21 July 2020

संत व त्यांची मूळ गावे


🌷 श्री शंकराचार्य : कालडी ( केरळ )

🌷संत जनाबाई : गंगाखेड, जि. परभणी ( महाराष्ट्र )

🌷संत तुकाराम : देहू ( महाराष्ट्र )

🌷संत सावता महाराज : अरणभेंडी, पंढरपूर ( महाराष्ट्र )

🌷संत रामदास स्वामी : जांब, ता. अंबड, जि. जालना ( महाराष्ट्र)

🌷संत ज्ञानेश्वर : आपेगाव ( महाराष्ट्र )

🌷संत नामदेव : नरसी-बामणी, जि. परभणी ( महाराष्ट्र )

🌷संत एकनाथ : पैठण ( महाराष्ट्र )

🌷संत बसवेश्वर : बागेवाडी ( विजापूर ) कर्नाटक

🌷संत मुक्ताबाई : आपेगाव ( महाराष्ट्र )

🌷संत नरहरी सोनार : पंढरपूर ( महाराष्ट्र )

🌷संत तुलसीदास : राजापूर, जि. बांदा ( उत्तरप्रदेश )
  

ज्ञानपीठ पुरस्कार 2019

- प्रख्यात मल्याळी कवी अक्क्रीथम यांना 55 वा ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान करण्यात आला.
- निवड समितीचे अध्यक्ष ज्ञानपीठ विजेत्या कादंबरीकार प्रतिभा रे होत्या.

● अक्क्रीथम (अक्क्रिथम अच्युतन नंबुदी)
- जन्म: 18 मार्च 1926
- केरळमधील पालक्कड जिल्ह्याचे रहिवासी
- मल्याळी साहित्यातील भीष्माचार्य अशी ओळख.
- त्याच्या नावावर 55 पुस्तके, 45 कवितासंग्रह आहेत. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- उन्नी नंब्रुदी' या मासिकाचे ते संस्थापक आहेत.
- अस्पृश्यतेच्या विरोधात उभ्या राहिलेल्या पहिल्या मल्याळी साहित्यिकांपैकी अक्क्रिथम हे एक.
- योगक्षेम सभा' आणि 'पलियम सत्याग्रह' या दोन संस्थामार्फत त्यांनी अनेक दशके हिरारीने सामाजिक काम केले.
- वीरवदम', 'निमिष क्षेत्रम', 'अमृत कतिका', 'अक्कीथम कवितका', '21 व्या शतकातील महाकाव्य', आणि 'अंतिमहाकालम' ही साहित्ये त्याची प्रसिद्ध आहेत.
- त्याना 1973 ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तर 1972 आणि 1988 ला केरळ साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, 2017 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.
- मातृभूमी सन्मान, वायलर सन्मान आणि कबीर सन्मान आदींनी त्यांना गौरविले आहे.

● ज्ञानपीठ पुरस्कार
- सुरुवात: 1965
- शांतीप्रसाद जैन: संस्थापक
- साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे.
- स्वरुप - 11 लाख आहे.
- आतापर्यंत 22 भाषेपैकी सिंधी भाषेला एखाद्याही ज्ञानपीठ मिळाला नाही.
- हा पुरस्कार मरणोत्तर दिला जात नाही.
- सर्वाधिक अकरा वेळा हिंदी भाषेला हा पुरस्कार मिळाला.

● मराठी भाषेला चार वेळा ज्ञानपीठ मिळाला.
- वि. स. खांडेकर - 1974
- वि. वा. शिरवाडकर - 1987
- विंदा करंदीकर - 2003
- भालचंद्र नेमाडे - 2014

● पुरस्काराचे नाविन्य
- आतापर्यंत सात महिलांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे.
- अक्क्रिथम ज्ञानपीठ मिळणारे सहावे मल्याळी लेखक ठरले.
- पहिला ज्ञानपीठ : गोविंद शंकर कुरूप (मल्याळम) 'ओडोक्नुफल' महाकाव्याबद्दल
- आतापर्यंत 59 व्यक्तींना हा पुरस्कार मिळाला.
- पुरस्कार प्राप्त पहिली महिला - आशापूर्णा देवी

महत्त्वाचे प्रश्नसंच

🚦१) बस चालकाचा परवाना मिळवणारी देशातील पहिलीच इंजिनिअर महिला कोण ठरली आहे ?
अ) प्रतिक्षा दास ✅✅
ब) भक्ती दास
क) प्रिया राव
ड) प्रिया दास
-----------------------------------------

🚦२) डॉ. श्रीराम लागू आणि दिपा लागू यांच्या दिवंगत मुलाच्या नावाने कोणता पुरस्कार दिला जातो ?
अ) तन्वीर सन्मान ✅✅
ब) बालगंधर्व पुरस्कार
क) प्रभात पुरस्कार
ड) नाट्य सेवा पुरस्कार
-----------------------------------------

🚦३) नुकतेच प्रकाशित करण्यात आलेले ' अर्थसंकल्प सोप्या भाषेत ' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
अ) उद्धव ठाकरे
ब) देवेंद्र फडणवीस ✅✅
क) अजित पवार
ड) शरद पवार

-----------------------------------------
🚦४) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये कोणत्या विद्यापीठाने सर्वाधिक पदक जिंकून प्रथम स्थान पटकावले ?
अ) सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे
ब) पंजाब विद्यापीठ चंदिगड ✅✅
क) जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली
ड) कोल्हापूर विद्यापीठ कोल्हापूर

-----------------------------------------
🚦५) नुकतेच मध्यप्रदेशातील कोणते अभयारण्य इको-सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केले आहे ?
अ) सरदारपुर अभयारण्य
ब) राष्ट्रीय चंबळ अभयारण्य ✅✅
क) फेन अभयारण्य
ड) केन अभयारण्य

१) मोसाद ही कोणत्या देशाची गुप्तहेर संस्था आहे ?
अ) इस्त्राईल ✅✅
ब) जपान
क) भारत
ड) अमेरिका

२) अंडरनिथ दी सदर्न क्राॅस हे प्रसिद्ध आत्मचरित्र कोणत्या खेळाडूचे आहे ?
अ) महेंद्रसिंग धोनी
ब) रिकी पाॅटिंग
क) कपिल देव
ड) मायकेल हसी ✅✅

३) खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नवीन कृषी विद्यापीठ स्थापनेस महाराष्ट्र सरकारने मंजुरी प्रदान केली ?
अ) साकोली ✅✅
ब) बुलढाणा
क) चंद्रपूर
ड) नंदुरबार

४) १७ व्या लोकसभेचा कार्यकाळ किती आहे ?
अ) २०१८-२०२३
ब) २०२०-२०२५
क) २०१९-२०२४ ✅✅
ड) २०१७-२०२२

५) खालीलपैकी कोणत्या योजनेंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते ?
अ) मनोधैर्य ✅✅
ब) निर्भया
क) किशोरी शक्ती
ड) मुस्कान

🔸 कोणत्या कंपनीने सौर ऊर्जेवर चालणारे मोबाईल स्वॅब कलेक्शन वाहन तयार केले?
उत्तर : सेल्को सोलार लाइट

🔸 कोणत्या देशाने ‘लॉंग मार्च 5B’ अग्निबाण प्रक्षेपित केले?
उत्तर : चीन

🔸 जागतिक रेडक्रॉस दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 8 मे

🔸 भारताकडे कोळसा निर्यात करण्यासाठी कोणता देश भारतासोबत सामंजस्य करार करणार आहे?
उत्तर : रशिया

🔸 कोणत्या संस्थेला पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट (PPE) यांची चाचणी करून प्रमाणपत्र देण्यासाठी नेमण्यात आले आहे?
उत्तर : इंस्टिट्यूट ऑफ न्यूक्लियर मेडिसिन अँड अलाइड सायन्स

