१९ जून २०२२

मानवी चेतासंस्था

- मध्यवर्ती, परिघिय आणि स्वायत्त चेतासंस्था असे तीन प्रकार आहेत.
- मेंदू आणि मेरूरज्जू यांनी मध्यवर्ती चेतासंस्था तयार होते.

● मानवी मेंदू
- चेतासंस्थेचे नियंत्रण करणारा प्रमुख भाग
- प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन 1300 ते 1400 ग्रॅम इतके असते
- 100 अब्ज चेतापेशींपासून मेंदूची निर्मिती
- मेंदूच्या डाव्या बाजूची कार्ये: संभाषण, लिखाण, तर्कसंगत व विश्लेषणात्मक विचार, भाषा, शास्त्र व गणित
- मेंदूच्या उजव्या बाजूची कार्ये: सर्वांगीण व प्रतिभात्मक विचार, नवनिर्मिती, कला व संगीत
- डावी आणि उजवी बाजू एकमेकास नियंत्रीत करतात
- प्रमस्तिष्क: मोठा मेंदू
- अनुमस्तिष्क: छोटा मेंदू
- मस्तिष्कपुच्छ: सर्वात शेवटचा भाग

● मेरूरज्जू
- त्वचेपासून मेंदूकडे आवेगाचे वहन करणे
- मेंदूपासून स्नायू व ग्रंथीकडे आवेगाचे वहन करणे
- प्रतिक्षिप्त क्रियांचे समन्वयक केंद्र म्हणून कार्य करतो.

वनस्पतीचे वर्गीकरण :

उपसृष्टी : 1 अबीजपत्री - अपुष्प वनस्पती

विभाग - 1 : थॅलोफायटा

· शरीर साधे , मऊ ,तंतुमय

· मूळ , खोड , पान, नसते.

· पाण्यात आढळतात .

· स्वयंपोषी असतात.

· लैगिक जननांग - युग्माकधानी

वर्ग - 1 : शैवाल

· वाढ पाण्यात , ओलसर ठिकाणी

· उदा. शैवाल, स्पायरोगायारा, करा

· प्रकाश स्वयंपोषी

वर्ग - 2 : कवक

· परपोशी पोषण पद्धती

· इतरांच्या शरीरात, शरीरावर किंवा मृतोपाजीवी असतात.

· शरीर तंतुजालरूपी असते.

· तंतुरूपी कवकाना बुरशी म्हणतात.

· उदा. पेनिसिलीयम , म्युकर

· जननांगे मोठी आणि छत्रिसारखी असणाऱ्यांना 'छत्रकवके' म्हणतात.

· उदा . अगॅरिकस

· एकपेशीय कवकाना 'किन्व' म्हणतात .

· उदा . सॅकरोमायसिस

शैवाक -

· शैवाल व कवक एकत्र वाढ

· परस्परपूरक सहजीवन

· उदा . उस्निया (दगडफूल)

जीवाणू -

· एकपेशीय आदिकेंद्रकी सजीव.

· निरनिराळ्या पोषण पद्धती.

· प्रजजन साध्या स्वरूपाचे.

विभाग -२ : ब्रायोफायटा

· निम्नस्तरीय, बहुपेशीय, स्वयंपोषी, सावलीत राहण्याऱ्या उभयचर वनस्पती आहेत.

· बीजाणू निर्मितीचे प्रजनन करतात.

· शरीर चपटे , रीबिनसारखे व मऊ.

· मुळासारखे दिसणारे मुलाभ असतात.

· उदा. मॉस, रिक्सिया , मार्केंशिया , अॅन्थॉसिरॉस, फ्युनारीया

विभाग -3 : टेरीडोफायटा

· पाणी व खनिज वहनासाठी सुस्पष्ट संवहनी संस्था असते.

· मूळ, खोड, पाने असतात.

· सहसा लहान पर्णिका असतात.

· सावलीत व दमट वातावरणात वाढतात.

· अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे तर लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे होते.

· 3 उपवर्गात विभाजन होते.

वर्ग -1 : लायाकोपोडीनी

· या वनस्पती नेच्यासारख्या असतात.

· उदा. लायाकोपोडीयम, सीलॅजीनेला

वर्ग -2 : इक्वीसेटीनी

· नेच्यासारख्याच असतात.

· बिजानुधानीच्या समूहास शंकू म्हणतात.

· उदा. इक्वीसेटम

वर्ग -3 : फिलीसिनी

· वनस्पतीचा सर्वात मोठा वर्ग आहे.

· या वनस्पतींना 'नेचे' म्हणतात.

· बिजानुधानीपुंज पानावर तयार होतात.

· उदा. नेफ्रोलीपीस, अॅडीएन्टम, किलॅन्थेस, टेरिस

उपसृष्टी : 2 बिजपत्री - सपुष्प वनस्पती

विभाग -1 : अनावृत्तबीजी वनस्पती

· यांना उच्चकुलीन वनस्पती असे म्हणतात.

