Monday 11 March 2024

नारायण मेघाजी लोखंडे

नारायण मेघाजी लोखंडे (१८४८-१८९७)
जन्म: ८ फेब्रुवारी १८४८
मृत्यू : ९ फेब्रुवारी १८९७ प्लेगमुळे (ठाणे)

✍मूळ गाव : कव्हेरसर ता. सासवड जि. पुणे फुलमाळी शेतकरी कुटूंब पत्नी गोपिकाबाई, मुलगा गोपीनाथ
✍अतिशय गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.

✍सुरूवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात नोकरी केली. नंतर मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली.
मांडवी येथे नोकरी करत असताना तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले. त्यांना आठवड्याची सुट्टी नसे परिणामी त्यांनी नोकरी सोडून स्वतः कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले.
✍१८७३ लोखंडे हे सत्यशोधक समाजाचे निष्ठावंत सहकारी.
✍१८७५ मुंबईतील कापडगिरणीच्या कामगारांच्या आंदोलनामुळे ब्रिटीश सरकारने कामगारांच्या स्थितीचा व त्यात सुधारणा करण्यासाठी आयोग नेमला.
✍१८८० दीनबंधू सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र मुंबईमध्ये पुन्हा सुरू केले.
१८८१ इंग्रज सरकारला कारखाना कायद्यात सुधारणा करणे भाग पाडले. चार भरपगारी महिन्यातून सुट्ट्या कामगारांना मिळू लागल्या.
✍१८८३ टिळक व आगरकरांची बर्वे प्रकरणात सुटका झाल्यावर त्यांचा सत्कार केला.
✍१८८४ दुसरा कामगार कायदा आयोग नेमण्यात आला. या अयोगामुळे कामगारांच्या स्थितीत सुधारणा घडल्या नाहीत.
✍सप्टेंबर १८८४ पहिली मोठी कामगार परिषद मुंबई येथे भरवली. (५५०० कामगारांचे लेखी निवेदन पाठवले.)
✍️ १८९० मुंबई गिरणी कामगार संघ नावाची देशातील पहिली कामगार संघटना स्थापन केली. (बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन)
१० जून १८९० पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली.
✍१८९१ कामगार कायदा संमत करून त्यात लोखंडे यांच्या काही सूचनांचा समावेश केला.
✍१८९१ ब्रिटीश सरकारने त्यांच्या कामगिरीची दखल घेऊन (J. P. Justice of Pience) हा किताब दिला.
✍ १८९३-९४ मुंबईतील हिंदू-मुस्लीम दंगल मिटवण्यात मोठी भूमिका त्यामुळे सरकारने रावबहादूर ही पदवी बहाल केली.
✍ते निर्भिड वक्ते, झुंझार लेखक, संपादक, मुद्रक होते.
✍लोखंडे हे महात्मा फुलेंच्या सत्याशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते.
भारतीय कामगार चळवळीचे जनक म्हणून ओळख.
✍• प्लेग ग्रस्तांसाठी मराठा हॉस्पिटल काढले.
पंचदर्पण हे पुस्तक व गुराखी हे दैनिक काढले.
✍ सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांच्या समस्या यांना दीनबंधूतून वाचा फोडली
✍. • मृत्यू ९ फेब्रुवारी १८९७ (प्लेगमुळे ठाणे)

No comments:

Post a Comment

Latest post

भारतातील महत्वाचे जलविद्युत प्रकल्प

🔶मचकुंदी प्रकल्प  मुचकुंदी नदीवरील आंध्रप्रदेश व ओरिसा या राज्यांचा संयुक्त प्रकल्प. जलपुत येथे मुचकुंदी नदीवर धारण. मुख्य उद्देश वीजनिर्मि...