Monday 19 April 2021

भारतातील गरिबांची संख्या गेल्या वर्षभरात दुपटीहून अधिक



🔰गरिबी सर्वाधिक वेगाने कमी होणारा जगातील पहिल्या क्रमांकाचा देश असलेल्या भारतातील गरिबांच्या संख्येत, ४५ वर्षांच्या कालावधीनंतर गेल्या वर्षभराच्या काळात सर्वाधिक भर पडली आहे.


🔰गल्या दशकभराच्या काळात सर्वात कमी आर्थिक वाढीची नोंद झाली असतानाच भारताला करोना महासाथीचा फटका बसला. ज्या ठिकाणी देशातील बहुतांश ग्राहक व गरीब लोक राहतात, त्या ग्रामीण भागावर मंदावणाऱ्या अर्थव्यवस्थेचा विपरीत परिणाम झाला आहे.


🔰या संदर्भात कुठलीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नसली, तरी ग्रामीण भागातील दारिद्र्यातील वाढ कुणाच्याही लक्षात येऊ शकते. या भागात बेकारीचे प्रमाण मोठे होते; ग्राहकांचा खर्च (कंझ्युमर एक्सपेंडिचर) सतत कमी होत होता आणि विकासावरील खर्च अवरुद्ध झाला होता. हे तीन घटक एखाद्या अर्थव्यवस्थेचे आरोग्य ठरवतात.


🔰परामुख्याने असंघटित कामगार आणि गरीब यांचा समावेश असलेल्या ग्रामीण भारतीयांनी २०२१ साली एक वर्षभराहून अधिक काळ अनियमित रोजगारासह दिवस काढले आहेत. लोकांनी अन्नधान्यावरचा खर्च कमी केला आहे आणि धान्य महागल्यामुळे अनेकांनी मसुरीच्या डाळीसारखे प्राथमिक अन्नधान्य वापरणे सोडून दिले आहे.

क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत चॅफ तंत्रज्ञान भारतात विकसित


🔰संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (DRDO) शत्रूच्या क्षेपणास्त्र हल्ल्यापासून नौदलाच्या जहाजांचे रक्षण करणारे अद्ययावत चॅफ / शाफ (Chaff) तंत्रज्ञान विकसित केले आहे.


🔰DRDOच्या जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळेने (DLJ) या महत्वाच्या तंत्रज्ञानाचे तीन स्वदेशी प्रकार विकसित केले आहेत. भारतीय लष्कराच्या गुणात्मक आवश्यकतांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने लघु पल्ला चॅफ रॉकेट (SRCR), मध्यम पल्ला चॅफ रॉकेट (LRCR), दीर्घ पल्ला चॅफ रॉकेट (LRCR) विकसित करण्यात आले आहे.


🔰शत्रूच्या रडार आणि रेडीओ फ्रिक्वेन्सी क्षेपणास्त्र यापासून नौदलाच्या जहाजांचे संरक्षण करण्यासाठी चॅफ तंत्रज्ञानाचा जगभरात वापर केला जातो. शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशा विचलित करून त्यापासून जहाजांचे रक्षण करण्यासाठी हवेत तैनात केलेली अतिशय कमी तीव्रतेची चॅफ सामग्री काम करते.


🔰भारतीय नौदलाने अरबी समुद्रात नौदलाच्या नौकेवर या तीनही प्रकारांच्या नुकत्याच चाचण्या यशस्वीरीत्या घेतल्या. धोरणात्मक दृष्ट्या महत्वाचे असलेले हे तंत्रज्ञान कमी कालावधीत स्वदेशात विकसित करून मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी मोकळे करण्यात आले आहे.

सरन्यायाधीशपदी रमणा यांची नियुक्ती.



🔰सर्वोच्च न्यायालयातील सर्वांत वरिष्ठ न्यायाधीश असलेले नुथलापती वेंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी मंगळवारी नेमणूक करण्यात आली आहे. जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार न्या. रमणा हे देशाचे ४८वे सरन्यायाधीश म्हणून २४ एप्रिलला शपथ घेणार आहेत.


🔰सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे निवृत्त होत असून ते निवृत्त होण्याच्या एक दिवस आधी रमणा यांचा शपथविधी होत आहे. रमणा हे २६ ऑगस्ट २०२२ मध्ये निवृत्त होणार आहेत.