🔸 कोणत्या राज्याने ‘मुख्यमंत्री युबा योगायोग योजना’ याच्या अंतर्गत शिष्यवृत्तीसंबंधी एक संकेतस्थळ कार्यरत केले?
उत्तर : त्रिपुरा

🔸 ‘इंपॅक्ट ऑफ एनर्जी एफिशियन्सी मेजर्स फॉर द इयर 2018-19’ हा अहवाल कोणत्या संस्थेने प्रकाशित केला?
उत्तर : प्राइसवॉटरहाऊस कूपर्स लिमिटेड

🔸 कोणत्या देशाने "तोमान" नावाने नवे चलन प्रस्तुत केले?
उत्तर : इराण

🔸इराक देशाचे नवे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर : मुस्तफा अल-कदिमी

🔸 कोणत्या संस्थेनी ‘कोरोनाव्हायरस ग्लोबल रिस्पॉन्स इंटरनॅशनल प्लेजिंग कॉन्फरन्स’ आयोजित केली?
उत्तर : युरोपीय संघ

▪️ कोणती संस्था कोविड-19 जीनोम सीक्वेन्सिंग प्रक्रिया चालविणारी भारतातली द्वितीय संस्था ठरली?
उत्तर : गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर

▪️ कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘एअर इव्हॅक्युएशन पॉड’ विकसित केले आहे?
उत्तर : भारतीय नौदल

▪️ कोणत्या संस्थेनी स्वयंचलित ‘मिस्ट बेस्ड सॅनिटायझर डिस्पेन्सिंग युनिट’ हे उपकरण विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ केंद्र सरकारने नेमलेल्या कोविड19 साठीच्या उच्चस्तरीय कृती दलाचे नेतृत्व कोणाकडे दिले गेले आहे?
उत्तर : विनोद पॉल आणि के. विजयराघवन

▪️ निधन झालेल्या जीन डिच यांनी कोणत्या कार्टून मालिकेचे दिग्दर्शन केले होते?
उत्तर : टॉम अँड जेरी

▪️ कोविड-19 याच्या संदर्भात संपूर्ण माहिती प्रदान करण्यासाठी कोणत्या संस्थेनी ‘कोविड FYI’ संकेतस्थळ तयार केले?
उत्तर : IIM कोझिकोड

▪️ कोणते राज्य कोविड19 जलद चाचणी पद्धतीचा अवलंब करणारे देशातले पहिले राज्य ठरले?
उत्तर : राजस्थान

▪️ कोणत्या राज्य सरकारचा ‘आयू’ अॅपसोबत करार झाला आहे?
उत्तर : राजस्थान

▪️ कोणत्या कंपनीने “प्लाझ्मा बॉट” उपकरण तयार केले?
उत्तर : मायक्रोसॉफ्ट

▪️ ‘जिओटॅग’ प्राप्त सामुदायिक स्वयंपाकगृह असलेले देशातले पहिले राज्य कोणते आहे?
उत्तर : उत्तरप्रदेश

देशातील पहिला कचरा कॅफे

👉 अंबिकापूर (छत्तीसगड)

👉 हेतू-- शहर प्लॅस्टिकमुक्त करणे

👉 नागरीकांना 1kg प्लॅस्टिक कचऱ्याच्या बदल्यात अन्न पुरविणे

👉 घोषवाक्य-- "More the waste better the taste"

💐  राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय 💐

👉 ठिकाण-- लोथल, गुजरात

👉 लिस्बन, पोर्तुगाल येथील नेव्ही म्युझियम च्या धर्तीवर अंमलबजावणी      

👉केंद्रीय नौकावहन मंत्रालय (सागरमाला  प्रकल्पांतर्गत)

👉 भारत आणि पोर्तुगाल यांच्या सहकार्याने उभारणी

👉मार्च 2019 पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी

👉लोथल-- प्राचीन हडप्पा संस्कृतीतील एक बंदर

भाषेतील रस

🌿रसाचा शब्दश: अर्थ ‘चव’ किंवा ‘रुची’ असा आहे. व्यवहारात गोड, आंबट, खारट, तुरट, तिखट व कडू असे सहा रस आहेत. या सहा रसांमुळेच आपणास पदार्थांची गोडी किंवा चव  कळते. यालाच आपण रसास्वाद म्हणतो.  

🌿साहित्य वाचल्याने, ऐकल्याने किंवा पाहिल्याने मानवी अंत:करणातील भावना उद्दीपित होतात व रसानिर्मिती होते.  

🌿मानवी मनात काही भावना कायमच्या वास करीत असतात उदा. प्रेम करण्याची, रागावण्याची, हसण्याची, दु:खाची, पराक्रमांची इ. या मनातील ‘स्थिर’ व ‘शाश्वत’ भावनांनाच काव्यशास्त्रात ‘स्थायीभाव’ असे म्हणतात.     

🌿साहित्य कृतीच्या वाचनाने ‘स्थायी भाव’ जागृत होतात व रसनिर्मिती होते.   

🌾🌾१) स्थायीभाव - रती       

🌷🌷रसनिर्मिती – शृंगार🌷🌷

हा रस कुठे आढळतो - स्त्री-पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून किंवा आकर्षणाच्या वर्ननातुन 

उदा –

डोळे हे जुलमी गडे रोखुनी मज पाहु नका.      

२) स्थायीभाव – उत्साह 

🌷🌷रसनिर्मिती - वीर🌷🌷    

हा रस कुळे आढळतो - पराक्रम, शौर्य, धीरोदात्त प्रसंग यांच्या वर्णनात

उदा.

‘शुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती’

🌷🌷३) स्थायीभाव –शोक🌷🌷

रसनिर्मिती – करुण

हा रस कुठे आढळतो - दुख, वियोग, संकट यांच्या वर्णनात   

उदा –

आई म्हणोनि कोणी, आईस हाक मारी, ती हा

४) स्थायीभाव – क्रोध

🌷🌷रसनिर्मिती – रौद्र  🌷🌷      

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन           

उदा –

मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.      

४) स्थायीभाव – क्रोध

🌷🌷रसनिर्मिती – रौद्र     🌷🌷   

हा रस कुळे आढळतो – क्रोध, चीड किंवा रागाचे वर्णन           

उदा –

मनिषाच्या त्या वर्तनाकडे आई डोळे वटारून पाहत होती.    

५) स्थायीभाव – हास      

🌷🌷रसनिर्मिती – हास्य🌷🌷

हा रस कुठे आढळतो - विसंगती, असंबध्द भाषण, विडंबन,चेष्टा यांच्या वर्णनात.  

उदा –

मानसीच पेपर लिहिताना लक्ष विचलित होऊ नये म्हणून रश्मी बरोबर अडीच तास आठ दिवस भजी तळत बसायची.        

६) स्थायीभाव – भय

🌷🌷रसनिर्मिती- भयानक   🌷🌷        

हा रस कुळे आढळतो - युद्ध, मृत्यु, खून, सूड, राक्षस, स्मशान इ. च्या वर्णनात.         

उदा.

तो गुरासारखा ओरडला त्याचे सारे रक्त उलथे पालथे झाले व त्याने जोरात किंकाळी फोडली.     

७) स्थायीभाव – जुगुप्सा      

🌷🌷रसनिर्मिती – बीभत्स🌷🌷

हा रस कुठे आढळतो - किळस, वीट, तिटकारा इ. च्या वर्णनात.  

उदा – 

मुंबईचा कामगार चाळीतल्या दहा बाय बाराच्या घरात, कचऱ्याच्या ढिगाऱ्याशेजारी, ओकारी आणणाऱ्या दुर्गधीत आयुष्यभर खितपत पडलेला असतो.  

८) स्थायीभाव – विस्मय 

🌷🌷रसनिर्मिती- अदभुत   🌷🌷     

हा रस कुठे आढळतो - आश्चर्यकारक गोष्टींच्या वर्णनात 

उदा –

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला चंदेरी सोनेरी चमचमता चांगला.   

९) स्थायीभाव – शम (शांती)        

🌷🌷रसनिर्मिती – शांत   🌷🌷

हा रस कुळे आढळतो - परमेश्वर विषयक भक्ती भाव असलेली गांणी किंवा वातावरणात.           

उदा –

सर्वात्मका शिवसुंदरा, स्वीकार या अभिवादना, तिमिरातुनि तेजाकंडे प्रभू आमच्या ने जीवंना !

भारत सरकार कायदा 1858

👉 कंपनीच्या ताब्यातील सर्व प्रदेश व त्यासंबंधी सर्व अधिकार इंग्लंड च्या राजसत्तेला.

👉 Board of directors व board of control बरखास्त.

👉 भारतमंत्री हे पद निर्माण केले, व त्याला सल्ला देण्यासाठी 15 सदस्यांचे इंडिया कौन्सिल. (8 सदस्य राजसत्तेकडून व 7 सदस्य कंपनीच्या संचालकांकडून)

👉 भारत मंत्री व इंडिया कौन्सिल चे वेतन व ऑफिस खर्च भारताच्या तिजोरीवर.

👉  कौन्सिल चा सल्ला भारतमंत्र्यावर बंधनकारक नाही. (अपवाद - वित्तव्यवस्थेसंबंधी सर्व निर्णय)

👉 गव्हर्नर जनरल हा राणीचा व्हाइसरॉय म्हणून काम करेल.

👉 कोणत्याही लष्करी मोहिमांवर भारताच्या उत्पन्नातून खर्च करण्याची परवानगी ब्रिटिशांना.

शब्दांच्या शक्ती

🌿अभिधा ( वाच्यार्थ )

अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला अभिधा असे म्हणतात. या अभिधा शक्तीच्या सहाय्याने प्रगट होणा-या अर्थास वाच्यार्थ असे म्हणतात.  

उदाहरणार्थ   

१) साप मारायला हवा.  

२) मी एक लांडगा पाहिला.  

३) आमच्याकडे एक अमेरिकन कुत्रा आहे.  

४) बाबा जेवायला बसले.  

५) घरात फार जळवा झाल्या आहेत.  

६) आम्ही गहू खरेदी केला.     

🌷🌷व्यंजना (व्यंगार्थ) 🌷🌷     

मूळ अर्थाला बाधा न आणता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती असते तिला व्यंजना असे म्हणतात. या शक्तीने प्रकट होणा-या अर्थाला व्यंगार्थ असे म्हणतात.  

उदाहरणार्थ      

१) समाजात वावरणारे असले साप ठेचून काढले पाहिजेत.         

२) भुंकणारे कुत्रे चावत नसतात.       

३) निवडणुका आल्या कि कावळ्याची कावकाव सुरु होते.         

४) समाजातील असल्या जळवा वेळीच नष्ट केल्या पाहिजेत.        

५) घड्याळाने पाचचे ठोके दिले.     

🌷🌷लक्षणा (लक्षार्थ)   🌷🌷

शब्दाच्या मूळ अर्थाला बाधा येत असेल तर त्याला जुळेलसा दुसरा अर्थ घ्यावा लागतो, शब्दाच्या या शक्तीस लक्षणा शक्ती असे म्हणतात व या शक्तीमुळे प्रगट होणा-या अर्थास लक्षार्थे असे म्हणतात.  

ज्या शब्दशक्तीमध्ये शब्दांचा मूळ अर्थ लक्षात न घेता, त्याच्याशी सुसंगत असा दुसराच अर्थ घ्यावा लागतो. मनात शंका येते, हे कसे शक्य आहे तेव्हा ती शब्द लक्षणा असते.         

उदा.              

आम्ही ज्वारी खातो.  

याचा अर्थ आम्ही ज्वारीपासून केलेले पदार्थ खातो. शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्याला साजेसा जो दुसरा अर्थ घेतला जातो त्याला ‘लक्ष्यार्थ’ म्हणतात.    

उदाहरणार्थ          

1) बाबा ताटावर बसले.      

2) घरावरून हत्ती गेला.       

3) आम्ही आजकाल ज्वारी खातो.  

4) मी शेक्सपिअर वाचला.          

5) सूर्य बुडाला.        

6) पानिपतावर सव्वा लाख बांगड्या फुटल्या. 

 

🌿🌿शब्दसिद्धी 🌿🌿

शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.       

शब्दांचे दोन प्रकार आहेत.      

१) सिद्ध शब्द  

२) साधित शब्द       

🌷🌷१) सिद्ध शब्द :-        

शब्द जसा आहे तसाच त्याचा भाषेत उपयोग केला म्हणजे त्या शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात.      

सिद्ध, साधित, उपसर्ग, प्रत्यय जा, ये, कर, बस, बोल, पी यासारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात.           

उदा.

ये, जा, पी, उठ, कर, गा इ.            

🌷🌷सिद्ध शब्दांचे चार प्रकार पडतात पुढीलप्रमाणे :-🌷🌷   

अ) तत्सम शब्द -          

जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात. 

उदाहरणार्थ           

कवि, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, पुष्प, जल, प्रीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्यवान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामती, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नी, नदी, कमल इत्यादी       

🌷🌷आ) तद्भव शब्द -    

जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना ' तद्भव शब्द' असे म्हणतात.

उदाहरणार्थ  

कान, चाक, आग, पान, विनंती, घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दुध, घास, कोवळा, ओठ, घाम, काम, इत्यादी     

🌷🌷इ) देशी किंवा देशज शब्द -     

महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.    

उदाहरणार्थ       

झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकुण, कंबर इत्यादी. 

🌷🌷ई) परभाषीय शब्द –  

संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.

याचे दोन उपप्रकार पडतात.      

अ. परकीय किंवा विदेशी शब्द  

ब. स्वदेशी शब्द (परप्रांतीय भारतीय शब्द)

🌷🌷अ) परकीय किंवा विदेशी शब्द

🌿इंग्रजी शब्द –       

टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, सर, म्याडम, ऑफीस, ट्रेन, रेल्वे, बस, टिकीट, इयव्हर, मोटर, कडक्टर, स्टेशन, पोस्ट, कार्ड, पार्सल, नर्स, डॉक्टर, पेशंट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पैंट, बटन, बट, बॉल, ड्रेस, ग्लास इत्यादी. 

🌿पोर्तुगीज शब्द –     

बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, कोबी, हापूस, फणस इत्यादी. 

🌿फारसी शब्द –      

खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडणवीस इत्यादी.                

🌿अरबी शब्द –

अर्ज, इनाम, हुकूम, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, वाद, मदत, बदल इत्यादी   

🌷🌷ब. स्वदेशी शब्द ( परप्रांतीय भारतीय शब्द ) 

🌿कानडी शब्द –    

तूप, कुंची, हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ इत्यादी    

🌿गुजराती शब्द –   

घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा इत्यादी     

🌿तामिळी शब्द –

चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा इत्यादी    

🌿तेलगु शब्द –

ताळा, शिकेकाई, अनरसा, किडूकमिडूक, बंडी, डबी इत्यादी

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

1 बायबलचा बंगाली भाषेत कोणी अनुवाद केला
उत्तर विल्यम वोर्ड

2 जॉर्ज मार्शमेनने कोणत्या भारतीय भाषेतील विश्वकोष तयार केला
उत्तर बंगाली भाषा

3 चार्ल्स विलकिन्सने गीता ग्रंथाचा इंग्रजीत अनुवाद केला तर त्यास कोणी प्रस्तावना लिहली
उत्तर हेस्टिंग्ज

4 बनारस येथे संस्कृत कॉलेजची स्थापना कोणत्या ब्रिटिश व्यक्तीने केली
उत्तर जोनाथन डांकण

5 राजाराम मोहनराय व राधकांत देव यांनी 1817 ला हिंदू कॉलेजची स्थापना केली त्यासाठी त्यांना कोणत्या ब्रिटिश व्यापाऱ्याने मदत केली
उत्तर डेव्हिड हेअर

6 कोणत्या चार्टर ऍक्ट नुसार भारतातील शिक्षणाची जबाबदारी ब्रिटिश कंपनीवर टाकण्यात आली
उत्तर 1813 चा ऍक्ट

7 कोन्सिल ऑफ एज्युकेशन चक्र स्थापना कोणत्या साली करण्यात आलीं
उत्तर 1842

8 1857 ला संपूर्ण भारतात किती महाविद्यालये होती
उत्तर 27

9 1857 ला भारतात कोणत्या दोन ठिकाणी इंजिनेरींग कॉलेज कार्यरत होती
उत्तर रुरकी व कलकत्ता

10 थॉमस रॅले आयोग कोणत्या साली नियुक्त केला होता
उत्तर 1902

१) निती आयोगामार्फत कोणत्या राज्यात ईशान्य शाश्वत विकास ध्येय परिषद २०२० चे आयोजन करण्यात आले ?
अ) त्रिपुरा
ब) सिक्किम
✓क) आसाम
ड) महाराष्ट्र

२) रिझर्व्ह बँकेचे आणि सरकारचे वित्त वर्ष कोणत्या वर्षांपासून एकच असणार आहे ?
✓अ) २०२० - २१ पासून
ब) २०२१ - २२ पासून
क) २०२२ - २३ पासून
ड) २०२४ - २५ पासून

३) देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थापन करण्यात आले आहे ?
अ) पुणे
ब) कोल्हापूर
क) अहमदनगर
✓ड) नागपूर

४) सबका साथ सबका विकास या चर्चित पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?
✓अ) विजय प्रतापसिंह
ब) मनोहर मनोज
क) संदीप मिश्रा
ड) राम हूजा

५) अजय वाॅरियर हा लष्करी सैन्याभ्यास कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडला ?
✓अ) भारत - ब्रिटन
ब) भारत - अमेरिका
क) भारत - चीन
ड) यापैकी नाही

______________________________
🟣 देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ................... होय.

1) राज्य विधिमंडळ 
2) कार्यकारी मंडळ   
3) संसद ✔️✔️   
4) न्यायमंडळ

_______________________________
🔵 सनदी सेवकांना ........................ बनण्याची परवानगी नाही.

1) संसद सदस्य     ✔️✔️
2) मुख्य निर्वाचन आयुक्त   
3) विद्यापीठाचे कुलगुरू   
4) चौकशी आयोगाचे प्रमुख

_______________________________
🟡 घटनेच्या कलम 82 मधील सध्याच्या तरतूदीप्रमाणे, राज्या-राज्यांमध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षानंतर होऊ शकते ?

1) 2016   
2) 2021     
3) 2026  ✔️✔️   
4) 2031

_______________________________
🟠 विधान अ : भारतात राज्यसभेचे सदस्य अप्रत्यक्ष पद्धतीने निवडले जातात.
कारण ब : राज्यसभा लोकांपेक्षा राज्यांचे प्रतिनिधित्व करते.

1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही✔️✔️.
3) अ हे बरोबर आहे, ब हे चूक आहे.
4) अ हे चूक आहे पण ब हे बरोबर आहे.

_______________________________
🔴 राष्ट्रपती खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातून राज्यसभेच्या सदस्यांची नियुक्ती करतात ?

1) वाङमय, शास्त्र, कला आणि समाज सेवा ✔️✔️
2) शास्त्र, तंत्रज्ञान, कला आणि समाज सेवा
3) समाजशास्त्रे, संगीत, क्रीडा, कला
4) समाजशास्त्रे, नृत्य, संगीत, क्रीडा
_______________________________

1)"जय जवान जय किसान' ही घोषणा
ह्यांनी......दिली.(कृषी सेवक AR P1 2018)
A. लालबहादूर शास्त्री
C. गुलजारीलाल नंदा
B. जवाहरलाल नेहरू
D. मोरारजी देसाई

उत्तर : लालबहादूर शास्त्री
=========================
2) भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षात सुरू करण्यात आले?
(नगरपरिषद प्र.सं.पूर्व परीक्षा PRELIM - 3_P7 2018)

A. 1937
B. 1939
C. 1941
D. 1942
उत्तर : 1942
=========================
3)आर्य समाजाची स्थापना कुणी केली ?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P6 - 2018)
B. स्वामी विवेकानंद
D. स्वामी दयानंद सरस्वती
A. लाला लजपत राय
C. श्री ओरबिंदो
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती
=========================
4)"स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि
तो मी मिळवणारच" हे घोषवाक्य कोणी म्हटले?
(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)

A. बद्रुदीन तैय्यबजी
C. विनायक दामोदर सावरकर
B. बाळ गंगाधर टिळक
D. दादाभाई नौरोजी
उत्तर : बाळ गंगाधर टिळक

=========================
5)खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्राशी संबंधित नाही?(राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P2 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी
=========================
6)जय जवान जय किसान' या घोषवाक्याची रचना ......... द्वारे केली गेली. (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 -2018)
A. बिपिन चंद्र पाल
B. लालबहादूर शास्त्री
C. जवाहरलाल नेहरू
D. विनोबा भावे

उत्तर : लालबहादूर शास्त्री
=========================
7)भारत छोड़ो चळवळ........साली सुरू करण्यात आली होती? (राज्य गुप्त वार्ता विभाग SID - P1 - 2018)
A. 1930
B. 1919
C. 1942
D. 1945

उत्तर : 1942
=========================
8) बॉम्बे येथे 'आर्य समाजाची' स्थापना कोणी केली होती ?(कृषी सेवक KS - P5 -2019)
A. ज्योतिबा फुले
B. दयानंद सरस्वती
C. मुळ शंकर
D. एम. जी. रानडे

उत्तर : दयानंद सरस्वती
=========================
9) "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणारच!" हे लोकप्रिय घोषवाक्य.......यांचे  आहे.

(महाराष्ट्र गृहनिर्माण विभाग Peon - P1 2018)

A. रवींद्रनाथ टागोर
B. राजाराम मोहन रॉय
C. बाळ गंगाधर टिळक
D. मोहनदास गांधी

उत्तर : बाळ गंगाधर टिळक
=========================
10)खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही? (अन्न पुरवठा निरीक्षक SI - P8 - 2018)

A. कुचीपुडी
B. लावणी
C. तमाशा
D. पोवाडा

उत्तर : कुचीपुडी
=========================

१) पहिल्या खेलो इंडिया विद्यापीठ क्रिडा स्पर्धा २०२० मध्ये किती वर्षांखालील खेळाडूंना स्थान देण्यात आले होते ?
अ) २५ वर्षांखालील ✅✅
ब) १७ वर्षांखालील
क) २३ वर्षांखालील
ड) २१ वर्षांखालील

२) शून्य भेदभाव दिन कधी साजरा केला जातो ?
अ) ५ मार्च
ब) १ मार्च ✅✅
क) ६ मार्च
ड) २ मार्च

३) खालीलपैकी कोणाची केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे ?
अ) डॉ. राजीव कुमार
ब) सुनील अरोरा
क) सामंत गोयल
ड) विमल जुल्का ✅✅

४) मिताग नावाचे चक्रीवादळ आॅक्टोबर २०१९ मध्ये कोणत्या देशात आले होते ?
अ) तैवान ✅✅
ब) चीन
क) जपान
ड) रशिया

५) मिशन इंद्रधनुष्य खालीलपैकी कशाशी संबंधित आहे ?
अ) जलसंवर्धन
ब) जलसिंचन
क) लसीकरण ✅✅
ड) कृत्रिम पाऊस