Monday 26 October 2020

धरणांची पाणी क्षमता



धरणातील पाणी आवक जावक मापे बघा, किती पाणी येते वा जाते माहिती आहे कां ???


1) टीएमसी ( TMC) म्हणजे काय ??

2) क्युसेक (Cusec )म्हणजे काय ??

3) क्युमेक (Cumec ) म्हणजे काय??


सध्या सर्वदूर चांगला पाऊस होतो आहे, धरणे भरत आहेत, काही धरणांतून पाणीही सोडल्या जात आहे.इतके टीएमसी पाणी जमा झाले, तितके क्युसेक पाणी सोडले असे आपण पेपर मधून वाचतो. पण या संज्ञांचा नेमका अर्थ काय ???


आपणास फक्त "लिटर" ही संज्ञा माहित आहे; तर या लिटर संज्ञेप्रमाणे यांचा अर्थ समजून घेवूया.


▪️पाणी मोजण्याची एकके


● स्थिर पाणी मोजण्याची एकके – 


1) लिटर 

2) घनफूट 

3) घनमीटर  


▪️धरणातील पाणी मोजण्याचे एकक – टीएमसी  TMC (Thousand Million Cubic Feet) (अब्ज घनफूट)


● एक टीएमसी म्हणजे one thousand millions cubic feet म्हणजे एकावर नऊ शुन्य (01 अब्ज) इतके घन फूट.


1 टीएमसी  = 28,316,846,592 लिटर्स


2) वाहते पाणी मोजण्याची एकके-


1) 1 क्यूसेक ( Cusec )– एका सेकंदास एक घनफूट पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्यूसेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 28.3 लिटर पाणी बाहेर पडते. 


2) 1 क्युमेक (Cumec) - एका सेकंदास एक घनमीटर पाण्याचा प्रवाह म्हणजे एक क्युमेक होय. या प्रमाणात एक सेकंदात 1,000 लिटर पाणी बाहेर पडते. 


● उदा.

पुण्याच्या खडकवासला धरणाची क्षमता 1.97 टीएमसी आहे.

म्हणजेच त्यामध्ये 1.97 x 28.317 अब्ज लिटर्स पाणी मावते.


● याच धरणातून सध्या 500 क्युसेक पाणी नदीत सोडले जातआहे.


● म्हणजेच 500 x 27.317 लिटर प्रति सेकंद या विसर्गाने पाणी सोडल्या जात आहे.


◆ महाराष्ट्रातील क्षमतेने मोठी असलेली 06 धरणे


1)उजनी  117.27 टीएमसी 

2)कोयना  105.27 टीएमसी 

3)जायकवाडी 76.65 टीएमसी  ( पैठण )

4)पेंच तोतलाडोह  35.90 टीएमसी 

5) वारणा  34.40 टीएमसी

6) पूर्णा येलदरी  28.56 टीएमसी

बारा ज्योतिर्लिंगे



१) सोमनाथ -

सोरटी सोमनाथ- काठेवाडचे दक्षिणेस असलेल्या वेरावळ बंदराला समुद्रमार्गाने आणि रेल्वेने जातां येते. वेरावळहून प्रभासपट्टण तीन मैल लांब आहे. प्रभासपट्टमला सोमनाथाचें देऊळ आहे. क्षय नाहींसा होण्याकरितां सोमानें (चंद्राने) लिंग स्थापून पूजा केली, म्हणून ते सोमनाथ या नावाने प्रसिद्ध झाले.


२) मल्लिकार्जुन -

गुंटकल बेसवाडा - या छोट्या लाइनवर नंद्याळ स्टेशन आहे. तेथून 28 मैलांवर असलेल्या आत्माकुमार गांवाला मोटारीने जावें लागतें. आत्माकुरहून मल्लिकार्जुन 43 मलै श्रीशैल्यपर्वतावर आहे. रागावून गेलेल्या कुमार कार्तिकेयाला भेटण्याक‍िरतां (मल्लिका) पार्वती व अर्जुन (शंकर) येथें आले म्हणून मल्लिकार्जुन या नावाने प्रसिद्ध झाले. मल्लिकार्जुनाच्या पलीकडे पांच मैलांवर पाताळगंगा (कृष्णा) आहे.


३) महाकाळेश्वर -

 उज्जयिनीस प्रसिद्ध आहे. शिवशंभोचे 'महाकाल'रूप आहे.


४) अमलेश्वर -

 ओंकारमांधाता. उज्जयिनी-खंडवा रस्त्यावर मोरटक्का स्टेशनापासून दहा मैलांवर नर्मदेच्या-कांठीं आहे. हें नर्मदेच्या दुभंग झालेल्या बेटांत डोंगरावर आहे. तेथेच गौरी सोमनाथ व भैरवशीला ही स्थानें आहेत. दुसरें ॐकार या नांवाचें लिंग नर्मदेच्या दक्षिण तीरावर आहे. हा सर्व भाग ॐकारच्या आकाराचा आहे, म्हणून यास ओंकारअमलेश्वर असें म्हणतात.


५) वैद्यनाथ -

 शिवपुराणांतील श्लोकाप्रमाणें 'वैद्यनाथं चिता भूमौ' असा पाठ आहे. संथाल परगण्यांत पूर्व रेल्वेवरील जसीडोह स्टेशनापासून तीन मैल दूर ब्रँच लाइनवर वैद्यनाथ आहे. तेथील शिवालय प्रशस्त आहे. या स्थानीं कुष्ठरोगापासून मुक्त होण्याकरितां पुष्कळ रोगी येतात. बहुतेक विद्वानांच्या मतें हें ज्योतिर्लिगाचें स्थान आहे. दक्षिणेंत बारा ज्योतिर्लिगाच्या श्लोकांत 'वैद्यनाथ चिता भूमौ' याऐवजी 'परल्यां वैजनाथं' असा पाठ आहे. परळीवैजनाथयाचें स्थान मराठवाड्यांत परभणी स्टेशनापासून चोवीस मैल दक्षिणेस आहे.


६) भीमाशंकर -

 भीमाशंकर - खेड- जुन्नरद्दून थेट भीमाशंकराच्या देवळापाशीं रस्ता जातो. कर्जतवरून आणि खेड-चासहून रस्ते आहेत. भीमानें राक्षसाचा वध केल्यामुळें भीमाशंकर नांव प्रसिद्ध झाले. आसाम प्रांतांत कामरूप जिल्ह्यांत उत्तर-पूर्व रेल्वेवर गौहत्तीजवळ ब्रह्मपूर नांवाचा पहाड आहे. त्या पहाडवरील लिंगाला कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात. नैनीताल जिल्ह्यांत उज्जनक येथें एका विशाल मंदिरांत मोठ्या घेराचें आणि दोन पुरुष उंचीचें लिंग आहे. त्यालाच कांहीं लोक भीमाशंकर म्हणतात.


७) रामेश्वर -

 दक्षिण भारतांत प्रसिद्धच आहे. रामचंद्राने याची स्थापना केल्यामुळें याला असें नांव पडलें.


८) नागेश्वर -

 श्लोकांतील पाठ, 'नागेश दारुकावने' असा आहे आणि त्याप्रमाणें द्वारकेजवळचें लिंग तें हेंच ज्योतिर्लिग होय, असें बर्‍याच लोकांचे म्हणणें आहे. गोमती द्वारकेपासून थेट द्वारकेला जाणार्‍या रस्त्यावर बारा-तेरा मैलांवर पूर्वोत्तर रस्त्यावर हें स्थान आहे. औंढ्या नागनाथ हेंच नागेश ज्योतिर्लिंग होय, असें दक्षिणेतील लोकांचे म्हणणें आहे. मराठवाड्यांत पूर्णा-हिंगोली ब्रँचवर चौडी स्टेशन लागतें. तेथून पश्चिमेस चौदा मैलांवर हें स्थान आहे. आल्मोडापासून सतरा मैलांवर उत्तर-पूर्वेस योगेश (जागेश्वर) शिवलिंग आहे. त्यालाच कांहीं लोक नागेश ज्योतिर्लिंग म्हणतात.


९) काशीविश्वेश्वर -

 वाराणशीस (काशीस) प्रसिद्धच आहे. जगाच्या प्रलयकालांत शंकर ही नगरी त्रिशूलावर धारण करतो. शिवशंभोचे 'काशी विश्वेश्वर' रूप आहे.


१०) केदारेश्वर -

 हिमालयावर हरिद्वारहून केदार 150 मैल आहे. केदारनाथाचें देऊळ वैशाख ते आश्विन उघडें असतें. नंतर कार्तिकापासून चैत्रापर्यंत तें बर्फांत बुडालेलें असल्यामुळे बंद असतें.


११) घृष्णेश्वर -

 (घृश्मेश्वर) दौलताबाद स्टेशनापासून दहा मैलांवर घृष्णेश्वर आहे. शेजारी शिवकुंड (शिवालय) नांवाचें सरोवर आहे. घृष्णेच्या (घृश्मेच्या) प्रार्थनेवरून शंकर येथें स्थिर झाले म्हणून घृणेश्वर (घृश्मेश्वर) म्हणतात.


१२) त्र्यंबकेश्वर -

नाशिकहून बीस मैलांवर पश्चिमेस गौतम ऋषिच्या विनंतीवरून गंगा येथें आली व शंकर लिंगरूपानें आले. जप मंत्र - ओम त्र्यंबकम यजामहे ,सुगन्धिम पुष्टी वर्धनम। ऊर्वारुकमीव बंधनात मृत्योर्मुक्षीय मामृतात।।


दामोदर नदी :



बिहार आणि प. बंगाल राज्यांतील खनिजसमृद्ध प्रदेशातून वाहणारी गंगेची उपनदी. लांबी सु. ६२५ किमी. जलवाहनक्षेत्र २०,७०० चौ.किमी. ही छोटा नागपूर पठारातील रांची पठारावर पालामाऊ जिल्ह्याच्या तोरी परगण्यात रांचीपासून ५६ किमी., रांची–लोहारडागा रस्त्यावरील कुरू गावाच्या पूर्व ईशान्येस १६ किमी. वर, समुद्रसपाटीपासून सु. ६१० मी. उंचीवर उगम पावते. तिचा दुसरा उगमप्रवाह हजारीबाग जिल्ह्यातील तोरी–समारिया रस्त्यावरील बालुमाथ गावाच्या दक्षिणेस सु. ३ किमी. वरून निघून पहिल्या मुख्य प्रवाहाला सु. २० किमी. वर मिळतो. सुरुवातीला दामोदर सु. ४२ किमी. डोंगराळ भागातून वाहते. नंतर ती पठारावरील विभंगद्रोणीतून करणपुरा व रामगढ कोळसाक्षेत्रांतून सु. ७५ किमी. पूर्वेकडे गेल्यावर ईशान्येस सु. २३ किमी. जाते व पुन्हा सामान्यतः पूर्वेकडे वाहू लागते. बोकारो कोळसाक्षेत्रातून आलेली गोमिया व उत्तरेकडून आलेली कोनार यांचा संयुक्त प्रवाह तिला गोमिया व बेर्मो यांदरम्यान मिळतो. जमुनिया व इतरही अनेक प्रवाह तिला दोन्ही बाजूंनी येऊन मिळतात. धनबाद जिल्ह्यातील झरिया कोळसाक्षेत्रातून गेल्यावर राणीगंज कोळसाक्षेत्राच्या पश्चिम भागात तिला तिची उत्तरेकडील सर्वांत महत्त्वाची व मोठी उपनदी बराकर मिळते. येथून ती आग्नेय वाहिनी होऊन प. बंगाल राज्यात शिरते. येथून ती नौसुलबही होते. बरद्वानजवळून गेल्यावर सु. २० किमी. वर ती एकदम दक्षिण वाहिनी होते. नंतर बरद्वान व हुगळी जिल्ह्यांतून जाऊन ती कलकत्त्याच्या नैर्ऋत्येस ५६ किमी. वरील फाल्टा येथे हुगळी या गंगेच्या फाट्यास मिळते. 


सुरुवातीच्या सु. २०० किमी. भागात नदीप्रवाहाचा उतार दर किमी.ला १·९ मी., नंतरच्या सु. १६० किमी. भागात दर किमी.ला ०·५७ मी. व अखेरच्या सु. १५० किमी. भागात तो दर किमी.ला फक्त ०·१९ मी. आहे. यामुळे सुरुवातीच्या भागात दामोदर वेगाने वाहते आणि पठाराची झीज करून पुष्कळच दगडमाती आपल्या प्रवाहाबरोबर वाहून नेते. पुढे वेग कमी झाल्यावर पात्रात व आजूबाजूला गाळ साचू लागतो. बरद्वानच्या आधीच्या सु. १०० किमी. भागात नदीच्या पात्रात ठिकठिकाणी वाळू साचते व प्रवाहाला त्यातून मार्ग काढावा लागतो. अखेरच्या भागात प्रदेश इतका सपाट आहे की, प्रवाहाला फाटे फुटून त्या प्रदेशाला त्रिभुज प्रदेशाचे स्वरूप येते.


दामोदरचे वैशिष्ट्य म्हणजे तिला येणारे विनाशकारी पूर. दामोदरच्या खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचे पाणी तिच्यातून व तिच्या उपनद्यांतून जलाभेद्य स्फटिकी खडकांवरून येते व त्यामुळे पावसाळ्यात नद्या खूपच फुगतात. हे सर्व पाणी आसनसोलजवळच्या निरुंद भागातून पुढे जाते व बरद्वान आणि हुगळी जिल्ह्यांच्या सपाट प्रदेशात एकदम पसरते. या प्रदेशाचे अशा पुरांमुळे फारच नुकसान होत आले आहे. जंगलतोड व भूपृष्ठाची झीज यांमुळे हे पूर अधिकच विध्वंसक ठरले आहेत. काही वेळा दामोदरच्या पुराचे पाणी दक्षिणेकडे पसरून रूपनारायण नदीलाही मिळते. पूर्वी दामोदर कलकत्त्याच्या वरच्या बाजूस सु. ६२ किमी. वर नया सराई येथे हुगळीला मिळत असे. परंतु अठराव्या शतकात पुराचे पाणी व नदीचे पात्र दक्षिणेकडे सरकू लागले. १७७० मध्ये पुरामुळे बरद्वान शहर पार उद्ध्व‌स्त झाले. नदीकाठचे बांध मोडून गेले व मोठा दुष्काळ पडला. पुढे एकोणिसाव्या शतकातही पुरांमुळे अनेक वेळा नुकसान झाले. चालू विसाव्या शतकात भारत स्वतंत्र झाल्यावर या पुरांचे नियंत्रण करण्यासाठी व वीजउत्पादन, वाहतूक इ. इतर हेतूंसाठी दामोदर खोरे निगमाची स्थापना होऊन बहूउद्देशीय योजना कार्यान्वित झाली. दामोदर व तिच्या उपनद्यांच्या खोऱ्यांतून लोहमार्ग व सडका यांना सुलभ मार्ग उपलब्ध झाले आहेत.


