भारताची राज्यघटना मधील महत्त्वाचे ६० प्रश्न

१).  राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यातील संबंध भारतीय संविधानातील खालीलपैकी कोणत्या कलमांनी विस्तृतपणे अधिराज्यीत होतात ?

   अ) कलम – 73 
   ब) कलम – 74   
  क) कलम – 76 
  ड) कलम – 78

   1) अ, ब आणि क 
  2) ब, क आणि ड   
  3) अ, ब आणि ड   
4) ब आणि ड केवळ

  उत्तर :- 4

२).  भारतात सरकारी आदेशावर मंत्र्यांची सही नसते.

     इंग्लंडमध्ये मात्र :
   अ) प्रत्येक सरकारी आदेशावर मंत्र्यांची प्रतिस्वाक्षरी असते.

   ब) राजाला न्यायालयात नेता येत नाही कारण “राजा चुक करू शकत नाही.”
        वरील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   1) अ  
   2) ब  
   3) दोन्ही  
   4) एकही नाही

उत्तर :- 3

३). भारताच्या महान्यायवादींसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

   अ) त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही.

   ब) भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.

   क) त्यांच्या पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे.

         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब   
   2) फक्त ब  
   3) ब आणि क   
   4) अ आणि क

   उत्तर :- 1

४). खालील बाबींचा विचार करा.

   अ) भारतीय संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.

   ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने  दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही.

   1) अ व ब दोन्ही बरोबर आहेत.
   2) ब बरोबर व अ चूक आहे.
   3) अ बरोबर व ब चूक आहे.  
   4) अ व ब दोन्ही चूक आहेत.

    उत्तर :- 2

५) . महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर निर्वाचित होणा-या सदस्यांची एकूण सदस्य संख्या ........................ आहे.

   1) 288 
   2) 19   
   3) 48    
   4) 67

   उत्तर :- 4

६). खालील विधाने लक्षात घ्या.

   अ) केंद्रीय कार्यकारीची सर्व सत्ता भारताचे राष्ट्रपतीचे ठिकाणी विहित आहे.

  ब) भारताच्या राष्ट्रपतीला पंतप्रधान व मंत्रीमंडळाच्या सल्ल्याची गरज नाही.

   क) भारताच्या राष्ट्रपतीला लोकसभागृहाचे विसर्जन करण्याचा अधिकार आहे.

         भारताच्या राष्ट्रपतीच्या संदर्भात वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत  ?

   1) अ, ब  
  2) ब, क    
  3) अ, क    
  4) वरील सर्व

   उत्तर :- 3

७) . राष्ट्रपतीस सहाय्य व सल्ला देण्यासाठी एक मंत्रीपरिषद असते व राष्ट्रपती त्या सल्ल्यानुसार कार्ये पार पाडतात.

   अ) राष्ट्रपती मंत्रीपरिषदेस सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकत नाहीत.

   ब) मंत्रीपरिषदेने सल्ला दिला होता काय याबाबत केवळ सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

   क) संसदेचा सदस्य राहण्यास अनर्ह ठरल्यास व सदस्यत्वाचा कालावधी समाप्त होण्यापूर्वी त्याने निवडणूक लढविल्यास तो निवडून आल्याचे घोषित होईपर्यंत तो मंत्री म्हणून राहू शकेल.

   1) अ व ब योग्य  
   2) अ, क योग्य 
   3) ब व क योग्य
   4) तिन्ही अयोग्य

    उत्तर :- 4



८) . खालील विधाने विचारात घ्या .

   अ) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर मंत्रीमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक करण्यात आलेला आहे, परंतु अशी तरतूद राज्यपालाबाबत करण्यात आलेली नाही.

   ब) मंत्र्यांनी राज्यपालास काही सल्ला दिला होता काय आणि असल्यास कोणता, या  प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी करता येणार नाही.

   1) विधान अ बरोबर, ब चुक

   2) विधान अ चुक, ब बरोबर

   3) दोन्हीही विधाने चुकीची 

  4) दोन्हीही विधाने बरोबर

   उत्तर :- 4

९). भारतीय राज्यव्यवस्थेच्या संदर्भात खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत ?

   अ) मंत्रिमंडळ संसदेला संयुक्तरीत्या जबाबदार असते.

   ब) प्रत्येक मंत्री संसदेला वैयक्तिकरीत्या उत्तरदायी नसतो.

   क) पंतप्रधानाला आपले सहकारी निवडण्याचे स्वातंत्र्य असते.

   ड) अल्पसंख्यांकांसाठी मंत्रिमंडळात राखीव जागा असतात.

   1) अ, ब आणि क   
   2) अ आणि क  
  3) ब आणि ड   
  4) ब, क आणि ड

  उत्तर :- 3

१०) . भारताच्या ॲटर्नी जनरल संदर्भातील खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत  ?

   अ) ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात.

   ब) ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात.

   क) ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकतात.

    1) वरील सर्व विधाने सत्य आहेत.
    2) फक्त अ सत्य आहे.
    3) कोणतेही विधान सत्य नाही.
    4) फक्त अ आणि ब सत्य आहेत.

    उत्तर :- 4

११).  जोडया लावा.

   अ) मूलभूत अधिकार      i) जर्मनीचे वायमर संविधान

   ब) निती निर्देशक तत्वे      ii) कॅनडाचे संविधान

   क) केंद्र सरकारला उर्वरित अधकार    iii) आयरिश संविधान

   ड) आणीबाणी        iv) अमेरिकेचे संविधान

  अ  ब  क  ड

         1)  iv  i  iii  ii
         2)  iv  iii  i  ii
         3)  iv  iii  ii  i
         4)  I  iii  iv  ii

        उत्तर :- 3

१२) भारतीय संविधानाची वैशिष्टये आणि त्यांच्या स्त्रोतांच्या योग्य जोडया लावा.

   अ) एकेरी नागरिकत्व    i) ब्रिटीश राज्यघटना

   ब) मूलभूत हक्क      ii) फ्रान्स राज्यघटना

   क) स्वातंत्र्य, समता, बंधुता  iii) कॅनेडियन राज्यघटना

   ड) उर्वरित अधिकार    iv) अमेरिकेची राज्यघटना
  अ  ब  क  ड

         1)  iv  iii  i  ii
         2)  i  iv  ii  iii
         3)  iii  i  iv  ii
         4)  i  iii  iv  ii

     उत्तर :- 2

१३). राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?

   1) बिहार 
   2) केंद्रीय प्रांत 
   3) बाँम्बे    
   4) पंजाब

   उत्तर :- 2

१४) . सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा .

   अ) समतेचे तत्व  
   ब) स्वातंत्र्याचे तत्व  
   क) संघराज्य  
   ड) समाजवादी संरचना
   इ) न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार 
  फ) धर्मनिरपेक्षता

   1) अ, ब, क, ड, इ, फ 
   2) अ, क, इ, फ  
   3) अ, ब, क, ड, फ 
   4) अ, ब, क, इ, फ

    उत्तर :- 2

१५) खालील विधानांचा विचार करा.
   अ) डॉ. बी.आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

   ब) श्री. एच.जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.

   1) ब बरोबर आहे 
   2) अ बरोबर आहे   
   3) दोन्ही बरोबर आहेत
   4) दोन्ही चूक आहेत

    उत्तर :- 2

१६) .भारतीय संसद कोणते घटक मिळून बनलेली असते ?

   1) विधानसभा, विधानपरिषद, राज्यपाल

    2) राष्ट्रपती, राज्यसभा, लोकसभा

   3) विधानसभा, राष्ट्रपती, राज्यपाल

   4) राज्यसभा, विधानपरिषद, लोकसभा

   उत्तर :- 2

१७) . राष्ट्रपतींकडून लोकसभेमध्ये ...................... अँग्लो इंडियन सदस्य नेमले जातात.

   1) तीन 
   2) दोन   
   3) चार  
   4) पाच

उत्तर :- 2

१८) . सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पध्दतीचे विधिमंडळ असते ?

     1) व्दिगृही   
      2) एकगृही   
      3) बहुगृही
      4) यापैकी नाही

      उत्तर :- 1

१९) . संसदेच्या दोन अधिवेशनांमधील अंतर .....................  महिन्यांपेक्षा कमी असावे.

   1) दोन   
   2) तीन   
   3) चार   
   4) सहा

   उत्तर :- 4

२०) . दोन्ही विधाने वाचा व अचूक पर्याय निवडा :

   अ) 1976 सालच्या एक घटनादुरुस्तीव्दारे मतदार संघांची पुनर्रचना 2001 च्या जणगणनेपर्यंत तहकूब करण्यात आली.

   ब) परिसिमन आयोगाद्वारे 2003 मध्ये निर्धारित करण्यात आलेल्या मतदार संघामध्ये 2004 सालच्या सार्वत्रिक निवडणूका पार  पडल्या.

   1) दोन्ही विधाने चुकीची आहेत. 

   2) विधान (अ) चुकीचे आहे.

   3) विधान (ब) चुकीचे आहे.   

   4) दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि         (ब) हा (अ) चा परिणाम आहे.

उत्तर :- 3

२१) संसदेकडे खालीलपैकी कोणाला पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत ?

   अ) महालेखापाल 

  ब) सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश

   क) मुख्य निवडणूक आयुक्त 

   ड) उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

   1) अ, ब, क आणि ड   
   2) अ, ब आणि ड  
   3) अ, ब, क  
   4) अ, क आणि ड

उत्तर :- 1

२२) महिलांच्या लोकसभेतील प्रतिनिधीत्वासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

   अ) पहिल्या लोकसभेत केवळ 4.4% महिला सदस्या होत्या.

   ब) 16 व्या लोकसभेत त्या सहापट वाढल्या आहेत.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे/ त  ?

   1) अ    
   2) ब    
   3) अ, ब   
   4) यापैकी नाही

    उत्तर :- 1

२३) पुढीलपैकी कोणत्या राज्यांची लोकसभेच्या जागांमध्ये एक जागा निर्धारित करण्यात आली आहे.

   अ) मिझोराम  
   ब) नागालँड   
   क) त्रिपुरा  
   ड) सिक्कीम
   इ) गोवा 
  फ) चंदीगढ   
  ज) मणीपूर

   1) अ, ब, क, ड, इ
   2) अ, ब, ड, फ 
   3) अ, ब, ड  
   4) ब, क, ड, ज

   उत्तर :- 3

२४). लोकसभेविषयी कोणती विधाने  सत्य आहेत ?

   अ) ती संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे.

   ब) केवळ तिलाच केंद्रपातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे.

   क) ती सर्वस्वी सार्वभौम आहे.

   ड) ती जनतेला उत्तरदायी आहे.

   1) अ आणि ब  
   2) ब, क आणि ड  
   3) अ, ब आणि ड
   4) अ आणि ड

   उत्तर :- 4

२५). बिनविरोध निवडून येणा-या लोकसभेच्या पहिल्या महिला सभापती कोण  ?

   1) विजयालक्ष्मी पंडित
   2) इंदिरा गांधी   
   3) शीला दक्षित  
   4) मीरा कुमार

   उत्तर :- 4

२६).  देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.

   1) राज्य विधिमंडळ 
   2) कार्यकारी मंडळ  
   3) संसद 
   4) न्यायमंडळ

    उत्तर :- 3

२७) सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.

   1) संसद सदस्य    
   2) मुख्य निर्वाचन आयुक्त   
   3) विद्यापीठाचे कुलगुरू
   4) चौकशी आयोगाचे प्रमुख

उत्तर :- 1

२८) घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर  होऊ शकते ?

   1) 2016 
   2) 2021   
   3) 2026   
   4) 2031

    उत्तर :- 3

२९) .  विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
     कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

   1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.

   4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर
आहे.

उत्तर :- 2

३०) .  राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

   1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा

   2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा

   3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला

   4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा

    उत्तर :- 1

३१).  खालीलपैकी कोणते वाक्य चुकीचे आहे ?

   1) घटना समितीची पहिली सभा 9 डिसेंबर 1948 रोजी झाली.

   2) 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने भारताची राज्यघटना स्वीकृत केली.

   3) 26 जानेवारी 1950 रोजी भारताची राज्यघटना अंमलात आली.

   4) राज्यघटना तयार करण्यासाठी घटना समितीला 2 वर्षे 11 महिने 17 दिवस म्हणजे जवळपास तीन वर्ष लागले.

उत्तर :- 1

३२).  भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष होते ?

   1) डॉ. राजेंद्र प्रसाद   
   2) डॉ. बी. आर. आंबेडकर
   3) जे.बी. कृपलानी 
   4) सरदार वल्लभभाई पटेल

    उत्तर :- 1

३३).  संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ............ च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले ?

   1) अमेरिका  
   2) ऑस्ट्रेलिया 
   3) जर्मनी  
   4) फ्रान्स

   उत्तर :- 2

३४) . भारतीय संविधान हे “भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल” असे कोणी म्हटले ?

   1) पंडित नेहरू
   2) मान्वेंद्रनाथ रॉय
   3) महात्मा गांधी 
   4) डॉ. आंबेडकर

   उत्तर :- 3

३५).  खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्टये आहे ?

   1) भारत धार्मिक राज्य आहे 
   2) भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे
   3) भारत भांडवलशाही राज्य आहे                          
   4) भारत सर्वकषवादी राज्य आहे

   उत्तर :- 2
३६) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) भारतीय संविधानाने ब्रिटीश संसदीय प्रारुपाचे अनुकरण केले आहे.

   ब) भारतात संविधान सर्वश्रेष्ठ आहे, संसद नव्हे.

   क) भारतातील न्यायालयांना संसदेने पारित केलेल्या कायद्याची संविधानिकता तपासण्याची सत्ता प्राप्त नाही.

         वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) फक्त अ   
   2) अ व ब 
  3) अ व क 
  4) अ, ब आणि क

उत्तर :- 2

३७) खालीलपैकी कोणती राज्यघटनेची मुलभूत वैशिष्टये समजता येतील ?

   अ) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व 
   ब) न्यायालयीन पुनर्विलोकन
   क) कल्याणकारी राज्य 
    ड) घटनादुरुस्ती बाबतचे संसदेचे मर्यादित अधिकार

     1) अ, ब, क 
     2) अ, ब
     3) अ, ब, ड
     4) अ, ब, क, ड

उत्तर :- 4

३८) भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ?

      1) पंडित जवाहरलाल नेहरू
     2) सच्चिदानंद सिन्हा
     3) डॉ. राजेंद्र प्रसाद 
    4) डॉ. बी. आर. आंबेडकर

    उत्तर :- 4

३९) संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते ?

     1) डॉ. बी. आर. आंबेडकर
     2) डॉ. राजेंद्र प्रसाद
     3) जवाहरलाल नेहरू
     4) बी. एन. राव

उत्तर :- 4

४०). संघीय शासन व्यवस्थेमध्ये  ?

      1) सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते

      2) सत्तेचे विकेंद्रीकरण केलेले असते

     3) यामध्ये केवळ एकच सरकार असते

   4) यामध्ये केवळ प्रांतीय सरकारे असतात

उत्तर २

४१).  भारताच्या राष्ट्रीय ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते ?

   1) डॉ. राजेंद्र प्रसाद 
   2) डॉ. बी. आर. आंबेडकर   
   3) जे. बी. कृपलानी   
  4) सरदार वल्लभभाई पटेल

   उत्तर :- 1

४२) संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व ........... च्या राज्यघटनेवरून स्वीकारले गेले ?

   1) अमेरिका 
   2) ऑस्ट्रेलिया 
   3) जर्मनी  
   4) फ्रान्स

   उत्तर :- 2

४३) भारतीय संविधान हे “भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल” असे कोणी म्हटले ?

   1) पंडित नेहरू 
  2) मान्वेंद्रनाथ रॉय 
  3) महात्मा गांधी  
  4) डॉ. आंबेडकर

   उत्तर :- 3

४४) खालीलपैकी भारतीय राज्यघटनेचे कोणते एक वैशिष्टये आहे ?

   1) भारत धार्मिक राज्य आहे
  
  2) भारत धर्मनिरपेक्ष राज्य आहे

   3) भारत भांडवलशाही राज्य आहे  
 
4) भारत सर्वंकषवादी राज्य आहे

  उत्तर :- 2

४५).  खाली दिलेली भारतीय राज्यघटनेची वैशिष्टये आणि त्यासमोर दिलेले स्त्रोत तपासून योग्य पर्याय निवडा ?

   अ) कॅबिनेट व्यवस्था – फ्रान्स 
'   ब) मूलभूत हक्क – सोव्हिएत युनियन
   क) उर्वरित अधिकार – ऑस्ट्रेलिया            ड) मार्गदर्शक तत्वे – जर्मनी

   1) अ आणि ब बरोबर, तर क आणि ड चूक आहेत

   2) अ, क, ड बरोबर, तर ब चूक आहे

   3) सगळे चूक आहेत

   4) क आणि ड बरोबर, तर अ आणि ब चूक आहेत

उत्तर :- 3

४६). खालीलपैकी कोण संविधान सभेच्या सदस्या होत्या ?

   अ) विजया लक्ष्मी पंडीत
    ब) सुब्बलक्ष्मी 
    क) सुचेता कृपलानी  
    ड) सरोजीनी नायडू

   1) अ आणि ब केवळ 
   2) अ, क आणि ड  
   3) ब, क आणि ड    
   4) अ, ब आणि ड

    उत्तर :- 2

४७). भारतातील राष्ट्रपतींव्दारे होणारी राज्यपालाची निवड पध्दत कोणत्या देशाकडून स्वीकारली आहे ?

   1) कॅनडा   
   2) ऑस्ट्रेलया  
   3) यू.एस.ए    
   4) वरीलपैकी एकही नाही

    उत्तर :- 1

४८.) भारतीय राज्यघटनेच्या स्त्रोताबाबतच्या खालील विधानांचा विचार करा.

   अ) संसदीय लोकशाही – ब्रिटीश राज्यघटना    

ब) संघराज्य – अमेरिकेची राज्यघटना

   क) मार्गदर्शक तत्वे – आयर्लंडची
राज्यघटना    

ड) सामायिक सूची – ऑस्ट्रेलियाची

राज्यघटना आता बरोबर असलेल्या विधानांची निवड करा.

   1) अ एकमेव बरोबर आहे. 

    2) अ आणि ब बरोबर आहेत.

   3) अ, ब आणि क बरोबर आहेत.  

    4) सर्व बरोबर आहेत.

    उत्तर :- 4

४९).  राज्यघटनेने प्रशासकीय आणि वैधानिक एकता राखण्यासाठी खालील तत्वांचा स्वीकार केला आहे .

   अ) एकेरी न्यायव्यवस्था  

   ब) मूलभूत नागरी व फौजदारी कायद्याबाबत समानता

   क) समान अखिल भारतीय सेवा

   1) अ, क   
   2) अ, ब  
   3) ब, क   

   4) वरील सर्व

     उत्तर :- 4

५०). योग्य जोडया लावा.
  तरतूदी        स्त्रोत
         अ) कायद्याचे राज्य    i) ऑस्ट्रेलिया
         ब) घटनादुरस्ती प्रक्रिया  ii) इंग्लंड
         क) समवर्ती सूची    iii) दक्षिण आफ्रिका

     अ  ब  क
         1) ii  iii  i
         2) i  ii  iii
         3) iii  ii  i
         4) iii  i  ii

         उत्तर :- 1

५१) .  भारतीय संघराज्य व्यवस्था स्वीकारण्या मागचा उद्देश खालीलपैकी कोणता आहे ?

   1) सत्ता विभाजन 
   2) पक्षविरहीत लोकशाही   
   3) न्यायालयीन स्वातंत्र्य 
   4) लोकशाही विकेंद्रीकरण

   उत्तर :- 4

५२) .   संविधान सभेच्या उद्घाटन सत्रामध्ये अध्यक्षांनी कोणत्या देशांच्या सदिच्छा संदेशाचे वाचन केले होते ?

   अ) संयुक्त राज्य अमेरिका 
   ब) यू.एस.एस. आर
   क) चीन प्रजासत्ताक 
   ड) ऑस्ट्रेलियाचे सरकार

   1) अ, ब, ड 
  2) अ, क, ड 
  3) अ, ब, क  
  4) ब, क, ड

  उत्तर :- 2

५३).   जोडया लावा. (संविधान सभेच्या समित्या व त्याचे अध्यक्ष)

   अ) संघ अधिकार समिती      i) जे.बी. कृपलानी 

   ब) वित्त व स्टाफ समिती      ii) एच.सी. मुखर्जी

   क) अल्पसंख्याक उपसमिती    iii) राजेंन्द्र प्रसाद

   ड) मुलभूत अधिकार उपसमिती    iv) जवाहरलाल नेहरु

  अ  ब  क  ड

         1)  i  iv  ii  iii
         2) i  ii  iii  iv
         3) iv  iii  ii  i
         4) iv  ii  iii  i

उत्तर :- 3

५४).  कोणत्या अल्पसंख्यांक समाजाला घटना परिषदेत विशेष प्रतिनिधित्व देण्यात आले ?

   1) शीख 
  2) ख्रिश्चन  
  3) अनुसूचित जाती  
  4) अनुसूचित जमाती

   उत्तर :- 1

५५) . संविधान सभेच्या समित्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती  जुळत नाही  ?

  समित्या      अध्यक्ष
         1) सुकाणू समिती         -   डॉ. राजेंद्र प्रसाद

         2) कामकाज समिती         -   के.एम. मुन्शी

         3) मुलभूत हक्क उपसमिती -  जे.बी. कृपलानी

         4) अल्पसंख्याक उपसमिती -  मौलाना अबुल कलाम आझाद

उत्तर :- 4

५६) . भारतीय राज्यघटनेच्या नवनिर्मिती क्षमतेचे पुरावे म्हणून पुढे केलेल्या खालील तरतुदींचा विचार करा.

   अ) प्रबळ केंद्र आणि केंद्र आणि घटकराज्ये यात अधिकार वाटणी

   ब) एकात्म न्यायसंस्था

   क) अखिल भारतीय प्रशासकीय सेवा

   ड) एकेरी नागरिकत्व

        वरील विधानापैकी कोणते बरोबर आहे/ आहेत ?

   1) अ   
   2) अ, ब   
   3) अ, ब, क
   4) सर्व

   उत्तर :- 4

५७).  भारतीय संघराज्याचे वर्णन आणि लेखक यांची जुळणी करा :

   अ) संघराज्याची दुय्यम वैशिष्टये  असलेले एकात्म राज्य          i) सर आयव्हर जेनिंग्ज

   ब) पूर्णपणे संघराज्यही नाही पूर्णपणे एकात्म राज्यही नाही परंतु दोन्हींचा संयोग असलेले    ii) ग्रॅनव्हीले ऑस्टीन

   क) प्रबळ केंद्रिकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य            iii) दुर्गा दास बसु

   ड) एकात्म किंवा अद्भूत प्रकारचे संमिश्र राज्य              iv) के.सी. व्हिअर

  अ  ब  क  ड

         1)  iv  iii  i  ii
         2)  i  ii  iii  iv
         3)  iii  iv  ii  i
         4)  ii  i  iv  iii

         उत्तर :- 1

५८) .  घटना समितीमध्ये ब्रिटीश भारतातील, चीफ कमिशनर प्रांतातील आणि भारतीय संस्थानातील किती प्रतिनिधी होते ?

