13 January 2026

1857 च्या उठावानंतरचा काळ:


भारताचा पहिला व्हॉईसरॉय लॉर्ड कॅनिंग झाला.
राणी एलिझाबेथच्या काळात स्थापन झालेल्या ईस्ट इंडिया कंपनीची 1857 साली राणी व्हिक्टोरियाच्या कारकिर्दीत इतिश्री (शेवट) झाला.
इ.स. 1860 मध्ये भारतीय संस्थानिकांना कॅनिंगने सनदा दिल्या.
इ.स. 1861 साली प्रत्येक प्रांतात पोलिस खाते निर्माण करून त्यावर इंस्पेक्टर जनरल यापदाची निर्मिती करण्यात आली.
1837 साली लॉर्ड मेकॉलेने तर केलेल्या ‘इंडियन पिनल कोड’ ला 1860 मध्ये मान्यता देण्यात आली.
इ.स. 1861 मध्ये ‘इंडियन हायकोर्ट अॅक्ट’ पारीत केला गेला व त्यान्वये मुंबई, चेन्नई व कोलकात्ता या शहरात उच्च न्यायालयांची स्थापना करण्यात आली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

चार्लस वुड’ ने सुचविलेल्या सुचनेनुसार लॉर्ड कॅनिंगने प्रत्येक प्रांतात शिक्षणखाते सुरू केले. तसेच मुंबई, चेन्नई व कोलकात्ता येथे विद्यापीठे स्थापन करण्यास प्रोत्साहन दिले.
इ.स. 1859 साली शेतकर्‍याविषयीचा ‘बंगाल रेंट अॅक्ट’ कॅनिंगच्या काळात करण्यात आला.
इ.स. 1860 मध्ये झालेल्या कृषक आंदोलनाच्या मूळ कारणांचे वर्णन ‘निल दर्पण’ या नाटकात केले. त्याचे इंग्रजी भाषांतर बंगालचा लेफ्टनंट ग्रांट याने केले.
लॉर्ड कॅनिंगची कारर्किर्द 1862 ला पूर्ण झाली. राणीने त्यास ‘अर्ल’ हा किताब बहाल केला.
इ.स. 1866-67 मध्ये ओरिसात दुष्काळ पडला होता त्याचे निर्मूलन करण्यासाठी ‘फॅमिना कमीशन’ ची नियुक्ती सर जॉन लॉरेन्स याने केली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

व्हाईसरॉय लॉर्ड मेयोने भारतात पहिल्यांदा आर्थिक विकेंद्रीकरणाची सुरुवात केली.
14 डिसेंबर 1870 रोजी एक ठराव पास करून त्यानुसार वित्तविकेंद्रीकरणाची योजना निश्चित करण्यात आली. या ठरावास ‘प्रांतीय स्वायत्तेची सनद’ असे मानण्यात येते.
लॉर्ड मेयोच्या काळात इ.स. 1872 मध्ये शिरगणतीचे (जणगणना) कार्य सुरू झाले.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

 हंटर आयोग (भारतीय शिक्षण आयोग)

 ◾️ईस्ट इंडिया कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे अध्यक्ष सर चार्ल्स वुड यांच्या सांगण्यावरून कंपनीने
प्राथमिक शिक्षणाची प्रगती  1854 ते 1882 या कालखंडात अपेक्षेप्रमाणे न झाल्याने भारत सरकारने विल्यम हंटर यांच्या अध्यक्षतेखाली १८८२ मध्ये एक आयोग स्थापन केला.

◾️वुडच्या खलित्यातील तत्त्वांप्रमाणे शिक्षणाचा विकास होत आहे की नाही, याचा व विशेषत: प्राथमिक शिक्षणाच्या विकासाचा अभ्यास करावयास या  आयोगाला सांगण्यात आले होते.

◾️ या आयोगाने प्राथमिक शिक्षणविषयक धोरण, कायदे आणि व्यवस्थापन, स्थानिक शाळांना प्रोत्साहन, शालेय व्यवस्थापन, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि प्राथमिक शिक्षणाची अर्थव्यवस्था यांविषयी शिफारशी केल्या.

◾️ प्राथमिक शिक्षण हे लोकांचे शिक्षण आहे हे जाणून शक्य तेथे स्थानिक भाषेत शिक्षण द्यावे, प्राथमिक शिक्षणाला अधिक अर्थपुरवठा व्हावा, शासनात नोकरी देताना त्या व्यक्तीस लिहिता, वाचता येते की नाही हे पहावे मागास जिल्ह्यांत, विशेषत: आदिवासींच्या भागात, प्राथमिक शिक्षण पोहोचते की नाही हे पहावे.

◾️तसेच इंग्लंडमधील 1870 आणि 1876 च्या प्राथमिक शिक्षण कायद्यांप्रमाणे भारतातही कायदा करावा, प्राथमिक शिक्षणाचा कारभार जिल्हा किंवा नगरपरिषदांच्या मंडळांकडे सोपवावा, स्थानिक शाळांना प्रोत्साहन द्यावे, प्राथमिक शाळांतील अध्यापन आणि व्यवस्थापन स्थानिक परिस्थितीशी मिळतेजुळते असावे.

◾️ या आयोगासमोर महात्मा फुले, पंडीता रमाबाई यांनी साक्ष दिली.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

बरिटिशकालीन शिक्षण

♦️चार्ल्स वुडचा खलिता -1854



♦️कोणत्या अहवालाला "Magnacarta of English education in india " असे म्हणतात.

= चार्ल्स वुड



♦️मबई, कोलकाता, आणि मद्रास येथे केव्हा विद्यापीठे स्थापन झाली.

=इ स 1857



♦️कोणी कलकत्ता येथे स्वखर्चाने 'बेथ्यून कॉलेज' काढले.

= लॉर्ड डलहौसी



♦️हटर आयोग स्थापन.

= 1882



♦️भारतात मुद्रणकलेची सुरुवात कोठे झाली.

= गोवा


♦️मद्रण कलेचा प्रसार करण्याचे श्रेय कोणाला जाते?

= डॉ, कॅरे



♦️महाराष्टात ख्रिश्चन मिशऱ्यानी ग्रंथ छपाई केव्हा सुरू केली?

= इ स 1810

भारताचे गव्हर्नर जनरल्स व वॉइसरॉय

 वॉरन हेिस्टग (१७७४ ते १७८५) :

* वॉरन हेिस्टगला प्रथम गव्हर्नर जनरल संबोधले जाते.

* वॉरन हेिस्टगने भारतात आर्थिक, व्यापारिक व न्यायिक सुधारणा केल्या.

* १७७२ मध्ये वॉरन हेिस्टगने महसूल वसुलीचे ठोके जास्त बोली लावणाऱ्याना १ वर्षांसाठी दिले.

* वॉरन हेिस्टगने मीठ, सुपारी, तंबाखूव्यतिरिक्त व्यापारावर २.५% कर लावला.

* वॉरन हेिस्टगने कलकत्ता उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून सर एलिहाज इम्पेची यांची नियुक्ती केली. * नंदकुमार खटला : १७७५ मधील नंदकुमार हत्या खटल्यात वॉरन हेिस्टगचा संबंध.

* रेग्युलेटीन अ‍ॅक्ट, १७७३ : यानुसार कलकत्ता सुप्रीम कोर्टाची स्थापना करण्यात आली.

* १७७८ मध्ये आशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना केली.

* वॉरन हेिस्टगने चार्ल्स विल्कीन्सद्वारे अनुवादित गीतेस प्रस्तावना लिहिली.



लॉर्ड कॉर्नवॉलिस (१७८६ ते १७९३) :

* १७८६ मध्ये कॉर्नवॉलिस गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला.

* न्यायालयीन सुधारणा : 

कॉर्नवॉलिसने सत्ता कलेक्टरांच्या हातात केंद्रित केली. १७८६ ला कलेक्टरांना दिवाणी न्यायाधीश म्हणून नियुक्त केले. १७९० मध्ये फौजदारी कायद्यात सुधारणा करण्यात आली. भारतीय न्यायाधीशांच्या हातातील जिल्हा फौजदारी न्यायालय समाप्त करण्यात आले. त्याजागी ५ फिरती न्यायालये सुरू करण्यात आली. प्रांतिक न्यायालयाची स्थापना कलकत्ता, मुर्शिदाबाद, ढाका, पटणा या ठिकाणी कॉर्नवॉलिसच्या काळात झाली.

* कॉर्नवॉलिस संहिता – 

– अधिकार विभाजनाच्या तत्त्वावर कॉर्नवॉलिसची संहिता आधारित आहे.

– त्याने कर व न्यायपद्धती विभाजित केली.

– त्याने कलेक्टरकडेच पूर्वीचे न्यायालयीन व फौजदारी अधिकार होते ते काढून त्याकडे फक्त कर अधिकार शिल्लक ठेवले.

– जिल्हा सत्र न्यायालयात स्वतंत्र न्यायाधीश नेमणूक केली.

– भारतात त्याने कायद्यांच्या सर्वोच्चतेचा नियम लागू केला.

– कॉर्नवॉलिसची न्यायप्रणाली ही पाश्चिमात्य न्याय संकल्पना व समतेच्या तत्त्वांवर आधारित होती.

* पोलीस सुधारणा- 

– त्याने पोलिसांना जास्त वेतन द्यावयाचे ठरवले.

– खुनी व्यक्ती व चोरांना पकडल्यास खास पुरस्कार जाहीर केला.

– जमीनदारांकडून पोलीस अधिकार काढून घेण्यात आले.

* कर सुधारणा – 

– १७८७ मध्ये कॉर्नवॉलिसने प्रांतांना राजस्व भागात विभाजित केले. त्यावर कलेक्टरची नियुक्ती केली.

* कायम धारा सुधारणा (Permanent Settlement of Land) :

– त्या दृष्टीने त्याने प्रचलित भूमिका, जमीन पट्टा देणे याचा अभ्यास केला व त्यानुसार त्याने जॉन शोर, जेम्स गड्र यांच्याशी चर्चा करून त्याने जमीनदारी व्यवस्था स्थायी स्वरूपात ठेवण्याचा निर्णय घेतला.

– या सुधारणेमुळे कंपनीला बरेचसे फायदे झाले.

* नागरी प्रशासनाचा पाया वॉरन हेिस्टगने घातला, तर त्याचा विकास कॉर्नवॉलिसने केला.

