20 November 2021

महाराष्ट्रातील प्रमुख घाट


1) राम घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

2) अंबोली घाट - कोल्हापुर - सावंतवाडी 

3) फोंडा घाट - संगमेश्वर - कोल्हापुर 

4) हनुमंते घाट - कोल्हापुर - कुडाळ 

5) करूळ घाट - कोल्हापुर - विजयदुर्ग 

6) बावडा घाट - कोल्हापुर - खारेपाटण 

7) आंबा घाट - कोल्हापुर - रत्नागिरी 

8) उत्तर तिवरा घाट - सातारा - रत्नागिरी 

9) कुंभार्ली घाट - सातारा - रत्नागिरी 

10) हातलोट घाट - सातारा - रत्नागिरी 

11) पार घाट - सातारा - रत्नागिरी 

12) केंळघरचा घाट - सातारा - रत्नागिरी 

13) पसरणीचा घाट - सातारा - वाई 

14) फिटस् जिराल्डाचा घाट - महाबळेश्वर - अलिबाग 

15) पांचगणी घाट - पोलादपुर - वाई 

16) बोरघाट - पुणे - कुलाबा

17) खंडाळा घाट - पुणे - पनवेल 

18) कुसुर घाट - पुणे - पनवेल 

19) वरंधा घाट - पुणे - महाड 

20) रूपत्या घाट - पुणे - महाड 

21) भीमाशंकर घाट - पुणे - महाड 

22) कसारा घाट - नाशिक - ठाणे 

23) नाणे घाट -अहमदनगर - मुंबई

 24) थळ घाट - नाशिक - ठाणे 

25) माळशेज घाट - ठाणे- पुणे  

26) सारसा घाट - सिरोंचा - चंद्रपुर 


पिंपरी चिंचवड विशेष.


🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याच्या शासन निर्णय.....?

👉 10 एप्रिल 2018


🔹 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय ची स्थापना कधी झाली .....?

👉 15 ऑगस्ट 2018


🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे पहिले आयुक्त......?

👉 R.K. पद्मनाभन


🔹 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे सध्याचे पोलीस आयुक्त.......?

👉 शरी. कृष्णप्रकाश 


🎯वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये पहिले सरकारी अधिकारी तसेच आयर्नमॅन किताब मिळालेला आहे....


🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे सध्याचे अप्पर पोलीस आयुक्त.....?

👉 डॉ. संजय शिढे


🔹 पिंपरी चिंचवड महानगरपालिका ची स्थापना......?

👉 11 ऑक्टोंबर 1982


🎯 मख्यालय - पिंपरी येथे आहे


🎯 आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका ओळखली जाते......


🔸 पणे महानगरपालिका चे पहिले महापौर......?

👉 बाबाराव सणस


🔹 पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे सध्याचे महापौर......?

👉 उषा उर्फ माई मनोहर ढोरे


🎯 उपमहापौर - राहुल जाधव


🔸 पिंपरी चिंचवड महानगरपालिका चे सध्याचे आयुक्त.....?

👉 शरी. राजेश पाटील


🔹 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कोणत्या ठिकाणी आहे.......?

👉 निगडी

                                  

🔸 पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय चे किती परिमंडळ आहेत.....?

👉 तीन


🔹 पिंपरी चिंचवड चे पालकमंत्री....?

👉 अजितदादा पवार


🔸 पिंपरी चिंचवड लोकसंख्या 2011 नुसार........?

👉 17.29 लाख


🔹 पिपंरी चिंचवड साक्षरता दर 2011 नुसार.......?

👉 87.19%


🔸 पिंपरी चिंचवड शहराचे  एकूण क्षेत्रफळ किती आहे.....?

👉 181 चौ.की.मी.


🔹 पिंपरी चिंचवड शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे......?

👉 पवना


🔸 पिंपरी चिंचवड शहराचा पिनकोड काय आहे.....?

👉 411017


🔹 पिंपरी चिंचवड शहराचा आरटीओ कोड काय आहे.....?

👉 MH-14


🎯 MH-12 पुणे तसेच MH-42 बारामती...


🔸 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सदस्य संख्या किती आहे....?

👉 128


🔹 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे एकूण किती झोन आहेत.....?

👉 आठ .....A to F


🔸 पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी येथे कोणती संस्था आहे......?

👉 राष्ट्रीय एड्स संशोधन 


🔹भोसरी चे जुने नाव काय होते.....?

👉 भोजापुरी ( राजा भोज ची राजधानी)


🔸 पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पहिल्या महिला महापौर.....?

👉 फरांदे


🎯 पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक प्रभाग संख्या 32 असून प्रत्येक प्रभागातून 4 नगरसेवक निवडले जातात....


🔹 पिंपरी चिंचवड हे शहर कोणत्या जिल्ह्यात आहे.....?

👉 पणे


🔸 पिंपरी चिंचवड येथे कोणता कारखाना आहे....?

👉 पनिसिलीन


🔹 पिंपरी चिंचवड येथील पर्यटन स्थळे.....?

👉 1) निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय

👉 2) दुर्गा देवी हिल पार्क

👉 3) पिंपरी चिंचवड सायन्स सेंटर

👉 4) मोरया गोसावी मंदिर


🔸चिंचवड येथे कोणत्या महा साधूची समाधी आहे ...?

👉 मोरया गोसावी


🔹 चिंचवड हे कोणत्या क्रांतिकारकांचे जन्मस्थान आहे......?

👉 चाफेकर बंधू


🔸 पिंपरी-चिंचवड शहराची समुद्रसपाटीपासूनची उंची किती आहे .....?

👉 530 मीटर


🔹 सटॅलाइट ऑफ पुणे म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते.....?

👉 पिंपरी चिंचवड


महत्वपूर्ण क्लुप्त्या


💐महाराष्ट्रातील प्रमुख डोंगररांगा व त्या दरम्यानच्या नद्या कशा ओळखाव्या


✅कलुप्ती : विन सातसा गोहभी मकृ

वि- विध्य पर्वत

न – नर्मदा

सा- सातपुडा

ता- तापी

सा – सातमाळ

गो- गोदावरी

ह –हरिचंद्र बालघाट

भी –भीमा

म- महादेव

कृ- कृष्णा


💐भारतातील कर्कवृत्त कोणत्या राज्यातून जाते ?


✅कर्कवृत्त हे अक्षवृत्त ८ राज्यातून जाते. कोणत्या राज्यातून जाते

✅कलूप्त्या : “गुझराती काका के 8 परममित्र है”

गु = गुजरात

झ = झारखंड

ती = छातीसगड

प = पं. बंगाल

र = राजस्थान

म = मध्यप्रदेश

मि = मिझोरम

त्र = त्रिपुरा


💐भारतातील हिमालय पर्वताचे पश्चिमेकडून पूर्वेकडे प्रादेशिक विभाग कसे लक्षात ठेवणार


✅कलूप्त्या : कप काकू ने पूर्व हिमालयातून आणले

क = काश्मीर हिमालय

प  =  पंजाब हिमालय

कु = कुमाऊ हिमालय

ने   = नेपाळ हिमालय

पूर्व हिमालय = पूर्व हिमालय


💐हिमाचल पर्वतरांगाच्या दक्षिण उत्तरावर असलेले गीरीस्थानके


✅कलूप्त्या : 'शिमा नैनाला घेवून दार्जीलिंग ला गेली'

शि – शिमला

म  – मसुरी

नैना – नैनिताल

दार्जी– दार्जीलिंग


💐 बांगलादेश या देशाला भारताच्या राज्यांच्या लागलेल्या सीमा


✅कलूप्त्या : “मैत्री आमिप”

मै = मेघालय

त्री = त्रिपुरा

आ = आसाम

मि = मिझोरम

प =पश्चिम बंगाल.


💐दवीपकल्पावरील महत्वाची शिखरे उतरत्या क्रमाने असे लक्षात ठेवा.


✅कलुप्ती : "अन्ना दोन वेळा गुरु सोबत काळूबाईला धूप वाहायला गडावर गेला""

अन्ना = अनायमुडी - २६९५

दोन = दोडाबेटा - २६३

गुरु = गुरुशिखर - १७२२

काळूबाई = कळसुबाई - १६४६

धूप = धुपगड = १३५०


💐भारतात ४ अल्ट्रा मेगा पॉवर प्रोजेक्ट खाजगी विकासकांना बहाल करण्यत आले आहेत


✅कलुप्ती : "कृत्ति" मुंगूस.

कृ - कृष्णपट्टम (प्रकल्प आं.प्र)

ति - तिलैया प्रकल्प (झारखंड)

मुगू - मुद्रा प्रकल्प (गुजरात)

स - ससन प्रकल्प (मध्य प्रदेश)


💐भारताच्या सागरी सीमेशी सल्लग्न असलेले देश कसे लक्षात ठेवाल?


✅कलुप्ती : "MIM BSP"

M - म्यानमार

I - इंडोनेशिया

M - मालदीव

B - बांगलादेश

S -श्रीलंका

P - पाकिस्तान


💐आदिश राशी कशा लक्षात ठेवाल.


✅कलुप्ती : “आकाशचा अवघा वेळ ऊर्जेत गेला”.

आ – आकारमान

का – कार्य

श – शक्ती

चा – चाल

अ – अंतर

व – वस्तुमान

घा – घनता

ला – लांबी

वेळ - ऊर्जा


💐सदिश राशी कशा लक्षात ठेवाल. 


✅कलुप्ती : "सविता वेग वजन बग "

स - संवेग

वि - विस्थापन

त - त्वरण

वेग

वजन

ब - बल

ग - गती


💐दगडी कोळसा कार्बन प्रमाण उतरत्या क्रमाने


✅कलुप्ती : ऑबिलीपी


ऑ - अन्थ्रासाईड

बी  - बिटूमिंस

लि - लिग्नाईट

पी - पिट


💐महाराष्ट्रातील घाट


✅आबा कोर -

आंबा घाट - कोल्हापूर ते रत्नागिरी

✅माथूना - मुंबई ते नाशिक - थळ घाट

✅बापुचादिवा - पुणे ते बारामती - दिवा घाट.

✅कभा चिपक - कराड ते चिपळूण - कुंभार्ली घाट

✅खांबाला पूस - पुणे ते सातारा - खंबाटकी घाट.

✅फोकोगा - फोंडा घाट- कोल्हापूर ते गोवा.

✅मना कसा आहेस - मुंबई ते नाशिक - कसारा घाट


💐सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


✅कलूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


💐सह्याद्रीच्या पूर्वेस असलेल्या डोंगररांगा उत्तरे कडून दक्षिणे कडे


✅कलूप्त्या : “साथ आहे मी तुझ्या”

सात – सातमाळ

आ   -  अजिंठा

हे    -  हरिश्चंद्र

मी   - महादेव


💐महाराष्ट्रातील पश्चिमेकडे वाहणाऱ्या नाद्याचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम कसा लक्षात ठेवावा


✅कलूप्त्या : ‘सूर्य वैतागला उल्हासवर

             आंबा पडला सावित्रीवर

             वैशिष्टी काजळ लावून गेली वाघावर

             काळी गेली तळ्यात खोलवर’


सूर्या नदी

वैतागला – वैतरणा नदी

उल्हास नदी

आंबा – आंबा नदी

सावित्री नदी

वशिष्टी नदी

काजळ -  काजळी नदी

वाघ – वाघोठान नदी

काळी नदी

तेरेखोल नदी


💐महाराष्ट्राच्या प्रमुख नद्यांचा विस्तारानुसार उतरता क्रम


✅कलूप्त्या : 'गोभीकृतान '

गो - गोदावरी

भी - भीमा

कृ - कृष्णा

ता - तापी

न - नर्मदा

पोलीस दल विशेष

 (०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ ऑगस्ट 


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ 


▪️महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहेत?
✓ दिलीप वळसे पाटिल

▪️पोलीस खाते कोणत्या मंत्रालयांतर्गत येते?
✓ गृहमंत्रालय

▪️पोलीस खाते हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो?
✓ राज्यसूची

▪️राष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र म्हणून ओळखले जाणारे मासिक कोणते? 
✓ दक्षता

▪️भारतीय पोलीस प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहे?
✓ तेलंगणा

▪️सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे? 
✓ हैदराबाद

▪️महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
✓ संजय पांडे

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य काय आहे?
✓ सदरक्षणाय खलनिग्रहणाय

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे सर्वोच्च पद कोणते?
✓ पोलीस महासंचालक

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचे मुख्यालय कोठे आहे?
✓ मुंबई

▪️सदरक्षणाय खलनिग्रहणाय या वाक्याचा अर्थ काय होतो?
✓ सज्जनांचे रक्षण, दुर्जनांचा नायनाट
 
▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर कोणत्या ताऱ्याचे चिन्ह आहे?
✓ पंचकोणी तारा

▪️पोलीस स्मृती दिवस कधी साजरा केला जातो?
✓ 21 ऑक्टोबर

▪️सीआरपीएफचे पूर्ण नाव काय? 
✓ सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स

▪️महाराष्ट्रात गुप्तचर अकादमी प्रशिक्षण केंद्र कोठे आहे?
✓ पुणे

▪️पोलीस दलातील शेवटचे पद कोणते?
✓ शिपाई

▪️महाराष्ट्र राज्यातील पहिल्या राज्य राखीव पोलीस दलाच्या महिला  बटालियनची स्थापना कोठे होणार आहे?
✓ काटोल, जि. नागपूर

▪️महाराष्ट्र राज्याच्या पोलीस ध्वजावर अभयनिदर्शक असे कोणते चिन्ह आहे? 
✓ हाताचा पंजा

▪️जिल्हा स्तरावरील पोलीस खात्याचा प्रमुख कोण असतो?
✓ पोलीस अधीक्षक

▪️महाराष्ट्र पोलीस दलाचा ध्वजाचा रंग कोणता आहे?
✓ गडद निळा

▪️मबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ?
✓ हेमंत नगराळे

▪️राज्याच्या पोलीस महासंचालकांची नेमणूक कोण करते ?
✓ राज्यशासन

▪️पोलीस विभागात परिक्षेत्राच्या प्रमुखास काय म्हणतात ?
✓ महानिरीक्षक

▪️FIR चा फुल फॉर्म काय ?
✓ first information report

▪️महाराष्ट्र राज्याच्या एटीएस विभागाचे प्रमुख कोण आहेत ?
✓ देवेन भारती

▪️गह विभागाच्या नियंत्रणाखाली कोणते विभाग येतात ?
✓ गृहरक्षक दल , तुरुंग

▪️महाराष्ट्र राज्याचे गुन्हे अन्वेषण विभागचे मुख्यालय कुठे आहे ?
 ✓ पुणे

▪️भारतातील पहिल्या पोलीस रोबोटचे नाव काय ?
✓ केपी-बोट

▪️राज्य राखीव पोलीस दलाची स्थापना केव्हा झाली ?
✓ 1948

▪️भारताच्या पहिल्या चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पदी कोणाची निवड करण्यात आली ? 
✓ जनरल बिपिन रावत

▪️दशाचे संरक्षण मंत्री कोण आहेत ?
 ✓ राजनाथ सिंह

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (कंसात जिल्ह्याचे नाव)


आंबोली (सिंधुदुर्ग)


खंडाळा (पुणे)


लोणावळा (पुणे)


भिमाशंकर (पुणे)


चिखलदरा-गाविलगड (अमरावती)


जव्हार (पालघर)


तोरणमाळ (नंदुरबार)


पन्हाळा (कोल्हापूर)


महाबळेश्वर (सातारा)


पाचगणी (सातारा)


कोयनानगर (सातारा)


माथेरान (रायगड)


मोखाडा(ठाणे)


सूर्यामाळ (ठाणे)


म्हैसमाळ (औरंगाबाद)


येडशी (उस्मानाबाद)


रामटेक (नागपूर)

सीबीआय आणि ईडीच्या प्रमुखांसंबंधी मोदी सरकारचा मोठा निर्णय



🔰सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या प्रमुखांचा कार्यकाळ पाच वर्षांपर्यंत वाढवण्याचा अध्यादेश सरकारने आणला आहे. या केंद्रीय तपास यंत्रणाच्या प्रमुखांचा कार्यकाळ सध्या दोन वर्षांचा आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी दोन्ही अध्यादेशांवर स्वाक्षरी केली आहे. या अध्यादेशानुसार सर्वोच्च संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक वर्षी तीन वर्षांसाठी वाढवला जाऊ शकतो.


🔰नयायमूर्ती एलएन राव यांच्या अध्यक्षतेखालील सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अलीकडेच अंमलबजावणी संचालनालयाचे संचालक एस के मिश्रा यांच्या कार्यकाळाच्या मुदतवाढीसंदर्भातील एका खटल्यात निकाल दिला. यावेळी, न्यायालयाने असे निरीक्षण नोंदवले की कार्यकाळ वाढवण्याची परवानगी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच आहे.


🔰या अध्यादेशानुसार, अंमलबजावणी संचलनालयाचे संचालक ज्या कालावधीसाठी आपले पदग्रहण करतो, तो कालावधी सेक्शन (अ) नुसार समितीच्या शिफारशीनुसार आणि लिखित स्वरूपात दिल्या गेलेल्या कारणांनुसार एका वेळी एका वर्षासाठी वाढवण्यात येऊ शकतो. अर्थात, हे केवळ पाच वर्षांपर्यंतच करता येते. पाच वर्षांची सेवा झाल्यानंतर संचालकाचा कालावधी वाढवता येत नाही. मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ होता आणि १७ नोव्हेंबर रोजी संपणार आहे.

पुढील दशकभरात भारतात तीन विश्वचषक



🔰भारताला २०२३च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपाठोपाठ श्रीलंकेसह संयुक्तरीत्या २०२६चा ट्वेन्टी२० विश्वचषक आणि बांगलादेशसह संयुक्तरीत्या २०३१चा एकदिवसीय विश्वचषक या स्पर्धाचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळणार आहे.


🔰आतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मंगळवारी जागतिक स्पर्धाची कार्यक्रमपत्रिका जाहीर केली. भारतात २०२९ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धेचेही आयोजन करण्यात येईल.


🔰तसेच पाकिस्तानात २० वर्षांहूनही अधिक कालावधीनंतर ‘आयसीसी’ची जागतिक स्पर्धा होणार असून २०२५च्या चॅम्पियन्स करंडकाचे यजमानपद भूषवण्याची त्यांना संधी मिळेल.


🔰पाकिस्तानाने भारत आणि श्रीलंकेसह संयुक्तरीत्या १९९६चा एकदिवसीय विश्वचषक आयोजित केला होता. तसेच अमेरिका, वेस्ट इंडिजला संयुक्तरीत्या २०२४ ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या आयोजनाची संधी लाभणार आहे.

मराठी न शिकवल्यास शाळांना दंड ; राज्यातील सर्व शिक्षणसंस्थांना अनिवार्य; कारवाईची रक्कम एक लाखापर्यंत



🔰राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या आणि सर्व परीक्षा मंडळाच्या पहिली ते दहावीच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करूनही मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर कारवाईचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालकांना दिले आहेत. दरम्यान शाळांमध्ये शिकवण्याचा आढावा घेण्याच्या शिक्षण विभागाच्या निर्णयाचे मराठी भाषा, साहित्य, शिक्षण क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे.


🔰राज्यात २०२०-२१ पासून राज्यातील शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा करण्यात आला आहे. त्यात २०२०-२१ मध्ये पहिली आणि सहावी, २०२१-२२ मध्ये दुसरी आणि सातवी, २०२२-२३ मध्ये तिसरी आणि आठवी, २०२-२४ मध्ये चौथी आणि नववी, २०२४-२५मध्ये पाचवी आणि दहावी या पद्धतीने हा निर्णय लागू होणार आहे. मराठी भाषेच्या सक्तीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत शासन स्तरावरून वारंवार आढावा घेण्यात येत आहे.


🔰मराठी शिकवत नसलेल्या संबंधित शाळा आणि व्यवस्थापनास एक लाख रुपयांपर्यंत दंड का करू नये, अशी नोटिस देण्यात यावी. त्यानंतर शाळांकडून खुलासा घ्यावा. खुलासा समाधानकारक नसल्यास किंवा विशेष करून मराठी भाषा विषयी संबंधित वर्ग सुरू न केल्यास अधिनियमातील तरतुदीनुसार शिक्षणाधिकारी स्तरावरून संस्था किंवा शाळा यांचे म्हणणे ऐकून घेऊन योग्य तो निर्णय पारित करावा. त्यानंतर प्राथमिक शिक्षण संचालकांकडे दंडाच्या वसुलीचा प्रस्ताव सादर करावा, असे टेमकर यांनी पत्रात नमूद केले आहे.

18 November 2021

MPSC मार्फत लवकरच 15,511 पदांची भरती होणार!


👨🏻‍💼 राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यासह काही विभागांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा या आयोगामार्फत एकूण 15511 जागा भरण्यासाठी राज्य शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यामधील एकूण 7168 पदांचे मागणीपत्र राज्य शासनामार्फत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला प्राप्त झाले आहे.

👉 राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग,वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच इतर विविध विभागात एकूण 15511 पदांची भरती होणार आहे. त्यामध्ये गट-अ वर्गात 4417, गट-ब वर्गात 8031 तसेच गट-क वर्गात 3063 पदे असणार आहेत.

📄 राज्य शासनाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगास 7168 पदांचे मागणीपत्र मिळाले आहे. त्यामध्ये गट अ - 2827 पदे, गट ब - 2641 पदे, गट क - 1700 पदे असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे.

📍 विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मी कायम प्रयत्नशील असून अनेक कामांचा पाठपुरावा मी स्वतः करत आहे. 7168 पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास प्राप्त झाले आहे. तसेच लवकर एमपीएससी विद्यार्थ्यांना एक वर्षाची संधी वाढवून दिल्याचे परिपत्रक निघणार आहे, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

भारतीय निवडणूक आयोग



🌸ही एक संवैधानिक संस्था असून कलम 324 नुसार याची स्थापना25 जानेवारी 1950 रोजी करण्यात आलेली आहे. भारतीय निवडणुक आयोगातर्फे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, संसद, राज्य विधिमंडळ यांच्या निवडणूका पार पाडल्या जातात. पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून सुकुमार सेन यांनी कामकाज पाहिले होते. मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती राष्ट्रपती करतात व ते 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे होईपर्यंत ते पदावर राहतात.


🌸राज्यसभा

- संसदेचे उच्च सभागृह

- भारताचे उपराष्ट्रपती पदसिद्ध अध्यक्ष असतात

- एकूण जागा: 250: 238 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त

- सध्या जागा: 245: 233 राज्ये आणि केंद्र शासित प्रदेश + 12 राष्ट्रपती नियुक्त (कलम 80 नुसार ही नियुक्ती)

- महाराष्ट्रात राज्यसभेच्या 19 जागा

- मणिपूर, मेघालय, मिझोरम, नागालॅड, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, पाॅडेचरी, गोवा या राज्यांना राज्यसभेवर प्रत्येकी 1 जागा


🌸लोकसभा

- एकूण जागा: 552 (कलम 81 & 331 नुसार)

- पहिल्या लोकसभेची स्थापना: 2 एप्रिल 1952

- 16 वी लोकसभा स्थापना: 4 जून 2014


🌸लोकसभा निवडणूक 2014

- 16 वी लोकसभा निवडणूक

- 7 एप्रिल ते 12 मे या कालावधीतील 10 दिवस भारतभरात मतदान

- 16 मे रोजी निकाल आणि 4 जून 2014 रोजी लोकसभेची स्थापना

- एकूण मतदारसंघ: 543

- एकूण मतदान केंद्र: 927553

- सहभागी राजकीय पक्ष: 464 (2009-363)

राष्ट्रीय- 342, राज्य- 182, नोंदणीकृत- 16, अपक्ष- 3

- एकूण उमेदवारांची संख्या: 8251 पैकी 668 महिला उमेदवार (पैकी 62 निवडून आल्या)


🌸 पक्षीय बलाबल

- भारतीय जनता पक्ष: 282

- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस: 44

- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष: 06

- कम्युनिस्ट पक्ष: 01

- कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी): 09

- राज्यस्तीय पक्ष: 182

- नोंदणीकृत पक्ष: 16

- अपक्ष: 03


🌸 वशिष्ट्ये

- EVM वर NOTA हा पर्याय भारतभर पहिल्यांदाच वापरण्यात आला. 

- नोटाचा सर्वाधिक वापर पाॅडेचरी (3.01%), सर्वात कमी वापर नागालॅड (0.26%) करण्यात आला

- 28,527 तृतीयपंथी मतदारांपैकी 1968 जणांनी मतदानाचा अधिकार बजावला. 

- 13,039 (पुरूष 12234, स्त्री 804) भारताबाहेरील भारतीयांपैकी 10 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. 

- एकूण निवडणूक खर्च: 3,87,0354,56,024 रूपये


🌸 महाराष्ट्र: लोकसभा निवडणूक 2014


- 48 मतदारसंघासाठी 90386 मतदान केंद्रे. 

- 6 मतदान केंद्रावर फेर मतदान घेण्यात आले. 

- 32 मतदारसंघात 16 पेक्षा जास्त उमेदवार उभा होते.

- एकूण मतदानापैकी 0.89% लोकांनी NOTA हा पर्याय वापरला


विधान परिषद



- राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह

- घटनेचे कलम 169 विधानपरिषदेची स्थापना किंवा रद्द करण्याशी संबंधित आहे: संबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने (2/3) असा ठराव पारित करावा लागतो आणि हा ठराव संसदेत साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो. 

-------------------------------------

● पात्रता 

- उमेदवार भारताचा नागरिक असावा

- त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत. 

- संसदेने ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक

-------------------------------------

● सदस्य संख्या

- कमीत कमी 40 (J&K: 36) तर जास्तीत जास्त संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतके सदस्य

- एक तृतीयांश सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात (स्थायी सभागृह)

- सदस्याचा कालावधी 6 वर्षांचा असतो

--------------------------------------

● रचना: कलम 171

[सदस्य: मतदार संघ: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील संख्या]


- 1/12 सदस्य: पदवीधर मतदारसंघातून: 7 सदस्य

- 1/12 सदस्य: शिक्षक मतदारसंघातून: 7 सदस्य

- 1/6 सदस्य: राज्यपाल नियुक्त: 12 सदस्य

- 1/3 सदस्य: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून: 26 सदस्य

- 1/3 सदस्य: विधानसभा सदस्य निवडून देतात: 26 सदस्य

■ विधानपरिषदेच्या गणपूर्तीसाठी 1/10 सदस्यांची आवश्यकता असता.

--------------------------------------

● विधानपरिषद असलेली राज्ये

[राज्याचे नाव आणि सदस्य संख्या]


- उत्तर प्रदेश (100)

- महाराष्ट्र (78)

- बिहार (75)

- कर्नाटक (75)

- आंध्र प्रदेश (50)

- तेलंगणा (40)

- जम्मू-काश्मिर (36)

■ ओरिसा हे विधानपरिषद स्थापन करणारे देशातील आठवे राज्य ठरले आहे.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव :




👉1.संन्याशाचा उठाव

1765-1800

बंगाल

शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक


👉2.चुआरांचा उठाव

1768

बंगाल-मिजापूर जिल्हा

जगन्नाथ घाला


👉3.हो जमातीचे बंड

1820

छोटा नागपूर व सिंग

भूम


👉4.जमिनदारांचा उठाव

1803

ओडिशा

जगबंधु


👉5.खोंडांचा उठाव

1836

पर्वतीय प्रदेश

दोरा बिसाई


👉6.संथाळांचा उठाव

1855

कान्हू व सिंधू


👉7.खासींचा उठाव

1824आसाम

निरत सिंग


👉8.कुंकिंचा उठाव

1826

मणिपूर


👉9.दक्षिण भारतातील उठाव


👉10.पाळेगारांचा उठाव

1790

मद्रास


👉11.म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव

1830

म्हैसूर


👉12.विजयनगरचा उठाव

1765

विजयनगर


👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव

1870

गोरखपूर


👉14.रोहिलखंडातील उठाव

1801

रोहिलखंड


👉15.रामोश्यांचा उठाव

1826

महाराष्ट्र

उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत


👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव

1824


👉17.केतूरच्या देसाईचा उठाव

1824

केतूर


👉18.फोंडा सावंतचा उठाव

1838


👉19.लखनऊ उठाव


👉21.भिल्लाचा उठाव

1825

खानदेश


👉21.दख्खनचे दंगे

1875

पुणे,सातारा,महाराष्ट्र

शेतकरी

कोकणातील नद्या....



▪️ठाणे

- सुर्या 

- वैतरणा 

- उल्हास 


▪️मबंई उपनगर 

- दहिसर  

- माहीम


▪️रायगड

- पाताळगंगा 

- सावित्री


▪️रत्नागिरी

- वशिष्ठी  

- शास्त्री 

- काजळी

- मुचकुंदी


▪️सिंधुदुर्ग

- देवगड 

- माचरा

- कर्ली

-तेरेखोल

अर्थशास्त्र काही प्रश्न व उत्तरे -

1. भारताच्या सन २००० च्या लोकसंख्या विषयक धोरणाचे दीर्घकालीन उद्दिष्ट काय आहे?

१.सन २०२० पर्यंत किमान जन्मदर साध्य करणे

२.सन २०३० पर्यंत सुदृढ लोकसंख्या साध्य करणे

३.सन २०४० पर्यंत स्त्री पुरुष प्रमाणात वाढ करणे 

४.सन २०४५ पर्यंत स्थिर लोकसंख्या साध्य करणे✅✅✅

2. १२ व्या पंचवार्षिक योजनेत पायाभूत क्षेत्रातील अंदाजे गुंतवणूक किती आहे?

१.११ व्या पंचवार्षिक योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट✅✅✅

२.११ व्या पंचवार्षिक योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या १२०%

३.११ व्या पंचवार्षिक योजनेत केलेल्या गुंतवणुकीच्या १५०%

४.वरीलपैकी एक ही नाही

3. भारतीय नियोजन अयशस्वी होण्याची प्रमुख तीन करणे कोणती?

अ)सार्वजनिक क्षेत्रातील अकार्यक्षम उत्पादन

ब)व्यावसायिक संरचनेत न झालेला बदल

क)दारिद्रय निर्मूलनातील अपयश

ड) महालनोबिस प्रतिमानाचा अयोग्य वापर

१.अ, ब आणि ड✅✅✅

२.ब, क, आणि ड

३.अ, ब आणि क

४.क, ड आणि अ

4. भारताच्या विकासासंदर्भात डॉ कलाम यांनी स्वीकारलेल्या प्रतिमानात खालील घटकांचा समावेश होता?

१.भौतिक, इलेक्ट्रॉनिक, ज्ञान व आर्थिक✅✅✅

२.खाजगी क्षेत्रावर नियंत्रण

३.दारिद्रय चे निवारण

४.शेती क्षेत्राचा विकास

5. ग्रामीण पायाभूत विकासासाठी..... या संस्थेने राज्यातील सिंचन प्रकल्प कार्यान्वित होण्यासाठी विकास निधीची स्थापना केली?

१.नाबार्ड✅✅✅

२.ए. आय.बी.पी

३.एन.सी.डी.सी

४.आय.ए.डी.पी

6. खालीलपैकी कोणते उद्योग भारताचे आधारभूत उद्दोग नाहीत?

१.कोळसा, कचे तेल आणि विधुत

२.तेल परिशोधन, कचे तेल आणि कोळसा

३.कोळसा, सिमेंट आणि लोह इस्पित

४.कचे तेल, प्राकृतिक गॅस आणि तेल परिशोधन✅✅✅

7. १९९१ च्या लघुउद्योगा साठीच्या योजनेनुसार, राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळाने खालीलपैकी कोणत्या गोष्टी वर लक्ष द्यायचे होते?

१.वित्त उभारणी

२.निर्यात प्रोत्साहन

३.विपणनास साहाय्य✅✅✅

४.कुशल कामगारांची तरतूद

8. खाजगीकरण व जागतिकीकरण धोरण कोणत्या प्रधानमंत्र्याने जाहीर केले?

१.चंद्रशेखर

२.पी व्ही नरसिंह राव✅✅✅

३.डॉ मनमोहन सिंग

४.एच डी देवेगौडा

9. २००३-२००७ च्या आयात निर्यात धोरणातील सर्वात महत्त्वाचा उपक्रम कोणता?

१.संशोधन आणि विकासात पुढाकार

२.विदेशी प्रत्यक्ष गुंतवणुकीस प्रोत्साहन

३.तंत्रज्ञान पार्क

४.शेतमालाच्या निर्यातीवरील संख्यात्मक निर्बंधा चे उच्चटन✅✅✅

10. देशातील ग्रामीण व शहरी दोन्ही भागात खालीलपैकी कोणत्या योजनेचा विस्तार करण्यात आला?

१.जवाहर रोजगार योजना

२.नेहरू रोजगार योजना

३.जे पी नारायण गॅरेटी योजना

४.प्रधानमंत्री रोजगार योजना✅✅✅

1.भारतातील ग्रामीण दारिद्रय दूर करण्यासाठी कोणता कार्यक्रम जाहीर करण्यात आला.

1. वीस कलमी कार्यक्रम✅✅✅

2. किमान गरजा कार्यक्रम

3. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम

4. वरील सर्व

2. डॉ. सुरेश तेंडुलकर अभ्यास गटाच्या शिफारसी प्रमाणे दारिद्रय रेषेखालील कुटुंब ...... या निकशाने ठरवावी.

1. उपभोगत्या खर्च✅✅✅

2. उत्पन्न मर्यादा

3. उष्मांक ( कॅलरी) ग्रहण

4. आरोग्य स्तिथी

3.उत्पन्न दरिद्र्याची व्याख्या कशी केली जाते.

1. किमान जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे.✅✅✅

2.  चांगले जीवनमान प्राप्त करण्यामध्ये  असमर्थ असणे

3.योग्य जीवनमान प्राप्त करण्यामध्ये असमर्थ असणे

4. वरील सर्व

4.महाराष्ट्राच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत होणाऱ्या खर्चाच्या विभागणीच्या संदर्भात खालील पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर आहे.

1.७५ टक्के केंद्रसरकार आणि25  टक्के राज्यसरकार ✅✅✅

2. ५०-५० टक्के केंद्र आणि राज्यसरकार

3. १०० टक्के केंद्रसरकार

4. राज्यसरकार.

5. रोजगार पुरवणारी खालीलपैकी कोणती योजना विशेषतः दुष्काळग्रस्त भागासाठी सुरु केली होती.

1. जवाहर ग्राम समृध्दी योजना

2. रोजगार हमी योजना ✅✅✅

3. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम

4. ग्रामीण भूमिहीन रोजगार हमी कार्यक्रम

6. दुष्काळ व्यवस्थापनासाठी महाराष्ट्रात कोणत्या कार्यक्रमाची अमलबजावणी करण्यात आली.

1. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम

2. ट्रायसेम 

3.सर्वंकष  पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम 

4.रोजगार हमी योजना✅✅✅

7.फिशरच्या  चलनसंख्यामान सिद्धांतानुसार पैशाचे मूल्य आणि पैशांची संख्या यामधील संबंध कडा आहे.

1. इतर परिस्थिती असता पैशांचे मुल्य त्याच्या संख्येच्या विरुद्ध दिशेने बदलते.✅✅✅

2. इतर परिस्थिती स्थिर असता पैशाचे मूल्य त्याच्या सम दिशेने बदलते

3.पैशांची संख्या आणि पैशांचे मूल्य यांच्यातील सहसंबंध प्रमाणशीर आहे

4. वरीलपैकी नाही

8.मंदीच्या काळात खालीलपैकी कोणते राजकोशीय धोरण आधिक यशस्वी ठरेल?

1. करामध्ये वाढ आणि सार्वजनिक खर्चात कपात

2.करामध्ये वाढ आणि सार्वजनिक खर्चात वाढ

3.करामध्ये कपात आणि सार्वजनिक खर्चात कपात

4. करामध्ये कपात आणि सार्वजनिक खर्चात वाढ✅✅✅

9.मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या दरास काय म्हणतात?

1.व्याज दर

2.बँक दर✅✅✅

3. रेपो दर

4.अधिकर्ष सवलत

10. नैसर्गिक मत्तेच्या मौद्रीक मूल्यांमध्ये त्या वर्षात जो ऱ्हास झाला असेल त्याचे समायोजन एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या आकड्याशी करण्याच्या पद्धतीला काय म्हणतात?

१.हरितगृह परिणाम

२.हरित क्रांती

३.हरित ऊर्जा

४.वरील एक ही नाही✅✅✅



 

1. दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र 'गाभा क्षेत्र' मानण्यात आले?

अ) औद्योगिक क्षेत्र

ब) शिक्षण क्षेत्र

क) पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा

ड) कृषी क्षेत्र

दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा

1.(अ) फक्त

2. (अ)आणि(क) फक्त

3.ब) फक्त

4.ड) फक्त✅

2. तुटीच्या अर्थभरण्यामुळे खालीलपैकी कोणता परिणाम होतो?

1.भावसंकोच

2. भाववाढ✅

3.निर्यातवाढ

4. यापैकी कोणतेही नाही

3.एक बंध अर्थव्यवस्था अशी अर्थव्यवस्था आहे ज्यामध्ये .. .....

1. चलन पुरवठा पूर्णपणे नियंत्रित असतो

2.तुटीच्या अर्थ भरणाचा वापर केला जातो

3.केवळ निर्यातीला परवानगी असते

4.ना निर्यात ना आयात✅

4. एक रुपयाच्या चलनी नोटा चलनात आणण्याचे अधिकार कोणास आहे?

1.नियोजन आयोग

2.रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया

3.स्टेट बँक ऑफ इंडिया

4.केंद्रीय अर्थ खाते✅

5.भारतीय हरितक्रांतीचे शिल्पकार कोणास म्हणले जाते?

1.जगदीशचंद्र बोस

2.राजा रामन्ना

3.डॉ. स्वामिनाथन✅

4.जयंत नारळीकर

6.मध्यवर्ती बँक सदस्य बँकांना ज्या दरात कर्ज देते त्या दरास काय म्हणतात?

1.बँक दर✅

2. व्याज दर

3 रेपो दर

4.अधिकर्ष सवलत

7...... यांनी १९४८ मध्ये स्वतंत्र भारताचे पहिले औद्योगिक  धोरण संसदेपुढे मांडले

1.डॉ. आंबेडकर

2.श्यामप्रसाद  मुखर्जी✅

3.पंडित नेहरू

4.गुलझारीलाल नंदा

8. खालीलपैकी कोणती समिती लघुउद्योग क्षेत्रातील पतपुरवठयात येणाऱ्या अडचणी या विषयाशी संबधित होती?

1. आर.व्ही.गुप्ता समिती

2.डा. एल.सी. गुप्ता समिती

3.एस.एल.कपूर समिती✅

4.आर.एल.मल्होत्रा समिती

9.सदोष शिक्षण पद्धतीमुळे ......बेकारी निर्माण होते?

1.सुशिक्षित✅

2.तंत्रिकी

3.ग्रामीण

4.संघर्षजन्य

10.रेपो दर वाढीचा खालीलपैकी परिणाम कोणता?

1.चलन पुरवठा कमी होणे✅

2.महागाईत वाढ होणे

3.उत्पादनात वाढ होणे

4.अ व ब  दोन्हीही

राज्यघटना आजचे प्रश्न व उत्तरे -

1. भारतीय राज्यघटनेच्या ----- कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे?
१.19 ते 22✅✅✅
२.31 ते 35
३.22 ते 24
४.31 ते 51

2. राज्यसभेचे सभापती आपला राजीनामा ----- यांच्याकडे सादर करतात.
१.राष्ट्रपती✅✅✅
२.उपराष्ट्रपती
३.पंतप्रधान
४.राज्यपाल

3. सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायधिशांची नेमणूक ----- करतात?
१.राष्ट्रपती
२ राज्यपाल
३.पंतप्रधान
४.सरन्यायाधिशांच्या सल्ल्याने राष्ट्रपती✅✅✅

4. ----- रोजी पंडित नेहरूंची घटनेची उद्देशपत्रिका/प्रस्तावना लिहिली?
१.11 डिसेंबर 1946✅✅✅
२.29 ऑगस्ट 1947
३.10 जानेवारी 1947
४.9 डिसेंबर 1946

5. भारतीय राज्यघटेनेच्या ----- परीशिष्टात विविध शपथ व नमुने दिलेले आहेत.
१.परिशिष्ट-1
२.परिशिष्ट-2
३.परिशिष्ट-3✅✅✅
४.परिशिष्ट-4

6. सध्या समावर्ती सूचीमध्ये ----- विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे.
१.47✅✅✅
२.48
३.52
४.यापैकी नाही

7. भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
१.डॉ. आंबेडकर
२.डॉ. राजेंद्रप्रसाद✅✅✅
३.पंडित नेहरू
४.लॉर्ड माऊंटबॅटन

8. घटना मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
१.डॉ. राजेंद्रप्रसाद
२.डॉ. आंबेडकर✅✅✅
३.महात्मा गांधी
४.पंडित नेहरू

9. खालीलपैकी संसदेचे स्थायी सभागृह कोणते
१.लोकसभा
२.विधानसभा
३.राज्यसभा✅✅✅
४.विधानपरिषद

10. लोकसभापतीची निवड कोण करतो/करते?
१. लोकसभा सदस्य✅✅✅
२.मंत्रीमंडळ
३. राज्यसभा सदस्य
४. राष्ट्रपती


१) आर्थिक आणीबाणी राज्यघटनेतील कोणत्या कलमानुसार लागते ?
अ) कलम ३५२
ब) कलम ३५६
क) कलम 360 ✅✅✅
ड) कलम 365

२) ४४ व्या घटनादुरुस्तीने कलम ३५२ मधील कोणती तरतूद बदलण्यात आली ?
अ) युद्ध
ब) परकीय आक्रमण
क) अंतर्गत अशांतता✅✅✅
ड) वरीलसर्व

३) कोणतेही विधेयक (धनविधेयक सोडून) विधान परिषद किती दिवस विलंब करू शकते ?
अ) दोन महिने
ब) तीन महिने
क) चार महिने✅✅✅
ड) सहा महिने

४) भारतात कोणत्या केंद्रशाशीत प्रदेशाला स्वतःचे उच्च न्यायालय आहे ?
अ) चंडीगड
ब) लक्षद्वीप
क) दिल्ली✅✅✅
ड) महाराष्ट्र

५) कनिष्ठ न्यायालयावर देखरेख करण्याचा अधिकार कुणाला आहे ?
अ) उच्च न्यायालय✅✅✅
ब) सर्वोच्य न्यायालय
क) दोन्ही
ड) यापैकी नाही 

६) कोणत्या कलमानुसार उच्च न्यायालयात याचिका दाखल करता येते ?
अ) कलम १३
ब) कलम ३२
क) कलम २२६✅✅✅
ड) यापैकी नाही

७) केंद्र व राज्य यांच्यातील संबधावर प्रकाश टाकण्यासाठी १९८३ मध्ये कोणत्या आयोगाची नेमणूक करण्यात आली ?
अ) राजमन्नार आयोग
ब) सच्चर आयोग
क) सरकारिया आयोग✅✅✅
ड) व्ही. के. सिंग

८) राज्य घटनेतील कोणत्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली आहे ?
अ) कलम २८०✅✅✅
ब) कलम २८२
क) कलम २७५
ड) कलम २८४

९) आंतरराज्जीय नदी विवाद सोडविण्यासाठी राज्य घटनेत कोणत्या कलमाची तरतूद करण्यात आली आहे ?

अ) कलम २६१

ब) कलम २६२✅✅✅

क) कलम २६३

ड) कलम २६४

१०) निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमानुसार राज्यघटनेत आहे ?

अ) कलम ३२४✅✅✅

ब) कलम ३२५

क) कलम ३२६

ड) कलम ३२७

११) खालीलपैकी कोणती समिती निवडणुका सुधारनांशी संबंधित नाही ?

अ) संथानाम समिती ✅✅✅

ब) वांछू व गोस्वामी समिती 

क) तारकुंडे समिती 

ड) गोपालकृष्णन समिती 

१२) राष्टीय अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो ?

अ) पाच वर्षे✅✅✅

ब) सहा वर्षे 

क) तीन वर्षे

ड) दोन वर्षे

१३) राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कुणाची नियुक्ती होते ?

अ) उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

ब) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश

क) उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश

ड) सर्वोच्य न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीश✅✅✅

१४) आचारसंहिता तयार करण्याचे काम कोण करते ?

अ) केंद्र सरकार

ब) राज्य सरकार

क) जिल्हाधिकारी

ड) निवडणूक आयोग✅✅✅

१५) कलम १६९ नुसार विधानपरिषदेची निर्मिती करण्याचा अधिकार कुणाला असतो ?

अ) केंद्र

ब) राज्य✅✅✅

क) दोन्ही

ड) यापैकी नाही

राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन


1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.


2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष


3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष


4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष


5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष


7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू


 11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.


12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.


16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष


22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.


23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट


26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.


31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार


32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष


35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल


39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष


40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा


43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन


44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी


50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन


51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव


52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट


53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष


61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला

General Knowledge



● कोणत्या दिवशी ‘जागतिक द्रुक-श्राव्य वारसा दिवस’ साजरा करतात?

उत्तर : २७ ऑक्टोबर


● कोणत्या व्यक्तीची २६ ऑक्टोबर २०२१ रोजी कॅनेडा देशाचे नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली? 

उत्तर : अनिता आनंद


● कोणत्या संस्थेने ‘स्वस्थ महिला, स्वस्थ गोवा’ उपक्रमाचा प्रारंभ केला?

उत्तर : यूवुईकॅन फाउंडेशन


● कोणत्या संस्थेसोबत भारत सरकारचा ऐझवाल (मिझोरम) शहरातील गतिशीलतेच्या प्रकल्पाला वित्तपूरवठा करण्यासाठी ४.५ दशलक्ष डॉलर एवढ्या कर्जासाठी करार झाला?

उत्तर : आशियाई विकास बँक


● कोणत्या दिवशी “आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिवस” साजरा करतात? 

उत्तर : २८ ऑक्टोबर


●  कोणत्या संस्थेने HDFC बँकेद्वारे HDFC ERGO कंपनीच्या थकबाकी भांडवली समभागांमधील ४.९९  टक्क्यांच्या खरेदीला मंजूरी दिली?

उत्तर : भारतीय स्पर्धा आयोग


● ____ देशाच्या अध्यक्षतेखाली २७ ऑक्टोबर २०२१ रोजी १६ वी पूर्व आशिया शिखर परिषद आयोजित करण्यात आली.

उत्तर : ब्रुनेई


● कोणत्या मंत्रालयाने “संभव” नावाचा राष्ट्रीय स्तरावरील जागृती ई-कार्यक्रम आयोजित केला? 

उत्तर :  सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय


●  कोणत्या व्यक्तीची राष्ट्रीय वित्तीय पायाभूत सुविधा आणि विकास बँक (NaBFID) याच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली?

उत्तर :  के व्ही कामत

महाराष्ट्र शासनाने या संज्ञा दिल्या आहेत.काही महत्त्वाच्या संज्ञांचे अर्थ:


१) राज्याचा एकत्रित निधी (राज्यघटनेचा अनुच्छेद २६६/१) : राज्याला विविध मार्गातून मिळणारा संपूर्ण महसूल, राज्याद्वारे उभारलेले सर्व कर्ज आणि कर्ज परताव्यामध्ये राज्याला मिळणारे सर्व उत्पन्न म्हणजे राज्याचा एकत्रित निधी होय. शासनाच्या विविध कार्यावर होणारा खर्च या एकत्रित निधीतून भागविला जातो.


२) आकस्मिता निधी ( राज्यघटनेचा अनुच्छेद २६७/२) :अर्थसंकल्पात तरतूद न केलेले अकस्मात उद्भवलेले अत्यंत महत्त्वाचे खर्च भागविण्याकरिता किंवा अनेकदा केलेली तरतूद अपुरी असल्यामुळे आणि खर्च मात्र अत्यावश्यक असल्यास असा खर्च भागविण्याकरिता या आकस्मिता निधीची तरतूद केली जाते. हा खर्च पुढे पूरक मागण्यांच्या रूपात विधानमंडळात मंजुरीकरिता मांडण्यात येतो व त्याकरिता पुनर्विनियोजन करण्यात येते.


३) लोकलेखा (राज्यघटनेचा अनुच्छेद २६६/२) : यामध्ये एकत्रित निधीमध्ये अंतर्भूत केलेल्या रकमा वगळून शासनाला किंवा शासनाच्यावतीने मिळालेल्या इतर सर्व रकमा जमा करण्यात येतात. यातील व्यवहार बँकिंग व समायोजनाच्या स्वरूपाचे असल्याने यातून खर्च करण्यासाठी विधानमंडळाच्या मंजुरीची आवश्यकता नसते. म्हणजेच लेखांच्या बाबतीत राज्यशासन बँकरची भूमिका करीत असते आणि ज्यावर व्याज देत असते व परत करण्याची जबाबदारी राज्यशासनाची असते असा निधी अथवा लेखे.


उदा. अल्पबचतचे पैसे, प्रॉव्हिडंट फंडाचे पैसे, राज्यमार्ग निधी, शिक्षण उपकरनिधी इ. लोकलेखा स्वतंत्रपणे सांभाळला जातो आणि तो राज्याच्या एकत्रित निधीचा भाग असत नाही.


४) दत्तमत खर्च : राज्याच्या एकत्रित निधीतून करावयाच्या खर्चाच्या पै अन् पैची मान्यता ही विधानसभेतून घ्यावी लागते. यातील काही बाबी सोडल्या तर सर्व खर्च हा दत्तमत असतो म्हणजे ज्याला मतदानाने मंजुरी मिळवावी लागते. याचा अर्थ असा की विभागाच्या खर्चाच्या मागण्या या विधानसभेत मतदानाला टाकाव्या लागतात आणि त्या मतदानाने मान्य होतात.


५) भारित खर्च : हा खर्च मतदानाला टाकला जात नाही तर हा राज्याच्या एकत्रित निधीवर भारित असतो. त्यामुळे विधानसभा याला नाकारू शकत नाहीत. उदा. मा. न्यायमूर्ती, मा. राज्यपाल, मा. अध्यक्ष व उपाध्यक्ष विधानसभा, मा. सभापती व उपसभापती विधानपरिषद यांचे पगार, भत्ते आदींचा खर्च शासनाच्या कर्जावरील व्याजाचा खर्च, न्यायालयाच्या आदेशान्वये भागवायचा खर्च इत्यादी.


६) योजनांतर्गत खर्च : राज्याच्या वार्षिक योजनेअंतर्गत असलेला खर्च. हा खर्च संपूर्णपणे विकासात्मक खर्च असतो.


७) योजनेतर खर्च : योजनेतर खर्चात सर्वसाधारणपणे राज्याचे सर्व विकासेतर खर्च भागविले जातात. उदा. कर्मचाऱ्यांचे पेन्शन, कायदा सुव्यवस्था व करवसुली यावर येणारा खर्च, सामान्य प्रशासनावर येणारा खर्च इत्यादी.


८) महसुली लेखे : हे दोन प्रकारचे असतात.

A. महसुली जमा : राज्यशासनाचे सर्व प्रकारचे कर, सेस, शुल्क या माध्यमातून येणारे उत्पन्न, केंद्रीय कर व शुल्कातील राज्याला मिळणारा हिस्सा व करेतर उत्पन्न जसे की प्राप्त होणारे व्याज, फी, शास्तीचे उत्पन्न तसेच केंद्र शासनाकडून मिळणारी विविध अनुदाने याला महसुली जमा असे म्हणतात.

B. महसुली खर्च : राज्यप्रशासन, राज्य विधानमंडळ, करवसुली यावर होणारा खर्च, कर्ज परतफेड आणि व्याज प्रदान करणे. पेन्शन तसेच विविध संस्थांना अनुदाने देणे व शासनाच्या विविध विभागांतर्गत प्रशासकीय खर्च करणे.


९) भांडवली लेखे : हे खालील प्रकारचे असतात.


अ . महसुली लेखा बाहेरील भांडवली खर्च : शासनाने कायमस्वरुपी मत्ता निर्माण करण्याकरिता अथवा प्राप्त करण्याकरिता केलेले खर्च. जमीन अधिग्रहीत करणे, रस्ते अथवा पुलांचे बांधकाम, पाटबंधारे अथवा ऊर्जा निर्मिती वरील खर्च, वरील खर्च, कर्ज रोख्यातील गुंतवणूक, खाद्यान्नाची भांडारे इत्यादी भांडवली खर्चाचे प्रकार आहेत.

ब. भांडवली उत्पन्न : साधारणपणे शासनाच्या मत्तेच्या विक्रीतून प्राप्त झालेले उत्पन्न.


१०) महसुली तूट आणि महसुली शिल्लक : राज्याच्या अर्थसंकल्पात ज्यावेळी एकूण महसुली जमेपेक्षा महसुली खर्च अधिक असतो त्यावेळी त्याला महसुली तूट मानले जाते. परंतु ज्यावेळी जमा होणारा महसूल हा महसुली खर्च भागवून उरतो अधिक असतो त्याला महसुली शिल्लक म्हणतात. ‘महसुली शिल्लक चांगले’ तर महसुली तूट ही राज्याच्या अर्थव्यवस्थेत चिंताजनतक मानली जाते.


११) तुटीचा अर्थसंकल्प : महसुली व भांडवली लेखावरील एकूण उत्पन्नापेक्षा एकूण खर्च ज्यावेळी अधिक असतो त्यावेळी त्याला अर्थसंकल्पीय तूट असे म्हणतात.


१२) राजकोषीय तूट : वर उल्लेखित केलेल्या अर्थसंकल्पीय तुटीत भांडवली उत्पन्नातील कर्ज व इतर दायित्व समाविष्ट केल्यावर जी रक्कम तयार होते तिला राजकोषीय तूट असे म्हणतात.


१३) मागण्या : प्रत्येक विभागाला आपल्या विभागांतर्गत जो खर्च अपेक्षित आहे तो अर्थसंकल्पात समाविष्ट केला जातो व हा खर्च कशाकरिता करण्यात येणार आहे. याच्या स्पष्टीकरणासह मागणीच्या स्वरुपात तो विधानमंडळापुढे मंजुरीसाठी मांडावा लागतो.


१४) पूरक मागण्या : एखाद्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात अंदाजित केल्यापेक्षा अधिक खर्च एखाद्या बाबीवर होत असेल अथवा वार्षिक अर्थसंकल्प तयार करताना ज्या खर्चाची कल्पना करण्यात आली नसेल असा नवीन बाबींवरील खर्च, अर्थसंकल्पात तरतूद न केलेला आकस्मिक स्वरुपाचा खर्च करावा लागला असेल तर तो आकस्मिता निधीतून केला जाते व मग पूरक मागण्यांच्या स्वरुपात त्याच्या स्पष्टीकरणासह विधानसभेसमोर मंजुरीकरिता मांडावा लागतो.


१५) अधिक खर्चाच्या मागण्या : या मागण्या पूरक मागण्यापेक्षा भिन्न असतात. कारण पूरक मागण्यांमधील चालू आर्थिक वर्षाकरिता मागणी असते तर यामध्ये मागील वित्तीय वर्षात झालेल्या अधिकच्या खर्चाकरिता मागणी असते.


१६) विनीयोजन विधेयक : सर्व विभागांच्या खर्चाच्या मागण्या एकत्रितपणे मतास टाकून मंजूर झाल्यावर त्याचे कायद्यात रुपांतर करावे लागते याला विनियोजन विधेयक म्हणतात आणि या मागण्या समवेत जो भारित खर्च आहे त्याचा अंतर्भाव करून राज्याच्या एकत्रित निधीतून हा खर्च भागविण्याचे अधिकार शासनास याद्वारे प्राप्त होतात.


17. पुनर्विनियोजन विधेयक : पूरक मागण्या संदर्भात जे विधेयक येते त्याला पुनर्विनियोजन विधेयक असे म्हणतात.


१८) वित्तीय विधेयक : राज्याचा अर्थसंकल्प मांडताना भाषणाच्या दुसऱ्या भागात वित्तमंत्री करासंबंधीचे प्रस्ताव मांडतात. याच प्रस्तावाचे विधेयकात रूपांतर करण्याकरिता विधानसभेसमोर वित्तीय विधेयक मांडले जाते. या विधेयकामुळे कर कमी किंवा अधिक होतो अथवा त्यात सूट मिळते किंवा त्यावरची शास्ती इ. वाढते व यामुळेच वस्तूंचे भाव कमी अधिक होतात. लौकिक अर्थाने नागरिकांना भाव कमी अधिक होणे म्हणजेच बजेट वाटते.

जगातील सर्वात श्रीमंत देश



जगातील सर्वात श्रीमंत देश कोणता? असा प्रश्न जर तुम्हाला कोणी विचारला तर कदाचित तुमचे उत्तर 'युनायटेड स्टेट्स' असेल. मात्र, हे उत्तर सपशेल चुकीचे आहे. पर कॅपिटा इनकमच्या (प्रति व्यक्ती उत्पन्न) आधारावर जगातील टॉप-10 श्रीमंत देशांमध्ये यूएसएचा 8 वा क्रमांक लागतो.


सर्वाधिक श्रीमंत देशातील प्रति व्यक्ती उत्पन्न हे 97 लाखापेक्षा जास्त आहे. त्या तुलनेत भारताचे पर कॅपिटा इनकम जवळपास 3 लाख 77 हजार रुपये आहे. याचा अर्थ असा की, जगातील श्रीमंत देशातील लोक भारतीय व्यक्तीपेक्षा 30 पटीने जास्त कमवतात.


चला तर मग जाणून घेऊया. जगातील सर्वाधिक श्रीमंत देशांविषयी.


*1. कतार*


जगातील 10 रिचेस्ट कंट्रीत कतार या देशाचा पहिला क्रमांक लागतो. येथील प्रति व्यक्ती उत्पन्न जवळपास 97 लाख (146,000 डॉलर) रुपये आहे. पेट्रोलियम व लिक्विफाइड नॅचलर गॅस हे या देशाचे उत्पन्नाचे स्रोत आहे. सरकारला 85 टक्के महसूल निर्यातीमधून मिळतो.


*2. लक्झेमबर्ग*


 लक्झेमबर्ग हा जगातील दुसरा श्रीमंत देश आहे. प्रति व्यक्ती उत्पन्न: 94,000 डॉलर (62 लाख 44 हजार रुपये) आहे. फायनान्शियल सेक्टर, इंडस्ट्री व स्टील सेक्टर हे या देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा समजले जाते.


*3. सिंगापूर*


56 लाख 46 हजार रुपये (85,000 डॉलर) प्रति व्यक्ती उत्पन्नासोबत सिंगापूर जगातील तिसरा सर्वात श्रीमंत देश आहे.

फायनान्शियल सर्व्हिस सेक्टर, केमिकल एक्सपोर्ट इंडस्ट्री तसेच लिबरल इकोनॉमी पॉलिसी हे येथील अर्थव्यवस्थेचे उत्पन्नाचे स्रोत आहेत.


*4. ब्रुनेई*


 ब्रुनेई हा जगातील चौथा श्रीमंत देश आहे.

 प्रति व्यक्ती उत्पन्न: 80,000 डॉलर (53 लाख 14 हजार रुपये) आहे. येथील अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार क्रूड ऑईल व नॅचरल गॅस आहे.


*5. कुवेत*


 जगातील पाचवा सर्वात श्रीमंत देश कुवेत.

 प्रति व्यक्ती उत्पन्न: 72,000 डॉलर (47 लाख 83 हजार रुपये)

 अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार: पेट्रोलियम व एक्सपोर्ट रेव्हेन्यु


*6. नॉर्वे*


 जगातील सातवा सर्वात श्रीमंत देश नॉर्वे.

 प्रति व्यक्ती उत्पन्न: 68,000 डॉलर (45 लाख रुपये

 पेट्रोलियम पदार्थ येथील अर्थव्यवस्थेचा कणा


*7. युनायटेड अरब अमिरात (यूएई)*


 युनायटेड अरब अमिरातचे प्रति व्यक्ती उत्पन्न जवळपास 68,000 डॉलर (45 लाख रुपये) आहे.

 कच्चे तेल हे येथील अर्थव्यवस्थेचे प्रमुख साधन.


*8. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका*


 यूएसए जगातील आठवा सर्वाधिक श्रीमंत देश

 प्रति व्यक्ती उत्पन्न 57,000 डॉलर (37 लाख 86 हजार रुपये)

 ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री, टेक्नॉलॉजिकल सेक्टर, न्यू इनोव्हेशन येथील अर्थव्यवस्थेचा कणा समजला जातो.


*9. स्वित्झर्लंड*


 जगातील सर्वात सुंदर देशांची यादी स्वित्झर्लंडचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

 स्वित्झर्लंड हा जगातील 9 वा श्रीमंत देश आहे. येथील प्रति व्यक्ती उत्पन्न 56,000 डॉलर (37 लाख रुपये)

 बॅंकींग सेक्टरचे येथील अर्थव्यवस्थेला मोठे योगदान आहे.


*10. सौदी अरब*


 सौदी अरब हा जगातील 10 वा सर्वात श्रीमंत देश आहे. 

प्रति व्यक्ती उत्पन्न लगभग 56,000 डॉलर (37 लाख रुपये) आहे.

 येथील अर्थव्यवस्थेला पेट्रोलियम सेक्टरचे महत्वपूर्ण योगदान आहे.