29 June 2020

पोलीस भरती प्रश्नसंच

मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

१.उत्तराखंड 🏆
२.जम्मू काश्मीर
३.सिक्किम
४.उत्तर प्रदेश

२.भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?

१.बेट
२.त्रिभुजप्रदेश
३.द्वीपकल्प 🏆
४.मैदानी प्रदेश

3. केदारनाथ कोणत्या राज्यात आहे?

१. उत्तर प्रदेश
२. हिमाचल प्रदेश
३. उत्तराखंड 🏆
४. जम्मू-काश्मीर

४. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

१. ०२ वर्ष
२. ०४ वर्ष
३. ०५ वर्ष
४. ०६ वर्ष🏆

५) भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली ?

१. पुणे
२. हैदराबाद
३. चेन्नई
४. मुंबई🏆

६) मार्च 2019 मध्ये खालील पैकी कोणत्या माझी आरबीआय गव्हर्नर ला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?

१.  मनमोहनसिंग
२.  रघुराम राजन🏆
३.  विमल जलान
४.  उर्जित पटेल

७) चांद्रयान-१ हे भारताचे पहिले मिशन टु मुन...... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले?

१. जानेवारी - २००७
२. ऑक्टोबर- २००८🏆
३. सप्टेंबर-  २०११
४. ऑक्टोबर -२०१२

८) ऑक्टोबर 2018 मध्ये वर रुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले ?

१. अरबी समुद्र 🏆
२. बंगालचा उपसागर
३. पॅसिफिक महासागर
४.  हिंदी महासागर

९) लोरियस स्पोर्ट मॅन ऑफ द इयर 2019 पुरस्कार कोणी जिंकला?

१. नोवाक जोकोविक🏆
२.  रॉजर फेडरर
३. राफेल नदाल
४.टायगर वूड्स

१०) मुलभूत कर्तव्य संदर्भात तरतुदी भारतीय घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे?

१. भाग -२
२. भाग -३
३. भाग -४
४. भाग -४अ🏆

११) 'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?

१. स्वामी दयानंद सरस्वती🏆
२. स्वामी विवेकानंद
३. राजाराम मोहन राय 
४. स्वामी परमहंस

१२) आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?
१. क्षय
२.  डायरिया
३. ॲनिमिया🏆
४. बेरीबेरी

१३) बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?

१.  लॉर्ड मिंटो
२. लॉर्ड कर्झन🏆
३. लॉर्ड रिपन
४. लॉर्ड डलहौसी

१४) मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?

१. महात्मा फुले
२. सावित्रीबाई फुले
३. लोकमान्य टिळक
४.वि.रा. शिंदे 🏆

१५)दिल्ली ही भारताची राजधानी केव्हापासून झाली?

👍 12 डिसेंबर 1911

प्रश्नसंच


📌 शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज देणारे पहिले राज्य कोणते ?

1) गोवा
2) तेलंगणा✅✅
3) गुजरात
4) पंजाब

📌 भारतातील पहिली करेन्सी प्रिंटिंग प्रेस ( टाकसाळ ) कोठे स्थापन करण्यात आली ?

1) मुंबई
2) कोलकाता
3) नाशिक✅✅
4) हैदराबाद

📌 महाराष्ट्रात सर्वात जास्त खेडी असणारा जिल्हा कोणता ?

1) पुणे ✅✅
2) सिंधुदुर्ग
3) अमरावती
4) सोलापूर

📌कोणत्या ठिकानांदरम्यान दक्षिण आशिया प्रदेशातली पहिली क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइन आहे?

(A) मोतिहारी आणि अमलेखगंज✅✅✅
(B) सबा आणि सारवाक
(C) हजीरा आणि विजयपूर
(D) ताशकंद आणि बिश्केक

📌कोणत्या सालापर्यंत पाय व मुखरोगांचे निर्मूलन करणे हे पाय व मुखरोग (FMD) यासाठीच्या ‘राष्ट्रीय पशूरोग नियंत्रण कार्यक्रम’चे उद्दीष्ट आहे?

(A) 2025
(B) 2035
(C) 2030✅✅✅
(D) 2027

📌भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ____ यांनी संयुक्तपणे दक्षिण आशिया प्रदेशातल्या पहिल्या क्रॉस-बॉर्डर पेट्रोलियम प्रॉडक्ट पाइपलाइनचे उद्घाटन केले.

(A) बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसीना
(B) नेपाळी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली✅✅✅
(C) चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग
(D) म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष विन मिंट

📌कोणते राज्य सरकार भारतातले पहिले आंतरराष्ट्रीय महिला व्यापार केंद्र (iWTC) याची स्थापना करणार आहे?

(A) दिल्ली
(B) राजस्थान
(C) महाराष्ट्र
(D) केरळ✅✅✅

📌“सावरकर: इकोज फ्रॉम ए फरगॉटन पास्ट, 1883-1924” पुस्तकाचे लेखक कोण आहेत? #books

(A) विक्रम संपथ✅✅✅
(B) श्री प्रह्लादसिंग पटेल
(C) रीना बॅरॉन
(D) व्यंकय्या नायडू

📌कोणत्या समूहाने भारतासह वस्तूंसंदर्भातल्या मुक्त व्यापार कराराचा (FTA) आढावा घेण्यास सहमती दर्शविली?

(A) जागतिक व्यापार संघटना
(B) ASEAN✅✅✅
(C) BRICS देश
(D) बांग्लादेश

📍 _______ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 107 व्या भारतीय विज्ञान परिषदेचे उद्घाटन करण्यात आले.

(A) बेंगळुरू✅✅
(B) चेन्नई
(C) मुंबई
(D) लखनऊ

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणते राज्य वाळू दारापर्यंत पोहचविण्याची योजना आखत आहे?

(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) आंध्रप्रदेश✅✅
(D) कर्नाटक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या राज्य प्राणीसंग्रहालयाने अस्तित्व धोक्यात असलेल्या ‘हरगिला’ या पक्षीप्रजातीचे संवर्धन करण्यासाठी प्रथम पुढाकार घेतला?

(A) आसाम✅✅
(B) नागालँड
(C) पश्चिम बंगाल
(D) मेघालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 समुद्रातल्या प्रवाळी प्रदेशाला विषारी ठरणारी ‘सनस्क्रीन’ यावर बंदी घालणारा पहिला देश कोणता आहे?

(A) फिजी
(B) किरीबाती
(C) नऊरू
(D) पलाऊ✅✅

📍 ____ कडून चलनी बँकनोट ओळखण्यासाठी दृष्टिहीन व्यक्तींसाठी ‘MANI / मनी’ अ‍ॅप सादर करण्यात आला.

(A) भारतीय स्टेट बँक
(B) एक्सिस बँक
(C) भारतीय रिझर्व्ह बँक✅✅
(D) HDFC बँक

-----------------------------------

१. मॅरेथाॅन स्पर्धा किती अंतराची असते
१. ४३.१९५ किलोमीटर
२. ४२.१९५ किलोमीटर👈
३. ४२.१८५ किलोमीटर
४. ४१.१८५ किलोमीटर

२. ------------- या देशाच्या दौऱ्यावर जाणारे नरेंद्र मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान ठरले आहे
१.  यूएई
२. बहरीन👈
३. इराक
४. घाना

३. मांगदेछू जलविद्युत प्रकल्प हा ------------ मैत्री प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे.
१. भूतान- भारत👈
२. भारत- नेपाळ
३. म्यानमार-भारत
४. भारत- बांगलादेश

४. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी -------------------- या देशात रूपे कार्ड लांच केले
१. भूतान👈
२. बहरीन
३. फ्रान्स
४. नेपाळ

५. भारताचा ५० वा आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नोव्हेंबर२०१९ रोजी कोणत्या शहरात पार पडणार आहे.
१ नवी दिल्ली
२ गोवा👈
३ पुणे
४ राजकोट

६.. कनेक्टिंग इंडिया हे घोषवाक्य खालीलपैकी कोणाचे आहे.
१. एअर इंडिया
२. भारतीय स्टेट बँक
३. भारतीय रेल्वे
४. बीएसएनएल👈

७. भारतीय हॉकी संघाने आत्तापर्यंत ऑलिम्पिक स्पर्धेत --------- पदके जिंकली आहे
१. ८ सुवर्ण, १ रौप्य, १ कास्य
२. ७ सुवर्ण, २ रौप्य,२  कास्य
३. ८ सुवर्ण, १ रौप्य, २ कास्य👈
४. ७ सुवर्ण, १ रौप्य, १ कास्य

८. बुली हा शब्द कोणत्या खेळादरम्यानवापरतात
१. क्रिकेट
२. फुटबॉल
३. गोल्फ👈
४. हॉकी

1. मालाने 5 खुर्च्या व 2 टेबल 1625 ला खरेदी केले. रेशमाने 2 खुर्च्या व 1 टेबल 750 ला खरेदी केले. तर एका खुर्चीची व एका टेबलाची किंमत अनुक्रमे —— आहे.

100, 525
125, 450
100, 500
125, 500
उत्तर : 125, 500

2. 7,11,15,19, —— ही अंकगणिती श्रेणी आहे. तिच्या 60 पर्यंतच्या पदांची बेरीज —– आहे.

750
7500
7700
770
उत्तर : 7500

3. एका आयताकृती भ्रमणध्वनी संचाची लांबी त्याच्या रुंदीपेक्षा 3 ने जास्त आहे. जर त्याची परिमिती 34 सेंमी असेल, तर त्या भ्रमणध्वनी संचाची लांबी —– आहे.

13 सेंमी
7 सेंमी
10 सेंमी
8 सेंमी
उत्तर : 10 सेंमी

4. खालील क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत किती?

5,8,11,14, —–.

21
23
24
22
उत्तर : 21

5. तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे, तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील प्रमाणात येतील?

4
3


उत्तर : 4

6. 4,10,12,24 या प्रत्येक संख्येत कोणती संख्या मिळवली असता येणार्‍या संख्या प्रमाणात येतील?

5
2
3
4
उत्तर : 4

7. 1,3,4 या अंकांपासून तयार होणार्‍या सर्व तीन-अंकी संख्यांची बेरीज किती?

1776
1876
1666
1676
उत्तर : 1776

8. दोन नैसर्गिक संख्यांची बेरीज 8 आहे, जर त्यांच्या व्युत्क्रम संख्यांची बेरीज 8/15 असेल, तर त्या दोन संख्या कोणत्या?

24
22
18
28
उत्तर : 18

9. कवायतीसाठी मुलांच्या जेवढया रांगा आहेत, तेवढीच मुले प्रत्येक रांगेत आहेत, जर एकूण मुले 484 असतील, तर कवायतीसाठी केलेल्या रांगा किती?

24
22
18
28
उत्तर : 22

10. एका दोन-अंकी संख्येतील एकक व दशक स्थांनाच्या अंकांचा गुणाकार 12 आहे. जर त्या संख्येत 36 ही संख्या मिळवली, तर मुळच्या संख्येतील अंकांची अदलाबदल होते, तर ती संख्या कोणती?

34
62
43
26
उत्तर : 26

11. चिकणमातीपासून बनवलेल्या एका शंकूची उंची 24 सेंमी आणि पायाची त्रिज्या 6 सेंमी आहे. त्याचा आकार बदलून गोल तयार केला, तर त्या गोलाची त्रिज्या किती?

7 सेंमी
7 सेंमी
8 सेंमी
9 सेंमी
उत्तर : 7 सेंमी

12. रमेशला सुरेशच्या पगाराच्या निमपट, तर महेशला रमेशच्या पगाराच्या तिप्पट पगार आहे. जर महेशचा पगार 4500 असल्यास सुरेशचा पगार किती?

1500
2000
3000
2500
उत्तर : 3000

28 June 2020

आजची प्रश्नमंजुषा

🟠 5 ते 7 डिसेंबर 1934 दरम्यान .....येथे भरलेल्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत संविधान सभेची मागणी झाली.? 
 
      A) दिल्ली

      B) पाटणा ✅✅

      C) मुंबई

      D) मद्रास
____________________________
🟡....... रोजी संविधान सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले?

     A) 15 ऑगस्ट 1947

     B) 22 जुलै 1947

     C) 24 जानेवारी 1950✅✅

     D) 25 डिसेंबर 1952
____________________________
🟢 संविधान सभेने घटना निर्मितीसाठी वेगवेगळ्या समित्या तयार केल्या त्यापैकी सुकाणू समितीचे अध्यक्ष कोण होते ?

     A) जवाहरलाल नेहरू

     B) वल्लभाई पटेल

    C) डॉ.के.एम. मुन्शी✅✅

    D) एच. सी .मुखर्जी
____________________________

🔵 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे या तरतुदींचा स्त्रोत कोणत्या देशाची घटना आहे ?

     A) जपान

     B) जर्मनी ✅✅

     C) फ्रान्स

     D) दक्षिण आफ्रिका
____________________________

⚫️ घटना दुरुस्तीची पद्धत कलम......... मध्ये देण्यात आली.*

       A)368 ✅✅

      B)365

      C)360

      D)352
____________________________
⚪️ मतदानाचे किमान वय........ व्या घटना दुरुस्तीनुसार 21 होऊन 18 वर्षे असे कमी करण्यात आले.?

      A) 42 व्या

      B) 61 व्या ✅✅

      C) 86 व्या

      D) 92 व्या
____________________________

🟤 बलवंतराय मेहता समिती......  मध्ये भारत सरकारने बलवंतराय जी मेहता यांच्या अध्यक्षतेखाली  स्थापना केली.?

     A)1962

     B)1957✅✅

     C)1960

     D)1966
____________________________
🔴 ......... मध्ये आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण हे 29 वे राज्य निर्माण करण्यात आले.?

     A) 2 जून 2013

     B) 2 जून 2014 ✅✅

     C) 13 डिसेंबर 2016

संपूर्ण मराठी व्याकरण वाक्यप्रचार व अर्थ


1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे

2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे

3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे

4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे

5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे

6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे

7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे

8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे

9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे

10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे

11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे

12)रामराम ठोकणे - निरोप घेणे

13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे

14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे

15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे

16) वर्ज्य करणे - टाकणे

17) काडीमोड करणे - संबंध तोडणे

18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे

19) अगतिक होणे - उपाय न चालणे

20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे

21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे

22) इडापिडा टळणे - संकट जाणे

23) उतराई होणे - उपकार फेडणे

24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे

25) लकडा लावणे - सारखी घाई करणे

26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे

27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे

28)कागाळी करणे - तक्रार करणे

29) खांदा देणे - मदत करणे

30) खोबरे करणे - नाश करणे

31) गय करणे - क्षमा करणे

32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे

33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे

34) जीव ओतणे - मन लावून काम करणे

35) सुपारी देणे - आमंत्रण देणे

36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे

37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे

38) नामोहरम होणे - पराभूत होणे

39) पदर पसरणे - याचना करणे

40) पाणउतारा करणे - अपमान करणे

41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे

42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास  क्षमता कमी पडणे

43) हिरमुसले होणे - नाराज होणे

44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे

45) विटून जाणे - त्रासणे

46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे

47) फडशा पाडणे - संपवणे

48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे

49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे

50)धिंडवडे निघणे - फजिती होणे

61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे

62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे

63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे

64)हातपाय गाळणे - धीर सोडणे

65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील

काम न करता कागदी पराक्रम गाजविणे

66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे

67)झाकड पडणे - अंधार पडणे

68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे

69)टोपी उडवणे - टवाळी करणे

70)पाणी पाजणे - पराभव करणे

71)वहिवाट असणे - रीत असणे

72)छी थू होणे - नाचक्की होणे

73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे

74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे

75)दिवा विझणे - मरण येणे

76)मूठमाती देणे - शेवट करणे

77) सुगावा लागणे - अंदाज लागणे

78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे

79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे

80)कानाशी लागणे - चहाडी करणे

81)किटाळ करणे - आरोप होणे

82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे

83)हातावर तुरी देणे - फसविणे

84)बेगमी करणे - साठा करणे

85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे

86)पोटात तुटणे - वाईट वाटणे

87)नख लावणे - नाश करणे

88)डोळो निवणे - समाधान होणे

राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नसंच

________________________

1) जिल्हा परिषदेच्या सर्व प्रकारच्या सर्वसाधारण सभांसाठी गणपूर्ती संख्या ही एकूण सदस्य संख्येच्या ______ एवढी असते.

A. 1/2 सदस्य संख्या

B. 1/3 सदस्य संख्या✅

C. 1/4 सदस्य संख्या

D. 1/10 सदस्य संख्या.

________________________

2) माहिती अधिकार अधिनियम 2005 च्या तरतुदीनुसार त्रयस्थ व्यक्तीला दुसरे अपिल किती कालावधीमध्ये दाखल करता येते ?

A. 30 दिवस

B. 60 दिवस

C. 90 दिवस✅

D. वरीलपैकी काहीही नाही.

________________________

3) जिल्हा परिषद अध्यक्षांच्या 30 दिवसापेक्षा अधिक ते 90 दिवसापर्यंत रजेस कोण मंजूरी देतो ?

A. राज्य शासन

B. स्थायी समिती✅

C. जिल्हा परिषद

D. मुख्य कार्यकारी अधिकारी.

________________________

4) महाराष्ट्र प्रशासकीय सुधारणा समिती (1968) च्या शिफारशीनुसार राज्य सरकारने सचिवालयामध्ये __________ पद्धतीचा स्विकार केला.

A. सहाय्यक अधिकारी

B. सल्लागार समिती

C. कक्ष अधिकारी✅

D. मुख्य अधिकारी.

________________________

5) नियमित ग्रामसभा बैठकांव्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक/बैठका
भरविण्याचा अधिकार कोणास आहे?

A. सरपंच

B. गट विकास अधिकारी

C. मुख्य कार्यकारी अधिकारी

D. वरील सर्वांना.✅

________________________

6) खालीलपैकी कोण 'अखिल भारतीय सेवांचे जनक' म्हणून ओळखले जातात ?

A. डॉ. बी.आर, आंबेडकर

B. वल्लभभाई पटेल✅

C. जवाहरलाल नेहरू

D.  डॉ. राजेंद्र प्रसाद.

________________________

7) भारताच्या नियंत्रक व महालेखापरिक्षकाबाबत खालील विधाने विचारात घ्या :

(a) केन्द्र व राज्यांच्या महसूलातून होणारया खर्चाचे लेखा-परीक्षण करणे.

(b) संसदेने मंजूर केलेल्या रकमेपेक्षा जास्त रक्कम केन्द्र शासनाकडून काढण्यात आलेली नाही याची खात्री करणे.

(c) केन्द्र आणि राज्याच्या आर्थिक देवाण-घेवाणीतील बिनचूकपणा अथवा अन्य बाबतीत मतप्रदर्शन करणे.

(d) खर्चातील नियम व अधिनियमाच्या अनियमिततेची प्रकरणे निदर्शनास आणणे.

सदरहू विधानांपैकी कोणती बरोबर आहेत ?

A. (a) आणि (b)

B. (b), (c) आणि (d)

C. (a), (c) आणि (d)

D. (a), (b), (c) आणि (d). ✅

________________________

8) लोकलेखा समितीबाबत खालीलपैकी कोणते सत्य आहे ?

(a) ती सर्वात जुनी आर्थिक समिती आहे.

(b) तिचे वर्णन अंदाज समितीची 'जुळी बहिण' असे केले जाते.

(c) तिचे निष्कर्ष हे पूर्वलक्षी स्वरूपाचे (Ex-post facto) असतात.

(d) तिचे कार्य हे केवळ शव विच्छेदनाचे आहे.

पर्यायी उत्तरे :

A. (a), (b), (c)

B. (b), (c), (d)

C. (a), (c), (d)

D. (a), (b), (c), (d). ✅

________________________

9) नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ___________ करू शकतात.

A. संसद ठराव करून

B. संसद कायदा तयार करून✅

C. राष्ट्रपती आदेश पारित करून

D. केंद्रीय लोकसेवा आयोग ठराव करून.

________________________

10) भारताच्या संचित निधीतून देयके (Payments) देण्यासाठी __________ द्वारे अधिकृत केले जाते.

A. वित्त विधेयक

B. विनियोजन अधिनियम ✅

C. वित्तीय अधिनियम

D. संचित निधी अधिनियम.

आंतरराष्ट्रीय व्यापार.


🅾आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणजे आंतरराष्ट्रीय सीमा किंवा प्रांत ओलांडून भांडवल , वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण होय . 

🅾बर्‍याच देशांमध्ये असा व्यापार सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) लक्षणीय वाटा दर्शवितो . आंतरराष्ट्रीय व्यापार संपूर्ण इतिहासात अस्तित्त्वात आहे (उदाहरणार्थ उत्तरापाठा , रेशीम रोड , अंबर रोड , आफ्रिकेसाठी भंगार , अटलांटिक गुलाम व्यापार , मीठ रस्ते ), त्याचे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय महत्त्व अलिकडच्या शतकांत वाढत चालले आहे.

🅾देशांतर्गत व्यापाराच्या तुलनेत आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापार करणे ही एक जटिल प्रक्रिया आहे . जेव्हा चलन, सरकारी धोरणे, अर्थव्यवस्था, न्यायालयीन व्यवस्था, कायदे आणि बाजारपेठा व्यापतात तेव्हा दोन किंवा अधिक देशांमधील व्यापार व्यापतो.

🅾वेगवेगळ्या आर्थिक स्थितीतील देशांमधील व्यापाराच्या प्रक्रियेस चालना देण्यासाठी आणि न्याय्य ठरवण्यासाठी जागतिक व्यापार संघटना सारख्या काही आंतरराष्ट्रीय आर्थिक संस्था स्थापन केल्या गेल्या . या संघटना आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या सोयीसाठी आणि वाढीच्या दिशेने कार्य करतात. आंतरराज्यीय आणि अधिराजकीय संस्था आणि राष्ट्रीय सांख्यिकी संस्था यांची सांख्यिकी सेवा आंतरराष्ट्रीय व्यापारावरील अधिकृत आकडेवारी प्रकाशित करते .

💠💠जागतिक व्यापार वैशिष्ट्य.💠💠

🅾एखाद्या देशातील एका पक्षाकडून दुसर्‍या देशातल्या पक्षाकडे हस्तांतरित किंवा विक्री केलेले उत्पादन हे मूळ देशातून निर्यात केले जाते आणि ते उत्पादन प्राप्त झालेल्या देशात आयात होते. देशाच्या चालू खात्यात पेमेंट्सच्या शिल्लकमध्ये आयात आणि निर्यात होते . 

🅾जागतिक स्तरावर व्यापार केल्याने ग्राहकांना आणि देशांना नवीन बाजारपेठांमध्ये आणि उत्पादनांच्या संपर्कात येण्याची संधी मिळते. आंतरराष्ट्रीय बाजारात जवळजवळ प्रत्येक प्रकारचे उत्पादन आढळू शकते: अन्न, कपडे, सुटे भाग, तेल, दागिने, वाइन, साठा, चलने आणि पाणी. सेवांचे व्यापार देखील केले जातातः पर्यटन, बँकिंग, सल्लामसलत आणि वाहतूक प्रगत तंत्रज्ञान ( वाहतुकीसह ), जागतिकीकरण , औद्योगिकीकरण , आउटसोर्सिंग आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांचा आंतरराष्ट्रीय व्यापार प्रणालीवर मोठा परिणाम होतो.

💠💠जागतिक व्यापार संघटना.💠💠

🅾च्या दौऱ्यावर, दर आणि व्यापार सर्वसाधारण करार (GATT), 1947 मध्ये 23 देशांमध्ये एक बहुपक्षीय करार स्थापना करण्यात आली नंतर दुसरे महायुद्ध आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्य-जसे की समर्पित इतर नवीन बहुपक्षीय संस्था वेक जागतिक बँक ( 1944 ची स्थापना केली) आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (1944 किंवा 1945 ची स्थापना केली). 

🅾आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या नावाने व्यापारासाठी तुलना करता येणारी आंतरराष्ट्रीय संस्था अमेरिका म्हणून कधीही सुरू झाली नाही . आणि इतर सही स्थापना करार मंजुरी देणे नाही, आणि GATT त्यामुळे हळूहळू झाले वास्तविक आंतरराष्ट्रीय संस्था.

27 June 2020

सामान्य ज्ञान प्रश्नोत्तरे

▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकृती’ नावाने संकेतस्थळ कोणत्या संस्थेने तयार केले?

उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

▪️ भारतीय संविधानातल्या कितव्या दुरुस्तीद्वारे पंचायतींना संविधानिक दर्जा दिला गेला?

उत्तर : 73 वी दुरुस्ती

▪️ चीनच्या पहिल्या मंगळ शोध मोहिमेचे नाव काय आहे?

उत्तर : तियानवेन 1

▪️ कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत ई-ग्राम स्वराज्य संकेतस्थळ आणि स्वामीत्व योजना चालवली जात आहे?

उत्तर : पंचायतराज मंत्रालय

▪️ कोणत्या देशाने ‘नूर’ नावाचा लष्करी उपयोगाचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?

उत्तर : इराण

▪️ कोणत्या व्यक्तीने 21 एप्रिल 2020 रोजी झालेल्या जी-20 कृषिमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?

उत्तर : नरेंद्र सिंग तोमर

▪️ UNESCO संघटनेनी कोणत्या शहराची 2020 या वर्षाची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली?

उत्तर : क्वालालंपुर

▪️ कोणता दिवस ‘इंग्रजी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो?

उत्तर : 23 एप्रिल

▪️ कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?

उत्तर : उत्तराखंड

▪️ कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?

उत्तर : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

राज्यसभाबद्दल सर्व माहिती

राज्यसभा हे संसदेचे वरिष्ठ सभागृह असून ते व्दितीय सभागृह आहे असे म्हटले जाते तर लोकसभा कनिष्ठ सभागृह असून प्रथम सभागृह मानले जाते.

सभासदांची संख्या :
घटनेच्या 80 व्या कलमामध्ये असे स्पष्ट करण्यात आले आहे की, राज्यसभेची सभासद संख्या 250 इतकी असेल त्यातील 238 निर्वाचित असतील तर 12 सदस्य भारताच्या राष्ट्रपतींकडून नियुक्त केलेले असतील यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ञ असतील.
उदा. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक इ.

उमेदवारांची पात्रता :
घटनेच्या 84 व्या कलमात सभासदांची पात्रता सांगितली आहे ती पुढीलप्रमाणे:
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 30 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. संसदेने वेळोवेळी विहित केलेल्या अटी त्याला मान्य असाव्यात.

निवडणूक पद्धत :
राज्यसभेच्या सदस्यांची निवड भारतीय नागरिकांकडून न करता प्रत्येक घटक राज्याच्या विधानसभेत निवडून आलेल्या उमेदवारांकडून केली जाते व ही निवडणूक पद्धत प्रत्यक्ष नसून अप्रत्यक्ष आहे.

राज्यसभेचा कार्यकाल :
राज्यसभा हे स्थायी सभागृह असून दर दोन वर्षानी 1/3 सभासद निवृत्त होतात. तेवढेच त्याच्या जागी नव्याने निवडतात.

सभासदांचा कार्यकाल :
प्रत्येक सभासदाचा कार्यकाल हा 6 वर्ष इतका असतो परंतु कार्यकाल पूर्ण होण्यापूर्वी तो आपला राजीनामा राज्यसभेच्या अध्यक्षाकडे देऊ शकतो.

पदमुक्तता :
कोणत्याही सभागृहाची परवानगी न घेता एखादा सदस्य सतत 60 दिवस सभागृहात गैरहजर राहिल्यास त्याचे सभासदत्व आपोआप रद्द होते. परंतु (60 दिवसात संबंधित सभागृहाला लागोपाठ चार दिवस सुट्ट्या आल्या असतील तर सभासदत्व रद्द होत नाही.)

बैठक किंवा आधिवेशन :
घटनेच्या 85/1 कलमामध्ये सांगितल्याप्रमाणे राष्ट्रपती संसदेच्या प्रत्येक सभागृहाची योग्य वाटेल त्यावेळी अधिवेशन बोलवितो परंतु या अधिवेशनामध्ये सहा महिन्यांपेक्षा जास्त अंतर नसावे.

गणसंख्या :
कोणतेही सभागृहाचे कामकाज चालविण्यासाठी आवश्यक असलेली सभासद संख्या म्हणजेच गणसंख्या होय. ती 1/10 इतकी निर्धारित करण्यात आली आहे.

राज्यसभेचा सभापती :
घटनेच्या 89व्या कलमानुसार भारताचा उपराष्ट्रपती हा राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष असतो. तो राज्यसभेचा सभासद नसल्यामुळे त्याला सभागृहात मतदान करण्याचा अधिकार नाही परंतु 100 व्या कलमानुसार समान मते पडल्यास तो आपले निर्णायक मत देऊ शकतो.

उपाध्यक्ष :
राज्यसभेतील निवडून आलेल्या एका सदस्याची उपाध्यक्ष म्हणून निवड केली जाते.