18 June 2020

‘IMD वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ यामध्ये भारताचा 43 वा क्रमांक.


🅾इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) या संस्थेनी त्यांचा ‘वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात 63 अर्थव्यवस्थांच्या कामगिरीबद्दल स्पष्टता दिली गेली आहे.

🅾कमकुवत पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रात अपर्याप्त गुंतवणूक यासारख्या काही परंपरागत धोरणांमुळे भारताला “जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2020” या क्रमवारीत 43 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.

🅾भारतासाठी, दीर्घकालीन रोजगारात वाढ, चालू खात्यातली शिल्लक, उच्च तंत्रज्ञानाची निर्यात, परकीय चलन साठा, शिक्षणावरील सार्वजनिक खर्च, राजकीय स्थैर्य आणि एकूणच उत्पादकता या क्षेत्रांमध्ये सुधारणा नोंदविण्यात आल्या आहेत. तथापि, विनिमय दर स्थिरता, वास्तविक GDP वृद्धी, स्पर्धात्मक कायदे आणि कर यासारख्या क्षेत्रात स्थिती कमकुवत झाली आहे.

🧩इतर ठळक बाबी...

🅾या 63 अर्थव्यवस्थांच्या यादीत सिंगापूर या देशाने पहिले स्थान कायम राखले आहे.

🅾सिंगापूरच्या यशामागील घटक म्हणजे त्याची मजबूत आर्थिक कामगिरी जी भक्कम आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक, रोजगार आणि कामगार बाजारपेठेच्या उपायांमुळे उद्भवते.

🅾शिक्षण प्रणाली आणि दूरसंचार, इंटरनेट बँडविड्थ वेग आणि उच्च तंत्रज्ञानाची निर्यात यासारख्या तंत्रज्ञानात्मक पायाभूत सुविधांमधील स्थिर कामगिरी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

🅾सिंगापूरच्या पाठोपाठ अनुक्रमे द्वितीय ते पाचव्या क्रमांकावर, डेन्मार्क, स्वित्झर्लँड, नेदरलँड्स आणि हाँगकाँग SAR या देशांचा क्रम लागतो आहे.

🅾मध्य-पूर्व प्रदेश तेलाच्या संकटामुळे नकारात्मकपणे प्रभावित झाले आहे.
BRICS देशांमध्ये चीननंतर भारत द्वितीय क्रमांकावर आहे. त्यानंतर जागतिक यादीत रशिया 50 वा, ब्राझील 56 वा आणि दक्षिण आफ्रिका 59 व्या क्रमांकावर आहे.

🅾सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या ASEAN देशांमध्ये केवळ सिंगापूर आणि थायलंड या देशांची आरोग्यासेवा संबंधी पायाभूत सुविधांच्या परिणामकारकतेत सकारात्मक कामगिरी आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा संयुक्त ‘विज्ञान दळणवळण मंच’.

🅾कार्यक्रम आणि विज्ञान संप्रेषण केंद्रित उपक्रमांच्या समन्वयासाठी कार्य करते. ही परिषद विज्ञान समजून घेणे आणि लोकांमध्ये विज्ञानाची रूची वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशभरात कार्यक्रम आयोजित करणे, देशातील विज्ञान संप्रेषण आणि विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी धोरणे आणि इतर क्रियाकलापांचे आयोजन करण्याची देखील जबाबदारी आहे.

🧩पार्श्वभूम..

🅾विज्ञान दळणवळणासाठी भारताची मजबूत संघटनात्मक रचना आहे. विज्ञान दळणवळणाच्या विकासासाठी कमीतकमी पाच राष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत - राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आणि सूचना स्रोत संस्था (1951), होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (1974),  राष्ट्रीय विज्ञान वस्तुसंग्रहालय परिषद (1978), राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण परिषद (1982), आणि विज्ञान प्रसार (1989).

🅾याव्यतिरिक्त, विविध वैज्ञानिक संस्थांचे त्यांचे विज्ञान दळणवळण विभाग आहेत. यामध्ये विज्ञान प्रसार एकक (CSIR), कृषी ज्ञान व्यवस्थापन संचालनालय (ICAR), प्रकाशने व माहिती विभाग (ICMR), जनसंपर्क संचालनालय (DRDO), जन जागरूकता विभाग (DAE), मीडिया आणि जनसंपर्क कार्यालय (ISRO), विज्ञान कक्ष, आकाशवाणी इत्यादीचा समावेश आहे.

🅾या संस्था विज्ञान दळणवळणात हातभार लावण्यासाठी आणि त्यांचे मत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध पद्धती आणि माध्यमांचा उपयोग करीत आहेत. तथापि, सामान्य धोरणे विकसित करण्यासाठी आणि व्यापक स्तरावर सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी संवाद आणि एकत्रीकरणासाठी यामध्ये पुरेसा वाव आहे. देशव्यापी कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यातून राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आराखडा उभा होऊ शकतो.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

महाराष्ट्रातील अभयारण्ये.

🅾नरनाळा - अकोला
🅾टिपेश्वर -यवतमाळ 
🅾येडशी रामलिंग - उस्मानाबाद
🅾अनेर - धुळे, नंदुरबार
🅾अंधेरी - चंद्रपूर

🅾औट्रमघाट - जळगांव
🅾कर्नाळा - रायगड
🅾कळसूबाई - अहमदनगर
🅾काटेपूर्णा - अकोला
🅾किनवट - नांदेड,यवतमाळ

🅾कोयना - सातारा
🅾कोळकाज - अमरावती
🅾गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
🅾चांदोली - सांगली, कोल्हापूर
🅾चपराला - गडचिरोली

🅾जायकवाडी - औरंगाबाद
🅾ढाकणा कोळकाज - अमरावती
🅾ताडोबा - चंद्रपूर
🅾तानसा - ठाणे
🅾देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर

🅾नवेगांव - भंडारा
🅾नागझिरा - भंडारा
🅾नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
🅾नानज - सोलापूर
🅾पेंच - नागपूर

🅾पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
🅾फणसाड - रायगड
🅾बोर - वर्धा
🅾बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
🅾भिमाशंकर - पुणे, ठाणे

🅾मालवण - सिंधुदुर्ग
🅾माळढोक - अहमदनगर, सोलापूर
🅾माहीम - मुंबई
🅾मुळा-मुठा - पुणे
🅾मेळघाट - अमरावती

🅾यावल - जळगांव
🅾राधानगरी - कोल्हापूर
🅾रेहेकुरी - अहमदनगर
🅾सागरेश्वर - सांगली

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

17 June 2020

आता भारत-जपान मिळून चंद्रावर जाणार, जाक्साने जाहीर केला कार्यक्रम.


◾️या मोहिमेतंर्गत लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्टय आहे.

◾️जपानची अवकाश संशोधन संस्था जाक्साने ही माहिती दिली आहे.

◾️मागच्यावर्षी चांद्रयान-२ मोहिमेत भारताला फक्त लँडिंगमध्ये अपयश आले होते.

◾️विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. ते अपयश मागे सोडून भारत आता जपानच्या साथीने पुन्हा चंद्रावर झेप घेणार आहे.

◾️भारत आणि जपानची ही संयुक्त चंद्र मोहिम २०२३ नंतर पार पडणार आहे.

◾️भारताने सध्या ‘मिशन गगनयान’ या मानवी अवकाश मोहिमेकडे लक्ष केंद्रीत केले आहे.

◾️२०२२ मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. लँडिंग मॉडयुल आणि👍 रोव्हरची निर्मिती जाक्सा करेल तर इस्रो लँडरची सिस्टिम बनवेल. जपानमधून या यानाचे उड्डाण होणार असून एच ३ रॉकेटमधून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावेल.


 

मुद्रा (चलन).


🅾चलन पैसे किंवा पैशाचे स्वरूप आहे जे रोजच्या जीवनात खरेदी आणि विक्री करते. यात नाणी व कागदी नोट्स दोन्ही आहेत. एखाद्या देशात सामान्यतः वापरलेले चलन त्या देशाच्या सरकारी यंत्रणेद्वारे तयार केले जाते. 

🧩उदाहरणार्थ,:- भारतीय रुपया आणि पैसा विनिमय.

🅾आम्ही करतो त्या आधारे आपण चलनाबद्दल बोलू शकतो. सामान्यत: आम्ही चलनाच्या कामांमध्ये विनिमय करण्याचे माध्यम, मूल्याचे मोजमाप आणि पैसे जमा करणे आणि डिफर्ड पेमेंट्सचे मूल्य इ. समाविष्ट करतो. विविध अर्थशास्त्रज्ञांनी चलन काय करते त्या आधारावर परिभाषित केले आहे. 

🅾चलनमध्ये सामान्य स्वीकृतीची मालमत्ता असणे फार महत्वाचे आहे, जर एखाद्या वस्तूमध्ये सामान्य स्वीकृतीचे वैशिष्ट्य नसते तर त्या वस्तूला चलन म्हटले जाऊ शकत नाही. अशा प्रकारे चलन म्हणजे कोणतीही वस्तू जी नियमन, मूल्य मोजणे, संपत्ती साठवणे आणि सर्वसाधारणपणे कर्जे भरण्याचे माध्यम म्हणून स्वीकारली जाऊ शकते.

कागदी चलन.

🅾कागदी चलन हे नियंत्रित चलनव्यवस्थेखाली काढले जाते. मध्यवर्ती बॅंक कागदी नोटा प्रचारात आणते व कागदी चलनाला आधार म्हणून चलनाला काही टक्के भाग सुवर्णाच्या स्वरूपात आपल्या खजिन्यात ठेवते. प्रातिनिधिक कागदी चलन असले, तर जेवढ्या कागदी नोटा असतील तेवढ्याच किमतीचे सोने आधार म्हणून ठेवावे लागते. कागदी चलनाचे रूपांतर सुवर्णात करता येते.

🅾प्रमाणित निधिपद्धती असेल, तर एकूण कागदी चलनाच्या काही विशिष्ट प्रमाणात सुवर्णनिधी ठेवावा लागतो. वेळोवेळी कायद्याने हे प्रमाण ठराविले जाते. मर्यादित विश्वासनिधि-पद्धती अस्तित्वात असेल, तर एका विशिष्ट मर्यादेपर्यंत चलनास सोन्याचा आधार द्यावा लागत नाही. मात्र त्या मर्यादेपेक्षा अधिक कागदी चलन काढावयाचे असेल, तर तितक्याच किमतीचे सोने मध्यवर्ती बॅंकेत वा सरकारी तिजोरीत ठेवावे लागते.

🅾आज बहुतेक देशांनी अपरिवर्तनीय कागदी चलनपद्धतीचा अवलंब केला आहे. अशा पद्धतीत कागदी चलनाचे धातूत रूपांतर करून मिळत नाही. लोकांचा सरकारवर जो विश्वास असतो, त्या आधारावर ही पद्धती टिकून राहते. चलननिर्मितीवर योग्य ते नियंत्रण ठेवले, तर किमती स्थिर राहतात व चलनव्यवहार सुरळीतपणे पार पडू शकतात .

चलनवाढीचे परिणाम.

1) अर्थव्यवस्थेत परिणाम
1) उद्योग - चलनवाढीचा काळ म्हणजे सुगीचा काळ
ii) गुंतवणूक - वाढते (देशी+परकीय गुंतवणूकीला चालना)
i) रोजगार निर्मीती - वाढते (बेरोजगारी कमी होते)
iv) करवसूली - बाढते
v) बचत - कमी होते (गुंतवणूकीत वाढ झाल्याने)
vi) व्याजदर - वाढते

खर्चदाबजन्य/पुरवठा कमी करणारी कारणे.

1. कृषी उत्पादनातील चढ-उतार
2. अपुरी औद्योगिक वाट
3. औद्योगिक कलह
4. नैसर्गिक संकटे
5. निर्यातीत वाढ
6. अपुन्या पायाभूत सुविधा
7. सट्टेबाजी व साठेबाजी
8. घटत्या फलाचा सिद्धांत

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

16 June 2020

लोह ( Iron)

✅18 मिली ग्रॅम ( लेश मूलद्रव्ये)

✅मांस, मासे, अंडी, घेवडा, पालक, मेथी, खजूर, मनुके, हळद, तीळ, हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, सुका मेवा, यकृत, सागरी पदार्थ, सोयाबीन, गुल शेंगदाणे

✍कार्य :

✅प्रथिने विकराच्या निर्मिती साठी

✅सर्वात जास्त उपयोग तांबड्या रक्तपेशीतील हिमोग्लोबिन साठी

✅75 टक्के लोह रक्तात असते

✅90 टक्के लोहाचा पुनर्वापर होतो

✅रक्तात हिमोग्लोबिन तर स्नायुत मायोग्लोबिन मधील  लोह ऑक्सिजन च्या साह्याने वहनाचे कार्य करते

✅लोहामुळे रोगप्रतिकारक्षमता व ऊर्जानिर्मिती नियंतत्रित केली जाते

✍अभाव : ऍनिमिया

✅पांडुरोग रक्तक्षय असे म्हणतात

✅रक्तातील तांबड्या पेशी किंवा लोहाचे प्रमाण कमी होणे

✅हिमोग्लोबिन च्या कार्यात अडथळ निर्माण होतो

✅थकवा, थाप, लागणे, अशक्तपणा, चक्कर येणे, त्वचा पांढरी पडणे

✅घोट्याना सूज येणे

✅गरोदर स्त्रियांत लोहाची कमतरता दूर होण्यासाठी त्यांना दररोज 60 मी ग्रॅम लोह आणि 500 मी ग्रॅम फॉलिक आम्लाचा पुरवठा करणे आवश्यक असते

✅दिवसात दोन वेळा फेरॉन सल्फेटच्या गोळ्या देऊन लोह अभावाचा उपचार करता येतो

✍अतिसेवन :

✅लोहाआधिक्य यामुळे पातळी वाढून हिमोक्रोमॅटोसीस हा अनुवांशिक विकार होतो

✅ यकृत, ह्रदय, अंतःस्रावी ग्रंथीच्या कार्यवर परिणाम होतो1

✅ यकृताचा सिरॉसिस ,मधुमेह, सांधेदुखी परिणाम दिसून येतात

भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका


*उद्दिष्टांचा ठराव जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 ला मांडला आणि घटना समितीने तो 22 जानेवारी 1947 ला स्वीकृत केला.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*शब्दांचा क्रम:- न्याय, स्वातंत्र्य, समानता, बंधुता
*42 व्या घटना दुरुस्तीने समाविष्ट शब्द:- समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सामाजिक, आर्थिक,राजकीय न्याय
*विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना याचे स्वातंत्र्य
*दर्जा आणि संधीची समानता
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
सरनामा घटनेचा भाग आहे का ?
*1960-बेरुबारी खटला- घटनेचा भाग नाही
*1973-केशवानंद भारती खटला-घटनेचा भाग आहे.
*1995-LIC खटला- घटनेचा भाग आहे.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सरनामा न्यायप्रविष्ट नाही.
*राज्य शब्दाची व्याख्या कलम 12 आणि कलम 36 मध्ये नमूद.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
*सामाजिक न्याय- कलम 38
*आर्थिक न्याय - कलम 39
*राजकीय न्याय - कलम 325, 326
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

15 June 2020

काळ व प्रकार

काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.

वर्तमान काळभूतकाळभविष्यकाळ

 1) वर्तमानकाळ :

क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो.

उदा.

मी आंबा खातो.मी क्रिकेट खेळतो.ती गाणे गाते.आम्ही अभ्यास करतो.

वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार घडतात.

i) साधा वर्तमान काळ

जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो.

उदा. 

मी आंबा खातो.कृष्णा क्रिकेट खेळतो.प्रिया चहा पिते.

ii) अपूर्ण वर्तमान काळ / चालू वर्तमानकाळ

जेव्हा वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरुन क्रिया वर्तमानामध्ये चालू किंवा सुरू असल्याचा बोध होतो. तेव्हा वाक्याचा काळ अपूर्ण वर्तमान असतो.

उदा. 

सुरेश पत्र लिहीत आहे.दिपा अभ्यास करीत आहे.आम्ही जेवण करीत आहोत.

iii) पूर्ण वर्तमान काळ

जेव्हा क्रिया ही वर्तमानकाळातील असून ती नुकतीच पूर्ण झालेली असेल तेव्हा त्याला ‘पूर्ण वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी आंबा खाल्ला आहे.आम्ही पेपर सोडविला आहे.विधार्थ्यांनी अभ्यास केला आहे.

iv) रीती वर्तमानकाळ / चालू पूर्ण वर्तमानकाळ

वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात.

उदा.    

मी रोज फिरायला जातो.प्रदीप रोज व्यायाम करतो.कृष्णा दररोज अभ्यास करतो.

2)  भूतकाळ :

जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

राम शाळेत गेला.मी अभ्यास केला.तिने जेवण केले.

भूतकाळचे 4 उपप्रकार पडतात.

i) साधा भूतकाळ

एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

रामने अभ्यास केलामी पुस्तक वाचले.सिताने नाटक पहिले.

ii) अपूर्ण/चालू भूतकाळ

एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ/चालू भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

मी आंबा खात होतो.दीपक गाणे गात होता.ती सायकल चालवत होती.

iii) पूर्ण भूतकाळ

एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

सिद्धीने गाणे गाईले होते.मी अभ्यास केला होता.त्यांनी पेपर लिहिला होता.राम वनात गेला होता.

iv) रीती भूतकाळ / चालू पूर्ण भूतकाळ

भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘चालू-पूर्ण भूतकाळ’ किंवा ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी रोज व्यायाम करीत होतो/असे.ती दररोज मंदिरात जात होती/असे.प्रसाद नियमित शाळेत जात होता/असे.

3)  भविष्यकाळ :

क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे, याची जाणीव होते, तेव्हा त्या काळाला ‘भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी सिनेमाला जाईल.मी शिक्षक बनेल.मी तुझ्याकडे येईन.

i) साधा भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो.

उदा.

उद्या पाऊस पडेल.उद्या परीक्षा संपेल.मी सिनेमाला जाईल.

ii) अपूर्ण / चालू भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

मी आंबा खात असेल.मी गावाला जात असेल.पूर्वी अभ्यास करत असेल.दिप्ती गाणे गात असेल.

iii) पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा. 

मी आंबा खाल्ला असेल.मी गावाला गेलो असेल.पूर्वाने अभ्यास केला असेल.दिप्तीने गाणे गायले असेल.

iv) रीती भविष्यकाळ / चालू पूर्ण भविष्यकाळ

जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती/ चालू पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात.

उदा.

मी रोज व्यायाम करत जाईल.पूर्वी रोज अभ्यास करत जाईल.सुनील नियमित शाळेत जाईल.

भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी....

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने संविधानाचा स्वीकार केला.

१. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो?

- कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.

२. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- संविधान सभेनं २ वर्षे ११ महिने १८ दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.

३. संविधानाची भाषा

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं.
- यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली.
-भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-अध्यक्ष-Dr.राजेंद्र प्रसाद

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली.

अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला.

५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?

-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली.
- सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते.
-पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

-फाळणीनंतर संविधान सभेतील संदस्यांची संख्या २९९ झाली.
समितीच्या ११ बैठका झाल्या.
त्या १६४ दिवस कामकाज चालले.
समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या.
त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते.
-मसुदा समितीच्या ४४ बैठका झाल्या.

७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

-मूळ घटनेत ८ परिशिष्टे होती. नंतर ४ जोडण्यात आली आहेत.

- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली.

-मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती.

-सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा लागू करण्यात आला.
भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

९. संविधान कोणी हस्तलिखित केले आहे?

-बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती.
-प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

अंकगणित

० ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचेअंक प्रत्येकी २० वेळा येतात.
।।) १ हा अंक २१ वेळा येतो.
।।।) ० हा अंक ११ वेळा येतो.

१ ते १०० पर्यंतच्या संख्यांत-
।) २ पासून ९ पर्यंतचे अंक असलेल्या एकूणसंख्या प्रत्येकी १९ येतात.
।।) दोन अंकी संख्यात १ ते ९ या अंकांच्याप्रत्येकी १८ संख्या असतात.

दोन अंकांमधून एकूण २ संख्या,तीन अंकांमधून एकूण ६ संख्या,चार अंकांमधून एकूण २४ संख्या व पाच अंकांमधून एकूण १२० संख्या तयार होतात.

विभाज्यतेच्या कसोटय़ा

A)२ ने नि:शेष भाग जाणारी संख्या -संख्येच्या एककस्थानी ०, २, ४, ६, ८ यापैकीकोणताही अंक असल्यास.

B)३ ची कसोटी-संख्येच्या सर्व अंकांच्या बेरजेला ३ ने नि:शेषभाग जात असल्यास.

C)४ ची कसोटी-संख्येच्या शेवटच्या २ अंकांनी तयार होणाऱ्यासंख्येला ४ ने नि:शेष भाग जात असल्यासअथवा संख्येच्या शेवटी कमीतकमी दोन शून्यअसल्यास.

D)५ ची कसोटी-संख्येच्या एकक स्थानचा अंक जर ० किंवा ५असल्यास.

E)६ ची कसोटी-ज्या संख्येला २ व ३ या अंकांनी नि:शेष भागजातो त्या संख्यांना ६ ने नि:शेष भाग जातोचकिंवा ज्या सम संख्येच्या अंकांच्या बेरजेला ३ने भाग जातो त्या संख्येला ६ ने निश्चित भाग जातो.

F)७ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या ३ अंकांनी तयारहोणाऱ्या संख्येतून डावीकडील उरलेल्याअंकांनी तयार झालेली संख्या वजा करूनआलेल्या संख्येस ७ ने नि:शेष भाग गेल्यास त्यासंख्येला ७ ने नि:शेष भाग जातो.

G)८ ची कसोटी-संख्येतील शेवटच्या तीन अंकांनीतयार होणाऱ्या संख्येला ८ ने निशेषभाग जातअसल्यास किंवा संख्येत शेवटी कमीतकमी ३शून्य असल्यास त्या संख्येला ८ ने निशेष भाग जातो किंवा ज्या संख्येच्या शतकस्थानी २ हा अंकअसतो व जिच्या अखेरच्या दोन अंकी संख्येला ८ने भाग जातो त्या संख्येला ८ ने भाग जातो.

H)९ ची कसोटी-संख्येतील सर्व अंकांच्या बेरजेला९ ने निशेषभाग जातो.

I)११ ची कसोटी-ज्या संख्येच्या विषम स्थानच्याया समस्थानच्या अंकांची बेरीज अथवा ११च्यापटीत असल्यास त्या संख्येला ११ ने निशेष भागजातो. एक सोडून १ अंकांची बेरीज समान असते किंवा फरक ० किंवा ११ च्या पटीत असतो.

J)१२ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ४या अंकांनी निशेष भाग जातो त्या संख्येला १२ ने भाग जातो.

K)१५ ची कसोटी-ज्या संख्येला ३ व ५ अंकानी निशेष भाग जातोत्या संख्येला १५ ने भाग जातो.

L)३६ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ४ ने निशेष भाग जातो त्या संख्येला ३६ ने भाग जातो.

M)७२ ची कसोटी-ज्या संख्येला ९ व ८ ने निशेषभाग जातो त्या संख्येला ७२ ने भाग जातो.