· या वनस्पतीच्या बिजांवर आवरण नसते. त्यांची मोठया आकाराची बीजे बृहद्बीजाणू पत्रांवर तयार होतात.

· काही वृक्ष मोठे व पुरातन असतात.

· उदा . सायकस, सूचीपर्णी (पायनस), देवदार (सेडस)

· सदाहरित, बहुवार्षिक

· खोडाला फांद्या नसतात.

· नर व मादी फुले वेगवेगळया बिजानुपत्रावर येतात.

· फळे येत नाहीत.

विभाग -2 : आवृत्तबिजी वनस्पती

· या वनस्पतीची बीजे संरक्षक आवरणात असतात.

· फुले हीच प्रजननांगे असतात.

· अतिसूक्ष्म जलीय वनस्पती वुल्फिया टे प्रचंड आकाराच्या ऑस्ट्रेलीयन अकॅशिया किंवा युकॅलिप्टस् यांचा समावेश होतो.

· 2 वर्गात विभागणी होते.

वर्ग -1 व्दिबिजपत्री वनस्पती

· बियांच्या भ्रुनात दोन बिजपत्रे असतात.

· मूळ हे सोटमूळ प्रकारचे असते.

· पानाचा शिराविण्यास जालीकीय असतो.

· उदा. सुर्यफुल, सदाफुली, जास्वंद, लिंबू ,पेरू, आंबा, वाटणा, वाल, हरभरा, टोमॅटो, मिरची, वांगी ,कोथिंबीर, कापूस,तुळस

वर्ग -2 एकबिजपत्री वनस्पती :

· बियांच्या भृणात फक्त एकच बिजपत्र असते.

· मुले तंतुसारखी , अपस्थानिक मुळे

· पानांचा शिराविण्यास समांतर असतो.

· फुल त्रीभागी.

· उदा. गहू, तांदूळ, मका, ज्वारी, ऊस, गवत, बांबू , कांदा,लसून, कर्दळी, केली, पाम, ऑर्कीड

समस्थानिके

▶युरेनियम, थोरियम, रेडियम या किरणोत्सारी मूलद्रव्यांचा टप्प्याटप्प्याने ऱ्हास होत जातो, याची कल्पना विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच संशोधकांना आली.

▶ मूलद्रव्याचा ऱ्हास होताना नवी ‘किरणोत्सारी मूलद्रव्ये’ निर्माण होऊन या ऱ्हासाचा शेवट शिसे या मूलद्रव्यात होत होता. या ऱ्हासात वेगवेगळा किरणोत्सार दर्शवणारी ४० वेगवेगळी मूलद्रव्ये निर्माण होत होती.

▶आता ८२ अणुक्रमांक असणारे शिसे व ९२ अणुक्रमांक असणारे युरेनियम, यांदरम्यान या ४० ‘किरणोत्सारी मूलद्रव्यां’ना सामावून घेण्यास जागाच नव्हती.

▶ यातील काही मूलद्रव्यांचे गुणधर्म इतके सारखे होते, की रासायनिक पद्धतींद्वारे त्यांना एकमेकांपासून वेगळे करणे अशक्यच होते. तसेच रासायनिक साधर्म्य असणाऱ्या आयोनियम आणि थोरियम या मूलद्रव्यांचे वर्णपटही अगदी सारखे असल्याचेही आढळले होते.

▶१९१३ साली याचे स्पष्टीकरण देताना, या मूलद्रव्यांवर संशोधन करणारा इंग्रज संशोधक फ्रेडरिक सॉडी याने- यातील सारखेच रासायनिक गुणधर्म असणारे अणू हे वेगवेगळ्या मूलद्रव्यांचे अणू नसून ते एकाच मूलद्रव्याचे, परंतु वेगवेगळा अणुभार असणारे अणू असल्याचे सुचवले. अशा अणूंना त्याने ‘समस्थानिक’ (आयसोटोप) ही संज्ञा सुचवली.

▶याच काळात इंग्रज संशोधक जे. जे. थॉमसन याचे धनविद्युतभारित कणांवर संशोधन चालू होते. थॉमसन या संशोधनात- निऑनचे धनविद्युतभारित आयन विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रातून कसा प्रवास करतात, ते अभ्यासत होता. प्रवासानंतर हे अणू कुठे आदळतात, हे पाहण्यासाठी थॉमसनने फोटोग्राफिक फिल्मचा वापर केला.

▶ विद्युत किंवा चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली निऑनच्या आयनांचा मार्ग काही अंशात वळणे अपेक्षित होतेच. तसे ते झालेही! परंतु निऑनचा झोत दोन मार्गामध्ये विभागला गेल्याचे त्याला आढळले.

