08 April 2024

मराठी व्याकरण


 

           शब्दाच्या जाती 

 

1)नाम - 

जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात. 

उदाहरण - घर, आकाश, गोड 

 

2)सर्वनाम- 

 जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात. 

उदाहरण - मी, तू, आम्ही 

 

3) विशेषण- 

 जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात. 

उदाहरण - गोड, उंच 

 

4)क्रियापद-  

जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात. 

उदाहरण - बसणे, पळणे 

 

5)क्रियाविशेषण-  

जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात. 

उदाहरण - इथे, उद्या 

 

6) शब्दयोगी अव्यय-  

जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी 

 

 

7) उभयान्वयी अव्यय- 

 जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरण - व, आणि, किंवा 

 

8) केवलप्रयोगी अव्यय- 

 जे शब्द आपल्या मनातील वृत्तीकिंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात. 

उदाहरण - अरेरे, अबब

मागासवर्गीय आयोग

 सध्या मागासवर्गीय आयोग Current मध्ये आहेत.... येणाऱ्या Exams मध्ये यावर प्रश्न अपेक्षित आहेत....✅✅


🔴भारताच्या राष्ट्रपतींच्या मान्यतेने भारतीय राज्यघटनेच्या कलम 340 अंतर्गत 

राष्ट्रपती आदेशाद्वारे, "सामाजिक आणि शैक्षणिक परिस्थितीची चौकशी" करण्यासाठी आवश्यकतेनुसार योग्य वाटतील अशा व्यक्तींचा नेतृत्वाखाली आयोग नियुक्त करू शकतात.


📌आतापर्यंतचे मागासवर्गीय आयोग :-


📍1st मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 29 January 1953

➡️अंतिम अहवाल:- 30 मार्च 1955 रोजी सादर

➡️अध्यक्ष : काकासाहेब कालेलकर

➡️कार्य:- सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गाच्या परिस्थितीचा व पार्श्वभूमीचा अभ्यास करणे व 'शैक्षणिकदृष्ट्या मागास' म्हणून लोकांची निवड करण्याचे निकष ठरवले.

➡️अहवाल:- ज्यामध्ये असे म्हटले होते की भारतात 2399 मागास गट आहेत. त्यापैकी 837 'सर्वात मागास' आहेत आणि मागासलेपणाचा प्रमुख पुरावा म्हणून जातीचा उल्लेख केला. 


⚠️तथापि, केंद्र सरकारने, जातविहीन समाज निर्माण करण्याच्यादृष्टीने, शिफारसी नाकारल्या.


📍2nd मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 1 जानेवारी 1979

➡️अंतिम अहवाल:- 31 डिसेंबर 1980

➡️अध्यक्ष:- B.P. मंडल (बिहारचे CM)

➡️मुख्य उद्देश:- भारतातील सामाजिक किंवा शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गांची ओळख करून देणे आणि जातीय असमानता आणि भेदभाव दूर करण्यासाठी आरक्षणाचा विचार करणे हे मंडल आयोगाचे मुख्य उद्देश होते .

➡️वैशिष्ट्ये:- मागासलेपणा निश्चित करण्यासाठी अकरा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक निर्देशक वापरले

➡️शिफारसी:- ओबीसीना सरकारी नोकरीत आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांतर्गत नोकऱ्यांमध्ये 27 टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली.



📍3rd इतर मागासवर्गीय आयोग :-


➡️स्थापना:- 2 ऑक्टोबर 2017

➡️अहवाल: 31 जुलै 2023 रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सादर

➡️रचना :- चार सदस्यीय आयोग)

➡️अध्यक्ष:- दिल्ली H.C च्या माजी मुख्य न्या. जी.राहिणी

➡️सदस्य:-3

🔴1. जे.के. बजाज (चेन्नईच्या सेंटर फॉर पॉलिसी स्टडीजचे संचालक)

🔴2. गौरी बसू (भारतीय मानवशास्त्रीय सर्वेक्षण संचालक, कोलकाता)

🔴3. विवेक जोशी (रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त) 


➡️समितीचे सचिव:- यू. वेंकटश्वरालू

➡️या आयोगाला आत्तापर्यंत 14 वेळा मुदत वाढ देण्यात आली होती.

➡️उद्देश : ओबीसींमधील अधिक मागासलेल्यांना आरक्षणाच्या फायद्यांचा लाभ घेता यावा यासाठी आणि आरक्षणाच्या लाभांचे अधिक न्याय्य वितरणाचे सुनिश्चितीकरण आणि ओबीसींमध्ये उप-वर्गीकरण करता येईल असे निकष आणि मापदंड ठरवणे.

चालू घडामोडी प्रश्नसंच



प्रश्न – अलीकडील पुरातत्व उत्खननात 52000 वर्षे जुनी हडप्पा वसाहत कोठे सापडली?

उत्तर - गुजरात


प्रश्न – हवाई संरक्षण पोस्चर वाढवण्यासाठी लष्कराने अलीकडे कोणती प्रणाली समाविष्ट केली आहे?

उत्तर - आकाशीर


प्रश्न – अलीकडेच SCO सुरक्षा परिषदेच्या बैठकीत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोणी केले?

उत्तर - अजित डोवाल


प्रश्न – अलीकडेच, भारताने अणुऊर्जा क्षमता १ लाख मेगावॅटपर्यंत वाढवण्याचे लक्ष्य केव्हा ठेवले आहे?

उत्तर - 2047


प्रश्न – अलीकडेच DRDO ने कोणत्या राज्यात चाचणी केंद्रासाठी प्रकल्प सुरू केला आहे?

उत्तर - पश्चिम बंगाल


प्रश्न – कोणत्या देशाने नुकताच ऐतिहासिक अणु कायदा संमत केला आहे?

उत्तर - इस्रायल


प्रश्न – नुकताच राष्ट्रीय सागरी दिन कधी साजरा करण्यात आला?

उत्तर – ५ एप्रिल


प्रश्न – मुख्यमंत्री महिला सन्मान योजना नुकतीच कोठे सुरू होणार आहे?

उत्तर - दिल्ली


प्रश्न – अलीकडेच जागतिक भविष्य ऊर्जा शिखर परिषदेचे आयोजन कोण करणार आहे?

उत्तर - मसदर


प्रश्न – पॅरिस ऑलिम्पिकमध्ये नुकतीच भारताची पहिली महिला ज्युरी सदस्य कोण बनली आहे?

उत्तर - बिल्किस मीर


प्रश्न.1) केंद्रीय निवडणुक आयोगाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी कोणाची युथ आयकॉन म्हणून निवड केली आहे?

उत्तर - आयुष्यमान खुराणा


प्रश्न.2) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोण भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळ पटू ठरला आहे?

उत्तर - अर्जुन एरिगैसी


प्रश्न.3) FIDE ने जाहीर केलेल्या रँकिंग नुसार कोणता बुद्धिबळ खेळाडू जगात प्रथम क्रमांकावर आहे?

