04 April 2024

Science Top-10 Quiz


Q : ___ निश्चित आकार असतो ? 

(अ) स्थायुला ✅✅

(ब) द्रवाला 

(क) प्लाझ्माला 

(ड) वायूला  



Q :___निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ? 

(अ) स्थायुला 

(ब) द्रवाला ✅✅

(क) प्लाझ्माला 

(ड) वायूला  



Q : पाणी  0 अंशसेल्सला____अवस्थेत असते? 

(अ) स्थायू  ✅✅

(ब) वायू 

(क) द्रव 

(ड) पुनर्घटन 



Q : पाण्याचा गोठणबिंदू _आहे? 

(अ) 0 अंश F

(ब) 100  अंश F

(क) 10 अंश F

(ड) 32 अंश F ✅✅



Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला____ म्हणतात? 

(अ) संघनन 

(ब) बाष्पीभवन 

(क) संप्लवन ✅✅

(ड) वितळणे 



Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला ___ म्हणतात? 

(अ) संघनन ✅✅

(ब) बाष्पीभवन 

(क) संप्लवन 

(ड) वितळणे 


Q : पाण्याचा  उत्कलनबिंदू _आहे? 

(अ) 112 अंश F 

(ब) 212  अंश F  ✅✅

(क) 102 अंश F

(ड) 202 अंश F 



Q : ____ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही? 

(अ) कापूर 

(ब) अमोनियम क्लोराइड  

(क) फॉस्फरस  ✅✅

(ड) आयोडीन 


Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___ असे म्हणतात?  

(अ) संघनन 

(ब) बाष्पीभवन ✅✅

(क) संप्लवन 

(ड) वितळणे 



Q : द्रव्याची ____ही पाचवी अवस्था आहे?  

(अ) प्लाझ्मा 

(ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट  ✅✅

(क) वायू  

(ड) द्रव 



Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_____म्हणतात? 

(अ) द्रव 

(ब) वायू 

(क) प्लाझ्मा  ✅✅

(ड) स्थायू 


Q : ___ रेणू एकमेकांपासून दूर असतात? 

(अ) ऑक्सिजनमधील  ✅✅

(ब) अल्कोहलमधील 

(क) लाकडामधील 

(ड) आयोडिनमधील  


जीवनसत्त्व ड


» या जीवनसत्त्वात ‘ड२’ आणि ‘ड३’ असे प्रकार आहेत. 


» ‘ड२’ जीवनसत्त्वाची रासायनिक नावे अरगोकॅल्सिफेरॉल, कॅल्सिफेरॉल, व्हायोस्टेरॉल अशी आहेत. 


» ‘ड३’ जीवनसत्त्वाचे नाव कोलेकॅल्सिफेरॉल आहे. 


» सर्व प्राण्यांच्या त्वचेमध्ये ७-डीहायड्रोकोलेस्टेरॉल हा पूर्वगामी ‘ड३’जीवनसत्त्व घटक असतो. 


» कोवळ्या सूर्यप्रकाशात अतिनील किरणांमुळे त्याचे कोलेकॅल्सिफेरॉलमध्ये रूपांतर होते. 


» अरगट आणि यीस्ट या कवकांत अरगोस्टेरॉल असते.


» ड जीवनसत्त्व वनस्पतींमध्ये अत्यल्प प्रमाणात असते. 


» सर्व प्राण्यांत ते अल्प प्रमाणात असून जठर आणि यकृतात असते. 


» शार्क व कॉड माशांच्या यकृतापासून मिळविलेल्या तेलात ते असते. 


» रोजच्या आहारातून ड जीवनसत्त्व पुरेसे मिळत नाही. म्हणून यकृत तेल वापरल्यास किंवा उन्हात बसल्यास ड जीवनसत्त्वाची कमतरता भरून निघते. 


» प्रौढ व्यक्तीला दररोज १५ मिग्रॅ. ड जीवनसत्त्व आवश्यक असते. 


» त्याचे कार्य आणि परावटू ग्रंथीतील पॅराथॉर्मोन संप्रेरकाचे कार्य एकमेकांस पूरक असते. 


» कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांच्या चयापचयावर ड जीवनसत्त्वाचे नियंत्रण असते. 


» शरीरातील हाडे आणि दात यांच्या जडणघडणीवर ड जीवनसत्त्वाचा परिणाम होतो. त्यामुळे कॅल्शियम, फॉस्फरस या दोन्हींच्या अभिशोषणात वाढ होते. 


» ड जीवनसत्त्व रक्तातील फॉस्फेटची पातळी नियमित राखते.


» ड जीवनसत्त्वाच्या त्रुटीमुळे लहान मुलांच्या बरगडया, मनगट, पाय यांच्या हाडांमध्ये बदल होतात. 


» शरीरातील लांब हाडांच्या टोकाशी कूर्चा तयार होते, हाडे वाकल्यामुळे बरगडया व पायांना बाक येतो, कवटीच्या हाडांचे कॅल्सीभवन होत नाही आणि दात किडतात. या लक्षणांना मुडदूस विकार म्हणतात. 


» ड जीवनसत्त्वाच्या अभावे प्रौढांना अस्थिमार्दव विकार होतो. त्यामुळे हाडांतील कॅल्शियमचे प्रमाण कमी होऊन हाडे ठिसूळ होतात.


महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग

1. तांब्याचा उपयोग :

भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.

विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र –  पितळ

धातू व प्रमाण – तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)

उपयोग – भांडी तयार करण्याकरिता

संमिश्र – ब्राँझ

धातू व प्रमाण – तांबे (81 ते 90%) व कथील (19 ते 10%)

उपयोग – बेअरिंग, जहाजाची बांधणी, पुतळे, नाणी आणि पदके तयार करण्याकरिता

संमिश्र – जर्मन सिल्व्हर

धातू व प्रमाण – तांबे (50%), जस्त (25%) व निकेल (25%)

उपयोग – हे संमिश्र उच्च प्रतीचे विद्युत रोधक आहे, म्हणून त्याचा उपयोग विद्युत रोधक उपकरणे तयार करण्याकरिता केला जातो.

संमिश्र – बेल मेटल

धातू व प्रमाण – तांबे (78%) व कथील (22%)

उपयोग – घंटया, तास तयार करण्याकरिता

संमिश्र – अॅल्युमिनीयम ब्राँझ

उपयोग – तांबे व अॅल्युमिनीयम भांडी तयार करण्याकरिता

संमिश्र – गनमेटल

धातू व प्रमाण – तांबे (88%) कथील (10%) व जस्त (2%)

उपयोग – बंदुका व बॉयलरचे सुटे भाग व जस्त तयार करण्याकरिता



2. लोखंडाचा उपयोग :

ओतीव लोखंड आणि बीड : झोतभट्टीमध्ये लोखंडाची धातुके वितळयानंतर त्यापासून लोहरस तयार होतो. हा लोहरस थंड झाल्यानंतर जे लोखंड तयार होते त्यास ओतीव लोखंड किंवा बीड असे म्हणतात.

नरम किंवा घडीव लोखंड : ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता केला जातो.

पोलाद : ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता बेसिमर भट्टी किंवा विवृत भट्टीचा उपयोग केला जातो.

लोखंडाचे संमिश्र आणि त्याचे उपयोग :

संमिश्र – स्टेनलेस स्टील

धातू – लोखंड, क्रोमीअम, कार्बन

उपयोग – तीक्ष्ण हत्यारे, भांडी सायकली व स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व निकेल तयार करण्याकरिता

संमिश्र – टंगस्टन स्टील

धातू – लोखंड, टंगस्टन व कार्बन

उपयोग – जलद गतीने कापण्यासाठी वापरली जाणारी हत्यारे तयार करण्याकरिता.

संमिश्र – मॅगनीज स्टील

धातू – लोखंड व मॅगनीज

उपयोग – कठीण खडकाला छिद्रे पाडणारी हत्यारे तयार करण्याकरिता.

संमिश्र – क्रोमीअम स्टील

धातू – लोखंड व क्रोमीअम

उपयोग – बॉलबेअरिंग, रोलर बेअरिंग स्वयंचलीत वाहनाचे सुटे भाग व खडक फोडण्याकरिता वापरण्यात येणार्‍या यंत्राचा जबडा तयार करण्याकरिता.



3. अॅल्युमिनीअमचा उपयोग :

घरातील भांडी, विमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता

चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता

विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता.

रुपेरी रंग तयार करण्याकरिता.

अॅल्युमिनीयमपासुन तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र – ड्युरालयुनिम

धातू – अॅल्युमिनीयम, तांबे, मॅग्नेशियम व मॅगनीज

उपयोग – हवाई वाहने, मोटारीचे साचे आणि आगगाडीचे भाग तयार करण्याकरिता.

संमिश्र – मॅग्नेलियम

धातू – अॅल्युमिनीयम व मॅग्नेशियम

उपयोग – शास्त्रीय तराजूच्या दांडया, घरघुती उपकरणे व हवाई वाहने तयार करण्याकरिता.

संमिश्र – अॅल्युमिनीअम ब्राँझ

धातू – तांबे, अॅल्युमिनीयम, लोखंड व कथील अॅल्युमिनीयम, कोबाल्ट.

संमिश्र – अल्किनो

धातू – अॅल्युमिनीयम, कोबाल्ट व निकेल

उपयोग – विद्युत जनित्राकरिता लागणारे उच्च प्रतीचे चुंबक तयार करण्याकरिता.



4. जस्ताचे उपयोग :

लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता.

विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो.

धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.



5. पाराचा उपयोग :

हवादाबमापी आणि तापमापीमध्ये पार्‍याचा उपयोग करतात.

बाष्पदीप तयार करण्याकरिता पार्‍याचा उपयोग करतात.

आरसे तयार करण्याकरिता केला जातो.



6. सोडीयमचे उपयोग :

सोडीयम बाष्पदीपामध्ये सोडीयमचा उपयोग करतात.

उच्च तापमान दर्शक तापमापीमध्ये त्याचा उपयोग होतो.



7. मॅग्नेशियमचे उपयोग :

क्षणदिप्ती छायाचित्रणामध्ये मॅग्नेशियमचा उपयोग करतात.

शोभेच्या दारूमध्ये.

धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.

धातूची जोडकामे करण्याकरिता थमाईट मिश्रण तयार करण्यासाठी.



8. चांदीचा उपयोग :

दागिने तयार करण्याकरिता

चांदी व पारा यापासून तयार झालेल्या मिश्रणाचा उपयोग दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता केला जातो.

छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता.

विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता.


9. सोन्याचे उपयोग :

नाणी व दागिने तयार करण्याकरिता व संवेदनशील विद्युत उपकरणामध्ये विद्युतवाहक म्हणून या धातूचा उपयोग केला जातो.



10. शिशाचा उपयोग :

मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता.

दारूगोळा तयार करण्याकरिता.

विद्युत घटात इलेक्ट्रोड तयार करण्याकरिता.

विद्युत परीपथकात वितळतार करण्यास.

अणुभट्टीतून न्युट्रॉन शोषक म्हणून भिंती तयार करण्याकरिता.

डाग देण्याचा धातू व सहज वितळणारी संमिश्रे तयार करणे.

पुरातनकाळी किल्याच्या भिंती मजबूत करण्याकरिता दोन दगडाच्या जोडात शिशे भरले जात असे.


 महत्त्वाचे धातू आणि अधातु व त्यांचे उपयोग 【भाग-2】


11. कथिलचा उपयोग :

मुद्रण धातूचे खिळे तयार करण्याकरिता

रंग तयार करण्याकरिता

विद्युत परीपथकामध्ये

मिश्रधातू तयार करण्याकरिता

विद्युत परीपथकात वितळतार तयार करण्याकरिता.


12. गांधकाचे उपयोग :

सल्फ्युरिक अॅसिडच्या उत्पादनकरिता.

आगकाडी उत्पादनात वापरण्यात येणारे अॅटिमनी सल्फाइड तयार करण्याकरिता.

गंधकाची पूड ही कवक नाशक आहे. यामुळे गंधकाची पूड पिकावर धूरळण्याकरिता उपयोगात आणली जाते. तसेच कीटकनाशके आणि कीडनाशके तयार करण्याकरिता गंधकाचा उपयोग केला जातो.

सल्फा ड्रग तयार करण्याकरिता

बंदुकीची दारू आणि स्फोटक द्रव्ये तयार करण्याकरिता

रबराचे व्हल्कनायझेन तयार करण्यासाठी.


13. सल्फर डायऑक्साइडचे उपयोग :

सल्फ्युरिक आम्लाच्या निर्मितीकरिता.

साखर, कृत्रिम धागे इत्यादीच्या विरंजनाकरिता.

कागद तयार करण्याकरिता आवश्यक असलेली कॅल्शियम बायसल्फाट सारखी संयुगे तयार करण्याकरिता

द्रवरूप सल्फर डायऑक्साइडचा उपयोग पेट्रोलियमच्या शुद्धीकरणाकरिता केला जातो.


14. पिवळा फॉस्फरसचे उपयोग :

तांबडा फॉस्फरस तयार करण्याकरिता. तांबडया फॉस्फरसपासून सुरक्षित आगकाडया तयार केल्या जातात.

अतिशय टणक, न गंजणारे फॉस्फर ब्राँझ मिश्र धातू तयार करण्याकरिता

उंदरासाठी मारण्याकरिता उपयोगी पडणारे झिंक फॉस्फेट विष तयार करण्याकरिता.

स्मोक बॉम्ब आणि शोभेची दारू तयार करण्याकरिता

स्फुरदयुक्त खताची निर्मिती करण्याकरिता


15. क्लोरीनचे उपयोग :

कापड, धागे, कागद व कागदाच्या लगदाच, विरंजन करण्याकरिता.

क्लोरीन जंतूनाशक असल्यामुळे पाण्याच्या शुद्धीकरणाकरिता या उपयोग केला जातो.

क्लोरोफार्म, एथीलीन क्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड इत्यादि संयुग तयार करण्याकरिता.

कृत्रिम रबर, प्लास्टीक, डी.डी.टी तयार करण्याकरिता.

विरंजक चूर्ण तयार करण्याकरिता.


16. ब्रोमीनचे उपयोग :

ब्रोमाइड क्षार तयार करण्यासाठी ब्रोमीन वापरतात.

रंग व जंतुनाशके तयार करण्यासाठी ब्रोमीनच उपयोग करतात.

फोटोफिल्म तयार करण्याकरिता सिल्व्हर ब्रोमाइडचा उपयोग करतात.

औषध उद्योगांमध्ये सोडीअम व पोटेशियमचे ब्रोमाईड वापरतात.


17. आयोडिनचे उपयोग :

टिंक्चर आयोडीन तयार करण्याकरिता व सिल्व्हर आयोडीन तयार करण्याकरिता.

आयोडिनपासून जंतुनाशक मलमे तयार केली जातात.

कृत्रिम रबर, प्लास्टिक, डी.डी.टी. तयार करण्याकरिता.


18. हिर्‍याचा उपयोग :

दागिण्यातील रत्न म्हणून

कठीण पदार्थातला छिद्र पाडण्यासाठी अवजारे तयार करण्याकरिता व काच कापण्याकरिता.


19. ग्रॅफाईट उपयोग :

विद्युत भट्टीमध्ये इलेक्ट्रोड म्हणून

शिसपेन्सिल तयार करण्याकरिता

उच्च तापमानावर कार्य करणार्‍या यंत्रामध्ये वंगण म्हणून

युरेनियमभट्टीमध्ये न्युट्रॉन शोषक म्हणून


20. कार्बन मोनॉक्साइडचा उपयोग :

कार्बनमोनोऑक्साइड आणि हायड्रोजनचा उपयोग वॉटर गॅस म्हणून करतात.

कार्बनमोनोऑक्साइड आणि नायट्रोजनचा उपयोग प्रोड्यूसर गॅस म्हणून करतात

रंगाच्या कारखाण्यात उपयुक्त असणार्‍या फॉस्जिन वायूच्या उत्पादनाकरिता

फॉस्जिन वायुचा उपयोग युद्धात विषारी वायु तयार करण्याकरिता सुद्धा करतात.


21. कार्बन डायऑक्साइडचा उपयोग :

सोडीयम कार्बोनेट आणि सोडीयम बायकार्बोनेट तयार करण्याकरिता

वायुमिश्रीत जल तयार करण्याकरिता

अग्निशामक दलामध्ये आग विझविण्याकरिता

अन्नपदार्थ टिकविण्याकरिता किंवा त्याची वाहतूक करण्याकरिता शितकारक म्हणून कोरडा बर्फ वापरतात.


22. मिथेनचा उपयोग :

गोबर गॅस आणि नॅचरल गॅसच्या स्वरुपात घरघुती इंधन म्हणून

काजळी आणि कार्बन ब्लॅक तयार करण्याकरिता.

ऊर्जानिर्मिती केंद्रामध्ये इंधन म्हणून

हायड्रोजनचे उत्पादन घेण्याकरिता


23. मिथेनॉलचा उपयोग

प्रयोग शाळेत स्पिरीट लॅम्प करिता इंधन म्हणून.

लाकडावर पॉलिश करण्याकरिता लागणारा द्रावक म्हणून

सुगंधी द्रव्ये तयार करण्याकरिता व कृत्रिम धागे तयार करण्याकरिता.


24. इथिलिनचा उपयोग :

कातकाम आणि धातुंच्या जोडकामाकरिता उपयोगात येणारी ऑक्सि-इथेलीन ज्योत तयार करण्याकरिता.

कृत्रिमरीत्या फळे पिकविण्याकरिता.

प्लास्टिकचे सामान व वस्तू त्याचप्रमाणे पॉलिथीन तयार करण्याकरिता.


25. अॅसिटीक अॅसिडचा उपयोग :

सेल्यु लोज अॅसिडच्या निर्मिती करिता.

कृत्रिम धागे आणि प्लास्टिकचे उत्पादन घेण्याकरिता

लोणची, सॉस, केचप यात परीरक्षक म्हणून अॅसिडपासून तयार केलेल्या व्हिनेगरचा उपयोग करतात.


26. बेंझीनचा उपयोग :

चरबी, राळ, रंगलेप आणि रबर इत्यादि द्रावकाकरिता.

ड्रायक्लीनिंगसाठी

पेट्रोल तुटवड्याच्या काळात मोटारच्या इंधनातील घटक म्हणून

निरनिराळी कार्बनी संयुगे तयार करण्याकरिता.

वातावरणाविषयी माहिती

पृथ्वी भोवतीच्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. वातावरणाचे खालील स्तर पडतात.

1. तपांबर

भूपृष्ठापासून तेरा किलोमीटर ऊंची पर्यंतच्या हवेच्या थर तपांबर म्हणून ओळखला जातो. या थराची विषुववृत्तावरील जाडी जवळजवळ सोळा किलोमीटर असून ध्रुवावर ती सहा किलोमिटरच्या दरम्यान आहे.

समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतसे तापमान कमी कमी होत जाते. या कारणामुळे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी थंड हवेची ठिकाणे निर्माण झालेली आहेत.

2. तपस्तब्धी

भुपृष्ठापासून जवळजवळ दहा किलोमिटरच्या उंचीपर्यंत वातावरणाच्या तापमानात सतत घट होत जाते. त्यानंतर तीन किलोमीटरच्या थरातील तापमानात कोणताही बदल होत नसल्यामुळे वातावरणाचा हा थर स्थिर तापमानाचा थर म्हणून ओळखला जातो. या थराला तपस्तब्धी असे म्हणतात.

3. स्थितांबर

तपस्तब्धीनंतर वातावरणाच्या या थराला सुरुवात होते. स्थितांबराच्या या भागाची जाडी जवळजवळ 13 ते 50 किलोमीटर पर्यंत आहे. या थरामधील सुरुवातीच्या 32 ते 40 किलोमीटर उंचीच्या भागात तापमान सारखेच आढळते. स्थितांबरामध्ये खालील स्थराचे अस्तित्व आढळते.
ओझोनोस्पीअर – स्थितांबराच्या खालच्या भागात ओझोन वायुचा स्तर आहे. हा थर ओझोनोस्पीअर या नावाने ओळखला जात असून या थरामध्ये सूर्यापासून आलेली अल्ट्राव्होयलेट किरणे शोषली जातात.
मध्यांबर – स्थितांबरचा वर मध्यांबर आहे. या भागात तापमानाचे प्रमाण सर्वात कमी आहे.

4. आयनाबंर

मध्यांबराच्या पलीकडील हवेच्या भागास आयनांबर म्हणतात. या थराची जाडी 80 ते 500 किलोमीटर पर्यंत आहे. या भागात हवेचे अत्यंत विरळ अस्तित्व आहे. सूर्यापासुन आलेल्या अल्ट्राव्होयलेट किरणाची हवेच्या अणूवर प्रक्रिया होऊन तेथे आयनांबर थर निर्माण झालेला आहे. यामध्ये खालील स्तर आढळतात.

इ-लेअर – या थरातील 100 ते 208 किलोमिटरचा थर इ-लेअर (E-Layaer) म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नेभोवाणीकडून निघालेल्या मध्यम रेडिओ लहरी पृथ्वीवर प्रवर्तित होतात.

एफ-लेअर – त्यानंतरचा थर (F-Layer) एफ-लेअर म्हणून ओळखला जातो. या थरामधून पृथ्वीवरील नभोवाणी केंद्रामधून निघालेल्या लघु रेडिओ लहरी पृथ्वीवर परावर्तीत होतात.

5. बाहयांबर


आयनाबंराच्या पलीकडील हवेच्या भागास बाहयांबर म्हणतात. या थरात उंचीनुसार तापमान वाढत जाते. या भागात हायड्रोजन सारख्या हलक्या वायूचे अस्तित्व आढळते.
माहिती संकलन:अमोल कवडे पाटिल.

दसरे महायुद्ध सुरु 1 सप्टेंबर 1939



◾️दसऱ्या महायुद्धात दोस्त राष्ट्रं - ज्यात सोव्हिएत युनियन, अमेरिका, ब्रिटन, आणि फ्रांस ह्यांचा समावेश होता तर अक्ष राष्ट्र - ज्यात नाझी जर्मनी, इटली, आणि जपान ह्यांचा समावेश होता.

◾️दसऱ्या महायुद्धाची बीजं ही पहिल्या युद्धात जर्मनीचा मानहानीकारक पराभवानंतर जर्मनीवर लादलेल्या जाचक अटींमध्ये होती. त्यावर लॉर्ड केन्स ह्यांचं “ Consequences of peace ” हे पुस्तक प्रसिद्ध आहे.

◾️पहिल्या महायुद्धाचं Theater हे युरोपात होतं तर दुसऱ्या महायुद्धाचं Theater हे जगभर पसरलं होतं.

◾️दसरं महायुद्ध सुरू होण्याचं तात्कालिक कारण म्हणजे राजपुत्र फर्डिनांड ची हत्या.

◾️नाझी जर्मनीने 1 सप्टेंबर, 1939 ला पोलंड वर केलेला हल्ला. त्याच बरोबर फ्रांस आणि ब्रिटनने जर्मनी विरूद्ध युद्ध पुकारलं.

◾️जर्मनीचा इटली आणि जपान सोबत Molotov-Ribbentrop करार झाला होता आणि त्या अनुषंगाने इटली आणि जपान जर्मनीच्या मदतीसाठी युद्धात उतरले.

◾️1941 पर्यंत युरोपातला बऱ्याचशा भागावर जर्मनीचं प्रभूत्व आलं होतं.

◾️जर्मनीने 1941 साली सोव्हिएत रशियाच्या पूर्व सीमेवर हल्ला चढवला आणि गल्लत झाली.

◾️सोव्हिएत रशियाच्या पूर्व सीमेपासून पश्चिम सीमेपर्यंतचं अंतर जवळपास ८००० किलोमीटर आहे.

◾️तयामुळे संपूर्ण रशिया जर्मनीच्या ताब्यात येणं जवळपास अशक्य होतं. पण हिटलर ला स्टालिनग्राड, लेनिनग्राड आणि मॉस्को वर ताबा मिळवणं पुरेसं होतं.

◾️तयात पूर्व सीमेवर प्रचंड थंडी असल्यामुळे इंधन गोठू लागलं आणि जर्मनीचं सैन्य अडकून पडलं.

◾️ जर्मनी ज्या तेलाच्या विहीरींमधून इंधनाची सोय करणार होतं ते रशियाने उधळून लावलं.

◾️ह सगळं होईपर्यंत अमेरिका या महायुद्धापासून अलिप्त होती.

◾️पण डिसेंबर 1941 ला जपानने अमेरिकेवर हल्ला केला आणि अमेरिका युद्धात उतरली. अक्ष राष्ट्रांनीही अमेरिकेविरूद्ध युद्ध पुकारलं.

◾️पण 1942 साली जपानचा Battle of Midway त पराभव झाला. त्यानंतर जर्मनी आणि इटली ह्यांच्या पराभवाची मालिका सुरू झाली.

◾️1944 साली फ्रांस च्या नॉर्मनडी च्या किनाऱ्यावरून दोस्त राष्ट्रांनी प्रति लढाई सुरू केली.

◾️1945 साली सोव्हिएत युनियनने बर्लिनवर ताबा मिळवला, ॲडॉल्फ हिटलर ने आत्महत्या केली. त्यानंतर जर्मनीने बिनशर्त शरणागती पत्करली.

◾️यरोपातलं महायुद्ध संपलं. पण जपान आणि अमेरिकेतली लढाई अजून सुरूच होती.

◾️जन 1945 मध्ये अमेरिकेने अणू बॉंब ची चाचणी यशस्वीरीत्या घेतली. 7 डिसेंबर 1939 साली जपानने पर्ल हार्बर वर जिथे अमेरिकेचा तळ होता तिथे हल्ला केला होता. त्याचा बदला घेण्याची सूचना अमेरिकी अधिकारी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष ट्रूमन ला करतच होते.

◾️जपान हे युद्धमान राष्ट्र असल्याने जपान शरण येण्याची शक्यता नव्हती आणि सरतेशेवटी अमेरिकेने 6 ऑगस्ट 1939 ला जपानच्या हिरोशिमा शहरावर आणि 9 ऑगस्ट, 1945 ला नागासाकी शहरावर अणुबॉम्ब टाकला.

◾️2 सप्टेंबर 1945 रोजी जपानने शरणांगती घेऊन दुसरे महायुद्ध समाप्त झाले.

इलेक्ट्रॉनचा शोध

🔥1897 मध्ये, जे जे थॉमसन यांना आढळले की कॅथोड किरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक लाटा नसतात परंतु हायड्रोजन (सर्वात हलके अणू) पेक्षा 1,800 पट जास्त फिकट असलेले कण बनतात. 


🔥थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे कण कॅथोडमधील अणूमधून आले आहेत - ते सबटामिक कण होते. त्यांनी या नवीन कणांना कॉर्पसुल्स म्हटले परंतु नंतर ते बदलून इलेक्ट्रॉन केले गेले . 


🔥थॉमसन यांनी हे देखील दर्शविले की इलेक्ट्रोन फोटोइलेक्ट्रिक आणि किरणोत्सर्गी सामग्रीद्वारे सोडलेल्या कणांसारखेच होते . 


🔥 ह त्वरित ओळखले गेले की इलेक्ट्रॉन हे विद्युतीय प्रवाह वाहणारे कण आहेतधातूच्या तारा मध्ये. थॉमसनने असा निष्कर्ष काढला की हे इलेक्ट्रॉन त्याच्या उपकरणांमधील कॅथोडच्या अगदी अणूमधून उद्भवले , ज्याचा अर्थ असा की अणू नावाच्या सूचनेनुसार अणू अविभाज्य नसतात .

जॉन डाल्टन

 जॉन डाल्टनच्या सिद्धांतानुसार एका मूलद्रव्याचे सर्व अणू एकसारखे असायला हवेत.

तसेच डाल्टनचा अणू हा एखाद्या भरीव गोळ्यासारखा, म्हणजेच एकसंध कण असायला हवा. परंतु वास्तव काही निराळेच असल्याचे एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धातील प्रयोगांनी दाखवून दिले.

हवेचा अत्यंत कमी दाब असलेल्या नळीतून विद्युत प्रवाह पाठवला, तर त्यामुळे प्रकाशाच्या स्वरूपातला विद्युत विमोच (इलेक्ट्रिक डिस्चार्ज) निर्माण होत असल्याचे अठराव्या शतकातही ज्ञात होते.

 उच्च दर्जाचे पंप उपलब्ध झाल्यानंतर, जर्मनीच्या ज्युलियस प्ल्युकेर याने १८५८ साली उच्च दर्जाची पोकळी निर्माण करून हेच प्रयोग केले. या प्रयोगांत त्याला, कॅथोडच्या (ऋणभारित इलेक्ट्रोड) विरुद्ध बाजूला असलेला नळीचा भाग, हिरव्या प्रकाशाने चमकायला लागल्याचे दिसून आले.

ही दीप्ती कॅथोडमधून निघत असलेले अज्ञात किरण निर्माण करीत असल्याने, या किरणांना 'कॅथोड किरण' म्हटले जाऊ लागले. याच किरणांवरील १८७९ सालच्या प्रयोगांत, इंग्लडच्या विल्यम क्रूक्स याला हे किरण चुंबकामुळे दिशा बदलत असल्याचे दिसले.

या दिशाबदलाचे स्वरूप या कणांवर ऋण विद्युत प्रभार असल्याचे दाखवत होते. क्रूक्सने वेगवेगळे वायू आणि वेगवेगळ्या धातूंचे इलेक्ट्रोड वापरून हेच प्रयोग केले. परंतु या किरणांमुळे निर्माण होणाऱ्या दीप्तीत कोणताही फरक पडला नाही.

 यावरून विल्यम क्रूक्स याने हे कॅथोड किरण म्हणजे इलेक्ट्रोडकडून येणारा विद्युत प्रवाहच असल्याचा निष्कर्ष काढला.

सन १८९७ मध्ये इंग्लंडच्या जे. जे. थॉमसन याने अत्युच्च दर्जाची निर्वात पोकळी वापरून केलेल्या प्रयोगांत, नळीच्या बाहेर बसवलेल्या अ‍ॅल्युमियमच्या दोन पट्टय़ांत विद्युत प्रवाह पाठवून विद्युतक्षेत्र निर्माण केले.

 या विद्युत क्षेत्रामुळे हे ऋण प्रभारित कॅथोड किरण अपेक्षेनुसार धन प्रभारित पट्टीकडे झुकत होते. चुंबकीय व विद्युत क्षेत्रांमुळे होणाऱ्या या कणांच्या मार्गबदलाच्या प्रमाणावरून थॉमसनने या कणांचा विद्युतभार व वस्तुमान काढले.

या कणांचे वस्तुमान हायड्रोजनच्या अणूच्या वस्तुमानाच्या तुलनेत अत्यल्प होते. या निरीक्षणांवरून कॅथोडपासून निघणारे हे ऋण प्रभारित कण अणूंचे मूलभूत घटक असले पाहिजेत, असा निष्कर्ष थॉमसनने काढला आणि त्यांना 'इलेक्ट्रॉन' या नावे संबोधले.

 अणूतील या घटकाच्या शोधाद्वारे, थॉमसनने अणूचे एकसंध स्वरूप संपुष्टात आणले. वायूंतील विद्युतवहनावरील केलेल्या संशोधनासाठी, थॉमसनला १९०६ सालचे नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

विज्ञान प्रश्नसंच.


🏆 खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 


⚪️ विस्थापन 

⚫️ चाल☑️

🔴 गती

🔵 तवरण 

_________________________


🏆 वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?


⚪️ ऑक्सिजन

⚫️ हड्रोजन

🔴 कार्बन डायऑक्साईड☑️

🔵 नायट्रोजन

_________________________


🏆 नयूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?


⚪️सवेग☑️

⚫️बल

🔴तवरण

🔵घडण


🏆 कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?


⚪️अल्फा

⚫️बिटा

🔴गमा☑️

🔵कष-किरण

_________________________


🏆 रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?


⚪️मलॅनिन

⚫️इन्शुलिन☑️

🔴यकृत

🔵कल्शियाम

_________________________


 🏆 मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?


⚪️रग तयार करणे

⚫️विद्युत रोधक म्हणून☑️

🔴विद्युत सुवाहक म्हणून 

🔵वरील सर्व कारणांसाठी 

_________________________


🏆 धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?


⚪️सोडियम क्लोरेट☑️

⚫️मायका

🔴मोरचुद

🔵कॉपर टिन

_________________________


🏆 बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.


⚪️मोठी

⚫️लहान☑️

🔴दप्पट

🔵तिप्पट

_________________________


🏆 वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................


⚪️तितकेच राहते

⚫️निमपट होत

🔴चौपट होते

🔵दप्पट होते ☑️

_________________________


🏆 धवनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .

⚪️सथायू 

⚫️दरव

🔴वायू

🔵निर्वात प्रदेश ☑️

_____________________________

सर्व स्पर्धा परीक्षा IMP प्रश्न

०१. महिला राष्ट्रीय संघ कोणी स्थापन केला ?


A. लतिका घोष ✔️

B. सरोजिनी नायडू

C. कृष्णाबाई राव

D. उर्मिला देवी



०२. पहिल्या कर्नाटक युद्धानंतर कोणत्या तहानुसार फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास दिले ?


A. अक्स-ला-चॅपेलचा तह ✔️

B. पॉंडेचेरीचा तह

C. मँगलोरचा तह

D. पॅरिसचा तह



०३. १८५७च्या उठावाचा बिहारमधील प्रमुख नेता कोण होता ?


A. खान बहादूर खान

B. कुंवरसिंग ✔️

C. मौलवी अहमदुल्ला

D. रावसाहेब



०४. डलहौसीने झाशी संस्थान केव्हा खालसा केल े?


A. १८४९

B. १८५१

C. १८५३ ✔️

D. १८५४



०५. १९०९ मध्ये पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणते वृत्तपत्र प्रकाशित केल े?


A. फ्री इंडिया

B. नया भारत

C. फ्री प्रेस जर्नल

D. लीडर ✔️



०६. १८५७च्या उठावाबाबत खालील विधाने लक्षात घ्या व योग्य विधाने ओळखा.


अ] उठावकर्त्यांना विशिष्ठ राजकीय उद्दिष्ट नव्हते.

ब] झीनत महल हिने स्वतःच्या सुरक्षेसाठी इंग्रजांशी बोलणी केली.


A. फक्त अ

B. फक्त ब

C. वरील दोन्ही ✔️

D. वरीलपैकी एकही नाही



०७. खाली दिलेल्या भारताच्या व्हॉइसरॉय यांचा योग्य कालक्रम लावा.


अ] लॉर्ड कर्झन

ब] लॉर्ड चेम्सफर्ड

क] लॉर्ड हार्डिंग्स II

ड] लॉर्ड आयर्विन


पर्याय

A. अ-ब-क-ड ✔️

B. अ-क-ब-ड

C. क-अ-ब-ड

D. अ-ड-क-ब



०८. विधान :- अ] १९२९ चा बालविवाह कायदा हा शारदा कायदा म्हणून प्रसिद्ध आहे.

स्पष्टीकरण:-  ब] उमा शंकर सारडा यांनी हा कायदा केंद्रीय कायदेमंडळात मांडला.


पर्याय

A. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण आहे. ✔️

B. फक्त अ आणि ब दोन्ही बरोबर असून ब हे अ चे योग्य स्पष्टीकरण नाही.

C. अ बरोबर आणि ब चूक

D. अ चूक आणि ब बरोबर



०९. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळामध्ये भारतीयांना स्थान मिळाले ?


A. भारत सरकारचा कायदा १९३५

B. भारत सरकारचा कायदा १९१९

C. भारत कौन्सिल कायदा १९०९ ✔️

D. भारत कौन्सिल कायदा १८९२



१०. मानवजातीसाठी एक धर्म, एक जात, एक ईश्वर. ही घोषणा कोणी दिली ? 


A. सहदरण आय्यपन 

B. नारायण गुरु ✔️

C. हृदयनाथ कुंजरू 

D. टी.एम. नायर 



१२. बंगाली साहित्यातील 'नील दर्पण' ही रचना कोणत्या साहित्य प्रकारात मोडते ?


A. कथा 

B. कादंबरी 

C. काव्य 

D. नाटक ✔️



१३. श्री नारायण एम. लोखंडे-मजूर चळवळीचे जनक यांच्या बाबत पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?