▶या निरीक्षणांवरून थॉमसनने निऑन वायुमधील ९० टक्के अणूंचा अणुभार २० असावा, तर उर्वरित दहा टक्के अणूंचा अणुभार २२ असावा, असे गणित मांडले. हे दोन्ही अणू निऑन या मूलद्रव्याचे समस्थानिक होते.

▶थॉमसनच्या या संशोधनामुळे सॉडी याचे निष्कर्ष खरे ठरले. यानंतर सहा वर्षांतच, थॉमसनचाच विद्यार्थी असणाऱ्या फ्रान्सिस अ‍ॅस्टन याने समस्थानिकांचे प्रमाण मोजण्यासाठी ‘मास स्पेक्ट्रोग्राफ’ हे साधन तयार केले.

▶समस्थानिकांच्या शोधात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या फ्रेडरिक सॉडी याचा १९२१ सालचे, तर मास स्पेक्ट्रोग्राफच्या निर्मितीबद्दल फ्रान्सिस अ‍ॅस्टन याचा १९२२ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला.

विज्ञान महत्त्वाचे 10 प्रश्नउत्तरे

*1) वातावरणातील सर्वाधिक प्रमाण असलेला वायू कोणता?
उत्तर : नायट्रोजन

*2) कोणत्या शास्त्रज्ञाने हृदयरोगाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी केली?
उत्तर : ख्रिश्चन बर्नार्ड

*3) कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर : ड

*4) कोणता अवयव मादी बेडकात आढळून येत नाही?
उत्तर : स्वरकोष

*5) वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे?
उत्तर : 0.03 टक्के

*6) चुंबकीय पदार्थ कोणता आहे? 
उत्तर : निकेल

*7) मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात?
उत्तर : नफोलॉजी

*8) वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?
उत्तर : कार्बन डायऑक्साईड

*9) तांबे व जस्त यांच्या मिश्रीणातून कोणता धातू तयार होतो?
उत्तर : पितळ

*10) बटाटा हे काय आहे?
उत्तर : खोड

भारतातील जैवविविधता संरक्षण आणि संवर्धन विषयक कायदे व नियम

1) जल प्रदूषण प्रतिबंध व नियमन -: 1974

2) पर्यावरण संरक्षण अर्धीनियम -: 1986

3)हवा प्रदूषण प्रतिबंध व नियम -: 1981

4) जैवविविधता अध्धीनियम -: 2002

5)भारतीय वन कायदा -: 1927

6.)वन संवर्धन अधिनियम :- 1980

7)आदिवासी जमाती आणि इत वनरहिवासी अधिनियम -: 2006

8.)वन्य जीवन संरक्षण अधिनियम - :1972

9.) सार्वजनिक दायित्व विमा अधिनियम -: 1991

10) राष्ट्रीय पर्यांवरण अपील प्राधिकरण अधिनियम -: 1997

11) राष्ट्रीय हरित लवाद अधिनियम -: 2010

12) आयात आणि निर्यात नियंत्रण अधिनियम -: 1947

13) खनन आणि खनिज द्रव्य विकास अधिनियम -: 1957

14) सीमाशुल्क अधिनियम -: 1962

15 ) महापालिका घन कचरा व्यवस्थापन नियम -: 2000

16) पर्यावरण स्नैही उत्पादनावरून खून पट्टी कायदा -: 1991

17) जैविक कचरा नियोजन -: 1998

18) पुन्हा वापरण्यासाठी प्लैस्टिकचे उत्पादन व वापर नियम -: 1999

थॅलेसिमिया लक्षणे आणि उपाय

थॅलेसेमिया हा एक रक्तसंबंधित अनुवांशिक आजार असून तो आई-वडिलांपासून मुलांना होतो.

🤔 *आजार कसा होतो?* : जर दोन्ही पालकांमध्ये यासंबंधी  जीन्स असल्यास, अनुवंशिक असणारा हा आजार 25 टक्‍के बालकांमध्ये संक्रमित होतो. यामुळे बालकाच्या शरीरात रक्ताची निर्मितीच होत नाही. त्यांना सुरुवातीला रक्त देण्याचा कालावधी कमी असला तरी वयानुसार तो वाढत जातो.

थॅलेसेमिया इंटरमेडिया (मायनर) आणि थॅलिसेमिया मेजर असे थॅलेसेमियाचे दोन प्रकार आहेत.

1. *थॅलेसेमिया मेजर* : या रुग्णांना नियमित रक्‍त भरावे लागते; कारण रोग्याचे शरीर पुरेसे हिमोग्लोबिन तयार करत नाही.

2. *थॅलेसेमिया मायनर* : बऱ्याच व्यक्तींना आपण मायनर थॅलेसेमिया आहे, याची माहितीच नसते. त्यामुळे विवाहपूर्व थॅलॅसेमियाची तपासणी केली, तर थॅलेसेमियाग्रस्त नवी पिढी तयार होणार नाही.

🤓 *उपचार काय आहे?* : ब्लड ट्रान्सफ्युजन (रक्तपुरवठा), अस्थीमज्जा प्रत्यारोपण, औषधे आणि शरीरातील अतिरिक्त लोह कमी करणे, पित्ताशय काढून टाकणे.

👀 *आजार टाळण्यासाठी काय करावे?* :

● सर्वात महत्वाचे म्हणजे लग्नापूर्वी युवक-युवतीच्या रक्ताची चाचणी करावी.
● जर युवक-युवती दोघेही थॅलेसेमिया वाहक असल्यास लग्न टाळावे.
● जर पती-पत्नीपैकी एकही थॅलेसेमियाग्रस्त असल्यास मुलाला हा आजार टाळण्यासाठी पुरेशी काळजी घ्यावी.
● जर गर्भवती माता थॅलेसेमिया वाहक/ रुग्ण असल्यास 10 आठवडयांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करावी.

दवबिंदू तापमान आणि आर्द्रता (Dew Point & Humidity) :

🌷·         तलाव, नदया आणि सागर यांच्यातील पाण्याचे सतत बाष्पीभवन होत असते. त्यामुळे वातावरणात नेहमीच काही प्रमाणात पाण्याचे बाष्प असते.

🌷·         वातावरणात असणार्‍या पाण्याच्या वाफेचा दैनंदिन जीवनावर परिणाम होतो. वातावरणामध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावरून दैनंदिन हवामानाचे स्वरूप समजण्यास मदत होते.

·🌷         जेव्हा हवा खूप थंड होते तेव्हा हवेत असलेली पाण्याची वाफ संतृप्त (Staturated) होते. त्यामुळे बाष्पाचे लहान थेंब बनतात. 

🌿ज्या तापमानास हवा बाष्पाने संतृप्त होते त्या तापमानास 'दवबिंदू तापमान' म्हणतात. हवेमध्ये असणार्‍या बाष्पाच्या प्रमाणावर दवबिंदू तापमान अवलंबून असते.

·🌿         हवेतील पाण्याच्या वाफेमुळे हवेत निर्माण होणारा ओलावा किंवा दमटपणा यालाच 'आर्द्रता' म्हणतात. 

·🌿         ज्या राशीच्या सहाय्याने हवेतील पाण्याच्या वाफेचे शेकडा प्रमाण मोजले जाते तिला निरपेक्ष आर्दता (Absolute Humidity) असे म्हणतात.

·🌿         एकक आकारामानाच्या हवेमध्ये असलेल्या पाण्याच्या वाफेच्या वस्तुमानास 'निरपेक्ष आर्द्रता' असे म्हणतात. 

🌿·         सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.

🌿सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता ही Kg/m3मध्ये मोजतात.

·🌿         हवा संतृप्त होण्यासाठी लागणार्‍या बाष्पाचे प्रमाण तापमानावर अवलंबून आहे.

·🌿         हवा सामावून घेत असलेल्या बाष्पाच्या कमाल मर्यादेपेक्षा हवेमध्ये कमी बाष्प सामावले असेल तर ती हवा 'असंतृप्त' आहे असे म्हटतात.

·🌿         जर हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्यात बाष्पाच्या प्रमाणापेक्षा हवेतील बाष्प खूपच कमी असेल तर ती हवा कोरडी असल्याचे आपणास जाणवते.

· 🌿        याउलट हवेतील बाष्पाचे प्रमाण ती हवा संतृप्त करण्यासाठी लागणार्याव बाष्पाच्या प्रमाण सापेक्ष संतृप्त हवेपेक्षा किंचित कमी असेल तर हवा दमट आहे असे जाणवते.

·🌿         हवेच्या दमटपणाचे प्रमाण सापेक्ष आर्द्र्तेच्या रूपात मोजतात.

🌿जमीन तिच्या सान्निध्यात येणारी हवा दवबिंदू तापमानापेक्षा कमी तापमानापर्यंत थंड करते. जेव्हा हवेतील बाष्पाचे संघनन (condensation) होते तेव्हा धुके (Fog) तयार होते.

· 🌿        जेव्हा गरम हवा थंड जमीन किंवा समुद्रावरून वाहते तेव्हा सुद्धा धुके तयार होते. सागरी धुके (Sea Fog) यामुळे तयार होते.

🌿·         उंचावरून जाणार्‍या विमानाच्या मागे पांढरी तेजोरेखा(त्राईल) दिसते. विमान उडत असताना इंजीनापासून निघणार्‍या वाफेचे संघनन होऊन ढग तयार होतात. 

🌿जर सभोवतालच्या वातावरणातील हवा ही अधिक सापेक्ष आर्द्रतेची असेल तर तेजोरेखा लांबच लांब दिसते.

·🌿         जर सापेक्ष आर्द्रता कमी असेल तर लहान तेजोरेखा तयार होते किंवा तयार सुद्धा होत नाही.

मानवी शरीर


1: हाडांची संख्या: 206
2: स्नायूंची संख्या: 639
3: मूत्रपिंडांची संख्या: 2
4: दुधाच्या दातांची संख्या: 20
5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)
6: हार्ट चेंबर क्रमांक: 4
7: मोठी धमनी: महाधमनी
8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी
9: रक्त पीएच: 7.4
10: पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33

11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7
12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6
13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14
14: कवटीतील हाडांची संख्या: 22
15: छातीत हाडांची संख्या: 25
16: हात मध्ये हाडांची संख्या: 6
17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72
18: हृदयातील पंपांची संख्या: 2
19: सर्वात मोठा अवयव: त्वचा
20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत

21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय
22: सर्वात लहान सेल: शुक्राणू
23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान
24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड
25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी
26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी
27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो
28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा
29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)
30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर

31: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस
32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस
33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)
34: मानवी पायात हाडांची संख्या: 33
35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8
36: हातात हाडांची संख्या: 27
37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड
38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा
40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर
:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)

41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)
42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306
43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5
44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ
45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी
46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट
47: सर्वात लहान पांढर्‍या रक्त पेशी: लिम्फोसाइट
48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया
49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा
50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त

51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल
52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा

सामान्य ज्ञान

गोमटेश्वर – भारतातील सर्वात उंच पुतळा.

गोवा – क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य.

गोवा – भारतातील पहिला छापखाना या राज्यात निघाला.

गोविंद – बुटक्या तांदळाची जात.

ग्रामपंचायत – पंचायतराज व्यवस्थेतीस सर्वात खालचा स्थर.

ग्रामसेवक – हा ग्रामपंचायतीचा सचिव असतो.

ग्रीनलंड – जगातील सर्वात मोठे बेट.

ग्रीनवीच – मुळ रेखावृत्त या शहरातुन जाते.

ग्रीनिच – ग्रेट ब्रिटनमधील 0० रेखांश स्थान व जागतिक प्रमाणवेळ स्थान.

ग्रीस – पहिले ऑलिम्पीकचे सामने येथे भरले गेले होते.

घटोत्कच – भीमाचा हिडिंबेपासून झालेला मुलगा.

घनफळ – घनाकृतीची लांबी, रूंदी व उंची यांच्या गुणाकारांनी आलेली संख्या.

घनमूळ – अंकगणितात ज्या मूळ संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले असता येणा-या गुणाकाराशी मूळ संख्येचे नाते.

घनीभवन – द्रवरूप तसेच वायुरुप पदार्थ घट्ट होण्याची प्रक्रिया.

घाशीराम कोतवाल – विजय तेंडूलकर यांनी १९७२ साली लिहीलेले हे नाटक गाजले.

चंडीगढ – पंजाब किंवा हरीयाणा या राज्यांची राजधानी.

चंदिगढ – भारताचे पहिले सुनियोजीत शहर.

चंद्रपुर – ताडोबा अभयारण्य या जिल्ह्यात आहे.

----------------------------------------------------

महाभरती साठी अत्यंत उपयुक्त

1) " नवल " हा शब्द भाववाचक नामात कसा वापराल ?

1) नवलाकडे
2) नवलाचे
3) नवलाई ✅
4) नवलाईने

2) " सुलभा " हे कोणते नाम आहे ?

1) सामान्यनाम
2) भाववाचक नाम
3) विशेषनाम ✅
4) सर्वनाम

3) " गोडवा " या शब्दाचा प्रकार सांगा.

1) नाम
2) भाववाचक नाम ✅
3) विशेषण
4) सर्वनाम

4) " भारत " या शब्दाची जात ओळखा ?

1) सामान्यनाम
2) समूहवाचक नाम
3) विशेषनाम ✅
4) गरिबी

5) शांतता, शहर, श्रीमंती, सौंदर्य या चार शब्दापैकी सामान्यनाम शब्द ओळखा.

1) शहर ✅
2) शांतता
3) सौदर्य
4) श्रीमंती

6) " त्याच्या बोलण्यात परंतुचा वापर फार होतो. "या वाक्यात परंतु हा शब्द कोणत्या जातीचा आहे .

1) सर्वनाम
2) उभयान्वयी अव्यय
3) विशेषण
4) नाम✅

7) शब्दाचा प्रकार ओळखा -"पर्वत "

1) सामान्यनाम ✅
2) विशेषनाम
3) भाववाचक नाम
4) विशेषण नाम

8) "आपल्या " या शब्दाचे भाववाचक रूप कोणते ?

1) आपण
2) आपुलकी ✅
3) आम्ही
4) आपली

9) विशेषनामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात?

1) अनेकवचनी
2) एकवचनी ✅
3) बहुवचनी
4) यापैकी नाही

10) पुढीलपैकी पदार्थवाचक नाम ओळखा :

1) सैन्य
2) साखर ✅
3) वर्ग
4) कळप

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) ‘दास’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा.

   1) दाशी    2) दासी      3) माळीण    4) मादी

उत्तर :- 2

2) पुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा.

   अ) शहारे    ब) हाल      क) केळे      ड) रताळे.

   1) अ आणि ब    2) अ आणि ड    3) अ, क आणि ड    4) फक्त ड

उत्तर :- 1

3) ‘कुत्रा’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?

   1) कुत्र्या    2) कुत्री      3) कुत्रे      4) कुत्रि

उत्तर :- 1

4) मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?

   1) सात    2) नऊ      3) आठ      4) दहा

उत्तर :- 3

5) विध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा.

   1) जर ढग दाटले तर पाऊस पडेल      2) पाऊस पडेल
   3) पाऊस पडला असता तर बरे झाले असते    4) पाऊस पडण्याची शक्यता आहे का ?

उत्तर :-2

6) एक विशाल मंदिर तयार झाले. या वाक्यातील अधोरेखित शब्द ................. आहेत.

   1) उद्देश्य    2) विधेय      3) उद्देश्यविस्तार    4) विधेयविस्तार

उत्तर :- 3

7) ‘राजा प्रधानाला बोलावतो’ या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) कर्मणी    3) भावे      4) कर्मकर्तरी

उत्तर :- 1

8) ‘नवरात्र’ या सामासिक शब्दाचा विग्रह कसा होईल ?

   1) नौ रात्रीचा समूह  2) नव रात्रींचा समूह  3) नऊ रात्रींचा समूह  4) नवरात्रौत्सव

उत्तर :- 3

9) रिकाम्या जागी योग्य शब्द भरा.
    “वाक्य व त्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणजे ................ येतो.”

   1) अर्धविराम    2) अपूर्णविराम    3) स्वल्पविराम    4) पूर्णविराम.

उत्तर :- 4

10) ‘पाठीवरी वेणी नच, नागीणच काळी’ – या वाक्यातील अलंकार ओळखा.

   1) व्यतिरेक    2) अपन्हुती    3) उत्प्रेक्षा    4) यमक

उत्तर :- 2

१६ जून २०२२

अंकगणित सराव 20 प्रश्न उत्तरे , अवश्य सोडवा

1. मुद्दल = 5000 रु, मुदत = 4 वर्षे, व्याज = 1600 रु तर सरळव्याजाचा दर किती?

 6

 7

 9

 8

उत्तर : 8



 2. 7 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहाल?

 VI

 VII

 XII

 IIV

उत्तर :VII



 3. 720 चा शेकडा 25 किती?

 360

 180

 144

 270

उत्तर :180



 4. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

 45,54,63,72,?

 42

 21

 81

 18

उत्तर :81



 5. खालील संख्यामालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती?

 29,58,87,?

 116

 96

 100

 106

उत्तर :116



 6. प्रश्नचिन्हाच्या जागीकाय येईल?

 10:50::8:?

 30

 40

 50

 60

उत्तर :40



 7. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 पुरुष:स्त्री::मोर:?

 मोरीण

 लांडोर

 लांडोरिन

 पिसारा

उत्तर :लांडोर



 8. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 6:36::?:49

 40

 6

 35

 7

उत्तर :7



 9. घड्याळाच्या दोन काटयांत साडेबारा वाजता किती अंशाचा कोन असेल?

 105°

 165°

 180°

 195°

उत्तर :165°



 10. ‘साखरभात’ या शब्दातील अक्षरांपासून खालीलपैकी कोणता शब्द तयार होत नाही?

 साभार

 भारत

 सारखा

 साखर

उत्तर :सारखा



 11. जर आकाशाला पाणी म्हटले, पाण्याला माती म्हटले, हवेला अग्नी म्हटले, तर मासे कुठे राहतात?

 पाणी

 हवा

 आकाश

 माती

उत्तर :माती



 12. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

पेन्सिल, पेन, खडू, —–?

 पाटी

 खोडरबर

 बोरू

 पट्टी

उत्तर :बोरू



 13. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

6/30,3/15,7/35,—–?

 2/10

 11/33

 8/24

 10/20

उत्तर :2/10



 14. गटात बसणारे पद ओळखून पर्याय लिहा.

4,9,16,—-

 138

 32

 164

 25

उत्तर :25



 15. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 45

 32

 47

 41

उत्तर :32



 16. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 32

 18

 43

 48

उत्तर :43



17. गटात न बसणार्‍या पदाचा क्रमांक लिहा.

 25

 12

 9

 64

उत्तर :12



 18. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

90:92::98:?

 982

 96

 89

 100

उत्तर :100



 19. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

 13:26::15:?

 20

 30

 31

 40

उत्तर :30



 20. प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल?

40:10::60:?

 20

 15

 12

 30

उत्तर : 15

मौलाना अबुल कलाम आझाद

🟢 मौलाना अबुल कलाम आझाद 🟢

◾️जन्म: 11नोव्हेंबर 1888
मक्का, ऑट्टोमन साम्राज्य (आताचे सौदी अरेबिया)

◾️मृत्यू: 22 फेब्रुवारी 1958, दिल्ली

◾️लोकजागृतीसाठी 1912 साली कलकत्ता येथे त्यांनी अल्-हिलाल हे उर्दू साप्ताहिक सुरू केले.

◾️1915 साली त्यांनी अल्-बलाघ हे दुसरे वृत्तपत्र काढले.

◾️अनेक वृत्तपत्रांतून ‘आझाद’ ह्या टोपणनावाने ते लेखन करीत

◾️1923 च्या दिल्ली येथील कॉंग्रेसच्या विशेष अधिवेशनाचे ते अध्यक्ष झाले

◾️आझाद 1949 ते 46 पर्यंत कॉंग्रेसचे अध्यक्ष होते

◾️1942 ची क्रिप्स योजना, 1945 ची वेव्हेलची सिमला परिषद व 1946 मधील ब्रिटिश मंत्र्यांचे शिष्टमंडळ इ. प्रसंगीच्या सर्व वाटाघाटींत कॉंग्रेसतर्फे अध्यक्ष ह्या नात्याने त्यांनीच पुढाकार घेतला

◾️केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले

◾️त्यांचे इंडिया विन्स फ्रीडम (1959) हे आत्मचरित्र त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाले आहे.

भारतीय राज्यघटनेचा सरनामा

भारतीय राज्यघटनेचा सरनामा

आम्ही,भारताचे लोक, भारताला एक सार्वभौम,

समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही,गणराज्य घडविण्याचा

व त्याच्या सर्व नागरिकांस:

सामाजिक,आर्थिक व राजकीय न्याय,

विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य,

दर्जाची व संधीची समानता,

निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची  प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा गांभीर्यपूर्वक निर्धार करून, आमच्या संविधान सभेत आज दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. 

भारतीय राज्यघटनेच्या सुरुवातीलाच आपल्या राज्यघटनेचा सरनामा किंवा प्रस्तावना (Preamble) देण्यात आलेली आहे.१३ डिसेंबर १९४६ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत मांडलेल्या उद्देश पत्राच्या आधारावर आणि अमेरिकन राज्यघटनेच्या धर्तीवर भारतीय राज्यघटनेत  ‘राज्यघटनेचा सरनामा’ सामील करण्यात आलेला आहे. ही केवळ भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना नसून, भारतीय राज्यघटनेचे तत्त्वज्ञान, मुल्ये,आदर्श व्यक्त करणारी उद्देशिका आहे आणि या सरनाम्याचे भारतीय राज्यघटनेत अनन्यसाधारण महत्व आहे.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये घटनेच्या प्राधिकाराचा स्त्रोत; भारतीय राज्याचे स्वरूप आणि आदर्श; राज्यघटनेचे उद्देश व आकांक्षा आणि घटनेची स्वीकृती तारीख- या चार घटकांचा समावेश होतो. या प्रस्तावनेमध्ये मुख्यतः भारतीय राज्यघटनेच्या तत्वज्ञानाचे चित्र प्रदर्शन होते.    सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही,गणराज्य,न्याय, स्वातंत्र्य,समानता,बंधुता,एकता आणि एकात्मता हे प्रस्ताविकेतील तत्त्वज्ञान संपूर्ण राज्यघटनेची दिशा निर्धारित करतात. यांतील प्रत्येक शब्द हा लाखमोलाचा असून त्याचे विस्तृत विवेचन आपणास राज्यघटनेच्या विविध कलमांमधून पहावयास मिळते.

भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजावून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. ‘सार्वभौम’ म्हणजे आपणावर कोणत्याही बाह्य शक्तींचा निर्णयप्रक्रियेत प्रभाव नसणे. भारत हे सार्वभौम राष्ट्र असल्यामुळे आता आपल्यावर कोणत्याही परकीय सत्तेचे आधिपत्य नाही आणि आपला अंतर्गत आणि बाह्य कारभार आपण आपल्या पद्धतीने करण्यास मुक्त व सक्षम आहोत. ‘समाजवादी’ हा शब्द आपणास केवळ घटनेच्या सरनाम्यात आढळतो आणि राज्यघटनेत तो शब्द इतरत्र कुठेही नमूद करण्यात आलेला नाही. लोकशाही समाजवादाच्या माध्यमातून विषमता दूर करून ‘कल्याणकारी राज्य’ स्थापन करण्याची अपेक्षा घटनाकर्त्यांना अपेक्षित आहे. ‘धर्मनिरपेक्ष’ या शब्दाचा अर्थ म्हणजे भारत देशाला स्वतःचा असा कुठलाही धर्म नाही, परंतु सर्वधर्मसमभाव हे तत्त्व आपल्या देशात अवलंबिले जाईल. ‘लोकशाही’म्हणजे लोकांनी,लोकांसाठी,लोकांमार्फत राबविलेली शासनव्यवस्था होय.

‘गणराज्य’ या शब्दाचा अर्थ म्हणजे आपल्या देशात सर्वोच्च असे राष्ट्रप्रमुखाचे पद हे वंशपरंपरेने अथवा राजेशाही पद्धतीने नेमले जात नसून भारताचे राष्ट्रपती हे लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतीनिधीमार्फत अप्रत्यक्षपणे निवडणूक पद्धतीने निवडले जातात. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यातील ‘न्याय’ ही संकल्पना सामाजिक,आर्थिक व राजकीय न्याय अशा पद्धतीने अपेक्षित आहे.

कुठल्याही पद्धतीच्या जात,वर्ण,वंश,लिंग यांसारख्या आधारावर भेदभाव न करता ‘सामाजिक न्याय’ प्रस्थापित करता येईल आणि  उत्पन्न व संपत्तीची विषमता नष्ट करून ‘आर्थिक न्याय’ प्रस्थापित होऊ शकेल. राजकीय न्यायामध्ये सर्वांना समान राजकीय हक्क,सार्वत्रिक प्रौढ मतदान पद्धती,राजकीय संधींची समानता यांचा समावेश होतो. ‘स्वातंत्र्य’ या शब्दाचा अर्थ व्यक्तींच्या कृतीवर बंधन नसणे आणि त्यांना व्यक्तिमत्वाच्या विकासासाठी संपूर्ण संधी देणे, असा होय.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सर्व भारतीयांसाठी
विचार,अभिव्यक्ती,विश्वास,श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे. या विविध स्वातंत्र्यांची अमलबजावणी राज्यघटनेत मुलभूत हक्कांच्या स्वरुपात उपलब्ध आहे.

‘समानते’च्या तत्वानुसार सर्व भारतीय नागरिकांना नागरी,राजकीय आणि आर्थिक समानतेची हमी देण्यात आलेली आहे. ‘बंधुभावा’च्या तत्वानुसार धार्मिक,भाषिक,प्रांतिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीला लावणे हे कर्तव्य असेल. ‘एकता व एकात्मता’ ह्या संकल्पना  राष्ट्रीय एकात्मतेच्या अनुक्रमे भौगोलिक एकसंधता व मानसिक बाजू प्रदर्शित करतात. एकात्मतेच्या संकल्पनेमध्ये राष्ट्रनिर्मितीची प्रक्रिया अंतर्भूत असून त्याचा संबंध जनतेच्या भावनिक एकीकरणासोबत जोडलेला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या मूळ सरनाम्यामध्ये ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार समाजवादी,धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता- या तीन शब्दांचा समावेश करण्यात आलेला आहे.

भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याचे भारतीय राज्यघटनेमध्ये  अनन्यसाधारण असे महत्व आहे. खऱ्या अर्थाने, ती भारतीय राज्यघटनेचा आत्मा आणि हृदय आहे. भारतीय राज्यघटनेचा सरनामा म्हणजे भरतीय संविधानाचा आरसा आहे, जो भारतीय राज्यघटनेला खरेखुरे आणि मोठ्या प्रमाणात प्रतिबिंबीत करतो.संविधान सभेचे सदस्य पंडित ठाकूर दास भार्गव यांच्या मते – ‘ सरनामा हा आपल्या घटनेतील सर्वात मौल्यवान भाग आहे.तो घटनेचा आत्मा आहे. ती घटनेची चावी आहे.

’ सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांनुसार  सुरुवातीला सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा हिस्सा आहे की नाही, यांविषयी वाद होता. सर्वोच्च न्यायालयाने बेरुबारी खटल्यामध्ये १९६० मध्ये सरनामा हा घटनेचा भाग नसल्याचा निवाडा दिला होता, परंतु १९७३ मधील केशवानंद भारती खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पूर्वीचे मत फेटाळून लावले आणि सरनामा हा संविधानाचा भाग असल्याचे स्पष्ट केले. तसेच ही प्रस्ताविका अत्यंत महत्वाचा भाग असून घटनेचा अर्थ या सरनाम्यातील उदात्त दूरदृष्टीच्या संदर्भातच लावण्याचे मत प्रदर्शित करण्यात आले.