🔰अधिसूचनेत म्हटले आहे की, अनुच्छेद १२४ मधील दुसऱ्या कलमानुसार राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांतर्गत न्या. नुथलापती वेंकट रमणा यांची देशाच्या सरन्यायाधीशपदी २४ एप्रिल २०२१ पासून नियुक्ती करण्यात येत आहे. पंतप्रधानांचे मुख्य सचिव पी. के. मिश्रा व कायदा मंत्रालयाचे सचिव बरुण मिश्रा यांनी राष्ट्रपतींची स्वाक्षरी असलेले नियुक्तीपत्र रमणा यांना सकाळी दिले.


🔰रमणा यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पोन्नावरम येथे २७ ऑगस्ट १९५७ रोजी झाला असून ते १० एप्रिल १९८३ रोजी वकिलीच्या क्षेत्रात आले. नंतर आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात २७ जानेवारी २०२० रोजी कायम न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली. काही काळ ते आंध्र उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश होते.


🔰२ सप्टेंबर २०१३ रोजी ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. तर १७ फेब्रुवारी २०१४ रोजी ते सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश झाले.  रमणा यांनी अनेक महत्त्वाची प्रकरणे हाताळली असून अनुच्छेद ३७० च्या घटनात्मक वैधतेवर नेमलेल्या पाच सदस्यांच्या  घटनापीठात त्यांचा समावेश होता. त्या वेळी हे प्रकरण सात सदस्यांच्या न्यायपीठाकडे देण्यास घटनापीठाने नकार दिला होता.

निती आयोग पुनर्रचना



🔰अध्यक्ष : पंतप्रधान नरेंद्र मोदी

🔰उपाध्यक्ष : डॉ. राजीव कुमार


🅾️पर्ण कालीन सदस्य :

1. व्ही. के. सारस्वत

2. प्रा. रमेश चंद

3. डॉ. व्ही. के. पॉल


🅾️पदसिद्ध सदस्य (4) :


1. राजनाथ सिंह (संरक्षण मंत्री)

2. अमित शाह (गृह मंत्री)

3. निर्मला सीतारामन (वित्त मंत्री)

4. नरेंद्र सिंह तोमर (ग्रामीण विकास, पंचायत राज, कृषी मंत्री)


🅾️विशेष आमंत्रित सदस्य (4) :


1. नितिन गडकरी (रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री, MSME मंत्री)

2. पीयूष गोयल (रेल्वे मंत्री, वाणिज्य व उद्योग मंत्री) 3. थावर चंद गहलोत (सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्री)

4. राव इंद्रजीत सिंह (सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबाजवणी राज्य मंत्री)

जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ भारतात.



🔰जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील आहेत, दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर आहे, असे आयक्यूएअर या स्विस संघटनेने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे.


🔰तथापि, दिल्लीतील हवेच्या दर्जात २०१९ ते २०२० या कालावधीत १५ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे, असेही अहवालामध्ये म्हटले आहे. हवेच्या दर्जात सुधारणा झाली असली तरी दिल्ली हे १० व्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे आणि जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर आहे, असे अहवालामध्ये म्हटले आहे.


🔰जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील असल्याने प्रदूषित शहरांच्या श्रेणीत भारताचे स्थान अद्याप कायम आहे. दिल्लीसह गझियाबाद, बुलंदशहर, बिसराख जलालपूर, नोइडा, ग्रेटर नोइडा, कानपूर, लखनऊ, मेरठ, आग्रा आणि मुझफ्फरनगर त्याचप्रमाणे राजस्थानातील भिवारी, फरिदाबादर्, ंजद, हिसार, फतेहाबाद, बंधवारी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक आणि धरुहेरा आणि बिहारमधील मुझफ्फरपूर ही अन्य २१ शहरे प्रदूषित आहेत.


🔰सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत चीनमधील झिनजिआंगचा समावेश आहे त्यापाठोपाठ भारतातील नऊ शहरांचा समावेश आहे. गझियाबाद हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. भारतामध्ये हवेचे प्रदूषण प्रामुख्याने वाहतूक, स्वयंपाकासाठी जाळण्यात येणारा बायोमास, वीजनिर्मिती, उद्योग, बांधकाम आणि कचरा जाळणे यामुळे होत आहे.

सरकारी ताफ्यातील प्रदूषणकारी वाहने लवकरच बाद



🔰दशात पंधरा वर्षे जुन्या सरकारी वाहनांच्या नोंदणी नूतनीकरणास १ एप्रिल २०२२ नंतर परवानगी न देण्याचा प्रस्ताव सरकारने मांडला आहे. त्यामुळे प्रदूषण करणारी अनेक वाहने वापरातून बाद होणार आहेत.


🔰सरकारने या प्रस्तावावर संबंधितांची मते मागवली असून ही अधिसूचना मंजूर झाल्यास वाहन उद्योगाला उत्तेजन मिळणार आहे तसेच प्रदूषणालाही आळा बसेल. पण त्याचबरोबर सरकारला नवीन वाहने खरेदी करावी लागणार आहेत. सरकारने स्वेच्छेने जुनी वाहने निकाली काढण्याचे धोरण २०२१-२२ पासून जाहीर केले असून वीस वर्षे जुन्या व्यक्तिगत व १५ वर्षे जुन्या व्यावसायिक वाहनांची चाचणी करून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.


🔰ही अधिसूचना १२ मार्चला जारी केली असून केंद्र सरकारने संबंधितांची मते त्यावर मागवली आहेत. सरकारी वाहने जर पंधरा वर्षे जुनी असतील तर त्यांच्या परवान्याचे नूतनीकरण १ एप्रिल २०२२ पर्यंतच करता येईल असा हा प्रस्ताव आहे.

सार्वजनिक बँका विकणे मोठी चूक’


🔰दशाची अर्थव्यवस्था सध्या करोनाच्या अवकळेतून बाहेर पडण्याच्या स्थितीत असताना पतधोरण व्यवस्थेच्या चौकटीत धोकादायक बदल केल्यास रोखे बाजारात अस्वस्थता निर्माण होण्याची शक्यता आहे, असे मत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी व्यक्त केले आहे. सार्वजनिक बँका खासगी उद्योगसमूहांना विकणे ही मोठी चूक ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले. चालू पतधोरण व्यवस्थेत चलनवाढ रोखून आर्थिक वाढ साकार करण्याचे उद्दिष्ट आहे असे त्यांनी स्पष्ट केले.


🔰तयांनी असे मत व्यक्त केले, की भारताने २०२४-२५ पर्यंत पाच लाख कोटींची अर्थव्यवस्था साकार करण्याचे ठेवलेले उद्दिष्ट फार महत्त्वाकांक्षी असून करोना काळाच्या आधीही हे लक्ष्य ठरवताना काळजीपूर्वक आकडेमोड केलेली दिसत नाही. पतधोरण हे चलनवाढ खाली आणू शकते यावर आपला विश्वास आहे. रिझर्व्ह बँकेला काही प्रमाणात लवचीकता दिल्यास त्यातून अर्थव्यवस्थेला हातभार लागू शकतो. कुठलीही व्यवस्था अस्तित्वात नसताना जर आपण वित्तीय तूट हाताळण्याचा प्रयत्न केला असता तर काय झाले असते याची कल्पनाही आपण करू शकत नाही.


🔰पतधोरणाचा भाग म्हणून चलनवाढ २ ते ६ टक्के या दरम्यान ठेवण्याच्या मुद्द्यावर फेरविचाराची आवश्यकता आहे का, या प्रश्नावर उपरोल्लेखित स्पष्टीकरण केले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला किरकोळ क्षेत्रातील चलनवाढ ४ टक्क््यांपर्यंत ठेवण्यास मुभा आहे, त्यात अलीकडे २ टक्के व पलीकडे २ टक्क््यांपर्यंत मुभा आहे. याचाच अर्थ ती ४ ते ६ टक्के ठेवण्यास हरकत नाही असे सध्याचे धोरण आहे.


🔰रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहा सदस्यीय पतधोरण समितीने ही परिस्थिती लक्षात घेऊनच व्याज  दर ठरवून दिले आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये  मध्यावधी मुदतीसाठी चलनवाढीची ठरवून दिलेली मर्यादा ३१ मार्चला संपुष्टात येत आहे. त्यानंतरच्या पाच वर्षांसाठी म्हणजे १ एप्रिलपासून पुढे पाच वर्षांसाठी चलनवाढीची मर्यादा ठरवण्यात येत आहे.

महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे



Q 1. मानवाधिकाराचे जनक कोणाला म्हणतात? 

- रेने कॅसिन


Q 2. भारतात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची स्थापना कधी झाली ?

- 12 ऑक्टोबर 1993


Q 3. सर्वाधिक उंच पर्वतरांगा कोणत्या खंडात आढळतात?

- आशिया खंडात


Q 4. जगातील सर्वात जास्त लांबीच्या पर्वतरांगा कोठे आहेत ? 

-अँडिज (7000 मीटर), रॉकी पर्वत रांग (4,500 मीटर)


Q 5. महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने डिसेंबर 2020 मध्ये कोणत्या क्षेत्रास अभयारण्याचा दर्जा बहाल केला ?

-कन्हारगाव अभयारण्य


Q 6. चीनने कोणत्या नदीवर बांध (धरण) बांधून जलविद्युत् प्रकल्प निर्माण करण्याचे योषित केले? - यारलुंग ल्सांग्पो (ब्रह्मपुत्रा) 


Q 7. शेतपीकांचा हमीभाव कोण ठरवितो?

- कमिशन फॉर अॅग्रिकल्चररल कॉस्ट अँड प्रायसेस आयोग 


Q 8. माऊंट एव्हरेस्टची उंची किती सेंटीमीटरने वाढली, अशी घोषणा नेपाळ व चीनने केली?

- 86 सेंटिमीटर


Q 9. माऊंट के-2 पर्वत शिरवरांची उंची किती आहे ?

- 8611 मीटर 


Q 10. माऊंट अॅल्बस कोणत्या पर्वत रांगेत आहे ?

- कॉकेशस पर्वतरांगेत (युरोप)

वेगवेगळ्या क्षेत्रातील पहिल्या भारतीय महिला



1] अवनी चतुर्वेदी, भावना कांत आणि मोहना सिंग: भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच फायटर पायलट ‘सुपरसॉनिक फायटर जेट’ विमानं उडवणाऱ्या महिला


2] इंदिरा गांधी: देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान


3] कल्पना चावला: अंतराळात जाणारी पहिली भारतीय महिला


4] दुर्गाबाई कामत: दुर्गाबाई कामत या पहिल्या भारतीय महिला अभिनेत्री होत्या.


5] प्रिया जिंघन: भारतीय सैन्यात भरती होणाऱ्या पहिल्या महिला


6] पी.व्ही.सिंधू: रिओ ऑलिम्पिकमध्ये महिला बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही.सिंधूने रौप्य पदकाची कमाई केली. ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई करणारी पहिली महिला ठरली


7] आनंदीबाई गोपाळ जोशी: भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून वेळप्रसंगी समाजाचा रोष पत्करून आनंदीबाई शिकल्या, भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला.


8] अदिती पंत: अंटार्टिकावर जाणाऱ्या पहिल्या भारतीय महिला


9] बचेंद्री पाल: या एव्हरेस्ट सर करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या. १९९४ साली त्यांनी जगातील सर्वात उंच शिखर सर केले. भारत सरकारने २०१९ साली त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.


10] रिटा फेरिया पॉल: मिस वर्ल्डचा किताब पटकावणारी पहिली भारतीय महिला


11] हिना सिंधू: वर्ल्डकप शुटिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय महिला.


12] मिताली राज: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६००० धावांचा टप्पा पार करणारी पहिली भारतीय महिला. एकदिवसीय सामन्यात २०० एकदिवसीय सामने खेळणारी ती पहिली महिला क्रिकेटपटू आहे


13] होमी वरारावाला: छायाचित्रकार म्हणून प्रसारमाध्यमांमध्ये काम करणाऱ्या (फोटो जर्नालिस्ट) पहिल्या भारतीय महिला साडी नेसून खांद्यावर कॅमेरा घेतलेला त्यांचा फोटो त्या काळाची प्रचिती देतो.


14] सायना नेहवाल: ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू


15] फातिमा बेवी: सर्वोच्च न्यायलयातील पहिल्या महिला न्यायाधीश


16] दीपा मलिक: २०१६ साली रिओ येथे झालेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला


17] पी. टी. उषा: ऑलिम्पिक खेळां

भारतातील चक्रीवादळे व विविध देशांकडून दिलेली नावे (२०१९-२०२०)



🌀 बरेवी : तमिळनाडू 

✔️ नाव दिले : मालदीव


🌀 निवार : तमिळनाडू , आंध्रप्रदेश 

✔️ नाव दिले : इराण


🌀 फनी : ओडिशा , पश्र्चिम बंगाल 

✔️ नाव दिले : बांग्लादेश


🌀 वायु : भारत , पाकिस्तान

✔️ नाव दिले : भारत 


🌀 हिक्का : गुजरात

✔️ नाव दिले : मालदीव 


🌀 महा : ओमान , श्रीलंका , भारत 

✔️ नाव दिले : ओमान


🌀 बलबुल : बांग्लादेश , भारत

✔️ नाव दिले : पाकिस्तान


🌀 कयार : सोमालिया , भारत , येमन

✔️ नाव दिले : म्यानमार 


🌀 पवन : सोमालिया , भारत 

✔️ नाव दिले : श्रीलंका 


🌀 अम्फान : ओडिशा , पश्र्चिम बंगाल

✔️ नाव दिले : थायलंड


🌀 निसर्ग : महाराष्ट्र , गोवा , गुजरात

✔️ नाव दिले : बांग्लादेश .


✅ यणारी चक्रीवादळे व त्यांची नावे 


🌀 तौकते : म्यानमार 

🌀 यास : ओमान

महाराष्ट्र भुषण पुरस्काराचे आतापर्यंतचे विजेते



👤 १९९६ : पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे

🙎‍♀ १९९७ : लता मंगेशकर 

👤 १९९९ : विजय भटकर 

👤 २००१ : सचिन तेंडुलकर

👤 २००२ : भिमसेन जोशी 

👤 २००३ : अभय बंग व राणी बंग 🙎‍♀

👤 २००४ : बाबा आमटे 

👤 २००५ : रघुनाथ माशेलकर

👤 २००६ : रतन टाटा 

👤 २००७ : आर के पाटील

👤 २००८ : नाना धर्माधिकारी 

👤 २००८ : मंगेश पाडगावकर

🙎‍♀ २००९ : सुलोचना लाटकर 

👤 २०१० : जयंत नारळीकर

👤 २०११ : डॉ. अनिल काकोडकर 

👤 २०१५ : बाबासाहेब पुरंदरे 

काही महत्त्वपूर्ण पुरस्कारांचे स्थापना वर्ष



🏆 नोबेल पुरस्कार : १९०१

🏆 पलित्झर पुरस्कार : १९१७

🏆 ऑस्कर पुरस्कार : १९२९

🏆 गोल्डन ग्लोब पुरस्कार : १९४३

🏆 कलिंगा पुरस्कार : १९५२

🏆 भारतरत्न पुरस्कार : १९५४

🏆 पद्म पुरस्कार : १९५४

🏆 साहित्य अकादमी पुरस्कार : १९५५

🏆 मगसेसे पुरस्कार : १९५७

🏆 अर्जुन पुरस्कार : १९६१

🏆 लाल बहादूर शास्त्री रा. पुरस्कार : १९६५

🏆 मनबुकर पुरस्कार : १९६९

🏆 आतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार : २००५

🏆 दादासाहेब फाळके पुरस्कार : १९६९

🏆 शिवछत्रपती पुरस्कार : १९७०

🏆 आगा खान पुरस्कार : १९७७

🏆 राईट लिवलीहुड पुरस्कार : १९८०

🏆 दरोणाचार्य पुरस्कार : १९८५

🏆 सरस्वती सम्मान : १९९१

🏆 वयास सम्मान : १९९१

🏆 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार : १९९१_९२

🏆 महात्मा गांधी शांतता पुरस्कार : १९९५

🏆 महाराष्ट्र भुषण पुरस्कार : १९९६

🏆 धयानचंद पुरस्कार : २००२

🏆 एबेल पुरस्कार : २००३ .

Latest post

चालू घडामोडी :- 17 मार्च 2024

◆ काश्मीरमध्ये जमीन खरेदी करणारे महाराष्ट्र हे पहिले भारतीय राज्य ठरले आहे. ◆ 2025 मध्ये चॅम्पियन क्रिकेट करंडक स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान ...