Monday 2 May 2022

ग्रामीण व कृषी उद्योग व्यवस्थापन

ग्रामीण व कृषी उद्योग व्यवस्थापन

देशाच्या ग्रामीण स्तरावर- विशेषत: शेती उद्योगात
कृषी मालाची किंमत ठरवणे हा एक महत्त्वाचा निर्णय या उद्योगांशी संबंधित सर्वाना घ्यावा लागतो.

देशाच्या ग्रामीण स्तरावर- विशेषत: शेती उद्योगात वेगाने बदल होताना दिसत आहेत. याचा थेट संबंध यासंबंधीत क्षेत्रांतील उपलब्ध करिअर संधींशी आहे. व्यवस्थापनाच्या ग्रामीण व कृषी उद्योग या स्पेशलायझेशनच्या अभ्यासात कोणत्या घटकांचा-उपघटकांचा समावेश आहे आणि त्याद्वारे कोणत्या करिअर संधींची कवाडे खुली होतात, याचे विवेचन..
व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षांसाठी असलेले ग्रामीण व कृषी उद्योग व्यवस्थापन (रुरल अ‍ॅण्ड अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट) हे  एक महत्त्वाचे स्पेशलायझेशन काही विद्यापीठांमध्ये उपलब्ध असते. देशाच्या ग्रामीण स्तरावर आणि शेती उद्योगात बरेच आणि वेगाने बदल होत असताना ग्रामीण भागातील प्रगतीसाठी केवळ शेतीवर अवलंबून न राहता जोडधंद्यांची तसेच शेतीवर आधारित उद्योगधंद्यांची नितांत गरज आहे. शेती उद्योगातही नवनवी आव्हाने उभी राहत आहेत.  या आव्हानांना यशस्वीरीत्या सामोरे जाण्यासाठी शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाची तसेच अद्ययावत  व्यवस्थापन तंत्रांची आवश्यकता आहे नजिकच्या भविष्यकाळात शेती आणि ग्रामीण विकासामध्ये प्रशिक्षित मनुष्यबळाची मोठी आवश्यकता भासणार आहे. या दृष्टिकोनातून या स्पेशलायझेशनकडे पाहिल्यास ग्रामीण व कृषी उद्योग या विषयाचे महत्त्व समजते आणि उपलब्ध संधींची कल्पना येऊ शकते.

या विषयाचे कोणकोणते उपघटक आहेत, हे जाणून घेऊयात. भारतीय कृषी क्षेत्राचा परिचय होण्यासाठी कृषीक्षेत्र आणि अर्थव्यवस्था यासंबंधीचा  एक विषय या स्पेशलायझेशनमध्ये असतो. या विषयामध्ये साधारणत: आपल्या देशातील कृषीक्षेत्राची सद्यस्थिती, पंचवार्षिक योजनांमधून झालेली शेतीची प्रगती तसेच जमीनविषयक सुधारणा, शेती पाणीपुरवठय़ाची स्थिती, मजुरांची उपलब्धता इत्यादी बाबींचा समावेश होतो. या गोष्टींची सविस्तर माहिती होण्याकरता देशाच्या वेगवेगळ्या भागांतील ग्रामीण भागात फिरून शेतीची सद्यस्थिती नजरेखालून घालायला हवी.

यासोबत ग्रामीण भागातील विपणन (रुरल मार्केटिंग), ग्रामीण भागाचा विकास (रुरल डेव्हलपमेंट), वस्तूंची बाजारपेठ (कमॉडिटी मार्केट), कृषीमालाचे विपणन आणि किमतीविषयक धोरण (अ‍ॅग्रीकल्चर मार्केटिंग अ‍ॅण्ड प्राइसिंग), अर्थपुरवठा (मॅक्रो फायनान्स), शेतीमालाचे वितरण, ग्रामीण विभागातील संशोधन पद्धती (रुरल रिसर्च मेथड्स), बँकिंग इत्यादी अनेक महत्त्वाच्या विषयांचा समावेश होतो. म्हणजेच प्रामुख्याने शेतीचे तसेच ग्रामीण विभागातील शेतीवर आधारित उद्योगांचे व्यवस्थापन कसे करावे याची माहिती या विषयाच्या अभ्यासातून मिळते.

विपणन विषयक उपघटकात शेतीमालाचे उत्पादन तसेच पूरक उद्योगामध्ये वस्तूंचे उत्पादन केल्यानंतर त्यांचे शास्त्रीयदृष्टय़ा, विपणनाची आधुनिक तंत्रे वापरून या मालाचे प्रभावी विपणन कसे करता येईल हे शिकता येते. त्यादृष्टीने ग्रामीण बाजारपेठांचे संशोधन कसे करावे, वितरण साखळी ग्रामीण भागात कशा पद्धतीने वापरता येईल, याविषयी वस्तूंचे पॅकिंग, ब्रॅण्डिंग तसेच जाहिरात कशा पद्धतीने करावी याचे मार्गदर्शन मिळते.

हे सतत लक्षात ठेवले पाहिजे की, व्यवस्थापनविषयक कोणताही विषय शिकताना आपण आपल्या स्वत:च्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणे गरजेचे असते. यासाठी आपण शिकत असलेल्या शहराच्या आसपासच्या ग्रामीण विभागात फिरलो तरी प्रत्यक्ष विषयाची पुरेशी कल्पना येऊ शकते. शेती आणि शेतीविषयक व्यवसायाचे व्यवस्थापन या विषयाचा अभ्यास करताना या बाबींची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.

ग्रामीण विकासासाठी आवश्यक असणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे वित्तपुरवठा. शेतीविषयक उद्योगांना भांडवल उभारणी दरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही भांडवल उभारणी कशी करावी यामध्ये ठिकठिकाणच्या अल्पबचत गटांचा उपयोग कसा करून घ्यावा, मॅक्रो फायनान्स म्हणजे नक्की काय इत्यादी अनेक विषयांची माहिती, वित्त विषयाशी संबंधित वर्तमानपत्रांद्वारे मिळते. याकरता या स्पेशलायझेशनमध्ये ग्रामीण विभागातील अर्थपुरवठा, बँकिंग इत्यादी अनेक विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. या विषयांचा अभ्यास करतानासुद्धा अशा ठिकाणांना प्रत्यक्ष भेट देऊन माहिती मिळवणे आवश्यक ठरते. बँकांची कार्यपद्धती, कर्जासंबंधीचे नियम इत्यादी वेगवेगळ्या कामांची माहिती करून घेता येते. ग्रामीण भागातील लोकांना बँकिंगविषयक तसेच इतर वित्तीय सेवा देण्यासाठी कोणत्या  उपाययोजना केलेल्या आहेत याची माहिती होते.

कृषी मालाची किंमत ठरवणे हा एक महत्त्वाचा निर्णय या उद्योगांशी संबंधित सर्वाना घ्यावा लागतो. शेतीमध्ये निर्माण होणाऱ्या मालाची किंमत कशी ठरवावी यासंबंधीची माहिती अ‍ॅग्रिकल्चर प्राइजिंग या विषयातून होते. ही किंमत ठरवताना वस्तूंचा उत्पादनखर्च कसा ठरवावा याची माहिती घ्यावी लागते तसेच किंमत ठरवताना ती जशी ग्राहकांना परवडणारी असावी लागते तसेच उत्पादकांनाही पुरेसा नफा देणारी असावी लागते. या दोन गोष्टींची सांगड कशी घालावी हे या उपघटकाच्या अभ्यासातून लक्षात येते. किंमत ठरवताना फ्युचर्स आणि ऑप्शन्स यांचा वापर कसा करावा, त्यातून उत्पादकांचा लाभ कसा होईल याचीही माहिती मिळते. कमॉडिटी मार्केट्समध्ये मूलभूत आणि तांत्रिक विश्लेषण (फंडामेंटल अ‍ॅण्ड टेक्निकल अ‍ॅनॅलिसिस) कसे करावे यासंबंधीची माहिती मिळते. थोडक्यात या विषयाद्वारे उत्पादित कृषी उत्पादन आणि कृषी उद्योगावर आधारित वस्तूंचे मूल्य कसे ठरवावे हे शिकता येते.

ग्रामीण विकासामध्ये सरकारी संस्थांचे महत्त्व मोठय़ा  प्रमाणावर आहे. यासंबंधित सरकारी संस्था, सहकारी संस्था, पतसंस्थांचे कामकाज कसे चालते व त्यासंबंधीचे नियम काय आहेत याची माहितीसुद्धा असणे अत्यावश्यक ठरते. सरकारी पतपेढय़ांमार्फत, सरकारी बँकांमार्फत आणि इतर बँकांमार्फत जो कर्जपुरवठा होतो त्यासाठी कोणते नियोजन करावे तसेच जोखमीचे व्यवस्थापन (रिस्क मॅनेजमेंट) कसे करावे याची माहिती घेता येते. कृषीविषयक उद्योगांचा प्रकल्प अहवाल कसा तयार करावा व त्याचे मूल्यमापन कसे करावे हेही शिकता येते.

विपणन व वित्तीय बाबींसोबतच ग्रामीण भागातील शेतीमालावर आधारित उद्योगांमधील मनुष्यबळ विकासाचे व्यवस्थापन कसे करावे हाही एक महत्त्वाचा भाग आहे. या उद्योगात काम करणारे कामगार बहुतांशी ग्रामीण भागांतून आलेले असतात. त्यांचे प्रश्न जाणून घेणे, त्यांच्याशी संवाद साधणे, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न करणे या सर्व गोष्टी आव्हानात्मक आहेत. याकरता मनुष्यबळ विकास व व्यवस्थापन यातील आधुनिक तंत्रे शेतीवषयक उत्पादनातील उद्योगांमध्ये कशा पद्धतीने वापरता येतील असा विचार करणे हाही अभ्यासक्रमाचाच एक भाग आहे. थोडक्यात असे म्हणता येईल की, व्यवस्थापनातील वेगवेगळे विभाग आणि त्यांची कामे म्हणजे विपणन (मार्केटिंग), वित्त (फायनान्स), मनुष्यबळ विकास व व्यवस्थापन (ह्युमन रिसोर्स, डेव्हलपमेंट व मॅनेजमेंट), उत्पादन व्यवस्थापन (प्रॉडक्शन मॅनेजमेंट). या सर्वाचा वापर या उद्योगांमध्ये कसा करता येईल हे या विषयाच्या अभ्यासातून जाणून घेता येते.

देशातील ग्रामीण विभाग आणि अर्थातच शेती विभाग यांचा विकास होण्याकरता प्रशिक्षित मनुष्यबळाची अत्यंत गरज आहे. इतर क्षेत्रांप्रमाणेच याही स्पेशलायझेशनमध्ये अनेक उत्तम करिअर संधी आहेत आणि भविष्यात त्या अधिक वाढतील. मात्र, त्याकरता आपला या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक व्हायला हवा.

क्रमिक अभ्यासाला प्रात्यक्षिकाची जोड दिल्यास  यासंबंधीच्या विविध घटक-उपघटकांमधील करिअरमध्ये भक्कम पाय रोवणे सहजशक्य आहे.

कृषी आधारित उद्योग साखर उद्योग : दुय्यम उत्पादने : कापड उद्योग : रेशीम उद्योग : मत्स्यव्यवसाय : साखर उद्योग :

कृषी आधारित उद्योग
साखर उद्योग :
दुय्यम उत्पादने :
कापड उद्योग :
रेशीम उद्योग :
मत्स्यव्यवसाय :
साखर उद्योग :

महाराष्ट्रात साखर उद्योग हा कृषीआधारीत असा प्रमुख उद्योग मानला जातो. ग्रामीण भागातील सुमारे अडीच कोटी लोकांचे जीवन साखर उद्योगावर अवलंबून आहे. साखरेतून महाराष्ट्राला सुमारे २२०० कोटी रूपयांचा महसूल प्राप्त होतो. एका साखर कारखान्यामुळे ऊस लागवडीपासून साखर बाजारपेठेत पोहोचेपर्यंत सर्व प्रकारच्या प्रकियांमध्ये ५००० लोकांना थेट रोजगार उपलब्ध होतो. या आकडेवारीवरून महाराष्ट्रातील साखर उद्योगाचे स्थान अधोरेखीत होते. राज्यात एकूण २०२ नोंदणीकृत साखर कारखाने असून (यांमधील काही आजारी व बंद) त्यामधून वर्षाला सुमारे १२००० कोटींची उलाढाल होते. साखरेच्या उत्पादनात दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढ होत असून २००७ साली सुमारे ८५० लाख टन एवढे साखरेचे विक्रमी उत्पादन झाले.
महाराष्ट्रातील सहकारी साखर कारखान्यांना ६० वर्षांची परंपरा आहे. अहमदनगर जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना स्थापन करणारे डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील, ज्येष्ठ सहकार तज्ज्ञ धनंजयराव गाडगीळ, वसंतदादा पाटील, तात्यासाहेब कोरे आदी अनेक लोकांच्या योगदानातून महाराष्ट्रातील ‘सहकार’ क्षेत्र आकाराला आले आहे.
राज्यात सहकारी साखर कारखाना हा केवळ उद्योग राहिलेला नाही, तर ती एक ‘चळवळ’ बनलेली आहे. या चळवळीतून औद्योगिक विकास तर झालाच, शिवाय महाराष्ट्राला अनेक स्तरांवरील सामाजिक व राजकीय नेतृत्वही यांतून प्राप्त झाले. साखर कारखान्यांच्या आसपासच्या परिसरातील मूलभूत सोयी सुविधांचा विकास झपाट्याने झाला. साखर कारखान्याला जोडूनच शिक्षण संकुल उभारण्याची परंपरा महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. कारखान्यांमार्फत विविध पाटबंधारे योजना, लिफ्ट इरिगेशनसारख्या विकासाच्या योजना राबविल्या जात असून शाळा, महाविद्यालये, दवाखाने यांसारख्या कल्याणकारी संस्था स्थापन केल्या गेल्या आहेत. त्यामुळे औद्योगिक विकासाबरोबरच शैक्षणिक व सामाजिक विकासही साधला गेला आहे.

दुय्यम उत्पादने :

कारखान्यातून साखरेव्यतिरिक्त इतर दुय्यम उत्पादने निर्माण होतात. सुमारे १०० टन ऊस गाळप केल्यास त्यापासून अंदाजे २८ ते ३० टन उसाचे चिपाड, ४ टन मळी, ३ टन गाळलेली राड व सुमारे ०.३ टन भट्टी राख हे घटक बाहेर पडतात. ही दुय्यम उत्पादने इतर उद्योगांचा कच्चा माल ठरतात.

महाराष्ट्र : ऊस व साखर उत्पादन

वर्षउसाचे क्षेत्र (००० हेक्टर)उत्पादन टन (हेक्टरी)साखर उत्पादन (लाख टन)साखर उतारा (%)साखर कारखाने(संख्या)
१९८०-१९८१२५६९२.००२८.८५११.०७८२
१९९०-१९९१४४०९६.५२४१.१७१०.७६१०२
२०००-२००१५९०५७६६७.२११.७१४०
२००१-२००२उपलब्ध नाही.४८०५५.८११.२*१२७
२००२-२००३उपलब्ध नाही.५३४६२.०उपलब्ध नाही.१५९
(ऊस उत्पादन (लाख टन) * १३ कारखाने अवसायनात , १९९९-२००० ची आकडेवारी)
(संदर्भ : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे पुस्तिका व महाराष्ट्र टाइम्स वार्तापत्र)

राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाबरोबरच संबंधित मद्यार्क, रसायने, कागद यांसारख्या उत्पादनांवरही लक्ष केंद्रित केले आहे. राज्यातील ६ साखर कारखान्यांनी उसाच्या चिपाडापासून, तर दोन कारखान्यांनी जैविक वायूवर आधारित वीजेची सहनिर्मिती सुरू केली आहे.
राज्यातील साखर कारखान्यांनी गोबर गॅस संयंत्रे बांधणे, विहिरी खोदणे, शौचालये बांधणे, पशुखाद्य तयार करणे, कुक्कुटपालन, फळबागांची लागवड आदी उपक्रमांना, उद्योगांना उत्तेजन देऊन ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासास हातभार लावला आहे.

कापड उद्योग :

महाराष्ट्रात आधुनिक पद्धतीने कापड उद्योगाला १५० वर्षांपूर्वी सुरुवात झाली. राज्यातील पहिली कापड गिरणी १८५४ मध्ये मुंबई येथे सुरू झाली, ही देशातील पहिली कापड गिरणी समजली जाते.
मुंबई हे महाराष्ट्रातील कापड उद्योगाचे सर्वांत मोठे केंद्र आहे. समुद्र जवळ असल्यामुळे तेथील दमट हवामान कापडाच्या निर्मितीसाठी पोषक आहे. त्यामुळे तेथे कापड उद्योगाचे मोठ्या प्रमाणावर केंद्रीकरण झाले आहे. त्याचबरोबर नाशिक, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, नागपूर या ठिकाणी विशिष्ट प्रकारच्या कापडाचे उत्पादन केले जाते. उदा. येवला (नाशिक) येथील पैठणी, पितांबर तसेच सोलापूर येथील चादरी, नागपुर येथील सूती कापड इत्यादी. तसेच हातमाग व यंत्रमागासाठी इचलकरंजी (कोल्हापूर) व मालेगाव (नाशिक) ही केंद्रे देखील प्रसिद्ध आहेत.

पशुधन   :

महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेत पशुधनाला विशेष स्थान आहे. गाय, म्हैस, बैल, शेळ्या, मेंढ्या, कोंबडी या प्राण्यांचे ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये मोलाचे स्थान आहे. सन २००७-०८ मधील कृषी क्षेत्राच्या स्थूल राज्य उत्पन्नात या क्षेत्राचा हिस्सा सुमारे २४% होता. राज्यात दर चौ. कि. मी. मागे पशुधनाची घनता १२० होती (२००७ च्या पशुगणनेनुसार). शेतीपूरक उद्योगांमध्ये दुग्ध-व्यवसाय हा प्रमुख व्यवसाय मानला जातो. महाराष्ट्रात शेतकर्‍यांनी दुग्ध व्यवसाय हा शेतीपूरक व्यवसाय म्हणून स्वीकारल्यामुळे वर्षभर उत्पादन व रोजगाराचे साधन निर्माण झाले आहे. राज्यातील सुमारे ६५% शेतकरी शेतीबरोबर दुग्धव्यवसाय करतात. महानंद, गोकूळ, वारणा आदी अनेक दुग्ध व संबंधित उत्पादनांचे मोठे प्रकल्प महाराष्ट्रात कार्यरत आहेत. उत्पादन, प्रक्रिया, वाहतूक व पशुपालन या माध्यमातून लाखो लोकांना रोजगार देणारे हे क्षेत्र आहे.

पशुधन व कुक्कुट उत्पादन

उत्पादनपरिमाण२००६-०७
२००७-०८*शेकडा वाढ
दूध००० मे. टन६,९७८७,१८७३.०
अंडीकोटी३४०३५१३.२
मांस००० मे. टन२४३२५०२.९
लोकरलाख कि. गॅ.१६.६७१६.९६१.७
(* अस्थायी)
२००६-०७ मधील कृषी क्षेत्राच्या स्थूल राज्य उत्पादनात पशुधनाचा हिस्सा सुमारे २१ % होता.
२००३ च्या पशुगणने नुसार महाराष्ट्रातील पशुधन हे सुमारे ३.७१ कोटी इतके होते.

रेशीम उद्योग :

राज्यातील हवामान रेशीम उद्योगास अनुकूल असून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मितीसाठी या उद्योगाच्या विकासास राज्यात भरपूर वाव आहे. देशात अपारंपरिक पद्धतीने रेशीम उत्पादनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर असून एकूण रेशीम उत्पादनात ५ व्या स्थानावर आहे. राज्यातील २३ जिल्ह्यात तुती रेशीम विकास कार्यक्रम राबवला जात असून विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या चार जिल्ह्यांमध्ये टसर रेशीम विकास प्रकल्प राबवला जात आहे.

मत्स्यव्यवसाय :

महाराष्ट्राला कोकण किनारपट्टी लाभली आहे. सुमारे ७२० कि. मी. चा सागरी किनारा लाभला आहे. यामुळे सागरी मासेमारी हा कोकणचा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. डहाणू, माहीम, वसई, वर्सोवा, अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन, दाभोळ, रत्नागिरी, शिरोड, हर्णै, वेंगूर्ला ही किनार्‍यावरील महत्त्वाची केंद्रे आहेत. सुरमई, पापलेट, कोळंबी, बांगडी, सावस, हलवा अशा अनेक जातींचे मासे कोकण किनारपट्टीवर आढळतात.याशिवाय राज्यातील नद्या, तलाव व धरणांच्या जलाशयांमध्येही गोड्या पाण्यातील मासेमारी चालते. अन्न म्हणून माशांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्याचबरोबर तेलनिर्मिती, खतनिर्मिती, सौंदर्यप्रसाधने निर्मिती या उद्योगांमध्येही माशांचा वापर केला जातो. राज्यात ९.१२ लाख चौ. कि. मी. क्षेत्र सागरी, ३.०१ लाख हेक्टर क्षेत्र गोड्या पाण्यातील व ०.१९ लाख हेक्टर क्षेत्र निमखार्‍या पाण्यातील मासेमारीस योग्य आहे. महाराष्ट्रातील मत्स्य उत्पादनाचा तक्ता पुढे देत आहोत.

मत्स्यव्यवसाय क्षेत्राच्या महत्त्वाच्या बाबींची माहिती

घटकपरिमाण २००८-०९२००७-०८*२००६-०७
एकूण मत्स्य उत्पादन
सागरीलाख मे. टन ३.६४.१४.६
गोड्या पाण्यातीललाख मे. टन १.०१.३१.३
एकूण४.६५.४५.९
मत्स्य उत्पादनाचे एकूण मूल्य
सागरीरु. कोटीत उ. ना.१,५०६
१,४२३
गोड्या पाण्यातीलरु. कोटीत उ. ना.७५५६२२
एकूणउ. ना.२,२६१२,०४५
मत्स्य उत्पादनाची निर्यात
अ) मात्रालाख मे. टन ०.५१.०१.४०
ब) मूल्यरु. कोटीत ६८६१,२३७१,३४७
सागरी मच्छिमारी बोटीसंख्या २७,८१२२६,१९५**२४,६४४
यापैकी यांत्रिकीसंख्या १४,४६९१४,६६६**१४,५५४
मासे उतरविण्याची केंद्रेसंख्या १८४१८४**१८४
(* डिसेंबर, २००७ पर्यंत, ** अस्थायी, उ. ना. - उपलब्ध नाही.)

-------------------------------------------------------------------------------------------------

शेतीवर आधारित व्यवसायांची यादी

स्वतंत्र शेती व्यवसाय
भाजीपाला शेती
रेशीम कीटक पालन / रेशीम शेती
फुलशेती
दूध उत्पादन
मशरूम उत्पादन
गांडूळ खत उत्पादन
मधमाशी पालन
औषधी वनस्पतींची लागवड
वेअर हाउस
बियाणे उत्पादन आणि मार्केटिंग
बोटॅनिकल कीटकनाशक उत्पादन
पीठ दळणे आणि पॅकिंग युनिट
लँडस्केप तज्ञ
हायड्रोपोनिक शेती उपकरणे वितरक
आधुनिक नर्सरीची स्थापना आणि व्यवस्थापन
ग्रीन हाऊस तंत्रज्ञान
इत्यादी….
शेती व्यवसायाचे काही वेगळे घटक
प्रोडक्शन रिसोर्सेज/ उत्पादक संसाधने (Productive Resources)
शेतीमाल (Agricultural Commodities)
सुलभ सेवा (Facilitative Services)
कमी खर्चात शेतीसोबत जोड धंदा म्हणून शक्य असणारे व्यवसाय
खतांचा व्यवसाय (Fertilizer business)
जट्रोफा लागवड (Jatropha Cultivation)
पल्स मिल व्यवसाय (Pulse mill business)
काजू प्रोसेसिंग यूनिट (Cashew Processing Unit)
रजनीगंधा फुलशेती (Rajnigandha farming)
लाकडाची शेती (Wood Farming)

महाराष्ट्रातील पर्यटन

___महाराष्ट्रातील पर्यटन
tourism

महाराष्ट्र राज्य हे ऐतिहासिक, धार्मिक, भौगोलिक, वैद्यकीय पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी देशाच्या विविध प्रांतांतून चार कोटी आणि परदेशांतून सुमारे २० लाख पर्यटक महाराष्ट्रात येतात. मुंबई, अजिंठा आणि वेरूळ यांना परदेशी पर्यटकांची पहिली पसंती असते. [१] परदेशी पर्यटकांत १९९० पासून शैक्षणिक कारणासाठी आणि २००० पासून वैद्यकीय उपचारांसाठी येणा-जाणाऱ्यांचे प्रमाण वाढीस लागले.

एलीफंटा लेणी
देशांतर्गत आणि राज्यांतर्गत पर्यटनामध्ये धार्मिक कारणाने होणाऱ्या पर्यटनाचे प्रमाण सर्वात जास्त आहे.

महाराष्ट्रातील पर्यटनाचा इतिहास
संपादन करा
महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक परंपरेचा महान वारसा लाभला आहे. सातवाहनांच्या काळातील कैलास लेणी, शिव मंदिरे; मराठ्यांच्या काळातील गडकिल्ले (दुर्ग) विशेषतः त्यांतील जलदुर्ग,की जे महाराष्ट्राशिवाय इतर कोठेही सापडत नाहीत तर पेशवा काळात तयार झालेले भुईकोट किल्ले इत्यादींनी महाराष्ट्र राज्याला समृद्ध केले आहे.

मुंबई
संपादन करा
मुंबई शहर

कोकण
संपादन करा
रायगड
संपादन करा
रायगड किल्ला, मुरुड-जंजीरा किल्ला, माथेरान, घारापुरी लेण्या, पाली, महड, अलिबाग, श्रीवर्धन, दिवेआगर, हरीहरेश्वर

रत्‍नागिरी
संपादन करा
रत्‍नागिरी, दापोली, गुहागर, गणपतीपुळे, मार्लेश्वर, राजापूर माचाळ चिपळूण

सिंधुदुर्ग
संपादन करा
विजयदुर्ग किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला, मालवण, वेंगुर्ला, आंबोली

धार्मिक स्थळे
संपादन करा
खानदेश
संपादन करा
प्रकाशे (नंदुरबार), मुडावद (धुळे),

जळगाव जिल्हा :- प्रती पंढरपूर(वाडी) व राममंदिर अमळनेर, पद्मालय एरंडोल आणि चांगदेव मुक्ताई मंदिर मुक्ताईनगर, पाटणादेवी चाळीसगाव

नाशिक
संपादन करा
पंचवटी (नाशिक), त्र्यंबकेश्वर, वणी, मांगीतुंगी

अहमदनगर
संपादन करा
शिर्डी, शनी-शिंगणापूर, सिद्धटेक

पश्चिम महाराष्ट्र
संपादन करा
भीमाशंकर, देहू, आळंदी, जेजुरी, मोरगाव, रांजणगाव, थेऊर, लेण्याद्री, ओझर (पुणे)

शिखर शिंगणापूर (सातारा), औदुंबर (सांगली),

कोल्हापूर, ज्योतिबा, नरसोबाची वाडी, कुंभोज (कोल्हापूर)

अक्कलकोट, पंढरपूर (सोलापूर)

मराठवाडा
संपादन करा
वेरुळ, पैठण (औरंगाबाद),

परळी वैजनाथ (बीड), औंढा नागनाथ (हिंगोली), तुळजापूर (उस्मानाबाद),

नांदेड, माहूर (नांदेड) बीड

विदर्भ
संपादन करा
शेगाव (बुलढाणा), कारंजा (वाशिम) नांदुरा (बुलढाणा) येथे १०५ फुट उंच हनुमानजीची अति सुंदर भव्यदिव्य मुर्ति व सुंदर दाक्षिणात्य कलाकुसरीचे भव्य बालाजी मंदीर

ऐतिहासिक ठिकाणे
संपादन करा
अहमदनगर, सातारा, कोल्हापूर, नागपूर, वर्धा

पुणे शहर शनिवार वाडा, लाल महाल, कसबा गणपती, दगडूशेठ गणपती, सारस बाग, पर्वती मंदिर व संग्रहालय, कात्रज सर्पोद्यान व प्राणी संग्रहालय, केळकर संग्रहालय, कस्तुरबा पॅलेस व म्युझियम, बालगंधर्व रंगमंदिर, संभाजी गार्डन, जैन मंदिर कात्रज

पुणे परिसर खडकवासला धरण, सिंहगड, पानशेत व वरसगाव धरण, निळकंठेश्वर, थेऊरचा गणपती, बोलाई देवी

मुळशी तालुका:- मुळशी धरण, पळसे धबधबा, कोळवडे मसोबा, लवासा सिटी, हाडशी साईबाबा मंदिर

मावळ तालुका :- प्रतिशिर्डी सोमटणे फाटा, भाजे लेण्या, एकविरा मंदिर व कार्ले लेण्या, खंडाळा घाट,

पुरंदर तालुका :- कानिफनाथ मंदिर, प्रती बालाजी केतकावळे, पुरंदर किल्ला नारायणपूर दत्त मंदिर, जेजुरी, मयुरेश्वर मोरगाव,

जुन्नर तालुका :- ओझर, लेण्याद्री, शिवनेरी किल्ला खोडद दुर्बिन

निसर्ग पर्यटन
संपादन करा
खानदेश
संपादन करा
तोरणमाळ (नंदुरबार), पाटणादेवी परिसर चाळीसगाव,

नाशिक
संपादन करा
इगतपुरी, नांदूर मध्यमेश्वर पक्षी अभयारण्य

अहमदनगर
संपादन करा
भंडारदरा, हरिश्चंद्रगड, कळसूबाई शिखर,

रांजणखळगे (निघोज),

रेहेकुरी काळवीट अभयारण्य

पश्चिम महाराष्ट्र
संपादन करा
लोणावळा (पुणे),

महाबळेश्वर, कास पठार (सातारा),

पन्हाळा, राधानगरी (कोल्हापूर)

