Wednesday 20 March 2024

चालू घडामोडी :- 20 मार्च 2024

◆ विक्रम साराभाई स्पेस सेंटर (VSSC) ने गगनयान मोहिमेवर अंतराळवीरांना मदत करण्यासाठी "सखी" बहुउद्देशीय ॲप विकसित केले आहे.


◆ ओडिशाचे मुख्यमंत्री पटनायक यांनी भुवनेश्वर येथील कलिंगा स्टेडियममध्ये भारतातील पहिले इनडोअर ॲथलेटिक्स स्टेडियम आणि जलचर केंद्राचे अनावरण केले.


◆ भारताचा दिग्गज खेळाडू पंकज अडवानीचा चीनच्या शंगराओ सिटी येथील जागतिक बिलिर्डस संग्रहालयातील हॉल ऑफ फेममध्ये समावेश झाला आहे.


◆ NVIDIA ने Humanoid रोबोट्‌ससाठी प्रोजेक्ट GROOT फाउंडेशन मॉडेल जाहीर केले.


◆ शास्त्रज्ञांनी मंगळावर 29,600 फूट उंच आणि 450 किलोमीटर रुंद पसरलेल्या 'नोक्टिस ज्वालामुखी या प्रचंड ज्वालामुखीचा शोध लावला आहे.


◆ विनय कुमार, 1992 बॅचचे IFS अधिकारी, यांची रशियामधील भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ 1997 च्या बॅचचे IFS अधिकारी टी. आर्मस्ट्राँग चांगसान यांची क्युबातील भारताचे पुढील टराजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ झारखंडचे टराज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे तेलंगणाचे राज्यपाल आणि पुद्दुचेरीचे नायब राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.


◆ 'जागतिक चिमणी दिन' दरवर्षी 20 मार्च रोजी साजरा केला जातो.


◆ ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी भुवनेश्वरमधील 'कलिंगा स्टेडियम' येथे भारतातील पहिल्या इनडोअर ॲथलेटिक्स आणि जलतरण केंद्रांचे उद्घाटन केले.


◆ भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी सराव ‘एक्स टायगर ट्रायम्फ-24’ सुरू झाला आहे.


◆ गयानाने भारतीय बनावटीचे डॉर्नियर विमान खरेदी करण्याचा करार केला आहे.


◆ भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी विवेक सहाय यांची पश्चिम बंगालचे नवे महासंचालक आणि पोलीस महानिरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ निवडणूक आयोगाने ‘नो युवर कॅन्डीडेट’ ॲप लाँच केले आहे.


◆ IQAIR च्या अहवालानुसार बिहारचे बेगुसराय हे जगातील सर्वात प्रदूषित शहर ठरले आहे.


◆ नेपाळ सरकारने अधिकृतपणे पोखरा ही देशाची पर्यटन राजधानी म्हणून घोषित केली आहे.


◆ ‘इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स’ ने आपला 37 वा स्थापना दिवस साजरा केला.


◆ कुमार व्यंकटसुब्रमण्यम हे P&G इंडियाचे नवे सीईओ बनले आहेत.


◆ मल्याळम भाषेतील प्रसिद्ध कवयित्री ‘प्रभा वर्मा’ यांना सरस्वती सन्मानाने सन्मानित करण्यात येणार आहे.


◆ ‘नॉर्थ ईस्ट गेम्स 2024’ ची तिसरी आवृत्ती नागालँडमध्ये सुरू झाली आहे.


◆ उत्तर प्रदेश पोलिसांनी ‘त्रिनेत्र 2.0’ हा डिजिटल प्लॅटफॉर्म लॉन्च केला आहे.


साम्यानज्ञान प्रश्नोउत्तरे -भूगोल(भारत) (Geography)


🔹 1. मुंबर्इ बंगलोर NH-4 हा कोणता मार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग ✅ 

राज्य मार्ग

जिल्हा मार्ग

ग्रामीण मार्ग


🔹 2. खालीलपैकी कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभजक आहे.

अरवली 

विंध्य

सहयाद्री

सातपुडा ✅


🔹 3. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात?

पश्चिमी घाट ✅

निलगिरी पर्वत

अरवली पर्वत

सातपूडा पर्वत


🔹 4. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र ………… आहे

श्रीहरीकोटा ✅

कोचीन

हसन

बेंगलोर


🔹 5. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.

कॄष्णा 

दामोदर

अलमाटी

सतलज ✅


🔹 6. ........... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

जोग ✅

नायगारा

कपिलधारा 

शिवसमुद्र


🔹 7. पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्ष वृत्तवर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो.

९०° अक्षांश 

६०° अक्षांश

१८०° अक्षांश ✅

३८०° अक्षांश


🔹 8. आठव्या पंचवार्षिक योजनेत रेल्वेच्या कशावर अधिक भर देण्यात आला आहे.

विद्युतीकरणावर ✅

रूंदीकरणावर

संगणकीकरणावर

खासगीकरणावर


🔹 9. ............... हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

श्रीलंका 

आयर्लंड

ग्रीनलंड ✅

ऑस्ट्रेलिया 


🔹 10. नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?

पाणी 

तापमान 

वातावरण ✅

सर्व परीक्षा महत्वाचे 50 प्रश्न आणि उत्तरे


1) सफरचंदात कोणते आम्ल आढळते?

उत्तर malic ऍसिड


२) चिंचेमध्ये कोणते आम्ल आढळते?

उत्तर टार्टारिक आम्ल


3) दूध आणि दह्यामध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर लैक्टिक ऍसिड


4) व्हिनेगरमध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर ऍसिटिक ऍसिड


5) लाल मुंगीच्या नांगीमध्ये कोणते आम्ल असते?

उत्तर फॉर्मिक आम्ल


6) लिंबू आणि आंबट पदार्थांमध्ये कोणते ऍसिड आढळते?

उत्तर सायट्रिक आम्ल


7) टोमॅटोच्या बियांमध्ये कोणते आम्ल आढळते?

उत्तर ऑक्सॅलिक ऍसिड


8) किडनी स्टोनला काय म्हणतात?

उत्तर कॅल्शियम ऑक्सलेट


9) प्रथिनांच्या पचनासाठी कोणते आम्ल उपयुक्त आहे?

उत्तर हायड्रोक्लोरिक आम्ल


10) सायलेंट व्हॅली कुठे आहे?

उत्तर केरळा


11) इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर गुरुग्राम (हरियाणा)


12) विक्रम साराभाई अंतराळ केंद्र कोठे आहे?

उत्तर तिरुवनंतपुरम


13) सतीश धवन अंतराळ केंद्र कोठे आहे?

उत्तर श्री हरिकोटा


14) भारतीय कृषी संशोधन केंद्र कोठे आहे?

उत्तर नवी दिल्ली


15) केंद्रीय भात संशोधन संस्था कोठे आहे?

उत्तर कटक (ओडिशा)


16) हॉकी विश्वचषक 2023 कोणत्या देशात आयोजित केला जाईल?

उत्तर भारत


17) हॉकीचा जादूगार कोणाला म्हणतात?

उत्तर मेजर ध्यानचंद


18) क्योटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे?

उत्तर हरितगृह वायू


19) मॉन्ट्रियल प्रोटोकॉल कोणाशी संबंधित आहे?

उत्तर ओझोन थर संरक्षण


20) रामसर अधिवेशन कोणाशी संबंधित आहे?

उत्तर आर्द्र प्रदेशांचे संवर्धन


21) स्कॉटहोम परिषद कधी झाली?

उत्तर 1912 मध्ये जन्म


22) जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर वॉशिंग्टन डी. सी


23) आशियाई विकास बँकेचे (ADB) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर मनिला


24) संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर नैरोबी, केनिया)


25) जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर जिनिव्हा.


26) UNESCO चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर पॅरिस


27) ऍम्नेस्टी इंटरनॅशनलचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर लंडन


28) ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम प्रोड्युसिंग कंट्रीज (OPEC) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर व्हिएन्ना


29) ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक को-ऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर पॅरिस


30) आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे (ILO) मुख्यालय कोठे आहे?

उत्तर जिनिव्हा


31) कोणत्या अंतराळ संस्थेने फाल्कन 9 रॉकेट प्रक्षेपित केले?

उत्तर space-x


32) होप मिशन कोणत्या देशाने सुरू केले आहे?

उत्तर संयुक्त अरब अमिराती (UAE)


33) भारताने 2017 मध्ये कोणत्या वाहनाने 104 उपग्रह प्रक्षेपित केले?

उत्तर PSLV C37


34) शिपकिला पास कोठे आहे?

उत्तर हिमाचल प्रदेश


35) सतलज नदी कोणत्या खिंडीतून भारतात प्रवेश करते?

उत्तर शिपकिला पास


36) नथुला पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर सिक्कीम


37) बोमडिला पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर अरुणाचल प्रदेश


38) तुजू पास कोणत्या राज्यात आहे?

उत्तर मणिपूर


39) व्याघ्र राज्य काय म्हणतात?

उत्तर मध्य प्रदेश


40) सिमलीपाल व्याघ्र प्रकल्प कोठे आहे?

उत्तर ओडिशा


41) नागरहोल व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर कर्नाटक


42) पलामू व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर झारखंड


43) ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?

उत्तर महाराष्ट्र


44) खजुराहो मंदिर कोणी बांधले?

उत्तर चंदेला शासक (छत्तर, मध्य प्रदेश)


45) खजुराहोची मंदिरे कोणत्या शैलीत बांधली गेली आहेत?

उत्तर पंचायत शैली


46) हुमायूनची कबर कोणत्या शैलीत बांधलेली आहे?

उत्तर चारबाग शैली


47) पूर्वेकडील ताजमहाल म्हणून काय ओळखले जाते?

उत्तर हुमायूनची कबर


48) बृहदीश्वर मंदिर कोणत्या शैलीत बांधले आहे?

