02 December 2021

जिल्हे निर्मिती

रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)-1 मे 1981

औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),-16 ऑगस्ट 1982

चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)-26 ऑगस्ट 1982

मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)-1990

धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)1 जुलै 1998

अकोल्यापासून – वाशिम (33 वाशिम जिल्हा)
 
परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)-
1 मे 1999

भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा-1 ऑगस्ट 2014 )

सोलापूर जिल्हा - महत्त्वाची माहिती

भौगोलिक माहिती :-
सोलापूर जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ १४,८४४.६ चौरस किलोमीटर आहे.सोलापुरातील सरासरी पर्जन्यमान ५४५.४ मिलिमीटर (महाराष्ट्रातील सर्वात कमी पर्जन्याचा ) आहे. जिल्ह्याची लोकसंख्या ३८,४९,५४३(इ.स. २००१) आहे. भीमा नदीजिल्ह्यातील प्रमुख नदी आहे. जिल्ह्यात डोंगराळ भाग जवळजवळ नाही.

सोलापूर जिल्ह्याच्या उत्तरेस  अहमदनगर  व  उस्मानाबाद पूर्वेला उस्मानाबाद, दक्षिणेस सांगली व विजापूर जिल्हा व (कर्नाटक) तर पश्र्चिमेस सांगली, सातारा व पुणे हे जिल्हे आहेत. जिल्ह्याच्या उत्तर, ईशान्य व पूर्व भागात बालाघाटच्या डोंगररांगा आहेत. तसेच पश्र्चिम व नैर्ऋत्य या भागांत महादेवाचे डोंगर आहेत. जिल्ह्याचा इतर भाग सपाट, पठारी आहे. या जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण व कोरडे आहे, तसेच थोडे विषमही आहे. काही भागांत उन्हाळ्यात कमाल तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत जाते.

जिल्ह्यात वायव्येकडून आग्नेयेकडे वाहणारी भीमा जिल्ह्याचे दोन भाग करते. भीमेची जिल्ह्यातील लांबी सुमारे २९० कि.मी. आहे. भीमा पंढरपूर येथे चंद्रभागा या नावाने ओळखली जाते. नीरा-भीमासंगम माळशिरस तालुक्यात, तर भीमा-सीना संगम दक्षिण सोलापूर तालुक्यात हत्तरसंग-कुडल येथे होतो. जिल्ह्यातून सीना, नीरा, भोगावती, हरणी, बोटी, माण या छोट्या-मोठ्या नद्या वाहतात.

सोलापूर-पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर माढा तालुक्यात उजनी(१२१ टी. एम. सी ) येथे भीमा नदीवर धरण बांधण्यात आलेले आहे. या धरणामुळे सोलापूर शहरासह जिल्ह्याच्या पश्र्चिम व मध्य भागांत पाणीपुरवठा सुलभतेने होतो. १९८० मध्ये बांधून पूर्ण झालेल्या उजनी धरणाच्या जलाशयाला यशवंतसागर असे म्हटले जाते. शेतीसाठी सिंचन, पिण्यासाठी पाणी, उद्योगांना पाणी, साखर कारखान्यांना पाणी, विद्युतनिर्मिती असे अनेक उद्देश साध्य करणारा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या धरणाच्या परिसरात फ्लेमिंगो(हा स्थलांतरित पक्षी ) (रोहित) पक्षी आढळतात. भीमा-सीना जोडकालव्यामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांना लाभ होतो. भीमा-सीना बोगदा हा आशिया खंडातील सर्वांत मोठा(?) बोगदा आहे. उजनी धरणातून या बोगद्याद्वारे सीना नदीत पाणी सोडले जाते. याचबरोबर जिल्ह्यात सहा (६) मध्यम प्रकल्प आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यात एकरूखे (हिप्परगी) तलाव आहे. याचाही फायदा आसपासच्या भागांतील लोकांना होतो.

भारताचे विविध देशासोबत चालणारे युद्ध सराव

◆युद्ध अभ्यास:- भारत आणि अमेरिका

◆ मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया

◆प्रबल दोस्त्यांक :- भारत आणि कझाकिस्तान

◆मलबार:- भारत , जपान आणि अमेरिका

◆सहयोग कायजीन - भारत व जपान तटरक्षक दल

◆शक्ती :- भारत आणि फ्रान्स लष्करी

◆Lamitye :-भारत आणि सेशल्स

◆इंद्र :- भारत आणि रशिया

◆गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया

◆सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ

◆कोब्रा गोल्ड:- थायलंड, भारत ,जपान आणि मलेशिया

◆वरूण:- भारत आणि फ्रान्स नौदल

◆Ekuverin:- भारत आणि मालदीव

◆मित्रशक्ती - भारत आणि श्रीलंका

◆समप्रिती- भारत आणि बांगलादेश

◆सिमबेक्स- भारत आणि सिंगापूर नौदल

◆Ausindex - भारत आणि ऑस्ट्रेलिया

◆गरुडा - भारत आणि फ्रान्स वायुदल सराव.

आरोग्यविषयक सरकारच्या महत्त्वाच्या योजना

1.जीवनदायी आरोग्य योजना :-

दारिद्रय़ रेषेखालील कुटुंबांसाठी 
१९९७-९८ पासून राबविण्यात येत आहे.

या योजनेअंतर्गत रुग्णांना मेंदूरोग, मूत्रविकार तसेच मज्जारज्जू यांसाठी आíथक साहाय्य दिले जाते.

योजनेअंतर्गत प्रतिरुग्णास ५० हजार इतके अर्थ साहाय्य दिले जात असे.मात्र ही रक्कम आता २००६-०७ पासून एक लाख ५० हजार इतकी करण्यात आली आहे.

राज्य सरकारने सध्या अस्तित्वात असलेल्या जीवनदायी रचनेचे पुनर्रचना करून सर्वसमावेशक राजीव गांधी जीवनदायी योजना तयार केली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2.राजीव गांधी जीवनदायी योजना :-

ही योजना महाराष्ट्र सरकारने २ जुलै २०१२ पासून सुरू केली..

राज्यातील आíथक दुर्बल घटकांना दुर्धर व गंभीर आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया करणे शक्य व्हावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली.

या योजनेअंतर्गत पिवळेकार्डधारक म्हणजे दारिद्रय़्ररेषेखालील व केशरी शिधापत्रधारक जे दारिद्रय़रेषेच्या वर आहेत, मात्र ज्यांचे वार्षकि उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे.

या योजनेअंतर्गत लाभार्थीक दीड लाखांपर्यंत वैद्यकीय सेवा उपलब्ध होणार आहे.

या योजनेत पात्र लाभार्थीना हेल्थ कार्ड दिले जाईल.ज्यात कुटुंबप्रमुख व सदस्यांची नावे व फोटो असतील.

राज्य सरकार लाभार्थीच्या नावे विमा काढणार असून त्या विम्याचा हप्ता राज्य सरकार भरणार आहे.लाभार्थी कुटुंबाकडून कोणतीही रक्कम स्वीकारली जाणार नाही.

या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड या विमा कंपनीशी करार करण्यात आला आहे.

ही योजना संपूर्णत: कॅशलेश असून रग्णाला या योजनेअंतर्गत कोणताही खर्च करावा लागणार नाही.

या योजनेअंतर्गत रग्णालयातील उपचार, निदान, आवश्यक औषधोपचार, शुश्रूषा, भोजन तसेच एक वेळचा परतीचा खर्च यांचा समावेश आहे.

या योजनेअंतर्गत रुग्णाला रुग्णालयातून मुक्त केल्यानंतर दहा दिवसांपर्यंतचा फेरतपासणीचा समावेश आहे.

या योजनेच्या पहिल्या टप्प्यात गडचिरोली, अमरावती, नांदेड, सोलापूर, धुळे, रायगड, मुंबई व मुंबई उपनगर या आठ जिल्ह्य़ांचा समावेश आहे.

राज्यातील शासकीय व खाजगी अशी जवळ जवळ १२० रग्णालये यात समाविष्ट झाली आहेत.

या योजनेत रुग्णाला रुग्णालयात भरती करताना मदत व्हावी यासाठी आरोग्यमित्र यांची नेमणूक करण्यात आली आहे. 
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

3.जननी बाल ( शिशू) सुरक्षा योजना :-

राष्ट्रीय आरोग्य मोहिमेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून बालसुरक्षा योजना राबविली जाते.

महाराष्ट्राची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्यात याची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.

ही योजना ०१ जून २०११ रोजी सुरू करण्यात आली.

भारतात प्रथमच अशा एखाद्या योजनेद्वारे पुढील वैधानिक अधिकार देण्यात आले आहेत.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📗 मातांचे वैधानिक अधिकार :-

सर्व शासकीय रग्णालयांत मोफत बाळंतपण सुविधा, सिझेरिअन ऑपरेशनसहित पुरवली जाईल.

दवाखान्याच्या कालावधीतील साधारणत: बाळंतपणाच्या वेळेस तीन दिवस व सिझेरिअनच्या वेळेस सात दिवसांपर्यंतचा आहार मोफत देण्यात येईल.

सर्व प्रकारची औषधे, फॉलिक अ‍ॅसिडच्या गोळ्या, सर्व प्रकारच्या चाचण्या- उदा. रक्त तपासणी, मूत्र तपासणी तसेच सोनोग्राफी मोफत केली जाईल, तसेच अडचणींच्या वेळेस मोफत रक्तपुरवठय़ाची सोय केली जाईल.

आजारी नवजात बालकाचे वैधानिक अधिकार.

आजारी नवजात शिशूला- म्हणजे ३० दिवसांच्या आतील शिशूला आवश्यक ते सर्व उपचार, औषधे, आहार, तपासण्या सर्व मोफत दिल्या जातील. त्याचबरोबर मोफत वाहतूक सुविधादेखील उपलब्ध होतात.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे प्रमुख

- पंजाब आणि सिंध बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: एस. हरीशंकर

- बॅक ऑफ महाराष्ट्र
मुख्यालय: पुणे
प्रमुख: ए. एस. राजीव

- युको बॅंक
मुख्यालय: कोलकाता
प्रमुख: अतुल कुमार गोयल

- इंडियन ओव्हरसिज बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: कमाम सेकर

- सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: पल्लव मोहापात्रा

- इंडियन बॅंक
मुख्यालय: चेन्नई
प्रमुख: पद्मजा चुनदूरू

- बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: दीनबंधू मोहापात्रा

- युनियन बॅंक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: राजकीरण राय जी.

- कॅनरा बॅंक
मुख्यालय: बेंगलोर
प्रमुख: आर. ए. शंकर नारायणन

- बॅंक ऑफ बडोदा
मुख्यालय: वडोदरा
प्रमुख: पी. एस. जयकुमार

- पंजाब नॅशनल बॅंक
मुख्यालय: नवी दिल्ली
प्रमुख: सुनिल मेहता

- स्टेट बँक ऑफ इंडिया
मुख्यालय: मुंबई
प्रमुख: रजनिश कुमार

भारत केंद्रीय अर्थसंकल्प.

🅾  तसेच संदर्भित वार्षिक वित्तीय स्टेटमेन्ट लेख 112 मध्ये भारतीय राज्यघटना ,  वार्षिक बजेट आहे भारत प्रजासत्ताक . सरकार फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी सादर करते जेणेकरून एप्रिलमध्ये नवीन आर्थिक वर्षाच्या सुरूवातीस आधी ते पूर्ण केले जाऊ शकेल. 2016 पर्यंत तो फेब्रुवारीच्या शेवटच्या काम दिवशी सादर करण्यात आला अर्थमंत्री मध्ये संसदेत . वित्त विधेयक आणि विनियोजन विधेयक सादर करून अर्थसंकल्प १ एप्रिल रोजी लागू होण्यापूर्वीच लोकसभेने मंजूर केले पाहिजे, म्हणजे भारताच्या आर्थिक वर्षाची सुरुवात .

🅾एक अंतरिम बजेट हे 'व्होट ऑन अकाउंट' सारखे नसते. 'व्हॉट ऑन अकाउंट' हा सरकारच्या बजेटच्या खर्चाच्या बाजूनेच आहे. अंतरिम बजेट हा खर्च आणि पावती या दोन्ही खात्यांचा एक संपूर्ण संच आहे. एक अंतरिम बजेट संपूर्ण बजेट प्रमाणेच संपूर्ण आर्थिक विधान देते. कायदा केंद्र सरकारला कर बदल लागू करण्यास अपात्र ठरवित नाही, सामान्यत: निवडणुकीच्या वर्षात, सलग सरकारांनी अंतरिम अर्थसंकल्पात आयकर कायद्यात कोणतेही मोठे बदल करणे टाळले आहे. 

🅾सप्टेंबर 2017 पर्यंत म्हणून , मोरारजी देसाई 10 सर्वाधिक संख्या आहे व त्यानंतर जे खर्चाचे अंदाजपत्रक सादर केले पी चिदंबरम यांनी च्या 9 आणि प्रणव मुखर्जी यांनी 'चे 8 यशवंत सिन्हा , यशवंतराव चव्हाण आणि चिंतामणराव देशमुख यांनी सादर केले आहेत प्रत्येकी 7 खर्चाचे अंदाजपत्रक मनमोहन सिंग आणि टीम कृष्णम्माचारी आहे 6 अर्थसंकल्प सादर केले.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

जाणून घ्या :- भारत सरकारच्या योजना

1. नीति आयोग - 1 जनवरी 2015

2. ह्रदय योजना -21 जनवरी 2015

3. बेटी बचाओ बेटी पढ़ाओं -22 जनवरी 2015

4. सुकन्या समृद्धि योजना -22 जनवरी 2015

5. मुद्रा बैंक योजना -8 अप्रैल 2015

6. प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना -9 मई 2015

7. अटल पेंशन योजना -9 मई 2015

8. प्रधानमंत्री जीवन ज्योति योजना -9 मई 2015

9. उस्ताद योजना (USTAD) -14 मई 2015

10. प्रधानमंत्री आवास योजना -25 जून 2015

11. अमरुत योजना(AMRUT) -25 जून 2015

12. स्मार्ट सिटी योजना -25 जून 2015

13. डिजिटल इंडिया मिशन -1 जुलाई 2015

14. स्किल इंडिया मिशन -15 जुलाई 2015

15. दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योति योजना -25 जुलाई 2015

16. नई मंजिल -8 अगस्त 2015

17. सहज योजना -30 अगस्त 2015

18. स्वावलंबन स्वास्थ्य योजना - 21 सितंबर 2015

19. मेक इन इंडिया -25 सितंबर 2015

20. इमप्रिण्ट इंडिया योजना - 5 नवंबर 2015

21. स्वर्ण मौद्रीकरण योजना -5 नवंबर 2015

22. उदय योजना (UDAY) -5 नवंबर 2015

23. वन रैंक वन पेंशन योजना -7 नवंबर 2015

24. ज्ञान योजना -30 नवंबर 2015

25. किलकारी योजना -25 दिसंबर 2015

26. नगामि गंगे, अभियान का पहला चरण आरंभ -5जनवरी 2016

27. स्टार्ट अप इंडिया -16 जनवरी 2016

28. प्रधानमंत्री फसल बीमा योजना -18 फरवरी 2016

29. सेतु भारतम परियोजना -4 मार्च 2016

30. स्टैंड अप इंडिया योजना - 5 अप्रैल 2016

31. ग्रामोदय से भारत उदय अभियान -14अप्रैल 2016

32. प्रधानमंत्री अज्वला योजना - 1 मई 2016

33. प्रधानमंत्री कृषि सिंचाई योजना - 31 मई 2016

34. राष्ट्रीय आपदा प्रबंधन योजना -1 जून 2016

35. नगामी गंगे कार्यक्रम -7 जुलाई 2016

36. गैस फॉर इंडिया -6 सितंबर 2016

37. उड़ान योजना -21 अक्टूबर 2016

38. सौर सुजला योजना -1 नवंबर 2016

39. प्रधानमंत्री युवा योजना -9 नवंबर 2016

40. भीम एप - 30 दिसंबर 2016

41. भारतनेट परियोजना फेज - 2 -19 जुलाई 2017

42. प्रधानमंत्री वय वंदना योजना -21 जुलाई 2017

43. आजीविका ग्रामीण एक्सप्रेस योजना -21 अगस्त 2017

44. प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना- सौभाग्य -25 सितंबर 2017

45. साथी अभियान -24 अक्टूबर 2017

46. दीनदयाल स्पर्श योजना- 3 नवंबर 2017

स्पर्धा परीक्षा साठी महत्त्वाचे प्रश्नसंच

1) 100 अंश सेल्सिअस तापमानाला वाफेमुळे भाजण्याची तीव्रता वाढते याचे कारण काय ?

👉 उच्च अप्रकट ऊष्मा

2)रमण परिणाम कशाशी संबंधित आहे ?

👉 फोटॉन

3)हालचाल वाहतूक पोलीस वाहनाचा वेग तात्काळ मोजण्यासाठी जी उपकरण वापरतात त्यातून  काय प्रक्षेपित होते ?

👉रेडिओ लहरी

4)एक टॉर म्हणजे...... मिलिमीटर चा पारा.

👉 1 मिलीमीटर

5) पृथ्वीवरील येणाऱ्या वैश्विक किरणांच्या जवळजवळ 90 टक्के...... आहेत .

👉प्रोटॉन

6)एखादे वाहन वर्तुळाकार वळण घेत असताना कुठल्या प्रकारच्या शक्तीचा अनुभव वाहनचालकाला येतो ?

👉सेंट्रीपेटल फॉर्स

7)अल्बर्ट आईन्स्टाईन यांना दिले गेलेले नोबेल पारितोषिक ......या क्षेत्रातील संशोधन आणि निर्मितीसाठी होते.

👉 फोटोईलेक्ट्रिक प्रभाव

8) प्रतिसेकंद न्यूटन मीटर चे प्रतिनिधीत्व हे .......आहे

👉वॅट

9)समुद्राच्या पाण्याचे रंग निळा असण्याचे कारण काय ?

👉पाण्यामुळे निळा रंग सर्वाधिक विखुरला जातो .

10)हेलियम च्या अणुतील दोन इलेक्ट्रॉन्स निघून गेल्यास त्याला काय म्हणता येईल ?

👉अल्फा किरण

11) चंद्रशेखर वेंकट रमण यांना रमान इफेक्ट साठी नोबेल पुरस्कार कोणत्या वर्षी देण्यात आला ?

👉1930

11)अलीकडे शोधलेले इंटरस्टीटीयम ला ...... हे नाव दिले आहे ?

👉मानवी शरीरातील अवयव

12) कोणत्या वस्तूवर त्याचे जडत्व अवलंबून असते?

👉 वस्तुमान

13) गतीमान वस्तूचा वेग दुप्पटीने वाढला असता गतिज ऊर्जेवर काय परिणाम होईल ?

👉 चौपटीने वाढेल

14)तापमान व दाब स्थिर असताना समान आकारमानाचा वायू तील रेणूंची संख्या समान असते हे कोणत्या नियमानुसार सांगितले आहे ?

👉अंहोगँड्रॉ चा नियम

15) पदार्थाचे स्थायुरूप आतून एकदम वायुरूपात अवस्थांतर होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ?

👉 संप्लवन

पोलीस भरती - सराव प्रश्नसंच विषय - अंकगणित

१) १ ते १७ या संख्याची बेरीज किती ?

अ ) १४४ ब ) १६२ क ) १७१ ड ) १५३ 


२)मोठ्यात मोठी ५ अंकी संख्या व लहानात लहान ४ अंकी संख्या यातील फरक किती ?

अ ) ९०,०००  ब ) ९८, ९९९  क) ९,००० ड ) ९०,००१ 

३)  राहुल शंभर पायऱ्या चढून एका मंदिरात जातो . वर जाताना त्याने प्रत्येक  पायरीवर  तिच्या क्रमांकाएवढी फुले ठेवल्यास त्यास किती फुले सोबत न्यावी लागतील ?

अ ) ४,५००  ब ) ५,००० क ) ५०५० ड ) ५,५००


४) १०.५ + १.०५ + १०५ = ?

अ ) ११६.५५ ब ) ३१५ क ) ११७ ड ) ११६.५


५) अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला ८ ने भागल्यास बाकी ४ उरते , १२ ने भागल्यास बाकी ८ उरते व १५ ने भागल्यावर बाकी ११ उरते ? 


अ ) ११६ ब  ) ५६  क ) १७६ ड ) २३६ 


६) खालील दिलेल्या कोणत्या अपूर्णांकाची किंमत सर्वात जास्त आहे ? 

अ ) २     ब )  ५     क ) ९      ड ) १५

     ---          ---          ---           ---

      ७           ८           १२           १८

७) एका नावेत सरासरी ३० Kg वजनाची मुले बसली आहेत . नावाड्यासह सर्वांचे सरासरी वजन ३१ Kg आहे . तर नावाड्याचे वजन किती ? 

अ ) ६१ ब ) ६२ क ) ५९ ड ) ५१


८) एका वस्तूची किंमत २५% ने कमी झाल्याने ती वस्तू आता २७० रुपयास मिळते तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?

अ ) ३६० ब ) ४८० क ) ५४० ड ) ४००


९) एकाच प्रकारचे २५ टेबल काही रकमेस विकल्यामुळे ४०% नफा झाला , तर प्रत्येक टेबलवर शेकडा नफा किती ?

अ ) २०% ब ) ४०% क ) ५/६ % ड ) सांगता येत नाही 


१०) साडेचार किलो ग्रॅम बेसनाच्या दीडशे ग्रॅमची एक याप्रमाणे किती पिशव्या तयार होतील ?

अ ) २५ ब ) ३० क ) ३५ ड ) २० 


उत्तर : १- ड  २- ब ३- क ४-अ  ५- अ  ६-ड  ७-अ  ८- अ  ९- ब  १०-ब


29 November 2021

भूगोल प्रश्नसंच


०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?

>>> बियास


०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?

>>>तिरुवनंतपुरम


०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?

>>>मध्य प्रदेश


०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.

>>>औरंगाबाद


०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?

>>> रांची


०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

>>> जळगाव


०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?

>>> लक्षद्वीप


०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?

>>> १२ लाख चौ.कि.मी.


०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?

>>> दख्खनचे पठार


१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

>>> मध्य प्रदेश


११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?

>>> उत्तर


१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?

>>> निर्मळ रांग


१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?

>>> नदीचे अपघर्षण


१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

>>> Lignite


१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

>>> औरंगाबाद


१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

>>> पाचगणी


१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?

>>> आसाम


१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?

>>> मणिपूर


१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?

>>> मरियाना गर्ता


२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?

>>> राजस्थान


२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?

>>> दुर्गा


२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?

>>> प्रशांत महासागर


२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?

>>> शुक्र


२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?

>>> गोदावरी


२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?

>>> आसाम


२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?

>>> मणिपुरी


२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?

>>> महाराष्ट्र


२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?

>>> आंध्र प्रदेश


२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?

>>> अरूणाचल प्रदेश


३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

>>> महाराष्ट्र


३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?

>>> हिमाचल प्रदेश


३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?

>>> गुजरात


३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?

>>> राजस्थान


३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?

>>> सिक्किम


३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?

>>> मध्य प्रदेश


३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

>>> नंदुरबार


३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?

>>> केरळ


३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?

> >> पूर्व विदर्भ


४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?

>>> अहमदनगर


४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?

>>> नर्मदा


४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?

>>> कृष्णा


४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?

>>> ९%


४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?

>>> उत्तर सीमेला


४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?

>>> ७२० किमी


४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?

>>> पंचगंगा


४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?

>>> ४४० कि.मी.


४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?

>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

इतिहास प्रश्नसंच


Q1) हडप्पा व मोहोंजदाडो या शहराचा उल्लेख विस्तृत सम्राज्याची जुड़वा राजधानी असा कोणी केला आहे ?   

1) पिग्गट ✔️    

2) जॉन मार्शल 

3) दयाराम सहानी    

4) विसेंट स्मिथ 


Q2) कापसाच्या कापडाचा तुकडा सिंधु संस्कृतीमध्ये कुठे सापडला ?

1) हडप्पा           

2) लोथळ          

3) राखीगढी             

4) 2 व 3✔️


Q3) सिंधु संस्कृतीतील नृत्तिकेची कांस्य मूर्ति कुठे सापडली ?

1) कालीबंगन   

*2) हडप्पा* ✔️          

3) मोहोंजोदाड़ो     

4) लोथल


Q4) हडप्पातील विटांचा आकार कसा होता ?

1) 1:2:3   

2) 1:2:4 ✔️  

3) 2:4:8            

4) 2:8:16


Q5) नांगरलेल्या शेताचा पुरावा सिंधु संस्कृतीमध्ये कोणत्या शहरात सापडतो 

1) लोथल           

2) हडप्पा ✔️         

3) कालीबंगन             

4) राखीगढ़ी


Q6) ऋग्वेदिक संस्कृतीचा काळ कोणाता मानला जातो ?

1) इ.स. पूर्व 1500 ते इ.स.पूर्व 1000 ✔️              

2) इ.स.पूर्व 1000 ते इ.स.पूर्व 600   

3) इ.स.पूर्व 600        

4) इ.स.पूर्व 800 ते इ.स.पूर्व 600

 

Q7) वैदिक काळाची विभागणी केली जाते.

1) पूर्व वैदिक - उत्तर वैदिक✔️   

2) ऋग्वेदिक - अथर्व वैदिक 

3) वैदिक - पौराणिक   

4) यांपैकी नाही


Q8) आर्य शब्दाचा शब्दश: अर्थ आहे.

1) वीर / योद्धा   

2) श्रेष्ठ ✔️         

3) यज्ञकर्ता            

4) विद्वान


Q9) प्रारंभिक आर्यच्या बाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही ?

1) संस्कृत बोलत होते   

2) ते घोडेस्वारी करत होते 

3) ते अनेक टोळ्यांनी भारतात आले  

4) ते नगरात राहत असत. ✔️


Q10) ऋग्वेदिक आर्यांचा मुख्य व्यवसाय काय होता ?

1) शेती           

2) पशुपालन✔️  

3) व्यापार        

4) शिक्षण / अध्यापन

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९ ✅✅✅
4) ९१२

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

1) सोडियम क्लोरेट ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3]  जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर

1)  त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ
2) ब ✅✅✅
3) ड
4) ई

6]  खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅✅✅

7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२                                                                                                                                       2) २३५.२
3) २३०.५२
4) २.३५२ ✅✅✅

8]  त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय .

1) वेग ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन

9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात . - Not Attempted

1)  निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅

10]   हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

वेग, वेळ आणि अंतर विषयी संपूर्ण माहिती


नमूना पहिला –

उदा.  300 मीटर लांबीच्या ताशी 72 कि.मी. वेगाने जाणार्‍या आगगाडीच्या एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल?
45 से.
15 से.
25 से.
35 से.
उत्तर : 15 से.
क्लृप्ती :-एका तासाचे सेकंद = 3600 व 1 कि.मी. = 1000 मी. 3600/1000=18/5, या आधारे वेग व वेळ काढताना 18/5 ने गुणा व अंतर काढताना 5/18 ने गुणा. खांब ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी/ताशी वेग × 18/5 ∶:  300/72×18/5=15 सेकंद

 नमूना दूसरा –
उदा. ताशी 40 कि.मी. वेगाने जाणार्‍या 400 मीटर लांबीच्या मालगाडीस 400 मीटर लांबीचा पूल ओलांडण्यास किती वेळ लागेल?
1मि. 12से.
1मि. 25से.
36से.
1मि. 10से.
उत्तर : 1मि. 12से.
क्लृप्ती :-एकूण कापावयाचे अंतर = गाडीची लांबी + पूलाची लांबी = 400+400 =800 मि.
पूल ओलांडण्यास लागणारा वेळ = गाडीची लांबी + पूलाची लांबी/ताशी वेग × 18/5

 नमूना तिसरा –
उदा. ताशी 54 कि.मी. वेगाने जाणारी आगगाडी एक विजेचा खांब 18 सेंकदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी किती?
540मी.
162मी.
270मी.
280मी.
उत्तर : 270 मी.
सूत्र :- गाडीची लांबी = वेग × वेळ × 5/18 = 54×18×5/18 = 270 मी.

 नमूना चौथा –
उदा. 800 मी. अंतर 72 सेकंदात ओलांडांनार्‍य गाडीचा ताशी वेग किती कि.मी. ?
54 कि.मी.
40 कि.मी.
50 कि.मी.
60 कि.मी.
उत्तर : 40 कि.मी.  
क्लृप्ती :-वेग = अंतर/वेळ ×18/5 = 800/72 × 18/5 = 40 (वेग काढताना 18/5 ने गुणणे)

 नमूना पाचवा –
उदा. मुंबईला नागपूरला जाणार्‍या दोन गाड्यांपैकी ताशी 60 कि.मी. वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7.30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 कि.मी. वेगाने सकाळी 8.30 वाजता सुटली, तर त्या एकमेकीस किती वाजता भेटतील?
दु.12 वा.
12.30 वा.
1.30 वा.
11.30 वा.
उत्तर : 12.30 वा.
क्लृप्ती :-भेटण्यास दुसर्‍या गाडीला लागणारा वेळ = वेळेतील फरक × पहिल्या गाडीचा/वेगातील फरक = 1 तास×60/75-60 = 60/15 = 4 तास
 

नमूना सहावा –
उदा. मुंबई ते गोवा हे 540 कि.मी. अंतर. मुंबईहून सकाळी 8.30 वा. सुटलेल्या ताशी 60 कि.मी. वेगाने जाणार्‍या गाडीची त्याचवेळी गोव्याहून सटलेल्या ताशी 75 कि.मी. वेग असलेल्या गाडीशी किती वाजता भेट होईल?
दु.12.30 वा.
दु.12वा.
दु.1.30 वा.
दु.1वा.
उत्तर : दु.12.30वा.
क्लृप्ती :- लागणारा वेळ = एकूण अंतर/दोन गाड्यांच्या वेगांची बेरीज

 नमूना सातवा –
उदा. ताशी 60 कि.मी. सरासरी वेगाने जाणारी आगगाडी, जर ताशी 75 कि.मी. वेगाने गेल्यास निर्धारित मुक्कामावर 48 मिनिटे लवकर पोहचली, तर त्या गाडीने एकूण किती प्रवास केला?
300 कि.मी.
240 कि.मी.
210 कि.मी.
270 कि.मी.
उत्तर : 240 कि.मी.

स्पष्टीकरण :-60 व 75 चा लसावी = 300
300 ÷ 60 = 5 तास     :: 60 मिनिटे फरक = 60×5=300 कि.मी.
300 ÷ 75 = 4 तास     :: 48 मिनिटे फरक = 4×60 = 240 कि.मी.

१८५७ च्या उठावाच्या अपयशाची कारणे कोणती?


🧩उठावाचे क्षेत्र मर्यादित :

🅾१८५७ चा उठाव सर्व हिंदुस्थानात एकाच वेळी झाला नाही दिल्ली औंध, बिहार, मध्य प्रदेश, बुंदेलखंड इ. प्रदेशात या बंडाचा फैलाव झाला. नर्मदेच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात उठाव झाला नाही. त्यामूळे इंग्रजांनी आपली शक्ती उत्तरेस एकवटून उठाव दडपून टाकाला.

🧩योग्य नेतृत्वाचा अभाव :

🅾उठावाला सर्वसामान्य नेता मिळू शकला असता तर उठाव यशस्वी होऊ शकला असता. इंग्रजांकडील सेनापती हे अत्यंत दक्ष व अनूभवी होते. उठाववाल्यांचे नेते त्यांची बरोबरी करु शकले नाहीत. नानासाहेब, तात्या टोपे, झाशीची राणी, कुंवरसिंह यांनी शिपायांचे नेतृत्व स्वीकारले परस्परांना सहकार्यही केले. यामधून सर्वमान्य नेतृत्व तयार होऊ शकले नाही. क्रांतीला योग्य दिशा देण्याची कामगिरी पार पाडणारा नेता पुढे येऊ शकला नाही.

🧩एकाच ध्येयाचा अभाव :

🅾१८५७ चा उठाव उच्च राष्ट्रीय ध्येयाने प्रेरित होऊन झालेला नव्हता उठाववाल्यांच्यात समान ध्येयाचा अभाव होता. हिंदी सैनिकांना ब्रिटिशांवरती सूड उगवायचा होता. बादशहा बहादूरशहहा यास आपली बादशाही पुन्हा निर्माण करावयाची होती. तर नानासाहेब पेशव्यांस आपली पेशवाई पुन्हा मिळवायची होती. झाशीची राणी मेरी झांशी मै नही दूंगी अशी गर्जना करुन रणमैदानात उतरली होती. सर्व नेत्यांमध्ये एकाच ध्येयाचा अभाव असल्यामुळे उठाव यशस्वी होऊ शकला नाही.

🧩नियोजनाचा अभाव :

🅾ब्रिटिशांच्या विरूध्द उठाव करण्याबाबत कोणत्या ठिकाणी कोणी उठाव कराव तसेच उठाव यशस्वी झाल्यानंतर पुढची वाटचाल कशी असावी, याबाबत नियोजनबध्द तयारी नव्हती इतिहासकारांच्या मतानुसार ३१ मे १८५७ ही उठावाची नियोजित तारीख होती. परंतु तत्पुर्वीच मिरतमधील सैनिकांनी व त्यापाठोपाठ इतर ठिकाणच्या सैनिकांनी उठाव केले. एकाच वेळी नियोजनबध्द उठाव न झाल्याने इंग्रजांनी उठाव दडपून टाकला.

🧩जनतेच्या पाठिंब्याचा अभाव :

🅾१८५७ च्या उठावात सामान्य जनता सहभागी झाली होती. परंतु ज्या प्रमाणात सामान्य माणसांचा पाठिंबा उठावास मिळावयास हवा होता. त्या प्रमाणात तो मिळाला नाही. दक्षिणेकडे सामान्य जनतेबरोबर सरंजामदार ही तटस्थ राहिले उठाववाल्यांनी प्रदेश आपल्या ताब्यात आल्यानंतर लुटालुट सुरू केली यामुळे सामान्य जनतेची त्यांना सहानुभुती मिळाली नाही.

🧩स्वार्थी व फुटीर लोकांची इंग्रजांना मदत :

🅾फोडा आणि झोडा ही ब्रिटिशांची राजकीय नीती होती. या धोरणाचा अवलंब ब्रिटिशांनी क्रांतीकारकांच्या हालचाली त्यांचे डावपेच सैन्य याबबतची माहिती पुरविणार्‍यांना बक्षिसे जहागीर, देण्याचे धोरण स्वीकारले. दुर्दैवाने स्वार्थापोटी क्रांतीकारकांची माहिती पुरविणारे देशद्रोही तयार झाले. फितुरीमुळे तात्या टोपेसारखे रणधूरंधुर सेनानी ब्रिटिशांच्या हाती लागले.

🧩लष्करी साहित्यातील तफावत :

🅾लष्करी साहित्यांच्या बाबतीत इंग्रज वरचढ होते. त्यांच्याकडे बंदुका, तोफा व इतर आधुनिक पध्दतीची शस्त्रास्त्रे होती. तर बंडवाल्यांकडे पारंपारिक शस्त्रास्त्रे होती. शस्त्रास्त्रामधील या तफावतीमुळे सर हयु रोज केवळ २ हजार सैन्यानिशी लढून तात्या टोपे यांच्या २० हजार फौजेचा त्याने पराभव केला लखनौममधील ब्रिटिश रेसिडेन्सीमधील अडकलेल्या २ हजार इंग्रजांनी १ लक्ष बंडवाल्यांच्या अपयशास कारणीभूत ठरली. १८५७ च्या उठावामधून पळून आलेला एक सैनिक म्हणतो. मला गोर्‍या इंग्रजांनी भीती वाटत नाही पण, त्यांच्या हाती असणार्‍या दोन नळीच्या बंदुकीची भीती वाटते.