Thursday 12 December 2019

आंध्र प्रदेश :बलात्काऱ्यांना २१ दिवसांमध्ये फाशीच्या शिक्षेची तरतूद

महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्र प्रदेश सरकार नवा कायदा आणण्याच्या तयारीत आहे.

नव्या कायद्याअंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपीला २१ दिवसांमध्ये फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे

बुधवारी आंध्र प्रदेशच्या मंत्रिमंडळानं या विधेयकाला मंजुरी दिली.

एफआयआर दाखल केल्यानंतर २१ दिवसांमध्ये ट्रायल पूर्ण करून फाशीची शिक्षाही देण्यात येणार असल्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे.

आंध्र प्रदेशच्या विधानसभेत आता हे विधेयक मांडण्यात येणार आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ३५४ मध्ये दुरूस्ती करून नवं ३५४ (ई) हे कलम तयार करण्यात आलं आहे.

भारतीय कायद्यामध्ये बलात्काराच्या आरोपात दोष सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद नाही.

हे विधेयक मंजुर झाल्यानंतर बलात्काराच्या गुन्ह्याखाली फाशीची शिक्षा देणारे आंध्र प्रदेश हे पहिले राज्य ठरणार आहे.

हा कायदा आंध्र प्रदेश गुन्हे कायद्यात सुधारणा असेल. तसंच याला ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’ असं नाव देण्यात आलं आहे.

याव्यतिरिक्त आणखी एका कायद्याच्या मसुद्याला मंजुरी देण्यात आली आहे. महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनाही करण्यात येणार आहे.

२१ दिवसांमध्ये मिळणार शिक्षा

प्रस्तावित ‘आंध्र प्रदेश दिशा कायदा’अंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या अंतर्गत ७ दिवसांमध्ये तपास आणि १४ दिवसांमध्ये न्यायालयात खटला चालवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

तसंच या २१ दिवसांमध्ये आरोपीला शिक्षाही ठोठावण्याची तरतूद करण्यात आली आहे.

सध्याच्या कायद्यांतर्गत खटला चालवण्यासाठी चार महिन्यांचा कालावधी मिळतो.

या प्रकरणांसाठी १३ जिल्ह्यांमध्ये विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात येणार आहे.

या न्यायालयांमध्ये बलात्कार, लैंगिक छळ, अॅसिड हल्ले आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांवर, बालकांवर होणारे अत्याचार यावरील खटले चालवले जाणार आहे.

चालु घडामोडी वन लाइनर्स, 12 डिसेंबर 2019.

🔶 12 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय तटस्थ दिन

🔶 12 डिसेंबर: आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज डे

🔶 थीम 2019: "वचन ठेवा"

🔶जगातील गरीबांपैकी 28% लोकांचे घर: मानव विकास निर्देशांक 2019

🔶 मंगत प्रभात लोढा हे भारताचे सर्वात रिअल इस्टेट टायकून म्हणून नावे आहेत

🔶 जयपूरचे आयआयएचएमआर विद्यापीठ स्वच्छ कॅम्पस क्रमवारीत 2019

🔶 अल्बर्टो फर्नांडिज यांनी अर्जेंटिनाचे नवीन अध्यक्ष म्हणून शपथ घेतली

🔶 भारती एअरटेलने 'एअरटेल वाय-फाय कॉलिंग' सेवा सुरू केली

🔶कॅथरीन ब्रंट 150 एकदिवसीय विकेट्स घेणारी पहिली इंग्लिश महिला बनली

🔶 बियान्का अँड्रिसकूने कॅनडाचा अ‍ॅथलीट ऑफ द इयर अवॉर्ड जिंकला

🔶 मेगन रॅपिनो स्पोर्ट्स इलस्ट्रेटेडचा स्पोर्ट्सपर्सन ऑफ द ईयर अवॉर्ड

🔶 'हँड इन हँड 2019' भारत-चीन संयुक्त सैन्य सराव मेघालयात सुरू झाला

🔶 गोविरहित मुलांसाठी भारतातील सर्वाधिक लोकसंख्या दुसर्‍या क्रमांकावर आहे

🔶 श्रीलंका सरकारने सुरेश साल्ले यांना राज्य गुप्तचर सेवा प्रमुख म्हणून नियुक्त केले.

🔶 फिनलँडची सन्ना मारिन (34) जगातील सर्वात तरुण पंतप्रधान होण्यासाठी

🔶20 वी जिओस्मार्ट इंडिया परिषद 2019 हैदराबादमध्ये आयोजित

🔶 2018 मध्ये जागतिक स्तरावर शस्त्रास्त्र विक्रीत सुमारे 5% वाढ झाली: एसआयपीआरआय

🔶 2018  मध्ये अमेरिकेच्या शस्त्रास्त्र उत्पादनामध्ये अव्वल स्थान

🔶 2018 मध्ये रशिया शस्त्रास्त्र उत्पादनात द्वितीय क्रमांक: एसआयपीआरआय

🔶2018 मध्ये शस्त्रास्त्र उत्पादनात युनायटेड किंगडम तिसर्‍या क्रमांकावरः एसआयपीआरआय

🔶2018 मध्ये फ्रान्सने शस्त्रास्त्र उत्पादनात चौथ्या क्रमांकावर: एसआयपीआरआय

🔶 2018 मध्ये शस्त्रास्त्र उत्पादनात भारताचा दहावा क्रमांक: एसआयपीआरआय

🔶कार्यकर्ते दावी कोपेनावा यांना योग्य रोजीरोटी पुरस्कार  प्रदान

🔶 ग्रेटा थुनबर्गला राइट लाइव्हहुअलि अवॉर्ड २०१ With प्रदान करण्यात आला

🔶 गुओ जियानमेईला राइट लाइव्हहुअलि अवॉर्ड २०१ With प्रदान करण्यात आला

🔶 अमीनाटू हैदरला उजव्या रोजीरोटी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

🔶 व्ही विश्वनाथन यांना धनलक्ष्मी बँकेच्या अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती

🔶 वसीम जाफर 150 रणजी सामने खेळणारा पहिला क्रिकेटर ठरला

🔶 गुलू मीरचंदानी बॅग्स सीईमा लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार

🔶 हिमाचल प्रदेश मंत्रिमंडळाने यमुनाचे पाणी विकायला होकार दिला

🔶 दिल्ली सहाव्या हिंद महासागर संवाद आणि दिल्ली संवाद इलेव्हनचे आयोजन करेल

🔶 तिसरा भारत-ऑस्ट्रेलिया सचिव-स्तर 2 + 2 संवाद नवी दिल्ली येथे आयोजित

🔶 मेरीम-वेबस्टर नावे 'ते' वर्ड ऑफ द इयर 2019 म्हणून

🔶 दुखापतग्रस्त धवनची वनडे मालिका वि

🔶 अमेरिकेचे माजी फेडरल रिझर्व्ह चेअरमन पॉल वोल्कर यांचे निधन

🔶 सुनील शेट्टी यांनी अँटी-डोपिंग ब्रँड अ‍ॅम्बेसेडर नाडावर स्वाक्षरी केली

🔶 इथिओपियाचे पंतप्रधान अबी अहमद यांना नोबेल शांतता पुरस्कार 2019 प्राप्त झाला

🔶 उच्च हवामान कामगिरीसह भारत पहिल्या 10 देशांमध्ये आहे

🔶 आयसीएसएसआर चे अध्यक्ष ब्रज बिहारी कुमार यांचे निधन

🔶 भारताच्या आर. प्रग्नानंधाने लंडन चेस क्लासिक जिंकला

  🔶नेपाळमधील काठमांडू येथे 13 वा दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन

13 13 व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताने एकूण 312 पदके जिंकली

🔶 नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक, राज्यसभेमध्ये 2019 सक्षम

🔶 बलात्कार प्रकरणांकरिता ओडिशा 45 फास्ट-ट्रॅक न्यायालये स्थापन करणार आहे

🔶 ग्रेटाथुनबर्गने टाइम मासिकाचे 2019 वर्षातील व्यक्ती म्हणून घोषित केले.

Super -30 Questions Current Affairs

1.    नवी दिल्लीत तिसर्‍या ‘राष्ट्रीय सार्वजनिक खरेदी परिषद’चे उद्घाटन कुणाच्या हस्ते झाले?
✅    वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल

2.    भारत आणि रशिया या देशांदरम्यानचा संयुक्त त्रैसेवा लष्करी सरावाचे नाव काय आहे?
✅.  इंद्र

3.   ‘हीट वेव्ह 2020’ या दोन दिवसांच्या कार्यशाळेचे उद्घाटन कोठे झाले?
✅    बेंगळुरू

4.    UNICEFच्या ‘डॅनी काय ह्यूमॅनिटेरियन अवॉर्ड’ या पुरस्काराने कुणाला सन्मानित करण्यात आले?
✅.    प्रियंका चोप्रा

5.   नागालँड राज्याने कोणत्या दिवशीद्वितीय ‘मधमाशी दिन’ साजरा केला?
✅    5 डिसेंबर

6.   देशातला पहिला कॉर्पोरेट बाँड ETF कोणता आहे?
✅.    भारत ETF

7.  ISRO ने कुठे नवीन ‘स्पेस टेक्नॉलॉजी इंक्युबेशन सेंटर’ उघडले आहे?
✅    तिरुचिरापल्ली

8.    द्वितीय ‘स्टार्टअप इंडिया ग्लोबल व्हेंचर कॅपिटल समिट’ या परिषदेचे आयोजन कुठे झाले?
✅.   गोवा

9.   PACS 2019 हा कार्यक्रम कुठे आयोजित करण्यात आला?
✅.  हवाई

10.   ‘UNCTAD B2C ई-कॉमर्स इंडेक्स 2019’ याच्यानुसार, भारताचा क्रमांक काय आहे?
✅.    73

11.   ‘हँड इन हँड’ हा कोणत्या देशादरम्यानचा एक संयुक्त लष्करी सराव आहे?
✅.  चीन आणि भारत

12.    “गुलामीच्या उन्मूलनासाठीचा आंतरराष्ट्रीय दिन” कधी साजरा केला जातो?
✅.   02 डिसेंबर

13.    राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन कधी साजरा केला जातो?
✅.   2 डिसेंबर

14.   नागालँडचा राज्य दिन कधी साजरा केला जातो?
✅.  1 डिसेंबर

15.   'गेस्ट ऑफ ऑनर कंट्री' हा सन्मान मिळविणारा पहिला आशियाई देश कोणता?
✅.    भारत
-:. @mpsctopper7
16.   महाराष्ट्र विधानसभेच्या सभापती पदावर कोणत्या व्यक्तीची निवड झाली?
✅.  नाना पटोले

17.    हज यात्रेविषयीची संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने चालविणारा पहिला देश कोणता?
✅.   भारत

18.   संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान बदल परिषदेचे COP 25 सत्र कुठे आयोजित करण्यात आले आहे?
✅.  मॅड्रीड

19.    सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुरुषांच्या एकेरी गटाचा अंतिम सामना कोणी जिंकला?
✅.  वांग त्झू वेई

20.   13 वे ‘दक्षिण आशियाई खेळ’ या क्रिडास्पर्धेला कोणत्या ठिकाणी औपचारिकपणे सुरुवात झाली?
✅.  काठमांडू

21.    अॅम्बेसेडर्स चॉइस: स्क्रीनिंग ऑफ फिल्म्स” हा कार्यक्रम कोणत्या शहरात आयोजित करण्यात आला?
✅.   रियाध

22.   चौथी ‘भारत जल प्रभाव शिखर परिषद’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली?
✅.  नवी दिल्ली

23.  नागरी संरक्षण दिन कोणत्या दिवशी पाळला जातो?
✅.   6 डिसेंबर

24.   17 व्या ‘हिंदुस्तान टाईम्स लीडरशिप’ शिखर परिषदेचे उद्घाटन कधी झाले?
✅.   6 डिसेंबर 2019

25.   कोणत्या संशोधन संस्थेनी मधुमेहावर उपचारासाठी औषध विकसित केले?
✅.   वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन मंडळ

26.   ‘भारतीय सशस्त्र सेना ध्वज दिन’ कधी साजरा केला जातो?
✅.    7 डिसेंबर

27.   कोणत्या क्रिकेट संघाने 2019 या वर्षाचा ‘CMJ स्पिरिट ऑफ क्रिकेट अवॉर्ड’ जिंकला?
✅.   न्युझीलँड

28.  औरंगाबाद येथे खेळवल्या गेलेल्या राष्ट्रीय शालेय बुद्धीबळ स्पर्धेत कुणी सुवर्णपदक जिंकले?
✅.   शशिनी पुवी

29.  कोणत्या विमा कंपनीने "माय:हेल्थ वुमन सुरक्षा पॉलिसी" सादर केली आहे?
✅.   HDFC एरगो

30.   WHO ने कोणते वर्ष ‘परिचारिका व सुईणी यांचे वर्ष’ म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे?
✅.  वर्ष 2020

अभिजीत बॅनर्जी यांनी पारंपरिक वेशभूषेत स्वीकारला नोबेल पुरस्कार

◾️स्टॉकहोम – स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोम येथे मंगळवारी नोबेल पुरस्कार प्रदान करण्याचा मोठा सोहळा संपन्न झाला.

◾️ भारतीय वंशाचे अभिजीत बॅनर्जी यांना या सोहळ्यात पुरस्कार प्रधान करण्यात आला.

◾️अभिजीत बॅनर्जी या कार्यक्रमात भारतीय पारंपरिक वेशभूषेत दिसल्यामुळे त्यांचे जगभरातून कौतुक केले जात आहे.

◾️भारतीय वंशाचे अमेरिकी संशोधक अभिजीत बॅनर्जी यांना ✍वैश्विक गरिबी निर्मूलनाविषयी केलेल्या प्रयोगशील संशोधनासाठी यावर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला होते.

◾️ स्वीडन देशाची राजधानी स्टॉकहोमच्या स्टॉकहोम सिटी हॉलमध्ये मंगळवारी नोबेल पुरस्कार प्रधान करण्याचा सोहळा संपन्न झाला.

◾️भारताचे अभिजीत बॅनर्जी यांना या कार्यक्रमात नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◾️अभिजीत बॅनर्जी हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी भारतीय पारंपरिक वेशभूषेत पोहोचले होते.

◾️ त्यामुळे अनेकांच्या नजरा अभिजीत यांच्याकडे खिळल्या. दरम्यान, त्यांना हा पुरस्कार स्वीडनचे राजा कार्ल गुस्ताफ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

◾️त्यांच्यासोबतच वैश्विक गरिबी निर्मूलनाविषयी केलेल्या प्रयोगशील संशोधनासाठी
📌एस्थेर डफ्लो आणि
📌मायकेल क्रेमर यांना देखील हा पुरस्कार प्रधान करण्यात आला.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुंबईतील पाण्यात आढळला सर्वात मोठा विषाणू; नाव बॉम्बे व्हायरस..

✍ नक्की 'हा' व्हायरस काय आहे ? 

👆मुंबईत करोडो लोकं राहतात. अशात तुमच्या आयुष्याशी निगडीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पाणी. जर तुमचं पाणीचं दुषित असेल तर तुम्हाला अनेक गंभीर आजत होऊ शकतात.

◾️ मुंबईतील पाण्यात एक वेगळाच व्हायरस/ विषाणू  आढळून आलाय.

◾️या विषाणूंची वाढ इतर विषाणूंच्या तुलनेत खूप वेगवान आहे. हे विषाणू पाण्यात आढळणाऱ्या विषाणूंपेक्षा मोठे आहेत.

◾️ याला शास्त्रज्ञांनी📌 'वांद्रे मेगाव्हायरस', 'कुर्ला व्हायरस' अशी नावे दिली आहेत. 

✍ हा व्हायरस करतो काय ? 

◾️इतर व्हायरस पेक्षा हा व्हायरस मोठा आहे 

◾️हा व्हायरस एका शरीरातून दुसऱ्या शरीरात जातो 

◾️एका शरीरातून दुसर्या शरीरात जाताना हा व्हायरस शरीरातील DNA माहिती गोळा करतो 

◾️हा व्हायरस एका शरीरातील DNA दुसऱ्या शरीरात जातात 

✍ कुणी आणि कसं केलं संशोधन ? 

◾️जैवतंत्रज्ञान विभाग आणि विज्ञान तंत्रज्ञान विभागाने याबाबतचं संशोधन करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला.

◾️यवर मुंबईतील IIT मधील शास्त्रज्ञ डॉ. किरण कोंडाबागील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल पाच वर्ष शोधकार्य केलंय. यामध्ये २० नवीन विषाणू आढळून आले आहेत. 

◾️संशोधनादरम्यान विविध शहरांच्या जलाशयांमधील पाण्याची चाचणी केली गेली.

◾️ त्यांनी शोधलेल्या महाकाय विषाणूंना वेगवेगळी नावं देण्यात आली आहेत.
🦠 पवई लेक व्हायरस,
🦠मिमी व्हायरस बॉम्बे,
🦠वांद्रा व्हायरस,
🦠 कुर्ला व्हायरस अशी ही नावं आहेत. 

◾️1992 मध्ये इंग्लंडमध्ये अशा प्रकारचा विषाणू सापडला होता. यानंतर याबद्दल संशोधनाला सुरवात झाली. 

◾️मात्र काळजी करू नका, संशोधकांच्या या व्हायरसमुळे आरोग्याला कोणताही धोका नाही. 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

तुम्हाला माहीत हवे - भूगोलातील अभ्यास घटक

⭐️ स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने भूगोल विषयाचा अभ्यास करताना खालील घटक अभ्यासणे क्रमप्राप्त ठरते.

1. जगाचा भूगोल :

प्राकृतिक भूगोल, भूरूपशास्त्र, हवामान शास्त्र, सागर शास्त्र, पर्यावरण भूगोल, जैव भूगोल, नदया, पर्वत, शिखरे, पठार, सरोवरे, बेटे, वाळवंटे, वार्‍याचे कार्य, सागरी लाटाचे कार्य, भुमिगत जालाचे कार्य, नद्यांचे कार्य, हिमनद्याचे कार्य, जगातील विभाग, खंड, महासागर, जगातील आदीवासी जमाती, स्थलांतरीत शेती, जगातील नैसर्गिक प्रदेश

2. भारताचा भूगोल :

राजकीय भूगोल, प्राकृतिक भूगोल – पर्वत, शिखरे, खिंडी, हिमनद्या, हवामान – पर्जन्य, हवामान विभाग, खनिजसंपत्ती, मृदा, वने, जणगणना/लोकसंख्या/जमाती, कृषी – पशुपालन, स्थलांतरील शेती प्रकार, उत्सव, सण, विविध आदीवासी जमाती, वाहतुक दळणवळण

3. महाराष्ट्राचा भूगोल :

प्रशासकीय विभाग, प्राकृतिक विभाग – कोकण किनारपट्टी, सहयाद्री पर्वत, महाराष्ट्र पठार, हवामान, नद्या, मृदा, खनिजसंपत्ती, वने, लोकसंख्या, वाहतुक, दळणवळण, पर्यटन

मुद्रा बँक योजना

♦️भारताची ओळख ‘तरुणांचा देश’ अशी आहे. देशामध्ये होतकरु, बुद्धिमान आणि जीवनामध्ये यशस्वी उद्योजक होण्याचे स्वप्न बाळगणारे लाखो तरुण आहेत. त्यांना रोजगार मिळावा यासाठी केंद्र सरकारने ‘स्कील इंडिया’ आणि ‘मेक इन इंडिया’ सारख्या योजनांची सुरूवात करण्यात आली आहे.

♦️अनेकांना कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे एखादा लहान उद्योग/ व्यवसाय नव्याने उभारण्यासाठी अनंत अडचणी येतात. मुख्य अडचण ही भांडवलाची असते. ती दूर करण्यासाठी केंद्र सरकारने ‘मुद्रा बँक योजना’ आणली आहे.

♦️कोणताही उद्योग, व्यापार आणि व्यवसाय उभारावयाचा असेल तर कमी व्याजदरामध्ये पतपुरवठा ही मुलभूत गरज आहे.

♦️या सर्वांचा विचार करुन अशा तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात आणि त्यातून उद्योजक निर्माण व्हावेत, या उदात्त हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुद्रा बँक योजना (Micro Units Development and Refinance Agency) 8 एप्रिल 2015 रोजी कार्यान्वित केली.

♦️योजनेसाठी 20 हजार कोटींचा निधी निश्चित करण्यात आला आहे तर तीन हजार कोटींचा क्रेडीट गॅरंटी निधी नव्या उद्योजकांना प्रोत्साहित करणारा ठरणार आहे.

♦️या योजनेनुसार कुठल्याही प्रकारची तारण किंवा जामिनदाराशिवाय होतकरु, बेरोजगार यांना कर्ज पुरवठा करुन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र शासनाच्या मुद्रा योजनाअंतर्गत अर्थसहाय्य देण्यात येते.

♦️बेरोजगारांना कर्ज पुरवठा करुन त्यांना व्यवसायासाठी प्रोत्साहित केले जाते. अनुसूचित जाती आणि जमातीच्या तरुणांना योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येणार आहे.

♦️योजनेअंतर्गत संबंधित व्यक्तींना जिल्हा सहकारी बँका, राष्ट्रीय बॅंका, प्रादेशिक ग्रामीण बँका, बिगर बँक वित्तीय संस्था इत्यादीमार्फत कर्ज देणे अपेक्षित आहे.

♦️यामध्ये सुतार, गवंडीकाम, कुंभार, शिंपी, धोबी, भाजीपाला व फळविक्रेते व्यावसायिक इ. लहान स्वरुपाचे व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींनादेखील कर्ज देण्याची तरतुद आहे. कर्जाचा व्याजदर केंद्र शासन वेळोवेळी ठरवेल त्याप्रमाणे राहणार आहे.

अर्थव्यवस्था वाढीचा दर ४.२ टक्क्य़ांवर

दुसऱ्या तिमाहीबाबत स्टेट बँकेच्या अहवालाचा अंदाज.

पहिल्या तिमाहीत सहा वर्षांच्या  तळात पोहोचलेल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीच्या दराची दुसऱ्या तिमाहीच्या आकडेवारीची घटिका समीप असतानाच, हा वेग आणखी खालावण्याचा अंदाज आघाडीच्या बँकांनी व्यक्त केले आहे.

स्टेट बँकेचा संशोधनात्मक अहवाल तसेच सिंगापूरस्थित डीबीएस बँकेच्या मंगळवारच्या अभ्यास-अंदाज अहवालात भारताचा जुलै ते सप्टेंबर २०१९ दरम्यानचा विकास दर ५ टक्क्यांच्या खूप खाली असेल, असे नमूद करण्यात आले आहे.

दुसऱ्या तिमाहीत ४.२ टक्के तर संपूर्ण विद्यमान वित्त वर्षांत विकास दर ५ टक्के असेल, असे स्टेट बँकेने म्हटले आहे. वाहन विक्रीतील घसरण, विमानातून प्रवासी वाहतुकीतील घसरण तसेच बांधकाम व पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक घसरण याचा विपरित परिणाम देशाच्या विकास दरावर होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत, एप्रिल ते जूनदरम्यान भारताने ५ टक्के असा गेल्या सहा वर्षांतील तळ दाखविणारा विकास दर नोंदविला होता. तर दुसऱ्या तिमाहीतील स्थिती येत्या २९ नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

सप्टेंबरमधील सात महिन्यांच्या तळातील औद्योगिक उत्पादन दर सोमवारीच स्पष्ट पुढे आला आहे.

विद्यमान २०१९-२० या संपूर्ण आर्थिक वर्षांत  ५ टक्के विकास दरानंतर पुढील वित्त वर्षांत देशाच्या अर्थप्रगतीचा दर ६.२ टक्के असेल, असा विश्वास स्टेट बँकेने तिच्या अहवालातून व्यक्त केला गेला आहे. परिणामी, डिसेंबरमधील पतधोरणात रिझव्‍‌र्ह बँक अधिक प्रमाणात व्याजदर कपात करेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेच्या भविष्याच्या अंदाजाबाबत मूडीजने व्यक्त केलेल्या पतदर्जाचा मोठा परिणाम जाणवणार नाही, असा दिलासाही स्टेट बँकेने दिला आहे. देशाच्या वित्तीय तुटीबाबतही चिंता करण्यासारखी स्थिती नाही, असेही अहवालात नमूद करण्यात आली आहे.

विकासदर ५ टक्क्य़ांखाली घसरणार : डीबीएस

जूनअखेरच्या पहिल्या तिमाहीतील ५ टक्के अशा सहा वर्षांच्या तळातील विकास दराचा उल्लेख करतानाच सप्टेंबरमधील घसरत्या औद्योगिक उत्पादन दराची आठवण करून देताना डीबीएस बँकेने सप्टेंबरअखेरच्या दुसऱ्या तिमाहीतील विकास दर ५ टक्क्यांपेक्षाही कमी असेल, असे नमूद केले आहे.

‘आरसेप’बाहेर राहिल्यास भारतात एकही बहुराष्ट्रीय कंपनी येणार नाही.

📚आरसेपवर अन्य १५ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि आपण बाहेरच राहिलो तर कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीला भारतात यावेसे वाटणार नाही, असे मत निती आयोगाचे माजी उपाध्यक्ष अरविंद पानगढिया यांनी व्यक्त केले आणि आरसेप हे भारताच्या हिताचेच असल्याचे अधोरेखित केले.

📚भारतात बहुराष्ट्रीय कंपन्यांना गुंतवणूकदार म्हणून आणण्यासाठी हीच योग्य वेळ आहे आणि त्यांना आसियान बाजारपेठेत करमुक्त प्रवेश मिळाला तर त्यांना भारतात स्थिर होण्यासाठी एक प्रकारे प्रोत्साहन मिळेल.

📚जर आरसेपवर अन्य १५ देशांनी स्वाक्षऱ्या केल्या आणि आपण बाहेरच राहिलो तर कोणत्याही बहुराष्ट्रीय कंपनीला येथे यावेसे वाटणार नाही, असे पानगढिया यांनी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले.

📚आरसेपमध्ये चीन, भारत, जपान, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह १० आसिआन देश आहेत, चर्चा २०१२ मध्ये सुरू झाली होती आणि ती २०१५ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते.

वन नेशन-वन डे पे' योजना लागू करणार

● देशभरात 'वन नेशन-वन डे पे' योजना लागू करण्याचा विचार केंद्र सरकार करत आहे.

● केंद्रीय कामगारमंत्री संतोष गंगवार म्हणाले की, देशभरात सर्वत्र कामगारांचा पगार दर महिन्याच्या एका विशिष्ट दिवशीच होणे आवश्यक आहे.

★■  संकल्प व उद्दिष्टे  ■★

✔ सर्वच क्षेत्रामध्ये किमान समान वेतनासाठी काही नियमही बनविणार आहे.
✔ 13 कामगार कायद्यांचे विलिनीकरण करून एकच कायदा बनवणे
✔ खासगी क्षेत्रातील जास्तीत जास्त कामगारांना या कायद्यातील तरतुदींचा लाभ मिळवा

संकलन  - मुंजा निर्मळ (STI)

नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्यासाठी मिहिर शहा समितीची स्थापना

​​

✅नवीन राष्ट्रीय जल धोरण तयार करण्याच्या उद्देशाने जल सुधारणांचे विश्लेषण आणि त्याचा मसुदा तयार करण्यासाठी भारत सरकारने मिहिर शहा यांच्या नेतृत्वात दहा सदस्य असलेली एक उच्चस्तरीय समिती नेमली.

✅केंद्रीय जलसंपदा मंत्रालयाने 11 नोव्हेंबर 2019 रोजी याबद्दल घोषणा केली.

✍ समिती व त्याची कार्ये :

✅मिहिर शहा हे पूर्वीच्या नियोजन आयोगाचे (आताचे NITI आयोग) माजी सदस्य आणि एक जल तज्ज्ञ आहेत.

✅समितीत इतर सदस्यांमध्ये माजी जलसंपदा सचिव शशी शेखर आणि केंद्रीय भूजल मंडळाचे माजी अध्यक्ष ए. बी. पंड्या यांच्यासह दहा लोक आहेत.

✅केंद्रीय जल आयोग (CWC) आणि केंद्रीय भूजल मंडळ (CGWB) या दोनही संस्थांच्या कार्यांचा आढावा घेण्याचे काम या समितीकडे सोपविण्यात आले आहे.

✅समिती या दोनही मंडळांचे लक्ष नसलेल्या मुद्द्यांना ओळखून त्याबाबत असलेल्या तफावतीचे विश्लेषण करणार आहे.

✍ धोरणाबाबत :

✅भारत सरकारचे केंद्रीय जलसंपदा मंत्रालय राष्ट्रीय जल धोरण तयार करीत असते.

✅धोरण उपलब्ध जलसंपत्तीचे नियोजन आणि त्यांचे संवर्धन आणि कार्यक्षमपणे वापर अश्या मुद्द्यांना लक्षात घेवून तयार केले जाते.

✅सप्टेंबर 1987 मध्ये भारताने पहिले राष्ट्रीय जल धोरण अवलंबले होते. पुढे सन 2002 आणि नंतर सन 2012 मध्ये त्याचे पुनरावलोकन करण्यात आले आणि त्यात सुधारणा करण्यात आली.

✅राष्ट्रीय जल धोरण वैश्विक तापमानवाढीचा सामना करण्यासाठी तयार केलेल्या ‘हवामानातले बदल विषयक राष्ट्रीय कृती योजना’ (NAPCC) याच्या अंतर्गत चालविलेल्या आठ मोहिमांपैकी एक आहे. पाण्याचा वापर 20 टक्क्यांनी कार्यक्षमपणे वाढविले हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...