दामोदर व तिच्या दक्षिणेची कासई या नद्यांदरम्यानचा भूप्रदेश संथाळ लोकांची पवित्र भूमी होय. ते दामोदरला समुद्रच मानतात आणि त्यांच्या मृतांच्या शरीराचा काही जळका भाग त्या नदीत टाकल्यावरच त्याचे और्ध्वदेहिक पुरे होते. तो भाग पुढे महासागरात जातो असे ते मानतात.


 दामोदर खोऱ्याच्या विकास योजनेमुळे तो प्रदेश भारतातील एक अग्रेसर औद्योगिक विभाग बनला आहे. तेथील लोकवस्ती फार दाट (दर चौ.किमी. स ३८४ लोक) आहे.


दामोदर खोऱ्याची भौगोलिक रचना : दामोदर खोऱ्यात अनेक उंचसखल भाग समाविष्ट आहेत. हजारीबाग आणि गया जिल्ह्यांत सु. ३८० मी. उंचीचे कोडार्मा पठार असून ते गिरिदिहकडे विस्तारले आहे. या पठारावर दामोदरची प्रमुख उपनदी बराकर उगम पावते. हजारीबाग पठाराच्या ईशान्य कोपऱ्यात १,३६५·५ मी. उंचीचा पारसनाथचा डोंगर आहे. सिंगभूम, पुरूलिया व रांची यांच्या सीमेवर डास्मा डोंगररांग असून यातून सुवर्णरेखा नदी मार्ग काढते. याच्या दक्षिणेस सिंगभूमच्या सपाट प्रदेशात अनेक अवशिष्ट शैल व माथ्यावर जांभा दगडांचा थर असलेली छोटी पठारे आहेत. चक्रधरपूर व चैबासा यांच्या पश्चिमेस छोटानागपूर पठाराची कड आहे. या पठारावर अनेक उपपठारे असून त्यांपैकी रांची पठार सु. ६१० मी. उंच आहे. ते पश्चिमेस ३१४ मी. पर्यंत उंच होत गेले असून त्यालाही अनेक अवशिष्ट शैल व कटक आहेत. रांची पठाराच्या उत्तरेस हजारीबाग पठार असून दोहोंच्या दरम्यान दामोदर नदी विभंग दरीतून वाहते. 


दामोदर खोऱ्यात हुगळीला मिळणारी दामोदर, बंगालच्या उपसागरास मिळणाऱ्या सुप्रसिद्ध शोण नदीला मिळणारी उत्तर कोएल व महानदीस मिळणारी दक्षिण कोएल या प्रमुख नद्या असून त्यांच्या अनेक उपनद्या आहेत. नद्यांना येणाऱ्या पुरांमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पूरनियंत्रण हा दामोदर खोरे प्रकल्पाचा एक प्रमुख उद्देश आहे.

शिवालिक नदी :




उत्तर भारतातील जलोत्सारण प्रणालीच्या (नदीनाल्यांच्या) रचनेत अनेक मोठे बदल तृतीय कल्पानंतर (सु. ६·५ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या काळानंतर) घडून आले. यामुळे तेथील मोठ्या नद्या अगदी उलट दिशेने वाहू लागल्या. हिमालयाच्या पायथ्याशी ⇨ शिवालिक संघाच्या खडकांचा लांब पातळ पट्टा तयार होऊन तो पश्चिमेकडे अधिक रुंद झाला. हे खडक वायव्येकडे वाहणाऱ्या एका मोठ्या नदीच्या पूरभूमीत साचलेले आहेत, असे मानतात. आसाम (पोटवार पठाराच्या पूर्वेकडील ब्रह्मपुत्रा खोरे) ते पंजाबच्या सर्वांत वायव्येकडील कोपऱ्यापर्यंत (पाकिस्तानातील बन्नू मैदानापर्यंत) ही नदी वाहत होती. या बन्नू मैदानात ती दक्षिणेकडे वळून सावकाशपणे आटत असलेल्या मायोसीन (सु. २ ते १·२ कोटी वर्षांपूर्वीच्या) काळातील समुद्राला मिळाली होती. जी. ई. पिलग्रिम यांनी गंगा व यमुना नद्यांच्या दरम्यान असलेल्या शिवालिक टेकड्यांवरून या नदीला शिवालिक नदी हे नाव दिले, तर ई. एच्. पॅस्को यांनी सिंधू, गंगा व ब्रह्मपुत्रा यांच्या एकत्रित प्रवाहावरून हिचे इंडोब्राह्म असे नामकरण केले. हिमालयाच्या मुख्य उत्थानानंतर समुद्राच्या अवशिष्ट अरुंद पट्ट्यांतून ही नदी निर्माण झाली, असे मानतात. या नदीच्या त्रिभूज प्रदेशाच्या आक्रमणाने समुद्राचा हा पट्टा सावकाशपणे मागे हटत गेला. येथील विस्तृत द्रोणीत मुरी शिवालिक निक्षेपांचे जाड थर साचले. शिवालिक संघाच्या काळानंतर (सु. १·२ कोटी वर्षांपूर्वी) वायव्य पंजाबात भूकवचात झालेल्या हालचालींनी ही जलोत्सारण प्रणाली भंग पावून सिंधू, तिच्या पाच उपनद्या, गंगा व तिच्या उपनद्या या तीन जलोत्सारण उपप्रणाल्या निर्माण झाल्या. सुमारे १·२ कोटी ते ६ लाख वर्षांपूर्वीच्या प्लाइस्टोसीन हिमयुगात शिवालिक नदी नाहीशी झाली. वायव्य आसामात आढळलेल्या नदीमुखामुळे बंगाल-आसाममधील शिवालिक नदीच्या अस्तित्वाविषयी शंका घेतली जाते. शिवालिक नदीत प्रवेश करणाऱ्या हिमनद्यांमार्फत पंजाबातील पाहुणे पाषाण त्यांच्या सध्याच्या ठिकाणी वाहून आले असल्याचे ए. एल्. कूलसन यांचे मत आहे.

सरमा नदी :

 


भारत व बांगला देशातून वाहणारी व मेघना नदीचा शीर्षप्रवाह असलेली एक नदी. लांबी सु. ९०२ किमी. मणिपूर टेकड्यांमध्ये माओसोंगसंगच्या दक्षिणेस २५० २८' उत्तर अक्षांश व ९४० १८' पूर्व रेखांश यांदरम्यान या नदीचा उगम आहे. ही नदी उत्तर मणिपूर टेकड्यांमधून पश्चिमेकडे वाहत जाऊन मणिपूर राज्याच्या पश्चिम सीमेवर तिपाईमुख येथे उत्तराभिमुख होऊन आसाम राज्यात प्रवेश करते व काचार भागातून वेड्यावाकड्या वळणांनी सुरमा खोऱ्यातून पश्चिमेकडे वाहत जाते. सुरमा खोऱ्यात सिद्घेश्वर (सारसपूर) टेकड्या असून त्यांची सस.पासूनची उंची १८३ मी. ते ६१० मी. दरम्यान आहे. काचारच्या पश्चिम सरहद्दीजवळ सुरमा दोन शाखांत विभागली गेली आहे. तिची दक्षिण शाखा प्रथम कुशियारा नावाने प्रसिद्घ आहे. पुढे तिचे पुन्हा दोन फाटे बराक व बिबियाना नावांनी बांगला देशातून वाहतात. हे पुढे सुरमा नदीच्या उत्तर प्रवाहास मिळतात. सुरमा नदीचा विभागलेला उत्तरेकडील दुसरा प्रवाह सुरमा नावाने खासी टेकड्यांमधून बांगला देशातील सिल्हेट व चाटाक शहरांतून वाहत जातो व सुनामगंजजवळ एकदम दक्षिणेस वाहत जाऊन पुढे ब्रह्मपुत्रेच्या जुन्या प्रवाहास भैरब बाझार येथे मिळतो. तद्नंतरचा हा संयुक्त प्रवाह मेघना नदी या नावाने ओळखला जातो.


सुरमा नदीस उत्तरेकडून जिरी, जटिंगा, बोगापानी, जादूकता, तर दक्षिणेकडून सोनाई, ढालेश्वरी, सिंग्ला, लोंगाई, मनू, खोवाई या महत्त्वाच्या उपनद्या येऊन मिळतात. वरच्या भागात नदी दऱ्याखोऱ्यांतून वाहते. त्यामुळे पुराचे पाणी लगतच्या प्रदेशात क्वचितच पसरते; मात्र हिचा खालचा भाग त्यामानाने उथळ असल्याने पुराचे वेळी पाणी लगतच्या भागात पसरुन काही प्रमाणात नुकसान होते.

 

सुरमा नदीस दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्व असून आसाम-बंगाल लोहमार्ग होण्यापूर्वी या नदीतून जलवाहतूक होत असे. त्या वेळी ती या भागातील दळणवळणाचा प्रमुख मार्ग होती. तुडुंबी, कारग, तिपाईमुख, सिल्वर, बदरपूर, करीमगंज, सिल्हेट, मनुमुख, हबीगंज, बालागंज, सुनामगंज इत्यादी सुरमा नदीकाठावरील काही प्रमुख शहरे होत.

माण नदी :



 महाराष्ट्र राज्यातील भीमा नदीची उजव्या तीरावरील प्रमुख उपनदी. आंधळी धरणाच्या योजनेमुळे हिला महत्त्व प्राप्त झाले असून नदीची लांबी सु. १६० किमी., पैकी सोलापूर जिल्ह्यातील लांबी सु. ८० किमी. आहे. सातारा जिल्ह्याच्या माण तालुक्यात, फलटणजवळच्या डोंगरात हिचा उगम होतो. सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागातून आग्नेय दिशेस वाहत जाऊन पुढे ती सांगली जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यात प्रवेश करते. सांगली जिल्हाच्या उत्तर भागातून आग्नेय दिशेने थोडे अंतर वहात गेल्यावर ती सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यात प्रवेशते. सांगोला तालुक्यातून प्रथम पूर्वेस व नंतर ईशान्येस वाहत जाते. पुढे काही अंतर पंढरपूर-मंगळवेढे तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहत जाऊन पंढरपूरच्या आग्नेयीस १७ किमी. वर असलेल्या सरकोलीजवळ भीमेला मिळते. नदीचे काठ सपाट व कृषियोग्य असून नदीपात्रात रेती आढळते. बेलवण, खुर्डू, सानगंगा व वांकडी हे प्रवाह माण नदीला मिळत असून ते कोरड्या ऋतूत पूर्ण आटतात. माण तालुक्यातील बोडके गावाजवळ या नदीवर आंधळी धरण बांधावयाची योजना आज अनेक वर्षे रेंगाळत आहे. दहिवडी, म्हसवड, दिघंची, सांगोला ही माण नदीकाठीवरील प्रमुख गावे आहेत.

मांजरा नदी :



महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेश या राज्यांतून वाहणारी गोदावरी नदीची एक प्रमुख उपनदी. वांजरा या नावानेही ती ओळखली जाते. सुमारे ६१६ किमी. लांबीची ही नदी महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात, बालाघाट डोंगररांगेत उगम पावते. सुरुवातीच्या भागात ही पूर्ववाहिनी असून बीड-उस्मानाबाद तसेच बीड-लातूर या जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. कासारखेडजवळ ही नदी लातूर जिल्ह्यात प्रवेश करते व जिल्ह्याच्या माध्यातून आग्नेयीस वाहत जाऊन निलंगा गावाजवळ कर्नाटक राज्यात व पुढे बीदरच्या पूर्वेस आंध्र प्रदेश राज्यात जाते. आंध्र प्रदेशातील संगरेड्डीपेटजवळ मांजरा नदी एकदम वळण घेऊन वायव्य दिशेने वाहू लागते. निझामाबाद जिल्ह्यात या नदीवर धरण बांधण्यात आले असून (१९३१) प्रसिद्ध निझामसागर तलाव तयार करण्यात आला आहे. पुढे ही नदी पुन्हा महाराष्ट्र राज्याच्या सरहद्दीपर्यंत येऊन नांदेड जिल्ह्यातील शेळगावपासून ईशान्येस, राज्याच्या सरहद्दीवरून वाहत जाते व याच जिल्ह्यातील कुंडलवाडी गावाजवळ गोदावरी नदीस उजवीकडे मिळते. तेरणा, कारंजा, तावरजा, लेंडी व मन्याड या मांजरा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. या नदीस तेरणा नदी लातूर जिल्ह्याच्या सरहद्दीवर निलंग्याच्या पूर्वेस, तर कारंजा नदी आंध्र प्रदेश राज्यात मिळते, लेंडी व मन्याड या नद्या नांदेड जिल्ह्याच्या सरहद्दीवर या नदीला डावीकडून मिळतात.

 

 

मांजरा नदीचा उपयोग प्रामुख्याने जलसिंचनासाठी केला जातो. नदीखोरे सुपीक असल्याने येथील लोकांचा शेती हाच प्रमुख व्यवसाय आहे. या नदीच्या वरच्या खोऱ्यात मुख्यत्वे कापसाचे पीक घेतले जाते, तर खालच्या खोऱ्यात ज्वारी, कडधान्ये, तेलबिया यांचे उत्पादन होते. बहुतेक ठिकाणी नदीकाठ मंद उताराचे असल्याने या नदीचा फेरी वाहतुकीसाठीही थोड्याफार प्रमाणात उपयोग होतो.

काटेपूर्णा नदी :



अकोला जिल्हयाच्या मध्य भागातून वाहणारी पूर्णा नदीची उत्तरवाहिनी उपनदी. लांबी सु.९७किमी.; नदीखोऱ्याचे क्षेत्रफळ १,१६० चौ.किमी. ही वाशिम तालुक्यातील काटा या गावाजवळ अजिंठ्याच्या पर्वतराजीत उगम पावून मंगरुळ, अकोला आणि मुर्तिजापूर या तालुक्यांतून वाहत जाऊन भटोरी गावाजवळ पूर्णेस मिळते. अकोल्यापासून आग्नेयीकडे ३५ किमी. वरील वास्तापूर या गावानजीक या नदीवर मातीचे धरण बांधून अंदाजे २४,००० हेक्टर जमिनीचे क्षेत्र ओलत करण्याची योजना आहे.

