05 May 2022

मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती

मुंबई प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण माहिती


1. मुंबई शहर ----------------

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – मुंबई            
   
क्षेत्रफळ – 157 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 31,45,966 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – नाहीत.
सीमा – उत्तरेस मुंबई उपनगर व दक्षिण-पूर्व या भागात अरबी समुद्र.

जिल्हा विशेष –----------------

1990 मध्ये बृहमुंबई जिल्ह्याचे विभाजन करून मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली.
राज्यात आकारमानाने किंवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान असलेला जिल्हा म्हणून मुंबई शहराची ओळख आहे. मुंबई हे भारताचे प्रवेशव्दार समजले जाते. 1857 मध्ये मुंबई विधापीठाची स्थापना झाली आणि मुंबई व महाराष्ट्राच्या शैक्षणिक प्रगतीचा पाया रोवला गेला. महत्वाचे शैक्षणिक केंद्र म्हणून नावलौकिक.
महाराष्ट्रची राजधानी, भारताची आर्थिक राजधानी, प्रथम क्रमांकाचे औधोगिक शहर.
1877 मध्ये मुंबई येथे शासनमान्य रोखेबाजार स्थापना करण्यात आला असून हा भारतातील पहिला व सुसंघटित रोखेबाजार मानला जातो.
प्रमुख स्थळे

दादर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची चैत्यभूमी.
गेट वे ऑफ इंडिया – प्रेक्षणिय स्थळ (1911 मध्ये राजा पाचवा जार्ज व राणी मेरी यांच्या स्वागतासाठी भारताचे प्रवेशव्दार बांधण्यात आले.)


2. मुंबई उपनगर ---------------

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – वांद्रे (बांद्रा)            
क्षेत्रफळ – 446 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 93,32,481 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – 3 – अंधेरी, बोरीवली, कुर्ला.
सीमा – उत्तरेस ठाणे जिल्हा, पूर्वेस ठाण्याची खाडी, दक्षिणेस मुंबई शहर, पश्चिमेस अरबी समुद्र.


जिल्हा विशेष –--------------------

साष्टी बेटाच्या दक्षिण भागात मुंबई उपनगर हा जिल्हा वसला आहे. लोकसंख्येच्या घनतेत या जिल्ह्याचा दूसरा क्रमांक आहे. मुंबई शहराचा पहिला क्रमांक लागतो.
जिल्ह्याच्या उत्तरेस कान्हेरीचे डोंगर आहे व येथेच कान्हेरी लेण्या आहेत.
सागर संपत्ती – मुंबई उपनगरास सागरकिनारा लाभला असून सभोवताली माहीमची खाडी असल्याने येथे मत्स्यव्यवसाय महत्वाचा ठरला. या माशांपासून कॉडलिव्हर ऑईलसारखी जीवनसत्वयुक्त तेले व औषधी तयार करतात. तसेच सागरी मिठाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.


प्रमुख स्थळे-------------------

माऊंट मेरी – सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान.
कान्हेरी लेणी – कान्हेरी डोंगरातील गुंफामध्ये खोदलेल्या लेण्यात भगवान बुद्धाच्या ध्यान-चिंतन अवस्थेतील अनेक सुंदर मूर्ती कोरल्या आहेत.
जुहू चौपाटी – पर्यटकांचे रमणीय स्थळ.
विरार तलाव व पवई तलाव – ही सहलीची ठिकाणे आहेत.
जोगेश्वरीची लेणी – या लेणीमध्ये शंकराच्या सुबक मुर्त्या आहेत.
संजय गांधी राष्ट्रीय उधान, इत्यादी
मुंबई प्रशासकीय विभाग म्हणजेच कोकण होय.
तालुका, पंचायत समिती व जिल्हा परिषद नसलेला एकमेव जिल्हा म्हणजे मुंबई शहर होय.
मुंबई उपनगर व मुंबई शहर या दोन जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही.

मुंबईच्या भायखळा भागात वीरमाता जिजाबाई उधान आहे.

मुंबईजवळचे मासेमारीचे मोठे केंद्र वर्सोवा
महाराष्ट्र कृषि उधोग विकास महामंडळाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण मुख्यालय मुंबई येथे आहे.

मुंबईतील दादर व नायगांव पासून महालक्ष्मी व भायखळा पर्यंतच्या भागास गिरणगांव मुंबई असे म्हणतात.
टाटा ईन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था मुंबई येथे आहे.

महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा मुंबई शहर (21,189 व्यक्ति प्रती चौ.कि.मी.)
मुंबईतील तलाव तुळशी, विरार व पवई हे आहेत.
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर (157 चौ.कि.मी)

मुंबईच्या महालक्ष्मी भागात घोड्यांच्या शर्यतीचे मैदान आहे.

महाराष्ट्रातील आधुनिक कत्तलखाना – देवनार (मुंबई)



3. ठाणे

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – ठाणे                
क्षेत्रफळ – 4,241 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 96,18,953 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – 07 – शहापूर, भिवंडी, मुरबाड, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ.
सीमा – उत्तरेस पालघर जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस रायगड जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला लागून नाशिक व अहमदनगर हे दोन जिल्हे आहेत.
जिल्हा विशेष –

राज्यात सर्वाधिक महानगरपालिका असलेल्या जिल्हा, ठाणे शहरास पूर्वी लष्करी स्थानक म्हणत. त्यावेळेस येथे लष्करी तळ होता. त्यावरूनच या शहरास थाणा व पुढे ठाणे असे नाव पडले.
ठाणे शहरात सोपारा येथे अशोकाचा शिलालेख व स्तूप आहे. त्यांच्याच काळात या भागात बोद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात प्रचार व प्रसार झाला.

प्रमुख स्थळे --------_--------

ठाणे – कोपिनेश्वराचे मंदिर प्रसिद्ध.
अंबरनाथ – डल्हासनगर तालुक्यातील मुंबई-पुणे लोहमार्गावर हे शहर वसले आहे. अंबरेश्वराच्या क्षेत्रामुळे या ठिकाणाला अंबरनाथ हे नाव पडले. या ठिकाणी दारूगोळा व शस्त्रास्त्रांचा कारखाना आहे.




4. पालघर

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – पालघर      
    
क्षेत्रफळ – 5,766 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 14,35,178
तालुके – 05 – विक्रमगढ, डहाणू, वसई, पालघर, ओवळा-मातीवडा
सीमा – उत्तरेस गुजरात राज्य व दादर-नगरहवेली हा संघशासित किंवा केंद्रशासित प्रदेश, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस ठाणे जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला लागून नाशिक व अहमदनगर हे दोन जिल्हे आहेत.

जिल्हा विशेष ---------------

1 ऑगस्ट 2014 रोजी ठाणे जिल्ह्याचे विभाजन करून पालघर हा जिल्हा निर्माण करण्यात आला. वसईचा भुईकोट किल्ला 23 मे 1739 रोजी थोरल्या बाजीराव पेशव्यांचे धाकटे भाऊ चिमाजी आप्पा यांनी पोर्तुगिजांकडून जिंकून घेतला.
प्रमुख स्थळे

पालघर – पालघर हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असून पालघर जवळ ‘तारापुर’ येथे भारतातील पहिला अणुविधुत प्रकल्प उभारण्यात आला आहे.

मनोर – वाहतुकीचे केंद्र
वसई – पोर्तुगीजाकडून चिमाजी आप्पांनी जिंकलेला ऐतिहासिक किल्ला.

वसईची केळी व विडयाची पाने प्रसिद्ध.
बोर्डी – हे एक रमणीय ठिकाण असून येथील किल्ला प्रेक्षणीय आहे. येथेच उद्वाडा हे पारशी लोकांचे पवित्र स्थळ आहे.

जव्हार – आदिवासींची बहुसंख्या दिसून येते. त्यामुळे आदिवासी उपाययोजणेमार्फत आदिवासींच्या विकासासाठी अनेक योजना राबविल्या जातात.
ठाणे हा जिल्हा राज्यातील सर्वाधिक महानगरपालिका असलेला जिल्हा आहे.

ठाणे जिल्ह्यातील महानगरपालिका – 1. ठाणे, 2. नवी मुंबई, 3. कल्याण-डोंबिवली, 4. भिवंडी-निजामपुर, 5. उल्हासनगर, 6. मीरा-भाईदर या आहेत.
ठाणे जिल्ह्यातील वाशी गावाच्या परिसरात नवी मुंबई वसविली आहे.
ठाणे जिल्ह्यात मोठा बोगदा पारसिक आहे.
ठाणे जिल्ह्याचे मुख्य पीक भात हे आहे.
पालघर जिल्ह्यात अणुशक्तीपासून वीज तयार करण्याचे केंद्र तारापुर ला आहे.
पालघर जिल्ह्यात काचेच्या बांगड्या चिंचणी व तारापुर येथे तयार होतात.

5. रायगड

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – अलिबाग          

क्षेत्रफळ – 7,152 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 26,35,394 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – 15 – कर्जत, पनवेल, उरण, मुरुड, पेण, रोहा, खालापूर, सुधागड, अलिबाग, माणगाव, म्हसाळे, श्रीवर्धन, महाड, पोलादपूर, तळा.
सीमा – उत्तरेस ठाणे जिल्हा , पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस रत्नागिरी जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला लागून पुणे जिल्हा आहे. आग्नेयेस सातारा जिल्हा.


जिल्हा विशेष -------------

पूर्वीचे नाव कुलाबा. या जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड हा किल्ला असल्याने या जिल्ह्याचे रहिवासी असलेले महाराष्ट्रचे माजी मुख्यमंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्या कारकिर्दीत कुलाबा जिल्हयांचे नामकरण 1 जानेवारी 1981 रोजी रायगड असे करण्यात आले.
शिवरायांचा उजवा हात म्हणून ज्यांची ओळख आहे ते तानाजी मालुसरे याच जिल्ह्यातील उमरठ गावचे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विधापीठाची स्थापना याच जिल्हयात लोणेर येथे करण्यात आली.


प्रमुख स्थळे ------------------

किल्ले – शिवरायांची समाधी व राजधानी असलेला प्रसिद्ध किल्ला रायगड येथेच आहे. कर्नाळा किल्ला, पाली किल्ला, मढ किल्ला हे प्रसिद्ध शिवकालीन किल्ले याच जिल्ह्यात आहेत.
गागोदे – आचार्य विनोबा भावे यांचे जन्मस्थान पेण तालुक्यात आहे.
खांदेरी किल्ला – जवळच चोला येथे बोद्धकालीन लेणी आहे.
अलिबाग – रायगड जिल्ह्याचे मुख्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाते. हे समुद्रकिनारी आहे. कान्होजी आंग्रे यांचे स्मारक.
हिराकोट – हा भुईकोट किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे.
शिरढोण – आध क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जन्मगाव.
महाड – चवदार तळ्याच्या सत्याग्रह येथेच झाला.
मुरुड-जंजिरा – अभेध असा जलदुर्ग.
माथेरान – थंड हवेचे ठिकाण.
घरापुरी – मुंबईपासून जवळ असलेल्या येथील ‘एलिफंटा कव्हेज’ रायगड जिल्ह्यात आहेत.
भिवपुरी जलविधुत केंद्र रायगड जिल्ह्यात आहे.
रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नांव कुलाबा हे होते.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय अलिबाग येथे आहे.
तकाई हे धार्मिक स्थळ रायगड या जिल्ह्यात आहे.
घारापुरी लेणी (एलिफंटा) रायगड जिल्ह्यात आहे.


6. रत्नागिरी

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – रत्नागिरी        
   
क्षेत्रफळ – 8,208 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 16,12,672 (सन 2011 च्या जनगणनेसुसार)
तालुके – 9 – मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, संगमेश्वर (देवरुख), लांजे.
सीमा – उत्तरेस रायगड जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सह्याद्रि पर्वतरांगेला लागून सातारा, सांगली व कोल्हापूर हे तीन जिल्हे आहेत.


जिल्हा विशेष ---------------

रत्नागिरी हा जिल्हा महाराष्ट्रमध्ये अनेक केल्ले असलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो.
रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये फुरसे हे नाव असलेले विषारी साप प्रामुख्याने आढळतात.
देशभक्त आणि समाज सेवकांचा जिल्हा. रत्नागिरीजवळच कुरबुडे येथे सुमारे 6.5 किमी. लांबीचा आशियातील सर्वात लांब बोगदा आहे.



प्रमुख स्थळे --------------


किल्ले – अंजनवेलचा किल्ला, शिवकालीन रत्नदुर्ग, जयगड, पूर्णगड, बाणकोट, मंडणगड, गोवळकोट, गोपाळगड, यशवंतगड, महिपतगड, जिवयगड, आंबोळगड, समळगड, रसाळगड इत्यादी अनेक किल्ले या जिल्ह्यात आहेत.

रत्नागिरी – लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान. वि.दा. सावरकर यांच्या सामाजिक कार्याची सुरवात रत्नागिरी मध्येच झाली. रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी भागेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे. सावरकरांनी इ.स.1929 मध्ये बांधलेले पतितपावन मंदिर येथे आहे.

मालगुंड ते पूर्णगड – ईल्मेनाईटचे साठे आढळतात.
गणपतीपुळे – रत्नागिरीपासून 40 कि.मी. अंतरावर गणपतीपुळे हे ठिकाण एक पर्यटन केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे.
समुद्रकिनार्‍यावरील गणपती मंदिर अष्टविनायकांपैकी एक स्थान.

गुहागर – हे तालुक्याचे ठिकाण असून येथील सुपारी व नारळ प्रसिद्ध आहे.

हर्णे – दापोली तालुक्यात हर्णे हे बंदर असून सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग किल्ला या ठिकाणी आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यात औषधे बनवण्याचे उधोग आंजर्ले व चिपळूण येथे आहेत.
देवरुखजवळ साडवली येथे सिट्रोनेला गवतापासून तेल काढतात.

स्टेनलेस स्टीलची भांडी तयार करण्याचा उधोग चिपळूणला आहे.

शाडू या मातीपासून गणपतीच्या मूर्ती तयार करतात.
पोलादी कानशी बनविण्याचा उधोग रत्नागिरी येथे आहे.
सिमेंट तयार करणे व होड्या बांधणे हे मोठे उधोग रत्नागिरी आहेत.

रत्नागिरीत छत्रपती शिवाजी स्टेडीयम आहे.
थिबाचा राजवाडा रत्नागिरीत आहे.

जहाज बांधण्याचा कारखाना मिर्‍या येथे आहे.
पावस गावी स्वामी स्वरूपानंदाची समाधी आहे.
दापोली तालुक्यात केळशी याकुबाबा यांचा दर्गा आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक भात हे आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात ईल्मेनाईट खनिज सापडते.


7. सिंधुदुर्ग

जिल्ह्याचे मुख्य ठिकाण – ओरोस बुद्रुक     
      
क्षेत्रफळ – 5,207 चौ.कि.मी.
लोकसंख्या – 8,48,868 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)
तालुके – 8 – कुडाळ, देवगड, सावंतवाडी, कणकवली, मालवण, वेंगुर्ले, वैभववाडी, दोडामार्ग.
सीमा – उत्तरेस रत्नागिरी जिल्हा, पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस गोवा व कर्नाटक राज्य, पूर्वेस सह्याद्री पर्वतरांगेला लागून कोल्हापूर जिल्हा आहे.


जिल्हा विशेष –---------------


रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन करून 1 मे 1981 ला महाराष्ट्र दिनाच्या शुभ माहूर्तावर सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा अस्तित्वात आला.
सिंधुदुर्ग या जिल्ह्यात महाराष्ट्रातील पहिला पवन विधुत प्रकल्प जमसांडे, ता. देवगड येथे उभयारण्यात आला.
प्रमुख स्थळे.

किल्ले  – विजयदुर्ग किल्ला, पदमदुर्ग, रंगणा, मनोहरगड, रामगड, यशवंत गड हे या जिल्ह्यातील महत्वाचे किल्ले आहेत.
कणकवली – भालचंद्र महाराजांचे समाधीस्थान.
अंबोली – निसर्गरम्य थंड हवेचे ठिकाण. अंबोलीपासून जवळच नारायणगड व महादेवगड हे डोंगरी किल्ले आहेत.

कणकेश्वर – यादवकालीन शिवमंदिर
विजयदुर्ग – शिवरायांनी बांधलेला जलदुर्ग.
फोंडा – सह्याद्री पर्वतावरचा घाट. फोंडा घाटातील मध प्रसिद्ध आहे.

देवगड – देवगड तालुक्यातील साळशी गावाजवळ सदानंदगड हा गिरीदुर्ग किल्ला आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील तळेरे गावापासुन 52 कि.मी. वर विजयदुर्ग का किल्ला आहे. या किल्ल्याच्या तिन्ही बाजूंनी तट आहे.

मावळण – मावळण तालुक्यामध्ये रामगड, सिद्धगड, वेताळगड, भगवंतगड व भरतगड हे गिरीदुर्ग किल्ले आहेत.

पद्मदुर्ग राजकोट व सर्जेकोट हे किनारीदुर्ग किल्ला आहे.

