07 May 2020

राज्य सरकारचा मोठा निर्णय! यंदा नोकरभरती नाही.

🅾कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात करण्यासाठी आरोग्यसेवा वगळता इतर विभागांत  नोकर भरती न करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

🅾तसेच शासकीय खर्चाला 67 टक्के कट लावण्यात आला असून, प्रत्येक विभागाला आता त्यांच्या एकूण बजेटच्या फक्त 33 टक्केच रक्कम मिळणार आहे. शिवाय, नवीन कोणतीही योजना सादर करू नये, असे वित्त विभागाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे.

🅾तर प्रत्येक विभागाने आपल्या चालू योजनांचा आढावा घेऊन ज्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत किंवा रद्द करण्यासारख्या आहेत त्या निश्चित कराव्यात, असे आदेशात म्हटले आहे.
वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, मदत पुनर्वसन हे विभाग प्राधान्य क्रमाचे विभाग म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.

🅾 या विभागांनी फक्त कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपला निधी खर्च करायचा आहे. अन्य विभागांना कोणत्याही खरेदीच्या नव्या प्रस्तावांना मंजुरी देता येणार नाही.तसेच फर्निचर, दुरुस्ती, झेरॉक्स मशीन, संगणक, कार्यशाळा, सेमिनार, भाड्याने कार्यालय घेणे, असे खर्चदेखील आता करता येणार नाहीत.

🅾प्राधान्यक्रम नसलेल्या विभागांना, कोणत्याही खरेदीच्या प्रस्तावांना, प्रशासकीय मान्यता देता येणार नाही अथवा प्रशासकीय मान्यता प्राप्त असली तरी निविदा प्रसिद्ध करता येणार नाही.मात्र औषधे, अत्यावश्यक वैद्यकीय उपकरणे व त्यांचा पुरवठा यांच्या खरेदीसाठी खर्च करण्यास मुभा देण्यात आली आहे.

राज्य ३१ मे पर्यंत करोनामुक्त झालंच पाहिजे, उद्धव ठाकरेंचे आदेश :

राज्यात वेगाने पसरणाऱ्या करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. त्यांनी सर्व जिल्ह्यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ क़ॉन्फरन्सिंगवरुन बैठक घेतली व ३१ मे पर्यंत राज्य करोनामुक्त करण्याचे आदेश दिले.

‘प्रत्येक जिल्हा ग्रीन झोन बनलाच पाहिजे. भले मग त्यासाठी तुम्ही कितीही कठोर भूमिका घ्या’, असे उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले.

‘स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी आवश्यक निर्णय घेऊ शकतात. पण करोना नियंत्रणात आणण्याच्या बाबतीत कुठलीही हयगय अजिबात सहन करणार नाही असे त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले’. दैनिक भास्करने हे वृत्त दिले आहे.

पोलीस भरती प्रश्नसंच

▶️खालीलपैकी दिनविशेष व दिनांक यांची चुकीची जोड ओळखा.

A. बालदिन - १४ नोव्हेंबर

B. कामगार दिन -१ मे

C. शिक्षणदिन - १५ सप्टेंबर✅

D. बालिका दिन -३ जानेवारी

▶️छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील संत खाली पर्यायांपैकी कोणते?

A. तुकाराम - एकनाथ

B. रामदास -तुकाराम✅

C. तुकाराम - नामदेव

D. रामदास - एकनाथ

▶️शेतकऱ्यांवर मोठे अरिष्ट कोसळले” अधोरेखित शब्दांची जात कोणती?

A. सर्वनाम

B. नाम✅

C. क्रियापद

D. विशेषण

▶️मतलई वारे कोणत्या वेळी वाहतात.

A. फक्त दिवस

B. डोपरी किंवा पहाटे

C. फक्त रात्री✅

D. दिवस किंवा रात्री

▶️खालील संख्यामालीकेत प्रश्नाचीन्हाच्या जगही क्रमाने येणारे संख्या पर्यायातून निवडा:

३८ , २९ , २२ , ? , १४ , १३

A. १८

B. १६

C. १७✅

D. १९

▶️अक्षमाला : कखगघड, चछजझत्र, टठडढण, तथदधन, पफवभग.

सोबतच्या अक्षरमालेतील ट च्या डावीकडील चौथा अक्षर हे वर्णमालेतील कितवे अक्षर आहे?

A. १४

B. ८

C. ७✅

D. ११

▶️३५ मी. लांब व ५० मी. रुंद असलेल्य आयताकृती बागेच्या कडेने समीक्षने चार फेऱ्या मारल्या; तर ती किती मीटर अंतर चालली?

A. ९२०✅

B. २३०

C. ११५

D. ६९०

▶️_यांचे पूर्ण नाव आहे डेबूजी झिंगराजी जानोरकर

A. संत गाडगेबाबा✅

B. संत तुकाराम

C. संत चोखामेळा

D. संत शेख महंमद

▶️बंगालच्या फाळणीविरुद्ध झालेले आंदोलन कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे ?

A. स्वदेशी आंदोलन

B. चोरीचौरा आंदोलन

C. फोडा आणि तोडा आंदोलन

D. बंग - भंग आंदोलन✅

▶️खालीलपैकी सर्वात लहान अपूर्णांक दर्शविणारा पर्याय कोणता?

A. ५/६

B. ३/५

C. ७/९

D. ४/७✅

▶️◾️◾️इलेक्ट्रॉनिक दळणवळण पद्धतीमध्ये (डिजिटल) अंकात्मक संदेश

अ. सलग संदेश संच पुरवत नाहीत.

ब. स्वतंत्र (विलग) पाय-यांमध्ये सादर केले जातात.

क. बायनरी (द्विमान) संख्यापद्धतीचा उपयोग करतात.

ड. दशमान आणि द्विमान (बायनरी) या दोन्ही संख्यापद्धतींचा उपयोग करतात.

वरीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत ?

पर्यायी उत्तरे :

A) फक्त अ आणि ब

B) फक्त ब आणि के

C) अ, ब आणि क✅

D) वरील सर्व

▶️◾️अणुकेंद्रका भोवली दुसन्या भ्रमणकक्षेत भ्रमण करणा-या इलेक्ट्रॉनची उर्जा - 3.4 eV आहे. त्याची तिस-या भ्रमण कक्षेतील उर्जा किती ?

A) - 1.51J

B) - 3.4eV

C) - 1.51 eV ✅

D) - 13.6 eV

▶️◾️खालीलपैकी कोणते विधान चूकीचे आहे ?

A)  भारताचे पहिले पर्यावरण पुरक जैव इंधन (bio-fuel) युक्त विमान चेन्नई आणि बेंगलुरु दरम्यान उडाले. ✅

B)  भारताने नुकतेच आपले जैव इंधन 2018 चे राष्ट्रीय धोरण जाहिर केले आहे.

C) या धोरणानुसार 2030 पर्यत पेट्रोलमध्ये 20% इथेनॉलचे मिश्रण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

D) वरीलपैकी एकही नाही

▶️◾️ नुकताच 'बॉनेटहेड
शार्क' (Bonnethead Shark) मासा बातम्यांमध्ये होता, त्यासंबंधी खालील विधाने विचारात घ्या :

अ] तो प्रामुख्याने समुद्र गवत (sea grass) खातो.

ब] तो प्रामुख्याने हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात आढळतो.

खाली दिलेल्या पर्यायातून योग्य विधान/ने निवडा :

पर्यायी उत्तरे :

A) फक्त अ✅

B) फक्त ब

C) अ आणि ब दोन्हीही

D) अ आणि ब दोन्हीही नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रकिया सुरू.

🏵न्यायालयात दाखल होणारी प्रकरणे ई-फायलिंग  पद्धतीने दाखल करतायावेत म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या ई कमिटीकडून नॅशनल मास्टर डाटाबेस तयार करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

🏵यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून राज्यात प्रॅक्टिस करत असलेल्या वकिलांची यादी मागविण्यात आली आहे, अशी माहिती बार कौन्सिलतर्फे देण्यात आली.

🏵सर्वोच्च न्यायालयाच्या इ कमिटीकडून या आराखड्यावर सध्या काम सुरू आहे. या कमिटीकडून बार कौन्सिल ऑफ इंडियाला याबाबत निर्देश देण्यात आले आहेत.महाराष्ट्र बरोबरच देशातील इतर राज्यांत कडूनही यासाठी माहिती मागविण्यात आली आहे.

🏵ही माहिती गोळा करण्यात आल्यानंतर कोर्टात दाखल होणारे दावे ई-फायलिंग द्वारे कसे दाखल करता येतील याचा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

🏵महाराष्ट्रातील वकिलांची माहिती गोळा करण्यासाठी तसेच ई-फायलिंग या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा ची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नुकतीच बैठक घेण्यात आली अशी माहिती कौन्सिलचे सदस्य अड. राजेंद्र उमाप यांनी दिली.

🏵राज्यातील व परराज्यातील माहिती गोळा करण्यात आल्यानंतर ही माहिती सर्वोच्च न्यायालयाच्या इ कमिटी कडे येणार आहे. त्या नंतर पुढील आराखडा तयार केला जाणार आहे.

🏵ही माहिती गोळा करण्यात आल्यानंतर प्रत्येक वकीलाला तालुका, जिल्हा, हायकोर्ट, आणि सुप्रीम कोर्टातही ई फाइलिंग द्वारे दावे दाखल करता येऊ शकणार आहेत, असे ही अड. उमाप यांनी सांगितले.

करोना व्हायरसवरील औषध निर्मितीमध्ये भारताला महत्वपूर्ण यश.

🔰सध्याच्या घडीला करोना व्हायरसवर अत्यंत परिणामकारक ठरणारे रेमडेसिविर औषध बनवण्याच्या दिशेने भारताने पहिले पाऊल टाकले  आहे.हैदराबाद स्थित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीने रेमडेसिविर औषध बनवण्यासाठी सुरुवातीला लागणाऱ्या साहित्याची निर्मिती केली आहे.

🔰औषधात वापरण्यात येणारे घटकद्रव्य बनवण्याच्या दृष्टीने टाकलेले हे पहिले पाऊल आहे.तसेच उद्या गरज पडली तर भारतात रेमडेसिविर औषधाची निर्मिती सुरु व्हावी, यासाठी IICT ने सिप्ला सारख्या औषध कंपन्यांसाठी टेक्नोलॉजीची प्रात्यक्षिक सुरु केली आहेत. गिलीयड सायन्सेस या औषध कंपनीने रेमडेसिविर औषधाची निर्मिती केली आहे.

🔰तर अमेरिकेत इमर्जन्सीमध्ये या औषधाचा वापर करण्याची परवानगी देण्यात आली आहे. रेमडेसिविर अँटीव्हायरल ड्रग हे औषध करोना व्हायरसवरील उपचारांमध्ये अत्यंत प्रभावी ठरत आहे.गिलीयड सायन्सेसकडे रेमडेसिविर औषधाचे पेटंट  आहे. पेटंट कायद्यानुसार व्यावसायिक वापरासाठी नव्हे, फक्त संशोधनासाठी या औषधाची निर्मिती करता येईल.

भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना.

🔰 जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत आदिवासी विकास विभागाच्यावतीने भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे विस्तारीकरण करीत या योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाला. या योजनेच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील योजनेविषयी सविस्तर माहिती जाणून घेवूया…

🔰 डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा १

🔰अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, मातामृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यावर उपाययोजना करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांच्या आहारातील उष्मांक आणि प्रथिनामध्ये वाढ करणे आणि जन्माला येणाऱ्या सुदृढ बालकांचे प्रमाण वाढविणे, यासाठी अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या आहारासाठी नोव्हेंबर २०१५ मध्ये डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना सुरू करण्यात आली.

🔰 यात अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेतून सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळेचा चौरस आहार देण्यात येत आहे. गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत तर स्तनदा मातांना प्रसूतीनंतर तीन महिन्यांच्या कालावधीसाठी या योजनेचा लाभ देण्यात आहे. त्यामुळेउष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होत आहे.

🔰 राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणानुसार (NFHS-२०१५-१६) नागरी व ग्रामीण अशी वर्गवारी लक्षात घेता ग्रामीण भागातील स्त्रियांमधील ॲनोमियाचे प्रमाण ४९.९ टक्के तर निकषापेक्षा बीएमआय कमी असलेल्यांचे प्रमाण ३० टक्के एवढे आहे.

🔰आदिवासी क्षेत्रात हे प्रमाण अधिक असल्याने गरोदर स्त्रियांना शेवटचे तीन महिने एक वेळा सकस आहार देण्याऐवजी गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून आहार दिल्यास ॲनेमियाचे प्रमाण कमी होऊन बीएमआय वाढविणे शक्य होईल. या उद्देशाने डॅा. भारतरत्न ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेचे विस्तारीकरण करण्यात येत आहे.

🔰 गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना एक वेळा चौरस आहार देण्याचा कालावधी वाढवून स्त्री गरोदर असल्याचे निश्चित झाल्यापासून बाळांतपणापर्यंत तसेच स्तनदा मातांना पहिले सहा महिने एकवेळा आहार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता गरोदर असल्याचे निश्चित झालेल्या स्त्रियांची नोंदणी प्राथमिक आरोग्य केंद्रात करतात.

राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाचा ‘नदी व्यवस्थापनाचे भविष्य’ विषयक ‘आयडियाथॉन’ कार्यक्रम

🔰राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियान (NMCG) आणि राष्ट्रीय शहरी व्यवहार संस्था (NIUA) या संस्थांनी कोविड-19 महामारीमुळे नदी व्यवस्थापन धोरणे भविष्यात कशा प्रकारे आकाराला येऊ शकतात याचा मागोवा घेण्यासाठी “नदी व्यवस्थापनाचे भविष्य” विषयक ‘आयडियाथॉन’ आयोजित केले. आयडियाथॉनमुळे नदी व्यवस्थापनाच्या विविध पैलूंवर चर्चा झाली.

🔰या कार्यक्रमाच्या अंतर्गत 2 मे 2020 रोजी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये सुमारे 500 जण सहभागी झाले होते. विविध देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांमधील तज्ञ यात सहभागी झाले होते.

🔰कोविड-19 महामारीच्या काळात टाळेबंदीमध्ये प्रदूषणाच्या पातळीत घट झालेली दिसून आली आहे आणि त्यामुळे नैसर्गिक वातावरणात लक्षणीय सुधारणा दिसून आली आहे. मात्र ही परिस्थिती किती काळ टिकून राहणार याविषयी चिंता व्यक्त केली गेली. त्यामुळे या समस्येवर उपाय शोधण्याच्या उद्देशाने, आयडीयाथॉनमध्ये नद्यांच्या सामाजिक दृष्टिकोनातून अन्य समस्यांचे निराकरण कसे केले जाऊ शकते याची चाचपणी करण्यात आली.

🔰नदी व्यवस्थापनाकडे अधिक लक्ष वेधण्यासाठी तसेच नदीशी शहरांची आंतरजोडणी अधोरेखित करण्यासाठी राष्ट्रीय स्वच्छ गंगा अभियानाने या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला होता.

भारतातील सर्वप्रथम खालीलप्रमाणे

☘भारतातील पहिली गोल्ड रिफायनरी----शिरपूर , महाराष्ट्रा.

☘भारतातील पाहिले इ टेम्पल ---शिर्डी(अहमदनगर,महाराष्ट्रा)

☘भारतातील पाहिले खाजगी विमानतळ---कोची(केरळ)

☘भारतातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा--कोट्टायम(केरळ)

☘भारतातील पाहिले पोलीस संग्रहालय----गाझियाबाद(उत्तरप्रदेश)

☘भारतातील पाहिले बायोटेक शहर--लखनौ(उत्तरप्रदेश)

☘भारतातील पाहिले इ कोर्ट---- --- बिहार.

☘भारतातील पाहिले इ पोस्ट------- पाटणा(बिहार)

☘भारतातील पाहिले बायोडिझाल प्रकल्प--काकीनडा (आंध्र प्रदेश)

☘भारतातील पहिला विशेष आर्थिक विभाग---पोसिंत्रा (गुजरात)

☘भारतातील पाहिले आभूषण निर्यात केंद्र---कोलकाता (प. बंगाल)

☘भारतातील पहिला रंगनिर्मिती कारखाना 1902 मध्ये कोईम्बबटूर येथे स्थापन करण्यात आला.

☘भारतातील पहिली कापड गिरणी मुंबई येथे सुरू करण्यात आली.

06 May 2020

हिंदू व्यक्तीला पहिल्यांदाच पाकिस्तान एअर फोर्समध्ये पायलट बनण्याचा मान.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अनोखी घटना घडली आहे. पाकिस्तानी एअर फोर्समध्ये एका हिंदु व्यक्तीला पायलट बनण्याचा बहुमान मिळाला आहे.

✍राहुल देव असं या व्यक्तीचं नाव असून तो पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील थारपकार भागात राहणारा आहे. सिंध प्रांतातला हा भाग हिंदु वस्तीसाठी ओळखला जातो.

✍पाकिस्तानी एअर फोर्समध्ये काम करणारा राहुल देव हा पहिला हिंदु पायलट म्हणून ओळखला जाणार आहे. मात्र एअर फोर्समध्ये पायलट म्हणून काम करण्याची संधी मिळालेला राहुल हा पहिलाच हिंदू व्यक्ती ठरणार आहे.

ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚦पाच वेळेचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद हा आज सुरू होत असलेल्या ऑनलाईन नेशन्स चषक बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणार आहे.

🚦करोनामुळे जगभरात क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असताना आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ आणि चेस डॉट कॉमने आयोजित केलेल्या या स्पर्धेत जगातील आघाडीचे खेळाडू सहभागी झाले आहेत.

🚦जगातील सहा संघांचा यात समावेश असून विश्व विजेता मॅग्नस कार्लसन याचा अपवाद वगळता अन्य सर्वच दिग्गज खेळणार आहेत.

🚦तर चीनला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. पाठोपाठ युरोप, रशिया, अमेरिका, भारत आणि शेष विश्व अशी क्रमवारी देण्यात आली.

🚦तसेच पाचवे मानांकन लाभलेल्या भारतीय संघात  आनंदसह विदित गुजराती, पी. हरिकृष्णा, बी. अधिबान, कोनेरू हम्पी आणि डी. हरिकाचा  समावेश आहे.

🚦माजी विश्वविजेता ब्लादिमिर क्रामनिक भारतीय संघाचा सल्लागार आहे. जेतेपदाचा प्रबळ दावेदार असलेल्या चीनच्या संघात डिग लीरेन, वांग हाओ, वेई यी आणि चारवेळेचा विश्व विजेता हाऊ यिफान याचा समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रात तिरुमूर्ती करणार भारताचं प्रतिनिधीत्व

• अनुभवी राजदूत म्हणून नावलौकीक मिळवलेले टी एस तिरुमूर्ती यांची निवड संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधि म्हणून करण्यात आलीय.

• टी एस तिरुमूर्ती हे सध्या परराष्ट्र मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत आहेत. ते भारतीय परराष्ट्र सेवेच्या (Indian Foreign Service) १९८५ च्या बॅचचे अधिकारी आहेत.

• तिरुमूर्ती न्यूयॉर्कमध्ये सय्यद अकबरुद्दीन यांची जागा घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता म्हणून काम हाताळलेले अकबरुद्दीन गेल्या अनेक वर्षांपासून संयुक्त राष्ट्रात देशाचे स्थायी प्रतिनिधी म्हणून काम पाहत होते.

• अनेक जागतिक मंचावर वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांनी भारताची भूमिका चोखपणे मांडली. अकबरुद्दीन हे लवकरच निवृत्त होत आहेत.

• 'परराष्ट्र मंत्रालयाच्या मुख्यालयात आर्थिक प्रकरणांचे सचिव म्हणून कार्यरत असणारे तिरुमूर्ती यांना संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधि म्हणून नियुक्त करण्यात आलंय' अशी माहिती मंत्रालयाकडून देण्यात आलीय.

• तसंच सरकारकडून नम्रता एस कुमार यांची स्लोवेनियामध्ये देशाच्या पुढच्या राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर जयदीप मजूमदार यांच्यावर ऑस्ट्रियामध्ये भारताचे नवे राजदूत म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलीय.

• संयुक्त सचिव दीपक मित्तल यांना कतारमध्ये भारताचे राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आलंय. तर पीयूष श्रीवास्तव यांची बहरीनमध्ये भारताच्या राजदूतपदी नियुक्ती करण्यात आलीय.

इराणने बदलले चलन

📌इराणने आपले चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. इराणने आपले रियाल हे चलन बदलून त्याऐवजी तोमान हे चलन अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.

📌बदललेल्या चलनानुसार एका तोमानची किंमत ही १० हजार रियाल इतकी असणार आहे.

📌अमेरिकेने इराणवर टाकलेल्या प्रतिबंधांमुळे मागील काही महिन्यांपासून इराणी चलनाच्या किंमतीमध्ये मोठी घसरण झाल्याचे पहायला मिळालं होतं. हीच घसरण थांबवण्यासाठी इरणने चलन बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

📌इराणने  राष्ट्रीय चलनामधून चार शून्य हटवण्याच्या प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. चलनामधून चार शून्य हटवण्याची चर्चा इराणमध्ये २००८ पासून सुरु होती.

दारुवर ७०% ‘स्पेशल करोना व्हायरस टॅक्स’, दिल्ली सरकारचा निर्णय

🔶लॉकडाउनमुळे गेला महिनाभर देशभरात दारू विक्रीची दुकाने बंद होती. मात्र, सोमवारपासून ग्रीन, ऑरेंज आणि रेड झोनमधील दारू विक्रीला अटीशर्तींसह परवानगी देण्यात आली. त्यानंतर सर्वत्र दारुच्या दुकानांबाहेर तळीरामांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.

🔶सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न झाल्यामुळे अनेक ठिकाणी दुकानं बंद करावी लागली. दिल्लीमध्येही असंच चित्र पाहायला मिळालं. त्यानंतर आता दिल्लीच्या केजरीवाल सरकारने दारुवर ‘स्पेशल करोना टॅक्स’ लावण्याचा निर्णय घेतला आहे.

🔶दिल्ली सरकारने दारू विक्रीवर 70 टक्के करोना व्हायरस कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. ‘स्पेशल करोना फी’अंतर्गत हा कर मंगळवारपासून आकारला जाईल. यानुसार ‘एमआरपी’वर 70% स्पेशल करोना टॅक्स आकारला जाणार आहे. सोमवारी रात्री उशीरा याबाबतचा आदेश दिल्ली सरकारने काढला. मंगळवारी सकाळपासून हा नियम लागू होईल.

🔶दारुच्या दुकानांबाहेर सोशल डिस्टन्सिंगचं पालन न केल्यास तिथे विक्रीला परवानगी देणार नाही, असा इशाराही केजरीवाल यांनी यापूर्वी दिला आहे. याशिवाय, मंगळवारपासून दिल्लीमध्ये सकाळी 9 ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत दारु विक्रीची दुकानं सुरू ठेवायला दिल्ली पोलिसांनी परवानगी दिली आहे.

नवी दिल्लीमध्ये संसदेच्या नव्या इमारतीला पर्यावरण मंत्रालयाची मंजूरी.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✴️पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या तज्ज्ञ मूल्यांकन समितीने संसद भावनाच्या शेजारी नवीन संसद भवनाची उभारणी करण्यास मंजूरी दिली आहे.

✴️हा प्रकल्प राष्ट्रपती भवनापासून ते इंडिया गेट पर्यंत 3 किलोमीटर लांबीच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनेचा एक भाग आहे. हा प्रकल्प 15 ऑगस्ट 2022 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. बांधकाम प्रकल्पाला येणारा खर्च 922 कोटी रुपये एवढा आहे.

♒️भारतीय संसदेच्या नवीन इमारतीची खास वैशिष्ट्ये:-

✴️इमारत 10.5 एकर भूखंडावर 65,000 चौरस मीटर क्षेत्रफळात बांधण्यात येणार. इमारतीची उंची 42 मीटर असणार.नव्या इमारतीचा आकार त्रिकोणी असणार आहे. या इमारतीला तीन मोठे मिनार असणार आहेत. हे तीन मिनार लोकशाहीच्या तीन स्तंभांचे प्रतिक असतील.

✴️इमारतीमध्ये 900 ते एक हजार लोकप्रतिनिधींची आसनक्षमता असणारी लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉलप्रमाणे संयुक्त सभागृह असणार. इमारतीच्या तळाशी सर्व मंत्रालयाच्या कार्यालयांना जोडणारी शटल सेवाही असणार आहे.

✴️संसदेची नवी इमारत ही सध्याच्या संसदेच्या जवळच असणार. संसद भवनाच्या खिडक्या या भारतातली विविधता दर्शवतील.इमारतीमध्ये सर्व खासदारांची कार्यालयेही असणार. नवीन संसद भवन हे अत्याधुनिक असणार.

✴️संसदेचे 75 वे अधिवेशन नवीन इमारतीमध्ये आयोजित करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे.पंतप्रधानांसाठी नवीन निवासस्थान बांधण्याचीही योजना आहे. पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थान दिल्लीच्या महत्वाच्या परिसरात म्हणजेच सेंट्रल व्हिस्टा येथे असणार.

✴️सध्याचे संसद भवन ही भारतीय संसदेची इमारत आहे. 1912-13 यावर्षी ब्रिटीश वास्तुकार हर्बट ब्रेकर यांनी या वर्तुळाकार इमारतीची रचना केली. इमारतीच्या बाह्य वर्तुळकार गच्छीस 257 ग्रेनाइट स्तंभांचा आधार आहे. संसद भवन दिल्लीला जनपथ वरील राष्ट्रपती भवन जवळ आहे.

देशात आतापर्यंत चार मुख्यमंत्री राज्यपालनियुक्त सदस्य

👉राज्यपाल नियुक्त सदस्याने मुख्यमंत्री किंवा मंत्रिपद भूषवू नये, असे संकेत असतात. तसा नियम नाही वा घटनेत तरतूदही नाही.

👉मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करावी, अशी शिफारस राज्य मंत्रिमंडळाने दोनदा करूनही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी ती मान्य केली नाही.

👉राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या दोन जागा रिक्त असल्या तरी त्यांची मुदत ५ जूनला संपुष्टात येईल.

👉लोकप्रतिनिधी कायद्यातील तरतुदीनुसार एक वर्षांपेक्षा कमी कालावधी असल्यास पोटनिवडणूक घेण्याची आवश्यकता नाही.

👉याआधी दोन सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रस्ताव आले असता राज्यपालांनी ते मान्य केले नव्हते. याच मुद्यावर ठाकरे यांच्या नियुक्तीस राज्यपालांनी बहुधा मान्यता दिलेली नसावी.

👉देशात आतापर्यंत चार मुख्यमंत्र्यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले होते.

👉१९५२ मध्ये तत्कालीन मद्रास प्रांताच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेले ज्येष्ठ नेते राजगोपाळचारी ऊर्फ  राजाजी यांनी पोटनिवडणूक लढविण्यास असमर्थता व्यक्त केली होती, पण त्यांची राज्यपालांनी नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती केली होती.

👉१९६१मध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्रभान गुप्ता यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. त्यांच्या निवडीला अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. पण उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली होती.

👉इतर मागासवर्गाला आरक्षणाचे लाभ मिळाले त्या मंडल आयोगाचे अध्यक्ष बी. पी. मंडल यांची १९६८मध्ये बिहार विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. या नियुक्तीनंतर त्यांची बिहारच्या मुख्यमंत्रिपदी अल्प काळासाठी निवड झाली होती.

👉१९७१ मध्ये टी. एन. सिंग यांची उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाली होती. त्यांची राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्यात आली होती. सिंग यांच्या निवडीस आव्हान देण्यात आले होते, पण न्यायालयाने सिंग यांना दिलासा दिला होता.

👉महाराष्ट्रात अलीकडच्या काळात दत्ता मेघे, फौजिया खान या नेत्यांनी राज्यपाल नियुक्त सदस्य असताना मंत्रिपद भूषविले होते.

✅मुख्यमंत्रिपद भूषवलेले राज्यपाल नियुक्त सदस्य.

1.राजगोपाळचारी –  मद्रास राज्य – १९५२
2.चंद्रभान गुप्ता – – उत्तर प्रदेश – १९६१
3.बी. पी. मंडल –  – बिहार – १९६८
4.टी. एन. सिंग – उत्तर प्रदेश – १९७१

●▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬●