Saturday 12 March 2022

संविघानाच्या उद्देशिकेची (Preamble) सुरुवात “आम्ही भारताचे लोक” अशीच का?

🔸 संविधान सभा सदस्य “एच व्ही कामत” यांनी प्रस्ताव ठेवला की “आम्ही भारताचे लोक” ऐवजी आपण “देवाचे नाव” घेवुन सुरुवात करुयात.

🔸”रोहिणी कुमार चाैधरी”यांनी कामत यांच्या सुचनेत बदल करत “देवीचे नाव” सुचवले.

🔸 संविधान सभेचे दुसरे सदस्य “शिब्बन लाल सक्सेना” यांनी आम्ही भारताचे लोक याऐवजी “देव आणि महात्मा गांधी” यांच्या नावाने सुरुवात करण्याचा प्रस्ताव ठेवला.

🔸मात्र वरील दोन्ही प्रस्ताव मान्य झाले नाहीत. आणि उद्देशिकेची सुरुवात आम्ही भारताचे लोक अशी करण्यात आली.

“आम्ही भारताचे लोक” (We the people) याचा अर्थ -

“आम्ही भारताचे लोक” ही रचना भारताने “अमेरीका” देशांकडुन घेतली.

१) या संविधानाचे निर्माते भारतीय आहेत.

२) संविधानाच्या शक्तीचा स्त्रोत भारतीय जनता आहे.

३) आम्ही भारताचे लोक ही रचना सार्वभाैमत्वाचे (Sovereign) दर्शन देते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 MAY 2024

1) राष्ट्रीय कागद विमान दिवस दरवर्षी 26 मे रोजी साजरा केला जातो. 2) व्हाईस अॅडमिरल गुरचरण सिंग यांनी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे कमांडंट...