A. त्यांनी प्रथम मजूर संघटना 'बॉम्बे मिल हँड्स असोसिएशन' स्थापन केली 

B. त्यांना त्यांच्या हिंदू-मुस्लीम दंग्याच्या वेळी केलेल्या सलोख्याच्या कामाबाबत राव बहादूर हा किताब बहाल करण्यात आला. 

C. त्यांना 'जस्टीस ऑफ पीस' हा पुरस्कार देण्यात आला. 

D. वरील एकही नाही ✔️


१४. क्रांतिकारकांच्या कार्यक्रमात पुढीलपैकी कशाचा सहभाग नव्हता ? 


A. भारतात शस्त्रास्त्रे तयार करणे. नसल्यास बाहेरून आयात करणे. 

B. श्रीमंताकडून कोणत्याही मार्गाने पैसे काढणे. 

C. रेल्वे लाईन व इतर यातायात साधनांवर हल्ला बोलणे जेणेकरून ब्रिटीश साम्राज्य अडचणीत येईल. 

D. वरील सर्वाचा त्यात समावेश होता ✔️



१५. बापुजी आणे यांनी पुसदमध्ये १० जुलै १९३० रोजी इंग्रजांविरुद्ध विरोध दर्शवण्यास काय केले ?


A. त्यांनी मीठ तयार केले व संविनय कायदेभंग चळवळीत सहभाग घेतला. 

B. त्यांनी मिठाची पाकिटे विकण्यासाठी सभा घेतल्या. 

C. त्यांनी राखीव जंगलातून गवत कापून जंगल कायदा मोडला. ✔️

D. त्यांनी पाश्चिमात्य कपडे गोळा करून त्यांना आग लावली. 



१६. भारतीय मजुरांची प्रातिनिधिक संघटना म्हणून आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने कोणत्या संघटनेस मान्यता दिली ? 


A. भातातीय राष्ट्रीय ट्रेड युनियन कॉंग्रेस ✔️

B. अखिल भातारीय लाल ट्रेड युनियन कॉंग्रेस 

C. अखिल भातारीय ट्रेड युनियन कॉंग्रेस 

D. अखिल भारतीय किसान सभा 


१७. सशस्त्र क्रांतिकारकांच्या आणि त्यांच्या कारवायांच्या क्षेत्राच्य जोड्या लावा. 


अ)  श्रीधर परांजपे                १. हैद्राबाद 

ब)  डॉ. सिद्धनाथ काणे        २. अमरावती 

क)  दादासाहेब खापर्डे           ३. यवतमाळ 

ड)  नार्हरीपंत घारपुरे            ४. वर्धा,नागपूर 


         अ)  ब)  क)  ड)

   A.   ४   ३    १    २ 

   B.   ४   ३    २    १ ✔️

   C.   १   २   ३    ४ 

   D.   २   १   ४    ३ 



१८. शिवराम जनाबा कांबळे ज्यांनी सोमवंशीय हितवर्धक सभा १९१० मध्ये आयोजित केली, त्यांच्यावर कोणाचा प्रभाव होता ? 


A. जी.बी.वालंगकर 

B. ज्योतिबा फुले 

C. वरील दोघांचाही ✔️

D. वरील कोणाचाही नाही 



१९. खालीलपैकी कोणती वाक्ये चुकीचे आहेत ? 


A. सातारा जिल्ह्यात नाना पाटील यांनी पत्री सरकार-समांतर सरकार सुरु केले. 

B. याश्वाणराव चव्हाण यांनी चळवळीत भाग घेतला. 

C. प्रभात फेऱ्या व लष्करी कारवाया आयोजित केल्या.

D. वरीलपैकी एकही नाही


1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………

1} सफरचंद

2} गाजर✅✅✅

3} केळी

4} संत्र


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

1} स्कर्व्ही

2} बेरीबेरी

3} मुडदूस✅✅✅

4} राताधळेपण


📖📖📖📖📖📖📖📖📖


3️⃣पथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.

1} २००

2} ३५०

3} ५००

4} ७५०✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


4️⃣जव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….

1} वाढते

2} कमी होते

3} पूर्वीइतकेच राहते

4} शून्य होते✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..

1} दगडी कोळसा

2} कोक

3} चारकोल

4} हिरा✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.

1} जीवाणू (bacteria)

2} विषाणू (virus)✅✅✅

3} कवक (fungi)

4} बुरशी


📖📖📖📖📖📖📖📖📖


7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

1} देवी

2} मधुमेह✅✅✅

3} पोलिओ

4} डांग्या खोकल


📖📖📖📖📖📖📖📖📖


8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.

1} अल्फा

2} ‘क्ष’

3} ग्यामा✅✅✅

4} बीटा


📖📖📖📖📖📖📖📖📖


9️⃣खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

1} रंगाधळेपण

2} स्कर्व्ही

3} बेरीबेरी

4} यापैकी नाही✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..

1} पेनेसिलीन

2} प्रायमाक्वीन✅✅✅

3} सल्फोन

4} टेरामायसीन


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..

1} पाण्यामध्ये विरघळतात

2} स्थिर नसतात

3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅

4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

1} प्लुटोनिअम✅✅✅

2} U -२३५

3} थोरीअम

4} रेडीअम


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

1} युरिया

2} नायट्रेट

3} अमोनिअम सल्फेट

4} कंपोस्ट✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

1} ‘ब-१’ जीवनसत्त्व

2} ‘ब-४’ जीवनसत्त्व

3} ‘ड ‘ जीवनसत्त्व

4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

1} मेंदूचे स्पंदन

2} हृदयाचे स्पंदन

3} डोळ्यांची क्षमता✅✅✅

4} हाडांची ठिसूळता


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅

2} ११० डी.बी.च्या वर

3} १४० डी.बी.च्या वर

4} १६० डी.बी.च्या वर


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५✅✅✅

2} अल्बम-३०

3} ल्युथिनिअरम-१७७

4} सेसिअम-१३७


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.

1} अवअणू

2} अणू

3} रेणू✅✅✅

4} पदार्थ


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.

1} सेल्युलेज✅✅✅

2} पेप्सीन

3} सेल्युलीन

4} सेल्युपेज


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…

1} कमी होते✅✅✅

2} वाढते

3} सारखेच राहते

4} शून्य होते


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.

1} M

2} N✅✅✅

3} A

4} XB


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.

1} प्रकाश प्रारणांच्या

2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅

3} अल्फा प्रारणांच्या

4} गामा प्रारणांच्या


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.

1} स्वयंपोषी

2}  परपोषी✅✅✅

3} मांसाहारी

4} अभक्ष


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣4️⃣किण्वन हा _____ चा प्रकार आहे.

1} ऑक्सिश्वसन

2} विनॉक्सिश्वसन✅✅✅

3} प्रकाशसंश्लेषण

4} ज्वलन


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣5️⃣परकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

1} हरितद्रव्यामुळे✅✅✅

2} झथोफिलमुळे

3} कॅरोटीनमुळे

4} मग्नेशिंअममुळ


1857 च्या पूर्वीचे उठाव:

चोरोंचा उठाव  (१८००-१८०२)

-बिहार  – नेतृत्व: भूषण शिंह


फकिरांचा उठाव  -बंगाल-  नेतृत्व: माज्नुम सहा

-फकीर: बंगालमधील धार्मिक मुसलमानांचा समूह


संन्यासाचा उठाव – बंगाल (१७७०-१८२०)

-प्रमुख कारण : यात्रेकरूना तीर्थस्थानाला जाण्यास प्रतिबंध

-या उठावाचा उल्लेख बंकिमचंद्र चटर्जी ने आपल्या आनंद माठ या कादंबरीत केला आहे


कुका उठाव – पंजाब

-या उठावाची सुरवात जवाहरमल भगत आणि बालक शिंग यांनी केला

-हजारो या नावाचे ठिकाण त्यांचे मुख्यालय होते

-आंदोलनाचा उद्देश : शिख धर्मातील अंधश्रद्धा दूर करणे

-१८७२ मध्ये राम शिंह यांना रंगून ला निर्वासित करण्यात आले.


सावंतवाडीचा उठाव – महाराष्ट्र (१८४४) नेतृत्व:  फोंडा सावंत


पाड्यागरोंचा उठाव

– दक्षिण भारत (१८०१-१८०५)

– नेतृत्व कट्टाबोम नायकम


वेलोर:  शिपायांचा उठाव  (१८०६)

-टिपू सुलतानच्या वंशजांनी शिपायांना साथ दिली


-शिपायांचा पहिला उठाव

नायक उठाव

-मेदिनापूर जिल्हा बंगाल

-नेतृत्व अचल शिंह.

त्रावणकोर उठाव

-नेतृत्व वेलू थम्पि

-फ्रांस व अमेरिकेकडे मदतीची मागणी


बरेलीचा उठाव  (1816)

-नेतृत्व मुफ्ती मोहमद एवाज


अलिगढ उठाव  (1817)

-दयाराम आणि भगवंत शिंह.

आधुनिक भारताच्या इतिहासात घडलेल्या सर्वप्रथम व एकमेव महत्वाच्या घटना



◾️भारतात रेलवे सुरु करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली?

- लॉर्ड हार्डींग्ज पहिला


◾️इंग्रजी भाषेत सुरु करण्यात आलेले मुंबईतिल प्रथम वृत्तपत्र कोणते?

- बॉम्बे हेराॅल्ड.


◾️भारतातील पहिली जातीय संघटना कोणती?

- मुस्लिम लीग


◾️ टिपू सुलतानाने कोणत्या लढाईत इंग्रजांविरुद्ध सर्वप्रथम रॉकेट चा वापर केला?

- 1780 ची पाल्लुतुरची लढाई 


◾️भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी?

- लॉर्ड कॅनिंग 


◾️ निळीचा उठाव हा सर्वप्रथम कोठे घडून आला?

- बंगाल प्रांतात


◾️1858च्या कायद्यान्वये नियुक्त झालेला पहिला भारतमंत्री?

- लॉर्ड स्टैनले


◾️1857च्या उठावाची पहिली ठिणगी ही सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली?

- 34वी एन. आय. रजिमेंट 


◾️इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करुन देणारे प्रथम कॉलेज कोणते?

- कलकत्ता विद्यालय

तिसरे कर्नाटक युध्द (1756-1763)



1756 मध्ये युरोपात इंग्लंड व फ्रान्समध्ये पुन्हा युध्द सुरु झाले. ते सप्तवर्षीय म्हणून प्रसिध्द आहे.


  फ्रेंच सरकारने ताबडतोब काऊंट लाली यास भारतात पाठविले तो जवळजवळ एक वर्ष प्रवास करीत एप्रिल 1758 मध्ये भारतात येऊन पोहोचला या दरम्यान सिरोजउद्दीला या पराभव करुन इंग्रजानी बंगालवर आपले नियंत्रण प्रस्थापित केले होते.


  त्यास इंग्रजांचा जो प्रचंड आर्थिक फायदा झाला, त्याचा उपभोग त्यांनी फ्रेंचांविरुध्द लढण्यास केला.

  काऊंट लालीने 1758 मध्येच पाॅंडेचरी जवळ असलेला सेंट डेविड किल्ला जिंकून घेतला त्यानंतर त्याने तंजावरवर आक्रमण करण्याचा आदेश दिला.


  कारण तंजावरच्या राजाकडून 56 लक्ष रुपये घ्यावयाचे होते, परंतु या मोहिमेत अपयश आल्यामुळे फ्रेंचांच्या आरमार आल्यामुळे त्याने हा वेढा उठवला.


  दुसर्‍या बाजूला पोकॅाकच्या नेतृत्वाखाली इंग्रज आरमारी तुकडीने डी अ‍ॅशच्या नेतृत्वाखाली असलेल्या फ्रेंच आरमारी तुकडीचा तीन वेळा पराभव करुन त्यांना भारतीय सागरातून परत सेनानी सरआयकूट याने वांदिवाश येथे फ्रेंचांचा जबरदस्त पराभव केला.

  खुद्द बुसीला युध्दकैदी बनविण्यात आले.


  युध्दातील या पराभावामुळे फ्रेंच पॉडेंचरीला परत गेले. पण इंग्रजांनी पाँडेचरीलाच वेढा घातला शेवटी आठ महिन्यानंतर फ्रेंचांनी पॉडेचरी इंग्रजांच्या ताब्यात दिले.


  कर्नाटकाच्या तिसर्‍या युध्दात फ्रेंचांचा अंतिम पराभव झाल्यामुळे हे युध्द निर्णायक सिध्द झाले.


  1763 च्या पॅरिसच्यातहाने सप्तवर्षीय युध्द थांबल्यावर भारतातील संघर्षही संपुष्टात आला.