   1) 290 – ब्रिटीश भारत, 6 – चीफ कमिशनर प्रांत, 93 – भारतीय संस्थाने

   2) 292 – ब्रिटीश भारत, 4 – चीफ कमिशनर प्रांत, 93 – भारतीय संस्थाने

   3) 296 – ब्रिटीश भारत, 4 – चीफ कमिशनर प्रांत, 89 – भारतीय संस्थाने

   4) 296 – ब्रिटीश भारत, 6 – चीफ कमिशनर प्रांत, 87 – भारतीय संस्थाने

उत्तर :- 2

५९)  ‘कॅबिनेट मिशन योजना’ संदर्भात जुळणी करा :

   अ) निवडावयाची एकूण सदस्य संख्या  i) 292

   ब) संस्थानिक राज्यांचे प्रतिनिधी    ii) 4

   क) उच्च आयुक्तांचे प्रांत प्रतिनिधी    iii) 93

   ड) प्रांतांचे प्रतिनिधी      iv) 389
  अ  ब  क  ड
         1)  iv  iii  ii  i
         2)  i  ii  iii  iv
         3)  ii  i  iv  iii
         4)  iii  iv  i  ii

      उत्तर :- 1

६०).  राज्यघटनेच्या मसुद्यावर ‘वकिलांचे नंदवन’ अशी टिका केली जाते, त्याची कारणे अशी आहेत.

   1) मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांनाच परिचित आहे.

   2) तरतुदीमागील ध्वन्यर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीलाच समजू शकतो.

   3) मसूदा लोकांना सत्यापासून दूर नेतो म्हणतात.

   4) मसुदा समितीतील सातपैकी तीन सभासद त्या काळातील कायदेतज्ञ होते.
    
   वरीलपैकी कोणते विधान असत्य आहे ?

उत्तर :- 4

सराव प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )


1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार --------- हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे 

समानतेचा हक्क

स्वातंत्र्याचा हक्क

घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क

धार्मिक स्वांत्र्याचा हक्क


● उत्तर - घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क


2. कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

३२ साव्या

३९ साव्या

४२ साव्या

४४ साव्या


● उत्तर - ४२ साव्या


3. राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?

महाभियोग

पदच्युत

अविश्र्वास ठराव

निलंबन


● उत्तर - महाभियोग


4. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?

३०

२५

४०

३५


● उत्तर - ३५


5. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?

मार्गदर्शक तत्वे

शिक्षण

पैसा

मुलभूत हक्क


● उत्तर - मुलभूत हक्क


6. मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?

दिवाणी न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

उच्च न्यायालय

फौजदारी न्यायालस


● उत्तर - सर्वोच्च न्यायालय


7. राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?

सर्वोच्च न्यायालयात

फक्त लोकसभेत

फक्त राज्यसभेत

संसदेत


● उत्तर - फक्त राज्यसभेत


8. खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?

अर्थविधेयक मंजूर करणे

सामान्य विधेयक मंजूर करणे

मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे

राष्ट्रपतीच्या निवडणूकीत भाग घेणे


● उत्तर - मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे


9. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?

स्वातंत्र्य

समता

न्याय

बंधुभाव


● उत्तर - न्याय


10. महाराष्ट्रच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?

५५

६५

७८

८७


● उत्तर - ७८


.......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो .

1) calcium 

2) magnesium

3) जस्त

सोडियम✅




पचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कीती कार्यकाळासाठि होते.

1) दिड वर्षे 

2) अडिच वर्षे✅

3) पाच वर्षे

4) एक वर्षे


आवर्तसारणीच्या मध्यातील 3 ते 12 गणातील संकरामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम .....कक्षा अपूर्ण असतात.

1) एक

2) दोन✅

3) तीन

4) चार


सिलिकॉन या मूलद्रव्यांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत  समरपक पणे करता येईल.

1) वाहक

2) रोधक

3) अर्धवाहक✅

4) या पैकी नाही


घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे.

1) स्थानांतरणीय

2) परिवलन

3) कंपन.✅

4)या पैकी नाही


हअरचे उपकरण कशासाठी वापरता येवू शकते.

1) द्रवाचे तापमान मोजने

2) द्रवाची घनता मोजने✅

3) द्रवाचे वजन मोजने

4) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी


परायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

1) 1951

2) 1955

3) 1959✅

4) 1965


वास्तव प्रतिमा नेहमी ..........असते.

1) सुलटि

2) कशीही

3) मोठी 

4) यापैकी नाही✅


वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या दिशा वेगाची दिशा.......

1) बदलते

2) भरकटते

3) बदलत नाही मात्र वेगाचे परिणाम कमी होत जाते.✅

4) निश्चित सांगता येनार नाही


एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूंपातर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ......पट असते .

1) 117 पट

2) 1100 पट

3) 1670 पट✅

4) 5000 पट


खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगाचे मिक्षण मानल्या गेलेल्या पाढंऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही.

1) निळा 

2) काळा✅

3) निळ्या 

4) पिवळ्या


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Jp⤵️



गनपावडर चा उल्लेख कोणाच्या साहित्यात सर्वप्रथम आढळला.

🌈🌈🌈🌈🌈

राँजर बेकन


भारतीय राज्यघटना

पार्श्वभूमी:


दुसरे महायुध्द संपुष्टात आल्यानंतर, भारतीयांने ज्या आश्वासनावर ब्रिटिशांना मदत केली. ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी १९४२ मध्ये स्टॅफोर्ड क्रिप्स यांच्या नेतृत्वाखाली एक आयोग भारतात पाठवण्यात आले. मात्र स्टॅफोर्ड क्रिप्स यांनी जो अहवाल तयार केला त्यामध्ये भारताच्या स्वातंत्र्याविषयी कोणत्याही प्रकारचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता. त्यामुळे भारतातील नेत्यांकडून या अहवालाविषयी नाराजी व्यक्त करण्यात आली.

त्यानंतर १९४६ मध्ये ‘त्रिमंत्री मंडळ’ भारताविषयी निर्णय घेण्यासाठी पाठवण्यात आले. या मंडळामध्ये पॅट्रिक लॉरेन्स, स्टॅफोर्ड क्रिप्स व ए.व्ही. अलेक्झांडर यांचा समावेश होता. या मंडळाच्या शिफारशीनुसार ब्रिटीश सरकारने भारताच्या स्वातंत्र्याची मागणी स्वीकारली होती. त्यामुळे भारतामध्ये सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या कॉंग्रेसने या मंडळाचा अहवाल स्वीकारला होता.

या त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीमध्ये स्वतंत्र भारताची राज्यघटना बनवण्याची एक महत्वाची शिफारस होती. या शिफारशीनुसार जुलै १९४६ मध्ये घटना परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या. निवडून आलेल्या सदस्यांची पहिली बैठक ९ डिसेंबर १९४६ मध्ये घेण्यात आली.


घटना परिषदेची रचना :


१) घटना परिषदेतील सदस्यांची संख्या- ३८९ यामध्ये २९६- सदस्य ब्रिटिश भारतातील होते, तर ९३- सदस्य हे भारतीय संस्थानातील होते.

2) निवडण्यात आलेले सदस्य हे १० लाख लोकसंख्येमागे एक सदस्य या प्रमाणात निवडण्यात आलेले होते.

3) भारतातील सर्व समाजातील प्रतिनिधींना सभासदत्व देण्यात आलेले होते.

4) निवडून आलेल्या सदस्यांमध्ये कॉंग्रेसचे २०८ सदस्य होते. मुस्लीम लीगचे ७३ सदस्य होते. तर इतर छोट्या पक्षांना एकूण १५ जागा मिळाल्या होत्या.


घटना परिषदेचे कार्य:


I. ९ डिसेंबर १९४६ मध्ये या परिषदेच्या प्रत्यक्ष कार्याला सुरवात झाली.

II. घटना परिषदेच्या पहिल्या बैठकीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा यांची निवड करण्यात आली.

III. ११ डिसेंबर १९४६ मध्ये राजेंद्र प्रसाद यांची घटना परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.

IV. मात्र मुस्लीम लीगकडून घटना परिषदेवर बहिष्कार घालण्यात आला होता.

V. त्यामुळे २११ सदस्यांच्या घटना निर्मितीच्या कार्याला सुरवात झाली.


घटनेचा उद्देश ठराव:


कोणतेही कार्य करत असताना आपल्या समोर उद्दिष्ट असावे लागते. उदा. आपण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना आपल्या समोर अधिकारी बनण्याचे उद्दिष्ट असते. त्याप्रमाणे भारत हा स्वातंत्र्यानंतर लोकशाही देश बनणार होता. त्यामुळे भारतीय राज्यघटना निर्माण करत असताना घटना परिषदेसमोर काही उद्दिष्ट असणे आवश्यक होते. त्यामुळे १३ डिसेंबर १९४६ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारतीय राज्यघटनेचा ठराव मांडला.

1) प्रशासनविषयक : ही घटना परिषद असे जाहीर करते कि, भारत देश स्वतंत्र, सार्वभौम, गणराज्य आहे व या देशाच्या प्रशासनासाठी आम्ही ही राज्यघटना निर्माण करू.

2) संघविषयक: सध्या भारतामध्ये समाविष्ट असणारा भुप्रदेश, राज्याचा भूप्रदेश, ब्रिटीश भारताबाहेरील भारताचा इतर भाग ज्यांना सार्वभौम भारताचा घटक बनण्याची इच्छा आहे, या सर्वांचा एक संघ असेल.

3) न्याय स्वातंत्र्य, समता यांची हमी व संरक्षण: न्याय- सामाजिक, राजकीय, आर्थिक यांच्या बाबतीत समता- दर्जा, संधी आणि कायद्यासमोर यांच्या बाबतीत स्वातंत्र्य- विचार, उच्चार, श्रद्धा, उपासना, व्यवसाय आणि संघटना या बाबतीत.

a) अल्पसंख्यांक व मागासांना संरक्षण: अल्पसंख्यांक, मागास आणि आदिवासी, वंचित व मागास वर्ग यांना पुरेसे संरक्षण

b) राज्यघटनेचा स्त्रोत- भारतीय लोक: सार्वभौम स्वतंत्र भारत, तिचे घटनात्मक भाग आणि शासनाची सत्ता आणि अधिसत्ता याचा स्त्रोत भारतीय लोक असतील.

c) सार्वभौम हक्क: गणराज्याची अखंडता व सभ्य राष्ट्राच्या न्याय व कायद्याप्रमाणे तिचा जमीन, समुद्र आणि हवाई क्षेत्र यावरचे सार्वभौम हक्क अबाधित राखला जाईल.

d) जगात मनाचे स्थान: ही प्राचीन भूमी, जगात तिचे न्याय हक्क आणि सन्मान प्राप्तल करेल. त्याचबरोबर मानवी समाजाचे कल्याण व जागतिक शांततेसाठी पूर्णपणे योगदान करेल.

e) स्वायतता : भारतीय भूभागाला राज्यघटनेप्रमाणे स्वायत्त एककाचा दर्जा दिला जाईल.





घटना परिषदेची इतर महत्वाची कामे


I. राष्ट्रीय ध्वज स्वीकारला – २२ जुलै १९४७

II. राष्ट्रकुल सदस्यत्वाला मंजुरी देण्यात आली.- मे १९४९

III. राष्ट्रगीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

IV. राष्ट्रीय गीताचा स्वीकार करण्यात आला- २४ जानेवारी १९५०

V. पहिले राष्ट्रपती म्हणून राजेंद्र प्रसाद यांची निवड करण्यात आली- २४ जानेवारी १९५०


घटना परिषदेविषयी विशेष महत्वाचे


या घटना परिषदेची स्थापना करण्यात आल्यापासून तिचे कामकाज २ वर्ष ११ महिने व १८ दिवस चालले. शेवटची बैठक २४ जानेवारी १९५० रोजी झाली. घटनापरिषदेने देशांच्या घटनांचा अभ्यास केला. या परिषदेवर एकूण कालावधीमध्ये ६० लाख रुपये खर्च झाले. या परिषदेचे एकूण ११४ दिवस अधिवेशन चालले.


घटना समितीतील महत्वाच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष


अ. क्र.   समितीचे नाव   समितीचे अध्यक्ष

१   संघराज्य घटना समिती   पं. जवाहरलाल नेहरू

२.   केंद्रीय उर्जा समिती   पं. जवाहरलाल नेहरू

३.   मसुदा समिती   डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४.   प्रांतीय राज्यघटना समिती   सरदार पटेल

५.   राज्य समिती   पं. जवाहरलाल नेहरू

६.   सुकाणू समिती   डॉ. राजेंद्र प्रसाद

७.   सभागृह समिती   पट्टाभी सीतारामय्या


मसुदा समिती


आपण पाहिलेल्या समितीमध्ये मसुदा समितीचे कार्य हे महत्वाचे होते. कारण, या समितीने घटनेला लिखित स्वरूप प्राप्त करून दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली २९ ऑगस्ट १९४७ मध्ये मसुदा समितीची स्थापना करण्यात आली. या समितीमध्ये सात सदस्यांचा समावेश करण्यात आलेला होता.

१) डॉ. बाबासाहेब आंबेडकर ( अध्यक्ष)

२) एन. गोपालस्वामी अय्यंगार

३) अल्लादी कृष्णास्वामी अय्यर

४) के.एम.मुन्शी

५) सय्यद मोहमद शादुल्ला

६) एन. माधव राव

७) टी. टी. कृष्णम्माचारी ( यांची निवड खैतानच्या मृत्युनंतर करण्यात आली.)

मसुदा समितीने घटना परिषदेतील वेगवेगळ्या समित्यांसोबत चर्चा केली. त्याचबरोबर देशातील वेगवेगळ्या गटांबरोबर चर्चा करून आपला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये प्रसिध्द केला.

तो मसुदा प्रसिद्ध केल्यानंतर लोकांना त्यावर चर्चा करण्यासाठी व त्यावर आपले मत मांडण्यासाठी आठ महिन्यांचा कालावधी देण्यात आला. ज्या लोकांना आपले मत मांडावयाचे आहे त्यांच्यासाठी पत्राद्वारे आपले मत मांडण्यास परवानगी देण्यात आली.

- लोकांकडून आलेल्या मतानुसार काही दुरुस्त्या करण्यात आल्या. काही दुरुस्त्या करण्यात येऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये पुन्हा मसूदा तयार करण्यात आला.


मसुद्याचे कायद्यात रुपांतर कसे झाले ?


पहिले वाचन


४ नोव्हेंबर १९४८ मध्ये मसुदा घटना परिषदेसमोर ठेवण्यात आला. या परिषदेमध्ये मसुद्यावर सर्वसाधारण ५ दिवस चर्चा करण्यात आली. या वाचनामध्ये काही दुरुस्त्या सुचवण्यात आल्या.


दुसरे वाचन


दुसऱ्या वाचन १५ नोव्हेंबर १९४८ ते १७ ऑक्टोबर १९४९ या कालावधीदरम्यान करण्यात आले. पहिल्या वाचनामध्ये ज्या दुरुस्त्या सुचवण्यात आलेल्या होत्या त्यावर चर्चा करण्यात आली.


तिसरे वाचन


तिसरे वाचन १९ नोव्हेंबर १९४९ रोजी करण्यात आले. हे एक औपचारिक वाचन होते. कारण ज्या काही दुरुस्त्या होत्या त्या दुसऱ्या वाचनादरम्यान करण्यात आलेल्या होत्या. या वाचनानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केलेला मसुदा मान्यतेसाठी घटना समितीसमोर ठेवला.

२६ नोव्हेंबर १९४९ मध्ये घटना परिषदेकडून राज्यघटनेला मान्यता देण्यात आली.


राज्य घटना प्रत्यक्ष लागू


- २६ जानेवारी १९५० रोजी राज्य घटना प्रत्यक्ष लागू करण्यात आली. २६ जानेवारी ही तारीख निवडण्याचे कारण म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये २६ जानेवारी १९३० रोजी पूर्ण स्वराज्याची घोषणा करण्यात आलेली होती.


अश्याच महत्वाच्या माहितीसाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-



राज्य घटनेची वैशिष्ट्ये :


a)विस्तृत लिखित राज्यघटना:


जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत. लिखित राज्यघटना व अलिखित राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या घटनेमध्ये फक्त १४ कलमे आहेत.

मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ८ परिशिष्टे व ३९५ कलमे होती. सध्या १२ परिशिष्टे व ४५० कलमांचा समावेश करण्यात आला आहे.


b) विविध स्त्रोतांपासून निर्मिती:


- राज्यघटना बनवत असताना इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला.

- या राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा जास्त प्रमाणावर प्रभाव दिसून येतो.

- अमेरिकन राज्यघटनेवरून मुलभूत हक्क / न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.

- आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आला.


c) मुलभूत हक्क:


- राज्यघटनेनुसार देशातील नागरिकांना काही मुलभूत हक्क देण्यात आलेले आहेत.

- राज्यघटनेमध्ये एकूण सहा प्रकारचे मुलभूत हक्क देण्यात आले आहेत.

- मुलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागामध्ये करण्यात आला आहे.


d) लवचिक व ताठर राज्यघटना :


- अमेरिकन राज्यघटना ही खूपच ताठर आहे. कारण या राज्यघटनेतील कलमांमध्ये सहजासहजी बदल / दुरुस्त्या करता येत नाहीत.

- तर ब्रिटिश राज्यघटना ही खूपच लवचिक आहे.

- मात्र घटनाकर्त्यांनी या दोन्हींचा विचार करून मधला मार्ग निवडला आहे.

- काही कलमांची दुरुस्ती ही सहज करता येते तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष अशा बहुमताची गरज असते.


e) मुलभूत कर्तव्य :


- १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.

- मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीची स्थापना करण्यात आली होती.

- या समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.

- मात्र मुलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत.

- ही केवळ आदर्शे आहेत.


f) निधर्मी राष्ट्र:


- पाकिस्तानसारखे राष्ट्र हे एक इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे.

- मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे.

- सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

- अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.


g) मार्गदर्शक तत्व:


- घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.

- शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा- हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

- ही मार्गदर्शक तत्वे- राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानवहित, आरोग्य यासंबंधी आहेत.

- या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते, त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते.


h) एकेरी नागरिकत्व :


- अमेरिकेमध्ये संघाचे व राज्याचे असे वेगवेगळे नागरिकत्व दिले जाते.

- भारतामध्येही अनेक राज्य अस्तित्वात आहेत, मात्र या प्रत्येक राज्यांना वेगवेगळे नागरिकत्व न देता सर्वांसाठी एकच (एकेरी) नागरिकत्व देण्यात आले आहे.


i) स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था :


- संपूर्ण देशासाठी एकसूत्री न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.

- सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. (apex court)


j)मतदानाचा अधिकार :


- पहिल्यांदा २१ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.

- मात्र १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.


k)आणीबाणीची तरतूद :


- काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.

- या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते. राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात.


l) त्रि–स्तरीय सरकारची स्थापना:


- केंद्र, राज्य, पंचायत राज

- यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात असून, ही एक उच्च अशी शासनव्यवस्था आहे.

- प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे.

- तर जिल्हा- तालुका- ग्राम( खेडे) यासाठी पंचायतराजची स्थापना करण्यात आली आहे.


राज्यघटनेविषयीचे काही दोष:


1. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती, त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती.

2. लॉर्ड विस्काऊट सायमन व विन्स्टन चर्चिलच्या मते, “ भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आलेली आहे.”

3. काहींच्या मते, “ घटना परिषद ही वकील- राजकीय व्यक्तींची बनलेली होती.”


  

मूलभूत हक्कांना असणारे अपवाद

मूलभूत हक्कांना असणारे अपवाद

कलमतरतूद

१२राज्याची व्याख्या.

१३मुलभूत हक्कांशी विसंगत असणारे किंवा त्यांचे न्यूनीकरण करणारे कायदे .

१४कायद्यापुढे समानता .

१५धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणांमुळे भेदभाव करण्यास मनाई.

१६सार्वजनिक सेवायोजनांच्या बाबींमध्ये समान संधी.

१७अस्पृश्यता नष्ट करणे.

१८किताबे नष्ट करणे.

१९भाषणस्वातंञ्य इ. विवक्षित हक्कांचे संरक्षण.

२०अपराधाबद्दलच्या दोषसिद्धीबाबत संरक्षण.

२१जीवित व व्यक्तीगत स्वातंञ्य यांचे संरक्षण.

२१क शिक्षणाचा हक्क.


२२विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यांपासून संरक्षण.

२३मानवी अपव्यापार व वेठबिगारी यांना मनाई.

२४बालमजूरीस मनाई.

२५सदसदविवेकबुद्धीचे स्वातंञ्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रसार.

२६धार्मिक व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंञ्य.

२७एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंञ्य.

२८विवक्षित शैक्षणिक संस्थांत धार्मिक शिक्षण व धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंञ्य.

२९अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण.

३०शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा अल्पसंख्यांक वर्गाचा हक्क.

३१(४४ व्या घटनादुरूस्तीने निरसित).

३१असंपत्तीचे संपादन इ. करिता केलेल्या कायद्यांची व्यावृत्ती.

३१बविवक्षित विधिनियमांची व विनियमांची विधीगृाह्यता.

३१कविवक्षित निर्देशक तत्वे अंमलात आणणार्या कायद्यांची व्यावृत्ती.

३१ड(४३ व्या घटनादुरूस्तीने निरसित).

३२सांवैधानिक उपाय योजण्याचा हक्क.

३३मुलभूत हक्क सशस्ञ सेनांना लागू करताना त्यात फेरबदल करण्याचा संसदेचा अधिकार.

३४लष्करी कायदा अंमलात असताना मुलभूत हक्कांवर निर्बंध.

३५या तरतूदीची अंमलबजावणी करण्यासाठी विधिविधान.

सराव प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )


1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार --------- हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे 

समानतेचा हक्क

स्वातंत्र्याचा हक्क

घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क

धार्मिक स्वांत्र्याचा हक्क


● उत्तर - घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क


2. कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

३२ साव्या

३९ साव्या

४२ साव्या

४४ साव्या


● उत्तर - ४२ साव्या


3. राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?

महाभियोग

पदच्युत

अविश्र्वास ठराव

निलंबन


● उत्तर - महाभियोग


4. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?

३०

२५

४०

३५


● उत्तर - ३५


5. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?

मार्गदर्शक तत्वे

शिक्षण

पैसा

मुलभूत हक्क


● उत्तर - मुलभूत हक्क


6. मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?

दिवाणी न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

उच्च न्यायालय

फौजदारी न्यायालस


● उत्तर - सर्वोच्च न्यायालय


7. राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?

सर्वोच्च न्यायालयात

फक्त लोकसभेत

फक्त राज्यसभेत

संसदेत


● उत्तर - फक्त राज्यसभेत


8. खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?

अर्थविधेयक मंजूर करणे

सामान्य विधेयक मंजूर करणे

मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे

राष्ट्रपतीच्या निवडणूकीत भाग घेणे


● उत्तर - मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे


9. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?

स्वातंत्र्य

समता

न्याय

बंधुभाव


● उत्तर - न्याय


10. महाराष्ट्रच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?

५५

६५

७८

८७


● उत्तर - ७८

______________________________________

ग्रामपंचायत

– “खेड्याकडे चला” असा संदेश महात्मा गांधी यांनी दिला. खेडे हि सक्षम व स्वयंपूर्ण झाली पाहिजे यासाठी ‘ग्रामस्वराज्य’ संकल्पना महात्मा गांधी यांनी मांडली.


– त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थेतील सर्वात शेवटचा स्टार म्हणजे ग्रामपंचचायत  हा होय.


– भारतातीतील राज्यघटनेच्या कलम ४० मध्ये ग्रामपंचायतीचा उल्लेख आढळतो


– महाराष्ट्रात ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ५ नुसार गावस्तरावर ग्रामपंचायतीची स्थापना केली जाते.


– एखाद्या ठिकाणी ग्रामपंचायत निर्माण करण्याच्या किंवा रद्द करण्याचा अधिकार राज्य सरकारला असतो.


– पंचायत राज हा विषय राज्यसूची मध्ये येतो.


– देशातील पहिली ग्रामपंचायात२ ऑक्टोबर १९५९ ला राजस्थानातील नागोरी येथे स्थापन करण्यात आली.


– ग्रामपंचायत हि ग्रामसभेची कार्यकारी समिती आहे.


– संपूर्ण देशात सर्वात सक्षम ग्रामपंचायती राजस्थान राज्यात आहे.


– महाराष्ट्रामध्ये २८,००० पेक्षा अधिक ग्रामपंचायती अस्तित्वात आहेत.


– महाराष्ट्रातील सर्वात जुनी ग्रामपंचायत सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर.


– महाराष्ट्रातील सर्वात मोठी व सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत सोलापूर जिल्हातील ‘अकलूज’ हि आहे.


– महाराष्ट्रातील विविध विकासयोजना राबविणारी पहिली ग्रामपंचायत अहमदनगर जिल्ह्यातील ‘हिवरे बाजार हि होय.


– महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती सातारा जिल्ह्या मध्ये आहे. ( १४०० पेक्षा अधिक )


– भारतामध्ये सर्वात जास्त ग्रामपंचायती उत्तरप्रदेशा मध्ये आहे.


– ७३ व्य घटनादुरुस्तीनुसार पंचायतराज ला घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.


– ७३ व्या घटना दुरुस्तीमध्ये अव्यये पहिल्या ग्रामपंचायत निवडणुका एप्रिल १९९५ ला पार पडल्या.


 ग्रामपंचायतीची रचना :


१) सपाट प्रदेशासाठी ६०० लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत.


२) नवीन नकषानुसार ५०० लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत.


३) डोंगरी परदेशासाठी ३०० लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत.


४) काही ठिकाणी प्रसंगी २ किंवा ३ गावाची मिळून एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते तिला गट ग्रामपंचायत (ग्रुप ग्रामपंचायत ) म्हणतात.


५) २०१४ पासून ३५० लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत स्थापन करणे



 ग्रामपंचायतीची सदस्य संख्या :

१) महाराष्ट्रातून लोकसंख्येच्या आधारावर सदस्य संख्या ठरली जाते.

२) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना असतो.

३) महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या ७ ते १७ इतकी आहे.

४) भारतामध्ये ग्रामपंचायतीची सदस्यसंख्या ५ ते ३१ इतकी आहे

लोकसंख्या           सदस्यसंख्या

६०० ते १५००           ७

१५०१ ते ३०००         ९

३००१ ते ४५००         ११

४५०१ ते ६०००         १३

६००१ ते ७५००          १५

७५०१ ते पुढे               १७

 सभासद पात्रता :

१) तो व्यक्ती संबंधित गावाचा रहिवाशी असावा.

२) वयाची २१ वर्ष पूर्ण केलेली असावी.

३) संबंधित गावाच्या मतदार यादीत नाव असावे.

४) कोणत्याही सरकारी सेवेत नसावा.

५) ग्रामपंचायतीचा थकबाकीदार नसावा.

६) १२ सप्टेंबर २००१ नंतर ३ रे अपत्य नसावे.

७) स्वतःच्या राहत्या घरी स्वच्छता गृह असणे बंधनकारक.

८) ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारासाठी जात प्रमाणपत्राची अट शिथिल करण्यात आली  ( २०१५ पासून )

 सभासद अपात्रता : 

१) दिनांक १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य असलेली व्यक्ती

२) राज्य निवडणूक आयोगाने वेळोवेळी निर्धारित केलेल्या अति पूर्ण न केल्यास.

३) अस्पृश्यता कायदा १९५८, महाराष्ट्र दारू बंदी कायदा १९४९ किंवा निवडणूक भ्रष्टाचार कायद्यान्वे दोषी ठरवलेली व्यक्ती

४) स्वतःच्या राहत्या शौचालय नसलेला व्यक्ती

५)  ग्रामपंचायतीचा कर्ज बाजारी असणारा व्यक्ती

६) शासनाच्या किंवा स्थानिक संस्थेचा शासकीय सेवेमध्ये असलेला  व्यक्ती

७) ग्रामपंचायतीमध्ये लाभाचे पद धारण करीत असलेला व्यक्ती

८) सक्षम न्यायालयाने विकल मनाची घोषित केलेली व्यक्ती

९) स्वच्छेने परदेशी नागरिकत्व संपादान केले व्यक्ती

१०) तो व्यक्ती संसद व राज्य विधिमंडळ सदस्य असल्यास

११) ती व्यक्ती पंचायतीच्या अधीन असलेले कोणतेही अधिकार पद किंवा लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती

“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”


🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते. 


🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.


🔸 पढील १० समित्यांचे ते सदस्य होते - 


१) ध्वज समिती

२) मुलभूत हक्क उपसमिती

३) अल्पसंख्यांक उपसमिती

४) संघ राज्य घटना समिती

५) घटना सुधारणा उपसमिती

६) नागरिकत्व तदर्थ समिती

७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती

८) सल्लागार समिती

९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती

१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)


🔸 जलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता. 


🔸 दशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.


🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.


राष्ट्रपती देशाचे पहिले नागरिक, तुमचा नंबर कोणता

देशाच्या १४ व्या राष्ट्रपतिपदी विराजमान झाल्यानंतर रामनाथ कोविंद हे भारताचे पहिले नागरिक बनले तर देशाचे दुसरे नागरिक अर्थात उपराष्ट्रपति व्यंकय्या नायडू हे झाले. देशाच्या नागरिकत्वाच्या क्रमानुसार सामान्य नागरिकाचा यात नेमका नंबर कितवा? हे पाहू...


🔸तिसरा नागरिक :- पंतप्रधान

🔸चौथा नागरिक :- राज्यपाल (स्वत:च्या संबंधित राज्यात)

🔸पाचवा नागरिक :- देशाचे माजी राष्ट्रपती

🔸सहावा नागरिक :- देशाचे सरन्यायाधीश, लोकसभा अध्यक्ष

🔸सातवा नागरिक :- केंद्रीय मंत्रिमंडळातील सदस्य, राज्यांचे मुख्यमंत्री, निती आयोगचे उपाध्यक्ष, माजी पंतप्रधान, राज्यसभा आणि लोकसभेचा विरोधी पक्ष नेता

🔸आठवा नागरिक :- भारतातील मान्यताप्राप्त राजदूत, मुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यपाल (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸नववा नागरिक :- सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश

🔸दहावा नागरिक :- राज्यसभेचे उपाध्यक्ष, उपमुख्यमंत्री, लोकसभेचे उपसभापती, निती आयोगातील सदस्य, संरक्षण विभागाशी निगडीत इतर मंत्री

🔸११ वा नागरिक :- अॅटर्नी जनरल, मंत्रिमंडळ सचिव, उप-राज्यपाल (केंद्रशासित प्रदेशांसह)

🔸१२ वा नागरिक :- तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख

🔸१३ वा नागरिक :- असाधारण राजदूत आणि पूर्णाधिकार प्राप्त मंत्री

🔸१४ वा नागरिक :- राज्यांचे चेअरमन आणि राज्य विधानसभेचे सभापती, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश

🔸१५ वा नागरिक :- राज्यांचे मंत्रिमंडळ सदस्य, केंद्र शासित राज्यांचे मुख्यमंत्री, दिल्लीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, केंद्रातील उपमंत्री


🔸१६ वा नागरिक :- लेफ्टनंट जनरल आणि प्रमुख अधिकारी

🔸१७ वा नागरिक :- अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष, अनुसूचित जाती-जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸१८ वा नागरिक :- कॅबिनेट मंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे सभापती आणि अध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर), राज्यांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष, राज्यांचे मंत्री

🔸१९ वा नागरिक :- केंद्रशासित राज्यांचे मुख्य आयुक्त, केंद्रशासित राज्यांचे उपमंत्री, केंद्रशासित प्रदेशांच्या विधानसभेचे उपाध्यक्ष

🔸२० वा नागरिक :- राज्यांच्या विधानसभांचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸२१ वा नागरिक :- खासदार

🔸२२ वा नागरिक :- राज्यांचे उपमुख्यमंत्री (स्वत:च्या राज्याबाहेर)

🔸२३ वा नागरिक :- लष्कराचे कमांडर, व्हाइसचीफ आणि इतर महत्त्वाचे अधिकारी, राज्य सरकारचे मुख्य सचिव, अल्पसंख्याक आयागोचे आयुक्त, अनुसूचित जाती-जमाती आयोगांचे आयुक्त, अल्पसंख्याक आयोगातील सदस्य, राष्ट्रीय अनुसूचित जाती आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य

🔸२४ वा नागरिक :- उप राज्यपालांच्या रँकशी समकक्ष अधिकारी

🔸२५ वा नागरिक :- भारत सरकारचे अतिरिक्त सचिव

🔸२६ वा नागरिक :- भारत सरकारचे संयुक्त सचिव, मेजर जनरल रँकशी समस्क रँकचे अधिकारी


या सर्वांनंतर देशातील  सामान्य व्यक्ती असतो देशाचा  २७ वा नागरिक

भारताची राज्यघटना – भारतीय संविधान


भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा (legal basis) आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.

भारतीय संविधानावर विविध पाश्चात्य संविधानांचा प्रभाव आहे.

नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी 26 इ.स. 1950पासून राज्यघटना अंमलात आली.

1950 साली अमलात आलेले भारतीय संविधान मुख्यत्वे 1935 च्या भारत सरकार कायद्यावर (Government of India Act of 1935) वर आधारित आहे.

ऑगस्ट 29, रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली.

अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा नोव्हेंबर 26 इ.स. 1949 रोजी स्वीकारला गेला.

यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस ‘भारतीय संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.

नागरिकत्व, निवडणूका व अंतरिम संसदेविषयीचे आणि इतर काही तात्पुरत्या बाबी तत्काळ लागू झाल्या.

संविधान संपूर्ण रूपानेजानेवारी 26, 1950 रोजी लागू झाले.

त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस ‘भारतीय प्रजासत्ताक दिन’ म्हणून साजरा केला जातो.

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व 12 पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे.

मुख्य संविधानाचे 22 विभाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे.

सुरूवातीच्या 395 कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत.

सध्या राज्यघटनेत 447 कलमे असून भारतीय संविधान जगातल्या सर्वांत मोठ्या संविधानांमध्ये मोडते.

भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक(Republic) आहे.

मूळ उद्देशिकेत समाजवादी (Socialist) व धर्मनिरपेक्ष (Secular) हे शब्द नव्हते.

राज्यघटनेच्या 42 व्या दुरूस्तीद्वारे ते उद्देशिकेत घालण्यात आले.


घटने मध्ये उल्लेख नसलेल्या बाबी

🔶धर्मनिरपेक्ष शब्दाचा उल्लेख प्रास्ताविक सोडून इतरत्र नाही


🔶समाजवादी शब्द केवळ प्रस्ताविकेत आढळतो घटनेत इतरत्र नाही


🔶घटनेत समाजवादी शब्द चा अर्थ स्पष्ट केलेले नाही


🔶घटनेच्या सुरुवातीनंतर नागरिकत्व संपादन समाप्ती बाबत स्थायी तरतुदी दिल्या नाहीत


🔶घटनेत अस्पृश्यता या शब्दच अर्थ स्पष्ट केलेला नाही


🔶घटनेत कोठेही अल्पसंख्याक शब्दचा अर्थ स्पष्ट केलेला नाही


🔶घटनेत मार्गदर्शक तत्वाचे वर्गीकरण करण्यात आलेले नाही


🔶घटनेत घटनाभंग या शब्दाचा अर्थ स्पष्ट केलेलं नाही


🔶संसदीय विधेयकावर निर्णय घेण्याबाबत राष्ट्रपती वर कोणतेही कालमर्यादा घातली नाही


🔶उपराष्ट्रपतीला पदावरून दूर करण्याची कारणे घटनेत सांगितली नाहीत


🔶पंतप्रधानचा कालावधी घटनेनं निश्चित केलेला नाही


🔶संसदीय शासनव्यवस्थाच्या तत्वाचे वर्णन करणयात आलेले नाही


🔶घटनेत मंत्रिमंडळ च्या रचनेची तरतूद नाही


🔶कॅबिनेट शब्दाचा उल्लेख मूळ घटनेत न्हवता


🔶कॅबिनेट समित्यांचा घटनेत उल्लेख नाही


🔶महान्यायवादी चा कालावधी घटनेत नाही व पदावरून दूर करण्याची पद्धत पण दिली नाही


🔶राज्यसभा सदस्यचा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही


🔶घटनेत सदस्यांच्या पेन्शन ची तरतुद नाही


🔶घटनेत लोकसभा अध्यक्ष पदासाठी पात्रता सांगण्यात आलेली नाही


🔶व्हीप्स चा घटनेत उल्लेख नाही


🔶CAG चा पदावधी घटनेत निश्चित करण्यात आलेला नाही


🔶सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशचा पदावधी निश्चित केलेला नाही


🔶न्यायालय अवमान ची व्याख्या घटनेत केली नाही


🔶घटनेत कुठेही न्यायिक पुनर्विलोकन या शब्द चा उल्लेख नाही


🔶उच्च न्यायालय न्यायाधीश च्या संख्या बाबत उल्लेख नाही


🔶न्यायाधीश पदावधी निश्चित केलेला नाही


🔶उच्च न्यायालयचा न्यायाधीश होण्यासाठी किमान वयाची पात्रता ठेवली नाही


🔶घटनेत मुख्यमंत्रीच्या निवडीसाठी व नियुक्तीसाठी कोणतेही विशेष पद्धत सांगण्यात आलेली नाही


🔶महाधिवक्ता पदाचा कालावधी पद्धत आधार याची तरतूद घटनेत नाही

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...