विदर्भ
संपादन करा
लोणार (बुलढाणा), चिखलदरा (अमरावती)

सह्याद्री रांगेतील घाटरस्ते
संपादन करा
कसारा घाट (नाशिक - मुंबई)

माळशेज घाट (अहमदनगर - कल्याण)

कन्नड घाट (औरंगाबाद-दौलतबाद किल्ला-वेरूळलेण्या-पितळखोरा लेण्या (कालीमठ) कन्नडघाट-चाळीसगाव-धुळे)

भोर घाट (पुणे - मुंबई)

खंबाटकी घाट (पुणे - सातारा)

ताम्हिणी घाट (पुणे - माणगाव)

वरंधा घाट (भोर - महाड)

कशेडी घाट (महाड - दापोली)

कुंभार्ली घाट (कराड - चिपळूण)

आंबा घाट (कोल्हापूर - रत्‍नागिरी)

फोंडा घाट (कोल्हापूर - कणकवली)

करुळ घाट (कोल्हापूर - वैभववाडी)

आंबोली घाट (कोल्हापूर - गोवा)

लेण्या, प्राचीन मंदिरे, ऐतिहासिक वास्तू
संपादन करा
नाशिक
संपादन करा
गोंदेश्वर मंदिर, सिन्नर

अहमदनगर
संपादन करा
चांदबीबीचा महाल (अहमदनगर)

पश्चिम महाराष्ट्र
संपादन करा
शनिवार वाडा, केसरी वाडा, आगाखान पॅलेस, पाताळेश्वर लेण्या (पुणे)

कोपेश्वर महादेव मंदिर, खिद्रापूर (कोल्हापूर),

मराठवाडा
संपादन करा
बिबी का मकबरा, पाणचक्की, अजिंठा लेण्या, वेरुळ लेण्या, खुलताबाद (औरंगाबाद)

पायाभूत सुविधांचा अभाव आणि अडचणी
संपादन करा
१९९० नंतर दळणवळण आणि रस्ते विकासाला महाराष्ट्रात चालना मिळाली. पर्यटकांसाठी खाजगी वाहतूक कंपन्या पुढे आल्या. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सेवेतही सुधारणा झाली, बीओटी (बांधा-चालवा- हस्तांतरित करा) तत्त्वावर रस्ते सुधारण्याचेही काम झाले; तरी सुद्धा प्रत्यक्ष पर्यटनास निघालेल्या व्यक्तीस स्वच्छ, सुयोग्य दरात दर्जेदार सेवा देतील अशा हॉटेल्सचा अभाव, नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्यासाठीचा सर्वसाधारण अनाग्रह, परभाषक आणि परदेशी पर्यटकांशी केली जाणारी गैरवर्तणूक आणि सभ्य नागरिकांची या विषयीची उदासीनता,[२] आत्यंतिक लोकसंख्येमुळे पर्यटन स्थळांचे गर्दीच्या ठिकाणांत झालेले रूपांतर इत्यादी बाबी, महाराष्ट्रात निव्वळ पर्यटन उद्देशाने येणाऱ्या परकीय पर्यटकांच्या दृष्टीने गोवा, केरळ, राजस्थान या इतर भारतीय राज्यांच्या तुलनेत नकारात्मक ठरतात.[ संदर्भ हवा ]

ग्रामीण पर्यटनाच्या दृष्टीने दिवाबत्तीची सोय, पिण्याचे पाणी, डास आणि उंदरांचे निराकरण, सार्वजनिक ठिकाणची वैयक्ति स्वच्छतेच्या अल्पसुविधा, एकूण अस्वच्छता, प्रवासी बसेसची स्थानकांवरील आणि रेल्वे स्टेशनवरील अस्वच्छता, कुत्री, डुकरे आणि जनावरांचा अयोग्य पद्धतीने वावर, राहाण्याच्या जागेची अस्वच्छता, उपाहारगृहांतील अनारोग्यकारक पदार्थ आणि वातावरण, सेवादात्यांमध्ये व्यावसायिकतेचा, संवाद कौशल्याचा आणि सौजन्याचा अभाव इत्यादी अडचणी आढळून येतात.[ संदर्भ हवा ]. पाश्चिमात्य पोशाखपद्धतीबद्दल बाळगलेला कुत्सित नकारात्मक दृष्टिकोणही[ संदर्भ हवा ] क्वचित दिसतो.

थंड हवेची आणि पावसाळी ठिकाणे
संपादन करा
मुंबईपासूनची अंतरे:

आंबोली - ५४९ किमी
खंडाळा - १०० किमी
चिखलदरा - ७६३ किमी
जव्हार - १८० किमी
तोरणमाळ - धुळ्यापासून ४० किमी
पुणे - १७० किमी
पन्हाळा - ४२८ किमी
पाचगणी-
भंडारदरा - १८५ किमी
महाबळेश्वर - २५६ किमी
माथेरान - १११ किमी
म्हैसमाळ - औरंगाबादहून ४० किमी
लोणावळा - १०४ किमी
कास सातारा
अभयारण्ये
संपादन करा
मुंबई
संपादन करा
संजय गांधी नॅशनल पार्क (मुंबई)
तानसा (ठाणे)
कोकण
संपादन करा
फणसाड, कर्नाळा (रायगड)
मालवण (सिंधुदुर्ग)
खानदेश
संपादन करा
अनेर (धुळे)
यावल, गौताळा औट्रमघाट (जळगांव)
अहमदनगर
संपादन करा
कळसूबाई, देऊळगाव रेहेकुरी, माळढोक
पश्चिम महाराष्ट्र
संपादन करा
भिमाशंकर (पुणे, ठाणे)
कोयना (सातारा)
चांदोली (सांगली, कोल्हापूर)
सागरेश्वर (सांगली)
राधानगरी (कोल्हापूर)
नानज (सोलापूर)
मराठवाडा
संपादन करा
जायकवाडी (औरंगाबाद)
विदर्भ
संपादन करा
नवेगांव-नागझिरा (भंडारा)
पेंच (नागपूर)
पैनगंगा (यवतमाळ, नांदेड)
बोर (वर्धा)
मेळघाट, ढाकणा कोळकाज (अमरावती)
किनवट (यवतमाळ)
ताडोबा राष्ट्रीय उद्यान, मधमेश्वर (चंद्रपूर)
चापराला (गडचिरोली)
राखीव मृगया क्षेत्र
संपादन करा
टिपेश्वर - यवतमाळ
मायणी - सातारा
मालखेड - अमरावती
महाराष्ट्राच्या इतर प्रदेशातील पर्यटन
संपादन करा
उदगीर किल्ला, हत्तीबेट, सोमनाथपूर (लातूर)