उत्तर - मॅग्नसन कार्लसन


प्रश्न.4) चंदीगड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय तायक्वादो स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या रूद्र पांडे याने कोणते पदक जिंकले आहे?

उत्तर - सुवर्ण 


प्रश्न.5) जागतिक बँकेच्या आर्थिक सल्लागार पॅनल मध्ये कोणत्या भारतीयाचा समावेश झाला आहे?

उत्तर - राकेश मोहन


प्रश्न.6) हिंदू पद्धतीने विवाह पार पाडण्यासाठी कन्यादानाची आवश्यकता नाही असा निर्णय कोणत्या उच्च न्यायालयाने दिला आहे?

उत्तर - अलाहाबाद


प्रश्न.7) WEF यंग ग्लोबल लीडर्स क्लास ऑफ २०२४ मध्ये किती भारतीयांचा समावेश झाला आहे?

उत्तर - 5 


प्रश्न.8) १५ वा CIDC विश्वकर्मा पुरस्कार २०२४ कोणत्या उद्योग समूहाला देण्यात आला आहे?

उत्तर - SJVN Ltd


प्रश्न.9) आशियाई ॲथलेटिक कमिटीच्या सदस्य पदी कोणाची निवड करण्यात आली आहे?

उत्तर - शायनी विल्सन


प्रश्न.10) आंतरराष्ट्रिय क्रिडा दीन कधी साजरा करण्यात येतो?

उत्तर - 6 एप्रिल

सामान्य ज्ञान प्रश्न आणि उत्तरे

Q : कांद्याच्या पेशी सुस्पष्ट दिसाव्यात यासाठी ____ हे अभिरंजक वापरले जाते? 

(अ) सॅफ्रनिन 

(ब) आयोडीन ✅

(क) इसॉसिन  

(ड) मिथेलिन ब्लू 


Q :__________ झाडाला कणखर आणि टणक बनवते? 

(अ) स्थूलकोन 

(ब) मूल ऊती 

(क) दृढकोण ऊती ✅

(ड) वायू ऊती 


Q : मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ पोरिफेरा या संघातील प्राण्यांची खालीलपैकी प्रमुख लक्षणे कोणती? 

(अ) खाऱ्या पाण्यात राहणारे 

(ब) शरीरावर शुकिकांचे आवरण असते 

(क) प्रचलन न करणारे 

(ड) वरील सर्व बरोबर  ✅


Q : अँनिलिडा सृष्टीतील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) गांडूळ  

(ब) लीच (जळू)

(क) नेरीस 

(ड) वरील सर्व ✅



Q : खालील वर्णनावरून मेटाझुआ उपसृष्टीतील प्राणी संघ ओळखा: 

(1) सर्वात मोठा प्राणी संघ (2) एकलिंगी प्राणी, लैंगिक प्रजनन करतात (3) डोके, वक्ष व उदार असे शरीराचे तीन भाग असतात. 

(अ) मोलुस्का 

(ब) आर्थोपोडा ✅

(क) एकायनोडर्माटा 

(ड) सीलेंटेराटा 



Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते? 

(अ) तारामासा 

(ब) सी- ककुंबर 

(क) सी-अर्चिन 

(ड) ऑफिऑथ्रिक्स 

(इ) वरील सर्व ✅


Q : एकट्या महाराष्ट्र राज्यात भारतातील एकूण उत्पादनापैकी 40% साठा कोणत्या खनिजांचा आहे? 

(अ) लोहखनिज 

(ब) मॅंगनीज 

(क) कोळसा ✅

(ड) यापैकी नाही 



Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _ मिळविण्यासाठी केला जातो? 

(अ) लोह

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) अँल्युमिनियम ✅



Q : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डी बांद्रामधून जपानला खालीलपैकी कोणत्या धातूची निर्यात होते? 

(अ) लोहखनिज ✅

(ब) मॅंगनीज 

(क) तांबे 

(ड) बॉक्साईट 



Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा खडकात आढळतो? 

(अ) सिलिका  

(ब) मॅंगनीज 

(क) लोहखनिज ✅

(ड) बॉक्साईट 


Q : खालील धातूंपैकी कोणता धातू जांभा / प्रामुख्याने आर्कियन खडकात आढळतो? 

(अ) मॅंगनीज  

(ब) लोहखनिज✅

(क) सिलिका 

(ड) बॉक्साईट 


उत्तर : कन्फयुजन आहे, कारण जांभा खडकात लोहखनिज आणि बॉक्साईट आढळते. 

प्राण्यांतील लैंगिक प्रजनन (Sexual Reproduction in Animals):


🌿काही प्राण्यांमध्ये नार आणि माधुरी ग्रंथी एकत्र असतात त्यांना उभयलिंगी प्राणी (Hermaphrodites) असे म्हणतात. उदा. लिव्हरफ्ल्यूक, हायड्रा, गांडूळ

🌿काही प्राण्यांमध्ये नार आणि मढी ग्रंथी भिन्न सजीवांमध्ये असतात त्यांना एकलिंगी प्राणी (Unisexual Animals) असे म्हणतात.

उदा. मानव, गुरे, कुत्रा, बेडूक, मासे, सॅप, पक्षी, पाल


🌿पराण्यांमधील प्रजनन प्रक्रियेसाठी ते अंडी घालतात किंवा पिल्लांना जन्म देतात या आधारे त्यांचे वर्गीकरण तीन गटात केले जाते.

🌷१) अंडज प्राणी (Oviparous) : जे प्राणी अंडी घालतात त्यांना अंडज प्राणी असे म्हणतात

उदा. बेडूक, कीटक, टोड, गोगलगाय, ऑकटोप्स, मासे, साप, पाल, पक्षी, (प्लॅटिपस आणि इकिडना सस्तनी प्राणी )


🌷२) जरायुज प्राणी (Viviparous): जे प्राणी पिल्लांना जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी असे म्हणतात.

उदा. मन, विंचू, झुरळ, देवमासा, शार्कमासा, समुद्री साप


🌷३) अंडजरायुज प्राणी (Oviviviparous): जे प्राणी फलित अंडी विकसित करतात आणि मादीच्या शरीरातून भ्रूण बाहेर सोडले जाते त्यांना अंडजरायुज प्राणी असे म्हणतात.