कुडाळ – कुडाळ तालुक्यातील घेटगे गावाजवळ सोनगड किल्ला, शिवापुर जवळ मनोहर आणि मनसंतोष किल्ल्यांची जोडी आहे.

महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग हा आहे.
महाराष्ट्रातील पहिला पवन विधुत प्रकल्प जामसांडे, देवगड (सिंधुदुर्ग)
महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण अंबोली (747 सें.मी.) सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय हे ओरोस बुद्रुक हे आहे.
सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणजे सिंधुदुर्ग आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी हे शहर पूर्वीच्या संस्थांनाची राजधानी होती.

सिधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी शहरात सुंदर राजवाडा व मोती तलाव आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले तालुक्यात दीपगृह निवती येथे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले सेंट ल्युकचे हॉस्पिटल आहे.

पावसाच्या स्वामी स्वरुपानंदानी ज्ञानेश्वर मंदिराची स्थापना वेंगुर्ले येथे केली.

सिधुदुर्ग जिल्ह्यात दुध व्यवसायाचे मुख्य केंद्र कणकवली हे आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात काजू संशोधन केंद्र वेंगुर्ले हे आहे.

विजयदुर्ग किल्ला विजयदुर्ग येथे आहे.          

भारतातील प्रसिध्द वास्तुशिल्पे

भारतातील प्रसिध्द वास्तुशिल्पे

वास्तुशिल्पे     --------------    ठिकाण.

कोलकाता  हायकोर्ट  -------------- कोलकाता.

गोपुरम   -------------- मदुराई.

लिंगराज शिवालय  -------मदुराई.

व्हिक्टोरिया मेमोरिअल -------  कोलकाता.

बुलंद दरवाजा   ------- फत्तेपूर क्षिक्री.

गोपुरम एकंबरनाथ मंदिर   -------कांचीपुरम

कुतुबमिनार   ----------- दिल्ली.

गोल घुमट -----------विजापूर.

बृहदेश्वर मंदिर ----------तंजावर.

विजयस्तंभ --------चितोड.

सूर्यमंदिर ------कोणार्क

भारतातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे

भारतातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे


प्रेक्षणीय स्थळ शहर राज्य

सुवर्ण मंदिर अमृतसर पंजाब.

लाल किल्ला, जमा मस्जिद, कुतुब मीनार, विजय घाट,

राष्ट्रपति भवन दिल्ली दिल्ली.

ताजमहाल आग्रा उत्तरप्रदेश.

मीनाक्षी मंदिर मदुराई तामिळनाडू.

सूर्य मंदिर कोणार्क ओडिशा .

बौध्द स्तूप सांची मध्यप्रदेश.

गौतम बुध्द जन्मस्थान लुंबिनी नेपाळ .

बौध्द अवशेष विदीशा मध्यप्रदेश.

गोल घुमट विजापूर कर्नाटक.

शालिमारबाग, निशातबाग, चष्मेशाही, डलहौसी .
सरोवर श्रीनगर काश्मीर .

रंगमंच मंदिर त्रिचनापल्ली तामिळनाडु .

बुलंद दरवाजा फत्तेपूर शिक्री उत्तरप्रदेश .

हवा महल जयपूर राजस्थान .

एलीफंटा गुहा, तारापूरवाला मत्स्यालय मुंबई महाराष्ट्र.

गेटवे ऑफ इंडिया, हैंगीग गार्डन, राणीचा बाग,मलबार.

हिल्स मुंबई महाराष्ट्र.

शिशमहाल इंदौर मध्यप्रदेश.

त्रिवेणी संगम गंगा-यमुना-सरस्वती अलाहाबाद.
उत्तरप्रदेश.

विजयस्तंभ चितोड राजस्थान.

वेरूळ व अजिंठा कोरीव लेणी औरंगाबाद महाराष्ट्र.

खजुराहो सतनाजवळ मध्यप्रदेश.

स्वामी विवेकानंद स्मारक कन्याकुमारी तामिळनाडु.

दिलवाडा मंदिर माउंट अबू राजस्थान.

रामकृष्ण मठ बेलूर बंगाल.

कैलास लेणी एलोरा महाराष्ट्र.

वृंदावन गार्डन, जोग धबधबा म्हैसूर कर्नाटक.

बिर्ला प्लॅनिटोरीयम, हावडा ब्रीज इडन गार्डन, काली.

मंदिर कोलकाता बंगाल.

महाकालेश्वर.

भारताचा भूगोल व सामान्य माहिती

भारताचा भूगोल व सामान्य माहिती

भारताचे क्षेत्रफळ 32,87,263 चौ.कि.मी.

भारताची लांबी (दक्षिण-उत्तर) 3,214 कि.मी.

भारताची रुंदी (पूर्व-पश्चिम) 2,933 कि.मी.

भारताचे जंगल व्याप्त क्षेत्राचे एकूण भू भागाशी प्रमाण 23%.

भारताच्या भू-सीमा : 15,200 कि.मी.
भारताला स्पर्श करणारे एकूण देश सात
भारताची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 121,01,93,422.

भारताची पुरुष संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 62,37,24,248.

भारताची स्त्री संख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 58,64,69, 174.

भारताचा साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार 74.04%.

पुरुष साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार 82.14%.

महिला साक्षरता दर सन 2011 च्या जनगणनेनुसार 64.46%.

भारताची घनता सन 2011 च्या जनगणनेनुसार 382 प्रति चौ.किमी.

भारतास लाभलेला समुद्रकिनारा 7,517 कि.मी.

भारताची राजधानी दिल्ली.

भारताची राष्ट्रगीत जन-गण-मन.

भारताचे ध्येय वाक्य सत्य मेव जयते.

राष्ट्रीय गीत वंदेमातरम.

‘जन-गण-मन’ या राष्ट्रगीताचे कवि रविंद्रनाथ टागोर
राष्ट्रीय गीत ‘वंदेमातरम’ चे कवी बंकीमचंद्र चटर्जी

भारताचा राष्ट्रध्वज तिरंगी झेंडा.

राष्ट्रीय फळ आंबा.

राष्ट्रीय फूल कमळ.

भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर.

भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ.

भारतात एकूण घटक राज्ये 28.

भारतात एकूण केंद्रशासित प्रदेश 7.

भारतात सर्वाधिक साक्षर राज्य केरळ.

भारतात सर्वात कमी साक्षर राज्य बिहार.

भारतात सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेला प्रदेश राजस्थान.

भारतात सर्वात जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा ठाणे (महाराष्ट्र).


गणिताच्या मुलभूत क्रिया | बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार यांचे नियम

गणिताच्या मुलभूत क्रिया

| बेरीज, वजाबाकी, गुणाकार व भागाकार यांचे नियम

गणिताच्या मुलभूत क्रिया (Mathematical Basic Operations)
सर्वप्रथम आपण बेरीज आणि बेरजेचे काही नियम बघणार आहोत ....

बेरीज आणि बेरजेचे नियम(Addition and their rules)
बेरीज : बेरीज म्हणजे थोडक्यात एका संख्येत दुसरी मिळवणे म्हणजेच बेरीज करणे होय.
बेरीज करत असतांना नेहमी उजवीकडून डावीकडे बेरीज करायची असते
उदा : ८+५ = १३

आता वेगवेगळ्या जस की पूर्णाक, अपूर्णांक, विषम संख्या या प्रकारच्या संख्यांची बेरीज करत असतानी काही नियम पाळायचे असतात ते आपण जाणून घेऊया.

साध्या व सरळ संख्येच्या बेरजेच्या पद्धती
साध्या संख्येची बेरीज करतांना कोणतेही असे नियम लागत नाही फक्त कोणत्याही संख्येची बेरीज करतानी एवढे लक्षात ठेवावे की बेरीज ही उजव्या बाजूने सुरु करायची.
उदा : २१९०+१२२४+५५३१=?
                     बेरीज= ८९४५
अशा मोठ्या संख्यांची बेरीज करतांना पहिले एकक स्थानातील संख्येची बेरीज करावी व नंतर दशक स्थानच्या अंकांची बेरीज करून ती बेरजेच्या एककस्थानी लिहावी. बेरीज करतानी कोणत्याही संख्येचा क्रम चुकणार नाही याची काळजी घ्यावी.

अपुर्णाकाच्या बेरीज करण्याच्या पद्धती
अपूर्णांक संख्येची बेरीज करतांना सर्वात पहिले सर्व संख्यांचे छेद सारखे करून घ्यावे. छेद समान करण्यासाठी दिलेल्या संख्येचा लसावी काढावा किवा छेद समान करून घ्यावा आणि छेद सारखा झाल्यास तो एकदाच लिहून अंशांच्या अंकांची बेरीज घ्यावी आणि नंतर अंश आणि छेदाला भाग जात असेल तर भाग द्यावा.
उदा : ३/२+४/५+५/४ येथे सर्वप्रथम आपण छेद समान करून घेऊया.
        =(३*१०)/(२*१०)+(४*४)/(५*४)+(५*५)/(४*५)
        = ३०/२०+१६/२०+२५/२० आता छेद समान झाला तो एक वेळा लिहून अंशाची बेरीज करून घेऊ.
        = ७१/२० आता या मध्ये भाग जात असल्यास द्यावा नाही तर तो अंक तसाच ठेवावा.

दशांश अपुर्णाकाची बेरीज करण्याची पद्धती
दशांश अपुर्नाकाची बेरीज सोपी आणि सरळ पद्धतीने करण्यासाठी सर्व संख्या एका खाली एक अशी मांडणी करून घ्यावी.
उदा १: २३.६०+४५.४०+१२.२८=?
         आता या दशांश अपुर्णाकाच्या खाली दशांश अपूर्णाक अशी मांडणी करून घेऊया.
        २३.६०
      +४५.४०
      +६०.४०
   ________
      १२९.४०
आता सोडून दाखविल्याप्रमाणे दशांश चीन्हाखाली दशांश चिन्ह घेऊन मांडणी करावी आणि बेरीज करून दशांश चिन्हानंतरच्या संख्या मोजून दशांश चिन्ह द्यावे.

उदा २: १८.२०+२२.४+३१.६०=?

वरील उदाहरणातील मधली संख्या (२२.४) दशांश स्थळानंतर इतर दोन्ही संख्यांपेक्षा छोटी आहे त्यामुळे त्या संखेमध्ये ० लाऊन ती संख्या समान करून घ्यायची व मग बेरीज करायची
   
    १८.२०
  +२२.४० (संख्या पूर्ण करून)
  +३१.६०
_________
    ७२.२०    

पूर्णांकयुक्त अपूर्णांकाच्या बेरजेची पद्धत
पूर्णांक युक्त अपूर्णांकाची बेरीज करताना सर्वप्रथम अपूर्णांकाची बेरीज करून घ्यावी आणि त्यानंतर अपूर्णांकाची बेरीज करून ती बाजूला लिहावी,
उदा: ८ १/३ +७ १/२
        = (८+७) (१/३+१/२) पूर्णाक आणि अपूर्णांक वेगळे करून आता त्यांची बेरीज करूया
        = (१५) (५/६)
        =  १५ ५/६

क्रमवार विषम संख्येच्या बेरजेच्या पद्धती
क्रमवार विषम संख्यांची बेरीज करीत असताना त्या संख्यामालेची सुरुवात १ ने होत असेल तर त्या संख्यामालेत जो मधला अंक आहे त्या मधल्या अंकाचा वर्ग म्हणजे त्या पूर्ण संख्यांची बेरीज होय.
उदा: १+३+५+७+९+११+१३
        मधला अंक = ७
        आता या ७ चा वर्ग ७² = ४९
    ४९ ही वरील उदाहरणातील संख्यामालेची बेरीज राहील.

