१७ सप्टेंबर २०२५

वारे

 उष्ण व कोरडे वारे ⚡️

१) फॉन - आल्प्स पर्वताच्या उतारावरून

२) चिनुक - उत्तर अमेरिका व कॅनडात असणाऱ्या रॉकी पर्वतावरून पूर्वेकडे

३) सिमुन - सहारा व अरब भागातील वाळवंटी प्रदेशातून

४) सिरोक्को - उत्तर आफ्रिका, सिसली व दक्षिण इटली

५) शामल - इराण, इराक, अरब प्रदेशातील वाळवंटी भागातून

६) झोंडा - अर्जेंटिना (अँडिज पर्वतातून)

७) खामसिन - उत्तर आफ्रिकेतून

८) हबुब - उत्तर सुदान

९) हरमॅटन - पश्चिम आफ्रिकेच्या गिनीच्या आखताकडे

१०) नोर्वेस्टर - पश्चिम बंगाल

११) लू - पाकिस्तान व उत्तर भारतातील मैदानी प्रदेश

१२)बाग्यो - फिलिपाईन्स 



थंड वारे ⚡️

१) पंपेरो - अर्जेंटिना, उरुग्वेमधील पंपास

२) बोरा - दक्षिण युरोपातील ऑडियाट्रीक समुद्रावरून

३) मिस्ट्रल - फ्रान्स

४) सर्दली बूस्टर - ऑस्ट्रेलिया

५) पापागयो - मेक्सिको

६) ब्लिझार्ड - सायबेरिया, कॅनडा

७) बर्ग विंड - दक्षिण आफ्रिक

बातम्यांमधील पहिल्या महिला - २०२५

१️⃣ विजया किशोर रहाटकर - *राष्ट्रीय महिला आयोग (NCW)* च्या नवीन अध्यक्षा 


२️⃣ बाला देवी - ५० आंतरराष्ट्रीय गोल करणारी पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू 


३️⃣ तनुष्का सिंग - भारतीय हवाई दलाच्या *जॅग्वार स्क्वॉड्रन* मधील पहिली महिला पायलट


४️⃣ क्रिस्टी कोव्हेंट्री (झिम्बाब्वे) ▪️ आयओसी (आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती) च्या पहिल्या महिला अध्यक्ष ▪️ पहिल्या आफ्रिकन आणि १० व्या एकूण अध्यक्ष ▪️ माजी ऑलिंपियन जलतरणपटू 


५️⃣ न्गोझी ओकोंजो-इवेला (नायजेरिया) - जागतिक व्यापार संघटनेचे (WTO) प्रमुख असलेल्या पहिल्या महिला 


६️⃣ अंजू राठी राणा - भारताच्या पहिल्या महिला कायदा सचिव 


७️⃣ नल्लाथंबी कलैसेल्वी - CSIR (वैज्ञानिक आणि औद्योगिक परिषद) च्या पहिल्या महिला महासंचालक संशोधन) 


८️⃣ रेखा गुप्ता – दिल्लीच्या *४ व्या महिला मुख्यमंत्री* 


९️⃣ नेतुम्बो नंदी-नदैतवाह – नामिबियाच्या *पहिल्या महिला राष्ट्रपती* 


🔟 पॅट्रिशिया स्कॉटलंड (डोमिनिका) – राष्ट्रकुल राष्ट्रांच्या पहिल्या महिला सरचिटणीस 


१️१️⃣ खुनयिंग पटामा (थायलंड) – जागतिक बॅडमिंटन महासंघाच्या दुसऱ्या महिला अध्यक्ष 


१️२️⃣ दिव्या शर्मा – भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर


दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना (DDU-GKY)

🔹 नियंत्रण – ग्रामविकास मंत्रालय

🔹 सुरुवात – २५ सप्टेंबर २०१४

🔹 उद्दिष्ट – ग्रामीण गरीब तरुणांना विकासाच्या प्रवाहात आणून समावेशक विकास साधणे


🔹 लक्ष्यगट – १५ ते ३५ वयोगटातील ग्रामीण गरीब तरुण

▪️ मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण

▪️ प्रशिक्षित झालेल्या किमान ७५% तरुणांना रोजगाराची हमी


🔹 आरक्षण प्रमाण –

▪️ महिला – ३३%

▪️ अनुसूचित जाती व जमाती – ५०%

▪️ अल्पसंख्यांक – १५%


💠 प्रादेशिक योजना (DDU-GKY अंतर्गत)

🔹 हिमायत – जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण तसेच शहरी तरुणांना कौशल्य प्रशिक्षण

🔹 उम्मीद – जम्मू-काश्मीरमधील स्त्रियांचे सबलीकरण व स्वयंसहायता गटांची निर्मिती

🔹 परवाज – दारिद्र्यरेषेखालील ग्रामीण अल्पसंख्यांक तरुणांना कौशल्य प्रशिक्षण व शिक्षण

🔹 रोशनी – अति डाव्या विचारसरणीने बाधित जिल्ह्यांतील तरुणांना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देणे

१६ सप्टेंबर २०२५

HDI म्हणजे Human Development Index.



हे एक सांख्यिकीय मापन (statistical measure) आहे जे देशातील मानवी विकासाची स्थिती दर्शवते. UNDP (United Nations Development Programme) दरवर्षी हा इंडेक्स प्रकाशित करतो.


🧱 HDI चे मुख्य तीन घटक (Three Main Dimensions):

 1. ✅ आयुष्याचा कालावधी (Life Expectancy at Birth)

→ आरोग्य स्थिती मोजण्यासाठी वापरले जाते.

 2. ✅ शिक्षण (Education)

 • सरासरी शैक्षणिक कालावधी (Mean Years of Schooling)

 • अपेक्षित शैक्षणिक कालावधी (Expected Years of Schooling)

 3. ✅ आर्थिक क्षमता (Standard of Living)

→ प्रति व्यक्ती निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न (Gross National Income per capita, GNI per capita).



🎯 HDI चे महत्त्व:

 • एका देशात लोकांचे आरोग्य, शिक्षण व आर्थिक स्तर कसा आहे हे समजून घेण्यासाठी उपयोगी.

 • देशांना तुलनात्मक आढावा घेण्यासाठी.

 • सामाजिक-आर्थिक धोरणे बनवण्यासाठी मदत करते.



📊 HDI Value Interpretation:


HDI Value Range Meaning

0.800 – 1.000 Very High Human Development

0.700 – 0.799 High Human Development

0.550 – 0.699 Medium Human Development

Below 0.550 Low Human Development




🌍 उदाहरण – 2021 च्या अहवालानुसार:

🇳🇴 Norway (HDI ~ 0.961) → Very High Development

🇮🇳 India (HDI ~ 0.645) → Medium Development


प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाइन गेमिंग बिल, 2025

 

1.उद्देश 🎯

➤ पैशांवर आधारित ऑनलाइन गेम्सवर संपूर्ण बंदी घालणे.


2.संसदेत मंजुरी 📜

➤ लोकसभा: 20 ऑगस्ट 2025

➤ राज्यसभा: 21 ऑगस्ट 2025

➤ मांडणारे: केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव


3.प्रमुख तरतुदी ⚖️

➤ ऑनलाइन मनी गेम्सवर बंदी: असे खेळ चालवणे बेकायदेशीर.

➤ चालवणाऱ्यांसाठी शिक्षा:

▪️ 3 वर्षांपर्यंत तुरुंगवास

▪️ आणि/किंवा ₹1 कोटी दंड

➤ जाहिरात करणाऱ्यांसाठी शिक्षा:

▪️ 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास

▪️ आणि/किंवा ₹50 लाख दंड

➤ आर्थिक निर्बंध:

▪️ बँका व वित्तीय संस्थांना अशा खेळांसाठी व्यवहार करण्यास सक्त मनाई.


हिंदुस्तानातील १८५७ चा उठाव

🔺हिंदुस्तानच्या इतिहासात १८५७ च्या उठावाइतकी वादग्रस्त घटना दुसरी कोणती नसेल असे वाटते. १८५७ सालापासून काहीजणांनी याला शिपायाचे बंड असे म्हटले आहे.


📚१८५७ च्या उठावाची विविध कारणे


१. राजकीय,सामाजिक,धार्मिक कारणे , राजकीय कारणे 


* तैनाती फौजेची पद्धतीचे दुष्परिणाम - आपले साम्राज्य उभे करताना इंग्रजांनी फोडा व झोडा या तत्वाचा नेहमीच अवलंब केला. क्लाइव्ह, हेस्टिंग, अधिकारयाची नीती - अनीती याचा फारसा विधिनिषेध पाळला नाही. त्यातच इंग्रजांची भेदनिती, त्यांचा व्यापारी साम्राज्यवाद, त्यांची शस्त्रास्त्रे व संस्कृतीचे सामर्थ्य यांचे रहस्य अनेक हिंदी राजेराजवाड्यांना उमजूनच आले नाही.

* डलहौसीचे आक्रमक साम्राज्यवादी धोरण

सामाजिक कारणे 

* हिंदी लोकांना रानटी समजले जाई

* हिंदू संस्कृतीवर संकट आल्याची भावना

* हजारो सरंजामदार व सैनिक बेकार बनले.

धार्मिक कारणे 

* तिसरे संकट धर्मावर आले.

* समाजसुधारणावादी धोरणाची प्रतिक्रिया


२. आर्थिक, लष्करी कारणे 


आर्थिक कारणे


* हस्तव्यवसाय व कारागिरी बुडाली.

* इंग्रजी भांडवलाकडून होणारी पिळवणूक

* शेतकरी व जमीनदार यांचा असंतोष व बेकारी


लष्करी कारणे 


* हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक - लष्करी मोहिमात इंग्रज अधिकारी प्रथम हिंदी शिपायांची फौज आघाडीवर धाडत. लढाई होऊन पहिल्या हल्ल्यात अनेक हिंदी शिपाई मारले गेले की, मग गोरी फौज पुढे सरकत असे त्यामुळे हिंदी शिपायांची जीवितहानी मोठी होई व शेवटी विजयश्रीची माळ गोऱ्यांच्या गळ्यात पडे. हा सर्वच प्रकार हिंदी शिपायांना संतापजनक वाटत होता.

* हिंदी शिपायाविरुध जाचक निर्बंध - १८०६ साली मद्रास आर्मीतील हिंदू शिपायावर गंध न लावण्याची व दाढी न राखण्याची सक्ती करण्यात आली. १८२४ साली बर्मी आर्मीतील हिंदू शिपायावर समुद्र पर्यटनाची सक्ती करण्यात आली. जातीत येण्यासाठी त्यांना अनेक धार्मिक विधी करावे लागले होते. अपुरा पगार, व भत्ता याबद्दल बंडाळ्या केल्या होत्या.


३. तात्कालिक कारण


हिंदी शिपायांना जी काडतुसे दिली जात त्यांना गाईची व डुकराची चरबी लावलेली असते. हि बातमी १८५७ च्या उठावास तात्कालिक कारण ठरली. काडतुसांच्या वापरासाठी ती प्रथम तोंडाने तोडावी लागत असे. साहजिकच त्यावरील चरबी शिपायांच्या तोंडात जात असे. व गाईला हिंदू पवित्र मानत असत. तर डुकराला मुसलमान अपवित्र मानतात. त्यामुळे हिंदू व मुसलमान शिपाई संतप्त झाले. अशाप्रकारे शिपायांचा त्यावर विश्वास बसला नव्हता. त्यांचा क्रोध वाढत गेला. या असंतोषाचा पहिला उद्रेक १० मे १८५७ रोजी मीरत येथील छावणीत झाला. शिपायांच्या बंडाची पहिली ठिणगी तेथे पडली.

चलेजाव आंदोलन (१९४२)

▪️घटनाक्रम


― क्रिप्स मिशनचे अपयश, जपानचा धोका उंबरठयावर, सरकारवरचा राग सामुदायिक परिणाम ६ जुलै १९४२ रोजी वर्धा येथे काँग्रेस कार्यकारिणी बैठक 'चलेजाव' ठराव पास.

― मुंबईत ७ ऑगस्ट १९४२ रोजी कॉंगे्रसचे खुले अधिवेशन सुरू. 

― (मौलाना आझाद अध्यक्ष) ८ ऑगस्ट १९४२ रोजी चलेजाव ठराव मंजूर. 

― ९ ऑगस्ट रोजी पहाटे नेत्यांची धरपकड.

― गांधीजी आगाखान पॅलेस पुणे येथे बंदीवान.

― कार्यकारिणी सदस्य अहमदनगर तुरूंगात ही एकमेव नेतृत्वविरहित चळवळ.

― प्रती सरकारे सातारा (नाना पाटील), तालचेर (ओरिसा), बलिया (उत्तर प्रदेश) इ.

― बंगालात तामलुक जतिया सरकार दिनापुर येथे.

― या राष्ट्रीय सरकारानी कायदा, सुव्यवस्था राखली. आरोग्य, शिक्षण, शेती, पोस्टल व्यवस्था सांभाळली.

― सुरूवातीला शहरी भागात अधिक जोर नंतर खेडयात.

― या काळात भूमिगत चळवळी जयप्रकाश नारायण व रामनंदन मिश्रा हजारीबाग जेलमधून निसटले, भूमिगत चळवळ सुरू, मुंबईत समाजवाद्यांच्या अरूणा असफअलींच्या नेतृत्वाखाली भूमिगत कारवाया.

― काँग्रेस रेडिओ केंद्र, उषा मेहता, शाळा-कॉलेज स्त्री-पुरूष कामगार, जनआंदोलन.

― व्यापारी व भांडवलदार सामील नाहीत. युध्दकाळात त्यांचा मोठा फायदा.

― मुस्लीम लीग दूर राहिली. हिंदु महासभेने तिरस्कार केला. कम्युनिस्टांनी पाठिंबा दिला नाही.

― भारतीय संस्थानिकांची इंग्रजांना मदत. सी. राजगोपालाचारी या सारखे काँग्रेसी नेते बाजूला राहिले.

― निश्चित स्वरूप व कार्यक्रमाचा अभाव, हिंदी नोकरांची एकनिष्ठता, भीषण उपासमार, हिंदी लोकातील फूट, सरकारची दडपशाही यामुळे चलेजाव चळवळीला अपयश.

― स्वातंत्र्यासाठी जनता प्राणाची बाजी लावण्यास सिध्द आहे हे स्पष्ट झाले.

― भारताचे स्वातंत्र दृष्टीपथात आले.


▪️छोडो भारत चळवळ


क्रिप्स योजनेच्या अपयशानंतर भारतातील ब्रिटिश राजवट संपुष्टात आणून स्वातंत्र्य प्राप्त करण्याच्या उद्देशाने छोडो भारत चळवळ सुरू करण्याचा निर्णय राष्ट्रीय सभेने मुंबई येथे ८ ऑगस्ट, १९४२ रोजी घेतला. ही चळवळ दडपण्याचा ब्रिटिश शासनाने अयशस्वी प्रयत्न केला संपूर्ण देशभर या चळवळीचे लोण पसरले. समाजवादीगटाच्या नेत्यांनी भूमिगत राहून १९४२ च्या लढयाचे प्रभावी नेत्रृत्व केले. महाराष्ट्र्रात सातारा येथे क्रांतिसिंह नाना पाटिल यांनी प्रतिसरकार स्थापन करून ब्रिटिश राजवटीच्या सार्वभौमत्वाला आव्हान दिले. देशात अन्यत्रही अशी प्रतिसरकारे स्थापन करण्यात आली. अशा प्रकारे १९४२ चे जनआंदोलन अत्यंत यशस्वी ठरले.


▪️नेताजी सुभाष चंद्र बोस


भारताच्या स्वातंत्र्यचळवळीतील एक सर्वाधिक लोकप्रिय नेते सुभाषचंद्र बोस होत. १९३८ व १९३९ साली राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. दुसरे महायुध्द सुरू झाल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय चळवळ प्रखर करण्याचा आणि परकीयांची (म्हणजेच ब्रिटनच्या शत्रूराष्ट्रांची) मदत घेऊन स्वातंत्र्य प्राप्त करण्यात यावे, असा विचार मांडला फॅसिस्ट राष्ट्रांना अन्य ज्येष्ठ नेत्यांचा प्रखर विरोध असल्याने, सुभाषचंद्र बोस यांचे त्यांच्याशी मतभेद झाले. त्याची परिणती म्हणजे नेताजींनी दिलेला राष्ट्रीय काॅंग्रेसचा राजीनामा आणि फॉरर्वड ब्लॉक या पक्षाची केलेली स्थापना ब्रिटिशांविरूध्द उठाव करण्याच्या त्यांच्या प्रचारामुळे सरकारने त्यांना नजरकैदेत ठेवले, नजरकैदेतून शिताफिने निसटून ते प्रथम जर्मनीला आणि नंतर जपानला गेले.


▪️आझाद हिंद सेना


ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी रासबिहारी बोस यांनी १९४२ साली जपानच्या सहकार्याने आझाद हिंद सेने ची स्थापना केली. नेताजींनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व करावे, अशी रासबिहारी बोस यांनी विनंती केल्याने त्यांनी त्यांनी आझाद हिंद सेनेचे नेतृत्व स्वीकारले. नेताजींनी १९४३ आझाद हिंद सरकार ची स्थापना केली. आणि अमेरिका व इंग्लडविरूध्द युदध घोषित केले. आझाद हिंद सेनेने भारताला ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. १८ ऑगस्ट १९४५ रोजी नेताजींचा अपघाती मृत्यू झाला व या सशस्त्र संघर्षाच्या पर्वाची समाप्ती झाली. आझाद हिंद सेनेच्या अधिकारी व सैनिकांवर राजद्रोहाच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयात खटले भरण्यात आले. लोकक्षोभामुळे त्यांना देण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेची अंमलबजावणी रदद् करण्यात आली.


▪️भारतीय नौदलाचा उठाव


आझाद हिंद सेनेपासून प्रेरणा घेऊन भारतीय सैनिकांना दिल्या जाणार्‍या भेदभावी वागणुकीच्या निषेधार्थ फेब्रुवारी १९४६ मध्ये नौदलातील सैनिकांनी मुंबई व कराची येथे ब्रिटिशविरोधी उठाव केला. अखेरीस सरदार पटेल यांच्या मध्यस्थीने या सैनिकांना शरणागती स्वीकारावी लागली. या घटनेमुळे यात भारतीय सैन्याच्या आधारे भारतावर यापुढे राज्य करता येणार नाही, याची ब्रिटिशांना जाणीव झाली.

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले विविध उठाव :


👉1.संन्याशाचा उठाव

1765-1800

बंगाल

शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक


👉2.चुआरांचा उठाव

1768

बंगाल-मिजापूर जिल्हा

जगन्नाथ घाला


👉3.हो जमातीचे बंड

1820

छोटा नागपूर व सिंग

भूम


👉4.जमिनदारांचा उठाव

1803

ओडिशा

जगबंधु


👉5.खोंडांचा उठाव

1836

पर्वतीय प्रदेश

दोरा बिसाई


👉6.संथाळांचा उठाव

1855

कान्हू व सिंधू


👉7.खासींचा उठाव

1824आसाम

निरत सिंग


👉8.कुंकिंचा उठाव

1826

मणिपूर


👉9.दक्षिण भारतातील उठाव


👉10.पाळेगारांचा उठाव

1790

मद्रास


👉11.म्हैसूरमधील शेतकर्‍यांचा उठाव

1830

म्हैसूर


👉12.विजयनगरचा उठाव

1765

विजयनगर


👉13.गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव

1870

गोरखपूर


👉14.रोहिलखंडातील उठाव

1801

रोहिलखंड


👉15.रामोश्यांचा उठाव

1826

महाराष्ट्र

उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत


👉16.भिल्ल व कोळ्यांचा उठाव

1824


👉17.केतूरच्या देसाईचा उठाव

1824

केतूर


👉18.फोंडा सावंतचा उठाव

1838


👉19.लखनऊ उठाव


👉21.भिल्लाचा उठाव

1825

खानदेश


👉21.दख्खनचे दंगे

1875

पुणे,सातारा,महाराष्ट्र

शेतकरी

इंग्रज सरकार विरुध्दच्या या उठावात भारतीयांना आलेल्या अपयशाची प्रमुख कारणे

 हा उठाव स्थानिक स्वरुपात, मोजक्याच क्षेत्रात, मर्यादीत प्रमाणात व असंघटीत असा होता.

 तसेच भारतातील एेक्याचा अभाव हे देखील या उठावाच्या पराभवाचे मोठे कारण होते.

  इंग्रजांच्या लष्करातील जवळपास अर्धेहिंदी सैनिक इंग्रजांच्याच बाजूने लढले, तसेच शिखांनी देखील इंग्रजांना साथ दिली.

  सिंध, राजपुताना, पंजाब, काश्मिर, मुंबई, मद्रास या प्रांतातील जनता, शासक तसेच संस्थानिक यांनी या उठावात सक्रिय सहभाग न घेता ते शांत राहिले.
   शिवाय शेतकरी तसेच खालच्या जातीतील लोकांनीही या उठावात सक्रिय भाग घेतला नाही.

   पातियाळा, जिंद, ग्वाल्हेर, हैद्राबाद येथील राजांनी हा उठाव दडपून टाकण्यास सरकारला उघड सहकार्य केले.

  या उठावाचा जास्त प्रभाव केवळ पश्चिम बिहार, अवध, रोहिलखंड, दिल्ली तसेच नर्मदा व चंबळ नद्यांमधील प्रदेश येथेच जाणवला.

   उठावकर्त्यांच्या तुलनेने इंग्रजांकडे विपुल साधन सामग्री होती. उठावाला शिपायांजवळही फारच थोड्या बंदुका होत्या व तलवारी आणि भाले हिच भारतीयांची मुख्य शस्त्र होती.

   आधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने तसेच तारायंत्राच्या सुविधेमुळे उठाव दडपून टाकण्यासाठी एक सार्वत्रिक योजना बनविण्यात इंग्रज सफल झाले व अनुभवी अधिकाऱ्यांच्या रुपात कंपनी जवळ योग्य नेतृत्वही होते.

   या उठावाचे संघटन भारतीयांनी नियोजनबध्द पध्दतीने केले नव्हते. उठावात भाग घेणारे नेते शूर होते, परंतु संघटन क्षमता, अनुभव व परस्पर सहकार्याने काम करण्यात ते कमी पडले, तसेच त्यांच्यामध्येनेतृत्व गुणांचा देखील 
अभाव होता.

   कुवरसिंह व मौलवी अहमदुल्ला यांचा अपवाद वगळता प्रत्येकजण हे केवळ आपल्या क्षेत्रातच लढले.

स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे प्रश्नसंच

1) ⚛️ ''एकच प्‍याला" या नाटकाचे लेखक कोण?

1)    ग. दी. मांडुळकर

2)     राम गणेश गडकरी✅✅

3)    श्रीपाद कृष्‍ण कोल्‍हेटकर

4)    वि. स. खांडेकर



2)⚛️ कोणता देश ‘विश्व कबड्डी चषक 2019’ या स्पर्धेचे आयोजन करणार आहे?

(A) संयुक्त राज्ये अमेरिका

(B) ऑस्ट्रेलिया

(C) इंग्लंड

(D) भारत✅✅


3)⚛️ कोणती व्यक्ती ‘इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार’ जिंकणारा पहिला भारतीय आहे?

(A) सुदर्शन पटनाईक✅✅

(B) एम. एफ. हुसेन

(C) राजा रवी वर्मा

(D) नंदालाल बोस



4)⚛️ कोणत्या शहरात ‘मुख्यमंत्री सेप्टिक टँक सफाई योजना’ सुरू करण्यात आली?

(A) जयपूर

(B) नवी दिल्ली✅✅

(C) गुरुग्राम

(D) झुंझुनू



 5)⚛️कोणती महिला पायलट भारतीय नौदलाची प्रथम महिला पायलट बनली आहेत?

(A) भावना कांत

(B) अवनी चतुर्वेदी

(C) मोहना सिंग

(D) लेफ्टनंट शिवांगी✅✅




(6)⚛️राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण (NSS) याच्या 76 व्या फेरीतून केलेल्या सर्वेक्षणानुसार, ग्रामीण भागात  घरांमध्ये स्नानगृह आहे.

(A) 54 टक्के

(B) 45.1 टक्के

(C) 46 टक्के

(D) 50.3 टक्के✅✅



(7)⚛️_______ यांच्या हस्ते "राष्ट्रीय युवा संसद योजना" याच्या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले.

(A) भारताचे राष्ट्रपती✅✅

(B) भारताचे पंतप्रधान

(C) वित्त मंत्री

(D) संरक्षण मंत्री 


📌2011 चा साहीत्याचा नोबेल कोणाला प्राप्त झाला होता ?

1)   थॉमस ट्रान्सटॉमर✅✅✅✅

2)   ब्रायन क्रोबीला

3)   मारीयो ल्लोसा

4)   हर्टा म्युलर


📍 ताज्या “क्लायमेट चेंज परफॉरमन्स इंडेक्स” यामध्ये भारत कोणत्या क्रमांकावर आहे?

(A) प्रथम

(B) 10 वा

(C) 30 वा

(D) 9 वा✅✅


📍 दरवर्षी _ या दिवशी ‘आंतरराष्ट्रीय पर्वत दिन’ साजरा केला जातो.

(A) 10 नोव्हेंबर

(B) 11 डिसेंबर✅✅

(C) 11 ऑक्टोबर

(D) 12 नोव्हेंबर


📍 लोकसभेत मंजूर झालेल्या ‘नागरिकत्व (दुरुस्ती) विधेयक 2019’ अंतर्गत कोणते राज्य ‘इनर लाईन परमीट’ नियमाखाली आणले जाणार?

(A) आसाम

(B) मणीपूर✅✅

(C) त्रिपुरा

(D) मेघालय


📍 दरवर्षी _ या दिवशी ‘UNICEF दिन’ साजरा केला जातो.

(A) 7 डिसेंबर

(B) 11 डिसेंबर✅✅

(C) 9 ऑक्टोबर

(D) 11 ऑक्टोबर


📍 “डिफेएक्सपो” नावाचा 11 वा द्वैवार्षिक कार्यक्रम __ येथे आयोजित केला जाणार आहे.

(A) नवी दिल्ली

(B) लखनऊ✅✅

(C) मुंबई

(D) चेन्नई


1. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते?

शिवराम महादेव परांजपे.  √

विष्णुशास्त्री चिपळूणकर

कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे

छत्रपती शाहू महाराज

=========================

2. विसोबा खेचर हे कोणत्या संतांचे अध्यात्मिक गुरू होते?

संत तुकाराम

संत सावतामाळी

संत नरहरी सोनार

संत नामदेव.   √

=========================

3. इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल?

डॉ. भाऊ दाजी लाड

दादोबा पांडुरंग

बाळशास्त्री जांभेकर

नाना जगन्नाथ शंकरशेठ.   √

=========================

4. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ---------- शी संबंधित होता.

ऊस

कापूस

भात

नीळ.   √

=========================

5. इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिक कारण होते..........

गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग.   √

अनेक संस्थाने खालसा करणे

ख्रिश्चन धर्म प्रसार करणे

पदव्या, वतने आणि पेन्शन रग करने

=========================

6. गांधीजानी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती?

पंडित जवाहरलाल नेहरू 

विनोबा भावे.    √

सरदार वल्लभभाई पटेल 

मौलाना आझाद

=========================

7. विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली?

विनोबा भावेंनी राजबंद्यांसमोर गीतेवर अठरा प्रवचने केली

साने गुरूजी श्रोते विनोबांची प्रवचने ऐकत

साने गुरूजी विनोबांच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत.   √

विनोबा भावे हे गीता प्रवचनाचे लेखक आहेत 

=========================

8. सन १९४० मध्ये रामगढ येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला?

इंग्रजांना दुसऱ्या महायुध्दात सहकार्य करणे

ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे

वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरु करणे.  √

निवडणुकांवर बहिष्कार टाकणे

=========================

9. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?

रविंद्रनाथ टागोर .    √

लाला लजपतराय

लाला हरदयाळ

महात्मा गांधी

=========================

10. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली?