भवानी नदी :



 द. भारतातील कावेरी नदीची प्रमुख उपनदी. ही केरळ राज्यातील पालघाट (पालक्काड) जिल्ह्याच्या वेल्लुवनाड तालुक्यात, साइलेंट व्हॅलीच्या जंगल भागात उगम पावते. या पूर्ववाहिनी नदीची लांबी सु. १६९ किमी. आहे. ही नदी पुढे तमिळनाडू राज्याच्या कोईमतूर जिल्ह्यात प्रवेश करीत पूर्व दिशेने वाहत जाऊन भवानी गावाजवळ कावेरी नदीस मिळते. धन्यकोट्टैजवळ मिळणारी मोयार ही भवानी नदीची प्रमुख उपनदी असून कोरंगपल्लम्, कुंदा, पेरिङ्‌गपलम्, सिरुवनी, कूनूर या अन्य नद्याही तिला मिळतात. नैऋत्य मोसमी पर्जन्यकाळात या नदीस मोठे पूरही येतात.


जलसिंचनाच्या दृष्टीने भवानी नदीस महत्त्व आहे. या नदीवर मोयार नदी-संगमाच्या खालील बाजूस सु.२ किमी. व सत्यमंगलमपासून सु. ७ किमी. अंतरावर लोअर भवानी प्रकल्पातील धरण बांधण्यात आले आहे. या धरणापासून ८३,८७० हे. क्षेत्रास पाणीपुरवठ्याची सोय उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे कोईमतूर जिल्ह्यात कापूस व अन्नधान्याच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणे शक्य झाले आहे.

महीनदी :



(माही नदी). मध्य प्रदेश, राजस्थान व गुजरात या तीन राज्यांतून वाहणारी नदी. मही नदीची लांबी ५३३ किमी. असून मध्य प्रदेश राज्याच्या धार जिल्ह्यात विंध्य पर्वतात ६१७ मी. उंचीवर ती उगम पावते. या राज्यातून वायव्य दिशेने ती १६० किमी. अंतर वाहत जाते. पुढे राजस्थान राज्यातील डूंगरपूर या जिल्ह्याच्या उत्तरेकडील मेवाड टेकड्यांमुळे ती नैर्ऋत्यवाहिनी होऊन डूंगरपूर व बांसवाडा या जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहत जाऊन गुजरात राज्याच्या गोध्रा जिल्ह्यात प्रवेशते व पुढे खंबायतच्या आखाताला मिळते. या नदीचे एकूण पाणलोट क्षेत्र ३४,८४२ चौ. किमी. आहे. डाव्या तीरावरील अनास व पानम आणि उजव्या तीरावरील सोम या तिच्या प्रमुख उपनद्या होत. उधानाच्या भरतीच्या वेळी मही नदीमुखातून आत सु. ३२ किमी. पर्यंत पाणी येते.

 

पूर्वीपासून महापूर, खोल दऱ्या व उंच काठ यांसाठी प्रसिद्ध असलेल्या मही नदीवरील जलसिंचन प्रकल्पांमुळे तिला महत्त्व प्राप्त झाले असून राजस्थान व गुजरात राज्यांतील शेतीच्या दृष्टीने ती जास्त उपयुक्त ठरली आहे. गुजरात राज्यात या नदीवर ‘मही प्रकल्प’ ही दोन टप्प्यांची योजना असून पहिल्या टप्प्यात वनकबोरी गावजवळ ७९६ मी. लांब व २०·६ मी. उंचीचा चिरेबंदी बंधारा बांधण्याची योजना आहे. याच्या उजव्या कालव्यामुळे (७४ किमी. लांब) सु. १·८६ लक्ष हे. जमिनीस पाणीपुरवठा होईल. दुसऱ्या टप्यात कडाणाजवळ १,४३० मी. लांब व ५८ मी. उंचीचे माती-काँक्रीटचे संयुक्त धरण बांधलेले असून त्यामुळे ८९,००० हे. क्षेत्रास पाणीपुरवठा करण्याचे उद्दिष्ट आहे. यांशिवाय राजस्थान राज्यातील या नदीवरील प्रकल्पांमुळेही त्या राज्याला जलसिंचनाचा लाभ मिळाला आहे.

 

मही नदीचा उल्लेख महाभारतात व पुराणांतही आढळतो. पुराणांत तिला ‘मनोरमा’ असे म्हटले आहे. गुजरात राज्यात मही नदीच्या काठावर नवनाथ, ८४ सिद्ध व इतर देवता यांची मंदिरे आहेत. मिंग्रड, फाझिलपूर, अंगद, मसपूर ही कोळी लोकांची पवित्र स्थळे मही नदीच्या काठावरच आहेत. ‘महिसागर संगम’ या नावाने ओळखले जाणारे खंबायतच्या आखातातील या नदीचे मुख हे पवित्र तीर्थक्षेत्र मानेल जाते.

कदा नदी :



निलगिरीत उगम पावणारी तमिळनाडू राज्यातील नदी. लांबी सु. ११९ किमी. ऊटकमंडच्या आग्नेयीस सु. २४ किमी. वर देवबेट्टा, कौलिनबेट्टा, करायकुडी, पोर्थिमुंड इ. शिखरांच्या १,७०० मी. पेक्षा अधिक उंचीच्या पर्वतप्रदेशात उगम पावणाऱ्या अ‍ॅवलांच व एमेरल्ड या प्रवाहांनी मिळून कुंदा नदी झालेली आहे. तिच्या व दक्षिणेकडील अपर भवानीच्या


कुंदा नदीप्रकल्प


खोऱ्यादरम्यान निलगिरी पठाराच्या नैर्ऋत्येस कुंदा पर्वतरांग आहे. तिच्यात अ‍ॅवलांच, बेअरहिल, माकुर्ती ही २,५०० मी. हून अधिक उंचीची शिखरे असून, त्या भागात नैर्ऋत्य व ईशान्य मान्सूनचा पाऊस दरवर्षी सु. ४०० सेंमी. पडतो. ते पाणी भवानीला आणि कुंदेला मिळते. सिल्लाहल्ला, कनारहल्ला, पेंगुबहल्ला इ. उपनद्यांचे पाणी घेऊन कुंदा अपर भवानीला मिळते. या दोन्ही नद्या मग भवानी या नावाने कावेरीला मिळतात. निलगिरीच्या उभ्या उतारांवरून कुंदा वेगाने खाली येते. मंडनायूजवळ तिला सु. ६६ मी. उंचीचा एक धबधबा आहे. कुंदेच्या परिसरातील वनश्री अत्यंत नयनरम्य आहे.


कुंदेचे पाणी आणि तिचा वेग व शक्ती यांचा उपयोग करून कुंदा योजना किंवा लोअर भवानी योजना १९५६ मध्ये सुरू झाली. या योजनेत लहानमोठी बारा धरणे, यांना जोडणारे सु. ४० किमी. लांबीचे बोगदे, विद्युत्‌गृहे, कालवे इ. असून, चौथ्या पंचवार्षिक योजनेअखेर ११० मेगॅवॉट वीज उत्पादनाचे उद्दिष्ट आहे. पूरनियंत्रण, ७९,००० हे. शेतीला पाणीपुरवठा तसेच अ‍ॅल्युमिनियम, कॉस्टिक सोडा, सिमेंट, कागद इ. उद्योगांना आणि शेकडो खेड्यांना घरगुती वापरासाठी व छोट्या उद्योगधंद्यांसाठी वीजपुरवठा, हे या योजनेचे उद्देश असून, कोलंबो योजनेनुसार या प्रकल्पासाठी कॅनडाचे मोठे साहाय्य झालेले आहे.

सीना नदी :



 भीमा नदीची एक उपनदी. लांबी सु. ३७५ किमी. पाणलोट क्षेत्र सु. १२,७४२ चौ. किमी. महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यात अहमदनगर शहराच्या उत्तरेस ही नदी उगम पावते. हिचे तीन शीर्षप्रवाह मानले जातात. त्यांपैकी एक अहमदनगर शहराच्या पश्चिमेस जामगावजवळ, तर दुसरे दोन प्रवाह शहराच्या ईशान्येस जेऊर आणि पिंपळगाव उजनीजवळ उगम पावतात. त्यांचा एकत्रित प्रवाह सीना नदी या नावाने ओळखला जातो. सुरुवातीच्या टप्प्यात अहमदनगर शहरापर्यंत ही नदी दक्षिणवाहिनी आहे. तेथून पुढे ती आग्नेयवाहिनी बनते. या टप्प्यात या नदीमुळे अहमदनगर व बीड या जिल्ह्यांची सु. ५५ किमी. लांबीची नैसर्गिक सरहद्द बनली आहे. पुढे अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी या ऐतिहासिक ठिकाणाजवळ ही नदी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करते. या जिल्ह्यातील खांबेवाडी गावापासून पुढे या नदीमुळे सोलापूर-उस्मानाबाद जिल्ह्यांची सरहद्द बनली आहे. त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील म्हैसगावपासून हिचा प्रवाह याच जिल्ह्यातून पुढे वाहत जातो. कर्नाटक राज्य आणि सोलापूर जिल्हा यांच्या सरहद्दीवर कुडल गावाजवळ ही नदी भीमा नदीस मिळते. सीना नदीचे पात्र उथळ असून उन्हाळ्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ते कोरडे पडते.


मेहेक्री ही सीना नदीची प्रमुख उपनदी असून ती बीड जिल्ह्यामध्ये सांगवीजवळ सीना नदीला डावीकडून मिळते. याशिवाय तलवार, इंचाना, कामुही, भेंडी, नल्की, चांदली इ. तिच्या उपनद्या आहेत. सीना-निमगाव व सीना-कोळेगाव हे या नदीवरील प्रकल्प असून, सीना-कोळेगाव योजनेमुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील सु. ९,३०० हे. क्षेत्र ओलिताखाली आले आहे. चोंडी ( अहमदनगर जिल्हा ), मोहोळ, वडवळ, कुडल (सोलापूर जिल्हा) इ. या नदीवरील महत्त्वाची ठिकाणे आहेत.

लुशाई टेकड्या



लुशाई टेकड्या ईशान्य भारताच्या पर्वतीय प्रदेशातील डोंगर टेकड्या. यांचा विस्तार प्रामुख्याने मिझोराम राज्यात असून त्यांना ‘मिझो टेकड्या’ असेही म्हणतात. आराकान योमा या पर्वतश्रेणीचा हा उत्तरेकडील भाग होय. उत्तर-दक्षिण दिशेत परस्परांना समांतर पसरलेल्या या टेकड्या मुख्यत: तृतीयक कालखंडातील वालुकाश्म व शेल खडकांपासून तयार झाल्या आहेत. या घडीच्या टेकड्यांच्या दक्षिणेस पातकई टेकड्या आहेत. लुशाईच्या पश्र्चिमेस त्रिपुरा सरहद्दीपासून पूर्व सरहद्दीपर्यंत लहानलहान आठ रांगा व दऱ्या आहेत.


जलप्रवाहांच्या खनन कार्यामुळे या टेकड्यांमध्ये तीव्र उताराच्या खोल दऱ्या, घळ्या वव काही ठिकाणी लहान मैदानी द्रोणी प्रदेश तयार झालेले आहेत. या टेकड्यांचे पश्र्चिमेकडील उतार हे पूर्वेकडील उतारांपेक्षा अधिक तीव्र स्वरूपाचे आहेत. पश्चिमेकडे जलप्रवाहांची खोरी रुंद व पूर्वेस अरुंद आढळतात. या प्रदेशात १,३७१ मी. उंचीवर टेकड्यांनी वेढलेली सुपीक गाळाची मैदाने आहेत. मैदानामध्ये चांफाई हे मोठे मैदान (लांबी सु. ११ किमी. व रुंदी ५ किमी.) आहे. गाळाने भरून गेलेल्या पूर्वीच्या सरोवराच्या जागी हे मैदाने तयार झाली असावीत.


या टेकड्यांची सस.पासून सरासरी उंची पश्र्चिमेस ९१४ मी. पासून पूर्वेस १,२१८ मी. पर्यंत आढळते; परंतु काही ठिकाणी मात्र ती १,६७५ मी. पर्यंत वाढत जाते. दक्षिण भागात‘ब्लू मौंटन’ वा ‘फ्वंगपूरी’ (२,१६५ मी.) येथे सर्वाधिक उंची आढळते.


या प्रदेशातील जलप्रणाली गुंतागुंतीची आहे. उत्तरेस सुरमा नदीची उपनदी बराक, दक्षिणेस कलदन व पश्र्चिमेस कर्णफुली या नद्यांनी हा प्रदेश व्यापलेला आहे. उत्तर भागात ढालेश्र्वरी, सोनई व तुइव्हावल या बराक नदीच्या, तर दक्षिण भागात पूर्वेस मट, तुईचुंग, त्याओ, तुईपाई या कलदन नदीच्या आणि पश्र्चिमेकडील जलप्रणालीमध्ये चितगाँगजवळ तुईचंग, कओ, देह फायरंग व तुईलिपनुई या कर्णफुली नदीच्या मुखालगत येऊन मिळणाऱ्या उपनद्या आहेत.


या टेकड्यांच्या प्रदेशातील हवामान मानवी जीवनास प्रतिकूल आहे. खोल दऱ्यांमधून रोगट हवामानामुळे मलेरियाचा प्रादुर्भाव होतो. मार्च-एप्रिलमध्ये वायव्येकडून येणाऱ्याभयानक स्वरूपाच्या वादळी वाऱ्यांचा प्रादुर्भाव होतो. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने कोरडा दुष्काळ पडत नाही. उतारावर घनदाट सदारहित जंगले, बांबूंची वने व इतर उपयुक्त वृक्ष आहेत. खोलगट भागात पाम व माथ्यावरील भागात ओक, फर, चेस्टनट इ. वृक्ष आढळतात. या प्रदेशात हत्ती, गेंडा, हरिण, वाघ, अस्वले इ. प्राणीही आढळतात. या प्रदेशात बहुतांश आदिवासी लोक रहात असून ते ‘झूम शेती’ करतात. शेतीतून भात, तीळ, ऊस, तंबाखू व संत्री इ. उत्पादने घेतली जातात.


यूनेस्को की विश्व विरासत में शामिल भारतीय धरोहर



1. ताजमहल - उत्तर प्रदेश [1983]


2. आगरा का किला - उत्तर प्रदेश [1983]


3. अजंता की गुफाएं - महाराष्ट्र [1983]


4. एलोरा की गुफाएं - महाराष्ट्र [1983]


5. कोणार्क का सूर्य मंदिर - ओडिशा [1984]


6. महाबलिपुरम् का स्मारक समूह -तमिलनाडू [1984]


7. काजीरंगा राष्ट्रीय उद्यान - असोम [1985]


8. मानस वन्य जीव अभयारण्य - असोम [1985]


9. केवला देव राष्ट्रीय उद्यान - राजस्थान [1985]


10. पुराने गोवा के चर्च व मठ - गोवा [1986]


11. मुगल सिटी, फतेहपुर सिकरी - उत्तर प्रदेश [1986]


12. हम्पी स्मारक समूह - कर्नाटक [1986]


13. खजुराहो मंदिर - मध्यप्रदेश [1986]


14. एलीफेंटा की गुफाएं - महाराष्ट्र [1987]


15. पट्टदकल स्मारक समूह - कर्नाटक [1987]


16. सुंदरवन राष्ट्रीय उद्यान - प. बंगाल [1987]


17. वृहदेश्वर मंदिर तंजावुर - तमिलनाडू [1987]


18. नंदा देवी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [1988]


19. सांची का बौद्ध स्मारक - मध्यप्रदेश [1989]


21. हुमायूँ का मकबरा - दिल्ली [1993]


22. दार्जिलिंग हिमालयन रेल - पश्चिम बंगाल [1999]


23. महाबोधी मंदिर, गया - बिहार [2002]


24. भीमबेटका की गुफाएँ - मध्य प्रदेश [2003]


25. गंगई कोड़ा चोलपुरम् मन्दिर - तमिलनाडु [2004]


26. एरावतेश्वर मन्दिर - तमिलनाडु [2004]


27. छत्रपति शिवाजी टर्मिनल - महाराष्ट्र [2004]


28. नीलगिरि माउंटेन रेलवे - तमिलनाडु [2005]


29. फूलों की घाटी राष्ट्रीय उद्यान - उत्तराखंड [2005]


30. दिल्ली का लाल किला - दिल्ली [2007]


31. कालका शिमला रेलवे -हिमाचल प्रदेश [2008]


32. सिमलीपाल अभ्यारण्य - ओडिशा [2009]


33. नोकरेक अभ्यारण्य - मेघालय [2009]


34. भितरकनिका उद्यान - ओडिशा [2010]


35. जयपुर का जंतर-मन्तर - राजस्थान [2010]


36. पश्चिम घाट [2012]


37. आमेर का किला - राजस्थान [2013]


38. रणथंभोर किला - राजस्थान [2013]


39. कुंभलगढ़ किला - राजस्थान [2013]



40. सोनार किला - राजस्थान [2013]


41. चित्तौड़गढ़ किला - राजस्थान [2013]


42. गागरोन किला - राजस्थान [2013]


43. रानी का वाव - गुजरात [2014]


44. ग्रेट हिमालय राष्ट्रीय उद्यान - हिमाचल प्रदेश [2014]


भारतातील लोकनृत्ये:



🔸महाराष्ट्र* --- लावणी, कोळी नृत्य


🔶 *तामिळनाडू* --- भरतनाट्यम


🔶 करळ --- कथकली


🔶 *आंध्र प्रदेश* --- कुचीपुडी, कोल्लतम


🔶 *पंजाब* --- भांगडा, गिद्धा


🔶 *गुजरात* --- गरबा, रास


🔶 *ओरिसा* --- ओडिसी


🔶 *जम्मू आणी काश्मीर* --- रौफ


🔶 *आसाम* --- बिहू, जुमर नाच


🔶 *उत्तरखंड* --- गर्वाली


🔶 *मध्य प्रदेश* --- कर्मा, चार्कुला


🔶 *मेघालय* --- लाहो


🔶 *कर्नाटक* --- यक्षगान, हत्तारी


🔶 *मिझोरम* --- खान्तुंम


🔶 *गोवा* --- मंडो


🔶 *मणिपूर* --- मणिपुरी


🔶 *अरुणाचल प्रदेश* --- बार्दो छम


🔶 *झारखंड*---- कर्मा


🔶 *छत्तीसगढ* --- पंथी


🔶 *राजस्थान* --- घूमर


🔶 *पश्चिम बंगाल* --- गंभीरा


🔶 *उत्तर प्रदेश* --- कथक


जागतिक वारसा स्थळ



युनोची संघटना यूनेस्को सांस्कृतिक अथवा निसर्ग वारसा यादी तयार करते, सध्या जगत 1031 वारसा स्थळे यादीत आहेत, जगात 

इटली (51), चीन (48), 

स्पेन (48), फ्रांस (41), 

जर्मनी (40), मेक्सिको (33), 

भारत (32), जगात भारत सातव्या क्रमांकावर आहे. आशियात चीनमध्ये सर्वात जास्त स्थळे आहेत.

  

वारसा स्थळे घोषित करण्यामागे त्या स्थळांचे संरक्षण आणि संवर्धन करणे आणि पुढच्या पिढ्यापर्यंत हा अमुल्य वारसा सुपूर्द करणे ही उद्दिष्टे आहे.

  

भारतात सर्वप्रथम 1983 मध्ये आगर्‍याचा किल्ला व अजंठा लेणी या दोन स्थळाचा यादीत समावेश करण्यात आला, सध्या भारतात 32 स्थळे यादीत आहेत. त्यापैकी 25 सांस्कृतिक वारसा स्थळ आहेत, तर 7 निसर्गस्थळे आहेत.

  

महाराष्ट्रात सर्वाधिक चार स्थळे आहेत. (अजंठा व वेरूळ लेणी (1983), घारापुर लेणी (1987), छत्रपती शिवाजी टर्मिनल स्टेशन (मुंबई) 2004)

  

दिल्लीमध्ये कुतुबमिनार, हुमायुचा मकबरा, लाल किल्ला ही स्थळे आहे.

  

मध्य प्रदेशमध्ये भीम बेरकांच्या अश्मकालीन गुफा, सांचीचा स्तूप खजुराहोची मंदिरे आहेत.

  

राजस्थानमध्ये केवलदआ राष्ट्रीय उद्यान, जंतरमंतर खगोल प्रयोगशाळा चित्तोड, गाग्रोन, जैसलमेर कुंभलगड, अंबर, रणथंबोर हे किल्ले आहे.  

  

उत्तर प्रदेशमध्ये आगर्‍याचा किल्ला, फतेहपूर सिक्री, ताजमहल ही स्थळे आहे.

  

आसाममध्ये काझीरंगा, मानसा अभयारण्य ही स्थळे आहेत.

  

गुजरातमध्ये रानी की वाव, चंपानेर-पावागड पुरातत्व परिसर ही स्थळे आहे.

  

कर्नाटकमध्ये विजयनगर साम्राज्याची राजधानी हम्पी, पट्टडकल येथील चालुक्यांची मंदिरे ही स्थळे आहे.

  

तामीळनाडूमध्ये तंजावर गंगाईकोंड चोल पूरम व दोरयसम येथील मंदिर, महाबलीपूरम ही स्थळे आहे.

भारतातील प्रमुख जमाती



जमात                  राज्य


अबोर                  अरुणाचल प्रदेश

आपातनी             अरुणाचल प्रदेश

आओ                  नागाल्यांड

अंगामी                 नागाल्यांड

कोल                   छत्तीसगढ

कोटा                   तामिळनाडू

मुंडा                    झारखंड 

कोलाम                आंध्र प्रदेश

छुतीया                आसाम

चेंचू                     आंध्र प्रदेश

गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड

बैगा                     छत्तीसगढ,झारखंड

भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ

बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू

भोट                    हिमाचल प्रदेश

लेपचा                  सिक्कीम

वारली                  महाराष्ट्र

चकमा                  त्रिपुरा

गड्डी                     हिमाचल प्रदेश

जयंती                  मेघालय

बोदो                    आसाम

खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड

गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ

लुशिया                 त्रिपुरा

मोपला                  केरळ

भुतिया                  उत्तरांचल

जारवा                   छोटे अंदमान

कुकी                    मणिपूर

कुरुख                  झारखंड, ओरीसा

अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश

डाफला                अरुणाचल प्रदेश

कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र

हो                       छोटा नागपूर

मुरीया                  बस्तर छोटा नागपूर

संथाल                  वीरभूम,झारखंड

गुज्जर                  हिमाचल प्रदेश

खोंड                     ओरिसा

मिकिर                  आसाम

उरली                  केरळ

मीना                    राजस्थान

ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड

तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू


भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प



* मुचकुंदी प्रकल्प 

मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


* श्रीशैलम प्रकल्प

आंध्र प्रदेश कृष्ण नदीवर मुख्य उद्देश वीजनिर्मिती.


* बियास प्रकल्प

पंजाब, हरियाना व राजस्थान यांचा संयुक्त प्रकल्प. यामध्ये बियास सतलज जोड कालवा व बियास नदीवरील पोंग येथील धरणाचा समावेश होतो.


* भाक्रा-नानगल

पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान व हरियाना यांचा संयुक्त प्रकल्प. सतलज नदीवर हिमाचल प्रदेशात ' भाक्रा व पंजाब मध्ये नानगल अशी दोन धरणे भारताची सर्वात मोठी बहुददेशीय योजना. भाक्रा हे देशातील सर्वात उंच धरण आहे. उंची २२६ मीटर.


* दामोदर खोरे योजना

पश्चिम बंगाल व विभाजनापूर्वी बिहारमधील संयुक्त प्रकल्प. जलसिंचन, वीजनिर्मिती, पूरनियंत्रण, इत्यादी, या प्रकल्पाचे व्यवस्थापन दामोदर खोरे महामंडळ तर्फे केले जाते. अमेरिकेतील प्रसिद्ध टेनेसी व्हाली च्या धर्तीवर रचना.

 

* फराक्का योजना 

हि योजना पश्चिम बंगालमध्ये राबविली जात असून या योजनाअंतर्गत गंगा नदीवर फराक्का येथे व भागीरथी नदीवर जांगीपूर येथे धरणे बांधली आहेत. हुगळी नदीचा प्रवाह कायम राखणे व कोलकाता बंदराची व्यवस्था राखणे हे या योजनेमागचे उद्देश आहेत.

 

* हिराकूड 

प्रकल्प ओरिसा राज्यात आहे. संबळपूरजवळ महानदीवर जगातील सर्वाधिक लांबीचे धरण बांधले जाते. धरणाची लांबी २५.४०  कि मी आहे.


* चंबळ योजना

हि मध्य प्रदेश व राजस्थान ची संयुक्त योजना असून या योजनेंतर्गत चंबळ नदीवर रानाप्रतापसागर व जवाहरसागर कोटा दोन धरणे राजस्थान व गांधीसागर हे धरण मध्य प्रदेशात बांधले आहे. मुख्य उद्देश वीजनिर्मिती आहे.


* उकाई प्रकल्प

तापी नदीवरील गुजरात राज्यातील बहुद्देशीय प्रकल्प होय.

 

* कोसी प्रकल्प

विभाजनापूर्वी बिहार व नेपाळ सरकारची संयुक्त संस्था. गंडकी नदीवर वाल्मिकी नदीवर धरण.


* नागार्जुनसागर

आंध्रप्रदेशात कृष्णा नदीवर नंदिकोंडा येथे धरण.

वातावरणाचे थर


 वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.


 वातावरणाचे मुख्य थर 


📌 तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.


📌 तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.


📌 सथितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.


📌 सथितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.


📌 मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.


📌 मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.


📌 दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.


📌 आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.


📌 बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.

भारतातील महत्वाची शहरे :



🔷अमृतसर -  सुवर्ण मंदिर


🔶अहमदाबाद - साबरमती आश्रम


🔷आग्रा - लाल किल्ला


🔶कन्याकुमारी - महात्मा गांधी मेमोरिअल


🔷कानपूर - कातड्याच्या वस्तु


🔶कोडाई कॅनॉल - थंड हवेचे ठिकाण


🔷कोणार्क -  सूर्य मंदिर


🔶गगोत्री -  गंगा नदीचा उगम


🔷चदिगड - पंजाब व हरियानाची संयुक्त राजधानी


🔶जयपूर - जंतर मंतर वेधशाळा


🔷जोधापूर - मोती महल


🔶डलहौसी -  थंड हवेचे ठिकाण


🔷औरंगाबाद - बावत्र दरवाजांचे शहर


🔶नागपूर -  मध्यवर्ती वसलेले शहर


🔷मबई -  नैसर्गिक बंदर


🔶नाशिक -  सात टेकड्यांवर वसलेले शहर


🔷पोरबंदर -  महात्मा गांधींचे जन्म स्थळ


🔶हदराबाद -  चारमिनार 

वारणा नदी



सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतातील पथरपुंज पठाराजवळ प्रचितगडावर सस. पासून ९१४ मी. उंचीच्या प्रदेशात होतो. प्रथम वारणा नदी वायव्येकडून आग्नेयीकडे व नंतर पूर्वेकडे वाहते.

ती  कृष्णा नदीस सांगली शहराच्या नैर्ऋत्येस सु. दीड किमी. अंतरावर सस. पासून ५८४ मी. उंचीच्या प्रदेशात हरिपूर येथे मिळते. संगमाजवळ वारणा नदीचे पात्र ७० मी. रुंद आहे.

काडवी व मोरणा या वारणेच्या प्रमुख उपनद्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील काडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात आंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो.

सुमारे ३५.४ किमी. वाहून काडवी नदी सागाव जवळ वारणा नदीस मिळते. काडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. काडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे काडवी नदीस मिळतात.

सांगली जिल्ह्यातील मोरणा ही वारणेची दुसरी महत्त्वाची उपनदी. या नदीचा उगम धामवडे टेकडीजवळ होतो. ही नदी दक्षिणेस व आग्नेयीस वाहते. या नदीची लांबी सु. २७.३५ किमी. आहे. तिच्या खोऱ्यात विस्तृत पानमळे आढळतात. शिराळा तालुक्यातील मांगळे गावाजवळ मोरणा नदी वारणेस मिळते. उजव्या बाजूने कानसा नदी उदगिरीपासून २० किमी. वाहत जाऊन पन्हाळा तालुक्यात माळेवाडी-जवळ वारणेस मिळते. शाली व अंबार्डी या वारणेच्या इतर उपनद्या होत.

वारणा खोऱ्याचा विस्तार सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांत झाला असून त्याचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार अनुक्रमे १६०४७' उ. ते १७०१५' उ. आणि ७३०३०' १५" पू. ते ७४०३०' पू. यांदरम्यान आहे. या खोऱ्याची लांबी १४९ किमी., सरासरी रुंदी २१ किमी. व एकूण क्षेत्र २,०९५ चौ. किमी. आहे. वारणा खोऱ्यात शिराळा, वाळवा, मिरज (जि. सांगली), शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगले, शिरोळ (जि. कोल्हापूर), पाटण (जि.सातारा) या आठ तालुक्यांचा समावेश होतो.

भूवैज्ञानिक दृष्ट्या वारणा खोरे दख्खन ढाली प्रदेशात वायव्य भागात येते. वारणा नदीच्या खोऱ्यात विविध प्रकारची भूरूपे असल्याने येथील स्थलाकृती अत्यंत गुंतागुंतीची आहे. पश्चिमेकडे कोकण व पूर्वेकडे दख्खन पठार यांदरम्यानच्या संक्रमण पट्ट्यात वारणा खोरे असल्याने दोन्ही प्राकृतिक विभागांतील गुणधर्म वारणेच्या खोऱ्यात आढळतात. खोऱ्यातील पश्चिमेकडील प्रदेश पूर्वेकडील प्रदेशापेक्षा जास्त उंचसखल  आहे.

वारणेचे खोरे पश्चिम घाटामुळे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येते, त्यामुळे पाऊस कमी पडतो. मॉन्सून काळात पाऊस पडतो, परंतु इतर कालावधी कोरडा असल्याने वारणेच्या खोऱ्यातील नद्यांना पावसाळा वगळता इतर काळात पाणी फारच कमी असते.

वारणा नदीचे खोरे सुपीक आहे. भात, ज्वारी, ऊस, भुईमूग ही महत्त्वाची पिके या खोऱ्यात होतात. शाहूवाडी तालुक्यात आंबोळी येथे वारणा नदीवर एक मोठा प्रकल्प आणि सांगली जिल्ह्यात चांदोली व शिराळा तालुक्यात वारणा पाटबंधारे हा मोठा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. मोरणा नदीवर शिराळा तालुक्यातील प्रकल्प, तर शाहूवाडी तालुक्यात पोटफुगी नदीवर काडवी प्रकल्प पूर्ण करण्याची योजना आहे.

यांशिवाय वारणेच्या खोऱ्यात अनेक कोल्हापूरी बंधारे व काही लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण झालेले आहेत, तसेच वारणानगर (कोडोली) सारखी गावे उद्योगधंद्यांमुळे विकास पावली आहेत. या खोऱ्यातील खेड्यांना जोडणारे अनेक पक्के रस्ते, जिल्हा प्रमुख रस्ते व ग्रामीण रस्ते आहेत. परंतु या खोऱ्यात लोहमार्ग व हवाई वाहतूक यांची सोय नाही. कोल्हापूर, मिरज, सांगली ही या खोऱ्यातील लोकांना जवळची रेल्वेस्थानके आहेत.

सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :



1. ग्रहाचे नाव - बूध


सूर्यापासुन चे अंतर - 5.79  

 परिवलन काळ - 59

 परिभ्रमन काळ - 88 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.


2. ग्रहाचे नाव - शुक्र


सूर्यापासुन चे अंतर - 10.82  

 परिवलन काळ - 243 दिवस

 परिभ्रमन काळ - 224.7 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


3. ग्रहाचे नाव - पृथ्वी


सूर्यापासुन चे अंतर - 14.96  

 परिवलन काळ - 23.56 तास

 परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस

 इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.


4. ग्रहाचे नाव - मंगळ


सूर्यापासुन चे अंतर - 22.9  

 परिवलन काळ - 24.37 तास

 परिभ्रमन काळ - 687

 इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.


5. ग्रहाचे नाव - गुरु


सूर्यापासुन चे अंतर - 77.86

 परिवलन काळ - 9.50 तास

 परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.


6. ग्रहाचे नाव - शनि


सूर्यापासुन चे अंतर - 142.6

 परिवलन काळ - 10.14 तास

 परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष

 इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.


7. ग्रहाचे नाव - युरेनस  


सूर्यापासुन चे अंतर - 268.8

 परिवलन काळ - 16.10 तास

 परिभ्रमन काळ - 84 वर्षे

 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.


8. ग्रहाचे नाव - नेपच्यून  


सूर्यापासुन चे अंतर - 449.8

 परिवलन काळ - 16 तास

 परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे

 इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.

नदया व त्यांचे उगमस्थान:-



गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )

यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )

सिंधू => मानसरोवर (तिबेट )


नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )

तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )

महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )

ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )


सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )

व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )

गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक

कृष्णा => महाबळेश्वर


कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )

साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )

रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )

पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )

जगातील सर्वात उंच 10 शिखरे



🔵(1)......माउंट एव्हरेस्ट (नेपाळ) 

🔹8848 मीटर उंच.


🔵(2)..... माउंट के 2 (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8611 मीटर उंच.


🔵(3).... कांचनगंगा (भारत ) 

🔹8586 मीटर उंच.


🔵(4)...... ल्होत्से (नेपाळ)

🔹8516 मीटर उंच.


🔵(5)...... मकालू (नेपाळ)

🔹8463 मीटर उंच 


🔵(6).......चो ओयू (नेपाळ) 

🔹8201 मीटर उंच.


🔵(7).......धौलागिरी (नेपाळ) 

🔹8167 मीटर उंच.


🔵(8).......मानसलू (पश्चिम नेपाळ) 

🔹8163 मीटर उंच


🔵(9).....नंगा पर्वत (पाकव्याप्त काश्मीर) 

🔹8125 मीटर उंच.


🔵(10).....अन्नपूर्णा (उत्तरमध्य नेपाळ)

 🔹8091 मीटर उंच.


🔵(11).....गशेरब्रु( हिमालय)

🔹8068 मीटर उंच.


🔵(12).....ब्रॉड पिक (बाल्टिस्तान)

 🔹8051 मीटर उंच.


🔵(13)...... गशेरब्रूम --2

🔹(हिमालय) 8035 मीटर उंच


🔵(14)..... शिशापंग्मा (तिबेट)

🔹8027 मीटर उंच.


🔴जगातील 8 हजाराहून उंच अशी 14 हिमशिखरे आहेत ही सर्व शिखरे सर करणारे आज जगात केवळ 27 गिर्यारोहक आहेत.


महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे :-



●››अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण


●››अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)


●›› औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे


●›› उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण


●›› कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव


●›› गडचिरोली जिल्हा : दिना


●›› गोंदिया जिल्हा : इटियाडोह


●›››चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा


●››जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)


●›› ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे


●››धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव


●››नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,


●›› नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.


●›› नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण


●›› नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण


●›› परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण


●›› पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)


●›› बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी


●›› बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण


●›› भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप


●›› मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी


●›› यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा


●›› वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)


●›› सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)


●›› सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण


●›› सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)


●›› हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण.

भारतातील महत्त्वाचे रेल्‍वे समुद्री पूल


 १) पंबन रेल्‍वे पूल :- 

रामेश्‍वरमजवळ पंबन बेटापासून मुख्‍य किनारी येण्‍यासाठी बांधण्‍यात आलेला हा रेल्‍वे पूल आहे. १९११ साली याची सुरुवात झाली. 

१४ फेब्रुवारी १९१४ साली हा लोकांसाठी खुला करण्‍यात आला. 

पंबन रेल्‍वे पूल हा भारतामधील पहिला 

समुद्री पूल आहे. 

२०१० साली वांद्रे-वरळी सी-लिंकला सुरुवात होण्‍यापूर्वी हा भारतामधील सर्वात लांब समुद्री पूल होता. 

काँक्रिट खांबाचा यात वापर करण्‍यात आला आहे. 

दोन खांबामध्‍ये इतके अंतर ठेवण्‍यात आले आहे, की ज्‍याच्‍यामधून नौका आणि जहाजे जाऊ शकतील. 

याला समांतर असा पूल बांधण्‍यात आला आहे. १९८८ साली लोकांसाठी हा रस्‍ता खुला करण्‍यात आला.


-----------------------

 २) वांद्रे-वरळी सी लिंक :- वांद्रे-वरळी सी लिंकचे अधिकृत नाव राजीव गांधी सी लिंक असून दक्षिण मुंबईतील वरळी ते वांद्रे यांना जोडणारा हा पूल आहे. 

यासाठी काँक्रिट स्‍टील मटेरियल वापरण्‍यात आले आहे. 

नरीमन पॉईंटला जोडणाऱ्या फ्री वे चा हा एक भाग आहे. 

या पुलासाठी १६०० कोटी इतका खर्च आला आहे. हिंदुस्‍तान कन्‍स्‍ट्रक्‍शन कंपनीने बांधलेला आणि महाराष्‍ट्र राज्‍य रस्‍ते विकास महामंडळाने 

देखरेख केलेला हा पूल आहे. 

३० जून २००९ साली ८ पैकी ४ मार्ग खुले करण्‍यात आले. 

२४ मार्च २०१० साली सर्व ८ मार्ग खुले केले गेले.

वरळी आणि वांद्रे यांच्‍यातील अंतर कमी करण्‍यासाठी हा पूल बांधण्‍यात आला आहे.

-----------------------


३) कांडरौर पूल :- हिमाचल प्रदेश मधील बिलासपूर येथे सतलज नदीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. 

कांडरौर गावात हा पूल आहे. 

कांडरौर पुलाची उंची ८० मी. इतकी आहे. 

१९५९ साली याची सुरुवात झाली आहे आणि १९६४ साली हा खुला करण्‍यात आला. 

पुलाची रुंदी ७ मीटर आहे. नदीच्‍या पात्रापासून ६० मीटर उंचीवर हा पूल बांधण्‍यात आला आहे. जगातील सर्वांत उंचीवर बांधण्‍यात आलेल्‍या पुलापैकी एक आणि आशियामधील सर्वांत उंच पूल अशी याची ख्‍याती आहे. 

कांडरौर पूल हा हमीरपूर जिल्‍हा आणि बिलासपूर जि‍ल्‍हा यांना जोडतो. बिलासपूरपासून आठ

कि.मी. अंतरावर राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक ८८ वर आहे.

---------------------


४) विद्यासागर सेतू :- विद्यासागर सेतूला दुसरा हुगळी पुल असेही

म्‍हणता येईल. 

पश्चिम बंगालमधील हुगळी नदीवर कोलकाता आणि हावडा या दोन शहरांना जोडणारा हा सेतू आहे. 

या सेतूवरून जाणाऱ्या वाहनांना टोल टॅक्‍स द्यावा लागतो, मात्र सायकलींना

हा कर नाही. 

विद्यासागर सेतू हा आशियाईतील सर्वांत लांब पुलांपैकी एक आहे. १९व्‍या शतकातील सुधारक ईश्‍वरचंद विद्यासागर यांचे नाव या सेतूला देण्‍यात आले आहे.

हावडा पूल आणि विवेकानंद सेतू यासारखे अनेक समांतर पूल आहेत. या सेतूच्‍या कामाची सुरुवात १९७८ साली झाली आणि १० ऑक्‍टोबर १९९२ रोजी याचे उद्घाटन करण्‍यात आले. याची रुंदी ३५ मीटर असून, लांबी ४७५ मीटर इतकी आहे. 

या सेतूचे बांधकाम विख्‍यात ब्रेथवेट बर्न आणि जेसेप किंवा बीबीजे यांनी केले आहे. 

या सेतूवर १८२.८८ मीटर लांबीची समांतर केबल वायर जोडण्‍यात आली आहे.

पथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार :



व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

📌 भशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.


📌 खडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.


📌 बट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.


📌 समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 

📌सयोगभूमी - दोन खंडांना जोडणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.


 📌आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.


📌 खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.


📌 समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.

उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र.

 

📌उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर 

नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली


🔰‘नाग’ या रणागडा विरोधी क्षेपणास्त्राची अंतिम चाचणी यशस्वी ठरली आहे.

संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (डीआरडीओ) आज सकाळी पावणे सात वाजता पोखरण आर्मी रेंजवर वॉरहेड वापरुन या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली.

चार किलोमीटर रेंज असलेले हे क्षेपणास्त्र खांद्यावरुन डागता येते. भारतीय लष्करामध्ये या क्षेपणास्त्राचा लवकरच समावेश केला जाईल.


🔰हलिकॉप्टरमधून डागल्या जाणाऱ्या रणगाडाविरोधी मिसाइलची चाचणी केल्यानंतर आज नाग क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आली.


🔰19 ऑक्टोबरला बालासोर टेस्ट रेंजवर स्टँड ऑफ अँटी टँक मिसाइलची चाचणी करण्यात आली होती.


🔰या क्षेपणास्त्राद्वारे 10 किलोमीटर अंतरावरील रणगाडा उडवता येऊ शकतो.

कद्रीय लोकसेवा आयोगाकडून पूर्व परीक्षा २०२० चा निकाल जाहीर.


🔰केंद्रीय लोकसेवा आयोगाने(यूपीएससी) आपल्या अधिकृत वेबसाइटवर यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा २०२० चा निकाल  जाहीर केला आहे.


🔰यपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२० ही ४ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आली होती. ज्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली ते आता नागरी सेवा (Civil Services) पूर्व परिक्षा व भारतीय वन सेवा(Indian Forest Services) पूर्व परीक्षेचा निकाल upsc.gov.in या वेबसाइटवर जाऊन पाहू शकतात.


🔰वत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट काही तांत्रिक कारणास्तव काम करत नसल्याने ज्या विद्यार्थ्यांना upsc.gov.in येथे निकाल पाहण्यास अडचणी येत असतील, ते यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल upsconline.nic.in वर जाऊन पीडीएफ डाउनलोड करून देखील जाणून घेऊ शकतात.


🔰ज विद्यार्थी यूपीएससी नागरी सेवा पूर्व परीक्षा व भारतीय वन सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. ते आता मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. या परीक्षेबाबतची माहिती मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी यूपीएससीची अधिकृत वेबसाइट वेळोवेळी पाहत रहावी, असे सांगण्यात आले आहे.

आतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद भारताकडे.


🔰35 वर्षानंतर भारताने आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले आहे.


🔴ठळक बाबी....


🔰ILOच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून श्रम व रोजगार सचिव अपूर्व चंद्रा यांची निवड झाली आहे.ऑक्टोबर 2020 ते जून 2021 या काळासाठी ही निवड झाली आहे.येत्या नोव्हेंबरमध्ये प्रशासक मंडळाच्या होणाऱ्या बैठकीचे अध्यक्ष पद अपूर्व चंद्रा भूषवणार आहेत.


🔴आतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) विषयी....


🔰आतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याची 1919 साली स्थापना झाली. जिनेव्हा, स्वित्झर्लंड येथे संस्थेचे मुख्यालय आहे. भारत ILO चा एक संस्थापक सदस्य आहे. सध्या या संघटनेचे 187 देश सभासद आहेत.


