०६ मे २०२६

भाऊराव पायगौंडा पाटील


(२२ सप्टेंबर १८८७–९ मे १९५९). 


महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक व शिक्षणप्रसारक. सर्व जातिधर्मांच्या गरीब ग्रामीण रयतेला आपल्या भगीरथ प्रयत्नांनी त्यांनी आधुनिक शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. त्यांचे शैक्षणिक व सामाजीक कार्य पाहून गाडगे महाराज (Gadge Maharaj) यांनी त्यांना कर्मवीर पदवी दिली.  ते अण्णा या नावानेही परिचित आहेत.

 जन्म:


कुंभोज (जि. कोल्हापूर) या खेड्यात पायगौंडा व गंगुबाई या जैन दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे मूळ घराणे मूडब्रिदी (जि. दक्षिण कन्नड – कर्नाटक) गावचे. देसाई हे त्यांचे मूळ आडनाव; परंतु पुढे त्यांच्या घराण्याला पाटीलकी मिळाल्याने ते देसाईचे पाटील झालेत. 


शिक्षण:

एतवडे बुद्रुक (जि. सांगली) येथे प्राथमिक शिक्षण घेऊन पुढे ते कोल्हापुरात इंग्रजी सहावीपर्यंत शिकले. राजर्षी शाहूमहाराजांच्या प्रभावाखाली त्यांच्यावर समाजसेवेचे संस्कार झाले. विद्यार्थिदशेतच सातव्या एडवर्ड बादशाहाच्या पुतळ्यास डांबर फासल्याच्या खोट्या आरोपावरून त्यांना तुरुंगवास सोसावा लागला. त्याला कंटाळून आत्महत्या करण्याचा त्यांनी प्रयत्न केला; परंतु पुढे त्यांची सुटका होऊन त्यांनी कोल्हापूर सोडले.


भाऊराव हे ओगले काच कारखान्याचे व पुढे किर्लोस्कर नांगराचे १९१४ ते १९२२ या दरम्यान विक्रेते होते. या काळात ठिकठिकाणी खेड्यांत फिरल्यामुळे जनतेचे दारिद्र्य व शिक्षणाचा अभाव यांची जाणीव त्यांना झाली. 


कार्य:

१९०९ मध्ये दादा जिनप्पा मद्वण्णा यांनी आपल्या काही सहकाऱ्यांसह दूधगाव (जि. सांगली) येथे शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना केली होती. या शिक्षण संस्थेपासून प्रेरणा घेऊन कर्मवीरांनी १९१९ मध्ये कराडजवळील काले या गावी त्यांनी पहिले वसतिगृह काढले (१९१९). तोच रयत शिक्षण संस्थेचा शुभारंभ होता. पुढे १९२४ मध्ये सातारा येथे अस्पृश्यांसह सर्व जातिधर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी वसतिगृह काढले. त्यास राजर्षी शाहू महाराजांचे नाव देण्यात आले. महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांनी या वसतिगृहास १९२७ साली भेट दिली. त्या वेळी गांधीजींनी ‘भाऊराव का कार्यही उनका सच्चा किर्तीस्तंभ है’ अशी कर्मवीरांच्या कार्यांची प्रशंसा केली. तेव्हापासून भाऊराव खादी वापरू लागले व राजकारणापासून दूर राहून शिक्षणाच्या कार्यास त्यांनी पूर्णतः वाहून घेतले. गोरगरीब पण हुशार मुले जेथेजेथे खेड्यापाड्यांत दिसतील, तेथून त्यांना उचलून आणून वसतिगृहात ठेवून पोटच्या पोरांप्रमाणे सांभाळले. त्यांतील काही विद्यार्थांच्या परदेशी शिक्षणाची सोय पालक या नात्याने त्यांनीच केली. ‘स्वावलंबनाने कष्ट करून शिका’, या मंत्राबरोबरच भाऊरावांनी ‘तुम्हास एक वर्षाची तयारी करायची असेल, तर धान्य पेरा आणि शंभर वर्षांची तयारी करायची असेल, तर माणसे पेरा’ हा संदेश दिला.

सत्यशोधक चळवळीशी त्यांचा अत्यंत संस्कारक्षम अशा वयात आलेला निकटचा संबंध. या चळवळीतून बहुजनसमाजाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळावयाची, तर तिचा रोख शिक्षण प्रसाराच्या द्वारा त्या समाजातील अनिष्ट रूढी व अंधश्रद्धा नष्ट करण्याकडे असणे आवश्यक होते. भाऊरावांनी शिक्षणकार्य पतकरून हे साधण्याचा नेटका प्रयत्न केला. या कार्यामुळे विरोधक व सनातनी मंडळींचा रोष होऊन त्यांना जाच सहन करावा लागला. सर्व जातिधर्माचे आजन्म कार्यकर्ते सेवक या संस्थेत तयार झाले.वटवृक्ष हे बोधचिन्ह व स्वावलंबी शिक्षण हे संस्थेचे बोधवाक्य ठरले. भाऊरावांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांनी त्यांच्या कार्यास मनःपूर्वक साथ दिली. महात्मा ज्योतीराव गोविंदराव फुले (Mahatma Jyotirao Govindrao Phule) व राजर्षी शाहू महाराज (Rajarshi Shahu Mharaj) यांची शिक्षणाप्रसाराची इच्छा त्यांनी पूर्ण केली. ते सत्यशोधक समाज (Satyashodhak Samaj) याचे एक महत्त्वाचे सदस्य होते. पुणे विद्यापीठाने त्यांना ‘डी. लिट्.’ ही सन्मान्य पदवी अर्पण केली. 


निधन:

भाऊराव यांचे हृदयविकाराने पुणे येथे निधन झाले.

सयुक्त पूर्वपरीक्षा चा अभ्यास कसा करावा?

पूर्व परीक्षा (थोडक्यात)

 

 स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करताना आपल्या मनात खूप गोष्टी आश्वासक पणे भरलेल्या असतात...लायब्ररी  मधे बसुन जेव्हा कंटाळा येतो तेव्हा प्रेरणादायी भाषण ऐकून आपन खूप उत्साहित होतो (माझेच भाषण ऐकून प्रेरित होणारे खूप आहेत पण अशी प्रेरणा 4-5 दिवसच  टिकते) तो उत्साह मनापासून यावा लागतो..नुसत inspirational speech बघून पोस्ट निघत नाही त्यासाठी खूप मनापासून कष्ट करावे लागतात.. नुसत घोकंपट्टी किंवा पुस्तके संपवून काही उपयोग नसतो..एकाच टॉपिक साठी 5-6 पुस्तके वापरतो आपन जे की पूर्णपणे चुकीचे आहे..चहाच्या नावाखाली 1-2 तास घालवणे म्हणजे refreshment अशी व्याख्या बनवली आपण..आठवड्यातून एक दिवस सुट्टी fix (पन मित्रांनो परीक्षा ही परीक्षा असते, ती रविवार, दिवाळी, दसरा, जत्रा, गणपती, ऊन,वारा, पाऊस असल काही बघत नसते, ती त्याच दिवशी होते..ONLINE STUDY च्या नावाखाली what's app, फेसबुक जोमात चालू असत. ऑनलाईन अभ्यास करून जास्त फायदा नाही (माझ वैयक्तिक मत आहे) कारण ऑनलाईन अभ्यासाची revision आपल्याकडून होत नाही…

#पूर्व परीक्षा - सर्वप्रथम आपल्या हे लक्षात आले पाहिजे की पूर्व परीक्षा कशासाठी आहे. 4-5 लाख विद्यार्थ्यांमध्ये 300-400 विद्यार्थी निवडायचे म्हणजे पूर्व लाच मोठी चाळण आहे. त्यासाठी पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परिक्षा पेक्षा जास्त लागतो. स्कोर असा आणायचा की merit मधे १० ते १५ मार्क्स जास्त.. पूर्व परीक्षेला topic खूप लिमिटेड असतात आणि फिक्स पण असतात.

#जेव्हा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा अगोदर जुन्या question paper बघणे. आपल जेवढे चुकेल तेवढे लक्षात राहत. . त्यातून कळत काय करायच अणि काही नाही. मधे मधे कंटाळा आला तरी लगेच Question paper किंवा maps उघडायचे.. मी खूप question paper सोडवले, अगोदर आयोगाचे सोडवणे नंतर क्लासेस चे. (पैसे नसतील तर झेरॉक्स कॉपी आणून लायब्ररी मधे बसुन सोडवणे) . जेणेकरून मला पेपर चा पॅटर्न कळायला सोप गेल. एक वेळ वाचन कमी पण प्रश्ण जास्त. 

#उदाहरणार्थ - आधुनिक भारत आणि महाराष्ट्र चा detail अभ्यास करावा लागतो.

#भूगोल - संयुक्त पूर्व साठी साठी महाराष्ट्र आणि भारत या दोन गोष्टींकडे खूप वेळ द्यावा..आणि भूगोल चा अभ्यास करताना नेहमी ATLAS समोर असावा...कंटाळा आला की ATLAS पहायचा म्हणजे bor पण होत नाही... कोरे कागद घेऊन नद्या, पर्वत, ठिकाणे रेखाटत रहायची. Blank नकाशे घेऊन त्यावर पण नुसते marking करायच्या.. त्याने वाचायचा तान कमी होतो..  आपल्या संयुक्त पूर्व साठी महाराष्ट्र पूर्ण फोकस आणि भारत questions बघून करायला हवा. जग आणि फिजिकल चा एवढा उपयोग होत नाही. 

#Polity- संयुक्त पूर्व साठी आपन पूर्ण पुस्तक माहीत असण्यापेक्षा कलम 1 ते कलम 51A यांच्या बरोबरच कलम 52 ते 202 पर्यन्त सविस्तर माहिती, सर्व घटनादुरुस्ती, सर्व भाग अणि सर्व कलमाचे titles माहीत हवेत...पंचायतराज पण महत्वाचा आहे. (म्हणजे 2-3 प्रश्न येतात). आपण किमान निवडख घटक करून ठेवले तर फायदा आहे. या निवडक घटकांवर मी लिस्ट आपल्या The Achiever's Mentorship या टेलिग्राम चॅनल वर दिलेली आहे.

#अर्थशास्त्र - हा विषय बर्‍याच जणांना अवघड, किचकट वाटतो पण out of मार्क्स देणारा आहे हा.. पूर्व साठी खूप लिमिटेड टॉपिक आहेत. आर्थिक विकास (HDI) दारिद्रय़, बेरोजगारी. बॅंकिंग, World trade organization, IMF. world Bank. And some basic concepts like GDP. GNI. etc..


#Science -यामधे biology(human diseases, various systems,) अणि अलीकडे गणिते(mostly based on physics) यावर जास्त भर द्यावा लागेल कारण गेल्या दोन वर्षी पासून त्यावर जास्त question विचारतात. खर तर science खूप मोठा subject आहे पण त्याचे मार्क्स सुद्धा तेवढेच येतात. 14-15 question येतात.. पूर्व परीक्षेत science आणि csat (apti reasoning) या दोन गोष्टींवर मोठे लीड मिळू शकते..



#चालू घडामोडी - हमखास मार्क्स देणारा टॉपिक.. मागच्या एक वर्षातील परिक्रमा आणि कुठलेही 2 पुस्तके म्हणजे कुठल्याही एकाच प्रकाशन च्या मागील दोन आवृत्त्या. (dnyndeep, Unique, अभिनव प्रकाशन) वापरले तर बर्‍यापैकी मार्क्स मिळतात..


आपल्या ला mpsc मधे ज्ञान नाही तर मार्क्स मिळवावे लागतात (पर्सनल ओपिनियन) ..हा वास्तववादी दृष्टिकोन आहे. 

राहिला प्रश्ण गणिताचा तर बर्‍याच लोकांना गणिते अवघड जातात. मला पण खुप अवघड जायचे पण सगळेच गणिते सुटावी अस काही बंधन नाही. 15 पैकी 7-8 reasoning and 7-8 aptitude असतात.. 12 प्रश्न सोडवले तरी एक दोन चुकून देखील जास्त मार्क्स मिळतात. आणि गणित येत नसेल तर रिजनिंग व्यवस्थित सोडवणे 


# जर group discussion करायला जमत असेल तर नक्की करा. कारण दिवसभर अभ्यास करून कंटाळा आला असतो मग discussion मूळे refreshment होत राहते. थोडा फार जोक्स. मस्ती चालू असते पण खूप वेळ नको घालवायला त्यातच. 

मी booklistऑलरेडी अपलोड केली आहे..

शेवटी# MINIMUM READING, MAXIMUM REVISION. हेच परीक्षा पास होण्याच सूत्र आहे.. 

तुम्हाला येणाऱ्या मधील पूर्व परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा. मी BEST LUCK अस म्हणत नाही तर MAKE YOUR LUCK BEST अस म्हणतोय कारण आपल नशीब आपणच घडवू शकतो. 

#Share करा. जर at least 10-12 जणांना तरी याचा फायदा झाला तर मी एवढ टाइप केलेल सार्थक झाल म्हणुन समजेल. 

Thank you. 


युपीएससी परीक्षा म्हणजे नेमके काय ???

