Showing posts with label upsc. Show all posts
Showing posts with label upsc. Show all posts

21 November 2025

सामान्य ज्ञान 25 प्रश्नउत्तरे

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



१) महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण ?
उत्तर -- सावित्रीबाई फुले
---------------------------------------------------
२) ' सावरपाडा एक्सप्रेस ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- कविता राऊत ( धावपटू)
---------------------------------------------------
३) महाराष्ट्रातील पहिली महिला डाॅक्टर कोण ?
उत्तर -- आनंदीबाई जोशी
---------------------------------------------------
४) महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणारी पहिली महिला कोण ?
उत्तर -- लता मंगेशकर
--------------------------------------------------
५) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
---------------------------------------------------
६) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
उत्तर -- प्रतिभाताई पाटील
--------------------------------------------------
७) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ?
उत्तर -- कल्पना चावला
--------------------------------------------------
८) भारतरत्न मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- इंदिरा गांधी
--------------------------------------------------
९) एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय महिला कोण ?
उत्तर -- बचेंद्री पाल
--------------------------------------------------

१०) भारताच्या पहिल्या महिला लोकसभा सभापती कोण ?
उत्तर -- मीरा कुमार
--------------------------------------------------
११) भारताच्या पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी कोण ?
उत्तर -- किरण बेदी
-------------------------------------------------
१२) भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण ?
उत्तर -- मीरासाहेब फातेमा बीबी
--------------------------------------------------
१३) भारताच्या पहिल्या महिला वैमानिक कोण ?
उत्तर -- प्रेमा माथूर
--------------------------------------------------
१४) ' भारताची सुवर्णकन्या ' कोणाला म्हणतात ?
उत्तर -- पी. टी. उषा
--------------------------------------------------
१५) अंजली भागवत ही कोणत्या क्रीडाप्रकारासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर -- नेमबाजी
--------------------------------------------------
१६) पहिली भारतीय विश्वसुंदरी कोण ?
उत्तर -- सुश्मिता सेन
--------------------------------------------------
१७)भारतातील पहिली नोबेल पारितोषिक विजेती महिला कोण ?
उत्तर -- मदर तेरेसा
--------------------------------------------------
१८) ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बॅडमिंटन
-------------------------------------------------
१९) ' सानिया मिर्झा ' कोणत्या खेळाशी निगडीत आहे ?
उत्तर -- लाॅन टेनिस
-------------------------------------------------
२०) ' मेरी काॅम ' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर -- बाॅक्सिंग
---------------------------------------------------

२१) ' पूर्णिमा महतो ' हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- तिरंदाजी
---------------------------------------------------
२२) ' आरती साहा ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- जलतरण
---------------------------------------------------
२३) ' रोहिणी खाडिलकर ' कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- बुध्दिबळ
---------------------------------------------------
२४) ' कर्नामा मल्लेश्वरी ' ही कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर -- वेट लिफ्टिंग
---------------------------------------------------
२५) ' कोसबाडच्या टेकडीवरून ' हे आत्मवृत कोणाचे आहे ?
उत्तर -- अनुताई वाघ

पोलीस भरती सराव प्रश्नसंच विषय अंकगणित

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


*१) २७० नंतर पुढील येणाऱ्या १० व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?*
अ. १५ 
ब. १७
क. १९
ड. २१

*२) पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?*
अ. ०:२२५ 
ब. २२.५
क. ६.२५
ड. ६२.५ 

*३) १४.३१, १६.४, १३.१३, १२.२४ या संख्येचे मध्यमान किती येईल ?*
अ. ४१ वर्ष 
ब. ३३ वर्ष 
क. १२५ वर्ष 
ड. ४५ वर्ष

*४) रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?*
अ. ६६
ब. ६७
क. ६९
ड. ६८   

*५) सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?*
अ. ६६.५
ब. ६८
क. ६८.५
ड. ६९

*६) बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?*
अ. ३५ टक्के 
ब. ३० टक्के 
क. ३१ टक्के 
ड. ३२ टक्के

*७) एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?*
अ. ३५
ब. ४०
क. ६५
ड. ६०

*८) संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?*   
अ. २००
ब. २५०
क. ४००
ड. ६००

*९)  दर ५ वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन १९९०, १९९५ व २००० मध्ये रु. ५००० गुंतवणूक केली तर त्याला २००५ साली किती रक्कम मिळेल ?*
अ. रु. ४०००० 
ब. रु. ६००००
क. रु. ९००००
ड. रु. ७००००

*१०) मगनसेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला ?*
अ. ३०
ब. ४०
क. २०
ड. ५०

---------------------------------------------------- 

उत्तरे : १)  ब  २) क  ३) ब  ४) ब  ५) ड  ६) ड  ७) अ  ८) ड  ९) ड  १०) क

----------------------------------------------------

पोलीस भरती - प्रश्नसंच
      विषय - बुध्दीमत्ता
----------------------------------

१) एका घनाची बाजू ८ सेमी आहे तर त्याचे घनफळ किती ?
अ. ६४ चौ. से. मी. 
ब.  ५१२ घ. से. मी. 
क.  ६४  घ. से. मी. 
ड.  ४८ घ. से. मी. 

२) ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज ९०अंश असते त्या कोनांना परस्परांचे ----- आहेत असे म्हणतात ?
अ. पूरक कोन 
ब. विरुद्ध कोन
क. सरळ कोन
ड. कोटीकोन

३) १४ से. मी. लांबी व ८ से. मी. रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ किती ?
अ. ११२ चौ. से. मी. 
ब. १०० चौ. से. मी.  
क. १२१ चौ. से. मी.   
ड. १११ चौ. से. मी. 

४)    AZ, BY, CX, ?
अ. DW
ब. EV
क. EF
ड. JO

५) ---- हे प्राथमिक किंवा मूळ रंग होत ?
अ. निळा, हिरवा, लाल
ब. निळा, पिवळा, पांढरा  
क. पांढरा, काळा, लाल 
ड. हिरवा, पांढरा, केशरी

६) खालीलपैकी दिलेले शब्दकोशामध्ये (डिक्शनरी) कोणत्या क्रमाने येतील ?
१ Internet २) Income ३) India ४) Import .....
अ. २३१४
ब.  ४२३१
क.  १२३४
ड.  ४३२१

७) ८, ९, १३, २२, ३८, ६३ ?
अ. ८९
ब.  १०९
क.  ९९
ड.  ७९

८) घड्याळीतील तास काटा व मिनिटकाटा पुढीलपैकी कोणत्या वेळी काटकोनात असतो ?
अ. सहा वाजता  
ब. बारा वाजता 
क. साडेतीन वाजता  
ड. नऊ वाजता

९) खालील पर्यायामध्ये काही नवे दिली आहेत. त्यातील विसंगत नावे ओळखा ?  
अ. इंद्रकुमार गुजराल
ब. लालबहादूर शास्त्री 
क. एच. डी. देवेगौडा 
ड. डॉ. राजेंद्र प्रसाद

१०) खालील गटात न बसणारा शब्द कोणता ?
अ. उप जिल्हाधिकारी
ब.  पोलीस उपअधीक्षक
क. विक्रीकर अधिकारी 
ड.  जिल्हापरिषद अध्यक्ष

--------------------------------

उत्तरे : १) ब.  २) ड.  ३)अ. ४) अ.   ५) अ. ६)  ब.  ४२३१  ७) क ९९  ८) ड.  ९)  ड. १०) ड.
--------------------------------

पोलीस भरती - सराव  प्रश्नसंच
      विषय - अंकगणित
----------------------------------
*१) १ ते १७ या संख्याची बेरीज किती ?*
अ ) १४४ ब ) १६२ क ) १७१ ड ) १५३

*२)मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती ?*
अ ) ९०,०००  ब ) ९८, ९९९  क) ९,००० ड ) ९०,००१
*३)  राहुल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो . वर जाताना त्याने प्रत्येक  पायरीवर  तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?*
अ ) ४,५००  ब ) ५,००० क ) ५०५० ड ) ५,५००

*४) १०.५ + १.०५ + १०५ = ?*
अ ) ११६.५५ ब ) ३१५ क ) ११७ ड ) ११६.५

*५) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यावर बाकी ११ उरते ?*

अ ) ११६ ब  ) ५६  क ) १७६ ड ) २३६

*६) खालील दिलेल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे ?*
अ ) २     ब )  ५     क ) ९      ड ) १५
     ---          ---          ---           ---
      ७           ८           १२           १८
*७) एका नावेत सरासरी ३० Kg वजनाची मुले बसली आहेत . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ Kg आहे . तर नावाड्याचे वजन किती ?*
अ ) ६१ ब ) ६२ क ) ५९ ड ) ५१

*८) एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?*
अ ) ३६० ब ) ४८० क ) ५४० ड ) ४००

*९) एकाच प्रकारचे २५ टेबल काही रकमेस विकल्यामुळे ४०% नफा झाला , तर प्रत्येक टेबलवर शेकडा नफा किती ?*
अ ) २०% ब ) ४०% क ) ५/६ % ड ) सांगता येत नाही

*१०) साडेचार किलो ग्रॅम बेसनाच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?*
अ ) २५ ब ) ३० क ) ३५ ड ) २०

उत्तर : १- ड  २- ब ३- क ४-अ  ५- अ  ६-ड  ७-अ  ८- अ  ९- ब  १०-ब

18 November 2025

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे

१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ………. रोजी झाला.
उत्तर: ६ जून, १६७४


२) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक …….. किल्ल्यावर झाला.
उत्तर: रायगड

३) ‘राज्याभिषेक प्रयोग’ हा ग्रंथ………. यांनी लिहिला.
उत्तर: गागाभट्ट

४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी …….  हा इंग्रज वकील हजर होता.
उत्तर: हेन्री ऑक्झिडन


५) छत्रपती शिवाजी महाराजांचे सुवर्ण सिंहासन ……. वजनाचे होते.
उत्तर: ३२ मण

६) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकानिमित्त ……….. नाणे पाडले.
उत्तर: होन

७) छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकावेळी ………निर्माण केले.
उत्तर: अष्टप्रधान मंडळ

८) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे पुरोहित ………होते.
उत्तर: गागाभट्ट


९) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म ……….रोजी झाला.
उत्तर: १९ फेब्रुवारी, १६३०

१०) “जिजाबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची मार्गदर्शक व संरक्षक देवता होय” असे………नी म्हटले आहे.
उत्तर: न्या.म.गो.रानडे

शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे व माहिती (Names of Shivaji Maharaj bodyguards)
११) छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळीच्या भोरप्या डोंगरावर …… हा बुलंद किल्ला बांधला.
उत्तर: प्रतापगड

१२) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या जहाजांची संख्या…….होय.
उत्तर: ६४०


१३) युरोपियनांनी…….किल्ल्याला ‘पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे संबोधले.
उत्तर: रायगड

१४) शिव कालगणनेची………रोजी सुरुवात झाली.
उत्तर: ६ जून, १६७४

१५) छत्रपती शिवाजी महाराजांना……..यांनी “भारतीय आरमाराचे जनक” असे संबोधले.
उत्तर: डॉ.बाळकृष्ण

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काही प्रश्न उत्तरे | Chhatrapati Shivaji Maharaj question answers
१६) छत्रपती शिवाजी महाराजांनी……..हा किल्ला घेऊन स्वराज्याचे तोरण उभारले.
उत्तर: तोरणा


१७) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स………मध्ये सुरतवर स्वारी केली.
उत्तर: १६६४

१८) शिवकालीन शिवराई नाणे ……..धातूचे होते.
उत्तर: तांबा

१९) छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रजांना आपली आरमारी शक्ती दाखविण्यासाठी आपले सर्व आरमार……..या बंदरावर आणले होते.
उत्तर: ब्याक बे

२०) कर्नाटक मोहिमेवरून…….. मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला दाखल झाले.
उत्तर: एप्रिल,१६७८

२१) चित्रगुप्ताच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची संख्या…….होय.
उत्तर: ३६१

२२) ………रोजी छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून निसटले.
उत्तर: १७ ऑगस्ट १६६६

२३) छत्रपती शिवाजी महाराजांनी इ.स…….मध्ये दाभोळ बंदरावर ताबा मिळविला.
उत्तर: १६६९

२४) शाहिस्तेखानावर छत्रपती शिवाजी महाराजांनी……. रोजी हल्ला केला.
उत्तर: ५ एप्रिल, १६६३


२५) छत्रपती शिवाजी महाराजांनी श्री शैल्य मल्लिकार्जुन येथे कृष्णा नदीवर……. घाट बांधला.
उत्तर: श्री गणेश

२६) शिवाजी महाराजांच्या काळात होऊन गेले तो काळ कोणता होता?
उत्तर : मध्ययुगाचा काळ

२७) छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : जुन्नर

२८) तंजावर येथे राज्य करणाऱ्या शिवाजी महाराजांच्या सावत्र भावाचे नाव काय होते?
उत्तर : व्यंकोजी महाराज

२९) छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी कोठे आहे?
उत्तर : वढु बु

३०) अफजलखानाचा वध कोठे झाला होता?
उत्तर : प्रतापगड

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी माहिती (chhatrapati shivaji maharaj information in marathi)
३१) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
उत्तर : रायगड

३२) छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
उत्तर : शिवनेरी (19 फेब्रुवारी 1630)

३३) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार केला जात असे?
उत्तर : अष्टप्रधान मंडळ

३४) छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याची प्रथम राजधानी कोणती होती?
उत्तर : राजगड

३५) छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला ग्रंथ कोणता?
उत्तर : बुधभूषण

३६) छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्राबाहेर भव्य मंदिर कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर : श्री शैलम (आंध्र प्रदेश)

३७) छत्रपती शिवाजी महाराजांची सोन्याची नाणी कोणती होती?
उत्तर : होण

३८) छत्रपती शिवाजी महाराजांनी काढलेली तांब्याची नाणी कोणती होती?
उत्तर : शिवराई


३९) स्वराज्या मध्ये कोण मुख्य प्रधान होते?
उत्तर : मोरो त्रिंबक पिंगळे

४०) छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात अमात्य पदी कोण होते?
उत्तर : रामचंद्र नीलकंठ मुजुमदार

४१) वीर बाजीप्रभू यांचे जन्मस्थान कोणत्या तालुक्यात आहे?
उत्तर : भोर

४२) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळात सेनापती कोण होते?
उत्तर : हंबीरराव मोहिते

४३) छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
उत्तर : तोरणा

४४) छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील कोणत्या सम्राटाच्या दरबारी सरदार होते?
उत्तर : आदिलशहा

४५) छत्रपती शिवाजी महाराजांनंतर गादीवर कोण बसले?
उत्तर : छत्रपती संभाजी महाराज

छत्रपती शिवाजी महाराज प्रश्न उत्तर मराठी (Chhatrapati Shivaji Maharaj question answers in marathi)
४६) शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक वेळी कोण पौरोहित होते?
उत्तर : गागाभट्ट

४६) कोंढाणा गड कोणी सर केला होता?
उत्तर : तानाजी मालुसरे आणि सूर्याजी मालुसरे

४७) शिवरायांनी कोणत्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती?
उत्तर : रायरेश्वराचे मंदिर

४८) कोंढाणा किल्याला शिवाजी महाराजांनी कोणते नाव दिले?
उत्तर : सिंहगड

४९) छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रमुख गुप्तहेर कोण होता?
उत्तर : बहिर्जी नाईक

५०) मालोजी भोसले यांच्याकडे कोणत्या गावची पाटिलकी होती?
उत्तर : वेरूळ

५१) शिवरायांनी जिंकलेल्या तोरणा या किल्ल्याला कोणते नाव दिले गेले?
उत्तर : प्रचंडगड

५२) स्वराज्यात सचिवपदी कोण होते?
उत्तर : अण्णाजी दत्तो

५३) स्वराज्यात पत्रव्यवहार कोण पहात होते?
उत्तर : दत्ताजी त्रिंबक वाकणीस

५४) स्वराज्यात सुमंत कोण होते?
उत्तर : रामचंद्र त्रिंबक डबिर

५५) स्वराज्यात न्यायाधीशपदी कोण होते?
उत्तर : निराजी रावजी

५६) स्वराज्यात धार्मिक व्यवहाराचे काम कोण पाहत होते?
उत्तर : मोरेश्वर पंडितराव

५७) स्वराज्य मध्ये युद्ध साहित्याची व्यवस्था पाहण्यासाठी कोणता अधिकारी असे?
उत्तर : कारखानीस

५८) स्वराज्य मध्ये जवळपास किती किल्ले होते?
उत्तर : 370

५८) छत्रपती संभाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला होता?
उत्तर : 11 मार्च 1689

५९) अफजलखान भेटीच्या प्रसंगात छत्रपती शिवाजी महाराजांचे वकील कोण होते?
उत्तर : पंताजी गोपीनाथ

६०) जय सिंह पहिला व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात कोणता तह झाला होता?
उत्तर : पुरंदरचा तह

६१) मराठ्यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते?
उत्तर : कांहोजी आंग्रे

६२) छत्रपती शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा घालून कोणाची बोटे तोडली होती?
उत्तर : शाहिस्तेखान


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

17 October 2025

जिल्हा परिषद/आरोग्य विभाग/पोलीस भरती प्रश्नोत्तरे


(०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
उत्तर- मुख्यमंत्री.

(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?
उत्तर- अरबी समुद्र.

(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर- भूतान.

(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- रायगड.

(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?
उत्तर- महाराष्ट्र.

(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?
उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.

(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर- स्वामी विवेकानंद.

(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १० जानेवारी.

(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- हाॅकी.

(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?
उत्तर- इंदीरा गांधी.

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.

(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?
उत्तर- सिक्किम.

(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?
उत्तर- २० फेब्रुवारी.

(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- तिरंदाजी.

(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?
उत्तर- सरोजनी नायडू.

(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- जयंत नारळीकर.

(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर- सातारा.

(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- २३ मार्च.

(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- टेनिस.

(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?
उत्तर- मीरा कुमार.

(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण गायकवाड.

(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?
उत्तर- रविंद्रनाथ टागोर.

(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- ७ एप्रिल.

(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- कुस्ती.

(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?
उत्तर- आरती शहा.

(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?
उत्तर- लक्ष्मण माने.

(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?
उत्तर- प्रतिभा पाटील.

(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?
उत्तर- १७ मे.

(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर- क्रिकेट.

(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?
उत्तर- विजयालक्ष्मी.

पोलीस भरती सराव १०० महत्त्वाचे प्रश्न

१) भीमा नदीचा …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ४५१ कि.मी

२)…. या जातीचा ससा महाराष्ट्रात सर्वत्र आढळतो.

= लिपस निग्रीकोलीस

३) महाराष्ट्राचा आकार अनियमित असला तरी काहीसा …. सारखा आहे.

= काटकोन त्रिकोण

४) महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आकर्षण वाटणारे पीक …..

= ऊस

५) राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये अभ्रकाचे साठे आढळतात.

= सिंधुदुर्ग, चंद्रपूर व नागपूर

६) चद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमेवरून कोणती नदी वाहते?

= वैनगंगा

७) महाराष्ट्राच्या आग्नेय सीमेवरून कोणती नदी वाहते?

= इंद्रावती

८) राज्यातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून पुणे जिल्ह्याचा, तर ‘सर्वाधिक घनतेचा जिल्हा’ म्हणून …. जिल्ह्याचा उल्लेख करावा लागतो.

=मुंबई उपनगर

९) रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती?

= शुक्र

१०) केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानासाठी राज्यातील किती शहरांची निवड केली गेली आहे ?

= १०
११) ….. ही पश्चिम किनारपट्टीवरील सर्वांत मोठी खाडी आहे.

= धरमतर

१२) कसारा घाट’ म्हणजेच …..

= थळघाट

१३) सन १९६० मध्ये …. या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आल्याने तो दिवस ‘महाराष्ट्र दिन’ म्हणून साजरा केला जातो.

= १ मे

१४).…. या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले होते.

= १ नोव्हेंबर, १९५६

१५) सन १९६० मध्ये महाराष्ट्र राज्य स्थापन होत असतानाच मूळच्या द्वैभाषिक राज्यातून ….हेही स्वतंत्र राज्य अस्तित्वात आले.

= गुजरात

१६) महाराष्ट्रातील दक्षिण-उत्तर पसरलेल्या ……….पर्वतरांगेस ‘पश्चिम घाट’ असेही म्हणतात.

= सह्य

१७) ….. या महाराष्ट्राच्या उपराजधानीत विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन भरते.

= नागपूर

१८) नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीवर …. येथे बांधण्यात आलेल्या धरणातून नाशिक शहरास पाणीपुरवठा होतो.

= गंगापूर

१९) अजिंठ्याचे डोंगर, हरिश्चंद्र डोंगररांगा, बालाघाट डोंगररांगा व महादेव डोंगररांगा या वास्तविक ….. या पर्वताच्याच उपरांगा होत.

= सह्य

२०) राज्यात कोणत्या नदीच्या खोऱ्यात तंबाखूचे सर्वाधिक उत्पन्न काढले जाते?

= कृष्णा

२१) जलयुक्त शिवार अभियानाचा मुख्य उद्देश महाराष्ट्राला …. पर्यंत पाणी टंचाई मुक्त करण्याचा आहे.

= सन २०१९

२२) भारतातील एकूण साखर कारखान्यांपैकी सर्वाधिक कारखाने महाराष्ट्रात आहेत. किती टक्के?

= ३६ टक्के

२३) सन २०११ च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्येचा जिल्हा’ म्हणून …. या जिल्ह्याचा निर्दश करावा लागेल.

= सिंधुदुर्ग

२४) भौगोलिक निकटत्वामुळे मराठीच्या …. या उपभाषेवर किंवा बोलीवर काहीसा गुजरातीचाही ठसा आढळतो.

= खानदेशी

२५) सन २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील लोकसंख्येत अनुसूचित जातींचे प्रमाण ११.८ टक्के इतके, तर अनुसूचित जमातींचे प्रमाण …. टक्के इतके आहे.

= ९.४

२६) दुग्ध उत्पादनात राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो?

= सातवा

२७) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार राज्यातील भौगोलिक क्षेत्राशी बनव्याप्त क्षेत्राचे प्रमाण …. इतके आहे.

= १६.४७ टक्के

२८) सन २०१७ च्या वनस्थिती अहवालानुसार भारतातील एकूण क्षेत्राच्या अवघे …. इतके वनक्षेत्र महाराष्ट्रात आहे.

= ७.१६ टक्के

२९) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

३०) सह्याद्रीच्या पूर्वाभिमुख उतारावर कोणत्या प्रकारची वने प्रामुख्याने आढळतात ?

= शुष्क पानझडी वृक्षांची वने

३१) …. पर्वताला महाराष्ट्राचा प्रमुख जलदुभाजक म्हटले जाते.

= सह्य

३२) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

३३) कोकण किनारा ‘रिया’ प्रकारचा असून या किनाऱ्यावर …. जवळ ‘सागरी गुहा’ आढळतात.

= मालवण

३४) सह्य पर्वताची एकूण लांबी सुमारे १,६०० कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा भाग महाराष्ट्रात आहे.

= ६४० कि. मी.

३५) उत्तरेस सातमाळा-अजिंठ्याचे डोंगर व दक्षिणेस हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. चे खोरे पसरलेले आहे.

= गोदावरी

३६) उत्तरेला हरिश्चंद्र-बालाघाटचे डोंगर व दक्षिणेला महादेवाचे डोंगर यांच्या दरम्यान राज्यात …. नदीचे खोरे पसरलेले आहे.

= भीमा

३७) पुणे जिल्ह्यात भीमाशंकर येथे उगम पावणारी भीमा नदी कर्नाटक राज्यात रायचूर जिल्ह्यात येथे कृष्णेस मिळते.

= कुरुगड्डी

३८) गोदावरी नदीची एकूण लांबी सुमारे १,४६५ कि. मी. असून त्यांपैकी सुमारे …. लांबीचा प्रवाह महाराष्ट्रातून गेला आहे.

= ७३२ कि. मी.

३९) केंद्र स्तरावरील सांसद आदर्श ग्राम योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने कोणती योजना सुरू केली आहे?

= आमदार आदर्श ग्राम योजना

४०) तापी नदी महाराष्ट्रातील …….या जिल्ह्यांतून वाहत जाते.

= जळगाव, नंदुरबार व धुळे

४१) वैतरणा नदीवर बांधण्यात आलेल्या …. या धरणातूनही मुंबईला पाणीपुरवठा होतो.

= मोडकसागर

४२) …. ही पर्वतराग महाराष्ट्राच्या उत्तर सीमेस अनेक ठिकाणी छेदून वा स्पर्शून गेलेली आहे.

= सातपुडा

४३) डिसेंबर, २०१८ अखेर राज्यात एकूण दूरध्वनी जोडण्यांची संख्या …. इतकी होती.

= ४५.१० लाख

४४) हि राज्यातील सर्वाधिक लांबीची नदी दक्षिणेची गंगा’ तसेच ‘वृद्धगंगा’ म्हणून ओळखली जाते.

= गोदावरी

४५) महाराष्ट्राला प्रामुख्याने अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैत्रत्य मोसमी वाऱ्यांपासून पाऊस मिळतो. हा पाऊस साधारणतः …. या कालखंडातपडत असतो.

= जुन ते सप्टेंबर

४६) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

४७) खनिज संपत्तीचा विचार करता महाराष्ट्रातील …. हा विभाग सर्वाधिक समृद्ध आहे.

= विदर्भ

४८) सह्य पर्वताची किंवा पश्चिम घाटाची निर्मिती …. मुळे झाली आहे.

= प्रस्तरभंग

४९) राज्यातील किनारपट्टीच्या कोकण भागात …. प्रकारचा पाऊस पडतो.

= प्रतिरोध

५०) सागाची झाडे …. प्रकारच्या अरण्यात आढळतात.

= पानझडी वृक्षांची अरण्ये

५१) महाराष्ट्रात लाकूड-कटाईचे कारखाने (सॉ-मिल्स) …. या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणावर आहेत.

= चंद्रपूर, गडचिरोली व अमरावती

५२) महाराष्ट्रातील अतिपूर्वेकडील आदिवासी जमात ….

= माडिया-गोंड

५३) राज्यातील …. या विभागात सर्वांत कमी वने आढळतात.

= मराठवाडा

५४) महाराष्ट्र पठारावरील …. या सर्वांत मोठ्या डोंगररांगेने कृष्णा व भीमा या दोन नद्यांची खोरी वेगळी केली आहेत.

= महादेव डोंगररांग

५५) हरिश्चंद्र-बालाघाट’ या डोंगररांगेमुळे …. या नद्यांची खोरी एकमेकांपासून अलग झाली आहेत.

= गोदावरी व भीमा

56) ‘गाविलगड’ व ‘नर्नाळा’ हे प्रसिद्ध किल्ले …. या पर्वतावर वसले आहेत.

= सातपुडा

57) अहमदनगर व नाशिक या जिल्ह्यांच्या सीमेवर, सह्य पर्वतावर वसलेले ‘कळसूबाई’ हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वतशिखर असून त्याची उंची …. इतकी आहे.

= १,६४६ मीटर

58) अरुंद अशा कोकण किनारपट्टीची रुंदी …. नदीच्या खोऱ्यात वाढलेली आहे.

= उल्हास

59) ….. या जिल्ह्यांना पूर्वी ‘खानदेश’ म्हणून ओळखले जाई.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

६०) बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान’ या नदीच्या काठी वसले आहे.

= दहिसर

६१) नाशिकहून ठाणे जिल्ह्यात उतरताना …. हा घाट पार करावा लागतो.

= कसारा

६२)’कस्तुरी’ मांजर राज्यात …. जिल्ह्यांत आढळते.
= रायगड व रत्नागिरी

६३) गांधीजींनी घालून दिलेले आदर्श व त्यांची तत्त्वे यांच्या माध्यमातून विकास साधण्याची उद्दिष्टे असलेली ‘वर्धा योजना’ ….या वर्षीच्या गांधी जयंतीपासून वर्धा जिल्ह्यात राबविली जात आहे.

= १९८३

६४) एकोणिसाव्या पशुगणनेनुसार देशातील एकूण पशुधनात राज्याचा कितवा क्रमांक लागतो?

= सहावा

६५)संजय गांधी निराधार अनुदान’ योजनेअन्वये पात्र व्यक्तीस दरमहा …. इतके आर्थिक साहाय्य देण्यात येते.

= रुपये ६००/

६६) महाराष्ट्रातील…. या भागाचा उल्लेख यादवकालीन शिलालेखात ‘सेऊन देश’ असा केला गेला आहे.

= खानदेश (धुळे, नंदुरबार, जळगाव)

६७) केंद्र शासनाने ‘अतिमागास’ म्हणून जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील जमाती ….

= चंद्रपूर : माडिया-गोंड; यवतमाळ
नांदेड : कोलाम ; ठाणे, रायगड : कातकरी

६८) …. हे दोन महाराष्ट्राचे प्रमुख स्वाभाविक विभाग होत.

= कोकण व पठार (देश)

६९) कोकण किनारपट्टीत सापडणाऱ्या ‘जांभा’ या प्रकारच्या मातीत …. यांचे प्रमाण अधिक असते.

= लोह व जस्त

७०) महाराष्ट्राची सीमा खालील सहा राज्यांना भिडलेली आहे

= गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़,
तेलंगाणा, कर्नाटक व गोवा

७१) पूर्णा, वर्धा, पैनगंगा व वैनगंगा या …. भागातील प्रमुख नद्या होत.

= विदर्भ

७२) ‘अहिराणी’ ही मराठीची उपभाषा किंवा बोलीभाषा प्रामुख्याने …. या जिल्ह्यांत बोलली जाते.

= धुळे, नंदुरबार, जळगाव

७३) रोशा’ जातीचे गवत राज्यात …. या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळते.

= धुळे, नंदुरबार व जळगाव

७४) ‘कन्हान’, ‘वर्धा’ आणि ‘खोबरागडी’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= वैनगंगा

७५) एकूण लोकसंख्येशी असलेले नागरी लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्राचा (४५.२२ टक्के) क्रमांक देशात तिसरा लागतो; तर …. या राज्याचा क्रमांक पहिला लागतो.

= तमिळनाडू (४८.४० टक्के)

७६) …. या नदीच्या खोऱ्यास ‘संतांची भूमी’ म्हणून संबोधले जाते.

= गोदावरी

७७) राज्यातील …. या जिल्ह्यांमध्ये बांबूची वने मोठ्या प्रमाणावर आढळून येतात.

= चंद्रपूर व गडचिरोली

७८) विड्या तयार करण्यासाठी तेंदूची (टेंभुर्णीची) पाने वापरतात. तेंदूची झाडे ….या जिल्ह्यातील वनांमध्ये विपुल प्रमाणात आढळतात.

= नागपूर, गोंदिया व भंडारा

७९) परकीय चलन मिळवून देणारा ‘हापूस’ जातीचा आंबा या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो.

= रत्नागिरी व सिंधुदुर्ग

८०) राज्यातील हळदीच्या उत्पादनात अग्रेसर असलेले दोन जिल्हे …. हे होत.

= सातारा व सांगली

८१) ‘काटेपूर्णा’ व ‘नळगंगा’ या …. नदीच्या उपनद्या होत.

= पूर्णा

८२) सावंतवाडीहून बेळगावला जाताना लागणारा घाट …..

= आंबोली

८३) ‘पूर्णा’ व ‘गिरणा’ या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?

= तापी

८४) महाराष्ट्रात ……येथे रासायनिक द्रवांचे कारखाने आहेत.

= पनवेल व अंबरनाथ

८५) ‘पेंच ‘ प्रकल्पात महाराष्ट्राचे सहकारी राज्ये ….

= मध्य प्रदेश

८६) ….या विदर्भातील प्रमुख नद्या होत .

= वर्धा व वैनगंगा

८७) महाबळेश्वर-पोलादपूर रस्त्यावर लागणार घाट …..

= आंबेनळी

८८) महाराष्ट्रातील …..हे विभाग कापूस उत्पादनात अग्रेसर आहेत.

= खान्देश व विदर्भ

८९) गिरणा ,पांझरा व बुराई या …च्या उपनद्या होत.

= तापी

९०) सातारा ,सांगली ,कोल्हापूर हि शहरे …….खोऱ्यात वसली आहेत .

= भीमा

९१) राज्यात काडीपेटी तयार करण्याचे कारखाने ….येथे आहेत .

= मुंबई ,नागपूर ,अंबरनाथ

९२) मराठीच्या ..या बोलीस किंवा उपभाषेस अहिरांची भाषा म्हणून ‘अहिराणी ‘असेही म्हणतात.

= खान्देशी

९३) तापी नदीची एकूण लांबी ७२४ कि .मी.असून तापीचा सुमारे ….चा प्रवाह राज्यातून गेला आहे.

= २२८ कि .मी .

९४) येरळा ,वारणा व पंचगंगा या ….नदीच्या उपनद्या वा तिला येऊन मिळणाऱ्या नद्या होत.

= कृष्णा

९५) राज्यातील उत्तरेकडील बोर्डी-तलासरीपासून दक्षिणेकडील …. पर्यंतचा चिंचोळा पट्टा कोकण किनारपट्टीत मोडतो.

= रेडी-बांदा

९६)राज्यात एकूण ……जिल्हा मध्यवर्ती बँका आहेत.

= ३१

९७) लोकआयुक्ताची नेमणूक कोण करतात ?

= राज्यपाल

९८) महाराष्ट्र राज्याच्या पश्चिमेस …, पसरलेला आहे.

= अरबी समुद्र

९९) ‘लोकआयुक्त ‘ हे पद राज्यात आस्तित्वात आले .

= २५ ओक्टोम्बर ,१७७२

१००) महाबळेश्वर परिसरातील कृष्णा, कोयना व सावित्री यांच्या उगम प्रदेशातील वने प्रकारची आहेत.

= उष्ण कटिबंधीय सदाहरित वने

11 October 2025

महाराष्ट्रातील समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे

विठ्ठल रामजी शिंदे :

जन्म – 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.

मृत्यू – 2 जानेवारी 1944.

1932 – 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.

‘महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी‘ गं. बा. सरदार.

‘निष्काम कर्मयोगी‘, भाई माधवराव बागल.

जनतेकडून ‘महर्षी‘ ही पदवी.

अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.

संस्थात्मक योगदान :

1905 – मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.

18 ऑक्टोबर 1906 – डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई

येथे स्थापना. पहिले अध्यक्ष – न्या. चंदावकर.

1910 – जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.

द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने ‘सेवा सदन‘ ही संस्था.

अनाथाश्रम – रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.
ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.

23 मार्च 1918 – अस्पृश्यता निवारक संघ.
1918 – मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.

1920 – पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.

1937 – स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.

1923 – तरुण ब्रहयो संघ.

1937 – बहुजन पक्षाची स्थापना.
स्त्रियांसाठी आर्य

महिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.

वृद्धंनसाठि संगत सभा.

लेखन :

प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.

1903 – प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.

1903 – अ‍ॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत ‘हिंदुस्थानातील उदारधर्म’ हा निबंध वाचला.

Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.

भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न

माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .


वैशिष्ट्ये :

शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम
अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.

1904 – मुंबई धर्म परिषद.

1905 – अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.

1918 – मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.

1924 – वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.

1935 – बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.

स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.

शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.


16 September 2025

1857 च्या उठावानंतरचा काळ:


भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.
इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.
इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.
1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.
इ.स. 1861 मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

चार्लस वुड’ ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
इ.स. 1859 साली शेतकर्‍याविषयीचा ‘बंगाल रेंट अॅक्ट’ कॅनिंगच्या काळात करण्यात आला.
इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन ‘निल दर्पण’ या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.
लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास ‘अर्ल’ हा किताब बहाल केला.
इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी ‘फॅमिना कमीशन’ ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.
14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास ‘प्रांतीय स्वायत्तेची सनद’ असे मानण्यात येते.
लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

 हंटर आयोग (भारतीय शिक्षण आयोग)

 ◾️ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने
प्राथमिक शिक्षणाची प्रगती  1854 ते 1882 या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला.

◾️वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या  आयोगाला सांगण्यात आले होते.

◾️ या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण, कायदे आणि व्यवस्थापन, स्थानिक शाळांना प्रोत्साहन, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था यांविषयी शिफारशी केल्या.

◾️ प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे, प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा, शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे.

◾️तसेच इंग्लंडमधील 1870 आणि 1876 च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा, प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा, स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे, प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.

◾️ या आयोगासमोर महात्मा फुले, पंडीता रमाबाई यांनी साक्ष दिली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

08 September 2025

यूपीएससी अभ्यासक्रम मराठी मध्ये

 नमस्कार मित्रानो आज आपण या लेखात ( UPSC syllabus ) यूपीएससी अभ्यासक्रम बघणार आहोत. तसेच या लेखात आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम, आयएएस मुख्य परीक्षा अभ्यासक्रम तसेच यूपीएससी मुलाखत या सर्व घटकांची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न करू.


यूपीएससी परीक्षा अभ्यासक्रम:

 देशात यूपीएससी द्वारे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमध्ये IAS ची परीक्षा हि सर्वोच्य स्थानी मानली जाते. आज आपण या मधील IAS च्या अभ्यासक्रमाबद्दल जाणून घेऊया. सध्याच्या वेळेला आणि भूतकाळाला जोडणारा यूपीएससी अभ्यासक्रमाचा उच्च स्तर म्हणजे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय काठीण्य पातळी असलेला अभ्यासक्रम आहे. Upsc.gov.in वर जाहीर केलेल्या यूपीएससीच्या अधिकृत अधिसूचने मध्ये यूपीएससी अभ्यासक्रमाचा उल्लेख केलेला आहे. यूपीएससी चा अभ्यासक्रम हा IAS च्या तयारीचा मूळ आणि IAS परीक्षेत निवडलेला पहिला घटक आहे. UPSC परीक्षेतील प्रत्येक गोष्ट आपण UPSC च्या अभ्यासक्रमामधून आपण समजून घेऊ शकतो. यूपीएससी चा अभ्यासक्रम समजून घेणे ही आयएएस परीक्षेत यशस्वी होण्याची पहिली पायरी आहे. उमेदवारांना हे समजून घेणे आवश्यक आहे की सध्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्ताची घटना ही सामान्य अध्ययन अभ्यासक्रमाच्या मूलभूत विषयांशी निगडीत आहे आणि सध्याच्या घडामोडींच्या सहाय्याने उमेदवार या प्रकरणाची प्रासंगिकता समजून घेऊ शकतात.

IAS प्रिलिम्स आणि IAS मुख्य परीक्षेसाठी दरवर्षी यूपीएससीच्या अधिसूचनेमध्ये आयएएस अभ्यासक्रम अधिसूचित केला जातो.IAS तयारीचा पहिला आवश्यक घटक म्हणजे IAS अभ्यासक्रमाची आपणास स्पष्ट समज असणे आवशक आहे. IAS प्रिलिम्स अभ्यासक्रम आणि IAS मुख्य अभ्यासक्रमाचा स्वतंत्रपणे यूपीएससी अधिसूचनेमध्ये उल्लेख केला आहे. परंतु IAS मुख्य परीक्षा अभ्यासक्रम म्हणजे IAS प्रिलिम्स अभ्यासक्रमाचा विस्तृत विस्तार आहे. उमेदवारने IAS अभ्यासक्रमाची खोली समजून घेणे आवश्यक आहे. यूपीएससी अभ्यासक्रम समजण्यासाठी मागील वर्षाचे प्रश्नपत्रिका टॉर्च म्हणून काम करतात. याशिवाय आयएएस च्या तयारीच्या मार्गावर राहण्यासाठी उमेदवारांना दररोजच्या चालू घडामोडींचा आभ्यास करणे आवश्यक आहे.

IAS टॉपर्स केलेल्या उमेदवारांचे योग्य विश्लेषण आणि IAS च्या मागील प्रश्नपत्रिकां मधून आयएएस तयारीला दिशा प्रदान करते. परीक्षेची खोली समजून घेण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास नेहमीच आयएएस अभ्यासक्रमाच्या विषयाशी संबंधित ठेवण्यासाठी उमेदवारांना यूपीएससी अभ्यासक्रम अंतर्भूत करणे आवश्यक आहे. यूपीएससी चा अभ्यासक्रम IAS च्या तयारीची मर्यादा ठरवते. यूपीएससी मध्ये IAS अभ्यासक्रम वेगळ्या अस्तित्वात नसतो, ही त्यांची गतिशीलता आहे जी IAS परीक्षा अधिक जटिल बनवते. यूपीएससी परीक्षेत IAS अभ्यासक्रमात नमूद केलेले सर्व विषय IAS बनू पाहणारया परीक्षार्थींना, तसेच सामान्य माणसाला समजून घेण्याची मागणी करतात.


आयएएस अभ्यासक्रम 2022 – पूर्व परीक्षा

पेपरप्रश्न आणि वेळमार्क
सामान्य अध्ययन पेपर – ११०० प्रश्न200
सामान्य अध्ययन पेपर – २ (CSAT – Qualifying only)८० प्रश्न200 ( या मार्कांचा विचार केला जात नाही )
एकूण200




IAS – आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

आयएएस पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 2022 – सामान्य अध्ययन पेपर १

  • राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महत्त्व असणार्‍या सध्याच्या घटना.
  • भारत आणि भारतीय राष्ट्रीय चळवळीचा इतिहास.
  • भारतीय आणि जागतिक भूगोल – भौतिक, सामाजिक, भारत आणि जगाचा आर्थिक भूगोल.
  • भारतीय राज्य व राज्यशास्त्र-राज्यघटना, राजकीय व्यवस्था, पंचायत राज, सार्वजनिक धोरण, मुलभूत हक्कांचे प्रश्न इ.
  • आर्थिक आणि सामाजिक विकास, टिकाऊ विकास, गरीबी, लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्रातील पुढाकार इ.
  • पर्यावरणीय विषय, जैव-विविधता आणि हवामान बदल – या विषयावर विषय विशेषतेची आवश्यकता नाही.
  • सामान्य विज्ञान.

प्रीलिम्स परीक्षेसाठी यूपीएससीने आयएएस अभ्यासक्रमातील चालू घडामोडींना अव्वल स्थान दिले आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. आपण असे म्हणू शकतो की आयएएस तयारीच्या दिशेने निर्णय घेण्यामध्ये हा एक घटक महत्वाचा आहे. आयएएसच्या इच्छुकांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व असलेल्या सद्य घटनांचा विचार करून सर्व विषयांचा अभ्यास केला पाहिजे.

इतर सर्व विषय आयएएसच्या पूर्वपरीक्षा परीक्षेसाठी तितकेच महत्वाचे आहेत, परंतु उमेदवाराने आयएएसच्या तयारीत असंबद्ध विषय सोडण्याची सवय विकसित केली पाहिजे. भारतीय राजकारण हा असा एक विषय आहे जिथे उमेदवार नेत्यांच्या राजकीय विधानांबद्दल वाचण्यात वेळ वाया घालवतात. परंतु ही सवय मर्यादित ठेवण्याची आणि केवळ घटनात्मक कार्या पुरती मर्यादीत ठेवण्याची सूचना देते.


आयएएस प्रिलिम्स अभ्यासक्रम 2022 – सामान्य अध्ययन पेपर -2 (CSAT)

  • आकलन.
  • संवाद कौशल्यासह परस्पर वैयक्तिक कौशल्ये.
  • तार्किक तर्क आणि विश्लेषणात्मक क्षमता.
  • निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे.
  • सामान्य मानसिक क्षमता.
  • मूलभूत संख्या (संख्या आणि त्यांचे संबंध, परिमाण च्या ऑर्डर इ.) (दहावी ची पातळी), डेटा स्पष्टीकरण (चार्ट, आलेख, सारण्या इ. – (दहावी ची पातळी)

IAS – आयएएस मुख्य परीक्षा अभ्यासक्रम

आयएएस मुख्य परीक्षा ही वर्णनात्मक ( पारंपारिक ) पेपर-आधारित परीक्षा आहे. ज्यात उमेदवारांना प्रश्नांसाठी लांब उत्तरे लिहिण्याची आवश्यकता असते. सामान्य अध्ययनच्या पेपर व्यतिरिक्त, एक निबंध पेपर आहे ज्यामध्ये उमेदवारांना दोन निबंध लिहिणे आवश्यक आहे.

आयएएस मुख्य परीक्षा विषय व त्यांचे गुण खाली दिले आहेत.

पेपरपेपर चे नावमार्क
घटनेच्या आठव्या परिशिष्टात समाविष्ट केलेल्या भाषांमधून उमेदवाराने
निवडलेल्या भारतीय भाषेपैकी एक भाषा. (केवळ पात्रता )
३०० (केवळ पात्रता)
इंग्रजी (केवळ पात्रता)३०० (केवळ पात्रता)
निबंध लेखन२५०
सामान्य अध्ययन पेपर – १२५०
सामान्य अध्ययन पेपर – २२५०
सामान्य अध्ययन पेपर – ३२५०
सामान्य अध्ययन पेपर – ४२५०
पर्यायी – विषय पेपर १२५०
पर्यायी – विषय पेपर २२५०
आयएएस मुख्य (लेखी)१७५०
आयएएस मुलाखत२७५
एकूण२०२५
UPSC syllabus in Marathi PDF

नावाप्रमाणेच आयएएस मुख्य परीक्षा ही उमेदवारांची सुध्दा मुख्य परीक्षा आहे. आयएएस निवड केवळ आयएएस मुख्य (लेखी) आणि आयएएस मुख्य (मुलाखत) मध्ये मिळालेल्या गुणांवर आधारित आहे. यूपीएससी अधिकृत अधिसूचनेमध्ये आयएएस अभ्यासक्रम विषयाची यादी वेळोवेळी प्रदान करते. यूपीएससी अभ्यासक्रम पेपरनिहाय स्वरुपात देण्यात आला आहे आणि उमेदवारांना त्याच पद्धतीने आयएएस परीक्षेची तयारी करणे आवश्यक आहे.

आयएएस अभ्यासक्रम – निबंध पेपर

यूपीएससीच्या अधिसूचनेत आयएएस निबंध पेपर अभ्यासक्रमाचा उल्लेख नाही. अधिकृत अधिसूचनेमध्ये फक्त एक विस्तृत रूपरेषा प्रदान केली गेली आहे. परंतु उमेदवारांकडून मिळालेल्या अपेक्षेचा उल्लेख अधिसूचनेत करण्यात आला आहे. “त्यांच्या कल्पना सुव्यवस्थित पद्धतीने मांडण्यासाठी आणि संक्षिप्तपणे लिहिण्यासाठी त्यांनी निबंधाच्या विषयाशी जूळून जाणे अपेक्षित आहे.

यूपीएससी ने नेहमीच तत्वज्ञान, लोक प्रशासन आणि आंतरराष्ट्रीय परिस्थिती यावर विषय दिला आहे. या निबंधातून उमेदवारांच्या जागतिक दृष्टिकोनाची चाचणी घेतली जाते. उमेदवाराने गुंतलेली समस्या कशी पाहिली आणि त्या समस्येचे निराकरण कसे सुचविले यावर या विषयातील यश अवलंबून असते.

आयएएस अभ्यासक्रम – सामान्य अध्ययन पेपर  


इंडियन हेरिटेज अँड कल्चर, हिस्ट्री अँड भूगोल ऑफ द वर्ल्ड सोसायटी.

  • भारतीय संस्कृती प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत, कला, साहित्य आणि आर्किटेक्चरच्या मुख्य पैलूंचा समावेश.
  • आधुनिक भारतीय इतिहास अठराव्या शतकाच्या मध्य काळा पासून आजपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना, व्यक्तिमत्त्व, आणि मुद्दे.
  • स्वातंत्र्य चळवळ – त्याचे विविध टप्पे आणि देशातील विविध भागातील महत्त्वपूर्ण योगदानकर्ते / योगदान.
  • देशातील स्वातंत्र्योत्तर एकत्रीकरण आणि पुनर्रचना.
  • जगाच्या इतिहासामध्ये औद्योगिक क्रांती, महायुद्धे, राष्ट्रीय सीमांची पुनर्रचना, वसाहतवाद, विस्तारवाद, साम्यवाद, भांडवलशाही, समाजवाद इत्यादी घटनांचा समावेश आहे.
  • भारतीय समाजातील विविध वैशिष्ट्ये आणि विविधता.
  • महिलाची भूमिका आणि महिलांची संघटना, लोकसंख्या आणि संबंधित समस्या, दारिद्र्य आणि विकासात्मक समस्या, शहरीकरण, त्यांच्या समस्या आणि त्यांचे उपाय.
  • भारतीय समाजावर जागतिकीकरणाचे परिणाम.
  • सामाजिक सशक्तीकरण, जातीयवाद, प्रादेशिकता आणि धर्मनिरपेक्षता.
  • जगाच्या भौतिक भूगोलातील ठळक वैशिष्ट्ये.
  • जगभरातील प्रमुख नैसर्गिक संसाधनांचे वितरण (दक्षिण आशिया आणि भारतीय उपखंड यांचा समावेश असलेले ) जगातील विविध भागात (भारतासह) प्राथमिक, द्वितीय आणि तृतीय क्षेत्रातील उद्योगांच्या स्थानासाठी जबाबदार घटक.
  • भूकंप, सुनामी, ज्वालामुखीय, चक्रीवादळ इत्यादी, भौगोलिक वैशिष्ट्ये आणि त्यांचे भौगोलिक वैशिष्ट्यांमधील बदल, वनस्पती आणि जीव-जंतु आणि अशा बदलांचा परिणाम यासारख्या महत्त्वपूर्ण भौगोलिक घटना.

सामान्य अध्ययन पेपर – 

शासन, राज्यघटना, राजकारण, सामाजिक न्याय आणि आंतरराष्ट्रीय संबंध.

  • भारतीय राज्यघटना – ऐतिहासिक अधोरेखित, उत्क्रांती, वैशिष्ट्ये, दुरुस्ती, महत्त्वपूर्ण तरतुदी आणि मूलभूत रचना.
  • संघ आणि राज्ये यांची कार्ये आणि जबाबदारया, फेडरल स्ट्रक्चरशी संबंधित मुद्दे आणि आव्हाने, स्थानिक पातळीवरील अधिकार आणि वित्तपुरवठा आणि त्यातील आव्हाने.
  • विवाद निराकरण यंत्रणा यांचे विविध अवयव आणि संस्था यांच्यात शक्तींचे पृथक्करण.
  • लैंगिक संतुलन प्रतिबिंबित करणारे एक कार्यबल असण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे आणि महिला उमेदवारांना प्रोत्साहित केले जाते.
  • भारतीय घटनात्मक योजनेची इतर देशांच्या घटनेशी तुलना.
  • संसद व राज्य विधिमंडळ – रचना, कार्यप्रणाली, व्यवसायाचे आचरण, अधिकार व सुविधा व त्याद्वारे उद्भवणारे प्रश्न.
  • कार्यकारी आणि न्यायपालिकेची रचना, संघटना आणि कार्य-सरकारची मंत्रालये आणि विभाग, दबाव गट आणि औपचारिक / अनौपचारिक संघटना आणि त्यांची लोकसभेमधील भूमिका.
  • लोकप्रतिनिधी कायद्याची ठळक वैशिष्ट्ये.
  • विविध घटनात्मक पदाची कार्ये, अधिकार, कार्ये व जबाबदारया, विविध नेमणुका. वैधानिक, नियामक आणि विविध अर्ध-न्यायिक संस्था.
  • सरकारची धोरणे आणि विविध क्षेत्रातील विकासासाठी हस्तक्षेप आणि त्यांच्या अंमलबजावणीमुळे उद्भवणारे मुद्दे.
  • विकास प्रक्रिया आणि विकास उद्योग – स्वयंसेवी संस्था, बचत गट, विविध गट आणि संघटना, देणगीदार, धर्मादाय संस्था, संस्था आणि इतर भागधारकांची भूमिका.
  • केंद्र व राज्ये यांनी असुरक्षित लोकसंख्ये साठी कल्याणकारी योजना आणि या योजनांची कामगिरी, या असुरक्षित विभागांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या सुधारणेसाठी यंत्रणा, कायदे, संस्था स्थापन केले आहेत.
  • आरोग्य, शिक्षण, मानव संसाधन संबंधित सामाजिक क्षेत्र / सेवांच्या विकास आणि व्यवस्थापनाशी संबंधित मुद्दे.
  • दारिद्र्य आणि उपासमारीशी संबंधित मुद्दे.
  • शासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व, ई-गव्हर्नन्स अप्लिकेशन्स, मॉडेल्स, यश, मर्यादा आणि संभाव्यतेचे महत्त्वपूर्ण पैलू. नागरिकांची सनद, पारदर्शकता आणि जबाबदारी आणि संस्थात्मक आणि इतर उपाय.
  • लोकशाहीमध्ये नागरी सेवांची भूमिका.
  • भारत आणि त्याचे शेजारी राष्ट्रांशी संबंध.
  • द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक गटबाजी, आणि भारत किंवा भारताच्या हितावर परिणाम करणारे करार.
  • विकसनशील देशांच्या राजकारणाचा आणि भारताच्या हितावर आधारित राजकारणाचा प्रभाव, भारतीय डायस्पोरा.
  • महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय संस्था, आणि त्यांची रचना.

सामान्य अध्ययन पेपर – ३

  • तंत्रज्ञान, आर्थिक विकास, जैवविविधता, पर्यावरण, सुरक्षा आणि आपत्ती व्यवस्थापन.
  • भारतीय अर्थव्यवस्था आणि नियोजन, गतिशीलता, संसाधनांचा विकास, विकास आणि रोजगाराशी संबंधित मुद्दे.
  • समावेशक वाढ आणि त्यातून उद्भवणारे मुद्दे.
  • सरकारी बजेट.
  • देशातील विविध भागात मुख्य पीक-पीक पद्धती, विविध प्रकारचे सिंचन आणि सिंचन प्रणाली, साठवण, शेती उत्पादनांचे वाहतूक आणि विपणन मुद्दे व संबंधित अडचणी, शेतकर्‍यांच्या मदतीसाठी ई-तंत्रज्ञान.
  • प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेती अनुदान आणि किमान आधारभूत किंमतींशी संबंधित मुद्दे. सार्वजनिक वितरण प्रणाली- उद्दीष्टे, कामकाज, मर्यादा, सुधार, बफर साठा आणि अन्न सुरक्षा, तंत्रज्ञान मोहिम, पशु संगोपन अर्थशास्त्र.
  • भारतातील अन्न प्रक्रिया आणि संबंधित उद्योग- व्याप्ती आणि महत्त्व, स्थान, अपस्ट्रीम आणि डाउनस्ट्रीम आवश्यकता, पुरवठा साखळी व्यवस्थापन.
  • भारतातील जमीन सुधारना.
  • अर्थव्यवस्थेवर उदारीकरणाचे परिणाम, औद्योगिक धोरणात बदल आणि औद्योगिक विकासावर त्यांचे परिणाम.
  • पायाभूत सुविधा: ऊर्जा, बंदरे, रस्ते, विमानतळ, रेल्वे इ.
  • गुंतवणूक मॉडेल.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञान- घडामोडी आणि त्यांचे अनुप्रयोग आणि दैनंदिन जीवनातील प्रभाव.
  • विज्ञान आणि तंत्रज्ञानातील भारतीयांची उपलब्धि; तंत्रज्ञानाचे स्वदेशीकरण आणि नवीन तंत्रज्ञान विकसित करणे.
  • आयटी, स्पेस, कॉम्प्यूटर्स, रोबोटिक्स, नॅनो-टेक्नॉलॉजी, बायो-टेक्नॉलॉजी आणि बौद्धिक मालमत्ता हक्कांशी संबंधित विषयांमध्ये जागरूकता.
  • संवर्धन, पर्यावरण प्रदूषण आणि र्‍हास, पर्यावरणाचा प्रभाव मूल्यांकन.
  • आपत्ती व आपत्ती व्यवस्थापन
  • विकास आणि अतिरेकी प्रसार यांच्यात दुवा.
  • अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने निर्माण करण्यात बाह्य राज्य आणि राज्य-नसलेल्या इतर घटकांची भूमिका.
  • संप्रेषण नेटवर्कद्वारे अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने, अंतर्गत सुरक्षा आव्हानांमध्ये मीडिया आणि सोशल नेटवर्किंग साइट्सची भूमिका, सायबर सुरक्षाच्या मूलभूत गोष्टी, मनी लॉन्ड्रिंग आणि त्याचे प्रतिबंध.
  • सुरक्षा आव्हाने आणि सीमाभागातील त्यांचे व्यवस्थापन – दहशतवादासह संघटित गुन्ह्यांचा दुवा.
  • विविध सुरक्षा दले आणि एजन्सी आणि त्यांचा आदेश.

सामान्य अध्ययन पेपर – ४

नीतिशास्त्र, अखंडता आणि योग्यता या पेपरमध्ये उमेदवारांची वृत्ती आणि त्यांची अखंडता, सार्वजनिक जीवनातील संभाव्यता आणि त्याच्या समस्येचे निराकरण करण्याच्या दृष्टिकोनातून विविध प्रश्नांशी संबंधित असलेल्या समस्यांविषयी आणि समाजाशी वागताना होणारया संघर्षांबद्दलच्या प्रश्नांचा अभ्यास यात समावेश असेल. त्यासोबत खालील विस्तृत क्षेत्रे कव्हर केली जातील.

  • नीतिशास्त्र आणि मानवी इंटरफेस: मानवतेच्या नीतीमत्तेचे सार, निर्धारक आणि परिणाम, नैतिकतेचे परिमाण, नीतिशास्त्र – खाजगी आणि सार्वजनिक संबंधांमध्ये. मानवी मूल्ये – महान नेते, सुधारक आणि प्रशासकांचे जीवन आणि शिकवण्यांचे धडे, मूल्यमापन करण्यामध्ये कौटुंबिक समाज आणि शैक्षणिक संस्थांची भूमिका.
  • वृत्ती: सामग्री, रचना, कार्य त्याचा प्रभाव आणि विचार आणि वर्तन यांच्याशी संबंध, नैतिक आणि राजकीय दृष्टीकोन, सामाजिक प्रभाव आणि मन वळवणे.
  • नागरी सेवा, सचोटी, निःपक्षपातीपणा आणि वस्तुनिष्ठता, सार्वजनिक सेवेचे समर्पण, दुर्बल घटकांबद्दल सहानुभूती, सहिष्णुता आणि करुणेसाठी योग्यता आणि मूलभूत मूल्ये.
  • भावनिक बुद्धिमत्ता-संकल्पना आणि प्रशासन आणि कारभारामध्ये त्यांची उपयुक्तता आणि अनुप्रयोग.
  • भारत आणि जगातील नैतिक विचारवंतांचे आणि तत्वज्ञांचे योगदान.
  • सार्वजनिक / नागरी सेवेची मूल्ये आणि सार्वजनिक प्रशासनात नीतिशास्त्र. स्थिती आणि समस्या, सरकारी व खाजगी संस्थांमधील नैतिक चिंता व कोंडी, नैतिक मार्गदर्शनाचे स्रोत म्हणून कायदे, नियम, नियम आणि विवेक, जबाबदारी आणि नैतिक कारभार. प्रशासनात नैतिक आणि नैतिक मूल्यांचे बळकटीकरण, आंतरराष्ट्रीय संबंध आणि निधीमधील नैतिक मुद्दे, कॉर्पोरेट गव्हर्नन्स.
  • कारभाराची शक्यता: सार्वजनिक सेवेची संकल्पना, शासन आणि संभाव्यतेचा तात्विक आधार, सरकारमधील माहिती सामायिकरण आणि पारदर्शकता, माहितीचा अधिकार, संहिता.
  • नीतिशास्त्र, आचारसंहिता, नागरिकांची सनद, कार्यसंस्कृती, सेवा वितरणाची गुणवत्ता, सार्वजनिक निधीचा उपयोग, भ्रष्टाचाराची आव्हाने.
  • वरील मुद्द्यांवरील केस स्टडीज.

UPSC मध्ये पर्यायी विषय कोणते असतात?

पर्यायी – विषय पेपर १


आयएएस मुख्य परीक्षेत 25 पर्यायी विषय आहेत आणि त्यातील फक्त एक विषय उमेदवार निवडू शकतो. पर्यायी विषयाला एकून १७५० पैकी ५०० गुण आहेत. हे एकूण ३० % च्या आसपास आहे. म्हणून उमेदवारांना पर्यायी विषयांची काळजीपूर्वक निवड करण्याची सूचना देण्यात आली आहे कारण ते आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकते किंवा तोडू शकते.

खाली आयएएस मुख्य वैकल्पिक विषयांची अधिकृत यादी आहे. उमेदवार पर्यायी विषय म्हणून कोणत्याही एका विषयाची निवड करू शकतात.


शेतीपशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय विज्ञानमानववंशशास्त्र
वनस्पतिशास्त्ररसायनशास्त्रसिव्हिल अभियांत्रिकी
वाणिज्य आणि लेखाअर्थशास्त्रविद्युत अभियांत्रिकी
भूगोलइतिहासभूशास्त्र
कायदाव्यवस्थापनगणित
वैद्यकीय विज्ञानयांत्रिकी अभियांत्रिकीतत्वज्ञान
भौतिकशास्त्रराज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंधमानसशास्त्र
सार्वजनिक प्रशासनसमाजशास्त्रसांख्यिकी
प्राणीशास्त्र




पर्यायी – विषय पेपर 

उमेदवार त्यांच्या वैकल्पिक विषय म्हणून पुढीलपैकी कोणत्याही भाषेचे साहित्य निवडू शकतात.

आसामीबंगालीडोगरी
बोडोहिंदीगुजराती
काश्मिरीकन्नडकोंकणी
मैथिलीमल्याळममणिपुरी
नेपाळीमराठीपंजाबी
संस्कृतओडियासंथाली
तामिळउर्दूतेलगू
सिंधीइंग्रजी

अधिक माहिती साठी या संकेत स्थळाला भेट देऊ शकता . संघ लोक सेवा आयोग

आपणास  हा लेख कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा. जर आपणास इतर कोणत्याही विषया बद्दल माहिती हवी असेल तर आपण कमेंट करू शकता. जेणेकरून आम्ही तुमच्यासाठी त्या विषयावर लेख उपलब्ध करून देऊ.