उत्तर द्रविड शैली


49) बृहदेश्वर मंदिर कोणत्या राज्यकर्त्यांनी बांधले?

उत्तर चोल शासक


५०) बृहदीश्वर मंदिर कोठे आहे?

उत्तर तंजोर. 

नदया व त्यांचे उगमस्थान:-

गंगा =>गंगोत्री ( उत्तराखंड )

यमुना => यमुनोत्री ( उत्तराखंड )

सिंधू => मानसरोवर (तिबेट )


नर्मदा =>मैकल टेकडया , अमरकंटक ( मध्यप्रदेश )

तापी =>सातपुडा पर्वत , बैतुल (मध्यप्रदेश )

महानदी =>नागरी शहर( छत्तीसगड )

ब्रम्हपुत्रा =>चेमायुंगडुंग( तिबेट )


सतलज =>कैलास पर्वत( तिबेट )

व्यास => रोहतंग खिंड ( हिमाचल प्रदेश )

गोदावरी =>त्र्यंबकेश्वर , नाशिक

कृष्णा => महाबळेश्वर


कावेरी => ब्रम्हगिरी टेकड्या , कूर्ग ( कर्नाटक )

साबरमती =>उदयपूर , अरावली टेकड्या ( राजस्थान )

रावी =>चंबा ( हिमाचल प्रदेश )

पेन्नर => नंदी टेकड्या , चिकबल्लापूर ( कर्नाटक )

अर्थव्यवस्था या विषयाची तयारी कशी करावी?


 #Combine #Prelims साठी भारतीय अर्थव्यवस्थेचे साधारणतः 12 उपघटकांचा अभ्यास करावे लागतात. त्यातील साधारणतः 6 घटकांचा आज आपण आढावा घेऊ.         


❇️ 1.मूलभूत संकल्पना -

यामध्ये अर्थव्यवस्था म्हणजे काय? विकसित,विकासनशील, अविकसित अर्थव्यवस्था म्हणजे काय?इ. संकल्पना clear करून घ्या.कोळंबे सरांच्या पुस्तकामध्ये छान दिल्या आहेत.


प्रश्न - शक्यतो येत नाही. पण या Topic च्या Concepts clear असल्याशिवाय पुढील अर्थव्यवस्था पण समजत नाही.


❇️ 2. राष्ट्रीय उत्पन्न - खूपच conceptual Topic आहे. यातील प्रत्येक concept जोपर्यत व्यवस्थित समजत नाही तोपर्यत खूप अवघड वाटतो. पण एकदा लक्षात आल की मग यासारखा सोपा घटक नाही. कोळंबे सरांच्या पुस्तकात छान cover केलाय.


प्रश्न - Gdp vs Gnp,

        Ndp vs Nnp,

       Gross vs Net

       Value Addition etc. संकल्पनावरती प्रश्न विचारला जातं असतो. अणखी Gdp चे base years चांगले करून ठेवा आणि या base years च्याच Gdp, Poverty, unempolyment etc साठी figure करत चला.


❇️ 3.आर्थिक नियोजन व पंचवार्षिक योजना - आर्थिक नियोजनाची पार्शवभूमी, भारतातील पंचवार्षिक योजना त्याचा कालावधी, वृद्धीची उद्दिष्ट्ये, प्रतिमान, Model, योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये चांगली करून ठेवा.


प्रश्न - योजनेचा कालावधी, पंचवर्षिक योजना राबवत असताना राबविलेल्या महत्वाच्या योजना या बाबी चांगल्या करून ठेवा. हा Topic देसले सरांच्या पुस्तकातून चांगला cover होतो.


❇️ 4.दारिद्र्य व बेरोजगारी - Concepts आणि Facts याच मिश्रण असलेला घटक. दारिद्र्यचे प्रकार, Recall Periods,दारिद्र्य मोजमापच्या समित्या त्यांच्या शिफारशी यांचा अभ्यास करावा लागेल.दारिद्र्याच्या figures तोंडपाठ करा. हमखास प्रश्न येतोच.

बेरोजगारी मध्ये त्याच्या व्याख्या म्हणजे श्रम शक्ती कार्य शक्ती बेरोजगारीचा दर या व्यवस्थित करून ठेवा. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती पण चांगल्या करायला हव्यात. हा टॉपिक  कोळंबे सर आणि दिसले सरांच्या पुस्तकातून चांगला करा 


प्रश्न - साधारणता दारिद्र्याचे प्रकार, बेरोजगारीचे प्रकार, बेरोजगारीच्या व्याख्या, दारिद्र्य मापनाच्या समित्या  इ. घटकांवरती नियमित प्रश्न विचारले गेले आहेत.


❇️ 5. लोकसंख्या - यामध्ये लोकसंख्येच्या संख्यात्मक व गुणात्मक बाबींचा फॅक्च्युअल डाटा तोंडपाठ करून टाका. उदाहरणार्थ. लिंग गुणोत्तर,साक्षरता, लोकसंख्या वृद्धि, लोकसंख्या घनता इ. अलीकडे आयोग लोकसंख्येच्या धोरणांवरतीदेखील प्रश्न विचारत आहे. त्यामुळे 1976 आणि 20 00 लोकसंख्या धोरण चांगलं करून ठेवा.

 देसले सर भाग 2 मधून हा टॉपिक चांगला कव्हर होतो.


❇️ 6. Rbi व बँकिंग - यामध्ये आरबीआयची पार्श्वभूमी, कार्य, त्यामध्ये देखील संख्यात्मक व गुणात्मक साधने आणि एकंदरीत भारतीय वित्तव्यवस्थेमध्ये आरबीआयची असलेली भूमिका या घटकांचा बारकाईने अभ्यास करावा. यासाठी कोळंबे सरांचे पुस्तक वाचले तरी चालेल.


प्रश्न - आरबीआयची पार्श्वभूमी आरबीआयचे विविध कायदे उदा 1934 act, 1949 बँकिंग रेगुलशन act यावरती प्रश्न विचारले जातात. ते चांगले करा. Rbi ची संख्यात्मक साधने जसं की CRR, SLR, Repo Rate, Reverse Rapo Rate, Open Market Operations (Omos) etc चांगले करा.


 अशा पद्धतीने वरील सहा घटकांची आपण तयारी केली तर Combine Exam मध्ये आपल्याला या घटकांमध्ये नक्कीच चांगले मार्क्स मिळतील.



पण राहीलेले 6 उपघटक Cover करूयात.


❇️ 1. सार्वजनिक वित्त व कररचना -


 यामध्ये सार्वजनिक वित्ताची व्याप्ती, अर्थसंकल्प, FRBM कायदा, अर्थशंकल्पची रचना (महसूली व भांडवली )सार्वजनिक कर्ज, तुटीचे प्रकार, करांचे प्रकार, प्रत्येकाचा वाटा, करसुधारणेसाठी नेमलेल्या समित्या अणि वित्त आयोग विशेषतः 15 वा वित्त आयोग हे घटक चांगले करा.


प्रश्न - साधारणता 3-4 प्रश्न या उपघटका वरती विचारले जातात. दिवसेंदिवस प्रश्नांची depth वाढत असल्यामुळे आपल्याला deep level ला जाऊन Study करावा लागेल. Combine 20 मधील कर्जावरील प्रश्न तसेच Frbm प्रश्नावरून आपण भविष्यात प्रश्न किचकट येणार आहेत हे सांगू शकतो. यासाठी अगोदर कोळंबे सर अनि नंतर देसले सरांचे पुस्तक चांगले करून ठेवा.


❇️ 2.परकीय व्यापार व व्यवहारतोल -


 यामध्ये साधारणता आयात - निर्यात आकडेवारी, वस्तुगट, देशांचा क्रम, Fdi ची काही आकडेवारी, व्यवहारतोलाच्या Basic concepts चांगल्या करून ठेवा.आयात निर्यात धोरणनावर एक नजर टाकून घ्या.


प्रश्न - यावरती आयात - निर्यात वस्तूंचा क्रम, देशांचा क्रम यावरती प्रश्न विचारला जातोय. Combine 20 मध्ये अभियांत्रिकी वास्तुवर प्रश्न आला होता. यामध्ये logic असं होत की अभियांत्रिकी वस्तू हा अनेक वस्तूंचा समूह आहे किंवा group आहे. बाकीचे single वस्तू होत्या so answer अभियांत्रिकी वस्तू आल.


❇️ 3. कृषी उद्योग सेवा -


 यामध्ये 1950,1991,2011,2020 या वर्षांमध्ये कृषी, उद्योग अणि सेवा या तिन्ही क्षेत्राचा असलेला Gdp तील वाटा अणि रोजगारातील वाटा करून ठेवावा लागेल. हे chart स्वरूपात आपण लक्षात ठेवू शकतो. शक्य झाल्यास कृषी, उद्योग या घटकांच्या Basic scheme करून ठेवा.


प्रश्न - आकडेवारीवर थेट प्रश्न विचारला जातोय Gdp च्या base year चे आकडे चांगले करून ठेवा. उदा.1950,1990-91,199-2000,2004-05,2011-13,2017-18.


❇️ 4. शासकीय योजना, धोरणे, चालू घडामोडी -


 साधारणतः 2-3 प्रश्न या घटकावरती विचारले जातात.2014 पासून योजनांचा अभ्यास बारकाईने करा. 2014 पूर्वीच्या महत्त्वाच्या योजनांची पीडीएफ आपल्या ग्रुप वरती शेअर केली आहे ते एकदा पाहून घ्या. त्यामध्ये दिलेल्या योजना चांगल्या करून ठेवा.


प्रश्न - समाजातील दुर्बल घटक विशेषता महिला,बालक, वृद्ध, सामाजिक समावेशन अशा अनेक योजनांवर आयोग  जाणीवपूर्वक प्रश्न विचारतो. देसले सर भाग 2 मधून या योजना चांगले करून ठेवा


❇️ 5. LPG ( Liberalization, Privatization, Globalization )


 हा थोडा Conceptual घटक आहे. यासाठी तुम्हाला भारतीय नियोजनाचा एकंदरीत प्रवास माहित असायला हवा.1991 च्या आर्थिक संकटास कारणीभूत घटक अणि त्यावर मात करण्यासाठी भारताने कोणत्या उपाययोजना केल्या याचा सविस्तर आढावा घ्यावा लागेल. त्यामध्ये मग उदारीकरण, खाजगीकरण  आणि जागतिकीकरण या गोष्टी संकल्पना सहित समजून घ्याव्या लागतील.


प्रश्न -साधारणता एक प्रश्न या घटकावर विचारला जातो. या घटकासाठी PYQ चांगले करून ठेवा म्हणजे नवीन प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. यासाठी कोळंबे सरांचे पुस्तक ठीक राहील.


❇️ 6. किमती चलनवाढ व पैसा -


 या घटकावर ती आत्तापर्यंत एकच प्रश्न विचारला असून तो 2017 साली पैसा या घटकावर विचारण्यात आला होता. त्यानंतर या घटकावर ती प्रश्न विचारण्यात आला नाही. तरीही किमती व चलन वाढ हे घटक कोळंबे सरांच्या पुस्तकातून पैसा हा घटक देसले सरांच्या पुस्तकातून वाचून ठेवा.


 अशा पद्धतीने तुम्ही कम्बाईन पूर्व साठी अर्थव्यवस्था या विषयाची परिपूर्ण तयारी करू शकता.




इतिहास :- लॉर्ड आणि वहाइसरॉय


👉 लॉर्ड एल्गीन – (१८६२-१८६३) :

सिंधू नदीच्या पलीकडील हिंदुकुश पर्वतातील वहाबीविरुद्ध लढाई केली. भारतात आल्यावर धर्मशाला येथे अवघ्या २० महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला.



👉 लॉर्ड जॉन लॉरेन्स (१८६३-१८६९) :

सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अ‍ॅक्ट फॉर पंजाब अ‍ॅण्ड अवध संमत केला. १८६८ मध्ये पंजाब अवधसाठी कूळ कायदा लागू केला. त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली. दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले. सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.


👉 लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) :

सर जॉन लॉरेन्सच्या निवृत्तीनंतर व्हाइसरॉय १८६९ मध्ये मेयोची नियुक्ती झाली. डिसेंबर १८७० मध्ये रिचर्ड स्ट्रचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली. स्ट्रचीने तूट भरून काढण्यासाठी विकास कार्यात कपात, आयकरात वाढ, मीठ करात सुधारणा केल्या. १८७० चा विकेंद्रीकरणाचा ठराव प्रांती स्वायत्ततेची सनद म्हणून ओळखला जातो. बजेटमध्ये उत्पन्न खर्चात समतोल मेयोने निर्माण केला. स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेयोने १८७० मध्ये स्थानिक स्वतंत्र शासन समित्या स्थापल्या. संस्थानिकांच्या, सरदारांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज अजमेर येथे काढले. सर्वप्रथम भारतात जनगणना १८७२ मध्ये मेयोच्या काळात झाली. मेयोस आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाइसरॉय म्हणतात. जानेवारी, १८७२ मध्ये अंदमान येथे कैद्यांची पाहणी करत असताना एका पठाणाकडून मेयोची हत्या झाली.


👉 वहाइसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक (१८७२-१८७६) :

१८५३ मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक हा चार्ल्स वुडचा सचिव होता. १८७२ मध्ये नॉर्थब्रुक व्हाइसरॉय झाला. लॉर्ड नॉर्थब्रुक हा अनियोजित खाजगी आर्थिक व्यवहार आणि मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कर्ता होता. बिहार, बंगाल प्रांतात दुष्काळ निवारणार्थ (१८७३-७४) ब्रम्हदेशातून तांदूळ आयात केला. बंगाल-बिहार दुष्काळ निवारणार्थ नॉर्थब्रुकने ६६ लक्ष पौंड खर्च केले. त्याच्या काळात पंजाबातील कुका चळवळीचा सामना करावा लागला. त्याच्याच कारकिर्दीत मुंबईत १८७५ साली आर्य समाज व थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली. नॉर्थब्रुकची कारकीर्द अफगाण संदर्भात विरोधी धोरणामुळे प्रसिद्ध आहे. इंग्लंड सत्ताधीशांच्या मतभेदामुळे एक वर्ष आधी मुदतपूर्व राजीनामा दिला.


👉लॉर्ड लिटन (१८७६-१८८०) 


लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली. त्याच्या काळात १८७६-७७ मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागात दुष्काळ पडला. या काळात दुष्काळाने ५० लाख व्यक्ती मृत्यू पावल्या व २० लाख हेक्टर जमीन नापीक झाली. व्हाइसरॉयने दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हेतूने स्ट्रची दुष्काळ निवारण समिती नेमली. (अहवाल १८८०). तिचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली. लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले. १८७७ साली पहिला दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने भारत सम्राज्ञी हा किताब धारण केल्याचे जाहीर केले. त्याच्यावर देशी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्याने देशी वृत्तपत्रांवर र्निबध टाकणारा देशी कायदा मार्च, १८७८ मध्ये पास करून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केली. अमृतबझार पत्रिका हे देशी वृत्त तेव्हापासून इंग्रजी भाषेत सुरू आहे. १८७८ मध्ये शस्त्रबंदी कायदा करून विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी. लिटनच्या काळात भारतीय मुलकी सेवा कायदा १८७९ पास केला. आयसीएस परीक्षेचे वय २१ वरून १९ वर्षांवर आणले. त्याविरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची (आयसीएस पास प्रथम भारतीय व्यक्ती) इंडियन असोसिएशनच्या वतीने जनजागरण मोहीम.


👉 वहाइसरॉय लॉर्ड रिपन (१८८०-१८८४) 


भारतीयांसाठी उदारमतवादी व्हाइसरॉय म्हणून ओळखला जातो. इ.स. १८३२ च्या इंग्लंडमधील फॅक्टरी अ‍ॅक्टप्रमाणे रिपनने १८८१ मध्ये कामगारांसंबंधी फॅक्टरी अ‍ॅक्ट पास केला. इ.स. १८३५ मध्ये चार्ल्स मेटाकाफ व लॉर्ड मेकॉलेने भारतातील वृत्तपत्रांना स्वातंत्र्याची मागणी केली होती. १९ जानेवारी, १८८२ रोजी रिपनने (Vernacular) रद्द केला. रिपनने शिक्षणपद्धतीच्या पाहणीकरिता १८८२ मध्ये हंटर समिती १८५४ च्या वुड्स खलित्याप्रमाणे नेमली. हंटर समितीच्या शिफारशी स्वीकारून लाहोर येथे पंजाब व अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केली. १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पास केला. रिपनने स्थानिक भारतीयांना नियुक्त केले. त्यामुळे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधतात. भारतातील पहिली दशवर्षीय जनगणना १८८१ मध्ये रिपनच्या कारकिर्दीत झाली. १८८४ मध्ये इलबर्ट बिल मंजूर केले. या कायद्यान्वये भारतीय सत्र न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर खटले चालविण्याची मुभा देण्यात आली. १८८४ मध्ये रिपनने राजीनामा दिला.


👉 लॉर्ड डफरिन (१८८४-१८८८) 


रिपनच्या मुदतपूर्व राजीनाम्यामुळे लॉर्ड डफरिनची व्हाइसरॉयपदी नियुक्ती झाली. डफरिनच्या काळात उत्तर ब्रम्हदेश जिंकून संपूर्ण ब्रम्हदेश (१८८६) इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला. मुलकी सेवेत भारतीयांना समाविष्ट केले जावे म्हणून व्हाइसरॉयने चार्ल्स अ‍ॅचिसन समिती नेमली. चार्ल्स अ‍ॅचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोग (पब्लिक सर्व्हिस कमिशन)ची स्थापना झाली. १८८७ मध्ये अ‍ॅचिसनने लोकसेवा आयोगाच्या शिफारशी (अहवाल) सादर केल्या. डफरिनच्या काळात अ‍ॅलन ‘ाुम (निवृत्त आय.ए.एस. अधिकारी) ने इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापण्यास पुढाकार घेतला. डिसेंबर १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईत तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झाली. लॉर्ड डफरिनने इंपेरियल सर्व्हिस क्रॉप्सची स्थापना केली. बंगाल, पंजाब, औंधमध्ये नवीन कुळकायदे व कुळासाठी अधिक उदार धोरण स्वीकारले.


👉 लॉर्ड लॅन्सडाऊन (१८८८-१८९४) 


भारतीयांना शासनात सहभाग मिळावा म्हणून भारतीय विधिमंडळ कायदा, १८९२ संमत झाला.     सर डय़ुरांड यांनी पूर्व व दक्षिण अफगाणिस्तानची सीमा निश्चित केली. हिला डय़ुरांड रेषा म्हणतात. १८९१ साली कामकरी महिला व बालके यांच्या संरक्षणासाठी दुसरा फॅक्टरी अ‍ॅक्ट मंजूर केला गेला. समाजसुधारक बेहरामजी मलबारी यांच्या प्रयत्नामुळे व्हाइसरॉय लॅन्सडाऊनने एज ऑफ कन्सेंट अ‍ॅक्ट (संमतिवयाचा कायदा) १८९१ मध्ये संमत केला.


👉 लॉर्ड एल्गीन – २ (१८९४-१८९९) 


यांच्या कारकिर्दीत १८९६ चा भीषण दुष्काळ पडला. १८९६-९७ दुष्काळग्रस्तांसाठी व्हाइसरॉय एल्गीनने अन्नधान्य हाँगकाँगकडून मुंबई बंदरात आणले. या अन्नधान्यासोबत ब्युबॉनिक नावाचा भयंकर प्लेग भारतात आला.


👉 लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५) 


👉 लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत. व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता. १८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्ल्युएंझा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली. १९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला. १९०० चा कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा केला. कर्झन स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर शत्रू समजला जात होता. १८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले. पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभाराची चौकशी करण्यासाठी अ‍ॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली. कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली. १९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले व या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला. १९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरिता इंपीरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली. १९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला. १९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला. कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले. त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा संमत करून घेतला. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुल १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय. तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय कारणापेक्षा हिंदू-मुस्लीम फूट पाडणे हा होता. सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले. कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे त्याची कारकीर्द समिती प्रशासन म्हणतात. लष्कर सरसेनापती, परंतु फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला.


👉 कर्झनच्या शेती सुधारणा :


👉 १९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली. १९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला. कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले. रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली. कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला. कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली. 


👉 लॉर्ड मिंटो-२ (१९०५-१९१०) 


👉 १९०८-१० या काळात बंगाल फाळणी आंदोलनास तोंड दिले व फाळणीविरोधी आंदोलनाबाबत कायदे मिंटोने तयार केले. १९०७ मध्ये लॉर्ड मिंटोने चीनशी अफूचा व्यापार बंद केला. मुसलमानांना मिंटोने चिथावणी दिली. स्वतंत्र मतदारसंघाचे सिमला येथे १९०६ मध्ये वचन दिले. १९०९ मध्ये इंडिया कौन्सिल अ‍ॅक्ट, ज्याला मोल्रे मिंटो सुधारणा म्हणतात हा कायदा पास झाला. 



👉 वहाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज (१९१०-१९१६) 


👉 भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाइसरॉय म्हणून लॉर्ड हार्डिंग्जला ओळखतात. व्हाइसरॉय हार्डिंग्जने जॉर्ज पंचमच्या स्वागतार्थ दिल्लीत १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली दरबार भरवला. त्या वेळी पंचम जॉर्जने बंगाल फाळणी रद्द केली. २३ डिसेंबर, १९१२ रोजी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलविली. त्या शाही मिरवणुकीत हार्डिंग्ज बॉम्बहल्ल्यात जखमी झाला. रासबिहारी बोस यांच्यावर खटला भरला. तो खटला दिल्ली खटला म्हणून ओळखतात.

डिसेंबर, १९१४ मध्ये प्रथम महायुद्धास सुरुवात झाली. भारतीयांनी त्यास बिनशर्त पाठिंबा दर्शविला.


👉 लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१) 


👉 लॉर्ड चेम्सफोर्डने भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियात गव्हर्नर जनरलपदी कार्य केले होते. १९१९ चा माँटेग्यू- चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा भारत अधिनियम कायदा संमत झाला. १९१९ मध्ये पंजाब प्रांतात रौलेट कायदा (काळा कायदा) लागू केला. १३ एप्रिल, १९१९ रोजी जालियानवाला बाग हत्याकांड झाले. (जनरल डायर). १९२०-२१ मध्ये खिलाफत चळवळ व असहकार चळवळ .


👉 लॉर्ड रिडिंग (१९२१-१९२६) 


👉 लॉर्ड रिडिंग यहुदी होता. परंतु स्वगुणाने इंग्लंडचे मुख्य न्यायाधीश व भारताचा व्हाइसरॉय म्हणून नेमणूक झाली. काँग्रेसमध्ये फेरवादी व नाफेरवादी गट पडले. स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. रिडिंगच्या काळात दुहेरी प्रशासन व्यवस्था व मुडिमन समितीचा अहवाल सादर झाला. 



👉 लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१) 


👉 आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले. डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली. २६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला गेला. आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली. ५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला. गांधी गोलमेज परिषदेस गेले. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.


👉 लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६) 


👉 वहाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे विलिंग्डनच्या काळात झाली. १६ ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली. तिलाच जातीय निवाडा म्हणतात. गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यास तोंड द्यावे लागले. भारत सरकार अधिनियम, १९३५चा कायदा पास झाला. विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला. 


👉 वहाइसरॉय लिनलिथगो (१९३६-१९४३) 


👉 सटॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष होता. १९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता. १९३५ च्या कायद्याने केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन १९३७ मध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित केले. दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली. सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९मध्ये राजीनामे दिले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. १९४२च्या चले जाव चळवळीस दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला. 

सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले. १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले. 



👉 लॉर्ड वेव्हेल (१९४३-१९४७) 


👉 ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले. वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग  सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बठक सिमला येथे बोलवली. इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार स्थापन झाले. भारतात घटना समितीच्या बठकांस सुरुवात झाली. आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या. पंतप्रधान अ‍ॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला. 



👉 वहाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन (मार्च १९४७ ते ऑगस्ट १९४७- जून १९४८) 


👉 मार्च १९४७ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आले. मे १९४७ मध्ये ब्रिटन संसदेशी चर्चा करण्यास लंडनला गेले. २ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. ३ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची तारीख जाहीर केली. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचा तिरंगा प्रथम व्हाइसरॉय माऊंटबॅटनच्या हस्ते फडकविण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व इंग्रज सरकारचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन ठरले. माऊंटबॅटन जून, १९४८ पर्यंत स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होते. 




राज्यसेवा पूर्व परीक्षा सराव पेपर


◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड हार्डिंग II ☑️


◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?

A. अकबर
B. अलेक्झांडर लोदी
C. शेरशाह सुरी ☑️
D. बल्बन

◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. कृष्णा
B.कावेरी☑️
C. नर्मदा
D. तुंगभद्रा


◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?

A. 1815
B. 1812
C. 1828 ☑️
D. 1830


 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A. ओस्लो ☑️
B. पेरिस
C. वॉर्न
D. लिस्बन

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

महाराष्ट्र नदिप्रणाली आणि पर्वतरांगा

💐 महाराष्ट्र मध्ये बरेच लहानमोठ्या पर्वतरांगा🏔🏔 आहेत .


💐तया पुर्व- पश्चिम  पसरलेल्या पर्वतरांगाच्यामुळे वेगवेगळ्या नद्यांची खोरी विभगली गेली आहेत.


💐 सह्याद्री पर्वतरांग 🏔 ह 

उत्तरं - दक्षिण अशी पसरली आहे जी रांग नद्यांची पठारावरील नद्या आणि कोकणातील नद्या असे विभाजन करते


💐 सातमाळा-अजिंठा🏔, हरिश्चंद्र-बालाघाट🏔, शंभूमहादेव🏔 या डोंगररांगा सह्याद्रीच्या उपरांगा आहेत


‼️पठारावरील नद्या आणि पर्वतरांगा🏔🏔 च विभाजण‼️


💐पश्चिम वाहिनी नर्मदा नदी उत्तरेकडे विंध्य व दक्षिणेकडे सातपुडा रागा मधून वहाते


💐 सातपुड्याच्या दक्षिणेस तापी नदी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते.सातपुडा आणि सातमाळा-अजिंठा यांच्या मधून.


💐 पर्ववाहिनी गोदावरी नदी, उत्तरेकडील सातमाळा-अजिंठा व दक्षिणेकडील हरिश्चंद्र-बालाघाट डोंगररांग यांच्या मधून वहाते.


💐 हरिश्चंद्र-बालाघाट व महादेव डोंगर रांगा दरम्यान, भीमा नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे वहाते.


💐महादेव डोंगरांगेच्या दक्षिण कडून कृष्णा नदी वहाते.


भूगोल प्रश्न व उत्तरे


Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे? 

उत्तर :- साखर उद्योग 


Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे? 

उत्तर :- चौथा


Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो? 

उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य 


Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे? 

उत्तर :- पणजी (गोवा) 


Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?

उत्तर :- आम्रसरी 


Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? 

उत्तर :- राजेवाडी 


Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो? 

उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ 


 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते? 

उत्तर :- महाराष्ट्र 


Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे? 

उत्तर :- पुणे 


Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते? 

उत्तर :- झारखंड

खेळ क्लुप्त्यांचा :- अभ्यास थोडासा वेगळा


1) महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या


क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ:


वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा


2) भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?


कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते


क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”


गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा


3) भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार


क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले


क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय


4) हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके


क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'


शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग


5) बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा


क्लूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.


6) द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.


क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""


अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०


7) भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत


क्लुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)


8) भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?


क्लुप्ती : "MIM BSP"


M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान


9) आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.


क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.


आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा


१0) सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.


क्लुप्ती : "सविता वेग वजन बग "


स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती


१1) दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने


क्लुप्ती : ऑबिलीपी


ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट


१2)  महाराष्ट्रातील घाट


आंबा कोर -आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

कुंभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

मुना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट


१3) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”


सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१4) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”


सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१5) महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा


क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’

सूर्या नदी


वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी


१6)  महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम


क्लूप्त्या : 'गोभीकृतान '


गो - गोदावरी

भी - भीमा

कृ - कृष्णा

ता - तापी

न - नर्मदा


अजिंठा (लेणी)



इतिहास

◾️पराचीन भारतात धर्मशाळा, लेणी क्वचित मंदिरेसुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गांवर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत. त्यांचा उद्देश वाटसरूंना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा असे.

◾️ तयांना राजाश्रय, धर्माश्रय व लोकाश्रय असे. अजिंठा गावाजवळची लेण्यांची निर्मितीही याच उद्देशातून सुरू झाली असावी.

◾️परातत्त्वशास्त्रीय पुराव्यानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडात निर्माण केली गेली. ९, १०, १२, १३ व १५-अ ही लेणी हीनयान कालखंडात कोरली गेली असावीत.

◾️हा कालखंड साधारणतः इ.स.पूर्वीच्या दुसर्‍या शतकाच्या सुमारास सुरू झाला. या सगळ्या लेण्यांतून बुद्धाचे दर्शन स्तूप-रूपांत होते. ही सोडून १ ते २९ क्रमांकांची लेणी साधारणतः ८००-९०० वर्षांनंतर (इ.स.च्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास) महायान कालखंडात निर्माण केली गेलेली असावीत.

◾️ या लेण्यांतून बुद्धाचे सर्वसामान्य लोकांस परिचित असे रूप दिसून येते. महायान लेणी वाकाटक राजांचा राजवटीत निर्मिली गेली, त्यामुळे त्यांस बऱ्याचदा वाकाटक लेणी असेही संबोधले जाते.

◾️वाकाटक साम्राज्याच्या ऱ्हासानंतर यांचे निर्माण अचानक थांबले व ही लेणी योजित भव्यतेपासून वंचितच राहिली.

🟢 रचना

◾️अजिंठा येथे एकूण २९ लेणी आहेत. ही सर्व लेणी वाघुर नदीच्या आसपास विखुरलेली आहेत.

◾️लणी नदीच्या पात्रापासून १५-३० मीटर (४०-१०० फूट) उंचीवर कातळात आहेत.

◾️हीनयान कालखंडातील लेण्यांपैकी ९ व १० क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह आहेत व १२, १३, आणि १५-अ क्रमांकाचे लेणे विहार आहे.

◾️महायान कालखंडातील लेण्यांपैकी १९, २६ व २९ क्रमांकाची लेणी चैत्यगृहे असून १, २, ३, ५, ६, ७, ८, ११, १४, १५, १६, १७, १८, २०, २१, २२, २३, २४, २५, २७ व २८ क्रमांकाची लेणी विहार आहेत.

◾️विहार साधारणपणे चौरस आकाराचे असून त्यांची लांबी-रुंदी १७ मीटर (५२ फूट) पर्यंत आहे.

◾️ह विहार मुख्यत्वे भिक्षूंना राहण्यासाठी होते तर चैत्यगृह हे पारंपरिकरीत्या पूजाअर्चेसाठी वापरण्यात येत. कालांतराने विहारांतही मूर्तींची स्थापना झाली.

◾️बऱ्याच विहारांना सोपा व आंगण करण्यात आले व तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आली.

◾️अजिंठा लेणी ही जागतिक वारसा स्थान म्हणून युनेस्कोने १९८३ साली घोषित केलेली लेणी आहेत.

◾️या लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रास इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने २८ एप्रिल, इ.स. १८१९ रोजी लागला.

◾️समिथने येथील दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही अंधुकपणे दिसून येते.

लक्षात ठेवा

🔸१) १ ऑक्टोबर, १९५३ रोजी अस्तित्वात आलेले ..... हे भाषिक तत्त्वावरील भारतातील पहिले राज्य होय,

 - आंध्र राज्य


🔹२) २ जून, २०१४ रोजी आंध्र प्रदेश राज्याचे विभाजन करण्यात येऊन तेलंगाणा हे भारतातील २९ वे राज्य निर्माण झाले. तेलंगाणा प्रदेशाचा समावेश असलेले मूळ आंध्र प्रदेश राज्य केव्हा आकारास आले होते ?

- १ नोव्हेंबर, १९५६


🔸३) .... हा घटक राज्याचा घटनात्मक प्रमुख असून त्याच्या नावाने राज्याचे कार्यकारी आदेश काढले जातात.

- राज्यपाल


🔹४) राज्यपाल त्याचे कार्यकारी अधिकार थेट किंवा दुय्यम अधिकाऱ्यांद्वारा वापरू शकतो, असे कलम १५४ मध्ये म्हटले आहे. दुय्यम अधिकारी या संज्ञेत कोणाचा समावेश होतो ? 

- सर्व मंत्री व मुख्यमंत्री


🔸५) घटक राज्याच्या राज्यपालास राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो.

- राष्ट्रपती


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ आॅगस्ट.


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६



कोकणातील नद्या व त्यावरील खाडी ,गोदावरीच्या उपनद्या ....... उगमस्थान, जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती


कोकणातील नद्या व त्यावरील खाडी

✍️ नदी  - खाडी

✍️ वैतरणा - दातीवर

✍️ उल्हास  - वसई

✍️ पाताळगंगा -  धरमतर

✍️ कुंडलिका  - रोह्याची खाडी

✍️ सावित्री  - बाणकोट

✍️ वशिष्ठी - दाभोळ

✍️ शास्त्री - जयगड

✍️ शुक - विजयदुर्ग

✍️ गड - कलावली

✍️ कर्ली - कर्ली

✍️ तेरेखोल - तेरेखोल



☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘☘
गोदावरीच्या उपनद्या ....... उगमस्थान

✍️ पूर्ण - अजिंठा डोंगरात

✍️ मांजरा - पाटोदा पठारावर, बीड

✍️ पैनगंगा - मराठवाड्यात अजिंठा टेकड्यात

✍️ वर्धा - एमपी -बैतूल

✍️वैनगंगा - मध्यप्रदेश मैकल

✍️ इंद्रावती - ओरिसा (दंडकारण्यात)

_________________


जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

गोरा या कांदबरीचे लेखक कोण आहे ?
रविंद्रनाथ टागोर.

हैद्राबाद हे शहर कोणत्या नदी तीरावर वसलेले आहे ?
मुशी.

धनराज पिल्ले हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
  हॉकी.

चॉंदबीबीची राजधानी कोठे होती ?
अहमदनगर.

राजमाता जिजाऊ यांचा जन्म कुठे झाला ?
सिंदखेडराजा.

वाचा :- महाराष्ट्राची प्राकृतिक रचना



✅ *महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीन विभाग*

 1. कोकण किनारपट्टी

 2. सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट

 3. महाराष्ट्र पठार / दख्खन पठारी


✅ *कोकण किनारपट्टी :-*

1. स्थान: महराष्ट्र अरबी समुद्र व सह्याद्रि पर्वत यांच्या दरम्यान दक्षिणोत्तर लांब पट्टयास 'कोकण' म्हणतात.

2. विस्तार: उत्तरेस - दमानगंगा  नदीपासून दक्षिणेस - तेरेखोल खाडीपर्यंत. कोकण किनारपट्टी 'रिया' प्रकारची आहे.

3. लांबी:  दक्षिणोत्तर = 720 किमी,  रुंदी = सरासरी 30 ते 60 किमी. उत्तर भागात ही रुंदी 90 ते 95 किमी. तर दक्षिण भागात ही रुंदी 40 ते 45 किमी. 

4. क्षेत्रफळ: 30,394 चौ.किमी.


✅ *सह्याद्रि पर्वत / पश्चिम घाट :-*

1. स्थान: दख्खनच्या पठाराचा पश्चिमेकडील न खचलेला भाग म्हणजेच सह्याद्रि होय.

2. यामुळे सह्याद्रि पश्चिमेकडून अत्यंत उंच व सरल भिंतीसारखा दिसतो.

3. पठाराकडून मात्र अत्यंत मंद उताराचा दिसतो.सह्याद्रि पर्वत हा प्राचीन असून या पर्वताची बर्‍याच ठिकाणी झीज झाल्याने कमी - अधिक उंचीची ठिकाणे तयार झाली आहेत. उदा. शिखरे, घाट, डोंगर, उंचीवरील सपाट प्रदेश इ.


✅ *महाराष्ट्र पठार / दख्खन पठार / देश :-*

1. स्थान: महाराष्ट्र राज्यांपैकी एकूण क्षेत्रफळापैकी 90% क्षेत्र महाराष्ट्र पठाराणे व्यापले आहे.

2. लांबी-रुंदी:  पूर्व- पश्चिम - 750km. उत्तर- दक्षिण - 700km.

3. ऊंची:  450 मीटर- या पठाराची ऊंची पश्चिमेस (600 मी) जास्त व पूर्वेस (300 मी) कमी आहे.

4. महाराष्ट्र पठार डोंगर रांगा व नद्या खोर्‍यांनी व्यापले आहे.

खाडी

🟢 नदी जेथे समुद्राला जाऊन मिळते, तेथील पाण्याच्या साठ्याला खाडी असे म्हणतात.

🟢 भरतीचे पाणी नदीच्या मुखामध्ये जिथपर्यंत येते त्या भागास “खाडी”असे म्हणतात. कोकणचा किनारा अनेक खाड्यांनी बनलेला आहे.

▪️कधीकधी किनाऱ्याचा सखल भूभाग खचून किंवा समुद्राच्या पाण्याची पातळी वाढल्यानेसुद्धा समुद्री खाडी तयार होते.

▪️खाडी जर बऱ्यापैकी मोठी असेल तर तिला आखात म्हणतात.

▪️बंगालचा उपसागर हा देखील एका अखाताचाच प्रकार आहे.

▪️महाराष्ट्राच्या पश्चिम समुद्रकिनाऱ्याला अशा अनेक खाड्या आहेत. तिथली बहुतेक बंदरे खाडीच्या आश्रयाने बनली आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🛑 खाड्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडील क्रम खालीलप्रमाणे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१) डहाणूची खाडी, जि. ठाणे

२) दातीवऱ्याची खाडी, जि. ठाणे

३) वसईची खाडी, जि. ठाणे

४) धरमतरची खाडी, जि. रायगड

५) रोह्याची खाडी, जि. रायगड

६) राजापुरीची खाडी, जि. रत्नागिरी

७) बाणकोटची खाडी, जि. रत्नागिरी

८) दाभोळची खाडी, जि. रत्नागिरी

९) जयगड, जि. रत्नागिरी

१०)विजयदुर्ग, जि. सिंधुदूर्ग

११)तेरेखोलची खाडी, सिंधुदूर्ग

MPSC, पोलीस भरती,आर्मी भरती उपयुक प्रश्नसंच

*खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे *

⚪️ विस्थापन
⚫️ चाल☑️
🔴 गती
🔵 तवरण

*वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?*

⚪️ ऑक्सिजन
⚫️ हड्रोजन
🔴 कार्बन डायऑक्साईड☑️
🔵 नायट्रोजन


*मन्यूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?*

⚪️सवेग☑️
⚫️बल
🔴तवरण
🔵घडण

*कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?*

⚪️अल्फा
⚫️बिटा
🔴गमा☑️
🔵कष-किरण

*रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?*

⚪️मलॅनिन
⚫️इन्शुलिन☑️
🔴यकृत
🔵कल्शियाम

 *मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?*

⚪️रग तयार करणे
⚫️विद्युत रोधक म्हणून☑️
🔴विद्युत सुवाहक म्हणून
🔵वरील सर्व कारणांसाठी

*धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?*

⚪️सोडियम क्लोरेट☑️
⚫️मायका
🔴मोरचुद
🔵कॉपर टिन

*बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.*

⚪️मोठी
⚫️लहान☑️
🔴दप्पट
🔵तिप्पट

*वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................*

⚪️तितकेच राहते
⚫️निमपट होत
🔴चौपट होते
🔵दप्पट होते ☑️

*ध्वनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .*

⚪️सथायू ☑️
⚫️दरव
🔴वायू
🔵निर्वात प्रदेश


न्यायमूर्ती रानडे यांनी भारतीय राजकाणात ---------- राजकारणाचा पाया घातला असे म्हटले जाते.
⚪️राष्ट्रवादी
⚫️समाजवादी
🔴अर्थवादी
🔵सनदशीर✅

वसईचा तह कोणात झाला?
⚪️टीपू सुलतान - इंग्रज
⚫️दसरा बाजीराव पेशवे - इंग्रज✅
🔴रघुनाथ पेशवे - इंग्रज
🔵पशवे - पोर्तुगीज


खालीलपैकी कोणत्या चळवळीमध्ये गांधीजींचा सहभाग नव्हता?
⚪️ बार्डोली सत्याग्रह ✅
⚫️चफारण्य सत्याग्रह
🔴काळ्या कायाघाचा निषेध
🔵खडा सत्यांग्रह

बाबू गेनूने कोणत्या ठिकाणी आत्मबलीदान दिले?
⚪️नदुरबार
⚫️मबई✅
🔴पणे
🔵सातारा

सामाजिक विषमता दूर करण्यासाठी केरळमध्ये श्री. नाराण धर्मपालन योगम या संस्थेची स्थापना कोणी केली?
⚪️नारायण स्वामी
⚫️नारायण गुरु✅
🔴दयानंद सरस्वती
🔵राधाकृष्णन

दासबोध हा ग्रंथ कोणत्या संताचा आहे?
⚪️रामदास✅
⚫️चांगदेव
🔴सत तुकाराम
🔵सत सावता माळी


गोवा मुक्ती आंदोलनाचे नेते कोण होते?
⚪️सरदार वल्लभभाई पटेल
⚫️अरुणा असफअली
🔴राम मनोहर लोहिया ✅
🔵नानासाहेब गोरे

मिठाच्या सत्याग्रहात प्रसिध्दीस आलेले शिरोडा हे गाव महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
⚪️मबई
⚫️रत्नागिरी
🔴सिंधुदुर्ग ✅
🔵ठाणे

कॉग्रेसचे १९३६ चे पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले?
⚪️फजपूर✅
⚫️आवडी
🔴मद्रास
🔵रामनगर

संत तुकारामांचा जन्म कोठे झाला?
⚪️दहू✅
⚫️आळंदी
🔴जांब
🔵पठण

रक्ताविषयी काही मजेशीर माहिती


_रक्ताविषयी तुम्हाला माहीत नसलेल्या काही गोष्टी नक्की वाचा_


🔸जगातील पहिली रक्त पेढी १९३७ रोजी बनवण्यात आली होती.


🔸आपल्या शरीरातील रक्ताचा ७० टक्के भाग लाल रक्तपेशींच्या आतमध्ये असलेल्या हिमोग्लोबिनमध्ये असतो. ४ टक्के भाग मांसपेशींच्या प्रोटीन मायोग्लोबीन मध्ये, २५ टक्के भाग यकृत, बोन मॅरो, प्लीहा, मूत्रपिंडामध्ये असते आणि उरलेले १ टक्का रक्त प्लाजमाच्या तरल अंश व कोशिकांच्या एंजाइम्समध्ये असते.


🔸१ मिली रक्तामध्ये १०,००० पांढऱ्या रक्तपेशी आणि २,५०,००० प्लेटलेट्स असतात.


🔸आपल्या नसांमध्ये ४०० किलोमीटर प्रतितास या वेगाने रक्ताभिसरण होते.


🔸रक्त कोशिकांना संपूर्ण शरीरात फिरण्यास ३० सेकंद लागतात. या रक्त कोशिका २० सेकंदामध्ये १२००० किमी अंतर पार करू शकतात.


🔸जर आपल्या शरीराने रक्ताला बाहेर पंप केले, तर हे रक्त ३० मीटरपर्यंत उडू शकते.


🔸मनुष्याचे रक्त फक्त ४ प्रकारचे (O, A, B, AB) असते. पण गाईंमध्ये जवळपास ८००, कुत्र्यांमध्ये १३ आणि मांजरांमध्ये ११ प्रकारचे रक्त पाहण्यास मिळते.


🔸नकत्याच जन्मलेल्या बालकामध्ये फक्त १ कप (२५० एमएल) रक्त असते आणि तरुण माणसामध्ये जवळपास ५ लिटर रक्त असू शकते, म्हणजेच शरीराच्या एकूण वजनाच्या ७ टक्के रक्त असते.


🔸आतापर्यंत कृत्रिम रक्त बनवले गेले नाही आहे.



🔸लाल रक्त पेशी ह्या ऑक्सिजनला घेऊन जात असतात आणि कार्बनडायऑक्साईड संपवतात.


🔸पांढऱ्या रक्त पेशी ह्या शरीराला बॅक्टेरीया आणि वायरस यांच्यापासून वाचवतात.


🔸पलाजमा हे शरीरात प्रोटीन तयार करते आणि रक्ताला गोठण्यापासून वाचवते.


🔸पलेटलेट्स हे रक्ताला गोठ्ण्यास मदत करते, यांच्यामुळेच जखम झाल्यानंतर काही वेळ रक्त आल्यानंतर रक्त येण्याचे बंद होते.


🔸गर्भवती स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रिया रक्तदान करू शकत नाहीत.


🔸शारीरिकदृष्ट्या एकाच वेळी लघवी करणे आणि रक्तदान करणे शक्य नाही.


🔸जम्स हॅरीसन नावाच्या व्यक्तीने गेल्या ६० वर्षांमध्ये १००० वेळा रक्तदान केले आहे आणि २० लाख लोकांचे प्राण त्याने वाचवले आहेत.


🔸परत्येक दिवशी जगात ४०००० युनिट रक्ताची गरज असते. ३ पैकी १ व्यक्तीला आपल्या जीवनात कधी न कधी रक्ताची आवश्यकता नक्कीच पडते.


🔸सवीडनमध्ये जेव्हा कोणी रक्तदान करते, तेव्हा त्याला “Thank You” असा मॅसेज केला जातो आणि असाच मॅसेज जेव्हा त्याचे रक्त एखाद्याच्या कमी येते, तेव्हा देखील केला जातो.


🔸जपानमध्ये लोक रक्त गटावरूनच माणसाच्या व्यक्तित्वाचा अंदाज लावतात.


🔸बराझील देशात बोरोरो नावाचा आदिवासी समूह आहे, आश्चर्याची बाब म्हणजे या समूहातील सर्व लोकांचा एकच ” O “ रक्तगट आहे.


🔸जवळपास सर्वांमध्ये लाल रंगाचे रक्त पाहण्यास मिळते, पण कोळी आणि गोगलगायमध्ये हलक्या निळ्या रंगाचे रक्त पाहण्यास मिळते.


🔸आपल्या शरीरामध्ये जवळपास ०.२ मिलिग्रॅम एवढे सोने असते आणि याचे सर्वात जास्त प्रमाण रक्तात आढळून येते. ४०००० लोकांच्या रक्तामधून जवळपास ८ ग्रॅम सोन काढले जाऊ शकते.


🔸फक्त मादा मच्छरच माणसांचे रक्त शोषून घेते, नर मच्छर हे शाकाहारी असतात आणि ते फक्त गोड द्रव पदार्थ पितात. मादा मच्छर या आपल्या वजनाच्या तीनपट जास्त रक्त पिऊ शकतात.


🔸तम्हाला वाटत असेल कि, मच्छर फक्त थोडच रक्त पितात, पण तुम्हाला सांगू इच्छितो की, १२ लाख मच्छर तुमचे पूर्ण रक्त पिऊ शकतात. मच्छर “ O ” रक्तगटाचे रक्त पिणे पसंत करतात.

विज्ञान मैत्री प्रश्नमंजुषा स्पर्धा

 🎈परश्न क.१) ब्लॕट्टर हर्बेनियम ही संस्था कोठे स्थित आहे ?

१) मुंबई✅

२) डेहराडून

३) कोलकाता

४) अलाहाबाद


*🎈परश्न क्र. २) झुरळ या प्राण्याच्या हृदयाला किती कप्पे असतात ?*

१) १०

२) १३✅

३) १६

४) ६


🎈परश्न क्र.३) १ ग्रॅम प्रथिनांपासून किती कॕलरी उर्जा मिळते ?

१) ४✅

२) ६

३) ९

४) २


🎈परश्न क्र.४) हिऱ्याचा अपवर्तणांक ........ एवढा असतो.

१) १.४२

२) २.४२✅

३) ३.९६

४) ४.०८


🎈परश्न क्र.५) एक वस्तू पंचकोनाकृती मार्गाने गतिमान असेल तर तिला एक फेरी पूर्ण करण्यास ....... वेळा दिशा बदलावी लागते.

१) ४

२)६

३) ५✅

४) १०


*🎈परश्न क्र.६) थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती पाण्याच्या ..... मुळे सुरक्षित राहतात .

१) दवबिंदू

२) विशिष्ट उष्माधारकता

३) असंगत आचरण✅

४) बाष्पीभवन

 

🎈परश्न क्र.७) जर आपण कोणत्याही माध्यमाचे तापमान वाढवले तर ध्वनीचा वेग .......

१) कमी होतो.

२) वाढतो.✅

३) अर्धा होतो

४) दुप्पट होतो


🎈परश्न क्र.८) तांबे व पितळाच्या भांड्यांना कल्हई करण्यासाठी कोणता धातू वापरतात ?

१) कथिल✅

२) कार्बन

३) क्रोमियम

४) जस्त


🎈परश्न क्र ९) वनस्पती तेलापासुन वनस्पती तूप बनविताना उत्प्रेक म्हणून काय वापरतात ?*

१) आयोडीन

२) झायमेज

३) नीकेल✅

४) पेप्सिन


🎈१०)कोबाल्ट-60 या किरणोत्सारी समस्थानिकाचा उपयोग कशासाठी करतात ?

१)कर्करोग

२) कृषी क्षेत्र

३) अन्न परीक्षण✅

४)ट्यूमर

क्रियाशील फ्लोरीन


◆ ज्ञात मूलद्रव्यात फ्लोरीन मूलद्रव्य सर्वात क्रियाशील असून सेंद्रिय, असेंद्रिय, कार्बन, धातू, काच व सिरॅमिक अशा बहुतेक सर्व प्रकारच्या पदार्थावर प्रक्रिया करतो. 


◆ हायड्रोजन आणि फ्लोरीनचे हायड्रोफ्लोरीक आम्ल हे संयुग काचसुद्धा विरघळवते.


◆ फ्लोरीनच्या विषारी गुणामुळे व त्याच्या हाताळणीत होण्याऱ्या जखमांमुळे फ्लोरीनचे रसायनशास्त्र उलगडण्याची प्रगती अतिशय संथ गतीने झाली. 


◆ दुसऱ्या महायुद्धापर्यंत फ्लोरीनचे उत्पादन व्यावसायिक स्तरावर होत नव्हते. जसे रसायनशास्त्रात संशोधन होत गेले तसे काही वर्षांनी फ्लोरीन, क्लोरीन आणि कार्बन यांच्या क्लोरोफ्लुरो कार्बन या संयुगाचा शोध लागला. 


◆ या संयुगाचा वापर वातानुकूलित यंत्रे व रेफ्रिजरेटरमध्ये शीतक म्हणून केला जायचा. जवळपास साठ वर्षे क्लोरोफ्लुरो कार्बन अजिबात धोकादायक नाही अशी खात्री होती.


◆ पण क्लोरोफ्लुरो कार्बनमुळे पृथ्वीभोवती असणारा ओझोन वायूचा थर नष्ट व्हायला सुरुवात झाली.


◆ १९८७ मध्ये झालेल्या ‘मॉट्रिअल करारानुसार’ ओझोन वायूचा थर नष्ट करणाऱ्या क्लोरोफ्लुरो कार्बनसारख्या रसायनांचे उत्पादन आणि वापर थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 


◆ सध्या त्याच्याऐवजी हायड्रोफ्लुरो कार्बन वापरण्यात येतो. पर्यावरण संरक्षणासाठी घेतलेल्या या निर्णयाचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. कारण ओझोनच्या आवरणात सुधारणा होत असल्याचे दिसते. 


◆ फ्लोराईडयुक्त टुथपेस्ट वापराव्यात अशा जाहिराती आपण बघतो. क्षार आणि खनिजांच्या स्वरूपात आढळणारा फ्लोराईड हा फ्लोरीनचा आयन. 


◆ दातांच्या व हाडांच्या मजबुतीसाठी फ्लोराईड आवश्यक असल्याने पिण्याच्या पाण्यात सोडियम फ्लोराईड मिसळले जाते.


◆ फ्लोराईड वापरताना त्याचे प्रमाण मात्र योग्य असावे लागते. उच्च तापमानाला टिकणारे प्लास्टिक तयार करण्यासाठी फ्लोराईड मिसळले जाते. 


◆ सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारे आणि गृहिणींचे लाडके उत्पादन म्हणजे टेफ्लॉन. 


◆ पदार्थ न चिकटणाऱ्या, न जळणाऱ्या या टेफ्लॉनच्या निर्मितीसाठी कार्बन आणि फ्लोरीनचे मजबूत बंध असलेल्या फ्लोरोबहुवारीकाचा उपयोग केला जातो. 


◆ ऊष्णता वाहून नेणे, विद्युतरोधक, पाणी न शोषणारा, घर्षण कमी करणारा, न गंजणारा या फ्लोरोबहुवारीकाच्या विविध गुणधर्मामुळे औद्योगिक क्षेत्रात याचा वापर केला जातो. 


◆ विद्युत वाहक तारांच्या बाह्य़ लेपनासाठी, विमानांच्या आणि वाहनांच्या भागांना लेपन करण्यासाठी फ्लोरोबहुवारीकाचा वापर केला जातो. 


◆ आण्विक ऊर्जा केंद्रासाठी लागणाऱ्या इंधनातील युरेनियम २३८ पासून युरेनियम २३५ वेगळा करण्यासाठी युरेनियम हेक्झाफ्लोराईड हे फ्लोरीनचे संयुग वापरतात.

धातू आणि अधातूंचे भौतिक गुणधर्म

(Physical Properties Of Metals & Non – Metals) :

▪️धातु

1) भौतिक अवस्था:
सामान्य तापमानाला धातु स्थायूरूप अवस्थेत आढळतात.
(अपवाद – पारा व गॅलियम)
उदा. ॲल्युमिनियम, लोह, तांबे, जस्त इ.

2) चकाकी (Lustre):
काही धातूंना चकाकी असते धातूंचा पृष्ठभाग गाजल्यानंतर घासल्यानंतर त्यावरून प्रकाशाचे परावर्तन होते धातू सहसा रुपेरी किंवा करड्या रंगाचे असतात ( अपवाद – सोने, तांबे.

उदा. प्लॅटिनम, सोने, चांदी इ.

3) द्रावणीयता (Solubility):
धातू द्रावकात सहसा विरघळत नाहीत.

4) काठिण्यता (Hardness):
बहुतेक धातू कठीण असतात.
(अपवाद – सोडिअम, पोटॅशिअम)

उदा. तांबे, लोह, ॲल्युमिनियम इ.

5) उष्णतामान (Conduction Of Heat):
धातु उष्णतेचे सुवाहक असतात. कारण धातूंमधील कणांची रचना खूप दाट असते.

उदा. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम इ. (अपवाद – शिसे).


6) विद्युत वहन (Conduction Of Electricity):
धातु विजेचे सुवाहक असतात कारण धातूमध्ये मुक्त इलेक्ट्रॉन असतात. (अपवाद – शिसे)

उदा. चांदी, सोने, तांबे, ॲल्युमिनियम इ.

7) तन्यता (Ductility):
धातूंपासून तारा तयार करण्याच्या गुणधर्माला तन्यता असे म्हणतात.

उदा: सोने, चांदी, प्लॅटिनम, तांबे, टंगस्टन इत्यादी
एक ग्राम सोन्यापासून दोन किलोमीटर लांबीची तार बनते.


8) वर्धनीयता (Malleability):
धातूंपासून पत्रा तयार करण्याच्या गुणधर्माला वर्धनीयता असे म्हणतात.

उदा. सोने, चांदी, ॲल्युमिनियम इत्यादी

9) नादमयता (Sonorous):
कठीण पृष्ठभागावर आघात झाल्यामुळे कंपनातून ध्वनी निर्माण करण्याच्या गुणधर्माला नादमयता असे म्हणतात.

धातू नादमय असतात.
उदा. तांबे, लोह इ.

10) द्रवणांक आणि उत्कलनांक:
धातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक उच्च असतो.
(अपवाद – गॅलिअम, सोडिअम, पारा, पोटॅशियम)

11) घनता (Density):
धातूंची घनता उच्च असते.

(अपवाद – सोडिअम, पोटॅशिअम).


अधातू

1) भौतिक अवस्था:

सामान्य तापमानाला अधातू वायू स्थायू तसेच द्रवरूप अवस्थेत आढळतात उदा स्थायू कार्बन सल्फर phosphorus द्रव ब्रोमीन वायु ऑक्सिजन हायड्रोजन नायट्रोजन क्लोरीन फ्लोरीन .

2) चकाकी ( Lustre)
अधातूंना चकाकी नसते. काही अधातू रंगहीन तर काही अधातूंना वेगवेगळे रंग असतात.

(अपवाद – हिरा स्वरूपातील कार्बन)

3) द्रावणीयता (Solubility)
अधातू कोणत्याही द्रावकात विरघळू शकतात. तसेच त्या द्रावकाचे बाष्पीभवन करून विरघळलेला अधातू पुन्हा प्राप्त करता येतो.

4) काठिण्यता (Hardness):
अधातू ठिसूळ/मृदू असतात.

अपवाद: हिरा स्वरूपातील कार्बन

5) उष्णता वहन (Conduction Of Heat):
अधातू उष्णतेचे दुर्वाहक असतात.

6) विद्युत वहन (Conduction Of Electricity)
अधातू विजेचे दुर्वाहक असतात.
अपवाद – ग्रॅफाइट स्वरूपातील कार्बन, गॅस कार्बन

7) तन्यता ( Ductility):
अधातू पासून तारा तयार करता येत नाहीत.

8) वर्धनियता (Malleability):
अधातूंपासून पत्रा तयार करता येत नाही.

9) नादमयता (Sonorous):
अधातू अनादमय असतात.

10) द्रवणांक आणि उत्कलनांक
अधातूंचा द्रवणांक आणि उत्कलनांक कमी असतो.

अपवाद – कार्बन : द्रवणांक 3550¢ आणि उत्कलनांक 3825¢.

11) घनता (Density):
अधातूंची घनता कमी असते.

(अपवाद – हिरा स्वरूपातील कार्बन)

धातू आणि अधातूंचे रासायनिक गुणधर्म.

विज्ञान प्रश्नसंच

 1. पेशींच्या प्रकाराची संख्या किती?

1) ३६९ 

 2) ५४७

 3) ६३९ ✅✅✅

 4) ९१२


2. धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

 1) सोडियम क्लोरेट ✅✅✅

 2) मायका

 3) मोरचुद

 4) कॉपर टिन

3. जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर


 1) त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते . 

 2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .

 3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .

 4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅


4. रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅

 2) दोन

 3) चार

 4) सहा


5. मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ 

 2) ब ✅✅✅

 3) ड

 4) ई


6. खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल 

 2) रेल्वे

 3) जहाज

 4) वरिल सर्व ✅✅✅


7. २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२

 3) २३०.५२

 4) २.३५२ ✅✅✅


8. त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅

 2) अंतर

 3) चाल

 4) विस्थापन 


9. होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल 

 2) रबर

 3) रबर

 4) सूची✅✅✅


10. हॅड्रोजन आणि ----------- या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅

 2) नायट्रोजन

 3) कार्बनडाय ऑक्साईड

 4) हेलियम.

रक्तवाहिन्या (Blood Vessels):



 आपल्या शरीरात रक्ताचे अभिसरण करतात. आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची लांबी सुमारे 97 हजार किमी असते. रक्तवाहिन्यांचे तीन मुख्य प्रकार पडतात.

१) धमन्या (Arteries)
२) शिरा (Veins)
३) केशिका (Capillaries).

१) धमन्या (Arteries) : 

हृदयाकडून ऑक्सिजनयुक्त रक्ताचे वहन करतात. अपवाद – फुफ्फुसधमनी (Pulmonary Artery)भित्तिका जाड असून कमी लवचिक असतात.
शरीरात खोलवर स्थित असतात व झडपा नसतात.रक्तदाब खूप जास्त म्हणजेच 100 mm Hg एवढा असतो.
महाधमनी – धमन्या – धमनिका

२) शिरा (Veins) :

उतींकडून कार्बन डायॉकसाईड युक्त रक्ताचे वहन हृदयाकडे करतात.
अपवाद – फुफ्फुसशिरा (Pulmonary Veins)
भित्तिका पातळ असून जास्त लवचिक असतात.शरीरात त्वचेखाली स्थित असतात व झडपा असतात.रक्तदाब खूप कमी म्हणजेच 2 mm Hg एवढा असतो.महाशिरा -शिरा – शिरिका.

३) केशिका (Capillaries) :

धमनिका आणि शिरिका यांच्या पेशीतील जाळ्याला केशिका असे म्हणतात.
केशिका अत्यंत बारीक, एकस्तरीय असून भित्तिका पातळ असतात.
केशिकांमुळे पेशींमध्ये पोषद्रव्ये, ऑक्सिजन,कार्बन डायॉकसाईड, विकरे, संप्रेरके तसेच टाकाऊ पदार्थांची देवाण – घेवाण घडून येते.

Environment पर्यावरण    IMP for MPSC Prelims


Green climate fund ची स्थापना ____ मध्ये झाली आहे.
Ans:- 2010

ओझोन छिद्र सर्वप्रथम ____  मध्ये आढळले आहे.
Ans:- 1985

जगातील जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र ____ कोणते आहे.
Ans:-पश्चिम घाटमाथा

भारतातील पहिले कार्बनमुक्त राज्य _ आहे.
Ans:- हिमाचल प्रदेश

प्लास्टिक पुनर्वापर उत्पादन वापर कायदा _ मध्ये करण्यात आला.
Ans:- 1991

भारतात कोणत्या प्रजातींची संख्या सर्वात जास्त आहे? 
Ans:- कीटक

पर्यावरण संरक्षण कायदा____ _ मध्ये संमत करण्यात आला.
Ans:- 1986

पर्यावरण स्नेही खुनट्टी योजना __ वर्षी सुरु करण्यात आली
Ans:- 1991

जैव औषधी कचऱ्या संबंधित कायदा___ वर्षी संमत करण्यात आला.
Ans :- 1998

नगरपालिका घनकचरा नियोजन कायदा_ वर्षी संमत करण्यात आला.
Ans :- 2000

1987 मध्ये ब्रुडला आयोगाच्या शीर्षक_ होते.
Ans:- Our Common Future

जागतिक वसुंधरा परिषद __वर्षी भरविण्यात आली.
Ans :- 1992

पहिली मानवी पर्यावरण परिषद___वर्षी भरविण्यात आली.
Ans:- 1972

Green Economy ही संकल्पना__ वर्षी शाश्वत विकास परिषदेत स्वीकारण्यात आली.
Ans:- जून 2012

चालू घडामोडी :- 19 मार्च 2024


◆ राज्यपाल रमेशबैस यांच्या हस्ते ज्येष्ठ पत्रकार व रंगभूमीचे अभ्यासक गिरीजा शंकर लिखित 'रंग मंच' या पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे प्रकाशन करण्यात आले.

◆ लाडा मार्टिन मार्बानियांग यांची बेळगावच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रेक्जेनेस द्वीपकल्पात ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर दक्षिण आइसलँडमध्ये आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

◆ आइसलँडमध्ये एकुण 33 सक्रिय ज्वालामुखी प्रणाली आहेत, जी युरोपमधील सर्वाधिक संख्या आहे.

◆ जगातील सर्वात सक्रिय ज्वालामुखी माउंट एटना (3,350 मीटर) आहे, जो आफ्रिकन आणि यूरेशियन भूपट्टादरम्यान स्थित आहे.

◆ डॉ. प्रमोद सावंत हे भाजपचे मुख्यमंत्रिपदाची सलग पाच वर्षे पूर्ण करणारे पहिले मुख्यमंत्री ठरणार आहेत.

◆ 'आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन' दरवर्षी 19 मार्च रोजी साजरा केला जातो.[Note :- 15 मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन]

◆ 19 मार्च 2010 रोजी पहिला आंतरराष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

◆ DHL कनेक्टेडनेस इंडेक्समध्ये भारताला '62 वे' स्थान मिळाले आहे.

◆ व्लादिमीर पुतिन हे 5व्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत.

◆ प्रसिद्ध कन्नड संगीतकार 'टीएम कृष्णा' यांना प्रतिष्ठेच्या 'संगीत कलानिधी पुरस्कार'ने सन्मानित करण्यात आले आहे.

◆ तमिलिसाई सुंदरराजन यांनी तेलंगणाच्या राज्यपालपदाचा राजीनामा दिला आहे.

◆ जयदीप हंसराज यांची ‘वन कोटक’ चे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ प्रख्यात आदिवासी नेते आणि बौद्ध भिक्षू लामा लोबझांग यांचे वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले.

◆ भारतातील पहिला तेल पाम प्रक्रिया प्रकल्प अरुणाचल प्रदेशमध्ये सुरू झाला आहे.

◆ केंद्रीय मंत्री 'अनुराग सिंह ठाकूर' यांनी PB-SHABD आणि अपडेटेड न्यूज ऑन एअर मोबाईल ॲप लाँच केले आहे.

◆ अमेरिकेतील प्रसिद्ध पियानोवादक 'बायरन जेनिस' यांचे वयाच्या 95 व्या वर्षी निधन झाले.

◆ तामिळनाडू राज्य सरकारने ‘पीएम श्री योजना’ लागू करण्यास सहमती दर्शवली आहे.

◆ भारतीय सैन्य दल सेशेल्सला संयुक्त लष्करी सराव ‘एक्सरसाइज लिमिट-2024’ मध्ये सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहे.

◆ WPL 2024 स्पर्धेत दीप्ती शर्मा(यूपी वॉरियर्सने) ही खेळाडू मोस्ट व्हॅल्यूएबल प्लेयर ठरली आहे.

◆ WPL 2024 स्पर्धेत सोफी मोलिनक्स(RCB - ऑस्ट्रेलिया) या महिला खेळाडू ला सामनावीर पुरस्कार मिळाला आहे.

◆ काश्मीरच्या पर्यटन विभागांतर्गत श्रीनगरमध्ये पहिला  'फॉर्म्युला-4' कार रेस शो, फॉर्म्युला-4 आणि इंडियन रेसिंग लोग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला आहे.

◆ केंद्राकडून जम्मू-काश्मीर लिबरेशन फ्रंट असोसिएशनला बेकायदेशीर संघटना म्हणून घोषित करण्यात आली आहे.

◆ व्लादिमीर पुतीन यांची रशिया या देशाच्या राष्ट्राध्यक्ष पदी निवड झाली आहे.

◆ व्लादिमीर पुतीन यांची रशियाच्या अध्यक्ष पदी पाचव्यांदा निवड झाली आहे.

◆ रशियाच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत व्लादिमीर पुतीन यांना 88 टक्के मते मिळाली आहेत.

◆ रशियाच्या अध्यक्ष पदाचा कार्यकाळ सहा वर्षाचा असतो.

◆ प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड बनवणारे राजस्थान हे राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे.

◆ राजस्थान राज्यात प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ज्येष्ठांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार केले आहेत. त्यांना 'रामाश्रय' या नावाने ओळखले जाणार आहे.

◆ गुजरात राज्यातील खवडा येथे 'अदानी उद्योग समूह' जगातील सर्वात मोठे रिन्युएबल पार्क बनवत आहे.

◆ भारत आणि अमेरिका यांच्यात 18 ते 31 मार्च दरम्यान 'टायगर विजय' युद्ध सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ भारत हा अमेरिकेला स्मार्ट फोन निर्यात करणारा तिसरा सर्वात मोठा देश बनला आहे.

◆ तेलंगणा राज्याच्या राज्यपाल तमिळसाई सौंदरराजन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

◆ भारत ही वाहन उद्योगासाठी जगातील तिसरी सर्वात मोठी बाजार पेठ आहे.

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...