27 October 2025

जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

०१) जगात सर्वाधिक वाघ असणारे पहिले तीन देश कोणते ?

- भारत,रशिया,इंडोनेशिया.


०२) कोणत्या संघटनेमार्फत २०२३ हे वर्ष 'आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष' म्हणून घोषित केले आहे ?

- संयुक्त राष्ट्र संघ.


०३) 'कोसलाकार' असे कोणाला संबोधले जाते ?

- डॉ.भालचंद्र नेमाडे.


०४) महाराष्ट्रातील सर्वात लहान किल्ला कोणता ?

- तुंग.


०५) राष्ट्रध्वज केव्हा उतरवतात ?

- सूर्यास्ताच्या वेळी.


०१) अमावस्या व पोर्णिमेला येणार्‍या भरतीस कोणती भरती म्हणतात ?

- उधाणाची भरती.


०२) तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता ?

- निकोटीन.


०३) अवकाशातील तार्‍यांच्या समूहाला काय म्हणतात?

- आकाशगंगा.


०४) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?

- वाघ.


०५) भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता आहे ?

- वड.


०१) भारत देश कोणत्या खंडात आहे ?

- आशिया.


०२) भारताच्या राष्ट्रध्वजात एकूण किती रंगाचे पट्टे आहेत ?

- तीन-केशरी,पांढरा,हिरवा.


०३) राष्ट्रध्वजावरील केशरी रंग कशाचे प्रतिक आहे ?

- त्याग आणि शौर्याचे प्रतिक.


०४) राष्ट्रध्वजावरील पांढऱ्या रंगातून कोणता संदेश मिळतो ?

- शांततेचा.


०५) राष्ट्रध्वजावरील हिरवा रंग कशाचे प्रतिक आहे ?

- समृद्धीचे प्रतिक


०१) हॉकी इंडियाने भारतीय हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी कोणाची नियुक्ती केली आहे ?

- क्रेग फुल्टन,दक्षिण आफ्रिका.


०२) महाराष्ट्रातील कोणत्या संताची पदे 'गुरू ग्रंथसाहेब' या शीख धर्मियांच्या धर्मग्रंथात आहेत ?

- संत नामदेव महाराज. 


०३) जागतिक ध्रुवीय अस्वल दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- २७ फेब्रुवारी.(२०११ पासून)


०४) छत्रपती शिवाजी महाराज कोणता किल्ला जिंकू शकले नाही ?

- जंजिरा किल्ला.


०५) नांदेड जिल्ह्यात एकूण महानगरपालिका किती आहेत ?

- एक.


०१) चिल्का हे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे ?

- ओरिसा.


०२) कळसुबाई हे नाव कशाशी संबधित आहे ?

- पर्वत शिखर.


०३) ज्वारीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?

- प्रथम.


०४) चंदनाचे सर्वाधिक उत्पादन कोठे होते ?

- कर्नाटक.


०५) सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे ?

- नर्मदा.


०१) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ?

- रवींद्रनाथ टागोर.


०२) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ?

- मोर.


०३) शीखांचा मुख्य सण कोणता ?

- बैसाखी.


०४) कोणत्या महापुरुषाला ‘लोहपुरुष’ म्हणतात ?

- सरदार पटेल.


०५) आंतरराष्ट्रीय महिला दिन कधी साजरा केला जातो ?

- ८ मार्च.


०१)भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?

- कमळ.


०२)भारताचा राष्ट्रीय जलचर कोणता आहे ?

- डॉल्फिन.


०३) भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?

 - आंबा.


०४) भारताच्या राष्ट्रध्वजाच्या लांबी आणि रुंदीचे गुणोत्तर किती आहे ?

- ३:२


०५) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे ?

- हॉकी.


०१) भारतातील पहिला अंतराळवीर कोण ?

- राकेश शर्मा.


०२) अवकाशयात्री पहिली महिला कोण ?

- कल्पना चावला.


०३) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा कोठे घेतली ?

- नागपूर.


०४) भारतातील पहिली महिला राष्ट्रपती कोण ?

- प्रतिभाताई पाटील.


०५) महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे ?

- ९.७ %


०१) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला ?

- जॉन लोगी बेअर्ड.


०२) भारताची पहिली महिला शासिका कोण होती ?

- रजिया सुलताना.


०३) "अग्निपंख" ( Wings of Fire ) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

- डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम.


०४) जलग्रह असे कोणत्या ग्रहास म्हटले जाते ?

- पृथ्वी.


०५) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात ?

- कल्ले.


०१) दोन स्वर मिळून तयार होणाऱ्या स्वराला काय म्हणतात ?

- संयुक्त स्वर.


०२) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ कोणी यांनी लिहिला आहे?

- गागाभट्ट.


०३) महाराष्ट्रातील मिठागरांचा जिल्हा असे कोणत्या जिल्ह्यास म्हणतात ?

- रायगड.


०४) सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ?

- अल्बर्ट आईन्स्टाईन.


०५) 'शाकुंतल' हे प्रसिद्ध नाटक कोणी लिहिले ?

- कालिदास.


०१) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो ?

- ८ मिनिटे २० सेकंद.


०२) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढऱ्या पेशी.


०३) गायत्री मंत्र कोणत्या ग्रंथात लिहिलेला आहे ?

- ऋग्वेद.


०४) 'पंजाब केसरी' म्हणून कोणाला ओळखले जाते ?

- लाला लजपतराय.


०५) सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता ?

- बुध.


०१) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन कधी असतो ?

- ६ डिसेंबर.


०२) सातही खंडातील सर्वोच्च पर्वत शिखरे सर करणारी पहिली भारतीय महिला कोण.

- प्रेमलता अग्रवाल.


०३) सर्वात जास्त सौर ऊर्जेचा उत्पादन करणारा देश कोणता ?

- जर्मनी.


०४)डायनामाइट चा शोध कोण लावला.

 - अल्फ्रेड नोबेल.


०५) शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते?

- छोटा मेंदू.


०१)भारताचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते ?

- मौलाना अबुल कलाम आझाद.


०२) महाराष्ट्रातील पहिला १००% साक्षर जिल्हा कोणता आहे?

- सिंधुदुर्ग.


०३)भारतातील पहिले नोबेल पारितोषिक विजेते कोण आहेत ?

- रवींद्रनाथ टागोर.


०४) जय जवान, जय किसान, जय विज्ञान हा नारा कोणी दिला ?

- अटलबिहारी वाजपेयी.


०५) माउंट एव्हरेस्ट चढणाऱ्या भारतातील पहिल्या महिलेचे नाव?

- बचेंद्री पाल.


०१) मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केले ?

- डॉ.बाबासाहेब आंबेडकर.


०२) प्रसिद्ध कैलास लेणी कोठे आहे ?

- वेरूळ.


०३) दातांच्या आवरणात सापडणारे क्षार कोणते ?

- फ्लोरिन.


०४) भारतातील सर्वात मोठा खत कारखाना कोठे आहे ?

- सिंद्री.


०५) सर्वात जास्त भूकंप कोणत्या देशात होतात ?

- जपान.


०१) सूर्यापासून सर्वांत जवळ असलेला ग्रह कोणता ?

- बुध.


०२) दौलताबाद किल्ला एकेकाळी कोणत्या नावाने ओळखला जायचा ?

- देवगिरी.


०३) कोणत्या ग्रहाला लाल ग्रह असेही संबोधतात.?

- मंगळ.


०४) पृथ्वीवरून चंद्राचा जास्तीत जास्त किती टक्के भाग दिसतो ?

- ५९ टक्के.


०५) चंद्र दररोज किती मिनिटे उशिरा उगवतो ?

- ५० मिनिटे.


०१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात ?

- पांढऱ्या पेशी.


०२) राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो ?

- १२ जानेवारी.


०३) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?

- टंगस्टन.


०४) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?

- न्यूटन.


०५) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?

- यकृत.


०१) 'राष्ट्रीय विज्ञान दिन' केव्हा साजरा केला जातो ?

- २८ फेब्रुवारी.


०२) "काव्यफुले" हा ग्रंथ कोणी लिहला ?

- सावित्रीबाई फुले.


०३) संत गाडगेबाबा यांचा जन्म कोठे झाला ?

- शेंडगाव,जि.अमरावती.


०४) विद्यार्थ्यांसाठी कमवा व शिका ही योजना कोणी सुरू केली ?

- कर्मवीर भाऊराव पाटील.


०५) कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या वडिलांचे नाव काय होते ?

- पायगोंडा पाटील.


०१) ऑलिम्पिक मध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण ?

- करनाम मल्लेश्वरी.


०२) जय जवान,जय किसान हा नारा कोणी दिला ?

- लालबहादूर शास्त्री.


०३) अणुऊर्जा आयोगाची स्थापना कोणी केली ?

- पंडित जवाहरलाल नेहरु.


०४) आर्यभट्ट हा भारतीय उपग्रह कधी सोडण्यात आला ?

- १९७५.


०५) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

- डॉ.होमी भाभा.


०१) बॉर्डर - गावस्कर कसोटी चषक २०२३ भारताने किती फरकाने जिंकला ?

- २ - १ ने.


०२) ऑस्कर पुरस्कार २०२३ प्राप्त सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ?

- एव्हरीथिंग एव्हरीव्हेअर ऑल एट वन्स.


०३) कोणत्या राज्याने अलीकडे ५४ वर्षांनी संतोष ट्रॉफी जिंकली आहे ? 

- कर्नाटक.


०४) तांदूळ उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो ?

- दुसरा.


०५) मेघालय राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत ?

- कोनराड संगमा.


०१) भारत पाकिस्तान या दोन देशात संघर्ष सोडवण्यासाठी १९६६ ला जो करार झाला त्याला कोणता करार म्हणतात ?

- ताश्कंद करार.


०२)भारतात राष्ट्रीय आणीबाणी चा काळ किती वर्ष चालला ?

- दोन वर्ष.(१९७५-१९७७)


०३) लालबहादूर शास्त्री यांचे निधन कधी व कोठे झाले ?

- १९६६,ताश्कंद येथे.


०४) भारताने अणुचाचण्या कोठे केल्या ?

- पोखरण,जि.जैसलमेर राजस्थान.


०५) 'इन्कलाब जिंदाबाद' चा अर्थ काय होतो ?

- क्रांती अमर रहे.


०१)भारतातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत ?

- पाच.


०२) पृथ्वी पेक्षा सूर्य किती पटीने मोठा आहे?

- १३.(तेरा)


०३) अंदमान निकोबार ही बेटे कोणत्या समुद्रात आहेत ?

- बंगालचा उपसागर.


०४) भारतातील सर्वात जास्त लांबीचे धरण कोणते ?

- हिराकुंड.


०५) मानवाने सर्वप्रथम वापरलेला पहिला धातू कोणता ?

- तांबे.


०१) ' देवी ' या रोगावर परिणामकारक लस कोणी शोधून काढली ?

- एडविन जेन्नर.


०२) सर्वसामान्य प्रौढ व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात ?

- ७२.


०३) मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान किती असते ?

- ३७ अंश सेल्सिअस.


०४) कोणत्या रक्तगटाचे रक्त हे सर्वांना लागू पडते ?

- ओ.( O )


०५) पोलिओ प्रतिबंधक लस कोणी शोधून काढली ?

- साॅल्क जोनास एडवर्ड.


०१) भारत पाकिस्तान या दोन देशात संघर्ष सोडवण्यासाठी १९६६ ला जो करार झाला त्याला कोणता करार म्हणतात ?

- ताश्कंद करार.


०२)भारतात राष्ट्रीय आणीबाणी चा काळ किती वर्ष चालला ?

- दोन वर्ष.(१९७५-१९७७)


०३) लालबहादूर शास्त्री यांचे निधन कधी व कोठे झाले ?

- १९६६,ताश्कंद येथे.


०४) भारताने अणुचाचण्या कोठे केल्या ?

- पोखरण,जि.जैसलमेर राजस्थान.


०५) 'इन्कलाब जिंदाबाद' चा अर्थ काय होतो ?

- क्रांती अमर रहे.


०१) 'बालकवी' हे कोणाचे टोपण नाव आहे ?

- त्र्यंबक बापूजी ठोंबरे.


०२) हॅलेचा धुमकेतू किती वर्षांनंतर परत दिसतो ?

- ७६ वर्षांनी.


०३) वातावरणातील कोणता वायू अतिनील किरणे शोषून घेतो ?

- ओझोन.


०४) वातावरणातील सर्वांत खालच्या थरास काय म्हणतात ?

- तपांबर.


०५) भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे ?

- वाघ.


०१) संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

- आळंदी.


०२) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?

- मुंबई शहर.


०३) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते ?

- जायकवाडी.


०४) 'शक्तीस्थळ' हे कोणाचे समाधी स्थळ आहे ?

- इंदिरा गांधी.


०५) 'उपरा' ही कोणाची कादंबरी आहे ?

 - लक्ष्मण माने.




विषय - भुगोल

✒️विषुववृत्तामुळे पृथ्वीचे *उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध* असे दोन भाग पडतात..


✒️पथ्वीवर आडव्या रेषेने दाखवतात त्याला *अक्षवृत्त* म्हणतात..

एकूण 181 अक्षवृत्त आहेत..


✒️आणि उभ्या रेषेने दाखवितात त्यास *रेखावृत्त* म्हणतात..

ती एकूण 360 आहेत..


✒️शन्य अंशाचे अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त होय..


✒️पथ्वीच्या स्वत: भोवती फिरण्याला परिवलन म्हणतात..


✒️पथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालते, त्यास परिभ्रमण म्हणतात..


✒️पथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते..


✒️नकाशाचे चार प्रकार आहेत..-


१. उद्देशात्मक नकाशा

२. आधारभूत नकाशा

३. क्षेञघनी नकाशा

४. समघनी नकाशा..


✒️नकाशात हिरवा रंग *वनक्षेत्रासाठी* वापरतात..


✒️भारताची प्रमाणवेळ ही 82.30 पूर्व रेखावृत्तावरून ठरते..

हे रेखावृत्त *मिर्झापूर (उ. प्र.)* वरून ठरते..


✒️तपांबर- पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास तपांबर म्हणतात..

याचा विस्तार 13 किमी आहे.. वादळे, ढग, पाऊस इ.ची निर्मिती होते..


✒️ वातावरणातील सर्वात कमी तापमान मध्यांबरात आढळते..


✒️सदेशवहनासाठी *आयनांबर* या थराचा उपयोग होतो..


✒️ *इंदिरा पॉंईट* हे भारताचे सर्वात शेवटचे टोक आहे..


✒️कषेत्रफळाच्या बाबतीत भारताचा जगात *7 वा क्रमांक* आहे..


✒️ मख्य भूमी व सागरी बेटे मिळून भारतास *7517 किमी* लांबीचा सागर किनारा लाभला आहे..


-✒️ भारताच्या वायव्येस पाकिस्तान व आफगाणिस्तान, उत्तरेस- चीन, नेपाळ, भूतान, पूर्वेस- म्यानमार व बांग्लादेश आहेत..


✒️कषेत्रफळाच्या बाबतीत राजस्थान हे भारतातील सर्वात मोठे राज्य आहे..

त्यानंतर मध्यप्रदेश व तिसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो..


✒️गोवा या राज्याचे क्षेत्रफळ सर्वात कमी आहे..


✒️भारताच्या तिन्ही बाजूस पाणी असल्याने त्यास *द्वीपकल्प* म्हणतात..


✒️*कांचनगंगा* हे पूर्व हिमालयातील सर्वात उंच शिखर तर, k2(गॉडवीन ऑस्टीन 8611 मी. ) हे भारतातील सर्वात उंच शिखर आहे..


✒️दक्षिण भारतीय पठारास *दख्खनचे पठार* असे म्हणतात..


✒️अदमान समूहातील *बॅरन बेटावर* भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे..

लक्षात ठेवा

🔸१)पृथ्वीपृष्ठालगत असणाऱ्या वातावरणाच्या थरास .... असे म्हणतात.

-तपांबर


🔹२)तापस्तब्धीच्या वर असलेल्या १३ ते ५० कि. मी. जाडीच्या थरात हवेची हालचाल होत नाही.या थरास कोणते नाव आहे?

-स्थितांबर


🔸३)तपांबराच्या वरच्या भागातील सुमारे ३ कि. मी. जाडीच्या थरात तापमान स्थिर असते. या थरास कोणती संज्ञा आहे ?

- तापस्तब्धी


🔹४) स्थितांबर व आयनांबर यांच्या दरम्यान असलेल्या वातावरणाच्या थरास कोणत्या नावाने ओळखले जाते ?

- मध्यांबर


🔸५) मध्यांबराच्या वर असलेल्या ८० ते ५०० कि. मी. जाडीच्या .... या थराचा संदेशवहनासाठी उपयोग होतो.

- आयनांबर


🔸१) वातावरणातील सर्वांत उंचीवरील .... या थरात हायड्रोजनसारखे हलके वायू आढळतात. 

- बाह्यांवर


🔹२) .... या ग्रहाभोवती असलेल्या विरळ वातावरणात हायड्रोजन, हेलिअम नायट्रोजन व मिथेन हे वायू आढळून आले आहेत.

- गुरू


🔸३) .... या ग्रहांभोवती असलेल्या वातावरणाच्या विरळ थरात कार्बन-डाय-ऑक्साइड या वायूचे अस्तित्व आढळून आले आहे.

- मंगळ व शुक्र


🔹४) सूर्यमालेतील ज्ञात ग्रहांपैकी .... हा सूर्यापासून सर्वाधिक अंतरावर असलेला ग्रह होय. 

- नेपच्यून (वरुण)


🔸५) जर्मन शास्त्रज्ञ.... यांनी 'युरेनस' किंवा 'प्रजापती' या ग्रहाचा शोध लावला.

- सर विल्यम हर्शल


🔸१) २९ मार्च, १८५७ रोजी मंगल पांडे या हिंदी शिपायाने मेजर ह्यूसनवर झाडलेल्या पहिल्या गोळीने क्रांतीची ठिणगी पडली. ही घटना कोठे घडली?

- बराकपूरच्या छावणीत


🔹२) 'बराकपूर' हे ठिकाण सध्याच्या .... या राज्यात येते.

- पश्चिम बंगाल


🔸३) १८ एप्रिल, १८५९ रोजी तात्या टोपेंना .... येथे जाहीररीत्या फाशी दिली गेली.

- शिप्री


🔹४) “If the 'Sindhia' joins the Mutiny, I shall have to pack off tomorrow. " हे उद्गार कोणी काढले होते ?

- लॉर्ड कॅनिंग


🔸५) इस्लाम धर्मतत्त्वात गुलामगिरीला थारा नाही हे स्पष्ट करून देश ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या 'वहाबी' चळवळीचे प्रणेते म्हणजे ....

- सय्यद अहमदवरेलवी


वातावरणाचे थर


 वातावरणाची सरासरी उंची किंवा जाडी १६०० किमी असून भूपृष्ठपासून जसजसे उंच जावे तसतशी वातावरणाची घनता कमी होत जाते.


 वातावरणाचे मुख्य थर 


📌 तपांबर - भूपृष्ठाच्या अगदी नजीकचा वातावरणाचा थर म्हणजे तपांबर होय, याची सरासरी जाडी ११ किमी आहे. या थरात वातावरणातील ७५% घटक आढळून येतात. पाऊस, वारे, ढगनिर्मिती आदी हवामान विषयक या थरात आढळून येतात.


📌 तपस्तधी - तपांबर व स्थितांबर या थरांना अलग करणारा उपथर म्हणजे तपस्तधी होय. उंचीनुसार तापमानात घट होण्याची क्रिया या उपथरात थांबते.


📌 सथितांबर - तपांबरानंतर सुमारे ५० किमी उंचीपर्यंतचा थर म्हणजे स्थितांबर होय. या थरातील वातावरणात पाण्याची वाफ, धूलिकण, नसतात. व हवा शुष्क असते.


📌 सथितस्तबधी - स्थितांबराच्या वरचा सुमारे ३ किमी जाडीचा थर म्हणजे स्थितस्तबधी होय. या थरातील तापमान स्थिर असते. या थरात दोन्ही बाजूना ओझोन वायूचा थर आढळतो. हा वायू सूर्यापासून येणारी अतिनील किरणांचे रक्षण करतो.


📌 मध्यांबर - स्थितस्तबधी नंतर भूपृष्ठापासून सुमारे ८० किमी चा थर म्हणजे मध्यांबर होय. या थरात वाढत्या उंचीनुसार तापमानात घट होते.


📌 मध्यस्तबधी - पृथ्वीच्या वातावरणातील सर्वात कमी नोंद ज्या थरात होते तो थर म्हणजे मध्यस्तबधी होय.


📌 दलांबर - मध्यस्तबधी या थरानंतर अत्यंत विरळ असलेला हवेचा थर म्हणजे दलांबर होय. या थरात उंचीनुसार तापमान वाढते.


📌 आयनांबर - दलांबराच्या नंतरचा थर म्हणजे आयनांबर आहे. या थरात उंचीनुसार तापमान वाढते. या थरातील अतितापमानामुळे हेवेचे कण विद्युतप्रभारित होतात.


📌 बाह्यंबार - आयनांबराच्या वरचा थर म्हणजे बाह्यांम्बर होय. भूपृष्ठापासून ४८० किमी उंचीपासून वरील भागात हा थर पसरलेला आहे. या थरातील विविध वायूंचे अनु, रेणू, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्ष्णातील मुक्त होऊन अंतराळात विलीन होतात.

विज्ञान विषयातील महत्वाची सूत्रे



1. सरासरी चाल = कापलेले एकूण अंतर (s) / लागलेला एकूण वेळ (t)

2. त्वरण = अंतिम वेग (v) - सुरवातीचा वेग (u) / लागलेला वेळ (t)

3. बल = वस्तुमान * त्वरण

4. गतिज ऊर्जा = 1/2mv2

5. स्थितीज ऊर्जा = mgh

6. आरशाचे सूत्र = 1/आरशापासून वस्तूचे अंतर(u) + 1/आरशापासून प्रतिमेचे अंतर(v) = 1/नाभीय अंतर (f) = 2/ वक्रता त्रिजा

7. विशालन (m) = प्रतिमेचा आकार (q) / वस्तूचा आकार (p) = -v/u

8. सममूल्यभार = रेणूवस्तूमान / आम्लारिधर्मता

9. प्रसामान्यता (N) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / ग्रॅम सममूल्यभार * लीटरमधील आकारमान

10. रेणुता (M) = द्रव्याचे ग्रॅम मधील वजन / द्राव्याचे रेणूवस्तूमान * लीटरमधील आकारमान

11. प्रसामान्यता समीकरण = आम्लद्रावणाची प्रसामान्यता * आकारमान = आम्लरी द्रावणाची प्रसामान्यता * आकारमान

12. द्राव्याचे एक लीटर मधील वजन = प्रसामान्यता * ग्रॅम सममूल्यभार

13. दोन बिंदूमधील विभवांतर = कार्य / प्रभार

14. विद्युतधारा = विद्युतप्रभार / काळ

15. वाहनाचा रोध (R) = विभवांतर (V) / विद्युतधारा (I)

16. समुद्राची खोली = ध्वनीचा पाण्यातील वेग * कालावधी / 2

17. ध्वनीचा वेग = अंतर / वेळ

18. पदार्थाने शोषलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील वाढ

19. पदार्थाने गमावलेली उष्णता = पदार्थाचे वस्तुमान * विशिष्ट उष्माधारकता * तापमानातील घट

20. उष्णता विनिमयाचे तत्व = उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता = थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता

21. ओहमचा नियम = I = V / R

22. विद्युतप्रभार = विद्युतधारा * काल

23. कार्य = विभवांतर * विद्युतप्रभार

राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे (DPSP)☑️



कलम 36:
व्याख्या "राज्य" ची व्याख्या (संविधानाच्या भाग 3 प्रमाणे).

कलम 37:
अंमलबजावणी DPSP कायदेशीररित्या बंधनकारक नसली, तरी शासनासाठी मूलभूत आहेत.

कलम 38:
सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय प्रस्थापित करणे, असमानता कमी करणे.

कलम 39:
आर्थिक तत्त्वेसमान उपजीविकेची साधने, संपत्तीचे समान वितरण, लिंग समता, कामगार आणि बालकांचे शोषण टाळणे.

कलम 39A:
मोफत कायदेशीर सहाय्य आर्थिक कमतरतेमुळे कोणालाही न्याय नाकारला जाऊ नये.

कलम 40:
ग्रामपंचायतींची स्थापना ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ग्रामीण स्वराज्याला प्रोत्साहन.

कलम 41:
काम, शिक्षण आणि सामाजिक सहाय्यकाम, शिक्षण आणि बेरोजगारी, वृद्धापकाळ, अपंगत्व यामध्ये सहाय्य प्रदान करणे.

कलम 42:
कामगारांचे संरक्षण कामाच्या न्याय्य आणि मानवीय परिस्थिती, प्रसूती लाभ सुनिश्चित करणे.

कलम 43:
कामगारांना योग्य वेतन आणि जीवनमान सुनिश्चित करणे; कुटीर उद्योगांना प्रोत्साहन.

कलम 43A:
कामगारांचा व्यवस्थापनात सहभाग उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुनिश्चित करणे.

कलम 44:
एकसमान नागरी कायदा सर्व नागरिकांसाठी एकसमान नागरी कायदा लागू करणे.

कलम 45:
बालकांचे शिक्षण 14 वर्षांखालील मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे.

कलम 46:
मागासवर्गीयांचे संरक्षण अनुसूचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीयांचे शैक्षणिक, आर्थिक हितांचे संरक्षण.

कलम 47:
आरोग्य आणि जीवनमान पोषण, जीवनमान आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणे; दारूबंदीला प्रोत्साहन.

कलम 48:
कृषी आणि पशुसंवर्धन शेती आणि पशुसंवर्धनाचे आधुनिकीकरण; गायींचे संरक्षण.

कलम 48A:
पर्यावरण संरक्षण , जंगल आणि वन्यजीवांचे संरक्षण आणि सुधारणा.

कलम 49:
राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या स्मारकांचे संरक्षण.

कलम 50:
न्यायपाल आणि कार्यपाल यांचे विभक्तीकरण लोकसेवा व्यवस्थेत न्यायपाल आणि कार्यपाल यांचे विभक्तीकरण.

कलम 51:
आंतरराष्ट्रीय शांतता आणि सहकार्य आंतरराष्ट्रीय शांतता, मैत्री आणि कायद्याचा आदर वाढवणे.
➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️➖️

पंचायत_समिती



पंचायत समितीबद्दल संपूर्ण माहिती:


महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, कलम क्र. 56 नुसार प्रत्येक तालुक्यासाठी एक पंचायत समिती निर्माण करण्यात आली आहे.

पंचायत राज्यातील मधला स्तऱ म्हणून पंचायत समितीला ओळखले जाते.

निवडणूक : प्रत्येक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्य निवडणूक आयोग घेते.


सभासदांची पात्रता :

1. तो भारताचा नागरिक असावा

2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावीत.

3. त्या तालुक्यातील मतदान यादीत त्याचे नाव असावे.


आरक्षण :

1. महिलांना : 50 %

2. अनुसूचीत जाती/जमाती : लोकसंख्येच्या प्रमाणात (महिला 50%)

3. इतर मागासवर्ग : 27% (महिला 50%)


विसर्जन : 

राज्य सरकार करते व विसर्जन झाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेणे बंधनकारक आहे.


कार्यकाल : 5 वर्ष


राजीनामा :

सभापती - जिल्हा परिषदेच्याअध्यक्षांकडे

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे 


त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 

30 दिवसांच्या आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन : 

सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - पंचायत समितीच्या सभापतीकडे यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास : 30 दिवसाच्या  आत जिल्हाधिकार्याकडे व त्यांनी दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्तांकडे.


मानधन :

 सभापती - दरमहा रु 10,000/- व इतर सुखसुविधा

उपसभापती - दरमहा रु 8,000/- व इतर सुखसुविधा पंचायत समितीची बैठक - कलम क्र. 117 व 118 नुसार वर्षात 12 म्हणजेच प्रत्येक महिन्याला 1 अंदाज पत्रक - गटविकासअधिकारी तयार करतो व त्याला जिल्हा परिषदेची मान्यता आवश्यक आहे.


गटविकास अधिकारी :

निवड - गटविकास अधिकारी

नेमणूक - राज्यशासन

कर्मचारी - ग्रामविकास खात्याचा वर्ग-1 व वर्ग-2 चा अधिकारी

नजिकचे नियंत्रण - मुख्य कार्यकारी अधिकारी

पदोन्नती - उपमुख्य कार्यकारी अधिकारी


कार्य व कामे :

1. पंचायत समितीचा सचिव

2. शासनाने ठरवून दिलेले कर्तव्य पार पाडणे.

3. वर्ग-3 व वर्ग-4 च्या कर्मचार्यांच्या राजा मंजूर करणे.

4. कर्मच्यार्यांवर नियंत्रण ठेवणे.

5. पंचायत समितीने पास केलेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे.

6. पदाधिकार्यांना मार्गदर्शन करणे.

7. पंचायत समितीचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकार्यांस सादर करणे.

8. अनुदानाची रक्कम काढणे व तिचे वितरण करणे.

9. महत्वाची कागदपत्रे सांभाळणे.


पंचायत समितीची कामे :

1. शिक्षण

2. कृषी

3. वने

4. समाजकल्याण

5. पशुसंवर्धन व दुग्धविकास

6. सार्वजनिक आरोग्य सेवा

7. दळणवळण

8. समाजशिक्षण

अर्थसंकल्पाचे प्रकार

▪️* पारंपरिक अर्थसंकल्प (Traditional Budget) :- 

» पारंपरिक अर्थसंकल्पात मुख्यत: सरकारला विविध मार्गानी प्राप्त होणारा आय व विविध बाबींवर होणारा खर्च याचे वितरण असते, त्याअंतर्गत कोणत्या क्षेत्रावर वा बाबींवर किती खर्च होईल याचा उल्लेख असतो, मात्र त्या खर्चाने काय परिणाम होईल याचा उल्लेख नसतो.


▪️* निष्पादन अर्थसंकल्प (Performance Budget) :- 

निष्पादन अर्थसंकल्पाचा मुख्य भर वित्तीय संसाधनांची विभागणी अधिक कार्यक्षम व परिणामकारकरीत्या होण्यासाठी प्रदानांवर आधारित (Output – oriented) अर्थसंकल्प निर्मिती करणे हे अंतर्भूत आहे. निष्पादन अर्थसंकल्पाचा पहिला प्रयोग यूएसएमध्ये झाला.


▪️* शून्याधारित अर्थसंकल्प (Zero Based Budget):- 

» शून्याधारित अर्थसंकल्प याचा अर्थ दरवर्षी नव्याने विचार करून (मागील अथवा चालू वर्षांची खाती व त्यांच्या रकमा आधारभूत न मानता) जमा व खर्च अंदाज करणे तसेच खर्चाची योजना तयार करताना प्रत्येक बाबीवरील खर्च आणि त्यापासून सामाजिक लाभ यांचा हिशोब मांडणे आणि खर्चासाठी प्राधान्यक्रम ठरवून खर्चाला मंजुरी देणे असा आहे.

» पीटर पिहर यांना या अर्थसंकल्पाचे प्रवर्तक मानले जाते. 

» भारतात महाराष्ट्र राज्याने १ एप्रिल १९८६ रोजी शून्याधारित अर्थसंकल्प साजरा केला. 

» त्या वेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण होते. वित्तमंत्री सुशीलकुमार शिंदे व वित्त राज्यमंत्री श्रीकांत जिचकर होते. 

» २००१मध्ये आंध्र प्रदेशात शून्याधारित अर्थसंकल्प मांडण्यात आला. (हा शेवटचा प्रयोग होता.)

मान्सूनचे स्वरूप



अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल

ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण

क) मान्सूनचा खंड

ड) मान्सूनचे निर्गमन


▪️अ) मान्सूनचे आगमन व मान्सूनची वाटचाल


या घटकाची माहिती  आपण भाग 2 मध्ये बघितली आहे आता समोरची माहिती 👇 👇 👇 👇


▪️ब) पर्जन्यक्षमप्रणाली व मान्सूनच्या पावसाचे वितरण


1) आर्द काल व शुष्क काल

- सर्वसामान्य माणसाच्याया दृष्टीने मान्सून म्हणजे पाऊस असाच निगडित आहे.

- अर्थात मान्सूनचा पाऊस कधीच सातत्याने पडत नाही तर तो अधून मधून पडतो .

- आर्द कालाच्या  पाठोपाठ शुष्क काल येतो  


2) पाऊसाचे  वितरण

- बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या उष्ण कठीबंधीय आवरतामूळे भारतीय मैदानी प्रदेशात पाऊस पडतो .

- नैऋत्य मान्सून वाऱ्याच्या अरबी समुद्राच्या शाखेमुळे भारताच्या पश्चिम किनारपट्टीला पाऊस मिळतो .

-  पश्चिम घाटांमुळें पडणारा हा पाऊस प्रतिरोध पर्जन्याचा असतो . 

- पश्चिम किनारपट्टीजवळींल विषुववृत्तीय जेट स्ट्रीमच्या स्थानावर पश्चिम किनारपट्टीवरील पाऊस अवलंबून असतो .

 

3) मान्सून द्रोणी  व आवर्ताचा संबंध

- बंगालच्या उपसागरात निर्माण होणाऱ्या उष्ण कटिबंधीय अवरताची वारंवारिता दरवर्षी बदलत असते .

- आंतर उष्ण कटिबंधीय केंद्रीभावन  पट्याच्या स्थानावर आवर्ताचा मार्ग अवलंबून असते ; याला भारतीय मौसम science मध्ये `मान्सून द्रोणी' ( mansoon trough) म्हणतात . ज्याप्रामाने मान्सून द्रोणीचा आस आंदोलीत होत जातो त्याप्रमाने  आवर्ताचा मार्गही बदलतो . त्यामुळे पाऊसाची तीव्रता दरवर्षी पडणार्या वितरणामध्ये फरक असतो.

- पश्चिम किनारपट्टीपासून पूर्व व ईशान्यकडे तर भारतीय मैदानावर व द्विकल्पाच्या उत्तर भागात वायव्येकडे गेल्यास पावसाचे प्रमाण कमी-कमी होत जाते.


क) मान्सूनचा खंड

- नैऋत्य मान्सूनच्या काळात पाऊसात साधारणपणे खंड पडतो. हा खंड बऱ्याच वेळा एक वा दोन आठवडे किंवा आणखी काही आठ्वडेही असू शकतो .यालाच मान्सूनमधील खंड असे म्हणतात.


🔹पाऊस न पडण्याची अनेक कारणे पुढीलप्रमाणे ....


- पाऊस घेऊन येणारे उष्ण काठिबंधीय आवार्ते वारंवार निर्माणन न झाल्याने अश्या प्रकारचा खण्ड पडतो . 

- उत्तर भारतात मान्सून द्रोणीच्या स्थानामुळे पाऊस पडत नाही.

- भारताच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर वारे वाहत असतील तर पश्चिम किनारपट्टीवर पाऊस येत नाही.

 - पश्चिम राजस्थानात वातावरणाच्या भिन्न स्तरावर तापिय परिस्तितीमुळे पाऊस पडत नाही . 

- तापमानाच्या विपरीततमुळे घेऊन जाणार्या वाऱ्याना उंचीवर जाता येत नाही .


ड) मान्सूनचे निर्गमन

- वायव्य भरतामधून सप्टेंबरमध्ये मान्सूनचे निर्गमन होते . द्विकल्पाच्या दक्षिण भागमधून मध्य ऑक्टोबरला  मान्सूनचे निर्गमन होते .

- मान्सूनचे निर्गमन होत असताना बंगालच्या उपसगरावरून वारे वाहतात .बाष्प गोळा व ईशान्य मान्सून वारे म्हणून तामिळनाडूच्या किनारपट्टीवर पाऊस देतात.

_____________________________________

सहकारी बँकांचे विलीनीकरण

💰कद्रीय मंत्रिमंडळाने भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये त्याच्या सहकारी बँकांचे विलीनीकरण करण्यासाठी मंजूरी दिलेली आहे. याशिवाय, नव्याने स्थापन झालेल्या भारतीय महिला बँक ला सुद्धा SBI मध्ये विलीन केले जाईल.


💰SBI च्या सहा सहकारी बँका आहेत, त्यामध्ये ⤵️⤵️

🔰सटेट बँक ऑफ हैदराबाद, 

🔰सटेट बॅंक ऑफ बिकानेर अँड जयपूर, 

🔰सटेट बँक ऑफ पटियाला, 

🔰सटेट बँक ऑफ म्हैसूर, 

🔰सटेट बँक ऑफ त्रावणकोर, 

🔰सटेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर 


⬆️⬆️या आहेत⬆️⬆️


🏧SBI विलिनीकरणाचे फायदे🏧


💰विलीनीकरण झाल्यानंतर, 

🔝🔝🔸बकिंग क्षेत्रात अग्रेसर SBI हे जगातील टॉप-50 बँकांच्या यादीमध्ये प्रविष्ट होणार.🔸🔝🔝


💰ससाधने जमवण्यासाठी एकल कोषागार असणार आणि मोठ्या प्रमाणात कुशल संसाधनांच्या पायाचे योग्य वितरण केले जाणार.

💰SBI मध्ये अवलंबले जाणारे नवीन तंत्रज्ञान हे सहकारी बँकेच्या सर्व ग्राहकांना समानरूपाने उपलब्ध होणार.

💰तयाच्या उपकंपन्या सोबत SBI भागभांडवल बाजारात प्रचंड कमाई करू शकणार. अशा प्रकारे तो फायदा सर्व भागभांडवल धारकांना देखील होणार.

💰विलीनि‍करणानंतर SBI ची एकूण मालमत्ता रु. 37 लाख कोटी (37 ट्रिलियन रुपयांवर) पोहोचणार.यामुळे SBI चे 50 कोटी पेक्षा अधिक ग्राहक होणार, 


🏧आणि  22,500 शाखा आणि 58,000 ATM उपलब्ध होणार.🏧


 🏧💸SBI विलिनीकरणाचे तोटे💸🏧

💰या विलीनि‍करणानंतर , बँकेच्या प्रशासनाला कर्मचारी एकत्रीकरण आणि शाखा सुसूत्रीकरण संबंधित काही गंभीर आव्हानांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. 

⛔️अनेक कर्मचारी सहकारी संघ या विलीनि‍करणाच्या विरोधात आहेत.⛔️


🏧💸SBI च्या विलीनीकरणाआधी💸🏧

💰SBI मध्ये पूर्वीचे विलीनीकरण निरोगी असल्याचे सिद्ध झाले आहे. 

🔰2008 मध्ये, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र आणि 2010 मध्ये, स्टेट बँक ऑफ इंदोर चे विलीनीकरण करण्यात आले होते. 

🔰विलीनीकरण होण्याच्या आधी SBI च्या 7 सहकारी बँका होत्या.


महाराष्ट्र पोलिस भरती - महत्त्वाचे 50 प्रश्न


1) अंकारा – टर्की (तुर्कस्तान)ची राजधानी.

2)अंजनी – हिला वायुकृपेने हनुमान पुत्र झाला.

3)अंजनेरी – वायुपूत्र हनुमान याचा जन्म या ठिकाणी झाला.

4)अंबिले – संत तुकारामांचे आडनाव.

5)अकबर – प्रसिद्ध बुलंद दरवाजा या मोगल बादशहाने बांधला.

6)अक्रा – घाना या देशाची राजधानी.

7)अक्ष – रावन व मंदोदरी यांचा पुत्र.

8)अक्षयघाट – मोरारजी देसाई यांचे समाधी स्थान.

9)अक्षौहिणी – २१८७० हत्ती, तितकेच रथ, ६५६१० घोडे व १०९३५० पायदळ मिळून होणारे सैन्य.

10)अगरतळा – त्रिपुरा या राज्याची राजधानी.

11)अचमद सुकार्नो – इंडोनेशियाचे संस्थापक अध्यक्ष.

12)अजिंठा – भारतातील सर्वात लांब लेणी.

13)अटल बिहारी वाजपेयी – भारतीय जनता पार्टीचे पहिले अध्यक्ष.

14)अठरा – हिंदू धर्मातील पुराणांची संख्या.

15)अणू – मुलद्रव्याचा सर्वात लहान अविभाज्य कण.

16)अथर्ववेद – चार वेदांपैकी सर्वात शेवटी लिहीला गेलेला वेद.

17)अथेन्स – ग्रीस ची राजधानी.

18)अदिती – वामनावतारी विष्णुची माता.

19)अनिल – कवी आत्माराम रावजी देशपांडे यांचे टोपण नाव.

20)अनुराधा पाल – देशातील पहिली महिला तबलजी.

21)अपोलो मोहीम – चंद्रावरील पहिली मोहीम. या मोहीमेद्वारे नीलआर्मस्ट्रॉंग यांनी चंद्रावर प्रथम पाऊल टाकले.

22)अबुजा – नायजेरियाची राजधानी.

23)अबोध – माधुरी दीक्षितचा पहिला चित्रपट.

24)अभिनव भारत – वि.दा.सावरकर यांनी बांधलेली तरुण क्रांतिकारकांची गुप्तसंघटना.

25)अमरकंटक – नर्मदा नदीचे उगमस्थान.

26)अमूल डेरी – भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था.

27)अमृतसर – जालियनवाला बाग येथे आहे.

28)अमृतसर – हे शहर सुवर्ण मंदिरांचे शहर म्हणुन ओळखले जाते.

29)अमेझॉन नदी – जगातील नाईल खालोखाल दुस-या क्रमांकाची लांब नदी.

30)अमेरिका – कॉपीराईटचा कायदा प्रथम या देशाने केला.


31)अमेरिका – मानवाला चंद्रावर उतरविण्यात यशस्वी ठरलेले पहिले राष्ट्र.

32)अमेरिका – सूर्यास्ताचा देश.

33)अयोध्या – श्रीरामाची जन्मभूमी.

34)अरबी – इजिप्तची अधिकृत भाषा.

35)अरुणाचल प्रदेश – आसाम पासून १९८७ साली निर्माण झालेले राज्य.

36)अरुणाचल प्रदेश – भारतातील सर्वात पुर्वेकडील राज्य.

37)अर्कल स्मिथ – रिझर्व बॅंक ऑफ इंडीयाचे पहिले गव्हर्नर.

38)अलहाबाद – भारतीय प्रमाणवेळ या ठिकाणापासुन मोजण्यात येते.

39)अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्यालय.

40)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण खात्याचे पहिले महानिर्देशक.

41)अलेक्झांडर कनिंगहॅम – भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक.

42)अल्टीमिटर – उंची मापक उपकरण.

43)अल्ट्राव्हायोलेट – या किरणांमुळे त्वचा काळी पडते.

44)अल्लाउद्दीन खलजी – दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती.

45)अशोक स्तंभ – भारताचे राजचिन्ह.

46)अस्ताना – कजाकस्तान या देशाचीच राजधानी.

47)अहमदनगर – प्रसिद्ध शिर्डी मंदिर या जिल्ह्यात आहे.

48)अहमदनगर – महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा.

49)आंबेडकर डॉ.बाबासाहेब – भारताचे पहिले कायदामंत्री.

50)आईस हॉकी – कॅनडाचा राष्ट्रीय खेळ.

७४ वी घटना दुरुस्ती ( १९९२-९३ ) :

 नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेची सुरवात ब्रिटिश कालखंडामध्ये झाली. ( १६८७ ) नागरी स्थानिक संस्थांना पंचायतराज संस्थेप्रमाणेच घटनात्मक दर्जा देण्यात यावा हि मागणी समोर आली. या दृष्टीकोनातून सर्वप्रथम १९८९ ला राजीव गांधी यांनी नगरपालिका संबंधी ६५ वे घटनादुरुस्ती विधेयक तयार केले होते.  परंतु त्यांना अपयश आले. त्यानंतर व्ही. पी. सिंग व चनशेखर यांनी प्रयत्न केले. परंतु अपयश आले. १९९१ ला पी. व्ही. नरसिंहराव पंतप्रधान असताना नागरी स्थानिक संस्थाना घटनात्मक दर्जा देण्यासाठी त्यांनी १९९२ ला ७४ वे घटनादुरुस्ती विध्येयक तयार केले.


– २२ डिसेंबर १९९२ ला या विधेयकावर लोकसभेत बहुमत सिद्ध.


– २३ डिसेंबर १९९२ ला या विधयेकावर राज्यसभेत बहुमत सिद्ध


– २० एप्रिल १९९३ रोजी ७४ व्या घटना दुरुस्ती विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी होऊन नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.


– ३१ मे १९९४ पर्यंत ह्या शिफारशी सर्व राज्यांना लागू करणे बंधनकारक करण्यात आले.


– राज्य घटनेच्या कलम २४३ ( P ) ते २४३ ( ZG ) मध्ये तरतूद करण्यात आली. व भारतीय राज्य घटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले. व त्या मध्ये एकूण १८ विषयांचा समावेश करण्यात आला आहे.


 ७४ व्या घटनादुरुस्तीची वैशिष्ट्ये / परिणाम / भूमिका :


१) नागरी स्थानिक संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त कलम ( P ते ZG )


२) राज्यघटनेला १२ वे परिशिष्ट जोडण्यात आले ( एकूण १८ विषयांचा समावेश आहे. )


३) महत्वाच्या व्याख्या कलम २४३ ( P )


४) नगरपालिका स्थापन करणे कलम २४३ ( Q )


     अ ) नगर पंचायत  ( Nagar Panchyat )


      ब ) नगर परिषद   ( Municipal Corporation )


      क ) महानगरपालिका ( Municipal Corporation )


५) नगरपालिकांची रचना कलम २४३ ( R )


६) वॉर्ड समित्या स्थापन करणे कलम २४३ ( S )


७) राखीव जागांची तरतूद कलम २४३ ( T )


      अ ) महिलांसाठी ३३ टक्के राखीव जागा


       ब ) इतर मागासवर्गीय ( OBC ) २७ टक्के राखीव जागा


       क ) अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती ( SC / ST ) याना लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव जागा.


८) नगरपालिकांचा पालिकांचा कालावधी निश्चित कलम २४३ ( U )


९) सदस्यांची अपात्रता कलम २४३ ( V )


१०) नगरपालींकाचे अधिकार, जबाबदारी कलम २४३ ( W )


११) नगरपालिकांना कर व निधी लादण्याचा अधिकार कलम २४३ ( X )


१२) राज्य वीत्त आयोगाची स्थापना कलम २४३ ( Y )


१३) नगरपालिकांचे लेखांकन, लेखापरीक्षण कलम २४३ ( Z )


१४) नगरपालिकांच्या निवडणुका घेणे कलम २४३ ( ZA )


१५) केंद्रशासित व अपवाद असणाऱ्या प्रदेशासाठी तरतूद कलम २४३ ( ZB )


१६) काही प्रदेशांना ७४ व्या घटनादुरुस्तीमधून सूट कलम २४३ ( ZC )


१७) जिल्हा नियोजन समितीला घटनात्मक दर्जा कलम २४३ ( ZD )


१८) महानगर नियोजन समितीची स्थापना कलम २४३ ( ZE )


१९) नागरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका बाबीमध्ये न्यायिक हस्तक्षेप नाही कलम २४३ ( ZG )



राज्यघटनेतील अकरावी अनुसूचित मधील विषय :

१) कृषी विस्तारासह शेती

२) भू – विकास जमीन सुधारणांची अंमलबजावणी, जमिनीचे एकत्रीकरण मृदसंधारण

३) पाण्याचे व्यवस्थापन, लघु पाटबंधारे आणि पाणलोट विकास

४) पशु संवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि कुकूटपालन

५) मासेमारी

६) सामाजिक वनीकरण व शेती वनीकरण

७) किरकोळ वन उत्पन्न

८) अन्नप्रक्रिया व लघु उद्योग

९) ग्रामोद्योग, कुटिरोद्योग व खादी उद्योग

१०) ग्रामीण गृह निर्माण

११) पिण्याचे पाणी

१२) इंधन व चारा

१३) रस्ते, नाली, पूल, नदी, जलमार्ग व दळणवळण अन्य साधने

१४) ग्रामीण विद्युतीकरण, विजेचे वाटप

१५) अपारंपरिक ऊर्जा साधने

१६) दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रम

१७) प्राथमिक व माध्यमिक शाळांसह शिक्षण

१८) तांत्रिक व व्यावसायिक शाळांसह शिक्षण

१९) प्रौढ व अनोपचारिक शिक्षण

२०) ग्रंथालय

२१) सांस्कृतिक कार्यक्रम

२२) बाजार व यात्रा

२३) रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे व दवाखाने यासह आरोग्य व स्वच्छता

२४) कुटुंब कल्याण

२५) स्त्रिया व बालविकास

२६) अपंग व मतिमंद यांच्या कल्याणासह समाजकल्याण

२७) दुर्बल घटकांचे कल्याण व अनुसूचित जाती ( SC ) व अनुसूचित जमाती ( ST ) कल्याण

२८) सार्वजनिक वितरण व्यवस्था

२९) समाजाच्या मौल्यवान ठेव्यांच्या सांभाळ करणे.

– २३ एप्रिल १९९४ पासून महाराष्ट्रात ७३ व्या घटना दुरुस्तूची अंबलबजावणी.

– १९६६ मध्य महाराष्ट्र शासनाने आपल्या १२३ योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केल्या आहेत.

– अरुणाचल प्रदेशात अनुसूचित जाती ( एस. सी ) साठी याना राखीव जागांची तरतूद नाही.

– ७३ व्या घटनादुरुस्तीची अमबलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य मध्यप्रदेश होय.

भूकंप लहरी :



» ज्या वेळी भूकंप होतो, त्या वेळी भूकवचात मोठय़ा प्रमाणात हालचाली होतात व मोठय़ा प्रमाणात कंप निर्माण होतात. यांनाच ‘भूकंप लहरी’ असे म्हणतात.


■ नाभी (Focus) : 

» भूकंप झाल्यावर भूकवचातील ज्या स्थानापासून उगम पावून सर्वदूर पसरतात, त्या स्थानास भूकंप केंद्र किंवा नाभी म्हणतात.


■ अधीकेंद्र (Epicentre) : 

» नाभीच्या अगदी वर क्षितिजाजवळच्या लंब रेषेवर पृथ्वीच्या पृष्ठभागावर जो िबदू मिळतो, त्याला ‘अधीकेंद्र’ असे म्हणतात. भूकंपकेंद्रापासून निघणाऱ्या भूकंप लहरींचा सर्वात अधिक प्रभाव अधीकेंद्राच्या निकट दिसून येतो. अधिकेंद्रापासून जसजसे अंतर वाढत जाते, तसेतसे भूकंपाची तीव्रता कमी कमी होत जाते.


■ भूकंप अधिलेख (Seismogram) :-  

» भूकंप लहरींचा अभ्यास भूकंप अभिलेखांवरून करता येतो. भूकंप लहरींचे तीन प्रकार पडतात-  प्राथमिक लहरी, दुय्यम लहरी, भूपृष्ठ लहरी.


भूकंप लहरींचे प्रकार :- 

■ प्राथमिक लहरी (P waves) : 

» प्राथमिक लहरींचा वेग इतर सर्व लहरींपेक्षा जास्त असतो. 

» प्राथमिक लहरी या स्थायुरूप व द्रव्यरूप पदार्थावरून प्रवेश करू शकतात. 

» प्राथमिक लहरी या ध्वनी लहरींप्रमाणे असतात. 

» यात कणांचे कंपन लहरींच्या संचरण दिशेने घडून येते.


■ दुय्यम लहरी (S waves) : 

» दुय्यम लहरी या प्रकाश लहरींप्रमाणे असून यात कणांचे कंपन संचरण दिशेशी समलंब दिशेने घडून येते. 

» दुय्यम लहरी या घनपदार्थापासून जाऊ शकतात; परंतु द्रवरूप पदार्थातून त्या जाऊ शकत नाहीत. 

» सर्व साधारणपणे त्यांचा वेग प्राथमिक लहरींच्या वेगापेक्षा निम्मा असतो.


■ भूपृष्ठ लहरी (L waves) : 

» भूपृष्ठ लहरी या भूपृष्ठांवरूनच सागरी लहरींप्रमाणे प्रवाहित होतात. 

» सर्व भूकंप लहरींमध्ये भूपृष्ठ लहरी या अधिक विनाशक असतात. 

» भूपृष्ठांवरून अधिक खोलवर या लहरी प्रवास करू शकत नाही. 

» भूपृष्ठ लहरी पृथ्वीपासून आरपार न जाता पृथ्वीगोलाला फेरी मारतात. 

» भूकंप अभिलेखावर या लहरींची नोंद सर्वात शेवटी होते.

_____________________

■ रिश्टर स्केल (Richter Scale) : 

» अमेरिकन भूकंप शास्त्रज्ञ चार्ल्स रिश्टर यांनी १९३५ साली भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासांठी रिश्टर प्रमाण शोधून काढले. याच्या साह्य़ाने भूकंपाच्या तीव्रतेची सातत्याने नोंद केली जाते. याच्या कक्षा एक ते नऊ या दरम्यान असतात.


■ भूकंपाचे जागतिक वितरण 

■पॅसिफिक महासागराचा पट्टा : 

» जगातील ६५% भूकंप प्रदेश पॅसिफिक महासागराच्या सभोवतालच्या पट्टय़ात आढळतो. 

» याला प्रशांत महासागरातील पट्टा किंवा अग्निकंकण (Rings of Fire) असे म्हणतात. 

» यात इंडोनेशिया, फिलिपाइन्स, जपानची बेटे, कामचटका द्वीपकल्प व पूर्व सबेरियातील काही भाग येतो. 

» भूकंपाचा हा पट्टा उत्तर अमेरिकेत आल्प्सपासून रॉकीज पर्वत दक्षिण अमेरिकेत अँडीज पर्वताला अनुसरून पुढे अंटाक्र्टिका खंडापर्यंत गेलेला आहे. 

» या भागातच असलेल्या जपानच्या हांशू बेटांवर जगातील सर्वात जास्त विद्धंसक भूकंप होतात.


■ मध्य अटलांटिक पट्टा  : 

» या पट्टय़ात अटलांटिक महासागरातील मध्य अटलांटिक रिझ आणि रिझजवळील काही बेटांचा समावेश होतो. 

» येथे सर्वसाधारणपणे मध्यम तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झालेली आहे.


■ भूमध्य सागरीय पट्टा : 

» या पट्टय़ाचा विस्तार अटलांटिक महासागरातील जलमग्न पर्वतरांगेपासून होऊन भूमध्य समुद्राभोवती पसरलेला आहे.


ज्वालामुखी


पृथ्वीच्या पृष्ठभागी जमिनीला भेग अथवा नळीसारखे भोक पडून त्याद्वारे जमिनीखालच्या खोलवर भागातील तप्त शिलारस (मॅग्मा) बाहेर येऊन पृष्ठभागावर वाहणे, तसेच स्फोटक वायुलोट आणि राखेसदृश्य असे खडकांचे लहानमोठे कण बाहेर फेकले जाणे, या क्रियेला ज्वालामुखी क्रिया म्हणतात.


 सर्वसामान्य ज्वालामुखी क्रियेत मध्यवर्ती नळीच्या वाटे तप्त शिलारस बाहेर येऊन नळीभोवती लाव्हा आणि राख यांची रास साचते व शंकूच्या आकाराचा उंचवटा तयार होत जातो, त्याला ज्वालामुखी हे नाव देतात.


ज्वालामुखी हे जळणारे पर्वत आहेत असा पूर्वी समज होता. ज्वालामुखीतून बाहेर उफाळणारे तप्त वायूचे लोट, धुरासारखे दिसणारे खडकांच्या सूक्ष्म कणांचे फवारे आणि उसळून सांडणारा तप्त शिलारस या सर्वांवरून ही एक पेटलेली निसर्गाची भट्टी आहे, असे वाटणे साहजिक होते. त्यामुळेच ज्वालामुखीतून बाहेर पडणाऱ्या खडकांच्या लहानमोठ्या कणांनाही ‘राख’, ‘अंगार’ (निखारे) अशीच नावे दिली गेली आहेत. पण भौतिक किंवा रासायनिक दृष्ट्या ज्वाला ‘ज्वलन’ म्हणता येईल अशी कोणतीही क्रिया ज्वालामुखी क्रियेत घडून येत नसते. क्वचित बाहेर पडणाऱ्या वायूंपैकी गंधकाची वाफ किंवा हायड्रोजन यांचे ज्वलन होते, पण ते एकूण क्रियेच्या मानाने अगदी नगण्य असते.


जमिनीवर येण्यापूर्वी भूपृष्ठाखाली काही खोलीवर असणाऱ्या तप्त द्रवाला शिलारस म्हणतात. शिलारस म्हणजे केवळ खडक वितळून तयार होणारा रस नव्हे. त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात अनेक वायू विरघळलेल्या अवस्थेत असतात. काही कारणाने या शिलारसावर असलेल्या खडकात भेगेसारखे दुर्बल प्रतल किंवा मार्ग सापडला की, दाबाखाली असणारा असा शिलारस पृष्ठभागाकडे येऊ लागतो.


 तो जसजसा पृष्ठभागाकडे घुसत जातो तसतसा वरच्या खडकांचा भार कमी होऊन शिलारसातील वायूंचा दाब वाढू लागतो. शेवटी सोडावॉटरच्या बाटलीचे बूच उडावे तसा वरचा टोपण खडक उडवून देऊन शिलारस उसळून जमिनीवर सांडतो.


शिलारस पृष्ठभागावर आला की, त्यात विरघळलेले बहुतेक वायू कमी-अधिक स्फोटकपणे किंवा शांतपणे बाहेर पडू लागतात. ज्या शिलारसातून बहुतेक वायू निघून गेले आहेत अशा द्रवाला लाव्हा म्हणतात.


मध्यवर्ती निर्गम द्वाराभोवती लाव्हा व राख यांची रास साचून तयार झालेल्या शंकूच्या आकाराच्या डोंगराचे तोंड ज्वालामुखी उद्रेकातील स्फोटाने उडून गेल्यामुळे किंवा खालचा शिलारस निघून जाऊन खाली पोकळी झाल्यामुळे बाजूच्या कडांचा आधार जाऊन त्या आत कोसळल्याने शंकूच्या माथ्याशी बशीसारखा खोलगट भाग तयार होतो, त्याला ‘कुंड’ म्हणतात. 


अशाप्रकारे सर्वसामान्य केंद्रीय उद्रेकात शंकू-कुंड रचनेचे ज्वालामुखी तयार होतात. काही उद्रेकांत मध्यवर्ती नळीच्या ऐवजी जमिनीत अरुंद व लांब भेग पडून तीतून लाव्हा बाहेर पडून आसपासच्या प्रदेशात थरांच्या रूपाने पसरतो. 


ही क्रिया बराच काळ चालू राहून आसपासच्या प्रदेशातील लहान मोठ्या दऱ्या भरून जातात व लाव्हा थरांचा पठारी प्रदेश निर्माण होतो. अशा ज्वालामुखी क्रियेला ‘भेगी उद्रेक’ म्हणतात.


केंद्रीय उद्रेकात लाव्हा नेहमीच मधल्या नळीतून बाहेर न येता कित्येकदा वर येताना खालच्या पातळीवरच बाजूने एखाद्या आडव्या भेगेतून तो बाहेर येऊन मुख्य शंकूच्या उताराच्या बाजूवर उपद्वारातून त्याचा उद्रेक होतो व तेथे उपशंकू तयार होतो.

 इटलीतील एटना या ज्वालामुखीच्या बाजूवर अशी २०० हून अधिक उपद्वारे व उपशंकू तयार झालेली आहेत.


ज्वालामुखीनिर्मितीची कारणे :


 ज्वालामुखी क्रियेचे सर्वांत प्रमुख अंग म्हणजे निर्गम द्वारातून तप्त शिलारस व वायू बाहेर पडणे हे असते. पूर्वी एकेकाळी असा समज होता की, पृथ्वीच्या पृष्ठभागी असणाऱ्या घन कवचाखाली सर्व जागी द्रव स्थितीतील शिलारस भरलेला असावा आणि वेळोवेळी ज्वालामुखींच्या वाटेने तो जमिनीवर येत असावा. 


परंतु भूकंपीय तरंगांच्या अभ्यासातून मिळालेल्या पृथ्वीच्या अंतरंगासंबंधीच्या माहितीवरून असे सिद्ध झाले आहे की, पृथ्वीचा बाहेरचा किमान २,९०० किमी. जाडीचा भाग पूर्णतया घन स्थितीत असला पाहिजे. म्हणजेच कवचाच्या खाली कोठेही मोठ्या प्रमाणात कायम स्वरूपाचा शिलारसाचा साठा असणे शक्य नाही. 


मात्र स्थानिक क्षेत्रात लहान कोठ्यांच्या (कप्प्यांच्या) स्वरूपात वेळोवेळी शिलारसाची निर्मिती होत असावी आणि असा तयार झालेला शिलारस कवचाच्या उथळ भागात येऊन त्याच्यापासून अंतर्वेशी अग्निज खडकांच्या राशी तयार होत असाव्यात, तसेच काही भाग ज्वालामुखी क्रियेने भूपृष्ठावर येत असावा अशी कल्पना आहे [⟶ अग्निज खडक].


शिलारस नेमका कोणत्या जागी, किती खोलीवर, केव्हा आणि कसा निर्माण होतो यांचे पुरेसे ज्ञान अद्याप झालेले नाही. भूपृष्ठीय परिस्थितीत सर्वसामान्य अग्निज खडकांचा वितळबिंदू १,०००° ते १,५००° से. असतो. भूपृष्ठापासून जसजसे खोल जावे तसतसे दर ३२ मी. खोलीला १° से.या प्रमाणात तापमान वाढत जाते. खोलीनुसार तापमान वाढण्याचे हे प्रमाण असेच राहिले, तर सु. ३० किमी. खोलीवर खडक वितळण्याइतके तापमान वाढलेले असेल.


 परंतु खोलीनुसार वरच्या खडकांच्या वजनामुळे दाबही वाढत जातो आणि वाढत्या दाबाप्रमाणे खडक वितळण्याचा बिंदूही वाढतो. त्यामुळे ३२ किमी. खोलीवर खडक वितळण्याइतके तापमान असूनही वाढत्या दाबामुळे तेथील खडक न वितळता घन राहतात.


 जर अशा जागी काही कारणाने खडकांवरील दाब तात्पुरता कमी झाला किंवा तापमानात बरीच वाढ झाली, तर तेवढ्या क्षेत्रातील खडक वितळून त्यांचा शिलारस होणे शक्य आहे.

ज्वालामुखी उद्रेकांचे प्रकार:

 ज्वालामुखीच्या उद्रेकांचे भेगी आणि केंद्रीय असे दोन ठळक प्रकार पडतात. भेगी उद्रेकात पृष्ठभागी पडलेल्या लांब भेगांतून अत्यंत तरल आणि सुवाही बेसाल्ट लाव्ह्याचे पूर पृष्ठावरून वाहत जाऊन जमिनीला समांतर थरात पसरतात. या प्रकारच्या उद्रेकाचे उत्तम उदाहरण आइसलँडमधील १७८३ सालचा उद्रेक होय. त्यावरून अशा उद्रेकांना आइसलँडी उद्रेक म्हणतात.

केंद्रीय उद्रेकामध्ये एखाद्या नळीसारख्या मध्यवर्ती निर्गम द्वारातून लाव्हा व अग्निदलिक पदार्थ बाहेर पडून ते द्वाराभोवती साचतात. लाव्ह्याचे रासायनिक संघटन व तापमान, विशेषतः लाव्ह्यात असणाऱ्या वायूंचे प्रमाण व दाब यांनुसार केंद्रीय उद्रेकाचे अनेक प्रकार होतात. त्यांतील महत्त्वाच्या प्रकारांचे वर्णन येथे दिले आहे.

1. हवाई प्रकार :
 यामध्ये मध्यवर्ती निर्गम द्वारातून अत्यंत सुवाही अशा लाव्ह्याचे निस्सारण होत असते. लाव्ह्यातील वायू शांतपणे बाहेर पडतात. क्वचित प्रसंगी कुंडात असलेल्या लाव्ह्याच्या पृष्ठावरून वेगाने बाहेर पडणाऱ्या वायूंच्या धक्क्यामुळे तप्त लाव्ह्याचे फवारे उडतात व ते वाऱ्याच्या झोतात सापडून लाव्ह्याच्या थेंबांचे तारेसारखे लांब काचतंतू तयार होतात. त्यांना ‘पेली’ या पॉलिनेशियन अग्निदेवतेवरून ‘पेलीचे केस’ असे म्हणतात. 
हवाई प्रकारच्या उद्रेकांमुळे विस्तिर्ण आकारमानाचे ढाल ज्वालामुखी तयार होतात.

हवाई उद्रेकाचा एक दुय्यम प्रकार लाव्हा तलाव हा आहे. ढाल ज्वालामुखीच्या कटाहात अत्यंत तप्त व तरल लाव्हा असतो. तलावाच्या मध्यातून वर येणारा तप्त लाव्हा चोहोबाजूंना काठाकडे वाहत जातो आणि काठाशी पुन्हा आत बुडून हे अभिसरणाचे चक्र चालू राहते. अशा प्रकारे काठाबाहेर लाव्हा न सांडता कटाहात दीर्घकाल एखाद्या तलावाप्रमाणे द्रव लाव्हा राहतो. 

कीलाउआ ज्वालामुखीतील हालेमाऊ माऊ नावाच्या कुंडामध्ये १८२३ पासून १९२४ पर्यंतच्या काळात असा लाव्हा तलाव तयार झालेला होता.

2. स्ट्राँबोली प्रकार :
 लाव्ह्याचा दाटपणा जसजसा वाढत जातो आणि त्याचा सुवाहीपणा कमी होतो, तसतसा लाव्ह्यातील वायू बाहेर पडण्यास होणारा अडथळा वाढत जातो व उद्रेकाचे स्वरूप अधिकाधिक स्फोटक होत जाते. हवाई लाव्ह्यापेक्षा काहीसा कमी सुवाही लाव्हा कुंडात उघडा पडला म्हणजे त्याच्या पृष्ठभागावरील थर घट्ट होतो आणि त्याच्याखाली अडकून पडलेले वायू साचत राहून मधून मधून धक्क्याने सौम्य स्फोटांच्या रूपाने निसटत राहतात. 

हे स्फोट ठराविक कालावधीने, तालबद्धतेने किंवा सातत्याने होत असतात. स्फोटामुळे लाव्ह्याचे लहान मोठे थेंब व गोळे हवेत फेकले जाऊन त्यांचे बाँब, लॅपिली, अंगार इ. पदार्थ होतात. अधिक जोराच्या स्फोटात तप्त लाव्ह्याचे कारंजे वर उडून त्याचा प्रकाशमान फवारा दिसतो. 
सिसिली बेटाच्या उत्तरेस असलेल्या लिपारी समूहातील ज्वालामुखींपैकी स्टाँबोली या ज्वालामुखीत अशी क्रिया दिसत असल्यामुळे या प्रकाराला त्याचे नाव मिळाले आहे. मॅक्सिकोतील पारीकूटीन हा ज्वालामुखीही स्ट्राँबोली प्रकारचा होता.

3. व्हल्कॅनी प्रकार : 
लिपारी समूहातील व्हल्कॅनो नावाच्या ज्वालामुखीवरून हे नाव दिले आहे. या प्रकांरातील लाव्हा बराच दाट असून कुंडात तो थिजून त्याचा घट्ट खडक होतो. थिजलेल्या कवचाखाली असलेल्या लाव्ह्यात बराच काळ वायू साचत राहून अखेर त्याचा दाब इतका वाढतो की, वरच्या कवचाच्या ठिकऱ्या उडवून फार मोठ्या प्रमाणात स्फोटक उद्रेक होतो. घनीभूत लाव्ह्याच्या कवचाचे लहान मोठे तुकडे आणि वायू यांचा प्रचंड लोट आकाशात खूपच उंच उसळून त्याचा फूलकोबीसारखा माथ्याशी विस्तारणारा ढग बनतो. हा ढग काळा दिसतो. 

दीर्घकाल निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीतून जेव्हा पुन्हा नव्याने उद्रेकाची सुरुवात होते तेव्हाचा उद्रेक व्हल्कॅनी प्रकाराने होतो. या उद्रेकाने नळीच्या तोंडाशी असलेला अडथळा उडवून देऊन नळी मोकळी करण्याचे कार्य होते.
4. व्हीस्यूव्हिअसी प्रकार : 

हा व्हल्कॅनी प्रकाराचाच पण अधिक उग्र स्फोटक आविष्कार आहे. दीर्घकालापर्यंत बाह्यतः निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीत नळीच्या खाली असणाऱ्या शिलारसातील वायूंचे प्रमाण व दाब वाढत वाढत इतके वाढते की, शेवटी नळीचे तोंड उडवले जाऊन अत्यंत उग्र स्फोटक रीत्या खालचा तप्त शिलारस बाहेर भिरकावला जातो.

 शिलारसावरील दाब एकदम कमी झाल्यामुळे त्यातील वायू मुक्त होऊन शिलारसाचे रूपांतर फेसाळ लोटात होते. हा लोट आकाशात खूप उंचीपर्यंत चढून त्याचा माथा विस्तारतो. फुलकोबीसारख्या आकाराचा हा विस्तारणाचा ढग तळपत्या शिलारसाच्या सूक्ष्म थेंबांमुळे प्रकाशमान झालेला असतो.

 व्हीस्यूव्हिअस ज्वालामुखीच्या १९०६ सालच्या स्फोटक उद्रेकात वायूचा स्तंभ १० किमी. उंचीपर्यंत उसळला होता व सतत २० तासांपर्यंत वायूचा लोट बाहेर येत होता.या वायूच्या लोटामुळे ४५० मी. व्यासाचे नळीसारखे भोक पोखरले गेले.

5. प्लिनी प्रकार :
 हा व्हीस्यूव्हिअसी प्रकाराचा पण अत्यंत उग्र स्वरूपाचा स्फोटक उद्रेक आहे. या प्रकारात वर उसळणारा वायूचा लोट कित्येक किमी. उंच चढून विस्तारतो, त्यामुळे आसपासच्या विस्तृत प्रदेशात राखेचा वर्षाव होतो. 
व्हीस्यूव्हिअसच्या इ. स. ७९ सालच्या उग्र स्फोटक उद्रेकाचे वर्णन धाकटे प्लिनी यांनी लिहून ठेवले आहे, त्यावरून हे नाव दिले आहे. या उद्रेकात पाँपेई व हर्क्यूलॅनियम ही दोन मोठी शहरे नष्ट झाली व याच उद्रेकाचे जवळून निरीक्षण करण्याच्या प्रयत्नात थोरले प्लिनी (धाकट्या प्लिनींचे चुलते) यांचा अंत झाला.

6.पेली प्रकार : 
या उद्रेकात लाव्ह्याचा दाटपणा आणि वायूंची स्फोटकता यांची परमावधी होते. नळीच्या वरच्या भागात थिजून घट्ट झालेल्या लाव्ह्याचे टोपण इतके जाड झालेले असते की, खालच्या बाजूस लाव्ह्यात साचत असलेल्या वायूला ते उडवून देणे अशक्य होते.

 वरच्या बाजूने सुटकेचा मार्ग न उरल्याने वायूने भारलेला शिलारस नळीच्या बाजूला भेग पाडून तेथून बाहेर वाट काढतो व उतारावरून तप्त शिलारसाचे लोढें खाली वाहू लागतात. शिलारस बाहेर पडताच त्यातील वायू मुक्त होऊन त्याचा फेसाळ प्रवाह बनतो. 
या प्रवाहाच्या खालच्या बाजूने बाहेर पडणाऱ्या वायूंचा वंगणासारखा उपयोग होऊन घर्षणरहित झालेल्या उतारावरून शिलारसाचे अतितप्त फेसाळ लोंढे प्रचंड वेगाने खाली धाव घेतात. 

क्वचित प्रसंगी त्यांचा वेग ताशी १६० किमी.पर्यंत जातो. उतारावरून वेगाने धाव घेणारे हे लोंढे काळे वा तळपते (प्रकाशमान) असतात. त्यांना ‘न्ये आर्दांत’ असे फ्रेंच नाव आहे. मार्टिनिक बेटावरील माँ पले या ज्वालामुखीचा १९०२ मध्ये अशा प्रकारचा उद्रेक होऊन त्यात पायथ्याचे ३० हजार वस्तीचे सेंट पिअरे हे शहर काही क्षणांत बेचिराख झाले.

ज्वालामुखी क्रियेचे परिणाम :

 ज्वालामुखींच्या उद्रेकाने माणसांचे अतोनात नुकसान होते. राखेने व वायूने पिके नष्ट होतात. वेली व झाडे करपतात. क्वचित संपूर्ण शहरेही लाव्हा रसाने व राखेने बुडून जातात. 
असे असूनही ज्वालामुखी उद्रेकाची टांगती तलवार डोक्यावर बाळगून अशा प्रदेशात माणूस वस्ती करण्यास का उद्युक्त होतो, याचे आश्चर्य ज्वालामुखी प्रदेशापासून दूर राहणाऱ्यांना नेहमीच वाटत आलेले आहे. 
पण ज्वालामुखीचे कार्य केवळ विध्वंसक असते असे नव्हे, तर भूवैज्ञानिक दृष्ट्या ज्वालामुखी क्रियेमुळे भूकवचाच्या खडकात नवीन भर पडत असल्यामुळे हे कार्य रचनात्मक समजले जाते. 

चक्री वादळे, भूकंप , प्रचंड पूर इ. नैसर्गिक आपत्तींमुळे होणारे नुकसान ज्वालामुखी उद्रेकाने होणाऱ्या नुकसानीपेक्षा कितीतरी जास्त असते. इ.स. ७९ ची पाँपेईवर किंवा १९०२ मध्ये सेंट पिअरेवर कोसळलेली आपत्ती ही विरळा घडणारी घटना आहे.

 महायुद्धामुळे किंवा प्रतिवर्षी रस्त्यांवर होणाऱ्या मोटार वाहनांच्या अपघातांमुळे होणाऱ्या मानवी हत्येची  बरोबरी ज्वालामुखी करू शकत नाहीत. ज्वालामुखी उद्रेकाच्या धोक्याबरोबरच ज्वालामुखी प्रदेशातील सुपीक जमिनीचे आकर्षण माणसाला असते. लाव्ह्याचे अपक्षयजन्य (वातावरणीय प्रक्रियांनी तयार झालेले) पदार्थ वनस्पतींना आवश्यक अशा पोषक द्रव्यांनी परिपूर्ण  असतात.

ज्वालामुखीचे प्रकार:

ज्वालामुखींचे वर्गीकरण त्यांच्या  विस्फोटक स्थितीनुसार आणि पृष्ठभागावर विकसित केलेल्या लेयरच्या आधारे  केले जाते.

1.शील्ड ज्वालामुखी

लाव्हा दूरपर्यंत वाहतो म्हणून शिल्ड ज्वालामुखी जगातील सर्वात मोठे ज्वालामुखी आहेत. 
 ते मोठ्या उंचीवर तसेच जास्त अंतरावर आढळतात. 
शिल्ड volcano कमी उतार असलेले आणि जवळजवळ पूर्णतः गोठलेले लावापासून बनलेले आहेत. हे ज्वालामुखी बहुतेक बेसाल्टपासून बनलेले असतात, एक प्रकारचा लावा जो उकळतो तेव्हा अतिशय द्रव असतो.

 ते सर्वसाधारणपणे कमी स्फोटक असतात, परंतु जर पाणी उकळत असेल तर ते विस्फोटक बनू शकतात. येणारा नविन लाव्हा फव्वाराच्या स्वरूपात येतो आणि वरच्या शंकूकार दिशेने उत्सर्जित होतो.

2.सिंडर कोन ज्वालामुखी

हे अतिवृद्ध इग्निअस खडक आणि आकारात लहान असतात. हे स्कोरिया म्हणूनही ओळखले जाते. 
त्यात लहानलहान, दाणेदार सिंडर्स आणि जवळजवळ लावा नसलेली ओलकॅनो असतात. त्यांच्याकडे वरच्या बाजूला एक लहान क्रेटर असते आणि खूप जास्त  बाजूचा उतार असतो.
3. संयुक्त(composite) ज्वालामुखी

संयुक्त ज्वालामुखी मध्यम आकाराच्या बाजूचा आकारात असतात.कधीकधी, त्यांच्या शिखरांमध्ये त्यांच्याकडे लहान craters आहेत.

त्यांना स्ट्रेटो असेही म्हणतात कारण त्यामध्ये वाळूच्या थरांच्या मिश्रित घनदाट लावा प्रवाहांचे स्तर असतात. बेसाल्टापेक्षा थंड आणि अधिक ऍक्टिव्ह लावाच्या विस्फोटाने संयुक्त ज्वालामुखींचे वर्णन केले जाते. हे ज्वालामुखी बहुतेकदा  विस्फोट होऊन तयार होतात.

 पायरोक्लास्टिक पदार्थ आणि राख मोठ्या प्रमाणावर लावासह ग्राउंडमध्ये त्यांचा मार्ग शोधतात. ही सामग्री व्हेंट ओपनिंगच्या परिसरात जमा होते आणि लेयरची निर्मिती करते आणि त्यामुळे त्याला संयुक्त ज्वालामुखी पर्वत म्हणून ओळखतात.

4.कॅल्डेरा

पृथ्वीवरील ज्वालामुखीचे सर्वात मोठे स्फोटक कॅल्डेरा आहे. ते सामान्यतः इतके विस्फोटक असतात की जेव्हा ते उडतात तेव्हा ते कोणत्याही उंच संरचनेऐवजी स्वत: वर पडतात.

त्यांचे स्फोट हे दर्शवितात की त्याचा मेग्मा चेंबर मोठा आणि जवळच्याच भागामध्ये दिसून येतो.  कॅल्डेरा इतका वेगळा असतो की मोठ्या प्रमाणावरील विस्फोट झाल्यानंतर  मोठा उद्रेक होऊन लाव्हा बाहेर पडतो आणि क्रेटर एक लहान, जास्त वाळूचा ज्वालामुखीय खोलगट भाग असतो जो फवाऱ्यावाटे बाहेर पडतो.

ज्वालामुखीय लँडफॉर्म

ज्वालामुखीय विस्फोटक द्रव्यातुन सोडल्या जाणार्या लाव्हाचे रुपांतर अग्निज खडकात होते. 
लाव्हा थंड होण्याच्या स्थानावरून अग्निज खडकांना वर्गीकृत केले आहे:

ज्वालामुखीय अग्निजन्य खडक- यांना extruisve अग्निज खडक म्हणून देखील ओळखले जातात. रॉक कूलिंग पृथ्वीच्या पृष्ठभागावर होते. उदा. बेसाल्ट, अँथ्रेसाईट इ.

प्लुटोनिक अग्निजन्य खडक - या खडकांना Intrusive अग्निज खडक म्हणून देखील ओळखले जाते. खडकाचे शीतकरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर नसून क्रस्टमध्ये होते.
 उदा. ग्रॅनाइट, गॅबरो, डायओराइट इत्यादी. प्लुटोनिक अग्निज खडक त्यांच्या स्वरुपात खालील प्रकारांमध्ये विभागली जातात.

बाथोलिथ: मोठ्या डोमच्या आकाराच्या स्वरूपात खोल भागात असून चुंबकीय पदार्थांचे एक मोठे स्थान आहे. हे ग्रॅनिटिक भाग आहे.

लॅकोलिथ्स: मोठ्या डोमच्या आकारात intrusive भागाचा पातळी खाली आणि पाईप सारखी  असते. पृथ्वीच्या खाली ,संयुक्त ज्वालामुखी सारखी संरचना आहे.

लापोलिथ: ते आकारात saucer(उथळ बशी) आकाराचे आहेत, आकाशाकडे concave आहेत.

फॅकोलिथ्स: नागमोडी वळणात  पदार्थांचे  स्त्रोत  खाली निश्चित करण्यासाठी एक विशिष्ट नळीच्या आकाराचे आहे.

शीट: ते  आग्निज खडकांच्या क्षितिज समांतर भागाजवळ आहेत. पातळ स्तराना शीट म्हटले जाते आणि जाड आडव्या डिपॉझिटला सिल्स असे म्हणतात.

डाईक्स: जेव्हा लाव्हा क्रॅकमधून बाहेर येतात तेव्हा ते ग्राउंडला जवळजवळ लंबरुप बनवतात आणि डाईक्स नावाच्या संरचनेसारख्या उभ्या भेगामध्ये बनतात.

ज्वालामुखींचे वितरण

जगभरातील ज्वालामुखींचे वितरण खाली दिल्याप्रमाणे तीन बेल्टमध्ये आढळतात:

सर्कम पॅसिफिक बेल्ट

मिड-वर्ल्ड माउंटन बेल्ट

आफ्रिकन रिफ्ट व्हॅली बेल्ट

ज्वालामुखी तीव्र फोल्डिंग आणि फौल्टिंगच्या प्रदेशांशी संबंधित आहेत. ते किनार्यावरील पर्वत, बेटांवर आणि महासागराच्या मध्यभागी असतात. महाद्वीपमधील आंतरिक भाग ज्वालामुखी पासूनसामान्यतः मुक्त असतात. 

बहुतेक सक्रिय ज्वालामुखी प्रशांत(पॅसिफिक) महासागरिय प्रदेशात आढळतात.



भारतीय संविधानाचे भाग


------------------------------------------------

 •    भाग १ - कलमे १-४ केंद्र आणि शासनाविषयी

------------------------------------------------

•    भाग २ - कलमे ५-११ नागरिकत्व

------------------------------------------------

•    भाग ३ - कलमे १२-३५ मूलभूत हक्क

•    कलमे १४-१८ समानतेचा हक्क,

•    कलमे १९-२२ स्वातंत्र्याचा हक्क,

•    कलमे २३-२४ शोषणाविरुद्धचा हक्क,

•    कलमे २५-२८ धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क,

•    कलमे २९-३१ सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क,

•    कलमे ३२-३५ सांविधानिक परिहाराचा हक्क.

------------------------------------------------

•    भाग ४ 

•  सरकारी कामकाजाविषयीकची सांविधानिक कलमे ३६ - ५१ 

•  कलम 40 -ग्रामपंचायतीचे संघटन 

•  कलम 41 - काम करण्याचा, शिक्षणाचा, गरजूंना सरकारी मदत मिळण्याचा अधिकार 

•  भाग ४(ऎ) कलम ५१ अ - प्रत्येक भारतीय नागरिकाचि मूलभूत कर्तव्ये. 

------------------------------------------------

•  भाग ५ -

•  प्रकरण १ - कलमे ५२-७८ 

•  कलमे ५२-७३ राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्याबाबत, 

•  कलमे ७४-७५ मंत्रीमंडळविषयक 

•  कलम ७६ भारताचे मुख्य ऍटर्नी, 

•  कलमे ७७-७८ सरकारच्या व्यवहाराबाबत 

•  प्रकरण २ - कलमे ७९-१२२ संसदेबाबत. 

•  कलमे ७९-८८ संसदेच्या संविधानाबाबत, 

•  कलमे ८९-९८ संसदेच्या आधिकारांबाबत, 

•  कलमे ९९-१०० 

•  कलमे १०१-१०४ सदस्यत्व रद्द करण्याबाबत 

•  कलमे १०५-१०६ संसद व खासदारांचे आधिकार आणि विशेषाधिकार यांच्या बाबत, 

•  कलमे १०७-१११ (law making process) 

•  कलमे ११२-११७ आर्थिक बाबींबाबत, 

•  कलमे ११८-१२२ 

•  प्रकरण ३ - कलम १२३ 

•  कलम १२३ संसदेच्या विरामकाळात राष्ट्रपतींच्या आदेशाबाबत 

•  प्रकरण ४ - कलमे १२४-१४७ 

•  कलमे १२४-१४७ सर्वोच्च न्यायालयची रचना आणि संविधान याबाबत 

•  प्रकरण ५ - कलमे १४८-१५१ भारताचे कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचेबाबत. 

•  कलमे १४८ - १५१ कंट्रोलर आणि ऑडिटर जनरल यांचे आधिकार व कर्तव्ये यांबाबत 

------------------------------------------------ 

भाग ६- राज्यांच्याच्या बाबतची कलमे. 

•  प्रकरण १ - कलम १५२ भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या 

•  कलम १५२ - भारताचे राज्यांची सामान्य व्याख्या - जम्मु आणि काश्मीर वगळून 

•  प्रकरण २ - कलमे १५३-१६७ कार्यांबाबत 

•  कलमे १५३-१६२ राज्यपालाच्या बाबत, 

•  कलमे १६३-१६४ मंत्रीमंडळावर, 

•  कलम १६५ राज्याच्या ऍड्व्होकेट-जनरल यांच्याबाबत. 

•  कलमे १६६-१६७ सरकारच्या व्यवहारिक गरजांबाबत. 

•  प्रकरण ३ - कलमे १६८ - २१२ राज्यांच्या शासनाशी निगडित. 

•  कलमे १६८ - १७७ सामान्य माहिती 

•  कलमे १७८ - १८७ राराज्यांच्या शासनाचे आधिकार 

•  कलमे १८८ - १८९ कार्यकलापाविषयी 

•  कलमे १९० - १९३ सदस्यत्व रद्द करण्याबाबत 

•  कलमे १९४ - १९५ विधीमंडळ सदस्यांचे आधिकार, सवलती, कायदेशीर संरक्षणे 

•  कलमे १९६ - २०१ कार्यकलापाविषयी 

•  कलमे २०२ - २०७ अर्थिक विषयासंबधी 

•  कलमे २०८ - २१२ इतर सामान्य विषयासंबधी 

•  प्रकरण ४ - कलम २१३ राज्यपालच्या आधिकाराबाबत 

•  कलम २१३ - राष्ट्रपती व अधिवेशन काळातील विधेयके. 

•  प्रकरण ५ - कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत. 

•  कलमे २१४ - २३१ राज्यांच्या उच्चन्यायालयांच्या बाबत. 

•  प्रकरण ६ - कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत. 

•  कलमे २३३ - २३७ अधीन न्यायालयांच्या बाबत 

------------------------------------------------

•  भाग ७- राज्यांच्या बाबतील कलमे. 

•  कलम २३८ - 

------------------------------------------------

*•  भाग ८* - केंद्रशासित प्रदेशांशी निगडीत कलमे 

•  कलमे २३९ - २४२ मंत्रीमंडळ रचना आणि उच्चन्यायालयांच्या बाबत 

------------------------------------------------

•  भाग ९ - पंचायती पद्धतीबाबतची कलमे 

•  कलमे २४३ - २४३ ओ ग्रामसभा आणि पंचायती पद्धतीबाबत 

------------------------------------------------

•  भाग ९ऎ- नगरपालिकांबाबतची कलमे. 

•  कलमे २४३पी - २४३ झेड नगरपालिकांबाबत 

------------------------------------------------

•  भाग १० - 

•  कलमे २४४ - २४४ऎ 

------------------------------------------------

•  भाग ११ - केंद्र आणि राज्यांच्या संबंधांविषयी 

•  प्रकरण १ - कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी 

•  कलमे २४५ - २५५ शासनाच्या आधिकारांच्या वितरणाविषयी 

•  प्रकरण २ - कलमे २५६ - २६३ 

•  कलमे २५६ - २६१ - सामान्य 

•  कलमे २६२ - पाण्याचा विवादाबाबत. 

•  कलमे २६३ - राज्यांचे परस्पर संबंध. 

------------------------------------------------

•  भाग १२ - संपत्ती, मालमत्ता व दिवाणी दावे यांबाबत 

•  प्रकरण १ - कलमे २६४ - २९१ संपत्तीच्या बाबत 

•  कलमे २६४ - २६७ सामान्य 

•  कलमे २६८ - २८१ 

•  कलमे २८२ - २९१ इतर 

•  प्रकरण २ - कलमे २९२ - २९३ 

कलमे २९२ - २९३ 

•  प्रकरण ३ - कलमे २९४ - ३०० 

•  कलमे २९४ - ३०० 

•  प्रकरण ४ - कलम ३००ऎ मालमत्तेच्या आधिकाराविषयक 

•  कलम ३००ऎ - 

------------------------------------------------

•  भाग १३- भारताच्या व्यापार आणि वाणिज्यविषयक कलमे 

•  कलमे ३०१ - ३०५ 

•  कलम ३०६ - 

•  कलम ३०७ - 

------------------------------------------------

•  भाग १४ - 

•  प्रकरण ५ - कलमे ३०८ - ३१४ 

•  कलमे ३०८ - ३१३ 

•  कलम ३१४ - 

•  प्रकरण २ - कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम 

•  कलमे ३१५ - ३२३ लोकसेवा आयोगाबाबतचे कलम 

--------------------------------------.........

•  भाग १४ऎ - आयोग च्या बाबत कलमे 

•  कलमे ३२३ऎ - ३२३बी 

---------------------------------------------

•  भाग १५- निवडणूक विषयक कलमे 

•  कलमे ३२४ - ३२९ निवडणूक विषयक कलमे 

•  कलम ३२९ ऎ - 

----------------------------------------------

•  भाग १६- 

•  कलमे ३३० -३४२ 

-------------------------------------------

•  भाग १७- अधिकृत भाषॆबाबतची कलमे 

•  प्रकरण १ - कलमे ३४३ - ३४४ केंद्र भाषॆबाबत 

•  कलमे ३४३ - ३४४ केंद्राच्या अधिकृत भाषॆबाबत 

•  प्रकरण २ - कलमे ३४५ - ३४७ प्रांतीय भाषॆबाबत 

•  कलमे ३४५ -३४७ प्रांतीय भाषॆबाबत 

•  प्रकरण ३ - कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादी 

•  कलमे ३४८ - ३४९ सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांच्या भाषॆबाबत, इत्यादि 

•  प्रकरण ४ - कलमे ३५० - ३५१ विशेष निर्देश 

•  कलम ३५० - 

•  कलम ३५० ऎ - 

•  कलम ३५०बि - भाषिक अल्पसंख्यांकाविषयीचे कलम 

•  कलम ३५१ - हिंदी भाषॆविषयीक कलम 

-----------------------------------------------

•  भाग १८ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे 

•  कलमे ३५२ - ३५९ - आणीबाणी परिस्थितीबाबतची कलमे 

•  कलम ३५९ऎ - 

•  कलम ३६० - आर्थिक आणीबाणी

---------------------------------------------- 

•  भाग १९ - इतर विषय

•  कलमे ३६१ - ३६१ऎ - इतर विषय 

•  कलम ३६२ - 

•  कलमे ३६३ - ३६७ - इतर 

-----------------------------:-::-------------

•  भाग २० -

•  कलम ३६८ - घटनादुरुस्ती

---------------------------------------------

•  भाग २१ -

•  कलमे ३६९ -३७८ऎ 

•  कलमे ३७९ - ३९१ - 

•  कलम ३९२ - आणीबाणीच्या परिस्थितीतील राष्ट्रपतींचे हक्क 

अर्थशास्त्र विषयातील आता पर्यंत विचारलेले प्रश्न

1. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेची आहेत?
अ) कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा हेतू असतो.
ब) व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते
क) उद्योग उभारणीसंदर्भात मालक स्वतः निर्णय घेतात
ड) यातील उत्पादनाचे कार्य व विभाजन सरकारमार्फत चालते
1. अ,ब
2. क,ड
3. अ,ब,क,ड
4. अ,ब,क✅

2.  पर्याप्त लोकसंख्येची वौशिष्ट्ये ओळखा?
अ) यामध्ये उपलब्ध साधनसामग्रीचा परिपूर्ण वापर केला जातो
ब) उपलब्ध साधनसामग्री गरजे एवढी निर्माण झालेली असते
क) देशातील लोकसंख्येचे आदर्श आकारमान दर्शवते
1. अ,क बरोबर✅
2. अ,ब,क बरोबर
3. ब,क बरोबर
4. अ,ब बरोबर

3. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा उपयोग होतो?
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) सहकार क्षेत्र
क) समाजवादी क्षेत्र
ड) खाजगी क्षेत्र
1. अ,ड✅
2. ब,क
3. क,ड
4. अ,ब

4. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राची निवड करावी लागते
अ) श्रमप्रधान तंत्र
ब) कृषिप्रधान तंत्र
क) भांडवलप्रधान तंत्र
1. अ,ब,क
2. अ,ब
3. अ,क✅
4.ब,क

5. खालील विधानातून योग्य पर्याय ओळखा
अ) भूमी, श्रम, भांडवल इत्यादी घटकांच्या कमतरतेमुळे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन घटते
ब) औद्योगिक कलहामुळे उत्पादन प्रभावित होते
क) सुखचैनीच्या वस्तू वाढीमुळे बाजार भावात घट होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,क
4.अ,ब,क

6.वस्तू व सेवांच्या तुलनेत पैशाचा पुरवठा अतिरिक्त झाल्यास पुढील कोणत्या मौद्रीक अधिकाराचा वापर करून ते कमी केले जातात
अ) बँक दर वाढवणे
ब) सरकारी कर्जखोऱ्याची खरेदी
क) रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करणे
1. अ
2.ब
3. अ,ब,क
4. अ,क✅

7. राष्ट्रीय उत्पन्नाची योग्य वैशिष्ट्य ओळखा
अ) राष्ट्रीय उत्पन्न ही समग्रलकशी संकल्पना आहे
ब) राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे
क) राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पैशात व्यक्त केलेले मूल्य
ड) राष्ट्रीय उत्पन्नात घसारा मोजला जातो
1. अ,ब,ड
2. अ,क,ड
3. ब,क,ड
4. अ,ब,क✅

8. खालीलपैकी कोणत्या कारणाने वस्तू विनियमात अडचण होती, याबाबत अयोग्य विधाने ओळखा
अ) गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव
ब) मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव
क) वस्तूंचा साठा कऱण्यातील अडचण
ड) विलंबित देणी देण्यातील अडचण
1, अ,ब
2. ब,व क
3. यापैकी नाही✅
4. अ,ब,क,ड

9. खालीलपैकी कोणत्या चलनप्रकारात अतिरिक्त चलननिर्मितीचा धोका संभवतो
अ) प्रातिनिधिक कागदी चलन
ब) परिवर्तनीय कागदी चलन
क) अपरिवर्तनीय कागदी चलन
1. अ,ब
2. अ,क
3. ब,क✅
4. अ,ब,क

10. रेपो दर वाढिचा खालीलपैकी कोणता परिणाम आहे?
अ) चलनपुरवठा कमी होतो
ब) महागाईत वाढ होते
क) व्यक्तींची व्यय शक्ती वाढते
ड) उत्पादनात वाढ होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,ड
4. अ,ब,क


1. सहकार चळवळीशी संबंधीत असलेले फेंडरीक निकोल्सन (1892) यांनी भारतात सहकारी संस्था स्थापनेसाठी खालीलपैकी कोणती शिफारशी केल्या.

अ) ग्रामिण भागात सहकारी संस्था स्थापनेसाठी रायफेजन पध्दतीचा वापर करावा.
ब) शहरी भागात सहकारी संस्था स्थापनेसाठी शुल्झ डेलित्झ पध्दतीचा वापर करावा.
क) निकोल्सन यांनी संस्था स्थापनेची प्रेरणा जर्मनी या देशाकडून घेतली.

१) अ आणि ब योग्य
२) अ आणि क योग्य
3) अ, ब आणि क अयोग्य
४) अ, ब आणि क योग्य✅

2. रुपयाच्या अवमुल्यन केले असता खालीलपैकी कोणते परीणाम घडून येतात.

अ) रुपयाची किंमत कमी होईल व डाँँलरची किंमत वाढेल.
ब) परकीयांना भारतात गुंतवणुक करणे सोपे होईल व रोजगार वाढेल.
क) भारताची आयात वाढेल व निर्यात कमी होईल.
ड) चालु खात्यावरील तुट कमी होईल आणि भांडवली खात्यात वाढ होईल.

१) अ, ब आणि क
२) अ, ब आणि ड✅
३) ब, क आणि ड
४) वरील सर्व

3. घाऊक किंमतीचा निर्देशांक विषयी पुढील विधाने विचारा घ्या.

अ) अभिजित सेन कार्यदलानुसार 2010 पासून 676 वस्तूंच्या घाऊक किंमतीवरुन काढला जातो.
ब) यासाठी आधारभूत वर्ष 2004-05 स्विकारण्यात आले आहे.
क) यामध्ये सर्वाधिक भार प्राथमिक वस्तुंना देण्यात आला आहे.

१) अ आणि ब✅
२) ब आणि क
३) अ आणि क
४) वरील सर्व 

4. राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा.

अ) या योजनेची सुरुवात २०११ साली झाली.
ब) या योजनेत ५०% वाटा केंद्राने उचलला आहे.
क) या अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते.

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) अ आणि क
४) वरील सर्व  ✅

5. राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण २००० चा प्रयत्न

१) बालिकांसंबंधी असलेले सर्व भेदभाव व महिलांवर होणारे
सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे
२) महिलांना मानवी हक्क आणि सत्तेत समान संधी प्रदान
करणे
३) वरील दोन्ही✅
४) वरीलपैकी कुठलेच नाही

6. अमर्त्य सेन आणि गाऊलेट डी. यांनी वर्णन केलेली विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणती? खालीलपैकी योग्य
पर्याय निवडा.
१) उपजीविका, स्वतबद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता, अधिकार/हक्क✅

२) आरोग्य, भरणपोषण, शिक्षण, क्षमता, अधिकार/हक्क

३) अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छता

४) राष्ट्रीय उत्पन्न वाढ, दरडोई उत्पन्न, मूलभूत गरजा, स्वातंत्र्य, शिक्षण

7. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

अ) वित्त आयोगाची नेमणूक हे राज्यपालांचे कार्यकारी कर्तव्य आहे
ब) नागरी खटल्यांपासून स्वतची प्रतिरक्षा राज्यपालांचा स्वेच्छा अधिकार असतो.
१) केवळ अ
2) केवळ ब
३) दोन्ही
४) एकही नाही✅

8. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट ४८ मध्ये नेमली.
ब) प्रोफेसर डी. आर. गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते.

१) केवळ अ योग्य
२)केवळ ब योग्य
३) अ व ब दोन्ही योग्य
४)अ व ब दोन्ही अयोग्य✅

9. मनरेगा विषयी असत्य विधान ओळखा.
१. ही योजना २ फेब्रुवारी २००६ ला भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालया मार्फत सुरू करण्यात आली
२.या योजनेत किमान रोजगार १२७ रु प्रती दिन इतका मिळतो
३. अर्ज केल्यानंतर किमान ३० दिवसाच्या आत काम मिळाले नाही तर बेरोजगारी भत्ता दिला जातो✅
४.ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना या योजनेचा लाभ घेता येतो

10. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे (IRDP) कोणत्या योजनेत विलीन करण्यात आले?
१.इंदिरा आवास योजना
२.स्वर्ण जयंती स्वयंरोजगार योजना✅
३.स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना
४.भारत निर्माण योजना

1. जागतिक बँकेद्वारे जारी करण्यात आलेल्या पहिल्या मानव भांडवल निर्देशांकात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
१.108 वा
२.115 वा✅
३.91 वा
४.131 वा

2. भारतात 1997 सालापासून उद्योगांना 'मिनिरत्न' व 'नवरत्न' दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
१.सी. रंगराजन
२.अर्जुनसेन गुप्ता✅
३.अभिजितसेन गुप्ता
४.एम. नरसिंहन

3. भारतात शासकीय मार्गाने संरक्षण क्षेत्रात किती टक्के परकीय थेट गुंतवणूकीस (FDI)परवानगी आहे?
१.51%
२.66%
३.74%
४.100%✅

4. भारतात संरक्षण क्षेत्रात स्वयंचलित मार्गाने किती टक्के FDI ला परवानगी आहे?
१.26%
२.49%✅
३.74%
४.100%(शासकीय मार्गाने 100% FDI परवानगी)

5. 2017-18 आकडेवारीनुसार भारतात राष्ट्रीय महामार्गांची सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यात आहे?
१.महाराष्ट्र✅(15437 किमी)
२.उत्तरप्रदेश (8711 किमी)
३.राजस्थान(7906किमी)
४.दिल्ली(678किमी)

6. भारतात कृषी हवामान विभाग स्थापन कोणत्या साली करण्यात आली होती?

१.1875( भारतीय हवामान विभाग , पुणे स्थापन)
२.1918
३.1932✅
४.1953

7. भारताचे पहिले त्रैवार्षिक आयात निर्यात धोरण 1985 साली कोणत्या समितीच्या शिफारशीवरून स्वीकार करण्यात आले होते?

१.व्ही.व्ही.रामैय्या समिती
२.अबीद हुसेन समिती
३.मुदलियार समिती✅
४.एल.के.झा. समिती

8. भारताच्या परकीय व्यापार धोरणाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत?

अ.आयात पर्यायीकरण
ब. निर्यात प्रोत्साहन
क. परकीय बाजारपेठ काबीज करणे
ड. शेती व्यापारास प्रोत्साहन

पर्याय

१.अ,ब,क,ड
२.अ,ब,क
३.फक्त क
४.अ,ब✅

9. 1971 साली कार्यान्वित करण्यात आलेली भारताची झर्लिना  ही अणुभट्टी कोणत्या देशाच्या मदतीने स्थापन करण्यात आली होती?
१.अमेरिका
२.ब्रिटन
३.फ्रान्स✅
४.स्वदेशी बनावटीची

10. संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती?
१.बँक ऑफ हिंदुस्थान
२.RBI
३.पंजाब नॅशनल बँक✅
४.बँक ऑफ महाराष्ट्र

1.स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील दारिद्र्य विषयक अभ्यास करणाऱ्या तज्ञांमद्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
1.प्रा.वी. म.दांडेकर
2.डॉ. नीलकंठ रथ
3.म.एस. अहलुवालीया
4.जॉन मालथस✅

2.खाजगिकरणाबाबत करण्यात आलेल्या खालील उपाययोजनांपैकी अयोग्य पर्याय ओळखा
1.उद्योगांना नवरत्नाचा दर्जा
2. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती
3.निर्गुंतवणूक धोरण
4. फेरा ऐवजी फेमा धारण करणे✅

3.खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँकेचे म्हणता येणार नाही?
1.बँकांची बँक म्हणून काम पाहणे
2.जागतिक बँकेचे प्रतिनिधित्व करणे✅
3. परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवणे
4.चलन निर्मिती करणे

4. महाराष्ट्राच्या नवीन सुधारित पथकर धोरण (toll policy)  बाबत खालील विधाने विचारात घ्या.
1. अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या प्रकल्पावर पथकर आकारला जाणार नाही✅
2. 200 कोटी रुपयाखालील  प्रकल्प खाजगीकरणानंतर्गत करण्यात येणार नाही
3. फक्त 200 कोटी रुपयांपुढील खाजगी प्रकल्पांसाठी पथकर आकारला जाईल
4. एकाच रस्त्यावरील दोन पथकर नाक्यांमधील अंतर किमान 20. कि. मी असावे

5.लोकांची योजना चे जनक म्हणून ..... यांचा निर्देश करावा लागेल?
1. श्रीमान नारायण
2.मानवेंद्रनाथ रॉय✅
3. प. जवाहरलाल नेहरु
4. एम. विश्वेश्वरय्या

6.विशेष उचल अधिकार (SDRs) सुविधा कोनामार्फत उपलब्ध करून दिली जाते?
1. जागतिक बँक
2. जागतिक व्यापार संघटना
3. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ
4. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी✅

7. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनाचे स्वामित्व, नियंत्रण व्यवस्थापन .....केले आहे.
1. सरकारद्वारे
2. समाजद्वारे
3. खासगी व्यक्तिद्वारे✅
4. सहकाराद्वारे

8.सार्वजनिक वितरण प्रणालीची उद्दिष्ट्ये कोणती आहेत?
अ) उपभोक्त्यांना स्वस्त आणि सवलतीच्या दरात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे
ब) लोकसंख्येचा किमान पोषणात्मक दर्जा टिकवून ठेवणे
1.अ बरोबर ब चूक
2.अ चूक ब बरोबर
3.दोन्ही बरोबर✅
4.दोन्ही चूक

9.दरडोई उत्पन्न म्हणजे .....
1.देशातील एकूण लोकसंख्या भागीले एकूण राष्ट्रीय उत्पन्न
2. देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागीले देशाचे एकूण उपभोग खर्च
3. देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागीले देशाची एकूण लोकसंख्या✅
4. एकूण उपभोग खर्च भागीले एकूण लोकसंख्या

10. लोकसंख्या स्थित्यंतरातील तिसरी अवस्था असलेला पर्याय सांगा.
1. जास्त जन्मदर व जास्त मृत्युदर
2. जास्त जन्मदर व कमी मृत्युदर
3. कमी जन्मदर व जास्त मृत्युदर
4. कमी जन्मदर व कमी मृत्युदर✅

1. महाराष्ट्रातील भारनियमनाचे  प्रमुख कारण काय आहे?

1. वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती✅
2. योग्य व्यवस्थापनाचा अभाव
3. पारेशनातील गळती
4. चुकीचे सरकारी धोरण

2. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत आर्थिक हिस्सा खालीलपैकी कोणता घटक दर्शवितो?
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) खाजगी क्षेत्रातील मोठे उद्योग
क) धातू वस्तू
ड) लघू उद्योग
योग्य पर्याय निवडा
1. (अ) आणि (ब)
2. (ब) फक्त✅
3. (क) आणि (ड)
4. (ड) फक्त

3. महाराष्ट्र सरकारने २०१३ सालच्या नवीन औद्योगिक धोरणाद्वारे सूक्ष्म ,लघू व मध्यम उपक्रमांबाबतीत पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे?
1. आशावादी
2. वास्तवादी
3. पवित्रवादी✅
4. अवास्तववादी

4. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत खालील घटकांचा समावेश होतो
अ) आंतरराष्ट्रीयीकरण
ब) खाजगीकरण
क) शिथिलीकरण
ड) विकेंद्रीकरण
1.(अ) आणि(ड)
2. (अ) आणि(क)✅
3. (ब) आणि(क)
4. (क) आणि(ड)

5. १९९१ च्या औद्योगिक धोरणाची कोणती उद्दिष्ट्ये होती?
अ) औद्योगिक परवानाराज संपुष्टात आणणे
ब) खाजगी क्षेत्राचे महत्व कमी करणे
क)सार्वजनिक क्षेत्राचे महत्व कमी करणे
ड)लघुउद्योगाचा विकास
दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा:
1. फक्त(अ)
2. (ब) आणि(ड)
3. (अ) आणि(क)✅
4. वरील सर्व

6. खालीलपैकी कोणती विधाने जागतिकीकरणाचा नकारात्मक परिणाम दर्शवतात
अ) कामगार संघटित क्षेत्रातून असंघटित क्षेत्रात ढकलले गेले
ब) स्पर्धा निर्माण केली
क) कामगार संघटनांची सौदाशक्ती घटली
ड) थेट परकीय गुंतवणूक वाढली
पर्यायी उत्तरे
1(अ) व (क) ✅
2. (अ) व (ड)
3. (ब) व (क)
4. (अ) व (ब)

7.  २०११-१२ मध्ये भारताच्या निर्यातीच्या बाबतीत वरची पाच राज्ये कोणती होती?
1. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक✅
2. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ
3. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि पंजाब
4. महाराष्ट्र, गुजरात,तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश

8. भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान समर्पक आहे?
1.OECD देशांचे भारतीय निर्यातीमधील महत्व वाढले आहे
2.  भारताचा OPEC प्रदेशाशी व्यापार मोठ्या प्रमाणात सुधारला आहे✅
3. भारताच्या निर्यातीत इंग्लंडचे स्थान प्रथम आहे
4.  सार्क प्रदेशातून आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे

9. सॉफ्टवेअर निर्यातीतील हिश्य्यानुसार भारतासाठी सर्वाधिक महत्वाची बाजारपेठ कोणती आहे?
1. अमेरिका✅
2. इंग्लंड
3. चीन
4.  जपान

10.  २०११-१२ मध्ये झालेल्या खाद्यान्नाच्या भाववाढीमध्ये  खालील घटकांचा महत्वचा वाटा होता.
अ) दूध
ब) अंडी, मटण, मासे
क) खाद्यतेल
ड) साखर
योग्य पर्याय निवडा
1. फक्त(अ) आणि (ब) ,(क)✅
2. फक्त(अ) (ब) आणि(ड)
3.फक्त (ब) (क) आणि(ड)
4. फक्त(ब) आणि(ड)


1. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेची आहेत?
अ) कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा हेतू असतो.
ब) व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते
क) उद्योग उभारणीसंदर्भात मालक स्वतः निर्णय घेतात
ड) यातील उत्पादनाचे कार्य व विभाजन सरकारमार्फत चालते
1. अ,ब
2. क,ड
3. अ,ब,क,ड
4. अ,ब,क✅

2.  पर्याप्त लोकसंख्येची वौशिष्ट्ये ओळखा?
अ) यामध्ये उपलब्ध साधनसामग्रीचा परिपूर्ण वापर केला जातो
ब) उपलब्ध साधनसामग्री गरजे एवढी निर्माण झालेली असते
क) देशातील लोकसंख्येचे आदर्श आकारमान दर्शवते
1. अ,क बरोबर✅
2. अ,ब,क बरोबर
3. ब,क बरोबर
4. अ,ब बरोबर

3. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा उपयोग होतो?
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) सहकार क्षेत्र
क) समाजवादी क्षेत्र
ड) खाजगी क्षेत्र
1. अ,ड✅
2. ब,क
3. क,ड
4. अ,ब

4. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राची निवड करावी लागते
अ) श्रमप्रधान तंत्र
ब) कृषिप्रधान तंत्र
क) भांडवलप्रधान तंत्र
1. अ,ब,क
2. अ,ब
3. अ,क✅
4.ब,क

5. खालील विधानातून योग्य पर्याय ओळखा
अ) भूमी, श्रम, भांडवल इत्यादी घटकांच्या कमतरतेमुळे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन घटते
ब) औद्योगिक कलहामुळे उत्पादन प्रभावित होते
क) सुखचैनीच्या वस्तू वाढीमुळे बाजार भावात घट होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,क
4.अ,ब,क

6.वस्तू व सेवांच्या तुलनेत पैशाचा पुरवठा अतिरिक्त झाल्यास पुढील कोणत्या मौद्रीक अधिकाराचा वापर करून ते कमी केले जातात
अ) बँक दर वाढवणे
ब) सरकारी कर्जखोऱ्याची खरेदी
क) रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करणे
1. अ
2.ब
3. अ,ब,क
4. अ,क✅

7. राष्ट्रीय उत्पन्नाची योग्य वैशिष्ट्य ओळखा
अ) राष्ट्रीय उत्पन्न ही समग्रलकशी संकल्पना आहे
ब) राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे
क) राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पैशात व्यक्त केलेले मूल्य
ड) राष्ट्रीय उत्पन्नात घसारा मोजला जातो
1. अ,ब,ड
2. अ,क,ड
3. ब,क,ड
4. अ,ब,क✅

8. खालीलपैकी कोणत्या कारणाने वस्तू विनियमात अडचण होती, याबाबत अयोग्य विधाने ओळखा
अ) गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव
ब) मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव
क) वस्तूंचा साठा कऱण्यातील अडचण
ड) विलंबित देणी देण्यातील अडचण
1, अ,ब
2. ब,व क
3. यापैकी नाही✅
4. अ,ब,क,ड

9. खालीलपैकी कोणत्या चलनप्रकारात अतिरिक्त चलननिर्मितीचा धोका संभवतो
अ) प्रातिनिधिक कागदी चलन
ब) परिवर्तनीय कागदी चलन
क) अपरिवर्तनीय कागदी चलन
1. अ,ब
2. अ,क
3. ब,क✅
4. अ,ब,क

10. रेपो दर वाढिचा खालीलपैकी कोणता परिणाम आहे?
अ) चलनपुरवठा कमी होतो
ब) महागाईत वाढ होते
क) व्यक्तींची व्यय शक्ती वाढते
ड) उत्पादनात वाढ होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,ड
4. अ,ब,क

1. वस्तू व सेवांच्या उत्पादनात घट होण्याची प्रमुख कारणे कोणती?
अ) उत्पादन घटकांची टंचाई
ब) औद्योगिक कलह
क) नैसर्गिक आपत्ती
ड) कर कपात
1. अ,ब,ड✅
2. ब,क,ड
3. अ,क,ड
4. अ,ब

2. अर्थव्यवस्थेत पुढील कोणत्या घटकांचा विचार केला जातो?
अ)  उत्पादन
ब) उपभोग
क) वितरण
ड) उपलब्ध साधनसामग्रीचे विभाजन
1. अ,ब,क
2. अ,ब
3. अ,क
4. वरील सर्व✅

3. भौतिक जीवनमान निर्देशांकावर काही मर्यादा आहेत. याबाबत अयोग्य विधान ओळखा
अ) बेरोजगारी, गृहनिर्माण, न्याय सुरक्षितता, मानवी हक्क हे घटक दुर्लक्षित झाले आहेत
ब) यात निर्देशकांचे तीन घटक सारखे महत्वाचे असतात
क) या निर्देशांकाद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलाचे स्पष्टीकरण करता येते.
1. अ,ब
2. ब,क
3. अ,ब,क
4. क✅

4खालीलपैकी कोणते आर्थिक वृद्धीचे निर्देशक मानले जाते?
अ) स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाढ
ब) दरडोई उत्पन्नामध्ये वाढ
क) दरडोई उपभोगात  वाढ
ड) लोकांचा सहभाग
1. अ,ब,क✅
2. ब,क,ड
3. ब,क
4. वरील सर्व

5. टेलिफोन क्षेत्राबाबत अयोग्य पर्याय ओळखा
1. महानगर टेलिफोन निगम. लि
2. भारत संचार निगम लि
3. टेलिकॉम रेग्युलिटी ऑथिरिटी लि✅
4. विदेश संचार निगम लि

6. खालीलपैकी दारिद्र्याचे आर्थिक परिणाम कोणते
अ) उत्पन्नात विषमता
ब) संसाधनांचा अपव्यय
क) मानवी मूल्यांचा ऱ्हास
ड) आर्थिक गुन्हेगारीत वाढ
1. अ,ब
2. ब,क,ड
3. अ,ब,ड✅
4. वरीलपैकी सर्व

7. मंदीच्या काळातील बेकारीला कोणती बेकारी म्हणतात
अ) घर्षणजन्य
ब) चक्रीय
क) ऐच्छिक
ड) संरचनात्मक
1. अ,ब,क
2. ब✅
3. अ,ब
4. वरील सर्व

8. खाजगिकरणाबाबत खालील कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत , याबाबत अयोग्य पर्याय ओळखा
1. उद्योगांना नवरत्नाचा दर्जा
2. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती
3. निर्गुंतवणूक धोरण
4. फेरा ऐवजी फेमा लागू✅

9. मानवी विकासाच्या प्राथमिक अवस्थेत पैसा म्हणून कशाचा वापर होत?
अ) पिसे , हस्तिदंत
ब) प्राण्यांची कातडी लोकर
क) मीठ, शिंपले
ड) नाणी
1. अ,ब,क✅
2. वरील सर्व
3. अ,ब,ड
4. अ,क,ड

10. खातेदाराने स्वाक्षरी केलेला दस्तऐवज घेवून आल्यास, त्यात नमूद केलेली रक्कम त्यास द्यावी असा आदेश म्हणजे काय?
अ) हुंडी वटवणे
ब) रोख कर्ज
क) अल्प मुदत कर्ज
1. ब,क बरोबर
2. फक्त अ बरोबर✅
3. अ,क
4. फक्त ड

1. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा?
अ) न्यून लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या खूप जास्त असणे
ब) न्यून लोकसंख्या म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीचापूर्ण वापर करण्यासाठी लोकसंख्या पुरेशी असणे
क) न्यून लोकसंख्येचे उदाहरण भारत आहे
1. अ,क बरोबर
2. अ,ब,क बरोबर
3. फक्त ब बरोबर
4. वरीलपैकी एकही नाही✅

2. श्रमापेक्षा यंत्रसामुग्रीचा जास्त वापर ...... यंत्रणांमध्ये केला जातो?
1. भांडवलप्रधान ✅
2. श्रमप्रधान
3. पारंपरिक
4. यापैकी नाही

3. केंद्र सरकार खालील गोष्टींसाठी जबाबदार असते?
1. अन्नधान्याची साठवणूक✅
2. शिधापत्रिकांचे वितरण
3. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची माहिती
4. स्वस्त धान्याच्या दुकानांच्या कामाचे पर्यवेक्षण

4. भाववाढीचे नकारात्मक परिणाम सांगा
1. खरेदीक्षमता घटते
2. बचत घटते✅
3. भांडवल उभारणी घटत
4. उत्पन्न वाढते

5.भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाबाबत योग्य विधाने ओळखा
1. देशाच्या उत्पादनात सध्या प्राथमिक क्षेत्रापेक्षा द्वितीयक क्षेत्राचा वाटा जास्त आहे✅
2. देशाच्या उत्पादनात सध्या द्वितीयक क्षेत्रापेक्षा प्राथमिक क्षेत्राचा वाटा जास्त आहे
3. देशाच्या उत्पादनात सध्या ्तृतीयक क्षेत्रापेक्षा द्वितीयक क्षेत्राचा वाटा जास्त आहे
4. देशाच्या उत्पादनात सध्या तृतीयक क्षेत्रापेक्षा प्राथमिक क्षेत्राचा वाटा जास्त आहे

6. सार्वजनिक उणीवांचा योग्य पर्याय ओळखा.
अ) गरिबांचा मर्यादित फायदा
ब) वितरकांचा फायदा होत नाही
क) शहरी पूर्वग्रह
ड) प्रादेशिक विषमता
1. अ,ब,क
2. ब,क,ड
3. अ,क,ड✅
4. यापैकी नाही

7.भारतात सार्वजनिक वितरण प्रणाली केव्हा अस्तित्वात आली
1. १९७२ च्या दुष्काळानंतर
2. २००० च्या दुष्काळानंतर
3. १९७३ च्या पहिल्या तेल झटक्यानंतर
4. १९४३ च्या बंगाल दुष्काळानंतर✅

8. भारतातील बेकारी नष्ट होण्यासाठी शासनाने खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत
अ) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम
ब) सीमांत शेतकरी व शेतमजूर कार्यक्रम
क) कृषी सेवाकेंद्र
ड) धडक कार्यक्रम
इ) जवाहर रोजगार योजना
उत्तर :-वरील सर्व✅

9.पुढील कोणते विधान अयोग्य आहे.
अ) दहशतवादामूळे विदेशी व्यापारावर विपरीत परिणाम होतो
ब) भ्रष्ट्राचारामुळे आर्थिक विषमता निर्माण होते
क) साठेबाजीमुळे वस्तूंच्या व सेवांच्या कृत्रिम तुटवडा निर्माण होतो
ड) उत्पादनात वाढ करण्याचा आकृतिबंध नैसर्गिक पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात घातक आहे
1. अ
2.ब
3. क
4. यापैकी नाही✅

10.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुरू केलेली जवाहर रोजगार योजना पुढील कोणत्या वर्गासाठी होती
अ) आदिवासी
ब) अनुसूचित जाती
क) वेठबिगार
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ ,ब
4. अ,ब,क✅

1. पुढील विधानांवर विचार करा.
अ) जेव्हा देशाची आयात जास्त असते तेव्हा देशाचा व्यापार प्रतिकूल असतो.
ब) जेव्हा देशाची निर्यात जास्त असते तेव्हा देशात भाववाढ होत असते.
1. अ बरोबर ब चूक
2. अ चूक ब बरोबर
3. अ व ब दोन्ही चूक
4. अ व ब दोन्ही बरोबर✅

2.भारतात सार्वजनिक वितरण प्रणाली केव्हा अस्तित्वात आली?
1. 1972 च्या दुष्काळानंतर
2. 2000 च्या दुष्काळानंतर
3. 1973 च्या पहिल्या तेल झटक्यांणातर
4. 1943 च्या बंगाल दुष्काळानंतर✅

3. ग्राहक संरक्षण कायद्याचे मुख्य उद्दिष्ट सांगा?
अ) ग्राहकांना चांगले व परिपूर्ण सरंक्षण देणे
ब) ग्राहकांवरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी सुलभ व वेगवान यंत्रणेची तरतूद करणे
क) भेसळयुक्त वस्तूची विक्री थांबवणे
ड) साठेबाजी व काळाबाजार करणे
1.अ,ब,ड
2. ब,क,ड
3. अ,ब✅
4. वरील सर्व

4.खालीलपैकी योग्य विधाने ओळखा
अ) आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेत गरिबी, बेरोजगारी, आर्थिक विषमता इत्यादी समस्या निराकरणाचा प्रयत्न केला जात नाही
ब) आर्थिकवृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे
1. अ बरोबर ब चूक
2. ब बरोबर अ चूक
3. दोन्ही बरोबर✅
4.दोन्ही चूक

5.भौतिक जीवनमान निर्देशकांचे निर्देशक घटक खालील पैकी कोणते?
अ) सरासरी आयुर्मान
ब) माता मृत्युदर
क) साक्षरतादार
ड) बालमृत्यूदर
1. अ,ब,ड
2. ब,क,ड
3. अ,क,ड✅
4. ब फक्त

6.अयोग्य पर्याय ओळखा
अ) आर्थिकवृद्धी होत असताना राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठा असतो
ब) आर्थिक विकास होत असताना राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा कमी कमी होत जातो तर उद्योग व  सेवाक्षेत्राचा वाटा वाढत जातो
1. अ
2. ब
3. अ व ब
4. यापैकी नाही✅

7.शासनाने गरिबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष उपाय योजनांबाबत अयोग्य पर्याय ओळखा.
1. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम- कामाच्या बदल्यात धान्य
2. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम- पदवीधरांना स्वयंरोजगारासाठी मदत✅
3 .स्वयंरोजगारासाठी  ग्रामीण युवकांना प्रशिक्षण- स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण
4. जवाहर रोजगार योजना

8.भारतातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये ओळखा
अ) जन्मदर व मृत्युदर यातील घटता फरक
ब) घटता बालमृत्यूदर
क) लोकसंख्या दशवार्षिक वाढीचा घटता दर
ड) कमी जन्मदर व उच्च मृत्युदर
1. अ,ब
2. अ,ब,क✅
3. वरील सर्व
4. यापैकी नाही

9.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) लोकसंख्या स्थित्यंतराचा सिद्धांत जन्मदाराचे व मृत्यूदराचे उच्च वेगकडून कमी वेगाकडे स्थित्यंतर स्पष्ट करते
ब) १९२१ या वर्षाला महाविभाजन वर्षे असे म्हणतात
1. केवळ अ
2. केवळ ब
3. अ आणि ब✅
4. अ व ब दोन्ही नाहीत

10. कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
1.1950
2. 1956
3. 1952✅
4. 2000

1. बेकारीच्या आर्थिक परिणामविषयी चुकीचे विधान ओळखा?
अ) संसाधनांचा अपव्यय
ब) कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अवघड
क) दारिद्र्य व उत्पादनातील विषमता
ड) आर्थिक गुन्हेगारीत वाढ
इ) अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता भर
1. अ,ब
2. क,ड,इ
3. यापैकी नाही✅
4. वरील सर्व

2.1991 साली नवीन आर्थिक धोरणाची आवश्यकता खालील कोणत्या कारणावरून वाटू लागली?
अ) आर्थिक अस्थिरता
ब) प्रतिकूल व्यापरतोल
क) कर्जाचा वाढता भार
ड) भाववाढ
इ) जर्मनीचे विघटन
1. अ,ब,क,ड
2. अ,ब,क✅
3. ब,क,ड,इ
4. वरील सर्व

3.खालीलपैकी आधुनिक काळातील सर्वात महत्वाची समस्या कोणती?
अ) पर्यावरण हानी
ब) बेरोजगारी
क) रोगराई
ड) प्रतिकूल मान्सून
1. अ✅
2. अ,ब,क
3. क,ड
4. वरील सर्व

4.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे
अ) प्रचलित मजुरी दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असतानाही न मिळणे म्हणजे बेकारी होय
ब) तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्या अवस्थेत प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेकारीला चक्रीय बेकारी असे म्हणतात.
क) जेव्हा अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल होतात त्याला संरचनात्मक बेकारी म्हणतात
1. अ, क
2. ब,क
3. अ,ब
4. वरील सर्व✅

5.भारतातील उच्च जन्मदराच्या कारणांपैकी अयोग्य कारण ओळखा.
अ) सार्वत्रिक विवाह
ब) दारिद्र्य
क) स्त्रियांचा निम्न दर्जा
ड) वाढती साक्षरता
1.अ,ब,क
2. ब,क,ड
3. अ,ब,क,ड
4. ड✅

6.जागतिकीकरणात पुढील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो
अ) आधुनिक दळणवळण
ब) माहिती तंत्रज्ञान
क) प्रगत वाहतूक
ड) डॉलर ची निर्मिती
1. अ,क
2. अ,ब,ड
3. अ,ब,क✅
4. अ,क,ड

7.भारतातील खनिज तेलाबाबत अयोग्य विधान ओळखा.
अ) भारतात तेल संशोधनासाठी तेल आणि नैसर्गिक वायू मंडळाची स्थापना करण्यात आली
ब) 1959 साली ऑइल इंडिया लिमिटेड ची स्थापना करण्यात आली.
1. अ
2. ब
3. अ व ब
4. यापैकी नाही✅

8.10 व्या पंचवार्षिक योजनेबाबत अयोग्य विधाने ओळखा.
1. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये वार्षिक सरासरी वृद्धी 7.8% झाली
2. त्यामुळे भारत हा वेगाने विकास करणारा देश ठरला.✅
3. औद्योगिक क्षेत्रातील वृद्धी 8.8% वार्षिक दराने वाढली
4. फेब्रुवारी 2007  मध्ये भारताचा विदेशी चलनाचा साठा 185  बिलिअन डॉलर पर्यंत पोहोचला होता.

9. खालीलपैकी कोणत्या कारणाने कागदी चलनाची निर्मिती झाली
अ) धातू, पैसा वाहून नेण्याच्या अडचणीमुळे 
ब) सोने, चांदीचा पुरवठा कमी असल्यामुळे
क) नाण्यात होणाऱ्या झीजमुळे
1. फक्त अ
2. अ व ब
3. अ व क
4. वरील सर्व✅

10.राष्ट्रीय उत्पन्न हा चक्रीय प्रवाह आहे , कारण......
अ) उत्पन्न हे दरवर्षी मोजले जाते
ब) एका व्यक्तीचे उत्पन्न म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा खर्च होय.
1. अ बरोबर
2. ब बरोबर✅
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक

1. ई. स. 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले.
1. प्रा सोलो आणि सम्यूल्सन
2. गुंन्नर मीरडाल आणि प्रा राजन
3. प्रा विल्यम नॉरधस आणि प्रा पॉल रोमर ✅
4.अमर्त्य सेन आणि प्रसू

2. लेखक समिती व त्यांच्या दारिद्रयाच्या संकल्पना यांची योग्य जोडी लावा
        अ गट
अ. जागतिक बँक
ब. श्री  गौरव दत्त
क. लकडावाला समिती
ड. डॉ दांडेकर आणि डॉ रथ
         
          ब गट
I. दरडोई दर दिवशी ग्रामीण भागात 2400 उष्मांक आणि शहरी भागात 2100 उष्मांक मिळण्याइतके अन्नधान्य मिळणे आवश्यक.
II. दारिद्र यातील अंतर (दारिद्रय आतील पोकळी)
III. दरडोई दर दिवशी आहारासाठी 2250 उष्मांकापेक्षा कमी अन्न मिळणे
IV. 1973- 74 च्या किमतीनुसार ज्यांना दरडोई महिना ग्रामीण भागात रुपये 49.0 नऊ आणि शहरी भागात रुपये 57 आहारासाठी मिळत नाहीत
✅उत्तर:- अ-IV, ब-III, क- I, ड- II

3. घाऊक किंमत निर्देशांका मध्ये (WPI) पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतींचा विचार केला जातो?
अ. प्राथमिक वस्तू
ब. इंधन
क. उत्पादित वस्तू
1. फक्त अ आणि क
2. फक्त अ आणि ब
3. फक्त ब
4. वरील सर्व✅

4. पी डी ओझा (1960-61) समितीने दारिद्र्यरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता?
1. प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न
2. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च✅
3. वरील दोन्ही
4. यापैकी नाही

5. सर्वसमावेशक वृद्धि प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे?
अ. महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण
ब. सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण
क. वरीलपैकी दोन्ही
ड. यापैकी नाही

6. योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.
अ. देशाच्या अन्नधान्य उत्पादनात चार पट वाढ झाली भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले
ब. आयातपर्यायी करण निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला
क. दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले
ड. उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले
1.ब, क, ड
2.ब, क
3.अ, ब✅
4. क, ड

7. खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही?
1. अति गरिबी आणि भूक यांचे उच्चाटन
2. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता
3. बालमृत्यू दर कमी करणे
4. कृषी शाश्वतता साध्य करणे✅

8. लिंग असमानता निर्देशांकामध्ये(GII) पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो?
अ. प्रजनन स्वास्थ्य
ब.सबलीकरण
क.श्रम बाजार
1.अ, ब
2.ब, क
3.ब
4.अ, ब, क, ड✅
या प्रश्नामध्ये अ ब आणि क हे तीनच पॉइंट दिले असुन उत्तरामध्ये मात्र अबकड असे चार पर्याय दिल्यामुळे हा प्रश्न चुकीचा असल्याने याचा एक गुण आयोगामार्फत दिला जाऊ शकतो

9. अल्पसंख्यांक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या योजना उपयोगी आहेत?
अ. नई रोशनी
ब. पढो परदेस
क. शिका व कमवा
ड. नई मंजिल
1. अ, ब
2. क, ड
3. वरीलपैकी कोणतेही नाही
4. वरील सर्व

10. जून 2012 मध्ये Rio+20 घोषणापत्र संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्ट (SDGs) ठरविण्यात आली त्यानुसार पुढील पैकी कोणती वैशिष्ट्ये ठरविण्यात आलेले नव्हते?
अ. गरिबीचे उच्चाटन असमान ती विरुद्ध संघर्ष लिंगभाव समानता
ब. आरोग्य व शिक्षण सुधारणा महासागर व जंगल रक्षण
क. अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी पाठपुरावा आणि समीक्षा साठी प्रभावी संरचना विकास
ड. अतिरेकी संघटना वर बंदी आणि पर आक्रमण वर बंदी
1.क, ड
2.अ, ब, क
3. ड
4.अ

11. वित्तीय सर्वसमावेशकते आपण चुकीचा प्रश्न साठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली?
1. 16 मे 2014
2. 15 में 2014
3. 28 ऑगस्ट 2014✅
4. 18 नोवेम्बर 2014

12. सन 1991 मध्ये विकासाचे एल पी जी प्रतिमान.......
या त्या वेळच्या अर्थमंत्र्यांनी अमलात आणले?
1.पी व्ही नरसिंहराव
2. प्रणव मुखर्जी
3. डॉ मनमोहन सिंग ✅
4. पी चिदंबरम