स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
14 October 2025
चालू घडामोडी :- 13 ऑक्टोबर 2025
11 October 2025
लॉर्ड कर्झन (1899 - 1905)
●लाॅर्ड कर्झन म्हणजे भारतातील सर्वात वादग्रस्त व्हाइसराॅय....
●1899 मध्ये भारतासाठी चांदी ऐवजी सुवर्ण परिमाण लाॅर्ड कर्झन याने अवलंबिले.
●1901 मध्ये काश्मिर व पंजाब यांचा काही भाग मिळुन वायव्य सरहद्द प्रांत निर्माण केला.
●1901 मध्ये भारतीय राजपुत्रांना उच्च शिक्षण देण्यासाठी लाॅर्ड कर्झन याने Imperial Cadet Core ची स्थापना केली.
●23 जानेवारी 1901 रोजी महाराणी व्हिक्टोरीया हिचे निधन झाले. पुढे 1921 मध्ये महाराणी व्हिक्टोरिया हिच्या स्मरणार्थ कलकत्ता येथे व्हिक्टोरिया हॉल बांधण्यात आला.
●1902 मध्ये सर थॉमस रॅले यांच्या अध्यक्षतेखाली 'युनिव्हर्सिटी कमिशन' नेमण्यात आले.
●1902 मध्ये सर अँन्ड फ्रेजर यांच्या अध्यक्षतेखाली पोलिस खात्याची समिती नेमण्यात आली. यानुसारच criminal investigation bureau ची सुरुवात झाली.
●1902 रोजी कर्झनने दुष्काळ निवारणासाठी 'मॅकडोनाल्ड दुष्काळ आयोग' स्थापन केला.
●1903 मध्ये लाॅर्ड कर्झन याने दिल्ली येथे भव्य दरबार भरवुन राणीच्या वारसाला भारत सम्राट घोषित केले.
●1903 मध्ये सर ॲन्ड्र्यु फ्रेजर यांनी बंगालच्या फाळणीची योजना तयार केली.
●1904 मध्ये पहिला सहकारी कायदा पारित करण्यात आला.
●1904 मध्ये प्राचीन स्मारक संरक्षण कायदा पारीत केला.
●लाॅर्ड कर्झन याने व्यापार व उद्योगधंदे खाते निर्माण केले.
●1901 मध्ये बंगालमध्ये पुसा येथे कृषी संशोधन संस्थेची स्थापना लाॅर्ड कर्झन यांनी केली.
●लाॅर्ड कर्झनच्या काळात DSP व Dysp यांची थेट नेमणूक सुरु झाली.
●ब्रिटीश शासनासोबत झालेल्या मतभेदांमुळे (कर्झन - किचनर विवाद) कर्झन 1905 मध्ये मायदेशी परतला.
●कर्झन याने रेल्वे कारभाराच्या चौकशी साठी सर रॉबर्टसन यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली.
● भारतात रेल्वेचे विस्तृत जाळे पसरविण्याचे श्रेय कर्झन कडे जाते.
●लाॅर्ड कर्झन याने टाटा इंस्टिट्युट ऑफ सायन्स, बेंगलोर येथील संशोधन कार्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या संस्थेला देणगी दिली.
●19 आॅगस्ट 1905 रोजी केसरी वृत्तपत्रामध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात लोकमान्य टिळकांनी कर्झनची कारकीर्द औरंगजेबाची प्रतिकृती होती असे म्हटले होते.
●लोकमान्य टिळक आणि नामदार गोखले यांनी लाॅर्ड कर्झन याची तुलना औरंगाजेबाशी केली.
●कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर लिखित 'किचकवध' नाटकात किचक ची तुलना कर्झन सोबत केली गेली.
●कर्झनची कारकीर्द आपल्या दुष्कृत्यामुळे खुप गाजली. लंडन मध्ये मदनलाल धिंग्रा याने कर्झनला मारण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
● 'व्हाइसराॅय पदाचा राजीनामा दिल्यानंतर कलकत्त्याचा महापौर होण्यास मला आवडेल' असे कर्झन म्हणत.
भारताचा घटनात्मक विकास ( राज्यसेवा - पूर्व + मुख्य साठी )
प्रस्तावना
ब्रिटिश राजवटीपूर्वी भारतात राजेशाही अस्तित्वात होती़ राजेशाहीची अंतिम विधिसत्ता, कार्यकारी सत्ता व न्यायसत्ता ही राजाच्या हातात एकवटलेली होती़.
या काळात मात्र खेडी ही स्वयंपूर्ण होती व स्वतंत्रही होती़ यामुळे सत्तेचे विकेंद्रीकरण झालेले होते.
याच काळामध्ये युरोपियन लोक भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आले त्यामधील एक कंपनी म्हणजे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी होय़.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ची स्थापना इ़ स़ १६०० मध्ये करण्यात आली, या कंपनीने इंग्लंडच्या राणीकडून ३१ डिसेंबर १६०० रोजी पूर्वेकडील देशांशी व्यापार करण्याची सनद मिळवली.
प्रथम ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे एकच ध्येय होते, ते भारतीय लोकांशी व्यापार करणे व त्यापासून नफा कमवणे़ म्हणून इ़ स़ १६०० ते १७५७ पर्यंतच्या कालखंडास ब्रिटिश ईस्ट इंडियाकंपनीचा व्यापार विस्ताराचा काळ असे म्हटले जाते़.
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये सत्तेचा पाया हा प्लासी (१७५७) (बंगाल प्रान्त) च्या लढाईने घातला, तर १७६४ च्या बक्सारच्या लढाईने आपल्या सत्तेचा पाया भक्कम केला़.
भारताच्या घटनात्मक विकासासंदर्भात खालील प्रमाणे वर्गीकरण केले जाते
१) ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या कालखंडामध्ये झालेला घटनात्मक विकास : १७७३ ते १८५८ पर्यंत़
२) ब्रिटिश राणी किंवा ब्रिटिश पार्लमेंटच्या काळामध्ये झालेला घटनात्मक विकास : १८५८ -१९४७
भारताचा घटनात्मक विकास १७७३ -१८५८ :
१७७३ चा रेंग्युलेटिंग अॅक्ट :
बंगालमधील जनतेत कंपनी सरकारकडून होणाऱ्या अत्याचाराच्या व जुलमाच्या बातम्या इंग्लंडमधील अधिकाऱ्यांच्या कानावर पडत होत्या़.
त्याच काळामध्ये बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडला़ बंगाल प्रान्तामध्ये मोठ्या प्रमाणात अराजकता माजली़.
भारतीय व्यापाराचा मक्ता फक्त ईस्ट इंडिया कंपनीला असल्यामुळे इंग्लंडमधील अनेक व्यापाऱ्यांना कंपनीचा हेवा वाटत असे़ व्यापारी कंपनीला राज्य करण्यास परवानगी देण्याविरुद्ध मोठ्या प्रमाणात इंग्लंडमध्ये आरडाओरड सुरू झाली़.
या सुमारास ईस्ट इंडिया कंपनीने पार्लमेंटकडे मोठ्या रकमेच्या कर्जाची मागणी केली़ तेव्हा कंपनीच्या एकूण कारभारावर पार्लमेंटमध्ये टीका होऊन त्यातून कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी रेग्युलेटींग अॅक्ट संमत करावा लागला़.
रेंग्युलेटिंग अॅक्ट
कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटतर्फे जो अॅक्ट देण्यात आला, त्यास रेंग्युलेटिंग अॅक्ट असे म्हणतात़.
त्यावेळी इंग्लंडमध्ये लॉर्ड नॉर्थ यांचे सरकार होते़ त्यांना इंग्लंडमधील संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत होते़ त्यामुळे कंपनी विषयी त्या सरकारने सभागृहामध्ये दोन कायदे केले़
१) पहिल्या कायद्यानुसार कंपनीच्या मागणीनुसार कंपनीला ४ टक्के व्याजदराने व काही अटींवर १४ लाख पौंड एवढे कर्ज दिले़
२) दुसरा कायदा म्हणजे कंपनीच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारा रेग्युलेटिंग अॅंक्ट होय़
रेग्युलेटिंग अॅाक्टमधील तरतूदी
१) या अॅक्टनुसार कंपनीच्या इंग्लंडच्या व भारताच्या घटनेत बदल करण्यात आला़
२) या अॅेक्टनुसार कंपनीच्या कारभाराचे भारतामध्ये एकसूत्रीकरण करण्यात आले़
३) बंगाल प्रान्तातील गव्हर्नरला बंगाल प्रांताचा गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला व त्याच्या नियंत्रणाखाली मुंबई व मद्रास प्रान्ताचे गव्हर्नर आले़ (विशेष बाब म्हणजे १७७३ च्या अॅचक्टपूर्वी अशा प्रकारे नियंत्रण नव्हते़ प्रत्येक प्रांताच्या गव्हर्नरवर प्रत्यक्ष संचालक मंडळाचे नियंत्रण होते़)
४) या अॅरक्टनुसार गव्हर्नर जनरलच्या मदतीला चार जणांचे एक सल्लागार मंडळ नेमण्यात आले़ प्रशासनाच्या कामात मार्गदर्शन व साहाय्य करण्याचे त्याचे काम होते़
५) या कायद्यानुसार बंगालमध्ये गव्हर्नर जनरल आणि ४ जणांचे सल्लागार मंडळ यांचे मिळून कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले होते़ या कार्यकारी मंडळाचे सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जावेत असे ठरवण्यात आले़
६) या कायद्यामधील तरतुदीनुसार १७७४ मध्ये कोलकत्ता या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली़ (पहिले न्यायाधीश -एलिजा इम्पे)
कंपनीचे कर्मचारी या न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रामध्ये आणले़
७) गव्हर्नर जनरल व न्यायाधीशांसह कंपनीच्या सर्व अधिकाऱ्यांना कोणाकडूनही बक्षीस, भेटवस्तू इ़ स्वीकारता येणार नाहीत असे सांगण्यात आले़
८) प्रत्येक २० वर्षानंतर कंपनीच्या कारभाराचे मूल्यमापन केले जाईल किंवा भारताच्या कारभारासाठी फेर कायदा देण्याचे ठरवण्यात आले़ हे फेर कायदे/मूल्यमापन (१) १७९३, (२) १८१३, (३) १८३३, (४) १८५३ मध्ये देण्यात आले
-------------------------------------------------------------------------१७८१
१७८१ चा संशोधनात्मक कायदा :
१७७३ च्या रेग्युलेटिंग अॅाक्टनंतर काही उपायात्मक व पूरक कायदे करण्याची आवश्यकता निर्माण झाली, त्यांपैकी एक म्हणजे १७८१ चा भारत सरकारचा कायदा होय़ यास १७८१ चा संशोधनात्मक कायदा असे म्हणतात़
१) त्यानुसार कंपनीच्या अधिकाऱ्यांना आपल्या शासकीय कार्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर करण्यात आले़
२) यानुसार सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र निश्चित करण्यात आले़.
--------------------------------------------------------------------------पिट्सचा
१७८४ चा पिट्स अॅक्ट :
१७८१ चा भारत सरकारच्या कायद्यानंतर - गव्हर्नर जनरलच्या भारतातील प्रशासनावर सक्त नजर ठेवण्याची गरज आहे अशी जाणीव ब्रिटिश सरकारला (पार्लमेंटला) झाली़ तसेच १७७३ च्या कायद्यातील दोष दूर करण्यासाठी १७८४ चा पिट्स अॅ क्ट देण्यात आला़ (पिट्स हे इंग्लंडचे पंतप्रधान होते़)
तरतुदी :
१) या कायद्यानुसार कंपनीच्या घटनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले़.
२) कंपनीच्या संचालकांचे धोरण नियंत्रित करण्यासाठी ६ सदस्यीय नियंत्रक मंडळाची स्थापना करण्यात आली़
३) या कायद्यानुसार कंपनीचे राजकीय व व्यापारविषयक अधिकार वेगळे करण्यात आले़.
४) गव्हर्नर जनरलच्या अधिकारात वाढ करताना सल्लागार मंडळाची सदस्य संख्या ४ वरून ३ करण्यात आली़.
५) गव्हर्नर जनरलला इतर गव्हर्नरांनी आपल्या प्रांतात लागू केलेले कायदे व नियम याची एक प्रत देणे सक्तीचे केले़
---------------------------------------------------------------------------१७९३
१७९३ चा चार्टर अॅक्ट :
१) या अॅक्टनुसार ईस्ट इंडिया कंपनीला दिलेल्या मुदतीमध्ये पुन्हा २० वर्षाची वाढ करण्यात आली़
२) कंपनीची व्यापाराची मक्तेदारी कमी करण्यात आली.
३) यानुसार नियामक मंडळाच्या सदस्यांना व त्यांच्या नौकर वर्गाला, भारताच्या महसुलातून तनखे देण्याची तरतूद करण्यात आली़.
४) कंपनीने केलेल्या कायद्याची व्याख्या करण्याचा अधिकार सर्वाच्च न्यालायला देण्यात आला.
५) कायम धारा या नवीन महसूल पद्धतीचा अवलंब करण्यात आला.
६) गव्हर्नर जनरल सैन्याचा सर्वाच्च प्रमुख बनला
--------------------------------------------------------------------------१८१३
१८१३ चा चार्टर अॅक्ट :
१) १८१३ च्या चार्टर अॅक्टद्वारे ईस्ट इंडिया कंपनीची मक्तेदारी संपुष्टात आणण्यात आली़
मात्र : कंपनीचा चहाच्या व्यापाराचा तसेच चीनशी व्यापाराची मक्तेदारी कंपनीचीच असेल असे ठरवण्यात आले़.
२) या कायद्यानुसार भारताच्या राज्यकारभाराबाबत सनदेची आणखी २० वर्षे मुद्दत वाढवण्यात आली़.
३) या कायद्यानुसार नियंत्रक मंडळाची सत्ता अधिक स्पष्ट करण्यात आली व त्यात वृद्धी करण्यात आली़.
४) या कायद्याने सरकारने जनतेत शिक्षण प्रसार करण्याचे ठरवले़.
५) भारतीय लोकांच्या शिक्षणासाठी प्रतिवर्षी कंपनीने १ लाख रुपये खर्च करावेत असे कायद्यात सांगितले़
६) या अॅनक्टनुसार खिस्ती धर्मप्रचारकास भारतामध्ये येण्याचे परवाने मिळाले़.
--------------------------------------------------------------------------१८३३
१८३३ चा चार्टर अॅक्ट :
१) या कायद्यानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला २० वर्ष मुदत वाढ देण्यात आली़
२) १८३३ च्या चार्टर अॅशक्टनुसार भारतामध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासनाचे केंद्रीकरण करण्यात आले़ यानुसार बंगालचा गव्हर्नर जनरल यास भारताचा गव्हर्नर जनरल हा किताब देण्यात आला़.
भारताचा पहिला गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग़
३) १८३३ च्या चार्टर अॅक्टनुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतीय घटनेत बदल करण्यात आला व या अॅक्टनुसार कंपनीचा चहाचा व्यापार व चीनसोबतच्या व्यापारविषयक मक्तेदारी संपुष्टात आली़
४) या कायद्यानुसार प्रांताच्या गव्हर्नरच्या मंडळातील सदस्यांची तीन ही संख्या निश्चित करण्यात आली; परंतु आर्थिक बाबतीत पूर्वीचे विकेंद्रीकरण नष्ट करण्यात आल्याने अधिकारावर मर्यादा आली़ अर्थकायदा, याबाबतीतही प्रांतावर मध्यवर्ती सरकारचे नियंत्रण प्रस्थापित झाले़
5) विधी आयोगाची स्थापना करण्यात आली (अध्यक्ष-लॉर्ड मेकोले)
-----------------------------------------------------------------------------१८५३
१८५३ चा चार्टर अॅक्ट :
:रेग्युलेटिंग अॅटक्टमधील तरतुदीनुसार १७९३, १८१३, १८३३ व १८५३ या मधील १८५३ चा चार्टर अॅक्ट महत्त्वाचा आहे़.
एकीकडे डलहौसीच्या साम्राज्यवादी धोरणामुळे भारतातील अनेक संस्थाने ब्रिटिश साम्राज्यात विलीन झाली होती़.याच सुमारास ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता भारतामधून संपवावी अशी मागणी भारतातील अनेक नेत्यांनी, संस्थानांनी केलेली होती़.
या सर्व मागण्यांचा काही फायदा झाला नाही कारण या अॅक्टनुसार कंपनीची सत्ता संपुष्टात आणण्यात आली नाही; पण सत्तेचा कालावधीही ठरविण्यात आला नाही़.
तरतुदी
१) कंपनीला व्यापाराचा व कारभाराची सत्ता मागील चार्टर अॅक्टप्रमाणे २० वर्षे वाटून देण्यात आली नाही़
२) या अॅक्टनुसार इंग्लंड पार्लमेंट जोपर्यंत देईल तेवढीच मुदतवाढ मिळेल असे स्पष्ट केले़
३) गव्हर्नर जनरल व गव्हर्नर यांच्या सल्लागार मंडळात पार्लमेंटच्या अनुमतीनेच सभासदांची नेमणूक केली जावी असे स्पष्ट केले़
४) बोर्ड ऑफ कंट्रोल अध्यक्षाचा दर्जा वाढवून त्याला इंग्लंडमधील मंत्र्यांचा दर्जा देण्यात आला़
५) भारतीयांच्या मागणीनुसार सनदी नोकरांच्या भरतीसाठी स्पर्धा परीक्षेची पद्धत स्वीकारण्यात आली़ (१८५४ मध्ये भारतामध्ये पहिल्यांदा स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या)
६) या कायद्यानुसार बंगाल प्रांतासाठी गव्हर्नरचे स्वतंत्र पद देण्यात आले़ यापूर्वी बंगालचा गव्हर्नर जनरल बंगालचा कारभार पाहत असे़.
इंग्रज अधिकारी व कामगिरी
▪️रॉबर्ट क्लाइव्ह - दुहेरी राज्यव्यवस्था
◾️वॉरन हेस्टींग - रेग्युलेटिंग अॅक्ट
◾️लॉर्ड कॉर्नवॉलिस - कायमधारा पद्धत
◾️लॉर्ड वेलस्ली - तैनाती फौज
◾️लॉर्ड हेस्टींग - पेंढाऱ्यांचा यशस्वी बंदोबस्त
◾️ लॉर्ड विल्यमबेंटीक - सती प्रतिबंधक कायदा
◾️ चार्ल्स मूटकॉफ - वृत्तपत्राचा मुक्तिदाता
◾️ लॉर्ड हार्डिग्ज पहिला - सरकारी कार्यालय रविवार सुट्टी
◾️ लॉर्ड डलहौसी - संस्थाने खालसा धोरण
◾️ लॉर्ड कॅनिंग - भारताचा पहिला व्हाईसरॉय
◾️ सर जॉन लॉरेन्स - दुष्काळ आयोगाची स्थापना
◾️ लॉर्ड मेयो - आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
◾️ लॉर्ड लिटल - व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
◾️ लॉर्ड रिपन - स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक.
डॉ. भीमराव रामजी आंबेडकर
जन्म - 14 एप्रिल 1891 महू, मध्यप्रदेश.
मृत्यू - 6 डिसेंबर 1956, मुंबई.
त्यांना घटनेचे शिल्पकार म्हटले जाते.
तसेच दलितांचा मुक्तिदाता म्हणून आंबेडकरांना संबोधले जाते.
1990 - 91 मरणोत्तर भारतरत्न हे वर्ष त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त सामाजिक न्यायवर्ष म्हणून साजरे केले जाते.
हिंदू कोड बिल मांडल्यामुळे त्यांना 'आधुनिक मनू' म्हटले जाते.
सामाजिक समता हा यांच्या विचारविश्वाचा केंद्रबिन्दु होता.
आंबेडकर हे 1947 - 51 नेहरू मंत्रिमंडळात कायदेमंत्री होते.
संस्थात्मक योगदान :
1924 - बहिष्कृत हितकारिणीची स्थापना.
1924 - बहिष्कृत मेळा. नागपूरहुन रिपब्लिकन पक्षाच्या स्थापनेची घोषणा.
20 मार्च 1927 - महाड येथे चवदार तळ्याचा सत्याग्रह.
25 डिसेंबर 1927 - मनुस्मृती दहन.
2 मार्च 1930 - नाशिक येथे काळाराम मंदिर सत्याग्रह (1935 मध्ये मंदिर खुले)
24 सप्टेंबर 1932 - पुणे करार, अस्पृश्यांसाठी कायदे मंडळात 148 जागा राखीव.
1933 - मुखेड येथे धार्मिक ग्रंथाचे पारायण.
ऑगस्ट 1936 - स्वातंत्र् मजुर पक्षाची स्थापना.
1937 - बाळासाहेब खरे सरकारात विरोधी पक्ष नेते.
1942 - नागपूर येथे All India Scheduled Castes Federation ची स्थापना. यांसाठी आप्पा दुराई यांनी मदत केली.
मे - 1946 : Peoples Education Society स्थापना.
20 जुलै 1946 - सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स, मुंबई. मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद.
आंबेडकरांचे लेखन :
The Problem Of Rupee
1916 - Cast In India
1930 - जनता वृत्तपत्र (1956 साली जनताचे नाव प्रबुद्ध भारत केले.)
1946 - The Untouchables
1956 - Thoughts on pakisthan.
1957 - बुद्ध आणि धम्म, हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957 मध्ये प्रकाशित.
'मुकनायक' ची सुरुवात संत तुकाराम यांच्या तर 'बहिकृत भारत'ची सुरुवात संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी होत असे.
1920 - मुकनायक.
1927 - समता.
1946 - Who Were Shudras?
वैशिष्ट्ये :
गौतम बुद्ध, महात्मा फुले, कबीर हे तीन गुरु.
1920 - च्या माणगाव परिषदेचे अध्यक्षपद.
1930, 31-32 या तीनही गोलमेज परिषदांत अस्पृशांचे प्रतिनिधित्व.
1935 - येवला (नाशिक) या ठिकाणी धर्मांतर घोषणा. मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो, तरी हिंदू म्हणून मरणार नाही,अशी घोषणा.
शिका ! संघटित व्हा ! संघर्ष करा, हा संदेश दिला.
29 ऑगस्ट 1947; मसुदा समितीचे अध्यक्ष.
1948 - हिंदू कोडबिल संसदेत मांडले.
14 ऑक्टोबर 1956 धंर्मांतर. नागपूर येथे बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. चंद्रमणी महास्थावीर यांनी दीक्षा दिली.
खोती पद्धत
🔹खोतांच्या प्रशासन पद्धतीला खोती असे म्हणत.
🔸खोत हा ब्रिटीश भारतातील गावचा एक प्रशासकीय अधिकारी असे.
🔹 तो गावातील शेतसारा गोळा करून सरकारला देत असे.
🔸 खोत शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.
🔹खोती पद्धत बहुतांशी
कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि
सिंधुदुर्ग येथे आढळून येत होती.
🔸खोती पद्धतीने शेतकऱ्यांचे कमालीचे शोषण होत होते.
🔹कळांनी जमीन कसायची आणि ७५ टक्के वाटा सावकारांना द्यायचा, अशी ही अन्यायकारक पद्धत होती.
🔺 ही एक प्रकारची वेठबिगारीच होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी खोती पद्धतीला नष्ट करण्यासाठी लढा दिला व ही पद्धत समाप्त केली.
🔸 तयांनी इ.स. १९०५ ते १९३१ या काळामध्ये पेण, वाशी, पोलादपूर, चिपळूण, माणगाव, महाड, खेड, तळा, रोहा इत्यादी गावांत अनेक सभा घेतल्या.
🔹तयानंतर खोतांना हादरा देण्यासाठी कोकणातील १४ गावच्या शेतकऱ्यांनी १९३३ ते १९३९ पर्यंत संप पुकारला होता.
🔸शतकरी नेते नारायण नागू पाटील हे या संपाचे नेतृत्व करत होते.
🔹शतकऱ्यांच्या या लढ्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी साथ दिली.
त्यावेळी झालेल्या केसेस लढण्यासाठी बाबासाहेब स्वतः शेतकऱ्यांच्यावतीने न्यायालयात उभे राहिले होते.
📚 खोतांचे अधिकार 📚
🔸एका खोताकडे अनेक गावांचे अधिकार असत. गावातील सर्वाधिक अधिकार हे खोताकडे असत.
🔹खोत या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ जमीनदार असाही होतो.
🔸खोताचे हक्क हे वंशपरंपरेने चालत असत. खोताकडे घाटावरील देशमुख आणि देशपांडे यांप्रमाणे काही अधिकार होते.
🔹भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर खोताचे अधिकार नष्ट झाले. तरी काही प्रमाणात गावातील त्याचा मान किंवा वजन तसेच राहिले.
🔺कोकणातील बहुतांशी खोत घराण्याची आडनावे ही सर किंवा प्रभू या उपसर्गाने सुरु होतात.
➡️ उदा. सरदेशपांडे, सरदेसाई, सरपोतदार, सरजोशी, प्रभुदेसाई इ.
सह्यादीतील घाट
उत्तर दक्षिण घाट
सह्याद्री पर्वतातले महाराष्ट्र राज्याअंतर्गत येणारे मोटारीने वाहतूक करता येण्यासारखे घाट
●सह्याद्रीतील प्रमुख घाट
□ घाट जोडलेली शहरे
•आंबाघाट रत्नागिरी-कोल्हापूर
•आंबेनळी घाट महाबळेश्वर-पोलादपूर
•आंबोली-रामघाट सावंतवाडी– कोल्हापूर
•कुंभार्ली घाट चिपळूण-कराड
•खंबाटकी-खंडाळा पुणे-सातारा
•चंदनापुरी घाट नाशिक-पुणे
•ताम्हिणी घाट माणगाव (कोकण)-पुणे
•दिवा घाट पुणे-सासवड
•थळघाट-कसार्याचा घाट नाशिक-मुंबई
(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३)
०पसरणी घाट वाई-महाबळेश्वर
०पारघाट सातारा-रत्नागिरी
०फोंडाघाट कोल्हापूर-गोवा
०बोरघाट-खंडाळ्याचा घाट पुणे-मुंबई
(राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४)
०माळशेज घाट आळेफाटा-कल्याण
०रणतोंडी घाट महाड-महाबळेश्वर
०वरंधा घाट भोर-महाड
महाराष्ट्राचा भूगोल
महत्त्वाचे घाट... स्थान
उत्तरेकडून दक्षिणेकडे
● थळ घाट(कसारा घाट)=मुंबई- नाशिक
○ माळशेज घाट =ठाणे-अहमदनगर
●बोर घाट (खंडाळा घाट)=मुंबई-पुणे
○वरंधा घाट=भोर - महाड
● खंबाटकी घाट=पुणे - सातारा
○ पसरणी घाट= वाई - महाबळेश्वर
● आंबेनळी घाट =महाबळेश्वर - महाड
○ कुंभार्ली घाट =कराड - चिपळूण
● आंबा घाट = कोल्हापूर - रत्नागिरी
○ फोंडा घाट= कोल्हापूर - पणजी
●हनुमंते घाट = कोल्हापूर - कुडाळ
○ अंबोली घाट= बेळगाव - सावंतवाड
अस्पृश्य निवारण परिषदा
23 मार्च, 1918 - अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद.❗️
🔺ठिकाण - मुंबई
🔺अध्यक्ष- महाराज सायाजीराव गायकवाड.
🔺आयोजक - महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
🔺स्वागताध्यक्ष - न्या. चंदावरकर
📍 महत्वाचे - "जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्यालाही मी देव मानणार नाही" असे लोकमान्य टिळकांनी याच परिषदेत प्रसिद्ध उद्गार काढले होते.
25 डिसेंबर 1920 रोजी अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद❗️
🔺 ठिकाण - नागपूर
🔺अध्यक्ष – महात्मा गांधी
२२ मार्च १९२० रोजी 'दख्खन अस्पृश्य समाजाची परिषद' ❗️
🔺ठिकाण - माणगाव, कागल
🔺अध्यक्ष - डॉ. बाबासाहेब आंबेडकर
🔺आयोजक - राजश्री शाहू महाराज
🔺स्वागताध्यक्ष- दादासाहेब इनामदार
📍महत्वाचे - याच परिषदेत शाहू महारजांनी डॉ. आंबेडकरांना पुढारी म्हणून घोषित केले होते.
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
महाराष्ट्रातील समाजसुधारक विठ्ठल रामजी शिंदे
विठ्ठल रामजी शिंदे :
जन्म – 23 एप्रिल 1873, जामखिंडी, कर्नाटक.
मृत्यू – 2 जानेवारी 1944.
1932 – 33: बडोदा संस्थानचे सयाजीराव गायकवाड परितोषिक.
‘महाराष्ट्राचे अपेक्षित मानकरी‘ गं. बा. सरदार.
‘निष्काम कर्मयोगी‘, भाई माधवराव बागल.
जनतेकडून ‘महर्षी‘ ही पदवी.
अस्पृश्यता निर्मूलनाचा प्रश्र्न राष्ट्रीय एकात्मतेशी जोडला.
संस्थात्मक योगदान :
1905 – मुंबई येथे तरुण अस्तिकांचा संघ स्थापन.
18 ऑक्टोबर 1906 – डिप्रेस्ड क्लास मिशनची मुंबई
येथे स्थापना. पहिले अध्यक्ष – न्या. चंदावकर.
1910 – जेजूरी येथे मुरळी प्रतिबंधक चळवळ.
द्याराम गिड्डमल यांच्या सहकार्याने ‘सेवा सदन‘ ही संस्था.
अनाथाश्रम – रावजी भोसले यांच्या सहकार्याने पंढरपूर येथे देवदासी प्रथा व व्यसनमुक्ति कार्य.
ब्राहय समाजाच्या प्रसारासाठी ब्राहय पोस्टल मिशनची स्थापना.
23 मार्च 1918 – अस्पृश्यता निवारक संघ.
1918 – मराठा समाजात जागृतिंनिर्माण करण्यासाठी मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना.
1920 – पुण्यातील दुष्काळ पीडितांसाठी दुष्काळ आपत्ती निवारण संस्था.
1937 – स्त्रियांसाठी अहिल्याश्रम.
1923 – तरुण ब्रहयो संघ.
1937 – बहुजन पक्षाची स्थापना.
स्त्रियांसाठी आर्य
महिला समाज, कौटुंबिक उपासना मंडळ.
वृद्धंनसाठि संगत सभा.
लेखन :
प्रार्थना समाजाच्या सुबोध पत्रिकेत लेखन.
1903 – प्रार्थना समाजाच्या सदस्यांसाठी उपासना हे साप्ताहिक.
1903 – अॅमस्टारडॅम येथे जागतिक धर्म परिषदेत ‘हिंदुस्थानातील उदारधर्म’ हा निबंध वाचला.
Thiestic Directory जागतिक उदार धर्माची माहिती सांगणारा धार्मिक ग्रंथ लिहाला.
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न
माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र .
वैशिष्ट्ये :
शिमग्याच्या सणातील बीभत्स प्रकारांना आळा बसावा म्हणून जनजागृती मोहीम
अस्पृश्यानसाठी रूपी फंड हा उप्रकार.
1904 – मुंबई धर्म परिषद.
1905 – अहमदनगर जवळ भिंगार येथे अस्पृश्योध्दाराची शपथ.
1918 – मुंबई येथे अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद भरविली. अध्यक्ष सायाजीराव गायकवाड.
1924 – वायकोम सत्याग्रह (त्रावनकोर), अस्पृश्य सत्याग्रहात सहभाग.
1935 – बडोदा मराठी साहित्य संमेलनात तत्वज्ञान व समाजशास्त्र शाखेचे अध्यक्ष.
स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जपान मधील विद्या पिठाच्या धर्तीवर भारतात महिला विद्यापीठे व्हावीत, असे मत.
शाहू महाराजांनी क्षात्र जगतगुरुपदी मराठा व्यक्ति नेमल्याबद्दल निषेध केला.
पोलीस भरती प्रश्नसंच
1. बेळगाव येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाच्या (१९२१ च्या) अध्यक्षपदी कोण होते?
शिवराम महादेव परांजपे. √
विष्णुशास्त्री चिपळूणकर
कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे
छत्रपती शाहू महाराज
=========================
2. विसोबा खेचर हे कोणत्या संतांचे अध्यात्मिक गुरू होते
संत तुकाराम
संत सावतामाळी
संत नरहरी सोनार
संत नामदेव. √
=========================
3. इंग्रज सरकारने जस्टिस ऑफ पीस हा बहुमोल सन्मान कोणास दिल?
डॉ. भाऊ दाजी लाड
दादोबा पांडुरंग
बाळशास्त्री जांभेकर
नाना जगन्नाथ शंकरशेठ. √
=========================
4. चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा ---------- शी संबंधित होता.
ऊस
कापूस
भात
नीळ. √
=========================
5. इ.स. १८५७ च्या उठावाचे तत्कालिक कारण होते..........
गाईची व डुक्कराची चरबी लावलेल्या काडतुसांचा उपयोग. √
अनेक संस्थाने खालसा करणे
ख्रिश्चन धर्म प्रसार करणे
पदव्या, वतने आणि पेन्शन रग करने
=========================
6. गांधीजानी वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले अनुयायी म्हणून कोणाची निवड केली होती?
पंडित जवाहरलाल नेहरू
विनोबा भावे. √
सरदार वल्लभभाई पटेल
मौलाना आझाद
=========================
7. विनोबा भावे यांची गीता प्रवचने कशी तयार झाली?
विनोबा भावेंनी राजबंद्यांसमोर गीतेवर अठरा प्रवचने केली
साने गुरूजी श्रोते विनोबांची प्रवचने ऐकत
साने गुरूजी विनोबांच्या प्रवचनाचे टिपण तयार करीत असत. √
विनोबा भावे हे गीता प्रवचनाचे लेखक आहेत
=========================
8. सन १९४० मध्ये रामगढ येथे भरलेल्या राष्ट्रीय कॉग्रेसच्या अधिवेशनात कोणता ठराव पास करण्यात आला?
इंग्रजांना दुसऱ्या महायुध्दात सहकार्य करणे
ब्रिटिशांना भारतातून हाकलून लावणे
वैयक्तिक सत्याग्रह चळवळ सुरु करणे. √
निवडणुकांवर बहिष्कार टाकणे
=========================
9. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधार्थ सर ही पदवी कोणी परत केली?
रविंद्रनाथ टागोर . √
लाला लजपतराय
लाला हरदयाळ
महात्मा गांधी
=========================
10. संत तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत ही पदवी कोणी दिली?
डॉ. रार्जेद्र प्रसाद. √
डॉ. राधाकॄष्णन
डॉ. आंबेडकर
डॉ. झाकीर हुसेन
=========================
11. ………… वॄक्षापासून तयार होणाया गोंदास मागणी आहे.
खैर. √
कुसूम
कंडोल
शलार्इ
=========================
12. इस्त्रायलची राजधानी कोणती?
जेरुसलेम. √
दमास्कस
तेल अवीव
तेहरान
=========================
13. ............... वंशाचे लोक मध्य व पूर्व आशियात आढळतात.
निग्रॉइड
मंगोलाइड . √
बुश मॅनाइड
ऑस्ट्रेलोंइड
=========================
14. महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत?
हरिहरेश्र्वर
वज्रेश्र्वरी. √
गणपतीपुळे
संगमेश्र्वर
=========================
15. खालीलपैकी कोणती जमीन कापसाची जमीन म्हणून ओळखली जाते?
गाळाची जमीन
काळी जमीन. √
तांबडी जमान
रेताड जमीन
=========================
16. भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र …………… येथे उभारण्यात आले.
पाडेगाव
कोर्इमतूर
कानपूर
मांजरी. √
=========================
17. ……… हे भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.
दिल्ली
चेन्नर्इ
मुंबर्इ. √
हैद्राबाद
=========================
18. देशात सर्वात जास्त साक्षरता कोणत्या राज्यात आहे.
महाराष्ट्र
केरळ . √
प. बंगाल
तमिळनाडू
=========================
19. भारतातील पहिले दूरचित्रवाणी केंद्र कोठे चालू झाले?
मुंबई
दिल्ली. √
मद्रास
बंगलोर
=========================
20. लक्षव्दिप बेटे कोणत्या समुद्रात आहेत?
अरबी समुद्र . √
बंगालचा उपसागर
हिंदी महासागर
पॅसिफिक महासागर
02 October 2025
नवीन नियुक्ती व नेमणुका 2025
🔹 प्रश्न: खाण मंत्रालयाचे नवे सचिव कोण झाले?
उत्तर: पियुष गोयल
🔹 प्रश्न: भारताचे नवे उपराष्ट्रपती कोण झाले?
उत्तर: सी. पी. राधाकृष्णन
🔹 प्रश्न: 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्ष म्हणून कोणांची निवड झाली?
उत्तर: विश्वास पाटील
🔹 प्रश्न: असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाचे (AMFI) नवे अध्यक्ष कोण झाले?
उत्तर: संदीप सिक्का
🔹 प्रश्न: नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे नवे अध्यक्ष कोण झाले?
उत्तर: इंजेती श्रीनिवास
🔹 प्रश्न: अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेचे (AIIA) नवे संचालक कोण झाले?
उत्तर: प्रदीप कुमार प्रजापती
🔹 प्रश्न: केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (CISF) नवे महासंचालक कोण झाले?
उत्तर: प्रवीर रंजन
🔹 प्रश्न: इंडो-तिबेटी सीमा पोलिस दलाचे (ITBP) नवे महासंचालक कोण झाले?
उत्तर: प्रवीण कुमार
🔹 प्रश्न: कंट्रोलर जनरल ऑफ कम्युनिकेशन्स अकाउंट्स (CGCA) म्हणून कोणांची नियुक्ती झाली?
उत्तर: वंदना गुप्ता
चालू घडामोडी सराव प्रश्न
प्रश्न.1) CAA अंतर्गत भारतीय नागरिकत्व मिळवणारे गोव्यातील पहिले व्यक्ती कोण बनले आहे ?
उत्तर - ख्रिश्चन जोसेफ परेरा
प्रश्न.2) केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांसाठी कोणती योजना जाहीर केली आहे?
उत्तर - डिजिटल कृषी मिशन
प्रश्न.3) पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताने सुमित अंतील ने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - सुवर्ण
प्रश्न.4) सलग दोन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावणारा सुमित अंतिल कितवा भारतीय भालाफेक पटु ठरला आहे?
उत्तर - पहिला
प्रश्न.5) पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या निषाद कुमार ने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - रौप्य
प्रश्न.6) राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद २०२४ कुठे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर - मुंबई
प्रश्न.7) कोणत्या फुटबॉल संघाने Durand Cup २०२४ चे विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर - North East United
प्रश्न.8) केंद्र सरकारने मनमाड ते इंदूर या नवीन किती किलोमीटर रेल्वे प्रकल्पाला मंजुरी दिली आहे?
उत्तर - 309 किमी
30 September 2025
चालू घडामोडी :- 29 सप्टेंबर 2025
29 September 2025
चालू घडामोडी :- सप्टेंबर 2025
28 September 2025
रागासा चक्रीवादळ
🔹 2025 मधील जगातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ (Typhoon)
🔹 वेग ताशी – 270 ते 295 किलोमीटर पर्यंत होता
🔹 ‘सुपर टायफून’ म्हणून ओळखले जाते
🔹 मुख्य प्रभावित क्षेत्र – फिलिपिन्स, तैवान, हाँगकाँग आणि दक्षिण चीन
🔹 पॅसिफिक महासागरात तयार झाले
🔹 'Ragasa' हे नाव फिलिपिन्सने दिले आहे
🔹 Ragasa अर्थ – “अचानक वेगवान हालचाल”
🔰 नुकतीच आलेली काही चक्रीवादळे
🔹 शक्ती (मे 2025) – बंगालचा उपसागर, भारताचा पूर्व किनारा (नाव – श्रीलंका)
🔹 अल्फ्रेड (मार्च 2025) – ऑस्ट्रेलियाचा दक्षिण-पूर्व किनारा (नाव – ऑस्ट्रेलिया)
🔹 जुड (मार्च 2025) – मादागास्कर आणि मोझांबिक (नाव – मॉरिशस)
🔹 डिक्लेडी (जानेवारी 2025) – दक्षिण-पश्चिम हिंदी महासागर
🔹 चिदो (डिसेंबर 2024) – मोझांबिक (नाव – मॉरिशस)
संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम (UNEP) – यंग चॅम्पियन्स ऑफ द अर्थ 2025
🔹 पुरस्काराचे स्वरूप
➤ ३० वर्षांखालील तरुणांना उत्कृष्ट पर्यावरणीय नवकल्पनांसाठी दिला जाणारा UNEP चा प्रतिष्ठित पुरस्कार.
🔹 २०२५ चे विजेते
🔹 जिनाली मोदी (भारत) ✅✅
🔹 जोसेफ न्गुथिरा (केनिया)
🔹 नोएमी फ्लोरिया (अमेरिका)
🔹 भारताची जिनाली मोदी – विशेष सन्मान
➤ मुंबईतील उद्योजिका आणि Banofi Leather च्या संस्थापक.
➤ केळी पिकाच्या कचऱ्यापासून (Banana Crop Waste) शाश्वत (Sustainable) व पर्यावरणपूरक लेदर पर्याय तयार केला.
🔹 नाविन्यपूर्ण उपाय (Innovation)
🔹 पारंपरिक लेदरच्या तुलनेत ९५% कमी पाणी वापर.
🔹 ९०% पेक्षा जास्त कार्बन उत्सर्जन घट.
🔹 विषारी रसायनांचा वापर टाळला, ज्यामुळे फास्ट फॅशन उद्योगाचा पर्यावरणीय परिणाम कमी.
🔹 इतर महत्त्वाचे मुद्दे
🔹 प्रत्येक विजेत्याला $20,000 बीज भांडवल (Seed Funding) दिले जाते.
🔹 Mentorship उपलब्ध होते.
🔹 त्यांच्या कल्पनांना जागतिक स्तरावर व्यासपीठ दिले जाते.
आर. वेंकटरमणी - भारताचे अटॉर्नी जनरल (महान्यायवादी) दुसऱ्यांदा नियुक्त
1.कार्यकाळ
🔹 30 सप्टेंबर 2025 रोजी पहिला कार्यकाळ संपला
🔹 1 ऑक्टोबर 2025 पासून नवीन 2 वर्षांचा कार्यकाळ सुरू
2.संवैधानिक अधिष्ठान
🔹 संविधानाच्या कलम 76(1) अंतर्गत नियुक्ती
3.वैयक्तिक माहिती
🔹 वय – 75 वर्षे
🔹 माजी वरिष्ठ अधिवक्ता
4.पदभार स्वीकार
🔹 1 ऑक्टोबर 2022 रोजी कार्यभार स्वीकारला
🔹 के.के. वेणुगोपाल यांच्यानंतर नियुक्ती
5.भूमिका व कार्य
🔹 भारत सरकारचे मुख्य कायदेशीर सल्लागार
🔹 सर्वोच्च न्यायालयात सरकारसाठी युक्तिवाद करणे
🔹 सरकारला कायदेशीर मुद्द्यांवर सल्ला देणे
6.स्थिती
🔹 केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य नाहीत
🔹 संसदेत बोलू शकतात; पण मतदान करू शकत नाहीत
7.पदाचे स्वरूप
🔹 हे पद संवैधानिक आहे
🔹 नियुक्तीचा कार्यकाळ निश्चित नाही; राष्ट्रपतींच्या इच्छेनुसार पदावर राहतात ✅
किनार्यालगतचे सागरी भागातील बेटे व सामुद्रधुनी
🏝️ प्रमुख बेटे
🔹 गंगा नदीच्या मुखाशी – न्यू मरे, सागर, गंगासागर
🔹 नर्मदा नदीच्या मुखाशी – आलिया बेट
🔹 भारत–श्रीलंका दरम्यान – पंबन बेट
🔹 चिलका सरोवरादरम्यान – निक्शोपित बेट
🔹 चिलका सरोवराच्या मुखाशी – पैरकुद बेट
🔹 सौराष्ट्राच्या दक्षिण किनाऱ्यावर – कच्छ, बेला, खाडी बेटे
🔹 पुलिकत सरोवराच्या मुखाशी – श्रीहरीकोटा बेट
🔹 महानदी व ब्राह्मणी नदीच्या मुखाशी – शॉर्ट व व्हिलर बेट
🌊 सामुद्रधुनी व विशेष भौगोलिक रचना
🔹 दक्षिण अंदमान व लिट्ल अंदमान दरम्यान – डंकन पास
🔹 कोको बेटे (म्यानमार) व उत्तर अंदमान दरम्यान – कोको स्ट्रेट
🔹 तमिळनाडू व श्रीलंका दरम्यान – पाल्क स्ट्रेट
🔹 भारत व श्रीलंका दरम्यान – अडम ब्रीज
27 September 2025
भारताच्या डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्राला IUCN मान्यता
1️⃣ मूलभूत माहिती
🔹 IUCN – International Union for Conservation of Nature
🔹 पाल्क खाडीतील भारतातील पहिल्या डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्राला औपचारिक मान्यता
2️⃣ स्थापना व कायदेशीर आधार
🔹 स्थापना – 2022 (तमिळनाडू सरकार)
🔹 कायदा – वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 अंतर्गत
3️⃣ भौगोलिक तपशील
🔹 स्थान – उत्तर पाल्क खाडी, तामिळनाडू
🔹 क्षेत्रफळ – 448.34 चौ. किमी
4️⃣ डुगोंगविषयी माहिती
🔹 डुगोंग याला सामान्यतः ‘समुद्री गाय’ म्हणून ओळखले जाते
🔹 हे सागरी शाकाहारी प्राणी आहेत आणि सागरी परिसंस्थेच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे
📌 टीप: भारतातील पहिले आणि एकमेव डुगोंग संवर्धन राखीव क्षेत्र
बिहारमध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन
1️⃣ मूलभूत माहिती
🔹 ठिकाण – पटना, बिहार
🔹 उद्घाटन – मुख्यमंत्री नितीश कुमार
2️⃣ वैशिष्ट्ये
🔹 एकूण क्षेत्रफळ – 21 एकर
🔹 एकूण खर्च – 889 कोटी रुपये
📌 टीप: विज्ञान प्रसार, नवकल्पना आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सायन्स सिटी एक महत्त्वाचा प्रकल्प मानला जातो.
परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र पहिल्या स्थानावर
◾️ गेल्या आर्थिक वर्षात महाराष्ट्रात एकूण 1,64,875 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक झाली
◾️केवल महाराष्ट्रातच देशातील एकूण गुंतवणुकीच्या 40% गुंतवणूक झाली
🔹 महाराष्ट्रात गुंतवणूक
💠 2023-24 मध्ये : 🔥 1,25,101 कोटी
💠 2024-25 मध्ये : 🔥 1,64,875 कोटी
🔹 भारतातील गुंतवणूक नुसार क्रम (2024-25)
🔹 महाराष्ट्र – 1,64,875 कोटी
🔹 कर्नाटका – 56,030 कोटी
🔹 गुजरात – 47,947 कोटी
🔹 दिल्ली – 51,540 कोटी
🔹 तमिळनाडू – 31,103 कोटी
भारतामधील 2 नवीन रामसर स्थळे
1️⃣ बिहारमधील नवीन स्थळांचा समावेश
🔹 गोकुळ जलाशय – बक्सर जिल्हा (448 हेक्टर)
🔹 उदयपूर सरोवर – पश्चिम चंपारण जिल्हा (319 हेक्टर)
2️⃣ एकूण माहिती
🔹 एकूण 93 रामसर स्थळे
🔹 एकूण क्षेत्रफळ – 13,60,719 हेक्टर
3️⃣ महत्त्वाचे तथ्ये
🔹 भारताचा जागतिक स्तरावर क्रमांक – तिसरा
🔹 तमिळनाडूमध्ये सर्वाधिक – 20 रामसर स्थळे
🔹 जागतिक पाणथळ दिन – 2 फेब्रुवारी
🔹 रामसर कराराची तारीख – 2 फेब्रुवारी 1971
🔹 रामसर मुख्यालय – ग्लैंड, स्वित्झर्लंड
🔹 भारतातील पहिले रामसर स्थळे – चिल्का सरोवर (ओडिशा, 1981) आणि केवलादेवी (राजस्थान)
🔹 क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे – सुंदरबन पाणथळ (प. बंगाल) – 4230 किमी²
🔹 क्षेत्रफळानुसार सर्वात लहान – रेणुका तलाव (हिमाचल प्रदेश) – 0.2 किमी²
26 September 2025
चालू घडामोडी :- 25 सप्टेंबर 2025
◆ 23 सप्टेंबर 2025 रोजी सात वर्षे पूर्ण करणारी जगातील सर्वात मोठी सरकारी अनुदानित आरोग्य विमा योजना "आयुष्मान भारत पंतप्रधान सार्वजनिक आरोग्य योजना" आहे.
◆ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) 23 सप्टेंबर 2018 रोजी रांची येथे सुरू करण्यात आली होती.
◆ राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) ने "सोलर पीव्ही पोटेंशियल असेसमेंट ऑफ इंडिया (ग्राउंड-माउंटेड)" हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
◆ अंत्योदय दिवस दरवर्षी 25 सप्टेंबर रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.
◆ आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) च्या अंमलबजावणीत उत्तर प्रदेश राज्य देशात पहिल्या स्थानावर आहे.
◆ अग्निकुल कॉसमॉसने चेन्नईतील IIT मद्रास रिसर्च पार्कमध्ये भारतातील पहिली खाजगी लार्ज-फॉर्मेट ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग सुविधा सुरू केली आहे.
◆ पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील वाडा येथील गोवर्धन इको व्हिलेज येथे "देसी फूड मॅटर्स" उपक्रमाचा शुभारंभ केला.
◆ राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त आयुर्वेदिक घटक आणि उत्पादनांचा डिजिटल डेटा मिळविण्यासाठी सुरू केलेल्या पोर्टलचे नाव "DRAVYA पोर्टल" आहे.
◆ मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पटना (बिहार) येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सायन्स सिटीचे उद्घाटन केले.
◆ राष्ट्रीय सेवा योजना (NSS) दिन दरवर्षी 24 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.
◆ आंध्र प्रदेश राज्याने भारतातील पहिले व्हॉट्सॲप आधारित गव्हर्नन्स प्लॅटफॉर्म 'मन मित्र' लाँच केले आहे.
◆ भारताच्या संरक्षणमंत्र्यांनी मोरोक्कोमध्ये टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टम्स लिमिटेड (TASL) च्या संरक्षण उत्पादन सुविधेचे उद्घाटन केले.
25 September 2025
चालू घडामोडी :- 24 सप्टेंबर 2025
24 September 2025
काही महत्त्वाच्या परिषदा व आयोजक ठिकाण
🔹️ जागतिक हायड्रोजन शिखर परिषद २०२५ - रॉटरडॅम, नेदरलँड्स
🔹️ ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन - सातारा
🔹️ ५१ वी वार्षिक G7 शिखर परिषद - कॅनडा
🔹️ COP 33 (२०२८) - भारत
🔹️ २०२६ मधील ब्रिक्स शिखर परिषद - भारत
🔹️ वॉन हवामान बदल परिषद २०२५ - जर्मनी
🔹️ ७ वी हेलिकॉप्टर आणि लघु विमान शिखर परिषद - पुणे
🔹️ पहिला आसियान-भारत क्रूझ संवाद - चेन्नई
🔹️ Quad २०२५ ची बैठक - भारत
🔹️ ग्रीन हायड्रोजन समिट २०२५ - आंध्रप्रदेश
🔹️ एआय इम्पॅक्ट समिट २०२६ - भारत
🔹️ २५ वी शांघाय शिखर परिषद २०२५ - चीन
राज्यघटनेतील भाग (Parts)
◆ भाग पहिला – संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
◆ भाग दूसरा – नागरिकत्व
◆ भाग तिसरा – मूलभूत हक्क
◆ भाग चौथा – मार्गदर्शक तत्वे
◆ भाग चार ‘अ’ – मूलभूत कर्तव्ये
◆ भाग पाचवा – संघ
◆ भाग सहावा – राज्य
◆ भाग सातवा – रद्द
◆ भाग आठवा – केंद्र शासित प्रदेश
◆ भाग नववा – पंचायत
◆ भाग नऊ ‘अ’ – महापालिका
◆ भाग नऊ ‘ब’ – सहकारी संस्था
◆ भाग दहावा – अनुसूचीत आणि आदिवशी क्षेत्र
◆ भाग अकरावा – संघ-राज्य संबंध
◆ भाग बारावा – वित्त, मालमत्ता, करार आणि सुट्स
◆ भाग तेरावा – भारताच्या राज्याक्षेत्रातील व्यापार आणि वाणिज्य.
◆ भाग चौदावा – संघ आणि राज्यांतर्गत सेवा
◆ भाग चौदा ‘अ’ – न्यायाधिकरणे
◆ भाग पंधरावा – निवडणुका
◆ भाग सोळावा – विशिष्ट वर्गांशी संबंधित विशेष तरतुदी
◆ भाग सतरावा – भाषा
◆ भाग आठरावा – आणीबाणी तरतुदी
◆ भाग एकोणीसवा – संकीर्ण
◆ भाग विसावा – घटनादुरूस्ती तरतुदी
◆ भाग एकविसावा – तात्पुरती, संक्रमणकालीन आणि विशेष तरतुदी
◆ भाग बाविसावा – संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.
आंतरराष्ट्रीय परिषदा २०२४-२०२५
१. G७ शिखर परिषद २०२५: कॅनडा
२. G२० शिखर परिषद २०२५: दक्षिण आफ्रिका
३. BRICS शिखर परिषद २०२५: ब्राझील (नवीन सदस्य: इजिप्त, इथिओपिया, इराण, युएई, इंडोनेशिया ; एकूण १०)
४. QUAD शिखर परिषद २०२५: भारत
५. ASIAN शिखर परिषद २०२४: लाओस
६. SCO शिखर परिषद २०२४: कझाकस्तान
७. NATO शिखर परिषद २०२४: वॉशिंग्टन डीसी, यूएसए
८. सहावी BIMSTEC शिखर परिषद २०२५: बँकॉक, थायलंड
९. COP ३० (२०२५): ब्राझील
१०.COP २९ (२०२४): बाकू, अझरबैजान
११. INTERPOL गव्हर्नन्स कमिटी: यूएई
22 September 2025
Super Questions
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
1. धुळे-कलकत्ता हा राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 कोणत्या जिल्ह्यातून जातो?
✅ - अमरावती
2. कोणती आदिवासी जमात अमरावती जिल्ह्यात अधिक प्रमाणात आढळते?
✅. - कोरकू
3. अमरावती जिल्ह्यातून जाणार्या सातपुडा पर्वत रांगेस काय म्हणतात?
✅. - गाविलगड रांग
4. पैनगंगा नदी कोणत्या डोंगरात उगम पावते?
✅. - अजिंठा, बुलढाणा
5. पैनगंगा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे?
✅. - पैनगंगा
6. तापी नदीच्या खोर्यात येणारा जिल्हा कोणता?
✅ - बुलढाणा
7. अकोला जिल्ह्याचे हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
✅ - विषम
8. बाळापूर हे इतिहास प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅ - अकोला
9. कारंजा हे गाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अकोला
10. जैनाची काशी कोणत्या ठिकाणाला संबोधले जाते?
✅. - अकोला
11. विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जिल्हा कोणता?
✅ - अकोला
12. शिरपूर हे जैनाचे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अकोला
13. काटेपूर्णा नदीवरील धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अकोला
14. पारस येथील औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - अकोला
15. नळगंगा ही नदी कोणत्या जिल्ह्यात वाहते?
✅. - बुलढाणा
16. कापसाचे कोठार कोणत्या शहरास संबोधतात?
✅. - अमरावती
17 यवतमाळ जिल्ह्यात कोणती आदिवासी जमाट आढळते?
✅. - गोंड
18. लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - बुलढाणा
19. किनवट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - नांदेड व यवतमाळ
20. यवतमाळ जिल्हा कोणता आदिवासी भाग म्हणून ओळखला जातो?
✅. - गोंडवन
21. लाकडाचे आधिक कारखाने असणारा जिल्हा कोणता ?
✅. - अमरावती
22. महाराष्ट्रातील बॉक्साइट कोणत्या जिल्ह्यात सापडते?
✅. - अकोला, अमरावती
23. अमरावती विभागाचे प्रादेशिक नाव काय?
✅. - विदर्भ
24. चिखलदरा हे पर्वत शिकर कोणत्या पर्वतात आहे?
✅. - सातपुडा
25. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्हयात आहे?
✅. - नांदेड व यवतमाळ
26. लोणार क्रेटर वनोद्योग कोणत्या जिल्ह्यात आहे?
✅. - बुलढाणा
27. जलगंगा धरण कोठे आहे?
✅. - बुलढाणा
28. गोसीखुर्द येथील इंदिरा सागर प्रकल्प कोणत्या भागात आहे?
✅. - विदर्भ
29. हळबा, पारधी जमातीचे लोक कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
✅. - यवतमाळ
30. श्री दत्त अवधुताचे जागृत स्थान कोठे आहे?
- कारंजा
महाराष्ट्रातील अभयारण्ये
नरनाळा – अकोला
टिपेश्वर -यवतमाळ
येडशी रामलिंग – उस्मानाबाद
अनेर – धुळे, नंदुरबार
अंधेरी – चंद्रपूर
औट्रमघाट – जळगांव
कर्नाळा – रायगड
कळसूबाई – अहमदनगर
काटेपूर्णा – अकोला
किनवट – नांदेड,यवतमाळ
कोयना – सातारा
कोळकाज – अमरावती
गौताळा औट्रमघाट – औरंगाबाद, जळगांव
चांदोली – सांगली, कोल्हापूर
चपराला – गडचिरोली
जायकवाडी – औरंगाबाद
ढाकणा कोळकाज – अमरावती
ताडोबा – चंद्रपूर
तानसा – ठाणे
देऊळगांव रेहेकुरी – अहमदनगर
नवेगांव – भंडारा
नागझिरा – भंडारा
नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
नानज – सोलापूर
पेंच – नागपूर
पैनगंगा – यवतमाळ, नांदेड
फणसाड – रायगड
बोर – वर्धा
बोरीवली(संजय गांधी) – मुंबई
भिमाशंकर – पुणे, ठाणे
पोलीस भरती प्रश्नसंच
दक्षिण भारतातील गंगा कुठल्या नदीला म्हंटले जाते
१) गोदावरी ✅✅✅
२) कृष्णा
३) भीमा
४) नर्मदा
१)गोदावरीची एकूण लांबी १,४६५ km आहे.
२) महाराष्ट्रात गोदावरी नदीची लांबी ८०० km आहे.
३) गोदावरी नदी महाराष्ट्र , आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यातून वाहत जाऊन बंगालच्या उपसागरात मिळते
अचूक नसलेली विधाने निवडा.
१) १,२
२) २,३ ✅✅✅
३) १,२,३
४) फक्त २
गोदावरी नदीची महाराष्ट्रातील एकूण लांबी 668 किलोमीटर आहे
गोदावरी नदी महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते
कळसूबाई शिखरावर कुठली नदी उगम पावते
१) प्राणहिता
२) इंद्रावती
३) मांजरा
४) दारणा ✅✅✅
दारणा नदी गोदावरी ची उजवी उपनदी आहे
१)सातमाळा डोंगरा वर शिवणा नदी उगम पावते
२) बालाघाट डोंगर रांगेत प्रवरा नदी उगम पावते
३) गोदावरी नदी ने महाराष्ट्राचे ४९% क्षेत्र व्यापलेले आहे
बिनचूक विधाने निवडा
१) १,२
२) २,३
३) १,२,३
४) १,३ ✅✅✅✅
बालाघाट डोंगर रांगात सिंधफणा नदी उगम पावते
प्रवरा नदी हरिश्चंद्र डोंगरावर भंडारदरा जवळ उगम पावते
नेवासे शहर कुठल्या नद्यांच्या संयुक्त प्रवाहावर वसलेले आहे.
१) मुळा मुठा
२) प्रवरा शिवणा
३) मुळा दारणा
४) प्रवरा मुळा ✅
खालीलपैकी कुठली नदी गोदावरी नदीला डाव्या तिरावरून येऊन भेटते
१) शिवना✅✅✅
२) प्रवरा
३) दारणा
४) बोर
शिवना नदी ही गोदावरी ला डाव्या तिरा कडून येऊन भेटते तर प्रवरा दारणा आणि बोर या नद्या उजवा तीरावरून गोदावरीला येऊन भेटतात
प्राणहिता नदी खालीलपैकी कुठल्या नद्या मिळून तयार झाली आहे.
१) वर्धा आणि वैनगंगा
२) वर्धा आणि पैनगंगा
३) वैनगंगा आणि पैनगंगा
४) वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा✅✅✅✅
खालीलपैकी कुठल्या नद्या भीमानदीच्या डाव्या उपनद्या आहेत
१) सीना
२) माण
३) घोड
४) वेळ
१) १,२,३
२) २,३,४
३) १,३,४ ✅✅✅✅
४) वरीलपैकी सर्व
माण ही नदी भीमा नदीची उपनदी
१) कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो.
२) कृष्णा नदीच्या नदी प्रवाहाची दिशा उत्तर - दक्षिण आहे
३) कऱ्हाड या ठिकाणी कृष्णा आणि कोयना नदीचा संगम होतो
चूक नसलेली विधाने निवडा
१) १,२
२) २,३
३) १,२,३ ✅✅✅
३) १, 3
डाव्या किनाऱ्याने कृष्णा नदीस कुठली नदी मिळते
१) दूधगंगा
२) तुळशी
३) पंचगंगा
४) येरळा ✅✅✅
कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्याने फक्त येरळा नदी येऊन मिळते
तापी नदी कुठल्या राज्यातून वाहते
१) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात ✅✅✅✅
२) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड
३) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश
४) मध्यप्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक
खोल घळई मधून कुठली नदी वाहते
१) तापी ✅✅✅
२) गोदावरी
३) कृष्णा
४) भीमा
तापी नदीचे क्षेत्र खचदरी च्या भागात येते म्हणून ही नदी खोल घळई मधून वा
१) कोकणातील नद्या लांबिने खूप लहान असून मंद गतीने वाहतात
२) कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास नदी आहे.
३) कोकणातील नद्या पञ्चीमवाहिनी नद्या आहेत
४) कोकणातील नद्या त्रिभुज प्रदेश तयार करतात.
बिनचूक नसलेली विधाने निवडा.
१) १,२
२) २,३
३) १,३
४) १,४ ✅✅✅
कोकणातील नद्या लांबीने लहान असतात परंतु त्या वेगाने वाहतात
कोकणातील नद्या खाड्या तयार करतात
महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी किती टक्के क्षेत्र व्यापले आहे
१) 65%
२) 81%
३) 70 %
४) 75% ✅✅✅
महाराष्ट्रातील लांबीनुसार नद्यांचे क्रम लावा
१) गोदावरी, तापी, भीमा, वैनगंगा
२) गोदावरी , भीमा , वैनगंगा ,तापी
३) गोदावरी, भीमा, तापी, वैनगंगा
४) गोदावरी, वैनगंगा, भीमा , तापी ✅✅✅
गोदावरी 668 km
वैनगंगा 495 km
भीमा 451 km
तापी 208 कम
नद्यांच्या खोऱ्याच्या क्षेत्रफळानुसार नद्यांचा चढता क्रम ओळखा
१) भीमा, वर्धा, कृष्णा, गोदावरी
२) कृष्णा, वर्धा, भीमा, गोदावरी ✅✅✅✅
३) वर्धा, कृष्णा ,भीमा , गोदावरी
४) वर्धा, भीमा, कृष्णा, गोदावरी
खालीलपैकी अचूक विधान ओळखा?
A) सातमाळा अजिंठा डोंगररांगांमुळे गोदावरी नदीचे खोरे हे तापी नदीच्या खोऱ्यापासून अलग झालेले आहे.
B) गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे शंभू महादेव डोंगररांगामुळे अलग झालेले आहे.
*पर्यायी* *उत्तरे*
1) अ आणि ब दोन्ही सत्य
2) अ आणि ब दोन्ही असत्य
3) हे सत्य असून बी असत्य आहे✅✅
4) हे असत्य असून बी सत्य आहे.
*स्पष्टीकरण* गोदावरी नदीचे खोरे आणि भीमा नदीचे खोरे हे हरिश्चंद्र बालाघाट या रंगामुळे अलग झालेले आहे.
महाराष्ट्रात पुन्हा प्रवेश करणाऱ्या खालीलपैकी कोणत्या नद्या आहेत?
1) गोदावरी, मांजरा, तापी✅
2) गंगा गोदावरी कृष्णा
3) महानदी कावेरी तापी
खालीलपैकी अचूक विधाने ओळखा?
1) गोदावरी नदीची महाराष्ट्रातील लांबी 668 किमी आहे.
2) भीमा नदीची महाराष्ट्रातील लांबी 451 किमी आहे.
3) कृष्णा नदीची महाराष्ट्रातील लांबी 282 किमी आहे.
4) तापी नदीची महाराष्ट्रातील लांबी 208 किमी आहे.
महाराष्ट्राचा भूगोल
✳️पराकृतिक विभाग
१. कोकण किनारपट्टीचा सखल प्रदेश
२. सह्याद्री व त्याच्या पुर्वेकडील रांगा
३. महाराष्ट्राचे पठार
४. उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगा
✳️महाराष्ट्रातील जलप्रणाली
🅾️पश्चिम वाहिनी नद्या
१. तापी-पूर्णा नदी प्रणाली
२. कोकणातील नद्या - उल्हास, सावित्री, तेरेखोल इ.
🅾️पर्व वाहिनी नद्या
१. प्राणहिता नदी प्रणाली
२. गोदावरी नदी प्रणाली
३. कृष्णा नदी प्रणाली
४. भीमा नदी प्रणाली
🅾️हवामान
महाराष्ट्रातील हवामान मोसमी वाऱ्यांच्या टापूत येत असल्याने महाराष्ट्राचे सर्वसामान्य हवामान मोसमी प्रकारचे आहे. परंतु संपूर्ण वर्षाच्या हवामानाच्या स्थितीचा विचार करता राज्यात वर्षभर हवामानाची स्थिती सारखी नसते. महाराष्ट्रात काही काळ हवामान उष्ण, कधी काळ पावसाळी तर कधी काळ थंड असते. शिवाय वर्षभरात मोसमी वाऱ्यांच्या स्थितीत फरक पडतो. मोसमी वाऱ्यांच्या स्थितीचा विचार करता महाराष्ट्रातील हवामानाचे दोन(२) भाग पडतात.
(१) नैऋत्य मोसमी हवामान
(२) ईशान्य मोसमी हवामान
✳️महाराष्ट्राच्या हवामानावर परिणाम करणारे घटक
१. भौगोलिक स्थान
२. अक्षवृत्तीय विस्तार
३. मोसमी वारे
४. सागरी सान्निध्य
५. प्राकृतिक रचना
✳️मदा
१. भरड उथळ मृदा (डोंगरमाथ्यावरील)
२. मध्यम काळी मृदा (सपाटीवरील)
३. खोल काळी मृदा
४. तांबूस तपकिरी डोंगरउतारावरील मृदा
५. समुद्रकिना-यावरील रेताड मृदा
६. पिवळसर तपकिरी मृदा
७. जम्भी व जांभ्यासारखी मृदा
८. समुद्रकिना-यावरील खारट जमीन
✳️वनस्पती
महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमाण विदर्भ, कोकण व सह्याद्री डोंगररांगात जंगले आढळून येतात. मराठवाड्यात हे प्रमाण खूपच कमी आहे.
🅾️महाराष्ट्रात वनस्पतीचे प्रमुख प्रकार:
१. उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती
२. उष्ण कटिबंधीय निम-सदाहरित वनस्पती
३. उप-उष्ण कटिबंधीय सदाहरित वनस्पती
४. आर्द्र-पानझडी वनस्पती
५. शुष्क पानझडी वनस्पती
६. रूक्ष काटेरी वनस्पती
७. खाजण वनस्पती
महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या उपनद्या -
🔶 गोदावरी - वारणा, प्रवरा, सिंधफणा, दक्षिण पूर्णा, मांजरा पूर्णा व गिरणा, प्राणहिता, पैनगंगा, दुधना.
🔶 तापी - गिरणा, पूर्णा, बोरी, अनेर, पांझरा.
🔶 कृष्णा - कोयना, वेरळा, पारणा, वेण्णा, पंचगंगा.
🔶 भीमा - इंद्रायणी, मुळा, सीना, कुकडी, पवना, कऱ्हा, नीरा, मुठा.
🔶 पैनगंगा - कन्हान, वर्धा व पैनगंगा.
🔶 पूर्णा - काटेपूर्णा व नळगंगा.
🔶 सिंधफणा - बिंदुसरा.
🔶 मांजरा - तेरु, तेरणा, कारंजी, घटणी.
गोदावरी नदी
१) महाराष्ट्रातील ही सर्वाधिक लांबीची नदी आहे.
२) गोदावरी नदी खोरे राज्यातील प्रथम क्रमांकाचे खोरे असून गोदावरी नदीच्या खोऱ्याने महाराष्ट्राचे (४९ %) क्षेत्र व्यापलेले आहे.
३) गोदावरी नदीला ‘दक्षिणेतील गंगा’, ‘संतांची भूमी’, ‘वृद्धगंगा’ या नावाने ओळखतात.
४) नदीचा उगम सह्याद्री पर्वतात महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी येथे झाला.
५) नदीची एकूण लांबी = १४५० कि.मी.
६) महाराष्ट्रातील प्रवाहाची लांबी = ६६८ कि.मी.
७) नदीचा प्रवास = महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश
८) प्रवाहाची दिशा = पश्चिमेकडून पूर्वेकडे
९) नदीच्या उपनद्या = मांजरा, दारणा, मुळा, वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, सिंधफणा, प्रवरा, इंद्रावती, इरई, प्राणहिता, कादवा, दुधना, दक्षिणपूर्णा, कुंडलिका
१०) गोदावरी नदी नाशिक, अहमदनगर, संपूर्ण मराठवाडा व दक्षिण विदर्भातून तेलंगणा राज्यात प्रवेश करते.
११) गोदावरी नदीवर नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण (पहिले मातीचे धरण), औरंगाबाद जिल्ह्यातील जायकवाडी धरण (राज्यातील सर्वात मोठे बहुउद्देशीय धरण), नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरण, धर्माबाद (जिल्हा नांदेड) येथील बाभळी धरण आहेत.
१२) जायकवाडी धरणात साठलेल्या जलाशयाला “नाथसागर” असे म्हणतात.
१३) नाथसागरातील जलाशयापासून पैठण येथे “म्हैसूरच्या वृंदावन गार्डन” च्या धर्तीवर ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती करण्यात आली.
१४) प्राणहिता ही गोदावरीची प्रमुख उपनदी असून गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे ह्या नद्यांचा संगम होतो.
१५) गोदावरी नदी आंध्रप्रदेश राज्यातील राजमहेंद्री ह्या शहराजवळ बंगालच्या उपसागरात विलीन होते.
_____________________________
मानवी भूगोलासंबंधी महत्त्वाचे ग्रंथ व लेखक
① बर्नहार्डस वारेनियस (जर्मन)
➤ ग्रंथ: जिओग्राफिया जनरलीस
② चार्ल्स डार्विन (इंग्रजी)
➤ ग्रंथ: ओरिजिन ऑफ स्पेसीस (1859)
➤ सिद्धांत: थिअरी ऑफ इव्होल्यूशन
③ हेन्री थॉमस बकल (इंग्रजी इतिहासकार)
➤ ग्रंथ: हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन इन इंग्लंड
④ कार्ल रिटर
➤ ग्रंथ: युरोपा (1863)
⑤ 'अर्डकुंड' (Erdkunde)
➤ लेखक: कार्ल रिटर
➤ अर्थ: भूगोल
➤ वैशिष्ट्य: २०,००० पानांचा व १९ खंडांचा ग्रंथ
➤ प्रकाशन: 1817 मध्ये लिहिण्यात आला
⑥ कॉसमॉस (Kosmos)
➤ लेखक: अलेक्झांडर हम्बोल्ट
➤ पद: बर्लिन विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक
➤ वैशिष्ट्य: लेक्चर्सचा संग्रह
➤ मान्यता: 'भूगोलाचा पहिला संदर्भग्रंथ'
⑦ ॲन्थ्रोपोजिओग्राफी (Anthropogeographie)
➤ लेखक: फ्रेडरिक रॅट्झेल
➤ वैशिष्ट्य: मानव भूगोलविषयक मूलभूत ग्रंथ
⑧ जिओग्राफिया ह्युमेना (Géographie Humaine)
➤ लेखक: जीन ब्रुन्स (Jean Brunhes)
➤ वैशिष्ट्य: फ्रेंच भाषेतील मानवी भूगोलावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ
19 September 2025
माहिती अधिकार कायदा (RTI- 2005)
18 September 2025
जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती
०१) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे ?
- गुरुमुखी.
०२) 'जुळे ग्रह' असे कोणत्या दोन ग्रहांना म्हटले जाते ?
- पृथ्वी आणि शुक्र.
०३) द्रव अवस्थेत असणारा एकमेव धातू कोणता ?
- पारा.
०४) 'गड आला पण सिंह गेला' हे उद्गार शिवरायांनी कोणाबद्दल काढले आहेत ?
- तानाजी मालुसरे.
०५) पहिला सजीव कुठे निर्माण झाला ?
- पाण्यात.
०१) महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?
- कर्नाळा.
०२) महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी कोणत्या नदीला म्हणतात ?
- कोयना.
०३) पत्रकार दिन केव्हा साजरा करण्यात येतो ?
- ६ जानेवारी.
०४) सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता ?
- शुक्र.
०५) मंगळ या ग्रहाला ..... असेही संबोधतात?
- लाल ग्रह.
०१) सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण होत्या ?
- फातिमा बिबी.
०२)भारतातील पहिल्या महिला अंध आय.ए.एस.अधिकारी कोण आहेत ?
- प्रांजल पाटील.
०३) भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरांमध्ये सुरू झाली ?
- कोलकाता.
०४) मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण किती बरगड्यांची संख्या असते ?
- २४.
०५) जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत मधून किती टक्के निधी दिव्यांगासाठी राखीव आहे ?
- पाच टक्के.
०१) 'व्हॉट्सॲपची' निर्मिती केव्हा झाली ?
- २००९.
०२) कोणाचा जन्मदिवस 'राष्ट्रीय युवक दिन' म्हणून साजरा केला जातो ?
- स्वामी विवेकानंद.
०३) 'बुलंद दरवाजा' कोठे आहे ?
- फत्तेपूर शिक्री.(उत्तर प्रदेश)
०४) ICU चा लॉंगफॉर्म काय आहे ?
- Intensive Care Unit.
०५) 'मेरी कोम' ही भारतीय खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
- बॉक्सिंग.
०१) भारतातील पहिला बोलपट कोणता ?
- आलम आरा.
०२) ऑलिंपिकमध्ये प्रथम सुवर्णपदक जिंकणारा भारतीय खेळाडू कोण ?
- अभिनव बिंद्रा.(नेमबाजी)
०३) 'भारतरत्न' या पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली ?
- १९५४.
०४) 'KYC' चा लॉंगफॉर्म काय आहे ?
- Know Your Customer.
०५) 'आंबोली' हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
- सिंधुदुर्ग.
०१) कोणत्या घटकाच्या प्रमाणावरून मानवी त्वचेचा काळेपणा - गोरेपणा ठरतो ?
- मेलॅनिन.
०२) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार कोणता ?
- शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार.
०३) मीठ साखर व पाणी यांच्या द्रावणाला काय म्हणतात ?
- जलसंजीवनी.
०४) क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक लागतो ?
- तिसरा.
०५) 'भारतरत्न' पुरस्कार मिळविणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती कोण ?
- महर्षी धोंडो केशव कर्वे.
💐 विटामिन बी चे अविष्कारक कोण आहेत ?
🎈मॅकुलन.
💐 शाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहे ?
🎈मिलींद बोकील.
💐 सोमनाथ जोतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे ?
🎈गुजरात.
💐 मंडो नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?
🎈गोवा.
💐 छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
🎈मुंबई.
०१) भारत देश कोणत्या खंडात आहे ?
- आशिया.
०२) राष्ट्रीय आपत्कालीन क्रमांक कोणता आहे ?
- ११२.
०३) 'नौटंकी' हे कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे ?
- उत्तर प्रदेश.
०४) पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो ?
- तामिळनाडू.
०५) महाराष्ट्रात कोणत्या वाऱ्यामुळे पाऊस पडतो ?
- नैऋत्य मोसमी वारे.
०१) भारतीय प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणी मोजतात ?
- मिर्झापूर.
०२) सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत काय म्हणतात ?
- प्रतल.
०३) शरीरातील सर्वात मोठे हाड कोठे असते ?
- मांडीत.
०४) कोणत्या वायूमुळे मुख्यतः ओझोन थराचा ऱ्हास होतो ?
- क्लोरो-फ्लोरो कार्बन.(CFC)
०५) दिल्ली हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
- यमुना.
०१) भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती ?
- हडप्पा.
०२) 'भरतनाट्यम' हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यातील आहे ?
- तामिळनाडू.
०३) कांगारू हा प्राणी कोणत्या खंडात आढळतो ?
- ऑस्ट्रेलिया.
०४) अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
- शरयू.
०५) सर्वोच्च न्यायालयाच्या प्रमुखास काय म्हणतात ?
- सरन्यायाधीश.
०१) वातावरणात ऑक्सीजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे ?
- २१ टक्के.
०२) मानवी चेहर्यात हाडांची संख्या किती ?
- १४.
०३) कोणत्या रोगाचा प्रसार डासामुळे होतो ?
- मलेरिया.
०४) मानवी शरीरात किती मणके असतात ?
- ३३.
०५) वजने व मापे यांचे जागतिक कार्यालय कोठे आहे ?
- पॅरिस.
०१) भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील कोणत्या संस्थेने तयार केला ?
- C-DAC.
०२) भारताची पहिली अणुभट्टी अप्सरा केंव्हा सुरू करण्यात आली ?
- १९५६.
०३) १९९८ साली कोणत्या ठिकाणी भारताने अणुस्फोटाच्या चाचण्या घेतल्या ?
- पोखरण.
०४) न्यूटनचा दुसरा नियम कशाचे मापन देतो ?
- संवेग.
०५) मेट्रोलोजी ही संज्ञा कशाशी संबंधित आहे ?
- हवामानशास्त्र.
०१) तेलबियांचा राजा असे कोणत्या पिकास म्हणतात ?
- भुईमूग.
०२) 'रुपया' हे नाणे सर्वप्रथम कोणी सुरू केले ?
- शेरशहा सुरी.
०३) 'तृतीय रत्न' हे नाटक कोणी लिहिले ?
- महात्मा फुले.
०४) आपल्या देशात कायदे करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
- संसदेला.
०५) तांबेरा हा रोग सर्वसाधारणपणे कोणत्या पिकावर पडतो ?
- गहू.
०१) बहिणाबाई चौधरी यांच्या कोणत्या बोलीभाषेतील कविता प्रसिद्ध आहेत ?
- अहिराणी.
०२) आपले राष्ट्रीय स्मारक कोणते आहे ?
- इंडिया गेट.
०३) भारताचे राष्ट्रीय ब्रीदवाक्य कोणते ?
- सत्यमेव जयते.
०४) चिप्सच्या पॅकेटमध्ये कोणता वायू असतो ?
- नायट्रोजन.
०५) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे ?
- नाईल.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
मानवी शरीर
1: हाडांची संख्या: 206
2: स्नायूंची संख्या: 639
3: मूत्रपिंडांची संख्या: 2
4: दुधाच्या दातांची संख्या: 20
5: फासांची संख्या: 24 (12 जोड्या)
6: हार्ट चेंबर क्रमांक: 4
7: मोठी धमनी: महाधमनी
8: सामान्य रक्तदाब: 120/80 मिमीएचजी
9: रक्त पीएच: 7.4
10:पाठीच्या स्तंभात कशेरुकाची संख्या: 33
11: मान मध्ये कशेरुकांची संख्या: 7
12: मध्यम कानात हाडांची संख्या: 6
13: चेहर्यावरील हाडांची संख्या: 14
14: कवटीतील हाडांची संख्या: 22
15: छातीत हाडांची संख्या: 25
16: हात मध्ये हाडांची संख्या: 6
17: मानवी हातातील स्नायूंची संख्या: 72
18: हृदयातील पंपांची संख्या: 2
19: सर्वात मोठा अवयव: त्वचा
20: सर्वात मोठी ग्रंथी: यकृत
21: सर्वात मोठा सेल: मादा अंडाशय
22: सर्वात लहान सेल: शुक्राणू
23: सर्वात लहान हाड: मध्यवर्ती कान
24: प्रथम प्रत्यारोपण केलेले अवयव: मूत्रपिंड
25: लहान आतड्याची सरासरी लांबी: 7 मी
26: मोठ्या आतड्याची सरासरी लांबी: 1.5 मी
27: नवजात बाळाचे सरासरी वजन: 3 किलो
28: एका मिनिटात नाडी दर: 72 वेळा
29: शरीराचे सामान्य तापमान: 37 से ° (98.4 फ °)
30: रक्ताची सरासरी मात्रा: 4 ते 5 लिटर
:१: लाइफटाइम लाल रक्तपेशी: १२० दिवस
32: लाइफटाइम पांढ White्या रक्त पेशी: 10 ते 15 दिवस
33: गरोदरपण: 280 दिवस (40 आठवडे)
34: मानवी पायात हाडांची संख्या: 33
35: प्रत्येक मनगटात हाडांची संख्या: 8
36: हातात हाडांची संख्या: 27
37: सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी: थायरॉईड
38: सर्वात मोठे लिम्फॅटिक अवयव: प्लीहा
40: सर्वात मोठे आणि भक्कम हाडे: फेमूर
:१: सर्वात लहान स्नायू: स्टेपेडियस (मध्यम कान)
41: गुणसूत्र संख्या: 46 (23 जोड्या)
42: नवजात बाळाच्या हाडांची संख्या: 306
43: रक्ताची चिकटपणा: 4.5 ते 5.5
44: युनिव्हर्सल डोनर रक्तगट: ओ
45: सार्वत्रिक प्राप्तकर्ता रक्त गट: एबी
46: सर्वात मोठा पांढरा रक्त पेशी: मोनोसाइट
47: सर्वात लहान पांढर्या रक्त पेशी: लिम्फोसाइट
48: लाल रक्तपेशींची संख्या वाढते असे म्हणतात: पॉलीसिथेमिया
49: शरीरात रक्तपेढी आहे: प्लीहा
50: जीवनाच्या नदीला म्हणतात: रक्त
51: सामान्य रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी: 100 मिलीग्राम / डीएल
52: रक्ताचा द्रव भाग: प्लाझ्मा
20 महत्त्वाचे CSAT सराव प्रश्न उत्तरे
1. सन 1996 हे लिपवर्ष आहे. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार येईल?
शुक्रवार
मंगळवार
गुरुवार
बुधवार
उत्तर : बुधवार
2. राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर विमला ही राधाची कोण?
मावस बहीण
पुतणी
भाची
आत्या
उत्तर :भाची
3. K हा J चा भाऊ आहे. M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण?
K
J
N
S
उत्तर :K
4. आर्या याच जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्यावर्षी गांधी जयंतीचा वार शनिवार होता. तर आर्याचा आठव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल?
गुरुवार
बुधवार
सोमवार
रविवार
उत्तर :गुरुवार
5. खालील मालिकेत 8 नंतर 18 ही संख्या किती वेळा आली आहे?
818881881811818181881888111818181181881
9 वेळा
10 वेळा
11 वेळा
8 वेळा
उत्तर :10 वेळा
6. खालील गटामध्ये जोड अक्षरे शब्द किती आहेत?
ग्रह, कृपा, कृषी, तंत्र, गृह, क्रम, कृती, क्षमा.
पाच
सात
आठ
वरील सर्व
उत्तर :पाच
7. खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?
लाकूड
हात
बैठक
पॉलिश
उत्तर :बैठक
8. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती?
आंबा
गुळ
बटाटा
गवत
उत्तर :आंबा
9. इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25, 19 आणि 5 ही अक्षरे जुळवून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?
E
W
S
R
उत्तर :S
10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?
7497:5255:111:?
312
121
393
101
उत्तर :393
11. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?
6:38::7:?
51
52
50
48
उत्तर :51
12. सतीशचे 15 वर्षापूर्वी वय 30 होते तर तो किती वर्षांनी 60 वर्षाचा होईल?
10
15
25
30
उत्तर :15
13. 4312 म्हणजे NICE व 756 म्हणजे PRO तर 75312 म्हणजे काय?
PICEP
CEPRJ
PIRCE
PRICE
उत्तर :PRICE
14. विसंगत शब्द शोधा.
जव (सातू)
कापूस
तांदूळ
गहू
उत्तर :कापूस
15. जर डॉक्टरांनी तुम्हाला चार गोळ्या दर अर्ध्या तासाने एक याप्रमाणे घ्यायला सांगितल्या तर त्या सर्व संपण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागेल?
2 तास
अडीच तास
1 तास
दिड तास
उत्तर :दिड तास
16. जर WINTER=2391420518 तर COTTON=?
31520201514
31515202014
32520152014
31420151520
उत्तर :31520201514
17. सायंकाळी 5:30 पासून रात्री 8:30 पर्यंत मिनिटकाटा तासकाट्याला किती वेळा ओलांडून जाईल?
तीन वेळा
दोन वेळा
चार वेळा
पाच वेळा
उत्तर : दोन वेळा
18. पाच बगळे पाच मासे पाच मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल?
1
25
5
15
उत्तर :5
19. एक वस्तु रु. 750 ला खरेदी केली व रु. 840 ला विकली तर शेकडा नफा किती झाला?
12
15
18
20
उत्तर :12
20. घड्याळात 13 वाजून 35 मिनिटे झाली आहेत, तर आरशात पाहिले असता किती वाजल्यासारखे दिसेल?
9 वाजून 25 मिनिटे
10 वाजून 35 मिनिटे
11 वाजून 20 मिनिटे
यापैकी नाही
उत्तर : यापैकी नाही
सूर्यमालेतील ग्रह व त्यासंबंधीची माहिती :
1. ग्रहाचे नाव - बूध
सूर्यापासुन चे अंतर - 5.79
परिवलन काळ - 59
परिभ्रमन काळ - 88 दिवस
इतर वैशिष्टे - सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह, आकाराने सर्वात लहान व सूर्यमालिकेतील सर्वात वेगवान ग्रह असून या ग्रहाला एकही उपग्रह नाही.
2. ग्रहाचे नाव - शुक्र
सूर्यापासुन चे अंतर - 10.82
परिवलन काळ - 243 दिवस
परिभ्रमन काळ - 224.7 दिवस
इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात तेजस्वी ग्रह पृथ्वीवरून संध्याकाळी व सकाळी आकाशात दिसतो. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
3. ग्रहाचे नाव - पृथ्वी
सूर्यापासुन चे अंतर - 14.96
परिवलन काळ - 23.56 तास
परिभ्रमन काळ - 365 1/4 दिवस
इतर वैशिष्टे - सूर्यमालिकेत केवळ पृथ्वीवरच प्राणीसृष्टी व वनस्पती सृष्टी आढळते. हा ग्रह जलग्रह म्हणून ओळखला जातो. चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे.
4. ग्रहाचे नाव - मंगळ
सूर्यापासुन चे अंतर - 22.9
परिवलन काळ - 24.37 तास
परिभ्रमन काळ - 687
इतर वैशिष्टे - शुक्रानंतरचा पृथ्वीच्या जवळील दूसरा ग्रह. या ग्रहास दोन उपग्रह आहेत.
5. ग्रहाचे नाव - गुरु
सूर्यापासुन चे अंतर - 77.86
परिवलन काळ - 9.50 तास
परिभ्रमन काळ - 11.86 वर्षे
इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील सर्वात मोठा ग्रह असून गुरूला त्रेसष्ट उपग्रह आहेत.
6. ग्रहाचे नाव - शनि
सूर्यापासुन चे अंतर - 142.6
परिवलन काळ - 10.14 तास
परिभ्रमन काळ - 29 1/2 वर्ष
इतर वैशिष्टे - सूर्यकुलातील दूसरा मोठा ग्रह या ग्रहाभोवती कडी आहेत. या ग्रहास त्रेपन्न उपग्रह आहेत.
7. ग्रहाचे नाव - युरेनस
सूर्यापासुन चे अंतर - 268.8
परिवलन काळ - 16.10 तास
परिभ्रमन काळ - 84 वर्षे
इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध 13 मार्च 1781 रोजी जर्मन खगोल शास्त्रज्ञ हर्षलने लावला. हा ग्रह जर्मन देवता युरेनस या नावाने ओळखला जातो. या ग्रहास सत्तावीस उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.
8. ग्रहाचे नाव - नेपच्यून
सूर्यापासुन चे अंतर - 449.8
परिवलन काळ - 16 तास
परिभ्रमन काळ - 164 1/2 वर्षे
इतर वैशिष्टे - या ग्रहाचा शोध सन 1886 मध्ये लागला. या ग्रहास एकूण तेरा उपग्रह आहेत. हा स्वत:भोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरतो.