● अकलोली ठाणे
● उनकेश्वर
● उनपदेव
● उन्हेरे
● गणेशपुरी
● खेड (रत्नागिरी)
● तुरळ
● देवनवरी
● राजवाडी
● राजापूर
● वज्रेश्वरी
● सव
● सातिवली
● सुनपदेव
● पाली
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
● अकलोली ठाणे
● उनकेश्वर
● उनपदेव
● उन्हेरे
● गणेशपुरी
● खेड (रत्नागिरी)
● तुरळ
● देवनवरी
● राजवाडी
● राजापूर
● वज्रेश्वरी
● सव
● सातिवली
● सुनपदेव
● पाली
1) प्रश्न :- भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- रामनाथ कोविंद (14 वे)
2) प्रश्न :- भारताचे सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर :- वैकय्या नायडू (13 वे)
3) प्रश्न :- भारताचे सध्याचे पंतप्रधान कोण आहेत?
उत्तर :- नरेंद्र दामोदरदास मोदी (15 वे)
4) प्रश्न :- भारताचे सध्याचे गृहमंत्री कोण आहेत?
उत्तर :- अमित शहा (29 वे)
5) प्रश्न :- भारताचे सध्याचे संरक्षणमंत्री कोण आहेत?
उत्तर :- राजनाथ सिंग (27 वे)
6) प्रश्न :- सध्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- ओम बिर्ला (18 वे)
7) प्रश्न :- भारताचे सध्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
उत्तर :- निर्मला सीतारमन (23 वे)
8) प्रश्न :- सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायधिश कोण आहेत?
उत्तर :- शरद बोबडे (47 वे)
9) प्रश्न :- रिजर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) चे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत?
उत्तर :- शक्तीकांत दास (25 वे)
10) प्रश्न :- भारताचे चीफ ऑफ डिफेन्स कोण आहेत?
उत्तर :- जनरल बिपीन रावत
11) प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- अजित डोवाल
12) प्रश्न :- भारताचे उपराष्ट्रीय सुरक्षा सलहाकार कोण आहेत?
उत्तर :- दत्ता पडसलगीकर
13) प्रश्न :- सध्या भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत?
उत्तर :- पियुष गोयल
14) प्रश्न :- भारतात सध्या किती राज्य व केंद्रशासित प्रदेश आहेत?
उत्तर :- राज्य 28 केंद्रशासित प्रदेश 8
15) प्रश्न :- सध्या भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- सुनील अरोरा
16) प्रश्न :- महाराष्ट्रा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत?
उत्तर :- यु.पी.एस.मदान
17) प्रश्न :- सध्या भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
उत्तर :- लेह ( लदाख )
18) प्रश्न :- भारताचे थालसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- मनोज मुकुंद नरवाने
19) प्रश्न :- भारताचे वायुसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- आर.के.एस.भदौरिया
20) प्रश्न :- भारताच्या नौसेना चे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर :- एडमिरल कर्मबिर सिंह
१. भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना
उत्तर -1885
२. वंग-भंगआंदोलन (स्वदेशी चळवळ)
उत्तर- 1905
3.मुस्लिम लीगची स्थापना
उत्तर- 1906
4.कॉंग्रेसची फाळणी
उत्तर- 1907
5. होमरुल चळवळ
उत्तर 1916
6. लखनऊ करार
उत्तर- डिसेंबर 1916
7. मॉन्टग घोषणा
उत्तर -20 ऑगस्ट 1917
8. रोलेट कायदा
उत्तर-१ मार्च १९१९
9. जालियनवाला बाग हत्याकांड
उत्तर -13 एप्रिल 1919
10. खिलाफत आंदोलन
उत्तर -१९१९
११. हंटर समितीचा अहवाल प्रसिद्ध
उत्तर -18 मे 1920
१२. कॉंग्रेसचे नागपूर अधिवेशन
उत्तर - डिसेंबर 1920
13. असहकार चळवळीस प्रारंभ
उत्तर -1 ऑगस्ट 1920
14. चौरी-चौरा घोटाळा
उत्तर -5 फेब्रुवारी 1922
१.. स्वराज्य पक्षाची स्थापना
उत्तर- 1 जानेवारी 1923
16. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन
उत्तर - ऑक्टोबर 1924
17. सायमन कमिशनची नेमणूक
उत्तर -8 नोव्हेंबर 1927
18. सायमन कमिशनचा भारत दौरा
उत्तर -3 फेब्रुवारी 1928
19. नेहरू अहवाल
उत्तर- ऑगस्ट 1928
20. बार्डोली सत्याग्रह
उत्तर - ऑक्टोबर 1928
21. लाहोर पद्मंत्र प्रकरण
उत्तर -8 एप्रिल 1929
22. कॉंग्रेसचे लाहोर अधिवेशन
उत्तरः डिसेंबर १९२९ @BHAVIADHIKARI2020
23. स्वातंत्र्य दिनाची घोषणा
उत्तर -2 जानेवारी 1930
24. मीठ सत्याग्रह
उत्तर -12 मार्च 1930 ते 5 एप्रिल 1930
25. सविनय कायदेभंग आंदोलन
उत्तर -6 एप्रिल 1930
26. प्रथम गोलमेज परिषद
उत्तर-12 नोव्हेंबर 1930
27. गांधी-इरविन करार
उत्तर -8 मार्च 1931
28. दुसरी गोलमेज परिषद
उत्तर- 7 सप्टेंबर 1931
२९. जातीय निवाडा
उत्तर -16 ऑगस्ट 1932
30. पूणे करार
उत्तर - सप्टेंबर 1932
31. तिसरी गोलमेज परिषद
उत्तर-17 नोव्हेंबर 1932
32. कॉंग्रेस सोशलिस्ट पक्षाची स्थापना
उत्तर- मे 1934
फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना
उत्तर -१ मे १९३९
34. मोक्ष (salvation day)दिन
उत्तर -22 डिसेंबर 1939
35. पाकिस्तानची मागणी
उत्तर-24 मार्च 1940
36. ऑगस्ट ऑफर
उत्तर- 8 ऑगस्ट 1940
37. क्रिप्स मिशन प्रस्ताव
उत्तर- मार्च 1942
38. भारत छोडो प्रस्ताव
उत्तर -8 ऑगस्ट 1942
39. शिमला परिषद
उत्तर-25 जून 1945
40. नौदल बंड
उत्तर -19 फेब्रुवारी 1946
41. पंतप्रधान एटलीची घोषणा
उत्तर -15 मार्च 1946
.२. कॅबिनेट मिशनचे आगमन
उत्तर-24 मार्च 1946
43. प्रत्यक्ष कृती दिवस
उत्तर -16 ऑगस्ट 1946
44. अंतरिम सरकारची स्थापना
उत्तर -2 सप्टेंबर 1946
45. माउंटबॅटन योजना
उत्तर -3 जून 1947
46. स्वातंत्र्य प्राप्ती
उत्तर -15 ऑगस्ट 1947
प्रश्न: - स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तरः लॉर्ड माउंटबॅटन.
प्रश्नः भारताचा पहिला वायसराय कोण होता?
उत्तर: - लॉर्ड कॅनिंग.
प्रश्न: - भारताची प्रथम महिला राजदूत कोण होती?
उत्तर: - विजयालक्ष्मी पंडित.
प्रश्नः भारताच्या पहिल्या अणुभट्टीचे नाव काय?
उत्तर: - अप्सरा.
प्रश्न: - भारताची प्रथम महिला पायलट कोण होती?
उत्तर: - प्रेमा माथूर.
प्रश्न: - भारतीय वायुसेनेची प्रथम महिला पायलट?
उत्तर: - हरिता कौर देओल.
प्रश्न: - परमवीर चक्र प्राप्त करणारे भारतीय वायुसेनेचे पहिले अधिकारी?
उत्तर: निर्मलजीत सेखो.
प्रश्न: - भारताच्या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्षा?
उत्तर: - मीरा कुमार.
प्रश्नः भारताचे पहिले कम्युनिस्ट लोकसभा अध्यक्ष कोण होते?
उत्तर: - सोमनाथ चटर्जी.
प्रश्नः भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते?
उत्तर: - सुकुमार सेन.
प्रश्नः भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते?
उत्तर: - सरदार वल्लभभाई पटेल.
प्रश्नः भारताचे पहिले संरक्षणमंत्री कोण होते?
उत्तर: - सरदार बलदेव सिंह.
प्रश्न: - भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते?
उत्तर: - आर.के. षणमुखम चेट्टी.
प्रश्नः भारताचे पहिले केंद्रीय शिक्षणमंत्री कोण होते?
उत्तर: - मौलाना अबुल कलाम आझाद.
1)हातातोंडाची गाठ पडणे - कसेबसे खाण्यास मिळणे
2) गयावया करणे - केविलवाणी विनंती करणे
3)अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संतापणे
4)पगडा बसवणे - छाप, प्रभाव पाडणे
मूग गिळणे - अपमान सहन करुन गप्प राहणे
5)वाटाण्याच्या अक्षता लावणे - नाकारणे
6)कस्पटासमान लेखणे - क्षुल्लक, कमी दर्जाचे समजणे
7)नामानिराळा राहणे - अलिप्त राहणे
8)द्त्त म्हणून उभा राहणे - अचानक येणे
9)जन्माची माती होणे - जीवन व्यर्थ होणे
10)चारी मुंड्या चीत होणे - संपूर्ण पराभव होणे
11)सर्द होणे - वरमणे, थिजून जाणे
12)रामराम ठोकणे - निरोप घेणे
13)आकाशपाताळ एक करणे - फार आरडाओरडा करणे
14)कानामागून येऊन तिखट होणे - मागाहून येऊन वरचढ होणे
15) उमाळा येणे - तीव्र इछा होणे
16) वर्ज्य करणे - टाकणे
17) काडीमोड करणे - संबंध तोडणे
18) अहमहमिका चालणे - चढाओढ लागणे
19) अगतिक होणे - उपाय न चालणे
20) कां-कूं करणे - एखादी गोष्ट करण्यास तयार नसणे
21) आभाळ फाटणे - मोठे संकट येणे
22) इडापिडा टळणे - संकट जाणे
23) उतराई होणे - उपकार फेडणे
24) अंतर्मुख होणे - स्वत:शी विचार करणे
25) लकडा लावणे - सारखी घाई करणे
26) परिपाठ ठेवणे - सवय ठेवणे
27) ब्रह्मांड कोसळणे - मोठे संकट येणे
28)कागाळी करणे - तक्रार करणे
29) खांदा देणे - मदत करणे
30) खोबरे करणे - नाश करणे
31) गय करणे - क्षमा करणे
32) न्यूनगंड वाटणे - कमीपणा वाटणे
33) जीव मुठीत घेणे - फार घाबरणे
34) जीव ओतणे - मन लावून काम करणे
35) सुपारी देणे - आमंत्रण देणे
36) तोंडाला तोंड देणे - उद्धटपणे बोलणे
37) डोळे दिपणे - आश्चर्य वाटणे
38) नामोहरम होणे - पराभूत होणे
39) पदर पसरणे - याचना करणे
40) पाणउतारा करणे - अपमान करणे
41) वाली नसणे - रक्षणकर्ता नसणे
42) हात तोकडे पडणे - मदत करण्यास क्षमता कमी पडणे
43) हिरमुसले होणे - नाराज होणे
44) पांग फेडणे - इच्छा पूर्ण करणे
45) विटून जाणे - त्रासणे
46) डोके सुन्न होणे - काही न सुचणे
47) फडशा पाडणे - संपवणे
48) गोरेमोरे होणे - लाज वाटणे
49)आकशाला गवसणी घालणे - अशक्य गोष्ट करुन पाहणे
50)धिंडवडे निघणे - फजिती होणे
61) आटापिटा करणे - खूप कष्ट करणे
62)माया पातळ होणे - प्रेम कमी होणे
63) वाऱ्यावर सोडणे - काही न विचारणे
64)हातपाय गाळणे - धीर सोडणे
65) कागदी घोडे नाचवणे - कृतिशील
काम न करता कागदी पराक्रम गाजविणे
66) गुळणी फोडणे - स्पष्ट सांगणे
67)झाकड पडणे - अंधार पडणे
68)पोटात आग पडणे - खूप भूक लागणे
69)टोपी उडवणे - टवाळी करणे
70)पाणी पाजणे - पराभव करणे
71)वहिवाट असणे - रीत असणे
72)छी थू होणे - नाचक्की होणे
73)प्रादूर्भूत होणे - दिसू लागणे
74)दंडेली करणे - जबरदस्ती करणे
75)दिवा विझणे - मरण येणे
76)मूठमाती देणे - शेवट करणे
77) सुगावा लागणे - अंदाज लागणे
78)प्रतारणा करणे - फसवणूक करणे
79)डोक्यावर घेणे - कौतुक करणे
80)कानाशी लागणे - चहाडी करणे
81)किटाळ करणे - आरोप होणे
82)देव्हारे माजविणे - महत्व वाढविणे
83)हातावर तुरी देणे - फसविणे
84)बेगमी करणे - साठा करणे
85)सोन्याचा धूर निघणे - चांगली स्थिती येणे
आठ महत्वपूर्ण उद्योगांचा निर्देशांक ऑक्टोबर महिन्यात 5.8 टक्क्याने कमी होऊन 127 इतका राहिला. एप्रिल ते ऑक्टोबर 2019-20 दरम्यान एकत्रित वाढ 0.2 टक्के इतकी राहिली
✅ कोळसा ✅
ऑक्टोबर 2019 मध्ये कोळशाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 17.6 टक्क्याने घट झाली. एप्रिल ते ऑक्टोबर 2019 दरम्यान या क्षेत्राचा एकत्रित निर्देशांक गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.8 टक्क्याने कमी राहिला.
✅ खनिज तेल ✅
ऑक्टोबर 2019 मध्ये खनिज तेलाच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.1 टक्क्याने घट झाली.
✅ नसर्गिक वायू ✅
ऑक्टोबर 2019 मध्ये नैसर्गिक वायूच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 5.7 टक्क्याने घट झाली.
✅ रिफायनरी उत्पादने ✅
ऑक्टोबर 2019 मध्ये पेट्रोलियम रिफायनरी उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 0.4 टक्क्याने वाढ झाली.
✅ खते ✅
ऑक्टोबर 2019 मध्ये खतांच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 11.8 टक्क्याने वाढ झाली.
✅ पोलाद ✅
ऑक्टोबर 2019 मध्ये पोलाद उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 1.6 टक्क्याने घट झाली.
✅ सिमेंट ✅
ऑक्टोबर 2019 मध्ये सिमेंटच्या उत्पादनात ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 7.7 टक्क्याने घट झाली.
✅ वीज ✅
ऑक्टोबर 2019 मध्ये वीज निर्मितीत ऑक्टोबर 2018 च्या तुलनेत 12.4 टक्क्याने घट झाली.
नोव्हेंबर 2019 साठीच्या औद्योगिक निर्देशांक 31 डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल.
मंत्रिमंडळाचा आकार मर्यादित ठेवणे, सार्वजनिक पदे धारण करण्यापासून, पक्षांतर करणाऱ्यांना रोखणे आणि पक्षांतर बंदी कायदा बळकट करणे या उद्देशाकरिता पुढील तरतुदी केल्या.
1) प्रधानमंत्र्यासहित, केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या लोकसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये (अनु. ७५ क)
2) संसदेच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल (अनु. ७५ ‘१ख’)
3) मुख्यमंत्र्यांसहित, राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांची एकूण संख्या संबंधित राज्याच्या विधानसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक असू नये. परंतु मुख्यमंत्रासहित, एकूण मंत्र्यांची संख्या १२ पेक्षा कमी असू नये (अनु. १६४ ‘क’)
4) राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहापैकी कोणत्याही सभागृहातील, कोणत्याही राजकीय पक्षाच्या सदस्याला पक्षांतरामुळे अपात्र घोषित केले असेल तर तो व्यक्ती मंत्रीपदी नियुक्त होण्यास अपात्र असेल. (अनु. १६४ ‘१ख’)
5) संसदेच्या किंवा राज्यविधिमंडळाच्या सदस्यांपैकी, कोणत्याही पक्षाचा सदस्य असणाऱ्याला पक्षांतराच्या आधारे अपात्र घोषित केलेले असेल तर, तिला इतर कोणतेही मोबदला प्राप्त राजकीय पद भूषविता येणार नाही. मोबदला प्राप्त राजकीय पदे म्हणजे
केंद्र वा राज्य शासनाच्या अखत्यारीतील असे कोणतेही पद. जिला संबंधित शासनाच्या सार्वजनिक महसुलातून वेतन वा मोबदला दिला जातो.
एखाद्या संस्थांतर्गत वा मंडळांतर्गत पद, जिचा समावेश शासनामध्ये केलेला असेल आणि त्या पदासाठी ते मंडळ. संस्था वेतन वा मोबदला देत असेल (अपवाद, असे वेतन वा मोबदल्याचे स्वरूप नुकसान भरपाईचे असेल तर) (अनु. ३६१ ‘ख’)
6) १० व्या परिशिष्टामधील पक्षांतरबंदी कायद्यामध्ये तरतूद केली होती कि, विधिमंडळीय पक्षा पासून विभक्त झाल्यास ते पक्षांतरामुळे अपात्र ठरणार नाहीत. या घटनादुरुस्तीने ही तरतूद रद्द केली. याचाच अर्थ पक्षांतर करणाऱ्यांना फुटीचा आधार घेऊन कोणतेही संरक्षण उपलब्ध नाही.
1. पी हळद हो गोरी – उतावळेपणा दाखविणे
2. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही – प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय कळत नाही
3. बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर – दोनपैकी एक पर्याय निवडणे
4. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे – प्रत्येकाची वेळ कधीतरी येतेच
5. आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे – अपेक्षेपेक्षा जास्त प्राप्ती होणे
6. उंटावरचा शहाणा – मूर्ख सल्ला देणारा
7. अडला हरी गाढवाचे पाय धरी – अडचणीच्या वेळी मूर्खाचीही मनधरणी करावी लागते
8. नाचता येईना अंगण वाकडे – स्वत:स चांगले काम येत नसणारा दुसऱ्याचे दोष काढतो
9. तोंड दाबून बुक्क्यांचा मार – विनाकारण जुलूम सहन करावा लागणे
10. नावडतीचे मीठ अळणी – नावडत्याने काही चांगले केले तरी आवडत नाही
11. अंथरूण पाहून पाय पसरावे – ऎपत पाहून खर्च करवा
12. छत्तीसाचा आकडा – विरुद्ध मत असणे
13. तेरड्याचा रंग तीन दिवस – एखादे कार्य थोडे दिवस जोरात चालून एकदम बंद पडणे
14. दुष्काळात तेरावा महिना – संकटात अधिक भर
15. नव्याचे नऊ दिवस – नवेपणा असतानाचे कौतुक नंतर टिकत नही
16. एका हाताने टाळी वाजत नाही – दोष दोन्हीकडे असतो
17. पालथ्या घड्यावर पाणी – सर्व प्रयत्न निरुपयोगी ठरणे
18. वासरात लंगडी गाय शहाणी – अडाणी लोकात अल्प ज्ञान असणारा शहाणा ठरतो
19. रात्र थोडी सोंगे फार – काम भरपूर, वेळ कमी
22. अति शहाणा त्याचा बैल रिकामा – अति शहाणपणाने नुकसान होते
21. शेरास सव्वाशेर – प्रतिपक्षापेक्षा श्रेष्ठ
22. नाकाचा बाल – अत्यंत प्रिय व्यक्ती
23. नाकापेक्षा मोती जड होणे – डोईजड होणे
24. आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना – दोन्ही बाजूंनी अडचण
25. कामापुरता मामा – काम साधण्यापुरते गोड बोलणे
26. आधी पोटोबा मग विठोबा – अगोदर पोट भरावे मग देवास आळवावे
27. काखेत कळसा गावाला वळसा – वस्तू स्वत:पाशी असून शोधत राहणे
28. झाकली मूठ सव्वा लाखाची – दुर्गुण असले तरी प्रकट करू नयेत
29. पायीची वहाण पायी बरी – योग्यतेप्रमाणे वागवावे
30. मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये – एखाद्याच्या चांगुलपणाचा फार फायदा घेऊ नये
31. उंटावरून शेळ्या हाकणे – आळस, हलगर्जीपणा करणे
32. कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही – क्षुद्र माणसांच्या निंदेने थोरांचे नुकसान होत नाही
33. कोल्हा काकडीला राजी – लहान माणसे थोड्या गोष्टीने संतुष्ट होतात
34. गाढवाला गुळाची चव काय – अडाणी, मूर्ख माणसास गुणाचे कौतुक नसते
35. घोडामैदानजवळ असणे – परीक्षा लवकरच होणे
36. डोंगर पोखरून उंदीर कढणे – जास्त श्रम करून कमी फायदा होणे
37. भरंवशाच्या म्हशीला टोणगा – पूर्ण निराशा करणे
38. वरातीमागून घोडे – एखदी गोष्ट झाल्यावर तिची साधने जुळवणे
39. पाण्यात राहून माशाशी वॆर – बलवानाशी शत्रुत्व काय कामाचे ?
40. खायला काळ भुईला भार – ज्याचा काही उपयोग नाही असा माणूस भार बनतो
41. तेल गेले, तूप गेले, हाती धुपाटणे आले – दोन्ही फायदा करून देणाऱ्या गोष्टी मूर्खपणामुळे हातच्या जाणे
42. नाव मोठे लक्षण खोटे – कीर्ती मोठी पण कृती छोटी
43. हपापाचा माल गपापा – लोकांचा तळतळाट करून मिळवलेले धन झपाट्याने नष्ट होते
44. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ – आपल्याच हातून आपल्या जातभाईंचे नुकसान होणे
45. गर्जेल तो पडेल काय? – पोकळ बडबडणारा काही करून दखवत नाही
46. टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नही – कष्टाशिवाय यश मिळत नाही
47. वारा पाहून पाठ फिरवावी – वातावरण पाहून वागावे
48. कुंपणानेच शेत खाणे – रक्षणकर्त्यानेच नुकसान करणे
49. दगडावरची रेघ- कायमची गोष्ट
जागतिक आर्थिक मंच (WEF) -
➖सथापना: सन 1971 (01 जानेवारी);
➖मख्यालय: कोलोग्नी, स्वित्झर्लंड.
ग्रुप ऑफ 20 (जी-20) याची
➖ सथापना – सन 1999 (26 सप्टेंबर).
पश्चिम बंगाल राज्य -
➖ सथापना: सन 1950 (26 जानेवारी);
➖राजधानी: कोलकाता.
छत्तीसगड राज्य -
➖ सथापना: सन 2000 (01 नोव्हेंबर);
➖ राजधानी: रायपूर.
सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross domestic product -GDP) याची मूलभूत संकल्पना मांडणारे ब्रिटिश अर्थशास्त्री - विलियम पेटी.
भारतातले राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) याची
➖ सथापना – सन 1993 (12 ऑक्टोबर).
भारतातले केंद्रीय माहिती आयोग (CIC) याची
➖ सथापना – सन 2005 (12 ऑक्टोबर) (माहितीचा अधिकार कायद्यान्वये).
भारतात माहितीचा अधिकार (RTI) कायदा या साली लागू करण्यात आला – सन 2005 (15 जून).
ब्रिटीश भारतातली प्रथम पदवीधर महिला - कामिनी रॉय (बंगाली कवीयत्री, समाजसेवक आणि स्त्रीवादी).
प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.
डोळे (Eyes):
८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.
पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.
अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.
बुबुळ (Cornea):
नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.
बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.
दृष्टिपटल (Retina):
हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.
दृष्टीसातत्य :
वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.
दृष्टिदोष (Defects Of Vision):
दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.
१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Short-sightedness):
जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते. प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.
उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा.
२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):
दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात. डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.
उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा
३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):
बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो. त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात. हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.
उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.
४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):
वाढत्या वयामुळे होणार दोष दूरदृष्टीतेचा एक प्रकार समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.
उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.
🔸जम्मु आणि काश्मिर केंद्र शासित प्रदेश होण्याअगोदर ते राष्ट्रपतींच्या निवडणुकीत भाग घेत होते.
🔸आता मात्र ते राज्य नसुन केंद्र शासित प्रदेश आहे. त्यामुळे त्याचा समावेश या निवडणुकीत समावेश होत नाही.
🔸जर जम्मु आणि काश्मिरचा समावेश राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणात (Electrol college) करायचा असेल तर कलम 54 मध्ये घटनादुरुस्ती करावी लागेल.
🔸सविधान कलम 54 मध्ये राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणाची तरतुद आहे.
🔸70 वी घटनादुरुस्ती करुन ज्या प्रकारे “दिल्ली आणि पुदुचेरी” चा समावेश राष्ट्रपतींच्या निर्वाचण गणात केला तसा जम्मु आणि काश्मिरचा करावा लागेल.
🔸राष्ट्रपतींच्या निवडणुक पद्धतीत बदल करण्यासाठी 2/3 विशेष बहुमत व निम्या राज्यांची संमती लागेल.
🥇विजेतेपद - पी.व्ही.सिंधू🏆
🥈उपविजेतेपद - नोझोमी ओकूहारा (जपान)
★स्पर्धा स्थळ - बासेल , स्वित्झर्लंड
●21-7 , 21-7 अश्या 2 सरळ सेटमध्ये विजय
●1977 साली जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेस सुरुवात
●जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत विजेतेपद प्राप्त करणारी प्रथम भारतीय खेळाडू - पी.व्ही.सिंधू ठरली आहे.
●यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पी.व्ही.सिंधूचे यश
1. 2013 - 🥉कांस्यपदक
2. 2014 - 🥉कांस्यपदक
3. 2017 - 🥈रौप्यपदक
4. 2018 - 🥈रौप्यपदक
5. 2019 - 🥇सवर्णपदक
🏆भारतास जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत आजपर्यंत - 10 पदके
(त्यातील 5 पदके एकट्या पी.व्ही.सिंधुची)
🎖वयाच्या 24 वर्षी पी.व्ही.सिंधू 🏸बडमिंटन जागतिक अजिंक्यपदाची🏆 मानकरी ठरली आहे.
🔰सपत चाललेल्या जीवाश्म इंधनाला एक पर्याय म्हणून स्वच्छ ऊर्जेच्या पर्यायी स्रोतांचा शोध भारतीय भूप्रदेशात लागला आहे.
🔰विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असलेली आघरकर संशोधन संस्थेनी केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, कृष्णा-गोदावरी खोऱ्यात ‘मिथेन हायड्रेट’ साठ्याचा समृद्ध स्रोत आहे ज्यामुळे मिथेन या नैसर्गिक वायूचा पुरेसा पुरवठा होऊ शकतो.
🔴ठळक बाबी....
🔰मिथेन स्वच्छ आणि स्वस्त इंधन आहे.
अंदाजानुसार, एक क्युबिक मीटर मिथेन हायड्रेटमध्ये 160-180 क्युबिक मीटर मिथेन असते. त्यानुसार, खोऱ्यातला मिथेन हायड्रेटसचा अगदी कमी अंदाज केला तरी, ते जगातल्या जीवाश्म इंधन साठ्यांच्या तुलनेत दुप्पट आहे.
🔰खोऱ्यात आढळलेले मिथेन हायड्रेट साठे बायोजेनिक मूळ असलेले आहेत.हायड्रोजन-बंधित पाणी आणि मिथेन वायू सागरामध्ये उच्च दाब आणि कमी तापमानाला एकत्र आले असता मिथेन हायड्रेटची निर्मिती होते.
🔰मिथेन हायड्रेट म्हणून सांधलेल्या बायोजेनिक मिथेनची निर्मिती करणार्या मिथेनोजेन शोधून काढले गेले आहे, जे ऊर्जेचे महत्त्वपूर्ण स्रोत असू शकते.
🔴कष्णा-गोदावरी खोरे..
🔰20 हजार चौरस किलोमीटर एवढ्या भूमी क्षेत्रात तसेच बंगालच्या उपसागराच्या 24 हजार चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात 2000 किलोमीटर एवढ्या आईसोबाथ (पाण्याच्या खोलीच्या समसमान ठिकाणी जोडली जाणारी नकाशावरील रेषा) पर्यंत कृष्णा-गोदावरी खोरे विस्तारलेले आहे.
🔰हा एक क्रॅटॉनिक फॉल्ट भूभाग आहे तसेच ईशान्य-नैऋत्य फॉल्टद्वारे मर्यादित आहे, ज्याला वायव्येकडील प्रणाहिता-गोदावरी ग्रॅबेन आणि पश्चिमेस कुडप्पा खोरेपासून वेगळे करते.
» अंतरराष्ट्रीय ओझोन स्तर संरक्षक दिवस / अंतरराष्ट्रीय ओझोन दिवस
» 16 सप्टेंबर
» पासून - 1995
» 16 सप्टेंबर 1987 रोजी Montreal Protocol वरती सह्या झाल्या होत्या, या दिवसाचे स्मरण म्हणून आमसभेने 1994 मध्ये 16 सप्टेंबर हा ओझोन दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले.
» 2019 Theme: 32 Years And Healing
» 2020 Theme: Ozone for life : 35 years of ozone layer protection
◆ ओझोन म्हणजे काय ?
» ओझोन हा ऑक्सिजनचा एक विशेष प्रकार आहे, ज्याचे रासायनिक सूत्र O3 आहे. बहुतेक ओझोन वातावरणामध्ये पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 10 ते 40 कि.मी. पर्यंत उंचीवर असतो. या प्रदेशास स्ट्रॅटोस्फियर असे म्हणतात आणि त्यात वातावरणातील सर्व ओझोनपैकी 90% समाविष्ट असतो.
» 1913 साली चार्ल्स फॅब्रि आणि हेन्री बुइसन यांनी लावला.
» व्हिएन्ना कन्व्हेंशन (ओझोन संरक्षण) 1985 साली केले होते त्यास यावर्षी 35 वर्ष होत आहेत (अंमलबजावणी 1988)
टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध
आजच्याच दिवशी २१ वर्षांपूर्वी म्हणजेच १९९९ मध्ये भारताने पाकिस्तानविरुद्धच्या कारगिल युद्धात विजय मिळवला. त्याच निमित्ताने १९९९ च्या कारगिल युद्धात नक्की काय घडले यावर ‘लोकसत्ता डॉटकॉम’ने टाकलेली नजर…
🔰 भारत पाकिस्तान नियंत्रण रेषेवर असणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील कारगिल जिल्ह्यामध्ये भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यात मे, जून आणि जुलै असे तीन महिने युद्ध सुरु होते.
🔰 कारगिलमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेली घुसखोरी रोकण्यासाठी आणि त्यांनी काबीज केलेला प्रदेश पुन्हा ताब्यात घेण्यासाठी भारताने ऑप्रेशन विजयची सुरुवात केली.
🔰 टिव्हीवरून देशाने पाहिलेले कारगिल युद्ध हे पहिलेच युद्ध ठरले.
१९९९च्या कारगिल युद्धाचा घटनाक्रम….
🔰 म ४: कारगिलमधील उंच ठिकाणांवर पाकिस्तानी सैन्याने ताबा मिळवल्याची बातमी हाती आली.
🔰 म ५ ते मे १५: या दहा दिवसांमध्ये भारतीय लष्कराच्या तुकड्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सर्वेक्षण केले. यामध्ये कॅप्टन सौरभ कालिया बेपत्ता झाले. त्यांना पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेऊन छळ करुन ठार केल्याचे बोलले जाते.
🔰 म २६: भारतीय हवाई दलाने कारगिलमधील पाकिस्तानी सैन्याच्या छावण्यांवर हवाई हल्ले सुरु केले. श्रीनगर, अवंतीपूर आणि आदमपूर एअरबेसवरून मीग २१, मीग २३, मीग २७, जॅग्वार, मीरेज २००० या लडाकू विमानांनी पाकिस्तानी तळांवर बॉम्ब हल्ले केले.
🔰 म २७: भारतीय हवाई दलाचे मीग २७ विमानाला अपघात होऊन ते कारगिलमध्ये पडले. विमान कोसळण्याआधी पॅरेशूटच्या सहाय्याने विमानाबाहेर आलेल्या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने युद्ध कैदी म्हणून ताब्यात घेतले. त्यानंतर आठ दिवसांनी या वैमानिकाला पाकिस्तानी सैन्याने भारताच्या ताब्यात दिले.
🔰 म ३१: पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी कारगिलमध्ये ‘युद्धसदृश्य परिस्थिती’ असल्याची माहिती दिली.
🔰 जन १०: पाकिस्तानने छिन्नविछिन्न अवस्थेतील विटंबना केलेल्या सहा भारतीय जवानांचे मृतदेह भारताच्या ताब्यात दिले. हे मृतदेह कॅप्टन सौरभ कालिया आणि त्यांच्या टीममधील सैनिकांचे होते. ही टीम पाकिस्तानने कारगिलमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त हाती आल्यानंतर सर्वेक्षणासाठी गेली होती.
🔰 जन १२: दिल्लीमध्ये दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक निष्फळ ठरली. भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग आणि पाकिस्तानचे परराष्ट मंत्री सरताज अजीज यांची भेट दिल्लीत झाली. मात्र चर्चेनंतर पाकिस्तानने आडमुठी भूमिका घेत भारतालाच घुसखोरांनी परत जायला हवे असे सांगितले.
🔰 जन १५: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना कारगिलमधून सैन्य मागे घेण्याची विनंती केली
🔰 जन २९: भारतीय लष्कराने टायगर हिल्स प्रदेशातील दोन महत्वाच्या चौक्या ताब्यात घेतल्या.
🔰 जलै ४: संपूर्ण टायगर हिल्स प्रदेशावर भारतीय लष्कराने ताबा मिळवला. भारतीय लष्कराच्या तीन तुकड्यांनी १८ ग्रेनेडियर्स, २ नागा आणि ८ शिख बटालियनने या प्रदेशात जोरदार गोळीबार करुन हा प्रदेश ताब्यात घेतला. अमेरिकेत वॉशिंग्टनमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांची भेट घेतली
🔰 जलै ५: शरीफ यांनी पाकिस्तान कारगिलमधून सैन्य मागे घेत असल्याची घोषणा केली
🔰 जलै ११: पाकिस्तानने कारगिलमधून सैन्य मागे घेण्यास सुरुवात केली
🔰 जलै १४: भारताने ऑप्रेशन विजय यशस्वी झाल्याची घोषणा केला
🔰 जलै २६: कारगिल युद्धाच्या संपल्याची औपचारिक घोषणा केली.
♾निकाराग्वा हा आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) या सौर ऊर्जा निर्मिती क्षेत्रातल्या आंतरराष्ट्रीय भागीदारीमध्ये औपचारीकपणे सहभागी होणारा 87 वा देश ठरला आहे.
♾ दशाच्या प्रतिनिधींनी 22 जुलै 2020 रोजी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली.
🔺आतरराष्ट्रीय सौर युती (ISA) विषयी.
..
♾2015 साली स्वीकारण्यात आलेल्या पॅरिस हवामान करारनाम्याच्या पार्श्वभूमीवर चालवला जाणारा आंतरराष्ट्रीय सौर युती (International Solar Alliance -ISA) कार्यक्रम हा सर्वसामन्यांना स्वच्छ आणि स्वस्त ऊर्जा उपलब्ध करून देण्यासाठी भारत आणि फ्रान्स या देशांच्या पुढाकाराने चालू करण्यात आलेला एक जागतिक उपक्रम आहे. भारतात हरयाणाच्या गुडगाव इथल्या राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE, गवलपहारी) येथे ISAचे मुख्यालय आणि अंतरिम सचिवालय आहे. ही भारतातली पहिली आंतरराष्ट्रीय व आंतर-सरकारी संघटना आहे.
♾पतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकोईस हॉलंड यांनी आंतरराष्ट्रीय सौर युती (ISA) याची स्थापना 30 नोव्हेंबर 2015 रोजी केली. आतापर्यंत 121 संभाव्य सदस्य देशांपैकी 87 देशांनी ISAच्या कार्यचौकटीच्या संदर्भात असलेल्या करारावर स्वाक्षरी केली आहे. त्यापैकी 58 देशांनी त्याला मान्यता दिली आहे.
🔺निकाराग्वा देश...
♾निकाराग्वा हा मध्य अमेरिका उपखंडातला सर्वात मोठा देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेला होन्डुरास व दक्षिणेला कोस्टा रिका हे देश, पूर्वेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे.
♾मानाग्वा ही निकाराग्वाची राजधानी आहे. कोर्डोबा हे देशाचे राष्ट्रीय चलन आहे.
📛भारत सरकारच्या नौवहन मंत्रालयाने दक्षिण-पश्चिम (नैऋत्य) भारतीय जलमार्गातील व्यापारी व मासेमारी करणाऱ्या जहाजांचे कार्यान्वित मार्ग वेगळे केले आहेत. नवीन मार्ग 1 ऑगस्ट 2020 पासून कार्यान्वित होतील.
📛भारताच्या दक्षिण-पश्चिम किनाऱ्याभोवती असलेला अरबी समुद्र हा एक व्यस्त समुद्री मार्ग असून या ठिकाणी मोठ्या संख्येने व्यापारी जहाजे ये-जा करीत असतात तसेच मासेमारी करणारी जहाजे देखील काम करीत असतात. यामुळे काहीवेळा अपघात घडतात; परिणामी जीवितहानी, मालमत्तेचे नुकसान आणि पर्यावरणीय प्रदूषण होते.
♻️ठळक बाबी...
📛जलवाहतूकीची सुरक्षा व कार्यक्षमता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
📛धडक होण्यापासून बचाव, समुद्रावरील जीवनाच्या सुरक्षेसह वाहतूकीचा प्रवाह सुलभ करणे, तसेच सागरी वातावरणाचे संरक्षण वाढविणे, या बाबी देखील यामुळे सुनिश्चित होणार.नौवहन महासंचलनालयाचे हे एक अतिशय सक्रिय व सकारात्मक पाऊल आहे, जे या प्रदेशातील नौवहनाचे कार्यक्षमतेने नियमन करणार आहे.
💠भारताने नव्या ‘ध्रुवास्त्र’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली आहे. हे क्षेपणास्त्र पूर्णपणे स्वदेशी निर्मित म्हणजेच मेड इन इंडिया आहे. हे क्विक रिस्पॉन्स देणारे क्षेपणास्त्र आहे.
💠'ध्रुवास्त्र' क्षेपणास्त्राची चाचणी ओडीशाच्या बालासोर चाचणी क्षेत्रात घेण्यात आली. ही चाचणी हेलिकॉप्टर-विना घेण्यात आली.
🔆ठळक वैशिष्ट्ये....
💠धरुवास्त्र क्षेपणास्त्राचा वापर भारतीय भुदलाकडील ध्रुव हेलिकॉप्टरसोबत तसेच भूमीवरून केला जाऊ शकतो.
💠या क्षेपणास्त्राचा मारा पल्ला चार किलोमीटर ते सात किलोमीटर पर्यंत आहे.
💠ह स्वयंचलितपणे मार्गक्रम करणारे म्हणजेच गाइडेड रणगाडा-भेदी क्षेपणास्त्र आहे. हे तिसऱ्या पिढीचे क्षेपणास्त्र आहे.
💠या क्षेपणास्त्राची लांबी 1.9 मीटर आहे आणि व्यास 0.16 मीटर आहे. त्याचे वजन 45 किलोग्रॅम आहे.हे क्षेपणास्त्र 240 मीटर / सेकंद या गतीने प्रवास करू शकते.
💠सरक्षण संशोधन व विकास संघटना (DRDO) यांनी तयार केलेल्या या क्षेपणास्त्राचे नाव आधी ‘नाग’ असे होते; जे नंतर बदलण्यात आले.
💠हलिकॉप्टरमार्फत सोडल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या आवृत्तीला “हेलीकॉप्टर-लॉंच्ड NAG (HELINA / हेलीना)” असे नाव देण्यात आले आहे.
🌼रल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक असलेले अरुण कुमार यांची पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या आंतरराष्ट्रीय रेल्वे संघाच्या (UIC) सुरक्षा विभागाचे उपाध्यक्ष पदावर निवड करण्यात आली आहे. UICच्या 96व्या महासभेच्या वेळी हा निर्णय घेण्यात आला.
🌼ही नियुक्ती दोन वर्षांच्या कार्यकाळासाठी झाली आहे म्हणजेच जुलै 2022 ते जुलै 2024 पर्यंत ते पदावर असणार.
🍂आतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) विषयी...
🌼आतरराष्ट्रीय रेल्वे संघ (UIC) याची स्थापना 1922 साली झाली आणि त्याचे मुख्यालय फ्रान्स देशाची राजधानी पॅरिस या शहरात आहे. संघाची उद्दिष्टे तीन स्तरांनुसार परिभाषित केली गेली आहेत; ते आहेत –धोरणात्मक, तांत्रिक/व्यवसायिक आणि समर्थन सेवा.
🌼वर्तमानात इटलीचे जियान्लुइगी कॅस्टेली संघाचे अध्यक्ष आहेत आणि फ्रान्सिओस डेवेन्न महासंचालक आहेत.
🌼UIC संघाचा सुरक्षा विभाग रेल्वे क्षेत्रातली मालमत्ता, स्थापना आणि सुरक्षा यांच्या संबंधित सर्व बाबींसाठी विश्लेषण आणि धोरणे निश्चित करते आणि ते विकसित करण्याचे अधिकार ठेवतो. या व्यासपीठाद्वारे सदस्यांमध्ये माहितीची आणि अनुभवांची देवाणघेवाण होते आणि सुरक्षेला प्रोत्साहन दिले जाते.
- मध्यवर्ती, परिघिय आणि स्वायत्त चेतासंस्था असे तीन प्रकार आहेत.
- मेंदू आणि मेरूरज्जू यांनी मध्यवर्ती चेतासंस्था तयार होते.
● मानवी मेंदू
- चेतासंस्थेचे नियंत्रण करणारा प्रमुख भाग
- प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन 1300 ते 1400 ग्रॅम इतके असते
- 100 अब्ज चेतापेशींपासून मेंदूची निर्मिती
- मेंदूच्या डाव्या बाजूची कार्ये: संभाषण, लिखाण, तर्कसंगत व विश्लेषणात्मक विचार, भाषा, शास्त्र व गणित
- मेंदूच्या उजव्या बाजूची कार्ये: सर्वांगीण व प्रतिभात्मक विचार, नवनिर्मिती, कला व संगीत
- डावी आणि उजवी बाजू एकमेकास नियंत्रीत करतात
- प्रमस्तिष्क: मोठा मेंदू
- अनुमस्तिष्क: छोटा मेंदू
- मस्तिष्कपुच्छ: सर्वात शेवटचा भाग
● मेरूरज्जू
- त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे
- मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे
- प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र म्हणून कार्य करतो.
*🔮🌀कोणत्याही देशाची एकता, अखंडता आणि त्याची ओळख त्या देशाचा झेंडा असतो. असाच आपल्या देशाचा तिरंगा आहे. पण हा तयार कसा झाला ? याच्या निर्मिती मागचा विचार काय होता ? हे जाणून घेऊया....*
🔺 दशाला पहिला राष्ट्रध्वज १९०६ मध्ये तयार करण्यात आला होता. कोलकातातील बागान चौकात हा ध्वज फडकवण्यात आला होता. यात केसरी, पिवळा आणि हिरवा रंग होता. तसेच त्यात अर्ध्या उमललेल्या कमळाच्या फूलाचे चित्रही होते. सोबतच या ध्वजावर वंदे मातरम लिहिले होते. याआधीही एक ध्वज तयार करण्यात आला होता तो केवळ दोन रंगांचा होता. हा ध्वज पॅरिसमध्ये मॅडम कामा आणि त्यांच्यासोबत निर्वासित झालेल्या काही क्रांतिकारकांनी फडकवला होता.
🔺 तर हा ध्वज बर्लिनमध्येही एका संमेलनात दाखवला गेला होता. यात तीन रंग होते. तर वरच्या पट्टीवर कमळाचं फूल होतं. सोबतच सात तारेही होते. याआधी स्वातंत्र्याबाबत आपल्या भावना प्रकट करण्यासाठी १९०४ मध्ये राष्ट्रध्वज निर्माण केला होता. हा स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी तयार केला होता. बंगालच्या एका रॅलीमध्ये या ध्वजाचा वापर करण्यात आला होता. नंतर नवीन राष्ट्रध्वज १९१७ मध्ये समोर आला. यात ५ लाल आणि ४ हिरव्या रंगांच्या पट्ट्या होत्या. तसेच त्यात तारेही होते. हा ध्वज डॉ. एनी बेझेंट आणि लोकमान्य टिळक यांनी एका आंदोलनादरम्यान तयार केला होता.
🔺 भारतीय राष्ट्रध्वजाचा मुख्य प्रवास १९२१ मध्ये तेव्हा सुरु झाला जेव्हा महात्मा गांधी यांनी देशासाठी ध्वजाचा विषय काढला. आणि त्यावेळी ध्वज पिंगली वैंकय्या यांनी तयार केला होता. यात केवळ लाल आणि हिरवा असे दोन रंग होते. ध्वजाच्या मधे पांढरा रंग आणि चरखा जोडण्याची सूचना गांधीजींनी लाला हंसराज यांच्या सल्ल्यानुसार दिली होती. पांढरा रंग ठेवल्याने सर्वधर्म समभाव आणि चरख्याने ध्वजाला स्वदेशीची प्रतिमा मिळाली. त्यानंतर ध्वजामध्ये काही बदल करण्यात आले. हा ध्वज आधी अखिल भारतीय कॉंग्रेससाठी तयार करण्यात आला होता. नंतर राष्ट्रीय ध्वज १९३१ मध्ये तयार करण्यात आला होता. हा राष्ट्रीय ध्वज तयार करण्यासाठी एक प्रस्ताव पारित करण्यात आला होता. गांधीजींच्या संशोधनानंतर यात केसरी, पांढरा आणि हिरवा रंग आणि चरख्याच्या जागी अशोक चक्र ठेवण्यात आला. २२ जुलै, १९४७ रोजी संविधान समितीने भारताचा राष्ट्रध्वज निश्चित केला.
🔰धवजातील रंगांचा अर्थ🔰
📌 भगवा किंवा केशरी रंग हे त्याग आणि धैर्याचे प्रतीक आहे.
📌 पांढरा रंग प्रकाश, शांती आणि सत्याची भावना व्यक्त करणारा आहे.
📌 तर, हिरवा समृद्धी आणि निसर्गाचे भूमीशी असलेले नाते व्यक्त करणारा रंग आहे.
📌 तयाचप्रमाणे झेंड्यातील मधले निळे अशोकचक्र हे सागराची अथांगता आणि कालचक्राचे द्योतक आहे. हे अशोकचक्र म्हणजे जगाला विश्वशांतीचा संदेश देणारे बौद्ध धर्माचे प्रतीक असलेले धम्मचक्र आहे.
🔰राष्ट्रध्वजासंबंधी नियम🔰
💥भारताचा राष्ट्रध्वज कसा असावा, कसा वापरावा आणि कधी वापरावा यासंदर्भात भारतीय घटनेने काही नियम ठरविले आहेत.
*– भारतीय राष्ट्रध्वजाच्या लांबी व उंचीचे प्रमाण ३:२ असे आहे.*
*– राष्ट्रध्वज खादीच्या अथवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे*.
*– ध्वज फडविताना तो सगळ्यांना दिसेल अशा सन्मानपूर्वक उच्च स्थानावरून फडकविला जावा*
*– शासकीय इमारतींवर कोणत्याही हवामानात तो सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फडकत राहावा व सूर्यास्तानंतर उतरविताना बिगूल वाजवून अगदी हळूहळू आदरपूर्वक उतरविला जावा*
*– केवळ प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनादिवशीच तो फुलांच्या पाकळ्या ठेवून फडकविला जातो*
*– राष्ट्रीय ध्वज फडकवताना अथवा उतरवताना उपस्थित नागरिक कवायतीच्या सावधान स्थितीत पाहिजेत.*🔙🙏👍🌹
आयोगाच्या कोणत्याही परीक्षेत एक तरी प्रश्न पुस्तकावर नेहमीच असतो.
The becoming - मिशेल ओबामा
Healed -मनीषा कोईराला
India after Modi -अजय गुडावर्थी
I do what I do -रघुराम राजन
The third pillar -रघुराम राजन
Every vote counts -नवीन चावला
India in distress -ममता बॅनर्जी
The republican ethic -रामनाथ कोविंद
लोकतंत्र के स्वर -रामनाथ कोवींद
Electronic voting machine -आलोक शुक्ला
Bad man - गुलशन ग्रोव्हर
The best thing about you is you -अनुपम खेर
Lessons life taught me unknowingly -अनुपम खेर
My life my lessons -बाबा रामदेव
We are displaced -मलाला युसुफजाई
Indian fiscal federalism -Y V Reddy आणि G R Reddy
Whispers of time -कृष्णा सक्सेना
Six machine क्रिस गेल
Straight task -अभिषेक मनु सिंघवी
Citizen delhi -शीला दीक्षित
The assassination of mahatma Gandhi-एम एस स्वामिनाथन
40 years of sportstar -पी व्ही सिंधू
Mind matter -विश्वनाथन आनंद
Unseen,unheard,unsaid - भरत वटवाणी
Let me say it now - राकेश मारिया
Who killed the sunderbans -तुषार कांजीलाल
कोविड-19 महामारीमुळे बंद पडलेल्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सेवेला काही निवडक देशांसाठी पुन्हा चालू करण्याच्या उद्देशाने भारताने संयुक्त राज्ये अमेरिका, फ्रान्स, जर्मनी या देशांच्या सोबत द्विपक्षीय ‘एअर बबल’ करार केले आहेत.
🔸महामारीमुळे बंद पडलेल्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा क्षेत्राला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे लवकरात लवकर विमान सेवा सुरु कारण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर अमेरिका, फ्रान्स आणि जर्मनीबरोबर करार करून या देशांमध्ये विमान सेवा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ठळक बाबी
🔸टाळेबंदीनंतर प्रथमच भारत-अमेरिका विमानसेवा सुरु झाली आहे. 18 जुलैपासून फ्रान्ससोबत हवाई सेवा सुरू होणार आहे.
🔸‘एअर बबल’ करारानुसार ठरलेल्या कालावधीतच निश्चित विमानसेवा पूर्ण करावयाच्या असतात.
🔸अमेरिका आणि भारत यांच्यात 17 ते 31 जुलै 2020 या कालावधीत 18 विमानांची उड्डाणे निश्चित झाली आहेत.
🔸ही उड्डाणे दिल्ली ते न्यूयॉर्क आणि दिल्ली ते सॅन फ्रॅन्सिस्को दरम्यान होतील. यासह एअर फ्रान्स दिल्ली, मुंबई, बंगळुरू पॅरिस दरम्यान 18 जुलै ते 1 ऑगस्ट या कालावधीत 28 विमानाचे उड्डाण करणार आहे.
🔸तसेच ब्रिटनसोबत हवाईसेवा सुरु करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे.
♦️बरिटिश अधिकाऱ्यांतही व्हाइसरॉय लॉर्ड डफरिन, ए. ओ. ह्यूमसारखे लोक यांनी भारतात सुराज्य निर्माण व्हावे, दडपलेल्या जनतेच्या असंतोषाचा भडका उडू नये, त्यांच्या अभिव्यक्तीला एक सनदशीर साधन मिळावे, हिंदी लोकांना स्वायत्ततेचे हक्क प्राप्त व्हावेत असे वाटत होते.
♦️ सर्व देशाचे प्रतिनिधित्व करणारी एखादी अखिल भारतीय राजकीय संस्था निर्माण झालेली नव्हती. ती स्थापन करण्यात ए.ओ. हयूम या सेवा निवृत्त सनदी अधिकाऱ्याने सर विल्यम वेडरबर्न व सर हेन्री कॉटन या दोन सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्याचेही सहकार्य घेतले.
♦️राष्ट्रसभेचे पहिले अधिवेशन पुण्यास भरविण्याचे ठरले होते. पण पुण्यास फार मोठया प्रमाणावर प्लेगची साथ झाली. त्यामुळे ते २८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईच्या गोवालिया टॅंकजवळील गोकुळदास तेजपाल संस्कृत कॉलेजमध्ये ते भरविण्यात आले. व्योमेशचंद्र बॅनर्जी हे या पहिल्या राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. सर्व भारतातून एकूण ७२ प्रतिनिधी राष्ट्रसभेच्या पहिल्या अधिवेशनास हजर होते.
♦️तयामध्ये दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, न्या के. टी. तेलंग, दिनशा वाच्छा, वीर राघवाचार्य, पी. आनंद चार्लू, गंगाप्रसाद वर्मा, न्या. रानडे, बद्रुद्दीन तय्यबजी, रा. गो. भांडारकर, एस्. सुब्रमण्यम् अय्यर, दिवाणबहादूर रघुनाथराव, केशव पिल्ले, एन्. जी. चंदावरकर, गो. ग. आगरकर इ. हिंदी नेत्याचा समावेश होता.
♦️कॉग्रेसचे पुढील अधिवेशन २८ डिसेंबर १८८६ राजी कलकत्ता येथे भरवण्यात यावेत असे ठरले. यानंतर ए.ओ. हयूम आणि राणी व्हिक्टोरिया यांना धन्यवाद देऊन सभा बरखास्त करण्यात आली. राष्ट्रसभेचे सुरुवातीचे स्वरुप कार्यपध्दती मवाळच होती.
🔷पहिल्या महायुदधानंतर आर्थिक दैन्य, शासनाची बेपवाई वाढती दडपशाही इत्यादी समस्यांनी भारतीय जनता त्रस्त झाली होती.
🔷1919 साली भारतीय जनतेतील वाढता असंतोष दडपण्याबाबत उपाययोजना रौलेट समितीने सुचवली.
🔷 तयानुसार कोणत्याही व्यक्तीला अटक करण्याचा आणि खटला न चालवता स्थानबदध करण्याचा अधिकार शासनास मिळाला.
🔷गांधीजीनी या काळया कायदयाचा निषेध करण्यासाठी भारतीय जनतेला 6 एप्रिल 1919 रोजी हरताळ पाळण्याचे आवाहन केले.
🔷 13 एप्रिल 1919 रोजी जनरल डायरप्रणीत जालियनवाला बागेतील हत्याकंड घडले.
🔷या घटनेने व्यथित झालेल्या गांधीजींनी ब्रिटिश शासनाशी असहकार करण्याचा निर्धार व्यक्त केला.
🔷 रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवीचा त्याग केला.
🔷दिग्दर्शन:
श्रीरामपूर मिशनच्या विल्यम कॅरी आदी बॅप्टिस्ट मिशनऱ्यांनी ख्रिस्ती धर्मप्रसाराच्या हेतूने दिग्दर्शन हे मासिक त्यांनी एप्रिल १८१८ मध्ये सुरु केले.
🔷समाचार दर्पण:
२३ मे १८१८ रोजी समाचार दर्पण हे बंगाली भाषेतील साप्ताहिक सुरु केले. देशी भाषेतील पहिल्या वृत्तपत्राचा मान त्याच्याकडे जातो.
🔷सोमप्रकाश:
पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सोमप्रकाश हे साप्ताहिक १५ नोव्हेंबर १८५८ पासून चालू झाले. द्वारकानाथ गंगोपाध्याय हे त्याचे संपादक होते.
🔷तत्त्वबोधिनी पत्रिका:
देवेंद्रनाथ टागोर यांच्या तत्त्वबोधिनी सभेचे तत्त्वबोधिनी पत्रिका हे मासिक.
🔷सलभ समाचार :
केशवचंद्र सेन (१८७८)
(जन्म: इ.स. १८४८; मृत्यू : ९ फेब्रुवारी, इ.स. १८९७)
🌱ह एक भारतीय कामगार पुढारी होते.
नारायण मेघाजींचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवडजवळचे कन्हेरसर.
🌱माळी शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या लोखंडे यांनी गरीब परिस्थितीतून माध्यमिक शिक्षण पुरे केले.
सुरुवातीस रेल्वे खात्यात कारकून म्हणून व पुढे पोस्ट खात्यात काही काळ नोकरी केल्यावर, लोखंडे यांना मुंबईच्या मांडवी भागात एका कापड गिरणीत भांडारपालाची नोकरी मिळाली.
तेथे त्यांना दहशतीच्या वातावरणात, दिवसातून १३-१४ तास काम करीत असलेले गिरणी कामगार आढळले; त्यांना आठवडयाची सुटीही मिळत नसे; परिणामी लोखंडे यांनी नोकरी सोडून स्वतःस कामगार चळवळीस वाहून घेण्याचे ठरविले.
त्याकरिता ते कामगार वस्तीतच राहू लागले. त्यांनी बाँबे मिल हँड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना २३ सप्टेंबर १८८४ रोजी स्थापली.
ही कामगार संघटना भारतातील संघटित कामगार चळवळीची सुरुवात मानली जाते.
🌱 इ.स.च्या १९व्या शतकात प्रथमच सुरू झालेल्या भारतातील कामगार चळवळीचे जनक म्हणून नारायण मेघाजी लोखंडे ओळखले जातात.
🌱लोखंडे हे महात्मा फुल्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्षही होते.
तसेच सत्यशोधक चळवळीतली त्यांची कामगिरीही महत्त्वपूर्ण मानली जाते.
🌱लोखंडे यांच्या पत्नीचे नाव गोपिकाबाई व मुलाचे नाव गोपीनाथ असे होते.
🍀🍀पत्रकारिता 🍀🍀
इ.स. १८८० मध्ये पुण्यात बंद पडलेले दीनबंधू हे सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र लोखंडे यांनी मुंबईत सुरू केले.
🌱 ह नियतकालिक शेतकरी-कामकरी वर्गाची बाजू हिरिरीने मांडे; त्यांच्या हालअपेष्टांना, दुःखाला वाचा फोडून सरकाचे व जनतेचे लक्ष वेधून घेत असे.
लोखंडे यांनी गुराखी या नावाचे एक दैनिकही काढले होते.
🌱सक्तीचे शिक्षण, दारूबंदी, मागासलेल्यांना नोकरीत प्रवेश, विद्यार्थ्यांना सवलती, शेतकऱ्यांना जंगलच्या कायद्यामुळे होणारा त्रास, विधवांच्या केशवपनास बंदी वगैरे अनेक प्रश्नांना लोखंडे यांनी दीनबंधूमधून वाचा फोडली.
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची दुर्दशा झाली असल्याचा पहिला आवाज दीनबंधूने उठविला.
🍀परस्कार आणि सन्मान 🍀
लॉर्ड लॅन्सडाऊन च्या काळात मुंबईत १८९३ मध्ये झालेल्या हिंदू-मुसलमानांच्या दंगलीत शांतता प्रस्थापित करण्याचे काम नारायण मेघाजी लोखंडे यांनी केले.
या कामगिरीबद्दल इंग्रज सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली.
ब्रिटिश सरकारने लोखंडे यांनी कामगारांसाठी केलेल्या कामगिरीची दखल देऊन त्यांना ‘जे.पी.’ (जस्टिस ऑफ पीस) हा किताब देऊन त्यांचा गौरव केला.
🍀पलेगने मृत्यू 🍀
मुंबईत इ.स. १८९६ मध्ये प्लेगची मोठी साथ उसळली. या साथीत अनेक लोक मृत्युमुखी पडले. याही वेळी पुढाकार घेऊन लोखंडे यांनी सरकारी मदतीने प्लेगग्रस्तांसाठी एक ‘मराठा इस्पितळ’ काढले; परंतु दुर्देवाने लोखंडे यांनाच प्लेगने पछाडले व त्यातच त्यांचा अंत झाला.
♦️चार्ल्स वुडचा खलिता -1854
♦️कोणत्या अहवालाला "Magnacarta of English education in india " असे म्हणतात.
= चार्ल्स वुड
♦️मबई, कोलकाता, आणि मद्रास येथे केव्हा विद्यापीठे स्थापन झाली.
=इ स 1857
♦️कोणी कलकत्ता येथे स्वखर्चाने 'बेथ्यून कॉलेज' काढले.
= लॉर्ड डलहौसी
♦️हटर आयोग स्थापन.
= 1882
♦️भारतात मुद्रणकलेची सुरुवात कोठे झाली.
= गोवा
♦️मद्रण कलेचा प्रसार करण्याचे श्रेय कोणाला जाते?
= डॉ, कॅरे
♦️महाराष्टात ख्रिश्चन मिशऱ्यानी ग्रंथ छपाई केव्हा सुरू केली?
= इ स 1810
▶️ रव्हरंड जी.आर. ग्लीन यांच्या ‘हिस्टरी ऑफ द ब्रिटिश एम्पायर इन इंडिया‘ या पुस्तकाच्या आधारे गोपाळराव देशमुखांनी इ.स.१८४२मध्ये, म्हणजे वयाच्या एकोणिसाव्या वर्षी हिंदुस्थानचा इतिहास ‘हे पुस्तक लिहिले.
पुस्तकाचे प्रकाशन मात्र इ.स.१८७८मध्ये झाले.
➡️ इ.स. १८४८ पासून त्यांनी मुंबईहून निघणाऱ्या प्रभाकर या साप्ताहिकात(संपादक :भाई महाजन), लोकहितवादी या नावाने लोकहितार्थ लेखन सुरू केले. त्या नावाने त्यांचा पहिला लेख त्या वर्षी १२मार्च रोजी प्रसिद्ध झाला. लेखाचा विषय होता..’इंग्लिश लोकांच्या व्यक्तिमात्राच्या गैरसमजुती’. याशिवाय, लोकहितवादींनी ‘एक ब्राह्मण‘ या नावानेही लिखाण केले आहे. त्या काळी लहान वयातच लग्न करून द्यायची प्रथा होती. लहान वयातील लग्नामुळे काय अडचणी होतात हे त्यांनी प्रभाकरमध्ये पत्र लिहून लोकांच्या नजरेस आणले. पुढील काळात त्यांनी अनेक समस्यांबाबत, विविध विषयांवर पत्रद्वारा लेखन केले.
इ.स. १८४८ ते इ.स. १८५० या काळात त्यांनी १०८ छोटे छोटे निबंध लिहिले.
▶️ हच निबंध लोकहितवादींची शतपत्रे नावाने ओळखले जातात. या शतपत्रांच्या माध्यमातून त्यांनी समाजसुधारणाविषयक विचार समाजासमोर मांडले. ही शतपत्रे प्रभाकर या साप्ताहिकातून प्रसिद्ध झाली. धार्मिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, वाङ्मयीन, ऐतिहासिक इत्यादी विषयांवर त्यांनी लहानमोठे असे सुमारे ३९ ग्रंथ लिहिले, दोन नियतकालिके चालविली, आणि ज्ञानप्रकाश व इंदुप्रकाश ही नियतकालिके काढण्याच्या कामी पुढाकार घेतला. लोकहितवादींनी अनेक उत्कृष्ट इंग्रजी ग्रंथांचे मराठीत भाषांतर केले. त्यांच्या लेखनातून लोकांच्या सर्वांगीण उन्नतीची तळमळ दिसून येते. जातिसंस्था हा देशाच्या उन्नती होण्याच्या मार्गातील मोठा अडसर आहे असे प्रतिपादन त्यांनी आपल्या लेखनातून केले. लोकहितवादी हे एकोणिसाव्याशतकाच्या पूर्वाधातील,म्हणजे रानडेपूर्व पिढीतील हिंदुस्थानातील अर्थशास्त्रज्ञ होते. मराठीतून लेखन करणारेही ते पहिलेच अर्थतज्ञ.
▶️‘ लक्ष्मीज्ञान‘ या ग्रंथाद्वारे त्यांनी अॅडम स्मिथ‘प्रणीत अर्थशास्त्र वाचकांसमोर आणले. "मातृभाषेतून शिक्षण" या तत्त्वाचाही त्यांनी प्रसार केला.
मराठीप्रमाणेच त्यांनी गुजरातीतही लिखाण
(फेब्रुवारी १८, इ.स. १८२३ - ९ ऑक्टोबर इ.स. १८९२)
.इ स.च्या एकोणिसाव्या शतकात होऊन गेलेले मराठी पत्रकार, समाजसुधारक व इतिहासलेखक होते.
प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून लोकहितवादी या टोपणनावाने यांनी समाजसुधारणाविषयक शतपत्रे (वस्तुतः संख्येने १०८) लिहिली. .
भाऊ महाजन उर्फ गोविंद विठ्ठल कुटें हे प्रभाकर साप्ताहिकाचे संपादक होते. वर्तमानपत्रात लिहिलेल्या एका ‘शतपत्रांचा इत्यर्थ‘ मथळ्याच्या पत्रात त्यांनी सुधारक विचारांच्या त्यांच्या लेखनाचा हेतू स्पष्ट केला आहे. मुळात संख्येने १०० असलेल्या या निबंधांत त्यांनी ‘संस्कृतविद्या‘, पुनर्विवाह‘, पंडितांची योग्यता‘, ‘खरा धर्म करण्याची आवश्यकता‘, ‘पुनर्विवाह आदी सुधारणा‘ ही पाच आणि अधिक तीन अशा आठ निबंधांची भर घातली