क्रमवार विषम संख्यांची बेरीज करताना त्या संख्यामालेत जर १ नसेल तर मधल्या अंकाचा वर्ग करून येणारी संख्या बरोबर उत्तर राहत नाही त्यामुळे अशा वेळेस मधल्या अंक गुणेला संख्यामालेतील एकूण संख्या किती हे मोजून त्यांचा गुणाकार करून येणारे उत्तर हे त्या संख्या मालेचे उत्तर असते.
उदा: ३+५+७+९+११+१३+१५
    = मधला अंक * एकूण संख्या
    = ९*७
    = ४२ हे उत्तर होईल.

क्रमवार सम संख्येच्या बेरजेची पद्धती
क्रमवार समसंख्या ची बेरीज करीत असताना त्या संख्या मालेतील मधला अंक गुणेला संख्या मालेतील एकूण अंक याचा गुणाकार करून येणारे उत्तर म्हणजे त्या संख्या मालकीची बेरीज होय.

उदा१: २+४+६+८+१०
        = मधला अंक * एकूण संख्या
        = ६*५
        = ३०

उदा२: २+४+६+८+१०+१२
         = मधला अंक * एकूण संख्या
         = ७*६
         = ४२
उदाहरण २ प्रमाणे मधला अंक सम संख्यामधून निघत नसल्यास मधल्या २ संख्यातील मधलाअंक घ्यावा.

क्रमवार  संख्येच्या बेरजेची पद्धती
क्रमवार सम संख्येची बेरीज करताना जो नियम लागतो तोच नियम क्रमवार संख्येची बेरीज करताना देखील उपयोगी येतो .

संख्यामालेतील मधली संख्या * संख्यामालेतील एकूण संख्या
उदा१: १+२+३+४+५+६+७+८+९
बेरीज = मधली संख्या * एकूण संख्या
         = ५*९
         = ४५
उदा२: १+२+३+४+५+६+.......+११=?
           या उदाहरणामध्ये पूर्ण संख्या देलेल्या नाही अश्या वेळेस मधली संख्या काढायला त्रास होतो अशा वेळेस खालील सूत्राचा वापर करावा.
संख्यामालेतील सुरवातीची संख्या + संख्यामालेतील शेवटची संख्या

___________________________________________________
                                                   

या सूत्रातून मधली संख्या प्राप्त होईल
१+११/२ =१२/२
= ६

आता मधली संख्या आणि एकूण संख्या यांचा गुणाकार करून दिलेल्या संख्या मालेची बेरीज मिळेल
६*११
= ६६

क्रमवार घन संख्या ची बेरीज पद्धत
क्रमवार धडा संख्यांची बेरीज करीत असताना केवळ त्या क्रमावर येणाऱ्या संख्यांची बेरीज करावी ती बेरीज करून आलेल्या उत्तराचा वर्ग करावा म्हणजेच क्रमवार घनसंख्येची बेरीज मिळेल.

उदा१: १³+२³+३³+४³+५³

= (१+२+३+४+५)²

= (१५)²

= २२५

उदा२: १³+२³+३³+४³+५³..........१५³

बेरीज = मधला अंक + एकूण अंक

= ८*१५

= (१२०)²

= १४४००

शतमान स्वरूपातील अंकांची बेरजेची पद्धत

शतमान स्वरूपातील अंकाची बेरीज करताना प्रथम टक्क्याचे  चिन्ह उडवून टाकावे त्यासाठी१/१०० ने सर्व संख्या ला गुणाकाराचे नियम लावून गुणावे व नंतर मिळालेल्या  सर्व अपूर्णांक संख्यांना अपूर्णांकाच्या बेरीज पद्धतीने बेरीज करून घ्यावी.

उदा: ४/३%+५/२%+१/३%
    = ३/३*१/१००+४/२*१/१००+१/३*१/१००
    = ४/३००+५/२००+१/३००
   आता सर्व अपूर्णांक संख्येचे छेद समान करून घेऊ
    = २*४/२*३००+५*३/३*२००+२*१/२*३००
    = ८/६००+१५/६००+२/६००
    = २५/६००
    =  २५/६

मापन पद्धतीतील बेरीज
मापन पद्धती ची बेरीज करताना त्या पद्धतीत मिटर, किलोग्रॅम, लीटर, सेंटीमीटर, अशा पद्धतीत उदाहरणे दिलेली असतात अशा अंकांची बेरीज करीत असताना दिलेली सर्व मापके ही ठराविक एककात बदलून घ्यावी व त्यानंतर त्या अंकांची बेरीज करावी
उदा: १५.३ मीटर + ४५ सें. मी. + ७८ मि.मी.
       आता या सर्व मापकांना मिलीमीटर या एककात बदलून घेऊया
१५.३ मीटर = १५३०० मि. मी.
४५ से.मी.   =     ४५० मि. मी.
७५ मि. मी. =       ७५ मि. मी.
                       ____________
                        १५८२५ मि. मी.

वजाबाकी आणि वजाबाकीचे नियम(Subtraction And Their Rules)
वजाबाकी: दोन संख्येतील फरक काढण्यासाठी जी गणितीय क्रिया करण्यात येते त्याला वजाबाकी असे म्हणतात.

उदा: १५ - ८ = ७

आता आपण वजाबाकीचे काही नियम व पद्धती बघूया.

अपुर्णाकाची वजाबाकी पद्धती
अपूर्णांकाची वजाबाकी करताना दोन पद्धती वापरल्या जातात एक म्हणजे तिरकस गुणाकार करून आणि दुसरी म्हणजे हेच समान करून या दोन्ही पद्धती आता आपण बघुया

जेव्हाही आपण दोन अपूर्णांकाचा संख्यांची वजाबाकी करतो तेव्हा त्याचा प्रथम तिरकस गुणाकार करावा किंवा प्रथम उजव्या बाजूने अंकाचा गुणाकार करून लिहावा नंतर अपूर्णांक संख्या च्या मध्ये वजाबाकी चे चिन्ह असल्यामुळे वजाबाकी चे चिन्ह द्यावे पुढे परत डाव्या बाजूने तिरपा गुणाकारकरावा आणि शेवटी छेदाचाछेदाचा गुणाकार करून  छेदस्थानी लिहावा त्यानंतर अंशाच्या ठिकाणी असलेल्या अंकाची अगोदर वजाबाकी करावी व पुढे अंश व छेदाचा भाग जात असल्यास तो द्यावा अन्यथा ती संख्या तशीच ठेवावी.

पद्धत१: तिरका गुणाकार करून वजाबाकी करणे

८/५ - ६/५ = ?

(८*५) - (६*५)
___________
        (५*५)

४० - ३०
_______
      २५

१०/२५  अंश आणि छेदाला भाग देऊन
२/५ हे उत्तर असेल

पद्धत२ : छेद समान करून वजाबाकी करणे
९/२ - ३/५ =?

(५*९) - (२*३)

___________

(२*३) - (५*२)

४६/१० - ६/१०

४५-६

____

  १०

३९/१०

३.९ हे उत्तर

मापन पद्धतीतील वजाबाकी
या वजाबाकीच्या पद्धतीमध्ये वजाबाकी करताना सर्वात पहिले दिलेली सर्व मापे एका एककात करून घ्यावी आणि नंतर एका खाली एक असे मांडून वजाबाकी करून घ्यावी.
३.५० कि. ग्रा. - १.५ कि. ग्रा - १३० ग्राम = ?

आता या सर्व मापांना ग्राम या एककात बदलून घेऊया
३.५० कि. ग्रा = ३५०० ग्राम
१.५ कि. ग्रा = १५०० ग्राम
१३० ग्राम
आता यांना एका खाली एक मंधून घेऊया
३५००
-१५००
-  १३०
______
   १८७० ग्राम हे शेवटचे उत्तर

पूर्णाकयुक्त अपुर्णाकाची वजबाकी पद्धत
पूर्णाकयुक्त अपुर्णाकाची वजाबाकी करताना पहिले पूर्णाक संख्येची वजाबाकी एका कंसात करून घ्यावी आणि नंतर बेरजेचे चिन्ह देऊन अपूर्णांक संख्येची वजाबाकी करून घ्यावी. त्यानंतर दोन्ही कंस वेगवेगळे सोडवून त्यांची बेरीज करून घ्यावी व उत्तर काढावे

उदा  २५ १/४ -१२ १/८ – ३ १/१६

(२५-१२-३)+ (१/४-१/८-१-१६)

(१०)+ (१*४/४*४-१*२/८*२-१/१६)

(१०) + (४/१६-२/१६-१/१६)

(१०) + १/१६

१० १/१६ हे उत्तर येईल

वर्ग संख्येची वजाबाकी पद्धत
वर्ग संख्येची वजाबाकी करण्याची पद्धत फार सोपी आहे त्यासाठी  A² + B² = (a + b)(a - b)

या सूत्राचा उपयोग करून उदाहरण सोडवले जाते.

उदा: (१५)² - (२८)²

सूत्र: A² - B² = (a + b)(a - b)

(२८²-१५²) = (२८+१५)(२८-१५)

          = ४३*१३

          = ५५९

वर्गमुळाची वजाबाकी करण्याची पद्धत
वर्गमुळाची वजाबाकी करायची झाल्यास सर्वात पहिले वर्गमुळात असलेल्या संख्यांचे वर्गमूळ काढून घ्यावे व त्यानंतर त्या संख्येची वजाबाकी करून घ्यावी. या शिवाय जर वर्गमुळात पुन्हा कधी वर्ग संख्या असल्यास ती वर्ग संख्या करावी आणि नंतर त्यांची वर्गमुळामध्येच वजाबाकी करावी आणि शेवटी येणारे उत्तर लिहावे त्यानंतर येणाऱ्या उत्तराचे वर्गमूळ निघत असेल तर ते काढून शेवटचे उत्तर लिहावे.

उदा१:  √१२*१२*२*२ - √११*११*२*२

    = १२*२ – ११*२

    = २४ – २२

    = २

उदा२: ८√४ – ४√८*२

    = ८√४ – ४√२*२*४

    = ८√४ – ४*२√४

    = ८√४ – ८√४

    = ०

________________________________

गुणाकार व गुणाकाराचे नियम (Multiplication And Their Rules)
गुणाकार : एका संख्येची विशिष्ट पट काढतांना केलेली क्रिया म्हणजे गुणाकार त्याच प्रमाणे एखाद्या संख्येची विशिष्ट संख्येचा पटीत केलेली बेरीज म्हणजे गुणाकार होय.
८ * ४ = ३२
८+८+८+८ = ३२
८ ची ४ वेळा बेरीज म्हणजे ८ ला ४ ने गुणने

गुणाकारात प्रामुख्याने तीन संख्या असतात. पहिली संख्या म्हणजे गुण्य जिला गुणायचे आहे ती संख्या, दुसरी संख्या म्हणजे गुणक ज्या संख्येने आपल्याला गुणायचे आहे ती संख्या, आणि तिसरी संख्या म्हणजे गुणाकार अर्थातच गुण्य आणि गुणक या संख्येचा गुणाकार करून आलेले उत्तर

गुणाकाराचे काही नियम पुढील प्रमाणे

१ या संख्येने कोणत्याही संख्येला गुणले असता गुणाकार तीच संख्या येते.
गुणाकार करताना संख्यांचा क्रम मागे पुढे केला तरीही त्याच्या गुणाकारात काहीही फरक पडत नाही.
गुणाकार करताना कोणत्याही संख्येला ० ने गुणले असता किंवा ० या संख्येला कोणत्याही संख्येने गुणले असता गुणाकार म्हणजेच येणारे उत्तर हे ० असते.
गुणाकार करताना एक संख्या धन असेल व दुसरी संख्या ऋण असेल तर येणारा गुणाकार हा ऋण संख्या येत असते.

गुणाकार करताना जर दिलेल्या दोन्ही संख्या धन असेल तर येणारे उत्तर देखील धन संख्याच येत असते.
दोन ऋण संख्यांचा गुणाकार देखील धन संख्याच येत असते.

गुणाकार करण्याच्या पद्धतीमध्ये काही नमुने बघितले असता ते नमुने लक्षात ठेऊन गुणाकार केल्यास तो सोडवणे अगदी सोपे जाते त्यामुळे गुणाकार करतांना खालील काही सूत्र लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

(a) x(a+b) = xa+xb

(b) (x+y) (a+b) = xa+xb+ya+yb

(c) (x-y) (a+b) = xa+xb-ya-yb

(d) (x-y) (a-b) = xa-xb-ya+yb

(e) (a+b)² = a²+2ab+b²

(f) (a-b)² = a²-2ab+b²

(g) (a²- b²) = (a-b)(a+b)

(h) (a+b)³  = a³+3a²b+3ab²-b³

(i) (a-b)³  = a³ -2a²b+3ab²-b³

(j) a³-b³ = (a-b)(a²-ab+b²)

(k) a³+b³ = (a+b)(a²-ab+b²)

या सूत्रांचा वापर करून आपण अजून लवकर गुणाकार क्रिया करू शकतो.

________________________

भागाकार आणि त्यांचे नियम (Divisions And Their Rules)
भागाकार: संख्यामालेतील एखाद्या संख्येची केलेली विभागणी म्हणजे भागाकार

भागाकार करण्याची पद्धत सोपी असते त्यांना एका विशिष्ट स्वरुपात बसवले तर आपण अगदी सहज भागाकार करू शकतो भागाकार करताना काही महत्वाच्या संज्ञा लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते आपण बघूया.

ज्या संख्याला आपल्याला भागायचे आहे त्या संख्येला भाज्य असे म्हणतात.
ज्या संख्येने आपल्याला भाग्याचे आहे त्या संख्येला आपण भाजक असे म्हणतो.
आपण ज्या भाज्य संख्येला भाजक संख्येने भागून जे उत्तर येते त्याला आपण भागाकार असे म्हणतो; आणि भागाकार पूर्ण होऊन खाली जी संख्या उरते तिला आपण बाकी असे म्हणतो.
आपण भागाकार केल्या नंतर खाली बाकी ० उरत असल्यास अश्या संख्यांना आपण विभाज्य संख्या असे म्हणतो; आणि याउलट जर बाकी कोणती संख्या उरत असल्यास त्या संख्यांना आपण अविभाज्य संख्या असे म्हणतो.

भागाकार, भागाकार म्हणजे काय, भागाकार कसा करायचा
भागाकार

कोणत्याही संख्येला १ के भागीतल्यास भागाकार तीच संख्या येत असते आणि कोणत्याही संख्येला ० ने भाग भागता येत नाही.
     भाज्य = भाजक * भागाकार+बाकी
एखाद्या धन संख्येला दुसऱ्या धन संख्येने भागीतले असता भागाकार म्हणजेच येणारे उत्तर हे धन संख्याच येते.
एखाद्या ऋण संख्येला धन संख्याने भाग दिला असता उत्तर हे ऋण संख्याच येत असते.
एख्याद्या धन संख्येला ऋण संख्येने भाग दिला असता उत्तर हे ऋण संख्याच येत असते.
एखाद्या ऋण संख्येला दुसऱ्या ऋण संख्येने भागीतले असता भागाकार म्हणजेच येणारे उत्तर हे धन संख्याच येते.
एखाद्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला एखाद्या विशिष्ट अंकाने भाग जात असल्यास तर त्या पूर्ण संख्येला त्या विशिष्ट संख्येने पूर्ण भाग जातो.
उदा: ४७४५
    ४+७+४+५ = २०
    २० या संख्येला ५ ने पूर्ण भाग जातो
    म्हणून ४७४५ या संख्येला देखील ५ ने पूर्ण भाग जातो.
एखाद्या संख्येच्या एकक स्थानाच्या ठिकाणी ० किंवा ५ हे अंक असतील तर त्या पूर्ण संख्येला ५ ने पूर्ण भाग जातो.
ज्या संख्येला ३ आणि ५ या दोन संख्यांनी भाग जातो त्या संख्यांना १५ ने देखील पूर्ण भाग जातो.
निष्कर्ष
अश्याप्रकारे आपला आजचा topic गणिताच्या मुलभूत क्रिया हा पूर्ण झाला आहे यामध्ये आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या चारही क्रियांबद्दल सविस्तर जाणून घेतले आहे या सर्व गणित क्रियांचे नियम व सुत्र देखील बघितले आहे आणि सर्व उदाहरणासह समजून घेतले आहे.

_________________________

संबंधित प्रश्न उत्तरे

१) बेरीज म्हणजे काय ?
उ: बेरीज म्हणजे थोडक्यात एका संख्येत दुसरी मिळवणे म्हणजेच बेरीज करणे होय.

२) वजाबाकी म्हणजे काय ?
उ:  दोन संख्येतील फरक काढण्यासाठी जी गणितीय क्रिया करण्यात येते त्याला वजाबाकी असे म्हणतात.

३) गुणाकार म्हणजे काय ?

उ: एखाद्या संख्येची विशिष्ट संख्येचा पटीत केलेली बेरीज म्हणजे गुणाकार होय.

४) भागाकार म्हणजे काय ?

उ: संख्यामालेतील एखाद्या संख्येची केलेली विभागणी म्हणजे भागाकार होय.