Saturday 16 March 2024

चालू घडामोडी :- 16 मार्च 2024

◆ किनवट तालुक्यातील भंडारवाडी या गावाची मराठवाड्यातील पहिले आणि राज्यातील चौथे मधाचे गाव म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

◆ 'राष्ट्रीय लसीकरण दिन' दरवर्षी 16 मार्च रोजी साजरा केला जातो.

◆ 16 मार्च 1955 पासून राष्ट्रीय लसीकरण दिवस साजरा करण्यात येतो आहे.

◆ ‘मोहम्मद मुस्तफा’ पॅलेस्टाईनचे नवे पंतप्रधान झाले आहेत.

◆ गृह मंत्रालयाने नागरिकत्व सुधारणा कायदा, 2019 अंतर्गत अर्ज करण्यासाठी ‘CAA-2019’ मोबाइल ॲप लाँच केले आहे.

◆ पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्लीत 'पर्यायी ऑटो फ्युएल इथेनॉल 100' लाँच केले आहे.

◆ मीडिया फाउंडेशनने स्वतंत्र पत्रकार ग्रिष्मा कुठार आणि इंडियन एक्स्प्रेसची रितिका चोप्रा यांना 2024 साठी 'चमेली देवी जैन पत्रकारिता पुरस्कार' देऊन संयुक्तपणे सन्मानित केले आहे.

◆ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) 'स्पेशल डिजिटल केस मॅनेजमेंट सिस्टम' (CCMS) चे उद्घाटन केले.

◆ राजस्थान सरकारने बाजरीच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बाजरी आणि भरड धान्याचे मोफत बियाणे वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ भारत सरकारने ‘फिनटेक इको सिस्टीम’ मजबूत करण्यासाठी आशियाई विकास बँकेसोबत (ADB) कर्जसाठी करार केला आहे.

◆ ‘बी साईराम’ यांची NCL चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (MD) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज 'मॅथ्यू वेड' याने प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

◆ देशभर सात टप्प्यांत 18 व्या लोकसभेसाठी मतदान होणार आहेत.

◆ 18 व्या लोकसभा निवडणुकीमध्ये पाच टप्प्यांत महाराष्ट्रातील 48 जागांसाठी मतदान होणार आहे.

◆ समाजसेवेतील अमूल्य योगदानासाठी रतन टाटांचा पी. व्ही नरसिंह राव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये



◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले


◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन


◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️सवामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता


◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम


◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह


◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.


◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.


◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष


◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन


◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी


◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय


◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले
‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी


◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर


◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार


◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”
 – गारेट ब्रिटीश इतिहासकार.


◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु


◾️करांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.


◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.


◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.


◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे


◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.


◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही.
भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक


◾️इग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक


◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना


◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स


जालियनवाला बाग हत्याकांड



जनरल डायरद्वारा केले गेलेले सामुहिक हत्याकांड


एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० 


जालियनवाला बाग सभा


अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. एप्रिल १० १९१९, रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणी, सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु, असे २ वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ह्या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्त्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बॅंकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचा एक युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बॅंक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयन नागरीकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. ह्या नंतररचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपीयन नागरीक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पन्जाब मध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला.


योगायोग असा की १३ एप्रीला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बान्धव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता.


जालियनवाला बाग हत्याकांड महत्त्वाचे मुद्धे


20 जुलै 1905 रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली.


सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते.


16 ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले.


कलकत्यांच्या अनेक रस्त्यांवरुन मिरवणुका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली. तिला 50,000 लोक हजर होते.


बंगालच्या खेडयापाडयांतून न शहराशहरांतून सभा, मिरवणुका व निदर्शने यांचे पडसाद सतत उमटत होते.


परकीय बनावटीच्या सर्व वस्तुवर बहिष्कार व त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर हे या चळवळीचे सूत्र होते.


अनेक ठिकाणी परदेशी कापडाच्या होळया पेटवण्यात आल्या आणि परदेशी कापड विकणार्‍या दुकानांपुढे निदर्शने करण्यात आली.


शाळा, कॉलेजांवर बहिष्कार, न्यायालये व सरकारी नोकर्‍यांचा त्याग असे या असहकार आंदोलनाचे स्वरुप होते, मात्र कार्यक्रमांतील हा भाग परिणामकारकरीत्या अमलात येऊ शकला नाही, परकीय जोखडातून स्वातंत्र्य, अशीही नव्या नेतृत्वाने हाक दिली.


त्याचाच एक परिणाम म्हणजे डिसेंबर 1906 मधील कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना दादाभाई नौरोजींनी स्पष्ट केले की ‘स्वराज्य’ हेच कॉंग्रेसचे उद्दिष्ट आहेत.


खेडयातील आणि शहरातील सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा देण्यात नवे नेतृत्व विलक्षण यशस्वी झाले.


विशेषत: विद्यार्थी, महिला आणि शहरी भागातील कार्यकर्ते, मोठया उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले, स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर प्रांतांतही प्रसृत झाल्या.


परदेशी कापडावरील बहिष्काराचे आंदोलन तर अखिल भारतीय पातळीवर संघटित करण्यात आले.


समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनांनी सारा देश आता एक होऊ लागला.


सरकारने दडपशाहीनेच या आंदोलनास उत्तर दिले. सभांवर बंदी घालण्यात आली.


वृत्तपत्रांचा आवाज दडपून टाकण्यात आला. राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेक नेत्यांना परदेशी हद्दपार करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना मारझोड करण्यात आली.


सरकारने जहालांपासून मवाळांना व हिंदूपासून मुसलमानांना वेगळे काढण्याचे प्रयत्न केले.


जनता आता जागृत झाली होती, पण तिला योग्य अशा संघटनेत बांधण्यात व लढयाला योग्य दिशा देण्यात नवे नेतृत्व अयशस्वी ठरले. उदाहरणार्थ नि:शस्त्र प्रतिकाराची चळवळ प्रत्यक्षात आली नाही.


अखेर लोकमान्य टिळकांना जेव्हा सहा वर्षे काळया पाण्याची शिक्षा झाली.


बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांनी राजकारण संन्यास घेतला व लाला लजपत राय परदेशी गेले तेव्हा सरकारला ही चळवळ दडपून टाकणे शक्य झाले.


मोठया जन आंदोलनात परिणामकारक सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी दडपशाहीचा प्रतिकार करण्यास कोणताच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्करणीय अधिकार्‍यांची हत्या करणे हीच त्यांच्या राजकीय कार्याची पध्दत बनली. अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दोन प्रमुख दहशतवादी गट होते.


या क्रांतिकारी दहशतवाद्यांना जनतेच्या पाठिंब्याचा आधार नव्हता व म्हणूनच ती चळवळ फार काळ टिकू शकली नाही. पण राष्ट्रीय चळवळीतील त्यांचेही योगदान मोलाचे आहे.


इसवी सन 1909 पासून 1916 पर्यंत राष्ट्रवादी चळवळ सुप्त स्थितीत होती, पण पहिल्या महायुध्दाच्या काळात भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍या इंग्रज विदुषी अ‍ॅनी बेझंट यांनी आणि करावासातून मुक्त झालेल्या लोकमान्य टिळकांनी ‘इंडियन होमरुल लीग’ च्या संरक्षणासाठी सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरु केले.


युध्दकाळात परदेशातील क्रांतिकारी कार्यकर्तेही क्रियाशील होते. त्यात अमेरिकेत व कॅनडात स्थापन झालेल्या व पूर्व आणि आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उलेख केला पाहिजे.


त्यानेच भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.


हत्याकांडाच्या प्रतिक्रिया


भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले.


शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ'डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला

लॉर्ड & वहाइसरॉय


👉 लॉर्ड एल्गीन – (१८६२-१८६३) :

सिंधू नदीच्या पलीकडील हिंदुकुश पर्वतातील वहाबीविरुद्ध लढाई केली. भारतात आल्यावर धर्मशाला येथे अवघ्या २० महिन्यांत त्यांचा मृत्यू झाला.

👉 लॉर्ड जॉन लॉरेन्स (१८६३-१८६९) :

सर जॉन लॉरेन्सने शेतकऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी टेनन्सी अ‍ॅक्ट फॉर पंजाब अ‍ॅण्ड अवध संमत केला. १८६८ मध्ये पंजाब अवधसाठी कूळ कायदा लागू केला. त्याच्या काळात दोन दुष्काळ पडले. पहिला १८६८ साली ओरिसातील व दुसरा १८६८-६९ मध्ये बुंदेलखंड व राजपुतान्यात. तेव्हा फेमीन कमिशनची स्थापना केली. दुष्काळासाठी जॉर्ज कॅम्पेबल समिती नेमली. समितीच्या शिफारशीनुसार सिंचन खाते स्थापन केले व त्याचा प्रमुख रिचर्ड स्ट्रची यास नियुक्त केले. सिमला ही ग्रीष्मकालीन राजधानी ठरविली.


👉 लॉर्ड मेयो (१८६९-१८७२) :

सर जॉन लॉरेन्सच्या निवृत्तीनंतर व्हाइसरॉय १८६९ मध्ये मेयोची नियुक्ती झाली. डिसेंबर १८७० मध्ये रिचर्ड स्ट्रचीने वित्त विकेंद्रीकरणाची घोषणा केली. स्ट्रचीने तूट भरून काढण्यासाठी विकास कार्यात कपात, आयकरात वाढ, मीठ करात सुधारणा केल्या. १८७० चा विकेंद्रीकरणाचा ठराव प्रांती स्वायत्ततेची सनद म्हणून ओळखला जातो. बजेटमध्ये उत्पन्न खर्चात समतोल मेयोने निर्माण केला. स्थानिक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मेयोने १८७० मध्ये स्थानिक स्वतंत्र शासन समित्या स्थापल्या. संस्थानिकांच्या, सरदारांच्या शिक्षणासाठी पहिले कॉलेज अजमेर येथे काढले. सर्वप्रथम भारतात जनगणना १८७२ मध्ये मेयोच्या काळात झाली. मेयोस आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण करणारा व्हाइसरॉय म्हणतात. जानेवारी, १८७२ मध्ये अंदमान येथे कैद्यांची पाहणी करत असताना एका पठाणाकडून मेयोची हत्या झाली.


👉 वहाइसरॉय लॉर्ड नॉर्थब्रुक (१८७२-१८७६) :

१८५३ मध्ये लॉर्ड नॉर्थब्रुक हा चार्ल्स वुडचा सचिव होता. १८७२ मध्ये नॉर्थब्रुक व्हाइसरॉय झाला. लॉर्ड नॉर्थब्रुक हा अनियोजित खाजगी आर्थिक व्यवहार आणि मुक्त व्यापार धोरणाचा पुरस्कर्ता होता. बिहार, बंगाल प्रांतात दुष्काळ निवारणार्थ (१८७३-७४) ब्रम्हदेशातून तांदूळ आयात केला. बंगाल-बिहार दुष्काळ निवारणार्थ नॉर्थब्रुकने ६६ लक्ष पौंड खर्च केले. त्याच्या काळात पंजाबातील कुका चळवळीचा सामना करावा लागला. त्याच्याच कारकिर्दीत मुंबईत १८७५ साली आर्य समाज व थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना झाली. नॉर्थब्रुकची कारकीर्द अफगाण संदर्भात विरोधी धोरणामुळे प्रसिद्ध आहे. इंग्लंड सत्ताधीशांच्या मतभेदामुळे एक वर्ष आधी मुदतपूर्व राजीनामा दिला.


👉लॉर्ड लिटन (१८७६-१८८०) 

लॉर्ड लिटन हा कट्टर साम्राज्यवादी होता. म्हणून डिझरायलीने त्याची भारताच्या व्हाइसरॉयपदी १८७६ मध्ये नेमणूक केली. त्याच्या काळात १८७६-७७ मध्ये मद्रास, मुंबई, पंजाब या भागात दुष्काळ पडला. या काळात दुष्काळाने ५० लाख व्यक्ती मृत्यू पावल्या व २० लाख हेक्टर जमीन नापीक झाली. व्हाइसरॉयने दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनेच्या हेतूने स्ट्रची दुष्काळ निवारण समिती नेमली. (अहवाल १८८०). तिचा अहवाल स्वीकारून सरकारने १८८३ साली दुष्काळ संहिता जाहीर केली. लिटनच्या उद्दाम धोरणामुळे दुसरे अफगाण युद्ध उद्भवले. १८७७ साली पहिला दिल्ली दरबार भरवण्यात येऊन राणी व्हिक्टोरियाने भारत सम्राज्ञी हा किताब धारण केल्याचे जाहीर केले. त्याच्यावर देशी वृत्तपत्रांनी टीकेची झोड उठवल्याने देशी वृत्तपत्रांवर र्निबध टाकणारा देशी कायदा मार्च, १८७८ मध्ये पास करून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी केली. अमृतबझार पत्रिका हे देशी वृत्त तेव्हापासून इंग्रजी भाषेत सुरू आहे. १८७८ मध्ये शस्त्रबंदी कायदा करून विनापरवाना शस्त्र बाळगण्यास बंदी. लिटनच्या काळात भारतीय मुलकी सेवा कायदा १८७९ पास केला. आयसीएस परीक्षेचे वय २१ वरून १९ वर्षांवर आणले. त्याविरुद्ध सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची (आयसीएस पास प्रथम भारतीय व्यक्ती) इंडियन असोसिएशनच्या वतीने जनजागरण मोहीम.


👉 वहाइसरॉय लॉर्ड रिपन (१८८०-१८८४) 

भारतीयांसाठी उदारमतवादी व्हाइसरॉय म्हणून ओळखला जातो. इ.स. १८३२ च्या इंग्लंडमधील फॅक्टरी अ‍ॅक्टप्रमाणे रिपनने १८८१ मध्ये कामगारांसंबंधी फॅक्टरी अ‍ॅक्ट पास केला. इ.स. १८३५ मध्ये चार्ल्स मेटाकाफ व लॉर्ड मेकॉलेने भारतातील वृत्तपत्रांना स्वातंत्र्याची मागणी केली होती. १९ जानेवारी, १८८२ रोजी रिपनने (Vernacular) रद्द केला. रिपनने शिक्षणपद्धतीच्या पाहणीकरिता १८८२ मध्ये हंटर समिती १८५४ च्या वुड्स खलित्याप्रमाणे नेमली. हंटर समितीच्या शिफारशी स्वीकारून लाहोर येथे पंजाब व अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना केली. १८८२ मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कायदा पास केला. रिपनने स्थानिक भारतीयांना नियुक्त केले. त्यामुळे रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून संबोधतात. भारतातील पहिली दशवर्षीय जनगणना १८८१ मध्ये रिपनच्या कारकिर्दीत झाली. १८८४ मध्ये इलबर्ट बिल मंजूर केले. या कायद्यान्वये भारतीय सत्र न्यायाधीशांना युरोपियन लोकांवर खटले चालविण्याची मुभा देण्यात आली. १८८४ मध्ये रिपनने राजीनामा दिला.


👉 लॉर्ड डफरिन (१८८४-१८८८) 

रिपनच्या मुदतपूर्व राजीनाम्यामुळे लॉर्ड डफरिनची व्हाइसरॉयपदी नियुक्ती झाली. डफरिनच्या काळात उत्तर ब्रम्हदेश जिंकून संपूर्ण ब्रम्हदेश (१८८६) इंग्रजांच्या वर्चस्वाखाली आणला. मुलकी सेवेत भारतीयांना समाविष्ट केले जावे म्हणून व्हाइसरॉयने चार्ल्स अ‍ॅचिसन समिती नेमली. चार्ल्स अ‍ॅचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोग (पब्लिक सर्व्हिस कमिशन)ची स्थापना झाली. १८८७ मध्ये अ‍ॅचिसनने लोकसेवा आयोगाच्या शिफारशी (अहवाल) सादर केल्या. डफरिनच्या काळात अ‍ॅलन ‘ाुम (निवृत्त आय.ए.एस. अधिकारी) ने इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापण्यास पुढाकार घेतला. डिसेंबर १८८५ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना मुंबईत तेजपाल संस्कृत महाविद्यालयात झाली. लॉर्ड डफरिनने इंपेरियल सर्व्हिस क्रॉप्सची स्थापना केली. बंगाल, पंजाब, औंधमध्ये नवीन कुळकायदे व कुळासाठी अधिक उदार धोरण स्वीकारले.



👉 लॉर्ड लॅन्सडाऊन (१८८८-१८९४) 

भारतीयांना शासनात सहभाग मिळावा म्हणून भारतीय विधिमंडळ कायदा, १८९२ संमत झाला.     सर डय़ुरांड यांनी पूर्व व दक्षिण अफगाणिस्तानची सीमा निश्चित केली. हिला डय़ुरांड रेषा म्हणतात. १८९१ साली कामकरी महिला व बालके यांच्या संरक्षणासाठी दुसरा फॅक्टरी अ‍ॅक्ट मंजूर केला गेला. समाजसुधारक बेहरामजी मलबारी यांच्या प्रयत्नामुळे व्हाइसरॉय लॅन्सडाऊनने एज ऑफ कन्सेंट अ‍ॅक्ट (संमतिवयाचा कायदा) १८९१ मध्ये संमत केला.


👉 लॉर्ड एल्गीन – २ (१८९४-१८९९) 

यांच्या कारकिर्दीत १८९६ चा भीषण दुष्काळ पडला. १८९६-९७ दुष्काळग्रस्तांसाठी व्हाइसरॉय एल्गीनने अन्नधान्य हाँगकाँगकडून मुंबई बंदरात आणले. या अन्नधान्यासोबत ब्युबॉनिक नावाचा भयंकर प्लेग भारतात आला.

👉 लॉर्ड कर्झन (१८९९-१९०५) 

👉 लॉर्ड कर्झन १८९९ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आला. कर्झन भारतास आशियाचा राजकीय आधारस्तंभ समजत. व्हाइसरॉयपदी येण्यापूर्वी कर्झन भारतात चार वेळा आलेला होता. १८९९-१९०० दरम्यान भारतात दुष्काळाबरोबर एन्फ्ल्युएंझा व मलेरियाची साथ पसरली. दुष्काळाची व्याप्ती महाराष्ट्र व गुजरातमध्ये होती. दुष्काळ निवारणार्थ व्हाइसरॉय कर्झनने १९०१ मध्ये लॉर्ड मॅक्डोनल समिती नेमली. १९०१ मध्ये वायव्य सरहद्द प्रांत निर्माण करून टोळीवाल्यांचा बंदोबस्त केला. १९०० चा कलकत्ता कॉर्पोरेशन कायदा केला. कर्झन स्थानिक स्वराज्य संस्थांचा कट्टर शत्रू समजला जात होता. १८९९ मध्ये कर्झनने भारतीय चलन कायदा संमत करून भारतासाठी सुवर्णप्रमाण स्वीकारले. पोलीस खात्यातील अकार्यक्षमता व भ्रष्टाचार आदी गरकारभाराची चौकशी करण्यासाठी अ‍ॅन्ड्र फ्रेझर समिती १९०२ मध्ये नेमली. कर्झनने १९०५ मध्ये पोलीस खात्याची पुनर्रचना केली. १९०२ साली सर रॅली यांच्या अध्यक्षतेखाली युनिव्हर्सिटी कमिशन नियुक्त केले व या कमिशनच्या शिफारशीनुसार १९०४ मध्ये हिंदी विद्यापीठाचा कायदा संमत केला. १९०१ मध्ये संस्थानिक राजपुत्रांकरिता इंपीरिअल कॅडेट कोअरची स्थापना केली. १९०१ मध्ये इंग्लंडच्या व्हिक्टोरिया राणीचा मृत्यू झाला. १९०३ मध्ये दुसरा दिल्ली दरबार भरवून अमाप पसा खर्च केला. कर्झनने पुराणवस्तू संशोधन खाते निर्माण केले. त्यासाठी प्राचीन स्मारक कायदा संमत करून घेतला. त्याच्या कारकिर्दीतील सर्वात मोठी घोडचूक म्हणजे ७ जुल १९०५ रोजी केलेली बंगालची फाळणी ही होय. तिचा मुख्य उद्देश प्रशासकीय कारणापेक्षा हिंदू-मुस्लीम फूट पाडणे हा होता. सरकारी यंत्रणेची कार्यक्षमता वाढविण्यासाठी एक नियमावली तयार करून त्याने राजकारणात कार्यक्षमता या बाबीला महत्त्व दिले. कर्झनने भारतात आल्यानंतर १२ खाती नेमून विविध समित्या नेमल्या. त्यामुळे त्याची कारकीर्द समिती प्रशासन म्हणतात. लष्कर सरसेनापती, परंतु फाळणी प्रकरणामुळे तो बराच वादग्रस्त ठरला.

👉 कर्झनच्या शेती सुधारणा :

👉 १९०० मध्ये पंजाबात जमिनीच्या हस्तांतरणाचा कायदा अमलात आणला. ज्याअन्वये शेतकऱ्यांव्यतिरिक्त इतरांना जमिनी घेण्यास बंदी घातली. १९०१ मध्ये शेतकी खात्याची स्थापना केली. त्याने कृषी महानिरीक्षकाची नेमणूक केली. बंगाल प्रांतातील पुसा येथे कृषी संशोधन केंद्राची स्थापना केली. सावकारांच्या पाशातून शेतकऱ्याची मुक्ती होण्यासाठी १९०४ मध्ये सहकारी पतपेढी कायदा केला. कर्झनच्या कालावधीत पुष्कळ नवीन रेल्वेमार्ग (सहा हजार मल लांब) बांधले. रेल्वे कारभारात कार्यक्षमतेसाठी सर रॉबर्टसन समिती नेमली. कर्झनने ताजमहलचे सौंदर्य वाढविण्यासाठी इराणहून दिवे आणले. ब्रिटिश साम्राज्याचे वैभव दर्शविण्यासाठी कलकत्ता येथे राणी व्हिक्टोरियाच्या स्मरणार्थ व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल उभारला. कर्झनने बंगलोर येथे सर जमशेदजी टाटा विज्ञान संस्थेची स्थापना केली.



👉 लॉर्ड मिंटो-२ (१९०५-१९१०) 

👉 १९०८-१० या काळात बंगाल फाळणी आंदोलनास तोंड दिले व फाळणीविरोधी आंदोलनाबाबत कायदे मिंटोने तयार केले. १९०७ मध्ये लॉर्ड मिंटोने चीनशी अफूचा व्यापार बंद केला. मुसलमानांना मिंटोने चिथावणी दिली. स्वतंत्र मतदारसंघाचे सिमला येथे १९०६ मध्ये वचन दिले. १९०९ मध्ये इंडिया कौन्सिल अ‍ॅक्ट, ज्याला मोल्रे मिंटो सुधारणा म्हणतात हा कायदा पास झाला.


👉 वहाइसरॉय लॉर्ड हार्डिंग्ज (१९१०-१९१६) 

👉 भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाइसरॉय म्हणून लॉर्ड हार्डिंग्जला ओळखतात. व्हाइसरॉय हार्डिंग्जने जॉर्ज पंचमच्या स्वागतार्थ दिल्लीत १२ डिसेंबर, १९११ रोजी दिल्ली दरबार भरवला. त्या वेळी पंचम जॉर्जने बंगाल फाळणी रद्द केली. २३ डिसेंबर, १९१२ रोजी राजधानी कलकत्त्याहून दिल्लीस हलविली. त्या शाही मिरवणुकीत हार्डिंग्ज बॉम्बहल्ल्यात जखमी झाला. रासबिहारी बोस यांच्यावर खटला भरला. तो खटला दिल्ली खटला म्हणून ओळखतात.
डिसेंबर, १९१४ मध्ये प्रथम महायुद्धास सुरुवात झाली. भारतीयांनी त्यास बिनशर्त पाठिंबा दर्शविला.



👉 लॉर्ड चेम्सफोर्ड (१९१६ – १९२१) 

👉 लॉर्ड चेम्सफोर्डने भारतात येण्यापूर्वी ऑस्ट्रेलियात गव्हर्नर जनरलपदी कार्य केले होते. १९१९ चा माँटेग्यू- चेम्सफोर्ड सुधारणा कायदा किंवा भारत अधिनियम कायदा संमत झाला. १९१९ मध्ये पंजाब प्रांतात रौलेट कायदा (काळा कायदा) लागू केला. १३ एप्रिल, १९१९ रोजी जालियानवाला बाग हत्याकांड झाले. (जनरल डायर). १९२०-२१ मध्ये खिलाफत चळवळ व असहकार चळवळ .



👉 लॉर्ड रिडिंग (१९२१-१९२६) 

👉 लॉर्ड रिडिंग यहुदी होता. परंतु स्वगुणाने इंग्लंडचे मुख्य न्यायाधीश व भारताचा व्हाइसरॉय म्हणून नेमणूक झाली. काँग्रेसमध्ये फेरवादी व नाफेरवादी गट पडले. स्वराज्य पक्षाची स्थापना झाली. रिडिंगच्या काळात दुहेरी प्रशासन व्यवस्था व मुडिमन समितीचा अहवाल सादर झाला.



👉 लॉर्ड आर्यविन (१९२६-१९३१) 

👉 आर्यविन काळातच सायमन कमिशन (१९२८) भारतात आले. डिसेंबर १९२९ च्या लाहोर अधिवेशनात काँग्रेसने संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली व सविनय कायदेभंग चळवळ (१९३०) चालू केली. २६ जानेवारी, १९३० हा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून पाळला गेला. आर्यविन काळातच सायमन कमिशनचा रिपोर्ट जाहीर झाला व गोलमेज परिषद भरवली गेली. ५ मार्च, १९३१ रोजी गांधी-आयर्विन करार झाला. गांधी गोलमेज परिषदेस गेले. सविनय कायदेभंग चळवळ स्थगित केली.



👉 लॉर्ड विलिंग्डन (१९३१-१९३६) 

👉 वहाइसरॉय नियुक्तीपूर्वी विलिंग्डन मुंबई-मद्रास प्रांताचा गव्हर्नर होता. दुसरी गोलमेज परिषद लंडन येथे विलिंग्डनच्या काळात झाली. १६ ऑगस्ट, १९३२ रोजी ब्रिटिश पंतप्रधान रॅम्से मॅक्डोनाल्डने श्वेतपत्रिका घोषित केली. तिलाच जातीय निवाडा म्हणतात. गांधीजींचे उपोषण व येवरडा तुरुंगात २४ सप्टेंबर, १९३२ रोजी महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. सविनय कायदेभंग चळवळीच्या दुसऱ्या टप्प्यास तोंड द्यावे लागले. भारत सरकार अधिनियम, १९३५चा कायदा पास झाला. विलिंग्डन त्याच्या दडपशाहीच्या कृत्यांमुळे भारतीयांचा नावडता राहिला.



👉 वहाइसरॉय लिनलिथगो (१९३६-१९४३) 

👉 सटॅनलेकडून लिनलिथगोने व्हाइसरॉयपदाची सूत्रे हाती घेतली. लिनलिथगोने भारतीय कृषी राज आयोगाचे अध्यक्ष म्हणून कार्य केले होते. लिनलिथगो भारतीय घटनात्मक सुधारणांच्या संयुक्त समितीचा अध्यक्ष होता. १९३५ च्या कायदा निर्मितीत लिनलिथगोचा सहभाग होता. १९३५ च्या कायद्याने केंद्रीय भागाऐवजी प्रांतीय तरतुदी मान्य करुन १९३७ मध्ये निवडणुका झाल्या. काँग्रेसने आठ प्रांतांत सरकार स्थापित केले. दुसऱ्या महायुद्धात भारतीयांच्या सहमतीशिवाय युद्धास पाठिंब्याची व्हाइसरॉयने १९३९ मध्ये घोषणा केली. सदर घटनेच्या निषेधार्थ प्रांतीय शासनाने १९३९मध्ये राजीनामे दिले. सुभाषचंद्र बोस यांनी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. १९४२च्या चले जाव चळवळीस दडपशाहीने बंद करण्याचा आटोकाट प्रयत्न केला.
सर्व नेत्यांना तुरुंगात टाकले. १९४२ मध्ये क्रिप्स मिशन भारतात आले.




👉 लॉर्ड वेव्हेल (१९४३-१९४७) 

👉 ऑक्टोबर, १९४३ मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त झाले. वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग  सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बठक सिमला येथे बोलवली. इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार स्थापन झाले. भारतात घटना समितीच्या बठकांस सुरुवात झाली. आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या. पंतप्रधान अ‍ॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला.




👉 वहाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन (मार्च १९४७ ते ऑगस्ट १९४७- जून १९४८) 

👉 मार्च १९४७ मध्ये व्हाइसरॉय म्हणून भारतात आले. मे १९४७ मध्ये ब्रिटन संसदेशी चर्चा करण्यास लंडनला गेले. २ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली. ३ जून, १९४७ रोजी भारताच्या स्वातंत्र्याची तारीख जाहीर केली. १५ ऑगस्ट, १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. स्वतंत्र भारताचा तिरंगा प्रथम व्हाइसरॉय माऊंटबॅटनच्या हस्ते फडकविण्यात आला. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल व इंग्रज सरकारचे शेवटचे व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन ठरले. माऊंटबॅटन जून, १९४८ पर्यंत स्वतंत्र भारताचे गव्हर्नर जनरल होते.




लोकमान्य बाळ गंगाधर :-


🔸भारतीय असंतोषाचे जनक

 (व्हॅलेंटाईन चिरोल द्वारे उपमा)

🔸भारतीय राष्ट्रवादाचे शिल्पकार...

🔸तल्या तांबोळ्यांचे पुढारी...

🔸महाराष्ट्र केसरी-लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती...

🔸1 जानेवारी 1880 रोजी 'न्यू इंग्लिश स्कूल,पुणे' ची स्थापना संस्थापक-टिळक,आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर...

🔸 कसरी व मराठा वृत्तपञांची सुरुवात

2Jan1881-मराठा(इं):-संपादक-टिळक

4Jan1881-केसरी(म):-संपादक-आगरकर

🔸जलै 1882-कोल्हापूरच्या बर्वे प्रकरणात टिळक व आगरकर 101 दिवस डोंगरीच्या तुरुंगात कैद...

🔸24 ऑक्टोबर 1884 डेक्कन एज्युकेशन सोसायटी ची स्थापना (टिळक व आगरकर)...

🔸दादाजी विरुद्ध पत्नी रखमाबाई प्रकरण...

🔸महाविद्यालयीन मित्र असणाऱ्या टिळक व आगरकर यांच्यात 'आधी सामाजिक की राजकीय सुधारणा' यावरून वितुष्ट...

🔸1893-मुस्लिमांच्या मोहर्रम सणावरून प्रेरणा घेत सार्वजनिक गणेश उत्सव सुरुवात...

🔸1895-सार्व. शिवजयंती उत्सव सुरुवात...

🔸1896-97 मधील साराबंदी मोहिम...

🔸1897-चाफेकर बंधूंनी केलेल्या प्लेग कमिशनर रँड हत्तेच्या समर्थनात केलेल्या लिखनाबद्दल दीड वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा

🔸1901-'आर्टिक होम इन वेदाज' ग्रंथ...

🔸1901 ते 1904 -ताई महाराज प्रकरण...

🔸1905-बंगालच्या फाळणीनंतर जहालवादाचा जोरदार पुरस्कार...

🔸''स्वदेशी,स्वराज्य,राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार'' या चतु:सुञीचा पुरस्कार...

🔸किंग्जफोर्ड प्रकरणानंतर केसरीत ''देशाचे दुर्दैव" या अग्रलेखा मुळे 6 वर्षे मंडाले येथे काळ्या पाण्याची शिक्षा...

🔸 1911-मंडालेच्या तुरुंगात 'गीतारहस्य' ग्रंथ पूर्ण..

🔸28 एप्रिल 1916-टिळकप्रणित होमरूल लीगची स्थापना...

🔸1916-टिळकांच्या मध्यस्थीने मुस्लिम लीग व राष्ट्रीय सभा यांच्यात येथे होऊन लखनौ अधिवेशन संपन्न...

🔸डिसेंबर 1916- बेळगाव येथे होमरूल लीगच्या प्रचारादरम्यान "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे व तो मी मिळवणारच" ही घोषणा...

🔸मार्च 1918- मुंबईतील अस्पृश्यता निवारण परिषदेत भाषण-"जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्यालाही मी देव मानणार नाही"...

🔸जानेवारी 1919- व्हॅलेंटाईन चिरोल विरोधात अब्रुनुकसानीचा खटला...

🔸1919 च्या माँटेग्यू-चेम्सफर्ड कायद्यावर 'हे स्वराज्य नव्हे व त्याचा पायाही नव्हे','उजाडले पण सूर्य कोठे आहे','दिल्ली तो बहुत दूर आहे' अशा शब्दात लोकमान्यांची टीका...

🔸1920-गांधीजी व टिळकांची सिंहगडावर भेट...

 🔸फब्रुवारी 1920 टिळकांचा काँग्रेस डेमोक्रॅटिक पक्ष...

🔸1 ऑगस्ट 1920-टिळकांचे मुंबई येथे निधन...


👉टिळकांविषयी शब्दगौरव:-

🔸"असे महापुरुष मरत नसतात.त्यांच्या कार्याच्या रुपाने ते अमर झालेले असतात"- महात्मा गांधी...

🔸"राष्ट्रीय चळवळीचा मनू"-न.र.फाटक...

 🔸"लोकमान्य" ही पदवी तसेच "टिळक हे भारतीय नेपोलियनच"-शिवराम परांजपे

🔸"टिळक म्हणजे सूर्याचे पिल्लू"-केरूनाना छत्रे (टिळकांचे शिक्षक).

टिळक युगातील महत्वाच्या घटना :



1. प्लेगची साथ व टिळकांना झालेली अटक :


सन 1896 ते 1899 या काळात पुण्यात ब्युबानिक प्लेगची भयंकर साथ आली होती.

शासनाने प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविण्याकरिता रॅंड या इंग्रज अधिकार्‍याची नियुक्ती केली.

रॅंडने उपाय योजनेच्या नावाखाली जनतेवर आतोनात अत्याचार केले. याचा बदला म्हणून चाफेकर बंधूंनी रॅंड व आयर्स्ट यांचा गोळ्या घालून वध केला.

ब्रिटिश शासनाने टिळकांचा रॅंडच्या खुनाशी संबंध जोडून त्यांना अटक केली.

न्यायालयाने टिळकांना दीड वर्षाची शिक्षा ठोठावली.

भारतीय जनतेने टिळकांच्या शिक्षेविरुद्ध संपूर्ण भारत बंद पाळला. हा भारतीय जनतेने पाळलेला पहिला बंद होय.


2. बंगालची फाळणी (1905) :


लॉर्ड कर्झनने राष्ट्रीय काँग्रेसमधील हिंदू-मुस्लिम जनतेमध्ये फुट पाडण्याच्या उद्देशाने 19 जुलै 1905 रोजी बंगालच्या फाळणीची घोषणा केली.

बंगालच्या फाळणीविरुद्ध बंगाल प्रांतात आंदोलन सुरू झाले. या घटनेच्या विरोधात लोकमान्य टिळकम बिपीनचंद्र पाल व लाला लजपतराय यांनी रान उठविले.

बंकिमचंद्र बॅनर्जी यांचे वंदे मातरम हे गीत राष्ट्रीय चळवळीला महामंत्र ठरले.

आनंद मोहन बोस यांच्या अध्यक्षतेखाली स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार या चार गोष्टीची घोषणा केली.

टिळकांनी यालाच चतु:सूत्री असे नाव दिले.

सन 1905 ते 1920 नंतरचा काळ टिळक युग म्हणून ओळखला जातो.


3. टिळकांना शिक्षा :


ब्रिटिश सरकारच्या विरोधात केसरीमध्ये जनतेच्या भावना भडकविणारे लेखन केल्याचा आरोप लोकमान्य टिळकांवर ठेवण्यात आला व त्यांना 6 वर्षे सक्त मजुरीची शिक्षा ठोठावून मंडाले येथील तुरुंगात ठेवण्यात आले.


4. होमरूल लीग चळवळ :


डॉ. अॅनी. बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना केली.

थिऑसॉफीकल सोसायटीच्या माध्यमातून ही चळवळ संपूर्ण भारतभर पसरली.

सन 1914 मध्ये लोकमान्य टिळक मंडालेहून शिक्षा भोगून परत आले.

लोकमान्य टिळकांनी एप्रिल 1916 मध्ये पुण्यातून होमरूल लीग चळवळ सुरू केली.

बॅरिस्टर जोसेफ बाप्टिस्टा हे या चळवळीचे अध्यक्ष होते. न.ची. केळकर हे सचिव होते.


5. टिळकांचे निधन :


लोकमान्य टिळकांनी. या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याचा स्विकार करण्याच्या उद्देशाने प्रतीयोगिता सहकारिता हे धोरण जाहीर केले. ॰

या कायद्यानुसार घेण्यात येणार्‍या निवदणुकीत काँग्रेस लोकशाही पक्षाची स्थापना केली होती.

एप्रिल 1920 मध्ये निवडणुकीचा जाहीरनामा सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला. परंतु दुर्दैवाने लोकमान्य टिळकांचे 1 ऑगस्ट 1920 रोजी निधन झाले.

भारतीय राजकारणाच्या क्षितीजावर गांधी युगाचा उदय झाला.

भारताच्या स्वातंत्र्याचा कायदा 1947



- ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान कलेमंट अटली यांनी ३० जून, 1948 पर्यंत भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात येईल आणि त्यानंतर सत्ता जबाबदार भारतीयांकडे सोपविली जाईल असे २० फेब्रुवारी, १९४७ रोजी घोषित केले.
- माउंटबॅटन योजना: 3 जून 1947 भारताचा व्हाइसरॉय लॉर्ड माऊंटबॅटन याने फाळणीची योजना सादर केली. योजना काँग्रेस व मुस्लिम लीम लीगने मान्य केली. भारतीय स्वातंत्र्याचा कायदा (१९४७ संमत करून योजना लगेच अमलात आणली गेली.

- भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि १५ ऑगस्ट, १९४७ पासून भारत एक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र असल्याचे घोषित करण्यात आले.
- भारताची फाळणी करण्यात आली आणि भारत व पाकिस्तान ही दोन स्वतंत्र राष्ट्र निर्माण करण्यात आली. त्यांना ब्रिटिश राष्ट्रकुलापासून वेगळे होण्याचा अधिकार देण्यात आला.
- व्हाइसरॉय हे पद रद्द करण्यात आले
- आपल्या देशासाठी राज्यघटना तयार करून स्वीकारण्याचे अधिकार दोन्ही देशांच्या संविधान सभाना देण्यात आले.
- नवीन राज्यघटना तयार करून अमलात येईपर्यंत आपापल्या क्षेत्रासाठी कायदे करण्याचे अधिकार दोनी देशांच्या सविधान सभांना देण्यात आले.
- भारतमंत्री हे पद रद्द करण्यात आले.
- भारतातील संस्थानांना भारतात किंवा पाकिस्तानात सामील होण्याची किंवा स्वतंत्र राहण्याची मुभा देण्यात आली.
- नवीन राज्यघटना तयार होईपर्यंत दोन्ही देशातील व त्याच्या प्रांतातील राज्यव्यवस्था भारत सरकार कायदा १९३५ नुसार पाहिली जाईल अशी तरतूद करण्यात आली.
- इंग्लंडच्या सम्राटाच्या किताबातून भारताचा सम्राट हे शब्द काढण्यात आले

“डाॅ. आंबेडकर आणि घटना समित्या”


🔸 डाॅ. आंबेडकर १ समितीचे अध्यक्ष तर एकुण १० समित्यांचे सदस्य होते. सर्वाधिक समित्यांचा सदस्य असलेले ते एकमेव व्यक्ती होते. 


🔸 २९ आॅगस्ट १९४७ रोजी स्थापन केलेल्या मसुदा समितीचे(Drafting committee) ते अध्यक्ष होते.


🔸 पुढील १० समित्यांचे ते सदस्य होते - 


१) ध्वज समिती

२) मुलभूत हक्क उपसमिती

३) अल्पसंख्यांक उपसमिती

४) संघ राज्य घटना समिती

५) घटना सुधारणा उपसमिती

६) नागरिकत्व तदर्थ समिती

७) सर्वोच्च न्यायालय तदर्थ समिती

८) सल्लागार समिती

९) पुर्व पंजाब आणि बंगालच्या अल्पसंख्यांकांच्या       समस्येवरील उपसमिती

१०) संविधान सभा कार्य समिती(Functions committee)


🔸 जलै १९४६ च्या घटना सभात्याग निवडणुकीत आंबेडकर बंगाल मधील “जेस्सोर आणि खुलना” या मतदार संघातून निवडुन आले होते.”जोगेंद्र नाथ मंडल” यांनी यासाठी या जागेचा राजीनामा दिला होता. 


🔸 दशाची फाळणी झाल्यावर हा भाग पाकिस्तान मध्ये गेला. त्यावेळी आंबेडकरांनी त्या जागेचा राजीनामा दिला.


🔸 मात्र नंतर आंबेडकर “बाँम्बे प्रांतातुन” घटना सभेवर पुन्हा निवडुन आले. यावेळी बॅ. “एम. आर. जयकर” यांनी राजीनामा दिला होता.


भारताचे तीन तुकडे करणाऱ्या रॅडक्लिफ लाइनबद्दल तुम्हाला माहिती आहे का ?



17 ऑगस्ट 1947 रोजी दोन्ही देशांमध्ये रॅडक्लिफ लाइन आखून दोन वेगळे देश निर्माण करण्यात आले. सर सिरील रॅडक्लिफ यांनी भारत व पाकिस्तान यांच्यामधील सीमारेषा निश्चित केली. ते सीमा आयोगाचे अध्यक्ष होते. त्यांनी आखलेल्या रेषेमुळे पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि भारत असे तीन भाग करण्यात आले. नंतर पश्चिम पाकिस्तानच्या जुलमी राजवटीला आणि अत्याचारांना कंटाळून पूर्व पाकिस्तानने लढा देऊन 1971 साली स्वतंत्र बांगलादेश मिळवला

रॅडक्लिफ यांनी फाळणीची रेषा आखण्यासाठी भारतात येण्यापूर्वी कधीही भारत पाहिलेला नव्हता. येथील सामाजिक घटकांची त्यांना काहीही माहिती नव्हती. भारताच्या समाजरचनेचा, भौगोलिक स्थितीचा, लोकसंख्येचा कोणताही अभ्यास त्यांनी केला नव्हता

रॅडक्लिफ यांना अशी घाई-गडबडीत सीमारेषा आखण्याची कल्पना आवडलेली नव्हती. त्यामध्ये अनेक त्रूटी असल्याचे त्यांनी मान्य केले होते. मात्र तत्कालीन परिस्थितीत काम पूर्ण करण्यापलिकडे त्यांच्याकडे कोणताही पर्याय नव्हता.

16 ऑगस्ट रोजी फाळणीच्या रेषेचा अहवाल वाचण्यासाठी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना केवळ दोन तास देण्यात आले

 तर लाहोर भारतात आले असते

रॅडक्लिफ यांना लाहोर शहर भारतामध्ये देण्याची इच्छा होती. मात्र तसे करण्याने पाकिस्तानला कोणतेही मोठे शहर मिळाले नसते. भारताच्या वाट्याला कोलकाता शहर गेल्यामुळे त्यांनी लाहोर शहर पाकिस्तानच्या बाजूला देण्याचे निश्चित केले

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 1) 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल कोण होते? 

✔️ लार्ड कँनिंग


2) 1857 च्या उठावात पहिली गोळी झाडणारा व्यक्ति कोण ? 

✔️ मगल पांडे


3) वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण  ? 

✔️ विनोबा भावे


4) " आझाद हिंद सेने " ची स्थापना कोणी केली ? 

✔️ रासबिहार बोस


5) मायकेल ओडवायरीची हत्या कोणत्या क्रांतिकारकांनी केली ?  

✔️ उधमसिंग


6) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता ? 

✔️  लार्ड कर्झन


7) भारतात सामाजिक सुधारणांचा पाया घालणारी व्यक्ति कोण  ? 

✔️ राजा राममोहन रॉय


8) " पुणे करार " कोणाकोणामंध्ये झाला ? 

✔️  महात्मा गांधी - डॉ. आंबेडकर


9) जहाल गटातील तीन प्रसिद्ध नेत्यांची ( त्रिमूर्ती ) नावे सांगा  ? 

✔️ लाल - बाल  - पाल


10) इ.स. 1930 मंध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले ? 

✔️ रम्से मँक्डोनाँल्ड


11) भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली ? 

गो. कृ.  गोखले


12) जुन्या मुबंई प्रांताचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर -----------होता

✔️ एलफिन्स्टन


13) इ.स. 1829 मंध्ये सतीच्या चालीला बंदी घालणारा कायदा कोणी संमत केला ? 

✔️ बटिग विल्यम


14) " शिवजयंती उत्सव " महाराष्ट्रात सुरू करणारे राष्ट्रवादी व्यक्ती कोण ? 

✔️ बा.ग.टिळक


15) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते ? 

✔️ सर ए. ओ.ह्युम


16) भारतीय राष्ट्रीय कांग्रेसची पहिली महिला अध्यक्ष ----------------

✔️ अनी बेझंट


17) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते ? 

✔️ वयोमेशचंद्र बँनर्जी


18) डाँ.  पांडुरंग सदाशिव खानखोजे यांनी "गदर " ही गुप्त क्रांतिकारक संघटना ----------या देशामंध्ये सुरू केली ? 

✔️ अमेरिका


19) काँग्रेसचे पहिले अधिवेशन ------------या शहरात घडून आले ? 

✔️ मबंई


20)  कलेक्टर जँक्सनचा वध करणारा क्रांतिकारक -------------

✔️ अनंत लक्ष्मण कान्हेरे


21) " अभिनव भारत संघटनेचे " संस्थापक कोण ? 

✔️ वि.दा.सावरकर


22) आद्य क्रांतिकारक ? 

✔️ वासुदेवन बळवंत फडके


23) ईस्ट इंडिया कंपनीचा भारतातील राजवटीचा शेवट कदी झाला ? 

✔️ 1858


24) हैदराबाद मुक्ती संग्रामात अनुकूल पाश्र्वभूमी कोणी तयार केली ? 

✔️ सवामी रामानंद तीर्थ


25) भारताचा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसराँय कोण  ? 

✔️ लार्ड कँनिंग


26) "व्हर्नाक्युलर प्रेस अँक्ट "रद्द करणारा गव्हर्नर जनरल कोण ? 

✔️ लार्ड रिपन


27) लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मोगल सम्राटा बरोबर केली जाते ? 

✔️ औरंगजेब


29) 1929 मंध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव कोणाच्या आध्यक्षेखाली पास झाला ? 

✔️  पडित नेहरू


30) "गदर पार्टीचे " पुणे जिल्ह्यातील कार्यकरते कोण ? 

✔️ विष्णू गणेश पिगंळे


32) विधवा विवाहाचे पुरस्कार करणारे समाजसुधारक ------------

✔️ धोंडो केशव कर्वे


31) भारकाचे शेवटचे गव्हर्नर जनरल कोण ?  

✔️ सी.  राजगोपालाचारी


33) होमरुल लीगची स्थापना सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या प्रांतात झाली  ? 

✔️ मबंई


34) "असहकार चळवळ " कोणी केली ? 

✔️ महात्मा गांधी


35) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरूध्द----------- यांनी आवाज उठविला ? 

✔️ वि.रा.शिदें


36) वैयक्तिक सत्याग्रहाचे दुसरे सत्याग्रही ------------

✔️ पडित नेहरू


37) मुंबई येथे थिआँसाँफिकल सोसायटी शाखा इ.स.-----------या वर्षी झाली  ? 

✔️ इ.स.1897


38) भारतातील ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता हातात घेताना "राणीचा जाहिरणामा " प्रस्तुत करणार्‍या साम्राद्नीचे नाव -----------?

राणी व्हिक्टोरिया 

✔️


39) भारतातील" स्वतंत्र " हा शब्द ब्रिटिश राजकर्त्यानी ---------------मंध्ये वापरला ? 

✔️ अटलीच्या घोषणेत


40) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात।? 

✔️ लार्ड रिपन

इग्रजांचे बंगालवर वर्चस्व

 


🔹 बगाल हा मोगली साम्राज्यातील एक सधन व मोठा प्रांत होता. औरंगजेबाच्या मृत्यूनंतरच्या काळात ठिकठिकाणी सुभेदार जसे स्वतंत्र बनले होते. तसा बंगालचा सुभेदार अलीवर्दीखान हाही स्वतंत्र बनला होता. त्याच्यावर मोगल बादशहाचे नाममात्र वर्चस्व होते. तो १७५६ साली मृत्यू पावल्यावर त्याचा पुत्र सिराजउद्दोला हा बंगालच्या सुभेदारीवर आला. याच्यात कारकिर्दीत बंगालमध्ये इंग्रजांनी बाजी मारून इंग्रजी साम्राज्याचा पाया रचला.


* लवकरच प्लासीच्या रणमैदानावर सिराज उद्दोला लष्कर व इंग्रज यांची गाठ पडली. युद्धाला सुरुवात होताच सेनापती मीर जाफर प्रथम तटस्थ राहिला व नंतर इंग्रजांना जाऊन मिळाला. २३ जून १७५७ पुढे मीर जाफरचा पुत्र मिराण याने पकडून ठार केले. प्लासीच्या विजयानंतर इंग्रजांनी मीर जाफरला बंगालचा नवाब केला.


* मीर कासीम हा बंगालचा नाममात्र सुभेदार बनू इच्छीत नव्हता. इंग्रजांना हि न आवडणारी गोष्ट होती. त्यांनी मीर कासीम विरुद्ध युद्ध पुकारून त्याचा अनेक लढायात पराभव केला १७६३ आणि मीर जाफर यास पुन्हा बंगालचा सुभेदार म्हणून जाहीर केले.


* १ मे मध्ये क्लाइव्ह दुसऱ्यांदा बंगालचा गवर्नर म्हणून आला. त्याने आल्याबरोबर शहा अलम बादशाही व अयोध्येच्या नवाबाशी करार करून त्यांना आपल्या वर्चस्वाखाली आणले. याच वेळी त्याने बादशहापासून बंगालच्या सुभ्याची दिवाणी मिळविली. त्यातूनच बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था निर्माण झाली. त्याच्या जागी त्याचा पुत्र नजमुद्दोला याला इंग्रजांनी बसविले. तोही पूर्णपणे इंग्रजांच्या वर्चस्वाखाली राहिला.


📚दहेरी राज्यव्यवस्था


* १२ आगष्ट १७६५ रोजी मोगल बादशहा शहा आलम याने कंपनीस बंगालच्या दिवाणीचे फर्मान दिले. या फर्मानानुसार कंपनीस बंगालच्या सुभ्यातील महसूल गोळा करण्याचा अधिकार प्राप्त झाला. परंतु सुभ्याच्या राज्यकारभारातली व सुव्यवस्थेची जबाबदारी बंगालच्या सुभेदारावारच राहिली. याचाच अर्थ बंगालवर इंग्रजांचे सर्वार्धाने वर्चस्व झाले.


* १७६९ - ७० मध्ये या वर्षी दुष्काळात १ कोटी माणसे अन्नान्न करून तडफडून मेली. कंपनीच्या अवघ्या तेरा वर्षाच्या कारकिर्दीत शेती बुडाली. शेवटी विलायत सरकारला कंपनीच्या गैरकारभाराची चौकशी करून तिच्यावर बंधने टाकणारा रेग्युलेटिंग अक्ट [१७६९ - ७० ] पास करावा लागला

RRB NTPC Exams - (अति संभाव्य प्रश्नोत्तरे )


#1. भारतात सापडलेले सर्वात मोठे जुने शहर कोणते आहे? - हडप्पा


#2."स्वराज हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे" असे कोणी म्हटले? - बाळ गंगाधर टिळक


#3. महात्मा गांधींचे राजकीय गुरू कोण होते? - गोपाळ कृष्ण गोखले


#4. दिल्लीवर राज्य करणारी पहिली मुस्लिम महिला शासक / सर्वप्रथम महिला शासक कोण होती? - रझिया सुल्तान


#5. सिंधू सभ्यतेचे पट्टानगर (बंदर) कोणते होते? - लोथल


#6. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे संस्थापक कोण होते? - ए.ओ. ह्यूम


#7. कोणते वेद गद्य आणि श्लोक या दोन्ही मध्ये रचले गेले आहेत? - यजुर्वेद


#8. भारतातील पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? - सय्यद अहमद खान


#9. बौद्ध धर्म कोणाच्या शासनकाळात हीनयान आणि महायान या दोन भागात विभागला गेला होता? - कनिष्क


#10. लोदी घराण्याचा शेवटचा शासक कोण होता? - इब्राहिम लोदी


#11. प्रथम जैन संगीत कोठे आयोजित केले गेले होते? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#12. ऋग्वैदिक समाजातील सर्वात लहान घटक कोणते होते? - कुल किंवा कुटुंब


#13. कोणत्या शासकाकडे शक्तिशाली नौसेना होती? - चोल


#14. संकीर्तन प्रणालीचे जनक कोण होते? - चैतन्य


#15. कोणत्या मुगल शासकास 'आलमगीर' म्हटले जाते? - औरंगजेब


#16.  'शहीद आजम' ही पदवी कोणाला दिली गेली? - भगतसिंग


#17. सायमन कमिशनच्या निषेधाच्या वेळी लाठीचार्जात कोणत्या राजकारण्यांचा मृत्यू झाला? - लाला लाजपत राय


#18. वहाबी चळवळीचे प्रवर्तक कोण होते? - सय्यद अहमद


#19. बुद्धांनी महापरिनिर्वाण कोणत्या ठिकाणी केले? - कुशीनारा / कुशीनगरमध्ये


#20. कॉंग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? - व्योमेश चंद्र बॅनर्जी


#21. भरतनाट्यम कलाकुसर असलेल्या भगवान नटराजांचे प्रसिद्ध मंदिर कोठे आहे? - चिदंबरम


#22. गौतम बुद्धांनी उपदेश देण्यासाठी कोणती भाषा वापरली? - पाली


#23. कुतुब मीनारचे काम कोणत्या शासकाने पूर्ण केले? - इल्तुतमिश


#24. 'लीलावती' या पुस्तकाशी संबंधित आहे - गणित


#25. डोंगर तोडुन इलोराचे जगप्रसिद्ध कैलासनाथ मंदिर कोणी बनविले? - राष्ट्रकूट


#26. चिनी प्रवासी ह्नेनसांग कोणाच्या शासनकाळात भारतात आला होता? -  हर्षवर्धन 


#27. बनारस हिंदू विद्यापीठाचे (बी.एच.यू.) संस्थापक कोण होते? - मदन मोहन मालवीय


#28. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? - लॉर्ड माउंटबॅटन


#29. देवी लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मुस्लीम शासकाच्या काळात नाण्यावर होत्या? - महंमद गौरी


#30. कलशोकाची(कालाशोक) राजधानी कोणती होती? - पाटलिपुत्र (आताचे पटना)


#31. गायत्री मंत्राची रचना कोणी केली? - विश्वामित्र


#32. लंडनमध्ये 'इंडिया हाउस' ची स्थापना कोणी केली? - श्यामजी कृष्ण वर्मा


#33. कोणत्या गुप्त राजाला 'कविराज' म्हटले जाते? - समुद्रगुप्त


#34. अकबराच्या इतिहासकारांपैकी अकबर यांना इस्लामचा शत्रू कोणी म्हटले होते? - बदायूनी


#35. भक्तीला तत्वज्ञानाचा आधार देणारे पहिले आचार्य कोण होते? - शंकराचार्य


#36. कोणत्या नगराला 'शिराजे हिंद' म्हटले जाते? - जौनपूर


#37. चालुक्य घराण्याचा सर्वात प्रसिद्ध शासक कोण होता? - पुलकेशिन दुसरा


#38. मुहम्मद घोरीने 1192 A.D. मध्ये ताराईनच्या दुसर्‍या युद्धात कोणत्या राजाचा पराभव केला होता? - पृथ्वीराज चौहान


#39. भारतीयांचा रेशीम मार्ग कोणी सुरू केला? - कनिष्क


#40 'गुलरुखी' म्हणून कोणाला ओळखले जात असे? - सिकन्दर लोदी


#41. भारतात ब्रिटीशांचे वर्चस्व प्रस्थापित करणारे युद्ध कोणते होते? - प्लासीचे युद्ध


#42. जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर कोण होते? - महावीर


#43.   'सत्यमेव जयते' हा शब्द कोठून घेतला आहे? - मुंडकोपनिषद


#44. भारतात प्रथम सोन्याच्या चलनांची सुरूवात कोणी केली? - इंडो-बॅक्ट्रियन


#45. जहांगीरच्या दरबारात पक्ष्यांचे सर्वात मोठे चित्रकार कोण होते? - मन्सूर

लॉर्ड कर्झन (1899 - 1905).


●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय.... 


●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.


●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.


●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core  ची स्थापना केली.


●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.


●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.

 

●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली. 


●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.


●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.


●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली. 


●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला. 


●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.

 

●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.

 

●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली. 


●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली. 


●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.


●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. 


● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.


●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.


●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते. 


●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.


●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित  'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.


●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा  दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.

मुघल साम्राज्य TRICK


⚔️🛡 मघल साम्राज्य सुरवात हे पानिपत युद्धापासून  झाली


⚔️🛡 बाबर(1526 -1530)

   मुघल साम्राज्याचा पहिला राजा  याचे वडील फरगणा(ताशकंद) चे शासक होते ताशकंद हे आताच्या उजबेकिस्तान ची राजधानी आहे


   ⚔️🛡वाडीलानंतर बाबर हा शासक बनला त्याने भारतावर 5 आक्रमण केली 

   

⚔️🛡 21एप्रिल 1526 इब्राहिम लोधी vs बाबर असे पानीपत पहीले युद्ध झाले यामध्ये बाबर ने लोधी चा पराभव  केला आणि भारतात मुघल साम्राज्य सुरवात झाली.


⚔️🛡हुमायून - बाबर चा मुलगा शासक बनला.


⚔️🛡 अकबर(1556 1605)- हुमायून चा मोठा मुलगा याच्या वेळी दुसरे पानिपत युद्ध झाले मोहमद अली सहा आणि अकबर(14 वर्षे वय) मध्ये अकबर ने जिंकले.


⚔️🛡जहांगीर (1605-1627)अकबर मृत्यू नंतर  त्याने बांगला चे फारशी शेक अफगाण यांच्या विधवा पत्नी सोबत विवाह केला


⚔️🛡शाहजहान-  जहांगीर पुत्र


⚔️🛡पत्नी अंजुमन बानो(मुमताज) मृत्यू नंतर ताजमहाल ची निर्मिती केली(20 वर्षे)


⚔️🛡तयाने दख्खन 4 प्रांत निर्माण केले   ...1) खानदेश 2)बेरार 3)तेलंगाणा 4)दोलताबाद  आणि दख्खन शाशक म्हणून पुत्र औरंगजेब ला नेमले.


⚔️🛡औरंगजेब(1658-1707)

या काळातच शिवाजीमहाराज यांनी स्वतंत्र राज्य निर्माण केले 


⚔️🛡डान्स, दारू ,गाणे यावर त्याने बंदी घातली.


⚔️🛡बहादुर शहा जाफर(1707-1712)

वय 70 वर्षे होते यामुळेच शासन करणे जमले नाही आणि यापासून मुगल साम्राज्य लयास जाऊ लागले 


⚔️🛡Trick - भाईसाब (BHAISAB)🛡⚔️

 

    🏝 "I "बद्दल फ़क्त "J "हे अक्षर वापरा🏝

राणी लक्ष्मीबाई


महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर
टोपणनाव:मनू
जन्म:नोव्हेंबर १९, इ.स. १८३५
काशी, भारत
मृत्यू:जून १७, इ.स. १८५८
झाशी, मध्य प्रदेश
चळवळ:१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध
प्रमुख स्मारके:ग्वाल्हेर
धर्म:हिंदू
वडील:मोरोपंत तांबे
आई:भागीरथीबाई तांबे
पती:गंगाधरराव नेवाळकर
अपत्ये:दामोदर (दत्तकपुत्र)

लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.

बालपण

लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.

व्यक्तिमत्त्व

धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.

वैवाहिक जीवन

इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.

दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.

गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.

झाशी संस्थान खालसा

पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.

परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.

झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.

इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध

इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकार
सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.

अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.

दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.

उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.

शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.

राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’

या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

अलंकारिक शब्द


🌷 अकरावा रूद्र : अतिशय तापट माणूस


🌷 अकलेचा कांदा : मूर्ख


🌷 अरण्य पंडित : मूर्ख मनुष्य


🌷 अरण्यरुदन : ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार


🌷 अष्टपैलू  : अनेक चांगले गुण असलेला


🌷 अळवावरचे पाणी : फार काळ न टिकणारे


🌷 अक्षरशत्रू : निरक्षर माणूस


🌷 अडीपिल्ली : गुप्त गोष्ट


🌷 अधेर नगरी : अव्यव्स्तीत पानाचा कारभार


🌷 ओनामा : एखाद्या गोष्टीची सुरवात


🌷 उटावरचा शहाणा : मूर्खपणाचा सल्ला देणारा


🌷 उबराचे फुल : अगदी दुर्मिळ वस्तू


🌷 कर्णाचा अवतार : उदार माणूस


🌷 कळसूत्री बाहुले : दुसऱ्याच्या तंत्राने चालणारा


🌷 कळीचा नारद : भांडण लाऊन देणारा


🌷 काडी पहिलवान : हडकुळा माणूस


🌷 कभकर्ण : झोपाळू माणूस


🌷 कपमंडूक : संकुचित वृत्तीचा 


🌷 ककयी/मन्थरा : द्रुष्ट स्री


🌷 कोल्हेकुई : लोकांची वटवट : खडाजंगी


🌷 खडास्टक : भांडण


🌷 खशालचंद : अतिशय चैनखोर


🌷 खटराची पूजा : अपशब्दाने खरडपट्टी काढणे


🌷 गप्पीदास : थापा गप्पा मारणारा


🌷 गर्भश्रीमंत : जन्मापासून श्रीमंत


🌷 गगा यमुना : अश्रू


🌷 गडांतर : भीतीदायक संकट


🌷 गाजर पारखी : कसलीही पारख नसलेला, मूर्ख 


🌷 गाढव : बेअकली माणूस


🌷 गरुकिल्ली : मर्म, रहस्य


🌷 गळाचा गणपती : मंद बुद्धीचा


🌷 गोकुळ : मुलाबाळांनी भरलेले घर


🌷 गोगलगाय : गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य


🌷 घरकोंबडा : घराबाहेर न पडणारा


🌷 घोरपड : चिकाटी धरणारा


🌷 चरपट पंजिरी : निरर्थक बडबड


🌷 चालता काळ : वैभवाचा काळ


🌷चौदावे रत्न : मार


🌷 छत्तीसचा आकडा : शत्रूत्व


🌷 जमदग्नीचा अवतार : रागीट माणूस


🌷 टोळभैरव : नासाडी करीत फिरणारे


🌷 ताटाखालचे मांजर : दुसऱ्याच्या अंकित असणारा


🌷 थडा फराळ : उपवास


🌷 दगडावरची रेघ : कधीही न बदलणारे


🌷 दपारची सावली : अल्पकाळ टिकनारे


🌷 दवमाणूस : साधाभोळा माणूस


🌷 धारवाडी काटा : बिनचूक वजनाचा काटा


🌷 धोपट मार्ग : सरळ मार्ग


🌷 नवकोट नारायण : खूप श्रीमंत


🌷 नदीबैल : मंदबुद्धीचा


🌷 पर्वणी : अतिशय दुर्मिळ योग


🌷 पाताळयंत्री : कारस्तान करणारा


🌷 पांढरा कावळा : निसर्गात नसलेली वस्तू


🌷 पिकले पान : म्हातारा मनुष्य


🌷 बहस्पती : बुद्धिमान व्यक्ती


🌷 बोकेसंन्याशी : ढोंगी मनुष्य


🌷 बोलाचीच कढी : केवळ शाब्दिक वचन


🌷 भगीरथ प्रयत्न : आटोकाट प्रयत्न


🌷 भाकड कथा : बाष्कळ गोष्टी


🌷 भिष्मप्रतिज्ञा : कठीण प्रतिज्ञा


🌷 मायेचा पूत : पराक्रमी माणूस / मायाळू 


🌷 मारुतीचे शेपूट : लांबत जाणारे काम


🌷 मगजळ : केवळ आभास


🌷 मषपात्र : बावळट मनुष्य


🌷 लबकर्ण : बेअकली / बेअकल


🌷 वाटण्याच्या अक्षता : नकार


🌷 वाहती गंगा : आलेली संधी


🌷 शकुनी मामा : कपटी मनुष्य


🌷 सिकंदर : भाग्यवान


🌷 सिकंदर नशीब : फार मोठे नशीब


🌷 शदाड शिपाई : भित्रा मनुष्य


🌷 शरीगणेशा : आरंभ करणे


🌷 सव्यसाची : डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य


🌷 समशान वैराग्य : तात्कालिक वैराग्य


🌷 सांबाचा अवतार : अत्यंत भोळा मनुष्य


🌷 सळावरची पोळी : जीव धोक्यात घालण्यासारखे काम


🌷 सर्यवंशी : उशिरा उठणारा


🌷 सोन्याचे दिवस : चांगले दिवस


🌷 रामबाण औषध : अचूक गुणकारी 

महाराष्ट्रातील खडक प्रणाली



अ. आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.

ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.


ब. धारवाड खडक :

या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.

पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.

पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.


क. कडप्पा श्रेणींचा खडक :

महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.

कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.


ड. विंध्ययन खडक :

विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.

हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.


इ.गोंडवना खडक :

अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.

खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.

कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.

त्याला ‘गोंडवना खडक‘ असे म्हणतात.

चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.

जिल्हाधिकारी 🎯

निवड :-- upsc 

नेमणूक :-- राज्यशासन

1) म. हा.  जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 7 नुसार   प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्लाधिकाऱ्याची तरतूद आहे.

2) वोरेन हेस्टिंग्स  यांनी 1792 मध्ये या पदाची निर्मिती केली.

3) जिल्हाधिकारी हा भारतीय प्रशासन सेवेतील  IAS  अधिकारी असतो.

4) जिल्हाधिकारी हा नियोजन व विकास मंडळाचा सचिव असतो.

5) शान्तता व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून जिल्हादंडाधिकारी म्हणून काम पाहतो.

6) जिल्ह्यातील निवडणूक अधिकारी या नात्याने जिल्ह्यातील जनगणना व मतदान याद्या बनविणे.

7) दुष्काळ व अवर्षण काळात सरकारच्या परवानगीने शेतसारा माफ करणे.

8) जिल्हास्तरावर स्वस्त धान्याची दुकानें उघडण्यास परवानगी देणे.

9) जिल्हा आमसभेच्या सचिव असतो.

ग्रामसेवक / सचिव.



🅾️निवड : जिल्हा निवडमंडळाकडून केली जाते.

🅾️नमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी

🅾️नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी

🅾️कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा

🧩कामे :

1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.

2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे

3. कर्मचार्‍यांवर नियंत्रण ठेवणे.

4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.

5. व्हिलेज फंड सांभाळणे.

6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.

7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.

8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.

9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.

🧩गरामपंचातीची कामे व विषय :

1. कृषी

2. समाज कल्याण

3. जलसिंचन

4. ग्राम संरक्षण

5. इमारत व दळणवळण

6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा

7. सामान्य प्रशासन

🅾️गरामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.

🅾️बठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)

🅾️सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.

🅾️अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच

🅾️गरामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.

राजकीय भूगोल

राजकीय भूगोल

✔️महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्रफळाचे जिल्हे :-
       १) अहमदनगर -17048चौ.किमी
       २) पुणे    - 15663चौ.किमी
       ३) नाशिक    - 15530चौ.किमी
       ४) सोलापूर    - 14895चौ.किमी
       ५) गडचिरोली  - 14412चौ.किमी

Tricks:- "आपुन सोला गडी खेळू कबड्डी"

✔️ महाराष्ट्रातील सर्वात कमी क्षेत्रफळाचे जिल्हे:-
         1) मुंबई शहर  - 157चौकिमी
         2) मुंबई उपनगर - 446चौ.किमी
         3) भंडारा  - 3896चौ.किमी
         4) ठाणे   - 4214चौ.किमी
         5) हिंगोली   -  4524चौ.किमी



महत्त्वाचे विविध ऑपरेशन

❇️ऑपरेशन नमस्ते:-

✍कोरोनाचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कराने सुरू केले.

❇️ऑपरेशन मिशन सागर:-

✍विविध देशांना वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारताने सुरू केले.

❇️ऑपरेशन शिल्ड:-

✍कोरोना चा सामना करण्यासाठी दिल्ली सरकारने सुरू केले.

❇️ऑपरेशन समुद्र सेतू:-

✍इतर देशात अडकलेल्या भारतीयांना आणण्यासाठी नौदलने सुरू केले.

❇️ऑपरेशन संजीवनी:-

✍मालदीव ला वैद्यकीय साहित्य पुरवण्यासाठी भारतीय हवाई दलने सुरू केले.

❇️ऑपरेशन क्रॅकडाऊन 2:-

✍गुन्हेगार ची झाडाझडती घेण्यासाठी नागपूर पोलिसांनी सुरू केले.

❇️ऑपरेशन ब्लॅक फेस:-

✍चाईल्ड पोर्नोग्राफी वर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सुरू केले.

❇️ऑपरेशन मुस्कान:-

✍अपहरण झालेल्या मुलांना शोधण्यासाठी पालघर पोलिसांनी सुरू केले.



महाराष्ट्रातील पंचायतराज

 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

 कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
  - स्थानिक स्वराज्य संस्था

  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
  -  2 ऑक्टोबर 1953

 बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
  - 16 जानेवारी 1957

 बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
  - वसंतराव नाईक समिती

 वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
  - 27 जून 1960

  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
  - महसूल मंत्री

 वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
  - 226

 वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
  - जिल्हा परिषद

 पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

 महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
   - 1  मे 1962

 ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

 महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
  -  7 ते 17

 ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
  - जिल्हाधिकारी

 ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
  - जिल्हाधिकारी

 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
  - 5 वर्षे

 ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
  - पहिल्या सभेपासून

 ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
  - तहसीलदार

 सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
  - विभागीय आयुक्त

 उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - सरपंच

 सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

 पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - दोन तृतीयांश (2/3)

 महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
  - तीन चतुर्थांश (3/4)

 पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - पंचायत समिती सभापती

 पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

 जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - संबंधित विषय समिती सभापती

 जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - जिल्हा परिषद अध्यक्ष

 जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
  - विभागीय आयुक्त

 कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
  -  ग्रामसेवक

 ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
   - जिल्हा परिषदेचा.

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 150 प्रश्न उत्तरे :-


1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

➡️ नाईल (4,132 मैल)


2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?

➡️ आशिया


3) जगातील सर्वात मोठा देश कोणता आहे?

➡️ रशिया


4) जगातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

➡️ थरी गोर्जस डँम (three gorges dam)


5) जगातील सर्वात मोठ्या आकाराचे फुल कोणते आहे?

➡️ राफलेशिया अर्नोल्डिया (Rafflesia Arnoldia)


6) जगातील सर्वात मोठे बेट कोणते आहे?

➡️ गरीनलँड (Greenland)


7) जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे?

➡️ अटार्टिक ब्ल्यू व्हेल (Antartic Blue Whale)


8) जगातील सर्वात उंच पर्वत कोणता आहे?

➡️ माउंट एव्हरेस्ट


9) सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण कोणते आहे?

➡️ मौसीमराम


10) जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण आहे?

➡️ जफ बेझोस


11) जगातील सर्वात महागडी गाडी कोणती आहे?

➡️ बगाटी ला व्हॉइचर नॉइर (Bugatti La Voiture Noire)


12) जगातील सर्वात उंच बिल्डिंग कोणती आहे?

➡️ बर्ज खलिफा


13) जगातील सर्वात लहान देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी


14) पृथ्वीवर एकूण किती महासागर आहे? 

➡️ 5


15) जगातील सर्वात मोठी कंपनी कोणती आहे?

➡️ वॉल-मार्ट


16) जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता आहे?

➡️ कतार


17) जगातील सर्वात गरीब देश कोणता आहे?

➡️ कांगो


18) जगातील सर्वात मोठा धबधबा कोणता आहे? 

➡️ एजल फॉल्स


19) जगातील सर्वात जलद धावणारी रेल्वे कोणती आहे?

➡️ जपानमधील बुलेट ट्रेन


20) जगातील सर्वात कमी लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

➡️ वहॅटिकन सिटी (लोकसंख्या 1000)


21 जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश कोणता आहे?

➡️ चीन


22) जगातील सर्वात विषारी साप कोणता आहे? 

➡️ इनलंड ताईपान


23) आकाशगंगेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

➡️ गरु


24) आकाशगंगेतील सर्वात लहान ग्रह कोणता आहे?

➡️ बध


25) वर्षातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?

➡️ 21 जून


26) वर्षातील सर्वात लहान दिवस कोणता आहे?

➡️ 22 डिसेंबर


27) जगातील सर्वात मोठा समुद्र कोणता आहे?

➡️ पसिफिक समुद्र


28) जगातील सर्वात लहान समुद्र कोणता आहे?

➡️ आर्टिक समुद्र


29) जगातील सर्वात लहान पक्षी कोणता आहे?

➡️ बी हमिंग बर्ड


30) जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता आहे?

➡️ शहामृग


31) चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती कोण?

➡️ नील आर्मस्ट्रॉंग


32) विमानाचा शोध कोणी लावला?

➡️ राईट बंधू


33) अस्तित्वात असलेला जगातील सर्वात प्राचीन धर्म?

➡️ सनातन धर्म


34) जगात सर्वात आधी परमाणु हमला झालेले नगर कोणते?

➡️ हिरोशिमा


35) जगातील प्रथम महिला प्रधानमंत्री कोण?

➡️ एस. भंडारनायके (लंका)


36) जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले शहर कोणते आहे?

➡️ टोकियो


37) जगातील सर्वात मोठे महाकाव्य कोणते आहे?

➡️ महाभारत


38) सर्वात जास्त विकला जाणारे इंग्रजी वर्तमानपत्र कोणते आहे?

➡️ द टाइम्स ऑफ इंडिया


39) जगातील सर्वात लांब भुयार कोणते आहे?

➡️ नार्वे सुरंग


40) जगातील सर्वात मोठी भिंत कोणती आहे?

➡️ गरेट वॉल ऑफ चीन


41) पुस्तक मुद्रित करणारा पहिला देश कोणता?

➡️ चीन


42) स्वतंत्र भारताचे प्रथम पंतप्रधान कोण होते?

➡️ पडित जवहरलाल नेहरू


43) जगातील सर्वात जुने लोकतंत्र कोणते आहे?

➡️ यनायटेड स्टेट ऑफ अमेरिका


44) भारतावर आक्रमण करणारा पहिला युरोपियन शासक कोण?

➡️ सिकंदर


45) हडप्पा संस्कृतीचा शोध कोणी लावला?

➡️ दयाराम साहनी


46) शीख धर्माचे शेवटचे गुरु कोण होते?

➡️ गरुगोविंद सिंग


47) भारताची प्रथम महिला शासक कोण होती?

➡️ रझिया सुलतान


48) भारतातील सर्वात पहिला चित्रपट कोणता?

➡️ राजा हरिश्चंद्र


49) भारतातील सर्वात प्रथम रंगीत चित्रपट कोणता?

➡️ झाशीची राणी


50) भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोणी केली होती?

➡️ लॉर्ड मेकॉले


1) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?

उत्तर -- सावित्रीबाई फुले 

-------------------------------------------------

2) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)

-------------------------------------------------

3) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?

उत्तर -- आनंदीबाई जोशी 

-------------------------------------------------

4) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?

उत्तर -- लता मंगेशकर 

------------------------------------------------

5) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

-------------------------------------------------

6) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?

उत्तर -- प्रतिभाताई पाटील 

------------------------------------------------

7) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?

उत्तर -- कल्पना चावला

------------------------------------------------

8) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- इंदिरा गांधी 

------------------------------------------------

9) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?

उत्तर -- बचेंद्री पाल 

------------------------------------------------


10) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?

उत्तर -- मीरा कुमार 

------------------------------------------------

11) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?

उत्तर -- किरण बेदी 

-----------------------------------------------

12) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?

उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी 

------------------------------------------------

13) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?

उत्तर -- प्रेमा माथूर

------------------------------------------------

14) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?

उत्तर -- पी. टी. उषा 

------------------------------------------------

15) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?

उत्तर -- नेमबाजी 

------------------------------------------------

16) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?

उत्तर -- सुश्मिता सेन 

------------------------------------------------

17)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?

उत्तर -- मदर तेरेसा

------------------------------------------------

18) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बॅडमिंटन

-----------------------------------------------

19) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?

उत्तर -- लाॅन टेनिस 

-----------------------------------------------

20) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर -- बाॅक्सिंग 

-------------------------------------------------


21) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- तिरंदाजी 

-------------------------------------------------

22) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- जलतरण

-------------------------------------------------

23) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- बुध्दिबळ 

-------------------------------------------------

24) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

उत्तर -- वेट लिफ्टिंग 

-------------------------------------------------

25) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?

उत्तर -- अनुताई वाघ...



◆ ----------- यांनी  'सेंट्रल हिंदू कॉलेज' ची स्थापना  केली.

     - ॲनी बेझंट

       

◆ ------ हा देशातील भारतरत्‍न नंतरचा दुसर्‍या क्रमांकाचा नागरी पुरस्कार आहे.

  - पद्‍म विभूषण


◆ 1920 मध्ये भरलेल्या अस्पृश्य परिषदेचे अध्यक्ष पद ------ ह्यांनी भूषविले. 

    - राजर्षी शाहू महाराज


◆ इला भट्ट ह्या गांधीवादी समाज सेविका 1972 साली स्थापन्यात आलेल्या कोणत्या गैर-सरकारी संस्था (NGO) च्या संस्थापक आहेत❓ 

    - सेवा

 

◆ शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

   - औरंगाबाद


◆ जेट विमानाच्या उड्डाणाला न्यूटनचा गति विषयक  नियम लागू होतो❓

     - तिसरा


◆  दुधात  -------  ह्या घटकाचे प्रमाण सर्वाधिक असते.

   - शर्करा


◆ अति प्रचंड खजिन्या मुळे चर्चेत आलेले पद्‍मनाभ स्वामी मंदिर कोणत्या राज्यात आहे❓

    - केरळ


◆ राज्य घटना दुरुस्तीची पद्धती कोणत्या कलमा मध्ये स्पष्ट करण्यात आली आहे❓

      - 368


◆ गावातील कोतवालांची संख्या कशावरून ठरवली जाते❓

    - लोकसंख्या


◆ गोपाळ गणेश आगरकर हे पंडिता रमाबाई यांच्या ------  ह्या संस्थेचे शुभचिंतक होते. 

    - शारदा सदन

 

◆ अतिरिक्त मद्यपानाने  ------- ची कमतरता जाणवते.

   - थायामिन


◆ हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे❓

    - रांची


◆ फेकरी कोणत्या हा औष्णिक विद्युतप्रकल्प जिल्ह्यात आहे? 

     - जळगाव


◆ ------ हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे.

     - संगमरवर


◆ 1917 व 1934 च्या दरम्यान महात्मा गांधी मुंबईत कोठे रहात असत? 

    - मणि भवन

 

◆ भारतीय नौसेनेच्या प्रथम एअर स्टेशनचे नाव काय होते?

    - आयएनएस गरुड


◆ कॉम्प्यूटरच्या भाषेत एसडीआरएएम चा विस्तार काय आहे❓

    - सिंक्रोनस डायनॅमिक रॅम

 

◆ मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत❓

     - लक्षद्वीप


◆ कॉम्प्यूटरच्या भाषेत एस.एल.आय.पी. (स्लिप) चा विस्तार काय आहे❓

    - सिरीअल लाइन इंटरनेट प्रोटोकॉल

 

◆ भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे❓

      - १२ लाख चौ.कि.मी.


◆ नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार -----

      - दख्खनचे पठार


◆ महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे❓

     - मध्य प्रदेश


◆ महाराष्ट्राच्या ------  कडे सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत.

   - उत्तरे

 

◆ परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला ___ म्हणतात. 

    - निर्मळ रांग

 

◆ 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते? 

     - नदीचे अपघर्षण


◆  लोहखनिजाचे साठे विदर्भात कोठे आढळत नाहीत❓

    - किन्हाळा


◆ दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे❓

   - Lignite


◆ बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते❓

    - औरंगाबाद

 

◆ Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो❓

   - पाचगणी


Q1.अकबराने बांधलेल्या उपासनागृहाचे नाव काय होते?

उत्तर :- इबादत खाना


Q2.खालीलपैकी कोणत्या समितीचे वर्णन अंदाज समितीची ‘जुळी बहीण’ म्हणून केले जाते?

उत्तर :- लोकलेखा समिती


Q3.भारतात प्रच्छन्न बेरोजगारी कोणत्या क्षेत्रात अस्तित्वात आहे?

उत्तर :- कृषी क्षेत्र


Q4.भारतात ‘उन्हाळी मान्सून’ पाऊस कोठे पडतो?

उत्तर :- पश्चिम किनारा


Q5.परिसंस्थेतील घटकांच्या चक्राला_असे म्हणतात.

उत्तर :- जैव-रासायनिक चक्र


Q6.‘गरिबी हटाव’चा नारा कोणत्या पंचवार्षिक योजनेत देण्यात आला होता?

उत्तर :- चौथी योजना


Q7. इकोलॉजिकल कोनाडा ही संकल्पना पहिल्यांदा कोणामार्फत मांडण्यात आली?

उत्तर :- जे. ग्रिनेल


Q8.काश्मिर हरिण आढळणारे एकमेव अभयारण्य कोणते आहे?

उत्तर :- दाचीगम


Q9.इको-मार्क हे कोणत्या प्रकारच्या भारतीय उत्पादनांना दिले जातात?

उत्तर :- पर्यावरणास अनुकूल


Q10.राष्ट्रपतीपदाची रिक्त जागा किती महिन्यात भरली जाणे आवश्यक आहे?

उत्तर :- 6 महिने

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

Note - हे प्रश्न तुम्हाला आगामी होणाऱ्या पोलिस भरती मध्ये नक्की दिसतील .

सराव प्रश्नमालिका ( स्पेशल पोलीस भरती )


1. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मतानुसार --------- हा मूलभूत हक्क भारताच्या संविधानाचा आत्मा आहे 

समानतेचा हक्क

स्वातंत्र्याचा हक्क

घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क

धार्मिक स्वांत्र्याचा हक्क


● उत्तर - घटनात्मक न्यायालयीन दाद मागण्याचा हक्क


2. कोणत्या घटना दुरुतीनुसार संविधानामध्ये मुलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?

३२ साव्या

३९ साव्या

४२ साव्या

४४ साव्या


● उत्तर - ४२ साव्या


3. राष्ट्रपतील त्याच्या पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया वापरली जाते?

महाभियोग

पदच्युत

अविश्र्वास ठराव

निलंबन


● उत्तर - महाभियोग


4. राज्यपाल या पदासाठी आवश्यक किमान वयोमर्यादा किती वर्षाची असते?

३०

२५

४०

३५


● उत्तर - ३५


5. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विकासाकरिता घटनेतील महत्वाची तरतूद कोणती?

मार्गदर्शक तत्वे

शिक्षण

पैसा

मुलभूत हक्क


● उत्तर - मुलभूत हक्क


6. मुलभूत हक्कावर गदा आल्यास प्रथम कोठे दाद मागता येथे?

दिवाणी न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

उच्च न्यायालय

फौजदारी न्यायालस


● उत्तर - सर्वोच्च न्यायालय


7. राष्ट्रपतीवर महाभियोग खटला कोठे चालतो?

सर्वोच्च न्यायालयात

फक्त लोकसभेत

फक्त राज्यसभेत

संसदेत


● उत्तर - फक्त राज्यसभेत


8. खालीलपैकी कोणता अधिकार लोकसभेचा महत्वाचा अधिकार मानला जातो?

अर्थविधेयक मंजूर करणे

सामान्य विधेयक मंजूर करणे

मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे

राष्ट्रपतीच्या निवडणूकीत भाग घेणे


● उत्तर - मंत्रीमंडळावर नियंत्रण ठेवणे


9. भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे?

स्वातंत्र्य

समता

न्याय

बंधुभाव


● उत्तर - न्याय


10. महाराष्ट्रच्या विधानपरिषदेची सभासद संख्या किती आहे?

५५

६५

७८

८७


● उत्तर - ७८


.......हा रूपेरी रंगाचा धातू विक्षोभक पद्धतीने पाण्याशी संयोग पावतो .

1) calcium 

2) magnesium

3) जस्त

सोडियम✅




पचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड कीती कार्यकाळासाठि होते.

1) दिड वर्षे 

2) अडिच वर्षे✅

3) पाच वर्षे

4) एक वर्षे


आवर्तसारणीच्या मध्यातील 3 ते 12 गणातील संकरामक मूलद्रव्यांच्या बाह्यतम .....कक्षा अपूर्ण असतात.

1) एक

2) दोन✅

3) तीन

4) चार


सिलिकॉन या मूलद्रव्यांचे वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दांत  समरपक पणे करता येईल.

1) वाहक

2) रोधक

3) अर्धवाहक✅

4) या पैकी नाही


घड्याळातील लंबकाची गती हे गतीच्या कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे.

1) स्थानांतरणीय

2) परिवलन

3) कंपन.✅

4)या पैकी नाही


हअरचे उपकरण कशासाठी वापरता येवू शकते.

1) द्रवाचे तापमान मोजने

2) द्रवाची घनता मोजने✅

3) द्रवाचे वजन मोजने

4) द्रवातील विद्राव्य पदार्थ वेगळे करण्यासाठी


परायोगिक तत्त्वावर भारतात दूरदर्शनची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

1) 1951

2) 1955

3) 1959✅

4) 1965


वास्तव प्रतिमा नेहमी ..........असते.

1) सुलटि

2) कशीही

3) मोठी 

4) यापैकी नाही✅


वस्तू लंबरूप दिशेने फेकल्यास तिच्या दिशा वेगाची दिशा.......

1) बदलते

2) भरकटते

3) बदलत नाही मात्र वेगाचे परिणाम कमी होत जाते.✅

4) निश्चित सांगता येनार नाही


एक वातावरण दाबास पाण्याचे वाफेत रूंपातर झाल्यावर वाफेचे आकारमान हे पाण्याच्या आकारमानापेक्षा सुमारे ......पट असते .

1) 117 पट

2) 1100 पट

3) 1670 पट✅

4) 5000 पट


खालीलपैकी कोणता रंग हा सात रंगाचे मिक्षण मानल्या गेलेल्या पाढंऱ्या रंगाचा घटक होऊ शकत नाही.

1) निळा 

2) काळा✅

3) निळ्या 

4) पिवळ्या


🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹Jp⤵️



गनपावडर चा उल्लेख कोणाच्या साहित्यात सर्वप्रथम आढळला.

🌈🌈🌈🌈🌈

राँजर बेकन


Latest post

चालू घडामोडी :- 13 मे 2024

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे. ◆ कुवेतचे नवे अमीर शे...