उदा. गप्पी मासे (Gambusia Fish), काही कीटक

महाराष्ट्रातील महत्वाचे प्रकल्प

🎯महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प

 

🔹खोपोली - रायगड              

🔸भिरा अवजल प्रवाह - रायगड                              

🔹कोयना - सातारा                

🔸तिल्लारी - कोल्हापूर          

🔹पच - नागपूर                      

🔸जायकवाडी - औरंगाबाद


🎯महाराष्ट्रातील अणुविधुत प्रकल्प                 

🔰तारापुर - ठाणे                    

🔰जतापुर - रत्नागिरी              

🔰उमरेड - नागपूर(नियोजित)


🎯महाराष्ट्रातील पवन विधुत प्रकल्प                     

🔘जमसांडे - सिंधुदुर्ग             

🔘चाळकेवाडी - सातारा           

🔘ठोसेघर - सातारा               

🔘वनकुसवडे - सातारा           

🔘बरह्मनवेल - धुळे                 

🔘शाहजापूर - अहमदनगर

नैसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती

♍️जग : वनसंपत्ती♍️ 


💠 उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.


💠 मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.


💠 समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.


💠 सचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.


♍️जग : पशुसंपत्ती ♍️


💠 समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.


💠 उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.


💠 परमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.


💠 परमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,


💠परमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.


💠परमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत


♍️जग : खनिजे व ऊर्जासाधने ♍️


💠 लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.


💠मगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.


💠 बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.


💠 जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.


💠 तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी


💠 चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.


💠 सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला


💠 कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.


💠निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.


💠 करोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.


💠शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश


💠 गधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.


💠 खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.


💠 नसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.


💠 दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.


💠 हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


♍️जग : शेती ♍️


💠गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश


💠 तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश


💠मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश


💠जवारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.


💠 बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.


💠 डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,


💠सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.


💠 भईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.


💠खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,


💠 पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.


💠 बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.


💠 सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,


💠 चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,


💠 कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,


💠कशर - स्पेन, भारत, इराण.


💠 कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,


💠 कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.


💠 ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.


💠 तबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,


💠 रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.


💠 ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.


💠 फले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.


महाराष्ट्रातील विद्युत प्रकल्प आणि जिल्हे



📍 महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प: 🚔🚔🚔🚔🚔


● तुर्भ-मुंबई, खापरखेडा : नागपूर.

● बल्लारपूर : चंद्रपूर.

● चोला : ठाणे.

● परळी बैजनाथ : बीड.

● पारस : अकोला.

● एकलहरे : नाशिक.

● फेकरी : जळगाव.


📍 महाराष्ट्रातील जलविद्युत प्रकल्प:🌷🌷🌷🌷🌷


● खोपोली : रायगड.

● भिरा अवजल प्रवाह : रायगड.

● कोयना : सातारा.

● तिल्लारी : कोल्हापूर.

● पेंच : नागपूर.

● जायकवाडी . औरंगाबाद.


📍 महाराष्ट्रातील अणुविद्युत प्रकल्प: 🍬🍬🍬🍬🍬


● तारापुर : ठाणे.

● जैतापुर : रत्नागिरी.

● उमरेड : नागपूर.


📍 महाराष्ट्रातील पवनविद्युत प्रकल्प:🍫🍫🍫🍫


● जमसांडे : सिंधुदुर्ग.

● चाळकेवाडी : सातारा.

● ठोसेघर : सातारा.

● वनकुसवडे : सातारा.

● ब्रह्मनवेल : धुळे.

● शाहजापूर : अहमदनगर. 

पोलीस भरती 2024


▪️  महाराष्ट्रास लागून मध्य प्रदेश राज्याची सीमा सर्वात लांब आहे.


▪️ महाराष्ट्रात कोकण प्रदेश उत्तरेकडे डहाणूपर्यंत तर दक्षिणेकडे तेरेखोल खाडीपर्यंत आहे 


* विदर्भातील तलाव मालगुजारी नावाने ओळखले जातात.


▪️ विदर्भातील गोंदिया जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.


▪️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी रत्नागिरी जिल्ह्यात चालते.


▪️महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा गोंदिया आहे, तर शहर ठाणे आहे.


▪️महाराष्ट्राचे पठार बेसॉल्ट या खडकाने बनलेले आहे.


▪️  महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला सह्याद्री म्हणून ओळखतात.


▪️महाराष्ट्रातील मुंबई जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे


▪️ महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.


▪️महाराष्ट्रात गडचिरोली जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.


▪️महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा- सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.


▪️ महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा- वर्धा.


▪️  महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जिल्हा नगर.


▪️  भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या महाराष्ट्रात आहे.


▪️भारतात सर्वात जास्त विद्युत निर्मिती महाराष्ट्रात होते.


▪️  महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना नाशिक येथे आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा अहमदनगर.


▪️भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा रायगड जिल्ह्यात आहे.


▪️ महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग) येथे पडतो.


▪️पढरपूर शहर भीमा नदीकाठी आहे. महाराष्ट्राची काशी म्हणतात.


▪️गोदावरी नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात.


▪️  परवरा नदीच्या खोऱ्यात उसाचे पीक मोठय़ा प्रमाणात घेतले जाते.


▪️गरम पाण्याचे झरे ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे आहेत.


▪️ जगप्रसिद्ध लोणार सरोवर बुलढाणा जिल्ह्यात आहे.


▪️  औरंगाबाद शहर बावन्न दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते.


▪️पणे जिल्ह्यातील जुन्नर शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.


▪️  महाराष्ट्रातील जायकवाडी प्रकल्पाला नाथसागर म्हणतात.


▪️ कोयना प्रकल्पावर वीज निर्मिती केली जाते म्हणून महाराष्ट्राची भाग्य लक्ष्मी असे म्हणतात.


▪️ कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर म्हणतात.


▪️विदर्भातील नंदनवन असे चिखलदरा थंड हवेच्या ठिकाणाला म्हणतात.


▪️  विदर्भातील कॅलिफोर्नियाचा असे वरुड व चांदूरबाजार तालुक्याला म्हणतात. कारण तेथे जास्तीत जास्त संत्रा पिकविला जातो.


▪️ महाराष्ट्रातील कापसासाठी प्रसिद्ध बाजारपेठ अमरावती येथे आहे.


▪️ विदर्भातील प्रसिद्ध आनंद सागर शेगाव येथे आहे.


▪️सत गजानन महाराजांची समाधी शेगाव जि. बुलढाणा येथे आहे.


▪️ सत गाडगेबाबा विद्यापीठ अमरावती येथे आहे.


▪️राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी मोझरी, जि. अमरावती 


▪️ सत गाडगेबाबांची समाधी अमरावती येथे आहे.


▪️बरह्मदेशाच्या थिबा राजाचा राजवाडा रत्नागिरी येथे आहे.


▪️  यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक येथे आहे.


▪️ महाराष्ट्र राज्यात तोफखाना प्रशिक्षण शाळा देवळाली, जि. नाशिक.


▪️पणे ही पेशव्यांची राजधानी आहे.


▪️ कोल्हापूर येथे देशातील गुळाची बाजारपेठ आहे.


▪️  आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म शिरढोण, जि. रायगड येथे झाला.


▪️ मबई शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात


▪️यशवंतराव चव्हाणांच्या समाधी स्थळास प्रीतीसंगम असे म्हणतात.


▪️ महाराष्ट्र पोलीस अॅकॅडमी नाशिक येथे आहे.


▪️नशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला येथे आहे.


▪️महात्मा गांधीजींचा सेवाग्राम आश्रम व विनोबा भावेंचा पवनार आश्रम वर्धा जिल्ह्यात आहे.


▪️शिखांची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहर प्रसिद्धी आहे.


▪️ महाराष्ट्रात नाशिक येथे कुंभमेळा भरतो.


▪️शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी येथे आहे.


▪️ जञानेश्वरांनी नेवासे या ठिकाणी ज्ञानेश्वरी लिहिली.


▪️तारापूर हे भारतातील पहिले अणुशक्ती केंद्र आहे.


▪️भारतातील पहिला पेट्रो रसायन प्रकल्प तुर्भे या ठिकाणी आहे.


▪️महाराष्ट्रातील सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा ठाणे.


▪️रायगड जिल्ह्यात- कातकरी, ठाणे जिल्ह्यात- वारली, यवतमाळ जिल्ह्यात- कोलाम या आदिवासी जमाती प्रामुख्याने आढळतात.


महाराष्ट्राशी सबंधित प्रश्नोत्तरे



◆ महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापला आहे ? 

उत्तर ----- 9.7 टक्के 


◆महाराष्ट्र राज्याला सर्वात लांब सीमा कोणत्या राज्याची लागते ?

 उत्तर --मध्ये प्रदेश . 


◆ महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात मासेमारी कोणत्या जिल्ह्यात चालते? 

उत्तर ----रत्नागिरी. 


◆ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता ?

 उत्तर -- गोंदिया. 


◆ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्त्रियांची संख्या पुरुषा पेक्षा जास्त आहे ?

 उत्तर ---रत्नागिरी. 


◆ महाराष्ट्रातील सर्वाधिक साक्षर जिल्हा कोणता? 

उत्तर --- सिंधुदुर्ग. 


◆ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोठे आहे ?

 उत्तर--नाशिक 


◆ महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?

उत्तर --अंबोली (सिंधुदुर्ग).


◆ महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोणत्या जिल्ह्यात आहेत? 

उत्तर ---ठाणे जिल्ह्यात वज्रेश्वरी येथे. 


◆ विदर्भातील नंदनवन कोणते? 

उत्तर----चिखलदरा. 


◆ संत गजानन महाराजाची समाधी कोठे आहे? 

उत्तर ----शेगाव जिल्हा बुलढाणा . 


◆ महाराष्ट्राचे आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे? 

उत्तर--नाशिक 


◆ महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी कुंभमेळा भरतो? 

उत्तर--नाशिक. 


◆ महाराष्ट्राच्या उत्तर सीमेला कोणत्या पर्वताची रांग आहे? 

उत्तर----सातपुडा. 


◆ महाराष्ट्रात चुंनखडीचे साठे कोणत्या जिल्ह्यात आहेत? 

उत्तर--यवतमाळ. 


◆ महाराष्ट्र राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग कोणता ?

 उत्तर---national highway 6. 


◆ स्वातंत्र्य वीर सावरकरांचे जन्मस्थान कोणते? 

उत्तर- भगुर (जी नाशिक ). 


◆ महाराष्ट्रातील शिखांची दक्षिण काशी कोणती? 

उत्तर--नांदेड. 


◆ महाराष्ट्राचे जावारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात? 

उत्तर--सोलापूर. 


◆ छत्रपती शाहू महाराजांनी गुळाची बाजारपेठ कोणत्या जिल्ह्यात स्थापन केली?

 उत्तर---कोल्हापूर येथे 1895 ला. 


◆ महाराष्ट्रातील कापसाची प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे? 

उत्तर--अमरावती. 


◆ पुणे जिल्ह्यातील कोणते शहर बटाट्याच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे? 

उत्तर--जुन्नर. 


◆ पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या काठी आहे?

 उत्तर---भीमा. 


◆ महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखरकारखाना कोठे स्थापन करण्यात आला होता?

 उत्तर---प्रवरानगर(जी अहमदनगर ). 


◆ महाराष्ट्रातील जिल्हयांची संख्या?उत्तर ---36. 


◆ महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

उत्तर ---- गोदावरी. 


◆ महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?उत्तर---गोदावरी. 


◆ महाराष्ट्रातील सर्वाधिक आवर्षंनग्रस्त जिल्हा कोणता? 

उत्तर---अहमदनगर. 


◆ संत गाडगेबाबाचे नाव दिलेले विद्यापीठ कोठे आहे ?

 उत्तर---अमरावती. 


◆ यशवंतरावांच्या समाधी स्थळास कोणते नाव देण्यात आले?

 उत्तर---प्रीतिसंगम 


◆ भारतातील पहिले पक्षी अभयअरण्य  कोठे स्थापन करण्यात आले?

 उत्तर--कर्नाळा जिल्हा रायगड. 


◆ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची समाधी कोठे आहे?

 उत्तर---मोझरी (जी. अमरावती.). 


◆ महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या प्रकल्पास म्हणतात? 

उत्तर--कोयना प्रकल्प. 


◆ महाराष्ट्रातील मातीचे धरण ?

 उत्तर--गांगपूर जिल्हा नाशिक. 


◆ महाराष्ट्रातील कोणत्या शहरास बावन्न दरवाज्यांचे शहर म्हणून ओळखले जाते?उत्तर--औरंगाबाद. 


◆ लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर---बुलढाणा.  

महाराष्ट्रातील पर्वत शिखरे

📌 महाराष्ट्र पठार निर्मिती ही   🌋जवालामुखीच्या  उद्रेकामुळे झालीआहे


📌 गरम पाण्याचे झरे हे ज्वालामुखी उद्रेकाचे पुरावे देतात


📌 यातूनच सहयाद्री पर्वतरांग तयार झाली जी प्रमुख पश्चिम वाहिनी आणि पुर्व वहिनी नद्यांची जलविभाजक बनली.


📌 महाराष्ट्र मध्ये सह्याद्री ची उंची ही उत्तरे कडून दक्षिणेकडे कमी कामी होत जाते


🔰 महाराष्ट्रातील प्रमुख पर्वत शिखरे 🔰


  🎇 कळसुबाई  1,646 मी अहमदनगर


  🎇 साल्हेर 1,567 मी नाशिक


  🎇 महाबळेश्वर 1,438 मी सातारा


  🎇 हरिश्चंद्रगड 1,424 मी अहमदनगर

  

  🎇 सप्तश्रृंगी 1,416 मी नंदुरबार


  🎇 तोरणा 1,404 मी पुणे 


  Trick 👇👇

🏆 कसा मी हसतो अत्रे तिला विचारतो 🏆


  🌸 क  = कळसुबाई

  🌸 सा  = साल्हेर

  🌸 मी  = महाबळेश्वर

  🌸 हा   = हरिश्चंद्रगड

  🌸 स   =सप्तश्रृंगी

  🌸 तो   = तोरणा

  🌸 अ  =  अस्तंभा

  🌸  तर  =  त्र्यंबकेश्वर

  🌸 तिला =  तौला

  🌸 वि    = विराट

  🌸 चा    = चिखलदरा

भारतीय नदी(INDIAN RIVERS)


*1 सिन्धु नदी* :-

•लम्बाई: (2,880km)

• उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट

• सहायक नदी:(तिब्बत) सतलुज, व्यास,

झेलम, चिनाब,

रावी, शिंगार,

गिलगित, श्योक जम्मू और कश्मीर, लेह

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*2 झेलम नदी*

•लम्बाई: 720km

•उद्गम स्थल: शेषनाग झील,

जम्मू-कश्मीर

•सहायक नदी: किशन, गंगा, पुँछ लिदार,करेवाल,

सिंध जम्मू-कश्मीर,

कश्मीर


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*3 चिनाब नदी*

•लम्बाई: 1,180km

•उद्गम स्थल: बारालाचा दर्रे के निकट

•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*4 रावी नदी*

•लम्बाई: 725 km

•उद्गम स्थल:रोहतांग दर्रा,

कांगड़ा

•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*5 सतलुज नदी*

•लम्बाई: 1440 (1050)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल

•सहायक नदी : व्यास, स्पिती,

बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*6 व्यास नदी*

•लम्बाई: 470

•उद्गम स्थल: रोहतांग दर्रा •सहायक नदी:तीर्थन, पार्वती,

हुरला


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*7 गंगा नदी*

•लम्बाई :2,510 (2071)km •उद्गम स्थल: गंगोत्री के निकट गोमुख से

• सहायक नदी: यमुना, रामगंगा,

गोमती,

बागमती, गंडक,

कोसी,सोन,

अलकनंदा,

भागीरथी,

पिण्डार,

मंदाकिनी, उत्तरांचल,

उत्तर प्रदेश,

बिहार,

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*8 यमुना नदी*

•लम्बाई: 1375km

•उद्गम स्थल: यमुनोत्री ग्लेशियर

•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,

टोंस, गिरी,

काली, सिंध,

आसन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*9 रामगंगा नदी*

•लम्बाई: 690km

•उद्गम स्थल:नैनीताल के निकट एक हिमनदी से

• सहायक नदी:खोन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*10 घाघरा नदी*

•लम्बाई: 1,080 km

•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)

• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,

कुवाना, राप्ती,

चौकिया

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*11 गंडक नदी*

•लम्बाई: 425km

•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,

त्रिशूल, गंगा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*12 कोसी नदी*

•लम्बाई: 730km

•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी

(गोंसाईधाम)

•सहायक नदी: इन्द्रावती,

तामुर, अरुण,

कोसी

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*13 चम्बल नदी*

•लम्बाई: 960 km

•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से

•सहायक नदी :काली सिंध,

सिप्ता,

पार्वती, बनास

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*14 बेतवा नदी*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*15 सोन नदी*

•लम्बाई: 770 km

•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से

•सहायक नदी:रिहन्द, कुनहा 


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*16 दामोदर नदी*

•लम्बाई: 600km

•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व

•सहायक नदी:कोनार,

जामुनिया,

बराकर झारखण्ड,

पश्चिम बंगाल


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*17 ब्रह्मपुत्र नदी*

•लम्बाई: 2,880km

•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)

•सहायक नदी: घनसिरी,

कपिली,

सुवनसिती,

मानस, लोहित,

नोवा, पद्मा,

दिहांग अरुणाचल प्रदेश, असम

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*18 महानदी*

•लम्बाई: 890km

•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर

•सहायक नदी: सियोनाथ,

हसदेव, उंग, ईब,

ब्राह्मणी,

वैतरणी मध्य प्रदेश,

छत्तीसगढ़,

उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*19 वैतरणी नदी*

• लम्बाई: 333km

•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*20 स्वर्ण रेखा*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,

झारखण्ड,

पश्चिम बंगाल

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*21 गोदावरी नदी*

•लम्बाई: 1,450km

•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से

•सहायक नदी:प्राणहिता,

पेनगंगा, वर्धा,

वेनगंगा,

इन्द्रावती,

मंजीरा, पुरना महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*22 कृष्णा नदी*

•लम्बाई: 1,290km

•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट

•सहायक नदी: कोयना, यरला,

वर्णा, पंचगंगा,

दूधगंगा,

घाटप्रभा,

मालप्रभा,

भीमा, तुंगप्रभा,

मूसी महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*23 कावेरी नदी*

•लम्बाई: 760km

•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी

•सहायक नदी:हेमावती,

लोकपावना,

शिमला, भवानी,

अमरावती,

स्वर्णवती कर्नाटक,

तमिलनाडु

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*24 नर्मदा नदी*

•लम्बाई: 1,312km

•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी

•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,

दूधी, बर्ना मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*25 ताप्ती नदी*

•लम्बाई: 724km

•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)

•सहायक नदी: पूरणा, बेतूल,

गंजल, गोमई मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*26 साबरमती*

•लम्बाई: 716km

•उद्गम स्थल: जयसमंद झील

(उदयपुर)

•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*27 लूनी नदी*

•उद्गम स्थल: नाग पहाड़ •सहायक नदी:सुकड़ी, जनाई,

बांडी राजस्थान,

गुजरात,

मिरूडी,

भारत वार्षिक पर्जन्यमान




अती कमी पर्जन्य [ ४० सेमी पेक्षा कमी ]प्रदेश

कच्छचे रन,
पश्चिम राजस्थान,
नैऋत्य पंजाब,
पश्चिम हरयाणा,
कश्मीर का उत्तरेकडील भाग
___________________________
कमी पर्जन्य [४० ते ६० सेमी पर्जन्य ] प्रदेश

पूर्व राजस्थान,
पश्चिम गुजरात,
पश्चिम पंजाब,
पूर्व हरियाणा,
दक्षिण भारतीय पठारावरील पर्जन्य छायेचा प्रदेश
___________________________

मध्यम पर्जन्य [६० ते १०० सेमी ] प्रदेश

भारताचा बहुतांश भाग
जम्मू कश्मीर चा नैऋत्य भाग,
उत्तर भारतीय मैदानी पश्चिम भाग,
मध्यप्रदेश व गुजरात राज्याचा का ही भाग,
महाराष्ट्र,
कर्नाटक,
आंध्रा प्रदेश,
तामिळनाडू चा भाग
____________________________
१०० ते १५० पर्जन्य प्रदेश

उत्तर प्रदेश के पूर्व भाग,
बिहार, 
पश्चिम बंगाल,
मध्य प्रदेश,
छत्तीसगढ़,
झारखंड,
उडीसा.

लोकसंख्या


राज्यांच्या सहकार्यान केंद्र शासनामार्फत दर दहा वर्षांनी जनगणना  घेण्यात येते व याद्वारे लोकसंख्येबाबत व्यापक माहिती उपलब्ध होते. सन 2011 मध्ये घेण्यात आलेली जनगणना  ही मालिकेतील 15वी  असून त्यानुसार राज्याची लोकसंख्या 11 24 कोटी तर त्यातील स्त्रियांचे प्रमाण 48.1% आहे. राज्याचा दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर 2001 – 2011 या कालावधीत 6.7% अंकांनी कमी झाला असून राष्ट्रीय पातळीवर तो 3.8 %  अंकांनी कमी झाला आहे. राज्यांमध्ये दशवार्षिक लोकसंख्या वृद्धीदर मध्ये नोंदवली गेलेली ही सार्वत्रिक घट आहे.



लोकसंख्या एक साधन संपदा


लोकसंख्या एक नैसर्गिक संसाधन आहे. लोकसंख्येची गुणवत्ता ही कार्यक्षमता, साक्षरता, बुद्धिमत्ता यावर अवलंबून असते. कोणत्याही देशातील उद्योगधंदे, शेती, व्यापार, खाणकाम, संरक्षणासाठी व व्यवसायाची प्रगती ही तेथील लोकसंख्येच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. लोकसंख्येमुळे देशाला संरक्षणासाठी मानवी शक्ती प्राप्त होते


महाराष्ट्रातील जल, भूमी, वने, खनिजे व प्राणी संसाधने इत्यादींचे वितरण अत्यंत असमान आहे. या संसाधनांना महत्त्व केवळ मानवामुळे प्राप्त झाले आहे. लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतात दुसरा क्रमांक लागतो.  इ. स.  2011 च्या जनगणनेनुसार  महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 11, 23, 72, 972 इतकी आहे. यामध्ये एका 51.9 % पुरुष व 48. 1% स्त्रिया आहेत. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 9. 29% लोकसंख्या महाराष्ट्रात राहते. 


लोकसंख्येची वाढ


1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थळ निर्मिती झाली. त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे 4 कोटी होती. त्यानंतर गेल्या 50 वर्षांमध्ये उद्योगधंदे, व्यापार, वाहतूक, पर्यटन, शेती यांच्या विकासामुळे जीवनात स्थिरता आली. रोजगारांच्या निर्मितीमुळे लोकांचे मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात स्थलांतर झाले. त्यामुळे लोकसंख्येत सतत वाढ झाली आहे.


दारिद्र्य, निरक्षरता, कुटुंबनियोजनाचा अपुरा प्रचार यामुळे जन्म दर जास्त आहे तर वैद्यकीय सुविधा, अन्नधान्याचा पुरवठा, साथीच्या रोगांवर नियंत्रण इत्यादींमुळे मृत्यूदर कमी होऊन महाराष्ट्रातील लोकसंख्येची वाढ झाली आहे. महाराष्ट्राच्या लोकसंख्या वाढीचा वेग भारताच्या लोकसंख्या वाढीपेक्षा कमी आहे. 1961 ते 1971 च्या काळात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर 27.45% इतका होता. तर भारताचा 24.8% होता. 1981 ते 1991 या काळात महाराष्ट्राच्या लोकसंख्या वृद्धीदर 25.73% इतका होता. यावेळी भारताचा लोकसंख्या वृद्धीदर 23. 85% होता. 2001 ते 2011 या दशकात महाराष्ट्राचा लोकसंख्या वृद्धीदर वेग 15.99 % आहे. ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 35.94% आहे. मुंबई मध्ये  सर्वात कमी लोकसंख्या वृद्धीदर (-) 7.57% नोंदला आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रथमच हा दर ऋणात्मक आहे.



लोकसंख्या वितरणावर परिणाम करणारे घटक :


महाराष्ट्रात लोकसंख्येचे वितरण असमान आहे. कोकण,पश्‍चिम महाराष्ट्रात लोकसंख्या जास्त असून औरंगाबाद व नागपूर विभागामध्ये लोकसंख्या विरळ आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या (9.84%) असून सर्वात कमी लोकसंख्या सिंधुदुर्ग (0.08%) जिल्ह्यात आहे. लोकसंख्येच्या वितरणावर मुख्यत्वे नैसर्गिक आर्थिक व सामाजिक घटकांचा परिणाम होतो.



1)  नैसर्गिक घटक :


महाराष्ट्राच्या पश्चिम भागात दक्षिण-उत्तर सह्याद्री पर्वत पसरलेला आहे. सह्याद्री पर्वत व त्यापासून निघणाऱ्या डोंगररांगेमुळे तसेच कोकणामध्ये उंच-सखल भूप्रदेश व दाट वने व तसेच पूर्व महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्येही वनक्षेत्र जास्त असल्याने लोकसंख्या कमी आढळते. महाराष्ट्र पठारावर सह्याद्रीच्या पूर्व भागात, नद्यांचा मैदानी भागात अनुकूल हवामान व सुपीक मृदा यामुळे लोकसंख्या दाट आढळते.



2) आर्थिक घटक :


मुंबई – पुणे, कोल्हापूर – इचलकरंजी, औरंगाबाद – जालना व नागपूर विभाग या प्रदेशात वाहतूक, उद्योगधंदे, व्यापाऱ यांचा विकास झाल्याने लोकसंख्या दाट आढळते. पश्चिम महाराष्ट्रात जलसिंचन सुविधांमुळे शेतीचा विकास झाला असल्यामुळे तसेच पूर्व महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, अमरावती या जिल्ह्यांमध्ये विविध प्रकारच्या खनिजांची उपलब्धता असल्याने तेथे जास्त लोकसंख्या आढळते.



लोकसंख्येची संरचना 


लिंग गुणोत्तर, वय संरचना,  साक्षरता, व्यवसाय, ग्रामीण-शहरी यावरून लोकसंख्येची रचना ठरते. जनगणनेतून उपलब्ध लोकसंख्येच्या रचनेची माहिती मिळते. या माहितीचा उपयोग लोकसंख्येची सद्यस्थिती व भविष्यातील नियोजनासाठी करता येतो.



अ) वय संरचना :


लोकसंख्येचे वयोगटानुसार विभाजन करता येते. सामान्यपणे 0 ते 14 वयोगट व 60 पेक्षा जास्त वयोगट वृद्धांचा (परावलंबी) समजला जातो तर 15 ते 59 वयोगट कार्यक्षम समजला जातो.  वय रचनेवरून राज्यात किती श्रमशक्ती उपलब्ध आहे व किती परावलंबी लोकसंख्या आहे याची माहिती मिळते तसेच नियोजन व विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी लोकसंख्येची वय रचना माहित असणे आवश्यक असते.


सामान्यपणे जन्मदर, मृत्युदर, स्थलांतर इत्यादी घटकांचा परिणाम वय रचनेवर होतो. इ.स.  2001 च्या जनगणनेनुसार काम करणाऱ्या लोकांचे प्रमाण 42% तर काम न करणाऱ्यांचे प्रमाण 58% होते. यामुळे आपल्या राज्यात कार्यक्षम लोकसंख्येचे प्रमाण कमी आहे. तसेच 50% मुलांचे प्रमाण व 8% वृद्धांचे प्रमाण आहे.


जनगणना 2011 नुसार राज्यातील सुमारे 20% लोकसंख्या किशोरवयीन गटातील (वय 10 ते 19 वर्षे) असून युवा गटाचे वय (वय 15 ते 24 ) प्रमाणही सारखेच आहे.


किशोरवयीन लोकसंख्येचे प्रमाण नंदुरबार जिल्हा मध्ये सर्वाधिक (23%) असून मुंबई शहरात सर्वात कमी (16.1%) आहे.


युवा लोकसंख्येचे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सर्वाधिक (20.5%) सिंधुदुर्गमध्ये ते सर्वात कमी (16.5%) आहे.


जनगणना 2011 नुसार राज्याची सुमारे 9.9% लोकसंख्या 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वय गटातील असून 2001 मध्ये हे प्रमाणात 8.7% होते.


राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण 2001 व 2011 करिता अनुक्रमे 7.4% व 8.6% आहे.  राज्यामध्ये 60 वर्ष व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींची सुमारे 5.12 लाख एक सदस्य कुटुंबे आहेत तर राष्ट्रीय पातळीवर अशा कुटुंबांची संख्या 49. 76 लाख आहे.


राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर ग्रामीण भागांमध्ये 60 वर्षे व त्यापेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींचा एक सदस्य कुटुंबांची संख्या अधिक आहे.

भूगोल :- मातीचे प्रकार व स्थान



◆गाळाची मृदा
सतलज-गंगा-ब्रह्मपुत्रा नद्यांच्या मैदानी प्रदेशात गाळाची मृदा आढळते. उत्तर भारतात पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, आसाम राज्यात गाळाची मृदा आहे.

◆काळी मृदा
दख्खनच्या पठारावर काळी मृदा आढळते. तिला रेगूर मृदा या नावानेही ओळखतात. बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांचे विदारण होऊन काळी मृदा तयार झाली आहे.

◆तांबडी मृदा
तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेशचा ईशान्य भाग, महाराष्ट्राचा आग्नेय भाग, ओडिशा, बिहार, राजस्थानातील अरवली टेकडय़ा, पूर्वेकडील खासी, जैतिया, नागा टेकडय़ा या भागांमध्ये तांबडी माती आढळते.

◆वाळवंटी मृदा
राजस्थानमधील अरवली पर्वताच्या पश्चिमेकडील संपूर्ण भागात वालुकामय माती आहे. पंजाब व हरियाणाचा दक्षिण भाग, गुजरातमधील सौराष्ट्र व कच्छच्या भागात ही माती पसरलेली आहे.

◆गाळाची मृदा
नद्यांमध्ये खाडय़ांमध्ये चिखल व मळीच्या संचयनाने गाळाची माती तयार होते. महाराष्ट्रात कोकण किनारपट्टीलगत सखल प्रदेशात गाळाची माती आहे, तिला भाबर मृदा असेही म्हणतात.


आपणास माहीत आहे का ?


⚜️ १) सेंद्रीय शेती करणारे भारतातील पहिले राज्य :- -----सिक्कीम


⚜️२) सेवा हमी कायद्यातील ३६९ सेवा ऑनलाइन देणारे देशातील पहिले राज्य :--------------महाराष्ट्र


⚜️३) देशात सर्वात प्रथम इ-रेशन कार्ड वितरीत केले गेले :------नवी दिल्ली


⚜️४) मतदाराना ऑनलाइन मतदान मतदान करून देणारे भारतातील पहिले राज्य :-----------गुजराथ


⚜️५) मृदा स्वास्थ कार्ड वापरणारे देशातील पहिले राज्य :--------पंजाब


६) प्रधानमंत्री जनधन योजनेची १००% यशस्वी अमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य:------------मेघालय


⚜️७) ब्ल्यू मॉरमॉन' या प्रजातीच्या फुलपाखराला राज्य फुलपाखरू घोषित करणारे भारतातील पहिले राज्य:- --------महाराष्ट्र


⚜️८) पंचायत निवडणुकीसाठी शैक्षणिक व इतर पात्रता बंधनकारक करणारे देशातील पहिले राज्य:- --------- राजस्थान


⚜️९) बालकांच्या जन्माबरोबर त्याचे आधार नोंदणी करणारे देशातील पहिले राज्य :-----------हरियाना


⚜️१०) सामाजिक छळाच्या घटनामध्ये दोषीवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतत्र कायदा करणार हे देशातील पहिलेच राज्य ठरले:--------महाराष्ट्र

पाणथळ प्रदेशाचे महत्त्व


परिसंस्थेचा अभ्यास

जागतिक अन्नसाखळीमध्ये जलीय परिसंस्थांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. या भागात पाणी पूर्णपणे किंवा अंशतः उथळ असते. 

सूर्यप्रकाशाच्या विपूल उपलब्धतेमुळे या परिसंस्थांमधील जैवविविधता लक्षणीय असते. 

यापूर्वी दलदलीच्या प्रदेशासंबंधी प्रश्न विचारण्यात आले होते. 

आगामी परीक्षेतसुद्धा यावर प्रश्न येऊ शकतात.

🌿🌿दलदलीय प्रदेश🌿🌿


दलदलीय प्रदेश हा जमीन आणि पाणी यांच्यामधील संक्रमणात्मक प्रदेश असतो त्याला 'इकोटोन' म्हणतात

. या भागात विविध जलीय वनस्पतींनी व्यापलेले हंगामी उथळ पाणीसाठे आढळतात. 

दलदलीय प्रदेश ठरविण्यासाठी तीन महत्त्वाचे घटक ठरतात.

१) प्रदेश कायमस्वरूपी पाण्याखाली असणे.

२) या भागात जलीय वनस्पतींचे अस्तित्व असणे.

३) जलसंपृक्त मृदा असणे.

दलदलीय प्रदेश हे जमीन आणि पाणी यादरम्यान नैसर्गिक बफर म्हणून कार्य करतात.

 दलदलीय परिसंस्था या आर्थिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाच्या असून अनेकांच्या उपजीविकेशी संबंधित आहेत.

🌾🌾संवर्धनाचे महत्त्व🌾🌾

दलदलीय प्रदेश हे विविध प्रकारे मानवासाठी महत्त्वाचे आहेत. 

विविध बुरशी, वनस्पती, वृक्ष आणि जलीय प्राण्यांचा अधिवास असणाऱ्या या परिसंस्थेची उत्पादकता खूप जास्त आहे. स्थलांतर करणाऱ्या जगभरातील ८०० पक्षी प्रजातींपैकी ५० % पेक्षा जास्त पाणथळ परिसंस्थांवर अवलंबून आहेत.

सौंदर्यदृष्टीनेसुद्धा दलदलीत परिसंस्था या अमूल्य आहेत.

 मात्र अनियंत्रित वापरामुळे आणि मानवी हस्तक्षेपामुळे या परिसंस्थांची हानी होत आहे. 

जगातील एक जैवविविधता संपन्न असणाऱ्या या परिसंस्थांचे संवर्धन करणे पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी अत्यंत निकडीचे आहे.

🌱🌱रामसर करार🌱🌱

इराणमधल्या रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१मध्ये हा दलदलीय प्रदेशसंबंधी आंतरराष्ट्रीय करार स्वीकारण्यात आला.

 हा करार पक्ष्यांचा अधिवास म्हणून पाणथळ परिसंस्थांचे संवर्धन आणि धोरणी वापर ही दोन मुख्य उद्दिष्ट्ये अधोरेखित करतो. 

जागतिक महत्त्व असणाऱ्या दलदलीत प्रदेशांची रामसर यादी हा या कराराचा महत्त्वाचा भाग आहे. २ फेब्रुवारीला हा करार स्वीकारल्यामुळे तो दिवस ‘जागतिक पाणथळी दिवस’ म्हणून साजरा केला जातो

. रामसर कराराचे तीन प्रमुख आधारस्तंभ हे धोरण वापर, रामसर यादी व आंतरराष्ट्रीय सहकार्य हे आहेत.

महाराष्ट्र स्थान, विस्तार, सीमा आणि प्रादेशिक/ राजकीय भूगोल


(२ मार्क - Combine 2024)❣️


🟢महाराष्ट्र स्थान आणि विस्तार


१. महाराष्ट्राचा अक्षवृत्तीय आणि रेखावृत्तीय विस्तार आणि त्यातील फरक पाठच करणे.( रेखावृतीय विस्तार मधील फरक  (8°14') या वरती प्रश्न येणे बाकी)

२.महाराष्ट्राची पूर्व-पश्चिम लांबी

 ३.महाराष्ट्राची दक्षिण उत्तर लांबी (या वरती प्रश्न येणे बकी आहे)

४.महाराष्ट्राचे क्षेत्रफळ

५.महाराष्ट्राच्या इतर राज्यांशी असलेल्या सीमा

-MH ची सीमा सर्वाधिक किंवा सर्वात कमी कोणत्या राज्यांना लागून आहे.

-इतर राज्यांच्या सीमेलगत असणारे जिल्हे -दोन राज्यांची सीमा करणारी जिल्हे.

६.महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

-विभागांचा क्षेत्रफळ,लोकसंख्या, तालुके जिल्हा नुसार क्रम (प्रश्न येणे बाकी आहे)

७.सर्वाधिक जिल्हे असणारा विभाग

८. सर्वात कमी जिल्हे असणारा विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)

९. सर्वाधिक तालुके असणारा विभाग 

१०.सर्वात कमी तालुके असणारा विभाग(प्रश्न येणे बाकी आहे)

११.विभागांच्या नकाशाचा अभ्यास आणि त्यांचे पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर बाजूचे तालुके (new trend-२०१९ पासून)

१२.एका जिल्ह्याच्या सीमा इतर जिल्ह्यांशी लागून आसणे व त्यांचे नकाशे

१३.जिल्हा निर्मिती

१४.जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसार क्रम(सर्वात मोठा/सर्वात लहान)(१ ते ३ पाठ करा)

१५.सर्वाधिक तालुके असणारे जिल्हे 

१६.सर्वाधिक कमी तालुके असणारे जिल्हे(प्रश्न येणे बाकी)


वारणा नदी :



सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते. ती  कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.

 

काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो. सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागावजवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.

 

सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत.

 

वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो. भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल  आहे. वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.

 

वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे. यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.

चालू घडामोडी :- 07 एप्रिल 2024

◆ जम्मू आणि काश्मीरमधील बिल्कीस मीरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पहिली भारतीय महिला ज्युरी सदस्य म्हणून इतिहास रचला आहे.

◆ हवाई संरक्षण स्थिती सुधारण्यासाठी लष्कराने "आकाशतीर" प्रणाली समाविष्ट करण्यात आली आहे.[भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) द्वारे विकसित]

◆ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेली मीराबाई चानू ही एकमेव भारतीय भारत्तोलक खेळाडू ठरली आहे.

◆ डार्क एनर्जी स्पेक्ट्रोस्कोपिक उपकरणाने विश्वाचा सर्वात मोठा 3D नकाशा बनवला आहे.

◆ संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेने इंटरसेक्स हक्कांसाठी ऐतिहासिक ठराव स्वीकारला आहे.

◆ अध्यक्ष अजय बंगा यांनी राकेश मोहन यांची जागतिक बँक समूहाच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे.

◆ जागतिक आरोग्य समस्यांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी आणि निरोगी जीवनाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 7 एप्रिल रोजी जागतिक आरोग्य दिन पाळला जातो.

◆ जागतिक आरोग्य दिन 2024 ची थीम "माझे आरोग्य, माझे हक्क" ही आहे.

◆ पहिला जागतिक आरोग्य दिन 7 एप्रिल 1950 रोजी साजरा करण्यात आला.

◆ रोमानियातील मॅगुरेले लेसर हे जगातील सर्वात शक्तिशाली लेसर बनले आहे.

◆ NATO ने संपूर्ण युरोप, उत्तर अमेरिकेत सामूहिक संरक्षणाची 75 वर्षे पूर्ण केली.

◆ डॉ. कार्तिक कोम्मुरी यांना प्रतिष्ठित राष्ट्रीय कीर्ती पुरस्कार मिळाला.

◆ EVI हा ह्यूमने विकसित केलेला जगातील पहिला भावनात्मक बुद्धिमत्तेसह क्रियामुख (इमोशनल इंटेलिजन्स वॉइस) AI आहे.

◆ लेफ्टनंट जनरल जेएस सिडाना यांनी EME चे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

◆ AVGARDE ने काउंटर ड्रोन तंत्रज्ञानातील राष्ट्रीय स्तरावरील नवकल्पनांसाठी DRDO डेअर टू ड्रीम 4.0 स्पर्धा जिंकली आहे.

◆ संतोष कुमार झा कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे नवे CMD पदी नियुक्त करण्यात आले आहे.

◆ FICCI महिला संघटनेच्या अध्यक्षपदी जयश्री दास वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ टाइम्स समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन यांना भारतीय वृत्त दूरदर्शनमधील योगदानासाठी ENBA जीवनगौरव पुरस्कार 2023 ने सन्मानित करण्यात आले आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━