चित्रदालन
संपादन करा

Kailash Temple in Ellora Caves

Elephanta Caves

Ajanta Caves

Temple corridor of the Pataleshwar cave temple, built during the Rashtrakuta Empire.

Bibi Ka Maqbara

Hazur Sahib Nanded, 2nd holiest site in Sikhism

Chhatrapati Shivaji Terminus

Taj Mahal Palace & Tower

Nariman Point and Cuffe Parade

BMC

Rajabai Clock Tower at the University of Mumbai

Shaniwarwada

Gateway of India

Flora Fountain

Deekshabhoomi

Devgad Beach, Sindhudurg district

Tadoba Andhari Tiger Reserve is famous for Jungle safari

Bhimashankar Temple in Pune district is one of twelve Jyotirlinga

Famous Tulja Bhavani Temple of Tuljapur town of Osmanabad District.

Migratory birds at Jayakwadi Dam, the main source of water for Marathwada.

Grishneshwar Jyotirlinga in Aurangabad district.

A view of Parli Vaijnath Temple, Beed District.

The Haji Ali Mosque was built in 1431, when Mumbai was under Islamic rule.[३]

Daulatabad (Deogiri) Fort

Mula and Mutha rivers

1 st century BCE Pandavleni Caves in Nashik

____________________________

पर्यटन
मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास

पर्यटनशास्त्र (Tourism) :-पर्यटन ही संज्ञा प्रवास (Tour) या शब्दाशी संबंधित आहे आणि प्रवास (Tour) हा शब्द लॅटिन भाषेतील 'Tornos' या शब्दापासून आलेला आहे. Tornos शब्दाचा मूळ अर्थ 'वर्तुळ' किंवा 'वर्तुळाकार' असा आहे. याच शब्दापासून पुढे 'वर्तुळाकार प्रवास' किंवा पॅकेज टूर्स हा शब्द रुढ झाला.

एका व्यक्तीने किंवा व्यक्ती समूहाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मनोरंजनासाठी, अभ्यासासाठी, कामासाठी केलेला प्रवास म्हणजे पर्यटन होय.

मनोरंजन, फुरसत किंवा कामासाठी केलेला प्रवास म्हणजेच पर्यटन. जागतिक पर्यटन संस्था (World Tourism Organization) ही 'जे लोक प्रवास करून आपल्या परिसराबाहेरील जागी जाऊन सलग १ वर्षापेक्षा कमी काळ मनोरंजन, काम वा इतर कारणांसाठी रहातात ते' अशी पर्यटकांची व्याख्या करते.[१]

पर्यटन हे फुरसतीचा वेळ घालविण्याचे एक साधन म्हणून जगभरात अतिशय लोकप्रिय झाले आहे. २००० च्या शतकाच्या अखेरीस आलेल्या जागतिक मंदीने व H1N1 फ्लूच्या साथीने २००८ च्या मध्यापासून ते २००९ च्या अखेरपर्यंत रोडावलेल्या पर्यटनाला परत बरे दिवस आले असून २०१२ मध्ये जागतिक पर्यटकांच्या संख्येने १०० कोटीचा पल्ला इतिहासात पहिल्यांदा ओलांडला. आंतरदेशीय पर्यटन उत्पन्न (आंतरदेशीय देणे जमाखात्यातले पर्यटनावरचे उपखाते) २०११त १.०३ लाख कोटी अमेरिकन डॉलर (७४ हजार कोटी युरो) इतके वाढले. ते २०१० च्या तुलनेत ३.८% अधिक होते. २०१२त चीन जगातील पर्यटनावर सर्वात जास्त खर्च करणारा देश बनला आणि त्याने अमेरिका व जर्मनी यांना त्याबाबतीत मागे टाकले. चीन व उदयोन्मुख राष्ट्रे (रशिया व ब्राझील ठळकपणे) ह्यांचा पर्यटनावरचा खर्च गेल्या दशकात लक्षणीय वाढला आहे.[२]

==शब्देतिहास==maharashtatil praytan thale

इतिहास
संपादन करा
अतिप्राचीन काळापासून प्रवास ही मनुष्यप्राण्याची सहज प्रवृत्ती आहे. प्राचीन काळातील प्रवासाच्या पद्धती व संकल्पना या आजच्या काळातील प्रवास पद्धती व संकल्पना यापेक्षा वेगळया आहेत. प्राचीन काळी प्रवासाचा उद्देश नवीन प्रदेशचा शोध घेणे, व्यापार करणे व धार्मिक स्थळांना भेट देणे हा होता. हे प्रवासी व व्यापारी विविध भूप्रदेश, देश व राज्यातून प्रवास करत असत. त्यामुळे विविध राज्यांच्या राजधान्या, शहरे, बंदरे, बाजारपेठांची केंद्रे, व्यापारी मार्ग यांचा त्यांच्याषी संबंध येत असे. हा प्रवास व व्यापार यांतून विविध मानवी समूह, संस्कृती यांची परस्पर ओळख झाली. अनेक गोष्टीची देवाण घेवाण झाली. एकमेकांच्या समाजजीवनाचे आकलन झाले. प्रवास व पर्यटनाच्या वाढीसाठी या बाबी अनुकूल ठरल्या. मध्ययुगात व्यापाÚयांच्या प्रवासाच्या पद्धतीत बदल झाले. आनंद मिळविण्यासाठी, मनोरंजनासाठी प्रवास ही संकल्पना प्रथम युरोपातील रोमन लोकांनी रूजवली. रोमन साम्राज्याच्या काळात तेथील लोक इजिप्तमधील पिरॅमिड्स, ग्रीसमधील अथेन्स व स्मार्टा या नगरांची भव्य नगररचना, तेथील देव देवतांची मंदिरे, मूर्ती, तेथील क्रीडांगणे पाहण्यासाठी जात. पुढे युरोपमधील पुनरूज्जीवनामुळे जगभरातील वसाहतींचा व साम्राज्याचा विस्तार, औद्योगिक क्रांती व यातून युरोपमध्ये सुरू झालेला संपत्तीचा ओघ यांमुळे तेथे पर्यटनही श्रीमंतांची मक्तेदारी न राहता मध्यम वर्गसुद्धा पर्यटनात सहभागी झाला. त्यात धर्मप्रसारक, विद्वान, लेखक, कवी व व्यापारी यांचा समावेश होता. युरोपियन पर्यटकांनी आधुनिक पर्यटनाचा पाया घातला.

महापर्यटन (Grand Tour)
संपादन करा
फुरसतीच्या पर्यटनाचा उदय
संपादन करा
पर्यटन म्हणजे दैनंदिन प्रवासाव्यतिरिक्त किंवा कामाव्यतिरिक्त केलेला प्रवास.

कामातून सुट्टी मिळाली की त्यानुसार आनंद, मौज करीत निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी केलेले नियोजनबद्ध पर्यटन म्हणजे फुरसतीचे पर्यटन होय.

समुद्री पर्यटन

आधुनिक पर्यटन

उद्देश : १. पर्यावरण जतन २. पुरातन वस्तूंची हानी न करणे

हिवाळी पर्यटन
संपादन करा
भारतीय पर्यटनाचा इतिहास हा हजारो वर्षो जुना आहे. हजारो वर्षापासून भारतीय उपखंडात लोक तीर्थक्षेत्रIन्ना भेट देण्याकरीता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरत आलेत. भारतीय ग्रंथात सुद्धा याचे पुरावे भेटतात ज्यात, पंढरीची वारी, कुंभमेळा यांचे संदर्भ वाचण्यास मिळतात. तसेच इंग्रजांनी जेव्हा भारतावर राज्य केले तेंव्हा त्यांचा दोन राजधानी असत, हिवाळी राजधानी आणि उन्हाळी राजधानी. इंग्रज उन्हाळ्यात महाबळेश्वरला, शिमला, कश्मीर, उटी, म्हेसूर अशा ठिकाणी राहाण पसंत करत. इंग्रज हे राज्यकर्ते होते आणि त्यांचाकडे कामासाठी किवां निगराणी साठी भारतातील काही राजे महाराजे किवा अधिकारी होते, ज्यांना कामानिम्मित इंग्रजांचा माघे त्या त्या ठिकाणी जावे लागे. भारताला स्वातंत्र्य मिळाले इंग्रज हा देश सोडून गेले पण त्यांचा मागे येथील श्रीमंत घराणे आणि राजे महाराजे यांना मात्र अशा फिरण्याची चटक लागली आणि स्वतंत्र भारतात फिरण्याची वेगवेगळे प्रदेश बघण्याची इच्छा तर प्रत्येक सामान्य माणसाला होती ती या लोकांना बघून उदयास आली आणि अशा प्रकारे आधुनिक भारता मध्ये हिवाळी पर्यटन उदयास आले.

जनता पर्यटन
संपादन करा
हल्लीचे बदल
संपादन करा
जोपासनाशील पर्यटन
संपादन करा
===प

र्यावरण पर्यटन===

आम आदमी पर्यटन

मंदीतले पर्यटन

आरोग्य पर्यटन

आरोग्य पर्यटनात पर्यटक आल्हाददायक स्वच्छ हवामानात आपल्या प्रकृतीत सुधारणा करण्यासाठी अथवा आहे तशीच ठेवण्याचा प्रयत्‍न करतो. पूर्वी यालाच हवापालट असे म्हणत. लोकमान्य टिळक अशाच कारणासाठी सिंहगडावर जाऊन रहात.

प्रदूषणमुक्त व आल्हाददायक वातावरण व जोडीला निसर्गसौंदर्य असल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, म्हणूनच स्थानिक पर्यटनात पर्यटक जवळच्या शांत निसर्ग संपन्न व सौंदर्याने नटलेल्या परिसरात हवापालटासाठी जातात. अशा पर्यटनात पर्यटक एका आठवड्यापासून ते तीन महिन्यापर्यंत वास्तव्य करतात. उदा० महाबळेश्वर, माथेरान, चिखलदरा, वाई, पाचगणी, इत्यादी गावी जाऊन राहणे.

शैक्षणिक पर्यटन

शैक्षणिक पर्यटन म्हणजे अभ्यासाच्या दृष्टीने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी केलेला प्रवास होय.यामध्ये शैक्षणिक सहली,शैक्षणिक परिषद किंवा संशोधनासाठी देशामध्ये किंवा देशाबाहेर केलेला प्रवास यांचा समावेश होतो.विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या पर्यटनाला जास्त महत्त्व आहे कारण क्षेत्र अभ्यास केल्यामुळे वेगवेगळ्या संकल्पना समजण्यास मदत होते.

इतर पर्यटन प्रकार

एकल पर्यटन ही संकल्पना पश्चिमात्य देशात लोकप्रिय आहे.एकट्याने थोडक्या साहित्यानिशी पर्यटनाला बाहेर पडणे,पर्यटनाचे नियोजन करून अथवा न करता लवचिक धोरणानुसार ठिकठिकाणी पर्यटन करणे.ही प्रमुख संकल्पना या मागे असते.शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरी किंवा व्यवसाय करण्या अगोदर काही काळाचा विश्राम घेऊन तरुण-तरुणी एकट्याने पर्यटनासाठी बाहेर पडतात.या मध्ये अनेक भले-बुरे अनुभव येतात,व जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोन विस्तृत होतो.भारतातही हल्ली या प्रकारचे पर्यटन करणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे.

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...