mpsc लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
mpsc लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२३ मे २०२६

My Strategy : संयुक्त पूर्व परीक्षा

1) पेपर सोडवत असतांना जे जे प्रश्न sure येत असतील ते लगेच Answersheet वर गोल करून घ्या, ह्यामुळे तुमचे 5 मिनिटे वाचतात व त्याचा शेवटी गणिते सोडवताना उपयोग होतो.

शेवटी गोल काळे करण्यामुळे गोंधळात ते चुकतात आणि वेळ वाया जातो.


2) Avoid YZ Questions : काही प्रश्न हे निव्वळ तुमचा वेळ वाया घालवण्यासाठी दिलेले असतात ,असे काही प्रश्न इतिहास,विज्ञान व गणितात असतात ते Skip करत चला.


3) Attempt किती ठेवावा ? : ज्यांना STI/ASO द्यायचा आहे त्यांनी जरूर Attempt 90+ ठेवावा. PSI फोकस असणाऱ्यांनी 85-90 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा.


4) आज आणि उद्या महत्वाचे चार्ट/कलमे/आकडेवारी/गणिते सूत्र/current topics बघून घ्यावे


5) Be Positive: काही जणांना पेपर सोडविताना घबराट होते, कृपया मनात आत्मविश्वास बाळगा ,पेपर सुरू होण्याच्या आधी 10 मिनिटे डोळे लावून आपल्या प्रेरणस्थानाचे स्मरण करा.


6) लक्षात ठेवा तुमची लढाई ही "स्व" ची "स्वतःशी" आहे 


7) Avoid Silly Mistakes: प्रश्न नीट वाचत चला ,गोल काळे करतांना आधी option वर टिक करूनच गोल काळे करा,चूक /अचूक इ. शब्दाला underline करून option select करा.


8) केंद्रावर पोहोचल्यावर मित्रांना भेटून फालतू गप्पा करायच्या टाळून ,चालू घडामोडी वाचण्यावर भर दिला तर उत्तम.

राज्यसेवा पूर्व साठी शेवटच्या आठवड्यात strategy काय असावी-



सर्वप्रथम तुमचा आधीपासून महिन्याभरापासून ज्या planning ने अभ्यास चालू आहे त्याच नियोजनाद्वारे अभ्यास चालू ठेवा, शेवटच्या आठवडा आहे म्हणून सगळे विषय पुन्हा करण्याचं असाध्य नियोजन करू नका. 


✳️ CSAT बद्दल:-


CSAT चा दिवसाला एक Question पेपर time लावून solve करून त्याचे analysis करा.(वेळ दुपारी ३ ते ५ च असू द्या)

शक्यतो आयोगाच्या पूर्वीच्या Question पेपरवरच भर द्या.

गणिते सोडविण्यासाठी गेल्या दोन वर्षांच्या  गट-ब पूर्व व मुख्य परीक्षेच्या पेपरचा सुद्धा वापर करा.

गणिताचे फॉर्म्युले, logics एका पेजवर separately काढून ठेवा आणि त्यांची वेळोवेळी उजळणी करा. 


✳️ GS बद्दल:-


संपूर्ण GS पुन्हा आठवडाभरात संपवण्याच्या  मागे लागू नका, त्याऐवजी स्वतः चा अभ्यास check करायचा असेल तर PYQ सोडवा.

असे topics जे की फक्त पुर्वलाच आहेत आणि तुमचे वाचायचे राहिले आहेत तर ते वाचून काढा जसे की :- Ancient history, World geography.

रात्री जेवल्यानंतर एक तास रिलॅक्सेशन म्हणून current affairs वाचा.

पेपरच्या आदिच्या दिवशी काय वाचायचे आहे त्याची एक यादी तयार करा:-

जसे की:-

1. CSAT फॉर्म्युले व logics.

2. तयार केलेल charts:-Constitutional non constitutional bodies.

3. जनगणना च्या notes.

4. Constitution चे महत्त्वाचे  articles.

5. World geography Maps.



✳️ काही महत्वाच्य‍ा गोष्टी:-

नवीन काही वाचू नका, जे काही आधी वाचले आहे तेच वाचा.

Daily अभ्यास 9 ते 10 तास खूप झाला, परीक्षा आली आहे म्हणून खूप अवाजवी असा अभ्यास करायला जावू नका कारण लक्षात ठेवा ही परीक्षा फक्त अभ्यासाचीच नाही तर तुमच्या संयमाची व आत्मविश्वासाची पण आहे.

स्वतःचे झोपण्याचे खाण्या-पिण्याचे एक चांगले routine असू द्या.

रात्री जागणे, दिवसा झोपणे, बाहेरचे खाणे या गोष्टी टाळाच.

Group discussion पेक्षा Self study वर च भर द्या.

स्वतःच्या अभ्यासाची हुशारीची इतरांबरोबर तुलना करू नका.

अनावश्यक व दडपण आणणार्‍या गोष्टींची चर्चा टाळा व अशा लोकांपासून पण दूर राहा जसे की पेपर कसा असेल, पेपरच्या आधीच cut off किती असेल, जागा वाढतील का वगैरे वगैरे..



येणाऱ्या राज्यसेवा पूर्व साठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा.💐


यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 प्रश्न ,-दमण व दीव येथील मुख्य भाषा कोणती?

अ) पंजाबी

ब) गुजराती✅

क) हिंदी

ड) तमिळ

___________


प्रश्न-भारतीय कृषि अनुसंधान संस्था कोठे आहे?

अ) मुंबई

ब) कानपूर

क) नवी दिल्ली✅

ड) कर्नाल

___________


प्रश्न-दुधाचा महापूर हि योजना भारतात दुसऱ्यांदा केव्हा सुरू झाली?

अ)1971

ब)1975

क)1979✅

ड)1991

___________


प्रश्न-दुधाचा महापूर ही योजना भारतात  तिसऱ्यांदा केव्हा सुरू झाली?

अ)1971

ब)1979

क)1991✅

ड) यापैकी नाही

___________


प्रश्न-2011 साली झालेली भारताची कितवी लोकसंख्या जनगणना होती?

अ) 13वी

ब) 14वी

क)15वी✅

ड)16वी

___________


प्रश्न-पंडित जवाहरलाल नेहरू यांनी राष्ट्राला दान दिलेले राहते घर कोणते?

अ) लोथल

ब) आगाखान पॅलेस

क) आनंद

ड) आनंद भवन✅

___________


प्रश्न-दलितांचा मुक्ती राजा या शब्दात डॉक्टर आंबेडकरांचा गौरव कोणी केला?

अ) डॉक्टर बेव्हरेल  निकोल्स

ब) शाहू महाराज✅

क) महात्मा ज्योतिबा फुले

ड) यापैकी नाही

___________


प्रश्न- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना बौद्ध धर्माची दीक्षा कोणी दिली?

अ) भंते प्रज्ञानंद

ब) भंते चंद्रमणी महास्थिर✅

क) भंते सद्दतिस्स

ड) भंते संघरत्न

___________


प्रश्न-1952 मध्ये कोलंबिया विद्यापीठाने डॉक्टर आंबेडकर यांना कोणती पदवी बहाल केली?

अ) एम. ए.

ब) पी.एच.डी✅ 

क) एल. एल.डी 

ड) डी. एस.सी.

___________


प्रश्न-विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ओबीसी समाज बांधवांच्या हक्क अधिकारांसाठी संविधानात कोणत्या कलमाची निर्मिती केली?

अ) कलम 340✅

ब) कलम 341

क) कलम 342

ड) कलम 343

___________


प्रश्न-विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न हा पुरस्कार कोणत्या साली मिळाला?

अ) 1989 

ब) 1990✅

क) 1992 

ड) 1994

___________


प्रश्न-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेला शेवटचा ग्रंथ कोणता?

अ) थॉट्स ऑन पाकिस्तान✅

ब) बुद्ध आणि त्यांचा धम्म

क) हू वेअर शुद्राज

ड) द अनटचेबल्स

___________


प्रश्न- एकात्मिक आदर्श कृषि ग्राम योजना नुकतीच कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे?

अ) केरळ 

ब) बिहार 

क) उत्तराखंड✅

ड) महाराष्ट्र

___________


प्रश्न- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या तीन गुरु पैकी दुसऱ्या क्रमांकावर कोणाला गुरु मानले?

अ) महात्मा ज्योतिबा फुले 

ब) तथागत गौतम बुद्ध 

क) संत कबीर ✅

ड) यापैकी नाही

___________


प्रश्न-डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा कधी केली?

अ) 14 ऑक्टोबर 1935 

ब) 13 ऑक्टोबर 1955 

क) 14 ऑक्टोबर 1955 

ड) 13 ऑक्टोबर 1935✅

___________


प्रश्न -......... रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला?

अ) 1 ऑगस्ट 1920✅

ब) 1 ऑगस्ट 1925 

क) 1 ऑगस्ट 1929 

ड) 1 ऑगस्ट 1935

___________


प्रश्न - कोणत्या वर्षी सार्क संघटना स्थापन झाली?

अ) 1969 

ब) 1972 

क) 1980 

ड) 1985✅

__________


प्रश्न -...... हे एक जगातील सर्वात मोठे धरण आहे?

अ) जायकवाडी 

ब) भाक्रा नांगल✅ 

क) तुंगभद्रा 

ड) हीराकुंड

___________


प्रश्न - ओलान हे ऐतिहासिक शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?

अ) व्हेनिस✅

ब) नेपल्स 

क) मिलान

ड) तुरीन

___________


प्रश्न- भारत हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील .........क्रमांकाचा देश आहे?

अ) पहिल्या 

ब) सहाव्या 

क) सातव्या✅

ड) आठव्या

___________


प्रश्न - अंदमान निकोबार बेटाची राजधानी ......आहे?

अ) पोर्ट ब्लेअर✅ 

ब) कवरत्ती

क)  दिल्ली 

ड) सिल्वासा

___________


प्रश्न - इंदिरा गांधी कालवा....... राज्याच्या वायव्य भागात आहे?

अ) राजस्थान✅

ब) गुजरात 

क) उत्तर प्रदेश 

ड) मध्य प्रदेश

___________


प्रश्न - महात्मा गांधीजींनी हरिजन हे साप्ताहिक कधी सुरू केले?

अ) 1930 

ब) 1933✅

क) 1936 

ड) 1939

___________


प्रश्न-कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी म्हणतात?

अ) वेदगंगा 

ब) वारणा

क) कृष्णा

ड) पंचगंगा✅

___________


प्रश्न -1965 मध्ये आशियातील पहिले निर्यात प्रक्रिया क्षेत्र भारतात कोणत्या ठिकाणी स्थापन झाले?

अ) विशाखापट्टणम 

ब) कांडला✅

क) कोचीन 

ड) यापैकी नाही

सामान्य ज्ञान - प्रश्न उत्तरे

1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

साडी


2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

 अरबी समुद्र


3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

ठोसेघर धबधबा


4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

औरंगाबाद


5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

पुणे


6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

 भूकंप


7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

 नाशिक


8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

गोदावरी


9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

नांदेड


10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

 औरंगाबाद


11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

अकोला


12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

1962


13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

 थंड हवेची ठिकाणे


14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

 गडचिरोली


15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

 रत्नागिरी.

पोलीस भरती सराव १०० महत्त्वाचे प्रश्न

१) भीमा नदीचा …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ४५१ कि.मी

२)…. या जातीचा ससा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.

= लिपस निग्रीकोलीस

३) महाराष्ट्राचा आकार अनियमित असला तरी काहीसा …. सारखा आहे.

= काटकोन त्रिकोण

४) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक …..

= ऊस

५) राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये अभ्रकाचे साठे आढळतात.

= सिंधुदुर्ग, चंद्रपूर व नागपूर

६) चद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते?

= वैनगंगा

७) महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते?

= इंद्रावती

८) राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून पुणे जिल्ह्याचा, तर ‘सर्वाधिक घनतेचा जिल्हा’ म्हणून …. जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो.

=मुंबई उपनगर

९) रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती?

= शुक्र

१०) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे ?

= १०
११) ….. ही पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत मोठी खाडी आहे.

= धरमतर

१२) कसारा घाट’ म्हणजेच …..

= थळघाट

१३) सन १९६० मध्ये …. या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याने तो दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.

= १ मे

१४).…. या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते.

= १ नोव्हेंबर, १९५६

१५) सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून ….हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

= गुजरात

१६) महाराष्ट्रातील दक्षिण-उत्तर पसरलेल्या ……….पर्वतरांगेस ‘पश्चिम घाट’ असेही म्हणतात.

= सह्य

१७) ….. या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते.

= नागपूर

१८) नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर …. येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा होतो.

= गंगापूर

१९) अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगररांगा, बालाघाट डोंगररांगा व महादेव डोंगररांगा या वास्तविक ….. या पर्वताच्याच उपरांगा होत.

= सह्य

२०) राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?

= कृष्णा

२१) जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला …. पर्यंत पाणी टंचाई मुक्त करण्याचा आहे.

= सन २०१९

२२) भारतातील एकूण साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. किती टक्के?

= ३६ टक्के

२३) सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून …. या जिल्ह्याचा निर्दश करावा लागेल.

= सिंधुदुर्ग

२४) भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या …. या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो.

= खानदेशी

२५) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत अनुसूचित जातींचे प्रमाण ११.८ टक्के इतके, तर अनुसूचित जमातींचे प्रमाण …. टक्के इतके आहे.

= ९.४

२६) दुग्ध उत्पादनात राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो?

= सातवा

२७) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार राज्यातील भौगोलिक क्षेत्राशी बनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण …. इतके आहे.

= १६.४७ टक्के

२८) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार भारतातील एकूण क्षेत्राच्या अवघे …. इतके वनक्षेत्र महाराष्ट्रात आहे.

= ७.१६ टक्के

२९) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

३०) सह्याद्रीच्या पूर्वाभिमुख उतारावर कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात ?

= शुष्क पानझडी वृक्षांची वने

३१) …. पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलदुभाजक म्हटले जाते.

= सह्य

३२) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

३३) कोकण किनारा ‘रिया’ प्रकारचा असून या किनाऱ्यावर …. जवळ ‘सागरी गुहा’ आढळतात.

= मालवण

३४) सह्य पर्वताची एकूण लांबी सुमारे १,६०० कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे.

= ६४० कि. मी.

३५) उत्तरेस सातमाळा-अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेस हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. चे खोरे पसरलेले आहे.

= गोदावरी

३६) उत्तरेला हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर व दक्षिणेला महादेवाचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. नदीचे खोरे पसरलेले आहे.

= भीमा

३७) पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात येथे कृष्णेस मिळते.

= कुरुगड्डी

३८) गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे १,४६५ कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ७३२ कि. मी.

३९) केंद्र स्तरावरील सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?

= आमदार आदर्श ग्राम योजना

४०) तापी नदी महाराष्ट्रातील …….या जिल्ह्यांतून वाहत जाते.

= जळगाव, नंदुरबार व धुळे

४१) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या …. या धरणातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो.

= मोडकसागर

४२) …. ही पर्वतराग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्शून गेलेली आहे.

= सातपुडा

४३) डिसेंबर, २०१८ अखेर राज्यात एकूण दूरध्वनी जोडण्यांची संख्या …. इतकी होती.

= ४५.१० लाख

४४) हि राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा’ तसेच ‘वृद्धगंगा’ म्हणून ओळखली जाते.

= गोदावरी

४५) महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैत्रत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः …. या कालखंडातपडत असतो.

= जुन ते सप्टेंबर

४६) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

४७) खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील …. हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे.

= विदर्भ

४८) सह्य पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती …. मुळे झाली आहे.

= प्रस्तरभंग

४९) राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात …. प्रकारचा पाऊस पडतो.

= प्रतिरोध

५०) सागाची झाडे …. प्रकारच्या अरण्यात आढळतात.

= पानझडी वृक्षांची अरण्ये

५१) महाराष्ट्रात लाकूड-कटाईचे कारखाने (सॉ-मिल्स) …. या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आहेत.

= चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती

५२) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात ….

= माडिया-गोंड

५३) राज्यातील …. या विभागात सर्वांत कमी वने आढळतात.

= मराठवाडा

५४) महाराष्ट्र पठारावरील …. या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.

= महादेव डोंगररांग

५५) हरिश्चंद्र-बालाघाट’ या डोंगररांगेमुळे …. या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत.

= गोदावरी व भीमा

56) ‘गाविलगड’ व ‘नर्नाळा’ हे प्रसिद्ध किल्ले …. या पर्वतावर वसले आहेत.

= सातपुडा

57) अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर, सह्य पर्वतावर वसलेले ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वतशिखर असून त्याची उंची …. इतकी आहे.

= १,६४६ मीटर

58) अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी …. नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे.

= उल्हास

59) ….. या जिल्ह्यांना पूर्वी ‘खानदेश’ म्हणून ओळखले जाई.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

६०) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ या नदीच्या काठी वसले आहे.

= दहिसर

६१) नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना …. हा घाट पार करावा लागतो.

= कसारा

६२)’कस्तुरी’ मांजर राज्यात …. जिल्ह्यांत आढळते.
= रायगड व रत्नागिरी

६३) गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्त्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली ‘वर्धा योजना’ ….या वर्षीच्या गांधी जयंतीपासून वर्धा जिल्ह्यात राबविली जात आहे.

= १९८३

६४) एकोणिसाव्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधनात राज्याचा कितवा क्रमांक लागतो?

= सहावा

६५)संजय गांधी निराधार अनुदान’ योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा …. इतके आर्थिक साहाय्य देण्यात येते.

= रुपये ६००/

६६) महाराष्ट्रातील…. या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात ‘सेऊन देश’ असा केला गेला आहे.

= खानदेश (धुळे, नंदुरबार, जळगाव)

६७) केंद्र शासनाने ‘अतिमागास’ म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील जमाती ….

= चंद्रपूर : माडिया-गोंड; यवतमाळ
नांदेड : कोलाम ; ठाणे, रायगड : कातकरी

६८) …. हे दोन महाराष्ट्राचे प्रमुख स्वाभाविक विभाग होत.

= कोकण व पठार (देश)

६९) कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या ‘जांभा’ या प्रकारच्या मातीत …. यांचे प्रमाण अधिक असते.

= लोह व जस्त

७०) महाराष्ट्राची सीमा खालील सहा राज्यांना भिडलेली आहे

= गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़,
तेलंगाणा, कर्नाटक व गोवा

७१) पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या …. भागातील प्रमुख नद्या होत.

= विदर्भ

७२) ‘अहिराणी’ ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने …. या जिल्ह्यांत बोलली जाते.

= धुळे, नंदुरबार, जळगाव

७३) रोशा’ जातीचे गवत राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

७४) ‘कन्हान’, ‘वर्धा’ आणि ‘खोबरागडी’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= वैनगंगा

७५) एकूण लोकसंख्येशी असलेले नागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्राचा (४५.२२ टक्के) क्रमांक देशात तिसरा लागतो; तर …. या राज्याचा क्रमांक पहिला लागतो.

= तमिळनाडू (४८.४० टक्के)

७६) …. या नदीच्या खोऱ्यास ‘संतांची भूमी’ म्हणून संबोधले जाते.

= गोदावरी

७७) राज्यातील …. या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

= चंद्रपूर व गडचिरोली

७८) विड्या तयार करण्यासाठी तेंदूची (टेंभुर्णीची) पाने वापरतात. तेंदूची झाडे ….या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात.

= नागपूर, गोंदिया व भंडारा

७९) परकीय चलन मिळवून देणारा ‘हापूस’ जातीचा आंबा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.

= रत्नागिरी व सिंधुदुर्ग

८०) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे …. हे होत.

= सातारा व सांगली

८१) ‘काटेपूर्णा’ व ‘नळगंगा’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= पूर्णा

८२) सावंतवाडीहून बेळगावला जाताना लागणारा घाट …..

= आंबोली

८३) ‘पूर्णा’ व ‘गिरणा’ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

= तापी

८४) महाराष्ट्रात ……येथे रासायनिक द्रवांचे कारखाने आहेत.

= पनवेल व अंबरनाथ

८५) ‘पेंच ‘ प्रकल्पात महाराष्ट्राचे सहकारी राज्ये ….

= मध्य प्रदेश

८६) ….या विदर्भातील प्रमुख नद्या होत .

= वर्धा व वैनगंगा

८७) महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर लागणार घाट …..

= आंबेनळी

८८) महाराष्ट्रातील …..हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहेत.

= खान्देश व विदर्भ

८९) गिरणा ,पांझरा व बुराई या …च्या उपनद्या होत.

= तापी

९०) सातारा ,सांगली ,कोल्हापूर हि शहरे …….खोऱ्यात वसली आहेत .

= भीमा

९१) राज्यात काडीपेटी तयार करण्याचे कारखाने ….येथे आहेत .

= मुंबई ,नागपूर ,अंबरनाथ

९२) मराठीच्या ..या बोलीस किंवा उपभाषेस अहिरांची भाषा म्हणून ‘अहिराणी ‘असेही म्हणतात.

= खान्देशी

९३) तापी नदीची एकूण लांबी ७२४ कि .मी.असून तापीचा सुमारे ….चा प्रवाह राज्यातून गेला आहे.

= २२८ कि .मी .

९४) येरळा ,वारणा व पंचगंगा या ….नदीच्या उपनद्या वा तिला येऊन मिळणाऱ्या नद्या होत.

= कृष्णा

९५) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

९६)राज्यात एकूण ……जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत.

= ३१

९७) लोकआयुक्ताची नेमणूक कोण करतात ?

= राज्यपाल

९८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

९९) ‘लोकआयुक्त ‘ हे पद राज्यात आस्तित्वात आले .

= २५ ओक्टोम्बर ,१७७२

१००) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

१८ मे २०२६

माझ्या भावी अधिकारी मित्र आणी मैत्रीणीनो...



अभ्यास....अभ्यास....अभ्यास... करत असालच तर मनात कुठलीही भिती बाळगू नका... हरवलेला आत्मविश्वास शोधा त्याला आता बाहेर काढा... माहिती आहे मला की, अधिकारी होण्याचे स्वप्नं पाहणार्या मुलिंना अनेक मर्यादा आहेत आणी मुलांना बंधना सोबत अनेक जबाबदारी आहेत... आणी त्यात आयोगाचे पेपर पुढे ढकलले गेले आहेत याच डिप्रेशन येतय..! पण विद्यार्थी ना तुम्ही हे विसरून कस चालेल ? जरा शोधा बरं विद्यार्थी म्हणजे काय ? याचा उत्तर... "कुठल्याही ज्ञानाच्या धर्तीवर, विवेक बुद्धीने ज्ञान धारण करुन जगणारा म्हणजे विद्यार्थी. " मग तुम्हाला न्याय देता यायला हवा या विद्यार्थी दशेला...

त्यासाठी विद्यार्थी हा उताविळ नसावा तर तो संयमी, चिकित्सक, जिद्दी, ध्येयवाडी, प्रामाणिक आणी आत्मविश्वासू असावा. मागेच अयोगाने वेळापत्रक प्रसिद्ध केले आणी सगळेच जोमाने सिद्धत्वाच्या वाटेवर धावू लागले.. त्यात कालच बातमी धडकली की, " आयोगाने परीक्षा पुढे ढकलल्या..! " हे ऐकल आणी अनेक विद्यार्थी थबकले. काही लगेच तणावग्रस्त झाले. काही तर अक्षरशः व्हाटसअप, फेसबूक आणी सोशल मिडियावर ट्रोल करत आपल्यातला असंयमी विद्यार्थी प्रदर्शन करत निघाले. आयोग म्हणजे आज तमाम भावी अधिकारी वर्गाचे एक असे मंदिर आहे. जे तुम्हाला तुमच्या आयुष्याला प्रामाणीकपणाने न्याय देत आले आहे आणी देत आहे देत राहील...

मग तुमचा संयम जर आज फक्त परीक्षा पुढे ढकलल्या म्हणून जर सुटत असेल तर, ही धोक्याची घंटा म्हणावी लागेल... मित्रांनो जरा धीर धरा.. ही तूमच्या संयमाची परीक्षा आहे. त्यात यशस्वी व्हा. कारण संयम मातृत्व बहाल करतो. मग कोणते मातृत्व तर जिद्द, इच्छाशक्ती, आत्मविश्वास यांसारखी अनेक सामर्थ्यशील गुण संयमच जन्माला घालतो. मग बघा तुम्ही कुठल्या तणावात जगत आहे.. सोडा आता तरी त्या तणावाचे दार
..ह्वा तिथून फरार... आणी ठोठवा विवेक बुद्धीचे दार... शोधा तुमचे दोष, वाढवा तुमचा अभ्यासाचा व्यासंग... परीक्षा पुढ ढकलल्या गेल्या म्हणून टेंशन आले. ही कारण तुम्ही तुमच्या अपयशाला देऊ शकत नाही. पण परिक्षा आणी तुमच्यात पडलेल अंतर परिवर्तीत करा तुमच्या आत्मविश्वासात...

 वेळ वाया जातोय ही कारण तुमच ध्येय सिद्ध होईपर्यंत तुमचा वेळ वाया जातोय अस जिथ कुठ वाटेल ना तिथ थोड थांबा...! बघा आतमधे डोकाऊन मग मिळेल एक उत्तर की, वेळ वाया जात नाही तो आपण घालवतो आहे..! म्हणून संयम बाळगा...! देशाच्या जवानांसारखी तयारी ठेवा..! युद्धाची मानसीक व शारीरिक तयारी ते एका दिवसात नाही पुर्ण करत. ती तयारी ते रोजच करत असतात. म्हणून ते खचत नाही. अपयशाचा विचारही ते कधीच करत नाही. कधी समोरुन क्षत्रूची गोळी येईल आणी रक्त पिऊन कायमची घेऊन जाईल...पण ना असते चिंता ना असते भिती असते फक्त तयारी..!

ती तयारी करा.. अभ्यास झालय पुर्ण ही फालतू कारण देऊन आपल्या भविष्याचा, आईबापाच आणी स्वताःचा अपमान तरी करु नका. कारण अभ्यास हा कधीच कुणाचाही पुर्णपणे पुर्ण होत नाही अगदी मरेपर्यंत... मग तुमचा अभ्यास झाला हे कोणीही मान्य करणार नाही. अगदी तुमचे मनही हे वाक्य फेटाळून लावेल. अभ्यास झाला होता राव...! मूड़ ऑफ़ झालाय..! तयारी झाली होती राव..! आता काय काराव ? हा जर विचार करत असाल तर कुठतरी चुकता आहे. पुढचे वेळापत्रक येईपर्यंत रोजचा दिनक्रम तसाच ठेवा... झालच शक्य तर मानसीक तयारी करा. या परिक्षेसोबतच आयुष्यातील कुठल्याही परीक्षेला सामोरी जाण्याची तयारी... खंबीर, संयमी आणी शांत व्हा.. ती सर्वात मोठी ताकद आहे सामर्थ्याची...

 तुमच्यातला ध्येयवेडा माणुस कधीच शांत होऊ देऊ नका. तो शांत झाला तर वाट्याला येणारी प्रश्नावली आयुष्य नैराश्ययुक्त करते. मित्रांनो मला माझे शेकडो मित्र रोजच भेटतात. आणी एक निर्जीव वाक्य वापरतात. " सरकारी नौकरी मिळवण म्हणजे जोक नाही. " मान्य आहे मला हे सगळ. पण हे वाक्य कन्व्हर्ट करता यायला हव. हे वरील वाक्य विनोद आहे फक्त त्यांच्यासाठी जे जिवंतपणी मृत अवस्थेत जगत आहे.. हा विनोद आहे त्यांच्यासाठी जे आयुष्य फक्त मौजमजा करत वाया घालवत आहे मग तुम्ही कोण ? ठरवा... काय करनार हाती आलेल्या वेळेचा सदउपयोग कसा करावा ते.. कारण "प्रत्येक गोष्टीतिल वेळेचे योग्य व अचुक नियोजन तुम्हाला यशापर्यंत घेऊन जाते..."

शेवटी एकच सांगेल तुकोबारायांच्या शब्दात...

असाध्य ते साध्य करिता सायास
कारण अभ्यास तुका म्हणे...!

०६ मे २०२६

सयुक्त पूर्वपरीक्षा चा अभ्यास कसा करावा?

पूर्व परीक्षा (थोडक्यात)

 

 स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू करताना आपल्या मनात खूप गोष्टी आश्वासक पणे भरलेल्या असतात...लायब्ररी  मधे बसुन जेव्हा कंटाळा येतो तेव्हा प्रेरणादायी भाषण ऐकून आपन खूप उत्साहित होतो (माझेच भाषण ऐकून प्रेरित होणारे खूप आहेत पण अशी प्रेरणा 4-5 दिवसच  टिकते) तो उत्साह मनापासून यावा लागतो..नुसत inspirational speech बघून पोस्ट निघत नाही त्यासाठी खूप मनापासून कष्ट करावे लागतात.. नुसत घोकंपट्टी किंवा पुस्तके संपवून काही उपयोग नसतो..एकाच टॉपिक साठी 5-6 पुस्तके वापरतो आपन जे की पूर्णपणे चुकीचे आहे..चहाच्या नावाखाली 1-2 तास घालवणे म्हणजे refreshment अशी व्याख्या बनवली आपण..आठवड्यातून एक दिवस सुट्टी fix (पन मित्रांनो परीक्षा ही परीक्षा असते, ती रविवार, दिवाळी, दसरा, जत्रा, गणपती, ऊन,वारा, पाऊस असल काही बघत नसते, ती त्याच दिवशी होते..ONLINE STUDY च्या नावाखाली what's app, फेसबुक जोमात चालू असत. ऑनलाईन अभ्यास करून जास्त फायदा नाही (माझ वैयक्तिक मत आहे) कारण ऑनलाईन अभ्यासाची revision आपल्याकडून होत नाही…

#पूर्व परीक्षा - सर्वप्रथम आपल्या हे लक्षात आले पाहिजे की पूर्व परीक्षा कशासाठी आहे. 4-5 लाख विद्यार्थ्यांमध्ये 300-400 विद्यार्थी निवडायचे म्हणजे पूर्व लाच मोठी चाळण आहे. त्यासाठी पूर्व परीक्षेचा अभ्यास मुख्य परिक्षा पेक्षा जास्त लागतो. स्कोर असा आणायचा की merit मधे १० ते १५ मार्क्स जास्त.. पूर्व परीक्षेला topic खूप लिमिटेड असतात आणि फिक्स पण असतात.

#जेव्हा कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करतो तेव्हा अगोदर जुन्या question paper बघणे. आपल जेवढे चुकेल तेवढे लक्षात राहत. . त्यातून कळत काय करायच अणि काही नाही. मधे मधे कंटाळा आला तरी लगेच Question paper किंवा maps उघडायचे.. मी खूप question paper सोडवले, अगोदर आयोगाचे सोडवणे नंतर क्लासेस चे. (पैसे नसतील तर झेरॉक्स कॉपी आणून लायब्ररी मधे बसुन सोडवणे) . जेणेकरून मला पेपर चा पॅटर्न कळायला सोप गेल. एक वेळ वाचन कमी पण प्रश्ण जास्त. 

#उदाहरणार्थ - आधुनिक भारत आणि महाराष्ट्र चा detail अभ्यास करावा लागतो.

#भूगोल - संयुक्त पूर्व साठी साठी महाराष्ट्र आणि भारत या दोन गोष्टींकडे खूप वेळ द्यावा..आणि भूगोल चा अभ्यास करताना नेहमी ATLAS समोर असावा...कंटाळा आला की ATLAS पहायचा म्हणजे bor पण होत नाही... कोरे कागद घेऊन नद्या, पर्वत, ठिकाणे रेखाटत रहायची. Blank नकाशे घेऊन त्यावर पण नुसते marking करायच्या.. त्याने वाचायचा तान कमी होतो..  आपल्या संयुक्त पूर्व साठी महाराष्ट्र पूर्ण फोकस आणि भारत questions बघून करायला हवा. जग आणि फिजिकल चा एवढा उपयोग होत नाही. 

#Polity- संयुक्त पूर्व साठी आपन पूर्ण पुस्तक माहीत असण्यापेक्षा कलम 1 ते कलम 51A यांच्या बरोबरच कलम 52 ते 202 पर्यन्त सविस्तर माहिती, सर्व घटनादुरुस्ती, सर्व भाग अणि सर्व कलमाचे titles माहीत हवेत...पंचायतराज पण महत्वाचा आहे. (म्हणजे 2-3 प्रश्न येतात). आपण किमान निवडख घटक करून ठेवले तर फायदा आहे. या निवडक घटकांवर मी लिस्ट आपल्या The Achiever's Mentorship या टेलिग्राम चॅनल वर दिलेली आहे.

#अर्थशास्त्र - हा विषय बर्‍याच जणांना अवघड, किचकट वाटतो पण out of मार्क्स देणारा आहे हा.. पूर्व साठी खूप लिमिटेड टॉपिक आहेत. आर्थिक विकास (HDI) दारिद्रय़, बेरोजगारी. बॅंकिंग, World trade organization, IMF. world Bank. And some basic concepts like GDP. GNI. etc..


#Science -यामधे biology(human diseases, various systems,) अणि अलीकडे गणिते(mostly based on physics) यावर जास्त भर द्यावा लागेल कारण गेल्या दोन वर्षी पासून त्यावर जास्त question विचारतात. खर तर science खूप मोठा subject आहे पण त्याचे मार्क्स सुद्धा तेवढेच येतात. 14-15 question येतात.. पूर्व परीक्षेत science आणि csat (apti reasoning) या दोन गोष्टींवर मोठे लीड मिळू शकते..



#चालू घडामोडी - हमखास मार्क्स देणारा टॉपिक.. मागच्या एक वर्षातील परिक्रमा आणि कुठलेही 2 पुस्तके म्हणजे कुठल्याही एकाच प्रकाशन च्या मागील दोन आवृत्त्या. (dnyndeep, Unique, अभिनव प्रकाशन) वापरले तर बर्‍यापैकी मार्क्स मिळतात..


आपल्या ला mpsc मधे ज्ञान नाही तर मार्क्स मिळवावे लागतात (पर्सनल ओपिनियन) ..हा वास्तववादी दृष्टिकोन आहे. 

राहिला प्रश्ण गणिताचा तर बर्‍याच लोकांना गणिते अवघड जातात. मला पण खुप अवघड जायचे पण सगळेच गणिते सुटावी अस काही बंधन नाही. 15 पैकी 7-8 reasoning and 7-8 aptitude असतात.. 12 प्रश्न सोडवले तरी एक दोन चुकून देखील जास्त मार्क्स मिळतात. आणि गणित येत नसेल तर रिजनिंग व्यवस्थित सोडवणे 


# जर group discussion करायला जमत असेल तर नक्की करा. कारण दिवसभर अभ्यास करून कंटाळा आला असतो मग discussion मूळे refreshment होत राहते. थोडा फार जोक्स. मस्ती चालू असते पण खूप वेळ नको घालवायला त्यातच. 

मी booklistऑलरेडी अपलोड केली आहे..

शेवटी# MINIMUM READING, MAXIMUM REVISION. हेच परीक्षा पास होण्याच सूत्र आहे.. 

तुम्हाला येणाऱ्या मधील पूर्व परीक्षा साठी खूप खूप शुभेच्छा. मी BEST LUCK अस म्हणत नाही तर MAKE YOUR LUCK BEST अस म्हणतोय कारण आपल नशीब आपणच घडवू शकतो. 

#Share करा. जर at least 10-12 जणांना तरी याचा फायदा झाला तर मी एवढ टाइप केलेल सार्थक झाल म्हणुन समजेल. 

Thank you. 


संयुक्त पूर्व परीक्षा

 नमस्कार मित्रांनो,


आज आपण शेवटच्या 60 दिवसांमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी आणि 60 गुण कसे मिळवावेत याबाबत चर्चा करूयात..


⭕️ संयुक्त पूर्व परीक्षेचा निकाल पाहता आता सुरक्षित गुण किती असतील याबाबत कोणीच निश्चित सांगू शकत नाही. पहिल्या उत्तरतालिका नुसार किमान 60 गुण मिळवले तरच मुख्य परीक्षेला असण्याची खात्री राहणार आहे. सर्वांनी पूर्व परीक्षेला ठरवून 60 गुणांच्या वर स्कोर करण्याची आवश्यकता आहे.


⭕️ इतिहास -

मागील संयुक्त पूर्व परीक्षेचा पेपर पाहता असे लक्षात येते की नेहमीच त्रास देणाऱ्या इतिहास या विषयाने विद्यार्थी मित्रांना भरपूर मदत केलेली आहे. 15 पैकी 14 गुण मिळवणारे बरेच विद्यार्थी मी स्वतः पाहिलेले आहेत त्यामुळे यंदा इतिहासामध्ये, जर पेपरचा दर्जा मागील प्रमाणेच राहिला तर, किमान 12 गुण मिळवणे अनिवार्य राहणार आहे. इतिहासाचे तयारी करण्यासाठी गाठाळ सर किंवा कठारे सर या दोघांपैकी एका चे पुस्तक आपण वापरू शकता. इतिहासामध्ये ज्ञान मिळवणे मर्यादीत असल्याने लॉजिक डेव्हलपमेंट आणि एलिमिनेशन टेक्निक्स खूप काम करतात.त्याबाबत आपण आवर्जून विचार करावा


⭕️भगोल-

बाबतीत,15 पैकी किमान 10 गुण मिळाले तर आपण पूर्व परीक्षा सहजासहजी पास होऊ शकतो.भूगोलाचा अभ्यास करण्यासाठी सौदी सर किंवा खातीब सर किंवा दीपस्तंभ प्रकाशन यांचे पैकी कोणतेही एक महाराष्ट्राच्या भूगोल साठी वापरावे आणि भारताच्या भूगोलासाठी सौदी सरांचे पुस्तक वापरावे.


⭕️पॉलिटी-

 या विषयांमध्ये पूर्वी 10 पैकी 10 गुण मिळतात मात्र अभ्यासक्रमाचा आवाका व त्या तुलनेमध्ये कमी गुणांचा भारांक आणि आयोगाची प्रश्न विचारण्याची वाढत असलेली खोली पाहता सध्या आपणास 10 पैकी 7 ते 8 गुण मिळवणे आवश्यक असते. लक्ष्मीकांत सरांचे अथवा  कोळंबे सरांचे पुस्तक आपण यासाठी वापरू शकतो तसेच पंचायत राज या घटकावर येणाऱ्या 2 ते 3 प्रश्नांसाठी किशोर लवटे सरांचे पंचायत राज हे पुस्तक उपयुक्त ठरते. त्याचे वारंवार वाचन केले पाहिजे. शॉर्ट नोट्स बनवल्या पाहिजेत व त्याची वारंवार उजळणी झाली पाहिजे तरच प्रचंड डेटा आपल्या लक्षात राहू शकतो.


⭕️अर्थशास्त्र-

 येणाऱ्या प्रश्नांची काठिण्य पातळी सध्या कमी होत आहे म्हणजेच केवळ सर्वसामान्य अभ्यासावर आपण 15 पैकी 10 ते 12 गुण मिळवू शकतो. यासाठी देसले सर किंवा कोळंबे सर पैकी कोणतेही एक पुस्तक वाचण्यास पुरेसे ठरते. अर्थशास्त्राचे आयोगाचे मागील काही वर्षांचे प्रश्न पाहिल्यास आयोग कोणत्या घटकांवर किती आणि कसे प्रश्न विचारतो हे लक्षात येऊ शकते त्यामुळे पूर्वीच्या प्रश्नांना बिलकुल दुर्लक्षित करू नये.


⭕️विज्ञान -

हा घटक सर्वसामान्यपणे सर्वच जनतेला किचकट वाटणारा विषय आहे तसेच प्रश्नांचा दर्जा मध्ये आयोगाने सातत्य राखलेले नाही. त्यामुळे कधी अभ्यास करून कमी मार्क तर कधी अभ्यास न करता ही सरासरी मार्क मिळतात मात्र तरीही स्टेट बोर्ड इयत्ता 7 ते 10 वी च्या पुस्तकांवर आपली कमांड असायला हवी किंवा सचिन भस्के सरांच्या पुस्तकाच्या किमान 3 ते 4 उजळण्या व्हायला हव्यात. लक्षात ठेवा की जर विज्ञान विषय अवघड आला तर तो सर्वांसाठी अवघड असेल आणि सोपा ला करतो सर्वांसाठीच सोपा असेल त्यामुळे या विषयावर ती मेरीट ठरण्याची शक्यता फार कमी असते.


⭕️ चालू घडामोडी-

हा पूर्व परीक्षांमधील सर्वांत अनिश्चित विषय मला वाटतो.यासाठी आयोग नक्की कोणता source वापरतो हे निश्चित समजत नाही. मात्र असे असले तरीही 15 पैकी 8 प्रश्न प्रयत्नपूर्वक अभ्यास केल्याने सुटू शकतात. परिक्रमा हे मासिक किंवा अभिनव अथवा सिंपलिफाईड प्रकाशनाचे वार्षिकी यातून बऱ्याच अंशी घटना कव्हर होतात. त्या पुस्तकांच्या 2 ते 3 उजळण्या केल्यास किमान 7 ते 8 गुण पडण्यास हरकत नाही.


⭕️गणित बुद्धिमत्ता -

हा विषय पूर्व परीक्षांमधील मार्क देणारा विषय म्हणून ओळखला जातो मात्र काही विद्यार्थ्यांना हा विषय की  किचकट जातो मात्र दररोज सराव केल्यास या विषयाची भीती मनातून निघू शकते. आयोगाच्या मागील प्रश्नपत्रिका पहा व आयोगाने कशा पद्धतीचे प्रश्न विचारले आहेत यावरून बाजारात सापडणारे कोणतेही एक पुस्तक घेऊन त्यातून दररोज दोन ते अडीच तास सराव अपेक्षित आहे.


⭕️अशाप्रकारे एकंदरीत आपण 60 गुणांची गोळाबेरीज परीक्षेपूर्वी जमा केली आणि त्यानुसार विषयांना वेळ वाटून दिला आणि उजळणी केली तर निश्‍चितपणे आपण संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये 60 पेक्षा जास्त गुण मिळवू शकतो. जितके जास्त गुण असतील तितकी पूर्व परीक्षा पास होण्याची खात्री अधिक असेल व त्यामुळे पूर्व परीक्षेचा निकाल पर्यंतचा वेळ वाट पाहण्यात जाणार नाही.

त्यामुळे वरील प्रमाणे अभ्यास करून अथवा आपल्या सोयीनुसार त्यामध्ये बदल करून 60 प्लस गुण मिळवणे आवश्यक ठरते.


❇️ अभ्यासासाठी अनेक अनेक शुभेच्छा.


🔴 PSI पूर्व परीक्षेसाठी 50 गुणांची गोळाबेरीज कशी कराल?

 ⭕ PSI पुर्व परीक्षा पास होणं तुलनेने सोपं असत कारण PSI च्या जागा STI- ASO पेक्षा जास्त असतात, बऱ्याच लोकांना PSI पदाची ची आवड नसते (विशेषतः मुलींना )तसेच PSI साठी लागणाऱ्या Physical आणि Medical Standards मुळे बरेच विद्यार्थी अपात्र ठरतात.

                                

⭕ Actually PSI चा Cutoff हा दरवर्षी around 45 असतो पण 50 हा Safe Score समजला जातो. 


♦️ माझ्या आत्तापर्यंतच्या निरक्षण आणि अनुभवावारून PSI साठी इच्छुक असणाऱ्या बऱ्याच  Candidates चा Score हा 40-45 दरम्यान असतो.हे विद्यार्थी बऱ्यापैकी Serious असतात अभ्यासदेखील करत असतात पण त्यांच्या चुका त्यांना नकळत समजत नाहीत.


♦️ तर आपण या चुका काही प्रमाणात जाणून घ्यायचा प्रयत्न करूया.

     

1.Revision चे महत्व माहिती असूनही ते न केल्यामुळे  ऐन परीक्षेच्या वेळी सोपे -सोपे प्रश्न विद्यार्थी न आठवल्यामुळे चुकतात व Finally Score कमी येतो.


2. सोबतच प्रत्येक विषयामधला महत्वाचा घटक कुठला व कमी महत्वाचा घटक कुठला हे ओळखन्यामध्ये बरेच विद्यार्थी अपयशी ठरतात त्यामुळे अभ्यास करण्यात Unnecessary वेळ वाया जातो.


3. Unnecessary Attempt-


75-85 Attempt करून देखील तुमची Psi prelims निघू शकते त्यामुळे 100 प्रश्नांचा नाद करणे जमत नसेल तर Accuracy वर फोकस ठेवावा. 

                   

4. बऱ्याच विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगला असूनदेखील परीक्षेच्या अंतिम 15-20 दिवसात ते विद्यार्थी परीक्षा सोडून देतात . परीक्षेच्या काळात लागणार आत्मविश्वास आणि Temperament जो Manage करतो तोच परीक्षा पास होतो. त्यामुळे परीक्षेविषयी असणाऱ्या भीतीवर (अपयशाची )आत्त्तापासूनच काम करणे गरजेचे आहे.


5. 50-60% काठावर Score असलेल्या मुलांची पुर्व परीक्षा ही गणित बुद्धिमत्ता व विज्ञान या दोन विषयात कमी गुण मिळाल्यामुळे  जाते. त्यामुळे या 2 विषयांची जशी जमेल तशी जास्त तयारी करावी ( Class लावले तरी चालतील )


तर आपण 50 गुण मिळवण्याच्या साध्या आणि सोप्या 2 Strategy पाहू.


✔️  1. 7*7 Strategy-  


  पुर्व परीक्षेतील 7 ही विषयांना Average 7 गुण मिळवले तर आपण सहज 50 स्कोर करू शकतो.त्यामुळे पुर्व परीक्षेला सर्व विषयांना समान Weightage आणि Time दिला तर तुमची पुर्व परीक्षा आरामात निघू शकते.     

  पण एखाद्या विषयाला 7 पेक्षा कमी गुण आले तर ते दुसऱ्या विषयातून Cover व्हायला पाहिजेत.

तुमचा एखादा विषय weak असेल तरी पण चालेल पण एक पेक्षा जास्त weak नको.. कारण लिमिट पेक्षा जास्त marks cover होत नाहीत.. त्यामुळे योग्य विषयावर आपला वेळ आणि अभ्यासाची energy इन्व्हेस्ट करून आपण अपेक्षित score करू शकतो..


✔️ 2. Focused आणि Selective Strategy- 


 यामध्ये तुम्हाला Score करण्यास Easy असणारे 4-5 विषय निवडायचे आणि बाकी 2-3 विषयांची Average तयारी करायची.उदा. मी History, Geography, Polity, Ecomony आणि Current affairs या विषयांवर Focus करील आणि बाकी Science आणि Mathematics याला कमी वेळ देईल. तसेच  Time management साठी परीक्षेच्या किमान 1 महिना अगोदर किमान 15-20 सराव papers 50-55 मिनटात वेळ लावून सोडवण्याचा प्रयत्न करावा.


 ही Strategy थोडीशी धोकादायक असली तरी बऱ्याच विद्यार्थ्यांना लागू पडते. त्यामुळे आपल्याला आपल्या प्रांतात खेळता येते आणि प्रॉपर study केला तर आरामात 50 score करता येतो.


❇️ तर अशा प्रकारे आपण पुर्व मध्ये गुण मिळवण्याच्या Strategy आणि अभ्यास्पद्धतीविषयी पुढेही बोलत राहू. 


१६ मार्च २०२६

Online Test Series

टेस्ट क्रमांक :-08( तलाठी भरती)

http://testmoz.com/12912916

✅Passcode - 111

------------------------------------------------
टेस्ट क्रमांक :-07( तलाठी भरती)

testmoz.com/12904552

✅Passcode - 1001

------------------------------------------------
तलाठी टेस्ट क्रमांक -06

testmoz.com/12894476

Passcode -1234

------------------------------------------------
इंग्रजी टॉपिक टेस्ट.
Test No -11
Topic :- Degree and conjunction
testmoz.com/q/12903186

Test No:-12
Topic - Sentence Formation and clauses
testmoz.com/q/12903190

------------------------------------------------
टेस्ट क्रमांक :-02

testmoz.com/12890864

✅Passcode - 1611

------------------------------------------------
मराठी व्याकरण
टेस्ट क्रमांक -09
टॉपिक - वाक्य संकलन आणि वाक्य पृथक्करण
testmoz.com/12887576

------------------------------------------------

टेस्ट क्रमांक -10
टॉपिक - अलंकार आणि शब्द सिध्दी
testmoz.com/12887584

------------------------------------------------
टेस्ट क्रमांक :-05( तलाठी भरती)

testmoz.com/12883832

✅Passcode - 124

------------------------------------------------
इंग्रजी टॉपिक नुसार टेस्ट.

Test No :- 09
Topic :-Modal Auxiliary and Preposition
testmoz.com/q/12858406

------------------------------------------------

Test No:-10
Topic :- One word substitution
http://testmoz.com/q/12858410

------------------------------------------------
टेस्ट क्रमांक :-01( वनरक्षक भरती)

testmoz.com/12877504

✅Passcode - 100

------------------------------------------------
तलाठी संपूर्ण अभ्यासक्रम आधारित टेस्ट क्रमांक -03

testmoz.com/12872376

------------------------------------------------
तलाठी संपूर्ण अभ्यासक्रम आधारित टेस्ट क्रमांक -04

testmoz.com/12876112

------------------------------------------------
तलाठी संपूर्ण अभ्यासक्रम आधारित टेस्ट क्रमांक -02
वेळ काढून प्रामाणिकपणे टेस्ट सोडवा.

testmoz.com/12865878

------------------------------------------------
चालू घडामोडी
टेस्ट क्रमांक -01
टॉपिक - मे 2023(पृथ्वी परिक्रमा)
testmoz.com/12860536

------------------------------------------------
भारतीय राज्यघटना आणि ग्राम प्रशासन

testmoz.com/q/12011378
(टेस्ट क्रमांक -०१)
testmoz.com/q/12011422
(टेस्ट क्रमांक -०२)
testmoz.com/q/12011438
(टेस्ट क्रमांक -०३)
https://testmoz.com/12011808
(टेस्ट क्रमांक -०४)
testmoz.com/q/12011818
(टेस्ट क्रमांक -०५)
testmoz.com/q/12014000
(टेस्ट क्रमांक -०६)
testmoz.com/q/12014016
(टेस्ट क्रमांक -०७)
testmoz.com/q/12014026
(टेस्ट क्रमांक -०८)
testmoz.com/12014040
(टेस्ट क्रमांक -०९)
testmoz.com/12014058
(टेस्ट क्रमांक -१०)

------------------------------------------------
Comprehensive Test No :-01

http://testmoz.com/12839996

------------------------------------------------
महाराष्ट्र भूगोल.

Test no :-01
टॉपिक - स्थान , विस्तार, प्रशासकीय, प्राकृतिक.
testmoz.com/12014922

टेस्ट क्रमांक -02
टॉपिक - नदी प्रणाली
http://testmoz.com/12033392

(टेस्ट क्रमांक -०३)
टॉपिक - हवामान, वने
https://testmoz.com/12024146

(टेस्ट क्रमांक -०४)
टॉपिक -मृदा ,खनिजे आणि ऊर्जा संसाधन.
testmoz.com/q/12024148

------------------------------------------------
Test No :-08
Topic :-Verb and Adverb
testmoz.com/12853118
Passcode:-111

------------------------------------------------

टेस्ट क्रमांक -08
टॉपिक :- वाक्यविचार आणि वाक्य रूपांतरण
testmoz.com/q/12853126
Passcode:-100

------------------------------------------------
GK TEST

(लोकसंख्या)
testmoz.com/q/12851090

(समाजसुधारक टेस्ट क्रमांक:-01)
testmoz.com/q/12851096

(समाजसुधारक टेस्ट क्रमांक:-02)
testmoz.com/q/12851104

Passcode :-1234

------------------------------------------------
Test No :- 01
Topic :- Reasoning Practice Test
testmoz.com/12837166
Passcode:-1234

------------------------------------------------
Test No :- 07
Topic :- Antonyms
testmoz.com/q/12849664
Passcode:-111

------------------------------------------------

Test no :-07
विरुद्धार्थी शब्द
testmoz.com/12849660
Passcode:-100

------------------------------------------------
Test No :- 06
Topic :-  Pronoun and Adjective
testmoz.com/q/12848794
Passcode:-111

------------------------------------------------

Test no :-06
समास आणि प्रयोग
testmoz.com/12848796
Passcode:-100

------------------------------------------------
Test no :-05

क्रियाविशेषण अव्यय
शब्दयोगी अव्यय
उभयानव्यीय अव्यय
केवलप्रयोगी अव्यय.
testmoz.com/q/12847958

Passcode:-100

------------------------------------------------
Test No :- 05
Topic :-Noun
testmoz.com/12847942
Passcode:-111

------------------------------------------------
Test no :-03
Topic :- Synonyms
testmoz.com/q/12846928

Test No :- 04
Topic :- Change The Voice
testmoz.com/12335300

Passcode:-111

------------------------------------------------
टेस्ट क्रमांक :-03(मराठी व्याकरण)
सर्वनाम, विशेषण, क्रियापद, काळ आणि प्रकार

testmoz.com/q/12846534

टेस्ट क्रमांक:-04
शब्दसंग्रह(समानार्थी शब्द)

testmoz.com/q/12846538

passcode :-100

------------------------------------------------
testmoz.com/q/12840650
इंग्रजी टेस्ट क्रमांक :-01
(Basic of Grammar and Tense)

testmoz.com/12840760
इंग्रजी टेस्ट क्रमांक:02
(Conditional Sentence and Mood)
सर्व इंग्रजी टेस्ट साठी Passcode:-111 असेल.

------------------------------------------------
testmoz.com/12845470
मराठी टेस्ट क्रमांक -01
(भाषा,लिपी,वर्ण विचार,संधी)

testmoz.com/q/12840668

मराठी टेस्ट क्रमांक -02
(नाम,लिंग, वचन,विभक्ती)

सर्व मराठी टेस्ट साठी Passcode:-100 असेल.

१४ मार्च २०२६

महाराष्ट्रातील मृदा व मृदेचे प्रकार

⏩काळी मृदा

✔️बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. या मृदेस रेगूर मृदा असेही म्हणतात. ✔️मृदेतील टिटॅनिफेरस मॅग्रेटाईट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो.

✔️या मृदेमध्ये चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्रेशियम या घटक द्रव्यांचे प्रमाण असते. तर नायट्रोजन फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.


✔️ही अत्यंत सुपीक मृदा आहे.यामध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते.

✔️महाराष्ट्रात ही मृदा प्रामुख्याने अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांमध्ये आढळते.

✔️महाराष्ट्रात काळ्या मृदांमध्ये कापूस, ऊस, फळे, गहू, ज्वाररी, कडधान्ये ही पिके घेतली जातात.


⏩जांभी मृदा

✔️2000 मिमी पेक्षा जास्त पर्जन्य व निश्‍चित कोरडा कालखंड असलेल्या प्रदेशात जांभी मृदा आढळते.

✔️सतत पाणी झिरपण्याने खडकातील क्षार व सिलिकाचे कण वाहून नेले जातात. परिणामत: लोह व अल्युमिनियम मृदातील प्रमाण वाढते.

✔️या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय पददार्थ या द्रव्यांचे प्रमाण कमी असते. या मृदेची सुपीकता कमी आहे.


✔️महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्हयात ही मृदा आढळते. या मृदेमध्ये तांदूळ हे प्रमुख पिके घेतली जाते.


✔️डोंगर उतारावर फलोत्पादन केले जाते.



⏩गाळाची मृदा

✔️सततच्या संचयनामुळे नदी खोर्‍यांच्या सखल भागात विशेषत: पूर मैदानात ही मृदा आढळते. ✔️बारीक पोत व पाण्याची सहज उपलब्धता यामुळे सतत नवीन गाळ येत राहण्यामुळे ही मृदा सुपीक बनते.

✔️महाराष्ट्रातील मुख्य नद्यांच्या सखल भागात व पूर मैदानात ही मृदा आढळते.


✔️उत्तर महाराष्ट्रातील तापी-पूर्णा खोर्‍यात खूप खोलवर गाळाचे संचयन झाले आहे. या भागात विस्तीर्ण गाळाच्या मृदांचे क्षेत्र आहे.


✔️गाळाची मृदा सुपीक असल्याने या मृदेत विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते.


⏩तांबडी-पिवळसर मृदा

✔️महाराष्ट्रात अतिप्राचीन काळातील गॅ्रनाईट आणि नीस प्रकारच्या खडकांवर अपक्षय क्रिया होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे.

✔️ही चिकणमाती व वाळूमिश्रित मृदा असून, तिच्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त होतो.

✔️तिचा रंग पिवळा, तपकिरी किंवा राखाी असू शकतो.

✔️मृदेमध्ये चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरिक अ‍ॅसिड, सेंद्रिय द्रव्य व पोटॅशचे प्रमाण अत्यल्प असते. ✔️ही मृदा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात आहे.

✔️या मृदेमध्ये बाजरी, भुईमूग, बटाटे आणि भात ही पिके घेता येतात .

ज्वारी (कोरडवाहू पीक)

✅ज्वारी (कोरडवाहू पीक)✅

● ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्य पीक आहे. रब्बी व खरीप दोन्ही हंगामामध्ये घेतल्या जाते.

● महाराष्ट्रात एकूण लागवडी पैकी 35% क्षेत्रात ज्वारी लावले जाते हे देशाच्या एकूण ज्वारी उत्पन्नाच्या ते 46% आहे.

● हे पीक 25 ते 26 डिग्री सेल्सिअस तापमान व 50 ते 75 सेंटीमीटर पर्जन्य पडणाऱ्या मध्यम स्वरूपाच्या जमिनीत घेतले जाते म्हणून याला कोरडवाहू पीक म्हणतात.

● महाराष्ट्रात पठारात हे पीक घेतले जाते.

● कोकणात व पूर्व विदर्भात हे पीक घेतले जात नाही कारण तिथे पावसाचे प्रमाण जास्त असते.

●कायम भुसभुशीत मृदेत ज्वारीचे उत्पादन चांगले होते हे पीक खरीप व रब्बी दोन्ही हंगामात घेतले जाते.

●खरिपातील झालेला "जोंधळा "असे म्हणतात तर रब्बी च्या ज्वारी ला  शाळू असे म्हणतात.

■ज्वारीच्या प्रमुख जाती:

फुले, माऊली, फुले चित्रा, फुले सुचित्रा, फुले अनुराधा

◆महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारे जिल्ह्यांचा उतरता क्रम:

सोलापूर >अहमदनगर> पुणे

◆सर्वाधिक उत्पादन असणारे जिल्हे:

सोलापूर> अहमदनगर> सांगली

◆सर्वाधिक हेक्टरी उत्पादन:

चंद्रपूर> जळगाव> कोल्हापूर

◆रोगांचा प्रादुर्भाव:

तुडतुडे, खोडकिडा, खोडमाशी, मावा, लाल कोळी, खळखळया.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३ मार्च २०२६

जनरल नॉलेज


महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?

👉 १ मे १९६०

महाराष्ट्राची राजधानी कोणती?

👉 मबई 

महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?

👉 नागपूर 

महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?

👉 ६

महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?

👉 ५

महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?

👉 ३६

महाराष्ट्रातील महानगरपालिका?

👉 २६

महाराष्ट्रातील नगरपालिका?

👉 २२२

महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?

👉 ७

महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?

👉 ३४

महाराष्ट्रातील एकुण तालुके?

👉 ३५८

महाराष्ट्रातील पंचायत समित्या?

👉 ३५५

महाराष्ट्राची लोकसंख्या किती?

👉 ११,२३,७४,३३३

स्त्री : पुरुष प्रमाण किती?

👉 ९२९ : १०००

महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?

👉 ८२.९१%

महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?

👉 सिंधुदुर्ग

सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?

👉 मबई उपनगर (८९.९१% )

सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?

👉 नदुरबार (६४.४% )

सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?

👉 रत्नागिरी

सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?

👉 मबई शहर

क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?

👉 अहमदनगर 

क्षेत्रफळाने लहान जिल्हा?

👉 मबई शहर 

जास्त लोकसंख्येचा जिल्हा?

👉 ठाणे 

कमी लोकसंख्येचा जिल्हा?

👉 सिंधुदुर्ग 

भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?

👉 ९३%

महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?

👉 आबा

महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?

👉 मोठा बोंडारा

महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?

👉 हारावत 

महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?

👉 शकरु

महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?

👉 मराठी

महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?

👉 कळसुबाई (१६४६ मी.)

महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?

👉 गोदावरी

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

भारतातील जनरल नॉलेज 

👇👇👇👇👇👇👇

सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?

👉 गगानगर ( राजस्थान )

सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?

👉 उत्तरप्रदेश

सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?

👉 मबई (१,८४,१४,२८८ )

सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?

👉 करळ

सर्वांत मोठा धबधबा कोणता?

👉 गिरसप्पा धबधबा 

सर्वांत मोठी मशीद कोणती?

👉 जामा मशीद 

सर्वांत लांब नदी कोणती?

👉 बरह्यमपुत्रा

सर्वांत मोठी घुमट कोणती?

👉 गोल घुमट 

सर्वांत मोठे वाळवंट कोणते?

👉 थरचे वाळवंट 

सर्वांत उंच पुतळा कोणता?

👉 गोमटेश्वर ( बाहुबली )

सर्वांत मोठे धरण कोणते?

👉 भाक्रा नांगल

सर्वांत उंच धरण कोणते?

👉 टिहरी

सर्वांत लांब धरण कोणते?

👉 हिराकुड

सर्वांत लांब बोगदा कोणता?

👉 जवाहर बोगदा 

सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?

👉 यवा भारती

सर्वांत उंच मनोरा कोणता?

👉 दरदर्शन मनोरा 

सर्वांत उंच झाड कोणते?

👉 दवदार

क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?

👉 कच्छ 

लोकसंख्येने मोठा जिल्हा?

👉 ठाणे 

सर्वाधिक पावसाचे ठिकाण?

👉 मावसनिराम

🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗

जगाचे जनरल नॉलेज 

👇👇👇👇👇👇

सर्वांत मोठे वाळवंट कोणते?

👉 सहारा ( आफ्रिका )

सर्वांत मोठे बेट कोणते?

👉 गरीनॅलंड

सर्वाधिक लोकसंख्येचा देश?

👉 चीन

क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?

👉 रशिया

सर्वांत मोठा खंड कोणता?

👉 आशिया

सर्वांत मोठी गर्ता कोणती?

👉 मरियना

सर्वांत मोठा पक्षी कोणता?

👉 शहाम्रुग

सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?

👉 सदरबन

सर्वांत मोठा पुतळा कोणता?

👉 सटॅचु ऑफ लिबर्टी

सर्वांत मोठी नदी कोणती?

👉 अमेझॉन

सर्वांत मोठे बंदर कोणते?

👉 सिडनी

सर्वांत मोठा महासागर कोणता?

👉 पसिफिक महासागर 

सर्वांत मोठी मशीद कोणती?

👉 जामा मशीद ( दिल्ली )

सर्वांत मोठा धबधबा कोणता?

👉 वहेनेझुएला

सर्वांत लहान खंड कोणता?

👉 ऑस्ट्रेलिया 

सर्वांत लहान महासागर कोणता?

👉 आर्क्टिक महासागर 

सर्वांत लहान पक्षी कोणता?

👉 हमिंग बर्ड

सर्वांत लहान दिवस कोणता?

👉 २२ डिसेंबर

सर्वांत लांब नदी कोणती?

👉 नाईल

सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?

👉 मावसनिराम ( मेघालय )

सर्वांत जलद उडणारा पक्षी?

👉 हमिंग बर्ड 

सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?

👉 मलाक्काची सामुद्रधुनी 

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

विविध घटना, गोष्टींची भारतातील पहिली सुरुवात

👉 पहिले वर्तमान पत्र द बेंगॉल गॅझेट (जेम्स हिकी ,  29 जाने. 1780)

👉 पहिली टपाल कचेरी कोलकत्ता (1727)

👉 पहिले रेल्वे(वाफेचे) इंजिन मुंबई ते ठाणे (16 एप्रिल, 1853) 

👉 पहिले संग्रहालय इंडियन म्युझियम, कोलकत्ता (फेब्रु.1814)

👉 पहिले क्षेपणास्त्र पृथ्वी (1988)

👉 पहिले राष्ट्रीय उद्यान जीम कार्बेट, राष्ट्रीय उद्यान (उत्तरांचल 1935)

👉 पहिले रेल्वेस्थानक बोरीबंदर (सध्याचे छत्रपती शिवाजी)

👉 पहिली भुयारी रेल्वे मेट्रो रेल्वे दिल्ली

👉 पहिले व्यापारी विमानोड्डापण कराची ते मुंबई (ऑक्टो. 1932)

👉 पहिली दुमजली रेल्वेगाडी सिंहगड एक्सप्रेस (मुंबई ते ठाणे)

👉 पहिले पंचतारांकित हॉटेल ताजमहाल, मुंबई (1903)

👉 पहिला मूकपट राजा हरिश्चंद्र (1913 दादासाहेब फाळके निर्मिती)

👉 पहिला बोलपट आलमआरा (1913, आर्देशिर इराणी निर्मिती)

👉 पहिला मराठी बोलपट अयोध्येचा राजा

👉 पहिले जलविद्युत केंद्र दार्जिलिंग (1898)

👉 पहिला तेलशुद्धीकरण कारखाना दिग्बोई (1901, आसाम)

👉 पहिला आधुनिक पोलाद कारखाना कुल्टी, प.बंगाल

👉 पहिले दूरदर्शन केंद्र दिल्ली (1959)

👉 पहिली अनुभट्टी अप्सरा, तारापूर (1956)

👉 पहिले अंटार्क्टिका मोहीम डिसेंबर 1981, मोहीम प्रमुख प्रा. कासीम

👉 पहिले विद्यापीठ कोलकत्ता (1957)

👉 पहिला स्कायबस प्रकल्प मडगाव, गोवा

👉 पहिले रासायनिक बंदर दाहेज, गुजरात

👉 भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा विजयंता

👉 पहिले टेलिफोन एक्सचेंज कोलकत्ता (1881)

👉 भारताचे पहिले लढाऊ विमान नॅट



२५ फेब्रुवारी २०२६

राज्यसेवा, PSI-STI-ASO मुख्य परीक्षा प्रश्नसंच


📚 कोणत्याही यूरोपीयन सत्तेद्वारा एखाद्या सुसंस्कृत जनतेच्या देशात प्रशासन चालविण्याचा पहिला प्रयत्न म्हणजे कोणता कायदा होय?

= नियामक कायदा,1773(The Regulating Act,1773)


📚 एकूण 11 वर्षे अंमलात असणारया  नियामक कायद्यांतर्गत प्रशासन चालविणारा एकमेव गव्हरनर  जनरल?

= वाॅरन हेस्टिंग्ज 


📚 भारतात सर्वप्रथम कंपनी मधिल मुलकी सेवेच्या अधिकार्याना प्रशिक्षण देण्याचे प्रयत्न करणारा पहिला व्यक्ती?

= लॉर्ड वेलस्ली


📚 भारतात मुलकी सेवेच्या सुधारणा करणारा पहिला व्यक्ती?

= रोबर्ट क्लाईव्ह 


📚 भारतात मुल्की सेवेचा खरा पाया रचनारा पहिला व्यक्ती?

= लॉर्ड कॉर्नवॉलीस


📚 परथम व्यक्ती ज्याने सर्वप्रथम यूरोपीयन सैन्य हे  भरतीय राज्यस पैशाच्या मोबदल्यात देवू केले?

= जोसेफ फ्रन्सीस डुप्ले


📚 कषी सिंचन धोरण अंमलात आणण्यासाठी सुरुवातीची पाऊले उचलणारा प्रथम गव्हर्नर जनरल ?

- लॉर्ड बेंटींक 


📚 भारतात रेलवे स्थापन करण्याचा प्रथम निर्णय कोठे घेण्यात आला?

- मद्रास


📚 मलकी सेवांमधील नेमणूकीसाठी स्पर्धा परीक्षेच्या तत्वाचा स्विकार करण्याची शिफारस करणारा प्रथम व्यक्ती?

- लॉर्ड मेकॉले


📚 रलवे सुरु करण्याची सर्वप्रथम योजना कोनी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


📚 इग्रजांनी भरतातील पहिली वखार ही कोठे स्थापन केली?

- सुरत


📚भरतातील पहिली राजकिय संघटना कोणती?

- लैंड होल्डर्स सोसायटी.


📚 भारतातील कामगारांची पहिली संघटना स्थापन करणारे?

- नारायण मेघाजी लोखंडे


१३ जानेवारी २०२६

1857 च्या उठावानंतरचा काळ:


भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.
इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.
इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.
1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.
इ.स. 1861 मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

चार्लस वुड’ ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
इ.स. 1859 साली शेतकर्‍याविषयीचा ‘बंगाल रेंट अॅक्ट’ कॅनिंगच्या काळात करण्यात आला.
इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन ‘निल दर्पण’ या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.
लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास ‘अर्ल’ हा किताब बहाल केला.
इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी ‘फॅमिना कमीशन’ ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.
14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास ‘प्रांतीय स्वायत्तेची सनद’ असे मानण्यात येते.
लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

 हंटर आयोग (भारतीय शिक्षण आयोग)

 ◾️ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने
प्राथमिक शिक्षणाची प्रगती  1854 ते 1882 या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला.

◾️वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या  आयोगाला सांगण्यात आले होते.

◾️ या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण, कायदे आणि व्यवस्थापन, स्थानिक शाळांना प्रोत्साहन, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था यांविषयी शिफारशी केल्या.

◾️ प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे, प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा, शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे.

◾️तसेच इंग्लंडमधील 1870 आणि 1876 च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा, प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा, स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे, प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.

◾️ या आयोगासमोर महात्मा फुले, पंडीता रमाबाई यांनी साक्ष दिली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

२३ नोव्हेंबर २०२५

तलाठी भरती: सामान्य ज्ञान - ५० वन-लायनर

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


​प्रश्न: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १८८५


​प्रश्न: 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच' हे कोणाचे विधान आहे?

​उत्तर: लोकमान्य बाळ गंगाधर टिळक


​प्रश्न: भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर


​प्रश्न: 'चले जाव' (Quit India) चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली?

​उत्तर: १९४२


​प्रश्न: 'जालियनवाला बाग हत्याकांड' कोणत्या शहरात झाले?

​उत्तर: अमृतसर


​प्रश्न: सातवाहनांची राजधानी कोणती होती?

​उत्तर: पैठण


​प्रश्न: भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या देशाच्या संविधानातून घेतले आहेत?

​उत्तर: अमेरिका (United States)


​प्रश्न: 'भारतरत्न' पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: १९५४


​प्रश्न: महाराष्ट्रात होमरूल लीगची स्थापना कोणी केली?

​उत्तर: लोकमान्य टिळक


​प्रश्न: शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे?

​उत्तर: जायकवाडी (पैठण)


​प्रश्न: 'अजिंठा लेणी' कोणत्या जिल्ह्यात आहेत?

​उत्तर: छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)


​प्रश्न: महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

​उत्तर: नागपूर


​प्रश्न: क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे?

​उत्तर: राजस्थान


​प्रश्न: **महाराष्ट्रात 'कोकण रेल्वे' मुळे जोडले गेलेले दोन प्रमुख जिल्हे कोणते?

​उत्तर: रायगड आणि सिंधुदुर्ग


​प्रश्न: भारतातील सर्वात लांब नदी कोणती आहे?

​उत्तर: गंगा


​प्रश्न: सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे?

​उत्तर: गुरू (Jupiter)


​प्रश्न: माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

​उत्तर: रायगड


​प्रश्न: 'भारताचे मँचेस्टर' म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते?

​उत्तर: अहमदाबाद


​प्रश्न: तारापूर अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे?

​उत्तर: महाराष्ट्र


​विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology)

​प्रश्न: पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे?

​उत्तर: H_2ओ


​प्रश्न: 'पेशीचा ऊर्जा स्त्रोत' (Powerhouse of the cell) कशाला म्हणतात?

​उत्तर: तंतुकणिका (Mitochondria)


​प्रश्न: रक्तामध्ये हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी कोणते खनिज आवश्यक आहे?

​उत्तर: लोह (Iron)


​प्रश्न: ध्वनीचा वेग सर्वाधिक कशामध्ये असतो?

​उत्तर: स्थायू (Solid)


​प्रश्न: 'पोलिओची लस' कोणी शोधली?

​उत्तर: डॉ. जोनास साल्क


​प्रश्न: विद्युतप्रवाहाचे एकक (Unit) कोणते आहे?

​उत्तर: अँपिअर (Ampere)


​प्रश्न: व्हिटॅमिन 'सी' च्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो?

​उत्तर: स्कर्वी (Scurvy)


​प्रश्न: 'गॅल्व्हनायझेशन' प्रक्रियेत लोखंडावर कशाचा थर दिला जातो?

​उत्तर: जस्त (Zinc)


​प्रश्न: सूर्यप्रकाशामुळे मानवी शरीरात कोणते व्हिटॅमिन तयार होते?

​उत्तर: व्हिटॅमिन डी


​प्रश्न: ध्वनीची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते आहे?

​उत्तर: डेसिबल (Decibel)

​प्रश्न: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) मुख्यालय कोठे आहे?

​उत्तर: मुंबई


​प्रश्न: 'नीती आयोगाचे' अध्यक्ष कोण असतात?

​उत्तर: पंतप्रधान


​प्रश्न: 'जीएसटी' (GST) चा फुल फॉर्म काय आहे?

​उत्तर: वस्तू आणि सेवा कर (Goods and Services Tax)


​प्रश्न: 'हरित क्रांतीचे जनक' म्हणून भारतात कोणाला ओळखले जाते?

​उत्तर: डॉ. एम. एस. स्वामीनाथन


​प्रश्न: सध्या भारताचे पंतप्रधान कोण आहेत?

​उत्तर: श्री. नरेंद्र मोदी


​प्रश्न: भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?

​उत्तर: प्रतिभा पाटील


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय चलन काय आहे?

​उत्तर: रुपया


​प्रश्न: 'मेक इन इंडिया' कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली?

​उत्तर: २०१४


​प्रश्न: भारतात सध्या किती केंद्रशासित प्रदेश आहेत?

​उत्तर: ८


​प्रश्न: महाराष्ट्र राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत?

​उत्तर: एकनाथ शिंदे


​प्रश्न: महाराष्ट्राचे राज्य फूल कोणते आहे?

​उत्तर: तामण (जारूल)


​प्रश्न: 'ग्रँड स्लॅम' हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

​उत्तर: टेनिस


​प्रश्न: 'ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा' किती वर्षांनी आयोजित केल्या जातात?

​उत्तर: चार


​प्रश्न: जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?

​उत्तर: माऊंट एव्हरेस्ट


​प्रश्न: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते?

​उत्तर: यशवंतराव चव्हाण


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?

​उत्तर: वंदे मातरम्


​प्रश्न: 'नोबेल पुरस्कार' कोणत्या देशात दिला जातो?

​उत्तर: स्वीडन


​प्रश्न: 'सत्यमेव जयते' हे ब्रीदवाक्य कशातून घेतले आहे?

​उत्तर: मुंडक उपनिषद


​प्रश्न: 'महाराष्ट्र दिन' कधी साजरा केला जातो?

​उत्तर: १ मे


​प्रश्न: भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे?

​उत्तर: आंबा

२१ नोव्हेंबर २०२५

सामान्य ज्ञान 25 प्रश्नउत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

Prelims

 2012 >> CLICK HERE>>


2013 >> CLICK HERE>>


2014 >> CLICK HERE>>


2015 >> CLICK HERE>>


2016 >> CLICK HERE>>


2017 >> CLICK HERE>>


2018 >> CLICK HERE>>


2019 >> CLICK HERE>>


2020 >> CLICK HERE>>


2021 >> CLICK HERE>>


2022 >> CLICK HERE>>

पोलीस भरती सराव प्रश्नसंच विषय अंकगणित

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


*१) २७० नंतर पुढील येणाऱ्या १० व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?*
अ. १५ 
ब. १७
क. १९
ड. २१

*२) पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?*
अ. ०:२२५ 
ब. २२.५
क. ६.२५
ड. ६२.५ 

*३) १४.३१, १६.४, १३.१३, १२.२४ या संख्येचे मध्यमान किती येईल ?*
अ. ४१ वर्ष 
ब. ३३ वर्ष 
क. १२५ वर्ष 
ड. ४५ वर्ष

*४) रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?*
अ. ६६
ब. ६७
क. ६९
ड. ६८   

*५) सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?*
अ. ६६.५
ब. ६८
क. ६८.५
ड. ६९

*६) बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?*
अ. ३५ टक्के 
ब. ३० टक्के 
क. ३१ टक्के 
ड. ३२ टक्के

*७) एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?*
अ. ३५
ब. ४०
क. ६५
ड. ६०

*८) संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?*   
अ. २००
ब. २५०
क. ४००
ड. ६००

*९)  दर ५ वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन १९९०, १९९५ व २००० मध्ये रु. ५००० गुंतवणूक केली तर त्याला २००५ साली किती रक्कम मिळेल ?*
अ. रु. ४०००० 
ब. रु. ६००००
क. रु. ९००००
ड. रु. ७००००

*१०) मगनसेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला ?*
अ. ३०
ब. ४०
क. २०
ड. ५०

---------------------------------------------------- 

उत्तरे : १)  ब  २) क  ३) ब  ४) ब  ५) ड  ६) ड  ७) अ  ८) ड  ९) ड  १०) क

----------------------------------------------------

पोलीस भरती - प्रश्नसंच
      विषय - बुध्दीमत्ता
----------------------------------

१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?
अ. ६४ चौ. से. मी. 
ब.  ५१२ घ. से. मी. 
क.  ६४  घ. से. मी. 
ड.  ४८ घ. से. मी. 

२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?
अ. पूरक कोन 
ब. विरुद्ध कोन
क. सरळ कोन
ड. कोटीकोन

३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ?
अ. ११२ चौ. से. मी. 
ब. १०० चौ. से. मी.  
क. १२१ चौ. से. मी.   
ड. १११ चौ. से. मी. 

४)    AZ, BY, CX, ?
अ. DW
ब. EV
क. EF
ड. JO

५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?
अ. निळा, हिरवा, लाल
ब. निळा, पिवळा, पांढरा  
क. पांढरा, काळा, लाल 
ड. हिरवा, पांढरा, केशरी

६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ?
१ Internet २) Income ३) India ४) Import .....
अ. २३१४
ब.  ४२३१
क.  १२३४
ड.  ४३२१

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?
अ. ८९
ब.  १०९
क.  ९९
ड.  ७९

८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ?
अ. सहा वाजता  
ब. बारा वाजता 
क. साडेतीन वाजता  
ड. नऊ वाजता

९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?  
अ. इंद्रकुमार गुजराल
ब. लालबहादूर शास्त्री 
क. एच. डी. देवेगौडा 
ड. डॉ. राजेंद्र प्रसाद

१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ?
अ. उप जिल्हाधिकारी
ब.  पोलीस उपअधीक्षक
क. विक्रीकर अधिकारी 
ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष

--------------------------------

उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड.
--------------------------------

पोलीस भरती - सराव  प्रश्नसंच
      विषय - अंकगणित
----------------------------------
*१) १ ते १७ या संख्याची बेरीज किती ?*
अ ) १४४ ब ) १६२ क ) १७१ ड ) १५३

*२)मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती ?*
अ ) ९०,०००  ब ) ९८, ९९९  क) ९,००० ड ) ९०,००१
*३)  राहुल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो . वर जाताना त्याने प्रत्येक  पायरीवर  तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?*
अ ) ४,५००  ब ) ५,००० क ) ५०५० ड ) ५,५००

*४) १०.५ + १.०५ + १०५ = ?*
अ ) ११६.५५ ब ) ३१५ क ) ११७ ड ) ११६.५

*५) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यावर बाकी ११ उरते ?*

अ ) ११६ ब  ) ५६  क ) १७६ ड ) २३६

*६) खालील दिलेल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे ?*
अ ) २     ब )  ५     क ) ९      ड ) १५
     ---          ---          ---           ---
      ७           ८           १२           १८
*७) एका नावेत सरासरी ३० Kg वजनाची मुले बसली आहेत . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ Kg आहे . तर नावाड्याचे वजन किती ?*
अ ) ६१ ब ) ६२ क ) ५९ ड ) ५१

*८) एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?*
अ ) ३६० ब ) ४८० क ) ५४० ड ) ४००

*९) एकाच प्रकारचे २५ टेबल काही रकमेस विकल्यामुळे ४०% नफा झाला , तर प्रत्येक टेबलवर शेकडा नफा किती ?*
अ ) २०% ब ) ४०% क ) ५/६ % ड ) सांगता येत नाही

*१०) साडेचार किलो ग्रॅम बेसनाच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?*
अ ) २५ ब ) ३० क ) ३५ ड ) २०

उत्तर : १- ड  २- ब ३- क ४-अ  ५- अ  ६-ड  ७-अ  ८- अ  ९- ब  १०-ब