Sunday 1 May 2022

हरी नारायण आपटे मराठी लेखक

हरी नारायण आपटे
मराठी लेखक

हरी नारायण आपटे, अर्थात ह.ना. आपटे, (मार्च ८, इ.स. १८६४ - मार्च ३, इ.स. १९१९) हे मराठी लेखक, कादंबरीकार, नाटककार, कवी व व्याख्याते होते. ते ज्ञानप्रकाश या मासिकाचे काही काळ संपादक, आनंदाश्रम या प्रकाशनसंस्थेचे व्यवस्थापक, आणि करमणूक या मासिकाचे संस्थापक-संपादक होते. अकोला येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते संमेलनाध्यक्ष होते. त्यांनी अनेक पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या आहेत. आठ स्त्रीरत्ने या सदराखाली ह.ना.आपटे यांनी भास्कराचार्यांची लीलावती, राणी दुर्गावती इत्यादी स्त्रियांची बोधप्रद माहिती प्रकाशित केली होती. केशवसुतांची कविता आणि गोविंद बल्लाळ देवल यांचे शारदा हे नाटक हरिभाऊ आपट्यांनीच प्रकाशात आणले.

हरी नारायण आपटे
नारायण हरी आपटे याच्याशी गल्लत करू नका.

हरी नारायण आपटे
प्रकाशित साहित्य
संपादन करा
आपटे अर्वाचीन मराठी कादंबरीचे जनक मानले जातात. त्यांच्या लिखाणावर महादेव गोविंद रानडे, गोपाळ कृष्ण गोखले प्रभृतींचा प्रभाव होता. १२ सामाजिक आणि ११ ऐतिहासिक अशा एकूण २३ कादंबऱ्या लिहिणाऱ्या ह.ना. आपटयांची 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी मराठी साहित्यात मानदंड समजली जाते. सतत २५-३० वर्षे अशाप्रकारचे मराठी साहित्य निर्माण झालेल्या त्या ह.ना.आपट्यांच्या कालखंडाला हरीभाऊ युग म्हणतात, आणि हरीभाऊ आपट्यांना युगप्रवर्तक. हरिभाऊंनी नाटकेसुद्धा लिहिली आहेत. दोन नाटके स्वतंत्र आहेत, त्यांतले ’सती पिंगळा’ हे नाटक त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. उरलेली तीन नाटके व तीन प्रहसने रूपांतरित आहेत. धूर्तविलसत, मारून मुटकून वैद्यबुवा व जबरीचा विवाह ही फ्रेन्च नाटककार मोलियरच्या प्रहसनांची रूपांतरे आहेत तर, जयध्वज (मूळ व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'), श्रुतकीर्तचरित (काँग्रेव्हचे ’द मोर्निंग ब्राईड’) व सुमतिविजय (शेक्सपियरचे ’मेझर फॉर मेझर’) ही रूपांतरित नाटके आहेत. त्यांनी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या तेराव्या वार्षिक सभेपुढे दिलेल्या व्याख्यानांची पुस्तिका ’विदग्धवाङ्‌मय’ या नावाखाली प्रकाशित झाली होती. ’नाट्यकथार्णव’ यामासिकासाठी त्यांनी मेडोज टेलर या इंग्रजी लेखकाच्या दोन कादंबऱ्यांची ’तारा’ व ’पांडुरंग हरी’ ही मराठी भाषांतरे केली होती. बिचारा या टोपणनावाने ह.ना. आपट्यांनी २९ मार्च, इ.स. १८८१ च्या केसरीच्या अंकात कालिदास व भवभूती यांच्या संबंधांत लिहिलेल्या पत्रांतून त्यांचा व्यासंग व समीक्षा दृष्टी दिसून येते. निबंधकार चिपळूणकर यांच्या निधनानंतर हरीभाऊ आपट्यांनी शिष्यजनविलाप ही ८८ श्लोकांची विलापिका लिहिली होती. ती विद्वज्जनांनी वाखाणली होती. सुरुवातीच्या काळात साहित्याला एक वेगळी उंची प्राप्त करून देण्यामध्ये हरी नारायण आपटे यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले सामाजिक आणि ऐतिहासिक स्वरूपाच्या कादंबऱ्या त्यांनी लिहिल्या त्यांच्या कादंबऱ्यांतून समाजाचं यथार्थ चित्रण केलं गेलं

नावसाहित्यप्रकारप्रकाशनप्रकाशन वर्ष (इ.स.)
आजचसामाजिक कादंबरी (अपूर्ण)रम्यकथा प्रकाशनइ.स. १९०४ - इ.स. १९०६
उषःकालऐतिहासिक कादंबरीइ.स. १८९५ - इ.स. १८९७
घटकाभर करमणूककथासंग्रहइ.स. १९१७
कर्मयोगसामाजिक कादंबरी(अपूर्ण)रम्यकथा प्रकाशनइ.स. १९१३ - इ.स. १९१७
कालकूटऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण)इ.स. १९०९ - इ.स. १९११
केवळ स्वराज्यासाठीऐतिहासिक कादंबरीइ.स. १८९८ - इ.स. १८९९
गड आला पण सिंह गेलाऐतिहासिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १९०३ - इ.स. १९०४
गणपतरावसामाजिक कादंबरी(अपूर्ण)आधी मासिक’मनोरंजन’, नंतर रम्यकथा प्रकाशनइ.स. १८८६ - इ.स. १८९२
गीतांजलीटागोरांचे चरित्र व त्यांच्या गीतांजलीचा गद्य अनुवादइ.स. १९१७
चंद्रगुप्तऐतिहासिक माहितीपरइ.स. १९०२ - इ.स. १९०५
चंद्रगुप्त व चाणक्यऐतिहासिक कादंबरीइ.स. १९०२ - इ.स. १९०५
चाणाक्षपणाचा कळससामाजिक कादंबरीआधी मनोरंजन मासिक, नंतर रम्यकथा प्रकाशनइ.स. १८८६ - इ.स. १८९२
जग हें असें आहे...सामाजिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १८९७ - इ.स. १८९९
जबरीचा विवाहप्रहसन(रूपांतरित)मूळ लेखक - मोलियरइ.स. १९१०
जयध्वजनाटक(रूपांतरित)मूळ - व्हिक्टर ह्यूगोचे 'हेर्नानी'
तारासामाजिक कादंबरी(अनुवादित)
धूर्त विलसतप्रहसन (रूपांतरित)मूळ लेखक - मोलियरइ.स. १९१०
पण लक्षात कोण घेतो?सामाजिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १८९० - इ.स. १८९२
पांडुरंग हरीसामाजिक कादंबरी (अनुवादित)
भयंकर दिव्यकादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १९०१ - इ.स. १९०३
भासकवीच्या नाटककथाअनुवादित कथाइ.स. १९१७
मधली स्थिति(आजकालच्या गोष्टी)सामाजिक कादंबरीआधी मासिक ’पुणे वैभव’, नंतर रम्यकथा प्रकाशनइ.स. १८८५ - इ.स. १८८८
माध्यान्हसामाजिक कादंबरीइ.स. १९०६ - इ.स. १९०८
मायेचा बाजारसामाजिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १९१० - इ.स. १९१२
मारून मुटकून वैद्यबुवाप्रहसन (रूपांतरित)मूळ लेखक - मोलियरइ.स. १९१०
मीसामाजिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १८९३ - इ.स. १८९५
म्हैसूरचा वाघअनुवादात्मक ऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण)इ.स. १८९० - इ.स. १८९१
यशवंतराव खरेसामाजिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १८९२ - इ.स. १८९५
रूपनगरची राजकन्याऐतिहासिक कादंबरीरम्यकथा प्रकाशनइ.स. १९०० - इ.स. १९०२
वज्राघातऐतिहासिक कादंबरीइ.स. १९१३ - इ.स. १९१५
विदग्धवाङ्‌मयव्याख्यानपुस्तिकाइ.स. १९११
शिष्यजनविलापश्लोकमय विलापिकासाप्ताहिक केसरीमार्च, इ.स. १८८२
श्रुतकीर्तचरितनाटक(रूपांतरित)
संत सखूनाटकइ.स. १९११
सती पिंगळानाटकइ.स. १९२१
सुमतिविजयनाटक(रूपांतरित)मूळ विल्यम शेक्सपियर लिखित मेझर फाॅर मेझर
स्फुट गोष्टी -भाग १ ते ६कथासंग्रहइ.स. १९१७
सूर्यग्रहणऐतिहासिक कादंबरी(अपूर्ण)इ.स. १९०८ - इ.स. १९०९
सूर्योदयऐतिहासिक कादंबरीइ.स. १९०५ - इ.स. १९०६
हरिभाऊंचीं पत्रें [१]पत्रसंग्रहऐक्यसंपादन मंडळ
संदर्भ
संपादन करा
हरी नारायण आपटे यांनीं श्री काशीबाई व गोविंद वासुदेव कानिटकर यांस लिहिलेलीं पत्रें ; दोन शब्द, काशीबाई कानिटकर ; प्रस्तावना वाग्भट नारायण देशपांडे
ह.ना. आपटे यांच्यासंबंधीची पुस्तके
संपादन करा
आलोचना मासिकाचा हरि नारायण आपटे विशेषांक (इ.स. १९६३)
सहा साहित्यकार (हरिभाऊ आणि इतर, सु. रा. चुनेकर)
हरि नारायण आपटे (चरित्र, लेखक रा.भि. जोशी)
हरि नारायण आपटे, चरित्र व वाङ्‍मयविवेचन (इ.स. १९३१) : लेखिका वेणूताई पानसे
हरि नारायण आपटे यांचे संक्षिप्त चरित्र (इ.स. १९२२) : लेखक बापुजी मार्तंड आंबेकर
ह.ना. आपटे (कांहीं आठवणी आणि मनोरंजक प्रसंग) (बापुजी मार्तंड आंबेकर)
ह.ना. आपटे निवडक वाङ्‌मय : साहित्य अकादमी प्रकाशन (इ.स. १९८९) : संपादक विद्याधर पुंडलिक
हरिभाऊ, काळ आणि कर्तृत्व (इ.स. १९७२) : लेखक वि.बा.आंबेकर.
हरिभाऊ आपटे यांची आत्मचरित्रात्मक कादंबरी -'मी' -डॉ. रेखा वडिखाये
हरिभाऊ आपटे यांची 'मी' ही कादंबरी त्यांच्या जीवनावर आधारित असल्याने तिच्यातून तत्कालीन, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आर्थिक परिस्थितीचे दर्शन घडते. कादंबरी नायकप्रधान वाटत असली तरी ती स्त्रीजीवनकेंद्री आहे.स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडणे हाच या कादंबरीचा मूळ हेतू आहे. पुरुषप्रधान संस्कृतीच्या अनुषंगाने निर्माण झालेली पुरुषजातीची आणि समाजाची स्त्रीकडे बघण्याची मानसिकता बदलण्याची गरज त्यांनी या कादंबरीत वर्तवली आहे. हरिभाऊंचे वडील कुटुंब सोडून गेल्यामुळे आईच्या वाट्याला आलेले दुःख, बहीण गंगी तिचा साठीच्या आतबाहेर असलेल्या पुरुषाशी झालेला जरठबाला विवाह, घराघरांत असलेल्या गंगीसारख्या स्त्रियां, त्यांची अवस्था बदलण्यासाठी शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे या जाणिवेतून हरिभाऊंनी त्याकाळी स्त्री शिक्षणाचा जोरकसपणे पुरस्कार केला. हरिभाऊ आपटे यांनी मृत्युपूर्वी लिहून ठेवलेल्या या कादंबरीत समाविष्ट केलेल्या पत्रात समाजसुधारणेविषयीची त्यांची तळमळ प्रकर्षाने जाणवते. ते म्हणतात,"एकोणविसाव्या शतकानंतर आता आपला शत्रू म्हणजे आपले अज्ञान. आज हजारो वर्षे जगाचे पाऊल पुढे पडत आहे ते ज्ञानाच्या जोरावर. ज्ञानाचे स्थान एकेकाळी आपला आर्य देश होता. पुढे इजिप्त झाला, पुढे रोम झाला. पुढे फ्रान्स,जर्मनी,इंग्लंड, अमेरिका इत्यादी देश होत गेले आहेत. आता जपानमध्ये ते आले आहे. कालचक्राप्रमाणे ज्ञानाने आपले स्थान बदलले. ज्या स्थानांतून त्याचा लोप झाला त्या स्थानांचे वैभवही लयास गेले.म्हणून अज्ञानरूपी शत्रूला जिंकण्यासाठी ज्ञानाचा प्रसार करणे हेच मोठे अकुंठित गतिशात्र आहे."( ' मी ' -पृ.क्र. ४५३ ,४५४) समाजातील केवढा मोठा मानवसमूह पुरुषप्रधान संस्कृतीने अज्ञानाच्या अंधारात ठेवल्याने त्याच्याजवळ असलेल्या विविध क्षमतांचा समाजविकासासाठी आणि देशविकासासाठी वापर होऊ शकत नाही, याचे दुःख हरिभाऊ वरील परिच्छेदात अतिशय कळकळीने व्यक्त करताना दिसतात. त्यांच्या या विचारांची आजच्या समाजालाही नितांत गरज आहे.स् त्रीशिक्षण आणि स्त्री -पुरुष समानतेचा विचार हा या कादंबरीचा गाभा आहे. यायोगेच कुटुंबाचा, समाजाचा, पर्यायाने देशाचा विकास घडून येणार आहे.

आधार ग्रंथ - ' मी ' -कादंबरी - हरिभाऊ आपटे , सर्व्हिडिया प्रकाशन, पुणे,१९६५ ,पाचवी आवृत्ती

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...