🔰रोजगार आणि कामगारांच्या हिताच्या दृष्टीने विविध ठराव, शिफारसी आणि राजशिष्टाचार यांच्या स्वरुपात आंतरराष्ट्रीय मापदंड प्रस्थापित करणे हे ILO ची मुख्य कार्य आहेत. भारताने आतापर्यंत ILO च्या 45 ठरावांना मान्यता दिली असून त्यापैकी 42 ठरावांना देशात प्रभावी करण्यात आले आहेत. त्यापैकी 4 ठराव मुलभूत किंवा प्रमुख ठराव आहेत.


🔰ILOचे प्रशासकीय मंडळ हे सर्वोच्च कार्यकारी मंडळ असून ते धोरण, कार्यक्रम, अर्थसंकल्प याबाबत आखणी करते आणि महासंचालकाची निवड करते.

“ट्यूबरिअल सलायवरी ग्लॅंड”: मानवी शरीरात नव्या अवयवाचा शोध


🔰वैज्ञानिकांनी मानवी शरीरातल्या एका अनोख्या अवयवाचा शोध लावला आहे. नेदरलँडच्या वैज्ञानिकाने कर्करोगाची तपासणी आणि उपचार करत असताना मानवी शरीराच्या एका नव्या अवयवाचा शोध लावला आहे.


🔴 ठळक बाबी


🔰सशोधकांना दिसून आले की, गळ्याच्या वरच्या भागातल्या ग्रंथीमध्ये एक अवयव आहे. या अवयवाबद्दल अजूनही पूर्ण माहिती मिळालेली नाही.


🔰मानवी शरीरात आढळून आलेल्या या अवयवाला वैज्ञानिकांनी “ट्यूबरिअल सलायवरी ग्लॅंड” असे नाव दिले आहे. शरीरातला हा अवयव वंगणाच्या क्रियेसाठी फायदेशीर ठरतो.


🔰गरंथीच्या समुहाद्वारे कळून आले की, हा नवीन अवयव 1.5 इंचाचा आहे. लाळग्रंथींप्रमाणे हा अवयव काम करतो.


🔴 पार्श्वभूमी


🔰नदरलँडच्या एम्सटर्डम कॅन्सर इंस्टीट्यूटचे तज्ज्ञ प्रोस्टेट (मूत्राशयाच्या निमूळत्या भागावर असणारी ग्रंथी) कर्करोगाची तपासणी करण्यासाठी PSMA PET-CT स्कॅनचे परिक्षण करत होते. यादरम्यान एका रेडियओएक्टीव्ह ट्रेसरला मानवी शरीरात टाकण्यात आले होते. रेडिओएक्टीव्ह ट्रेसरमुळे या नवीन अवयवाचा शोध लागला.

कर सुधारणा समिती


🔴 वांचू समिती:-प्रत्यक्ष कर


🔴 राज समिती:-कृषी कर


🔴 एल के झा समिती:-अप्रत्यक्ष कर


🔴 चोक्सी समिती:-प्रत्यक्ष कर


🔴 रेखी समिती:-अप्रत्यक्ष कर


🔴 राजमन्नार समिती:-केंद्र राज्य कर


🔴 केळकर समिती:-प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर

राज्यसेवा पूर्व परीक्षा चालू घडामोडी,सराव पेपर


१. १३ मार्च २०२० रोजी संपलेल्या रणजी करंडक स्पर्धेत खालीलपैकी कोणत्या संघाने प्रथमच सहभाग घेतला होता 

१. चंदीगड

२. नागालँड

३. जम्मू-काश्मीर

४. सेनादल


2. 5 मार्च 2020 रोजी विद्यार्थी आरोग्य कार्ड योजना कोणत्या केंद्र शासित प्रदेशात सुरू करण्यात आली?

1. लडाख

2. जम्मू आणि काश्मीर

3. लक्षद्वीप

4. पुडुचेरी


३. 5 मार्च 2020 रोजी केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी - 'क्रॉनिकल्स ऑफ चेंज चॅम्पियन्स' पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक कोणत्या योजनेवर आधारीत आहे.

१. पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना 

२. पंतप्रधान पीक विमा योजना 

३. प्रधानमंत्री धन लक्ष्मी योजना 

४. बेटी पढाओ बेटी बचाओ योजना


४. उत्तराखंड राज्यसरकारने 4 मार्च 2019 रोजी ................. या शहराला राज्याची उन्हाळी राजधानी म्हणून घोषित केले 

१. नैनीताल

२. उधमसिंह नगर

३. गरसेन

४. हल्द्वानी


५. मार्च 2020 रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने सार्वजनिक क्षेत्रातील 10 बँकांचे 4 बँकांमध्ये विलीनीकरणास मान्यता दिली. विलीनीकरणासंदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही 

१. ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया चे पंजाब नॅशनल बँकेत विलीन 

२. सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत विलीन.

३. आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलीन 

४. अलाहाबाद बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये विलीन 


६. 4 मार्च 2020 रोजी खालीलपैकी कोणता क्रिकेट खेळाडू 500 टी -20 सामने खेळणारा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला

१. ड्वेन ब्राबो

२. विराट कोहली

३. ख्रिस गेल

४. केरॉन पोलार्ड


७. रणजी ट्रॉफीच्या एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा ........... हा पहिला वेगवान गोलंदाज ठरला?

१. विनय कुमार 

२. व्ही. कौशिक 

३. जयदेव उनाडकट 

४. उमेश यादव


८. टायगर स्पीक हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे

१.विमल त्रिपाठी 

२.मयंक भारद्वाज 

३.हरिओम तिवारी 

४.महिपालसिंग


९. खेलो इंडिया विद्यापीठ स्पर्धां २०२० मध्ये कोणत्या विद्यापीठाने पदकतालिकेत प्रथम स्थान पटकावले 

१. पंजाब विद्यापीठ, पंजाब

२. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, महाराष्ट्र

३. पंजाबी विद्यापीठ, पटियाला

४. मंगलोर, विद्यापीठ, कर्नाटक


१० भारताचा दौरा करणारे डोनाल्ड ट्रम्प हे ....................... वे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरले.

१. सहावे

२. पाचवे

३. सातवे

४. आठवे


११. . २१ जून २०२० रोजी साजरा होणारा सहावा आंतराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम ------------------ येथे होणार आहे

१. पुणे

२. लेह

३. श्रीनगर

४. भोपाळ


१२. . ----------------- या राज्य सरकारने करोना हा साथीचा रोग असल्याचे सर्वप्रथम जाहीर केले

१. केरळ

२. हरियाणा

३. महाराष्ट्र

४. दिल्ली


१३ .................. या फुटबॉलपटूने आपला 1000 वा सामना खेळला

१. लिओनेल मेसी

२. ख्रिस्तीयानो रोनाल्डो

३. नेमार जूनियर

४. आंद्रे इनिएस्टा


१४. एकीकृत नोंदणी कार्ड सादर करणारे ............. हे देशातील पहिले राज्य ठरले

१. मध्य प्रदेश

२. उत्तर प्रदेश

३. महाराष्ट्र

४. तामिळनाडू


१५. रशियाने खालीलपैकी कोणता ह्यूमनाॅइट रोबो आंतरळात पाठवला होता.

१. स्काईबोट B-830 

२. स्काईबोट C-730

३. स्काईबोट A-803

४. स्काईबोट F-850




उत्तरे:-

१:- , २:- २, ३:- ४, ४:-३,५:- ४,६:-४,

७:- ३, ८:- ३, ९:- १, १०:-३, ११:२, 

१२: २, १३:-२, १४ :- १ ,१५:- ४



१. भारत हा .............नंतर दुसरा सर्वात मोठा उदयोन्मुख हरित रोखे बाजारपेठ असलेला देश आहे.

१. चीन

२. अमेरिका

३. फ्रान्स

४. इंग्लंड


२. भारताने सर्वात जास्त आयात खालीलपैकी कोणत्या देशातून केली आहे

१. चीन

२. अमेरिका

३. संयुक्त अरब अमिराती

४. सौदी अरेबिया.


३. जागतिक बँकेनुसार नवीन कंपन्यांच्या निर्मितीत भारत ....................स्थानावर आहे. 2018 मध्ये 1.24 लाख नवीन कंपन्या उभारण्यात आल्या.

१. पहिल्या

२. तिसऱ्या

३. पाचव्या

४. सहाव्या 


४. आर्थिक सर्वेक्षण २०१९-२० च्या अह्वाआलानुसार 2018-19 मध्ये भारतीय रेल्वे जगातील सर्वात मोठे प्रवासी वाहक आणि ............सर्वात मोठे मालवाहतूक करणारी वाहक बनली आहे.

१. प्रथम

२. दुसरी

३. चौथे

४. पाचवे


५. जागतिक आर्थिक मंचाच्या वैश्विक स्पर्धात्मक अहवाल 2019 नुसार विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत इतर देशांच्या तुलनेत भारत ................क्रमांकावर आहे.

१. सातव्या

२. सहाव्या

३. चौथ्या 

४. दुसऱ्या 


६.आर्थिक सर्वेक्षणानुसार भारत हा जगातील ..............मोठा ऊर्जा वापरकर्ता देश आहे.

१. पहिला

२. दुसरा

३. तिसरा

४. पाचवा


७. आर्थिक सर्वेक्षण 2019-20 नुसार सेवा क्षेत्रात सर्वाधिक उद्योजकता खालीलपैकी कोठे सर्वात जास्त आढळून आली आहे.

१. दिल्ली

२. गुजरात

३. महाराष्ट्र

४. तामिळनाडू


८.आर्थिक सर्वेक्षण 2019-20 च्या अह्वाआलानुसार जागतिक स्तरावरील १०० बँकाच्या यादीत सार्वजनिक क्षेत्रातील भारतीय स्टेट बँक ही पहिल्या सहा बँकांमधील एक बँक म्हणून ओळखल्या जाऊ शकते जी आजमितीला जागतिक पातळीवर .............व्या स्थानावर आहे.

१. ५५

२. ६ 

३. ४६

४. ६० 


९. २०२०- २१ च्या अर्थसंकल्पात कृषी कर्ज वितरणासाठी किती निधीची तरतूद करण्यात आली आहे 

१. १२ लक्ष कोटी

२. १३ लक्ष कोटी

३. १४ लक्ष कोटी

४. १५ लक्ष कोटी


१०. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणती उद्दिष्टे साध्य करण्यावर जोर देण्यात आला आहे.

१. भ्रष्टाचार मुक्त शासन

२. नीतीनीर्देशीत व सक्षम शासन

३. स्वच्छ व मजबूत आर्थिक क्षेत्र

४. वरील पैकी सर्व


११. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जीवन सुगमता कोणत्या विषयांसाठी महत्व देण्यात आले आहे.

अ. शेतीसिंचन आणि ग्रामीण विकास

ब. आरोग्य पेयजल आणि स्वच्छता

क. शिक्षण आणि कौशल्यविकस

ड. गृहनिर्माण आणि उद्योग सुगमता

१.:- अ, ब,क

२. अ, ब,

३. ब,क

४. अ, ब, क, ड


१२. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात जबाबदार समाज ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या घटकावर लक्ष केंद्रीत करणार आहे

१. महिला आणि बालके

२. समाजकल्याण

३. संसकृती आणि पर्यटन

४. वरील पैकी सर्व 


१३:- २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात खालीलपैकी कोणत्या प्रमाणातील वार्षिक उलाढाल असलेल्या सूक्ष्म लघू आणि मध्यम उद्योगांसाठी लेखापरीक्षण अनिवार्य नसेल

१. ५० लाख

२. १ कोटी

३. २.५ कोटी

४. पाच कोटी


१४. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात आयकरासाठीच्या वैकल्पिक योजनेमध्ये करनिर्धारन करण्यासाठीचे किती टप्पे निश्चित केले आहे.

१. ३

२. ५

३. ७

४. ९ 


१५. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात टीबी हरेगा देश जीतेगा या अभियानांतर्गत खालीलपैकी कोणत्या वर्षापर्यंत भारत क्षयमुक्त करण्याचे उद्दिष्टे निश्चित केले आहे.

१. २०२२

२. २०२३

३. २०२४

४. २०२५ 


१६. २०२० - २१ च्या केंद्रीय अर्थसंकल्पात पशुधनविकासाठीच्या कोणत्या योजनेचा समावेश करण्यात आलेला नाही 

१. दुग्धप्रकिया क्षमता दुप्पट करणे

२. कृत्रिम रेतन सुविधा ७०% पर्यंत वाढवणे

३. कुरणविकास कार्यक्रम मनरेगा बरोबर जोडणे

४. वराह पालनला उत्तेजन देणे



उत्तरे :- 


१:- १, २:- १, ३:-२, ४:- ३, ५:- १, ६:- ३, ७:- १, ८:- १,९ : ४ १० :- ४ ,११ :- १ १२ :- ४ १३:-४ १४ :- ३ १५:- ४ १६:- ४

अर्थशास्त्रावरील प्रश्न सरावासाठी.




१) कोणत्या मूल्यांकनाच्या एककास “कागदी सोने” म्हणतात ?

   1) युरो डॉलर 

   2) एस. डी. आर. 

   3) पेट्रो डॉलर   

 4) जी. डी. आर.


उत्तर :- 2✔️✔️


२) खालील विधाने विचारात घ्या.

   अ) ॲडम स्मिथ ने तुलनात्मक खर्च सिध्दांत मांडला.

   ब) अन्योन्य मागणी सिध्दांत व्यापार शर्तीची निश्चिती स्पष्ट करतो.

   क) डेनिस रॉबर्टसन यांनी वृध्दिचे इंजिन म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापार असे वर्णन केले आहे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ व ब  

  2) ब व क 

   3) अ व क    

4) वरीलपैकी सर्व

उत्तर :- 2✔️✔️



३) कोणती संस्था ग्रामीण भागातील वित्तीय गरजा भागविणारी शिखर संस्था म्हणून काम करते ?

   1) नाबार्ड   

  2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

   3) स्टेट बँक ऑफ इंडिया

    4) वरील सर्व

उत्तर :- 1✔️✔️




४) भारतातील लघुउद्योगांची प्रमुख समस्या कोणती आहे ?

   1) कच्च्या मालाचा अभाव   

   2) अपु-या पायाभुत सुविधा

   3) आधुनिकीकरण   

   4) कामगारांची अनुपलब्धता

उत्तर :- 2✔️✔️




५) सहकारी विपणन संस्थांनी या हेतूने महत्वाची भूमिका पार पाडली आहे.

   अ) शेती उत्पादनाच्या ‍किंमती स्थिर करण्यासाठी मदत करणे. 

   ब) सभासदांना गोदामाच्या सुविधा पुरविणे.

   क) गैरव्यवहारापासुन सभासदांचे संरक्षण करणे.  

    ड) शेतक-यांना दीर्घकालीन कर्जपुरवठा करणे.

   वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

   1) अ फक्त  

  2) अ आणि ब फक्त 

   3) अ, ब आणि क  

  4) अ, ब आणि ड

उत्तर :- 3✔️✔️

डेली का डोज



1.महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी को किस राज्य का अतिरिक्त प्रभार दिया गया है?

a. बिहार

b. झारखंड

c. गोवा✔️

d. कर्नाटक


2.शास्त्रीय संगीत के किस प्रसिद्ध गायक का हाल ही में अमेरिका में 90 वर्ष की उम्र में निधन हो गया है?

a. पंडित जसराज✔️

b. अरुण भादुड़ी

c. बिरजू महाराज

d. भीमसेन जोशी


3.केंद्रीय गृह मंत्रालय ने हाल ही में किस रेलवे स्टेशन का नाम बदलकर बनारस करने को मंजूरी प्रदान कर दी है?

a. तारी घाट रेलवे स्टेशन

b. मंडुआडीह रेलवे स्टेशन✔️

c. अमौसी रेलवे स्टेशन

d. बलरामपुर रेलवे स्टेशन


4.सीबीआई के किस पूर्व विशेष निदेशक को सीमा सुरक्षा बल (बीएसएफ) का नया महानिदेशक नियुक्त किया गया है?

a. ऋषि कुमार शुक्ला

b. एनके सिंह

c. राकेश अस्थाना✔️

d. जावीद अहमद


5.निम्न में से किस देश ने बांग्लादेश की तीस्ता नदी परियोजना के लिए 01 बिलियन कर्ज देने की घोषणा की है?

a. नेपाल

b. रूस

c. जापान

d. चीन✔️


6.'मदारी' और 'दृश्यम' फिल्म के किस निर्माता का हाल ही में निधन हो गया?

a. निशिकांत कामत✔️

b. कमल हासन

c. अनील सूरी

d. टीनू आनंद


7.हाल ही में किस IPS अधिकारी को गृह मंत्रालय के आंतरिक मामलों के लिए विशेष सचिव नियुक्त किया गया है?

a. सुधीर कुमार पोरिका

b. प्रमोद कुमार मंडल

c. वीएसके कौमुदी✔️

d. हरकिशोर राय 


8.यूनाइटेड किंगडम ने भारत में कितने मिलियन पाउंड का इनोवेशन चैलेंज फंड लॉन्च किया है?

a. 3 मिलियन पाउंड✔️

b. 2 मिलियन पाउंड

c. 1 मिलियन पाउंड

d. 7 मिलियन पाउंड


9.हाल ही में मेघालय का राज्यपाल किसे नियुक्त किया गया है?

a. सत्यपाल मलिक✔️

b. भगत सिंह कोश्यारी

c. गिरीश चंद्र मुर्मू

d. फागु चौहान


10.भारतीय रेलवे किस राज्य में दुनिया का सबसे लंबा पियर ब्रिज का निर्माण कर रहा है?

a. कर्नाटक

b. बिहार

c. तमिलनाडु

d. मणिपुर✔️

इतिहास सराव प्रश्न


वैदिक गणिताचे महत्वपूर्ण अंग काय आहे ? 

A. शतपत ब्राहण 

B. शुल्व सूत्र ✅️

अथर्ववेद

D. छान्दोग्य उपनिषद



 वेदांची संख्या किती आहे ? 

A. 3

B. 5

C. 4 ✅️

D. 1


 सर्वात प्राचीन वेद कोणते आहे ? 

A. सामवेद

B. ऋ ग्वेद  ✅️

C. अथर्ववेद

D. यजुर्वेद



 कोणत्या वेदा द्वारे वैदिक संस्कृती बद्दल माहिती मिळते ? 

A. यजुर्वेद

B. सामवेद

C. अर्थवेद

D. ऋ ग्वेद ✅️



 भारताच्या राजचिन्ह मध्ये लिहलेले सत्यमेव जयते कोणत्या उपनिषदा मधून घेतले आहे ? 

A. छांदोग्य उपनिषद

B. बृहदारण्यक उपनिषद

C. मांडूक्य उपनिषद

D. मुंडकोपनिषद ✅️

चालू घडामोडी चे 10 प्रश्न व उत्तरे




Q1) कोणत्या संस्थेनी "द वर्ल्ड्स वुमन 2020: ट्रेंड्स अँड स्टॅटिस्टिक्स" या शीर्षकाखाली एक अहवाल प्रसिद्ध केला?

-----  संयुक्त राष्ट्रसंघ आर्थिक व सामाजिक कार्य विभाग


Q2) खालीलपैकी कोण निवडणूक आयोगाने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांवर होणाऱ्या खर्चाच्या मर्यादेत बदल करण्याच्या हेतूने मुद्दयाची तपासणी करण्यासाठी नेमलेल्या समितीचे सदस्य आहेत?

-------- हरीश कुमार आणि उमेश सिन्हा


Q3) कोणत्या राज्यात "आंतरराष्ट्रीय महत्त्वाची पाणथळ भूमी" हा दर्जा देण्यात आलेला ‘असन संवर्धन प्रकल्प’ आहे?

------ उत्तराखंड


Q4) कोणत्या संस्थेनी कमी खर्चाचे 'कोविरॅप' नामक कोविड-19 निदान चाचणी यंत्र विकसित केले?

------  IIT खडगपूर


Q5) कोणते औद्योगिक कामगारांसाठीच्या ग्राहक किंमत निर्देशांकासाठी कामगार मंत्रालयाकडून ठरविण्यात आलेले आधारभूत वर्ष आहे?

-------  2016


Q6) कोणत्या जलविद्युत प्रकल्पाला प्रतिष्ठित ‘ब्रुनेल पदक’ बहाल करण्यात आले?

--------  मांगदेछू जलविद्युत प्रकल्प


Q7) कोणत्या व्यक्तीची आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) याच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाली?

------ अपूर्व चंद्रा


Q8) कोणत्या संस्थेनी ‘नाग’ नामक रणगाडा-भेदी मार्गदर्शित क्षेपणास्त्राचा (ATGM) विकास केला?

--------- संरक्षण संशोधन व विकास संस्था


Q9) कोणता शास्त्रज्ञांनी नोंदवलेला सर्वात कमी कालावधी आहे?

------ 247 झेप्टोसेकंद


Q10) कोणत्या राज्यात “स्मार्ट ब्लॅक बोर्ड” योजना लागू केली गेली आहे?

------- तामिळनाडू


● सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) महासंचालक पदावर कोणाची नेमणूक झाली आहे?

उत्तर : राकेश अस्थाना


● ‘स्पॅनिश ग्रँड प्रीक्स 2020’ ही फॉर्म्युला वन शर्यत कोणत्या व्यक्तीने जिंकली?

उत्तर : लेविस हॅमिल्टन


● नुकतेच निधन झालेले पंडित जसराज यांना कोणत्या साली 'पद्म विभूषण' पुरस्काराने गौरवण्यात आले होते?

उत्तर : 2000 साली


● एखाद्या जिल्ह्याचे किंवा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याला कोणते मंत्रालय मान्यता देते?

उत्तर : गृह मंत्रालय


● महाराष्ट्रातल्या गृहनिर्माण क्षेत्राविषयी महिलांना कौशल्य प्रदान करण्यासाठी 1 दशलक्ष युरो एवढी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पाचा आरंभ कोणत्या संस्थेनी केला?

उत्तर : युरोपीय संघ


● जगातला सर्वाधिक उंचीवरचा पियर पूल कोणत्या नदीवर बांधण्यात येत आहे?

उत्तर : इजाई


● ‘पढाई तुहार परा’ योजना कोणते राज्य सरकार राबवित आहे?

उत्तर : छत्तीसगड सरकार


● “वन सन, वन वर्ल्ड, वन ग्रिड” (OSOWOG) या उपक्रमाच्या अंतर्गत एकाच पॉवर ग्रीडद्वारे किती देशांना जोडण्याचा प्रस्ताव आहे?

उत्तर : 140 दे


Q1) कोणत्या राज्य सरकारने खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची भरपाई करण्यासाठी ‘मुख्यमंत्री शेतकरी सहाय्य योजना’ लागू केली?

उत्तर :- गुजरात


Q2) कोणत्या व्यक्तीची भारतीय पोलाद प्राधिकरण मर्यादीत (SAIL) या उपक्रमाच्या अध्यक्षपदी नेमणूक झाली?

उत्तर :-  सोमा मोंडल


Q3) कोणते शहर स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने स्त्री-स्वरूपात वाहतूक सिग्नल मिळविणारे पहिले ठरले?

उत्तर :- मुंबई


Q4) कोणत्या संस्थेनी “BEEG” या नावाने देशी ‘सीड बॉल’ विकसित केले आहेत?

उत्तर :-  भारतीय तंत्रज्ञान संस्था, कानपूर


Q5) ‘70th अॅनिव्हर्सरी ग्रँड प्रिक्स 2020’ या शर्यतीचा विजेता कोण ठरला?

उत्तर :- मॅक्स व्हर्स्टपेन


Q6) कोणत्या संस्थेनी भारतभर ‘W-GDP विमेन कनेक्ट चॅलेंज’ उपक्रम राबविण्यासाठी USAID संस्थेसोबत भागीदारी करार केला?

उत्तर :- रिलायन्स फाऊंडेशन


Q7) कोणत्या कंपनीने “विद्यार्थी उद्योजकता कार्यक्रम 2.0” यासाठी अटल इनोव्हेशन मिशन (AIM) सोबत भागीदारी केली?

उत्तर :- डेल टेक्नॉलॉजीज


Q8) कोणत्या संस्थेच्यावतीने ‘इंडिया@ 75 समिट: मिशन 2022’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते?

उत्तर :-  भारतीय उद्योग संघ (CII)


Q9) कोणत्या व्यक्तीची भारतीय आंतरराष्ट्रीय आर्थिक संबंध संशोधन मंडळाचे (ICRIER) अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?

उत्तर :- प्रमोद भसीन


Q10) कोणत्या व्यक्तीने पश्चिम बंगालमधून बांग्लादेशमार्गे त्रिपुराच्या आगरतळाकडे जाणाऱ्या पहिल्या चाचणी मालवाहू जहाजाला हिरवा झेंडा दाखविला?

उत्तर :-  मनसुख मांडवीया


Q1) कोणत्या देशाने नागरी अणुऊर्जा, अंतराळ, सागरी विज्ञान आणि नवीन तंत्रज्ञान यासारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये सहकार्याविषयी शोध घेऊन हिंद-प्रशांत भागीदारीला बळकटी देण्यासाठी भारताला समर्थन दिले?

उत्तर :- व्हिएतनाम


Q2) कोणती बँक खर्च कमी करण्याच्या हेतूने कृषीकर्ज देण्यासाठी उपग्रहाने पाठविलेल्या प्रतिमांचा वापर करणारी प्रथम बँक ठरली आहे?

उत्तर :-  ICICI बँक


Q3) दलात रुजू होण्यास इच्छुक असणाऱ्यांना व्यवसाय संबंधित माहिती आणि तपशील पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलाने तयार केलेल्या मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

उत्तर :-  माय IAF


Q4) कोणत्या शहरातल्या रेल्वेप्रणाली प्रकल्पासाठी भारताने अशियाई पायाभूत सुविधा गुंतवणूक बँक (AIIB) सोबत 500 दशलक्ष डॉलर एवढ्या रकमेचा कर्ज करार केला?

उत्तर :- मुंबई


Q5) कोणत्या देशाने ‘माइंड स्पोर्ट्स ऑलिम्पियाड 2020’ या स्पर्धांमध्ये ‘मेंटल कॅल्युलेशन वर्ल्ड चॅम्पियनशीप’ गटातले पहिले सुवर्णपदक जिंकले?

उत्तर :- भारत


Q6) कोणत्या संघाने ‘UEFA चॅम्पियन्स लीग 2019-20’ ही स्पर्धा जिंकली?

उत्तर :-  बायर्न म्युनिच


Q7) कोणत्या दिवशी “उत्कृष्ट सार्वजनिक व्यवस्थापनासाठी पंतप्रधान पुरस्कार”चे वितरण केले जाते?

उत्तर :- 31 ऑक्टोबर


Q8) कोणत्या व्यक्तीला 2019 सालाच्या ‘टेनझिंग नॉरगे राष्ट्रीय साहसिक पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले?

उत्तर :-  अनिता कुंडू


Q9) कोणता देश सुमारे दहा दशलक्ष रोहिंग्या समुदायाच्या लोकांना ‘भशन चार बेटे’ या ठिकाणी वसविण्याची योजना तयार करीत आहे?

उत्तर :- बांगलादेश


Q10) कोणत्या देशासोबत भारताने संयुक्त राष्ट्रीय समन्वय समितीची पहिली बैठक घेतली?

उत्तर :-  उझबेकिस्तान


1) प्रश्न :- संस्कृति मंत्रालयाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) या संस्थेच्या किती नवीन क्षेत्रांची नावे जाहीर केली?

उत्तर :- सात


2) प्रश्न :- कोणत्या मंत्रालयाच्यावतीने ‘DGNCC मोबाइल ट्रेनिंग’ अॅप तयार करण्यात आले?

उत्तर :- संरक्षण मंत्रालय


3) प्रश्न :- नीती आयोगाकडून आरंभ करण्यात आलेल्या “नॅशनली डिटरमाइंड कॉन्ट्रीब्यूशन्स (NDC)-ट्रान्सपोर्ट इनिशिएटिव्ह फॉर एशिया (TIA)” याच्या भारतीय घटकाचे उद्दीष्ट काय आहे?

उत्तर :- कार्बन-विरहित वाहतुक


4) प्रश्न :- कोणते अ‍ॅप नागरिकांना उपलब्ध करुन देण्यासाठी NeGD आणि CSC E-गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लिमिटेड यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला?

उत्तर :-  उमंग


5) प्रश्न :- कोणत्या बँकेनी भारतीय युवांसाठी ‘लिबर्टी बचत खाता’ योजना सादर केली?

उत्तर :- अ‍ॅक्सिस बँक


6) प्रश्न :- कोणत्या प्रशिक्षकाच्या जीवनावर ‘क्रिकेट द्रोणा’ हे शीर्षक असलेले पुस्तक लिहिले गेले आहे?

उत्तर :- वासुदेव जगन्नाथ परांजपे


7) प्रश्न :- कोणता देश आणि IIT अल्युमनी काऊंसिल यांच्यामध्ये जगातला सर्वात मोठा आणि सर्वात वेगवान हायब्रीड क्वांटम महासंगणक तयार करण्यासाठी भागीदारी करार झाला?

उत्तर :- रशिया


8) प्रश्न :- कोणती व्यक्ती ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक 2020’ जिंकणारा सर्वात तरुण लेखक ठरला/ली?

उत्तर :- मारिएक लुकास रिसनेवेल्ड


9) प्रश्न :- कोणत्या राज्यात केंद्रीय रस्ते मंत्री यांच्या हस्ते सुमारे 11000 कोटी रुपये खर्चाच्या 45 महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन झाले?

उत्तर :- मध्यप्रदेश


10) प्रश्न :- कोणत्या व्यक्तीने BRICS देशांच्या उद्योग मंत्र्यांच्या पाचव्या आभासी बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?

उत्तर :-  सोम प्रकाश


आयुष मंत्रालय रिजनल रॉ ड्रग रिपॉझिटरी (RRDR) यांची स्थापना करणार


✅आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करणाऱ्या नॅशनल मेडिसिनल प्लांट बोर्ड (NMPB) यांनी आयुर्वेद, सिद्ध, युनानी आणि होमिओपॅथी औषध प्रणालींमध्ये वापरल्या जाणार्‍या कच्च्या औषधांच्या संदर्भात प्रदेशनिहाय रिजनल रॉ ड्रग रिपॉझिटरी (RRDR) यांची स्थापना करण्याची योजना तयार केली आहे.


🔴रिजनल रॉ ड्रग रिपॉझिटरी (RRDR) उभे करण्यामागची मुख्य उद्दिष्टे


✅परत्येक प्रदेशात उपलब्ध असणाऱ्या आणि वापरल्या जाणार्‍या कच्च्या औषधी मालाचे एक संग्रह केंद्र म्हणून कार्य करणे.

कच्च्या औषधांच्या प्रमाणीकरणासाठी अधिकृत संदर्भ साठा म्हणून कार्य करणे.


✅हर्बल उद्योगांमध्ये वापरल्या जाणार्‍या कच्च्या औषधाच्या प्रमाणीकरणासाठी मानक शिष्टाचार प्रस्थापित करणे.


✅कच्च्या औषधांच्या उपयुक्ततेबद्दल सामान्य जागरूकता पसरविण्यासाठी शैक्षणिक केंद्र म्हणून कार्य करणे.

प्रस्तावित RRDR


✅हिमालयी विभाग (उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू व काश्मीर).


✅पश्चिम विभाग (पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरात)


✅उत्तर विभाग (उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड)

मध्य विभाग (मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड).


✅पर्व विभाग (पश्चिम बंगाल, ओरिसा, सिक्कीम)


✅पर्वोत्तर विभाग (आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मिझोरम, नागालँड, त्रिपुरा, मणीपूर).


✅दक्षिणी (अ) विभाग (कर्नाटक, गोवा, आंध्रप्रदेश, तेलंगणा).


✅दक्षिणी (ब) आणि बेट विभाग (तामिळनाडू, केरळ, पांडिचेरी, अंदमान आणि निकोबार.

परदेशी नागरिकांना भारतात येण्यास मुभा


🖋पर्यटकवगळता सर्व परदेशी नागरिकांना भारतात येण्याची परवानगी देण्यात आली असून केंद्रीय गृहमंत्रालयाने व्हिसा निर्बंध गुरुवारी शिथिल केले. करोनामुळे फक्त परदेशात राहत असलेल्या भारतीय नागरिकांना देशात येण्याची मुभा होती.


🖋आता व्यापारीभेट, परिषदा, नोकरी, शिक्षण, संशोधन, वैद्यकीय उपचार आदी कारणांसाठी व्हिसा दिले जातील.


🖋विमान वा जलवाहतुकीच्या मार्गाने विदेशी नागरिक, परदेशस्थ भारतीय नागरिक आणि भारतीय वंशाच्या व्यक्तींना भारतात येता येईल. भारताचा अन्य देशांशी झालेला विमान करार (एअर बबल), वंदे भारत मोहीम, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मंजुरीनंतर बिगरव्यावसायिक कारणांसाठी होणाऱ्या विमानफेऱ्या याद्वारे परदेशातून प्रवाशांना भारतात येणे शक्य होणार आहे. मात्र, या प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने लागू केलेल्या करोनासंदर्भातील सूचनांचे पालन करणे सक्तीचे असेल, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केले.


🖋कद्र सरकारने जूनमध्ये अल्पवयीन परदेशी मुला-मुलींना भारतात येण्याची मुभा दिली होती मात्र, परदेशस्थ भारतीय नागरिक वा भारतीय नागरिक असलेल्या किमान एका पालकाचे मुलांबरोबर असणे सक्तीचे होते.

सतर्कता व भ्रष्टाचार निर्मूलन’ विषयी राष्ट्रीय परिषद



 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 27 ऑक्टोबर 2020 रोजी ‘सतर्कता (दक्षता) व भ्रष्टाचार निर्मूलन’ विषयी एका राष्ट्रीय परीषदेचे आभासी पध्दतीने उद्घाटन करणार आहेत.


 "सतर्क भारत, समृध्द भारत" (Vigilant India, Prosperous India) या या कार्यक्रमाचा विषय असणार आहे.


📌 ठळक बाबी :


 केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) दरवर्षी 27 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर या कालावधीत ‘सतर्कता जागृती सप्ताह’ साजरा करीत असतो आणि ही परिषद  याच सप्ताहात आयोजित केली जात आहे.


 परिषदेत सतर्कता या विषयावर लक्ष केंद्रित करण्यात आले असून त्यायोगे लोकांमध्ये जनजागृती करणे आणि नागरिकांना सहभागी करीत भारताच्या सार्वजनिक जीवनातली अस्मिता आणि सत्यनिष्ठा या संकल्पनांचे सबळीकरण हा या परीषदेचा हेतू आहे.


 या तीन दिवस चालणाऱ्या परिषदेत परदेशी कायद्यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या कक्षांमुळे तपास करण्यात येणारी आव्हाने, भ्रष्टाचार विरोधात कार्यरत नियंत्रणासाठी सतर्कता प्रक्रिया, आर्थिक घोटाळे समाविष्ट असणाऱ्या कार्यप्रणालीतल्या सुधारणा आणि बँकांमधल्या फसवणूकींना प्रतिबंध, लेखा परीक्षण प्रभावीपणे करुन त्याने विकास घडवून आणणे, भ्रष्टाचार निर्मूलन कायद्यात नव्या सुधारणा करत भ्रष्टाचार विरोधात लढणे, क्षमता विस्तार आणि प्रशिक्षण, त्वरित आणि प्रभावीपणे तपास करण्याकरता बहुआयामी समन्वय, आर्थिक अपराध करणाची प्रवृत्ती, सायबर गुन्हे आणि आंतरराष्ट्रीय संघटीत गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांची चौकशी करण्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांच्या उत्तम कार्यपध्दतींचे एकमेकांत आदानप्रदान या सारख्या विषयांवर चर्चा होणार आहे.

जगातील विविध स्थळांची टोपननावे किंवा ठळक वैशिष्टये


👉🏾 *इंग्लंडचे उद्यान*

– केंट 


👉🏾 *यूरोपाचे काश्मीर*

– स्वित्झर्लंड 


👉🏾 *वादळी शहर*

– शिकागो 


👉🏾 *पीत नदी*

– हो हँग हो 


👉🏾 *भारताचे स्वित्झर्लंड*

– काश्मीर 


👉🏾 *लवगांचे बेट*

– झांजीबार 


👉🏾 *गुलाबी शहर*

– जयपूर 


👉🏾 *खड़काळ शहर*

– अँबरडीन 


👉🏾 *पायाखालील प्रदेश*

– ऑस्ट्रेलिया 


👉🏾 *पाच नदयाचा प्रदेश*

– पंजाब 


👉🏾 *हजार तळ्यांचा देश*

– फिनलँड 


👉🏾 *निर्जनतम बेट*

– ट्रिस्टन डी क्यूबा 


👉🏾 *भारताचे व्हेनीस*

– अलेप्पी


👉🏾 *पाचूंचे बेट*

– श्रीलंका 


👉🏾 *दक्षिणेतील ब्रिटन*

– न्यूझीलंड 


👉🏾 *भारताचे उद्यान*

– बंगलोर 


👉🏾 *भूकंपाचे शहर*

– फिलाडेल्फिया 


👉🏾 *उत्तरेकडील व्हेनीस*

– स्टॉकहोम 


👉🏾 *कमलपुष्पांचा देश*

– फ़्रान्स व कॅनडा 


👉🏾 *अमर शहर*

– रोम 


👉🏾 *मंदिरांचे माहेरघर*

– बनारस 


👉🏾 *मेपल वृक्षांचा देश*

– कॅनडा


👉🏾 *काळा खंड*

– आफ्रिका 


👉🏾 *श्वेत शहर*

– बेलग्रेड 


👉🏾 *जगाचे छप्पर*

– पामीरचे पठार 


👉🏾 *भारताचा मसाला मळा*

– केरळ 


👉🏾 *भूमध्य समुद्राची किल्ली*

– जिब्राल्टर 


👉🏾 *गोऱ्या माणसाची दफन भूमी*

– गिनीचा किनारा 


👉🏾 *मोत्यांचे बेट*

– बहारीन 


👉🏾 *राजवाडयांचे शहर*

– वॉशिंगटन


👉🏾 *अज्ञात खंड*

– आफ्रिका 


👉🏾 *उंच इमारतीचे शहर*

– न्यूयार्क 


👉🏾 *भव्य अंतराचे शहर*

– कोलकाता 


👉🏾 *कांगारूंचा देश*

– ऑस्ट्रेलिया 


👉🏾 *सूर्यास्ताचा देश*

– ब्रिटन 


👉🏾 *उगवत्या सूर्याचा देश*

– जपान 


👉🏾 *मध्यरात्रीच्या सूर्याचा देश*

– नॉर्वे

सामान्य विज्ञान (इयत्ता 6 वी)



👉अमिबा, पॅरामेशिअम, क्लोरेला, यीस्ट या सजीवांचे शरीर एक पेशीचे बनलेले असते.


 👉चतना मिळाल्यावर प्रतिसाद देण्याच्या क्षमतेला चेतनाक्षमता असे म्हणतात.


👉पराणी :

वयोमान

घरमाशी - 1 ते 4 महिनेकुत्रा - 16 ते 18 वर्षशहामृग - 50 वर्ष हत्ती - 70 ते 90 वर्ष

वनस्पतीच्या वर्गीकरणाचे श्रेय कॅरोलेस लिनियस या शास्त्रज्ञाकडे जाते.


 👉बरशी, भूछत्र, स्पायरोगायरा, नेचे व कवक यांना फुले येत नाहीत.


 👉वड, उंबर, बोगनवेल या सपुष्प वनस्पती आहेत.


 👉वदिवार्षिक वनस्पती - मुळा, गाजर, बीट.


👉वार्षिक वनस्पती -सूर्यफूल, झेंडू, ज्वारी,बाजरी, मका.


 👉जलचर प्राणी - मासा, जेलीफिश, ऑक्टोपस


👉 उभयचर प्राणी - बेडूक, कासव, सुसर


 👉वडाच्या खोडावरील पारंब्या या वडाची मुळे आहेत. कोलकाता येथील बोटॅनिकल गार्डन मध्ये सुमारे 250 वर्षाचे वडाचे झाड आहे.


 👉पर आणि पान यांच्या दुबेळक्यात कोंबासारखा भाग दिसतो त्याला मुकूल म्हणतात. मूळाच्या टोकाशी मूलटोपी असते.


 👉जायांग स्त्रीकेशराचा बनलेला असतो.


👉 वस्तुमान, अंतर, तापमान, काळ अशा प्रकारात ज्यांचे मापन करायचे असते, त्यांना राशी असे म्हणतात.


 👉MKS आणि CGS या प्रचलित मापन पद्धती आहेत.


👉 गोलंदाजीच्या वेगाचे मापन रडार प्रणालीव्दारे केले जाते.


 👉सथिर वस्तूला हलविण्यासाठी बलाची आवश्यकता असते.


 👉मगलेव्ह ट्रेन ही चुंबकाचा वापर करून चालणारी रेल्वे ताशी 500 ते 580 किमी वेगाने धावते.


 👉घर्षणबल गतीच्या विरोधात कार्य करते.


👉 घर्षनामुळे वीज निर्माण होणार्‍या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात.


 👉एका दिशेने जाणार्‍या गतीला रेषीय गती असे म्हणतात.


 👉जया गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती म्हणतात.


 👉आधाराभोवती हालणार्‍या आणि न वाकणार्‍या दांड्याला तरफ म्हणतात. हे साधे यंत्र आहे.


 👉कार्य करण्याच्या क्षमतेला ऊर्जा असे म्हणतात.


 👉पदार्थाच्या ताणामुळे / स्थितीमुळे साठवल्या गेलेल्या उर्जेला स्थितीज ऊर्जा असे म्हणतात.


 👉गतीज ऊर्जेचा वापर करून डायनॅमोमध्ये विद्युतनिर्मिती होते.


 👉पारंपारिक ऊर्जा स्त्रोत - कोळसा, डिझेल, पेट्रोल

सविधान सभा



👁‍🗨9 डिसेंम्बर 1946:- पहिली बैठक


👁‍🗨11 डिसेंम्बर 1946:- डॉ राजेंद्र प्रसाद यांची अद्यक्ष म्हणून निवड


👁‍🗨13 डिसेंम्बर 1946:-नेहरूंनी उद्देश पत्रिका मांडली


👁‍🗨22 जानेवारी 1947:-उद्देश पत्रिका चा स्वीकार केला गेला


👁‍🗨25 जानेवारी 1947:- एच सी मुखर्जी यांची उपद्यक्ष म्हणून निवड केली गेली


👁‍🗨22 जुलै 1947:- राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला


🔻24 जानेवारी 1950:-राष्ट्रगीत व राष्ट्रगान स्वीकृत केले


🔻29 ऑगस्ट 1947:- मसुदा समिती स्थापन


🔴26 नोव्हेंबर 1949:- घटना स्वीकृत केली गेली


🔴24 जानेवारी 1950:- घटनेवर 284 सदस्यांनी सह्या केल्या


👉26 जानेवारी 1950:- घटनेचा अंमल सुरू झाला

Latest post

शक्तिपीठ महामार्ग...

◾️शक्तिपीठ’महामार्ग नागपूर – गोव्या ◾️जिल्हे:  वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातुर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि ...