20 August 2025

Mpsc pre exam samples question


1) सिंधू संस्कृतीतील लोकांनी _______ पाळलेला होता किंवा नाही या बद्दल शंका आहेत.

 A. कुत्रा

 B. घोडा✍️

 C. हत्ती

 D. ऊंट.

____________________________

2) कोणाचे सुप्रसिद्ध आत्मचरित्र पुढील विधानाने सुरू होते ?

विशेषतः भारतात, सुखवस्तू कुटुम्बाचे एकुलते एक चिरंजीव बिघडण्याची शक्यता अधिक असते.”

 A. जवाहरलाल नेहरू✍️

 B. मोहनदास करमचंद गांधी

 C. नसीरूद्दीन शहा

 D. जे.आर.डी. टाटा.

____________________________

3) विद्युतचुंबकीय लहरींची पुढीलपैकी कोणती उदाहरणे आहेत ?
अ. दूरदर्शन लहरी

ब. अतिनील किरणे

क. क्ष-किरणे

ड. सूर्यप्रकाश किरणे

 A. अ, ब आणि क

 B. अ, क आणि ड

 C. अ, ब आणि ड

 D. अ, ब, क आणि ड. ✍️


____________________________

4) अभ्रक कपड्यांच्या इस्त्रीत वापरळा जातो. यासंदर्भात पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

अ. अभ्रक विजेचा सुवाहक आहे.

ब. अभ्रक उष्णतेचा सुवाहक आहे.

 A. फक्त अ

 B. फक्त ब✍️

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.

____________________________

5) पुढील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

अ. अणु अंक म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्सची संख्या.

ब. अणु वस्तुमान म्हणजे अणु केंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या

 A. फक्त अ

 B. फक्त ब

 C. दोन्ही अ आणि ब

 D. दोन्ही नाहीत.✍️

____________________________

6) एका मिनिटात मूत्रपिंडातून किती रक्त वाहते ?

 A. 1 लीटर✍️

 B. 0.75 लीटर

 C. 0.50 लीटर

 D. 0.25 लीटर.

____________________________

7) 'बंडल ऑफ हिज़' (His) जे जाळे

 A. संपुर्ण हृदयात पसरलेल्या मज्जातंतू चे असते

 B. संपुर्ण हृदयात पसरलेल्या स्नायूतंतू चे असते

 C. फक्त हृदयातील जवनिका (वेंट्रिकल) मध्ये पसरलेल्या स्नायूतंतूचे असते✍️

 D. हृदयातील जवनिका मध्ये पसरलेल्या मज्जातंतू चे असते.

____________________________

8) जस अशी रासायनिक अभिक्रिया होत रहाते वेळेनुसार तिचा वेग ________ .

 A. मंदावतो✍️

 B. वाढतो

 C. बदलत नाही

 D. खूप वेगाने वाढतो.

____________________________

9) नैसर्गिक रबर हा एक _________ चा पॉलिमर आहे.

 A. प्रोपीन

 B. आइसोप्रीन✍️

 C. फॉर्माल्डिहाइड

 D. फिनॉल.

____________________________

10) खालीलपैकी कोणता पिष्ठमय पदार्थ डायसँकैराइड आहे ?

 A. ग्लुकोज

 B. फ्रक्टोज

 C. सुक्रोज✍️

 D. सेल्युलोज.



◾️कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्ली येते नेण्यात आली ?

A. लॉर्ड डलहौसी
B. लॉर्ड रिपन
C. लॉर्ड कर्झन
D. लॉर्ड हार्डिंग II ☑️


◾️रपया नावाचे नाणे भारतात प्रथम जारी करणारे कोण होते?

A. अकबर
B. अलेक्झांडर लोदी
C. शेरशाह सुरी ☑️
D. बल्बन

◾️मट्टूर धरण - कोणत्या नदीवर बांधले आहे?

A. कृष्णा
B.कावेरी☑️
C. नर्मदा
D. तुंगभद्रा


◾️राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना कधी केली?

A. 1815
B. 1812
C. 1828 ☑️
D. 1830


 ◾️नॉर्वे ची राजधानी कोठे आहे?

A. ओस्लो ☑️
B. पेरिस
C. वॉर्न
D. लिस्बन

Q-1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग

Q-2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा

Q-3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य

Q-4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)

Q-5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी

Q-6) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी

Q-7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ

 Q-8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र

Q-9)  देशातील घनकचर्‍यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे

Q:-10) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड

मौर्यकालीन भारत :

 🔴मौर्य साम्राज्याची स्थापना :

⚫️नंद घराण्यातील शेवटचा राजा धनानंद हा अत्यंत जुलमी होता.

🟤 त्याने चाणक्य नावाच्या ब्राम्हण व्यक्तीचा भर दरबारात अपमान केला.

🟢त्याचा बदला म्हणून आर्य चाणक्यने चंद्रगुप्त मौर्याच्या नेतृत्वाखाली राजे लोकांना एकत्र करून धनानंदाचा पराभव केला आणि चंद्रगुप्ताच्या नेतृत्वाखाली मौर्य साम्राज्याची स्थापना केली.


🔴चंद्रगुप्त मौर्य :

⚫️चंद्रगुप्त मौर्य हा मौर्य साम्राज्याचा संस्थापक असून भारताचा पहिला सम्राट होय. 

🟤त्याने आपल्या राज्याचा विस्तार काबूल, कंदाहार, हेरात ते पश्चिमेकडील सौराष्ट्रपर्यंत आपल्या राज्याचा विस्तार केला होता.

🟢बिहारमधील पाटलीपुत्र (पाटणा) ही त्याच्या राज्याची राजधानी होती.

🔵ग्रीकचा राजा सेल्युकस निकोटरने आपला राजदूत म्हणून मेगॉस्थनिस यास राजदूत म्हणून चंद्रगुप्ताच्या दरबारी पाठविले होते.

🟤 त्यांने मेगॉथिसने तत्कालीन परिस्थितिचे वर्णन इंडिका नावाच्या ग्रथांत केले होते.

🔴चंद्रगुप्ताने आपला मुलगा बिंदुसार याचेकडे राज्य सोपवून संन्यास घेतला.

⚫️ त्याचे श्रवणबेळगोळा येथे निधन झाले.

🟢बिंदुसार नंतर मौर्य वंशात सम्राट अशोक हा पराक्रमी राजा आला.



🔴सम्राट अशोक :

⚫️चंद्रगुप्तानंतर मौर्य साम्राज्यातील सम्राट अशोक हा दूसरा पराक्रमी राजा होय.

🟤त्याने पूर्वेस बंगालचा उपसागर ते पश्चिमेस अरबी समुद्र, वायव्येस काबूल नदीपर्यंत आणि उत्तरेस नेपाळ ते दक्षिणेस कावेरी नदीपर्यंत मगध साम्राजाच्या विस्तार केला होता.

🟤कलिंगच्या युद्धाच्या घटनेमुळे सम्राट अशोकाच्या जिवनास वेगळेच वळण लागले.

🔴कलिंग युद्ध (इसवी सन पूर्व 261) :

⚫️सम्राट अशोकाने साम्राज्य विस्ताराच्या उद्देशाने कलिंगवर स्वारी केली.

🟤या युद्धात भयंकर रक्तपातानंतर अशोकाला विजय मिळाला.

🔵या घटनेमुळे व्यथित होवून अशोकाने पुढे युद्ध न करण्याचा निर्णय घेतला आणि बौद्ध धर्माचा स्विकार केला.



🔴बौद्ध धर्माचा प्रसार :

⚫️बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाल्यामुळे अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाला.

🟤बौद्ध धर्माच्या प्रसारातील पाटलीपुत्र येथे बौद्धधर्म परिषद बोलविण्यात आली होती.

🟢जागोजागी शिलालेख आणि स्तंभ उभे केले सांची बौद्ध स्तूप व अशोक स्तंभ याच काळात उभारले गेले.

🔵आपली मुलगी संघमित्रा आणि मुलगा महेंद्र यास श्रीलंकेस बौद्ध धर्माच्या प्रसाराकरिता पाठविले होते.


🔴मौर्यकालीन राज्य व्यवस्था :

🟤मौर्य कालामध्ये राजाला सल्ला देण्याकरिता मंत्रीपरिषद निर्माण करण्यात आली होती.

⚫️जिल्ह्याचा प्रमुख रज्जुक, तालुक्याचा प्रमुख गोप व गावा प्रमुख ग्रामणी म्हणून ओळखला जात असे.

🟢मौर्य कालीन लोकजीवन :

🔴मौर्य काळातील लोकजीवन कृषिप्रधान होते.

🔵 त्याचबरोबर चकाकी असलेली भांडी तयार करणे, नौकाबांधणी, कापड तयार करणे, व्यापार इत्यादी उद्योग भरभराटीस आले होते.

🟢विविध व्यापार्‍यांचे संघ स्थापन करण्यात आले होते, त्यांना श्रेणी असे म्हणत.


🔴मौर्यकालीन कला व साहित्य :

🟤सम्राट अशोकाने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर शिल्पकलेस राजाश्रय दिला.

⚫️यामुळे सारनाथ येथील स्तंब व सांची येथील बौद्ध सतूपासारखे स्मारके बांधली गेली. 

🟢मौर्य काळामध्ये संस्कृत भाषेबरोबर पाली आणि अर्धमागधी भाषेत बरेच साहित्य लिहिले गेले.

⚫️चाणक्याचे अर्थशास्त्र, पाणिणीचे व्याकरण आणि बौद्ध धर्मातील त्रिपिटक याच काळात लिहिले गेले.    




पोलीस भरती प्रश्नसंच

 १) कोणती प्रजाती कागदनिर्मितीमध्ये प्रामुख्याने वापरली जाते

A. निलगिरी✔️

B. सागवान

C. देवदार

D. साल


2)  महाराष्ट्रात सहकार तत्त्वावर सर्वात पहिला हातमाग . . .. येथे सुरु झाला

A. सातारा

B. भिंवडी

C. इचलकरंजी✔️

D. मुंबई


३) महाराष्ट्र अभियंात्रिकी संशोधन संस्था मेरी कोठे आहे.

A. नागपूर

B. मुंबई

C. पुणे

D. नाशिक✔️


४) कायमस्वरुपी व हंगामी हिमाच्छादित प्रदेशाच्या दरम्यानचा प्रदेश कोणत्या नावाने ओळखतात.

A. हिमक्षेत्रे

B. हिमटोपी

C. हिमनदी

D. वरीलपौकी नाही✔️


५)  खालीलपौकी कोणत्या राज्यात एरंडीचे उत्पादन अधिक होते

A. गुजरात आणि आंध्र प्रदेश✔️

B. महाराष्ट्र आणि कर्नाटक

C. तामिळनाडू आणि ओरिसा

D. राजस्थान आणि बिहार


६) खालीलपौकी कोणते शहर कृष्णा - पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे

A. कराड

B. कोल्हापूर

C. नरसोबाची वाडी✔️

D. सातारा


७)  महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण . . . . आहे.

A. 0.21✔️

B. 0.25

C. 0.27

D. 0.1


८)  खालील पौकी चंद्रपूर जिल्ह्यातील कोणती आदिवासी जमात केद्र शासनाने अतिमागास जमात म्हणून जाहीर केली

A. कोळंब

B. माडिया गोंड✔️

C. परधान

D. वरील सर्व


९)  खालीलपौकी लोकसख्येच्या दृष्टीने जगातील सर्वात लहान देश कोणता.

A. मोन्ॉको

B. सन म्ॉरिनो

C. चीन

D. व्हॅटिकन सिटी✔️


१०)  . . .. हा ऊसाचा सुधारित वाण क्षारयुक्त जमिनीसाठी शिफारस करण्यात आला आहे

A. को, 76032

B. को. एम 88121

C. को. एम. 0265✔️

D. को. एम. 7125


११)  महाराष्ट्रात दगडी कोळशाचे सर्वात जास्त साठे . . . .येथे आहेत

A. उमरखेड

B. बल्लारपूर

C. कामटी✔️

D. सावनेर


१२)  खालीलपौकी कोण्ेती महाराष्ट्रात विमुक्त जात नाही


A. बेरड

B. रामोशी

C. कैकाडी

D. गारुडी✔️


१३)  पृथ्वीचा केद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो

A. सियाल✔️

B. सायमा

C. निफे

D. शिलावरण


१४)  कोणती नदी अरबी समुद्राला मिळते.

A. तापी✔️

B. कावेरी

C. महानदी

D. कृष्णा


१५)  महाराष्ट्रातील कोणत्या प्रदेशात नौऋत्य मान्सून वा·यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो

A. मराठवाडा

B. कोकण

C. खानदेश

D. विदर्भ✔️


१. वटवाघूळ उडत असताना _ ध्वनी निर्माण करतात.

A) लघु वारंवारतेचा 

B) उच्च वारंवारतेचा ✅

C) मध्यम वारंवारतेचा

D) यापैकी नाही


२. कोणते पाणी सर्वात स्वच्छ जल म्हणून ओळखले जाते?

A) विहिरीतील 

B) नळाचे 

C) तलावाचे

D) पावसाचे ✅


३. कुष्ठरोगाच्या जिवाणूंचा शोध कोणत्या शास्त्राज्ञाने लावला?

A) डॉ. हॅन्सन ✅ 

B) डॉ. रोनॉल्ड

C) डॉ. बेरी

D) डॉ. निकेल्सनू


४. ७ कि.मी. = डेकामीटर ?

A) ७० 

B) ७०० ✅

C) ७०००

D) ०.७००


५. खालीलपैकी कोणते औषध क्षयरोगासाठी वापरतात?

A) स्ट्रेप्टोमायसिन ✅

B) पेनिसिलिन

C) डेप्सॉन

D) ग्लोब

भारतीय नदी(INDIAN RIVERS


*1 सिन्धु नदी* :-

•लम्बाई: (2,880km)

• उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट

• सहायक नदी:(तिब्बत) सतलुज, व्यास,

झेलम, चिनाब,

रावी, शिंगार,

गिलगित, श्योक जम्मू और कश्मीर, लेह

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*2 झेलम नदी*

•लम्बाई: 720km

•उद्गम स्थल: शेषनाग झील,

जम्मू-कश्मीर

•सहायक नदी: किशन, गंगा, पुँछ लिदार,करेवाल,

सिंध जम्मू-कश्मीर,

कश्मीर


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*3 चिनाब नदी*

•लम्बाई: 1,180km

•उद्गम स्थल: बारालाचा दर्रे के निकट

•सहायक नदी: चन्द्रभागा जम्मू-कश्मीर

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*4 रावी नदी*

•लम्बाई: 725 km

•उद्गम स्थल:रोहतांग दर्रा,

कांगड़ा

•सहायक नदी :साहो, सुइल पंजाब


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*5 सतलुज नदी*

•लम्बाई: 1440 (1050)km •उद्गमस्थल:मानसरोवर के निकट राकसताल

•सहायक नदी : व्यास, स्पिती,

बस्पा हिमाचल प्रदेश, पंजाब

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*6 व्यास नदी*

•लम्बाई: 470

•उद्गम स्थल: रोहतांग दर्रा •सहायक नदी:तीर्थन, पार्वती,

हुरला


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*7 गंगा नदी*

•लम्बाई :2,510 (2071)km •उद्गम स्थल: गंगोत्री के निकट गोमुख से

• सहायक नदी: यमुना, रामगंगा,

गोमती,

बागमती, गंडक,

कोसी,सोन,

अलकनंदा,

भागीरथी,

पिण्डार,

मंदाकिनी, उत्तरांचल,

उत्तर प्रदेश,

बिहार,

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*8 यमुना नदी*

•लम्बाई: 1375km

•उद्गम स्थल: यमुनोत्री ग्लेशियर

•सहायक नदी: चम्बल, बेतवा, केन,

टोंस, गिरी,

काली, सिंध,

आसन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*9 रामगंगा नदी*

•लम्बाई: 690km

•उद्गम स्थल:नैनीताल के निकट एक हिमनदी से

• सहायक नदी:खोन

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*10 घाघरा नदी*

•लम्बाई: 1,080 km

•उद्गम स्थल:मप्सातुंग (नेपाल)

• सहायक नदी:हिमनद शारदा, करनली,

कुवाना, राप्ती,

चौकिया

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*11 गंडक नदी*

•लम्बाई: 425km

•उद्गम स्थल: नेपाल तिब्बत सीमा पर मुस्ताग के निकट •सहायक नदी :काली गंडक,

त्रिशूल, गंगा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*12 कोसी नदी*

•लम्बाई: 730km

•उद्गम स्थल: नेपाल में सप्तकोशिकी

(गोंसाईधाम)

•सहायक नदी: इन्द्रावती,

तामुर, अरुण,

कोसी

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*13 चम्बल नदी*

•लम्बाई: 960 km

•उद्गम स्थल:मऊ के निकट जानापाव पहाड़ी से

•सहायक नदी :काली सिंध,

सिप्ता,

पार्वती, बनास

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*14 बेतवा नदी*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल: भोपाल के पास उबेदुल्ला गंज के पास मध्य प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*15 सोन नदी*

•लम्बाई: 770 km

•उद्गमस्थल:अमरकंटक की पहाड़ियों से

•सहायक नदी:रिहन्द, कुनहा 


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*16 दामोदर नदी*

•लम्बाई: 600km

•उद्गम स्थल: छोटा नागपुर पठार से दक्षिण पूर्व

•सहायक नदी:कोनार,

जामुनिया,

बराकर झारखण्ड,

पश्चिम बंगाल


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*17 ब्रह्मपुत्र नदी*

•लम्बाई: 2,880km

•उद्गम स्थल: मानसरोवर झील के निकट (तिब्बत में सांग्पो)

•सहायक नदी: घनसिरी,

कपिली,

सुवनसिती,

मानस, लोहित,

नोवा, पद्मा,

दिहांग अरुणाचल प्रदेश, असम

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*18 महानदी*

•लम्बाई: 890km

•उद्गम स्थल: सिहावा के निकट रायपुर

•सहायक नदी: सियोनाथ,

हसदेव, उंग, ईब,

ब्राह्मणी,

वैतरणी मध्य प्रदेश,

छत्तीसगढ़,

उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*19 वैतरणी नदी*

• लम्बाई: 333km

•उद्गम स्थल:क्योंझर पठार उड़ीसा

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*20 स्वर्ण रेखा*

•लम्बाई: 480km

•उद्गम स्थल ;छोटा नागपुर पठार उड़ीसा,

झारखण्ड,

पश्चिम बंगाल

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*21 गोदावरी नदी*

•लम्बाई: 1,450km

•उद्गम स्थल: नासिक की पहाड़ियों से

•सहायक नदी:प्राणहिता,

पेनगंगा, वर्धा,

वेनगंगा,

इन्द्रावती,

मंजीरा, पुरना महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*22 कृष्णा नदी*

•लम्बाई: 1,290km

•उद्गम स्थल: महाबलेश्वर के निकट

•सहायक नदी: कोयना, यरला,

वर्णा, पंचगंगा,

दूधगंगा,

घाटप्रभा,

मालप्रभा,

भीमा, तुंगप्रभा,

मूसी महाराष्ट्र,

कर्नाटक,

आन्ध्र प्रदेश

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*23 कावेरी नदी*

•लम्बाई: 760km

•उद्गम स्थल: केरकारा के निकट ब्रह्मगिरी

•सहायक नदी:हेमावती,

लोकपावना,

शिमला, भवानी,

अमरावती,

स्वर्णवती कर्नाटक,

तमिलनाडु

🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹

*24 नर्मदा नदी*

•लम्बाई: 1,312km

•उद्गम स्थल :अमरकंटक चोटी

•सहायक नदी: तवा, शेर, शक्कर,

दूधी, बर्ना मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*25 ताप्ती नदी*

•लम्बाई: 724km

•उद्गम स्थल: मुल्ताई से (बेतूल)

•सहायक नदी: पूरणा, बेतूल,

गंजल, गोमई मध्य प्रदेश,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*26 साबरमती*

•लम्बाई: 716km

•उद्गम स्थल: जयसमंद झील

(उदयपुर)

•सहायक नदी:वाकल, हाथमती राजस्थान,

गुजरात


🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹


*27 लूनी नदी*

•उद्गम स्थल: नाग पहाड़ •सहायक नदी:सुकड़ी, जनाई,

बांडी राजस्थान,

गुजरात,

मिरूडी,

दख्खन पठार


‘दक्षिण’ या संस्कृत शब्दाचा ‘दख्खन’ हा अपभ्रंश असून, दक्षिण म्हणजे उजव्या हाताकडील अथवा दक्षिण दिशेकडील. यावरूनच दख्खन पठार अशी संज्ञा पडली असावी. या पठाराचा उल्लेख रामायण, महाभारत व मार्कंडेय, मत्स्य, वायु या पुराणांत अनेक वेळा आढळतो.


पहिल्या शतकात एका ग्रीक मार्गनिर्देशकाने लिहिलेल्या पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या ग्रंथात या पठाराचा ‘दचिन बदेस’, तर पाचव्या शतकात आलेला चिनी प्रवासी फाहियान याच्या वृत्तांतात Ta–Thsin असा उल्लेख आढळतो. तसेच अभिजात संस्कृत साहित्यात व कोरीव लेखांत याचा ‘दक्षिण पथ’ असा उल्लेख आढळतो. सातवाहन राजांच्या कारकीर्दीत सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी यास ‘दक्षिणापथपति’ अशी उपाधी दिलेली होती.


दक्षिण पथावर सातवाहन, चोल, चालुक्य, राष्ट्रकूट, देवगिरीचे यादव व होयसळ इ. वंशांचे राज्य होते. तेराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत या पठाराविषयी फार थोडी  माहिती उपलब्ध होती. तथापि पठारावर इतिहासपूर्व काळापासून मानवी वस्ती आहे, याबद्दल पुष्कळ पुरावा मिळतो.

या पठाराच्या सीमेबाबत एकमत नाही. संकुचित अर्थाने उत्तरेकडे सातमाळा टेकड्या व दक्षिणेकडे कृष्णा नदी यांच्यामधील मराठी भाषा बोलली जाणाऱ्या (महाराष्ट्र) प्रदेशासच दख्खन पठार म्हणतात; तर व्यापक अर्थाने नर्मदा किंवा विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडील संपूर्ण भारतीय द्वीपकल्पास दख्खन पठार म्हणतात.


हे पठार भारत वआफ्रिका खंड यांना जोडणाऱ्या प्राचीन ‘गोंडवन भूमी’ चा अवशेषात्मक भाग असावा. या पठाराच्या उत्तरेस सातपुडा पर्वंत असून त्यात १,६७६ मी. उंचीच्या डोंगररांगा आहेत. या रांगांत उगम पावणाऱ्या तापी, नर्मदा या नद्या अरबी समुद्रास मिळतात.


तसेच पूर्वेस व पश्चिमेस अनुक्रमे पूर्व घाट व पश्चिम घाट (सह्याद्री) असून हे घाट पठाराच्या दक्षिण टोकाला येऊन मिळतात. पठाराची सरासरी उंची सु. ६१० मी. असून पठाराचा उतार पूर्वेकडे कमी कमी होत गेला आहे. कृष्णा, गोदावरी आणि कावेरी या पठारावरील प्रमुख नद्या असून त्या पश्चिम घाटात उगम पूर्वेकडे बंगालच्या उपसागरास मिळतात.


पठारावरील हवामान कोरडे असून किनाऱ्यावर उष्ण–दमट तर काही ठिकाणी रूक्ष असते. उन्हाळ्यात तपमान २०° ते ३२° से. च्या दरम्यान असते, तर हिवाळ्यात १०° ते २४° से. पर्यंत असते. नैर्ऋत्य व ईशान्य या दोन्ही मोसमी वाऱ्यांपासून पठारावर पाऊस पडतो.


जास्तीत जास्त पर्जन्यमान पश्चिम घाटावर असून पूर्वेकडे पावसाचे प्रमाण कमी कमी होत जाते. पठार अतिशय टणक, मजबूत आणि स्फटिकमय ग्रॅनाइटी व बेसाल्ट खडकांनी बनले आहे. त्यावरील लाव्हारसाच्या थरांपासून बनलेली मृदा सुपीक आहे.


पठाराचा बराचसा भाग सपाट असून त्यात मधून मधून सपाट माथ्याचे उंचवटे व गोलाकार टेकड्या दिसतात. भूवैज्ञानिक दृष्ट्या हा प्रदेश स्थिर स्वरूपाचा मानला जातो. पठारावर खनिज संपत्ती विपुल असून तीत सोने, दगडी कोळसा, मँगॅनीज व लोखंड यांची धातुके तसेच बॉक्साइट, मोनॅझाइट वाळू इ. खनिजे प्रमुख आहेत.


आतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे

💥 (Combine focus)


▪️कष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा


▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र


▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान


▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी


▪️कष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश


▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश


▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.


▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

भारतातील महत्वाचे धबधबे

१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे. 


२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी 


३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी 


४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी 


५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी 


६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी 


७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी 


८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी

जालियनवाला बाग हत्याकांड



जनरल डायरद्वारा केले गेलेले सामुहिक हत्याकांड


एप्रिल १३, इ.स. १९१९ या दिवशी इंग्रजांच्या भारतावरील राजवटीत ब्रिगेडियर-जनरल रेजिनाल्ड डायर याने अमृतसर येथील जालियनवाला बाग ठिकाणी हे हत्याकांड घडवून आणले. जनरल डायर याच्या हुकुमावरून लष्कराने निशस्त्र लोकांच्या सभेवर रायफलींच्या १,६०० फैरी झाडल्या. या सभेत स्त्रिया आणि पुरूषांसोबत लहान मुलांचाही समावेश होता. अधिकृत सूत्रांच्या हवाल्यातून या हत्याकांडामधे ३७९ लोकांचा मृत्यू झाला. अनाधिकृत सूत्रांनुसार मृतांचा आकडा १,००० 


जालियनवाला बाग सभा


अमृतसर अखंड भारतातील पंजाब राज्यातील एक महत्त्वाचे शहर होते. एप्रिल १० १९१९, रोजी सकाळी एक घोळका अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे जात होता. कारण होते दोन प्रसिद्ध स्वातंत्र्यवीरांच्या सुटकेच्या मागणी, सत्यपाल आणि सैफुद्दीन किचलु, असे २ वीर ज्यांच्या विरुद्ध तडीपार करण्याचा आदेश जारी करण्यात आला होता. ह्या घोळ्क्यावर सैन्याच्या एका तुकडीने बेछूट गोळीबार केला. त्याचे पडसाद त्याच दिवशी उमटले. ब्रिटिश सरकारच्या अस्तित्त्वाची जाणीव करून देण्याऱ्या ईमारतींना आग लावण्यात आली. टाउन हॉल, दोन बॅंकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. गुरखा रेजीमेंटने रेल्वे स्थानकाचा बचाव केला. रेल्वे गोदामाचा एक युरोपीयन रक्षकाला जोरदार मारहाण करण्यात आली, तीन बॅंक कर्मचारी आगीत ठार झाले, तर एका युरोपीयन नागरीकाचा रस्त्यात खून करण्यात आला. एका ब्रिटिश महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण काही भारतीयांनी तिचे प्राण वाचविले. दिवसभर हे थैमान चालू होतेच. ब्रिटिश सैन्याने दिवसभरात केलेल्या गोळीबारात ८-२० स्वातंत्र्य सैनिक धारातीर्थी पडले. ह्या नंतररचे दोन दिवस अमृतसर शांत होते, पण पंजाबमधील इतर भागात मात्र हिंसा चालू होतीच. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ युरोपीयन नागरीक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पन्जाब मध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला.


योगायोग असा की १३ एप्रीला पंजाबी जनतेचा प्रिय सण ’बैसाखी’ पण होता. रिवाजानुसार हिंदू आणि शीख बान्धव सण साजरा करण्यास एकत्र जमले. प्रचंड जनसमुदाय जालीयानवाला बागेत जमला होता. पण मार्शल लॉ मुळे जमावबन्दी लागू होती. पाच किंवा जास्त जणांचा जमाव नियमबाह्य होता.


जालियनवाला बाग हत्याकांड महत्त्वाचे मुद्धे


20 जुलै 1905 रोजी सरकारने बंगालची फाळणी करण्याचा निर्णय जाहीर केला आणि ठिणगी पडली.


सरकारचा दावा असा होता की प्रशासकीय विचारांतून हा निर्णय घेण्यात आला आहे. पण त्यामागे राष्ट्रवादी विचारांच्या बंग जनतेची फाळणी करण्याचा हेतू आहे हे जनतेने ओळखले होते.


16 ऑक्टोबर रोजी कलकत्यात सार्वत्रिक हरताळ पाळण्यात आला व लोकांनी एक दिवस उपोषण केले.


कलकत्यांच्या अनेक रस्त्यांवरुन मिरवणुका निघाल्या व संध्याकाळी प्रचंड सभा झाली. तिला 50,000 लोक हजर होते.


बंगालच्या खेडयापाडयांतून न शहराशहरांतून सभा, मिरवणुका व निदर्शने यांचे पडसाद सतत उमटत होते.


परकीय बनावटीच्या सर्व वस्तुवर बहिष्कार व त्याऐवजी स्वदेशी वस्तूंचा वापर हे या चळवळीचे सूत्र होते.


अनेक ठिकाणी परदेशी कापडाच्या होळया पेटवण्यात आल्या आणि परदेशी कापड विकणार्‍या दुकानांपुढे निदर्शने करण्यात आली.


शाळा, कॉलेजांवर बहिष्कार, न्यायालये व सरकारी नोकर्‍यांचा त्याग असे या असहकार आंदोलनाचे स्वरुप होते, मात्र कार्यक्रमांतील हा भाग परिणामकारकरीत्या अमलात येऊ शकला नाही, परकीय जोखडातून स्वातंत्र्य, अशीही नव्या नेतृत्वाने हाक दिली.


त्याचाच एक परिणाम म्हणजे डिसेंबर 1906 मधील कॉंग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरुन बोलतांना दादाभाई नौरोजींनी स्पष्ट केले की ‘स्वराज्य’ हेच कॉंग्रेसचे उद्दिष्ट आहेत.


खेडयातील आणि शहरातील सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होण्याची प्रेरणा देण्यात नवे नेतृत्व विलक्षण यशस्वी झाले.


विशेषत: विद्यार्थी, महिला आणि शहरी भागातील कार्यकर्ते, मोठया उत्साहाने या आंदोलनात सहभागी झाले, स्वदेशी आणि स्वराज्य या घोषणा लवकरच इतर प्रांतांतही प्रसृत झाल्या.


परदेशी कापडावरील बहिष्काराचे आंदोलन तर अखिल भारतीय पातळीवर संघटित करण्यात आले.


समान सहानुभूती व समान राजकारण या बंधनांनी सारा देश आता एक होऊ लागला.


सरकारने दडपशाहीनेच या आंदोलनास उत्तर दिले. सभांवर बंदी घालण्यात आली.


वृत्तपत्रांचा आवाज दडपून टाकण्यात आला. राजकीय कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. अनेक नेत्यांना परदेशी हद्दपार करण्यात आले आणि विद्यार्थ्यांना मारझोड करण्यात आली.


सरकारने जहालांपासून मवाळांना व हिंदूपासून मुसलमानांना वेगळे काढण्याचे प्रयत्न केले.


जनता आता जागृत झाली होती, पण तिला योग्य अशा संघटनेत बांधण्यात व लढयाला योग्य दिशा देण्यात नवे नेतृत्व अयशस्वी ठरले. उदाहरणार्थ नि:शस्त्र प्रतिकाराची चळवळ प्रत्यक्षात आली नाही.


अखेर लोकमान्य टिळकांना जेव्हा सहा वर्षे काळया पाण्याची शिक्षा झाली.


बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष यांनी राजकारण संन्यास घेतला व लाला लजपत राय परदेशी गेले तेव्हा सरकारला ही चळवळ दडपून टाकणे शक्य झाले.


मोठया जन आंदोलनात परिणामकारक सहभागाची संधी न मिळाल्याने व सरकारी दडपशाहीचा प्रतिकार करण्यास कोणताच बाब न राहिल्याने युवा वर्ग दहशतवादी क्रांतिकारी मार्गाकडे वळला आणि तिरस्करणीय अधिकार्‍यांची हत्या करणे हीच त्यांच्या राजकीय कार्याची पध्दत बनली. अनुशीलन व युगांतर हे त्या काळातील दोन प्रमुख दहशतवादी गट होते.


या क्रांतिकारी दहशतवाद्यांना जनतेच्या पाठिंब्याचा आधार नव्हता व म्हणूनच ती चळवळ फार काळ टिकू शकली नाही. पण राष्ट्रीय चळवळीतील त्यांचेही योगदान मोलाचे आहे.


इसवी सन 1909 पासून 1916 पर्यंत राष्ट्रवादी चळवळ सुप्त स्थितीत होती, पण पहिल्या महायुध्दाच्या काळात भारतीय संस्कृतीचा अभिमान बाळगणार्‍या इंग्रज विदुषी अ‍ॅनी बेझंट यांनी आणि करावासातून मुक्त झालेल्या लोकमान्य टिळकांनी ‘इंडियन होमरुल लीग’ च्या संरक्षणासाठी सनदशीर मार्गाने अखिल भारतीय आंदोलन पुन्हा सुरु केले.


युध्दकाळात परदेशातील क्रांतिकारी कार्यकर्तेही क्रियाशील होते. त्यात अमेरिकेत व कॅनडात स्थापन झालेल्या व पूर्व आणि आग्नेय आशियात शाखा असलेल्या गदर पक्षाचा विशेष उलेख केला पाहिजे.


त्यानेच भारतात सशस्त्र क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न केला.


हत्याकांडाच्या प्रतिक्रिया


भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले.


शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ'डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) यांवर बंदुकितून गोळ्या झाडुन वध केला

सार्क संघटना.



🔰नाव :  Asian Association for Regional Cooperation (SAARC)


🔰सथापना  : ८ डिसेंबर १९८५ 


🔰मख्यालय : काठमांडू, नेपाळ


🔰सदस्यत्व : ८ सदस्य,९ निरिक्षक 

(बांगलादेश, भूतान, भारत, मालदिव, नेपाल, पाकिस्तान, श्रीलंका आणि अफगाणिस्तान)✅


🔰सरचिटणीस : श्री एसाला रुवान वीराकून (01 मार्च 2020 पासुन )


🔰उद्देश : दक्षिण आशियामध्ये आर्थिक व सामाजिक प्रगती  करण्याच्या उद्देशाने तसेच सांस्कृतिक विकास व विकसनशील देशाबरोबर सहकार्य करण्यासाठी 


 🔰एकूण झालेल्या परिषद : १८ शिखर परिषद

(२०१६ मध्ये पाकिस्तान येथे होणारी १९ वी शिखर परिषद भारतासह बांग्लादेश, भूतान, अफगाणिस्तान यांनी बहिष्कार टाकल्याने रद्द )


🔰अमेरिका व चीन खालोखाल सार्क सदस्य राष्ट्राची एकत्रित अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावर असून जगातील लोकसंख्येच्या २१ टक्के लोक सार्क क्षेत्रामध्ये राहतात. 


🔰६ जानेवारी २००६ रोजी सार्क सदस्य राष्ट्रांनी प्रादेशिक व्यापाराला चालना देण्यासाठी दक्षिण आशियाई मुक्त व्यापार कराराची निर्मिती केली.

19 August 2025

असहकार चळवळ

◾️ 1920 सालच्या नागपूर अधिवेशनात राष्ट्रीय सभेने गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीच्या कार्यक्रमास मान्यता दिली.


➡️ तयात पुढील बाबींचा समावेश होता.

1) सरकारी नोकर्‍या व पदव्या यांचा त्याग करणे.

2) सरकारी सभा समारंभावर बहिष्कार टाकणे.

3) सरकारी शाळा- महाविदयांलयातून मुलांना काढून घेऊन त्यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थांत दाखल करणे

4) सरकारी कोर्ट्सकचेर्‍यांवर बहिष्कार घालणे.

5) प्रांतिक निवडणुकांवर बहिष्कार टाकणे.

6) परदेशी मालावर बहिष्कार टाकणे व स्वदेशी मालाचा वापर करणे.

7) दारूबंदीचा प्रचार व दारूच्या दुकानांसमोर निदर्शने करणे.


◾️ असहकार आंदोलनास भारतीय जनतेचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

◾️  शासनाने दडपशाहीचे धोरण स्वीकांरताच गांधीजींनी सविनय कायदेभंगाचे आंदोलन सुरू करण्याचा निर्धार व्यक्त केला.

◾️ चौरीचौरा येथे चळवळीला हिंसक वळण लागल्याने ऐन जोमात आलेली असहकारची चळवळ मागे घेण्याचा निर्णय गांधीजीनी 5 फेब्रुवारी, 1922 रोजी घेतला.


🟢 विधायक कार्यक्रम :-

◾️ गांधीजीनी असहकाराच्या चळवळीला विधायक कार्यक्रमाची जोड दिली.

◾️ तयामुळे राष्ट्रीय चळवळ ग्रामीण भागात पोचली व तिला जनाधार प्राप्त झाला.

18 August 2025

वाचा :- भारतीय संविधानाबद्दल 10 महत्वाच्या गोष्टी

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २६ नोव्हेंबर १९४९ रोजी देशाला राज्यघटना प्रदान केली.म्हणून जाणून घेऊयात संविधानाबद्दल १० महत्त्वाच्या गोष्टी...


 १. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस का साजरा केला जातो? 

२६ नोव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. कारण २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संसदेत संविधानाला मान्यता देण्यात आली होती.


 २. संविधानाच्या निर्मितीसाठी किती वेळ लागला?

- संविधान सभेनं दोन वर्षे ११ महिने अठरा दिवस या दीर्घ कालावधीत संविधान पूर्ण केलं.


३. कसं लिहीलं गेलं संविधान?

-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.


४. संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.


 ५. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?

-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.


६. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?

-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.


 ७. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?

- भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.


 ८. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?

-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.


 ९. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?

- भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.


१०.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?

-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.


17 August 2025

कंपनीच्या राज्यसत्तेत गाजलेले बंगालचे गव्हर्नर जनरल

1. लॉर्ड क्लाईव्ह (1756 ते 1772) :-

भारतात इंग्रजी सत्तेचा पाया रोवण्याची महत्वपूर्ण कामगिरी लॉर्ड क्लाईव्हने केली. लॉर्ड क्लाईव्हच्या काळातील घटना.
प्लासिचे युद्ध :- जून 1757 रोजी प्लासीच्या मैदानात सिराजउदौला व कंपनीच्या सेनेत युद्ध झाले. या युद्धात लॉर्ड क्लाईव्हने सिराजउदौलाचा पराभव करून बंगालवर ताबा मिळविला.
बक्सरची लढाई :- बंगालचा नवाब मीरकासीम, आयोद्धेच नवाब शुजाउदौला व दिल्लीचा बादशहा शहाआलम यांचा सन 1764 मध्ये बक्सर येथे कंपनीच्या सेनेने पराभव केला.
अलाहाबादचा तह :- बक्सरच्या युद्धानंतर ऑगस्ट 1765 मध्ये लॉर्ड क्लाईव्हने अलाहाबाद येथे मोघल बादशहा शहाआलम सोबत तह केला. या तहानुसार बंगाल प्रांतात दुहेरी राजकीय व्यवस्था सूरु झाली.

2. सर वॉरन हेस्टिंग (सन 1772 ते 1773) :-

सर वॉरन हेस्टिंगने बंगाल प्रांतात न्यायविषयक सुधारणा केल्या व विल्यम जोन्सच्या सहकार्याने सन 1783 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या संस्थेची स्थापना केली.
भारतातील पहिले वृत्तपत्र बंगाल गॅझेट (1781) याच काळात सुरू झाले.

3. लॉर्ड कॉर्नवॉलीस (1786 ते 1793) :-

लॉर्ड कॉर्नवॉलीसला भारतीय प्रशासकीय सेवेचा व कायमधारा पद्धतीचा जनक असे सुद्धा म्हणतात.

4. लॉर्ड वेलस्ली (1798 ते 1805) :-

लॉर्ड वेलस्लीला तैनाती फौजेचा जनक म्हणतात. त्याने तैनाती फौजेच्या माघ्यमातून भारतात कंपनी सत्तेचा विस्तार केला.
तैनाती फौजेच्या ही कल्पना सर्वप्रथम सन 1899 मध्ये निझामाने स्विकारली.
सन 1802 मध्ये दुसर्‍या बाजीरावने वसईच्या तहातंर्गत तैनाती फौजेचा स्विकार केला.

5. मार्क्विस ऑफ हेंस्टीग्ज (सन 1813 ते 1823) :-

मार्क्विस ऑफ हेस्टिंगने नेपाळवर स्वारी करून हिमालयातील तराईचा विस्तृत प्रदेश, कुमाऊम गढवाल व सिक्किम प्रांत, सिमला, नैनीताल व मसूरी सारखी थंड हवेची ठिकाणे जिंकून कंपनीच्या साभ्राज्यात सामील केली.

जून 1818 मध्ये एलफिन्स्टनच्या सेनेने कोरेगावाच्या लढाईत बाजीराव पेशव्याच्या सेनेचा निर्णायक पराभव करून पेशवेशाही खालसा केली.

6. लॉर्ड विल्यम बेंटीक (1823 ते 1833) :-

लॉर्ड विल्यम बेंटिकने सन 1829 मध्ये सती प्रथा बंद कायदा पास केला.
भारतीय लोकांच्या शिक्षणाकरिता इंग्रजी भाषा ही शिक्षणाचे माध्यम राहील असे जाहीर केले.

16 August 2025

सामान्यज्ञान प्रश्नोत्तरे इतिहास (भारत)(History)

*1. १८५७ च्या उठावाच्या वेळी झाशी येथे कोणाचे राज्य होते?*

राणी लक्ष्मीबाई 

पेशवे नानासाहेब ✅

बहादूरशहा जफर

ईस्ट इंडिया कंपनी


*2. न्यायमूर्ती रानडे यांनी कोणत्या उद्देशाने सामाजिक परिषदेची स्थापना केली?*

राजकीय प्रश्नावर चर्चा करण्याकरिता 

सामाजिक प्रश्नाला राजकीय व्यासपीठ मिळवून देण्याकरिता ✅

सामाजिक प्रश्नावर चर्चा करण्याकरिता

भारतीय लोकांच्या आर्थिक प्रश्नाचा अभ्यास करण्याकरिता 


*3. खालीलपैकी ............. येथे १८५७ चा उठाव झाला नव्हता?*

अलाहाबाद 

दिल्ली

मद्रास ✅

रामनगर


*4. ……… या संतांचे गुरू जनार्दन स्वामी होते?*

संत ज्ञानेश्वर 

संत एकनाथ ✅

संत तुकाराम

संत नामदेव


*5. १९१९ मध्ये सातारा जिल्याह्यात रयत शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?*

कर्मवीर वि.रा. शिंदे 

कर्मवीर भाऊराव पाटील ✅

छत्रपीत शाहू महाराज

भास्करराव जाधव


*6. सत्तीची चाल बंद व्हावी म्हणूण बंगाल प्रांतात कोणी आंदोलन सुरु केले होते?*

राजा राममोहन रॉय ✅ 

ईश्वरचंद्र विद्यासागर

व्दारकाप्रसाद टागोर

केशवचंद्र सेन


*7. इंग्लंडप्रमाणे भारतातही पार्लमेंट असावी अशी मागणी कोणी होती?*

लोकमान्य टिळक 

महात्मा गांधी

गोपाळ हरी देशमुख ✅

न्यायमूर्ती रानडे


*8. साता-याचा राजा प्रतापसिंहाने आपला वकील म्हणून इंग्लंडला कोणास पाठविले होते?*

रंगो बापूजी ✅

तात्या टोपे

अजीमुल्ला खान

अहमदशहा 


*9. मद्रास येथे होमरूल लीगची स्थापना कोणी केली?*

लोकमान्य टिळक 

गोपाळ कृष्ण गोखले

डॉ. अॅनी बेझंट ✅

सरोजिनी नायडू


*10. कोणत्या राज्यात नामदेवांची अनेक मंदिरे आहेत?*

मध्य प्रदेश 

बिहार

पंजाब ✅

गुजरात

इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले

◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन

◾️“हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे” – भारतमंत्री बर्कनहेड

◾️सवामी दयानंदाच्या आर्य समाजाचे ”लढऊ हिंदू धर्म”असे वर्णन- भगिनी निवेदिता

◾️राजा राममोहन राय यांच्या सतीविरोधी लढ्याबद्दल ‘मानवतावादी आणि मानवजातीचा सेवक’ असी प्रशांश – बेंथम

◾️“मुर्शिदाबाद हे शहर लंडन शहराइतकेच धनसंपन्न होते” – लॉर्ड क्लाइव्ह

◾️“प्रत्येक वर्षाला कॉंग्रेसचे होणारे तीन दिवसाचे अधिवेशन म्हणजे एक प्रकारचा तमाशाच आहे.” अश्विनीकुमार दत्त.

◾️” भुंकत राहणारे परंतु चावा घेण्यास कचरणारे श्वान किंवा दात नसलेला कागदी वाघ.” असे कॉंग्रेसचे वर्णन – अश्विनीकुमार दत्त.

◾️” कॉंग्रेस हि एक महान रोगाने पछाडलेली संघटना आहे” – अरविंद घोष

◾️” आम्ही आमच्या जोरावर भारताला जिंकून घेतले आहे आणि स्वतःच्या जोरावर तो आमच्या ताब्यात ठेऊ ” – लॉर्ड एल्गिन

◾️” टिळकांना कारावासाची शिक्षा दिल्याबद्दल संपूर्ण राष्ट्र रडत आहे “- सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” बंगालच्या विभाजनाची घोषणा आमच्यावर बॉम्ब गोळ्याप्रमाणे कोसळली. बंगालची फाळणी म्हणजे आमच्या अस्मितेला हेतुपुरस्पर सरकारने दिलेला धका आहे.” – सुरेंद्रनाथ बनर्जी

◾️” कोणतेही हक्क आपणास भिक मागून मिळत नसतात ते तीव्र आंदोलन करून राज्यकर्त्यांकडून हिसकून घेतले पाहिजेत.” – लाला लजपतराय

◾️‘कर्झनची तुलना औरंगजेबशी’ – गोखले

‘ रॅडची(Rand) तुलना अफजलखानाशी ‘ – लोकमान्य टिळक

◾️” आम्हाला न्याय हवा आहे भिक नको” – दादाभाई नौरोजी

◾️“बिपिनचंद्र पाल व अरविंद घोष हे बंगालचे नेते कॉंग्रेसला पुढे खेचण्याचा प्रयत्न करीत होते तर फिरोजशाह मेहता व दिनशा वाच्छा कॉंग्रसला मागे खेचत होते.”- आचार्य जावडेकर

◾️“लखनौच्या करारातूनच पाकिस्तानच्या मागणीची पायाभरणी झाली” – डॉ. मुजुमदार

◾️” कोणत्याही परिणामांचा थोडाही विचार न केलेला करार म्हणजे लखनौ करार.”

 – गारेट ब्रिटीश इतिहासकार.

◾️” अनी बेझंट यांना स्थानबद्ध करून सरकारने अनेक बेझंट निर्माण केले आहेत.” – लॉर्ड मॉनटेग्यु

◾️करांतीकारकांना ‘वाट चुकलेले तरुण’ असे अनी बेझंट यांनी संबोधले.

◾️“गांधीजी राष्ट्रीय आंदोलन मोठ्या जोमाने सुरु करतात, काही काळ या आंदोलनाचे नेतृत्व कुशल रीतीने सांभाळतात; परंतु शेवटी आंदोलन यशस्वी होत असतानाच आपल्या ध्येयाचा विचार न करता ते मधूनच पळ काढतात.” – चित्तरंजन दास.

◾️” एका वर्षात देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची घोषणा करणे म्हणजे एखाद्या लहान मुलाने बोलण्यासारखे आहे.” – सुभाषचंद्र बोस यांची गांधीजींवर टीका.

◾️“देवाने माझे उर्वरित आयुष्य वि. दा. सावरकरांना द्यावे” – वि. रा. शिंदे

◾️“हे स्वराज्यही नव्हे आणि त्याचा पायही नव्हे” टिळकांची मॉटेग्यू चेम्सफोर्ड कायद्यावरील टीका.

◾️“भारतीय विणकरांना मरणाची अवकळा प्राप्त झाली आहे. व्यापार उद्योगाच्या संपूर्ण इतिहासात असे उदाहरण सापडणार नाही. 

भारतीय विणकरांची अस्थींमुळे जणू भारतीय मैदानी प्रदेशाला एकप्रकारची स्मशानकळा आली आहे.” विल्यम बेंटिक

◾️इग्लंडकडे जाणाऱ्या भारतीय संपत्तीचे वर्णन ” लक्ष्मी विलायतेला चालली.” लोकहितवादी

◾️असहकार चळवळ तहकूब केल्याच्या घटनेचे ‘नॅशनल कॅलॅमिटी’ वर्णन सुभाषचंद्र बोस यांनी केले.

◾️सभाषचंद्र बोस यांनी दांडी यात्रेची तुलना नेपोलियनने एल्बाहून परतल्यावर पॅरिसकडे केलेल्या संचालनाशी केली.

◾️“जर ब्रिटीशांनी स्वराज्याचा हक्क फक्त मुस्लिमांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही, फक्त राजपुतांना दिला तरी माझा त्यास विरोध नाही किंवा हिंदुमधील कनिष्ठ वर्गालाच फक्त स्वराज्य बहाल केले तरी त्यासाही माझा प्रत्यवाह नाही” – लोकमान्य टिळक

◾️खान अब्दुल गफार खान यांचे वर्णन “हिंदूंच्या प्रभावाखाली असणारे आणि लढाऊ पाठांनांच्या खच्चीकरणाचे प्रमुख” असे वर्णन – महम्मद आली जिना

◾️1857 चा उठाव हा कामगार सैनिकांचा भांडवलशाही विरुद्ध व जमिंदरांविरूद्धचा उठाव होता – कार्ल मार्क्स

Question bank


1. पहिल्या पंचवार्षिक योजनेत ------ ला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले.

1. व्यापार

2. शेती

3. औद्योगिकरण

4. गुंतवणूक

🅾️उत्तर : शेती


2. धवलक्रांति ----- शी संबंधित आहे.

1. शेती व्यवसाय

2. मत्स्य व्यवसाय

3. दुग्ध व्यवसाय

4. कुकुटपालन व्यवसाय

🅾️उत्तर : दुग्ध व्यवसाय


3. महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो?

1. महाबळेश्वर

2. पंचगणी

3. लोणावळा

4. आंबोली

🅾️उत्तर : आंबोली


4. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहेत?

1. तहसीलदार

2. उपजिल्हाधिकारी

3. जिल्हाधिकारी

4. महसूल आयुक्त

🅾️उत्तर : महसूल आयुक्त


5. सप्टेंबर 2011 मध्ये रशियात झालेल्या बुद्धिबळ वर्ल्डकप स्पर्धेच विजेता कोण?

1. पीटर सविड्लर

2. अलेक्झांडर ग्रीशुक

3. व्हॅसिली इव्हानचूक

4. विश्वनाथ आनंद

🅾️उत्तर : पीटर सविड्लर


6. मुअम्मर गद्दाफी हा कोणत्या देशाचा हुकूमशहा होता?

1. सौदी अरेबिया

2. अफगाणिस्तान

3. लिबिया

4. इराक

🅾️उत्तर : लिबिया


7. केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळाने ठरविल्यानुसार ------ वर्गापर्यंतच्या मुलांना 'मोफत व सक्तीचे शिक्षण' देण्यात येणार आहे.

1. दहावी

2. आठवी

3. बारावी

4. स्नातकीय

🅾️उत्तर : दहावी


8. 2011 मधील अर्जुन पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला?

1. गगन नारंग

2. रामपाल

3. राजेंद्र सिंह

4. जहीरखान

🅾️उत्तर : जहीरखान


9. खालीलपैकी कोणते राष्ट्र हे BRICS चे सदस्य नाही?

1. ब्रिटन

2. रशिया

3. भारत

4. दक्षिण आफ्रिका

🅾️उत्तर : ब्रिटन


10. मुंबई बंदरातील वाहतूकीचा भार कमी करता यावा म्हणून ------ हे बंदर विकसित करण्यात आलेले आहे.

1. हल्दिया

2. न्हावा-शेवा

3. कांडला

4. मार्मागोवा

🅾️उत्तर : न्हावा-शेवा


11. जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय ----- येथे आहे.

1. जिनिव्हा

2. पॅरिस

3. न्यूयॉर्क

4. रोम

🅾️उत्तर : जिनिव्हा


12. ------ येथे डॉ. आंबेडकरांनी मंदिर प्रवेश सत्याग्रह केला.

1. महाड

2. औरंगाबाद

3. नाशिक

4. मुंबई

🅾️उत्तर : नाशिक


13. भारतीय प्रमाणवेळ (I.S.T.) ही ग्रीनिच प्रमाणवेळेपेक्षा (G.M.T.) ----- तासांनी पुढे आहे.

1. अडीच

2. तीन

3. साडे चार

4. साडे पाच

🅾️उत्तर : साडे पाच


14. ------ यांना महाराष्ट्राचे 'मार्टिन ल्युथर' म्हणतात.

1. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

2. लोकहितवादी

3. महात्मा फुले

4. न्या. महादेव गोविंद रानडे

🅾️उत्तर : महात्मा फुले


15. पेट्रोलमध्ये मिसळलेल जाणारे इथेनॉल भारतात कशापासून बनवतात?

1. द्राक्ष

2. मका

3. उस

4. डिझेल

🅾️उत्तर : उस


16. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही?

1. नीळ

2. भात फक्त

3. गहू फक्त

4. भात व गहू

🅾️उत्तर : भात व गहू


17. 'श्रीपती शेषाद्री प्रकरण' ज्या समाजसुधारकांशी संबंधित होते. त्यांचे नाव ओळखा.

1. जगन्नाथ शंकर सेठ

2. बाळशास्त्री जांभेकर

3. भाऊ दाजी लाड

4. छत्रपती शाहू महाराज

🅾️उत्तर : बाळशास्त्री जांभेकर


18. पर्वतीय वार्यांना चिनुक वारे असे कोणत्या विभागात म्हणतात?

1. अमेरिका आणि मेक्सिको

2. अमेरिका आणि कॅनडा

3. ब्राझिल आणि अर्जेटीना

4. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड

🅾️उत्तर : अमेरिका आणि कॅनडा


19. खालीलपैकी कोणती वाक्ये अर्टेशियन विहिरी संदर्भात सत्य आहेत?

1. ही एक वाळवंटातील कोरडी विहीर आहे

2. अशा विहिरी नैसर्गिक तेल पुरवतात

3. या विहिरी नैसर्गिक वायु पुरवतात.

4. वरील कोणतीही नाही

🅾️उत्तर : वरील कोणतीही नाही


20. -----% सौरशक्ति पृथ्वीच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचत नाही.

1. 79

2. 59

3. 49

4. 39

🅾️उत्तर : 49


१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?

अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी

ब)  श्री. दिनशॉ वाच्छा

क) श्री. विल्यम वेडेरबर्न

ड) वरील सर्व.🅾️


२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?

अ) कांग्रेस सेवा दल 

ब)  युक्रांद🅾️

क) एन एस यू आय

ड) आय एन टी यू सी


३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?

अ) पक्षाध्यक्ष

ब) पक्ष उपाध्यक्ष 

क) कांग्रेस कार्यकारी समिती 🅾️

ड) यापैकी नाही


४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.

१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.

२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.

३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.


अ) फक्त १ व ३

ब) फक्त १ व २

क) फक्त २ व ३

ड) वरील सर्व 🅾️


५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 

१) विचारसरणीत  भिन्नता 

२) आंदोलन मार्गातील भिन्नता 

३) मागण्यात  भिन्नता 

४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 


अ) १, ३ व ४

ब) २, ३ व ४

क) १, २ व ३🅾️

ड) १, २ व ४



६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?

   

अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.

ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 

क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 

ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे🅾️


७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?


अ) सी. राजगोपालाचारी  

ब) आचार्य कृपलानी 

क) महात्मा गांधी 🅾️

ड) जयप्रकाश नारायण 


८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?

अ) मनरेगा

ब) किसान विकास पत्र

क) सुकन्या समृद्धी🅾️

ड) अन्न सुरक्षा


९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?

अ) ४४ 🅾️

ब) ४८ 

क) ५२

ड) ६१


१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?

अ) पी. चिदंबरम

ब) पी.व्ही. नरसिंहाराव

क) इंदिरा गांधी

ड) पृथ्वीराज चव्हाण 🅾️


राष्ट्रीय काँग्रेस अधिवेशनाबद्दल या गोष्टी लक्षात ठेवा यावर प्रश्न असतोच


◾️पाहिले अधिवेशन - 1885 - मुंबई (व्योमेशचंद्र बॅनर्जी अध्यक्ष होते (पाहिले ख्रिश्चन अध्यक्ष)

◾️ पहिले अधिवेशन मुंबईत गोपाळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात भरले

◾️ पहिल्या अधिवेशनात एकूण 72 प्रतिनिधी होते

◾️पहिल्या अधिवेशनाला लोकमान्य टिळक उपस्थित नव्हते

◾️ राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ऑलन ह्युम,  हेन्री कॉटन , विल्यम वेडर बर्न हे इंग्रज अधिकारी उपस्थित होते

◾️दुसरे अधिवेशन - 1886 - कोलकाता दादाभाई नौरोजी अध्यक्ष होते

◾️सी शंकरन नायर - हे  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सर्वात तरुण अध्यक्ष 1897 (13 वे ) - अमरावती

◾️1924 (40 वे) - महात्मा गांधी (बेळगाव) - महात्मा गांधी पहिल्यांदा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले( आणि हे एकमेव अधिवेशन आहे अध्यक्ष म्हणून)

◾️1896 कलकत्ता अधिवेशन - रहिमतुल्ला एम. सयानी (राष्ट्रीय गीत 'वंदे मातरम' पहिल्यांदा गायले गेले)

◾️1911कलकत्ता अधिवेशन - बिशन नारायण धर अध्यक्ष ('जन गण मन' पहिल्यांदा गायले)

◾️1917 कलकत्ता अधिवेशन ॲनी बेझंट - पहिल्या महिला अध्यक्ष (भारतीय नाही)

◾️1925 कानपूर अधिवेशन - सरोजिनी नायडू - पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष

◾️1929 लाहोर अधिवेशन - अध्यक्ष जवाहरलाल नेहरू' पूर्ण स्वराज' ठराव

◾️1936 : फैजपूर अधिवेशन - जवाहरलाल नेहरू अध्यक्ष - पहिले ग्रामीण अधिवेशन अधिवेशन

◾️ 1907 सुरत अधिवेशनात जहाल गट आणि मवाळ गट अशी फूट पडली

◾️1916 : लखनऊ अधिवेशनात जहाल गट आणि मवाळगट पुन्हा एकत्र आले

◾️ घ.दा बिर्ला आणि वालचंद हिराचंद हे राष्ट्रीय महासभेत सामील झाले नाहीत परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक मदत केली

◾️ काँग्रेसचे 4 थे अधिवेशन अलाहाबाद - अध्यक्ष जॉर्ज युल या अधिवेशनाला जागा मिळू नये म्हणून ब्रिटिश सरकारने प्रयत्न केले होते

◾️1946 : मेरठ अधिवेशन - आचार्य कृपलानी - स्वातंत्र्यापूर्वीचे शेवटचे अधिवेशन

◾️1948 : जयपूर अधिवेशन - पट्टाभी सीतारामय्या अध्यक्ष - स्वातंत्र्यानंतरचे पहिले अधिवेशन

◾️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले सरचिटणीस - एओ ह्यूम

◾️INC च्या पहिल्या अधिवेशनावेळी लॉर्ड डफरिन हे व्हाइसरॉय होते

◾️भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष - बद्रुद्दीन तैयबजी (1887 चेन्नई 3रे)

◾️1889 च्या अधिवेशनात ब्रिटिश पार्लमेंटचे सदस्य चार्ल्स ब्रेड लॉ उपस्थित राहिले

◾️ राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन पुणे ऐवजी मुंबईत भरवले कारण पुण्यात कॉलरा ची साथ आली होती

◾️पाहिले परकीय अध्यक्ष - जॉर्ज यूल (3रे) - 1888 - अलाहाबाद 


👉 राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना वेळ 72 प्रतिनिधी पैकी मुंबई प्रांताचे  प्रतिनिधी (यावर प्रश्न येतो)

◾️दादाभाई नौरोजी

◾️के टी तेलंग

◾️फिरोजशहा मेहता

◾️कृष्णाजी नूलकर

◾️दिनशा वाँच्छा

◾️नारायण गणेश चंदावरकर

◾️शिवराम हरी साठे

◾️रहिमतुल्ला सयानी

◾️वामन शिवराम आपटे

◾️सीताराम चिपळूणकर

◾️रामकृष्ण गोपाल भांडारकर

◾️रामचंद्र मोरेश्वर साने

◾️गोपाळ गणेश आगरकर

◾️गंगाराम मस्के

◾️बेहराम मलबारी

◾️न्या. महादेव गोविंद रानडे

लखनऊ ऐक्य व लखनऊ करार



🖍गोखलेंच्या भारत सेवक समाजास होमरुल लीगचे सदस्य होण्याची संमती नव्हती, परंतु त्यांनी देखील भाषण दौरे आयोजित करुन होमरुलला पाठबळ दिले.

🖍होमरूल कार्यपध्दती ही गांधीजींना मान्य नव्हती व होमरूलसाठीची ही योग्य वेळ नाही असे त्यांचे मत होते. 

🖍या अधिवेशनासाठी टिळकांच्या होमरूल लीगने ‘काँग्रेस स्पेशल’ व ‘होमरूल स्पेशल’ म्हणून लखनौसाठी या दोन स्पेशल आगगाडयांची व्यवस्था केली.

🖍या अधिवेशनात ॲनी बेझंट यांच्या प्रयत्नाने जहालांना पुन्हा काँग्रेसमध्ये औपचारिकरित्या सामील करून घेण्यात आले. यास ‘लखनौ ऐक्य’ असे म्हणतात.

🖍आता काँग्रेसची दारही जहाल गटाला खुली झाल्यानंतर ती पुन्हा प्रभावीत तसेच गतीशील बनली व राष्ट्रीय आंदोलनाचे नेतृत्व करण्याची ताकद तिच्यात पुन्हा निर्माण झाली.

🖍याअधिवेशनात एक मुखाने स्वराज्याची मागणी करण्यात आली.

🖍काँग्रेस व मुस्लिम लीग दोघांच्या राजकीय मागण्या सारख्याच असाव्यात म्हणून काँग्रेस व मुस्लिम लीग यांमध्ये एक करार करण्यात आला. त्यास लखनौ करार असे म्हणतात.

🖍या कराराव्दारे काँग्रेसने मुस्लिम लीगची स्वतंत्र मतदार संघाची मागणी मान्य केली, तर मुस्लिम लीगने काँग्रेसच्या साम्राज्यांतर्गत स्वराज्याच्या मागणीचे समर्थन केले.

🖍तसेच मुस्लिमांच्या अल्पसंख्य प्रांतातून मुस्लिम लोकसंख्येच्या प्रमाणापेक्षा जास्त प्रतिनिधी 
पाठविण्यासंबंधीची मागणी मुस्लिम लीगने काहीशी सौम्य केली.

🖍आता काँग्रेस व लीग यांच्यात राजकीय मागण्याबाबत मतैक्य होवून भारताच्या राजकीय क्षेत्रात समान उद्दिष्ट पूर्तीसाठी या संघटना सहकार्यास सिध्द झाल्या. (वस्तुत: काँग्रेसने व्यवहारीक दृष्टीकोनातून राष्ट्रीय सामंजस्यासाठी मुस्लिमांचे स्वतंत्र मतदार संघ आनंदाने स्विकारुन नाईलाजाने केलेली एक तात्विक तडजोड होती.)

होमरूल चळवळ

* होमरूल म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा आपणास अधिकार प्राप्त करून घेणे. 

* इंग्लंडच्या जोडखातून मुक्त होऊन स्वराज्याचे अधिकार प्राप्त करून घेण्यासाठी होमरुलची चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरु झाली. 

* डॉ. अनी बेझंट या विदुषीने तिचा प्रथम विचार मांडला. 

* बेझंट ह्या जन्माने आयरिश होत्या, २५ सप्टेंबर १९१५ साली होमरूल लीग [ स्वराज्य संघ ] याची स्थापना करण्यात आली. 

* त्यांच्या धार्मिक थिओसोफ़िकल सोसायटी हा संप्रदाय स्थापन केला. 

* २ जानेवारी १९१४ रोजी मद्रास प्रांतात 'कॉमन विल' हे वृत्तपत्र स्थापन केले. 

* इंग्लंडचा दौरा करून डॉ अनी बेझंट हिंदुस्तानात परतल्यानंतर त्यांनी मद्रासेत 'न्यू इंडिया' नावाचे एक आणखी वृत्तपत्र काढून आपले विचार सुरु केले.


🔹लो. टिळकांची होमरूल चळवळ

* हिंदुस्तानासाठी स्वराज्य मागणे व त्यासाठी चळवळ उभारणे, हि त्यावेळी जहाल विचारसरणीच होती. 

* बेझंट बाईच्या होमरूल चळवळीच्या अगोदरच त्यांनी १८ एप्रिल १९१६ रोजी त्यांना महाराष्ट्रात होमरूल चळवळ स्थापन केली होती. व जोसेफ बॉप्टिस्टा हे या लीग चे अध्यक्ष होते. 

* न ची केळकर हे तिचे सचिव होते.


🔺होमरूल चळवळीचे परदेशातील कार्य

* हिंदुस्त्नातील चळवळीचे कार्य हे परदेशातही उमटले. 

* मद्रास हाय कोर्टाचे न्यायाधीश सर सुब्र्म्ह्न्यम अय्यर हे मद्रास प्रांतातील होमरूल लीगचे अध्यक्ष होते. 

* ईंग्लंड व अमेरिकेतही होमरूल या संघटनेचे वृत्त या देशातील वृत्तपत्रानीही घेण्यास सुरवात केली.


🔸होमरूल चळवळीचे कार्याचे परीक्षण

* राष्ट्रसभेच्या धोरणात बदल 

* पाश्चात्य देशात हिंदी स्वराज्याबद्दल सहानुभूती 

* मॉन्टेग्यू साहेबाची  इतिहास प्रसिद्ध घोषणा


🔺होमरूल चळवळीचे उदिष्टे

* ब्रिटीश साम्राज्याचा अंतर्गत स्वराज्य ताबडतोब प्राप्त करणे

* देशातील लोकमत जागृत करून ते संघटीत करणे

* इंग्रजांच्या जुलुमी धोरणाचा परिचय सामान्य जनतेला करून देणे

* स्वराज्य मिळून देण्यासाठी देशातील सर्व साधनसामुग्रीचा वापर करणे

* इंग्रज प्रशासनाकडून भरीव राजकीय सुधारणा प्राप्त करणे


राष्ट्रीय काँग्रेसची अधिवेशन

1) 1885- मुंबई - व्योमेश्‍चंद्र बॅनर्जी- या अधिवेशनात 72 प्रतिनिधी   उपस्थित होते.


2)1886 -कलकत्ता -दादाभाई नौरोजी -पहिले पारसी अध्यक्ष


3)1887 -मद्रास -बद्रुदीन तैय्यबजी -पहिले मुस्लीम अध्यक्ष


4)1888 -अलाहाबाद - जॉर्ज यूल  -पहिले ब्रिटीश अध्यक्ष


5)1889-  मुंबई-  सर विल्यम वेडनबर्ग - दुसरे ब्रिटीश अध्यक्ष


7) 1891 - नागपूर - पी आनंद चार्लू


 11) 1895  -पुणे  -सुरेंद्रनाथ बॅनर्जी - ICS परीक्षा भारतात घेतली.


12) 1896  -कलकत्ता-  महमद रहिमतुल्ला सयानी  -वंदे मातरम टागोरांनी गायले.


16) 1900 - लाहोर - एन.जी. चंदावरकर - पहिले मराठी अध्यक्ष


22) 1906  -कलकत्ता  -दादाभाई नौरोजी  स्वराज्य शब्दाचा स्विकार तसेच          चतुसुत्रीचा स्विकार केला.


23) 1907  -सुरत  -रासबिहारी घोष - मवाळ व जहाल यांच्यात पहिली फुट


26) 1911 - कलकत्ता  बिशण नारायण धर - जण-गण-मन टागोरांनी गायले.


31) 1916 - लखनौ - अंबिका चरण मुजूमदार  ऐक्य -करार/लखनौ करार


32) 1917 - कलकत्ता  -अ‍ॅनी बेझंट  पहिल्या महिला अध्यक्ष


35) 1920 - नागपूर - सी विजय राघवाचार्य-  काँग्रेसच्या घटनेत बदल


39) 1924-  बेळगाव  -महात्मा गांधी  एकदाच अध्यक्ष


40) 1925  -कानपूर  -सरोजिनी नायडू - पहिली भारतीय महिला अध्यक्षा


43) 1926 - कलकत्ता  -मोतीलाल नेहरू - वसाहतीची मागणी, पहिले युवक  अधिवेशन


44) 1929  -लाहोर  -जवाहरलाल नेहरू - पूर्ण स्वराज्याची मागणी


50) 1936 - फैजपूर - जवाहलाल नेहरू - ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन


51) 1938  -हरिपूरा  -सुभाषचंद्र बोस - पटट्भी सितारामय्याचा पराभव


52) 1939  -त्रिपुरा - सुभाषचंद्र बोस/ राजेंद्र प्रसाद  मवाळ व जहाल यांच्यात दुसरी फुट


53) 1940 - रामगड  -अब्दुल कलाम आझाद - सर्वात जास्त काळ व सर्वात तरूण  अध्यक्ष


61) 1955 - आवडी  -यू.एन.ढेबर  समाजवादाचा ठराव मांडला

भारतातील सर्वप्रथम महिला


▪️ भारतातील पहिली महिला बॅरिस्टर?

>> कारनेलिन सोराबजी


▪️ भारतातील पहिल्या महिला IPS अधिकारी?

>> किरण बेदी


▪️ महाराष्ट्रातील पहिल्या महिला IPS अधिकारी?

>> मीरा बोरवणकर


▪️ नोबेल विजेत्या पहिल्या भारतीय महिला?

>> मदर तेरेसा


▪️ भारतरत्न विजेती पहिली भारतीय महिला?

>>  इंदिरा गांधी


▪️ मिस वर्ल्ड विजेती पहिली भारतीय महिला?

>>  रिता फारिया


▪️ भारताची पहिली महिला ग्रँडमास्टर?

>> विजयालक्ष्मी सुब्रमण्यम


▪️ भारताची पहिली महिला क्रांतिकारक?

>>  मादाम भिकाजी कामा


▪️ भारतीय वंशाची पहिली महिला अंतराळवीरांगणा?

>> कल्पना चावला


▪️ भारतीय नौदलाची पहिली महिला वैमानिक?

>> शुभांगी स्वरूप


▪️ एवरेस्ट सर करणारी पहिली भारतीय महिला?

>> प्रा. बचेंद्री पाल


-----------------------------------------------------------


14 August 2025

वेदोक्त प्रकरण


1899 साली हे प्रकरण कोल्हापूरामध्ये घडले. कार्तिक महिन्यात शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. यावेळेस त्यांच्या परिवारातले काही सदस्य बंधू बापूसाहेब महाराज, मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्यावेळेस मंत्र म्हणणारे नारायण भटजी असत.


एकेदिवशी महाराजांचे स्नेही आणि प्रकांड पंडित राजारामशास्त्री भागवतही होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.


त्यांनी हे महाराजांच्या लक्षात आणून दिलं. महाराजांनी भटजींना विचारताच त्यांनी शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात असं उत्तर दिलं.


हे उत्तर शाहू महाराजांसाठी एक मोठ्या विचारमंथनाचं कारण ठरलं. त्या वाक्यानं ते अंतर्मूख तर झालेच त्याहून पुढील मोठ्या सामाजिक चळवळीसाठी सिद्ध झाले.


क्षत्रियकुलावतंस हिंदुपदपातशहा असं बिरुद लावणाऱ्या राजालाही दर्जा मिळत नसेल तर बाकी लोकांवर काय अन्याय होत असेल याची त्यांना जाणीव झाली.


वेदोक्ताचं असं प्रकरण उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळीही असा वाद निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी काशीहून गागाभट्टांना बोलावून राज्याभिषेक करवून घेतला होता.


साताऱ्याचे महाराज प्रतापसिंह यांच्या कार्यकाळातही वेदोक्ताधिकाराचा तंटा निर्माण झाल्यावर त्यांनी पंडितांची एक निर्णयसभा बोलावली आणि त्यामध्ये मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध होऊन त्यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य केला गेला.


1896 साली बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांच्याकडील धार्मिक विधी महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिल्यावर सयाजीरावांनी राजस्थानी आणि गुजराती ब्राह्मणांकरवी ते करवून घेतले होते.


या वेदोक्त प्रकरणाचे पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात न पडते तरच नवल. यातून एकप्रकारचा संघर्षच निर्माण झाले. महाराष्ट्रातील तत्कालीन वर्तमानपत्रांतून, सभा-भाषणांतून त्याची दोन्ही बाजूंनी चर्चा होऊ लागली.


ऑक्टोबर 1901 मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरीमध्ये वेदोक्ताचे खूळ या नावाचे दोन अग्रलेख लिहिले. त्यातून त्यांनी वेदोक्तातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती थोडक्यात अशी होती, “या युगात ब्राह्मण व शूद्र असे दोनच वर्ण राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्यावर मोहिती होऊन तत्कालीन कर्त्या पुरुषांनी खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करुन गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला; पण त्यावेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही.”


नवा राजवाडा, कोल्हापूर

छत्रपतींच्या भोसले घराण्याशिवाय इतर घराण्यांना वेदोक्ताचा अधिकार नाकारणं हे शाहू महाराजांना अस्वस्थ करणारं होतं. आधी फक्त आपल्यापुरते राजवाड्यासाठी वेदोक्ताचा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी समस्त मराठ्यांना हा अधिकार मिळावा असा आग्रह धरला आणि तसेही प्रयत्नही केले.


पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातीतींल मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले.


ज्या ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्यास नकार दिला त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.


संस्थानचे राजोपाध्यांचे राजसेवेसाठी दिलेले 30 हजारांचे इनाम जप्त करण्यात आले. करवीरच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे 50 हजार रुपयांचे उत्पन्न सरकारजमा करण्यात आले. इतरही शेकडो ब्राह्मणांची उत्पन्नं आणि इनाम सरकारजमा करण्यात आले.


हे प्रकरण कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलपर्यंतही गेले. वेदोक्ताचा अधिकार कोणाला द्यायचा यावर चर्चा, टीका घडत राहिली. 1905 साली डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर सभेतील ठरावात महाराजांचे क्षत्रियत्व आणि त्यांना वेदाधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण निवळले.

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स



1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स 

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय 

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज 

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई 

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे

75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी 

● मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे

: पार्श्वभूमी
• मराठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रचून शिवाजी राजे १६७४ मध्ये पहिले छत्रपती बनले. छत्रपती शिवाजी राज्यांच्या मृत्यूनंतर कनिष्ठ पुत्र राजारामांना गादीवर बसविण्याचा कट उधळून देऊन या संभाजी राजे (१६८०-१६८९) मराठी राज्याचे दुसरे छत्रपती
बनले.

• संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी येसूबाईंनी विश्वासू सरदारांशी चर्चा करून व मराठे शाहीवरचे संकट बाळाजीने ओळखून राजाराम राज्यांना नजर कैदेतून मुक्त करून त्यांना गादीवर बसविले. ‘राजा सलामत तर राज्य सलामत’ या हेतूने
मराठ्यांनी १६८९ मध्ये सुरक्षेसाठी राजारामांना कर्नाटकातील जिंजीस पोहोचविले. मुघलांनी राणी येसूबाई व बाल शाहू यांना कैद केली. १६९७ मध्ये राजाराम महाराष्ट्रात परतल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा २ मार्च, १७०० रोजी वयाच्या केवळ ३० व्या वर्षी मृत्यू झाला.

• राजारामाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाईंनी आपला साडेतीन-चार वर्षाचा मुलगा शिवाजी यास गादीवर बसवून स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व आपल्या हाती घेतले.

 छ.शाहू राजे यांची सुटका व राज्यारोहण

• औरंगजेबच्या मृत्यूनंतर बहादूरशाहने शाहू राजांना मुक्त केले. बाजीरावाने ताराबाईंनी शाहूंच्या हाती मराठेशाहीची सत्ता देण्यास नकार दिला. ताराबाईंचा सेनापती धनाजी जाधव यांनी ऐनवेळी शाहूंची बाजू घेतली. या गृहयुद्धातून झालेल्या खेडच्या युद्धात
(१२ ऑक्टोबर, १७०७) ताराबाईंचा पराभव झाला. शाहू राजांनी सातारचा किल्ला सर करून १२ जानेवारी, १७०८ मध्ये राज्याभिषेक करून राज्यारोहण केले. ते मराठ्यांचे चौथे छत्रपती बनले. ताराबाईंनी कोल्हापूरला मराठ्यांची दुसरी गादी
निर्माण केली. या दोघांमधील यादवी १७३१ च्या वारणेच्या तहापर्यंत चालू राहिली.

● पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२)

 कारणे व महत्त्वाच्या घटना

• बॉम्बे सरकारला महाराष्ट्रात क्लाईव्हने बंगालमध्ये स्थापन केलेल्या दुहेरी शासनव्यवस्थेची स्थापन करण्याची इच्छा होती. पेशवेपदासाठीच्या सत्ता संघर्षाने त्यांना संधी प्राप्त झाली.

• माधवरावांच्या मृत्यूनंतरचा सत्ता संघर्ष: पेशवेपदाची इच्छा असलेल्या रघुनाथरावांनी (माधवरावांचा काका) पेशवा नारायणराव (माधवरावांचा भाऊ) याचा खून घडवून आणला व स्वत:स पेशवा घोषित केले. तेव्हा मराठा दरबारातील नाना फडणीस, महादजी शिंदे, सखाराम बापू वगैरे बारा व्यक्तींनी राघोबाच्या विरोधात बारभाईंचे राजकारण केले. त्यांनी राघोबाला पदच्युत केले व नारायणरावांच्या नुकत्याच झालेल्या मुलाला सवाई माधवराव असे नाव देऊन त्याला पेशवा बनविले व त्याच्या वतीने हे बाराजण राज्यकारभार पाहू लागले.

•राघोबाने गेलेले पेशवेपद मिळविण्यासाठी बॉम्बे प्रेसिडन्सीशी ‘सुरतचा तह’ (१६ मार्च, १७७५) रोजी केला. त्यामुळे युद्धास सुरूवात झाली.

• मात्र सुरतचा तह कलकत्त्याच्या गव्हर्नर-जनरलला पसंद पडला नाही. त्याने बॉम्बे सरकारला मराठ्यांची नवीन तह करायला सांगितले. दीर्घ चर्चेनंतर बॉम्बे सरकारने पुणे दरबारातील शासक गटाशी मार्च १७७६ मध्ये ‘पुरंदरचा तह’ केला. या तहामुळे युद्ध तात्पुरते थांबले. या तहाद्वारे राघोबाला मराठ्यांच्या स्वाधीन
करायचे ठरले व त्याने केलेले पूर्वीचे तह रद्द करण्यात आले.

• मात्र हा तह मुंबईच्या इंग्रजांना नुकसानकारक वाटला. तसेच कंपनीच्या संचालकांनाही तो पसंत पडला नाही. अमेरिकन वसाहती गमावल्याने आता इंग्रजांनी पुन्हा राघोबाची बाजू घेऊन मराठ्यांशी युद्ध सुरू केले. पण पुण्याकडे राघोबाला घेऊन येणाऱ्या इंग्रजांचा महादजी शिंदेंनी तळेगाव येथे पराभव
करून त्यांना ‘तळेगावचा तह’ (१७७९) मान्य करावयास लावला.

• हा तह इंग्रजांनी अमान्य केल्यावर त्यांचा निर्णायक पराभव करण्यासाठी नाना फडणीसाने पेशवे, नागपूरकर भोसले, हैदर अली व निझाम यांचा ‘चतुःसंघ’ इंग्रजांविरूद्ध उभा केला. मात्र धुर्त इंग्रजांनी निझाम व भोसल्यांना फितविले. तसेच गोद्दार्ड
याच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याहून मोठे सैन्य मराठ्यांविरूद्ध पाठविले.

• दोन वर्षे युद्ध असेच चालू राहिले. इंग्रजांनी महादजींकरवी शांततेचा प्रस्ताव मांडला. हैदर न विचारता मराठ्यांनी ‘साल्बाईचा तह’ करून ७-८ वर्षे चाललेले युद्ध संपुष्टात आणले.

● साल्बाईचा तह, १७ मे, १७८२

• साल्बाई या ग्वाल्हेरपासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी महादजी शिंदे (पेशव्यांच्या वतीने) व इंग्रज यांमध्ये हा तह १७ मे, १७८२ रोजी करण्यात आला व पहिले इंग्रजमराठा युद्ध थांबले. या तहाच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्याः

– १)साष्टी, भडोच, मुंबई इंग्रजांकडेच राहतील, तर पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेली ठाणी मराठ्यांना परत केली जातील.
– २)इंग्रजांनी राघोबाची बाजू घेऊ नये.
– ३)इंग्रजांना त्याच्या व्यापारी सवलती पुन्हा प्राप्त होतील.
– ४)दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या दोस्त राज्यांवर हल्ला करायचा नाही.तसेच पेशव्यांनी इतर युरोपीयन शक्तींना मदत करायची नाही.

● महत्व

• हा तह इंग्रजांसाठी खूप महत्वाचा ठरला. खरे तर, तो इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या इतिहासात एक महत्वाचे वळण (turning point) ठरला. या तहामुळे इंग्रजांची मराठ्यांशी २० वर्षे शांतता प्रस्थापित झाल्याने या काळात त्यांनी आपली शक्ती
वाढविली व मराठ्यांव्यतिरिक्त इतर शबूंचा एक-एक करून पराभव केला. नाना फडणीसाला हा तह हैदरच्या मान्यतेशिवाय करायचा नव्हता. त्यामुळे महादजी व नाना यांच्या फूट पडली, तसेच मराठे व हैदर यांचे संबंधही बिघडले.

● दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५)

● कारणे

• १)लॉर्ड वेलस्लीचे मराठ्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे आक्रमक धोरण. त्याला मराठ्यांवर तैनाती फौजेचा तह लादायचा होता.

• २)सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर १७९५ मध्ये राघोबाचा अकार्यक्षम व कर्तव्यशून्य असा मुलगा दुसरा बाजीराव यास पेशवेपद मिळाले. १८०० मध्ये नाना फडणीसाचा मृत्यू झाला व ‘मराठेशाहीतील सारे शहाणपण संपले’. १८ व्या शतकाच्याअखेर पर्यंत अनेक हुशार, मुत्सद्दी व अनुभवी मराठी राजकारण्यांचा मृत्यू झाला होता.

• ३)मराठा सरदारांमधील दुफळी: दौलतराव शिंदे व यशवंतराव होळकर यांच्यातील यादवी. बाजीरावाची होळकरांविरूद्ध शिंद्यांना मदत, यशवंतराव होळकरांनी केलेला पेशवे व शिंदे यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव. या पराभवामुळे बाजीरावाने
संरक्षणासाठी इंग्रजांकडे धाव घेतली व १३ डिसेंबर, १८०२ रोजी ‘वसईचा तह करून इंग्रजांची तैनाती फौज पदरी ठेवण्याचे मान्य करून इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारले.

• ४)वसईच्या तहामुळे इंग्रजांना पेशव्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्राप्त झाला. मात्र इतर मराठा सरदारांनी तहास मान्यता देण्यास नकार दर्शविल्याने दुसऱ्या युद्धास तोंड फुटले.

● महत्त्वाच्या घटना

• १८०३ मध्ये ऑर्थर वेलस्लीने शिंदे-भोसले यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव केला व त्यांच्या तैनाती फौजेचे पुढील तह केले:

१) १७ डिसेंबर, १८०३ रोजी रघुजी भोसले यांच्या बरोबर ‘देवगावचा तह’ केला. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यास भोसल्यांच्या दरबारात रेसिडेन्ट म्हणून नेमण्यात आले.

२) ३० डिसेंबर, १८०३ रोजी दौलतराव शिंदे यांच्या बरोबर ‘सुर्जी अर्जनगावचा तह’ केला. जॉन माल्कम यास शिंद्यांच्या दरबारात रेसिडन्ट म्हणून नेमण्यात आले.

• होळकरांविरूद्ध मात्र इंग्रजांना यश मिळू शकले नाही. शेवटी २४ डिसेंबर, १८०५ रोजी यशवंतराव होळकरांबरोबर इंग्रजांनी ‘राजपूरघाटचा तह’ हा शांततेचा तह केला.

• अशाप्रकारे दुसऱ्या इंग्रज- -मराठा युद्धात भोसले, शिंदे, होळकर यांच्यासारख्या मातब्बर सरदारांना इंग्रजांनी पराभूत केले. भारतात कंपनीची सत्ता सर्वश्रेष्ठ शक्ती (Paramount Power) बनली.

● तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८१७-१८१८)

• कारणे

• आपण एकटे पडलो आहोत याची जाणीव दुसऱ्या बाजीरावाला झाली. त्याने इंग्रजांच्या जोखडातून सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपले स्वातंत्र्य नष्ट झाल्याने मराठा सरदारांमध्यही असंतोष होता.

• गायकवाडांच्या गंगाधरशास्त्रींच्या खूनात बाजीरावाचा व त्याचा सल्लागार त्र्यंबकजी डेंगळे यांचा हात असल्याचा आरोप करून इंग्रजांनी बाजीरावावर जून १८१७ मध्ये ‘पुणे तह’ हा एक
कडक तह लादला, जो वसईच्या तहाला पूरक म्हणून
लादण्यात आला. या तहाने बाजीराव निव्वळ एक संस्थानिक बनला.

• लॉर्ड हेस्टिंगने पिंडाऱ्यांचा बंदोबस्त करण्यापूर्वी त्यासाठी शिंद्यांची मदत घेण्यासाठी दौलतराव शिंदेबरोबर नोव्हेंबर, १८१७ मध्ये ‘ग्वाल्हेरचा तह’ केला. तसेच दुसऱ्या मल्हारराव होळकरांबरोबरच जानेवारी, १८१८ मध्ये ‘मंदासोरचा तह’ केला.

• पुणे तहाच्या विरूद्ध बाजीरावाने बापू गोखलेच्या साहाय्याने लढण्याचे ठरविले. ५ नोव्हेंबर, १८१८ रोजी निर्णायक असे तिसरे युद्ध खडकी येथे सुरू झाले. युद्धात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीरावाने शरणागती पत्करली. त्याच्या बरोबर इतर मराठा सरदार घराणीही इंग्रजांच्या अंकित आले.

• इंग्रजांनी बाजीरावास पेन्शन देऊन त्यास कानपूरजवळ बिठूर येथे रवाना केले. पेशव्यांचा सर्व प्रदेश ताब्यात घेतला.

TCS पॅटर्न अत्यंत महत्वाचे


✨ 'ब्रह्म समाज' ची स्थापना केव्हा झाली - इ.स. 1828.


✨ 'ब्रह्म समाज' ची स्थापना कोणी आणि कुठे केली - कलकत्ता येथे, राजा राममोहन रॉय


✨ आधुनिक भारतातील हिंदू धर्मात सुधारणा करण्याची पहिली चळवळ कोणती होती - ब्राह्मो समाज


✨ सती प्रथेला आणि इतर सुधारणांना विरोध करणारी ब्राह्मसमाजाची विरोधी संघटना कोणती- धर्मसभा


✨ धर्मसभेचे संस्थापक कोण होते - राधाकांता देव


✨ सती प्रथा कधी संपली - इ.स. 1829.


✨ सती प्रथेच्या शेवटी कोणाचा प्रयत्न सर्वात जास्त होता - राजा राममोहन रॉय


✨  'आर्य समाजाची ' स्थापना केव्हा झाली - इ.स. 1875, मुंबई


✨ आर्य समाजाची स्थापना कोणी केली - स्वामी दयानंद सरस्वती


✨ आर्य समाज कशाच्या विरोधात आहे - धार्मिक विधी आणि मूर्तीपूजा


✨ 19 व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला मानले जाते - राजा राममोहन रॉय


✨ राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कुठे झाला- राधानगर, जिल्हा वर्धमान


✨ स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते- मूळशंकर


✨ राजा राममोहन रॉय इंग्लंडला गेल्यानंतर ब्राह्मसमाजाची सूत्रे कोणी हाती घेतली - रामचंद विद्वागीश


✨ ज्यांच्या प्रयत्नाने ब्राह्मोसमाजाची मुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रासमध्ये पसरली - केशवचंद्र सेन


✨ 1815 मध्ये कलकत्ता येथे 'आत्मीय सभा'   स्थापन करणारे - राजा राममोहन रॉय


✨ राजा राममोहन रॉय आणि डेव्हिड हेअर हे हकीस संस्थेशी संबंधित होते- हिंदू कॉलेज


✨ थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कोठे झाली - 1875 एडी, न्यूयॉर्कमध्ये


✨ भारतामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कोठे झाली - 1882, अड्यार, मद्रास येथे


✨ 'सत्यर्थ प्रकाश' कोणी रचला - दयानंद सरस्वती


✨ 'वेद की बहुत' चा नारा कोणी दिला - दयानंद सरस्वती


✨ जेव्हा 'रामकृष्ण मिशन' ची स्थापना झाली - इ.स. 1896-97, बैलूर (कलकत्ता)


✨ 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना कोणी केली - स्वामी विवेकानंद


✨ अलीगड चळवळ कोणी सुरू केली - सर सय्यद अहमद खान


✨ अलीगड मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली- सर सय्यद अहमद खान


✨ 'यंग बंगाल' चळवळीचा नेता कोण होता - हेन्री व्हिव्हियन डेरोजिओ


✨ सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते - ज्योतिबा फुले


✨ भारताबाहेर कोणत्या धर्मसुधारकाचा मृत्यू झाला - राजा राममोहन रॉय


✨ वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र कोठे होते- पाटणा


✨ जेव्हा भारतात गुलामगिरी बेकायदेशीर घोषित करण्यात आली - 1843 


✨ भारतातील इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था कोणाकडून होती - विल्यम बेंटिक यांनी


✨ 'संपूर्ण सत्य वेदांमध्ये सामावलेले आहे' हे विधान कोणाचे - स्वामी दयानंद सरस्वती


✨ 'महाराष्ट्राचा सॉक्रेटिस' कोणाला म्हणतात - महादेव गोविंद रानडे


✨ विश्व धर्म परिषदेत विवेकानंद कुठे प्रसिद्ध झाले - शिकागो


⚫️ 'संवाद कौमुदी'चे संपादक कोण होते - राजा राममोहन रॉय


⚫️ 'तत्व रंजिनी सभा', 'तत्व बोधिनी सभा'   आणि 'तत्वबोधीन पत्रिका' यांचा संबंध - देवेंद्र नाथ टागोर


⚫️ 'प्रार्थना सोसायटी'ची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली - केशवचंद्र सेन


⚫️ महिलांसाठी 'वामा बोधिनी' हे मासिक कोणी काढले - केशवचंद्र सेन


⚫️ शारदामणी कोण होती - रामकृष्ण परमहंस यांची पत्नी


⚫️ 'कुका आंदोलन' कोणी सुरू केले - गुरु राम सिंह


⚫️ 1956 मध्ये कोणता धार्मिक कायदा संमत झाला - धार्मिक अपात्रता कायदा


⚫️ महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकाला 'लोकहितवादी' म्हणतात - गोपाळ हरी देशमुख


⚫️ ब्राह्मसमाज कोणत्या तत्त्वावर आधारित आहे - एकेश्वरवाद


⚫️ 'देव समाज' कोणी स्थापन केला - शिवनारायण अग्निहोत्री


⚫️ 'राधास्वामी सत्संग' चे संस्थापक कोण आहेत - शिवदयाल साहेब


⚫️ फॅव्हियन चळवळीचे समर्थक कोण होते - अॅनी बेझंट


⚫️ 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात सुरू झालेली चळवळ कोणती होती - अहरार


⚫️ गोपाळ कृष्ण गोखले यांनी 'भारत समाज सेवक' ची स्थापना केव्हा व कोणी केली - इ.स. 1905


⚫️शीख गुरुद्वारा कायदा केव्हा पास झाला - 1925 


⚫️ रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय होते - गदाधर चट्टोपाध्याय


⚫️डॉ. अॅनी बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा केव्हा बनल्या - 1917 


⚫️शिकागो जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद कधी सहभागी झाले - 1893 


⚫️ 'प्रिसेप्टस ऑफ जीझस' कोणी रचला - राजा राममोहन रॉय


⚫️राजा राममोहन रॉय यांचे कोणते पर्शियन पुस्तक होते, जे 1809 मध्ये प्रकाशित झाले होते - तुहफतुह-उल-मुवाहिदीन


⚫️वेदांत महाविद्यालयाची स्थापना कोणी केली - राजा राममोहन रॉय


⚫️ राजा राममोहन रॉय यांना 'युग दूत' कोणी म्हटले - सुभाषचंद्र बोस


रक्तपट्टीका



🔻आकार द्विबहिर्वक्र व रंगहीन

🔻सस्तन प्राण्यातच आढळतात

🔻कद्रक नसते व अतिशय लहान

🔻5 ते 10 दिवस जगतात

👉अस्थीमज्जा मध्ये तयार होतात

👉रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात

👁‍🗨यांना Thrombocytes म्हणतात

👁‍🗨डग्यू मलेरिया मध्ये यांचे प्रमाण कमी होते


🔰लाल रक्त पेशी🔰

🔘गोलाकार व द्विअंतरावर्क असतात

🔘कद्रक नाही

🔘आकाराने खूप लहान

🔘हिमोग्लोबीन मुळे लाल रंग

🔘सत्री मध्ये प्रमाण कमी

🔘127 दिवस जगतात

🔘पलिहा मध्ये मरतात

👉गर्भात यकृत मध्ये तयार होतात

👉परौढ माणसात अस्थी मज्जा मध्ये तयार होतात

👉यांना Erythrocytes म्हणतात



🔴पांढऱ्या पेशी🔴

👁‍🗨आकाराने मोठ्या,अमिबासदृश

👁‍🗨कद्रक असते व रंगहीन

👁‍🗨3 ते 4 दिवस जगतात

👁‍🗨अस्थीमज्जा व प्लिहा मध्ये तयार

👁‍🗨5000 ते 11000 प्रति घनमिमी असतात

👉आजारामध्ये यांची संख्या वाढते

👉यांना Leucocytes म्हणतात

भास्करराव विठोजीराव जाधव

◾️भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे

◾️ रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते

◾️मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते

◾️महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले. 

◾️पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. 

◾️दुर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले. 

◾️१८९५ ते १९२१ या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, १९०१ च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली

◾️बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते

◾️शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल १४ वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली

◾️करवीरची जनता त्यांचा 'कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार' असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.

◾️त्यांना प्रति शाहू महाराज असेही म्हटले जाते


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com