Friday 12 January 2024

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

 


🔶मचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶शरीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


🔶बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


🔶भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


🔶दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.


🔶फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.


🔶हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


🔶चबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


🔶उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.


🔶कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन

1. लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-

भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना. 


प्लासिचे युद्ध :- 

जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला. 


बक्सरची लढाई :- 

बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला. 


अलाहाबादचा तह :- 

बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली. 


2. सर वॉरन हेस्टिंग(सन 1772 ते 1773) :-

सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली. 


भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले. 


3. लॉर्ड कॉर्नवॉलीस (1786 ते 1793) :-

लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात. 


4. लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-

लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला. 

तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली. 

सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला. 


5. मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-

मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल

1. लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-

भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना.
प्लासिचे युद्ध :- जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला.
बक्सरची लढाई :- बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला.
अलाहाबादचा तह :- बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली.

2. सर वॉरन हेस्टिंग (सन 1772 ते 1773) :-

सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली.
भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले.

3. लॉर्ड कॉर्नवॉलीस (1786 ते 1793) :-

लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात.

4. लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-

लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला.
तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली.
सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला.

5. मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-

मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.
जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली.

6. लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-

लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला.
भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे



●1885 - मुंबई - ओमेशचंद्र बॅनर्जी - राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन


●1886 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी


●1887 - मद्रास - बद्रुद्दीन तय्यबजी - पहिले मुस्लिम अध्यक्ष


●1888 - अलाहाबाद - सर जॉर्ज युल - पहिले स्काटिश अध्यक्ष


●1889 - मुंबई - सर विल्यम वेडरबर्ग - पहिले इंग्रज अध्यक्ष


●1896 - कलकत्ता - रहेमतुल्ला सयानी - या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.


●1905 - बनारस - गोपाल कृष्ण गोखले - हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.


●1906 - कलकत्ता - दादाभाई नौरोजी - या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.


●1907 - सूरत - राशबिहारी बोस - राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.


●1915 - मुंबई - लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा - या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.


●1916 - लखनौ - अंबिकाचरण मुजूमदार - या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.


●1917 - कलकत्ता - डॉ. अॅनी बेझंट - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.


●1920 - कलकत्ता(विशेष) - लाला लजपत रॉय - या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.


●1920 - नागपूर - सी. राघवाचारी - या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.


●1922 - गया - चित्तरंजन दास - कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.


●1924 - बेळगांव - महात्मा गांधी - महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.


●1925 - कानपूर - सरोजिनी नायडू - राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.


●1927 - मद्रास - एम.ए. अंसारी - सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

तिसरी गोलमेज परिषद



  तारिख :- 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932

  कार्यकाळ :- 1 महिना

  उपस्थित सदस्य :- 46 प्रतिनिधी उपस्थित होते व तेही सरकारशी एकनिष्ठ होते.

🖍काँग्रेसने या परिषदेवर बहिष्कार टाकला.

🖍इग्लंडमधील मजुर पक्षाने देखील या परिषदेस अनुपस्थिती दर्शविली.

🖍 सरकारचे धोरण यावेळेस अधिकच प्रतिगामी होते.

🖍 या परिषदेला जिना, इक्बाल यांनाही बोलविले नाही.

🖍तसेच हिंदु महासभेलाही नाही.

🖍बरिटीशशासित भारताचे केवळ 22 व संस्थांनाचे 12 एवढेच प्रतिनिधी या परिषदेसाठी आमंत्रीत केले गेले होते.

🖍मजुर पक्षानेही या परिषदेतुन अंग काढुन घेतले.

🖍महत्वाचे उपस्थित असेलेल प्रतिनिधी :-
       👉आगाखान,
       👉आबेडकर,
       👉तजबहादुर सप्रु,
       👉कळकर,
       👉बगम शहनवाझ.

           महत्वाचे म्हणजे हे महत्वाचे प्रतिनिधी तिनही परिषदेला हजर होते.

 🖍 यातील योजनेत मुलभुत हक्कांचा समावेश करण्यात यावा अशी भारतीय प्रतिनिधींनी मागणी केली पण  ती मंजुर झाली नाही.

🖍  एकुण 3 परिषदांपैकी 2 परिषद मध्ये काँग्रेसचा सहभाग नसल्याने यांना फारशी लोकप्रियता मिळाली नाही.

   📚या परिषदेमध्ये पुढील बाबींवर चर्चा झाली.

       👉मतदान अधिकारात स्त्रियांचा सहभाग.

       👉कद्रीय संघटनेच्या बाबतीत मतदान पध्दती, अर्थव्यवस्था व राज्याचे अधिकार.

🖍वरील 3 परिषदेमधील चर्चेनुसार मार्च 1933 मध्ये सरकारतर्फे एक श्वेत पत्रिका प्रसारीत करण्यात आली.

🖍या श्वेतपत्रिकेच्या आधारे ब्रिटन संसदेमध्ये एक कायदा पारित करण्यात आला व यालाच 1935 चा 
भारत सरकारचा कायदा असे म्हणतात.

📚 सदर्भ :- "आधुनिक भारताच्या इतिहासाची आवर्तसारनी", बी पब्लिकेशन, पुणे.
लेखन व संकलन - अॅड. वरद देशपांडे

गांधी युगाचा उदय :

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला. 


आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. 


जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले. 


जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.


1. भारतातील चळवळी :

भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या. 


चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -


चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्‍या गरीब शेतकर्‍यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली. 


साराबंधी चळवळ (सन 1918) -


1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्‍याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत. 


गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली. 


शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला. 


हा गांधीजीचा दूसरा विजय होता. 


रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -


भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला. 


या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता. 


या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. 


हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय. 


13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली. 


या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्‍याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.


2. असहकार आंदोलन :

डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.


सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले. 


फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली. 


या आगीत पोलिस अधिकार्‍यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.


या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.


3. स्वराज्य पक्षाची स्थापना :

सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या. 


असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली. 


काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.


4. सायमन कमिशन (1928) :

 


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले. 


या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते. 


या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते. 


या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.


5. नेहरू रिपोर्ट (1928) :


भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले. 


राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली. 


नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.


6. सविनय कायदेभंग आंदोलन :


1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते. 


या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :

सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला. 


12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली. 


385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली. 


यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले. 


महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.


सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली. 


6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्‍याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले. 


आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.

8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :

सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली. 


महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली. 


विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.

9. भारत छोडो आंदोलन (1942) :

क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला. 


14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला. 


8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली. 


प्रति सरकारे -


इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले. 


प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.

चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले. 


महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली. 


सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -


सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.


या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले. 


भारतीय सैनिकाचा उठाव -


चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.

या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला. 


नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला. 


सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.

10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :

सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता. 


मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली. 


त्रिमंत्री योजना (सन 1946) -


या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले. 


या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे  मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे. 


हंगामी सरकार -


त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली. 


माऊंट बॅटन योजना -


24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले. 


भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली. 


3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली. 


मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.

___________________________________

व्हिटॅमिन



एक जीवनसत्व एक आहे सेंद्रीय रेणू (किंवा रेणू संबंधित संच) एक आहे की विशेषतः कुजून रुपांतर झालेले एक की जीव त्याच्या योग्य काम लहान प्रमाणात आवश्यक चयापचय . जीवनात आवश्यक पोषक द्रव्यांचे संश्लेषण केले जाऊ शकत नाही , एकतर अजिबात नाही किंवा पुरेसे प्रमाणात नाही आणि म्हणूनच आहारातून मिळणे आवश्यक आहे . व्हिटॅमिन सी काही प्रजातींनी संश्लेषित केले जाऊ शकते परंतु इतरांद्वारे नाही; हे प्रथम प्रकरणात जीवनसत्व नसून दुसर्‍या क्रमांकावर आहे. मुदत जीवनसत्व तीन इतर गट समाविष्ट नाही आवश्यक पोषक : खनिजे ,आवश्यक फॅटी idsसिडस् आणि आवश्यक अमीनो acसिडस् . [२] बहुतेक जीवनसत्त्वे एकल रेणू नसतात, परंतु विटामर नावाच्या संबंधित रेणूंचा समूह असतात . उदाहरणार्थ, व्हिटॅमिन ईमध्ये चार टोकोफेरॉल आणि चार टोकोट्रिएनोल असतात . मानवी चयापचय आवश्यक तेरा जीवनसत्त्वे आहेत: व्हिटॅमिन ए ( ऑल- ट्रान्स - रेटिनॉल , ऑल- ट्रान्स -रेटीनिल-एस्टर, तसेच ऑल ट्रान्स - बीटा-कॅरोटीन आणि इतर प्रोविटामिन ए कॅरोटीनोइड ), व्हिटॅमिन बी 1 ( थायमिन ) , व्हिटॅमिन बी 2 (राइबोफ्लेविन , व्हिटॅमिन बी 3 ( नियासिन ), व्हिटॅमिन बी 5 ( पॅन्टोथेनिक acidसिड ), व्हिटॅमिन बी 6 ( पायरोडॉक्सिन ), व्हिटॅमिन बी 7 ( बायोटिन ), व्हिटॅमिन बी 9 ( फॉलिक acid सिड किंवा फोलेट ), व्हिटॅमिन बी 12 ( कोबालामिन ), व्हिटॅमिन सी ( एस्कॉर्बिक acid सिड ), व्हिटॅमिन डी ( कॅल्सीफेरॉल्स ), व्हिटॅमिन ई ( टोकॉफेरल्स आणि टकोट्रिएनोल ), आणि व्हिटॅमिन के ( क्विनोन ).


वर्गीकरण

जीवनसत्त्वे एकतर पाणी -विरघळणारे किंवा चरबी-विद्रव्य म्हणून वर्गीकृत केली जातात . मानवांमध्ये 13 जीवनसत्त्वे असतात: 4 फॅट-विद्रव्य (ए, डी, ई, आणि के) आणि 9 वॉटर विद्रव्य (8 बी जीवनसत्त्वे आणि व्हिटॅमिन सी). पाण्यामध्ये विरघळणारे जीवनसत्त्वे पाण्यात सहजतेने विरघळतात आणि सर्वसाधारणपणे, शरीरातून सहजपणे उत्सर्जन केले जाते की मूत्रमार्गातील उत्पादन व्हिटॅमिनच्या वापराचे एक मजबूत अंदाज आहे.  कारण ते इतके सहजपणे साठवले जात नाहीत, अधिक सातत्यपूर्ण सेवन करणे महत्वाचे आहे.
 चरबी-विरघळणारे जीवनसत्त्वे लिपिड्स (फॅट्स) च्या मदतीने आतड्यांसंबंधी मार्गाद्वारे शोषले जातात . व्हिटॅमिन ए आणि डी शरीरात साचू शकतात, ज्यामुळे धोकादायक हायपरविटामिनोसिस होऊ शकते. मालाबर्शनमुळे चरबी-विद्रव्य व्हिटॅमिनची कमतरता सिस्टिक फायब्रोसिसमध्ये विशेष महत्त्व आहे .


व्हिटॅमिन ए





हा लेख विटामरांच्या कुटुंबाविषयी आहे. पूरक म्हणून सामान्यतः वापरल्या जाणार्‍या फॉर्मसाठी, रेटिनॉल पहा .



रेटिनॉलची रासायनिक रचना , व्हिटॅमिन ए च्या मुख्य प्रकारांपैकी एक

अ जीवनसत्व ह्यामध्ये अनसॅच्युरेटेड पौष्टिक एक गट आहे सेंद्रीय संयुगे समावेश आहे retinol , रेटिनासंबंधी , retinoic ऍसिड , आणि अनेक जीवनसत्त्वांचा पूर्वगामी पदार्थ एक carotenoids (बहुतेक विशेषतः बीटा कॅरोटीन ).
 व्हिटॅमिन एची एकाधिक कार्ये आहेत: रोगप्रतिकारक शक्तीची देखभाल आणि चांगली दृष्टी यासाठी वाढ आणि विकास आवश्यक आहे .
अ जीवनसत्व आवश्यक आहे डोळयातील पडदा स्वरूपात डोळा रेटिनासंबंधी प्रथिनापासून मेळ जे, opsin तयार करण्यासाठी चेतापटलामध्ये व्हिजुअल परपल तयार होणे, कमी-प्रकाश ( स्कॉटोपिक व्हिजन) आणि रंग दृष्टी या दोहोंसाठी आवश्यक प्रकाश-शोषक रेणू
 . [6] अ जीवनसत्व हे देखील एक महत्त्वाचे आहे retinoic आम्ल म्हणून खूप भिन्न भूमिका (retinol एक रद्द न करता oxidized फॉर्म), फंक्शन्स संप्रेरक -like घटक वाढ साठी epithelial आणि काही इतर पेशी.


ब-जीवनसत्व

ब-जीवनसत्व हे प्रत्यक्षात पाण्यात विरघळणाऱ्या ८ क्लिष्ट जीवनसत्त्वांचा समूह आहे. हे शरिराला लागणारे अत्यंत महत्त्वाचे जीवनसत्व असून पेशींमधील ऊर्जानिर्मितीसाठी काम करते.


ब-जीवनसत्त्वांची यादी

ब १ जीवनसत्त्व (थायमिन)

ब २ जीवनसत्त्व (रायबोफ्लेव्हिन)

ब ३ जीवनसत्त्व (नायासिन)

ब ५ जीवनसत्त्व (पँटोथिनिक ॲसिड)

ब ६ जीवनसत्त्व(पायरिडॉक्सिन)

ब ७ जीवनसत्त्व (बायोटिन)

ब ९ जीवनसत्त्व (फॉलिक ॲसिड/फोलेट)

ब १२ जीवनसत्त्व (सायनोकोबलामाईन)

✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅


क-जीवनसत्त्व


❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️❇️

जीवनसत्व क

क-जीवनसत्त्व हे शरीराला थोड्या प्रमाणात लागणारे पण महत्त्वाचे जीवनसत्त्व असून पाण्यात विरघळणारे आहे.


व्हिटॅमिन डी

🔺कल्शियम , मॅग्नेशियम आणि फॉस्फेट आणि इतर अनेक जैविक प्रभावांच्या आतड्यांसंबंधी शोषण वाढविण्यासाठी जबाबदार चरबी-विद्रव्य सेकोस्टेरॉइड्सचा एक गट आहे . [
१] मानवांमध्ये, या गटातील सर्वात महत्वाची संयुगे आहेत जीवनसत्व डी 3(ज्याला Cholecalciferol देखील म्हणतात ) आणि व्हिटॅमिन डी 2 ( एर्गोकाल्सीफेरॉल ) आहेत.


विज्ञान


मानवी शरीरात शर्करेचा उपयोग फक्त मोनोसँकराईडच्या स्वरूपातच होतो.


पुरूषांना प्रतिदिन 56 ग्राम तर स्त्रीयांना प्रतिदिन 46 ग्राम प्रथिनांची आवश्यकता असते.


♦️*नायसिनच्या अभावामुळे पेलाग्रा नावाचा रोग होतो.*


♦️ पलाग्रा रोगालाच 3-D रोग असेही म्हणतात.


♦️3-D = डर्माटायटीस , डायरीया , डिमेंशिया


मनुष्यातील अन्ननलिकेची लांबी - 950 सेमी (32 फूट)


अन्नाची चव समजण्यासाठी जिभेवर Taste Buds कलिका पेशी असतात.


जिभ - 

समोरचे टोक- गोड चव

मागचे टोक - कडू चव

बाजू - खारट, तूरट , आंबट




तिखट हा चवीचा प्रकार नाही. Capcisin ह्या रसायनामुळे केवळ जिभेचा अंगार होतो.


दातांचे प्रकार 4

सुळे , पटाशीचे दात , उपदाढा , दाढा.


♦️मानवास संपूर्ण आयुष्यात 52 दात येतात.

20 प्राथमिक दुधाचे दात व 32 कायम दात.



म्हणजेच मानवी शरीरात 20 दात दोनवेळेस येतात.


मानवी मुखात ३ प्रकारच्या लाळग्रंथी असतात.

1. कर्णमुल ग्रंथी Parotid Gland

2. अधोहनु ग्रंथी Submandibular Gland

3. अधोजीव्हा ग्रंथी Sublingual Gland


♦️पांढर्या रक्तपेशी किंवा श्वेत रक्तकणिकांचे एकूण 5 प्रकार पडतात


1. न्युट्रोफिल्स - जीवाणू व कवकांविरूद्ध लढा


2. इसायनोफिल्स - परजीवांविरूद्ध लढा


3. बेसोफिल्स - अँलर्जीविरूद्ध तसेच प्रतिजन म्हणून लढा. त्यासाठी हिस्टामाईन नावाचे रसायन तयार करते


4. लिम्फोसाईटस् - रोगजंतू नष्ट करणे


5. मोनोसाईट - मृत पेशींना शरीराबाहेर टाकणे


♦️हरदयाबाबत महत्वाचे♦️


1. ह्रदय स्पंदनांचे नियंत्रण मेंदूतील मेड्युला ऑब्लाँगाटा हा भाग करतो.


2. थायरॉक्झीन व अँड्रीनल यासारखी संप्रेरक ह्रदय स्पंदने नियंत्रित करतात



3. रक्तातील अँसिडीटी वाढल्यास ह्रदय स्पंदने वाढतात , तर रक्तातील बेसिसीटी वाढल्यास स्पंदने कमी होतात


4. 2 ह्रदय स्पंदनातील अंतर 0.8 सेकंद एवढे असतेे.


5. ह्रदय स्पंदनाच्या आवाजाची तीव्रता 15 डेसीबल पर्यंत असते.



♦️परागीभवनाच्या माध्यमानुसार प्रकार


1. अँनिमोफिली - वारा

2. कँन्थरोफिली - भुंगा

3. शिरोटेरोफिली - वटवाघुळ

4. एन्टोमोफिली - किटक

5. मेलीटोफिली - घरमाशी

6. सायकोफिली - फुलपाखरू


♦️शरीरातील सर्वात लहान अस्थी - स्टेप्स(मध्यकर्णात)


♦️शरीरातील सर्वात मोठी अस्थी - फिमर (मांडीमध्ये)


♦️शरीरातील सर्वात मजबूत अस्थी - मँडीबल (जबड्यात)


♦️शरीरातील सर्वात लहान स्नायू - स्टेपिडीयस(मध्यकर्णात)


♦️शरीरातील सर्वात मोठा स्नायू - ग्लुटेअस मँक्झिमस(मांडीमध्ये)



♦️कर्करोगाचे प्रकार

1. कार्सीनोमा - त्वचेचा कर्करोग

2. सार्कोमा - संयोजी उतीचा कर्करोग

3. लिम्फोमा - लिम्फोसाईटचा कर्करोग

4. ल्युकेमिया - पांढर्या पेशींचा कर्करोग

5. सेमिनोमा - वृषणाचा कर्करोग(Testis Cancer) 

6. डिसजर्मिनोमा - अंडाशयाचा कर्करोग

7. ब्लास्टोमा - अपरिपक्व पेशींचा कर्करोग


रक्तवाहिन्या (Blood Vessels)





रक्तवाहिन्या आपल्या शरीरात रक्ताचे अभिसरण करतात. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी सुमारे 97 हजार किमी असते. रक्तवाहिन्यांचे तीन मुख्य प्रकार पडतात.

१) धमन्या (Arteries)
२) शिरा (Veins)
३) केशिका (Capillaries)

१) धमन्या (Arteries) : 
हृदयाकडून ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वहन करतात. अपवाद – फुफ्फुसधमनी (Pulmonary Artery)भित्तिका जाड असून कमी लवचिक असतात.शरीरात खोलवर स्थित असतात व झडपा नसतात.रक्तदाब खूप जास्त म्हणजेच 100 mm Hg एवढा असतो.महाधमनी – धमन्या – धमनिका

२) शिरा (Veins) :
उतींकडून कार्बन डायॉकसाईड युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करतात. अपवाद – फुफ्फुसशिरा (Pulmonary Veins)भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात.शरीरात त्वचेखाली स्थित असतात व झडपा असतात.रक्तदाब खूप कमी म्हणजेच 2 mm Hg एवढा असतो.महाशिरा -शिरा – शिरिका

३) केशिका (Capillaries) :
धमनिका आणि शिरिका यांच्या पेशीतील जाळ्याला केशिका असे म्हणतात.केशिका अत्यंत बारीक, एकस्तरीय असून भित्तिका पातळ असतात.केशिकांमुळे पेशींमध्ये पोषद्रव्ये, ऑक्सिजन,कार्बन डायॉकसाईड, विकरे, संप्रेरके तसेच टाकाऊ पदार्थांची देवाण – घेवाण घडून

पचनक्रियाची कार्ये


👉निरोगी पॅनक्रियामुळे आपण खाल्लेले पदार्थ पचवण्यासाठी योग्य वेळी योग्य प्रमाणात योग्य रसायने तयार केली जातात.


🌲🌲एक्सोक्राइन फंक्शन:🌲🌲


🌹सवादुपिंडात एक्सोक्राइन ग्रंथी असतात ज्या पाचनसाठी महत्त्वपूर्ण एंजाइम तयार करतात 


🌹. या एंजाइममध्ये प्रथिने पचवण्यासाठी ट्रिप्सिन आणि किमोट्रिप्सीन असतात; कार्बोहायड्रेट्सच्या पचनसाठी एमायलेस; आणि चरबी खाली सोडण्यासाठी लिपेस.


👉 जव्हा अन्न पोटात प्रवेश करते, तेव्हा हे स्वादुपिंड रस मुख्य स्वादुपिंडाच्या नलिकामध्ये उद्भवणार्‍या नलिकांच्या प्रणालीमध्ये सोडले जातात 


👉. स्वादुपिंडाचा नलिका सामान्य पित्त नलिकामध्ये सामील होतो व्हेटरचा एम्पुला तयार करतो जो लहान आतड्याच्या पहिल्या भागात स्थित आहे, ज्याला ड्युओडेनम म्हणतात .


👉 सामान्य पित्त नलिका यकृत आणि पित्ताशयामध्ये उद्भवते आणि पित्त नावाचा आणखी एक महत्त्वपूर्ण पाचन रस तयार करते. 


👉डयुओडेनममध्ये सोडलेले अग्नाशयी रस आणि पित्त चरबी, कर्बोदकांमधे आणि प्रथिने पचन करण्यास शरीरास मदत करतात.


👉👉अतःस्रावी कार्य:👉👉


👉सवादुपिंडाच्या अंतःस्रावी घटकात आयलेट सेल्स (लँगरहॅन्सचे बेटे) असतात जे महत्त्वपूर्ण रक्त संप्रेरक थेट रक्तप्रवाहात तयार करतात आणि सोडतात .


👉 मख्य स्वादुपिंडातील दोन हार्मोन्स इन्सुलिन आहेत , जे रक्तातील साखर कमी करण्यासाठी कार्य करते, आणि ग्लुकोगन , जे रक्तातील साखर वाढविण्यास कार्य करते.


👉 मदू, यकृत आणि मूत्रपिंडांसह मुख्य अवयवांच्या कार्य करण्यासाठी रक्तातील साखरेची योग्य पातळी राखणे महत्त्वपूर्ण आहे.

अंतस्रावी ग्रंथी आणि संप्रेरक

1. पियुषिका (Pituitary):
प्रोलॅक्टिन, ऑक्सिटोसीन, ल्युटीनायझिंग

2. अवटु (Thyroid):
थायराॅक्झिन, कॅल्सिटोनिन

3. पराअवटु (Parathyroid):
पॅराथाॅर्मोन

4. स्वादुपिंड (Pancreas): ग्लुकॅगाॅन, इन्सुलिन, सोमॅटोस्टॅटिन, पॅन्क्रिएटिक पाॅलीपेप्टाईड

5. अधिवृक्क (Adrenal):
अॅड्रेनॅलिन, नाॅनअॅड्रेनॅलिन, काॅर्टिकोस्टेराॅईड

6. अध:चेतक (Hypothalamus):
डोपामाईन, थायरोट्राॅपिन, काॅर्ट्रिकोट्राॅपीन

7. अंडाशय (Ovary):
इस्ट्रोजन, प्रोजेस्टेराॅन

8. वृषणग्रंथी (Testis): टेस्टेस्टेराॅन

9. यौवनलोपी ग्रंथी (Thymus): थायमोसिन

लोकसभा

लोकसभेबद्दल संपूर्ण माहिती:


लोकसभेची निर्मिती ब्रिटन आणि कॅनडाच्या कॉमन सभागृहाच्या धर्तीवर करण्यात आली आहे.


सभासदांची संख्या :

घटनेच्या 81 व्या कलमामध्ये लोकसभेच्या सभासदांची संख्या निर्धारित करण्यात आली आहे. 1974 च्या 31 व्या घटनादुरुस्तीनुसार घटकराज्यांच्या सभासदांची संख्या 525 तर केंद्रशासीत प्रदेशांची सभासद संख्या 20 इतकी करण्यात आली आहे. परंतु लोकसभेत जास्तीत जास्त 552 इतके सभासद सांगितले आहेत. त्यामध्ये 530 घटकराज्य. 20 केंद्रशासीत प्रदेश आणि जर अँग्लो इंडियन समाजाला लोकसभेत प्रतिनिधीत्व मिळाले नाही तर दोन सदस्यांची नेमणूक करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. भारतीयलोकप्रतींनिधी कायदा 1951 नुसार पाच ते साडेसात लाख मतदारांमागे एक लोकसभेचा उमेदवार निवडला जातो.


मतदारसंघ निर्धारण आयोग :

या आयोगाची निर्मिती 1972 साली करण्यात आली. त्या आयोगाचा अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचा एक न्यायाधीश असतो.


उमेदवारांची पात्रता :

घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.


निवडणूक पद्धत :

लोकसभेची निवडणूक प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते. ती निवडणूक आयोगाच्या नियंत्रणाखाली होते.


लोकसभेचा कार्यकाल :

पाच वर्ष इतका आहे परंतु तो कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी लोकसभा विसर्जित करण्याचा अधिकार भारताच्या राष्ट्रपतीला आहे. आणीबाणीच्या कालखंडात संसद कायदा करून लोकसभेचा कार्यकाल फक्त एकदाच एका वर्षासाठी 83/2 कलमानुसार वाढवू शकतो.


सभासदांचा कार्यकाल :

प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 5 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी आपला राजीनामा लोकसभेच्या सभापतींकडे देऊ शकतो.


बैठक किंवा अधिवेशन :

घटनेच्या 85 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची वाटेल त्या वेळी अधिवेशन बोलवितो परंतु दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


गणसंख्या :

कोणत्याही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.


पदमुक्तता :

कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)


लोकसभेचा सभापती कार्य आणि अधिकार :

लोकसभेत निवडून आलेल्या एका सदस्याची सभापती म्हणून व दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून लोकसभेतील सदस्यांकडून निवड केली जाते.


कार्य :

1. धनविधेयक आहे की नाही हे ठरविणे.

2. प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्यास परवानगी देणे.

3. प्रवर समितीच्या अध्यक्षांची नियुक्ती करणे.

4. कमरोको प्रस्ताव आणण्यासाठी सभापतींची परवानगी आवश्यक आहे.

5. सभागृहात शांतता व सुव्यवस्था राखणे.

6. सभागृहाचे कामकाज सुरू होण्यासाठी पुरेशी गणसंख्या नसेल तर कामकाज थांबविणे.

7. राष्ट्रपतीने दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक बोलविल्यास अध्यक्षपद भूषविणे.

8. सामान्य उद्देश समिती, नियम समिती व कार्यवाही समितीचा सभापती पदसिद्ध अध्यक्ष असतो.

विधानसभेबद्दल संपूर्ण माहिती:



घटना कलम क्र. 170 मध्ये प्रत्येक घटकराज्यासाठी एक विधानसभा असेल अशी तरतूद करण्यात आली आहे. विधानसभा हे कनिष्ठ परंतू अधिकाराच्या बाबतीत श्रेष्ठ सभागृह समजले जाते तर विधानपरिषद हे वरिष्ठ सभागृह असून अधिकाराच्या बाबतीत


विधानसभेची रचना :

170 व्या कलमात सांगितल्याप्रमाणे विधानसभेत 60 व जास्तीत जास्त 500 सभासद असतात.


राखीव जागा :

घटना कलम क्र. 332 मध्ये सांगितल्याप्रमाणे अनुसूचीत जाती जमातीसाठी महाराष्ट्रामध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचीत जातींसाठी 29 तर अनुसूचीत जमातीसाठी 25 राखीव जागा आहेत.


निवडणूक : 

प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने सदस्यांची निवड केली जाते.


उमेदवारांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.


गणसंख्या : 1/10

अधिवेशन : 

दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.


सभापतीचे कार्य आणि अधिकार :

1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.

2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.

3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.

4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.


जनरल माहिती :

1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.

2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.

3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.

4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.

5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.

6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.

7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.

8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

प्रस्ताविका/ सरनामा/ उद्देशपत्रिका


              (PREAMBLE)

- सरनामा म्हणजे, "राज्यघटनेची प्रारंभिक माहिती".

- संविधान ज्या तत्त्वज्ञानावर आधारलेले आहे ते तत्वज्ञान सरनाम्यात समाविष्ट आहे.

- जगात सर्वप्रथम "अमेरिका" राष्ट्राच्या घटनेत सरनामा लिहिला गेला.

- भारताने  आपल्या घटनेत सरनामा असावा ही बाब "अमेरिकेकडून" स्वीकारली.

- 1919 चा भारत सरकार कायदा (माँटफर्ड) याला सरनामा होता. मात्र 1935 च्या कायद्याला सरनामा नव्हता.

- पं जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला उद्दिष्टांचा ठराव मांडला. हा ठराव घटनासमिती समोरचा दिशादर्शक होता.

- हा ठराव घटनासमितीने 22 जानेवारी 1947 ला बिनविरोधपणे संमत केला.

- हा उद्दिष्टांचा ठराव म्हणजे सरनामा नाही. मात्र सरनामा हा या उद्दिष्टांच्या ठरावावर आधारित आहे.

- 22 जानेवारी ला उद्दिष्टांचा ठराव जरी संमत झाला असेल. तरी मूळ सरनामा हा  घटना संमत झाल्यावर संमत  करण्यात आला.

- भारतीय सरनाम्याची सुरुवात "आम्ही भारताचे लोक" तर अमेरिकेच्या सरनाम्याची सुरुवात ही आम्ही अमेरिकेचे लोक अशी आहे.

:
1) उद्दिष्टांचा ठराव मांडला ?
    - पं. नेहरू

2) उद्दिष्टांचा ठराव मांडला तो दिनांक ?
    - 13 डिसेंबर 1946

3) उद्दिष्टांचा ठराव स्वीकारला?
    - 22 जानेवारी 1947

4) सरनामा असावा हा आदर्श कोणाचा किंवा सरनामा असलेली जगातील पहिले संविधान?
  - अमेरिका

महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा

 प्रश्न.१.कोणत्या घटनादुरुस्ती द्वारे मुलभत  कर्तव्याचा भारतीय राज्यघटनेत समावेश करण्यात आला ?

१)४२ वी घनादुरुस्ती🖋️🖋️

२)४४) वी घनादुरुस्ती

३)६१ वी घनादुरुस्ती

४)२४ वी घटनादुरुस्ती 


प्रश्न.२. भारताच्या घटना समितीचे पाहिले अधिवेशन केव्हा झाले ?

१)८ डिसेंबर १९४६

२)९ डिसेंबर १९४६🖋️🖋️

३)१५ डिसेंबर १९४६

४) १५ ऑगस्ट १९४७


प्रश्न.३.कोणत्या राजकीय पक्षाचे संविधान सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

a) कृषक प्रजा पक्ष b) शेड्युल कास्ट फेडरेशन c)कम्युनिस्ट पक्ष d) अपक्ष

१)a.c.d

२)b.c.d

३)a.b.d

४)a.b.c🖋️🖋️



प्रश्न.४. खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही ?

१) मराठी

२)सिंधी

३)मारवाडी🖋️🖋️

४) संथाली



प्र.५. भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे ?

१)राज्यघटनेची उद्द्देशिका

२)राज्याची मार्गदर्शक तत्वे✔️✔️

३)मूलभूत कर्तव्य

 ४) नववी सूची


प्रश्न.६.योग्य कथन/कथने ओळखा.

१)४२ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.

२)८६ व्या घटनादूरूस्थीद्वारे सविधानामध्ये ११ कर्तव्ये समाविष्ट करण्यात आली.

A)कथन (A) फक्त

B)कथन (ब) फक्त

C)दोन्ही कथने (A) (B) बरोबर आहेत🖋️🖋️

D)दोन्ही कथने (A) (B) चूक आहेत



प्रश्न.७.रजनेतीच्या मार्गदर्शक तत्त्वंच्या संधर्भात कोणते गुंणशिष्टे गैरलागू ठरते ?

१)मूलभूत आधीकारांशी  अनुरूप

२) न्यायालयीन निर्णय योग्य 🖋️🖋️

३) परिवर्तन

४) कल्याणप्रद


प्रश्न.९.कमवा व शिकवा या योजनेचा पुरस्कार कोणत्या आयोगाने केला आहे ?

१)राधाकृष्ण आयोग🖋️🖋️

२)मुदलियार आयोग

३)कोठारी आयोग

४) जॉन सार्जंट आयोग


प्रश्न.१०.१९४९ मध्ये कोणत्या प्रादेशिक विद्यापीठांची स्थापना झाली ?

१)मुंबई

२)पुणे🖋️🖋️

३) अमरावती

४)कोल्हापूर


प्रश्न.११.सेंट्रल हिंदु कॉलेज ची स्थापना कोणी केली ?

१)स्वामी दयानंद

२)स्वामी विवेकानंद

३) अँनी बेझंट🖋️🖋️

४) केशव चंद्र सेन



प्रश्न.१२.मराठी भाषा पंधरवाडा केव्हा साजरा केला जातो ?

१)१९ ते २४ नोव्हेंबर

२)१५ ते २९ डिसेंबर

३)१ ते १५ जानेवारी🖋️🖋️

४)१ ते १५ फेब्रुवार



प्रश्न.१३.'खटूआ समिती' खालीलपैकी कशाशी संबधित आहे ?

१)GST संकलन

२) ओला उबेर भाडे निश्चिती

३)रेल्वे आधुनिकीकरण🖋️🖋️

४)सरपंच - गोपिनियातेची शपत


प्रश्न.१४.महाराष्ट्रातील सिक्युरिटी ऑपरेशन सेंटर चा हेतू कोणता ?

१) मुख्यमंत्र्यांना सुरक्षा प्रदान करणे सुरक्षित ठेवणे

२) सामाजिक सुरक्षा

३) शासकिय संकेत स्थळावरील माहिती सुरक्षित ठेवणे

४)सांस्कृतिक वारसा स्थळांची सुरक्षा🖋️🖋


1. शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?

1) ३६९ 

 2) ५४७

 3) ६३९ ✅✅✅

 4) ९१२


2. धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

 1) सोडियम क्लोरेट ✅✅✅

 2) मायका

 3) मोरचुद

 4) कॉपर टिन

3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर


 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 

 2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .

 3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .

 4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅


4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅

 2) दोन

 3) चार

 4) सहा


5. मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ 

 2) ब ✅✅✅

 3) ड

 4) ई


6. खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल 

 2) रेल्वे

 3) जहाज

 4) वरिल सर्व ✅✅✅


7. २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२

 3) २३०.५२

 4) २.३५२ ✅✅✅


8. त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅

 2) अंतर

 3) चाल

 4) विस्थापन 


9. होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल 

 2) रबर

 3) रबर

 4) सूची✅✅✅


10. हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅

 2) नायट्रोजन

 3) कार्बनडाय ऑक्साईड

 4) हेलियम



1] कोणता राज्य वा केंद्रशासित प्रदेश ‘सुकून - कोविड-19 बीट द स्ट्रेस’ नावाने एक उपक्रम राबवित आहे?


(A) दिल्ली

(B) मध्यप्रदेश

(C) जम्मू व काश्मीर✅✅

(D) अंदमान निकोबार बेट


कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद संघाच्या अध्यक्ष पदावर नेमणूक करण्यात आली?


(A) दिलीप उम्मेन✅✅

(B) टी.व्ही. नरेंद्रन

(C) भास्कर चटर्जी

(D) रतन जिंदल


रेल्वेच्या कोणत्या विभागामध्ये ‘रेल-बॉट’ हे रोबोटिक उपकरण विकसित करण्यात आले?


(A) दक्षिण-पश्चिम रेल्वे विभाग

(B) मध्य रेल्वे विभाग

(C) दक्षिण-पूर्व रेल्वे विभाग

(D) दक्षिण-मध्य रेल्वे विभाग✅✅


परीक्षांच्या तयारीसाठी उमेदवारांना मदत व्हावी यासाठी राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) यांनी तयार केलेल्या नवीन मोबाइल अ‍ॅप नाव काय आहे?


(A) नॅशनल टेस्ट अॅसेसमेंट

(B) नॅशनल टेस्ट अभ्यास✅✅

(C) परीक्षा अभ्यास

(D) यापैकी नाही


कोणत्या व्यक्तीची जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) कार्यकारी समितीच्या अध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे?


(A) डॉ. हर्ष वर्धन✅✅

(B) लेमोगांग क्वापे

(C) एडमा ट्रॉओर

(D) हिरोकी नाकातानी



राज्यसेवा, PSI-STI-ASO मुख्य परीक्षा प्रश्नसंच, [01.06.20 10:36]

📕 कोणत्या शहरात भारतातली प्रथम मोबाइल व्हायरलॉजी रिसर्च अँड डायग्नोस्टिक्स लॅबोरेटरी तैनात आहे?


(A) हैदराबाद✅✅

(B) मुंबई

(C) दिल्ली

(D) बंगळुरू


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📗 सीमा रस्ते संस्थेनी (BRO) कोणत्या नदीवर कासोवाल क्षेत्राला उर्वरित देशाशी जोडणारा पूल बांधला?


(A) बियास नदी

(B) रावी नदी✅✅

(C) चिनाब नदी

(D) झेलम नदी


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📘 वद्यकीय उपयोगासाठी गांजा वनस्पतीची शेती कायदेशीर करणारा पहिला आखाती देश कोणता आहे?


(A) अल्जेरिया

(B) ट्युनिशिया

(C) लिबिया

(D) लेबनॉन✅✅


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📕 कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?


(A) टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस✅✅

(B) फ्लिपकार्ट

(C) पेटीएम

(D) इन्फोसिस


📘 कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?


(A) मध्यप्रदेश

(B) राजस्थान

(C) उत्तराखंड✅✅

(D) हरयाणा


१) १९३५ च्या कायद्याने-------% जनतेला मतदानाचा अधिकार मिळाला. 


१) ५ 

२) १०👍👍

३) १५

४) २०



२) सांप्रदायिक निवडणुकीचे जनक असे कोणाला संबोधतात?


१) लॉर्ड कर्झन  

२) लॉर्ड मिन्टो👍👍

३) मोंटेग्यु 

४)  चेम्सफर्ड


३)---------- च्या चार्टर कायद्यानुसार नागरी सेवकांसाठी खुल्या स्पर्धेचे आयोजन करण्यात येवू लागले 


१) १८५८

२)  १८११

३) १८६१

४) १८३३👍👍



४) १८३३ च्या चार्टर कायद्यानुसार बंगालच्या  गव्हर्नर  जनरल ला भारताचा  गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात आले भारताचे प्रथम गव्हर्नर  जनरल ----------------- हे होते 


१) विल्यम बेंटिक👍👍

२) वॉरन हेस्टीग्ज

३) रोबर्ट क्लाइव्ह

४) लॉर्ड कोर्नवालीस



५) १७७३  च्या रेग्युलेटिंग  कायद्यानुसार बंगालच्या गव्हर्नर ला गव्हर्नर  जनरल असे संबोधण्यात येवू लागले पहिले गव्हर्नर जनरल ------------- हे होते

 

१) विल्यम बेंन्टीक 

२) वॉरन हेस्टीग्ज👍👍

३) रोबर्ट क्लाइव्ह

४ लॉर्ड कोर्नवालीस


६) भारतात देशी वृत्तपत्रांना खरा प्रारंभ कधी आणि कोणाच्या काळात झाला?


१) मार्क्विस ऑफ हेस्टीग्ज👍👍

२) लॉर्ड वेलस्ली

३) लॉर्ड मिंटो

४) लॉर्ड विल्यम बेंटिक


७) भारतात पोलीस खात्याची स्थापना कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?


१) वॉरन हेस्टींग्ज

२) विल्यम कॅरी

३) लॉर्ड विल्यम बेंटिक

४) चार्ल्स बॅबेज

५) लॉर्ड कॉर्नवालीस👍👍



८) ब्रिटीश नागरी सेवेची सुरवात

कोणत्या गव्हर्नर जनरलने केली?

१) रोबर्ट हुक 

२) जॉन स्नोव

३) लॉर्ड कॉंर्नवालीस👍👍

४) रॉबर्ट कोच



९) भारतीय सनदी सेवांचा जनक कोणत्या गव्हर्नर जनरलला म्हणतात?

१)फ्रँकेल 

२)लॉर्ड कर्झन

३) रिकेट्स

४) लॉर्ड कॉंर्नवालीस👍👍



१०) भारतीय नागरिकांना उच्च पदे आणि इंग्रजी शिक्षण कोणत्या गव्हर्नर जनरलने दिले?

१) एम.डब्लू.beijerinck

२) लॉर्ड विल्यम बेंटीक👍👍

३) जे.एच. वॉलकर

४)लॉर्ड मिंटो



११) भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून कोणाला  ओळखतात?


१) रॉबर्ट क्लाइव्ह

२) जेम्सफर्ड

३)रिपन👍👍

४)लॉर्ड विल्यम बेंटिक



१२)------पासून मद्रास प्रांतात अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली.

१) १ सप्टेंबर१९१७

२) १सप्टेंबर१९१८

३) १सप्टेंबर १८१६

४) १सप्टेंबर१९१६👍



१३) 1919 ला कोणत्या प्रांतात व्हाईसरॉय चेम्सफोर्डने रॉलेक्ट अॅक्ट लागू केला.

१) पंजाब👍👍

२) हरियाणा

३) बंगाल

४) महाराष्ट्र


१४)-------च्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फूट पडून काँग्रेसचे विभाजन झाले.


१) १९०६

२) १९०७👍👍

३) १८०७

४) १९०५



१५) होमरूल चळवळ सर्वप्रथम-----मध्ये सुरू करण्यात आली होती.


१) थायलंड

२) भारत

३) आयर्लंड👍👍

४) इराण


1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?


 ✅19 ते 25

     31 ते 35

    22 ते 24

    31 ते 51


2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.


✅ राष्ट्रपती

      उपराष्ट्रपती

      पंतप्रधान

       राज्यप ल


3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?


      राष्ट्रपती

      राज्यपाल

      पंतप्रधान

✅ सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती


4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?


 ✅11 डिसेंबर 1946

      29 ऑगस्ट 1947

      10 जानेवारी 1947

      9 डिसेंबर 1946


5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.


      परिशिष्ट-1

      परिशिष्ट-2

 ✅परिशिष्ट-3

      परिशिष्ट-4


6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.


 ✅47

      48

      52

    यापैकी नाह.


7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?


      डॉ. आंबेडकर

 ✅डॉ. राजेंद्रप्रसाद

      पंडित नेहरू

      लॉर्ड माऊंटबॅटन


8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?


      डॉ. राजेंद्रप्रसाद

 ✅डॉ. आंबेडकर

       महात्मा गांधी

       पंडित नेहरू


9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते?


      लोकसभा

      विधानसभा

✅ राज्यसभा

      विधानपरिषद


10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?


 ✅लोकसभा सदस्य

      मंत्रीमंडळ

      राज्यसभा सदस्य

      राष्ट्रपती


11. लोकसभेची मुदत किती वर्ष असते?


      1.8 वर्षे

      6 वर्षे

      4 वर्षे

✅ 5 वर्षे


12. राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो?


      राष्ट्रपती

      सभापती

      उपराष्ट्रपती

 ✅पतप्रधान

"चलेजाव चळवळ १९४२"



नुकतेच ७५ वर्ष पुर्ण
(संकल्प से सिध्दी - घोषणा)

२अधिवेशने-
१-वर्धा -प्रस्ताव संमत
२-गवालिया टँक,मुंबई-सुरु

ठराव मंजुर-८ अॉगस्ट १९४२

कारण-
क्रिप्स वाटाघाडी फिस्कटल्या
जपाण आक्रमण
महागाईचा भडका
महायुध्द

घोषणा-
चले जाव (युसुफ मेहेरअली)
करा अथवा मरा(गांधी)

अटक-(अॉपरेशन झिरो अवर)

गांधी-आगाखाण पॕलेस,पुणे
नेहरु-अल्मोडा
जयप्रकाश नारायण-हजारीबाग कारागृह

असहभागी घटक-
मुस्लीम लीग,
हिंदु महासभा
लिबरल पार्टी
भारतीय कम्युनीस्ट पक्ष


पत्रीसरकार-

महाराष्ट्र - सातारा
उत्तर प्रदेश -बलिया (भारतातील पहिले )
बंगाल -मिदनापुर /तामलुक-(गांधी बुढी-मतंगिणी हाजरा)
बिहार -पुर्णिया

गव्हर्नर -लाॕर्ड लिनलिथगो
INC चे अध्यक्ष-मौलाना आझाद

९ अॉगस्टला गवालिया टॕंक वर झेंडा फडकवणारी महिला-अरुणा असफ अली.
उमेश कुदळे

इ.स. 1883 :- ईलबर्टबिल



🖍 ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात युरोपीय व्यक्तींकरीता ब्रिटिश फौजदारी कायदा तर भारतीय लोकांसाठी मोगलकालीन फौजदारी कायदा लागू करण्यात येत असे.

🖍 1857 च्या उठावानंतर मात्र परीस्थिती बदलली व इंग्रज लोकांप्रमाणे भारतीय लोकंही ब्रिटिश 
राजसत्तेचे प्रजानन बनल्याने सर्वांनाच ब्रिटिश फौजदारी कायदा लागू करण्यात आला. परंतु युरोपीयनांविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार मात्र भारतीय न्यायाधीशांना दिल्या
गेला नाही.

🖍 1873 च्या क्रिमिनल प्रोसिजर कोड नुसार भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना 
युरोपियनांविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार राहणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. 
हा अधिकार उच्च न्यायालयाच्या सर्व न्यायाधीशांना होता. परंतु जिल्हा स्तरावर मात्र फक्त युरोपीयन
न्यायाधीशांनाच होता.

🖍 करिमिनल प्रोसिजर कोडमध्ये सुधारणा करण्याचे काम 1882 मध्ये रिपन सरकारने हाती घेतले त्यावेळी सनदी सिव्हील सर्व्हिसमध्ये असलेले बिहारीलाल गुप्ता यांनी न्यायदान पध्दतीतील हे दोष रिपनच्या नजरेस आणून दिले.

🖍 परेसिडेंन्सी मॅजिस्ट्रेट म्हणून त्यांना युरोपीयन गुन्हेगांरांविरुध्द खटले चालविण्याचा असलेला अधिकार जिल्ह्याच्या ठिकाणी बदली होताच उच्च पदी नेमणूक होऊनही त्यांनी तो गमावला होता.

🖍 यावेळी रिपन यांनी भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांनाही युरोपीय न्यायाधीशांप्रमाणे युरोपीय गुन्हेगारांविरुध्द खटले चालविण्याचा अधिकार दिला जावा अशी शिफारस केली.

🖍 सदरील प्रस्तावावर इंडिया कौन्सिल मध्येही चर्चा झाली. परंतु इंडिया कौन्सिलचा विधीतज्ज्ञ सर हेन्री मेन हा त्यावेळी पॅरीसला होता. त्याच्याकडे विचारणा केली असता रिपनने योजलेली सुधारणा ही युरोपीय तसेच अँग्लो इंडियन गटाला बोचक ठरण्याचा संभव असल्याने प्रथम या गटांशी विचार विमर्श कारावा अशी सूचना त्याने केली.
  परंतु त्याचे हे पत्र चुकून भारतमंत्र्यांच्या खिशात राहून गेल्याने रिपन पर्यंत ते पोहोचलेच नाही व यामुळे आपण योजलेल्या सुधारणेला इंडीया कौन्सिल व भारतातील ब्रिटिश अधिकारी वर्ग यांच्याकडून विरोध होणार नाही असे रिपनला वाटल्याने त्याने त्या दिशेने पाऊल उचलले.

🖍 तयाच्या मार्गदर्शनाखालील सी.पी. इलबर्ट या कार्यकारी मंडळाच्या विधीसदस्याने तद्संबंधी विधेयक तयार करुन 2 फेब्रुवारी 1883 रोजी विधीमंडळापुढे मान्यतेकरीता ठेवले.

🖍 यान्वये उच्च न्यायालयाकडे अपील करण्याचा आरोपीचा हक्क कायम ठेवून भारतीय जिल्हा
न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना युरोपीय आरोपीविरुध्द फौजदारी खटले चालविण्याचा अधिकार देण्याची तरतूद त्या विधेयकात केली होती.

🖍 परंतु विधेयक सादर होताच विधीमंडळातून ब्रिटिश सदस्यांनी याबद्दलची तीव्र नापसंती व्यक्त केली व लगेचच भारतातील युरोपीय व अँग्लो इंडियन समाज हा रिपन विरुध्द भडकला.

🖍 28 फेब्रुवारी 1883 रोजी कलकत्त्याच्या टाऊन हॉलमध्ये त्यांनी मोठी सभा घेतली व इलबर्ट
बिलाविरुध्द आंदोलन सुरु करण्याकरीता अँग्लो इंडियन ॲण्ड युरोपीयन डिफेन्स असोसिएशन या 
नावाची संघटना देखील स्थापन करण्यात आली. तसेच युरोपीय महिलांचीही एक समिती तयार 
करण्यात आली.

🖍 सटेटस्मन या केवळ एका इंग्रजी वृत्तपत्राचा अपवाद वगळता इंग्रजी वृत्तपत्रेप्रामुख्याने सुशिक्षित 
भारतीयांविरुध्द विषारी प्रचार करु लागली.

🖍 इग्रजी वृत्तपत्रांव्दार युरोपीय व अँग्लो इंडियन गटांनी रिपनवर कठोर शब्दात टिकेचे प्रहार तर केलेच, परंतु कलकत्त्याच्या भर रस्त्यावर त्याच्याशी उद्दामपणे वागून त्याची उघडपणे अप्रतिष्ठा करण्याइतपत त्यांची मजल गेली होती.

🖍 आता पार्लमेंटच्या बऱ्याच सदस्यांनी रिपनच्या विरोधकांचा पक्ष उचलून धरल्याने रिपनला उघडपणे पाठिंबा देणे हे ग्लॅडस्टनला शक्य झाले नाही.

🖍 बऱ्याच विचाराअंती रिपनने त्यात फेरफार करुन नव्याने ते विधेयक विधीमंडळापुढे ठेवले व 25 जानेवारी 1884 रोजी ते पारीत झाले.

🖍 यान्वये भारतीय जिल्हा न्यायाधीश व सत्र न्यायाधीश यांना युरोपीय आरोपीविरुध्द फौजदारी खटला चालविण्याचा अधिकार दिला गेला असला, तरी देखील सदरील खटला ज्युरी समाेर चालवावा व ज्युरींपैकी निम्मे सदस्य तरी युरोपीय असावेत अशी मागणी करण्याचा अधिकार हा युरोपीयनांना देण्यात आला.

🖍 अखेर इलबर्ट बिल पास झाले, तरीही वर्णभेदावर आधारीत पक्षपात नाहीसा करणे व युरोपीय न्यायाधीशांच्या बरोबरींने भारतीय न्यायाधीशांना खटले चालविण्याचा अधिकार देणे हे या बिलामागील मुख्य उद्दिष्ट मात्र अत्यंत काैतुकास्पद व हिम्मतीने प्रयत्न करुन सुध्दा लॉर्ड रिपन यास साध्य करीता आले नाही.

42वी घटनादुरुस्ती 1976

या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.


2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.


3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.


4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद


5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती


6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.


7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.


8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.


9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.


10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.


11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण


12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.


13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.


14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.


15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी


16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.


17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.


18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद


19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.

"अविश्वास प्रस्ताव (No Confidence Motion) )"

2018 साली लोकसभेत सद्याच्या सरकार विरुद्ध अविश्वासाचा प्रस्ताव "तेलगू देसम पार्टीने" (TDP) मांडला होता. प्रस्ताव मात्र संमत झाला नसल्याने सरकार स्थिर आहे यावर्षी  होणाऱ्या परीक्षासाठी अविश्वास प्रस्तावाबाबत घटनात्मक आणि सभागृहात काय तरतुदी  आहेत त्याचा आढावा.....


- कलम 75 सांगते की, मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असते. त्यामुळे लोकसभेत बहुमत असे पर्यंत मंत्रिमंडळ सत्तेवर राहते. मंत्रीमंडळावर अविश्वासाचा प्रस्ताव मांडून लोकसभा त्याला सत्तेवरून हटवू शकते.


1) राज्यघटनेत कुठेही विशेष अशी अविश्वास प्रस्तावाची तरतूद नाही.


2) अविश्वास प्रस्ताव हा फक्त लोकसभेत मांडता येतो. राज्यसभेत नाही.


3) अविश्वास प्रस्तावाची तरतूद लोकसभेच्या कार्यपद्धती मध्ये आहे.


4) लोकसभेचा कोणताही खासदार (सत्ताधारी अथवा विरोधी) हा लोकसभेत अविश्वास प्रस्ताव मांडू शकतो.


5) प्रस्ताव मांडण्यासाठी कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 वाजता लोकसभा सचिवांकडे नोटीस देणे बंधनकारक आहे.


6) प्रस्ताव मांडताना 50 लोकसभा सदस्यांचे समर्थन बंधनकारक आहे.


7) वरील सगळी प्रक्रिया पूर्ण झाली की लोकसभा अध्यक्ष प्रस्तावावर चर्चा व मतदान कधी होणार हे सांगतात.


८) सभागृहात जर हा प्रस्ताव मंजूर झाला. त्या सरकारला राजीनामा द्यावा लागतो.


9) प्रस्तावावर मतदान हे आवाजी किंवा मतविभागणी करून होते.


10) अविश्वास प्रस्ताव मांडताना करणे देण्याची गरज नसते.


11) अविश्वास प्रस्ताव फक्त मंत्रिमंडळाविरुद्ध मांडता येतो.

परश्न व उत्तरे

(1) कान्हा पार्क कोणत्या राज्यात आहे? 

👉मध्यप्रदेश. 


(2)गुलाबी क्रांती चा  संबंध कशाशी आहे 

👉झिंगा उत्पादन 


(3) दूध उत्पादन मध्ये कोणता देश अग्रेसर आहे 

👉भारत 


(4)दिल्ली हे पुस्तक कोणी लिहले 

👉खशवंत सिंह


(5)श्रीनगर ची स्थापना कोणी केली 

👉अशोक


(6)भगतसिंग राजगुरू व सुखदेव यांना फाशी कधी देण्यात आली 👉23 मार्च 1931


(7) भारताचे प्रथम रक्षा मंत्री कोण होते 👉बलदेव सिंह


(8)वायू सेना अकॅडेमी 

👉हद्राबाद


(9)थल सेना अकॅडेमी 

👉दहरादून


(10)इंडियन नेव्हल अकॅडेमी 

👉कोचीन


(11)सापांचा देश 

👉बराझील


(12)हिरे आणि सोन्या चा देश 

👉दक्षिण आफ्रिका


(13)हुसैन सागर सरोवर कोठे आहे 

👉आध्रप्रदेश


(14)शिवपुरी नॅशनल पार्क 

👉मध्यप्रदेश


(15) फॅशन कि नगरी 

👉परिस


(16) भारताची पहिली अनुभटी अप्सरा केंव्हा सुरु करण्यात आली

👉1956


(17)सत्यार्थ प्रकाश चे लेखक 

👉सवामी दयानंद


(18)केवलादेव नॅशनल पार्क 

👉भरतपूर राजस्थान


(19)दुधवा नॅशनल पार्क   

👉उत्तरप्रदेश


(20)राजाजी नॅशनल पार्क 

👉उत्तराखंड


(21) महाराष्ट्रातील पहिला सोने शुद्धीकरण कारखाना 

👉शिरपूर


(22)सर्वाधिक शहरी लोकसंख्या 

👉महाराष्ट्र


(23)जयपूर फूट चे जनक 

👉डॉ प्रमोद सेठीं


(24)एन्डोसल्फान हे काय आहे 

👉किडनाशक


(25)पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची 

👉मा. गांधी


(26)जैतापुर अणुविदुत प्रकल्प प्रस्तावित 

👉रत्नागिरी


(27)संत जनाबाई  समाधी 

👉गगाखेड


(28)  पुरंदर चा किल्ला कोणी लढवला 

👉मरारजी देशपांडे


(29) हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो 

👉76


(30) अर्नाळा किल्ला 

👉रायगड


(31) उठी उठी गोपाळा गीताचे लेखक 

👉होनाजी बाळा


(32)शांतता कोर्ट चालू आहे. हे नाटक कोणी लिहिले 

👉विजय तेंडुलकर


(33) उस्मानाबाद जिल्हाचे क्षेत्रफळ 

7569 चौ. किमी


(34) उस्मानाबाद विधानसभा मतदार संघ 

👉4


(35) उस्मानाबाद जिल्हातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 

👉 NH 9

      NH 204

      NH  211


(36) अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर 

👉 गरुशिखर


(37) सुभाषचंद्र बोस यांच्या वडिलांचे  नाव 

👉जानकीनाथ बोस


(38) सोयाबीन उत्पादन मध्ये अग्रेसर राज्य 

👉 मध्यप्रदेश


(40))नालंदा विश्वविद्यालय ची स्थापना 

👉 कमारगुप्त


(41)  CRPF ची स्थापना 

       👉1939 नवी दिल्ली


(42)  NCC ची स्थापना 

👉   1948  नवी दिल्ली


(43) NSG  ची स्थापना 

👉  1984  नवी दिल्ली


(44)  BSF ची स्थापना 

👉  1965 नवी दिल्ली


(45)  ITBP ची स्थापना 

👉    1962  नवी दिल्ली


प्रमुख देश व गुप्तहेर संघटना


(46) इंडीया 👉RAW

Research and analysis wing


(47) पाकिस्तान 👉 ISI

Inter service intelligence


(48) बांग्लादेश 👉NSI 

National security intelligence


(49) अमेरिका 👉CIA

Central intelligence agency


(50) इराण 👉 साबाक 

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

 1) 1909 च्या कायद्यामधील उणिवा कमी करण्यासाठी 1919 च्या सुधारित कायदा तयार करण्यात आला. या कायद्याचा मसुदा कोणी तयार केला? 

1) लॉर्ड माँटेग्यू व व्हाईसरॉय चेम्सफर्ड ✅✅

2) लॉर्ड मोर्ले व व्हाईसरॉय मिंटो 

3) चेंबरलिन व मूल्टन 

4) डॉ अॅलन सँडल व जेम्स जीन्स




2) अमेरिकेतील ----- या सभागृहामध्ये समानतेच्या तत्वानुसार प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. 

1) House of Representatives 

2)Senate ✅✅

3) House of Commons

4) none of these



3) खालील विधाने कशा संदर्भातील आहेत? 

अ) सरंजामदारांच्या सभेच्या मंजूरीविना राजाला कर लागू करता येणार नाही. 

ब)  आरोप सिद्ध झाल्याशिवाय कोणालाही अटक करून ठेवता येणार नाही अथवा हद्दपार करता येणार नाही किंवा मालमत्ता हिरावून घेता येणार नाही.

क)  कायद्याच्या दृष्टीने श्रीमंत गरीब असा भेदभाव करता येत नाही 

ड)  या तरतुदीमुळे चॅथॅम यांनी त्यास ब्रिटिश शासन पध्दतीचे बायबल मानले आहे. 


1) मॅग्नाकार्टा / महान सनद✅✅

2) कोलंबिया रेजीस

3) मॉडेल पार्लमेंट

4) मॅग्नम कौन्सिलिअम





4) अ गट 

     1) इंग्लंड 

     2) भारत 

     3) स्वित्झर्लंड 

     4) संसदीय व्यवस्था 


     ब) गट 

अ)  लोकसभा 

ब) जबाबदार शासनव्यवस्था

क)  सामान्यांचे सभागृह 

ड)  सत्ताविभाजन, नियंत्रण, व

       संतुलन 

ई)  राष्ट्रीय परिषद 


1) 1-क, 2-अ, 3-ई, 4-ब,5-ड ✅✅

2) 1-ब, 2-अ, 3-ई, 4-क,5-ड

3) 1-क, 2-ड, 3-ई, 4-अ,5-ब

4) 1-ब, 2-ड, 3-अ, 4-क,5-ई




5) सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश विरुद्ध महाभियोग खटला चालविण्यास -----

अ) लोकसभा सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधिशाला घटनाविरोधी वर्तन, गैरवर्तन, भ्रष्टाचार इ. कारणावरून पदच्युतीचा आदेश काढू शकतो. 

ब) दोन्ही सभागृहांच्या उपस्थित सदस्य संख्येच्या 2/3 बहुमताने न्यायाधीशांवरील आरोप सिद्ध झाला पाहिजे. 

क) न्यायाधीश चौकशी कायदा 1968 नुसार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाला संसद महाभियोगाचा खटला चालवून पदावरून बडतर्फ करु शकते. 

वरील पैकी चुकीचे विधान कोणते?


1.फक्त ब

2. फक्त अ✅✅

3. अ व ब

4. ब व क




6) राज्यसभेत लोकसभेप्रमाणे कोणत्या बाबींमध्ये समान अधिकार आहेत?  

1) नवीन अखिल भारतीय सेवा निर्माण करण्याविषयी 

2) घटना दुरुस्तीमध्ये ✅

3) सरकार हटविण्यासाठी 

4) कपात प्रस्ताव सदर करण्याबाबत





7) अर्थमंत्री संसदेमध्ये अर्थसंकल्प सादर करताना सोबत आणखी काही दस्तऐवज सादर करतात. ज्यामध्ये 'बृहद आर्थिक रूपरेखा विवरण' (The Macro Economic Framework Statement) चाही समावेश असतो. हा दस्तऐवज खालील मँडेटमुळे सादर केला जातो. 

1)चिरकालिय संसदीय परंपरेमुळे 

2) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 112 तसेच 110(1) मुळे 

3) भारतीय संविधानाच्या कलम 113 मुळे 

4) राजकोषीय उत्तरदायित्व व बजेट व्यवस्थापन अधिनियम, 2003 (FRBM, Act 2003) तील तरतुदीमुळे ✅✅




प्र. 8) राज्यसभेने धन विधेयक दुरुस्तीसह वा दुरुस्तीविरहित 14 दिवसाच्या मुदतीत लोकसभेकडे सादर न केल्यास...

1. ते नामंजूर झाले असे समजण्यात येईल.

2. ते जसेच्या तसे दोन्ही गृहांनी संमत केले असे समजण्यात येईल.✅✅

3. ते पुन्हा नव्याने मांडावे लागेल.

4. त्यावर दोन्ही गृहांच्या संयुक्त बैठकीत निर्णय घ्यावा लागेल.



प्र.9) एखादे विधेयक धन विधेयक किंवा नाही, हे ठरविण्याचा अधिकार कोणास असतो?

1. राष्ट्रपती

2. लोकसभा सभापती✅✅

3. लोकसभा

4. राज्यसभा




10) 92 वी घटनादुरुस्ती 2003 अन्वये 8 व्या परिशिष्टात नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या चारही भाषा खालील पैकी कोणत्या पर्यायात आहेत? 

1) कोंकणी,  मणिपुरी, संथाली, डोगरी

2) संथाली,बोडो,कोंकणी,भोजपुरी

3) बोडो, संथाली, मैथिली, भोजपुरी

4) बोडो, संथाली, मैथिली, डोगरी✅

विधानसभा



उमेदवारांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा.

2. त्याच्या वयाची 25 वर्ष पूर्ण झालेली असावी.

3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

सदस्यांचा कार्यकाल : सदस्यांचा कार्यकाल पाच वर्ष इतका असतो.

गणसंख्या : 1/10

अधिवेशन :

दोन अधिवेशनामध्ये सहा महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे.


सभापती व उपसभापती :

विधानसभेत निवडून आलेल्या सदस्यांकडून एका सदस्याची सभापती तर दुसर्या एका सदस्याची उपसभापती म्हणून निवड केली जाते.


सभापतीचे कार्य आणि अधिकार :
1. विधानसभेत मांडण्यात येणार्या प्रस्तावाला संमती देणे.
2. विधानसभेत शांतता व सुव्यवस्था राखणे.
3. सभागृहात एखाद्या विषयावर समान मते पडल्यास आपले निर्णायक मत देणे.
4. जनविधेयक आहे की नाही ते ठरविणे.

जनरल माहिती :
1. धनविधेयक प्रथम विधानसभेत मांडतात.
2. धनविधेयक आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार सभापतीला आहे.
3. धनविधेयकाला विधानपरिषदेने 14 दिवसाच्या आत मान्यता द्यावी लागते. काहीच न कळवल्यास तीला ते मान्य आहे असे समजले जाते.
4. मुख्यमंत्री हा मंत्रिमंडळाचा प्रमुख असतो.
5. घटकराज्यांचे मंत्रीमंडल संयुक्तरित्या विधानसभेला जबाबदार असते.
6. मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा होय.
7. मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीचे अध्यक्षपद मुख्यमंत्री भूषवितो.
8. स्वातंत्र्य भारताचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे होते.

चालू घडामोडी :- 12 जानेवारी 2024

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 च्या पुरस्कारात देशात महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये मध्यप्रदेश राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे.

◆ स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारात 1 लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील नवी मुंबई चा देशात तिसरा क्रमांक आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये एक लाखा पेक्षा कमी लोकसंख्येच्या शहरामध्ये महाराष्ट्र राज्यातील सासवड हे शहर देशात प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारत सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय स्तरावर एकून सहा पुरस्कार मिळाले आहेत.

◆ महाराष्ट्र राज्यातील पिंपरी चिंचवड या महानगर पालिकेला स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारामध्ये वॉटर प्लस दर्जा प्राप्त झाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये इंदोर आणि सुरत शहरे देशात सर्वाधिक स्वच्छ ठरली आहेत.

◆ मध्यप्रदेश राज्यातील इंदोर शहर सतव्यांदा देशात सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील पुणे शहराचा सर्वाधिक स्वच्छ शहराच्या यादीत देशात 10वा क्रमांक आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये गंगा किनाऱ्यावरील स्वच्छ शहराच्या यादीत वाराणसी हे शहर प्रथम स्थानावर आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट सफाई मिञ सेफ सिटी पुरस्कार चंदीगड या शहराला मिळाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारात महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट स्वच्छ राजधानी चा पुरस्कार "भोपाळ" ला मिळाला आहे.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2023 पुरस्कारांमध्ये पणजी या शहराला Fast Mover City award मिळाला आहे.

◆ पैठण येथे आयोजित पाहिल्या मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सुरेश सावंत हे आहेत.

◆ जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024 च्या यादीत सहा(फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, सिंगापूर, स्पेन) देशांनी सर्वोच्च स्थान पटकावले आहे.

◆ जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट 2024 च्या यादीत भारत देशाचा 80वा क्रमांक आहे.

◆ जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2023 च्या यादीत भारताचा 83वा क्रमांक होता.

◆ जगातील सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2024 च्या यादीनुसार भारतीय नागरिक 62 देशांत व्हिसाशिवाय प्रवास करू शकतात.

◆ जगात सर्वाधिक प्रभावशाली पासपोर्ट 2024 यादी नुसार अफगाणिस्थान या देशाचा क्रमांक सर्वात खाली आहे.

◆ 18 व्या आशियाई चसक फुटबॉल स्पर्धा कतार येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.

◆ कतार येथे आयोजित आशियाई चसक फुटबॉल स्पर्धेत 24 देशांचा सहभाग आहे.

◆ अयोध्या या ठिकाणच्या हनुमान गडी बेसन लाडू ला GI टॅग प्राप्त झाले आहे.

◆ केंद्र सरकारच्या पी एम घरकुल योजनेत शहरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घरे बांधण्यात महाराष्ट्र राज्याचा दुसरा क्रमांक आहे.

◆ केंद्र सरकारच्या पी एम घरकुल योजनेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आंध्रप्रदेश हे राज्य प्रथम क्रमांकावर आहे.

◆ भारतात 12 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो.

◆ भारत देशात 12 जानेवारी हा दिवस स्वामी विवेकानंद यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतात येतो.

◆ भारतात 1985 या वर्षापासून दरवर्षी 12 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय युवा दिवस म्हणून साजरा करतात येतो.

◆ केंद्र सरकारच्या स्वच्छता सर्वेक्षण 2024 पुरस्कारामध्ये महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक 21 शहरांना वॉटर प्लस दर्जा मिळाला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

खालील अजून २ कागदपत्रे तुम्हाला लागणार आहेत त्याची प्रिंट घेऊन जायला लागेल.

 

Small Family_- Click Here


Fitnees Certificate_- Click Here

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...