डॉ. रार्जेद्र प्रसाद.    √

डॉ. राधाकॄष्णन

डॉ. आंबेडकर

डॉ. झाकीर हुसेन

=========================

11.  ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.

खैर.   √

कुसूम

कंडोल

शलार्इ

=========================

12. इस्त्रायलची राजधानी कोणती?

जेरुसलेम.  √

दमास्कस

तेल अवीव 

तेहरान 

=========================

13. ............... वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.

निग्रॉइड

मंगोलाइड .  √

बुश मॅनाइड 

ऑस्ट्रेलोंइड

=========================

14. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?

हरिहरेश्र्वर

वज्रेश्र्वरी.  √

गणपतीपुळे

संगमेश्र्वर

=========================

15. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?

गाळाची जमीन 

काळी जमीन.   √

तांबडी जमान

रेताड जमीन

=========================

16. भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र …………… येथे उभारण्यात आले.

पाडेगाव

कोर्इमतूर

कानपूर

मांजरी.   √

=========================

17.  ……… हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.

दिल्ली

चेन्नर्इ

मुंबर्इ.   √

हैद्राबाद

=========================

18. देशात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे.

महाराष्ट्र

केरळ .  √

प. बंगाल

तमिळनाडू

=========================

19. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे चालू झाले?

मुंबई

दिल्ली.   √

मद्रास 

बंगलोर

=========================

20. लक्षव्दिप बेटे कोणत्या समुद्रात आहेत?

अरबी समुद्र .   √

बंगालचा उपसागर  

हिंदी महासागर   

पॅसिफिक महासागर


🔴"थॉट्स ऑन पाकिस्तान'' हा ग्रंथ कोणी लिहिला ?

A. सर सय्यद अहमद खान

B. बॅ. महमद अली जीना

C. मौलाना अब्दुल करीम आझाद

D. डॉ. बाबासाहेब आंबेडकर ✅


______________________________

🟠 लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांनी लिहलेली शतपत्रे खालीलपैकी कोणत्या मासिकातून प्रसिद्ध होत होती ?

A. प्रभाकर✅

B. समता

C. सुलभ समाचार

D. बहिष्कृत भारत

______________________________

⚫️ महात्मा जोतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?

A. 8 सप्टेंबर, 1873

B. 10 ऑक्टोबर, 1873

C. 14 सप्टेंबर, 1873 ✅

D. 15 ऑगस्ट, 1873

______________________________

🔵 सर विल्यम ली वॉर्नरने ‘‘घाणेरडा नीग्रो'' असे कोणाला म्हंटले?

A. कुंजबिहारी बोस✅

B. विरेंद्रकुमार घोष

C. अरविंदो घोष

D. हेमचंद्र दास


🟢 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना कोणी केली?

A. महात्मा फुले

B. गणेश वासुदेव जोशी

C. डॉ. बाबासाहेब आंबेडकर

D. जगन्नाथ शंकर शेठ✅

______________________________

🟡 ऑपरेशन सनराइज ही कोणत्या देशांची संयुक्त लष्करी मोहीम आहे?


A) भारत आणि म्यानमार☑️

B) भारत आणि नेपाळ

C) भारत आणि बांग्लादेश

D) भारत आणि थायलँड


🟠 कोणत्या देशात भारताने कलादन प्रकल्प सुरू केला आहे?

A) नेपाळ

B) म्यानमार

C) इंडोनेशिया

D) इराक

______________________________

🔴 राज्यघटना कलम.......नुसार संपूर्ण देशासाठी वार्षिक अंदाजपञक तयार केले जाते?

A-कलम 110

B-कलम 111

C-कलम 112

D- कलम 113


______________________________

🟢 कोणत्या भारतीय समाजसुधारकाचा हस्तीदंती अर्ध पुतळा ब्रिटनमध्ये त्यांच्या 180 व्या स्मृती दिनाचे औचित्य साधून बसविण्यात आला?

(1)लाला हरदयाळ

(2)राजाराम मोहन रॉय✅✅

(3)पं. मदनमोहन मालविय

(3)यापैकी नाही

______________________________

🟤' द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण?

डॉ.एस.एन.सेन

वि.डी.सावरकर

अशोक मेहता✅✅

अशोक कोठारी

______________________________

⚫️ महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते ?अशोक मेहता✅अशोक मेहता✅

दोदाबेटा

कळसुबाई✅✅✅

साल्हेर

मलयगिरी

______________________________

🔵 निलगिरी पर्वतातील उंच शिखर .. आहे.

1)माकुर्णी

2)दोडाबेटा✅✅

3) अन्ना मलाई

4) उदकमडलम

______________________________

🟡 सयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना कधी झाली?

१) 24 ऑक्टोबर 1 9 45✅✅✅

२) 25 ऑक्टोबर 1 9 45  

३) 24 ऑक्टोबर 1 9 54  

४) 25 ऑक्टोबर 1 9 54  


प्रश्न.१. आदिमानवातील कोणत्या मानवास 'हॕन्डी मॕन' म्हणून ओळखले जाते.?

१. होमो इरेक्टस 

२. होमो निअॕन्डरथॕलेन्सीस

३. होमो हायब्डर्रजेन्सिस

४. होमो हॕबिलीस ✔️



प्रश्न.२. खालील विधानांपैकी अयोग्य विधान ओळखा.?

१. कार्बन मोनाँँक्साईडमुळे शरीरातील उपलब्ध हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते.

२. ओझोन वनस्पतींच्या वाढीसाठी उपयुक्त ठरतो.  ✔️

३. कार्बनडाय आँक्साईड जागतिक तापमान वाढीसाठी कारणीभूत ठरतो.

४. तरंगणाऱ्या कणांमुळे फुफ्फुसांचे रोग होतात.



प्रश्न.३. स्ट्राॕबेरी हे ------- प्रकारचे फळ आहे.?

१. संयुक्त

२. कॕप्सुलर

३. लिंबु वर्गीय

४. अॕग्रीगेट ✔️


प्रश्न.४. दोन पदार्थांचे घर्षण झाल्यास त्यांच्यातील रेणू-रेणूंमधील अंतर ......?

१. वाढते  ✔️

२. कायम राहते

३. कमी होते

४. नष्ट होते


प्रश्न.५. उच्च दर्जाच्या मोतीस (Pearl) काय म्हणतात.?

१. रिअल मोती (Real)

२. स्वेता मोती (Sweta)

३. लिन्घा मोती (Lingha)  ✔️

४. अॕमेथिस्ट (Amethist)


प्रश्न.६. टेबलावर ठेवलेले पेन अचल स्थितीत राहते, ही बाब म्हणजे न्युटनच्या गतिविषयक कितव्या नियमाचे उदाहरण आहे.?

१. पहिल्या  ✔️

२. दुसऱ्या 

३. तिसऱ्या 

४. चौथ्या 


प्रश्न.७. सध्या इन्सुलिन हे औषध कमी किमतीत मिळते आहे. त्याचे कारण पुढीलपैकी कोणते आहे.?

१. येथे जीवाणूंना दिले जाणारे अन्न अतिशय स्वस्त आहे.

२. जनुकीय परिवर्तित जीवाणू हे तयार करतात. ✔️

३. येथे किण्वनाची प्रक्रिया अतिशय जलद असते.

४. किण्वन करण्याची जी संयंत्रे वापरली जातात ती वर्षानुवर्षे टिकतात.


प्रश्न.८. मानवी आरोग्याच्या स्थितीत सतत प्रगतीशील सुधारणा होण्याच्या क्रियेस काय म्हणतात.?

१. सामाजिक आरोग्य

२. वैयक्तिक आरोग्य

३. सामाजिक आरोग्यशास्त्र 

४. आरोग्य विकास  ✔️



प्रश्न.९. ओझोन वायूचे एकक पुढीलपैकी कोणते आहे.?

१. A.U.

२. B.U.

३. C.U.

४. D.U.  ✔️



प्रश्न.१०. रसेल कार्लसन यांचे प्रसिद्ध पुस्तक 'सायलेंट स्प्रिंग' हे पुढील कशाशी संबंधित आहे.?

१. किटकनाशके व त्यांचे दुष्परिणाम  ✔️ 

२. नद्या व नदीकाठचा प्रदेश

३. जैवविविधता 

४. विषाणूजन्य आजार व मानवावर होणारे परिणाम


प्रश्न.११. एकक वेळेत पृथ्वीच्या एकक क्षेत्रफळावर आदळणाऱ्यां विद्युत चुंबकीय ऊर्जेस काय म्हणतात.?

१. किरणोत्सार (Radioactivity)

२. फाॕलआऊट (Fallout)

३. इरॕडिअन्स (Irradiance)  ✔️

४. जडत्व (Inertia)


प्रश्न.१२. जैवतंत्रज्ञानात सर्वाधिक अभ्यासला गेलेला जीवाणू म्हणून पुढीलपैकी कोणत्या जीवाणूला ओळखले जाते.?

१. अॕन्थ्रॕक्स बॕसिलस

२. स्ट्रेप्टोकोकस मँसिअस

३. सुडोमोनास 

४. ई. कोलाय  ✔️


प्रश्न.१३. मसाल्यात वापरले जाणारे दगडफूल पुढीलपैकी कोणते आहे.?

१. उस्निया

२. पारमेलिया  ✔️

३. ब्राओरिया

४. लँमिनारिया


प्रश्न.१४. सूर्यफूल ही ------ वनस्पती आहे.?

१. अनावृत्तबीजी 

२. एकबीजपत्री

३. नेचोद्रभिदी

४. द्वीबीजपत्री  ✔️


प्रश्न.१५. डीएनए मध्ये थायमीन (T) हा नेहमी कुठल्या नत्र घटकाशी जोडी बनवतो.?

१. सायटोसिन

२. ग्वानाईन

३. अॕडेनाईन  ✔️

४. थायमीन


प्रश्न.१६. पुढीलपैकी कोणत्या पदार्थापासून सर्वात जास्त कॕलरीज मिळतात.?

१. एक कप आईस्क्रीम ✔️

२. एक कप सरबत

३. एक कप दूध

४. एक कप आंब्याचा रस


प्रश्न.१७. पुढीलपैकी कोणत्या रोगाचे लसीकरण उपलब्ध नाही.?

१. क्षयरोग

२. हिवताप  ✔️

३. विषमज्वर 

४. यकृतदाह


प्रश्न.१८. L-Dopa हे औषध पुढीलपैकी कोणत्या आजारावर उपचार करण्यासाठी वापरले जाते.?

१. टि.बी.  

२. कँन्सर

३. पार्किन्सन्स✔️

४. मलेरिया


 मिलिट्री व औद्योगिक क्षेत्रांमध्ये वापरले जाणारे RDX निर्माण करण्यासाठी पुढील कोणती पद्धती वापरली जात नाही.?

१. बाखमन पद्धती 

२. वुलविच पद्धती 

३. नायट्रेशन पद्धती

४. थिओडोलाईट पद्धती ✔️


भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे?

A) आग्नेय ✅✅

B) ईशान्य

C) नैॠत्य

D) वायव्य


भारतात सर्वप्रथम व्यापारानिमित्य कोण आले होते?

A) पोर्तुगीज ✅✅

B) इंग्रज

C) डच

D) फ्रेंच


मानवामध्ये  गुणसूत्रे असतात.

A) ४६ ✅✅

B) ४४

C) ३२

D) ५२


भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे?

A) लक्षद्वीप

B) मालदीव

C) छागोस

D) अंदमान ✅✅


‘झुमर’ लोकनृत्य _ राज्यात प्रसिद्ध आहे.

A) कर्नाटका

B) राजस्थान ✅✅

C) बिहार

D) गुजरात


आम्ल पदार्थाची चव कशी असते?

A) खारट

B) आंबट ✅✅

C) तुरट

D) गोड


नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL)  ठिकाणी स्थित आहे.

A) मुंबई

B) औंरंगाबाद

C) पुणे ✅✅

D) नागपूर


आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली?

A) रासबिहारी बोस ✅✅

B) चंद्रशेखर आझाद

C) सुभाषचंद्र बोस

D) रामप्रसाद बिस्मिल


भारतात कोणता दिवस राष्ट्रीय ग्राहक दिवस म्हणून ओळखला जातो?

A) २४ डिसेंम्बर ✅✅

B) १५ मार्च

C) १ जुलै

D) २ आक्टोबर


I.S.I. हि गुप्तहेर संघटना  देशाची आहे?

A) भारत

B) पाकिस्तान ✅👌

C) अमेरिका

D) रशिया


अक्षय उर्जा दिन : २० ऑगस्ट :: ? : २२ मार्च

A) जागतिक जल दिन ✅✅

B) साक्षरता दिन

C) जागतिक महिला दिन

D) जागतिक एड्स दिन


‘दोनदा जन्मलेला’ हा विग्रह कोणत्या सामासिक शब्दाचा आहे?

A) द्वित

B) अग्रज

C) अनुज

D) द्विज ✅✅


‘नांगर चषक’  खेळाशी संबधित आहे.

A) गोल्फ

B) बुद्धिबळ

C) हाॅकि

D) बॅटमिंटन ✅✅


भारतीय अवकाश संशोधनाचे अध्वर्यू कोणास म्हणतात?

A) डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम

B) विक्रम साराभाई ✅✅

C) सतीश धवन

D) माधवन नायर


अंदमान – निकोबार बेटांंचे  राजधानीचे शहर कोणते आहे?

A) विशाखापट्टणम

B) मालदीव

C) छागोस

D) पोर्ट ब्लेअर ✅✅


‘सव्यापसव्य करणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?

A) उसने अवसान आणणे

B) सतत त्रास होणे

C) यातायात करणे ✅✅

D) अतिशय काळजी घेणे


कोणत्या कवीने ‘ गझल’ हा प्रकार मराठीत रूढ केला?

A) शांताराम नांदगावकर

B) जोतीबा फुले

C) जगदीश खेबुडकर

D) सुरेश भट्ट ✅✅


हिटलरच्या  आत्मचरित्रातून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप स्पष्ट होते.