  या तहानुसार पॉडेचरी व काही प्रदेश फ्रेंचांना परत मिळाला असला तरी यापुढे फ्रेंचांनी इंग्रजाविरूध्द युध्द करण्याची हिंमत केली नाही. येथून फ्रेंच सत्ता भारतात वाढू शकती नाही.

नियामक कायदा (1773) :-

कंपनीचा दिवाळखोरीपणा आणि दुहेरी राज्यव्यवस्थेच्या दुष्परिणामामुळे कंपनीचे ब्रिटिश सरकारकडे 14 लाख कर्ज मागितले याचा फायदा घेऊन पार्लमेंटने कंपनीवर आपले नियंत्रण प्रस्थापित करण्याच्या हेतुने नियामक कायदा 1773 मध्ये मंजूर केला.


▪️कायदा मंजूर करण्याची कारणे पुढीलप्रमाणे-


बंगालमध्ये अत्याचार - कंपनीच्या नोकरांनी बंगालमध्ये मोठया प्रमाणात अत्याचार केला.


कारागिराकडून जबरदस्तीने स्वस्त दरात माल घेणे, दंड करणे कारागृहात पाठविणे शेतकरी व्यापारी यांच्यकडून जबरदस्तीने कर्जाचे रोखे लिहून घेणे यामुळे इंग्लडची जनता कंपनी शासनावर टीका करुन कंपनी सरकार बरखास्त केले.


कंपनीचे शासन म्हणजे व्यापारी धोरण - प्लासीच्या युध्दाने राजकारणात प्रवेश तर बक्सारच्या युध्दाने सत्ता स्थिर झाली. संरक्षण परराष्ट्रीय धोरण, करार, तह इ. महत्वाचे अधिकार कंपनीला मिळाले शासनविषयक सज्ञ्ल्त्;ाा व्यापारी संघटनेकडे असणे योग्य नाही असे मत राजनीतिज्ञम्प्;म्पनी व्यक्त केले.


व्यापारी हे कुशल प्रशासक नसतात असे म्हटले जाते.


ब्रिटिश पार्लमेंटला संधी - कंपनीच्या कर्मचार्‍यांनी अनेक मार्गाने मोठया प्रमाणात पैसा स्वत:साठी गोळा केला.


कंपनीने सतत युध्दाचे धोरण स्वीकारले त्यामूळे आर्थिक स्थिती कोलमडली होती. यासाठी कंपनीने पार्लमेंटकडे आर्थिक मदत मागितली.


1772 मध्ये संसदेने कंनीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी 31 सदस्य असलेल्या प्रवर समिती व त्याचबरोबर 13 सदस्यअसलेल्या गुप्त समितीची नेमणूक केली. समितीच्या अहवालाच्या आधारे 14 लाख पौंड रक्कम कर्जाऊ दिली.


त्याचवेळी 1 ऑक्टोबर 1773 रोजी नियंत्रणाचा कायदा मंजूर केला.

दत्तक विधान नामंजूर - लॉर्ड डलहौसीने

🖍 दत्तक विधान नामंजूर या तत्वाचा हा शोधकर्ता नव्हता.

🖍  या तत्वांचा प्रथम पुरस्कार हा ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाकडे जातो. 

🖍  1834 मध्ये कंपनीच्या संचालकांनी घोषणा केली होती की पुत्र नसल्यास दत्तक घेण्याचा अधिकार देणे म्हणजे आमची ही विशेष कृपा आहे.

 

  या आदेशांवरून सर्वप्रथम खालसा झालेली राज्ये. 

  मांडवी राज्य :- 1839 

  कुलाबा व जालौर :- 1840 

  सुरतच्या नवाबाचे राज्य :- 1842 



🖍 वयपगत सिध्दांतानुसार विलीन झालेले प्रथम            संस्था म्हणजेच सातारा होय व शेवटचे संस्थान म्हणजेच नागपुर होय.

डलहौसीने पुढील राज्ये खालसा करून ती इंग्रजी राज्यात विलीन केली.

  सातारा :- 1848 

  जैतपूर व संबलपूर :- 1849 

  पंजाब :- 1849 

 ओरछा :- 1849 

 भागत /बघाट :- 1850 

 उदयपूर :- 1852 

 झांसी :- 1853 

 नागपूर :- 1854 

 करौली :- 1855 

🖍  इ. स. 1852 :- ब्रम्हदेश हा इंग्रजी राज्यात विलीन केला गेला. 

🖍  इ. स. 1853 :- तैनाती फौजेची बाकी म्हणुन त्याने हैद्राबदच्या निजामाकडून वऱ्हाड प्रांत घेतला.

🖍  इ. स. 1855 :- याने तंजावरच्या राजाची राजा ही पदवी रद्द केली. 

🖍  इ. स. 1856 :- गैरव्यवहार व अव्यवस्था या कारणाखाली याने औंधच्या नवाबाचे राज्य खालसा केले. 

🖍  इ. स. 1856 :- याने अवधचा नवाब वाजिद अली शाह यास सत्तात्याग करण्यास सांगितले परंतु नवाबाने नकार दिला तेव्हा ‘प्रशासन’ हा मुद्दा बनवून त्याने अवधचे विलीनीकरण केले. 

🖍  पशवा बाजीराव दुसरा याचे दत्तक पुत्र धोंडोपंत उर्फ नानासाहेब यांची वार्षिक 8 लक्ष रूपयांची पेन्शन तसेच पेशवा ही पदवीदेखील डलहौसीने रद्द केली. तसेच नानासाहेबांना बिठूर जहागीर सोडण्याचाही हुकूम दिला गेला. 

🖍 कर्नाटकच्या नवाबाला मिळत असलेली 8 लक्ष प्रती वर्ष ही पेंन्शन याने बंद केली. 

🖍  बादशहा बहादुरशहा याची पदवी रद्द करण्याचा डलहौसीचा प्रयत्न मात्र असफल ठरला.


भारतीय इतिहासाशी संबंधित टॉप (1000) ल्युसेंटवर आधारित महत्त्वाचे प्रश्नोत्तरे



प्रश्न 1. भारतात मुस्लिम राजवटीचा पाया कोणी घातला?

उत्तर - शहाबुद्दीन (उर्फ मोहम्मद घोरी)


प्रश्न 2. भारतात मुस्लिम लीगची स्थापना केव्हा व कोठे झाली?

उत्तर – ३० डिसेंबर १९०६, ढाका (बांगलादेश)


प्रश्न 3. भारतात मानवाचा पहिला पुरावा कोठे सापडला?

उत्तर - नर्मदा खोऱ्यातून (मध्य प्रदेश)


प्रश्न 4. 1881 मध्ये भारतीयांनी स्थापन केलेली आणि व्यवस्थापित केलेली भारतातील पहिली मर्यादित दायित्व बँक कोणती होती?

उत्तर - अवध कमर्शियल बँक


प्रश्न 5. भारतातील ब्रिटिश जमीन महसूल प्रणालीचा सर्वाधिक फायदा कोणाला झाला?

उत्तर - जमीनदार


प्रश्न 6. बीबी का मकबरा भारतात कुठे आहे?

उत्तर - औरंगाबाद (महाराष्ट्र) मध्ये


प्रश्न 7. भारतात पहिला रेल्वेमार्ग कोणी टाकला?

उत्तर - लॉर्ड डलहौसी यांनी 1850 मध्ये


प्रश्न 8. पोलो हा खेळ भारतात कोणाच्या काळात सुरू झाला?

उत्तर - तुर्कांच्या काळात


प्रश्न 9. भारतातील पोर्तुगीज साम्राज्याचा संस्थापक कोण मानला जातो?

उत्तर - अल्फोन्सो डी अल्बुकर्क


प्रश्न 10. भारतात पहिली कापूस कापड गिरणी कधी आणि कुठे स्थापन झाली?

उत्तर - 22 फेब्रुवारी 1854 इ.स. बॉम्बे (मुंबई) स्पिनिंग आणि विव्हिंगच्या स्थानिक पारशी उद्योजकाने.

भारताचे गवर्नर जनरल


●  किस गवर्नर जनरल को भारतीय प्रेस का मुक्तिदाता कहा जाता है ?

— लॉर्ड चार्ल्स मेटकॉफ


●  लॉर्ड एलिनबरो के कार्य का समय रहा है ?

— (1842-44 ई.) लॉर्ड एलिनबरो


●  दास प्रथा का उन्मूलन किस गवर्नर जनरल के समय हुआ ?

— लॉर्ड एलिनबरो


●  किस गवर्नर जनरल के समय ब्रिटिश हुकूमत में सिंध को मिला लिया गया 

— लॉर्ड एलिनबरो (अगस्त, 1843 में)


●  लॉर्ड ऑकलैंड के कार्य का समय रहा है ?

— (1836-42 ई.) लॉर्ड ऑकलैंड


●  लॉर्ड हार्डिंग के कार्य का समय रहा है ?

— (1844- 48 ई.) लॉर्ड हार्डिंग


●  लॉर्ड हार्डिंग ने किस प्रथा पर रोक लगाई ?

— नरबलि प्रथा


●  प्रथम आंग्ल-सिख युद्ध किसके समय हुआ, जिसमें अंग्रेज जीत गए ?

— लॉर्ड हार्डिंग


●  लॉर्ड डलहौजी के कार्य का समय रहा है ?

— ( 1848-56 ई.) लॉर्ड डलहौजी


●  द्वितीय आंग्ल-सिख युद्ध तथा पंजाब का ब्रिटिश हुकूमत में विलय किस गवर्नर के काल में हुआ ?


—लॉर्ड डलहौजी



●  लॉर्ड विलयम बैटिक के कार्य का समय रहा है ?

— (1828-35 ई.) लॉर्ड विलयम बैटिक


●  बंगाल का अंतिम गवर्नर जनरल कौन था ?

— (लॉर्ड विलयम बैटिक


●  किस एक्ट के तहत बंगाल के गवर्नर-जनरल को भारत का गवर्नर जनरल बनाया गया ?

— (चार्टर एक्ट


●  चार्टर एक्ट लागू होने के बाद भारत का पहला गवर्नर जनरल कौन बना ?

— (विलयम बैटिक


●  सती प्रथा को कब प्रतिबंधित किया गया ?

— (1829 ई.


●  किसके सहयोग से लॉर्ड विलियम बैटिक ने सती प्रथा को प्रतिबंधित किया ?

— (राजा राममोहन राय


●  सती प्रथा के अलावे विलियम बैटिक का कार्यकाल किसके लिए जाना जाता है ?

— शिक्षा सुधार


●  किस मेडिकल कॉलेज की स्थापना लॉर्ड विलयम बैटिक ने की ?

— सन् 1835 में कलकत्ता मेडिकल कॉलेज


●  किसकी सिफारिशों को मानते हुए विलियम बैटिक ने अंग्रेजी को शिक्षा का माध्यम बनाया ?

— (मैकाले (1835 ई.)


●  बैटिक ने ठगी प्रथा को रोकने के लिए किसकी नियुक्ति की ?

— कर्नल स्लीमैन


●  लॉर्ड चार्ल्स मेटकॉफ के कार्य का समय रहा है ?

— (1835-36 ई.) लॉर्ड चार्ल्स मेटकॉफ


●  लॉर्ड डलहौजी के समय महारानी विक्टोरिया को जो हीरा भेजा गया उसका क्या नाम था ?

— कोहिनूर हीरा


●  किस कमीशन के तहत लॉर्ड डलहौजी ने भूमिकर रहित जागीरों की जमीन हड़पनी शुरू की ?

— इनाम कमीशन


●  डलहौजी के शासन को किस कारण याद किया जाता है ?

— व्यपगत सिद्धांत (Doctrine of lapse)


●  डलहौजी ने सिक्कम पर कब और कैसे अधिकार कर लिया ?

— सन् 1850 ई. में दो अंग्रेज डॉक्टरों के साथ बदसलूकी का आरोप लगाकर ।


●  अवध का विलय डलहौजी ने कौन-सा आरोप लगाकर किया ?

— कुशासन का आरोप


●  जिस समय अवध को ब्रिटिश शासन में शामिल किया गया उस समय वहां का नवाब कौन था ?

— वाजिद अली शाह


●  डलहौजी ने अपनी ग्रीष्मकालीन राजधानी कहां बनवाई ?

— शिमला


●  भारतीय नागरिक सेवा के लिए सबसे पहले प्रतियोगिता परीक्षा की शुरुआत किसने की ?

— लॉर्ड डलहौजी


●  पहली बार स्वतंत्र रुप से लोक सेवा विभाग की स्थापना किसने और कब की ?

— 1854 ई. में लॉर्ड डलहौजी ने


●  सन् 1853 में पहली बार लॉर्ड डलहौजी के समय बिजली से संचालित तार-सेवा कहां शुरू हुई ?

— कलकत्ता एवं आगरा ।


●  बंगाल, बिहार एवं उड़ीसा में स्थायी बंदोबस्त कब और किसने लागू किया

— 1793 ई. में लॉर्ड कार्नवालिस ने ।


●  डलहौजी के शासन में सबसे पहले रेल की शुरुआत हुई, पहली रेल कहां से कहां तक चली थी ?

— बम्बई से थाणे


●  बम्बई से थाणे के बीच पहली बार चलने वाली ट्रेन को हरी झंडी कब मिली 

— 15 अप्रैल 1853 ई.


●  उस समय बुम्बई से थाणे के बीच चलाई गई ट्रेन ने कितनी दूरी तय की थी 

— 34 किलोमीटर


●  नया पोस्ट ऑफिस एक्ट कब पारित हुआ ?

— 1854 ई.


●  भारत में पहली बार डाक टिकट का प्रचलन कब शुरू हुआ ?

— 1854 ई.

बक्सारची लढाई: 22 ऑक्टोबर 1764

◾️मोगल सम्राट दुसरा शाह आलम, त्याचा वजीर व अयोध्येचा (अवध किंवा औंध) सुभेदार शुजाउद्दौला व बंगालच्या सुभेदार मीर कासिम यांची संयुक्त आघाडी आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यात बक्सार गावापाशी झालेली लढाई. 


◾️बक्सार बिहार प्रातांत पाटण्याच्या पश्चिमेस सु. 120 किमी. वर गंगा नदीच्या दक्षिण तीरावर वसले आहे.


◾️मीर कासिमने सर्वांना करमुक्त व्यापार करण्यास सवलत जाहीर केली.


◾️वातावरण स्फोटक होण्याचे आणखी एक कारण म्हणजे पाटणा येथील कंपनीच्या प्रतिनिधी एलिस याचा उद्दामपणा, हे होते


◾️कपनीचे 857 गोरे व 7072 एतद्देशीय सैनिक आणि संयुक्त आघाडीचे 6000 वर मोगली सैनिक ठार झाले, असे म्हणतात. संयुक्त आघाडीच्या पराभवामुळे येथे ब्रिटिश सत्तेचा पाया घातला गेला


चालू घडामोडी :- 03 एप्रिल 2024

◆ IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा KKR(272 धावा] हा दुसरा संघ ठरला आहे.[पहिला SRH :- 277धावा]

◆ 'जीएसटी' प्रणाली लागू झाल्यापासून महाराष्ट्राने संकलनात पहिला क्रमांक कायम राखला आहे.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार भारतात पुरूष कामगारांना सर्वाधिक पगार दिल्ली राज्यात दिला जातो.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार देशात पुरूष कामगारांना सर्वात कमी पगार मध्यप्रदेश या राज्यात मिळतो.

◆ देशात पुरूष कामगारांना मिळणाऱ्या पगाराच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य 18व्या क्रमांकावर आहे.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन अहावालानुसार देशात हिमाचल प्रदेश या राज्यात महिलांना सर्वाधिक वेतन मिळते.

◆ महिलांना वेतन देण्यात महाराष्ट्र राज्य देशात 22व्या क्रमांकावर आहे.

◆ भारतात 15 ते 29 वयोगटा दरम्यान सुशिक्षित तरुणांचा बेरोजगारीचा दर सर्वाधिक ओडिशा राज्यात आहे.

◆ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन च्या अहावालानुसार भारतातील गुजरात या राज्यात 15 ते 29 वयोगटाच्या सुशिक्षित तरुणांना सर्वाधिक नोकरीची संधी आहे.

◆ आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशाच्या ऐकून GST संकलनात महाराष्ट्र राज्याचा वाटा 15 टक्के आहे.

◆ ज्युडिश सुमिनवा तुलुका यांची काँगो देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान पदी निवड झाली आहे.

◆ एशिया सोसायटी इंडियाच्या अध्यक्ष पदी संगिता जिंदाल यांची निवड झाली आहे.

◆ भारताचे पहिले ट्राय सर्व्हिस कॉमन डिफेन्स स्टेशन मुंबई या ठिकाणी होणार आहे.

◆ Covinet हे कारोना व्हायरस नेटवर्क WHO या संस्थेने लाँच केले आहे.

◆ उत्तर प्रदेश राज्यातील बनारस या ठिकाणच्या शहनाई ला GI टॅग प्राप्त झाले आहे.

◆ तक्रार निवारण प्रणालीची एक नवीन आणि अधिक वापरकर्ता अनुकूल आवृत्ती Scores 2.0 SEBI या संस्थेकडून लाँच करण्यात आली आहे.

◆ आंतरराष्ट्रिय संस्कृती पुरस्कार 2024 ने मीना चरंदा यांना सन्मानित करण्यात आले आहे.

◆ रिन्यूबल एनर्जी फायनान्सिंग क्षेणीमध्ये Skotch ESG पुरस्कार "REC Ltd" या कंपनीला मिळाला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

03 April 2024

चालू घडामोडी :- 02 एप्रिल 2024

◆ T20 मध्ये 300 बळी टिपणारा महेंद्रसिंग धोनी पहिला यष्टीरक्षक आहे.

◆ एमएस धोनी T20 मध्ये 7000 धावा करणारा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला.

◆ राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाचा एक वाहन एक फास्टग हा नियम देशभरात 01 एप्रिल पासून लागू झाला आहे.

◆ मुंबई मध्ये RBI चा 90वा स्थापन दिवस साजरा करण्यात आला.

◆ सिमरन ब्रम्हदेव थोरात ने देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान मिळवला आहे.

◆ तुळजापूर हे तीर्थक्षेत्र 'कवड्यांचे गाव' म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रथमच मानांकन झाले आहे.

◆ केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरो च्या प्रधान महासंचालक पदी "शेफाली सरण" यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ नवी दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय खो खो स्पर्धेचे महिला व पुरुष दोन्ही विजेतेपद महाराष्ट्र या राज्याच्या संघाने पटकावले.

◆ महाराष्ट्र राज्याच्या पुरुष खो खो संघाने 39वे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.

◆ महाराष्ट्र राज्याच्या महिला खो खो संघाने 25वे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले आहे.

◆ आयपीएल क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा हा खेळाडू सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे.

◆ अमेरिकेत झालेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद "जानिक सिनर" यांनी जिंकले आहे.

◆ FICCI लेडी ऑर्गनायझेशन च्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी जॉयश्री दास वर्मा यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ महाराष्ट्रातील कोल्हापूर या जिल्ह्यातील हुपरी येथील चांदी उद्योगाला GI टॅग प्राप्त झाले आहे.

◆ स्टॉकहोम जल पुरस्कार 2024 "तैकान ओकी" यांना प्रदान करण्यात आला आहे.

◆ स्टॉकहोम जल पुरस्कार हा 1991 या वर्षांपासून दरवर्षी पाण्यासंबंधी काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.

◆ सीता राम मीना यांची "नायजर गणराज्य" या देशाच्या भारताच्या राजदूत पदी निवड झाली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

02 April 2024

चालू घडामोडी :- 01 एप्रिल 2024

◆ हॉकी इंडिया च्या 2023 वर्षांतील सर्वोत्तम हॉकीपटूचा बलबीर सिंह वरीष्ठ पुरस्काराने हार्दिक सिंह यांना सन्मानित करण्यात आले आहे.

◆ हॉकी इंडियाच्या वतीने देण्यात येणारा मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार 2023 अशोक कुमार यांना प्रदान करण्यात आला आहे.

◆ हॉकी इंडिया च्या वार्षिक पुरस्कारांमध्ये पी. आर. श्रीजेश यांना सर्वोत्तम गोलरक्षक पुरस्कार देण्यात आला आहे.

◆ भारताचा टेनिसपटू रोहन बोपण्णा आणि ऑस्ट्रेलियाचा टेनिसपटू मॅथ्यु एबडेन यांनी मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

◆ भारताचा टेनिस पटू रोहन बोपण्णा ने टेनिस दुहेरी स्पर्धेचे 26वे विजेतेपद पटकावले आहे.

◆ भारताचा टेनिस पटू रोहन बोपण्णा ने पुरुष दुहेरीच्या क्रमवारीत पाहिले स्थान पटकावले आहे.

◆ देशातील आसाम राज्यातील सहा पारंपारिक हस्तकला वस्तू उत्पादनाला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे.

◆ महाराष्ट्र राज्याच्या बालमृत्यू दरात प्रति एक हजार 22 वरुन 18 पर्यंत घट झाली आहे.

◆ महाराष्ट्र राज्याचा नवजात मृत्युदर प्रति एक हजार 13 इतका होता. तो आता 11 पर्यंत कमी झाला आहे.

◆ UNO च्या शाश्वत विकास ध्येयानुसार सन 2030 पर्यंत नवजात मृत्युदर 12 पेक्षा कमी करण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले होते.

◆ UNO चे नवजात मृत्युदर कमी जे उद्दिष्ट ठेवले होते. ते महाराष्ट्र राज्याने 2020 या वर्षामध्ये गाठले आहे.

◆ महाराष्ट्र राजभवन मुंबई येथे रमेश बैस यांच्या हस्ते सागरी सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले आहे.

◆ उत्तरप्रदेशातील मथुरा या ठिकाणच्या सांझी क्राफ्ट कलेला GI टॅग प्रदान करण्यात आला आहे.

◆ भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती 2024 हा सर्वात मोठा लष्करी सराव जैसलमेर, राजस्थान येथे आयोजित करण्यात आला आहे.

◆ जैसलमेर ,राजस्थान येथे 01 ते 10 एप्रिल या कालावधी दरम्यान भारतीय हवाई दलाचा गगनशक्ती 2024 हा लष्करी सराव आयोजित करण्यात आला आहे.

◆ बसिरो डिओमाये यांची सेनेगल या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली आहे.

◆ भारताच्या इतिहासातील वायकोम सत्याग्रहाला नुकतेच 100 वर्षे पूर्ण झाली आहेत.

◆ हवामान संबंधी असणारे INDRA ॲप लाँच करण्यात आले आहे.

◆ ''गमाने" नावाचे चक्रीवादळ मादागास्कर या देशात आले आहे.

◆ गोवा च्या जायफळ टॅफी (कॅन्डी) ला पेटंट मिळाले असून याची प्रक्रिया गोवा च्या ICAR केंद्रीय तटीय कृषी संशोधन केंद्रात 'डॉ.ए आर देसाई' यांच्या नेतृत्वात विकसित करण्यात आली आहे.

01 April 2024

1857 उठावाची केंद्र आणि नेते

❑ बरेली  ➭   खान बहादुर खान 


❑ कानपुर  ➭   नाना साहब


❑ आरा (बिहार)  ➭   कुँवर सिंह


❑ अवध  ➭   हजरत महल 


❑ झाँसी ➭   रानी लक्ष्मीबाई


❑ हरियाणा  ➭   राव तुलाराम


❑ सम्बल ➭   सुरेंद्र साईं


❑ इलाहाबाद ➭   लियाकत अली


❑ ग्वालियर / कानपुर ➭   तात्या टोपे


❑ लखनऊ ➭   बेगम हजरत महल 


❑ बैरकपुर ➭ मंगल पांडे


नागरिकत्व: काय आहे नेहरू-लियाकत करार?



- मंजूर होण्यापूर्वी नेहरू-लियाकत कराराचा अनेक नेत्यांनी दाखला दिला. भारत आणि पाकिस्तान या दोन देशाच्या प्रमुखांमध्ये सहा दिवस चाललेल्या चर्चेनंतर ८ एप्रिल १९५० रोजी दिल्ली करार झाला, ज्याला दिल्ली पॅक्ट असंही बोललं जातं. 


- नेहरू-लियाकत नावाने प्रसिद्ध असलेला हा करार उभय देशांमधील अल्पसंख्यांकांचे अधिकार सुनिश्चित करण्यासाठी टाकलेलं पाऊल होतं. याशिवाय दोन्ही देशातील युद्ध टाळणं हाही या कराराचा महत्त्वाचा उद्देश होता.


-१९४७ च्या फाळणीनंतरचा रक्तरंजित इतिहास सर्वांना परिचित आहे. दोन्हीही बाजूंना दंगली उसळल्या, ज्यात लाखो लोकांचा मृत्यू झाला, हजारो महिलांवर बलात्कार करण्यात आला, अल्पवयीन मुलींचं अपहरण झालं आणि त्यांचं जबरदस्तीने धर्मांतर करण्यात आलं. या संघर्षामुळे दोन्ही देशातील अल्पसंख्यांक असुरक्षित होते. 


-  डिसेंबर १९४९ मध्ये भारत-पाकिस्तानमधील व्यापारिक संबंधही बंद झाले. जीव वाचवण्यासाठी अल्पसंख्यांक घर-दार सर्व काही सोडून निघून गेले. लाखोंच्या संख्येने हिंदू-मुस्लिमांचं स्थलांतर झालं. 


- स्वतःचा देश सोडून जे लोक कुठेही गेले नाही, त्यांना संशयास्पद नजरेने पाहिलं जाऊ लागलं.

सराव प्रश्नसंच


Q1. खालीलपैकी कोणत्या राज्यात तांब्याचा साठा सर्वात जास्त आहे?

(a) बिहार

(b) झारखंड

(c) कर्नाटकक

(d) राजस्थान✅


Q2. स्टॉक फार्मिंग म्हणजे काय?

(a) एकाच वेळी 2-3 पिकांची वाढ

(b) प्राण्यांची पैदास✅

(c) पीक फेरपालट

(d) वरीलपैकी कोणतेही नाही


Q3. हवेतून नायट्रोजन सोडविण्यास सक्षम असलेल्या पिकाचा प्रकार कोणता आहे?

(a) गहू

(b) शेंगा✅

(c) कॉफी

(d) रबर


Q4. ‘हरिजन सेवक संघ’ कोणी स्थापन केला होता?

(a) महात्मा गांधी✅

(b) डॉ. बी.आर. आंबेडकर

(c) जी डी बिर्ला

(d) स्वामी विवेकानंद


Q5. खालीलपैकी कोणते बेट लक्षद्वीप समूहातील नाही?

(a) कावरत्ती

(b) अमिनी

(c) मिनिकॉय

(d) नील✅


Q6. खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार जम्मू आणि काश्मीर राज्याचा आहे?

(a)बिडेसिया

(b) कर्म

(c) रौफ✅

(d) स्वांग


Q7. ‘पुसा, सिंधू, गंगा’ या कशाच्या जाती आहेत?

(a) गहू✅

(b) भात

(c) मसूर

(d) हरभरा


Q8. माजुली नदीचे बेट जे “भारतातील पहिले आणि एकमेव बेट जिल्हा” बनले आहे ते कोणत्या राज्यात आहे?

(a) हिमाचल प्रदेश

(b) जम्मू आणि काश्मीर

(c) कर्नाटक

(d) आसाम✅


Q9. मुस्लिम लीगच्या लाहोर अधिवेशनाचे (1940) अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

(a) लियाकत अली खान

(b) चौधरी खालिक-उझ-जमान

(c) मोहम्मद अली जिना✅

(d) फातिमा जिना


Q10. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले खेळाडू कोण आहेत?

(a) ध्यानचंद

(b) लिएंडर पेस

(c) सचिन तेंडुलकर✅

(d) अभिनव बिंद्रा


मागोवा इतिहासाचा....

८ मे,१९१५ लॉर्ड हार्डिंग्जच्या हत्तीवर बॉम्बस्फोट करणाऱ्या रासबिहारी बोस आणि शूर हुतात्म्यांच्या बलिदानाचा दिवस !


२३ डिसेंबर, १९१२ रोजी लॉर्ड हार्डिंग्ज आपल्या लवाजम्यासह कलकत्त्याहून निघून दिल्लीत प्रथमच पोचणार होता. एखाद्या राजासारखी हत्तीवरील हौद्यात बसून त्याची लेडीसह मिरवणूक निघणार होती. अन्य मांडलिक राजांचे हत्ती, घोडे, उंट त्याच्यापुढे असणार होते. इंग्रजांशी एकनिष्ठता दाखवण्याची उत्तम संधी ! रासबिहारी बोस आणि त्यांचे सहकारी यांनी या हत्तीवरच बॉम्ब फेकायचा  निर्धार केला. जुन्या किल्ल्यापासून लाहोर गेटकडे जाणाऱ्या रस्त्यावर एक तीन मजली इमारत त्यांनी हेरली. मिरवणुकीच्या वेळी इथे महिला घराच्या माड्यांवर बसून गम्मत पाहणार हे उघड होते. इमारतीत महिलेच्या वेशात जाऊन बसायचे आणि वरून बॉम्ब टाकायचा हे ठरले. मास्टर अमीरचंद, भाई बालमुकुंद, अवधबिहारी, वसंतकुमार विश्वास आणि स्वतः रासबिहारी यामध्ये सहभागी होते. हा बॉम्ब रासबिहारींनी स्वतः निर्माण केला होता. त्याचे नाव होते लिबेर्टो. हा सुरक्षिततेसाठी दोन भागात बनवलेला बॉम्ब होता.


लॉर्ड हार्डिंग्ज पत्नीसह हत्तीवर ठेवलेल्या चांदीच्या हौद्यात बसला, त्याच्या मागे जमादार बसला आणि राजाच्या ऐटीत मिरवणूक सुरु झाली. क्रान्तिकारकांनी ठरविलेल्या ठिकाणी हत्ती आला. बसंत कुमार बिस्वास बुरखाधारी स्त्रीचा वेष घालून वरच्या मजल्याच्या गच्चीत बसले होते. योग्य ठिकाणी हत्ती येताच त्यांनी बॉम्बचे दोन सुटे भाग जुळवले आणि नेम धरून बॉम्ब हौद्यावर फेकला. जमादार खलास झाला. पाठीकडच्या  चांदीच्या जाड पत्र्यामुळे हार्डिंग्ज वाचला परंतु जखमी झाला , त्याचा अंगरखा फाटला, पुढच्या सत्कार कार्यक्रमातून माघार घेण्याइतकी त्याची तब्येत बिघडली. मिरवणुकीचा त्याने इतका धसका घेतला, की पुढे कपूरथळामध्ये अशी मिरवणूक निघाली तेव्हा त्याने तेथील राजाला स्वतःच्या शेजारी बसवूनच मिरवणुकीत भाग घेतला !


बॉम्बस्फोट करून पाचही जण यशस्वीरीत्या गायब झाले. या स्फोटाच्या तपासात इंग्रजांना थेट यश कधीच मिळाले नाही. पण पुढे फितुरीमुळे रासबिहारी सोडून अन्य चौघे पकड़ले गेले. रासबिहारी जपानला गेले. तिथे त्यांनी आझाद हिन्द सेना उभारली. 

मास्टर अमीरचंद न्यायालयात बेडरपणे उद्गारले, 'तुम्ही ब्रिटिश संख्येने आहात कितीसे ? सर्व भारतीय तुमच्याकड़े पाहुन थुंकले तरी त्या लोटात तुम्ही वाहून जाल, दुर्दैवी आम्ही आहोत, आधी कोण थुंकणार यावर भांडत बसू.'


प्रत्यक्ष कोणताही पुरावा नसुनही इंग्रजांनी दिल्ली कारागृहात अवध बिहारी, भाई बालमुकुंद आणि मास्टर अमीरचंद यांना आजच्याच दिवशी फासावर चढवले तर बसंतकुमार बिस्वास या तरुणाला अम्बाला कारागृहात ११ मे दिनी फाशी देण्यात आले.

हडप्पा संस्कृती थोडक्यात......



▪️(इंग्रजी: Harappan civilization)

👉 ही जगातील प्राचीन ताम्र युगीन संस्कृतींपैकी एक आहे.

▪️हिचा कालखंड लिबी यांच्या कार्बन १४ या शास्त्रीय पद्धतीनुसार इ.स.पू. २७०० ते इ.स.पूर्व १५०० असा मानला जातो.

▪️इ.स. १९२० च्या सुमारास लाहोर-मुलतान रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना काही प्राचीन विटांचे अवशेष सापडले. यामुळे पुरातत्त्व खात्याने याचा शोध घेण्यासाठी सर जॉन मार्शल यांच्या नेतृत्वाखाली उत्खनन सुरू केले आणि एक प्राचीन संस्कृती प्रकाशात आली.

▪️या संस्कृतीचे प्रथम अवशेष हडप्पा येथे सापडले म्हणून नव्यानेच शोधलेल्या या संस्कृतीला हडप्पा संस्कृती असे म्हणतात.

▪️नागरी हडप्पा संस्कृतीची बीजे बलुचिस्तानातील मेहेरगढ येथील हडप्पापूर्व् काळातील नवाश्मयुगीन संस्कृतीमध्ये सापडतात.

▪️जॉ फ्रन्क्ववा जारीज आणि रिचर्ड् मेडो या पुरातत्वज्ञानी येथे उत्खनन केले. हडप्पा संस्कृतीच्या उदयाच्या खुणा दर्शविणा-या ज्या संस्कृतीचे अवशेष मिळाले आहेत त्या संस्कृतीला 'टोगाओ संस्कृती' या नावाने ओळखले जाते.

▪️हडप्पापूर्व् काळातील 'रावी अथवा हाक्रा' संस्कृतीचे अवशेष हडप्पा (पन्जाब् पाकिस्तान), कुणाल, भिराणा, फर्माना (हरयाणा) इत्यादी स्थळाच्या उत्खननात मिळाले आहेत.

▪️उत्खननात हडप्पा व मोहेंजोदडो या दोन्ही नगरांच्या ठिकाणी एकाच प्रकारच्या मुद्रा आढळून आल्या.

🛑 अशाच प्रकारच्या संस्कृतीचे
      अवशेष पश्चिम भारतात

👉कालीबंगन,
👉धोळावीरा,
👉सरकोटडा,
👉लोथल,
👉दायमाबाद

इत्यादी ठिकाणी मोठ्या प्रमाणात सापडले.


'कोहिनूर' हिऱ्याचा किस्सा... जाणून घ्या, भारताकडून इंग्रजांकडे गेला कसा?



जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता की त्यांना तो भेट म्हणून देण्यात आला होता. हा प्रश्न सामान्य ज्ञानासाठी नेहमीच विचारला जातो. मात्र आता या प्रश्नाचं कोडं लवकरच उलघडणार आहे. भारताचा कोहिनूर हिरा हा इंग्रजांनी जबरदस्तीने नेला होता, असा खुलासा भारतीय पुरातत्त्व विभागाने केला आहे. नऊ वर्षांच्या महाराजा दुलिप सिंह यांच्यासोबत करण्यात आलेल्या तहानुसार त्यांनी कोहिनूर हिरा हिसकावून नेला असल्याची माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पुरातत्त्व विभागाने दिली आहे. 


महाराज रणजित सिंह यांच्या उत्तराधिकाऱ्यांनी ईस्ट इंडिया कंपनीला कोहिनूर हिरा भेट म्हणून दिला होता, हा सरकारचा दावा पुरातत्व विभागाच्या खुलाशामुळे आता खोटा ठरला आहे. एप्रिल 2016 मध्ये सरकारने सर्वोच्च न्यायालयात कोहिनूर हिऱ्यासंबंधी माहिती दिली होती. लाहोरच्या महाराजांनी कोहिनूर हिरा इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाच्या ताब्यात दिला होता, असे पुरातत्त्व विभागाने म्हटले आहे. तसेच अँग्लो-शीख युद्धाच्या खर्चाची भरपाई म्हणून रणजित सिंह यांच्या नातलगांनी स्वेच्छेन कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता, असे सरकारने एका जनहित याचिकेला उत्तर देताना सांगितले होते.


सामाजिक कार्यकर्ते रोहित सबरवाल यांनी आरटीआय दाखल करून कोणत्या आधारावर कोहिनूर हिरा इंग्रजांना दिला होता?, असा प्रश्न विचारला होता. त्यांच्या या प्रश्नाला आता भारतीय पुरातत्त्व विभागाने उत्तर दिले आहे. कोहिनूर हिऱ्याची माहिती मागवण्यासाठी कोणाकडे अर्ज करायचा यासंदर्भात मला काहीही माहिती नव्हते. म्हणून मी तो अर्ज पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवला. पंतप्रधान कार्यालयाने तो अर्ज एएसआयकडे पाठवला, असे रोहित सबरवाल यांनी सांगितले. रोहित यांच्या प्रश्नाला उत्तर देताना नोंदीनुसार लाहोरमध्ये लॉर्ड डलहौसी आणि महाराजा दुलिप सिंह यांच्यात 1849 साली कथित करार झाला असल्याचं सांगितलं. लाहोरच्या महाराजांनी इंग्लंडच्या महाराणीकडे कोहिनूर हिरा सोपवला होता. परंतु दुलिप सिंह यांच्या इच्छेनुसार तो इंग्रजांकडे सोपवला नव्हता, हेच स्पष्ट होत आहे. कारण करार झाला त्यावेळी दुलिप सिंह केवळ 9 वर्षांचे होते, असे एएसआयने रोहित सबरवाल  यांना पाठवलेल्या उत्तरात सांगण्यात आले आहे.

काँग्रेस अधिवेशनातील काही ठळक घटना

  

१) कलकत्ता अधिवेशन 

- १९०६

- स्वराज्याचा ठराव 


२) सुरत अधिवेशन

- १९०७ 

-काँग्रेस मध्ये पहिली फूट 


३) लखनौ अधिवेशन 

- १९१६

- हिंदू मुस्लिम ऐक्याचा ठराव


४) कलकत्ता अधिवेशन

- १९२०

- असहकार चळवळीला मान्यता


५) लाहोर अधिवेशन

- १९२९ 

- पूर्ण स्वराज्याचा ठराव


६) कराची अधिवेशन

- १९३१

- मूलभूत हक्कांचा ठराव


७) आवडी अधिवेशन

- १९५५

- समाजवादी समाज रचनेचा ठराव


८) फरीदाबाद अधिवेशन

- १९६९

- कॉंग्रेस मधील दुसरी फूट


२ री पंचवार्षिक योजना


◆ कालावधी: इ.स. १९५६ - इ.स. १९६१

◆ प्राधान्य : जड व मुलभुत उद्योग

◆मॉडेल : Mahalanobis Model

◆ खर्च : प्रस्तावित खर्च- ४८०० कोटी रु., वास्तविक खर्च- ४६०० कोटी रु.


◆ प्रकल्प : 

★ १. भिलाई (छत्तीसगड) पोलाद प्रकल्प(१९५९) - रशियाच्या मदतीने 

★ २. रुरकेला (ओरिसा) पोलाद प्रकल्प(१९५९) - जर्मनीच्या मदतीने

★  ३. दुर्गापूर (पश्चिम बंगाल) पोलाद प्रकल्प(१९६२) - ब्रिटनच्या मदतीने 

★ ४. BHEL (Bharat Heavy Electricals Ltd.) - भोपाळ

★ ५. नानगल व रुरकेला खत कारखाने.

★ ६. पेरांम्बर रेल्वे वाघिणींचा कारखाना उभारण्यात आला.


● महत्वपूर्ण घटना : 

★ १. भारताचे दुसरे औद्योगिक धोरण १९५६ जाहीर. 

★ २. Intensive Agriculture district programme – (1960) मूल्यमापन - आर्थिक वाढीचा दर ७.५% (संकल्पित) ४.२% (साध्य) किंमतीचा निर्देशांक ३० टक्क्यांनी वाढला.

★ ३. पेराम्बूर कारखान्याचे उत्पादन वाढविण्यात आले. 

★ ४. नॅशनल ऑरगॅनिक केमिकल 

★ ५. समाजवादी समाजरचनेचा स्वीकार 

★  ६. कुटुंब नियोजनाचे कुटुंब कल्याण असे नामकरण 

★ ७. बलवंत रॉय मेहता आयोगाची स्थापना-1957


दूसरी गोलमेज परिषद



  तारिख :- 7 सप्टेंबर 1931 ते 1 डिसेंबर 1931

  परिषदेचा कार्यकाल :- 3 महिने.

  एकुण प्रतिनिधी :- 107

🖍या परिषदेतील बहुतेक सर्व प्रतिनिधी हे सरकारने निवडलेले एकनिष्ठ, सांप्रदायिक असे होते.

🖍यावेळी इंग्लडमधील मजुर पक्षाचे सरकार जावून त्याजागी संयुक्त राष्ट्रीय सरकार अधिकारावर येवून आयर्विन ऐवजी आता विलिंग्डन हा साम्राज्यवादी व्हॉईसरॉय झाला, तसेच सॅम्युअल होअर हा व्यक्ती भारत मंत्री होता.

🖍परमुख उपस्थित महिला :- बेगम शाहनवाज व राधाबाई सुब्बरायन.

🖍या परिषदेस गांधीजी हे राजपुताना बोटीने गेले व तेथे गांधीजी हे एकमेव काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणुन उपस्थित होते.

🖍इतर महत्वाचे प्रतिनिधी :- मदन मोहन मालवीय, आस. अय्यर, तेजबहादुर व चिंतामणी,मुंजे व जयकर , आंबेडकर व श्रीनिवासन, जीना व सरोजीनी व 2 इतर महिला, व्ही.व्ही.गीरी.

🖍यावेळी लंडनला जाताना गांधींनी आपल्या बरोबर डॉ. अन्सारी यांना सोबत नेण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र लॉर्डविलिंगडन यांनी त्यास नकार दिला.

🖍या दुसऱ्या परिषदेच्या सेक्रेटरी जनरल गटात सी.डी. देशमुख यांचाही समावेश होता.

🖍पहिल्या गोलमेज परिषदेत उपस्थित असलेले सर्व जण हे दुसऱ्या परिषदेत उपस्थित होते.

🖍यावेळी काँग्रेसच्या वतीने गांधींजींसोबत सरोजीनी नायडु याही उपस्थित होत्या.

🖍काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणुन गांधीजींना या परिषदेत उपस्थित करण्याचे प्रमुख कार्य हे तेजबहादुर सप्रु व एम.आर.जयकर तसेच व्ही.एस. श्रीनिवास शास्त्री यांनी केले व गांधी आयर्विन करार घडुन आणला व गांधीजींनी या परिषदेत पूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली, परंतु त्यांनी मुस्लिम व अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यास विरोध केला.

🖍या परिषदेत ब्रिटिशांनी मुस्लिम, हरिजन, शीख, ख्रिश्चन, युरोपियन आणि अॅग्लो इंडियन यांच्यासाठी स्वतंत्र मतदार संघाची घोषणा केली होती व या परिषदेत भारतातील जातीय गटांचे नेते यशस्वी ठरलेत.

🖍ही परिषद अल्पसंख्याकांच्या प्रश्नावरून बारगळली.

🖍ठरल्याप्रमाणे गांधीजी हे दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहिले.परंतु या परिषदेतुन काहीही निष्पन्न न झाल्यामुळे शेवटी जानेवारी 1932 महिन्यात सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले.

🖍नतर 1934 मध्ये गांधींनी पाटणा अधिवेशनात हे आंदोलन मागे घेतले.

विवाहाचे प्रकार



1) ब्रह्म विवाह :

 दोन्ही पक्षांच्या संमतीने समान वर्गाच्या सुयोग्य वरासोबत कन्येच्या इच्छेनुसार विवाह निश्चित करणे याला 'ब्रह्म विवाह' असे म्हणतात. या विवाहात वैदिक रीती आणि नियम पाळले जातात. हे उत्तम विवाह आहे.

विवाहाचा हा प्रकार सर्वश्रेष्ठ

 

2) देव विवाह : 

एखाद्या धार्मिक कार्य या उद्देश्याने किंवा मूल्य रूपात आपली कन्या एखाद्या विशेष वराला सोपवणे याला 'देव विवाह' असे म्हणतात. परंतू या विवाहात कन्येच्या इच्छेकडे दुर्लक्ष केलं जातं. हा मध्यम विवाह आहे.


3) आर्श विवाह : 

कन्या-पक्षाला कन्येचे मूल्य चुकवून (सामान्यतः गो दान करून) कन्येशी विवाह करणे याला 'अर्श विवाह' असे म्हणतात. हा मध्यम विवाह आहे.


 


4) प्रजापत्य विवाह : 

कन्येची संमती घेतल्याविना पालकाद्वारे तिचा विवाह अभिजात्य वर्गाच्या (धनवान आणि प्रतिष्ठित) वरासोबत करणे याला 'प्रजापत्य विवाह' असे म्हणतात.


5) गंधर्व विवाह : 

या विवाहाचे वर्तमान स्वरूप म्हणजे प्रेम विवाह. कुटुंबाच्या समंतीविना वर आणि कन्या यांच्याद्वारे विधीशिवाय आपसात विवाह करणे याला 'गंधर्व विवाह' असे म्हणतात. वर्तमानात हे केवळ यौन आकर्षण आणि धन तृप्ती या हेतूने केलं जातं आणि याला प्रेम विवाह असे नाव दिलं जातं.


 


6) असुर विवाह : 

कन्येला खरेदी करून (आर्थिक रूपाने) विवाह करणे याला 'असुर विवाह' असे म्हणतात.


 


7) राक्षस विवाह : 

कन्येच्या संमतीविना तिचे अपहरण करून बळजबरी विवाह करणे याला 'राक्षस विवाह' असे म्हणतात.


 


8) पैशाच विवाह :

 गुंगीत असलेल्या कन्येचा (गहन निद्रा, मानसिक कमजोरी इत्यादी) लाभ घेत तिच्याशी शारीरिक संबंध स्थापित करणे आणि तिच्यासोबत विवाह करणे याला 'पैशाच विवाह' असे म्हणतात.


🔷या आठ प्रकारांच्या विवाहातून केवळ ब्रह्म विवाहाला मान्यता आहे बाकीचे विवाह धर्म संमत मानले गेले नाही. तरी पण यातून देव विवाहाला प्राचीन काळात मान्यता प्राप्त होती.


ब. जीनांचे चौदा मुद्दे

1) भारतीय राज्यघटना संघराज्यात्मक असावी.

2) शेषाधिकार प्रांतांकडे असावेत.

3) सर्व प्रांतांना सारखीच स्वायत्तता मिळावी.

4) सर्व कायदेमंडळात व लोकनियुक्त संस्थांत अल्पसंख्याकांना योग्य व परिणामकारक प्रतिनिधीत्व मिळावे. तथापि, त्यामुळे बहूसंख्याकवाला पक्ष अल्पसंख्याक होऊ नये.

5) केंद्रीय कायदेमंडळात मुस्लीममांना एक-तृतीयांश प्रतिनिधीत्व मिळावे.

6) स्वतंत्र्य मतदारसंघ हे अस्तित्वात असतीलच. तथापि, कोणाही समाजाला स्वतंत्र मतदारसंघाचा स्वत: हून त्याग करून संयुक्त मतदारसंघ स्वीकारता येईल.

7) पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांत यांची पुनर्रचना करीत असता मुस्लीम मताधिक्य नष्ट होता कामा नये.

8) सर्व समाजांना आपल्या धर्माचे आचरण करण्यास, प्रचार करण्यास किंवा धार्मिक शिक्षण घेण्यास पूर्ण स्वातंत्र्य असावे.

9) कोणत्याही कायदेमंडळात अगर लोकनियुक्त संस्थेत एखाद्या समजाविषयी ठराव पास होत असता त्या समाजातील तीन-चतुर्थाश प्रतिनिधींनी जर त्या ठरावाला विरोध केला तर तो ठराव पास होऊ नये.

10) मुंबई प्रांतापसून सिंध प्रदेश वेगळा करावा.

वायव्य सरहद्द प्रांत व बलूचिस्तान या प्रांतांत इतर प्रांतांप्रमाणे राजकीय सुधारणा राबवाव्यात.

11) राज्याच्या व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या कारभारात मुस्लिमांना योग्य त्या प्रमाणात नोकर्‍या मिळाल्या पाहिजेत.

12) मुस्लीम संस्कृती, भाषा, शिक्षण, संस्था इत्यादींचे संरक्षण करण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

13) केंद्रीय अथवा प्रांतीय मंत्रीमंडळात एक-तृतीयांश मुस्लीम सदस्य असले पाहिजेत.

14) केंद्रीय कायदेमंडळाची रचना बदल्यासाठी प्रांतीय कायदेमंडळाच्या संमतीची आवश्यकता असेल.