 

लॉर्ड वेलस्ली (१७९८ ते १८०५) :

– १७९८ मध्ये जॉन शोअरनंतर वेलस्ली गव्हर्नर जनरल झाला.

– त्याने भारतीय राजकीय स्थितीचा फायदा घेऊन कंपनीचे साम्राज्य हे ध्येय समोर ठेवले. त्याने सरळ युद्धनीतीचा अवलंब केला.

* तनाती फौज : 

– भारतीय राज्यांना नियंत्रणात आणण्यासाठी तनाती फौजेचा स्वीकार केला.

– तनाची फौजेचा खऱ्या अर्थाने प्रणेता डुप्ले हा होता. कारण की, वेलस्लीच्या आधी त्याने ही पद्धत सुरू केली होती.

– वेलस्ली हा साहाय्यक प्रणालीसाठी प्रसिद्ध आहे.

– या पद्धतीनुसार भारतीय रियायतीबरोबर वेलस्लीने करार करून साम्राज्य दृढ करून साहाय्यक प्रणालीला जन्म दिला.

– ही प्रणाली चार अवस्थांवर अवलंबून होती. सन्य बाळगणे, मदत देणे, खर्च घेणे व बरखास्ती.

हैदराबादच्या निजामाने १७९८ मध्ये,

म्हैसूरने १७९९ मध्ये,

अवध १८०१ मध्ये,

पेशवा १८०२ मध्ये या करारावर सह्या केल्या.

– त्याच्या काळात चतुर्थ इंग्रज – म्हैसूर युद्ध (१७९९)- टिपू सुलतानाचा मृत्यू झाला. (४ मे, १७९९).

 

लॉर्ड मिंटो १८०७ ते १८१३) :

– १८०९ मध्ये रणजितसिंहांशी लॉर्ड मिंटोने करार केला.

– लॉर्ड मिंटोच्या काळात मॉरिशसवर ब्रिटिशांचे साम्राज्य स्थापन झाले.

– १८१३ – चार्टर अ‍ॅक्ट : या कायद्यानुसार कंपनी प्रशासनाला एक लाख रुपये शिक्षणावर खर्च करण्याचे बंधन घालण्यात आले. या कायद्याने भारतातील व्यापारावरील कंपनीचा एकाधिकार काढून घेण्यात आला. (फक्त चहाचा व्यापार व चीनबरोबरचा व्यापार वगळता).

 

लॉर्ड हेिस्टग (१८१३ ते १८२३) –

– लॉर्ड मिंटोनंतर लॉर्ड हेिस्टग हा गव्हर्नर जनरल बनला.

– लॉर्ड हेिस्टग हा अहस्तकक्षेप निधीचा पुरस्कर्ता होता. पण लॉर्ड हेिस्टगला हस्तक्षेप निधी स्वीकारावा लागला.

– त्याच्या काळात नेपाळबरोबर युद्ध झाले. (नेपाळ आंग्ल युद्ध १८१४ ते १८१६ या काळात झाले.) हे युद्ध १८१६ ला सगौली कराराने समाप्त झाले.

– तृतीय मराठा-इंग्रज युद्ध (१८१७ ते १८१८) – या युद्धामुळे पेशवा पद समाप्त झाले. १३ जून १८१८ रोजी पुण्याचा तह, पेशवा बाजीराव दुसरा याला कानपूरजवळील विठूर येथे पाठविण्यात आले व उर्वरित आयुष्य कंपनीच्या पेन्शनवर जगून तेथेच त्यांचा मृत्यू झाला.

– यांच्या काळात रयत थॉमस मुन्रोने मद्रास प्रांतात रयतवारी पद्धत लागू केली.

– ज्या पद्धतीत शेतकरी हा भूमी स्वामी होता तो सरळ सरकारला कर द्यायचा.

– लॉर्ड हेिस्टगने वृत्तपत्रांना प्रथमत: स्वतंत्रता प्रदान केली. पण पुढे अटी लादल्या.

– त्याने वृत्तपत्रांवरील प्रसिद्धिपूर्वक नियंत्रण काढून घेतले.

 

लॉर्ड विल्यम बेंटिंग (१८२८ ते १८३५)

– लॉर्ड बेंटिंग हा सुधारणावादी होता.

– त्याला नेपोलियन विरुद्ध लढायचा अनुभव होता.

– सतीप्रतिबंधक कायदा, १८२९ – बेंटिंगच्या आधी कोणत्याही गव्हर्नर जनरलने सामाजिक प्रश्न सोडविण्याचे धाडस दाखवले नाही. बेंटिगने मात्र सतीप्रथा व शिशुवध बंद करून सामाजिक सुधारणा केल्या.

– राजा राममोहन रॉय यांनी सतीप्रथा बंद करण्यासाठी बेंटिंगला साथ दिली.

– १८३० मध्ये मुंबई व मद्रास प्रेसिडेन्सी क्षेत्रात सतीप्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला.

– त्याने ठगांचादेखील बंदोबस्त केला.

– वृत्तपत्रांबाबत त्याने उदार धोरण ठेवले.

* शिक्षण सुधारणा – 

– त्याने सार्वजनिक शिक्षण समिती नेमली.

– बेंटिंगने मेकॉलेला शिक्षण समितीचा अध्यक्ष नियुक्त केले.

– त्यानुसार उच्च स्तरावरील शिक्षणासाठी इंग्रजीची भाषा स्वीकारण्यात आली.

– बेंटिंगने १८३५ मध्ये कलकत्ता मेडिकल कॉलेजची स्थापना केली.

– त्याच्याच काळात चार्टर अ‍ॅक्ट, १८३३ हा संमत झाला.

 

सर चार्ल्स मेटकाफ (१८३५ ते ३६) –

– बेंटिंगनंतर हा भारताचा गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त झाला.

– त्याने भारतीय वृत्तपत्रांवरील बंदी उठवली. म्हणून त्याला गव्हर्नर जनरल पदावरून दूर केले.

 

गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी (१८४८-५६) :

– १८४८ मध्ये लॉर्ड हर्डिंगच्या जागी डलहौसी गव्हर्नर जनरल बनला.

– डलहौसी हा त्याच्या व्यपगत सिद्धांतासाठी विशेष ओळखला जातो.

– डलहौसीच्या मते, संस्थाने तीन प्रकारची होती- स्वतंत्र व कर न देणारी संस्थाने, मोगल/पेशवाअधीन असणारी पण ईस्ट इंडिया कंपनीला कर देणारी संस्थाने, इंग्रजांच्या मदतीने बनलेले अथवा पुनर्जीवित झालेली संस्थाने.

– डलहौसीने या संस्थानांना दत्तक पुत्र घेण्यास अनुमती दिली. पण दत्तक पुत्र हा गादीस वारस मानण्यास नकार दिला.

– त्याचप्रमाणे द्वितीय आणि तृतीय प्रकारच्या संस्थानाला दत्तक पुत्र वारसा नेमल्यास मान्यता नाकारली.

– डलहौसीने या सिद्धांतानुसार सातारा (१८४८), संबलपूर व जैतपूर (१८४९), बगाढ (१८५०), उदयपूर (१८५२), झाशी (१८५३) व नागपूर (१८५४) खालसा केले.

– लॉर्ड डलहौसीकृत सुधारणांचा एकमेव उद्देश सत्ता केंद्रीकरण हा होता.

– लॉर्ड डलहौसीच्या काळात ईस्ट इंडिया कंपनीच्या साम्राज्याचा विस्तार पश्चिम भागात झाला.

– लॉर्ड डलहौसीने सन्यात तीन रेजिमेंटची भर घातली.

– १८५३ मध्ये प्रथम रेल्वे ठाणे ते मुंबई येथे सुरू करण्यात आली.

– भारतात पोस्ट स्टॅम्पचा वापर लॉर्ड डलहौसीच्या काळात सुरू झाला.

– त्याच्या काळात भारतात रेल्वे लाइनचे जाळे ठेके पद्धतीने बांधण्यात आले.

– लॉर्ड डलहौसीला भारतात विद्युत तारेचा प्रारंभकर्ता असे म्हणतात.

– लॉर्ड डलहौसीने व्यापारासाठी सर्व बंदरे खुली करून कर रद्द केला.

– १८५४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची स्थापना केली.

– १८५४ चा वुडचा खलिता – त्यानुसार प्राथमिक शिक्षणापासून ते विश्वविद्यालयीन शिक्षणापर्यंत एक शिक्षा योजना बनविण्यात आली. यालाच भारतीय शिक्षणाचा मॅग्रा चार्टा असे म्हणतात. यानुसार प्रत्येक प्रांतात स्वतंत्र शिक्षण असावे, अशी शिफारस करण्यात आली.

– त्याच्या काळात विधवा विवाहासंदर्भात विडो रिमॅरेज अ‍ॅक्ट, १८५६ ला संमत करण्यात आला. त्यासाठी त्याला ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी मदत केली.

 

लॉर्ड कॅिनग (१८५६ ते १८६२) :

– १८६२ मध्ये भारत प्रशासन कायद्यानुसार गव्हर्नर जनरल व्हाइसरॉय या किताबाचा पहिला मानकरी ठरला.

– १८५८ चा उठाव कॅिनगच्या काळात झाला. उठाव मोडून काढण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्याने केले.

– राणीचा जाहीरनामा (पंतप्रधान डर्बीनी तयार केला.) लॉर्ड कॅिनगने १ नोव्हेंबर,

– १८५८ रोजी अलाहाबादच्या दरबारात वाचून दाखविला.

– कॅिनगने १८६१ च्या पोलीस खात्यात सुधारणा केल्या.

– पोलीस विभागपदी इन्स्पेक्टर जनरल (आयजी) जिल्हा पोलीस प्रमुखपदी पोलीस अधीक्षक (एसपी) तालुका प्रमुखपदी डेप्युटी इन्स्पेक्टर इ.च्या नेमणुका केल्या.

– कॅिनगने मेकॉलेद्वारा तयार केलेली (१८३७ भारतीय दंडविधान) संहिता १८६०मध्ये लागू केली.

– १८६२पासून त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात आली. इ.स. १८६१ मध्ये इंडियन हाय कोर्ट अ‍ॅक्ट संमत झाला.

– कॅिनगने मुंबई, मद्रास, कलकत्ता येथे उच्च न्यायालयाच्या शाखा स्थापन केल्या.

– उत्तर भारतासाठी अलाहाबाद येथे उच्च न्यायालयाची स्थापना केली.

– १८५९ मध्ये भारतमंत्री म्हणून चार्ल्स वुड आला. वुडच्या साहाय्याने कॅिनगने प्रत्येक प्रांतात शिक्षण खात्याची स्थापना केली.

– १८६१ च्या दुष्काळ चौकशीसाठी कर्नल स्मिथच्या अध्यक्षतेखाली  िहदुस्थानच्या इतिहासातील पहिला चौकशी आयोग कॅिनगने नेमला.

– कॅिनग हा ईस्ट इंडिया कंपनीचा शेवटचा गव्हर्नर जनरल व ब्रिटिश संसदेद्वारा नियुक्त प्रथम व्हाइसरॉय (व्हॉइस ऑफ रॉय – राजा/राणीचा प्रत्यक्ष प्रतिनिधी/ आवाज) होय.  १८६१ चा भारतीय विधिमंडळ कायदा (इंडियन कौन्सिल अ‍ॅक्ट) पास झाला.

– याच काळात इंडियन सिव्हिल सíव्हसेस परीक्षा सुरू झाल्या.

– इ.स. १८५७ मध्ये मुंबई, मद्रास, कलकत्ता (कलकत्ता- २४ जानेवारी) विश्वविद्यालयांची स्थापना करण्यात आली.

जमीन सुधारणा पद्धती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



⭕️♦️⚠️ कायमधारा पद्धती

♦️लागू :- 1793.

♦️प्रांत :- बंगाल,बिहार,ओरिसा, बनारस व उत्तर कर्नाटक.

♦️ प्रमाण :- 19% प्रदेशात कायमधारा.

♦️ संबंधित अधिकारी :- कॉर्नवाॅलीस (जॉन शोअर समिती).

♦️ महसूल वाटप :-शासन,जमीनदार, शेतकरी.



⭕️♦️⚠️ रयतवारी पद्धती

♦️लागू :- 1820.

♦️प्रांत :- मुंबई, मद्रास, आसाम.

♦️ प्रमाण :- 51% प्रदेशात रयतवारी.

♦️ संबंधित अधिकारी :-

               थॉमस मन्रो-मद्रास.  

               एल्फिन्स्टन-मुंबई.

♦️ महसूल वाटप :-शासन व रयत.



⭕️♦️⚠️ महालवारी पद्धत

♦️लागू :- 1822.

♦️प्रांत :- (उत्तर प्रदेश), पंजाब, आग्रा, अवध.

♦️ प्रमाण :- उर्वरित 30% प्रदेशात महालवारी.

♦️ संबंधित अधिकारी :- होल्ट मॅकेन्झी.

♦️ महसूल वाटप :- शासन,जमीनदार,

 कूळ व प्रत्यक्ष जमीन कसणारा.


⭕️♦️⚠️मौजेवारी पध्दती - लॉर्ड एलफिन्स्टन.

⭕️♦️⚠️लिलाव/बोली पद्धत - वॉरन हेस्टींग.

इतिहास प्रश्नसंच

 १)  आग्रा शहराचे संस्थापक कोण होते ?

    १) मोहम्मद तुघलक 

    २) अल्लादिन खिल्जी 

    ३) सिकंदर लोधी 📚📚

    ४) इब्राहिम लोधी




२) 'द ग्रेट रिबेलियन' या पुस्तकाचे लेखक कोण होते ? 

        १) अशोक कोठारी 

        २) अशोक मेहता 📚📚

        ३) डॉ. एस. एन.सेन 

        ४)  वी.डी सावरकर




३) केरळमध्ये अस्पृश्यांसाठी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणी उभारली होती ?

      १) शिवराम   

      २) नारायण गुरु📚📚

      ३) राजगुरू 

      ४)  पेरियार




४) होमरूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली ?

          १) दक्षिण आफ्रिका

          २) आयर्लंड📚📚

          ३) नेदरलँड

          ४) भारत




५) महात्मा गांधीजींनी पहिला राष्ट्रव्यापी 'सत्याग्रह' केला.........?     

         १) असहकार चळवळीच्या वेळी  📚📚

         २)  जालियनवाला बाग हत्याकांडा वेळी 

         ३) रौलेट ॲक्ट विरोधात 

         ४) खिरापत चळवळीच्या वेळी




६) चंपारण्य मधील शेतकऱ्यांचा लढा .......... शी संबंधित होता.

          १) ऊस 

          २) नीळ 📚📚

          ३) कापूस

          ४) भात




७) खालील पैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण? 

           १) महात्मा गांधी 

           २) लोकमान्य टिळक

           ३) चित्तरंजन दास📚📚

           ४) न्यायमूर्ती रानडे





८) खालील पैकी कोणत्या कायद्याने मुस्लीमांसाठी विभक्त मतदारसंघ निर्माण करण्यात आले ? 

            १) १८१३

            २) १९०९📚📚

            ३) १९१९

            ४) १९३५




९) भारतातील कामगार संघटनांवर कुठल्या क्रांतीचा मोठ्या प्रमाणावर  प्रभाव पडला ? 

            १) अमेरिकन क्रांती

            २) फ्रेंच क्रांती 

            ३) रशियन क्रांती📚📚

            ४) यापैकी नाही




१०) कोणत्या महसूल पध्दतीत शेतकरी जमीन मालक बनले ? 

              १) कायमधारा 

              २) जमीनदारी 

              ३) रयतवारी 📚📚

              ४) मिरासदारी


राजर्षि शाहू महाराज :



जन्म - 16 जुलै 1874.

मृत्यू - 6 मे 1922.

एप्रिल 1919 भारतात बहुजन समाजाच्या उद्धराचे कार्य करणार्‍या कुर्मी क्षत्रिय महासभा या संस्थेच्या कानपूर येथे भरलेल्या 13 व्या अधिवेशनात महाराजांना 'राजर्षी' ही पदवी बहाल करण्यात आली.

महाराष्ट्रात त्यांच्या शेतकर्‍यांचा खरा राजा म्हणून गौरव केला गेला.

भारतातील वसतिगृहांचे आद्य जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो.

एक कल्याणकारी राजा.

संस्थात्मक योगदान :


ग्रामीण भागातून शहरी भागात शिकण्यास येणार्‍या विविध जातीधर्माच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जातीची वस्तीगृहे स्थापन केली.

1901 - मराठा विद्यार्थ्यांसाठी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगची स्थापना (कोल्हापूर).

नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वस्तीगृह उभारले.

1902 - राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी प्रशासकीय सेवेमध्ये 5% राखीव जागा.

15 नोव्हेंबर 1906 - किंग एडवर्ड मोहमेडण एज्यु. सोसा. स्थापना.

1907 - मिस क्लार्क बोर्डिंग हाऊस ची स्थापना.

1911 - जाहीरनामा काढून 15% विद्यार्थ्यांना नादरी देण्याची घोषणा.

1911 - शिक्षक प्रशिक्षण व शिक्षकांसाठी मेरीट प्रमोशन योजना.

1917 - माध्यमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले.

14 फेब्रुवारी 1919 - पाटील शाळा व त्याला जोडून तलाठी वर्ग सुरू केले.

लष्करी शिक्षणासाठी इन्फंन्ट्री स्कूल.

पुणे येथे श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूल.

जयसिंगराव घाटके टेक्निकल इन्स्टिट्यूड स्थापना.

1894 - बहुजन समाजातून तलाठयांच्या नेमणुका.

1917 - विधवा विवाहाचा कायदा.

1918 - आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा.

1918 - महार वतने रद्द करून जमिनी रयतवारी पद्धतीने दिल्या.

वेठबिगारी प्रथा कायद्याने बंद केली.

1920 - माणगाव अस्पृश्यता निवारण परिषदेचे आयोजन.

1895 - गुळाच्या व्यापारासाठी शाहूपुरी.

1899 - वेदोक्त प्रकरण - सत्यशोधक चळवळीचे ब्राह्यणोत्तर चळवळीत रूपांतर होण्यास करणीभूत.

यामुळे पुरोहितगिरी व ब्राम्हंणाच्या मक्तेदारीस शह.

1906 - शाहू स्पिनिंग अँड विव्हिंग मिलची स्थापना.

1907 - सरकारी तत्वावर कापड गिरणी मल्लविधेस प्रोत्साहन देण्यासाठी खासबाग कुत्स्यांचे मैदान.

1911 - सत्यशोधक समाजाची शाखा कोल्हापूर येथे स्थापन झाली.

1911 - भोगवती नदीवर राधानगरी धरण बांधले.

1912 - कोल्हापुरात सरकारी कायदा करून सरकारी चळवळीस प्रोत्साहन.

1916 - निपाणी येथे डेक्कन रयत संस्थेची स्थापना.

1918 - कुलकर्णी वेतणे रद्द. तलाठी नेमले.

1918 - आर्य समाजाची शाखा स्थापन करून आर्य समाजाकडे राजाराम कॉलेज चालविण्यास दिले.

1919 - स्त्रियांना क्रूरपणे वागविन्यास प्रतिबंध करणारा कायदा.

1920 - घटस्फोटाचा कायदा. देवदासी प्रथा कायद्याने बंद.

1920 - हुबळी येथील ब्राह्येनेत्तर सामाजिक परिषदेचे आणि भावनगर येथील आर्य समाज परिषदेचे अध्यक्षपद भूषविले.

कोल्हापूर शहरास 'वस्तीगृहांची जननी' म्हटले जाते.

ब्राम्ह्येणत्तर चळवळीचे नेतृत्व.

वैशिष्टे :


महात्मा फुले व सत्यशोधक समाजाचा प्रारंभ.

सामाजिक चळवळीच्या क्षेत्रातील म. फुले यांचे खरेखरे वारसदार.

जाती भेदास तीव्र विरोध, लोककल्याणकारी राज्य.

पददलित व मागास वर्गीयांची उन्नती हेच जीवन कार्य.

उदार विचार प्रणालीचा राजा.

राज्य सोडावे लागले तर बेहत्तर, पण मागासलेल्या प्रजेच्या सेवेचे व्रत सोडणार नाही.


कामगारांनो संघटित व्हा व आपले हक्क प्राप्त करून घ्या, हा संदेश. He Was a King But a Democratic King - भाई माधवराव बागल.


शाहू राजा नुसता मराठा नव्हता, तो नव्या युगातला सर्वांगपूर्ण राष्ट्रपुरुष तो महाराष्ट्राच्या विकासाचा स्वाभाविक तरंग होतो. - वि. रा. शिंदे.


टीकाकारांकडून 'शुद्रांचा राजा' असा उल्लेख.

02 January 2026

Combine पूर्व परीक्षा Polity

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


Revision साठी Important Topics 


घटना निर्मिती : पार्श्वभूमी (कायदे), घटनासमिती, सरनामा, संघराज्य 

मूलभूत हक्क, कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ,

राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ

संसद, विधिमंडळ, न्यायालये,

विविध आयोग + घटनात्मक पदे जसे CAG, महान्यायवादी etc घटनादुरुस्ती, आणीबाणी

सूची - विषय,

घटनेतील महत्वाची कलमे, भाग, परिशिष्टे

संसदीय समित्या 


Polity चा अभ्यास करताना काही नियम & अपवादात्मक काही गोष्टी असतात त्यावर थोडं focus. For ex - काही गोष्टी घटनेत नमूद असतात & काही गोष्टी संकेतानुसार असतात, या प्रकारच्या बऱ्याच गोष्टी असतात, वाचत असताना लक्षपूर्वक वाचा


पंचायतराज

यावर Generally 1-2 प्रश्न विचारले जातात

मागच्या वर्षी ग्रामपंचायत + ग्रामसभेवर 2 प्रश्न होते + 1 प्रश्न अभियान वर विचारला होता.


पंचायत राज वाचताना तुलनात्मक chart / table format मध्ये notes किंवा पुस्तकात असेल तर या पद्धतीने वाचा. कारण 2 प्रश्नांसाठी 200 पानं वाचणं थोडं धोकादायक आहे.

त्यामुळे ग्रामपंचायत + पंचायत समिती + zp

महानगरपालिका + नगरपरिषद + पालिका

यांचं comparison chart format मध्ये असेल तर ते revise करा + PYQS

पंचायराज विषयी समित्या - imp शिफारशी,

73rd + 74th घ. दु.

11 वी, 12 वी अनुसूची - विषय 



2020 मध्ये polity चे questions as compared to previous papers थोडे अवघड होते. 

राज्यसेवा, PSI-STI-ASO प्रश्नसंच

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१) “दी इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ इंडिया” या प्रसिध्द ग्रंथाचा लेखक कोण होता ?

   1) एच. एच. विल्सन  

   2) आर. सी. दत्त  

   3) कार्टराईट    

   4) हारग्रीव्हज


उत्तर :- 2


२) ... ........... रोजी राष्ट्रीय विकास समिती (एन.डी.सी.) कडून 10व्या पंचवार्षिक योजनेस मंजूरी देण्यात आली.

   1) 21 डिसेंबर 2002  

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 21 जानेवारी 2003 

   4) 31 जानेवारी 2003


उत्तर :- 1


३) अकराव्या योजने अंतर्गत किती अतिरिक्त रोजगार संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य ‍निर्धारित करण्यात आले होते ?

   1) 50 मिलीयन (5 कोटी)   

   2) 58 मिलीयन  (5.8 कोटी)

   3) 60 मिलीयन (6 कोटी)     

   4) 45 मिलीयन (4.5 कोटी)


उत्तर :- २


४) अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत गुंतवणूक दर एकूण स्थूल राष्ट्रीय उत्पादनाच्या किती टक्के अपेक्षित होता ?

   1) 33.3%   

   2) 36.7%    

   3) 24.8%   

   4) 30.0%

 

उत्तर :- 2


५) भारतातील पहिला खत कारखाना पहिल्या पंचवार्षिक योजनेत .............. येथे सुरू झाला.

   1) भटिंका    

    2) सिंद्री    

    3) कोची  

    4) हाजिरा


उत्तर :- 2



१) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान 

   

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान


   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान


   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान


            अ  ब  क  ड


         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


२) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता


   1) ब, ड आणि क    2) अ आणि ब    3) अ, ब आणि क    4) ब आणि ड


उत्तर :- 4


३) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे –:

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क      2) ब आणि क    3) फक्त अ    4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


४) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)    

  2) गांधी योजना    

 3) नेहरू योजना    

 4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


५) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

   1) कर्नाटक   

   2) महाराष्ट्र    

   3) गुजरात 

    4) राजस्थान


उत्तर :- 4



६) भारतात नियोजन मंडळाचा आणि राष्ट्रीय विकास परिषदेचा अध्यक्ष कोण असतो ?

   1) भारताचे राष्ट्रपती    2) पंतप्रधान    3) भारताचे उपराष्ट्रपती    4) वित्तमंत्री

उत्तर :- 2


७) भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी कोण पार पाडते ?

   1) स्थानिक आणि राज्य सरकार     

   2) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया व नाबार्ड

   3) केंद्र सरकार आणि राज्य सरकार      

   4) स्टेट बँक ऑफ इंडिया व नियोजन मंडळ

उत्तर :- 3


८) भारतीय नियोजन आयोगाच्या कार्यांच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या.

   अ) देशातील उपलब्ध साधनांच्या परिणामकारक आणि समतोल वापरासंबंधी योजना आखणे.

   ब) भौतिकसाधने, भांडवल आणि मानवी साधने यांचे योग्य मूल्यमापन करणे.

   क) मध्यवर्ती सरकारला मार्गदर्शन करणे.

        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत ?


   1) फक्त अ    

   2) फक्त अ आणि ब  

   3) फक्त ब आणि क    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 4


९) 74 वी घटनादुरुस्ती खालील हेतूने करण्यात आली आहे.

   अ) जिल्हा नियोजन समिती स्थापन करणे.   

    ब) ग्राम पंचायती स्थापन करणे.

   क) राज्य वित्तीय आयोग स्थापन करणे.

   वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत/आहे.


   1) फक्त अ   

  2) फक्त अ आणि ब 

  3) फक्त अ आणि क    

  4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


1०) भारतातील कुठल्या राज्यात वीजेचा दरडोई कमीत कमी वापर करण्यात येतो ?

   1) आसाम  

   2) मणिपूर     

   3) त्रिपूरा     

   4) बिहार


उत्तर :- 4


१) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ................. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3    2) 40.4      

   3) 45.0    4) 58.4


उत्तर :- 1


२) 2006-07 साली भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा किती होता ?

   1) 13.26%    2) 18.51%    

   3) 20.47%    4) 22.18%


उत्तर :- 2


३) भारतातील इतर राज्यांशी तुलना करता – औद्योगिक गुंतवणुकीसंदर्भात कोणत्या राज्यानंतर महाराष्ट्राला दुस-या क्रमांकाची   पसंती मिळत आहे.

   1) आंध्रप्रदेश    2) कर्नाटक    

   3) गुजरात    4) तामिळनाडू


उत्तर :- 3


४) कोणत्या औद्योगिक धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला ?

   1) औद्योगिक धोरण, 1956  

   2) औद्योगिक धोरण, 1970

   3) औद्योगिक धोरण, 1977 

   4) औद्योगिक धोरण, 1991


उत्तर :- 4


५) खाजगीकरण म्हणजे ........................ उद्योगांत खाजगी मालकी प्रस्थापित करणे होय.

   1) खाजगी मालकीचे   

    2) सार्वजनिक मालकीचे

   3) संयुक्त मालकीचे  

   4) यापैकी एकही नाही


उत्तर :- 2



६) आर्थिक विकासावरून पुढील सुचित होते.

   अ) वस्तू आणि सेवांच्या वास्तव उत्पादनातील वाढ

   ब) देशाच्या सामाजिक – आर्थिक संचरनेतील प्रागतिक बदल

   क) बेकारी, दारिद्रय आणि विषमतेतील घट


   1) अ फक्त    

   2) अ आणि क    

   3) अ आणि ड   

   4) ब आणि ड


उत्तर :- 4


७) 2011 च्या जनगणनेनुसार ..................... या राज्यांतील बाललिंगगुणोत्तर वयोगट 0-6 सर्वात कमी आहे.

   1) हरियाणा आणि जम्मू काश्मिर   

   2) हरियाणा आणि पंजाब

   3) पंजाब आणि राजस्थान  

   4) हरियाणा आणि राजस्थान


उत्तर :- 1


२२०८) केंद्रीय सांख्यिकीय संघटनेनुसार सेवा क्षेत्राच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश होत नाही  ?

   1) व्यापार, हॉटेल्स आणि रेस्टॉरंट    

    2) वाहतूक, साठवणूक आणि दळणवळण

   3) गृहनिर्माण आणि वित्तपुरवठा    

   4) वरीलपैकी काहीही नाही



उत्तर :- 4


९) भारताच्या पंतप्रधानांनी ‘जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय शहरी’ नुतनीकरण कार्यक्रम ..................... रोजी सुरू केला.

   1) 13 डिसेंबर 2001    

   2) 31 डिसेंबर 2002

   3) 01 डिसेंबर 2004    

   4) 03 डिसेंबर 2005


उत्तर :- 4


१०) खालीलपैकी कोणता कालावधी नियोजन सुट्टीचा कालावधी म्हणून ओळखला जातो  ?

   1) 1951 – 56     

   2) 1961 – 66

   3) 1966 – 69      

   4) 1969 – 72


     उत्तर :- 3


१) भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता ?

   1) डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 

   2) डॉ. झाकीर हुसेन

   3) श्री. व्ही. व्ही. गिरी     

   4) डॉ. फक्रुद्दीन अली अहमद


उत्तर :- 2


२) राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारासंबंधी प्रतिपादित केलेल्या पुढील विधानांतील अयोग्य विधान कोणते ?

   1) कोर्ट मार्शलद्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही.

   2) राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्रीपरिषदेच्या सल्ल्यानेच करतात.

   3) राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही.

   4) घटनेचा अनुच्छेद क्र. 72 नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे मांडण्याची गरज नाही.


उत्तर :- 1


३) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

   1) आता पावेतो उप – राष्ट्रपती पुढे राष्ट्रपती झाले आहेत.

   2) केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे राष्ट्रपती पदाचा अधिकचा भार राहिला आहे.

   3) वरील एका व्यतिरिक्त केवळ एका उप – राष्ट्रपतींकडे श्री. व्ही. व्ही. गिरी, राष्ट्रपती पदाचा अधिकचा तसेच नियमित पदभार राहिला आहे.

   4) तीन उप – राष्ट्रपती राष्ट्रपती न बनता उपराष्ट्रपती म्हणूनच निवृत्त झाले.


उत्तर :- 3


४) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   अ) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो.

   ब) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा अधिकार नाकारला गेला आहे.


   1) अ    

  2) ब   

  3) दोन्हीही 

  4) एकही नाही


उत्तर :- 4


५) राष्ट्रपती खालील कोणत्या परिस्थितीत आणीबाणी घोषित करतात ?

   अ) बाह्य (परकीय) आक्रमण     

   ब) अंतर्गत कलह

   क) राज्यात राज्यकारभार चालविण्यात अपयश    

  ड) आर्थिक कलह


   1) अ, ब, क   

   2) अ, क, ड 

   3) ब, क, ड   

   4) अ, ब, ड

 

उत्तर :- 2


६) भारताच्या राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्षरित्या निर्वाचन मंडळाकडून होते ज्यामध्ये .................... च्या निर्वाचित सदस्यांचा  समावेश असतो.

   1) फक्त लोकसभा    

   2) फक्त राज्यसभा    

   3) लोकसभा व राज्यसभा   

   4) लोकसभा, राज्यसभा व राज्याच्या विधानसभा


उत्तर :- 4


७) अ) भारताचे राष्ट्रपती हे संघराज्य शासनाचे कार्यकारी प्रमुख आहेत.

 ब) ते सैन्य दलांचे सर्वोच्च प्रमुख आहेत.


   1) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत. ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

   2) अ आणि ब दोन्हीही बरोबर आहेत पण ब हे अ चे बरोबर स्पष्टीकरण नाही.

   3) अ हे बरोबर आहे, ब हे चुक आहे.

   4) अ हे चूक आहे, ब हे बरोबर आहे.


उत्तर :- 2


८) पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?

   1) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांबाबत सर्वोच्च न्यायालय चौकशी करू शकते.

   2) उपराष्ट्रपतींच्या निवडणूकीतून उद्भवणा-या मुद्यांसंदर्भात राष्ट्रपतींचा निर्णय अंतिम असतो.

   3) उपराष्ट्रपतींची निवडणूक अग्राह्य ठरल्यास अशा घोषणेपर्यंत केलेली कर्तव्ये अग्राह्य ठरत नाहीत.

   4) उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीसंबंधी कोणत्याही बाबीचे कायद्याव्दारे विनियमन संविधानास अधीन राहून संसदेस करता येते.


उत्तर :- 2


९) भारताचा राष्ट्रपती आपल्या राजीनाम्याचे पत्र कोणाला संबोधून देतो ?

   1) प्रधानमंत्री    

   2) भारताचे सर्वोच्च न्यायाधीश    

   3) भारताचे उपराष्ट्रपती   

  4) वरीलपैकी एकही नाही


उत्तर :- 3


1०) “आम्ही त्यांना कोणतीही वास्तव सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्ठेचे केले आहे.”  राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले ?

   1) पं. जवाहरलाल नेहरू    

   2) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

   3) के. एम. मुन्शी  

   4) डॉ. राजेंद्र प्रसाद


उत्तर :- 1


1) खालील विद्युत प्रकल्प व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोडया लावा.

  विद्युत प्रकल्प      जिल्हा

         अ) पवना        i) ठाणे

         ब) तिलारी        ii) सिंधुदुर्ग

         क) भातसा        iii) परभणी

         ड) येलदरी        iv) पुणे

             अ  ब  क  ड

         1)  ii  i  iv  iii

         2)  i  iii  ii  iv

         3)  iv  ii  i  iii

         4)  i  iv  iii  ii


उत्तर :- 3


2) महाराष्ट्रातील खालील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरत्या क्रमाने लिहा.

   अ) वर्धा    ब) कोयना    क) उल्हास    ड) सावित्री


   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, अ    3) अ, ब, ड, क    4) ड, क, ब, अ


उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात ........... या जिल्ह्यामध्ये अरण्यांची टक्केवारी सर्वात जास्त आहे

   1) सिंधुदुर्ग    2) गडचिरोली    3) औरंगाबाद    4) सोलापूर


उत्तर :- 2


4) महाराष्ट्रात सर्वात कमी वनाखालील क्षेत्र ............. या विभागात आहे.

   1) विदर्भ    2) कोकण    3) मराठवाडा    4) नाशिक

उत्तर :- 3


5) मेळघाटचा ‘व्याघ्र प्रकल्प’ ..............जिल्ह्यात वसलेला आहे.

   1) गडचिरोली    2) भंडारा    3) अमरावती    4) यवतमाळ


उत्तर :- 3

प्रश्नमंजुषा

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१. खालीलपैकी कोणत्या समितीचा कार्यविषयक 'पंचायतराज संस्था' हा होता ?

अ) जी. व्ही. के. राव समिती

ब) लळा सुंदरम समिती

क) अशोक मेहता समिती ✅✅

ड) व्ही.कृष्णमेनंन समिती


२) चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असतांना सूर्यग्रहण झाले तर अशे ग्रहण ..........असेल?

१) खग्रास 

२) खंडग्रास 

३) कंकनाकृती ✅✅

४) यापैकी नाही


३) केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली 'माडिया गोंड'ही जगात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते ?

१) सिंधुदुर्ग

२) चंद्रपूर ✅✅

३) गोंदिया

४) रायगड


४) खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा आपणास मिळणाऱ्या परकीय मदतीत आजही सर्वाधिक हिस्सा आहे ?

१) रशिया 

२) जपान 

३) ब्रिटन 

४)अमेरिका ✅✅


५) 'मुंबई बेट'ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ..........

१) याने पोर्तुगीजांकडू जिंकून घेतले.

२) याने मोघलांकडून जिंकून घेतले.

३) यांच्यामते इंग्लंडहून सुंदर शहर होते 

४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले. ✅✅


६) 'ग्रँड ट्रॅक' हा राष्ट्रीय महामार्ग या दोन शहरांना जोडतो.

१) कोलकत्ता : अमृतसर  ✅✅

२) मुंबई : दिल्ली

३) मुंबई : कोलकत्ता 

४) कोलकत्ता : चेन्नई


७) अग्निकंकण उर्फ 'रिंग ऑफ फायर'खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधीत आहे

अ) भूकंपप्रवण क्षेत्र

ब) ज्वालामुखी उद्रेकाचे क्षेत्र

क) प्रशांत महासागराभोवतीचा भाग


१) फक्त अ,ब व क ✅✅

२) फक्त ब व क

३) फक्त ब व अ

४) अ ते क 


८) 'रिंट ऑफ व्हेबिअस कॉपर्स' व 'रिंट ऑफ मॅडामस' हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधीत आहेत

१) संपत्तीचा हक्क

२) धर्मस्वातंत्र्याचा हक्क

३) स्वातंत्र्याचा हक्क

४) घटनात्मक दाद मागण्याचा हक्क ✅✅


९) खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रीपतीच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधीत आहेत?

१) ३५२,३५६,३६० ✅✅

२) १६३,१६४,१६५

३) ३६७,३६८,३६९

४) ३६९,३७०,३७१



10) भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर,१९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते.या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले  होते?                                १) डॉ. राजेंद्रप्रसाद

२) हृदयनाथ कुंझरू

३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर

४) डॉ. सच्चिदानंद सिन्हा✅✅


११) विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जाते?

१) एक-पप्ष्टांश 

२) एक-बारांश ✅✅

३) एक-पंचमाश

४) एक-तृतीयांश


१२) दादाभाई नौरोजीनी आपला सुप्रसिद्ध 'वहन सिद्धांत' (Drain Theory) आपल्या ..........ग्रंथात मांडला आहे .

१)पाँव्हार्टी इन इंडिया 

२) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल इन इंडिया ✅✅

३) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल 

४) ब्रेन ड्रेन ड्युरिंग ब्रिटिश पिरिअड


१३) गंगा नदी येथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगेच्या मुखाशी गाळ साचून ........या नावाने बेट तयार झाले आहे

१) सुंदरबन 

२) प्रयाग 

3) न्यू-मूर ✅✅

४) कोलकात्ता


१४) संगणकामधील फ्लॉपी डिस्क म्हणजे........होय.

१) माहिती एकत्र करणारी यंत्रणा

२) केंद्रीय मेमरी 

३) एक सॉफ्टवेअर 

४) माहिती साठवण्याचे एक साधन ✅✅


१५) 'P'हा 'K'चा भाऊ आहे .'S'हा 'P' चा मुलगा आहे .'T'ही 'K'ची मुलगी आहे .'E'आणि 'K'परस्पर बहिणी आहेत; तर 'E'che 'T'शी नाते काय?

१) आत्या 

२) मावशी ✅✅

३) मामी 

४) बहीण

गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


· पंचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकार्‍याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते. 


· गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो. 


· गटविकास अधिकार्‍यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍याचे असते. 


· गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो. 


· पंचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो. 


· पंचायत समितीस मिळणार्‍या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत. 


· पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्‍यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्‍याला आहेत.


· पंचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्‍याच्या संमतीने करावा लागतो. 


· पंचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो. 


· पंचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्‍यावर अवलंबून असते. 


· गटविकास अधिकार्‍याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो. 


· पंचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो. 


· राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.

महाराष्ट्रातील पंचायतराज

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


👉 आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.


◆ कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?

  - स्थानिक स्वराज्य संस्था


◆ राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?

  -  2 ऑक्टोबर 1953


◆ बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?

  - 16 जानेवारी 1957


◆ बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?

  - वसंतराव नाईक समिती


◆ वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?

  - 27 जून 1960


◆  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?

  - महसूल मंत्री


◆ वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?

  - 226


◆ वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?

  - जिल्हा परिषद


◆ पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?

  - तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)


◆ महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?

   - 1  मे 1962


◆ ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?

  -  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966


◆ महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?

  -  7 ते 17


◆ ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?

  - जिल्हाधिकारी


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?

  - 5 वर्षे


◆ ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?

  - पहिल्या सभेपासून


◆ ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?

  - तहसीलदार


◆ सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?

  - विभागीय आयुक्त


◆ उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - सरपंच


◆ सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - दोन तृतीयांश (2/3)


◆ महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?

  - तीन चतुर्थांश (3/4)


◆ पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - पंचायत समिती सभापती


◆ पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - संबंधित विषय समिती सभापती


◆ जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - जिल्हा परिषद अध्यक्ष


◆ जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?

  - विभागीय आयुक्त


◆ कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?

  -  ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?

   - जिल्हा परिषदेचा


◆ ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?

  - जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून


◆ ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?

  - ग्रामसेवक


◆ ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?

   -  शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)


◆ ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?

  -  राज्यशासनाला


◆ सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?

   -  विस्तार अधिकारी


◆ गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?

  - ग्रामविकास खाते


  ◆ जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

  - जिल्ह्याचे पालकमंत्री


◆ जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?

  -  जिल्हाधिकारी


◆ जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?

  -  दहा (स्थायी+9 विषय समित्या)


◆ जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?

  - स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा


◆ जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?

  -  जिल्हा परिषद अध्यक्ष


◆  महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?

  -  वसंतराव नाईक


19 December 2025

भारतीय संविधान : सर्व अनुसूच्या (All Schedules)



1) अनुसूची 1 – राज्ये व केंद्रशासित प्रदेश

● भारतातील राज्ये व केंद्रशासित प्रदेशांची नावे व सीमा

● नवीन राज्य किंवा केंद्रशासित प्रदेश निर्माण झाल्यास ही अनुसूची बदलली जाते

● संबंधित अनुच्छेद : अनुच्छेद 1 व अनुच्छेद 4


2) अनुसूची 2 – वेतन, भत्ते व पेन्शन

● राष्ट्रपती

● उपराष्ट्रपती

● राज्यपाल

● लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष

● राज्य विधानसभेचे अध्यक्ष

● सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

● विशेष मुद्दा : नियंत्रक व महालेखापाल (CAG) यांचे वेतन यात समाविष्ट नाही (अनुच्छेद 148)


3) अनुसूची 3 – शपथ / प्रतिज्ञा

● केंद्रीय व राज्य मंत्री

● लोकसभा व राज्यसभा सदस्य

● आमदार

● सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायाधीश

● राष्ट्रपती – अनुच्छेद 60

● उपराष्ट्रपती – अनुच्छेद 69


4) अनुसूची 4 – राज्यसभा प्रतिनिधित्व

● राज्यानुसार राज्यसभा सदस्यांची संख्या

● अप्रत्यक्ष निवडणूक पद्धत (विधानसभा मार्फत)

● संबंधित अनुच्छेद : अनुच्छेद 80


5) अनुसूची 5 – अनुसूचित क्षेत्रे (Tribal Areas)

● राज्यांतील अनुसूचित क्षेत्रांचे प्रशासन

● राज्यपालांना विशेष अधिकार

● Tribal Advisory Council ची तरतूद

● मध्य व पूर्व भारतातील राज्यांमध्ये लागू


6) अनुसूची 6 – स्वायत्त जिल्हे

● लागू राज्ये :

● आसाम

● मेघालय

● त्रिपुरा

● मिझोरम

● Autonomous District Council / Regional Council ची तरतूद

● आदिवासी परंपरा व स्थानिक कायद्यांचे संरक्षण


7) अनुसूची 7 – अधिकारांची विभागणी

● संघ सूची (Union List) – 100 विषय (संरक्षण, परराष्ट्र व्यवहार)

● राज्य सूची (State List) – 61 विषय (पोलीस, सार्वजनिक आरोग्य)

● समवर्ती सूची (Concurrent List) – 52 विषय (शिक्षण, वन)

● केंद्र व राज्य कायद्यात संघर्ष झाल्यास केंद्राचा कायदा लागू


8) अनुसूची 8 – संविधानिक भाषा

● सध्या एकूण 22 भाषा

● मूळ भाषा : 14

● 2011 मध्ये समाविष्ट भाषा :

● बोडो

● डोगरी

● मैथिली

● संथाली


9) अनुसूची 9 – न्यायालयीन संरक्षण

● प्रामुख्याने भूमिसुधार कायद्यांचे संरक्षण

● संबंधित अनुच्छेद : अनुच्छेद 31B

● 24 एप्रिल 1973 नंतरचे कायदे न्यायालयीन पुनरावलोकनास पात्र


10) अनुसूची 10 – पक्षांतर विरोधी कायदा

● 52 वी घटनादुरुस्ती, 1985

● आमदार किंवा खासदार अपात्र ठरू शकतो

● निर्णय देण्याचा अधिकार : सभापती / अध्यक्ष


11) अनुसूची 11 – पंचायती

● 73 वी घटनादुरुस्ती

● 29 विषय

● ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद


12) अनुसूची 12 – नगरपालिका

● 74 वी घटनादुरुस्ती

● 18 विषय

● महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत

स्वतंत्र मजूर पक्ष (Independent Labour Party)

◆ संस्थापक व स्थापना

● संस्थापक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

● स्थापना वर्ष : 15 ऑगस्ट 1936

● स्थापना स्थळ : मुंबई प्रांत


◆ उद्देश

● श्रमिक, शेतकरी, शेतमजूर व दलित वर्गाला सामाजिक, आर्थिक व राजकीय न्याय मिळवून देणे


◆ कार्य व लढे

● भूमिहीन शेतमजुरांना जमीन मिळवून देण्यासाठी संघर्ष

● कामगारांसाठी चांगले कायदे व सुविधा यासाठी आंदोलन

● ट्रेड डिस्प्युट बिलविरोधात आंदोलन

● 7 नोव्हेंबर 1938 रोजी लाक्षणिक संप


◆ निवडणूक यश

● 1936 च्या प्रांतीय निवडणुकीत 17 पैकी 15 जागा जिंकल्या

● विधानसभेत प्रभावी भूमिका बजावली


◆ विधिमंडळातील भूमिका (1937–1939)

● विविध विधेयके मांडली

● कामगार व शेतकरी हिताचे मुद्दे प्रभावीपणे उपस्थित


◆ जाहीरनामा

● पक्षाचा जाहीरनामा प्रथम ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या दैनिकात प्रकाशित


◆ पुढील रूपांतरण

● 1942 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाचे शेड्युल्ड कास्ट्स फेडरेशनमध्ये रूपांतर


◆ ऐतिहासिक महत्त्व

● दलित व कामगार वर्गाला स्वतंत्र राजकीय व्यासपीठ

● जातीय भेदभाव व शोषणाविरुद्ध संघटित लढा

16 December 2025

चालू घडामोडी (16 डिसेंबर 2025)



 📰 संगीता बरुआ पिशारोटी – PCI च्या पहिल्या महिला अध्यक्ष

ऐतिहासिक निवड: 14 डिसेंबर 2025 रोजी प्रेस क्लब ऑफ इंडिया (PCI) च्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून निवड.

महत्व: 1957 मध्ये स्थापन झालेल्या PCI च्या 68 वर्षांच्या इतिहासातील पहिली महिला अध्यक्ष; भारतीय पत्रकारितेतील महिला नेतृत्वासाठी मैलाचा दगड.

निवडणूक निकाल: 13 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या निवडणुकांत 21 पैकी 21 जागांवर त्यांच्या गटाचा निर्विवाद विजय.

अनुभव: 2024 मध्ये PCI च्या उपाध्यक्ष.

सन्मान: 2017 – रामनाथ गोएंका उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार.

लेखन: “Assam: The Accord, The Discord” – असम करार व ईशान्य भारतावरील अभ्यासपूर्ण पुस्तक.


2️⃣ 💰 DBS बँक – जागतिक बँकिंगमधील अव्वल कामगिरी

पुरस्कार: Global Bank of the Year 2025.

पुरस्कार देणारे: The Banker मासिक (Financial Times Group).

पुनरावृत्ती: 2018, 2021 नंतर तिसऱ्यांदा हा सन्मान.

स्पर्धा: जगभरातील 294 बँकांचा सहभाग.

ओळख: डिजिटल बँकिंग, नवकल्पना, ग्रीन फायनान्स व आर्थिक स्थैर्य.

पूर्ण नाव: Development Bank of Singapore (DBS).

मुख्यालय: सिंगापूर 🇸🇬.


3️⃣ 🇦🇹 ऑस्ट्रियाचा सामाजिक निर्णय – शाळांमध्ये हेडस्कार्फ बंदी

निर्णय: 14 वर्षांखालील मुलींना सार्वजनिक व खाजगी शाळांमध्ये हेडस्कार्फ (हिजाब) परिधान करण्यास बंदी.

मंजुरी: 11 डिसेंबर 2025 रोजी संसदेत.

अंमलबजावणी: सप्टेंबर 2026 पासून.

उद्देश: मुलींच्या स्वातंत्र्याचे संरक्षण व लिंग समानतेला प्रोत्साहन.

परिस्थिती: युरोपमध्ये धर्मनिरपेक्षता, एकात्मता व धार्मिक प्रतीकांवरील धोरणांवर चर्चा.

पार्श्वभूमी: 2019 मधील तत्सम कायदा नंतर रद्द.


4️⃣ 🗺️ Yellow Line – इस्रायल व गाझामधील नवीन सीमारेषा

नाव: Yellow Line (यलो लाईन) 🟡.

स्थान: इस्रायल 🇮🇱 – गाझा (पॅलेस्टाईन).

स्वरूप: उत्तर–दक्षिण दिशेने जाणारी काल्पनिक विभाजक रेषा.

संदर्भ: ऑक्टोबर 2025 च्या युद्धविराम कराराचा भाग.

घोषणा: 8 डिसेंबर 2025 – इस्रायली लष्करप्रमुख.

महत्व: भू-राजकीय बदल व सुरक्षा (Buffer Zone) व्यवस्थापनाचे प्रतीक.


📌 महत्वाच्या आंतरराष्ट्रीय सीमारेषा (स्पर्धा परीक्षांसाठी)

ड्युरंड लाईन: पाकिस्तान – अफगाणिस्तान

रेडक्लिफ लाईन: भारत – पाकिस्तान

मॅकमोहन लाईन: भारत – चीन

24 वी समांतर रेषा: भारत – पाकिस्तान (1965 युद्धबंदी/कच्छ संदर्भ)

LOC (Line of Control): भारत – पाकिस्तान

LAC (Line of Actual Control): भारत – चीन

38 वी समांतर रेषा: उत्तर कोरिया – दक्षिण कोरिया

MPSC संयुक्त गट ‘ब’ पूर्व परीक्षा २०१७ – Polity PYQ



प्र. १) स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण?

उत्तर: सी. राजगोपालचारी


प्र. २) अविश्वास प्रस्तावा संदर्भात: (अ) राज्यघटनेत तरतूद नाही. (ब) तो फक्त लोकसभेत होतो.

उत्तर: दोन्ही विधाने बरोबर


प्र. ३) DPSP बाबत— (अ) सामाजिक आर्थिक लोकशाहीसाठी. (ब) न्यायप्रविष्ट नाहीत.

उत्तर: दोन्ही विधाने बरोबर


प्र. ४) राष्ट्रीय विकास परिषदेत कोण असतात?

उत्तर: पंतप्रधान, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री


प्र. ५) आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा कुठे नमूद आहे?

उत्तर: DPSP – कलम ५१


प्र. ६) दिल्ली आणि पुदुच्चेरीलाच राज्यसभा जागा असण्याचे योग्य स्पष्टीकरण?

उत्तर: कारण व विधान दोन्ही बरोबर आणि कारण योग्य स्पष्टीकरण


प्र. ७) Attorney General बद्दल चूक विधान कोणते?

उत्तर: ते लोकसभेत मतदान करू शकतात


प्र. ८) आंतरराष्ट्रीय करार लागू करण्यासाठी सर्व राज्यांची संमती आवश्यक आहे का?

उत्तर: नाही


प्र. ९) कलम ३६० कोणत्या आणीबाणीशी संबंधित आहे?

उत्तर: वित्तीय (आर्थिक) आणीबाणी


🏛️ MPSC संयुक्त गट ‘क’ पूर्व परीक्षा २०१८ – Polity PYQ

प्र. १०) कोणत्या पाणी तंट्यात कर्नाटक समाविष्ट नाही?

उत्तर: वंशधारा


प्र. ११) संविधानाचा ‘आत्मा’ कोणते कलम?

उत्तर: कलम ३२


प्र. १२) संविधान सल्लागार म्हणून कोण होते?

उत्तर: सर बी. एन. राव


प्र. १३) मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटनादुरुस्तीने जोडली?

उत्तर: ४२ वी दुरुस्ती (१९७६)


प्र. १४) Anti-Defection कायदा कोणत्या दुरुस्तीने लागू झाला?

उत्तर: ५२ वी दुरुस्ती (१९८५)


प्र. १५) UPSC/MPSC स्थापनेकरीता कलम कोणते?

उत्तर: कलम ३१५


प्र. १६) मंत्रीपरिषद लोकसभेस सामूहिकरीत्या उत्तरदायी— कोणते कलम?

उत्तर: कलम ७५(३)


प्र. १७) एम. सी. सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते का?

उत्तर: होय

महाराष्ट्रातील प्रमुख खनिजे: साठे



1)लोहखनिज 

         👉२०%

         👉येत्यापल्ली, गडचिरोली

         👉विदर्भात (टिकोनाईट) कोकणात: जांभा खडकात 

         👉 लोह-पोलाद उद्योग 


2)मँगनीज 

         👉 ४०% 

         👉भंडारा व नागपूर, सिंधुदुर्ग 

         👉 पोलाद उद्योग 


3)बॉक्साईट 

        👉 २१%

        👉संपूर्ण कोकण व कोल्हापूर, सातारा, सांगली  

        👉ॲल्युमिनियम निर्मिती 


4)क्रोमाईट (मौनी) 

        👉 १०% 

        👉 भंडारा व गोंदिया (रत्नागिरी व सिंधुदुर्ग) 

        👉रसायन व धातू उद्योग

5)चुनखडी (राजूऱा) 

        👉 ९% 

        👉 यवतमाळ,चंद्रपूर,गडचिरोली सिमेंट             

        👉 उद्योग; लोह-पोलाद उद्योग 


6) डोलोमाईट 

       👉 १%

       👉 नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, रत्नागिरी                                    

       👉 ९०% लोह-पोलाद उद्योग

       👉 १०% खत कारखान्यात 


7) कायनाईट 

       👉 १५%  

       👉 भंडारा ,गोंदिया 

       👉  हिऱ्याना पैलू पाडणे, वीज


13 December 2025

भारत सरकार कायदा, 1935 मधील भारतीय राज्यघटनेत स्वीकारलेल्या प्रमुख तरतुदी

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


१) संघराज्यीय योजना (Federal Scheme)

➤ केंद्र व प्रांतांमधील अधिकारांची स्पष्ट विभागणी.

➤ भारतात संघराज्याचे (Federal) तत्त्व याच कायद्यातून स्वीकारले गेले.


२) अधिकारांची विभागणी (Division of Powers)

➤ तीन सूचींची व्यवस्था : फेडरल, प्रांतीय, समवर्ती.

➤ भारतीय संविधानात त्या अनुक्रमे केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची म्हणून स्वीकारल्या.

➤ 1935 च्या केंद्रीकरणाच्या अनुभवावरून नव्या संविधानात अधिक संतुलित केंद्र-राज्य संबंध रचले गेले.


३) विधानमंडळ व कार्यपालिका यांचे विभाजन

➤ Legislature आणि Executive स्वतंत्र ठेवण्याचे तत्त्व.

➤ मात्र 1935 च्या कायद्यात Governor-General कडे अत्यधिक अधिकार होते.


४) राज्यपालाचे पद (Office of Governor)

➤ राज्याचा घटनात्मक प्रमुख म्हणून राज्यपालाची संकल्पना.

➤ या पदाचे स्वरूप जवळजवळ तसेच भारतीय संविधानाने स्वीकारले.


५) न्यायव्यवस्था (Judiciary)

➤ 1937 मध्ये फेडरल कोर्ट स्थापन.

➤ हाच ढाचा पुढे भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्मितीचा आधार.


६) लोकसेवा आयोगे (Public Service Commissions)

➤ फेडरल PSC → UPSC

➤ प्रांतीय PSC → राज्य लोकसेवा आयोग

➤ सार्वजनिक सेवांची निवड व संघटनासाठी स्वतंत्र आयोगांची परंपरा.


७) आणीबाणीच्या तरतुदी (Emergency Provisions)

➤ राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याची तरतूद.

➤ भारतीय संविधानातही अशाच प्रकारच्या आपत्कालीन तरतुदी समाविष्ट.


८) प्रशासकीय ढाचा (Administrative Details)

➤ भारतीय प्रशासनाची रचना, विभागांची मांडणी, अधिकारपद्धती — मोठ्या प्रमाणात 1935 च्या कायद्यावर आधारित.

➤ प्रांतांच्या प्रशासनासाठी स्पष्ट कार्यपद्धती.

राज्यपाल हा राज्याचा घटनात्मक प्रमुख आहे. ...

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com



भारताच्या प्रत्येक राज्यात एक राज्यपाल असतो. केंद्र सरकारकडून राज्यात संविधानाचे रक्षण व देखरेख करण्यासाठी राज्यपाल नेमला जातो.

2) राज्यपालाशी संबंधित संविधानातील अनुच्छेद (Articles)

अनुच्छेद 153 — राज्यपाल

भारताच्या प्रत्येक राज्यात एक राज्यपाल असणार.

(काही राज्यांना एकच राज्यपालही नेमला जाऊ शकतो)

अनुच्छेद 154 — कार्यकारी शक्ती (Executive Power)

राज्याची सर्व कार्यकारी शक्ती राज्यपालाकडे निहित असते.

अनुच्छेद 155 — नियुक्ती (Appointment)

राज्यपालांची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.

अनुच्छेद 156 — कार्यकाळ (Term of Office)

साधारण कार्यकाळ : ५ वर्षे

पण राष्ट्रपती कधीही पदावरून हटवू शकतात (at the pleasure of President).

अनुच्छेद 157 — पात्रता (Qualifications)

राज्यपाल होण्यासाठी:

भारताचा नागरिक असणे आवश्यक

वय ३५ वर्षांपेक्षा जास्त

अनुच्छेद 158 — अटी व शर्ती (Conditions of Office)

कोणतेही नफ्याचे पद धारण करणार नाही

राज्यात कोणत्याही राजकीय पदावर (MLA/MLC) असू नये

पगार व इतर सुविधांची तरतूद

अनुच्छेद 159 — शपथ

राज्यपालाची शपथ मुख्य न्यायाधीश किंवा उच्च न्यायालयातील वरिष्ठ न्यायाधीश घेतात.

अनुच्छेद 160 — विशेष परिस्थितीत तरतूद

अडचणीच्या परिस्थितीत राष्ट्रपती राज्यपालांसाठी विशेष तरतूद करू शकतात.

अनुच्छेद 161 — क्षमाशक्ती (Pardon Power)

राज्यपाल:

शिक्षा माफ, स्थगित, कमी करण्याचे अधिकार वापरू शकतो

पण मृत्युदंड माफ करण्याचा अधिकार नाही (तो फक्त राष्ट्रपतींकडे)

अनुच्छेद 163 — मंत्रिमंडळाचा सल्ला

राज्यपाल मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काम करतो.

अनुच्छेद 164 — मुख्यमंत्री व मंत्रीांची नियुक्ती

मुख्यमंत्री नेमणे राज्यपालाचे कार्य

इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्री सल्ल्याने

अनुच्छेद 165 — महाधिवक्ता (Advocate General)

राज्याच्या महाधिवक्त्याची नियुक्ती राज्यपाल करतो.

अनुच्छेद 174 — विधानसभेचे अधिवेशन बोलावणे/ तहकूब करणे

Legislative Assembly sessions Governor चालवतो.

अनुच्छेद 175 — संदेश देण्याचा अधिकार (Addressing the House)

राज्यपाल विधानसभेला संदेश देऊ शकतो.

अनुच्छेद 176 — संयुक्त अभिभाषण

निवडणुकीनंतर राज्यपाल दोन्ही सभागृहांना संयुक्त संबोधन करतो.

अनुच्छेद 200 — विधेयकावर स्वाक्षरी

राज्यपालाचे पर्याय:

पास करणे

नकार देणे

राष्ट्रपतींकडे पाठवणे

पुन्हा विचारासाठी पाठवणे

अनुच्छेद 201 — राष्ट्रपतींकडे पाठवलेले विधेयक

राष्ट्रपती त्यावर अंतिम निर्णय देतात.

3) राज्यपालांचे अधिकार

✔️ कार्यकारी अधिकार – अधिकारी नियुक्ती, सरकारचे नियंत्रण, अहवाल देणे

✔️ विधायी अधिकार – विधेयक मंजुरी, अधिवेशन बोलावणे, संबोधन

✔️ न्यायिक अधिकार – शिक्षा कमी/ स्थगित

✔️ आर्थिक अधिकार – अर्थसंकल्प सादर करण्यास मंजुरी

✔️ विशेष अधिकार – President’s Rule साठी अहवाल देणे (Article 356 चा आधार)

4) महत्त्वाचे मुद्दे (Examination Points)

राज्यपालाला मृत्युदंड माफ करण्याचा अधिकार नाही......


महत्वाचे भारतातील पहिले व्यक्ती

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


→ भारताचे पहिले राष्ट्रपती: 

राजेंद्र प्रसाद 


→ भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती : 

प्रतिभाताई पाटील


→ भारताचे पहिले उपराष्ट्रपती :

सर्वपल्ली राधाकृष्णन


→ भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष : 

व्योमेश चंद्र बॅनर्जी


→ भारताचे पहिले सरन्यायाधीश : 

एच जे कानिया


→ भारताचे पहिले पंतप्रधान : 

जवाहरलाल नेहरू


→ भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान : 

इंदिरा गांधी


→ भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त : 

सुकुमार सेन


→ भारताचे पहिले व्हाईसरॉय : 

लॉर्ड कॅनिंग


→ भारताचे पहिले गव्हर्नर जनरल : 

लॉर्ड विल्यम बेंटिक


→ भारतातील पहिल्या महिला राज्यपाल : 

सरोजिनी नायडू


→ पहिल्या महिला मुख्यमंत्री : 

सुचेता कृपलानी


→ लोकसभेचे पहिले सभापती : 

जी.व्ही.मावळणकर


→ भारताचे पहिले गृहमंत्री : 

सरदार  वल्लभभाई पटेल


→ भारतातील लोकपालचे पहिले अध्यक्ष : 

पिनाकी चंद्र घोष


→ भारतातील पहिल्या महिला संरक्षण मंत्री : 

निर्मला सीताराम


→ देशाच्या पंतप्रधान बनणाऱ्या जगातील पहिल्या महिला :

सिरीमाओ भंडारनायके

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग

 अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


1) महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग म्हणजे 

महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) हा संविधानाने स्थापन केलेला राज्यस्तरीय स्वायत्त आयोग आहे.

याची प्रमुख जबाबदारी म्हणजे –

✔️ राज्यातील विविध शासकीय पदांसाठी निवड प्रक्रिया करणे

✔️ भरती, पदोन्नती, स्थानांतरण, शिस्तभंग विषयक सल्ला देणे

✔️ पारदर्शक व गुणवत्तापूर्ण निवड प्रक्रिया सुनिश्चित करणे

2) स्थापना कोणत्या कलमानुसार?

भारतीय संविधानातील कलम 315 ते 323 हे सार्वजनिक सेवा आयोगांशी संबंधित आहेत.

मुख्य कलमे :

कलम 315 :

केंद्र व प्रत्येक राज्यासाठी सार्वजनिक सेवा आयोग स्थापन करण्याचे प्रावधान

महाराष्ट्रासाठी MPSC या कलमानुसारच अस्तित्वात आहे.

कलम 316 :

आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती कोण करतो?

→ राज्यपाल नियुक्त करतात.

कार्यकाळ : 6 वर्षे किंवा वय 62 वर्षे (जो आधी येईल)

कलम 317 :

अध्यक्ष/सदस्य पदावरून हटविण्याचे अधिकार

→ राष्ट्रपती (सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर)

कलम 318 :

आयोगाच्या सदस्यसंख्या व सेवा अटी ठरविण्याचा अधिकार

→ राज्यपाल.

कलम 319 :

सेवानिवृत्तीनंतर अध्यक्ष/सदस्यांना कोणते पद घेता येते/येऊ शकत नाही याबाबत तरतूद.

कलम 320 :

आयोगाच्या कार्ये आणि कर्तव्ये

→ भरती, परीक्षा, पदोन्नती, शिस्तभंग कारवाई, सेवा नियम इत्यादींबाबत सल्ला देणे.

कलम 321 :

राज्य सरकार आयोगावर अतिरिक्त कार्य सोपवू शकते.

कलम 322 :

आयोगाच्या खर्चाचे भरणे समायोजित.

कलम 323 :

वार्षिक अहवाल राज्यपालांकडे आणि नंतर राज्य विधानसभेस ठेवणे.

3) MPSC ची प्रमुख कार्ये

राज्यातील गट-अ, गट-ब, गट-क पदांसाठी परीक्षा व मुलाखत

सेवाशर्ती, शिस्तभंग विषयक शिफारशी

विभागीय परीक्षा

भरती प्रक्रियेत पारदर्शकता व गुणवत्ता राखणे

4) MPSC मुख्यालय

मुंबई (मुख्य कार्यालय)

नवीन प्रशासनिक भवन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC)


महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग (MPSC) सध्याचे अध्यक्ष 

✔️ सध्याचे MPSC चे अध्यक्ष (Chairman)


👉 राजनीश सेठ (Rajnish Seth) हे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. 

📌 ते IPS अधिकारी आहेत आणि 1988 बॅचचे अधिकारी आहेत. सरकारने त्यांना आयोगाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे.....


केंद्रीय माहिती आयोग

अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com


 RTI कायदा 2005 (माहितीचा अधिकार कायदा 2005).


कधी स्थापन झाला? → 12 ऑक्टोबर 2005


का तयार झाला? → केंद्र सरकारच्या विभागांकडून नागरिकांना माहिती मिळण्यात जर अडचण झाली तर अंतिम अपील ऐकण्यासाठी..


2) आयोगाची रचना (Structure)

केंद्रीय माहिती आयोगात:

मुख्य माहिती आयुक्त (Chief Information Commissioner) – 1

माहिती आयुक्त (Information Commissioners) – कमाल 10 पर्यंत

एकूण → जास्तीत जास्त 11 सदस्य


3) नियुक्ती कशी होते? (Appointment)

सर्व नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात.

शिफारस करणारी समिती:

पंतप्रधान — अध्यक्ष

लोकसभेतील विरोधी पक्षनेते

पंतप्रधानांनी निवडलेले एक केंद्रीय मंत्री


4) पात्रता (Eligibility)

प्रशासन, कायदा, शिक्षण, विज्ञान, सामाजिक कार्य, पत्रकारिता अशा क्षेत्रात अनुभवी, प्रामाणिक व्यक्तींना नियुक्ती.

कोणत्याही राजकीय पदावर असलेले व्यक्ती निवडता येत नाहीत..


5) कार्यकाळ (Tenure)

साधारणतः 3 वर्षे किंवा

वयोमर्यादा 65 वर्षे

(ज्याचे आधी पूर्ण होईल ते लागू)


6) मुख्य कार्य (Main Functions)

✔️ 1) Second Appeal (दुसरी अपील) ऐकणे

जर First Appeal मध्ये निर्णय मिळाला नाही किंवा समाधानकारक उत्तर नाही → नागरिक CIC कडे दुसरी अपील करू शकतो.

✔️ 2) तक्रारींची चौकशी

RTI मध्ये अडथळा आल्यास, माहिती देण्यात विलंब झाल्यास किंवा चुकीचे कारण देऊन माहिती नाकारल्यास तक्रार स्वीकारते.

✔️ 3) दंड लावण्याचा अधिकार

केंद्रीय सरकारी विभागातील CPIO वर खालील कारणांसाठी दंड लागू शकतो:

माहिती लपवणे

चुकीची/अपूर्ण माहिती देणे

वेळेत माहिती न देणे

RTI कायद्याचे उल्लंघन करणे

दंड → दरदिवशी ठराविक रक्कम, कमाल मर्यादा ठरलेली असते.

✔️ 4) सूचना देण्याचा अधिकार

विभागाला माहिती देण्यास सांगणे

तपास करण्याचे आदेश देणे

संबंधित अधिकाऱ्यावर विभागीय कारवाईची शिफारस.


7) अपील प्रक्रिया — Step by Step

Step 1: RTI अर्ज

नागरिकाने प्रथम RTI अर्ज संबंधित केंद्रीय विभागाकडे करायचा → CPIO कडे.

Step 2: First Appeal

30 दिवसांत उत्तर न मिळाल्यास किंवा चुकीचे उत्तर मिळाल्यास

→ त्या विभागातील First Appellate Authority कडे अपील.

Step 3: Second Appeal (CIC कडे)

First Appeal चा निर्णय समाधानकारक नसल्यास किंवा

45 दिवसांत निर्णय न मिळाल्यास

→ केंद्रीय माहिती आयोगाकडे दुसरी अपील करता येते..


8) आयोगाचे अधिकार (Powers)

चौकशी करण्याचा अधिकार

साक्ष घेण्याचा अधिकार

दस्तऐवज मागवण्याचा अधिकार

आदेश देण्याचा अधिकार

दंड लावण्याचा अधिकार

विभागावर शिस्तभंग कारवाईची शिफारस.


9) नागरिकांचे फायदे (Benefits to Citizens)

केंद्र सरकारच्या मंत्रालये, विभाग, आयोग, कार्यालये यांच्याकडून माहिती मिळवणं सोपं

RTI अर्जाचा योग्य तो निपटारा

पारदर्शकता आणि जबाबदारी

भ्रष्टाचार कमी होणे

वेळेत उत्तर न मिळाल्यास अंतिम न्याय मिळवण्याचे व्यासपीठ.


10) सोप्या भाषेत सारांश

टप्पाकाय होते?1RTI अर्ज CPIO कडे2उत्तर नाही / समाधान नाही → First Appeal3First Appeal नंतरही समस्या → Second Appeal to CIC4आयोग चौकशी करून अंतिम आदेश देतो5आवश्यक असल्यास अधिकाऱ्यावर दंड / कारवाई.