संघ लोकसेवा आयोगामार्फत दरवर्षी स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून आय.ए.एस.,आय.पी.एस.,आय.एफ.एस. यांसारख्या किमान १६ प्रकारच्या पदांसाठी परीक्षा घेतली जाते. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रीय तरुण मागे पडतात. याबाबत बऱ्याच वेळा चर्चा होताना दिसते. मात्र वस्तुस्थिती अशी आहे, की गेल्या काही वर्षांपासून संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यशस्वी होणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांची संख्या आता वाढण्यास सुरुवात झाली आहे. २०११ मध्ये संघ लोकसेवा आयोगाने आपल्या परीक्षाप्रणालीत मोठा बदल केला. २०११ पूर्वी परीक्षार्थीला सामान्य अध्ययन पेपरबरोबर एक ऐच्छिक विषयाचा पेपर द्यावा लागत असे. २०११ मध्ये हा पूर्वपरीक्षांचे ऐच्छिक पेपर काढून टाकण्यात आला व त्यासाठी सी सॅटचा पेपर ठेवण्यात आला म्हणजे आता पूर्वपरीक्षेत पेपर १ (२०० गुण) आणि पेपर २ (२०० गुण) हे दोन वेगवेगळे पेपर असतात. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षेचा व संघ लोकसेवा आयोगाच्या पूर्वपरीक्षांचा अभ्यासक्रम तंतोतंत सारखा आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्राचा भूगोलाचा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना या दोन परीक्षांसाठी स्वतंत्र अभ्यास करावा लागत नाही. एम.पी.एस.सी व यू.पी.एस.सी या दोन्ही परीक्षांची तयारी बरोबरच सुरू केली तर या परीक्षांमध्ये यश मिळविणे सोपे होते.

१) अभ्यासाची सुरुवात :  पदवी परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच   या परीक्षेची तयारी सुरू केल्यास फायदेशीर ठरते. मात्र काही कारणांमुळे या काळात अभ्यास करणे शक्य झाले नसल्यास  निराश होण्याचे कारण नाही. पदवीनंतर किमान एक वर्ष काही न करता फक्त या परीक्षेची तयारी करावी.

२) तयारी करताना सर्वप्रथम इ. ५ वी ते १० वी पर्यंत एन.सी.आर.टी.ची पुस्तके व्यवस्थित दोन ते तीन वेळेला वाचून टाकावीत. हा तयारीचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.

३) अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वपूर्ण पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. आधुनिक भारताच्या इतिहासासाठी बिपिनचंद्र, स्वातंत्र्योत्तर भारत – बिपिनचंद्र, भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, भारताचा भूगोल – माजिद हुसन,  जिऑग्री थ्रु मॅप – के. सिद्धार्थ, विज्ञान आणि तंत्रज्ञान – विझार्ड पब्लिकेशन तसेच अर्थशात्रासाठी सर्वप्रथम अर्थशात्राच्या संकल्पना समजून दत्ता आणि सुंदरम किंवा रमेशसिंग यांची पुस्तके वाचावीत. मूलभूत पुस्तकांचेच वाचन तीन ते चार वेळा केल्यास जास्त फायदा होतो.

४) यूपीएससी  व एमपीएससी या दोन्ही परीक्षांच्या पूर्वपरीक्षेसाठी सी सॅट पेपर २ हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे किंबहुना आपण मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार किंवा नाही, हे ठरविणारा हा पेपर आहे. या पेपरच्या बाबतीत मोठा विरोधाभास दिसून येतो. तो म्हणजे जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील, इंजिनीअरिंग शाखेतील आहेत, त्यांना या पेपरची तयारी करणे सोपे जाते. या पेपरमध्ये हे विद्यार्थी सहजतेने पास होताना दिसतात. मात्र जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहे, त्यांना या पेपरची तयारी करणे अवघड जाते. या पेपरच्या संदर्भात त्यांच्या मनात मोठा न्यूनगंड दिसतो म्हणून अशा विद्यार्थ्यांनी वर्षांच्या सुरुवातीपासूनच दिवसांतील काही वेळ या पेपरच्या तयारीस दिल्यास हा पेपर त्यांच्यासाठी देखील सोपा होऊ शकतो. ज्यांच्या मनात गणिताबद्दल भीती बसलेली आहे, त्यांनी हे लक्षात ठेवावे, की सी-सॅट पेपर २ म्हणजे गणिताचा पेपर नव्हे. मात्र गणित, बुद्धिमत्ता यांचे योग्य नियोजन व तयारी केल्यास ती तयारी या पेपरसाठी उपयोगी ठरते.

६) २०१३ च्या मुख्य परीक्षेत जे विद्यार्थी नियमित वृत्तपत्रांचे वाचन करत होते; तसेच ज्यांना आपल्या अवती-भोवती घडणाऱ्या घटनांबद्दल योग्य ज्ञान होते, त्यांनाच मुख्य परीक्षेचे पेपर सोपे गेले.(२०१३ मध्ये मुख्य परीक्षेसाठी संघ लोकसेवा आयोगाने बदल केला होता तो आपण पुढील भागात पाहणार आहोत.), या परीक्षेत सामान्य अध्ययनाच्या पेपर मध्ये (मुख्य) अडीचशे गुणांसाठी २५ प्रश्न विचारलेले होते. प्रत्येक प्रश्न १० गुणांसाठी होता व १० गुणांसाठी २०० शब्दांची शब्दमर्यादा दिलेली होती म्हणजेच थोडक्यात तीन तासांत ५ हजार शब्द लिहावयाचे होते. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी लिखाणाचा सराव मोठय़ा प्रमाणात करावा. हस्ताक्षर मात्र वाचनीय असावे.

७) परीक्षा मराठी माध्यमातून की इंग्रजी माध्यमातून द्यावी: मुख्य परीक्षा व मुलाखत आपण मराठी माध्यमात देऊ शकतो. फक्त एक इंग्रजीचा अनिवार्य ३०० गुणांचा पेपर इंग्रजीत लिहायचा असतो. या पेपरचे गुण अंतिम गुणांमध्ये ग्राह्य धरले जात नाहीत. मात्र हा पेपर पास होणे आवश्यक असते. मुख्य परीक्षा ही मराठी माध्यामातून द्यावी की इंग्रजी माध्यमातून द्यावी हा एक नेहमीचा प्रश्न आहे.

जे विद्यार्थी विज्ञान शाखेतील आहेत व ज्यांना इंग्रजी बोलताना थोडी अडचण येते, ते मात्र शेवटपर्यंत गोंधळात असतात की पेपर मराठी माध्यमातून लिहावा की इंग्रजी माध्यमातून. जर मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असेल, तर अभ्यास साहित्य मराठीतून वाचावे की इंग्रजीतून वाचावे येथून प्रश्नांना सुरुवात होते. खरंतर माध्यमाचा प्रश्न पूर्वपरीक्षा पास झाल्यानंतर येणार असतो.   जे विद्यार्थी कला, वाणिज्य शाखेतील आहेत व ज्यांनी मराठी माध्यमातून शिक्षण घेतले, त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की आपण मराठी माध्यमातून पेपर लिहिणार असाल, तर मुख्य परीक्षेतील विज्ञान संदर्भात घटकांची तयारी करताना तो घटक मराठीत सांगणे अवघड जाते.  आता मराठी भाषेतून चांगली पुस्तके उपलब्ध झालेली आहेत. थोडक्यात पेपर मराठीतून किंवा इंग्रजीतून लिहावा याबाबत जास्त खल न करता सर्वप्रथम अभ्यासक्रम समजून त्यातील प्रत्येक उपघटकांवर आपली व्यवस्थित पकड निर्माण करावी. एकदा अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपल्याला हे ठरविणे जास्त सोपे होते की माध्यम कोणते निवडावे.

यूपीएससी (पूर्वपरीक्षा)- तयारी यूपीएससीची

प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो.


प्रथम एमपीएससीची तयारी करून यूपीएससीची तयारी करावी की फक्त यूपीएससीची तयारी करावी? 


स्पर्धापरीक्षेची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मनात हा संभ्रम असतो. या प्रश्नाचे प्रत्येक तज्ज्ञाचे उत्तर वेगवेगळे असू शकेल. काहींच्या मते, यूपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी फक्त यूपीएससीची तयारी करावी. त्यांनी एमपीएससीची तयारी करण्यामध्ये वेळ वाया घालवू नये. व्यावहारिक पातळीवर बोलायचे झाले तर या दोन्ही परीक्षा परस्परांना पूरक आहेत. एमपीएससीची तयारी जर यूपीएससीच्या दृष्टिकोनातून केली तर दोन्ही पदांच्या परीक्षेसाठी तयारी होते. जर एखाद्या परीक्षेत अपयशी झालात तर दुसऱ्या परीक्षेच्या माध्यमाद्वारे पर्याय 


उपलब्ध असतो.


दर वर्षी एमपीएससी आणि यूपीएससी परीक्षेसाठी लाखो विद्यार्थी बसतात. तुलनेने जागांची संख्या कमी असल्याने खूप चांगला अभ्यास करूनही यश प्राप्त होईलच, याची शाश्वती नसते. अशा वेळी दोन्ही परीक्षांची तयारी करत असाल तर दोन्ही परीक्षांमध्ये यश मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करता येतात. ज्यांना यूपीएससीची तयारी करायची आहे त्यांनी यूपीएससीच्या दृष्टिकोनातून एमपीएससीची तयारी करावी. अभ्यासक्रमाचे सखोल विश्लेषण केले तर लक्षात येईल की, दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम सारखाच आहे. फक्त यूपीएससीसाठी एका वैकल्पिक विषयाचा अभ्यास करावा लागतो.


यूपीएससी पूर्वपरीक्षेची तयारी : कशी? केव्हापासून?


खरेतर सर्व स्पर्धा परीक्षांची तयारी पदवी परीक्षेच्या प्रथम वर्षांपासूनच सुरुवात करावी. पदवी मिळेपर्यंत या परीक्षेसाठी अभ्यासाव्या लागणाऱ्या पुस्तकांचे वाचन होणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असणाऱ्या घटकांची तयारीदेखील या काळात पूर्ण करता येईल. उदा. काही विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व नसेल तर या तीन वर्षांच्या काळात इंग्रजीच्या लेखन-वाचनाचा सराव करून त्यावर प्रभुत्व मिळवता येईल. जे विद्यार्थी लिखाणात मागे आहेत, त्यांना लेखनावर काम करता येईल. या परीक्षेसाठी अवांतर वाचन करणे आवश्यक आहे. ते या कालावधीत पूर्ण होऊ शकेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘एनसीईआरटी’ची पाचवी ते बारावीपर्यंतची पुस्तके वाचून काढता येतील. थोडक्यात, या कालावधीत अभ्यासाची पूर्वतयारी केली तर पदवी मिळेपर्यंत जवळपास ८० टक्के अभ्यास आरामात पूर्ण होईल आणि यश मिळण्याची शक्यता वाढेल.


मात्र बऱ्याचदा या परीक्षेची माहिती विद्यार्थ्यांना उशिरा कळते. त्यामुळे अनेकांची या परीक्षेची तयारी पदवीनंतर सुरू होते. या वेळी निराश न होता, ‘जब जागे तब सबेरा’ या नियमानुसार अभ्यासाला सुरुवात करावी.


* ज्यांना तयारीला सुरुवात करायची आहे त्यांनी सर्वप्रथम पाचवी ते दहावीपर्यंतची ‘एनसीईआरटी’ची पुस्तके सविस्तर वाचावीत. हा तयारीचा टप्पा अत्यंत महत्त्वाचा आहे.


* यानंतर अभ्यासक्रम समजून घेऊन काही महत्त्वाच्या पुस्तकांचे वाचन करणे आवश्यक आहे. उदा. 

🔶 प्रचिन भारताचा इतिहास- र स शर्मा 

🔶 मध्यकालीन भारत- सतीश चंद्र 

🔶 जागाच इतिहास- जान माधुर के सागर आनुवाद मराठी 

🔶 सामाजिक समस्या- राम आहूजा हिंदी में 

🔶 Ethics GS- माधवी कवि, Unique Academy 

🔶 आंतरिक सुरक्षा- Tata magro हिंदी में 

🔶 आंतराठिय संबंध- डाँ शोलौद देवळणकर 

🔷 NCERT Geography, 6,7,9,11 

🔷 NCERT History- 6.7,12

🔷 आधुनिक भारताच्या इतिहास- बिपिनचंद्र, 

🔷 स्वातंत्र्योत्तर भारत- बिपिनचंद्र, 

🔷 भारतीय राज्यघटना- एम. लक्ष्मीकांत, 

🔷 भारताचा भूगोल- माजिद हुसन, 

🔷 जिऑग्री थ्रू मॅप- के. सिद्धार्थ, 

🔷 विज्ञान आणि तंत्रज्ञान- विझार्ड पब्लिकेशन तसेच 


अर्थशास्त्रासाठी सर्वप्रथम अर्थशास्त्राच्या संकल्पना स्पष्ट होण्यासाठी दत्ता आणि सुंदरम किंवा रमेश सिंग यांची पुस्तके वाचावीत.


* वेगवेगळ्या पुस्तकांचे वाचन करण्यापेक्षा वर उल्लेख केलेल्या मूलभूत पुस्तकांचे सखोल वाचन तीन ते चार वेळा केल्यास परीक्षार्थीना अधिक फायदा होईल. परीक्षेसंबंधी उपलब्ध असलेले सर्व अभ्याससाहित्य वाचणे आवाक्याच्या पलीकडचे ठरेल. गेल्या दोन वर्षांचे मुख्य परीक्षेचे पेपर पाहिल्यास सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगावीशी वाटते ती म्हणजे ज्यांना यूपीएससीची तयारी करायची असेल त्यांनी लिखाणाचा अधिकाधिक सराव करावा.


नोकरी करून यूूपीएससी परीक्षेचा अभ्यास करायला जमेल का?


नोकरी करून यूपीएससी परीक्षा द्यायची असेल तर लक्षात ठेवायचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही स्पर्धापरीक्षा आहे. संपूर्ण देशभरातून या परीक्षेला सुमारे १०-१२ लाख विद्यार्थी बसतात. शक्य असल्यास या परीक्षेच्या तयारीसाठी एक वर्ष पूर्णवेळ अभ्यास करणे आवश्यक आहे. 


👉 योग्य मार्गदर्शकाची आवश्यक आहे,

अर्थव्यवस्था या विषयाची तयारी कशी करावी?

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



 #Combine #Prelims साठी भारतीय अर्थव्यवस्थेचे साधारणतः 12 उपघटकांचा अभ्यास करावे लागतात. त्यातील साधारणतः 6 घटकांचा आज आपण आढावा घेऊ.         


❇️ 1.मूलभूत संकल्पना -

यामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे काय? विकसित,विकासनशील, अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय?इ. संकल्पना clear करून घ्या.कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये छान दिल्या आहेत.


प्रश्न - शक्यतो येत नाही. पण या Topic च्या Concepts clear असल्याशिवाय पुढील अर्थव्यवस्था पण समजत नाही.


❇️ 2. राष्ट्रीय उत्पन्न - खूपच conceptual Topic आहे. यातील प्रत्येक concept जोपर्यत व्यवस्थित समजत नाही तोपर्यत खूप अवघड वाटतो. पण एकदा लक्षात आल की मग यासारखा सोपा घटक नाही. कोळंबे सरांच्या पुस्तकात छान cover केलाय.


प्रश्न - Gdp vs Gnp,

        Ndp vs Nnp,

       Gross vs Net

       Value Addition etc. संकल्पनावरती प्रश्न विचारला जातं असतो. अणखी Gdp चे base years चांगले करून ठेवा आणि या base years च्याच Gdp, Poverty, unempolyment etc साठी figure करत चला.


❇️ 3.आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना - आर्थिक नियोजनाची पार्शवभूमी, भारतातील पंचवार्षिक योजना त्याचा कालावधी, वृद्धीची उद्दिष्ट्ये, प्रतिमान, Model, योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये चांगली करून ठेवा.


प्रश्न - योजनेचा कालावधी, पंचवर्षिक योजना राबवत असताना राबविलेल्या महत्वाच्या योजना या बाबी चांगल्या करून ठेवा. हा Topic देसले सरांच्या पुस्तकातून चांगला cover होतो.


❇️ 4.दारिद्र्य व बेरोजगारी - Concepts आणि Facts याच मिश्रण असलेला घटक. दारिद्र्यचे प्रकार, Recall Periods,दारिद्र्य मोजमापच्या समित्या त्यांच्या शिफारशी यांचा अभ्यास करावा लागेल.दारिद्र्याच्या figures तोंडपाठ करा. हमखास प्रश्न येतोच.

बेरोजगारी मध्ये त्याच्या व्याख्या म्हणजे श्रम शक्ती कार्य शक्ती बेरोजगारीचा दर या व्यवस्थित करून ठेवा. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती पण चांगल्या करायला हव्यात. हा टॉपिक  कोळंबे सर आणि दिसले सरांच्या पुस्तकातून चांगला करा 


प्रश्न - साधारणता दारिद्र्याचे प्रकार, बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीच्या व्याख्या, दारिद्र्य मापनाच्या समित्या  इ. घटकांवरती नियमित प्रश्न विचारले गेले आहेत.


❇️ 5. लोकसंख्या - यामध्ये लोकसंख्येच्या संख्यात्मक व गुणात्मक बाबींचा फॅक्च्युअल डाटा तोंडपाठ करून टाका. उदाहरणार्थ. लिंग गुणोत्तर,साक्षरता, लोकसंख्या वृद्धि, लोकसंख्या घनता इ. अलीकडे आयोग लोकसंख्येच्या धोरणांवरतीदेखील प्रश्न विचारत आहे. त्यामुळे 1976 आणि 20 00 लोकसंख्या धोरण चांगलं करून ठेवा.

 देसले सर भाग 2 मधून हा टॉपिक चांगला कव्हर होतो.


❇️ 6. Rbi व बँकिंग - यामध्ये आरबीआयची पार्श्वभूमी, कार्य, त्यामध्ये देखील संख्यात्मक व गुणात्मक साधने आणि एकंदरीत भारतीय वित्तव्यवस्थेमध्ये आरबीआयची असलेली भूमिका या घटकांचा बारकाईने अभ्यास करावा. यासाठी कोळंबे सरांचे पुस्तक वाचले तरी चालेल.


प्रश्न - आरबीआयची पार्श्वभूमी आरबीआयचे विविध कायदे उदा 1934 act, 1949 बँकिंग रेगुलशन act यावरती प्रश्न विचारले जातात. ते चांगले करा. Rbi ची संख्यात्मक साधने जसं की CRR, SLR, Repo Rate, Reverse Rapo Rate, Open Market Operations (Omos) etc चांगले करा.


 अशा पद्धतीने वरील सहा घटकांची आपण तयारी केली तर Combine Exam मध्ये आपल्याला या घटकांमध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळतील.



पण राहीलेले 6 उपघटक Cover करूयात.


❇️ 1. सार्वजनिक वित्त व कररचना -


 यामध्ये सार्वजनिक वित्ताची व्याप्ती, अर्थसंकल्प, FRBM कायदा, अर्थशंकल्पची रचना (महसूली व भांडवली )सार्वजनिक कर्ज, तुटीचे प्रकार, करांचे प्रकार, प्रत्येकाचा वाटा, करसुधारणेसाठी नेमलेल्या समित्या अणि वित्त आयोग विशेषतः 15 वा वित्त आयोग हे घटक चांगले करा.


प्रश्न - साधारणता 3-4 प्रश्न या उपघटका वरती विचारले जातात. दिवसेंदिवस प्रश्नांची depth वाढत असल्यामुळे आपल्याला deep level ला जाऊन Study करावा लागेल. Combine 20 मधील कर्जावरील प्रश्न तसेच Frbm प्रश्नावरून आपण भविष्यात प्रश्न किचकट येणार आहेत हे सांगू शकतो. यासाठी अगोदर कोळंबे सर अनि नंतर देसले सरांचे पुस्तक चांगले करून ठेवा.


❇️ 2.परकीय व्यापार व व्यवहारतोल -


 यामध्ये साधारणता आयात - निर्यात आकडेवारी, वस्तुगट, देशांचा क्रम, Fdi ची काही आकडेवारी, व्यवहारतोलाच्या Basic concepts चांगल्या करून ठेवा.आयात निर्यात धोरणनावर एक नजर टाकून घ्या.


प्रश्न - यावरती आयात - निर्यात वस्तूंचा क्रम, देशांचा क्रम यावरती प्रश्न विचारला जातोय. Combine 20 मध्ये अभियांत्रिकी वास्तुवर प्रश्न आला होता. यामध्ये logic असं होत की अभियांत्रिकी वस्तू हा अनेक वस्तूंचा समूह आहे किंवा group आहे. बाकीचे single वस्तू होत्या so answer अभियांत्रिकी वस्तू आल.


❇️ 3. कृषी उद्योग सेवा -


 यामध्ये 1950,1991,2011,2020 या वर्षांमध्ये कृषी, उद्योग अणि सेवा या तिन्ही क्षेत्राचा असलेला Gdp तील वाटा अणि रोजगारातील वाटा करून ठेवावा लागेल. हे chart स्वरूपात आपण लक्षात ठेवू शकतो. शक्य झाल्यास कृषी, उद्योग या घटकांच्या Basic scheme करून ठेवा.


प्रश्न - आकडेवारीवर थेट प्रश्न विचारला जातोय Gdp च्या base year चे आकडे चांगले करून ठेवा. उदा.1950,1990-91,199-2000,2004-05,2011-13,2017-18.


❇️ 4. शासकीय योजना, धोरणे, चालू घडामोडी -


 साधारणतः 2-3 प्रश्न या घटकावरती विचारले जातात.2014 पासून योजनांचा अभ्यास बारकाईने करा. 2014 पूर्वीच्या महत्त्वाच्या योजनांची पीडीएफ आपल्या ग्रुप वरती शेअर केली आहे ते एकदा पाहून घ्या. त्यामध्ये दिलेल्या योजना चांगल्या करून ठेवा.


प्रश्न - समाजातील दुर्बल घटक विशेषता महिला,बालक, वृद्ध, सामाजिक समावेशन अशा अनेक योजनांवर आयोग  जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो. देसले सर भाग 2 मधून या योजना चांगले करून ठेवा


❇️ 5. LPG ( Liberalization, Privatization, Globalization )


 हा थोडा Conceptual घटक आहे. यासाठी तुम्हाला भारतीय नियोजनाचा एकंदरीत प्रवास माहित असायला हवा.1991 च्या आर्थिक संकटास कारणीभूत घटक अणि त्यावर मात करण्यासाठी भारताने कोणत्या उपाययोजना केल्या याचा सविस्तर आढावा घ्यावा लागेल. त्यामध्ये मग उदारीकरण, खाजगीकरण  आणि जागतिकीकरण या गोष्टी संकल्पना सहित समजून घ्याव्या लागतील.


प्रश्न -साधारणता एक प्रश्न या घटकावर विचारला जातो. या घटकासाठी PYQ चांगले करून ठेवा म्हणजे नवीन प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. यासाठी कोळंबे सरांचे पुस्तक ठीक राहील.


❇️ 6. किमती चलनवाढ व पैसा -


 या घटकावर ती आत्तापर्यंत एकच प्रश्न विचारला असून तो 2017 साली पैसा या घटकावर विचारण्यात आला होता. त्यानंतर या घटकावर ती प्रश्न विचारण्यात आला नाही. तरीही किमती व चलन वाढ हे घटक कोळंबे सरांच्या पुस्तकातून पैसा हा घटक देसले सरांच्या पुस्तकातून वाचून ठेवा.


 अशा पद्धतीने तुम्ही कम्बाईन पूर्व साठी अर्थव्यवस्था या विषयाची परिपूर्ण तयारी करू शकता.




राणी लक्ष्मीबाई

महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर

टोपणनाव:मनू

जन्म:नोव्हेंबर १९, इ.स. १८३५

काशी, भारत

मृत्यू:जून १७, इ.स. १८५८

झाशी, मध्य प्रदेश

चळवळ:१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

प्रमुख स्मारके:ग्वाल्हेर

धर्म:हिंदू

वडील:मोरोपंत तांबे

आई:भागीरथीबाई तांबे 

पती:गंगाधरराव नेवाळकर

अपत्ये:दामोदर (दत्तकपुत्र)


लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.


बालपण


लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.


व्यक्तिमत्त्व


धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.


वैवाहिक जीवन


इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.


दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.


गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.


झाशी संस्थान खालसा


पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.


परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.


झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.


इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध


इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकारसूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.


अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.


दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.


उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.


शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.


राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’


या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

संयुक्त पूर्व परीक्षा

 नमस्कार मित्रांनो,


आज आपण शेवटच्या 60 दिवसांमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी आणि 60 गुण कसे मिळवावेत याबाबत चर्चा करूयात..


⭕️ संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल पाहता आता सुरक्षित गुण किती असतील याबाबत कोणीच निश्चित सांगू शकत नाही. पहिल्या उत्तरतालिका नुसार किमान 60 गुण मिळवले तरच मुख्य परीक्षेला असण्याची खात्री राहणार आहे. सर्वांनी पूर्व परीक्षेला ठरवून 60 गुणांच्या वर स्कोर करण्याची आवश्यकता आहे.


⭕️ इतिहास -

मागील संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पाहता असे लक्षात येते की नेहमीच त्रास देणाऱ्या इतिहास या विषयाने विद्यार्थी मित्रांना भरपूर मदत केलेली आहे. 15 पैकी 14 गुण मिळवणारे बरेच विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत त्यामुळे यंदा इतिहासामध्ये, जर पेपरचा दर्जा मागील प्रमाणेच राहिला तर, किमान 12 गुण मिळवणे अनिवार्य राहणार आहे. इतिहासाचे तयारी करण्यासाठी गाठाळ सर किंवा कठारे सर या दोघांपैकी एका चे पुस्तक आपण वापरू शकता. इतिहासामध्ये ज्ञान मिळवणे मर्यादीत असल्याने लॉजिक डेव्हलपमेंट आणि एलिमिनेशन टेक्निक्स खूप काम करतात.त्याबाबत आपण आवर्जून विचार करावा


⭕️भगोल-

बाबतीत,15 पैकी किमान 10 गुण मिळाले तर आपण पूर्व परीक्षा सहजासहजी पास होऊ शकतो.भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी सौदी सर किंवा खातीब सर किंवा दीपस्तंभ प्रकाशन यांचे पैकी कोणतेही एक महाराष्ट्राच्या भूगोल साठी वापरावे आणि भारताच्या भूगोलासाठी सौदी सरांचे पुस्तक वापरावे.


⭕️पॉलिटी-

 या विषयांमध्ये पूर्वी 10 पैकी 10 गुण मिळतात मात्र अभ्यासक्रमाचा आवाका व त्या तुलनेमध्ये कमी गुणांचा भारांक आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची वाढत असलेली खोली पाहता सध्या आपणास 10 पैकी 7 ते 8 गुण मिळवणे आवश्यक असते. लक्ष्मीकांत सरांचे अथवा  कोळंबे सरांचे पुस्तक आपण यासाठी वापरू शकतो तसेच पंचायत राज या घटकावर येणाऱ्या 2 ते 3 प्रश्नांसाठी किशोर लवटे सरांचे पंचायत राज हे पुस्तक उपयुक्त ठरते. त्याचे वारंवार वाचन केले पाहिजे. शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत व त्याची वारंवार उजळणी झाली पाहिजे तरच प्रचंड डेटा आपल्या लक्षात राहू शकतो.


⭕️अर्थशास्त्र-

 येणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी सध्या कमी होत आहे म्हणजेच केवळ सर्वसामान्य अभ्यासावर आपण 15 पैकी 10 ते 12 गुण मिळवू शकतो. यासाठी देसले सर किंवा कोळंबे सर पैकी कोणतेही एक पुस्तक वाचण्यास पुरेसे ठरते. अर्थशास्त्राचे आयोगाचे मागील काही वर्षांचे प्रश्न पाहिल्यास आयोग कोणत्या घटकांवर किती आणि कसे प्रश्न विचारतो हे लक्षात येऊ शकते त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नांना बिलकुल दुर्लक्षित करू नये.


⭕️विज्ञान -

हा घटक सर्वसामान्यपणे सर्वच जनतेला किचकट वाटणारा विषय आहे तसेच प्रश्नांचा दर्जा मध्ये आयोगाने सातत्य राखलेले नाही. त्यामुळे कधी अभ्यास करून कमी मार्क तर कधी अभ्यास न करता ही सरासरी मार्क मिळतात मात्र तरीही स्टेट बोर्ड इयत्ता 7 ते 10 वी च्या पुस्तकांवर आपली कमांड असायला हवी किंवा सचिन भस्के सरांच्या पुस्तकाच्या किमान 3 ते 4 उजळण्या व्हायला हव्यात. लक्षात ठेवा की जर विज्ञान विषय अवघड आला तर तो सर्वांसाठी अवघड असेल आणि सोपा ला करतो सर्वांसाठीच सोपा असेल त्यामुळे या विषयावर ती मेरीट ठरण्याची शक्यता फार कमी असते.


⭕️ चालू घडामोडी-

हा पूर्व परीक्षांमधील सर्वांत अनिश्चित विषय मला वाटतो.यासाठी आयोग नक्की कोणता source वापरतो हे निश्चित समजत नाही. मात्र असे असले तरीही 15 पैकी 8 प्रश्न प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्याने सुटू शकतात. परिक्रमा हे मासिक किंवा अभिनव अथवा सिंपलिफाईड प्रकाशनाचे वार्षिकी यातून बऱ्याच अंशी घटना कव्हर होतात. त्या पुस्तकांच्या 2 ते 3 उजळण्या केल्यास किमान 7 ते 8 गुण पडण्यास हरकत नाही.


⭕️गणित बुद्धिमत्ता -

हा विषय पूर्व परीक्षांमधील मार्क देणारा विषय म्हणून ओळखला जातो मात्र काही विद्यार्थ्यांना हा विषय की  किचकट जातो मात्र दररोज सराव केल्यास या विषयाची भीती मनातून निघू शकते. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पहा व आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत यावरून बाजारात सापडणारे कोणतेही एक पुस्तक घेऊन त्यातून दररोज दोन ते अडीच तास सराव अपेक्षित आहे.


⭕️अशाप्रकारे एकंदरीत आपण 60 गुणांची गोळाबेरीज परीक्षेपूर्वी जमा केली आणि त्यानुसार विषयांना वेळ वाटून दिला आणि उजळणी केली तर निश्‍चितपणे आपण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतो. जितके जास्त गुण असतील तितकी पूर्व परीक्षा पास होण्याची खात्री अधिक असेल व त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल पर्यंतचा वेळ वाट पाहण्यात जाणार नाही.

त्यामुळे वरील प्रमाणे अभ्यास करून अथवा आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करून 60 प्लस गुण मिळवणे आवश्यक ठरते.


❇️ अभ्यासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.


🔴 PSI पूर्व परीक्षेसाठी 50 गुणांची गोळाबेरीज कशी कराल?

 ⭕ PSI पुर्व परीक्षा पास होणं तुलनेने सोपं असत कारण PSI च्या जागा STI- ASO पेक्षा जास्त असतात, बऱ्याच लोकांना PSI पदाची ची आवड नसते (विशेषतः मुलींना )तसेच PSI साठी लागणाऱ्या Physical आणि Medical Standards मुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरतात.

                                

⭕ Actually PSI चा Cutoff हा दरवर्षी around 45 असतो पण 50 हा Safe Score समजला जातो. 


♦️ माझ्या आत्तापर्यंतच्या निरक्षण आणि अनुभवावारून PSI साठी इच्छुक असणाऱ्या बऱ्याच  Candidates चा Score हा 40-45 दरम्यान असतो.हे विद्यार्थी बऱ्यापैकी Serious असतात अभ्यासदेखील करत असतात पण त्यांच्या चुका त्यांना नकळत समजत नाहीत.


♦️ तर आपण या चुका काही प्रमाणात जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.

     

1.Revision चे महत्व माहिती असूनही ते न केल्यामुळे  ऐन परीक्षेच्या वेळी सोपे -सोपे प्रश्न विद्यार्थी न आठवल्यामुळे चुकतात व Finally Score कमी येतो.


2. सोबतच प्रत्येक विषयामधला महत्वाचा घटक कुठला व कमी महत्वाचा घटक कुठला हे ओळखन्यामध्ये बरेच विद्यार्थी अपयशी ठरतात त्यामुळे अभ्यास करण्यात Unnecessary वेळ वाया जातो.


3. Unnecessary Attempt-


75-85 Attempt करून देखील तुमची Psi prelims निघू शकते त्यामुळे 100 प्रश्नांचा नाद करणे जमत नसेल तर Accuracy वर फोकस ठेवावा. 

                   

4. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असूनदेखील परीक्षेच्या अंतिम 15-20 दिवसात ते विद्यार्थी परीक्षा सोडून देतात . परीक्षेच्या काळात लागणार आत्मविश्वास आणि Temperament जो Manage करतो तोच परीक्षा पास होतो. त्यामुळे परीक्षेविषयी असणाऱ्या भीतीवर (अपयशाची )आत्त्तापासूनच काम करणे गरजेचे आहे.


5. 50-60% काठावर Score असलेल्या मुलांची पुर्व परीक्षा ही गणित बुद्धिमत्ता व विज्ञान या दोन विषयात कमी गुण मिळाल्यामुळे  जाते. त्यामुळे या 2 विषयांची जशी जमेल तशी जास्त तयारी करावी ( Class लावले तरी चालतील )


तर आपण 50 गुण मिळवण्याच्या साध्या आणि सोप्या 2 Strategy पाहू.


✔️  1. 7*7 Strategy-  


  पुर्व परीक्षेतील 7 ही विषयांना Average 7 गुण मिळवले तर आपण सहज 50 स्कोर करू शकतो.त्यामुळे पुर्व परीक्षेला सर्व विषयांना समान Weightage आणि Time दिला तर तुमची पुर्व परीक्षा आरामात निघू शकते.     

  पण एखाद्या विषयाला 7 पेक्षा कमी गुण आले तर ते दुसऱ्या विषयातून Cover व्हायला पाहिजेत.

तुमचा एखादा विषय weak असेल तरी पण चालेल पण एक पेक्षा जास्त weak नको.. कारण लिमिट पेक्षा जास्त marks cover होत नाहीत.. त्यामुळे योग्य विषयावर आपला वेळ आणि अभ्यासाची energy इन्व्हेस्ट करून आपण अपेक्षित score करू शकतो..


✔️ 2. Focused आणि Selective Strategy- 


 यामध्ये तुम्हाला Score करण्यास Easy असणारे 4-5 विषय निवडायचे आणि बाकी 2-3 विषयांची Average तयारी करायची.उदा. मी History, Geography, Polity, Ecomony आणि Current affairs या विषयांवर Focus करील आणि बाकी Science आणि Mathematics याला कमी वेळ देईल. तसेच  Time management साठी परीक्षेच्या किमान 1 महिना अगोदर किमान 15-20 सराव papers 50-55 मिनटात वेळ लावून सोडवण्याचा प्रयत्न करावा.


 ही Strategy थोडीशी धोकादायक असली तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना लागू पडते. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रांतात खेळता येते आणि प्रॉपर study केला तर आरामात 50 score करता येतो.


❇️ तर अशा प्रकारे आपण पुर्व मध्ये गुण मिळवण्याच्या Strategy आणि अभ्यास्पद्धतीविषयी पुढेही बोलत राहू. 


पदे व राजीनामा कोणाकडे देतात

➡️◾️पोलीस भरतीला यावर नेहमी प्रश्न येतोच

◾️राष्ट्रपती - उपराष्ट्रपतीकडे

◾️उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे 

◾️पंतप्रधान - राष्ट्रपतीकडे

◾️केंद्रीय मंत्री - राष्ट्रपतीकडे

◾️राज्यपाल - राष्ट्रपतीकडे

◾️संरक्षण दलाचे प्रमुख - राष्ट्रपतीकडे

◾️महालेखापाल - राष्ट्रपतीकडे

◾️महान्यायवादी - राष्ट्रपतीकडे

◾️राज्यसभा सभापती/ उपराष्ट्रपती - राष्ट्रपतीकडे

◾️लोकपाल - राष्ट्रपतीकडे

◾️लोकपाल मंडळ सदस्य - राष्ट्रपतीकडे

◾️मुख्य निवडणुक आयुक्त - राष्ट्रपतीकडे

◾️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश - राष्ट्रपतीकडे

◾️लोकसभा सदस्य - लोकसभा सभापतीकडे

◾️लोकसभा सभापती - लोकसभा उपसभापतीकडे

◾️लोकसभा उपसभापती - लोकसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा सदस्य - राज्यसभा सभापतीकडे

◾️राज्यसभा उपसभापती - राज्यसभा सभापतीकडे

◾️मुख्यमंत्री - राज्यपालाकडे

◾️राज्याचे इतर मंत्री - राज्यपालाकडे

◾️महाधिवक्ता - राज्यपालाकडे

◾️महाराष्ट्र-लोकायुक्त - राज्यपालाकडे

◾️महाराष्ट्र-उपलोकायुक्त - राज्यपालाकडे

◾️राष्ट्रपतीकडे - उच्च न्यायालयाचे न्यायाधिश

◾️विधानसभा अध्यक्ष - विधानसभा उपाध्यक्षाकडे

◾️विधानसभा सदस्य - विधानसभा अध्यक्षा

MPSC STUDENT महत्वाचे प्रश्नसंच

1) खालीलपैकी गतीविषयक पहिले समीकरण कोणते ?

1) v² = u² + at         2) v = u + at    

3) v = ut + ½at²      4) v = u + v/t

उत्तर :- 2


2) खालीलपैकी कोणते धातू आहेत ?

   अ) ॲल्युमिनीअम,  सोने      ब) लोखंड, तांबे

   क) चांदी, तांबे        ड) आयोडीन, सिलिकॉन

   1) अ, ब           2) ब, क    

   3) अ, ब, क      4) अ, ब, क, ड

उत्तर :- 3

1) खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील प्रथम राष्ट्रीय डॉल्फीन संशोधन केंद्र उघडण्यात येणार आहे.

   1) मुंबई    2) चेन्नई    

   3) पटना      4) बेंगळूरू

उत्तर :- 3


2) योग्य जोडया निवडा. (राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार)

   अ) 2018    --  विराट कोहली, मीराबाई चानू

   ब) 2017    --  सरदार सिंग, देवेंद्र झांझरिया

   क) 2016    --  पी.व्ही. सिंधु, साक्षी मलिक, दिपा कर्माकर, जितू रॉय

   ड) 2015    --  सानिया मिर्झा

  1) अ, क, ड    2) अ, ब, क, ड  

  3) अ, ब, ड    4) अ, ब, क

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणता दिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

   1) 15 सप्टेंबर    2) 15 ऑक्टोबर    3) 14 ऑगस्ट    4) 24 डिसेंबर

उत्तर :- 2


4) तृतीयपंथीय लोकांकरीता मैदानी स्पर्धा आयोजित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.

   अ) तामिळनाडू    ब) केरळ      क) गुजरात    ड) महाराष्ट्र

  1) ड      2) क     

  3) ब      4) अ

उत्तर :- 3


5) थेट जनतेकडून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे.

   1) पहिले    2) दुसरे  

   3) तिसरे      4) चौथे

उत्तर :- 3


3) खालील विधानांचा विचार करा.

   अ) पेशीचा आकार मुख्यत्वे तिच्या कार्याशी निगडीत असतो.

   ब) सूक्ष्मजीवांना गिळंकृत करण्यासाठी पांढ-या रक्तपेशी स्वत:चा आकार बदलू शकतात.

   क) एका टोकाकडून दुस-या टोकाकडे आवेगाने वहन करण्यासाठी चेतापेशींची लांबी जास्त असते.

   ड) केशिकांमधून सुलभ वहन होण्यासाठी मानवी लोहीत रक्तपेशींचा आकार व्दिबर्हिर्वक्री गोलाकार असतो.

   1) अ, ब, क    2) अ, क, ड 

   3) अ, ब, ड      4) वरील सर्व बरोबर

उत्तर :- 1


4) v² = u² + 2as हे गतीविषयक कितवे समीकरण आहे ?

   1) चौथे         2) पहिले    

   3) तिसरे        4) दुसरे

उत्तर :- 3


5) खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू तसेच अधातूंचे गुणधर्म दर्शविते.

   1) आर्सेनिक, अँटीमनी 

   2) सेलिनिअम, सिलिकॉन

   3) जर्मेनिअम    

  4) वरील सर्व

उत्तर :- 4



1) कँडेला (Candela) हे खालीलपैकी कशाचे एकक आहे.

   1) ल्युमिनस इंटेनसिटी (Luminous Intensity)

    2) चुंबकीय विकर्षरेषा

   3) चुंबकीय क्षेत्र       

   4) विद्युत प्रभार

उत्तर :- 1


2) ॲल्युमिनीअम, लोखंड, जस्त या धातूंची थंड / उष्ण पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही मात्र

   1) वाफेशी अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होते.     

   2) ऑक्सिजन वायू मुक्त होतो.

   3) 2 Al + 3 H2O   Al2O3 + H2 ही अभिक्रिया होणार    

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


3) खालील विधानांचा विचार करा.

   अ) लाल रक्तपेशी या भ्रूणामध्ये यकृतात किंवा प्लिहामध्ये तयार होतात.

   ब) लाल रक्तपेशी प्रौढ माणसांत अस्थिमज्जेत तयार होतात.

   क) पांढ-या पेशी या अस्थिमज्जा तसेच प्लिहामध्ये तयार होतात.

   ड) वरील सर्व विधाने बरोबर आहे.

1) अ, क  2) ड   3) ब, क 4) फक्त अ  

उत्तर :- 2


4) खालीलपैकी कोणते मूलभूत एकक MKS, CGS आणि FPS या तिन्ही पध्दतीत सामाईक आहे.

   1) मीटर  2) सेकंद   3) ग्रॅम  4) फूट

उत्तर :- 2


5) असे कोणते धातू मूलद्रव्ये आहेत ज्यांची पाणी व वाफ सोबत रासायनिक अभिक्रिया होत नाही.

 1) सोने  2) चांदी    

3) तांबे      4) वरील सर्व

उत्तर 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) 2018 चा मिस वर्ल्ड चा किताब कोणी जिंकला.

   1) वेनेसा पोन्स डी लिऑन     

   2) निकालेन पिशाना

   3) मानुषी छिल्लर      

   4) मानसी मल्होत्रा

उत्तर :- 1


2) पूर्णपणे भारतीय बनावटीची इंजिनविरहीत ............. ही देशातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन ठरली आहे.

   1) ट्रेन 18    2) ट्रेन 20    

   3) ट्रेन 21    4) ट्रेन 25

उत्तर :- 1


3) खालील माहितीचा विचार करा.

   अ) राजीव महर्षी यांची भारताच्या नियंत्रक व महालेखापालपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

   ब) राजीव महर्षी हे भारताचे 13 वे नियंत्रक व महालेखापाल आहे.

   क) भारताचे पहिले नियंत्रक व महालेखापाल व्ही. नरहरी राव होते.

   ड) भारताचे संविधानाच्या कलम 148 नुसार नियंत्रक व महालेखापालाची रचना करण्यात आलेली आहे.

  1) अ, ब, क बिनचूक      

  2) अ, क, ड बिनचूक

  3) अ, ब, ड बिनचूक      

  4) अ, ब, क, ड बिनचूक

उत्तर :- 4


4) RBI ने जाहीर केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशांकडून भारताला सर्वाधिक (Remittances) प्राप्त होतो.1) UAE       2) USA      

3) कतार      4) कुवेत

उत्तर :- 1


5) खालील माहितीचा विचार करा.

अ) मायकेल ॲन्डाटजे यांना जुलै 2018 मध्ये The English Patient या पुस्तकासाठी गोल्ड मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ब) मॅन बुकर पुरस्काराच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त खास गोल्ड मॅन बुकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.

क) मॅन बुकर पुरस्काराची सुरुवात 1969 पासून झाली.

1) अ सत्य         2) अ, ब सत्य    

3) अ, क सत्य    4) अ, ब, क सत्य

उत्तर :- 4




📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविणे भाग पडले ?

1) पहिली पंचवार्षिक योजना      

2) दुसरी पंचवार्षिक योजना

3) तिसरी पंचवार्षिक योजना      

4) पाचवी पंचवार्षिक योजना

उत्तर :- 3


2) भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ............... या उद्दिष्टावर भर दिला होता.

1) सहकार व स्वातंत्र्य      

2) विकास व तंत्रज्ञान

3) आत्मनिर्भरता व स्वावलंबन    

4) बेरोजगारी

उत्तर :- 3


3) पायाभूत व जड उद्योगावर भरीव खर्च व सार्वजनिक क्षेत्र वाढीवर जोर कुठपर्यंत चालू होता ?

   1) तिसरी योजना      2) पाचवी योजना

   3) आठवी योजना      4) दहावी योजना

उत्तर :- 3


4) दहाव्या पंचवार्षिक योजनेतील उद्देशिय स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्टे  खालीलपैकी कोणते होते ?

   1) 9.00%       2) 8.00%   

   3) 10.00%    4) 07.00%

उत्तर :- 2


5) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष्य निश्चित केले नव्हते?

अ) दारिद्रयात घट      

ब) सहकारास प्रोत्साहन

क) वृद्धीदर आणि रोजगारात वाढ    

ड) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकण

   1) अ फक्त          2) ब फक्त   

    3) क आणि ड    4) ड आणि अ

उत्तर :- 2


1) जोडया लावा.

   अ) मूलभूत अधिकार      i) जर्मनीचे वायमर संविधान

   ब) निती निर्देशक तत्वे      ii) कॅनडाचे संविधान

   क) केंद्र सरकारला उर्वरित अधकार    iii) आयरिश संविधान

   ड) आणीबाणी        iv) अमेरिकेचे संविधान

             अ  ब  क  ड

         1)  iv  i  iii  ii

         2)  iv  iii  i  ii

         3)  iv  iii  ii  i

         4)  I  iii  iv  ii

उत्तर :- 3


2) भारतीय संविधानाची वैशिष्टये आणि त्यांच्या स्त्रोतांच्या योग्य जोडया लावा.

   अ) एकेरी नागरिकत्व    i) ब्रिटीश राज्यघटना

   ब) मूलभूत हक्क      ii) फ्रान्स राज्यघटना

   क) स्वातंत्र्य, समता, बंधुता  iii) कॅनेडियन राज्यघटना

   ड) उर्वरित अधिकार    iv) अमेरिकेची राज्यघटना

             अ  ब  क  ड

         1)  iv  iii  i  ii

         2)  i  iv  ii  iii

         3)  iii  i  iv  ii

         4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 2


3) राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?

   1) बिहार    2) केंद्रीय प्रांत    3) बाँम्बे      4) पंजाब

उत्तर :- 2


4) सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या 

     वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा .

   अ) समतेचे तत्व      ब) स्वातंत्र्याचे तत्व    क) संघराज्य    ड) समाजवादी संरचना

   इ) न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार    फ) धर्मनिरपेक्षता

   1) अ, ब, क, ड, इ, फ    2) अ, क, इ, फ      3) अ, ब, क, ड, फ    4) अ, ब, क, इ, फ

उत्तर :- 2


5) खालील विधानांचा विचार करा.

   अ) डॉ. बी.आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

   ब) श्री. एच.जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.

   1) ब बरोबर आहे    2) अ बरोबर आहे      3) दोन्ही बरोबर आहेत  4) दोन्ही चूक आहेत

उत्तर :- 2


1) एखाद्या  नळीचा अंतर्गत व्यास मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते मापक वापरतात ?

1) मायक्रोमीटर    2) व्हर्निअर कॅलीपर  3) नॅनोमीटर        4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 2


2) खालीलपैकी कोणत्या धातूची विरल HCl सोबत अभिक्रिया होत नाही.

   1) लोखंड    2) जस्त   

   3) तांबे      4) वरील सर्व

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणता घटक रक्त गोठण्याच्या क्रियेत भाग घेतो.

   अ) कॅल्शिअम    ब) व्हिटॅमीन    क) रक्तपट्टीका     ड) फायब्रीनोजीन    इ) प्रोथ्रॉम्बीन

   1) अ, ड, इ    2) फक्त ड, इ    

   3) क, ड, इ    4) वरील सर्व

उत्तर :- 4


4) खालीलपैकी संपूर्ण अदिश राशींचा समूह कोणता ?

  1) वस्तुमान, घनता, कार्य, उष्णता  

  2) चाल, संवेग, बल, त्वरण

  3) लांबी, वेग, विस्थापन, चाल      

  4) संवेग, तापमान, उष्णता, ऊर्जा

उत्तर :- 1


5) आम्लारीची धातूंवर अभिक्रिया झाली असता कोणता वायू बाहेर पडतो ?

   1) CO2    2) O2      

   3) H2      4) यापैकी नाही

उत्तर :- 3


1) UNHRC चे पूर्ण रूप काय ?

   अ) United Nations Human Right Counsil

   ब) United Nations Higher Refugeas Counsil

   क) United Nations Human Right Commision

   ड) United Nations Human Right Court

  1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 1


2) खालीलपैकी अभिनेत्री लालन सारंग बाबत काय खरे आहे.

   अ) लालन सारंग यांचे 9 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले.

   ब) रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जायच्या.

   क) विजय तेंडूलकर यांच्या सखाराम बाईंडर या नाटकात त्यांनी साकारलेली चंपाची भूमिका वादळी ठरली होती.

   ड) त्यांनी 87 व्या मराठी नाटयसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

  1) अ, ब, क    2) अ, क, ड   

  3) अ, ब, ड    4) अ, ब, क, ड

उत्तर :- 4


3) खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी ATM सुरू करण्यात आले आहे.

   1) मुंबई        2) दिल्ली  

   3) बेंगळूरू    4) नागपूर

उत्तर :- 3


4) ‘नालसा’ (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली.

1) न्या. मदन लोकूर  2) तुषार मेहता    3) रवी शर्मा             4) यापैकी नाही

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणाची मालदीवच्या अध्यक्षपदी निवड झाली.

   1) इब्राहीम महंमद सोलीह        

   2) अब्दुल्ला यामीन

   3) महंमद नाशीद      

   4) यापैकी नाही

उत्तर :- 1


1) 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रामधील अंदाजे गुंतवणूक किती आहे ?

   1) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट

   2) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या 120%

   3) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या 150%

   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


2) काही पंचवार्षिक योजनांकरिता विकासाच्या उद्दिष्टांची टक्केवारी व प्रत्यक्षात आत्मसात विकासाची टक्केवारी पुढे दिली आहे. 

    यातील कोणते विधान चुकीचे आहे ?

           उद्दिष्ट    प्रत्यक्षात

1) प्रथम योजना (1951 – 56)  2.1    3.6

2) चौथी योजना (1969 – 74)  5.7    2.05 

3) आठवी योजना (1992 – 97)  5.6    6.68

4) दहावी योजना (2002 – 2007)  8.0    9.7

उत्तर :- 4


3) खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे ?

   1) पहिली पंचवार्षिक योजना = (1951 – 56)

   2) तिसरी पंचवार्षिक योजना = (1966 – 71)

   3) सहावी पंचवार्षिक योजना = (1980 – 85)

   4) दहावी पंचवार्षिक योजना = ( 2002 – 2007)

उत्तर :- 2


4) 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये (2012 – 17) , नियोजन आयोगाने पायाभूत विकासासाठी अंदाजे रु. 45 लक्ष कोटींची 

    गुंतवणुकीची तरतूद केली आहे. या गुंतवणुकीपैकी खाजगी गुंतवणुकीची वाटा किती आहे ?

   1) कमीत कमी 50%      2) 60%    

   3) कमीत कमी 45%      4) 75%

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणती अकराव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट समजता येतील  ?

   अ) संपूर्ण देशाकरिता सकलदेशीय उत्पादन (GDP) 9% पर्यंत नेणे.

   ब) दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे.

   क) सकल देशी उत्पादन (GDP) 8% पर्यंत  नेणे.

   ड) दरडोई सकल देशी उत्पादनात (GDP) वार्षिक वृद्धी 7.6% व्हावी.

   1) अ, ब, क      2) अ, ड     

   3) ब, क           4) अ, ब, क, ड

उत्तर :- 2



1) योग्य जोडया लावा.

                     गती      उदाहरण

         1) स्थानांतरणीय    अ) यात्रेतील फिरणारा पाळणा

         2) परिवलन      ब) पृथ्वीवरील दिवस – रात्र

         3) नियतकालिक    क) चालणारी व्यक्ती

         4) यादृच्छिक    ड) उडणारे फुलपाखरू

        इ) सायकलचा ब्रेक

    1) 1-क, 2-अ, 3-ब, 4-ड  

    2) 1-क, 2-ब, 3-अ, 4-ड

    3) 1-अ, 2-ब, 3-क, 4-ड  

    4) 1-क, 2-ब, 3-ड, 4-अ

उत्तर :- 1


2) योग्य पर्याय निवडा.

            धातू/अधातू      उपयोग

           

            1) पारा        अ) लोखंड, कार्बन, निकेल, क्रोमिअम यांचे संमिश्र

           2) ग्रॅफाइट        ब) लोखंड, कार्बन, यांचे संमिश्र

           3) सल्फर        क) पेन्सिलीतील शिसे

           4) पोलाद        ड) औषधे

           5) स्टेनलेस स्टील      इ) तापमापी

   1) 1-इ, 2-क, 3-ड, 4-ब, 5-अ    

   2) 1-इ, 2-क, 3-ड, 4-अ, 5-ब

   3) 1-इ, 2-क, 3-अ, 4-ड, 5-ब     

   4) 1-इ, 2-क, 3-अ, 4-ब, 5-ड

उत्तर :- 1


3) खालील कोणत्या संघात खुली रक्ताभिसरण संस्था आढळते.

   अ) संघ मोलुस्का    ब) संघ आर्थोपोडा    क) दोन्ही बरोबर    ड) दोन्ही चूक

   1) अ        2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 3


4) अ) वेगबदलाच्या दराला त्वरण असे म्हणतात.

    ब) हवेचा कुठलाही विरोध नसताना उंचीवरून खाली सोडलेल्या वस्तूचे त्वरण एकसमान त्वरण असे म्हणतात.

    क) ऋण त्वरणाला ‘मंदन’ असेही म्हणतात.

          वरीलपैकी सत्य विधान/ विधाने कोणती ?

   1) फक्त अ      2) फक्त ब   

   3) फक्त क      4) अ, ब, क

उत्तर :- 4


5) मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षणबाबत योग्य विधान/विधाने ओळखा.

   अ) लोखंड, जस्त, तांबे हे मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत.

   ब) हे सल्फाईड किंवा कार्बोनेटच्या रूपात आढळतात.

   क) कार्बोनेट मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे ऑक्साईडमध्ये रूपांतर कॅल्सिनेशन पध्दतीव्दारे केले जाते.

   1) अ, ब बरोबर , क चूक   

   2) अ, ब, क बरोबर 

   3) अ, क बरोबर, ब चूक 

   4) सर्व अयोग्य

उत्तर :- 2



1) योग्य जोडया निवडा.

   अ) धवलक्रांतीचे जनक      --  वर्गीस कुरीयन

   ब) जागतिक हरितक्रांतीचे जनक    --  नॉर्मन बोरलाँग

   क) भारतीय हरितक्रांतीचे जनक    --  डॉ. स्वामीनाथन

   ड) महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक  --  वसंतराव नाईक

  1) अ, क, ड    2) अ, ब, ड  

  3) अ, ब, क    4) अ, ब, क, ड

उत्तर :- 4


2) ज्यू  समुदायाला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देणारे गुजरात हे कितवे राज्य आहे.

   1) पहिले    2) दुसरे    

   3) तिसरे      4) चौथ्ये

उत्तर :- 3


3) सह्योग HOP TAC – 2018 हा भारताचा कोणत्या देशाबरोबरचा संयुक्त युध्दाभ्यास आहे.

   1) व्हिएतनाम    2) ऑस्ट्रेलिया 

   3) अमेरिका       4) यापैकी नाही

उत्तर :- 1


4) खालील माहितीचा विचार करा.

   अ) केनियाची राजधानी नैरोबी येथे पहिल्या शाश्वत निल अर्थव्यवस्था परिषद नोव्हेंबर 2018 मध्ये पार पडली.

   ब) या परिषदेचे यजमान पद केनियाने भूषविले.

   क) या परिषदेची संकल्पना निला अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा अशी होती.

  1) अ, क योग्य    

  2) अ, ब योग्य  

  3) अ योग्य   

  4) अ, ब, क योग्य

उत्तर :- 4


5) खालीलपैकी बिनचूक जोडया निवडा. ( 90 वे ऑस्कर पुरस्कार)

   अ) सर्वोत्कृष्ट चित्रपट  -  द शेप ऑफ वाटर

   ब) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  -  त्रिआमो डेलटोरो

   क) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  -  फ्रान्सिस मॅकडोरमंड

   ड) सर्वोत्कृष्ट अभिनेता  -  गॅरी ओल्ड मॅन

  1) अ, ब, क    2) अ, ब, क, ड   

  3) अ, ब, ड    4) अ, क, ड

उत्तर :- 2



1) दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र ‘गाभा क्षेत्र’ मानण्यात आले ?

   अ) औद्योगिक क्षेत्र    

    ब) शिक्षण क्षेत्र

   क) पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा   

   ड) कृषी क्षेत्र

         दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

   1) अ फक्त    2) अ आणि क 

   3) ब फक्त    4) ड  फक्त

उत्तर :- 4


2) नियोजन आयोगाच्या मतानुसार नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले  

     गेले ?

   1) सामाजिक न्याय आणि समतेसह विकास     

   2) सामाजिक न्याय आणि न्यायबुद्धीसह विकास

   3) सामाजिक न्याय आणि रोजगारासहीत विकास  

  4) सामाजिक न्याय आणि आर्थिक समानतेसह विकास

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ‘जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी’ होते.

   ब) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ‘अधिक आणि संतुलित वृद्धी’ होते.

   1) फक्त अ बरोबर   

   2) फक्त ब बरोबर  

   3) दोन्ही बरोबर  

   4) दोन्ही चूक

उत्तर  :- 1


4) 12 व्या योजनेच्या संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहेत ?

   अ) योजनेचा कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017

   ब) नियोजनाचे दोन मसुदे, 9 टक्के विकास दर आणि 9.5 टक्के विकास दर विचारात घेऊन ठरविले आहेत.

   क) औद्योगिक विकासाचा दर 9.6 टक्के आणि 10.9 टक्के.

   ड) शेती उत्पादन वाढीचा दर 5.0 टक्के आणि 5.5 टक्के.

   1) फक्त अ आणि ब  

   2) फक्त क आणि ड  

   3) वरील सर्व   

   4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 4


5) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

     पहिल्या दहा पंचवार्षिक योजना काळात ठरविलेल्या उद्दिष्टांच्या संदर्भात भारताची अर्थव्यवस्थेची स्थूल आंतरदेशीय उत्पादन 

      स्वरूपात विकासाची कामगिरी कशी राहीली ?

   अ) तिस-या पंचवार्षिक योजनेत सगळयात कमी

   ब) दहाव्या पंचवार्षिक योजनेत सगळयात अधिक

   1) केवळ अ अयोग्य     

   2) केवळ ब अयोग्य    

   3) अ व ब दोन्ही अयोग्य नाहीत  

   4) अ व ब दोन्ही अयोग्य आहेत

उत्तर :- 4



1) प्लाझ्मा पदार्थाच्या संशोधनासाठी भारत सरकारने ‘राष्ट्रीय प्लाझ्मा संशोधन केंद्र’ कोठे उभारले आहे ?

   1) चेन्नई      2) अहमदाबाद  

   3) मुंबई      4) बेंगळुरू

उत्तर :- 2



2) अधातूचे भौतिक गुणधर्म विचारात घ्या आणि त्यापैकी कोणता गुणधर्म असा आहे ज्याला हिरा अपवाद आहे.

   अ) चकाकी नसते      ब) विजेचे वहन करत नाहीत

   क) कठीणपणा नसतो      ड) ठिसूळपणा असतो

    1) फक्त क    2) क आणि अ

    3) अ, ब, ड    4) यापैकी नाही

उत्तर :- 3



3) गाईच्या शेणावर उगवलेल्या कवकाला काय म्हणतात ?

   अ) सेक्सिकॉल्स    ब) टेरिकॉल्स    क) कार्टिकॉल्स    ड) क्रोप्रोफिलस

   1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 4



4) विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.

   अ) बोस-आईनस्टाईन कंडनसेट ही पदार्थाची पाचवी अवस्था आहे.

   ब) सत्येंद्रनाथ बोस यांच्या स्मरणार्थ ‘बोस’ आणि ‘अल्बर्ट आईनस्टाईन’ यांचे आईनस्टाईन संज्ञा देण्यात आलेल्या आहेत.

   क) या अवस्थेच्या शोधाबाबत एरिक कार्नेल, यु.काटर्ले आणि कार्ल वेमेन या अमेरिकी शास्त्रज्ञांना 2001 चे नोबेल पारितोषिक 

        देण्यात आले.

        वरीलपैकी सत्य नसलेले विधान/विधाने कोणती ?

   1) अ, क    2) ब, क   

   3) फक्त क    4) एकही नाही

उत्तर :- 4


5) धातूंची ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होतात. मात्र खालीलपैकी असा कोणता धातू आहे. ज्याची 

     ऑक्सिजनसोबत अभिक्रया होत नाही.

   अ) सोने    ब) सोडिअम    क) सिल्वर    ड) मॅग्नेशिअम

   1) फक्त अ, क    2) फक्त ब  

   3) फक्त क         4) यापैकी नाही

उत्तर :-1

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) मानव विकास निर्देशांक 2018 नुसार प्रथम पाच देशांचा बिनचूक क्रम निवडा.

   अ) नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जर्मनी

   ब) नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, आयर्लंड

   क) नॉर्वे, स्वित्झर्लंड, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया

   ड) नॉर्वे, स्वित्झर्लंड, जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया

  1) क      2) ब      3) अ      4) ड

उत्तर :- 3


2) खालील माहितीचा विचार करा.

   अ) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयाचे (स्टॅच्यु ऑफ युनिटी) 31 ऑक्टोबर 2018 रोजी लोकार्पण करण्यात आले.

   ब) स्टॅच्यु ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

   क) स्टॅच्यु ऑफ युनिटी या पुतळयाची उंची 182 मीटर आहे.

   ड) सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.

  1) अ, ब, क बिनचूक       

  2) अ, क, ड बिनचूक

  3) अ, ब, क, ड बिनचूक        

  4) अ, ब, ड बिनचूक

उत्तर :- 3


3) खालील माहितीचा विचार करा.

   अ) 18 ऑगस्ट 2018 रोजी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून इम्रान खानने शपथ घेतली.

   ब) इम्रान खान हे पाकिस्तान  तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख  आहे.

   क) जुलै 2018 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने 116 जागा 

       जिंकल्या.

   ड) पाकिस्तानच्या संसदेला “मजलिस-ए-शुरा” असे म्हणतात.

  1) अ, ब, क, ड योग्य       

  2) अ, क, ड योग्य

  3) अ, ब,  ड यो ग्य      

  4) अ, ब, क योग्य

उत्तर :- 1


4) खालील माहितीचा विचार करा.

   अ) प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारतातील डीएनए तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे डिसेंबर 2017 मध्ये निधन झाले.

   ब) लालजी सिंह यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते.

   क) भारत सरकारने लालजी सिंह यांना पद्मश्री पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता.

  1) अ सत्य        2) अ, क सत्य   

  3) अ, ब सत्य    4) अ, ब, क सत्य

उत्तर :- 4


5) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी  2018 नोबेल पुरस्कार दिला गेला नाही.

   अ) भौतिकशास्त्र    ब) शांतता    क) अर्थशास्त्र    ड) साहित्य

  1) अ, ड    2) ड      3) ब      4) क, ड

उत्तर :-2


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) समतोल प्रादेशिक वाढीसाठी, दहाव्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे :

   1) “राष्ट्रीय समान उन्नती योजने” ची स्थापना

   2) स्वर्णजयंती स्वरोजगार योजनेअंतर्गत साधनसामग्रींचे हस्तांतर

   3) गरीब राज्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन

   4) विशेष विभाग उन्नती कार्यक्रम

उत्तर :- 1




2) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   1) औद्योगिकीकरणामुळे भारतात वृद्धीची क्षमता निर्माण झाली.

   2) भारतात जागतिकीकरणानंतर औद्योगिक उत्पादन वाढले.

   3) दहाव्या पंचवार्षिक योजनाकाळात (2002-2007) औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर जास्त होता.

   4) जागतिकीकरणानंतर भारतीय मोठया उद्योगधंद्यांचा विस्तार झाला.

उत्तर :- 3


3) अ) दहाव्या योजनेदरम्यान सरकारच्या भूमिकेची नव्याने व्याख्या केली गेली.

    ब) परंतु अकराव्या योजनेत समानता आणि सामाजिक न्याय याच्या खात्रीची गरज यावर भर देण्यात आला, दहाव्या योजनेत 

         नाही. 

   1) अ फक्त बरोबर आहे   

   2) ब फक्त बरोबर आहे    

   3)अ आणि ब दोन्ही बरोबर आहे  

  4) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.

उत्तर :- 1


4) जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरिता अवजड उद्योगांमधील गुंतवणूकीवर भर 

    देण्याविषयीची रणनीती म्हणजे :

   1) गांधी प्रतिमान   

   2) नव – गांधी प्रतिमान

   3) महालनोबिस प्रतिमान    

   4) मार्क्स प्रतिमान

उत्तर :- 3


5) दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषि क्षेत्राचा सकल उत्पन्न दर कुठपासून कुठपर्यंत वाढला ? 

अ) 2.0% ते 4.0  %  

ब) 3.7% ते 4.5%    

क) 5.7% ते 8%   

ड) वरीलपैकी कुठलाही नाही  

   1) ‍क      2) ड      3) अ      4) ब

उत्तर :-3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे ?

    1) सागेश्वर – सांगली  

    2) मेळघाट – अमरावती    

    3) राधानगरी – कोल्हापूर  

    4) तानसा – ठाणे

उत्तर :- 3


2) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठय प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?  

   1) विदर्भ      2) मराठवाडा 

   3) कोकण    4) वरील सर्व

उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ................... आहे.

   1) 21%       2) 25%  

    3) 27%      4) 10%

उत्तर :- 1


4) जोडया लावा.

              वन उत्पादने      विभाग

         अ) तेंदूची पाने      i) चंद्रपूर

         ब) खैर कात        ii) नागपूर, गोंदिया

         क) रोशा गवत      iii) डहाणू

         ड) बांबू गवत       iv) गडचिरोली, अमरावती

                अ  ब  क  ड

           1)  ii  iii  iv  i

           2)  i  ii  iii  iv

           3)  iii  iv  i  ii

           4)  iv  iii  ii  i

उत्तर :- 1


5) कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटयांचा काडया बनविण्यास वापरले जाते ?

   1) सागवान    2) साल  

   3) पॉपलर     4) निलगिरी

उत्तर :- 3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

   अ) कृषक प्रजा पक्ष 

    ब) शेडयूलड् कास्टस् फेडरेशन

   क) कम्युनिस्ट पक्ष    

   ड) अपक्ष

1) फक्त अ, क, ड    2) फक्त ब, क, ड          3) फक्त अ, ब, ड       4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 4

2) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.

   ब) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

   क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.

         वरीलपैकी कोणते / ती विधान  / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब      2) ब आणि क 

   3) अ आणि क     4) अ, ब आणि क

उत्तर :- 1


3) सर्वोच्च न्यायालयाने काही  वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या 

    वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?

   अ) समतेचे तत्व      ब) न्यायालयीन पुनर्विलोकन  

   क) संघराज्य      ड) सार्वभौमत्व

   1) अ, ब, क, ड    

   2) ब, क, ड 

   3) अ, ब, क   

   4) अ, ड, क

उत्तर :- 1


4) भारताच्या संघराज्यात्मक पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) राज्यघटनेत ‘संघराज्य’ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही.

   2) संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही.

   3) अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात.

   4) राज्यपालाच्या नेमणूकीची पध्दत भारताने अमेरिकन पध्दती प्रमाणे स्वीकारली आहे.

उत्तर :- 4


5) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ?

   अ) राज्ये अविनाशी नाहीत.   

    ब) आणीबाणी तरतूदी

   क) अखिल भारतीय सेवा   

   ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व    

   इ) राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार

   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, इ 

   3) अ, ब, क, इ     4) ब, क, इ

उत्तर :- 3



1) लार्ज हायड्रॉन कोलॉइडर (LHC) हा जगदविख्यात प्रयोग खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या सीमेवर पार पडला ?

   1) फ्रान्स आणि स्वित्झर्लंड  

   2) रुमानिया आणि तुर्की

   3) स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रीया 

   4) फ्रान्स आणि इटली

उत्तर :- 1


2) खालील काही रासायनिक समीकरण दिले आहेत. त्यापैकी अयोग्य समीकरण ओळखा.

   1) 2 Zn + O2           2 ZnO   

   2) 4 Al + O2         4 AlO3

   3) K2O + H2O                 2 KOH        4) Na2O + H2O                  2 NaoH

उत्तर :- 2


3) योग्य पर्याय निवडा.

   अ) ग्लोब्युलीन    -  शरीरात प्रतिद्रव्ये तयार करतात.

   ब) अलब्युलीन    -  शरीरातील पाण्याचा समतोल राखणे.

   क) प्रोथ्राँबीन    -  रक्त गोठयाच्या प्रक्रियेत मदत करणे.

   ड) फ्राब्रेनोगेन    -  सुज आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन.

   1) अ, ब, क    2) अ, ब, ड  

   3) ब, क, ड    4) अ, ब

उत्तर :- 1


4) 10¼  Fermi म्हणजेच ......

   1) 1 मीटर               2) 100 मायक्रॉन 

   3) 1 अँगस्ट्रॉम युनिट  4) 1 मि. मी.

उत्तर :- 3


5) ‘उभयधर्मी ऑक्साइड’ म्हणजे –

   1) जे धातू ऑक्साईड आम्ल व आम्लारी दोन्हीसोबत अभिक्रिया करतात.

   2) या अभिक्रियांतून क्षार आणि पाणी तयार होते.

   3) Al2O3 हा धातू ऑक्साईड आम्ल व आम्लारी दोन्हीसोबत अभिक्रिया करू शकतो.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) इस्त्रोचे पहिले ‘अवकाश तंत्रज्ञान उबवण’ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले.

   1) सिक्कीम    2) त्रिपूरा   

   3) कर्नाटक     4) यापैकी नाही

उत्तर :- 2


2) देशातील हरवलेल्या मुलांना शोधून काढण्यासाठी नुकतेच कोणते ॲप सुरू केले आहे.

   1) निर्यात मित्र    2) रियुनाइट  

   3) प्राप्ती            4) सुखद

उत्तर :- 2


3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने पहिल्या वित्तीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली.

   अ) सूधा मूर्ती    ब) सुधा बालकृष्णन  क) सुधा कोहली    ड) सुधा चतुर्वेदी

  1) ब      2) अ      3) ड      4) क

उत्तर :- 1


4) द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार या दोन्ही पुरस्कारांची सुरुवात केव्हा झाली.

   1) 1985, 2002    2) 1988, 2004        3) 1988, 2006    4) 1992, 1961

उत्तर :- 1


5) व्यास सन्मान या पुरस्काराची सुरुवात केव्हा पासून झाली.

   1) 1991    2) 1981 

   3) 1993      4) 1982

उत्तर :- 1


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?

   अ) शेतमालाच्या किंमती प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्षात उतरल्या.

   ब) तदनंतर शेतमालाच्या किंमती निरंतर वाढतच गेल्या केवळ 1971-72 वर्ष सोडून

   1) केवळ अ           2) केवळ ब 

   3) कोणतेही नाही    4) दोन्हीही

उत्तर :- 1


2) किमान जीवनमान पुरविण्यासाठी भारतीयांचा भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा सुधारणे हे .......... शी संबंधित आहे.

   1) नेहरू – गांधी प्रतिमान   

   2) नव – गांधी प्रतिमान

   3) नव – गांधी प्रतिमान     

   4) मार्क्स प्रतिमान

उत्तर :- 2


3) बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ‘उपभोग गरीबी’ चे शिरगणती गुणोत्तर किती टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे  ?

   अ) 8      ब) 10      क) 12      ड) 6

   1) ड      2) अ      3) ब      4) क

उत्तर :- 3


4) भारताच्या पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा या एका क्षेत्राला मिळाला .

   1) कृषी व संबंधित सहायक क्षेत्र   

   2) वीज

   3) सिंचन        

   4) वाहतूक आणि दळणवळण

उत्तर :- 4


5) सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी विकासाच्या व्यूह रचनेत ............... समाविष्ट होते.

   अ) कृषी विस्तार सेवा        ब) अनुकूल व्यापार शर्ती

   क) सिंचन विस्तार        ड) संस्थात्मक कर्ज

   1) अ, क        2) अ, क आणि ड  

   3) अ, ब, ड    4) ब, क, ड

उत्तर :- 2


1) खालीलपैकी कोणते एकक ऊर्जेचे एकक नाही ?

   1) न्यूटन             2) न्यूटन/ सेकंद  

  3) न्यूटन/ मिनट    4) यापैकी  नाही

उत्तर :- 4



2) कॅल्शिअम हा धातू पाण्यावर तरंगतो कारण,

   1) कॅल्शिअमची पाण्याबरोबर अभिक्रिया होत असताना तीव्रता कमी असते.

   2) बाहेर पडलेली उष्णता ही हायड्रोजन वायूला पेट घेण्यास पुरेशी नसते.

   3) हायड्रोजनचे बुडबुडे पृष्ठभागावर तयार झाल्यामुळे

   4) वरील सर्व

उत्तर :- 4




3) योग्य पर्याय निवडा.

   अ) झुरळाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.   

 ब) बेडकाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.

   क) मासे यांचे हदय हे दोन कप्प्यांचे असते. 

   ड) सापाचे हदय हे दोन कप्प्यांचे असते.

   1) अ, ब, क, ड    2) ब, क   

   3) ब, क, ड         4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 2




4) खालीलपैकी संपूर्ण सदिश राशींचा समूह कोणता ?

   1) बल, संवेग, त्वरण, वेग  

    2) चाल, वस्तुमान, लांबी, घनता    

   3) संवेग, तापमान, कार्य, बल  

  4) कार्य, ऊर्जा, उष्णता, विस्थापन

उत्तर :- 1





5) धातूची विरल HCl आम्लासोबत अभिक्रिया झाली तर धातूचे .............. तयार होतात व H2 मुक्त होतो आणि धातूंची सल्फुरिक 

    आम्ल सोबत अभिक्रिया होऊन ............... तयार होतात.

     वरील दोन्ही रिक्त जागा भरा.

   1) क्षार, क्लोराइड्स    2) क्लोराइड्स, क्षार   

 3) क्षार, पाणी    4) क्लोराइड्स, सल्फेट

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) जगातील सर्वांत लांब सागरी पुल कोणत्या देशांत बांधण्यात आला आहे.

   1) जर्मनी    2) जपान  

    3) चीन      4) फ्रान्स

उत्तर :- 3



2) राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते.

   1) गुजरात    2) तामिळनाडू 

   3) महाराष्ट्र    4) राजस्थान

उत्तर :- 4



3) गायीला राष्ट्रमाता घोषीत करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.

   1) उत्तराखंड    2) उत्तरप्रदेश  

   3) मध्यप्रदेश    4) महाराष्ट्र

उत्तर :- 1




4) जागतिक शांतता निर्देशांक 2018 नुसार प्रथम स्थानी कोणता देश आहे.

   1) आइसलँड    2) न्युझीलँड 

   3) ऑस्ट्रीया      4) डेन्मार्क

उत्तर :- 1




5) 21 वी राष्ट्रकूल स्पर्धा नुकतीच कोठे पार पडली ?

   अ) ऑस्ट्रेलिया    ब) स्वीडन    क) इंग्लंड    ड) स्कॉटलँड 

  1) ब      2) अ      3) क      4) ड

उत्तर :-. 2


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) अकराव्या पंचवार्षिक योजना आराखडयाचे शीर्षक ............... हे होते.

   1) जलद आणि आर्थिक वृद्धीच्या दिशेने        2) जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीकडे

   3) जलद, अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाकडे   

 4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2



2) आपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे

   1) समाजवादी समाज रचना निर्माण करणे  

  2) आर्थिक विषमता कमी करणे

   3) विभागीय समतोल    

    4) औद्योगिकरण

उत्तर :- 1



3) 12 वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते.

   1) डॉ.  मोन्टेक सिंग अहलुवालिया      2) डॉ. मनमोहन सिंग

   3) डॉ. अरविंद सुब्रमणियम   

   4) डॉ. रघुराम राजन

उत्तर :- 2


4) ही बाराव्या पंचवार्षिक योजनेंची (2012-2017) मुख्य लक्ष्ये आहेत –

   अ) वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृध्दी दर 8 टक्के राखणे.

   ब) अर्भक मृत्युदर 25 प्रति 1000 पर्यंत खाली प्रमाणे.

   क) पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची गुंतवणुक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9 टक्के पर्यंत वाढविणे.

   1) अ फक्त बरोबर आहे    

   2) ब फक्त बरोबर आहे    

   3) अ व ब फक्त बरोबर आहे     

   4) वरील सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 4


5) आर्थिक बाबी संदर्भातील कॅबिनेट समितीने ............ काळात कृषी विस्तार आणि  तंत्रज्ञानवर राष्ट्रीय मिशन अंमलबजावणीस 

     मान्यता दिली आहे.

   1) 9 वी पंचवार्षिक योजनेच्या  

   2) 10 वी पंचवार्षिक योजनेच्या

   3) 11 वी पंचवार्षिक योजनेच्या   

   4) 12 वी पंचवार्षिक योजनेच्या

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबधी खालीलपैकी कोणते वैशिष्टय बरोबर आहे ?

   अ) अत्यंत दाट आहेत.        ब) वार्षिक पानगळ आहे.    

   क) लाकूड टणक आणि टिकाऊ आहे.    ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.

   1) फक्त अ    2) फक्त अ, क आणि ड    3) फक्त क    4) फक्त ब आणि क

उत्तर :- 2


2) पुढील कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?

   अ) मोहगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.

   ब) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात.

   1) केवळ अ योग्य  2) केवळ ब योग्य      3) अ व ब दोन्ही योग्य  4) अ व ब दोन्ही अयोग्य

उत्तर :- 2


3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात

        आहेत.

   ब) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.

   1) अ    

   2) ब     

   3) दोन्ही 

   4) एकही नाही

उत्तर :- 1


4) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात खालीलपैकी कोणती झाडे आढळतात ?

   अ) सागवान    ब) सिसम      क) अंजन    ड) तिवर

   इ) हिरडा

   1) अ, क, ड, इ    2) क, ड, इ   

   3) अ, ब, क         4) अ, ब, क, इ

उत्तर :- 3


5) जोडया लावा.

  वन्य प्राणी अभयारण्य      प्रशासकीय विभाग

  अ) फन्साड        i) अमरावती

  ब) नांदूर – मधमेश्वर      ii) कोकण

     क) किनवट        iii) औरंगाबाद

  ड) मेळघाट        iv) नाशिक

         अ  ब  क  ड

    1)  ii  iv  iii  i

    2)  ii  iv  i  iii

    3)  iv  ii  iii  i

    4)  i  iii  iii  iv

उत्तर :- 1


1) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?

   अ) मूलभूत अधिकार समिती    ब) अल्पसंख्यांक उपसमिती    

   क) सल्लागार समिती      ड) राज्ये समिती

   1) फक्त अ, ब, क    2) फक्त ब, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) फक्त अ, क, ड

उत्तर :- 1


2) भारतीय संघराज्य व्यवस्थेला ‘वाटाघाटीचे संघराज्य’ असे कोणी संबोधले आहे ?

   1) के. सी. व्हिअर  

  2) आयव्हर जेनिंग्ज

  3) ग्रॅनव्हिल ऑस्टिन 

  4) मॉरिस जोन्स

उत्तर :- 4


3) ‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?

   1) एक राज्यघटना  

    2) व्दिगृही कायदेमंडळ  

   3) राज्यघटनेची सर्वोच्चता  

  4) न्यायालयीन पुनर्विलोकन

उत्तर :- 1


4) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?

   1) स्वातंत्र्य      2) समता  

    3) न्याय      4) बंधुभाव

उत्तर :- 3


5) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या ............. 

    घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.

   1) 44 वी      2) 41 वी   

   3) 42 वी      4) 46 वी

उत्तर :- 3



1) जेव्हा वस्तूमधील सर्व कणांचे विस्थापन एखाद्या स्थिर बिंदूभोवती अथवा त्या वस्तूच्या अक्षाभोवती वर्तुळाकार कक्षेत होते, 

     तेव्हा त्या गतीला कोणत्या प्रकारात समाविष्ट कराल ?

   1) एकरेषीय गती  2) परिवलन गती

 3) यादृच्छिक गती  4) नियतकालिक गती

उत्तर :- 2


2) ॲल्युमिनिअम निष्कर्षणाबाबत खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.

1) बॉक्साइटचे ॲल्युमिनीअममध्ये रूपांतर      

2)‍ शुध्द ॲल्युमिनीअमचे विद्युत अपघटनी क्षपण

3) स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते    

4) ॲल्युमिनीअम हा ॲनोड वर जमा होतो

उत्तर :- 4


3) खालील रक्तपट्टीका, रक्तबिंबीकाबाबत काय खरे आहेत.

   अ) यांचा आकार व्दबहिर्वक्र असते.        ब) या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.

   क) या अस्थिमज्जा मध्येच तयार होतात.      ड) या रक्तपेशी सर्व प्राण्यांत आढळतात.

   1) अ, ब, ड    2) अ, ब, क  

   3) ब, क, ड    4) फक्त ब, क

उत्तर :- 2


4) गटात न बसणारा पर्याय निवडा.

   1) लंबकाची गती    

   2) शिवणयंत्राची सुई  

   3) उडणा-या पक्ष्यांचे पंख    

   4) उडते फुलपाखरू

उत्तर :- 4


5) ॲल्युमिनीअम हा मुक्त अवस्थेत आढळत नाही आणि  ॲल्युमिनीअमचा मुख्य धातुके बॉक्साइट आहे, तर बॉक्साइटमध्ये 

     साधारणत: किती टक्के Al2O3 असते.

   1) 20 – 50%    2) 30 – 40%  

   3) 30 – 70%    4) 50 – 70%

उत्तर :- 3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) खालील माहितीचा विचार करा.

   अ) 21 वी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलिया येथे पार पडली.

   ब) 20 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2014 स्कॉटलँड येथे पार पडल्या होत्या.

   क) 22 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये इंग्लंड येथे होणार आहे.

  1) अ, ब सत्य    2) अ, क सत्य  

  3) अ सत्य        4) सर्व सत्य

उत्तर :- 4



2) खालीलपैकी कोणते शहर आपले स्वत:चे ब्रँड आणि बोधचिन्ह असलेले भारतातले पहिले शहर ठरले आहे.

   1) मुंबई      2) जयपूर 

   3) दिल्ली    4) बेंगळूरू

उत्तर :- 4


3) आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 पदतालिकांनुसार प्रथम पाच देशांचा योग्य क्रम निवडा.

   अ) चीन, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, उझबेकिस्तान

   ब) चीन, जपान, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान, इंडोनेशिया

   क) चीन, जपान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान

   ड) चीन, जपान, इंडोनेशिया, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया

  1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 1


4) 2018 चा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला.

   1) रघुनाथ माशेलकर  2) पुष्पा भावे    3) रणजित देसाई    4) राम लक्ष्मण

उत्तर :- 2


5) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या अन्यायाला बळी पडणा-या 

    महिल्यांच्या मदतीकरिता कोणत्या नावाची हेल्पलाईन सुरु केली.

   1) सुहिता         2) वनिता 

   3) हेल्प वुमन    4) यापैकी नाही

उत्तर :- 1


📌📌



1) अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये सरासरी 4 टक्के अभिवृद्धीच्या उद्देशाने “राष्ट्रीय कृषी विकास 

     योजना” 2007-08 वर्षामध्ये सुरू करण्यात आली.

   अ) या योजनेत कोणत्याही विशिष्ट भागाचा विकास अपेक्षित नाही.

   ब) केशरी मोहीम या योजनेत अंतर्भूत नाही.

   1) केवळ अ योग्य    2) केवळ ब योग्य    3) दोन्ही योग्य    4) एकही योग्य नाही

उत्तर :- 4


2) जोडया जुळवा.

  योजना        उद्दिष्टये

         अ) पहिली पंचवार्षिक योजना    i) जलद औद्योगीकरण

         ब) दुसरी पंचवार्षिक योजना    ii) जीवनमानाचा दर्जा उंचावणे

         क) पाचवी पंचवार्षिक योजना    iii) शेतीला प्राधान्य

         ड) दहावी पंचवार्षिक योजना    iv) गरीबी हटाव

               अ  ब  क  ड

           1)  ii  i  iii  iv

           2)  iii  i  iv  ii

           3)  ii  iv  i  iii

           4) iii  iv  i  ii

उत्तर :- 2


3) सामाजिक, आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत 

     स्वीकारण्यात आली ?

   1) आठवी योजना      2) नववी योजना

   3) दहावी योजना       4) अकरावी योजना

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र राज्याचा दहाव्या पंचवार्षिक योजनेतील स्थूल उत्पादनातील सरासरी चक्रवाढ वृध्दी दर किती होता ?

   1) 8.3 टक्के      2) 8.6 टक्के  

   3) 8.7 टक्के      4) 8.2 टक्के

उत्तर :- 1


5) पंचवार्षिक नियोजनात ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला. एका पंचवार्षिक योजनेत एकूण गुंतवणूकीपैकी 43 टक्के 

     गुंतवणूक एकात्मिक ग्रामीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण 

      विकासावर विशेष भर देण्यात आला ?

   1) दुसरी पंचवार्षिक योजना  

   2) पाचवी पंचवार्षिक योजना

   3) सहावी पंचवार्षिक योजना   

   4) अकरावी पंचवार्षिक योजना

उत्तर :- 3



1) महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळयात गळून पडतात कारण

1) उन्हाळयात पाऊस पडत नाही.      

2) उन्हाळयात तापमान जास्त असते.

3) उन्हाळयात हवामान विषम असते.    4) बाष्पीभवन कमी करण्यास्तव

उत्तर :- 4


2) महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी .........% क्षेत्र राखीव, .........% क्षेत्र संरक्षित व ..........% क्षेत्र अवगीकृत जंगलाखाली 

    आहे.

   1) 5, 11, 84    2) 11, 5, 84  

   3) 84, 11, 5    4) 85, 5, 10

उत्तर :- 3


3) खालील विधाने पहा.

   अ) उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात.

   ब) उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात.

   क) पळस, शिसम, खैर इ. वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात.

1) फक्त अ विधान बरोबर आहे.    

2) फक्त ब विधान बरोबर आहे.

3) फक्त क विधान बरोबर नाही.    

4) विधान अ, ब आणि क बरोबर नाहीत.

उत्तर :- 3


4) जोडया जुळवा.

                 अभयारण्य      जिल्हा

         अ) नरनाळा        i) यवतमाळ

         ब) टिपेश्वर        ii) उस्मानाबाद

         क) अनेर        iii) अकोला

         ड) येडशी रामलींग घाट    iv) नंदूरबार

                अ  ब  क  ड

           1)  iii  i  iv  ii

           2)  ii  i  iii  iv

           3)  iv  ii  i  iii

           4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?

   1) लातूर            2) मुंबई उपनगर  

   3) उस्मानाबाद    4) जालना

उत्तर :- 1



1) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट – 1935 मधील खालील तरतूदी विचारात घ्या :

   अ) या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व

         प्रदान केले.

   ब) शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते.

   क) या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली.

1) विधाने अ, ब बरोबर आहेत      

2) विधाने ब, क बरोबर आहेत

3) विधाने अ, क बरोबर आहेत      

4) विधाने अ, ब, क बरोबर आहेत

उत्तर :- 3


2) 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते 

    विधान बरोबर नाही ?

   1) सभा पूर्णत: सार्वभौम संस्था बनली.2) सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली.

   3) सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.

   4) मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली.

उत्तर :- 3


3) संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते.

   1) डॉ. बी. आर. आंबेडकर 

   2) जे. बी. कृपलानी

   3) सरदार वल्लभभाई पटेल  

   4) जवाहरलाल नेहरू

उत्तर :- 3


4) घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.

   1) आयर्लंड       2) यु. के.    

   3) यु. एस्. ए.    4) ऑस्ट्रेलिया

उत्तर :- 3


5) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे :

1) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य    

2) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य

3) सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य        4) प्रजासत्ताक गणराज्य

उत्तर :- 2



1) भारतात राष्ट्रीय उत्पन्ना विषयीचे अंदाज ................ कडून सादर केले जातात.
   1) नियोजन मंडळ    2) भारतीय रिझर्व्ह बँक    
   3) वित्त मंत्रालय      4) केंद्रीय सांख्यिकी संघटन 
उत्तर :- 4

2) भारतीय अर्थव्यवस्थेत 2008 – 09 या वर्षात सेवा क्षेत्राचा वृद्धी दर काय होता ?
   1) 8.9%      2) 7.1%   
   3) 7.9%      4) 9.8%
उत्तर :- 4

3) भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे क्षेत्र आहे ?
   1) प्राथमिक    2) व्दितीय  
  3) सेवा           4) बाहय
उत्तर :- 3

4) खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.
      राष्ट्रीय उत्पन्न वाढले की करांपासून मिळणारे उत्पन्न आपोआप वाढते, तर त्यास ............. म्हणतात.
   1) अंतर्गत परिवर्तनियता  
    2) अंतर्गत करव्यवस्था
   3) अंतर्गत मूल्यवृध्दि  
    4) अंतर्गत विकास
उत्तर :- 1
5) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.
   1) केंद्र शासन फक्त      
   2) राज्य शासन फक्त
   3) केंद्र आणि राज्य शासन दोन्हीही        4) वरीलपैकी नाही
उत्तर :-3

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌

1) जोडया जुळवा.
                       अ      ब
         अ) सिंधुदुर्ग             1) पेट्रोलियम/ खनिज तेल
         ब) मुंबई             2) औषधी खनिजयुक्त पाणी
         क) गडचिरोली           3) मँगनीज
         ड) ठाणे             4) चुनखडी
   1) अ-4, ब-2, क-1, ड-3  
    2) अ-3, ब-1, क-4, ड-2
   3) अ-3, ब-2, क-4, ड-1  
    4) अ-2, ब-1, क-3, ड-4
उत्तर :- 2

2) तारापूर अणूविद्युत केंद्र ............. जिल्ह्यात आहे.
   1) रायगड    2) ठाणे    
   3) नाशिक    4) पुणे 
उत्तर :- 2

3) हापूस आंब्याची झाडे ................ जिल्ह्यात आढळतात.
   1) सिंधुदुर्ग    2) रत्नागिरी 
   3) रायगड    4) वरील सर्व जिल्ह्यात
उत्तर :- 4

4) महाराष्ट्रात प्रामुख्याने ...........ऊर्जेचा वापर केला जातो.
   1) औष्णिक    2) अणु   
    3) पवन        4) नैसर्गिक
उत्तर :- 1

5) संकल्पित जैतापूर अणू-ऊर्जा प्रकल्पाचे स्थान .............. या जिल्ह्यात आहे.
   1) रत्नागिरी    2) सिंधुदुर्ग  
   3) कोल्हापूर    4) सोलापूर
उत्तर :- 1

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌

1) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ?
   अ) समाजवादी    आ) धर्मनिरपेक्ष    इ) सार्वभौम    ई) लोकशाही    उ) गणराज्य
   ऊ) न्याय    ए) स्वातंत्र्य    ऐ) समानता    ओ) बंधुता    औ) एकात्मता

   1) अ,  ब, औ    2) क, ड, ऊ  
   3) उ, ए, ऐ        4) अ, ड, ओ
उत्तर :- 1

2) भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ............ प्रभाव दिसतो.
   अ) कॅनडाची राज्यघटना   
   ब) जपानची राज्यघटना
   क) इंग्लंडची राज्यघटना  
   ड) अमेरिकेची राज्यघटना
   1) अ व क    2) क व ड  
   3) फक्त ड    4) फक्त ब
उत्तर :- 3

3) भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
   1) 1952      2) 1966   
   3) 1976      4) 1986
उत्तर :- 3

4) उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे.
   1) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना
   2) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना
   3) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा
   4) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा
उत्तर :- 2

5) 1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ?
   अ) सार्वभौम आणि समाजवादी     
    ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष
   क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा   
   ड) एकता आणि एकात्मता
        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
   1) फक्त ब         2) ब आणि क 
   3) क आणि ड    4) ब आणि ड  
उत्तर :- 1