28 August 2024

अतीमहत्वाच्या संज्ञा

१) राज्याचा एकत्रित निधी (राज्यघटनेचा अनुच्छेद २६६/१) : 

राज्याला विविध मार्गातून मिळणारा संपूर्ण महसूल, राज्याद्वारे उभारलेले सर्व कर्ज आणि कर्ज परताव्यामध्ये राज्याला मिळणारे सर्व उत्पन्न म्हणजे राज्याचा एकत्रित निधी होय. शासनाच्या विविध कार्यावर होणारा खर्च या एकत्रित निधीतून भागविला जातो.


२) आकस्मिता निधी ( राज्यघटनेचा अनुच्छेद २६७/२) :

अर्थसंकल्पात तरतूद न केलेले अकस्मात उद्भवलेले अत्यंत महत्त्वाचे खर्च भागविण्याकरिता किंवा अनेकदा केलेली तरतूद अपुरी असल्यामुळे आणि खर्च मात्र अत्यावश्यक असल्यास असा खर्च भागविण्याकरिता या आकस्मिता निधीची तरतूद केली जाते. हा खर्च पुढे पूरक मागण्यांच्या रूपात विधानमंडळात मंजुरीकरिता मांडण्यात येतो व त्याकरिता पुनर्विनियोजन करण्यात येते.


३) लोकलेखा (राज्यघटनेचा अनुच्छेद २६६/२) : 

यामध्ये एकत्रित निधीमध्ये अंतर्भूत केलेल्या रकमा वगळून शासनाला किंवा शासनाच्यावतीने मिळालेल्या इतर सर्व रकमा जमा करण्यात येतात. यातील व्यवहार बँकिंग व समायोजनाच्या स्वरूपाचे असल्याने यातून खर्च करण्यासाठी विधानमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता नसते. म्हणजेच लेखांच्या बाबतीत राज्यशासन बँकरची भूमिका करीत असते आणि ज्यावर व्याज देत असते व परत करण्याची जबाबदारी राज्यशासनाची असते असा निधी अथवा लेखे.

उदा. अल्पबचतचे पैसे, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, राज्यमार्ग निधी, शिक्षण उपकरनिधी इ. लोकलेखा स्वतंत्रपणे सांभाळला जातो आणि तो राज्याच्या एकत्रित निधीचा भाग असत नाही.


४) दत्तमत खर्च : 

राज्याच्या एकत्रित निधीतून करावयाच्या खर्चाच्या पै अन् पैची मान्यता ही विधानसभेतून घ्यावी लागते. यातील काही बाबी सोडल्या तर सर्व खर्च हा दत्तमत असतो म्हणजे ज्याला मतदानाने मंजुरी मिळवावी लागते. याचा अर्थ असा की विभागाच्या खर्चाच्या मागण्या या विधानसभेत मतदानाला टाकाव्या लागतात आणि त्या मतदानाने मान्य होतात.


५) भारित खर्च :

 हा खर्च मतदानाला टाकला जात नाही तर हा राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असतो. त्यामुळे विधानसभा याला नाकारू शकत नाहीत. उदा. मा. न्यायमूर्ती, मा. राज्यपाल, मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष विधानसभा, मा. सभापती व उपसभापती विधानपरिषद यांचे पगार, भत्ते आदींचा खर्च शासनाच्या कर्जावरील व्याजाचा खर्च, न्यायालयाच्या आदेशान्वये भागवायचा खर्च इत्यादी.


६) योजनांतर्गत खर्च : 

राज्याच्या वार्षिक योजनेअंतर्गत असलेला खर्च. हा खर्च संपूर्णपणे विकासात्मक खर्च असतो.


७) योजनेतर खर्च :

 योजनेतर खर्चात सर्वसाधारणपणे राज्याचे सर्व विकासेतर खर्च भागविले जातात. उदा. कर्मचाऱ्यांचे पेन्शन, कायदा सुव्यवस्था व करवसुली यावर येणारा खर्च, सामान्य प्रशासनावर येणारा खर्च इत्यादी.


८) महसुली लेखे :

 हे दोन प्रकारचे असतात. A. महसुली जमा : राज्यशासनाचे सर्व प्रकारचे कर, सेस, शुल्क या माध्यमातून येणारे उत्पन्न, केंद्रीय कर व शुल्कातील राज्याला मिळणारा हिस्सा व करेतर उत्पन्न जसे की प्राप्त होणारे व्याज, फी, शास्तीचे उत्पन्न तसेच केंद्र शासनाकडून मिळणारी विविध अनुदाने याला महसुली जमा असे म्हणतात.

B. महसुली खर्च : राज्यप्रशासन, राज्य विधानमंडळ, करवसुली यावर होणारा खर्च, कर्ज परतफेड आणि व्याज प्रदान करणे. पेन्शन तसेच विविध संस्थांना अनुदाने देणे व शासनाच्या विविध विभागांतर्गत प्रशासकीय खर्च करणे.


९) भांडवली लेखे :

 हे खालील प्रकारचे असतात.

अ . महसुली लेखा बाहेरील भांडवली खर्च : शासनाने कायमस्वरुपी मत्ता निर्माण करण्याकरिता अथवा प्राप्त करण्याकरिता केलेले खर्च. जमीन अधिग्रहीत करणे, रस्ते अथवा पुलांचे बांधकाम, पाटबंधारे अथवा ऊर्जा निर्मिती वरील खर्च, वरील खर्च, कर्ज रोख्यातील गुंतवणूक, खाद्यान्नाची भांडारे इत्यादी भांडवली खर्चाचे प्रकार आहेत.

ब. भांडवली उत्पन्न : साधारणपणे शासनाच्या मत्तेच्या विक्रीतून प्राप्त झालेले उत्पन्न.


१०) महसुली तूट आणि महसुली शिल्लक : 

राज्याच्या अर्थसंकल्पात ज्यावेळी एकूण महसुली जमेपेक्षा महसुली खर्च अधिक असतो त्यावेळी त्याला महसुली तूट मानले जाते. परंतु ज्यावेळी जमा होणारा महसूल हा महसुली खर्च भागवून उरतो अधिक असतो त्याला महसुली शिल्लक म्हणतात. ‘महसुली शिल्लक चांगले’ तर महसुली तूट ही राज्याच्या अर्थव्यवस्थेत चिंताजनतक मानली जाते.


११) तुटीचा अर्थसंकल्प : 

महसुली व भांडवली लेखावरील एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च ज्यावेळी अधिक असतो त्यावेळी त्याला अर्थसंकल्पीय तूट असे म्हणतात.


१२) राजकोषीय तूट :

 वर उल्लेखित केलेल्या अर्थसंकल्पीय तुटीत भांडवली उत्पन्नातील कर्ज व इतर दायित्व समाविष्ट केल्यावर जी रक्कम तयार होते तिला राजकोषीय तूट असे म्हणतात.


१३) मागण्या :

 प्रत्येक विभागाला आपल्या विभागांतर्गत जो खर्च अपेक्षित आहे तो अर्थसंकल्पात समाविष्ट केला जातो व हा खर्च कशाकरिता करण्यात येणार आहे. याच्या स्पष्टीकरणासह मागणीच्या स्वरुपात तो विधानमंडळापुढे मंजुरीसाठी मांडावा लागतो.


१४) पूरक मागण्या :

 एखाद्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात अंदाजित केल्यापेक्षा अधिक खर्च एखाद्या बाबीवर होत असेल अथवा वार्षिक अर्थसंकल्प तयार करताना ज्या खर्चाची कल्पना करण्यात आली नसेल असा नवीन बाबींवरील खर्च, अर्थसंकल्पात तरतूद न केलेला आकस्मिक स्वरुपाचा खर्च करावा लागला असेल तर तो आकस्मिता निधीतून केला जाते व मग पूरक मागण्यांच्या स्वरुपात त्याच्या स्पष्टीकरणासह विधानसभेसमोर मंजुरीकरिता मांडावा लागतो.


१५) अधिक खर्चाच्या मागण्या :

 या मागण्या पूरक मागण्यापेक्षा भिन्न असतात. कारण पूरक मागण्यांमधील चालू आर्थिक वर्षाकरिता मागणी असते तर यामध्ये मागील वित्तीय वर्षात झालेल्या अधिकच्या खर्चाकरिता मागणी असते.


१६) विनीयोजन विधेयक : 

सर्व विभागांच्या खर्चाच्या मागण्या एकत्रितपणे मतास टाकून मंजूर झाल्यावर त्याचे कायद्यात रुपांतर करावे लागते याला विनियोजन विधेयक म्हणतात आणि या मागण्या समवेत जो भारित खर्च आहे त्याचा अंतर्भाव करून राज्याच्या एकत्रित निधीतून हा खर्च भागविण्याचे अधिकार शासनास याद्वारे प्राप्त होतात.


17. पुनर्विनियोजन विधेयक : 

पूरक मागण्या संदर्भात जे विधेयक येते त्याला पुनर्विनियोजन विधेयक असे म्हणतात.


१८) वित्तीय विधेयक : 

राज्याचा अर्थसंकल्प मांडताना भाषणाच्या दुसऱ्या भागात वित्तमंत्री करासंबंधीचे प्रस्ताव मांडतात. याच प्रस्तावाचे विधेयकात रूपांतर करण्याकरिता विधानसभेसमोर वित्तीय विधेयक मांडले जाते. या विधेयकामुळे कर कमी किंवा अधिक होतो अथवा त्यात सूट मिळते किंवा त्यावरची शास्ती इ. वाढते व यामुळेच वस्तूंचे भाव कमी अधिक होतात. लौकिक अर्थाने नागरिकांना भाव कमी अधिक होणे म्हणजेच बजेट वाटते.


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

एमपीएससी म्हणजे काय?


एमपीएससी म्हणजे, महाराष्ट्र पब्लिक सíव्हस कमिशन अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हा भारतीय राज्यघटनेच्या कलम ३१५ अन्वये निर्माण केला असून घटनेच्या कलम ३२० अन्वये, सेवक भरती व त्यासंबंधी

सल्ला देण्याचे काम, हे आयोग पार पाडते. प्रशासनात पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांची भरती केली जावी, त्यात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये, गरप्रकार होऊ नये. यासाठी घटनाकर्त्यांनी राज्यघटनेत स्पष्ट तरतूद करून प्रशासकीय सेवांच्या भरतीसाठी, स्पर्धात्मक परीक्षांचे आयोजन करण्याची जबाबदारी या घटनात्मक संस्थेकडे सोपविली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे खालील सेवांकरता स्पर्धा परीक्षा घेतली जाते-


- राज्यसेवा परीक्षा

- महाराष्ट्र वनसेवा परीक्षा

- महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षा

- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट अ परीक्षा

- महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा गट ब परीक्षा

- दिवाणी न्यायाधीश, कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी, प्रथम वर्ग परीक्षा

- साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक परीक्षा

- पोलीस उपनिरीक्षक परीक्षा

- विक्रीकर निरीक्षक परीक्षा

- साहाय्यक परीक्षा

- लिपिक-टंकलेखक परीक्षा


*राज्यसेवा परीक्षेच्या* माध्यमातून राज्य शासनाच्या सेवेतील, राजपत्रित गट अ व गट ब संवर्गातील खालील विविध पदांसाठी एकच परीक्षा घेतली जाते. राज्यसेवा (पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत या संपूर्ण प्रक्रियेमधून) पुढील पदांसाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाते-


- उपजिल्हाधिकारी (गट अ)

- पोलीस उपअधीक्षक/साहाय्यक पोलीस आयुक्त (गट अ)

- साहाय्यक विक्रीकर आयुक्त (गट अ)

- उपनिबंधक, सहकारी संस्था (गट अ)

- उपमुख्य कार्यकारी अधिकारी/गटविकास अधिकारी (गट अ)

- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट अ)

- मुख्याधिकारी, नगरपालिका/परिषद, गट अ

- अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क (गट अ)

- तहसीलदार (गट अ)

- साहाय्यक, प्रादेशिक परिवहन अधिकारी, (गट ब)

- महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा (गट ब)

- कक्ष अधिकारी (गट ब)

- गटविकास अधिकारी (गट ब)

- मुख्याधिकारी, नगरपालिका/नगर परिषद, (गट ब)

- साहाय्यक निबंधक सहकारी संस्था (गट ब)

- उपअधीक्षक, भूमी अभिलेख (गट ब)

- साहाय्यक आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, (गट ब)

- नायब तहसीलदार (गट ब)


*महसूल सेवा*

उपजिल्हाधिकारी

हे राज्य सेवेतील सर्वोच्च पद आहे. बढती आणि सरळ सेवा प्रवेशाने या पदावर नेमणूक होते आणि १० ते १५ वर्षांच्या सेवेनंतर भारतीय प्रशासकीय सेवेमध्ये बढतीद्वारे प्रवेश

मिळू शकतो.

नेमणुका - उपविभागीय अधिकारी, विविध खात्यांचे उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी. कामाचे स्वरूप

पुढीलप्रमाणे आहे-

- उपविभागीय अधिकारी म्हणून काम करताना उपविभागातील शांतता व सुव्यवस्था पाहणे, महसूल वसुली, निर्वाचन अधिकारी म्हणून कार्य इत्यादी.

- विविध खात्यांचा उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्या त्या खात्याशी संबंधित कार्यवाही पूर्ण करणे व माहिती अद्ययावत ठेवणे.

- निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून काम करताना वरिष्ठ व कनिष्ठ कार्यालयात समन्वय साधणे व जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत जिल्हा प्रशासनात सुसूत्रता ठेवणे.


*तहसीलदार*

या पदावर निवड राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)द्वारे केली जाते. राज्य सरकार प्रत्येक तालुक्यासाठी एक तहसीलदार नेमते. तहसीलदारांच्या कामाचे स्वरूप पुढीलप्रमाणे -

- तालुक्यातील महसूल वसुली, प्रशासन याबाबतची सर्व कामे तहसीलदार पार पाडतात. महसूल वसुलीबाबत अर्धन्यायिक अधिकार तहसीलदाराला दिलेले आहेत.

- तालुका दंडाधिकारी या नात्याने शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठीचे न्यायिक अधिकार तहसीलदाराला आहेत.

- आपत्ती व्यवस्थापन, नुकसानभरपाई, शासकीय योजनांची अंमलबजावणी, भूमी अभिलेखाबाबतचे निर्णय इ. जबाबदाऱ्याही तहसीलदार पार पाडत असतात.


*नायब तहसीलदार*

महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ अन्वये राज्य शासन प्रत्येक तालुक्यासाठी एक किंवा जास्त नायब तहसीलदारांची नेमणूक करू शकते. तहसीलदारास करावी लागणारी कामेच नायब तहसीलदारांना पार पाडावी लागतात. कामांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे-

- तहसीलदार पातळीवर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी नायब तहसीलदार करतात.

- महसूल अधिकारी म्हणून महसूल वसुली, बिगरशेती परवाने देणे इ.बरोबर जातीचे, रहिवासाचे दाखले देणे ही काय्रे नायब तहसीलदाराला पार पाडावी लागतात.

- शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी दंडाधिकारी म्हणून काही न्यायिक अधिकार नायब तहसीलदाराला देण्यात आले आहेत.

- महसुली कामकाजांतर्गत अर्धन्यायिक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार काम पाहतात.

ब्रिटिशांचे कायदा धोरण

०१. भारतात विविध प्रांतांमध्ये वेगवेगळया स्वरूपात कायदे असल्याने न्यायदानात गोंधळ होत असे. तो नष्ट करण्याचा प्रयत्न १८३३ व १८५३ च्या चार्टर अॅक्टने केला. देशातील दिवाणी व फौजदारी कायद्यांचे एकत्रीकरण केले. त्याचा अध्यक्ष म्हणून लॉ मेंबर लॉर्ड मेकॉले यांची नियूक्ती केली. या कमीशनच्या अहवालांची व कामकाजाची तपासणी करण्यासाठी इंग्लडमध्ये लॉ कमिशन नियुक्तीची शिफारस १८५३ च्या कायद्याने केली.


०२. लॉर्ड मेकॉलेने भारतीय दंडविधान संहिता तयार केली. १८५३ च्या चार्टर अॅक्टनुसार दुसरे लॉ कमिशन स्थापन केले गेले. या कमिशनने दिवाणी आचार संहिता,१८५५ आणि फौजदारी आचारसंहिता, १८६१ निर्मिती केली त्याचे कायद्यात रुपांतर झाले.


०३. भारतात मध्ययुगामध्ये अनेक राजकीय सत्ता होत्या. त्या प्रत्येकाचे कायदे वेगवेगळे होते. त्याची अंमलबजावणी राज्यकर्त्याच्या इच्छेंनुसार होत असे. त्याच्यावर कोणाचेही बंधन नसे त्यामूळे ते एक प्रकारे व्यक्तीचे राज्य असे. पण जेव्हा ब्रिटिशांची राजकीय व प्रशासकीय सत्ता स्थापन झाली. तेव्हा कायद्यानुसार निर्णय घेऊन प्रशासन चालवावे असे बंधन होते.


०४. आपल्या राज्यात प्रत्येक व्यक्तीला कोणते हक्क व अधिकार आहेत हे ठरविण्यासाठी कायदे तयार केले गेले. लॉर्ड कॉर्नवॉलिसने न्यायदान पध्दतीत अनेक सुधारणा केल्या. या कायद्याच्या राज्यात उच्च किंवा कनिष्ठ व्यक्तीने उल्लंघन केल्यास त्याला न्यायालयात खेचण्याची तरतूद होती. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने कायद्याचे पालन सक्तीने केले. पाहिजे असा दंडक होता.


०५. व्यक्तीच्या हक्कांचे व अधिकारांचे संरक्षण करणे ही प्रशासनाची जबाबदारी होती. यासाठी इंग्रजांनी कायदेसंहिता तयार केली. यामध्ये कायदे व त्यातील तरतूदी ठरवून घेतल्या. त्यानुसार सरकारी न्यायालयाने निर्णय द्यावे. ते निर्णय जनतेने मान्य केले पाहिजेत. असे ब्रिटिश काळात कायद्याचे राज्य होते.


०६. तरीही कायद्याच्या राज्यातील कायदे हे लोकशाही प्रक्रियेतून तयार केलेले नसून ते परकीय लोकांनी भारतीयांवर लादलेले होते. त्याची अंमलबजावणीही त्यांच्याकडेच होती त्यामुळे लोकशाही व उदारमतवाद या विचारांना स्थान नव्हते. तसेच काही कायदे मुळातच सदोष अन्यायकारक होते.


०७. ब्रिटिशांपूर्वी भारतात धर्म, पंथ, जात, लिंग, वर्ण, याआधारे न्यायदान केले जात असे. परंपरागत न्यायदान, कायद्यातील जातिव्यवस्था व धर्मशास्त्र तत्व यामुळे उच्चवर्णियांसाठी वेगळा कायदा व शूद्र समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी वेगळा कायदा होता. जमीनदार, जहागीरदार, उमराव या लोकांना कमी शिक्षा असे, काही प्रंसगी शिक्षाही नसे. यामुळे कायद्यासमोर सर्व समानता नव्हती.


०८. इंग्रजांनी भारतामध्ये कायद्यांच्या राज्यात कायद्यासमोर सर्व समान हे लोकशाही तत्व अमंलात आणले त्यांनी धर्म पंथ, जात, वर्ण, लिंग, यांचा विचार न करता सर्वासाठी एकच कायदा अमलात आणला. एकाच गुन्हयाबदल वेगवेगळया शिक्षा होत्या. त्या एकत्र करून एकच शिक्षा ठरविण्यात आली. व्यक्ती किती मोठी किंवा छोटी असली तरीही ती कायद्यासमोर समानच आहे हे तत्व रुजवले त्यामूळे सामाजिक समता निर्माण होण्यास मदत झाली.


०९. १८३३ च्या चार्टर अॅक्टनुसार प्रांतीय कायदे करण्याचे अधिकार रद्द करून सर्व भारतीयासाठी कायदे करण्याचा अधिकार गव्हर्नर जनरल आणि त्याच्या कौन्सिलला देण्यात आला. सर्व भारतासाठी एकच कायदा करणारी स्वतंत्र यंत्रणा स्थापन झाली. या यंत्रणेने भारतातील विविध कायद्याचे एकत्रीकरण करुन कायदेसंहिता तयार केली. कायदेसंहितेमध्ये सर्व व्यक्ती कायद्यासमोर समान आहेत. ती सर्व भारतासाठी लागू केली.


१०. पण कायद्यासमोर सर्व समान या संदभर्रात इंग्रजांची दुप्पटी भूमिका होती. भारतीय लोक आणि युरोपियन यांच्यासाठी समान न्याय नव्हता. युरोपियन व्यक्तीचा खटला युरोपियन न्यायाधीशासमोर चालविला जात असे. युरोपियन व्यक्तीने भारतीयांवर कितीही अन्याय, अत्याचार केली तरीही त्यांना संरक्षण दिले जात असे.


११. ब्रिटिश न्यायदान व्यवस्था अधिक गुंणागुंतीची व खर्चिक होती. कोर्ट फी, वकिल, साक्षीदार इ. खूप खर्च असे. जिल्हयाच्या ठिकाणी न्यायालय असल्याने आणि खटला दिर्घकाळ लांबला तर खर्च अधिक वाढत असे. साक्षी पुरावे यावर आधारित न्यायव्यवस्था होती. इंग्रजांच्या राज्यात न्याय मिळणे ही गोष्ट सोपी, स्वस्त आणि जलद नव्हती.

1857 नंतर ब्रिटिशांची राज्यपद्धती

✳️  1. प्रशासकीय बदल   ✳️ 



०१. ब्रिटीश पार्लमेंटने १८५७ चा कायदा करून नवीन प्रशासन व्यवस्था लागू केली. गवर्नर जनरल लॉर्ड कॅन्न्निंगने १ नोव्हेंबर १८५८ रोजी अलाहाबाद येथे दरबार भरवून राणीचा जाहीरनामा वाचून दाखविला.


०२. १८५८ च्या कायद्यानुसार भारताची प्रशासनव्यवस्था इंग्लंडचा राजा कडे सोपविण्यात आली. भारताचा शासन प्रमुख गवर्नर जनरल याचे पदनाम बदलून त्यास व्हाईसरॉय असे नाव देण्यात आले.


०३. व्हाईसरॉयच्या मदतीसाठी व त्यास सल्ला देण्यासाठी ५ सदस्यांचे एक्झिक्यूटिव्ह कौन्सिल नियुक्त करण्यात आले. कौन्सिलचा सल्ला स्वीकारणे व नाकारणे यासंबंधीचा पूर्ण अधिकार व्हाईसरॉयला देण्यात आला.


०४. कायदे विषयीसंबंधी इम्पिरियल लेजीस्लेटिव्ह कौन्सिल तयार केले. पुढे इंडियन कौन्सिल एक्ट, १८६१ नुसार व्हाईसरॉयला कौन्सिलमध्ये ६ ते १२ सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार देण्यात आले. कौन्सिलने मंजूर केलेले कायदे व्हाईसरॉयच्या संमतीशिवाय मंजूर होत नसत.


०५. इंग्लंडच्या मंत्रिमंडळात भारतमंत्री या नव्या मंत्र्याची नियुक्ती करण्यात आली. भारतमंत्र्यावर भारताच्या प्रशासनाची जबाबदारी टाकण्यात आली. भारतमंत्र्यांच्या मदतीसाठी १५ सदस्यांचे इंडियन कौन्सिल देण्यात आले. भारतमंत्री लंडनमध्येच वास्तव्य करीत. परंतु त्याचा वेतनाचा खर्च भारत सरकारच्या खजिन्यातून करण्यात येत असे.


०६. व्हाईसरॉयने भारतमंत्र्याच्या आदेशानुसारच निर्णय घेतले पाहिजेत असे बंधन घालण्यात आले. १८७० नंतर व्हाईसरॉय व भारतमंत्री यांच्यात तात्काळ संपर्क व्हावा म्हणून भारत ते लंडन अशी थेट केबल सेवा प्रस्थापित करण्यात आली.


०७. भारतामध्ये प्रांत पाडण्यात आले. बंगाल, मद्रास, आणि मुंबई हे प्रांत प्रेसिडेन्सी म्हणून ओळखण्यात येऊ लागले. प्रेसिडेन्सीचे प्रशासन ब्रिटिशांनी नियुक्त केलेल्या त्रिसदस्यीय कौन्सिलकडे सोपविण्यात आले. इतर प्रांताचे कारभार लेफ्टनंट गवर्नर व चीफ कमिश्नर यांच्याकडे सोपविण्यात आले. चीफ कमिश्नरची नियुक्ती व्हाईसरॉय करीत असे. इतर प्रांतांपेक्षा प्रेसिडेन्सी प्रशासनास जास्त अधिकार होते.


०८. इंडियन कौन्सिल एक्ट, १८६१ नुसार प्रशासनात विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारण्यात आले. त्यामुळे प्रांतिक एक्झिक्यूटिव्ह कौन्सिललाच लेजीस्लेटिव्ह कौन्सिलचे रूप देण्यात आले. लेजीस्लेटिव्ह कौन्सिलमध्ये ४ ते ८ अशासकीय ब्रिटीश व हिंदी सदस्यांची नियुक्ती करण्याचे ठरविण्यात आले. अर्थात, लेजीस्लेटिव्ह कौन्सिल हे निव्वळ सल्लागार मंडळ होते. अंतिम अधिकार केंद्राकडेच होते.


०९. इंडियन कौन्सिल एक्ट, १८९२ नुसार केंद्रीय लेजीस्लेटिव्ह कौन्सिलच्या सदस्यत्वामध्ये १२ ते १६ सदस्यांची वाढ करण्यात आली. हे सर्व शासकीय सदस्य होते.


१०. सर्व प्रांतिक सरकारे भारत सरकारच्या पूर्ण नियंत्रणाखाली होती.या काळात प्राप्तीकर सुरु करण्यात आला. सर्व आयातीवर १०% आयातकर लादण्यात आला. मिठावरील कर वाढविण्यात आला. या काळात वार्षिक अंदाजपत्रक सादर करण्याची प्रथा सुरु करण्यात आली.


2. स्थानिक शासन पद्धत


०१. १८१६ व १८१९ साली स्थानिक शासनासाठी काही नियम मंजूर केले.


०२. १८५८ नंतर ब्रिटिशांनी नगर पालिका व जिल्हा लोकल बोर्ड अशा संस्था स्थापन करण्यास स्थानिक जनतेला उत्तेजन दिले.


०३. १८६४ ते १८६८ दरम्यान देशात स्थानिक पातळीवर स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात आली. या संस्थांच्या सदस्यांची नियुक्ती सरकारकडून करण्यात आली. संस्थांच्या अध्यक्षपदी डिस्ट्रीक्ट मैजिस्ट्रेटची नियुक्ती करण्यात आली.


०४. लॉर्ड मेयोने १८७० साली स्थानिक स्वराज्य संस्थानच्या विकासासाठी विशेष प्रयत्न केले. सर्व प्रांतात म्युन्सिपल एक्ट मंजूर करून शासकीय व अशासकीय सदस्य असलेल्या समित्या तयार करण्यात आल्या. मात्र प्रत्येक समितीच्या अध्यक्षपदी शासन नियुक्त शासकीय सदस्य असेल याची दक्षता घेण्यात आली.


०५. लॉर्ड रिपनने स्थानिक स्वराज्य संस्थांना बरेच स्वातंत्र्य दिले. मे, १८८२ मध्ये सरकारने लोकल बोर्डातील अशासकीय सभासदांची संख्या वाढविली. ग्रामीण व नागरी लोकल बोर्डात एक सामंजस्य निर्माण केले.


०६. कलकत्ता, मद्रास व मुंबई येथील महापालिकांचे कार्यक्षेत्र व कामकाज इतर जिल्ह्यांच्या नगरपालिकांपेक्षा सर्वस्वी वेगळे होते. १८ व्या शतकाच्या अखेरीस या महानगरांचे प्रशासन व कामकाज सुरळीत व्हावे म्हणून गवर्नर जनरलने प्रतिष्ठित व्यक्तींची जस्टीस ऑफ पीस म्हणून नियुक्ती केली. त्यांना न्यायालयीन कामकाज करता येत होते. त्याचप्रमाणे सफाई कामगार, वॉचमन यांच्या नेमणुका करण्याचे अधिकारही देण्यात आले होते.

42वी घटनादुरुस्ती 1976

या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते.


1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.

2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.

3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.

4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद

5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती

6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.

7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.

8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.

9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.

10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.

11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण

12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.

13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.

14) कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती हाताळण्यासाठी कोणत्याही राज्यात सशस्त्र सैनिक दलांची तैनाती करण्याचे अधिकार केंद्राला दिले.

15) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले. उदा. शिक्षण, जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण, वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना इत्यादी

16) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.

17) संसदेचे सदस्य आणि तिच्या समित्यांचे हक्क आणि विशेषाधिकार वेळोवेळी निश्चित करण्याचे अधिकार संसदेला दिले.

18) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद

19) चौकशीनंतर दुसऱ्या टप्प्यावर आपली बाजू मांडण्याचा सनदी सेवकांचा हक्क काढून घेत शिस्तभंगाच्या कारवाईची कार्यपध्द्त संक्षिप्त केली.

महाराष्ट्र राज्याचा संक्षिप्त आढावा.


🔶 देशाचा पश्‍चिम व मध्य भाग व्यापलेल्या राज्यास अरबी समुद्राचा 720 किमी लांबीचा विस्तीर्ण सागरी किनारा लाभला आहे. पश्‍चिमेकडील सह्याद्री पर्वताच्या रांगा राज्याचा प्राकृतिक कणा असून उत्तरेस असलेल्या सातपुडा पर्वताच्या रांगा व पूर्वेस असलेल्या भामरागड-चिरोली-गायखुरी या डोंगररांगा राज्याच्या नैसर्गिक सीमा आहेत. राज्याच्या वायव्येस गुजरात उत्तरेस मध्य प्रदेश, पूर्वेस छत्तीसगढ, आग्नेयेस आंध्रप्रदेश, दक्षिणेस कर्नाटक व नैऋृत्येस गोवा ही राज्ये आहेत. 


🔶राज्यात उष्ण कटिबंधीय मोसमी हवामान आहे. मार्चपासून सुरु होणारा, अंगाची लाहीलाही करणारा उन्हाळा जूनच्या सुरुवातीला पाऊस घेऊन येतो. पावसाळ्यातील हिरवळीत लपेटलेले आल्हाददायी वातावरण, ऑक्टोबरच्या त्रासदायक वातावरणानंतर येणार्‍या हिवाळ्यात टिकून राहते. 


🔶पश्‍चिम समुद्र तटावरून येणार्‍या पावसाळी ढगांमुळे सह्याद्रीच्या डोंगर रांगांवर 400 सेंमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. समुद्र किनारपट्टीवरील कोकणात मुसळधार पाऊस पडतो व तो उत्तरेकडे सकरताना कमी होत जातो. सह्याद्रीच्या पूर्वेला पश्‍चिम पठारावरील जिल्ह्यात 70सेंमी एवढा अत्यल्प पाऊस पडत असून सोलापूर व अहमदनगर हे सर्वाधिक कोरडे जिल्हे आहेत. पूर्वेस विदर्भ व मराठवाड्याकडे सरकताना पावसाचे प्रमाण काहीसे वाढते. 


🔶लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशात दुसर्‍या क्रमांकाचे राज्य असून राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र 3.08 लक्ष चौ.कि.मी. आहे. जनगणना, 2011 नुसार राज्याची लोकसंख्या सुमारे 11.24 कोटी असून ती देशातील एकूण लोकसंख्येच्या 9.3 टक्के आहे.


🔶राज्याचे मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून 45.2 टक्के लोकसंख्या नागरी भागात राहते. राज्यात 36 जिल्हे असून प्रशासकीय सुविधेसाठी ते कोकण, पुणे नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर या सहा महसुली विभागातविभागले आहेत.


🔶जिल्हा स्तरावरील नियोजनासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहेत. स्थानिक प्रशासनासाठी राज्याच्या ग्रामीण भागात 34 जिल्हा परिषदा, 351 पंचायत समित्या व 27,920 ग्रामपंचायती आहेत, तर नागरी भागात 26 महानगरपालिका, 230 नगरपरिषदा, 110 नगरपंचायती व सात कटक मंडळे आहेत.


🔶 मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तसेच देशाची आर्थिक राजधानी असून बहुतांशी प्रमुख खाजगी कंपन्या व वित्तीय संस्थांची मुख्यालये या शहरात आहेत. देशातील प्रमुख वायदे व भांडवली बाजार आणि विक्रेय वस्तू व्यापार विनिमय केंद्रे मुंबईत आहेत.


🔶राज्यातील 234 लाख हेक्टर जमीन लागवडीखाली तर 52.1 लाख हेक्टर वनांखाली आहे. सिंचनात वाढ व्हावी यासाठी अनेक सिंचन प्रकल्प राबविण्यात येत आहेत. बिगर सिंचन क्षेत्रात मृद व जलसंधारणाची कामे गतीने होण्यासाठी पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. 


🔶महाराष्ट्राला ‘2019 पर्यंत पाणी टंचाई मुक्त राज्य’ करण्याकरिता जलयुक्त शिवार अभियान सुरु करण्यात आले असून याद्वारे दरवर्षी 5,000 गावे पाणी टंचाई मुक्त करण्याचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. 


🔶पशुसंवर्धन हे कृषि क्षेत्राशी संबंधीत महत्त्वाचे क्षेत्र आहे. देशातील पशुधन व कुक्कुट पक्ष्यांच्या संख्येमध्ये राज्याचा हिस्सा अनुक्रमे 6.3 टक्के व 10.7 टक्के आहे.


🔶 महाराष्ट्र हे मोठ्या प्रमाणात औद्योगिकीकरण झालेल्या राज्यांपैकी एक राज्य आहे. लघु उद्योगात हे अग्रेसर असून देशांतर्गत तसेच विदेशी संस्थांकडून औद्योगि क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात राज्याने सातत्य राखले आहे. माहिती तंत्रज्ञानाचे हे प्रमुख केंद्र आहे.


🔶जनगणना 2011 नुसार अखिल भारतीय स्तरावरील 73 टक्के साक्षरता दराच्या तुलनेत राज्याचा साक्षरता 82.3 टक्के आहे. बारावीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण दिले जात असून राज्यात अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यवस्थापन क्षेत्रातील उच्च शिक्षणाच्या उत्कृष्ट संस्था आहेत. 


🔶भारताच्या मानव विकास अहवाल 2011 नुसारदेशाचा मानव विकास निर्देशांक 0.467 आहे तर राज्यासाठी तो 0.572 आहे. मानव विकास निर्देशांकात भारताचा सध्या 130 वा क्रमांकआहे. 


🔶महिला धोरण राबविणारे तसेच महिलांच्या विकासासाठी ‘महिला व बालकल्याण’ या स्वतंत्र विभागाची स्थापना करुन अर्थसंकल्पीय तरतूद करणारे हे पहिले राज्य आहे. रोजगार हमी योजना राबविणारे हे आद्यप्रवर्तक राज्य असून केंद्र शासनाने ही येाजना अंगिकारली आहे. 


🔶महाराष्ट्र हे केवळ भौगोलिक सीमांनी रेखांकित केलेले राज्य नसून येथील जनतेने संघटितरित्या परिश्रमपूर्वक घटविलेले राज्य आहे. या राज्याची वैशिष्ट्यपूर्ण मराठी संस्कृती विकसित होण्यास नैसर्गिक तसेच सांस्कृतिक विविधता सहाय्यभूत झाली आहे. स्वतःची अध्यात्मिक बैठक असलेले हे राज्य ‘संतांची भूमी’ म्हणून ओळखले जाते. 


🔶 राज्याने देशाच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रात लक्षणीय भूमिका बजावली आहे. 

भारतात समुद्रमार्गे येणारे यूरोपियन




1. लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-


भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना. 

प्लासिचे युद्ध :- 


जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला. 


बक्सरची लढाई :- 


बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला. 


अलाहाबादचा तह :- 


बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली. 


2. सर वॉरन हेस्टिंग(सन 1772 ते 1773) :-


सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली. 


भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले. 


3. लॉर्ड कॉर्नवॉलीस (1786 ते 1793) :-


लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात. 


4. लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-


लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला. 


तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली. 


सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला. 


5. मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-


मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली. 

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट


❑ नन्द वंश 

संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन

अंतिम शासक ➛ धनानंद


❑ मौर्य वंश 

संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य 

अंतिम शासक ➛ बृहद्रथ 


❑ गुप्त वंश 

संस्थापक ➛ श्रीगुप्त

अंतिम शासक ➛ स्कंदगुप्त 


❑ शुंग वंश  

संस्थापक ➛ पुष्यमित्र शुंग 

अंतिम शासक ➛ देवभूमी


❑ सातवाहन वंश 

संस्थापक ➛ सिमुक   

अंतिम शासक ➛ यज्ञ शातकर्णी 


❑ (वतापी के) चालुक्य वंश

संस्थापक  ➛ पुलकेशिन् प्रथम 

अंतिम शासक ➛ कीर्तीवर्मन चालुक्य


❑ चोल वंश 

संस्थापक ➛ विजयालय

अंतिम शासक ➛ अथिराजेंद्र


❑ राष्ट्रकूट वंश  

संस्थापक ➛ दंतीदुर्ग 

अंतिम शासक ➛ इंद्र चतुर्थ


❑ सोलंकी वंश

संस्थापक  ➛ मूलराज प्रथम


❑ गुलाम वंश

संस्थापक ➛ कुतुबुद्दीन ऐबक

अंतिम शासक ➛ मुइज़ुद्दिन क़ैकाबाद 


❑ खिलजी वंश 

संस्थापक ➛ जलाल उद्दीन 

अंतिम शासक ➛ खुसरो खान

विश्व इतिहास

 1. चीन की राष्ट्रपिता किसे कहा जाता है

उत्तर– सनयात सेन


2. किसके शासनकाल में मुगलों तथा मेवाड़ के राजा के बीच 'चित्तौड़ की सन्धि' हस्ताक्षरित हुई? 

उत्तर– जहाँगीर के शासनकाल में


3. आर्यभट्ट कौन था

उत्तर– खगोल वैज्ञानिक व गणितज्ञ


4. आर्यभट्ट किस वंश के समकालीन था

उत्तर– गुप्त वंश के


5. गुप्त शासकों की राजदरबारी भाषा क्या थी?

उत्तर – संस्कृत


6. गुप्त राजवंश के किस शासक ने हूणों के आक्रमण को रोका—

उत्तर– स्कंदगुप्त ने


7. गुप्त राजवंश किसके लिए प्रसिद्ध था

उत्तर –कला एवं स्थापत्य के लिए


8. अजंता व एलौरा कलाकृतियाँ किस काल से संबंधित हैं

उत्तर– गुप्त काल से


9. कालीदास किसके राजदबारी कवि थे 

उत्तर– चंद्रगुप्त II ‘विक्रमाद्वित्य’


10. अंजता चित्रकारी किस धर्म से संबंधित हैं

उत्तर– बौद्ध धर्म से 


11. नेपोलियन फ्रांस का राजा कब बना

उत्तर–1804 ई. 


12. नेपोलियन के पिता का नाम क्या था

उत्तर –कार्लो बोनापार्ट 


13. 'अकबर ऑफ कश्मीर' किसे कहा जाता है? 

उत्तर– जैनुल आबेदीन (Zainual Abedin)


14. पेरिस शांति सम्मेलन कब से कब तक आयोजित हुआ

उत्तर– 18 जनवरी, 1919-21 जनवरी, 1920 तक 


15. लीग ऑफ नेशंस की स्थापना कब हुई

उत्तर– 1920 ई. 


16. द्वितीय विश्व युद्ध कब शुरू हुआ

उत्तर–1 सितंबर, 1939 ई. 


17. द्वितीय विश्व युद्ध कब समाप्त हुआ

उत्तर– 2 सितंबर, 1945 ई.


18. बैंक ऑफ फ्रांस की स्थापना किसने की

उत्तर– नेपोलियन ने


19. नेपोलियन के पतन का कारण क्या था

उत्तर– रूस पर आक्रमण करना 



20. लिटल कॉरपोरल किसे कहा जाता है

उत्तर– नेपोलियन को


खालील प्रश्न one Liner आहेत पण महत्वाचे आहेत.

________________________________

Q.1] भारतातील व्याघ्र प्रकल्पाचे जनक कोण आहेत?

A] पंडित नेहरू

B] सलीम अली

C] जिम कोर्बेट

D] कैलास सांकला

 उत्तर: D] कैलास सांकला

________________________________

Q.2] नवाश्मयुगात खालीलपैकी कोणता धातू मानवाला परिचित होता?

A] लोखंड

B] तांबे

C] चांदी

D] यापैकी नाही

 उत्तर: D] यापैकी नाही.

________________________________

Q.3] भारतातील मॅंगनीजच्या मोठ्या साठ्यांपैकी एक साठा महाराष्ट्रात कोठे आहे?

A] गडचिरोली

B] भंडारा

C] यवतमाळ

D] वर्धा

 उत्तर: B] भंडारा.

________________________________

Q.4] सुर्यसेनला पकडून देण्यास इंग्रजांची मदत कोणी केली?

A] गणेश द्रविड

B] वांची अय्यर

C] नेत्रसेन

D] रामचंद्र यादव

 उत्तर: C] नेत्रसेन.

________________________________

Q.5] भारतातील पहिला रेयॉन प्रकल्प १९५० साली कोणत्या राज्यात उभारला गेला?

A] उत्तर प्रदेश

B] केरळ

C] तामिळनाडू

D] महाराष्ट्र

 उत्तर: B] केरळ.

________________________________

Q.6] महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला?

A] लतिका घोष

B] सरोजिनी नायडू

C] कृष्णाबाई राव

D] उर्मिला देवी

 उत्तर: A] लतिका घोष.

________________________________

Q.7] जगप्रसिद्ध पंचमहासरोवरे कोणत्या देशात आहेत?

A] भारत

B] रशिया

C] अमेरिका

D] जपान

 उत्तर: C] अमेरिका.

________________________________

Q.8] अलाहाबाद येथील स्तंभालेख खालीलपैकी कोणाशी संबंधीत आहे?

A] महापद्म नंद

B] समुद्रगुप्त

C] चंद्रगुप्त मौर्य

D] सम्राट अशोक

 उत्तर: B] समुद्रगुप्त.

________________________________

Q.9] सरहिंद कालवा कोणत्या राज्यात आहे?

A] पंजाब

B] जम्मू काश्मीर

C] हिमाचल प्रदेश

D] उत्तराखंड

 उत्तर: A] पंजाब.

________________________________

Q.10] भारताला भेट देणारा 'मार्को पोलो' हा प्रवासी कोणत्या देशाचा होता?

A] चीन

B] पोर्तुगाल

C] इटली

D] फ्रांस

 उत्तर: C] इटली.

________________________________

Q.11] 'निलम' जातीच्या आंब्याचे भारतातील प्रमुख उत्पादक राज्य कोणते?

A] महारष्ट्र

B] आंध्रप्रदेश

C] उत्तर प्रदेश

D] पश्चिम बंगाल

 उत्तर: B] आंध्रप्रदेश.

________________________________

Q.12] राष्ट्रीय सभेच्या कोणत्या अध्यक्षाने १९४२च्या क्रिप्स आणि वेव्हेल योजनेसंबंधी वाटाघाटी घडवून आणल्या?

A] मौलाना आझाद

B] पंडित नेहरू

C] जे.बी.कृपलानी

D] सी.राजगोपालाचारी

 उत्तर: A] मौलाना आझाद.

________________________________

Q.13] 'गोंडवाना कोळसा क्षेत्र' खालीलपैकी कोणत्या राज्यात आढळते?

A] छत्तीसगढ

B] महाराष्ट्र 

C] कर्नाटक

D] मध्यप्रदेश

 उत्तर: C] कर्नाटक.

________________________________

Q.14] लोकमान्य टिळकांची चतुःसूत्री > स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि _ _ _ _ _ _ _ ?

A] असहकार

B] जहालवाद

C] राजकारण

D] राष्ट्रीय शिक्षण

 उत्तर: D] राष्ट्रीय शिक्षण.

________________________________

Q.15] तौला शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

A] नाशिक

B] पुणे

C] धुळे

D] नंदुरबार

 उत्तर: A] नाशिक.

भारताच्या विभाजनाबद्दल माहिती


भारताची फाळणी किती वेळा झाली?

ब्रिटिश राजवटीने 61 वर्षांत सात वेळा


 1) अफगाणिस्तान 1876 मध्ये भारतापासून वेगळे झाले.

 2) 1904 मध्ये नेपाळ

 3) 1906 मध्ये भूतान

 4) 1907 मध्ये तिबेट

 5) 1935 मध्ये श्रीलंका

 6) म्यानमार (बर्मा) 1937 मध्ये.

 आणि ...

 7) 1947 मध्ये पाकिस्तान




 अखंड भारताची फाळणी:

पुर्वी अखंड भारत हिमालयापासून हिंदी महासागरापर्यंत आणि इराणपासून इंडोनेशियापर्यंत विस्तारलेला होता.

 1857 मधे भारताचे क्षेत्रफळ 83 लाख चौरस किलोमीटर होते आणी सध्या 33 लाख चौरस किमी आहे.

 वर्ष 1857 ते 1947 या कालावधीत भारताचे बाह्य शक्तींनी अनेक वेळा तुकडे केले.

पूर्वीच्या भारतापासून विभक्त झालेले भाग:


 1) श्रीलंका:


 ब्रिटीशांनी 1935 मध्ये श्रीलंका भारतापासून वेगळी केली.

श्रीलंकेचे जुने नाव सिंहलद्वीप होते.

सिंहलद्वीप हे नाव नंतर सिलोन असे ठेवण्यात आले.  सम्राट अशोकाच्या काळात श्रीलंकेचे नाव ताम्रपर्णी होते. 

सम्राट अशोकाचा मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा बौद्ध धर्माचा प्रचार करण्यासाठी श्रीलंकेत गेले होते.  श्रीलंका हा अखंड भारताचा एक भाग होता.


 2) अफगाणिस्तान:

 अफगाणिस्तानचे प्राचीन नाव उपगणस्थान होते आणि कंधारचे नाव गांधार होते.

अफगाणिस्तान हा एक शैव देश होता.

महाभारतात वर्णन केलेले गांधार हे अफगाणिस्तानात आहे.

कौरवांची आई गांधारी आणि मामा शकुनी यांचा जन्म येथेच झाला होता.

कंधारचे वर्णन (म्हणजे गांधार) शहाजहानच्या कारकिर्दीपर्यंत सापडते.

तो भारताचा एक भाग होता.

1876   मध्ये रशिया आणि ब्रिटनमध्ये एक करार झाला.  करारानंतर, अफगाणिस्तान एक स्वतंत्र देश म्हणून स्वीकारला गेला.


 3) म्यानमार (बर्मा):

म्यानमारचे (बर्मा) प्राचीन नाव ब्रह्मदेश होते.

1937 मधे म्यानमार म्हणजेच बर्माला स्वतंत्र देशाची मान्यता ब्रिटिशांनी दिली.

प्राचीन काळी हिंदू राजा आनंदवर्ताने येथे राज्य केले होते.


 4) नेपाळ:

 नेपाळ प्राचीन काळात देवघर म्हणून ओळखले जात असे.

भगवान बुद्धांचा जन्म लुंबिनी येथे झाला आणि आई सीतेचा जन्म जनकपूर येथे झाला जो आज नेपाळमध्ये आहे.

1904 मध्ये ब्रिटिशांनी नेपाळला एक स्वतंत्र देश बनवले.

काही वर्षांपूर्वीपर्यंत नेपाळच्या राजाला नेपाळ नरेश म्हटले जात असे.

नेपाळमध्ये 81 टक्के हिंदू आणि 9% बौद्ध आहेत.


सम्राट अशोक आणि समुद्रगुप्त यांच्या काळात नेपाळ हा भारताचा अविभाज्य भाग होता.

1951 मधे नेपाळचे महाराजा त्रिभुवन सिंह यांनी भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांना नेपाळचे भारतात विलीनीकरण करण्याचे आवाहन केले पण जवाहरलाल नेहरूंनी हा प्रस्ताव नाकारला.


 5) थायलंड:


 थायलंडला 1393 पर्यंत स्याम/सयाम म्हणून ओळखले जात होते.

अयोध्या, श्री विजय इत्यादी प्रमुख शहरे होती. स्याममधील बौद्ध मंदिरांचे बांधकाम तिसऱ्या शतकात सुरू झाले.

आजही या देशात अनेक शिवमंदिरे आहेत.

थायलंडची राजधानी बँकॉक मधे शेकडो हिंदू मंदिरे आहेत.


 6) कंबोडिया:


कंबोडिया संस्कृत नाव कंबोज पासून आले आहे,

हा अखंड भारताचा भाग होता.

भारतीय वंशाच्या कौंडिन्य राजवंशाने पहिल्या शतकापासूनच येथे राज्य केले.

येथील लोक शिव, विष्णू आणि बुद्ध यांची पूजा करायचे.

राष्ट्रभाषा संस्कृत होती.

कंबोडियामध्ये आजही चेत्र, वैशाख, आषाढ या भारतीय महिन्यांची नावे वापरली जातात.


जगप्रसिद्ध अंकोरवट मंदिर भगवान विष्णूला समर्पित आहे, हे हिंदू राजा सूर्यदेव वर्मन यांनी बांधले होते.  मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि महाभारताशी संबंधित चित्रे आहेत.

अंकोरवटचे प्राचीन नाव यशोधरपूर आहे.


 7) व्हिएतनाम:

 व्हिएतनामचे प्राचीन नाव चंपादेश आहे आणि त्याची प्रमुख शहरे इंद्रपूर, अमरावती आणि विजय होती.

अनेक शिव, लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती मंदिरे आजही इथे सापडतील.

येथे शिवलिंगाचीही पूजा करण्यात यायची.

लोकांना चाम असे म्हटले गेले जे मूळ शैव होते.


 8) मलेशिया:

 मलेशियाचे प्राचीन नाव मलय देश होते.

 हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ पर्वतांची जमीन आहे.

मलेशियाचे वर्णन रामायण आणि रघुवंशम मधे देखील आहेत.

मलय देशात शैव धर्म पाळला जात होता.

देवी दुर्गा आणि गणपतीची पूजा करण्यात यायची.

येथील मुख्य लिपी ब्राह्मी होती आणि संस्कृत ही मुख्य भाषा होती.


 9) इंडोनेशिया:

इंडोनेशियाचे प्राचीन नाव दीपंतर भारत आहे ज्याचा उल्लेख पुराणांमध्ये देखील आहे.

दीपंतर भारत म्हणजे संपूर्ण भारतीय भुमी नंतरचा समुद्राच्या नंतरचा प्रदेश .

तेथे हिंदू राजांचे राज्य होते.

सर्वात मोठे शिव मंदिर जावा बेटावर होते.


सर्वच मंदिरात प्रामुख्याने भगवान राम आणि भगवान श्रीकृष्ण यांची शिल्पे कोरलेली आढळतात.

RRB NTPC Exams - (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )


#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा


#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक


#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले


#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान


#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल


#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम


#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद


#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान


#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क


#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी


#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब


#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल


#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य


#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब


#16.  'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग


#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय


#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद


#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये


#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी


#21. भरतनाट्यम कलाकुसर असलेल्या भगवान नटराजांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? - चिदंबरम


#22. गौतम बुद्धांनी उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली? - पाली


#23. कुतुब मीनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? - इल्तुतमिश


#24. 'लीलावती' या पुस्तकाशी संबंधित आहे - गणित


#25. डोंगर तोडुन इलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बनविले? - राष्ट्रकूट


#26. चिनी प्रवासी ह्नेनसांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? -  हर्षवर्धन 


#27. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बी.एच.यू.) संस्थापक कोण होते? - मदन मोहन मालवीय


#28. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - लॉर्ड माउंटबॅटन


#29. देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मुस्लीम शासकाच्या काळात नाण्यावर होत्या? - महंमद गौरी


#30. कलशोकाची(कालाशोक) राजधानी कोणती होती? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#31. गायत्री मंत्राची रचना कोणी केली? - विश्वामित्र


#32. लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? - श्यामजी कृष्ण वर्मा


#33. कोणत्या गुप्त राजाला 'कविराज' म्हटले जाते? - समुद्रगुप्त


#34. अकबराच्या इतिहासकारांपैकी अकबर यांना इस्लामचा शत्रू कोणी म्हटले होते? - बदायूनी


#35. भक्तीला तत्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? - शंकराचार्य


#36. कोणत्या नगराला 'शिराजे हिंद' म्हटले जाते? - जौनपूर


#37. चालुक्य घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? - पुलकेशिन दुसरा


#38. मुहम्मद घोरीने 1192 A.D. मध्ये ताराईनच्या दुसर्‍या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला होता? - पृथ्वीराज चौहान


#39. भारतीयांचा रेशीम मार्ग कोणी सुरू केला? - कनिष्क


#40 'गुलरुखी' म्हणून कोणाला ओळखले जात असे? - सिकन्दर लोदी


#41. भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे युद्ध कोणते होते? - प्लासीचे युद्ध


#42. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कोण होते? - महावीर


#43.   'सत्यमेव जयते' हा शब्द कोठून घेतला आहे? - मुंडकोपनिषद


#44. भारतात प्रथम सोन्याच्या चलनांची सुरूवात कोणी केली? - इंडो-बॅक्ट्रियन


#45. जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांचे सर्वात मोठे चित्रकार कोण होते? - मन्सूर

प्राचीन भारतीय इतिहास वन-लाइनर


 ➨ 1922 मध्ये, भारतीय पुरातत्वशास्त्रज्ञ श्रीराखल दास बॅनर्जी यांनी सिंधू संस्कृतीच्या मोहेंजोदारो स्थळाचा शोध लावला.


➨ धम्म महामातांचा उल्लेख अशोकस्तंभ आदेश-VII मध्ये आहे. गुलाम आणि नोकरांचे योग्य आचरण, आई-वडिलांची आज्ञापालन, ब्राह्मण आणि शर्मन यांच्याशी आदरयुक्त वागणूक आणि मित्र, परिचित आणि नातेवाईक यांच्याशी औदार्य यांचा उपदेश केला.


 ➨ अशोकाच्या दोन प्रमुख रॉक आवृत्त्या. मानसेरा आणि सहबाजगढ़ी खरोस्ती लिपीत आहेत. हे दोन्ही खडक पाकिस्तानातील खैबर पख्तुनख्वा येथे आहेत.


➨ इजिप्तचा शासक टॉलेमी दुसरा फिलाडेल्फस याने डायोनिससला बिंदुसार किंवा अशोकाच्या दरबारात राजदूत म्हणून पाठवले.


➨ सुरुवातीच्या वैदिक काळातील महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणजे पुरोहिता, सेनानी आणि ग्रामिणी.


 ➨ जगातील पहिले तैलचित्र अफगाणिस्तानमधील बामियान गुहांमध्ये सापडले.


➨ शकांनी पार्थियन लोकांसोबत क्षत्रप शासन प्रणाली सुरू केली जी इराणमधील अचेमेनिड आणि सेल्युसिड प्रणालीसारखीच होती. या व्यवस्थेनुसार, राज्याची विभागणी लष्करी गव्हर्नर महाक्षत्रप (ग्रेट क्षत्रप) यांच्या अंतर्गत प्रत्येक प्रांतात करण्यात आली. खालच्या दर्जाच्या राज्यपालांना क्षत्रप म्हणतात. या राज्यपालांना त्यांचे स्वतःचे शिलालेख जारी करण्याचा आणि स्वतःची नाणी काढण्याचा अधिकार होता.


➨ कनिष्काच्या दरबारातील महान विद्वान अश्वघोष (बौद्ध कवी), नागार्जुन (तत्त्वज्ञ), साम्राज्ञ (पुरोहित), मथरा (राजकारणी), वसुमित्र (बौद्ध विद्वान), चरक (वैद्य) आणि आगीसला (अभियंता) हे होते.


➨ हरीसेना हा समुद्रगुप्ताचा दरबारी कवी होता, ज्याने प्रयाग-प्रशस्ती शिलालेखात समुद्रगुप्ताच्या कर्तृत्वाचा उल्लेख केला आहे

समुद्रगुप्त


 ( इस. ३३५ ते ३८०) हा गुप्त साम्राज्याचा प्रभावी सम्राट व भारताच्या इतिहासातील महान सेनानी होता. इतिहासकार विंसेट स्मिथ यांना भारताचा नेपोलियन मानतात..

🌷  समुद्रगुप्त हे नाव त्याने पार पाडलेल्या लष्करी मोहिंमामुळे पडले होते व त्याने गुप्त साम्राज्याच्या सीमा तत्कालीन भारताच्या सागरापर्यंत नेउन गेला होता. समुद्रगुप्तला अनेक जेष्ठ बंधू असले तरी समुद्रगुप्तची सम्राट बनण्याची पात्रता इतरांपेक्षा जास्त होती म्हणून चंद्रगुप्त पहिल्यानंतर समुद्रगुप्त सम्राट बनला.

☘  समुद्रगुप्त बद्दल माहिती अलाहाबाद मधील शिलास्तंभांवरुन मिळते जे त्याच्या कार्यकालात उभारले होते. त्यात समुद्रगुप्तच्या विविध मोहिंमांचा दाखला आहे. हे शिलालेख तत्कालीन भारताची राजकिय स्थिती दर्शावतात, कारण विविध राजा, राज्ये व त्यात सहवास करणाऱ्या लोकांचा त्यात उल्लेख आहे.समुद्रगुप्तची विविध प्रकारची नाणी आहेत

परशु ,गरुड ,धनुर्धारी ,अश्वमेध,व्याघ्रहनन,वीणावादन इत्यादि प्रकार आहेत.

🌷   व्याघ्रहनन या प्रकारच्या नाण्यावर समुद्रगुप्त:हे नाव कोरलेले आहे...

🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘🍂🍂☘

राजवंशों के संस्थापक और अंतिम सम्राट


❑ नन्द वंश 

संस्थापक ➛ महापद्‌म या उग्रसेन

अंतिम शासक ➛ धनानंद


❑ मौर्य वंश 

संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य 

अंतिम शासक ➛ बृहद्रथ 


❑ गुप्त वंश 

संस्थापक ➛ चंद्रगुप्त प्रथम

अंतिम शासक ➛ स्कंदगुप्त 


❑ शुंग वंश  

संस्थापक ➛ पुष्यमित्र शुंग 

अंतिम शासक ➛ देवभूमी


❑ सातवाहन वंश 

संस्थापक ➛ सिमुक   

अंतिम शासक ➛ यज्ञ शातकर्णी 


❑ (वतापी के) चालुक्य वंश

संस्थापक  ➛ पुलकेशिन् प्रथम 

अंतिम शासक ➛ कीर्तीवर्मन चालुक्य


❑ चोल वंश 

संस्थापक ➛ विजयालय

अंतिम शासक ➛ अथिराजेंद्र


❑ राष्ट्रकूट वंश  

संस्थापक ➛ दंतीदुर्ग 

अंतिम शासक ➛ इंद्र चतुर्थ


❑ सोलंकी वंश

संस्थापक  ➛ मूलराज प्रथम


❑ गुलाम वंश

संस्थापक ➛ कुतुबुद्दीन ऐबक

अंतिम शासक ➛ मुइज़ुद्दिन क़ैकाबाद 


❑ खिलजी वंश 

संस्थापक ➛ जलाल उद्दीन 

अंतिम शासक ➛ खुसरो खान


❑ तुगलक वंश

संस्थापक ➛ गियाज़ुद्दिन तुगलक

अंतिम शासक ➛ फिरोज शाह तुगलक


❑ लोधी वंश

संस्थापक ➛ बहलोल लोधी

अंतिम शासक  ➛ इब्रहीम लोधी


❑ मुगल वंश

 संस्थापक ➛ बाबर 

अंतिम शासक ➛ बहादुर शाह द्वितीय

प्राचीन इतिहास शासक तयांच्या पदव्या अतिमहत्वाचा मुद्दा पाठच करा पूर्व परीक्षा


📌  बिंबिसार :- अमित्रघात, भद्रसार, सिंहसेन ,श्रोनिका.


 📌 अजातशत्रू :- कुनिक 


📌  चंद्रगुप्त मौर्य :- सेंन्ड्रोकोटस ,महाराजाधिराज , गुप्तसंवतप्रवर्तक.


📌 चंद्रगुप्त दुसरा :- विक्रमादित्य ,विक्रमांक.


📌 भारताचा आईन्स्टाईन:- नागार्जुन .


📌सम्राट अशोक :- देवणुपियदसी .


📌सातकर्णी प्रथम:- अप्रतिवृत्त ,चक्रादक्षिणापती .


📌समुद्रगुप्त :- कविराज,  भारताचा नेपोलियन , चक्रवर्ती .


📌 नरसिंहवर्मन दुसरा :- राजासिंह आगमप्रिय शंकरभक्त.


📌 नरसिंह वर्मन पहिला:- वातपीकोन्ड .


📌  पुलकेशी दुसरा :- परमेश्वर ,दक्षिणापथेश्वर .


📌 सातकर्णी गौरव :-  शकपहलयवन निसूदन.


📌 प्रभाकर वर्मन :- परमभट्टारक ,महाराजाधिराज .


 📌 पहिला पुलकेशी  :- पृथ्वीवल्लभ , सत्याश्रय .


📌 दुसरा पुलकेशी  :- परमेश्वर


📌 राजेंद्र प्रथम :- गंगैकोडचोल.


📌 आदित्य प्रथम :- कोदण्डराम.


📌 राजेंद्र दुसरा :- प्रकेसरी , राजकेसरी. 



🔥NOTE :- कॉपी च करायचं तर जसेच्या तसे करा नाहीतर थोडीशी मेहनत घ्या 😊


भारतातील प्रसिद्ध व्यक्ती आणि त्यांची उपाधी


●अशोक =  देवानाम प्रिय प्रियदस्स


●समुद्रगुप्त =  भारताचा नेपोलियन


●चंद्रगुप्त मौर्य  = सॅन्ड्रीकोटेस


●बिंदुसार = अमित्रोकोटेस


● कनिष्क = देवपुत्र


● गौतमीपुत्र सातकर्णी = त्रीसमुद्रतोयपितवाहन


● राजराजा = शिवपाद शिखर


● राजेंद्र प्रथम = गंगाईकोंडचोल


●चंद्रगुप्त द्वितीय = विक्रमादित्य


● कुमार गुप्त = महेंद्रादित्य


● चंद्रगुप्त प्रथम = महाराजाधिराज


● धनानंद = अग्रमिस


● नागार्जुन = भारताचा आईन्स्टाईन


● हर्षवर्धन = शिलादित्य 


● पुलकेशी द्वितीय = परमेश्वर 


● अश्वघोष = भारताचा कांत, वॉल्टेअर


● बलबन = उगलु खान


● मुहम्मद बिन तुघलक = जुना खान


● गियासुद्दीन तुघलक = गाजी मलिक


● जहांगीर = सलीम


● शेरशाह = शेरखान


● मलिक सरवर = मलिक उस शर्क


● जगत गोसाई = जोधाबाई


● शहाजहान = शहजादा


● औरंगजेब = जिंदा पिर


● बहादुर शहा प्रथम = मुअज्जम


● व्योमेशचंद्र बॅनर्जी = नखशिखांत इंग्रज


● उमाजी नाईक = आद्य क्रांतिकारक

 

● राजा रणजितसिंग = आधुनिक भारताचा नेपोलियन


● बाळाजी बाजीराव = नानासाहेब



● माधवराव नारायण = सवाई माधवराव


● जवाहरलाल नेहरू = चाचा  


● खानअब्दुल गफारखान = सरहद्द गांधी


● चित्तरंजन दास = देश बंधू


● सुभाष चंद्र बोस = नेताजी


● जयप्रकाश नारायण = लोकनायक


● अण्णाभाऊ साठे = लोकशाहीर


● सरोजिनी नायडू = गानकोकिळा


●के केप्पलन = दक्षिणेकडील गांधीजी


● वीरेशलिंगम पंतलु = दक्षिणेकडील राजा राम मोहन राय


● ई.व्ही.रामास्वामी = पेरियार


● वल्लभभाई पटेल = लोहपुरुष 


● छत्रपती शाहू महाराज = राजर्षी


06 August 2024

राज्यसेवा पुर्व साठी शेवटच्या 20दिवसांचे नियोजन आणि बरेच काही..


राज्यसेवा पूर्व परीक्षा अवघ्या 20 दिवसांवर येऊन ठेपली आहे आणि सर्वांनाच आता एक प्रकारची अनामिक भीती मनामध्ये बसलेली असते ती म्हणजे मी परीक्षा पास होईल का? मी अभ्यास तर केला आहे पण ते सर्व मला exam मध्ये आठवेल का असे विविध प्रश्न मनामध्ये येत असतात.


त्यामुळेच नक्की या शेवटच्या 20 दिवसात काय करायला हवं याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूयात.


♻️ आता Planning कस असावं?

तुम्ही अगोदर ठरवल्याप्रमाणेच schedule follow करा एनवेळी काही बदल नको. फक्त एका गोष्टीची काळजी घ्यायला हवी ती म्हणजे आता सारखं वाचुनही विसरणारे Topics सारखे revise करायला हवेत. उदा. Current Affairs, Eco & Geo मध्ये लोकसंख्या Topic, Polity चे articles, Science मधील formulae इ. असं प्रत्येक विषयातले विसरणारे टॉपिक्स व्यवस्थित करायला हवेत. अजून पण सर्व विषयांचे व्यवस्थित Revision होईल त्यामुळे जर रीड करायचे राहिले असल्यास वाचन पूर्ण करून घ्या.


♻️ आता फक्त Study की Pyq देखील सोडवावेत?

याआधी तुम्ही बऱ्यापैकी Pyq बघितले असतील आणि तुम्हाला प्रश्नांचा चांगला अंदाज आलेला असेल. त्यामुळे जे weak वाटत आहे असे Topics तुम्ही या कालावधीत read करू शकता जिथं तुम्हाला marks जाण्याची भीती वाटते. सोबतच 2017-23पर्यंतचे राज्यसेवा Prelims चे पेपर दररॊज पाहत राहा. त्यातून एक sense develope होण्यास मदत होईल.आणि तोच तुम्हाला 25 ऑगस्ट साठी फायद्याचा ठरणार आहे.


♻️ Revise होत नाही मग परीक्षेत आठवेल का?

तुमचं Revision complete झाले आहे असं वाटत नसेल तरीही तुम्ही या सर्व गोष्टी अगोदर read केल्या असल्यामुळे समोर आल्यावर तुम्हाला ते आठवणारच आहे. त्यामुळेच या चिंतेत न राहिलेलंच बरं. तसच आपली परीक्षा MCQ असल्यामुळे व्यवस्थित वाचन केले असल्यास परीक्षेत नक्की गोष्टी आठवतात.


♻️  Prelims, साठी अडचण ठरणारे विषय -

बऱ्याच वेळा Prelims मध्ये Current Affairs आणि Science हे दोन विषय अडचणीचे ठरु शकतात . कारण त्यांना Proper revision अत्यावश्यक असते. त्यामुळे Current dailly करा आणि Science साठी छान book refer करून read करून घ्या.20 दिवसांपैकी 4-5दिवस या विषयांसाठी प्रॉपर देऊ शकता म्हणजे शेवटच्या revission वेळी या विषयासाठी जास्त वेळ देणे गरजेचे राहणार नाही.


♻️  परीक्षेच्या काळात मानसिकता कशी टिकवून ठेवायची?

या काळात सर्वात धोकादायक ठरणारी गोष्ट म्हणजे मानसिकता. जर आपण कितीही study केला असेल आणि स्वतःवर विश्वास नसेल तर मग मात्र परीक्षा गेलीच म्हणून समजा. या काळात एकच गोष्ट आपल्याला तारू शकते ती म्हणजे अपला स्वतःवरचा विश्वास. तो exam मधील शेवटचा गोल करेपर्यत टिकून राहिला की आपल 70% काम झाले म्हणून समजा..


♻️  झोप आणि अभ्यासातील सातत्य - साधारणतः आपण 6-8 तास एवढी optimum झोप घायलाच हवी. शेवटी आपण खूप Study Centric होतो व आपल झोप,जेवण, regular Schedule विसरून जातो आणि normal असतानांदेखील Abnormal behave करायला लागतो.


♻️ इतर बाबी -

25 ऑगस्टसाठी ज्यावेळी आपण सर्व exam hall मध्ये बसू त्यावेळी सर्वजण एकाच Level ला असणार आहोत फक्त त्या 2 hrs मध्ये जो शांत डोकं ठेऊन सर्व व्यवस्थित manage करेल तोच शेवटचं टोक गाठणार आहे. त्यामुळेच Be Alert. 


अशा प्रकारे आपण पुढील 20 दिवसांचे नियोजन केलं आणि व्यवस्थित मानसिकता टिकवून 25 ऑगस्ट ला समोरे गेलो तर विजय आपलाच आहे.


परीक्षेसाठी सर्वाना शुभेच्छा 💐💐