०२ सप्टेंबर २०२४

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय?


देशातील प्रत्येक कारागीर कार्व्हर्सवासीय चालनांचा अहवाल राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या वेळी किंवा तणावग्रस्त देशांच्या स्वराज्यनिश्चिती: देशाच्या त्या देशातील राष्ट्रपती राजवट लागू होण्यासारख्या आहेत.


कल्चरमचा कलम 356 नार, जेव्हा राज्यातील प्रशासकीय कार्यक्रम घटनात्मक परिस्थिती चालविते राष्ट्रपती राजपूत लागू होतात.


सामाजिक कलम 365 नूसार, राज्य सरकारच्या निर्देशांबद्दल दुर्लक्ष झाले तर संबंधित देशव्यापी राजवट घोषित करणे आवश्यक आहे.


देशपातळीवर लागू होणा दोन्या दु: खाचा त्रास कमी होणे आवश्यक आहे.


संसदेच्या माहुरीवर सहा दिवस राष्ट्रपती राजवट लागू होतात.


संसदेणे पुढील सहा वर्षाचे प्रमाणित राष्ट्रपती राजवतीचा कालावधी कमी होणे.


संसदेची प्रमाणित वास्तविकता, भावनांचा दोनदा अनुभव तीन वर्षांचा प्रदेश राष्ट्रपुत्र लागू करणे आवश्यक आहे.


राष्ट्रपती राजवती न्यायालयीन राज्ये सर्व राष्ट्र राष्ट्रपती हाती असतात.


राष्ट्रपती पुनर्निधी असे बहुमत पाळणारे राज्यपाल चालवा राज्य चालवा.


राज्यपाल राज्याचे मुख्य सत्य कार्यवाही चालतात.


राष्ट्रपती राजवतीशी संबंधित राज्याची पद्धतशीर कार्ये, अधिकार संसदेकडे सोप एब्ले.


राष्ट्रपती अध्यादेश राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.


लोकांच्या भेटीगाठींच्या बैठकीत काही काळ खर्च होत नाही.


राष्ट्रपती राजवती उच्चस्तरीय अधिकार अबाधित असतात.


संबंधित राज्यातील वातानुकूलित विदर्जन दिशानिर्देशित राष्ट्रपती असतात

भूगोल नोट्स


☀️  जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो.

☀️  भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे.

☀️  भारताचे स्थान आशिया खंडात दक्षिणेस आहे,

दक्षिण आशिया खंडात भारत हा देश उत्तर गोलार्धात येतो.

☀️  क्षेत्रफळ व लोकसंख्येच्या बाबतीत व्हॅटिकन सिटी हा देश जगात सर्वात लहान आहे.

☀️  इंदिरा पॉइंट हा भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे.

☀️  पाल्कची सामुद्रधुनी व मन्नारचे आखात यामुळे श्रीलंका हे बेट भारतीय भूमीपासून वेगळे झाले आहे.

☀️  जगात सर्वात जास्त भूकंप आणि जपान या देशांमध्ये होतात, तर भारतामध्ये सर्वात जास्त भूकंप आसाम राज्यात होतात.

☀️  भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी अंदमान बेटें वरील बॅरन बेट येथे आहे.

☀️  भारताची दक्षिण उत्तर लांबी 3214 किलो मीटर एवढी आहे तर पूर्व पश्चिम लांबी 2933 किलो मीटर एवढी आहे.

☀️  भारतातील 8 राज्यांतून कर्कवृत्त जाते 


   🖊 क्लुप्ती - मित्र माझा राघू छाप 


   मि - मिझोराम

    त्र - त्रिपुरा

    म - मध्य प्रदेश

  झा - झारखंड

    रा - राजस्थान

    गु - गुजरात

  छा - छत्तीसगड

    प - पश्चिम बंगाल


सिंधू संस्कृती



1) समांतर चतुर्भुज आकाराचा हडप्पाचा गढ ४६० गज (४१८ मीटर) लांब, २१५ गज (१९५ मीटर) रुंद व १७ गज (१५ मीटर) उंच होता.


2) सिंधू संस्कृतीची लिपी ही चित्रलिपी होती. ज्याच्यात ६०० पेक्षा जास्त चित्राक्षर व ६० मुळाक्षरे होती.


3) १९२५ साली अर्नेस्ट मैक च्या नेतृत्वाखाली चन्हुदडो नावाच्या शहराचे उत्खनन केले गेले. या शहरात गढ नाही.


4) नाळ, डाबरकोट, राखीगढी, बनवली, रंगपूर, लोथल, आम्री, कुल्ली, राणा घुन्डाई, अंजिरा, गुमला, देस मोरासी घुन्डाई, मुन्डीगाक, दिप्लबंगा, सहर-ए-सोख्ता, बामपूर व क्वेट्टा या ऐतिहासिक स्थळी सिंधू संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.


5) १९६१ साली राजस्थानातील कालीबंगा येथे बी.बी. लाल आणि बी.के. थापड यांच्या निर्देशनाखाली उत्खनन करण्यात आले. उत्खननात खालील भागात पूर्व-सिंधू संस्कृतीचे अवशेष तर वरील पृष्ठभागात सिंधू संस्कृतीचे अवशेष मिळाले. येथील शहर आणि गडाच्या चारही बाजूंनी तटबंदी होती.


6) रंगनाथ राव यांच्या निदर्शनाखाली १९५३-५४ मध्ये गुजरात मधील रंगपूर येथे सिंधुकालीन स्थळाचे उत्खनन करण्यात आले. येथे कच्च्या विटांचे गड, नाल्या, मातीची भांडी, दगडांचे फलक इत्यादी गोष्टी मिळाल्या. परंतु देवींच्या मूर्ती व मुद्रा सापडल्या नाही.


7) प्राचीन काळी लोथल हे शहर समुद्रकिनाऱ्यावर स्थित होते. त्याच्या उत्खननात जहाज बांधणी कारखान्याचे अवशेष सापडले. यावरून असे समजले कि लोथलचे नागरिक पश्चिम आशियाशी व्यापार करत होते.


8) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील सूरकोटडा या ठिकाणचे उत्खनन कार्य १९६४ मध्ये जगतपति जोशी यांच्या निर्देशनाखाली केले गेले.


9) सिंधू संस्कृतीचे उत्खनन करत असताना २४२ फुट लांब आणि ११२ फुट रुंदीची एक विशाल इमारत सापडली. त्या इमारतीच्या भिंतीची रुंदी सुमारे ५ फुट होती.


10) सिंधू संस्कृतीत काही मूर्ती सापडल्या. ज्याच्या मध्य भागात सूर्याची प्रतिमा होती. यावरून समजण्यात आले कि त्या काळात सूर्य पूजा प्रचलित होती.


11) भारतात मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे साधारणतः १.५ करोड वर्षापूर्वीचे आहेत. भारतीय लोकांचे निग्रीटो, प्राचीन ऑस्ट्रेलियन, काकेशसी, व मेंगोलाईड्स असे चार मूळ वांशिक उपप्रकार पडतात.


12) अलाहाबाद जवळील सराय नाहर राय, बालाईखोर व लेखनिया येथे मानवी शरीराचे सांगाडे सापडले आहेत. मोठी उंची, चपटे नाक व रुंद चेहरा ही यांची विशेषता होती. हे सांगाडे मध्य पाषाणकालीन असावेत.


13) सिंधू नदीची उपनदी असलेल्या सोहन नदीच्या किनाऱ्यावर पूर्व पाषाणयुगीन संस्कृतीचे अवशेष सापडले. म्हणून याला सोहन संस्कृती असेसुद्धा म्हटले जाते.


14) हडप्पा संस्कृतीत देवीची पूजा केली जात असे. हडप्पा संस्कृतीत कुत्रा, मांजर आणि घोड्याच्या शरीराचे अवशेष मिळाले आहेत.


15) सिंध प्रदेश हा कापूस उत्पादन करणारा प्रदेश होता. म्हणून ग्रीकांनी याला सिडोन असे नाव दिले होते.


16) हडप्पामध्ये चांदीची आयात अफगाणिस्तान, दक्षिण भारत, इराण व अरबस्थानातून केली जात असे. निर्माण कार्यासाठी लागणारा लाज्बर्द बदक्शां येथून, फिरोजा इराण मधून, जबूमणि महाराष्ट्रातून, मुंगा आणि लाल सौराष्ट्र व पश्चिम भारतातून तसेच 'हरा पत्थर' मध्य आशियातून आयात केला जात असे.


17) राजस्थानातील अहाड संस्कृती ताम्रयुगीन होती. मातीची घरे, ताम्र भांडी, भातशेती ही या २००० वर्षापूर्वीच्या संस्कृतींची विशेषता होती.


18) माळवा या ताम्र पाषाण कालीन संस्कृतीची चिन्हे नव्दातौली येथून प्राप्त झाली आहेत.

Mpsc प्रश्न सराव


1) भीमा व गोदावरी नद्यांची खोरी खालील पर्वत रांगेमुळे अलग होतात.

   1) बालाघाट    2) महादेव    3) सातपुडा    4) अजिंठा


उत्तर :- 1


2) उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलपैकी कोणत्या नद्यांच्या खो-यांचा क्रम बरोबर आहे ?


   1) तापी, गोदावरी, सीना, भीमा, कृष्णा    2) तापी, गोदावरी, सीना, कृष्णा, भीमा

   3) भिमा, गोदावरी, तापी, कृष्णा, सीना    4) तापी, सीना, गोदावरी, कृष्णा, भिमा


उत्तर :- 1


3) खालील कोणते विधान चुकीचे आहे ?


   अ) दक्षिण पठारात गोदावरीचे खोरे दुसरे सर्वात मोठे खोरे असून ते भारताचे 10% क्षेत्र व्यापते.

   ब) गोदावरीनंतर कृष्णा नदीचे खोरे सर्वात मोठे आहे.

   क) महानदीचे खोरे पठारातील तिसरे सर्वांत मोठे खोरे आहे.

   ड) नर्मदा व कावेरी नद्यांचे खोरे जवळपास सारखे आहे.

   1) ब      2) क      3) ड      4) कोणतेही नाही


उत्तर :- 4


4) खालीलपैकी कोणती नदी काही क्षेत्रात पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा आहे ?


   1) गोदावरी    2) भीमा      3) कृष्णा      4) वरील एकही नाही


उत्तर :- 2


5) योग्य जोडया लावा.


  धबधबे      ठिकाण

         अ) मार्लेश्वर      i) सातारा

         ब) ठोसेघर      ii) रत्नागिरी

         क) सौताडा      iii) अहमदनगर

         ड) रंधा      iv) बीड


    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  i  iv

           2)  iv  iii  ii  i

           3)  i  iv  iii  ii

           4)  ii  i  iv  iii


उत्तर :- 4



1) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते ?


   1) तापी    2) वैनगंगा    3) नर्मदा      4) कृष्णा


उत्तर :- 2


7) पुढील कोणते /ती विधान/ ने योग्य आहेत ?


   अ) सहस्त्रकुंड धबधबा वैनगंगा नदीवर आहे.

   ब) वणी हे गाव निरगुडावर वसलेले आहे.


   1) केवळ अ योग्य  2) केवळ ब योग्य    3) अ व ब दोन्ही योग्य  4) अ व ब योग्य नाहीत


उत्तर :- 2


8) जोडया लावा.


  जिल्हा      धबधबा

         अ) अहमदनगर    i) सौताडा धबधबा

         ब) अमरावती    ii) सहस्त्रकुंड धबधबा

         क) बीड      iii) रंधा धबधबा

         ड) यवतमाळ    iv) मुक्तागिरी धबधबा

    अ  ब  क  ड


           1)  ii  iii  iv  i

           2)  i  iv  iii  ii

           3)  iii  iv  i  ii

           4)  iv  ii  iii  i


उत्तर :- 3


9) खालील विधाने पहा.


   अ) भिमा ही कृष्णेची उपनदी आहे.

   ब) इंद्रायणी ही भिमेची उजव्या तीरावरील उपनदी आहे.

   क) भोगवती ही सिना नदीची उपनदी आहे.

   1) विधान अ आणि ब बरोबर आहेत.    2) विधान अ आणि क बरोबर आहेत.

   3) विधान ब आणि क बरोबर आहेत.    4) सर्व विधाने बरोबर आहेत.


उत्तर :- 4


10) खालील कोणती तापीची उपनदी नाही ?


   1) पूर्णा    2) पांझरा    3) दुधना      4) गिरणा


उत्तर :- 3

खिलजी_वंश



1. जलालुद्दीन फिरोज खिलजी के शासन का समय रहा है ?

►-(1290-96) जलालुद्दीन फिरोज खिलजी


2. जलालुद्दीन फिरोज खिलजी दिल्ली की गद्दी पर कब बैठा ?

►-1290 ई.


3. सुल्तान बनने से पहले जलालुद्दीन क्या था ?

►-बुलंदशहर का इफ्तादार


4. नवीन मुसलमान किसे कहा गया ?

►-दिल्ली में बसने वाले मंगोलों को ।


5. किसने जलालुद्दीन फिरोज खिलजी की हत्या कर दिल्ली की गद्दी हासिल की 

►-अलाउद्दीन खिलजी (1296 ई. में)


6. अलाउद्दीन खिलजी के शासन का समय रहा है ?

►-(1296-1316 ई.) अलाउद्दीन खिलजी


7. जलालुउद्दीन खिलजी के शासन में अलाउद्दीन क्या था ?

►-कड़ा-मानिकपुर का सुबेदार


8. उसने देवगिरी पर कब आक्रमण किया ?

►-1296 ई.


9. सिकंदर-ए-सानी की उपाधि किसने ग्रहण की ?

►-अलाउद्दीन


10. अलाउद्दीन के समय किसने दिल्ली में विद्रोह किया था ?

►-हाजियों ने ।


11. हाजियों के विद्रोह को किसने खत्म किया ?

►-हमीदुद्दीन


12.अलाउद्दीन ने कौन-सा सिद्धांत चलाया था ?

►-दैवी अधिकार


13. अलाउद्दीन खिलजी ने सेना में कौन-सी प्रथा शुरू की ?

►-हुलिया रखने की प्रथा ।


14. खिलजी वंश में घोड़ों को दागने की पद्धति किसने शुरू की ?

►-अलाउद्दीन खिलजी ।


15. भू-राजस्व व्यवस्था को अधिक प्रभावी बनाने के लिए अलाउद्दीन खिलजी ने किसकी स्थापना की ?

►-दीवान-ए-मुस्तखराज


16. अलाउद्दीन का प्रसिद्ध सेनापति कौन था जिसने दक्षिण भारत अभियान का नेतृत्व किया था ?

►-मलिक काफूर


17. अलाउद्दीन के दरबारी कवि कौन थे ?

►-अमीर खुसरो


18. सितार एवं तबले के अविष्कार का श्रेय किन्हें जाता है ?

►-अमीर खुसरो


19. इब्नबतूता की पुस्तक रेहला में किस शासक की घटनाओं का वर्णन है ?

►-मुहम्मद तुगलक


20. अलाउद्दीन की मृत्यु के बाद दिल्ली का सुल्तान कौन बना ?

►-कुतुबुद्दीन मुबारक । इसने खलीफा की उपाधि ग्रहण की ।

पोलीस भरती प्रश्नसंच

 1. अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला —– म्हणतात.

आकाशगंगा

 दीर्घिका

 तेजोमेघ  

तारकामंडल

उत्तर : आकाशगंगा


2. अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस —– म्हणतात.

 भांगाची भरती

उधानाची भरती

 ध्रुवीय भरती

 विषुववृत्तीय भरती

उत्तर : उधानाची भरती


 3. रिश्टर हे —– तीव्रता मोजण्याचे एकक आहे.

 भूपट्ट निर्मिती

 ज्वालामुखी

भूकंप

 मंद हालचाली

उत्तर : भूकंप


 4. —– पासून अॅल्युमिनियम मिळवले जाते.

 तांबे

 बॉक्साइट

 लोखंड

मॅगनीज

उत्तर : मॅगनीज


 5. —– हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे.

 हिराकुंड

 जायकवाडी

भाक्रा नांगल

 तुंगभद्रा

उत्तर : भाक्रा नांगल


 6. काथ —– या वृक्षापासून बनवितात.


 साल

 देवदार

 हलदू

खैर

उत्तर : खैर


 7. सातपुडा पर्वत रांगेतील सर्वोच्च शिखर —– आहे.

 कळसूबाई

धुपगड

 महेंद्रगीरी

 अनैमुडी

उत्तर : धुपगड


 8. मॅग्रुव्ह वनस्पतीचे मूळ स्थान —– देशात आहे.

भारत

 नेपाळ

 चीन

 म्यानमार

उत्तर : भारत


 9. —– हे ऐतिहासिक शहर ओलान नदीकाठी वसले आहे.

व्हेनिस

 नेपल्स

 मिलान

 तुरीन

उत्तर : व्हेनिस


 10. —– हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

 श्रीलंका

 आयर्लंड

ग्रीनलंड

 ऑस्ट्रेलिया

उत्तर : ग्रीनलंड


 11. दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारी भागात —– पर्वत आहे.


 हिमालय

अंडीज

 आल्पस

 रॉकी

उत्तर : अंडीज


 12. भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील —– क्रमांकाचा देश आहे.

 पाचव्या

 सहाव्या

सातव्या

 आठव्या

उत्तर : सातव्या


 13. अंदमान निकोबर बेटाची राजधानी —– आहे.

 पोर्टब्लेयर

कंवरती

 दिल्ली

 सिल्वासा

उत्तर :कंवरती


 14. इंदिरा गांधी कालवा —– राज्याच्या वायव्य भागात आहे.

 गुजरात

राजस्थान

 उत्तर प्रदेश

 मध्य प्रदेश

उत्तर : राजस्थान


 15. गुरुशिखर हे —– पर्वतातील उंच शिखर आहे.

 विंध्य

 सातपुडा

अरवली

 हिमालय

उत्तर : अरवली


 16. कोलार हे गोड्या पाण्याचे सरोवर —– राज्यात आहे.

 ओडिसा

 केरळ

कर्नाटक

 आंध्रप्रदेश

उत्तर : कर्नाटक


 17. भारतीय पठारावरील —– पश्चिम वाहिनी नदी आहे.

नर्मदा

 कृष्णा

 गोदावरी

 कावेरी

उत्तर : नर्मदा


 18. सागर तळाची खोली मोजण्याचे परिणाम कोणते?

 मीटर

 रिश्टर

फॅदम

 फूट

उत्तर : फॅदम


 19. ऑस्ट्रेलियातील गवताळ प्रदेश —– नावाने ओळखला जातो.

 पंपाज

डाऊन्स

 प्रेअरी

 व्हेल्ड

उत्तर : डाऊन्स


 20. —– हा जागृत ज्वालामुखी आहे.

 व्हेसूव्हियस

 किलीमांजारो

 काटमाई

फुजियामा

उत्तर : फुजियामा

साम्यानज्ञान प्रश्नोउत्तरे -भूगोल(भारत) (Geography)


🔹 1. मुंबर्इ बंगलोर NH-4 हा कोणता मार्ग आहे.

राष्ट्रीय महामार्ग ✅ 

राज्य मार्ग

जिल्हा मार्ग

ग्रामीण मार्ग


🔹 2. खालीलपैकी कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभजक आहे.

अरवली 

विंध्य

सहयाद्री

सातपुडा ✅


🔹 3. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात?

पश्चिमी घाट ✅

निलगिरी पर्वत

अरवली पर्वत

सातपूडा पर्वत


🔹 4. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र ………… आहे

श्रीहरीकोटा ✅

कोचीन

हसन

बेंगलोर


🔹 5. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.

कॄष्णा 

दामोदर

अलमाटी

सतलज ✅


🔹 6. ........... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.

जोग ✅

नायगारा

कपिलधारा 

शिवसमुद्र


🔹 7. पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्ष वृत्तवर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो.

९०° अक्षांश 

६०° अक्षांश

१८०° अक्षांश ✅

३८०° अक्षांश


🔹 8. आठव्या पंचवार्षिक योजनेत रेल्वेच्या कशावर अधिक भर देण्यात आला आहे.

विद्युतीकरणावर ✅

रूंदीकरणावर

संगणकीकरणावर

खासगीकरणावर


🔹 9. ............... हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.

श्रीलंका 

आयर्लंड

ग्रीनलंड ✅

ऑस्ट्रेलिया 


🔹 10. नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?

पाणी 

तापमान 

वातावरण ✅

खेळ क्लुप्त्यांचा :- अभ्यास थोडासा वेगळा


1) महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या


क्लुप्ती : विन सातसा गोहभी मकृ:


वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा


2) भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?


कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते


क्लूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”


गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा


3) भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार


क्लूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले


क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय


4) हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके


क्लूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'


शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग


5) बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा


क्लूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.


6) द्वीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.


क्लुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""


अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०


7) भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत


क्लुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)


8) भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?


क्लुप्ती : "MIM BSP"


M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान


9) आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.


क्लुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.


आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा


१0) सदिश राशी कशा लक्षात ठेवाल.


क्लुप्ती : "सविता वेग वजन बग "


स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती


१1) दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने


क्लुप्ती : ऑबिलीपी


ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट


१2)  महाराष्ट्रातील घाट


आंबा कोर -आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

कुंभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

मुना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट


१3) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”


सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१4) सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


क्लूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”


सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


१5) महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा


क्लूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’

सूर्या नदी


वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी


१6)  महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम


क्लूप्त्या : 'गोभीकृतान '


गो - गोदावरी

भी - भीमा

कृ - कृष्णा

ता - तापी

न - नर्मदा


महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा


*देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा प्राकृतिक कणा असून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड-चिरोली-गायखुरी या डोंगररांगा राज्याच्या नैसर्गिक सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्रप्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व नैऋृत्येस गोवा ही राज्ये आहेत. 


*राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. 


*पश्‍चिम समुद्र तटावरून येणार्‍या पावसाळी ढगांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर 400 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. समुद्र किनारपट्टीवरील कोकणात मुसळधार पाऊस पडतो व तो उत्तरेकडे सकरताना कमी होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेला पश्‍चिम पठारावरील जिल्ह्यात 70सेंमी एवढा अत्यल्प पाऊस पडत असून सोलापूर व अहमदनगर हे सर्वाधिक कोरडे जिल्हे आहेत. पूर्वेस विदर्भ व मराठवाड्याकडे सरकताना पावसाचे प्रमाण काहीसे वाढते. 


*लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असून राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.08 लक्ष चौ.कि.मी. आहे. जनगणना, 2011 नुसार राज्याची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी असून ती देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे.


* राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45.2 टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. राज्यात 36 जिल्हे असून प्रशासकीय सुविधेसाठी ते कोकण, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसुली विभागातविभागले आहेत.


* जिल्हा स्तरावरील नियोजनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थानिक प्रशासनासाठी राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,920 ग्रामपंचायती आहेत, तर नागरी भागात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती व सात कटक मंडळे आहेत.


* मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्यालये या शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व भांडवली बाजार आणि विक्रेय वस्तू व्यापार विनिमय केंद्रे मुंबईत आहेत.


* राज्यातील 234 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर 52.1 लाख हेक्टर वनांखाली आहे. सिंचनात वाढ व्हावी यासाठी अनेक सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बिगर सिंचन क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 


*महाराष्ट्राला ‘2019 पर्यंत पाणी टंचाई मुक्त राज्य’ करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले असून याद्वारे दरवर्षी 5,000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 


*पशुसंवर्धन हे कृषि क्षेत्राशी संबंधीत महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे 6.3 टक्के व 10.7 टक्के आहे.


* महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. लघु उद्योगात हे अग्रेसर असून देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगि क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याने सातत्य राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे प्रमुख केंद्र आहे.


* जनगणना 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरील 73 टक्के साक्षरता दराच्या तुलनेत राज्याचा साक्षरता 82.3 टक्के आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिले जात असून राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट संस्था आहेत. 


*भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसारदेशाचा मानव विकास निर्देशांक 0.467 आहे तर राज्यासाठी तो 0.572 आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचा सध्या 130 वा क्रमांकआहे. 


*महिला धोरण राबविणारे तसेच महिलांच्या विकासासाठी ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करुन अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. रोजगार हमी योजना राबविणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्र शासनाने ही येाजना अंगिकारली आहे. 


*महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. 


*राज्याने देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे. अजंठा, वेरूळ व घारपुरीची लेणी, गेट वे ऑफ इंडिया आणि वास्तुशास्त्राच्या वैशिष्ट्यपूर्ण वास्तू


जसे विहार व चैत्य यामुळे जगभरातील पर्यटक राज्याकडे आकर्षित होतात. 


*मानव विकासास सहाय्यभूत ठरणार्‍या प्रत्येक क्षेत्रात कार्य करणारी व्यक्तिमत्त्वे राज्यात उदयास आली आहेत. क्रीडा, कला, साहित्य व सामाजिक सेवा यामध्ये राज्याचे भरीव योगदान आहे. ‘बॉलीवूड’ नावाने जगप्रसिद्ध असलेला चित्रपट उद्योग राज्यात स्थित आहे.

मान्सूनचे स्वरूप

अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

क) मान्सूनचा खंड

ड) मान्सूनचे निर्गमन


▪️अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल


या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇


▪️ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण


1) आर्द काल व शुष्क काल

- सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.

- अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .

- आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो  


2) पाऊसाचे  वितरण

- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .

- नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .

-  पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . 

- पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

 

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध

- बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .

- आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ; याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.

- पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.


क) मान्सूनचा खंड

- नैऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात.


🔹पाऊस न पडण्याची अनेक कारणे पुढीलप्रमाणे ....


- पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो . 

- उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.

- भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.

 - पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे पाऊस पडत नाही . 

- तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .


ड) मान्सूनचे निर्गमन

- वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते .

- मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

_____________________________________

हिमालयातील महत्वाच्या खिंडी


1. अघिल खिंड:

काराकोरम मध्ये K2 च्या उत्तरेस आहे .

चीनच्या शिनजियांग (सिंकियांग) प्रांतासह लडाखमध्ये सामील होते .


2. बनिहाल खिंड:

पीर-पंजाल पर्वतरांगा मध्ये स्थित आहे .

जम्मूमध्ये श्रीनगरला जोडते.

जवाहर बोगद्याचे उद्घाटन डिसेंबर 1956 मध्ये झाले.


3. बारा लाचा खिंड:

जम्मू आणि काश्मीर मध्ये स्थित आहे .

मनाली आणि लेहला जोडते.


4. बोमडी-ला खिंड:

अरुणाचल प्रदेशातील ग्रेटर हिमालयात भूतानच्या पूर्वेला स्थित आहे .

ल्हासा (तिबेटची राजधानी)आणि अरुणाचल प्रदेशला जोडते .


5. बुर्जीला खिंड:

भारत आणि पाकिस्तानच्या सीमेजवळील नियंत्रण रेषेच्या जवळ स्थित आहे.

हे काश्मीर खोऱ्याला लडाखच्या देवसाई मैदानाशी जोडते.


6. चांग-ला खिंड:

हा ग्रेटर हिमालयातील एक उंच पर्वत मार्ग आहे. हा देशातील सर्वात उंच पर्वत रस्त्यांपैकी एक आहे.

चांग-ला खिंड हिमालयात स्थित चांगथांग पठाराचे मुख्य प्रवेशद्वार आहे.


7. डेब्सा खिंड:

हिमाचल प्रदेशातील कुल्लू आणि स्पीती जिल्ह्यांच्या दरम्यान ग्रेटर हिमालयात स्थित आहे.स्पिती दरी आणि पार्वती दरीला जोडते.


8. दिहांग खिंड:

अरुणाचल प्रदेश राज्यात स्थित.

हे अरुणाचल प्रदेशला मंडाले (म्यानमार) शी जोडते.


9. दिफू खिंड:अरुणाचल प्रदेशच्या पूर्व भागात स्थित आहे.

हि खिंड भारत आणि म्यानमारमधील पारंपारिक खिंड आहे जी मंडालेला सहज आणि कमीत कमी  अंतरावर जोडते.


10. इमिस-ला खिंड:

लेह जिल्ह्याच्या दक्षिण काठावर स्थित आहे.

हि खिंड लेहहून तिबेट (चीन) साठी प्रवेशद्वार आहे.


11. खारदुंग-ला खिंड:

भारतीय जम्मू आणि काश्मीर राज्याच्या लडाख प्रदेशात स्थित आहे.

हि देशातील सर्वोच्च मोटरेबल(वाहने पण जाऊ शकतील) खिंड आहे.

हि लेहला सियाचिन हिमनदीसह जोडते.


12. खुंजरब खिंड:

काराकोरम पर्वत मध्ये स्थित आहे.

हि लडाख आणि चीनच्या सिंकियांग प्रांतामधील पारंपारिक खिंड आहे.


13.जेलेप ला खिंड:

पूर्व सिक्कीम जिल्हा, सिक्कीम, भारत आणि तिबेट स्वायत्त प्रदेश, चीन यांच्यामधील एक उंच पर्वत मार्ग आहे. भारताशी जोडणाऱ्या मार्गावर आहे.

हि खिंड सिक्कीमला ल्हासाशी जोडतो, चुंबी खोऱ्यातून जातो.


14. लनक खिंड:

अक्साई-चिन (लडाख) मध्ये स्थित आहे.

हि खिंड लडाखला ल्हासाशी जोडते.


15. लिखापानी/पांगसौ खिंड:

हि खिंड भारत-बर्मा (म्यानमार) सीमेवरील पत्काई टेकड्यांच्या शिखरावर आहे.

आसामच्या मैदानावरून बर्मामध्ये जाण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.


16. लिपु लेख खिंड:

पिथौरागढ जिल्ह्यात स्थित. हि खिंड उत्तराखंडला तिबेटशी जोडते.

महाराष्ट्रातील हवामान

महाराष्ट्रातील हवामान विशिष्टपूर्ण आहे. याचे कारण त्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्रात मान्सून वाऱ्यामुळे पाऊस मिळतो.


महाराष्ट्राच्या हवामानाचे स्वरूप -


कोकण -

कोकणचे हवामान उष्ण, दमट, सम, प्रकारचे आहे. कोकणची सखल किनारपट्टी अरबी समुद्रास अगदी जवळ असल्याने वर्षभर वर्षभर तो प्रदेश फार उष्नही व फार थंडही नसतो.


सह्यान्द्री -

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा थंड होते. म्हणून सह्यान्द्रीच्या घाटमाथ्यावर उन्हाळ्यत देखील तेथील हवामान थंड असते. हिवाळ्यात मात्र कडाक्याची थंडी असते. म्हणून या भागातील हवामान थंड व आद्र असते.


महाराष्ट्र पठार -

महाराष्ट्राच्या पठारावर उष्ण,विषम,व कोरडे आहे. या भागात मार्च ते मे या काळात बरीच उष्णता असते. म्हणजेच उन्ह्याळातील व हिवाळ्यातील तापमानातच बरीच तफावत असल्याने पठारावरील हवामान हे विषम आहे.


महाराष्ट्रातील ऋतू -

महाराष्ट्रात साधारणपणे उन्हाळा-मार्च ते मे, पावसाळा -जून ते सप्टेम्बर, हिवाळा - ऑक्टोबर ते फेब्रूअरी, हे तीन मुख्य ऋतू आहेत.


उन्हाळा -

२१ मार्चनंतर उत्तर गोलार्धात सूर्यकिरणे लंबरूप पडण्यास प्रारंभ होतो तसेच दिनमानाच्या कालही वाढते.

महाराष्ट्राचे भौगोलिक स्थान सुमारे १६' ते २२' दरम्यान असल्याने या काळात तापमानात वाढत जाते. कोकण किनार पट्टीत अरबी समुद्राच्या सानिध्यामुळे खरे व मतलई वारे यांचा फायदा मिळतो. तर दख्खनचे पठार हे सह्यन्द्री पर्वतामुळे

अरबी समुद्रापासून अलग झालेले असते. यामुळे कोकण व पठार यावरील बरीच तफावत आहे.


कोकणामध्ये दैनिक कमाल तापमान कक्षा ३०' ते ३३' सें च्या दरम्यान असते. मराठवाड्यात ३० ते ३५ सें तापमान असते. तर विदर्भामध्ये ४२ ते ४३ सें च्या आसपास असते.


हवेचा दाब व वारे -

उन्हाळ्यात असे तापमान वाढत गेल्यास साहजिकच हवेचा दाब कमी कमी होत जातो. आणि कोकण किनारपट्टीत समभार रेषा समांतर होत जातात. एप्रिल मे महिन्यात जसजसा उन्हाळा कडक होत जातो तसतसा समभार रेषा जवळजवळ येऊ लागतात आणि वायुभार उतार तीव्र होत जातो. अरबी समुद्रावरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात. आणि वायुभर उतार तीव्र होत जातो. अरबी समूद्रवरील जास्त दाबाच्या प्रदेशाकडून वारे वाहू लागतात व किनारपट्टीवर दुपारच्या कडक उन्हानंतर आरोह प्रकारचा पाऊस पडतो. तर मराठवाडा आणि विदर्भात उन्हाळ्याच्या शेवटच्या कालखंडात धुळीची वादळे निर्माण होतात.


पर्जन्य -

हिवाळ्यामध्ये वायव्य भारतात तयार झालेल्या जास्त दाबाचा पट्टा सूर्य कर्कवृत्ताकडे असल्याने हळूहळू दक्षिणेकडे सरकतो. एप्रिल महिन्यात हा जास्त दाबाचा पट्टा भारताच्या दक्षिण भागात असतो. व त्याचा बराचसा प्रदेश सागरावारही असतो. वायव्य भारतात दाबाचा प्रदेश असतो. परंतु तो अजूनही कमजोरच असतो. दाबाच्या प्रदेशाकडून

जास्त दाबाच्या प्रदेशाकडून लागतात. ते एप्रिल व मी महिन्यात महाराष्ट्रच्याही भागावरून वाहत जाऊन पाऊस देतात. यावेळेस आंब्याचा बहर असतो. म्हणून या पावसाला आंबेसरी

असे म्हणतात.


महाराष्ट्र मान्सूनची संकल्पना -


सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हि अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. उन्हाळ्यात भूभाग

व जलभाग तापणे हे मान्सून चे तंत्र आहे. हे भारतीय उपखंडाचे वैशिष्ट्य आहे. सर्वसामान्यपणे महाराष्ट्रात जो पाऊस पडतो. त्यापैकी सुमारे ८५% पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून मिळते. पावसाळ्यात चार महिन्याच्या कालावधीत कोकण आणि सह्यन्द्री पर्वतरांगेत भरपूर पाऊस पडतो. त्यामानाने मध्य महाराष्ट्रात कमी पाऊस पडतो. महाराष्ट्राच्या पूर्व भागात अजून पावसाचे प्रमाण वाढत जाते. त्याचे कारण विदर्भ हा प्रदेश बंगालच्या उपसागरावरील मान्सून वाऱ्याच्या शाखेत येतो त्या भागात आगस्ट आणि सप्टेंबर या दरम्यान पाऊस पडतो.

कोकणात २५० ते ३०० सें मी पाऊस पडतो. घाठ्माठ्यावरील आंबोली येथे सर्वात जास्त

म्हणजे ७०७ से मी पूस कोसळतो. तर महाबळेश्वरला ५९४ एवढा पाऊस पडतो. माथेरानच्या पठारावर पावसाचे प्रमाण ४९३ से मी आहे. सह्यांद्रीच्या पूर्वेकडे म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या भागाकडे ५० ते ६० सें मी पाऊस पडतो. तसेच हा प्रदेश अनिश्चित स्वरूपाचे आहे. म्हणून या भागाला अवर्षणग्रस्त प्रदेश म्हटले जाते.

मराठवाड्यात ६० ते ८० सें मी एवढे पर्जन्य आहे. विदर्भात पावसाचे प्रमाण वाढत जाते. विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेस पावसाचे प्रमाण वाढत जाते. पश्चिम विदर्भात ७५ ते ९० सें मी पाऊस पडतो. तर पूर्व विदर्भात ९० ते १५० से मी इतका पाऊस पडतो. विदर्भातील गाविलगडच्या डोंगरात पावसाचे प्रमाण वाढत जाते. तेथील थंड हवेच्या चिखलदरा या ठिकाणी १५० सें मी एवढा पाऊस पडतो.


ऑक्टोंबर संक्रमणाचा महिना -

या महिन्यात प्रखर सूर्यप्रकाश असतो. आणि हवेमध्ये बाष्पाचे प्रमाण भरपूर असल्याने उकाडा अनुभवास येतो.


हिवाळा -

मान्सून संपल्यावर वाऱ्याचा काळ संपल्यावर नोवेंबरपासून खऱ्या अर्थाने हिवाळा चालू होतो. हिवाळ्यात सरासरी मासिक तापमानाचा विचार केला तर असे आढळते कि बऱ्याचशा रेषा पश्चिम पूर्व दिशेने असून त्या एकमेकास समांतर आहेत. हिवाळ्यामध्ये काही ठिकाणी पाऊस पडतो.


महाराष्ट्रात हिवाळ्यात संपूर्ण खानदेश, नाशिक जिल्हा, बराचसा अहमदनगर पुण्यातील जुन्नर घोडेगाव,राजगुरुनगर, शिरूर,पुणे,हवेली, तालुके. विदर्भात अमरावती जिल्ह्याच्या धारणी,चिखलदरा, तसेच वरुड नागपूर भंडारा, चंद्रपूर या भागात किमान तापमान १० सें ते १२.५ सें एवढे असते. महाराष्ट्राच्या उर्वरित भागात म्हणजे दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच प्रमाणात मराठवाडा व पश्चिम विदर्भ व पूर्व विदर्भात नागपूर जिल्ह्याचा दक्षिण भाग वर्धा, गोंदिया, भंडारा,चंद्रपूरच्या उत्तर भागात किमान तापमान १२.५ व १५ सें दरम्यान आहे.


महाराष्ट्रातील वार्षिक पर्जन्याचे वितरण -


जास्त पर्जन्याचा प्रदेश - महाराष्ट्रातील कोकण आणि सह्यान्द्री डोंगरावर आणि डोंगराच्या पायथाचा प्रदेश या भागात ३०० ते ६०० इतका पाऊस पडतो. मध्यम पर्जन्याचा प्रदेश- सह्यान्द्रीच्या भागात, तर नाशिक,पुणे,सातारा,सांगली, या जिल्ह्याचा पश्चिम भाग गोंदिया, गडचिरोली, या भागात ३०० ते २०० से मी पाऊस पडतो. मध्यम ते कमी पर्जन्याचा प्रदेश - चन्द्रपूर, यवतमाळ,वर्धा, या भागात मध्यम पर्जन्य पडते. तर मराठवाड्यातील सर्व जिल्हे आणि सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा, पुणे या जिल्ह्याचा भागात तसेच पश्चिम विदर्भातील सर्व जिल्हे या भागात कमी पर्जन्य होते.

एलिफंटा लेणी


◾️ एलिफंटा लेण्यांच्या निर्मितीचा काळ हा साधारण इसवी सन ९०० ते १३००च्या दरम्यान असावा असा अंदाज आहे.


◾️ एका अखंड पाषाणात ही लेणी कोरण्यात आली आहेत. ज्या काळी पाश्चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता त्याकाळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केला याला कुठेच तोड नाही.


◾️या गावाचे प्राचीन नाव श्रीपुरी असे होते.


◾️कोकणातल्या मौर्य वंशाची घारापुरी ही राजधानीअसावीत्यानंतर चालुक्य, राष्ट्रकूट , यादव नि मोगल यांनी तिथे क्रमाने आपली सत्ता प्रस्थापित केली.सोळाव्या शतकाच्या पूर्वार्धात हे बेट पोर्तुगीजांच्या ताब्यात गेले.


◾️शिवाजी महाराजांच्या काळात ते मराठ्यांनी हस्तगत केले नि सन १७७४ मध्ये त्यावर इंग्रजांनी आपले प्रभुत्व स्थापले


◾️  १९८७साली या लेण्यांना युनेस्को जागतिक वारसा स्थानाचा दर्जा दिला गेला. 


◾️घारापूरी लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीचे प्रचंड आकाराचे एक शिल्प होते, त्यावरूनच या लेण्यांना एलिफंटा लेणी असे नाव पडले. 

भरती विशेष सामान्यज्ञान


1) जैन धर्माचे पहिले तीर्थकर- ऋषभदेव


2) सिंधू संस्कृती ही संस्कृती होय - नागरी


3) चिनी प्रवासी युवान सॉंग यांच्या काळात भारतात आला - हर्षवर्धन


4) आजच शत्रू चे दुसरे नाव काय - कुणीक


5) जैन धर्माचे शेवटचे तीर्थकार - वर्धमान महाविर


6) गौतम बुद्धाच्या वडिलांचे नाव काय होते - शुद्धोधन


7) 0 चा शोध कोणत्या देशात लागला - भारत


8) अष्टांग मार्गाच्या आचरणासाठी पंचशील कोणी सांगितले - गौतम बुद्ध


9) हॉटल येथे शिवाची मंदिरे यांच्या काळातील आहे - चालुक्य


10) पॅगोडा हा वस्तूचा प्रकार कोणत्या धर्माशी निगडित आहे - बोध


11) प्राचीन भारतामध्ये हडप्पा संस्कृती कोणत्या नदीकाठी अस्तित्वात होती - रावी


12) हडप्पा संस्कृती मध्ये कोणत्या कलांना महत्त्व होते - नृत्यसंगीत


13) गौतम बुद्धांचा जन्म कोठे झाला - लुंबिनी


14) हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे - कालीबंगन


15) महाभारतात दूत राष्ट्र या राजाच्या पत्नीचे नाव काय - गांधारी


16) मुस्लिम धर्मियांचे पवित्र ठिकाण मक्का हे कोणत्या देशामध्ये आहे - सौदी अरेबिया


17) कलिंग युद्धाची संबंधित नाव कोणते - सम्राट अशोक


18) हडप्पा संस्कृती मध्ये कोणत्या ठिकाणी अग्निकुंड सापडले - कालीबंगन


19) मोहम्मद गजनी यांनी भारतावर किती वेळा आक्रमण केले - 17


20) शीख धर्माचे दहावे गुरू - गुरूगोविंद सिंह


मोर्य ते यादव



मौर्य साम्राज्याचा काळ  


महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्राज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) हिस्सा होता. या काळात महाराष्ट्राने भरभराटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.


सातवाहन साम्राज्याचा काळ 


सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराणे होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतचा मानला जातो. अर्थात या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरुष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा अतिशय महत्त्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.


वाकाटकांचा काळ 


वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळात राजाश्रयामुळे महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळातील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.


कलाचुरींचा काळ 


वाकाटकांनंतर कलचुरी राजघराण्याने इसवी सनाच्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.


बदामी चालुक्य आणि कल्याणी चालुक्यांचा काळ 


वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणि इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमानी होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.


वाकाटक, चालुक्य व राष्ट्रकूटांचा काळ 


वाकाटकांच्या(इस.२५०-५२५) राज्यात विदर्भ समाविष्ट झाला. या कालखंडात कला, धर्म व तंत्रज्ञानात प्रगती होत गेली. सहाव्या शतकात बदामीच्या चालुक्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली. दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्कूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे पहिला कृष्ण या राष्ट्रकूट राजाने बांधले.


यादवांचा काळ 


महाराष्ट्राच्या काही भागावर कल्याणीच्या चालुक्यांची सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवांनी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१०पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता संपुष्टात आणली. यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्तिसंप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.

दख्खन पठार



‘दक्षिण’ या संस्कृत शब्दाचा ‘दख्खन’ हा अपभ्रंश असून, दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील. यावरूनच दख्खन पठार अशी संज्ञा पडली असावी. या पठाराचा उल्लेख रामायण, महाभारत व मार्कंडेय, मत्स्य, वायु या पुराणांत अनेक वेळा आढळतो.


पहिल्या शतकात एका ग्रीक मार्गनिर्देशकाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात या पठाराचा ‘दचिन बदेस’, तर पाचव्या शतकात आलेला चिनी प्रवासी फाहियान याच्या वृत्तांतात Ta–Thsin असा उल्लेख आढळतो. तसेच अभिजात संस्कृत साहित्यात व कोरीव लेखांत याचा ‘दक्षिण पथ’ असा उल्लेख आढळतो. सातवाहन राजांच्या कारकीर्दीत सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यास ‘दक्षिणापथपति’ अशी उपाधी दिलेली होती.


दक्षिण पथावर सातवाहन, चोल, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव व होयसळ इ. वंशांचे राज्य होते. तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या पठाराविषयी फार थोडी  माहिती उपलब्ध होती. तथापि पठारावर इतिहासपूर्व काळापासून मानवी वस्ती आहे, याबद्दल पुष्कळ पुरावा मिळतो.

या पठाराच्या सीमेबाबत एकमत नाही. संकुचित अर्थाने उत्तरेकडे सातमाळा टेकड्या व दक्षिणेकडे कृष्णा नदी यांच्यामधील मराठी भाषा बोलली जाणाऱ्या (महाराष्ट्र) प्रदेशासच दख्खन पठार म्हणतात; तर व्यापक अर्थाने नर्मदा किंवा विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील संपूर्ण भारतीय द्वीपकल्पास दख्खन पठार म्हणतात.


हे पठार भारत वआफ्रिका खंड यांना जोडणाऱ्या प्राचीन ‘गोंडवन भूमी’ चा अवशेषात्मक भाग असावा. या पठाराच्या उत्तरेस सातपुडा पर्वंत असून त्यात १,६७६ मी. उंचीच्या डोंगररांगा आहेत. या रांगांत उगम पावणाऱ्या तापी, नर्मदा या नद्या अरबी समुद्रास मिळतात.


तसेच पूर्वेस व पश्चिमेस अनुक्रमे पूर्व घाट व पश्चिम घाट (सह्याद्री) असून हे घाट पठाराच्या दक्षिण टोकाला येऊन मिळतात. पठाराची सरासरी उंची सु. ६१० मी. असून पठाराचा उतार पूर्वेकडे कमी कमी होत गेला आहे. कृष्णा, गोदावरी आणि कावेरी या पठारावरील प्रमुख नद्या असून त्या पश्चिम घाटात उगम पूर्वेकडे बंगालच्या उपसागरास मिळतात.


पठारावरील हवामान कोरडे असून किनाऱ्यावर उष्ण–दमट तर काही ठिकाणी रूक्ष असते. उन्हाळ्यात तपमान २०° ते ३२° से. च्या दरम्यान असते, तर हिवाळ्यात १०° ते २४° से. पर्यंत असते. नैर्ऋत्य व ईशान्य या दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून पठारावर पाऊस पडतो.


जास्तीत जास्त पर्जन्यमान पश्चिम घाटावर असून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. पठार अतिशय टणक, मजबूत आणि स्फटिकमय ग्रॅनाइटी व बेसाल्ट खडकांनी बनले आहे. त्यावरील लाव्हारसाच्या थरांपासून बनलेली मृदा सुपीक आहे.


पठाराचा बराचसा भाग सपाट असून त्यात मधून मधून सपाट माथ्याचे उंचवटे व गोलाकार टेकड्या दिसतात. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा प्रदेश स्थिर स्वरूपाचा मानला जातो. पठारावर खनिज संपत्ती विपुल असून तीत सोने, दगडी कोळसा, मँगॅनीज व लोखंड यांची धातुके तसेच बॉक्साइट, मोनॅझाइट वाळू इ. खनिजे प्रमुख आहेत.


मध्ययुगीन भारत (थोडक्यात)



गुप्त साम्राज्यानंतर भारताचा इतिहास मध्ययुगीन इतिहासात मोडतो. गुप्त साम्राज्यानंतर हूणांच्या आक्रमणांनी खिळखिळे झाले. त्यानंतर हर्षवर्धन या कनौज च्या सम्राटाने भारतीय राज्ये पुन्हा एका छत्राखाली आणली.

त्याचे साम्राज्य तो जिवंत असे पर्यंत टिकले परंतु प्रभावी वारसदार नसल्याने ते त्यानंतर लगेचच कोसळले. ७ व्या शतकानंतर ते १३ व्या शतकापर्यंत अनेक हिंदू साम्राज्ये उदयास येउन लयाला गेली.

१३ व्या शतकातले विजयनगरचे साम्राज्य हे शेवटचे मध्ययुगीन हिंदू साम्राज्य होते. या काळात भारतीयांनी स्थापत्यामध्ये फार मोठी प्रगती केली. मध्ययुगाच्या पूर्वाधात ६ व्या शतकात शंकराचार्यांनी प्राचीन अद्वैतवादाचे पुनरुत्थान केले.

आपल्या पांडित्याने हिंदू सनातन धर्माला पुन्हा एकदा बळकटी दिली. यानंतर भारतातील बौद्ध धर्माचे प्रस्थ कमी झाल्याचे समजले जाते.

या काळात दक्षिण भारत व महाराष्ट्रात राष्ट्रकूटांचे राज्य होते तर मध्य व पश्चिम भारतात मालव प्रांतात प्रतिहार पूर्वेकडे बंगालमध्ये पाल साम्राज्य उदयास आले ज्यांनी काही काळ जवळपास संपूर्ण उत्तर भारत व अफगाणिस्तानापर्यंत आपल्या सीमा वाढवल्या होत्या.

प्रतिहारांनी उमय्यद खलीफांच्या काळात झालेल्या पहिल्या इस्लामी आक्रमणाचा प्रखर सामना केला व पुढील तीन चार शतके इस्लामी आक्रमणे होण्यापासून भारताचे रक्षण केले.

प्रतिहारांचे मध्य व पश्चिम भारतावरील साम्राज्य कालांतराने क्षीण झाले व अनेक लहान सहान राज्यांमध्ये विभागले जी राज्ये राजपूत राज्ये (राजस्थानमधील) म्हणून ओळखली जात,

त्या राज्यांनी अगदी भारत इंग्रजांपासून स्वतंत्र होईपर्यंत आपले अस्तित्व टिकवले होते.

या राजपूत राज्यांनी उत्तर भारतातील मोठ्या प्रांतावर अनेक शतके राज्य केले, यापैकी पृथ्वीराज चौहान हा पराक्रमी राजपूत राजा दिल्लीचा राजा होता व इस्लामी आक्रमकांविरुद्ध अनेक युद्धे केली.

भारताच्या इतिहासातील पराक्रमी योद्धयांमध्ये पृथ्वीराजची गणना होते. मोहम्मद घौरी याने पृथ्वीराजचा पराभव करून त्याचा वध केला व स्वतः दिल्लीचा शासक बनला व भारतावर अधिकृतरीत्या इस्लामी राजवट सुरू झाली.

या काळात दक्षिण व मध्य भारतात चालुक्य साम्राज्य होते. *चालुक्यांचा कार्यकाल इस ५५० ते ७५० इतका होता.* चालुक्यांची राजधानी कर्नाटकातील बदामी इथे होती.

आजही बदामी इथे चालुक्यांचा इतिहास सांगणारी प्राचीन मंदीरे आढळून येतात. पल्लवांनी देखिल याच काळात अजून दक्षिणेला राज्य केले. चालुक्यांच्या साम्राज्यातील स्थापत्यामधील प्रगती लक्षणीय होती.

अजंठा व वेरुळची लेणी चालुक्य राज्यकर्त्यांनी बांधल्या असे मानतात. चालुक्यांचे राज्य जसे जसे क्षीण होत गेले तसे त्याचे विभाजन होत गेले. महाराष्ट्रात देवगीरीचे यादवांनी चालुक्य राज्य चालवले तर वारंगळमध्ये काकतीय तर कर्नाटक होयसाळांनी ताबा घेतला.

चालुक्यांचे राज्य क्षीण झाल्यानंतर दक्षिणेत प्राचीन चोल साम्राज्याने जबरदस्त उभारी घेतली व भारताच्या इतिहासातील एक अतिशय प्रभावी साम्राज्य बनले.

राजाराज चोल व राजेंद्र चोल यांनी चोल साम्राज्याच्या सीमा भारताबाहेर पार मलेशिया आणि थायलंड पर्यंत नेल्या. साम्राज्यवादी चोलांचे साम्राज्य भारताबाहेर पसरण्यास त्यांची प्रभावी नौदलीय सैन्यरचना उपयोगी ठरली.

या काळात दक्षिण भारतातील राज्यांनी पाश्चिमात्य व पौर्वात्य जगाशी व्यापार वाढवला व प्रबळ बनले. १३४३ पर्यंत चोलांचा प्रभाव कमी झाला व दक्षिणेतील सर्व लहान मोठी राज्ये विजयनगर साम्राज्यात संमिलीत झाली.

या काळात उत्तरेत इस्लामी राज्यकर्त्यांची पकड मजबूत झाली होती. विजयनगरचे साम्राज्य शेवटी इस्लामी राज्यकर्त्यांच्या आक्रमणाने लयाला गेले.