A) माईन काम्फ ✅✅

B) दास कॅपिटल

C) तरुण तुर्क

D) आपला लढा


‘भूल पडणे’ या वाक्याप्रचाराचा योग्य अर्थ पर्यायातून निवडा?

A) भुरळ पडणे✅✅

B) बेशुद्ध पडणे

C) मती नष्ट होणे

D) हरवणे


‘प्लेइंग’ इट माय वे’ हे प्रसिद्ध आत्मचरित्र  यांचे आहे.

A) कपिल देव

B) सुनील गावसकर

C) सचिन तेंदुलकर ✅✅

D) अॅडम गिल ख्रिस्ट


क्रेमलिन हे प्रमुख स्थळ  ठिकाणी आहे?

A) वाॅशिंग्टन

B) रोम

C) न्यूयाॅर्क

D) माॅस्को ✅✅



🔰 1) राजाराम मोहन रॉय यांना राजा हि पदवी कोणी दिली 
1)देंवेंद्रनाथ टागोर 
2)नेताजी बोस
3)अकबर✅✅
4)डॉ़ सेन

____________________________

🔰 2)राणी लक्ष्मीबाई पूर्ण नाव काय 
1)लक्षमीबाई महादेव जानकर 
2)मणकणिका मोरोपंत तांबे ✅✅
3)राणी पांडूरंग माने
4)लक्षमीबाई महादेव थोरात

____________________________

🔰 3)कभी कभी छोटी चीज भी बडा काम कर जाती है हे उदृगार कोणाचे आहे 
1)नेहरू
2)गांधी
3)लालबहादूर शास्त्री✅✅
4)इंदिरा गांधी
____________________________

🔰 4)चले जाव ठराव कोणत्या अधिवेशन मंजूर करण्यात आला 
1)मुंबई
2)पुणे
3)वधाँ✅✅
4)कलकत्त
____________________________

🔰5)पाकिस्तान हा शब्द कोणत्या पुस्तकात वाचायला मिळाला
1)never Pakistan 
2)no in pictures 
3)Now or Never ✅✅
4)some of the entire

🏆 खाली दिलेल्या राशींपैकी अदिश राशी .................... आहे 

⚪️ विस्थापन 
⚫️ चाल☑️
🔴 गती
🔵 तवरण 
_________________________

🏆 वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते?

⚪️ ऑक्सिजन
⚫️ हड्रोजन
🔴 कार्बन डायऑक्साईड☑️
🔵 नायट्रोजन
_________________________

🏆 नयूटनचा दुसरा नियमफ ----------- चे मापन देतो?

⚪️सवेग☑️
⚫️बल
🔴तवरण
🔵घडण

🏆 कोणत्या किरणांचा मारा करून फुलांची व फळांची उत्पादकता वाढवितात?

⚪️अल्फा
⚫️बिटा
🔴गमा☑️
🔵कष-किरण
_________________________

🏆 रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवणारा घटक कोणता?

⚪️मलॅनिन
⚫️इन्शुलिन☑️
🔴यकृत
🔵कल्शियाम
_________________________

 🏆 मायका चा वापर कोणत्या कारणांसाठी करतात?

⚪️रग तयार करणे
⚫️विद्युत रोधक म्हणून☑️
🔴विद्युत सुवाहक म्हणून 
🔵वरील सर्व कारणांसाठी 
_________________________

🏆 धान्यसाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

⚪️सोडियम क्लोरेट☑️
⚫️मायका
🔴मोरचुद
🔵कॉपर टिन
_________________________

🏆 बहिर्वक्र आरशाने तयार होणारी प्रतिमा नेहमीच वस्तूपेक्षा आकाराने .................. असते.

⚪️मोठी
⚫️लहान☑️
🔴दप्पट
🔵तिप्पट
_________________________

🏆 वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................

⚪️तितकेच राहते
⚫️निमपट होत
🔴चौपट होते
🔵दप्पट होते ☑️
_________________________

🏆 धवनीचे प्रसारण ..................... मधून होत नाही .
⚪️सथायू 
⚫️दरव
🔴वायू
🔵निर्वात प्रदेश ☑️

Que.1 : ब्रिटीश गव्हर्नर जनरल 'मॉडर्न इंडिया मेकर' म्हणून ओळखले जातात?
1⃣ लॉर्ड कॅनिंग
2⃣ लॉर्ड डलहौसी✅✅✅
3⃣ लॉर्ड कर्झन
4⃣ लॉर्ड माउंटबॅटन

 

Que .2: भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?

1⃣ मौलाना अबुल कलाम
2⃣ एम. ए. जिन्ना
3⃣ बद्रुद्दीन तायबजी✅✅✅
4⃣ रहीमतुल्ला एम सयानी

 

Que.3 : पुढीलपैकी कोणत्या वर्षात ब्रिटीश कारभाराची राजधानी कलकत्ता ते 
दिल्ली येथे स्थानांतरित झाली?
1⃣ 1911✅✅✅
2⃣ 1857
3⃣ 1905
4⃣ 1919

 

Que .4 : खालीलपैकी कोणते कार्यक्रम-वर्ष संयोजन चुकीचे आहे?
1⃣ चौरी चौरा - 1922
2⃣ भारत सोडा - 1942
3⃣ दांडी मार्च - 1931✅✅✅
4⃣ बगालचे विभाजन - 1905


Que.5 : भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.?
1⃣ जवाहरलाल नेहरू
2⃣ राजेंद्र प्रसाद
3⃣ सी राजगोपालाचारी
4⃣ ज.बी.कृपलानी✅✅✅

महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये दारूबंदी घोषित करण्यात आली?
 A) वर्धा 
 B) गडचिरोली 
 C) चंद्रपूर 
 D) गोंदिया ✅✅


 एक स्कूटर १ लिटर पेट्रोलवर ४५ कि.मी. अंतर कापू शकते तर १८० कि.मी. अंतर कापण्यासाठी किती पेट्रोल लागेल?
 A) ६ लिटर 
 B) ५ लिटर 
 C) ४ लिटर ✅✅
 D) ३ लिटर


 “पोपट पेरू खातो” या वाक्यातील कर्म ओळखा.
 A) प्रथमान्त ✅✅
 B) द्वितीयांत 
 C) चतुर्थ्यांत 
 D) तृतीयान्त

“म्हणून” हे कोणत्या प्रकारचे उभयान्वयी अव्यय आहे?
 A) कारणबोधक 
 B) विकल्पबोधक 
 C) न्यूनत्वबोधक 
 D) परिणामबोधक✅✅


नागरी सेवा दिन (Civil Service Day) कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
 A) २ जानेवारी 
 B) २१ एप्रिल ✅✅
 C) २८ फेब्रुवारी 
 D) १४ सप्टेंबर


 एका सांकेतिक भाषेत SAND म्हणजे VDQG , BIRD म्हणजे ELUG असेल तर LOVE म्हणजे काय?
 A) PRYW 
 B) ORTW 
 C) NPUH 
 D) ORYH ✅✅


: : x चे 15% = 900 चे 10% तर x =?
 A) 60 
 B) 600 ✅✅
 C) 700 
 D) 800


भारताच्या नार्कोतीक्स कंट्रोल ब्युरोचे पदसिद्ध प्रमुख (Ex – Officio Head) कोण आहेत?
 A) डायरेक्टर जनरल ऑफ बी.पी.आर. and डी. 
 B) डायरेक्टर आई. बी. 
 C) डायरेक्टर ऑफ रेवेन्यू इंतेलीजेंट 
 D) डायरेक्टर सी. बी. आय ✅✅
 


पेंच राष्ट्रीय उद्यानास कोणते नाव देण्यात आले?
 A) इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान 
 B) पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान ✅✅
 C) संजय गांधी राष्ट्रीय उद्यान 
 D) महात्मा गांधी राष्ट्रीय उद्यान



 “अनिष्ट ” शब्दाचा समास ओळखा?
 A) तत्पुरुष ✅✅
 B) अव्ययीभाव 
 C) कर्मधारय 
 D) द्विगु


देशातील पहिले डिजीटल खेडे कोणते आहे?
 A) अकोदरा ✅✅
 B) रावतभाटा 
 C) बडोदरा 
 D) मानकापूर

ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधात झालेले उठाव

संन्याशाचा उठाव : 1765-1800 – बंगाल शंकराचार्यांचे अनुयायी व गिरी संप्रदायाचे लोक
चुआरांचा उठाव : 1768 – बंगाल-मिजापूर जिल्हा जगन्नाथ घाला
हो जमातीचे बंड : 1820 – छोटा नागपूर व सिंगभूम
जमिनदारांचा उठाव : 1803 – ओडिशा जगबंधू
खोंडांचा उठाव : 1836 – पर्वतीय प्रदेश दोरा बिसाई
संथाळांचा उठाव : 1855 – कान्हू व सिंधू
खासींचा उठाव : 1824 – आसाम निरतसिंग
कुंकिंचा उठाव : 1826 – मणिपूर

दक्षिण भारतातील उठाव

पाळेगारांचा उठाव : 1790 – मद्रास
म्हैसूरमधील शेतकर्यांचा उठाव : 1830 – म्हैसूर
विजयनगरचा उठाव : 1765 – विजयनगर
गोरखपूरच्या जमिनदारांचा उठाव : 1870 – गोरखपूर
रोहिलखंडातील उठाव : 1801 – रोहिलखंड
रामोश्यांचा उठाव : 1826 – महाराष्ट्र उमाजी नाईक व बापू त्र्यंबकजी सावंत
भिल्ल व कोळ्यांचा उठाव : 1824
केतूरच्या देसाईचा उठाव : 1824 – केतूर
फोंडा सावंतचा उठाव : 1838
भिल्लाचा उठाव : 1825- खानदेश
दख्खनचे दंगे : 1875- पुणे,सातारा,महाराष्ट्र शेतकरी

1857 पूर्वीचे उठाव

 1. रामोशांचा उठाव


०१. सासवडच्या सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली सर्वप्रथम रामोशी समाज एकत्रित आला. सत्तू नाईक, साताऱ्याचा चित्तूरसिंग नाईक व पुरंदरचा उमाजी नाईक हे रामोशांचे प्रमुख नेते होते. पुण्याच्या आग्नेय भागात रामोशांची जास्त दहशत होती.


०२. सत्तू नाईकच्या नेतृत्वाखाली उमाजी नाईक व त्याचा भाऊ अमृता नाईक यांनी पुण्याजवळ भांबूर्ड्याचा लष्करी खजिना १९२४-२५ साली लुटला. पुण्यातून रामोशांच्या हकालपट्टीसाठी ब्रिटिशांनी जवाहरसिंग रामोशी यास सासवडचा अंमलदार बनविले. पण उमाजी व सत्तू नाईकाने जवाहरसिंग व त्याच्या मुलाच्या मुसक्या आवळल्याने त्याने इंग्रजांची नोकरी सोडून दिली.


०३. सत्तू नाईकनंतर रामोशांचे नेतृत्व उमाजी नाईककडे आले. भूजाजी, येसाजी, कृष्णाजी व अमृता हे उमाजीचे विश्वासू साथीदार होते. उमाजी स्वतःला राजे म्हणवून घेत असे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील भिवरी या गावी १७९१ साली उमाजीचा जन्म झाला होता.


०४. ब्रिटीश काळात रामोशांची संख्या १८००० होती. दरम्यानच्या काळात उमाजीने एका यात्रेत तलवारीने कोतवालाचे तुकडे करून पोलिसांत दहशत पसरविली. उमाजीला पकडण्यासाठी ब्रिटिशांनी १८२६ साली पहिला जाहीरनामा काढला. यानुसार उमाजी व त्याचा साथीदार पांडुजी यांना पकडून देणाऱ्यास १०० रु. इनाम जाहीर केले. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.


०५. सरकारने पुन्हा जाहीरनामा काढून इनामाची रक्कम १२०० रु केली. आणि जाहीरनाम्यात असे म्हटले कि, सरकारला मदत नाही केलीत तर बंडवाल्यात सामील झालात असे समजण्यात येईल. यावेळी उमाजीस पकडून देण्याचा विडा उचलणाऱ्या शिवनाक महारास रामोशांनी ठार केले.


०६. त्यावेळी उमाजीचा धाक पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, जेजुरी, सासवड व मराठवाड्याच्या काही भागात होता. यावेळी पुण्याचा कलेक्टर एच.डी. रॉबर्टसन याने वेळोवेळी जाहीरनामा काढून उमाजीला पकडण्याचे ठरविले. कोणीच गद्दारी न केल्यामुळे त्यांच्या हाती काहीच आले नाही.


०७. रॉबर्टसनने दरम्यान कोकणावर वचक बसविण्यासाठी बंडखोरांची माहिती देणाऱ्यासाठी खास बक्षीस जाहीर केले. या काळात उमाजीने ठाणे व रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांनी ब्रिटीशांकडे महसूल न भरता उमाजींकडे द्यावा असे जाहीर केले. याच्या परिणामस्वरूप भोर संस्थानातील १३ गावांनी उमाजीकडे महसूल भरला.


०८. शेवटी ब्रिटिशांनी उमाजीची बायको, दोन मुले व एक मुलगी यांना अटक केली. त्यामुळे कुटुंबाखातर उमाजी ब्रिटिशांना शरण आला. ब्रिटिशांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून त्याला सरकारी नोकरी दिली. पुणे व सातारा जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम उमाजीकडे देण्यात आले. पण पुढे नंतर १३ गावांच्या महसुलावरून उमाजी व ब्रिटीश यांच्यात वाद सुरु झाला.


०९. १८३१ साली ब्रिटिशांनी जाहीरनामा प्रसिद्ध करून उमाजीला पकडण्याची जबाबदारी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश यांच्याकडे सोपविली.उमाजी, येसाजी, मुंजाजी व कृष्णाजी यांना पकडून देणाऱ्यास ५००० रुपये व २ बिघा जमीन बक्षीस देण्याचे जाहीर केले. त्यापैकी एकट्या उमाजीस पकडून देणाऱ्यास २५०० रुपये व १ बिघा जमीन जाहीर करण्यात आली.


१०. बक्षिसाच्या आमिषाला बळी पडून एकेकाळचे त्याचे जवळचे साथीदार काळू रामोशी व नाना रामोशी यांनी गद्दारी केली. उमाजीचा जुना शत्रू बापूसिंग यानेही त्यांना मदत केली. १५ डिसेंबर १८३१ रोजी कॅप्टन मैकिन्तोशने पुण्याच्या मुळशी तालुक्यातील अवळस येथे उमाजीला अटक केली. ३ फेब्रुवारी १८३२ रोजी उमाजीला फाशी देण्यात आली.


११. उमाजी नाईकनंतर रामोशांनी दौलतराव नाईक याच्या नेतृत्वाखाली लढा सुरु ठेवला. सह्याद्रीच्या खोऱ्यात येसूबाईच्या डोंगरात दौलतराव नाईक व मेजर डैनियल यांच्यात चकमक झाली त्यात नाईक व त्याचे सहकारी मारले गेले. मारताना नाईकांनी फडकेंना विनंती केली कि, रामवंशी (रामोशी) पुढे स्वार्थासाठी दरोडे घालणार नाहीत याची दक्षता घ्या.


१२. त्यानंतर नाशिक व अहमदनगर भागात राघू भांगरे याने ब्रिटिशाविरुद्ध लढा दिला. २० सप्टेंबर १८४४ रोजी राघू भांगरेनी एका पोलिस अधिकाऱ्यासह ७ पोलिसांना ठार केले. ब्रिटिशांना सहाय्य करणाऱ्या पाटलांची नाके त्याने कापली. त्याच्या बंदोबस्तासाठी ब्रिटिशांनी ५००० रुपयाचे बक्षीस जाहीर केले. त्याला पकडण्याची जबादारी पाटील व कुलकर्ण्यावर सोपविली.


2. कोळ्यांचा उठाव


०१. १८२८, १८३९, १८४४ ते १८४८ या दरम्यान महाराष्ट्रात कोळ्यांनी तीन टप्प्यात उठाव केला. रामजी भांगडिया, रघु भांगडिया, बापू भांगडिया, चिमणाजी जाधव व नाना दरबारे यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. १८२४ साली मुंबई भागात कोळ्यांनी नेटिव्ह इन्फ्रंटीकडून उठाव केला. ब्रिटिशांनी तो उठाव मोडून काढला. म्हणून १८२८ साली मुंबई पोलिसातील कोळी अधिकारी रामजी भांगडिया यांनी नोकरीचा राजीनामा देऊन त्या भागात कोळ्यांचे नेतृव केले. त्यांनी मुंबई भागात दोन वर्षे ब्रिटीशांशी लढा दिला. हा उठाव दडपून टाकण्यासाठी कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मैकिन्तोश आले व त्यांनी हा उठाव मोडून काढला.


०३. १८३९ साली कोळ्यांनी पुण्यात अचानक उठावास सुरुवात केली. त्यावेळी आता संपूर्ण राज्य कोळ्यांच्या ताब्यात आहे अशी घोषणा दिली. कोळ्यांनी दुसऱ्या बाजीरावास पेशवेपद देऊन मराठी राज्याची पुनर्स्थापना केली.


०४. यावेळी घोडनदी जवळील सरकारी खजिन्याला १५० कोळ्यांनी वेढा घातला. त्यावेळी पुण्याचा आसिस्टंट कलेक्टर रोज याने कोळ्यांच्या बंदोबस्तासाठी पुण्याहून सैन्य मागविले. यावेळी ५४ कोळ्यांवर खटले भरून २८ जणांना कमीअधिक प्रमाणात शिक्षा दिली व दोघांना फाशी देण्यात आली.


०५. १८४४ साली कोळ्यांनी शस्त्रास्त्रे व माणसे जमवून रघु भांगडिया व बापू भांगडिया यांच्या नेतृत्वाखाली पुणे, नाशिक, सातारा. नगर व पुरंदर याभागात परत उठाव केला.


०६. नाणे घाट व माळशेज घाट ताब्यात घेऊन कोळ्यांनी कोकणचा मार्ग अडविला. इंग्रज अधिकारी कॅप्टन जेलने या उठावाचा बंदोबस्त केला. १८४५ मध्ये ब्रिटिशांनी बापू भांगडियाला पकडले. १८५० पर्यंत ब्रिटिशांनी महाराष्ट्रातील कोळ्यांचा कायमचा बंदोबस्त केला.


3. भिल्लांचे उठाव


०१. १८१८ मध्ये ब्रिटिशांनी खानदेश ताब्यात घेतला. भिल्लांची वस्ती विशेषतः याच भागात असल्याने भिल्लांच्या मनात इंग्रजाबद्द्ल द्वेष निर्माण झाला. त्यामुळे त्यांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. त्रिंबकजी डेंगळे, भिल्ल नाईक, दसरत व धानजी, हरिया (हिरा), निहाल, सेवाराम सोनार (घिसाडी), भागोजी नाईक, खर्जासिंग, भीमा नाईक, उचेतसिंग पवार यांनी या उठावाचे नेतृत्व केले.


०२. त्रिंबकजी ढेंगळे हा दुसऱ्या बाजीरावचा मित्र व मराठा सरदार होता. दुसऱ्या बाजीरावच्या पराभवानंतर डेंगळेला ठाण्याच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तेथून तो पळाला व त्याने भिल्लांना इंग्रजांविरुद्ध बंड करण्यास चिथविले. त्याने उठावाची सूत्रे त्याचे पुतणे गोदाजी व महिपा डेंगळे यांच्यावर सोपविली. तत्कालीन कलेक्टर कॅप्टन ब्रिग्जने उठावाचा बंदोबस्त करण्यासाठी भिल्लांचे मुडदे पाडले व डोंगरातील वाटघाटांवर सैन्य ठेऊन त्यांची रसद बंद केली.


०३. पण याउलट मुंबईचा गवर्नर माउंट एल्फिन्सटन याने मात्र भिल्लांना पेन्शन व काम देऊन त्यांचा बंदोबस्त केला.त्यांची वेगळी तुकडी उभारून आडमाळावर त्यांना तैनात केले. नादीरसिंह या भिल्ल डाकुस त्याच्या सहकाऱ्यांच्या मदतीनेच पकडण्यात आले.


०४. नोकऱ्या देऊनही भिल्ल थंड झाले नाहीत. त्यांनी उठाव सुरूच ठेवला. इंग्रजांनी भिल्लांच्या बंदोबस्तासाठी त्यांना माफी देण्याची घोषणा केली. यावेळी भिल्लाचे नेतृत्व सातमाळ्याचा भिल्ल नाईक करत होता. कॅप्टन ब्रिग्ज ने भिल्ल नाईकास पकडून त्याला फाशी दिली यासोबत शेख सादुल्ला यास कठोर शिक्षा केली.


०५. डसरत व धानजी हे लासूरच्या भिल्लांचे प्रमुख होते. त्यांनी १८२० मध्ये विशेषतः सातपुडा प्रदेशात गावे व घरे बेचिराख करण्याचे सत्र चालविले. त्यांच्या टोळीत शेख दुल्ला हा पेंढारी सामील झाला. मेजर मोरीन याने १०० मैलांवरील महत्वाच्या जागा जिंकल्याने दक्षिण भिल्लांच्या प्रमुखाना शरणागती पत्करावी लागली.


०६. १८२२ मध्ये सातमाळ्याचा हरिया व सातपुड्याचा निहाल भिल्ल यांनी भिल्लांच्या उठावाचे नेतृत्व केले. यांच्या काळात अंदाधुंदी, बलात्कार व शोषणास मर्यादा राहिल्या नाहीत. यावेळी कॅप्टन रॉबिन्सन याने भिल्लांना यशस्वीरित्या दडपले.


०७. १८२५ मध्ये सेवाराम सोनारच्या नेतृत्वाखाली भिल्लांनी उठाव केला. यावेळी राजकीय नेत्यांनीसुद्धा याला पाठींबा दिला. सेवारामने साताराच्या राजाच्या नावाने बनावट पत्रे तयार केली व ती राजाच्या आदेशानुसार बागलान तालुक्यातील भिल्लांना वाटली. ही पत्रे भिल्लांनी उठाव करण्यासंदर्भातील होती.


०८. त्यानुसार भिल्लांनी लुटालूट केली. त्यांनी उतारपूरवर हल्ला केला व तेथील लुट मुरली महाल या किल्ल्यात ठेवली. लेफ्टनंट औट्रम याने यातील काही लुट परत मिळविली व सेवाराम व त्याच्या सहकाऱ्यांना पकडले. सेवारामबाबत औट्रम ने मवाळ भूमिका घेतली व भिल्लांच्या जमिनी परत दिल्या.


०९. १८२८ पर्यंत भिल्लांचे उठाव कमी झाले पण संपले नव्हते. पानिपतच्या लढाईत मरण पावलेल्या पवारांचा पणतू उचेतसिंग पवार याने धारच्या पवारांकडून गादी मिळविण्यासाठी भिल्लांना सोबत घेऊन दोन वेळा हल्ला केला होता. दोन्ही वेळेस तो पराभूत झाला.


१०. मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्यात भिल्ल लोकांनी कोनारराव याच्या नेतृत्वाखाली इंग्रजांविरुद्ध बंड केले. पण सुसूत्रता नसल्याने इंग्रजांना बंड दडपून टाकणे सोपे ठरले.


११. काजरसिंग नाईक याने १८७५ च्या वेळी खानदेशात ब्रिटीशांविरुद्ध भिल्लाच्या उठावात नेतृत्व केले. तो पूर्वी ब्रिटीशांच्या पोलिस दलात होता. त्याने ब्रिटीशांचा ७ लाखाचा खजिना लुटला. १८५७ च्या अंबापाणी लढाईत भिल्लची ब्रिटीशांशी लढाई झाली. यात स्रियांचाही सहभाग होता.


4. गौंड जमातीतील उठाव


०१. १८१७-१८ च्या काळात नागपूरचे राजे अप्पासाहेब भोसले यांनी गौंड या आदिवासी जमातीच्या प्रमुखांच्या मदतीने इंग्रजांविरुद्ध उठाव केला. बेतूर येथे इंग्रजी फौजेचा त्यांनी पराभव केला. भोसलेंनी रणजीतसिंहासह अनेक हिंदी संस्थानिकांचे मन वळवून इंग्रंजांच्या विरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश आले नाही. शेवटी त्यांना इंग्रजांकडून पराभव पत्करावा लागला. १८४० मध्ये भोसलेंचा जोधपुर येथे मृत्यू झाला.


5. हटकरांचा उठाव


०१. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात हंसाजी नाईक हटकर यांचे छोटेसे राज्य होते. नोव्हाचा किल्ला हंसाजीचा प्रमुख आधार होता. त्यावेळी मराठवाडा हा इंग्रजांचा मांडलिक निजामच्या ताब्यात होता. हंसाजीने १८१९-२० मध्ये निजाम व इंग्रजांच्या विरुद्ध उठाव केला.


०२. मेजर पिटसन, कॅप्टन इव्हान्स डेविड, कॅप्टन मैडोज टेलर यांनी ४००० सैनिकांसह हंसाजीवर हल्ला केला. इंग्रजांनी नोव्हा किल्ल्यावर तोफा डागून तो किल्ला ताब्यात घेतला. तेव्हा हंसाजीने उमरखेड येथून इंग्रजांशी लढा दिला. इंग्रजांनी हंसाजी हटकर याचा पराभव केला व त्याचे राज्य ताब्यात घेतले.


6. धर्माजी प्रतापरावाचा उठाव


०१. बीड येथे धर्माजी प्रतापराव याने १८१८ मध्ये निजामाला विरोध केला. हा उठाव मोडण्यासाठी निजाम सरकारने ११ जुलै १८१८ रोजी नवाब मुर्तुजा यारजंग याला लेफ्टनंट जेम्स सदरलैंड याच्या नेतृत्वाखाली रवाना केले. ३० जुलै १८१८ रोजी सदरलैंडने धर्माजी लपून बसलेल्या दिवे गावातील किल्ल्याला वेढा घातला. त्यामुळे धर्माजी व त्याचा भाऊ कंपनीच्या हाती आले.


7. कोल्हापूरच्या गडकरींचा उठाव


०१. १ ऑक्टोबर १८१२च्या तहाने कोल्हापूर कंपनीचे मांडलिक झाले होते. १८२१ साली गादीवर बसलेले शहाजी बाबासाहेब इंग्रजद्वेष्टे होते. त्यांना राणी जिजाबाईपासून चौथा शिवाजी व राणी दिवणाबाईपासून चिमासाहेब अशी दोन अपत्ये होती.


०२. १८३८ मध्ये राजे शहाजीचा मृत्यू झाला. त्यांची दोन्ही मुले अल्पवयीन असल्याने राण्यांनी राज्यकारभार पाहिला. पण त्यांचे आपापसांत पटत नसल्याने इंग्रजांनी मध्ये हस्तक्षेप केला. इंग्रज सरकारने राज्यकारभार सुधारण्यासाठी दाजीकृष्ण पंडित यास दिवाण नेमले. हे धाकट्या राणीस व त्यांच्या समर्थकांस आवडले नाही.


०३. दाजी पंडितने शेतसारा वसूल करण्यासाठी मामलेदाराची नेमणूक केली. मामलेदार हे गडकरीपेक्षा कनिष्ट असल्याने गडकरींनी त्याकडे शेतसारा भरण्यास नकार दिला. सामानगडावर वसुलीसाठी आलेल्या मामलेदारांच्या माणसांना गाडकऱ्यांनी मारले. त्यामुळे दाजी पंडितने बेळगावहून सैन्य मागविले.


०४. कॅप्टन औट्रमच्या नेतृत्वाखालील १२०० सैनिकांनी सामानगडावर हल्ला केला व गडकऱ्यांचा पराभव केला. ऑक्टोबर १८४४ मध्ये बंडवाल्यांनी प्रतीसरकारची स्थापना केली व दाजी पंडितास पकडून कोल्हापूरचा ताबा घेतला. त्यासोबतच सामानगडही ताब्यात घेतला. पण गडकऱ्यांना पुढे कोल्हापूरहून मदत न मिळाल्यामुळे गडकरी शरण आले


सह्याद्रीतील प्रमुख घाट


✔️ घाट (किलोमीटरमध्ये लांबी) जोडलेली शहरे


▪️आबाघाट (११) रत्‍नागिरी-कोल्हापूर

▪️आबोली-रामघाट (१२) सावंतवाडी– कोल्हापूर

▪️फोंडाघाट (९) कोल्हापूर-गोवा

▪️राम घाट ( ७ km )कोल्हापुर – सावंतवाडी

▪️अबोली घाट ( १२ km )कोल्हापुर – सावंतवाडी

▪️हनुमंते घाट ( १० km )कोल्हापुर – कुडाळ

▪️करूळ घाट ( ८ km )कोल्हापुर – विजयदुर्ग

▪️उत्तर तिवरा घाट()सातारा – रत्नागिरी

▪️कभार्ली घाट()सातारा – रत्नागिरी

▪️हातलोट घाट()सातारा – रत्नागिरी

▪️पार घाट ( १० km )सातारा – रत्नागिरी

▪️कळघरचा घाट()सातारा – रत्नागिरी

▪️पसरणीचा घाट ( ५ km )सातारा – वाई

▪️फिटस् जिराल्डाचा घाट ( ५ km )महाबळेश्वर – अलिबाग

▪️पांचगणी घाट ( ४ km )पोलादपुर – वाई

▪️बोरघाट ( १५ km )पुणे – कुलाबा

▪️खडाळा घाट ( १० km )पुणे – पनवेल

▪️कसुर घाट ( ५ km )पुणे – पनवेल

▪️वरंधा घाट ( ५ Km )पुणे – महाड

▪️रपत्या घाट ( ७ km )पुणे – महाड

▪️भीमाशंकर घाट ( ६ km)पुणे – महाड

▪️कसारा घाट ( ८ km )नाशिक – मुंबई

▪️नाणे घाट ( १२ Km )अहमदनगर – मुंबई

▪️थळ घाट ( ७ Km )नाशिक – मुंबई

▪️माळशेज घाट ( ९ km )नाशिक – मुंबई

▪️सारसा घाट ( km )सिरोंचा – चंद्रपुर

१४ सप्टेंबर २०२५

ऑपरेशन्स

 ⭕️ 1.'ऑपरेशन सिंधू'

भारताने इराणमधील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू केले आहे.

🔹 या ऑपरेशन अंतर्गत, इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणले जात आहे.

🔹 भारतीय हवाई दलाची विमाने भारतीयांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.


⭕️ महत्त्वाची इतर ऑपरेशन्स

2.ऑपरेशन सिंदूर (2025)

🔹 पाकिस्तानात भारतीय हवाई दलाने केलेला हवाई हल्ला.


3.ऑपरेशन गंगा (2022)

🔹 युक्रेनमधून अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षित सुटका.


4.ऑपरेशन देवी शक्ती (2021)

🔹 अफगाणिस्तानातून भारतीय नागरिक व काही परदेशी नागरिकांची सुटका.


5.ऑपरेशन कावेरी (2023)

🔹 आफ्रिकेतील सुदान मधून भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी राबवलेले अभियान.


📌 विशेष टीप :

भारत सरकारने मागील दशकभरात विविध संघर्षग्रस्त व संकटग्रस्त देशांतून नागरिकांची सुटका करण्यासाठी अशा प्रकारची मानवीय मदत व आपत्कालीन बचाव ऑपरेशन्स मोठ्या प्रमाणात यशस्वीरित्या पार पाडली आहेत.

१३ सप्टेंबर २०२५

महाराष्ट्राची लोकसंख्या - 2011:



♦️👉2011 सालाच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 (112,374,333) इतकी आहे.


यामध्ये पुरुषांची लोकसंख्या 5 कोटी 82 लाख 43 हजार 056 (58,243,056) तर महिलांची लोकसंख्या 5 कोटी 41 लाख 31 हजार 277 (54,131,277) आहे.


II. लोकसंख्येचा दशकीय वाढ - 2011:


2001 ते 2011 दरम्यान महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या वाढीचा दर 9.20% इतका आहे.


2001 साली राज्याची एकूण लोकसंख्या 9 कोटी 68 लाख 78 हजार 627 होती.


2011 साली ती 11 कोटी 23 लाख 74 हजार 333 इतकी झाली आहे.


III. महाराष्ट्र लोकसंख्या घनता - 2011:


2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या घनता (दर चौरस किलोमीटर) 365 आहे.


राष्ट्रीय सरासरी घनता 382 आहे.


IV. साक्षरतेचा दर:


महाराष्ट्राचा साक्षरतेचा दर 82.34% आहे.


पुरुष साक्षरतेचा दर 89.82%, तर महिलांचा साक्षरतेचा दर 75.48% आहे.


महाराष्ट्रातील प्रमुख घाट



1. थळ (कसारा) घाट - मुंबई-नाशिक


2. बोर घाट - पुणे-मुंबई


3. माळशेज घाट - ठाणे-अहमदनगर


4. दिवे घाट - पुणे-बारामती


5. ऑट्रम घाट/कन्नड घाट - धुळे-औरंगाबाद


6. काज्रत व खंबाटकी घाट - पुणे-सातारा


7. प्रसरणी घाट - वाई-महाबळेश्वर


8. शिरसाट घाट - नाशिक-जव्हार


9. भीमाशंकर घाट - पनवेल-नारायणगाव (मंचरमार्गे)


10. वरंधा घाट - महाड-पुणे


11. कशेडी घाट - महाड-खेड-डापोली


12. चांदनापुरी घाट - नाशिक-पुणे


13. शिरसाट घाट - नाशिक-जव्हार

१२ सप्टेंबर २०२५

विज्ञान 15 प्रश्न

🟤. संतृप्त हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूंमध्ये............असतो.

A. एकेरी बंध

B. दुहेरी बंध

C. तिहरी बंध ✔️

D. आयनिक बंध


🟣. ..................हा सूर्याच्या सगळ्यात जवळ आणि आपल्या सूर्यामालेतील सगळ्यात लहान ग्रह आहे.

A. शुक्र

B. बुध✔️

C. मंगळ

D. पृथ्वी


🔴. एलपीजी मध्ये .......घटक असतात.

A. मिथेन आणि इथेन

B. मिथेन आणि ब्युटेन

C. ब्युटेन आणि प्रोपेन ✔️

D. हायड्रोजन आणि मिथेन


🔵. MKS पद्धतीत दाबाचे एकक.........असते.

A. न्युटन

B. पासकल ✔️

C. डाइन

D. वॅट


🟡. ..................किरणांना वस्तूमान नसते.

A. अल्फा

B. बीटा

C. गॅमा ✔️

D. क्ष


🔵 दंतक्षय रोखण्यासाठी पुढीलपैकी कोणते खनिजद्रव्य महत्तवाचे ठरते ?

A. सोडियम

B. आयोडिन

C. लोह

D. फ्लोरिन ✔️


🟢. पुढीलपैकी कोणते जीवनसत्तव भाज्यांतून मिळत नाही ?

A. ब जीवनसत्त्व

B. क जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व ✔️

D. इ जीवनसत्त्व


🟣. आईच्या दुधात पुढीलपैकी कशाचा अभाव असतो ?

A. क जीवनसत्त्व व सोडियम

B. प्रथिने व लोह

C. सोडियम व प्रथिने

D. लोह व क जीवनसत्त्व ✔️


⚫️. जास्ता चोथा असलेले अन्नघटक पुढीलपैकी कोणते ?

A. सफरचंद व तूप

B. काकडी व सफरचंद ✔️

C. अंडी व केळी

D. केळी व दूध


🟡. आतड्यातील जीवानून मुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते ?

A. ब-1 जीवनसत्त्व

B. ब-4जीवनसत्त्व

C. ड जीवनसत्त्व

D. के जीवनसत्त्व ✔️


🟢. पुढीलपैकी कोणत्या घटकात कर्बोदक आढळत नाहीत ?

A. पालक

B. लोणी

C. चीज

D. मासे ✔️


🔵. अफू मध्ये खालीलपैकी कोणते द्रव्य प्रधान असते ?

A. कॅफिन

B. टॅनिन

C. मॉर्फिन ✔️

D. निकोटीन


🟤 पुढीलपैकी कोणता अन्नघटक ब-12 जीवनसत्त्वाचा प्रमुख स्रोत आहे ?

A. मासा ✔️

B. सफरचंद

C. कलिंगड

D. काजू


⚪️. हुंगण्याचे बधिरकारी साधन म्हणून पुढीलपैकी कोणत्या पदार्थाचा वापर केला जातो ?

A. नायट्रोजन

B. नायट्रोजन पेरॉक्साईड

C. अमोनिया

D. नायट्रस ऑक्साईड ✔️


🟢. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकून वातावरणाच्या 85 % इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर

B. थर्मोस्फियर

C. ट्रोपोस्फियर ✔️

D. सेट्रॅटोस्फियर



1️⃣खालीलपैकी भरपूर प्रमाणात ‘अ’ जीवनसत्वे देणारा पदार्थ………

1} सफरचंद

2} गाजर✅✅✅

3} केळी

4} संत्र


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣खालीलपैकी कोणता रोग ‘ड’ जीवनसत्त्वाच्या अभावी?

1} स्कर्व्ही

2} बेरीबेरी

3} मुडदूस✅✅✅

4} राताधळेपण


📖📖📖📖📖📖📖📖📖


3️⃣पथ्वीवरील वातावरणाची उंची सुमारे ……..कि.मी.इतकी आहे.

1} २००

2} ३५०

3} ५००

4} ७५०✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


4️⃣जव्हा मनुष्य उपग्रहाद्वारे पृथ्वीभोवती फिरतो,तेव्हा त्याचे वजन……….

1} वाढते

2} कमी होते

3} पूर्वीइतकेच राहते

4} शून्य होते✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


5️⃣कार्बनचे जास्तीत जास्त शुद्ध स्वरूप……..

1} दगडी कोळसा

2} कोक

3} चारकोल

4} हिरा✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


6️⃣जनावरांना तोंडाचे आणि पायांचे रोग मुख्यतः ………..मुळे होतात.

1} जीवाणू (bacteria)

2} विषाणू (virus)✅✅✅

3} कवक (fungi)

4} बुरशी


📖📖📖📖📖📖📖📖📖


7️⃣लसीकरणाने पुढीलपैकी कोणता विकार नियंत्रित करता येत नाही?

1} देवी

2} मधुमेह✅✅✅

3} पोलिओ

4} डांग्या खोकल


📖📖📖📖📖📖📖📖📖


8️⃣……..या किरणांना वस्तुमान नसते.

1} अल्फा

2} ‘क्ष’

3} ग्यामा✅✅✅

4} बीटा


📖📖📖📖📖📖📖📖📖


9️⃣खालीलपैकी कोणता रोग  'अ’ जीवनसत्त्वाच्या अभावी होतो?

1} रंगाधळेपण

2} स्कर्व्ही

3} बेरीबेरी

4} यापैकी नाही✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


🔟हिवतापावरील प्रभावी ऑंषध……..

1} पेनेसिलीन

2} प्रायमाक्वीन✅✅✅

3} सल्फोन

4} टेरामायसीन


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣1️⃣निष्क्रिय वायू हे………..

1} पाण्यामध्ये विरघळतात

2} स्थिर नसतात

3} रासायनिक क्रिया करू न शकणारे✅✅✅

4} रासायनिक क्रियेसाठी जास्त क्रियाशील


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣2️⃣…….हे मानवनिर्मित मूलद्रव्य आहे.

1} प्लुटोनिअम✅✅✅

2} U -२३५

3} थोरीअम

4} रेडीअम


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣3️⃣खालीलपैकी कोणते खत रोपांना समतोल आहार पुरवते?

1} युरिया

2} नायट्रेट

3} अमोनिअम सल्फेट

4} कंपोस्ट✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣4️⃣आतड्यातील जिवाणूमुळे पुढीलपैकी कोणते जीवनसत्त्व तयार होते?

1} ‘ब-१’ जीवनसत्त्व

2} ‘ब-४’ जीवनसत्त्व

3} ‘ड ‘ जीवनसत्त्व

4} ‘के ‘ जीवनसत्त्व✅✅✅


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣5️⃣जी.एस.आर’ हे उपकरण कशाच्या मापनासाठी वापरतात.

1} मेंदूचे स्पंदन

2} हृदयाचे स्पंदन

3} डोळ्यांची क्षमता✅✅✅

4} हाडांची ठिसूळता


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣6️⃣किती तीव्रता असलेल्या ध्वनीच्या सततच्या संपर्कामुळे कायमचा बहिरेपणा येऊ शकतो?

1} १०० डी.बी.च्या वर✅✅✅

2} ११० डी.बी.च्या वर

3} १४० डी.बी.च्या वर

4} १६० डी.बी.च्या वर


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣7️⃣डोळ्याच्या कर्करोगाच्या उपचारासाठी भाभा अणुसंशोधन केंद्राने कोणता प्रकाश स्त्रोत तयार केला?

1} आयोडीन-१२५✅✅✅

2} अल्बम-३०

3} ल्युथिनिअरम-१७७

4} सेसिअम-१३७


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣8️⃣आधुनिक जैवतंत्रज्ञान …………. पातळीवर कार्य करते.

1} अवअणू

2} अणू

3} रेणू✅✅✅

4} पदार्थ


📖📖📖📖📖📖📖📖📖


1️⃣9️⃣मानव पालेभाज्यांतील सेल्युलोज पचवू शकत नाही,कारण……….हे विकर त्याच्या जठरात नसते.

1} सेल्युलेज✅✅✅

2} पेप्सीन

3} सेल्युलीन

4} सेल्युपेज


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣0️⃣इमारतीमधील विजेवर चालणाऱ्या पाळण्यातून वर जाताना व्यक्तीचे वजन…

1} कमी होते✅✅✅

2} वाढते

3} सारखेच राहते

4} शून्य होते


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣1️⃣पदार्थाच्या एका ग्रॅम-मोलमधील रेणूंची संख्या ……… इतकी असते.

1} M

2} N✅✅✅

3} A

4} XB


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣2️⃣सौरऊर्जा _ स्वरुपात असते.

1} प्रकाश प्रारणांच्या

2} विद्धुत चुंबकीय प्रारणांच्या✅✅✅

3} अल्फा प्रारणांच्या

4} गामा प्रारणांच्या


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣3️⃣अहरित वनस्पती ____ असतात.

1} स्वयंपोषी

2}  परपोषी✅✅✅

3} मांसाहारी

4} अभक्ष


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣4️⃣किण्वन हा _ चा प्रकार आहे.

1} ऑक्सिश्वसन

2} विनॉक्सिश्वसन✅✅✅

3} प्रकाशसंश्लेषण

4} ज्वलन


📖📖📖📖📖📖📖📖📖


2️⃣5️⃣परकाश संश्लेषनात ___ प्रकाशउर्जा ग्रहण केली जाती.

1} हरितद्रव्यामुळे✅✅✅

2} झथोफिलमुळे

3} कॅरोटीनमुळे

4} मग्नेशिंअममुळ


खनिजद्रव्य व त्याचे उपयोग

 शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते.

 आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.


 खनिज - फॉस्फरस 

 उपयोग - दातांच्या आणि हाडांच्या विकासासाठी.

 अभावी होणारे परिणाम – हायपो-फॉस्फटेमिया - यात रक्तातील फॉस्फरस चे प्रमाण कमी होते. त्यामुळे ऊर्जानिर्मिती वर परिणाम होतो. तसेच हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात अशक्तपणा, स्नायूंचे कुपोषण, रक्तक्षय  इ परिणाम.

 अतिसेवनाने होणारे परिणाम – हायपर-फॉस्फटेमिया - यात रक्तातील फॉस्फरस चे प्रमाण वाढते. त्यामुळे अतिअवटुता तसेच वृक्कनाश होऊ शकतो.

 स्रोत - शेंगा, काजू, बदाम, घेवडा, गाजर, अळंबी, मांस, मासे, ब्रेड, तांदूळ, अंडी, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ, तसेच हिरव्या पालेभाज्या.


 खनिज – पोटॅशियम 

 उपयोग – चेतापेशीच्या पोषणाकरिता

 अभावी होणारे परिणाम – हायपो-कॅलेमिया यामुळे रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण कमी होते, स्नायूंना अशक्तपणा, पॅरालिसिस, चेतापेशीवर परिणाम होतो

 अतिसेवनाने होणारे परिणाम – हायपर-कॅलेमिया - रक्तातील पोटॅशियम चे प्रमाण वाढते. त्यामुळे स्नायूंना अशक्तपणा, नाडीचे ठोके वाढणे, हृदयविकार, अडीसन्सचा रोग इ. परिणाम आढळतात.

 स्त्रोत – सुकी फळे, कडधान्ये, बटाटे, केळी, पपई, तीळ, घेवडा, तृणधान्ये, सोयाबीन, पालक, रताळ, हळद इ.


 खनिज – कॅल्शियम 

 उपयोग – हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता

 अभावी होणारे परिणाम – हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.

 स्त्रोत – तीळ व पालेभाज्या


 खनिज – लोह 

 उपयोग – रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.

 अभावी होणारे परिणाम – लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.  

 स्त्रोत – मांस, मासे, अंडी, सी फूड, यकृत, सोयाबीन, सुका मेवा, गूळ-शेंगदाणे, घेवडा, पालक, खजूर, मनुके, तीळ, हळद, हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी


 खनिज – तांबे 

 उपयोग – हिमोग्लोबिनचे संवर्धन करणे
1"
 अभावी होणारे परिणाम – तांब्याच्या आभावी हिमोग्लोबिनची निर्मिती होत नाही.

 स्त्रोत – पालेभाज्या


 खनिज – सल्फर 

 उपयोग – प्रथिनांची निर्मिती करणे अस्थी व नखे यांचे आरोग्य

 अभावी होणारे परिणाम – केस, हाडे कमकूवत होतात


 खनिज – फ्लोरिन 

 उपयोग – दातांचे रक्षण करण्याकरिता,

 अभावी होणारे परिणाम – याच्या अभावी दंतक्षय होतो.


 खनिज – सोडीयम 

 उपयोग – रक्तामधील आम्ल व अल्क यांचा समतोल साधला जातो.

 अभावी होणारे परिणाम – रक्तदाबावर परिणाम होतो.  

स्रोत - मीठ


 खनिज – आयोडीन 

 उपयोग – थायराईड ग्रथीच्या पोषणाकरिता

 अभावी होणारे परिणाम – गलगंड नावाचा आजार होतो.

 स्रोत - आयोडिनयुक्त मीठ


 खनिज - मॅग्नेशियम 

 उपयोग : ATP रेणूच्या निर्मितीमध्येतसेच हाडांच्या विकासासाठी

 अभावी होणारे परिणाम – हायपो-मॅग्नेशिया - यामध्ये अशक्तपणा, स्नायूंना पेटके, हृदयाच्या कार्यात अडथळा, चिडचिड, अतिताण, धनुर्वात इ परिणाम

 स्रोत - सोयाबीन, कोकोआ, शेंगदाणे, पालक, टोमॅटो, घेवडा, अद्रक, लवंग, पालेभाज्या इ.

अतिमहत्त्वाची माहिती


🔑भारतीय अवकाश संशोधन संस्था🔑

(Indian space research organisation ISRO)

स्थापना : 15 ऑगस्ट 1969

इस्रोचे मुख्यालय :  बंग‌ळूरू

श्रीहरीकोटा आंध्र प्रदेश अंतरिक्षित उपग्रह प्रक्षेपित केंद्र

भारताने 1975 मध्ये  सोवियत युनियन च्या मदतीने पहिला "आर्यभट्ट "उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले

भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट आहे प्रक्षेपण 1975 मध्ये करण्यात आला..

थूबा इक्विटोरियल लाँच सेंटर केरळ राज्यामध्ये आहे...

नाग रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र आहे


🔑संरक्षण संशोधन व विकास संस्था (डीआरडीओ)🔑

स्थापना:  1958

उद्देश भारताला संरक्षणाची साधने उपकरणे बनवण्याबाबतीत स्वावलंबी बनवणे.

भारतीय क्षेपणास्त्राचे व ""मिसाईल मॅनचे जनक""  डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांना म्हटले जाते.


🔑ONGC 🔑

ऑइल अँड नॅचरल गॅस कमिशन

स्थापना 1956

उद्देश:  खनिज तेल व नैसर्गिक वायू याचा शोध घेणे

दिग्गोई खनिज तेल केंद्र आसाम राज्यात आहे.

अंकलेश्वर खनिज तेल केंद्र गुजरात येथे आहे.



🔑कोकण रेल्वे🔑

स्थापना :1998

कोकण रेल्वे महाराष्ट्र ,गोवा ,कर्नाटक, केरळ (चार) राज्यातून प्रवास करते..

कोकण रेल्वे वरील सर्वात मोठा बोगदा (कारबुडे) हा असून लांबी (6.5 किमी) आहे..

कोकण रेल्वे वरील सर्वात उंच पूल (पानवल) हा असून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहे .



🔑भारतीय अणुऊर्जा आयोग🔑

स्थापना: 10 डिसेंबर 1948

तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित नेहरू हे होते.

अनुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर होमी भाभा हे होते

अणुऊर्जा आयोगाने 1956 मध्ये भारतातील पहिली अणुभट्टी ""अप्सरा"" कार्यान्वित केली.

Combine & राज्यसेवा 2024 पूर्व: विज्ञान विषय A to Z strategy

विज्ञान विषयाची तयारी करताना लक्षात घ्यायला हवे की हा सर्वात जास्त input द्यावा लागणारा आणि सर्वात कमी output असणार विषय आहे. Combine पूर्व 23 मधील प्रश्न बघता आयोग या विषयातील काही प्रश्न बरेच अवघड विचारताना दिसतो.बरेच जण घाबरून गेले आणि त्यामुळे पेपर चे पुढील सोप्पे प्रश्न पण चुकले.पेपर च्या त्या एक तासात आपली मानसिकता स्थिर ठेवण प्रचंड गरजेचं आहे.त्यामुळे किती जरी अवघड प्रश्न आले तर घाबरायच कारण नाही, इतके अवघड प्रश्न कोणालाच येत नसतात हे लक्षात घ्या.आता तयारी विषयी बोलुयात.एक Basic तयारी करून average गुण तरी या विषयात आपल्याला मिळवता आले पाहिजे.विज्ञान या विषया वर पूर्व परीक्षेत 15 प्रश्न विचारले जातात.त्यातील काही प्रश्न हे विचित्र परंतु काही प्रश्न हे ठरलेल्या topics वर विचारले जातात.PYQ च analysis केल तर आपल्याला कळेल की शेवटी दिलेल्या topics वर भर दिला तर नक्कीच आपण यात साधारण गुण सहज मिळवू शकतो.


👉ज्यांना खूप कमी वेळात जास्त गुण घ्यायचे असतील तर त्यांनी विज्ञानाचे फक्त स्टेट बोर्ड 6 वी ते 10 वी केले आणि त्याजोडीला PYQ analysis+ PYQ info तोंड पाठ जरी केली तरी पुरेस आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये आलेला जर्मन सिल्व्हर चा प्रश्न PYQ होता आणि त्यात 3-4 प्रश्न स्टेट बोर्ड मधून आलेले दिसतात.


👉गट ब मुख्य पेपर-2 आणि गट क मुख्य पेपर-2 मध्ये विचारलेल्या विज्ञानाच्या प्रश्नांचे Analysis ही नक्की करा.संयुक्त पूर्व 23 पेक्षा त्या प्रश्नांची काठिण्य पातळी ही कमी होती.या 2 पेपर मध्ये प्राणी वर्गिकरणावर 4-5 प्रश्न आलेले दिसतात.

✅जीवशास्त्र | Biology:


1.प्राण्याचे वर्गीकरण

2.वनस्पती वर्गीकरण

3. ग्रंथी संप्रेरके आणि विकरे

4. पोषण द्रव्ये

5. रोग लक्षणे आणि चिन्हे (यात जीवाणूजन्य, विषाणूजन्य,कवके,असंसर्ग जन्य यांचा अभ्यास)


✅रसायनशास्त्र | Chemistry 


1. अणू आणि त्याची रचना

2. आवर्तसारणी 

3. मूलद्रव्यांचे वर्गीकरण

4. खनिजे आणि धातुके

5. किरणत्सारीता आणि आण्विक रसायनशास्त्र

6. कार्बनी संयुगे


✅भौतिशास्त्र | Physics 


1.प्रकाश

2.ध्वनी

3.विद्युत धारा

4.ऊर्जा,कार्य व शक्ती

5. गती आणि बल

6. प्रकाश,भिंग,आरसे

7.किरणोत्सारीता 


👉Science चे स्टेट बोर्ड मधील One liner Problems ही चांगले करा.त्यात जे फक्त फॉर्म्युला टाकून एक दोन स्टेप मध्ये सोडवायचे छोटे छोटे problems आहेत बऱ्याचदा तेच आलेले दिसतात.


👉विज्ञान विषय अभ्यासताना मुलभूत संकल्पना समजून घेऊन अभ्यास केला तरच तो विषय समजून गुण येतात.या साठी अभ्यास करताना जी संकल्पना समजली नाही ती youtube वर search करून Video स्वरूपात बघितली तर चांगली लक्षात राहील (उदा.Cell structure).YT वर बऱ्याच channel वर वरील सर्व topics मोफत उपलब्ध आहे. त्याचा अभ्यास करताना नक्कीच फायदा होईल.


🚨सर्वात महत्वाचे........❌

👉बरेच जण मला msg करतात की सर विज्ञानात गुण मिळत नाही,खूप टेन्शन आलंय.जेव्हा त्यांच्याशी बोलणं होत तेव्हा प्रत्यक्षात अस जाणवत की त्यांना मुळात गणितात 8-10 गुण असतात,Polity मध्ये 7-8 गुण असतात. लक्षात घ्या विज्ञान तुमची लीड किती असणारे? हे ठरवणार नाही. ते गणित बुध्दिमत्ता आणि polity ठरवणार आहे.संयुक्त पूर्व 23 मध्ये पूर्व गणित one liner होत.मुलांनी त्यात 18-19 गुण पण घेतले आहेत.

विज्ञानात कमी गुण मिळतात म्हणून आता त्यात PHD च करतो अस ही काही जन ठरवतात.परंतु तस करू नका.त्यात किती जरी अभ्यास केला तरी अमुक अमुक गुण मिळतीलच हे सांगता येत नाही. विज्ञानाचा अभ्यास करण्यापूर्वी स्वतः ला 2 प्रश्न विचारा.

1. मला गणित बुद्धिमातेत किमान 15 पेक्षा जास्त गुण मिळणार आहेत ना? इतका आत्मविश्र्वास आलंय ना?

2. मला Polity मध्ये 12+ गुण मिळणार आहेत ना?


या 2 प्रश्नाची उत्तरे नकारात्मक असतील तर पहिले 2 विषय focus करा. कारण ते predictable आहेत आणि input output ratio ही खूप high आहे.


👉विज्ञानाला घाबरायच काही कारण नाही...

Combine पूर्व 23 ला बरेच जण प्रश्न बघून घाबरून गेले.मुळात त्याच कारण हे आहे की आपल्याला पैकीच्या पैकी गुण मिळवायची मानसिकता.वर सांगितल्या प्रमाणे कमीत कमी वेळात अभ्यास करून Avg गुण मिळवायचे ध्येय ठरवा.जास्त टेन्शन घेऊ नका.

बाकी गणित,polity,Geo,Eco,His आहेच score करायला.💯


MPSC Combine Syllabus 2025

1) इतिहास – आधुनिक भारताचा विशेषत: महाराष्ट्राचा इतिहास.

2) भूगोल – महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश- रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

3) अर्थव्यवस्था –

  • भारतीय अर्थव्यवस्था – राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.
  • शासकीय अर्थव्यवस्था – अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

4) चालू घडामोडी – जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

5) राज्यशास्त्र

6) सामान्य विज्ञान – भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), प्राणिशास्त्र (Zoology), वनस्पतीशास्त्र (Botany), आरोग्यशास्त्र (Hygiene).

7) अंकगणित – बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी इत्यादी

8) बुध्दिमापन चाचणी – उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

MPSC Group B & Group C Combine Mains Syllabus 2023

MPSC Combine Mains : Paper 1

पेपर क्रमांक – 1 (मराठी, इंग्रजी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

1) मराठी : सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.

2) इंग्रजी : Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.

MPSC Combine Mains : Paper 2

पेपर क्रमांक – 2 (सामान्य क्षमता चाचणी या विषयामध्ये खालील घटक/ उपघटकांचा समावेश असेल.)

1) सामान्य बुध्दिमापन व आकलन : उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

2) चालू घडामोडी : जागतिक तसेच महाराष्ट्रासह भारतातील.

3) अंकगणित व सांख्यिकी

4) माहितीचा अधिकार अधिनियम 2005 (as updated) व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

5) भारतीय संघ राज्यव्यवस्था, भारतीय राज्यघटना, स्थानिक स्वराज्य संस्था, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ व विधीमंडळ इत्यादी :

घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्ट्ये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कर्तव्ये, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य व कर्तव्ये, विधी समित्या इत्यादी

6) आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास :

सामाजिक व आर्थिक जागृती (१८८५-१९४७), महत्वाच्या व्यक्तींचे कार्य, समाज सुधारकांचे कार्य, स्वातंत्र्यपूर्व भारतातील सामाजिक जागृतीतील वर्तमानपत्रे, शिक्षणाचा परिणाम स्वातंत्र्यपूर्व काळातील इतर समकालीन चळवळी, राष्ट्रीय चळवळी

7) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल :

महाराष्ट्राचा व भारताचा प्राकृतिक (Physical) भूगोल, मुख्य प्राकृतिक (Physiographic) विभाग, हवामान शास्त्र (Climate), पर्जन्यमान व तापमान, पर्जन्यातील विभागवार बदल, नद्या, पर्वत व पठार, विविध भुरूपे, राजकीय विभाग, प्रशासकीय विभाग, नैसर्गिक संपत्ती- वने व खनिजे, मानवी व सामाजिक भूगोल, लोकसंख्या, लोकसंख्येचे स्थानांतर (Migration of Population) व त्याचे उगम (Source) आणि इष्टस्थानावरील (Destination) परिणाम, ग्रामीण वस्त्या व तांडे, झोपडपट्ट्या व त्यांचे प्रश्न.

पर्यावरण – मानवी विकास व पर्यावरण, पर्यावरणपूरक विकास, नैसर्गिक साधनसंपत्तीचे संधारण विशेषतः वनसंधारण, विविध प्रकारची प्रदूषणे व पर्यावरणीय आपत्ती, पर्यावरण संवर्धनात कार्यरत असलेल्या राज्य / राष्ट्र/ जागतिक पातळीवरील संघटना / संस्था इत्यादी.

8) सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान :

  • अ) भौतिकशास्त्र (Physics)
  • ब) रसायनशास्त्र (Chemistry)
  • क) प्राणीशास्त्र (Zoology)
  • ड) वनस्पतीशास्त्र (Botany)
  • इ) दूर संवेदन, हवाई व ड्रोन छायाचित्रण, भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन (Remote Sensing, | Aerial and drone photography, Geographic Information System (GIS) and it’s application etc.)
  • फ) माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान (Information and communication technology.)

9) अर्थव्यवस्था व नियोजन, विकास विषयक अर्थशास्त्र :

समग्रलक्षी अर्थशास्त्र

  • १.१ समग्रलक्षी अर्थशास्त्र
  • १.२ वृद्धी आणि विकास
  • १.३ सार्वजनिक वित्त
  • १.४ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि आंतरराष्ट्रीय भांडवल

भारतीय अर्थव्यवस्था

  • २.१ भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय अर्थव्यवस्थेची आव्हाने व आर्थिक सुधारणा
  • २.२ भारतीय शेती व ग्रामीण विकास
  • २.३ सहकार
  • २.४ मौद्रिक व वित्तीय क्षेत्र
  • २.५ सार्वजनिक वित्त आणि वित्तीय संस्था
  • २.६ उद्योग व सेवा क्षेत्र
  • २.७ पायाभूत सुविधा विकास
  • २.८ आंतरराष्ट्रीय व्यापार आणि भांडवल
  • २.९ महाराष्ट्राची अर्थव्यवस्था

रासायनिक गुणधर्मानुसार अग्निजन्य खडकांचे प्रकार :



🔘आम्लधर्मीय खडक : 

आम्लधर्मीय अग्निजन्य खडकात सिलिकाचे प्रमाण ८० टक्क्य़ांपर्यंत असते. अ‍ॅल्युमिनियम, मॅग्नेशियम व चुना यांचे प्रमाण २० टक्क्य़ांपर्यंत असते. हे खडक वजनाने हलके असून त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. घट्ट लाव्हारसापासून त्याची निर्मिती होत असल्याने या खडकांची उंची जास्त, पण विस्तार कमी असतो. ग्रॅनाइट हे या प्रकारच्या खडकांचे उत्तम उदाहरण आहे.


🔘अल्कधर्मीय खडक : 

या प्रकारच्या अग्निजन्य खडकात ४०% सिलिका व ४०% मॅग्नेशियमचे प्रमाण असते. आयर्न ऑक्साइड व इतर पदार्थ २०% असतात. या खडकाचा रंग काळा असून त्याची झीज लवकर होते. बेसॉल्ट हे याचे उदाहरण आहे. पातळ लाव्हारसापासून हे खडक तयार होत असल्याने भूपृष्ठावर दूरवर पसरलेले असतात.


🔶अग्निजन्य खडकांचे गुणधर्म :

* अग्निजन्य खडकातील स्फटिक गोलाकार नसतात. निरनिराळ्या आकारांचे स्फटिक अनियमित स्वरूपाचे, एकसंध झालेले असतात.

* हे खडक अवाढव्य असून कठीण असतात. त्यांच्यामध्ये थर आढळत नाहीत, परंतु जोड असतात.

* या खडकांमध्ये छिद्र नसते. त्यात पाणी मुरत नाही.

* अग्निजन्य खडकांमध्ये प्राण्यांचे किंवा वनस्पतींचे अवशेष सापडत नाहीत, परंतु अनेक प्रकारची खनिजे आढळतात.

वनांचे प्रकार


🔸भारतीय वनांचे पुढीलप्रमाणे पाच प्रकारांत वर्गीकरण केले जाते.

1)उष्णप्रदेशीय सदाहरित वने:

--250 से.मी पेक्षा अधिक पावसाच्या भागात सदाहरित वने आढळतात.

◾️प्रमुख वृक्ष:महोगणी,रोजवूड,बिशपवुड,रबर,आंबा,जांभूळ,शिसव, साल,हिरडा,बांबू,वेत.

🔺उपयोग:इमारती,जहाज बांधणी इत्यादीसाठी.



2)उष्ण परदेशीय पानझडी वने:

--'मोसमी वने' या नावेही ओळखली जाणारी हि वने 200 से.मी.पर्यंत पाऊस असणाऱ्या मधप्रदेश,बिहार,ओरिसा,महाराष्ट्र या राज्यात आढळतात.

▪️उष्ण कोरड्या हवेत बाष्पीभवन टाळण्यासाठी हे वृक्ष पाने गाळतात.

◾️प्रमुख वृक्ष:साल,साग,पळस, सिसंम, खैर,अर्जुन,मोह,पिंपळ,अंजन,धावडा,चंदन,किंजल,कुंभी,बांबू.

🔸उपयोग: जहाजबांधणी,रेल्वे डबे,खेळणी इत्यादींसाठी.


3)उष्ण प्रदेशीय काटेरी वने व झुडपे:

--50 ते 75 से.मी.पावसाच्या प्रदेशात कच्छ, सौराष्ट्र,राजस्थान,पंजाब,हरियाणा,आणि महाराष्ट्रातील कमी पावसाच्या प्रदेशात हि वने आढळतात.

◾️प्रमुख वृक्ष: बाभूळ,सालाई, निवडुंग,हिवर, बोर,केतकी,नागफणी,यासारखी काटेरि झुडपे या वनात आढळतात.


4)पर्वतीय वने:

--120से.मी. पेक्षा अधिक पावसाच्या काश्मीर,उत्तराखंड,हिमाचल प्रदेश या राज्यांच्या उंच पर्वतीय भागात हि वने आढळतात.

🔸प्रमुख वृक्ष: पाइन,ओक,चेस्टनट, स्पृस,देवदार,फर, पोपलेर, बर्रच, मॅपल.

🔸उपयोग: लाकूड मऊ व वजनाने हलके असल्याने त्यापासून आग्कड्या, कागदाचा लगदा,कलाकुसरीच्या वस्तू बनविल्या जातात.


5)समुद्रकाठची वने: 

--किनाऱ्यावरील त्रिभुज प्रदेशात हि वने दाटीवाटीने आढळतात.

--पश्चिम बंगालमधील सुंदरबन,ओडिशा,आंध्रप्रदेश,तामिळनाडू,या राज्यांच्या किनारी प्रदेशात हे वृक्ष वाढतात.

🔸उपयोग:

1)बिहार,ओडिशा,मध्य प्रदेश या राज्यातू  लाखेचे उत्पादन होते.

2)लाखेचा उपयोग औषधे,रंग,ग्रोमोफोन रेकॉर्ड ,बांगड्यानिर्मिती अशा अनेक उदोगात केला जातो.

3)बाभळीची साल कातडी कमावण्यासाठी व औषधे बनविण्यासाठी उपयुक्त असते.




          🌷वन्य प्राणी🌷


➡️आसाम,केरळ,कर्नाटकच्या जंगलात हत्ती आढळतात.

➡️कच्छच्या रन: चिंकारा,काळवीट,जंगली गाढव,उंट.

➡️राजस्थानचे वाळवंट: लाल कोल्हा,जंगली मांजर.

➡️राजस्थानच्या मैदानात भारतीय रानकोंबडा, खरुची,गिधाड,गरुड,बहिरी ससाणा,मोर हे पक्षी आढळतात.

➡️पश्चिम बंगाल व आसाममध्ये - एकशिंगी गेंडा.

➡️सौराष्ट्रातील जुनागड गिरच्या रानात: सिंह.

➡️प.बंगालमधील सुंदरबानंत : वाघ हे प्राणी आढळतात.


नसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती

♍️जग : वनसंपत्ती♍️ 

💠 उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.


💠 मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.


💠 समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.


💠 सचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.


♍️जग : पशुसंपत्ती ♍️

💠 समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.


💠 उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.


💠 परमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.


💠 परमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,


💠परमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.


💠परमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत


♍️जग : खनिजे व ऊर्जासाधने ♍️

💠 लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.


💠मगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.


💠 बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.


💠 जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.


💠 तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी


💠 चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.


💠 सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला


💠 कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.


💠निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.


💠 करोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.


💠शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश


💠 गधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.


💠 खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.


💠 नसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.


💠 दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.


💠 हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.


♍️जग : शेती ♍️

💠गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश


💠 तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश


💠मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश


💠जवारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.


💠 बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.


💠 डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,


💠सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.


💠 भईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.


💠खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,


💠 पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.


💠 बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.


💠 सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,


💠 चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,


💠 कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,


💠कशर - स्पेन, भारत, इराण.


💠 कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,


💠 कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.


💠 ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.


💠 तबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,


💠 रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.


💠 ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.


💠 फले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.


११ सप्टेंबर २०२५

चालू घडामोडी :- 10 सप्टेंबर 2025


◆ बहुपक्षीय लष्करी सराव ZAPAD 2025 रशियातील निझनी येथे आयोजित करण्यात आला होता.

◆ छत्तीसगड सरकारने आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनच्या मदतीने सर्व जिल्हा कारागृहांमधील कैद्यांसाठी योग आणि सुधारणा उपक्रम सुरू केले आहेत.

◆ केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी बेंगळुरू येथे 2025 च्या अंतराळावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन केले.

◆ 2025 च्या आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषदेचा विषय "जागतिक प्रगतीसाठी जागेचा वापर: नवोन्मेष, धोरण आणि विकास" आहे.

◆ युनायटेड किंग्डम इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्सिंग ब्रिज (UKIIFB) हा लंडन शहर आणि भारतातील नीती आयोग संस्थेचा संयुक्त उपक्रम आहे.

◆ CAFA (मध्य आशियाई फुटबॉल असोसिएशन) नेशन्स कप 2025 मध्ये भारताने ओमान देशाला हरवून कांस्यपदक जिंकले.

◆ भारतीय लष्कराच्या पश्चिम कमांडकडून 'ऑपरेशन राहत' अंतर्गत पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधील पूरग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

◆ दरवर्षी 10 सप्टेंबर दिवशी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो.

◆ जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन 2024 ते 2026 पर्यंतची थीम "आत्महत्येवरील कथन बदलणे" आहे.

◆ इंजिनिअर्स इंडिया लिमिटेडने (EIL) आसाममधील नुमालीगढ येथे भारतातील पहिल्या बांबू-आधारित बायोरिफायनरी प्रकल्पाचे यांत्रिक कार्य यशस्वीरित्या पूर्ण केले आहे.

◆ महाराष्ट्राने सप्टेंबर 2025 मध्ये स्टार्टअप, उद्योजकता आणि नवोन्मेष धोरण सुरू केले आहे.

◆ केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य एम. सिंधिया यांनी दुबईतील 28 व्या युनिव्हर्सल पोस्टल काँग्रेसमध्ये UPI-UPU इंटिग्रेशन प्रोजेक्ट लाँच केला.

◆ बिहार सरकारच्या कला, संस्कृती आणि युवा विभागाने मुख्यमंत्री गुरु-शिष्य परंपरा योजना सुरू केली आहे.

◆ केरळमधील पलक्कड येथील अनिवासी भारतीय उद्योगपती युनुस अहमद यांना कॅमल इंटरनॅशनल अवॉर्ड 2025 मिळाला आहे. [ते मिडल ईस्ट डॉटस्पेस कोवर्किंगचे कार्यकारी संचालक आहेत.]

 माहिती संकलन :- Avinash Chumble