14 August 2025

वेदोक्त प्रकरण


1899 साली हे प्रकरण कोल्हापूरामध्ये घडले. कार्तिक महिन्यात शाहू महाराज पंचगंगा नदीवर स्नानासाठी जात असत. यावेळेस त्यांच्या परिवारातले काही सदस्य बंधू बापूसाहेब महाराज, मेहुणे मामासाहेब खानविलकर आणि स्नानाच्यावेळेस मंत्र म्हणणारे नारायण भटजी असत.


एकेदिवशी महाराजांचे स्नेही आणि प्रकांड पंडित राजारामशास्त्री भागवतही होते. महाराजांचे स्नान सुरू असताना भटजी म्हणत असलेले मंत्र वेदोक्त नसून पुराणोक्त असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.


त्यांनी हे महाराजांच्या लक्षात आणून दिलं. महाराजांनी भटजींना विचारताच त्यांनी शूद्रांना पुराणोक्त मंत्रच सांगावे लागतात असं उत्तर दिलं.


हे उत्तर शाहू महाराजांसाठी एक मोठ्या विचारमंथनाचं कारण ठरलं. त्या वाक्यानं ते अंतर्मूख तर झालेच त्याहून पुढील मोठ्या सामाजिक चळवळीसाठी सिद्ध झाले.


क्षत्रियकुलावतंस हिंदुपदपातशहा असं बिरुद लावणाऱ्या राजालाही दर्जा मिळत नसेल तर बाकी लोकांवर काय अन्याय होत असेल याची त्यांना जाणीव झाली.


वेदोक्ताचं असं प्रकरण उद्भवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळीही असा वाद निर्माण झाला होता. शिवाजी महाराजांनी काशीहून गागाभट्टांना बोलावून राज्याभिषेक करवून घेतला होता.


साताऱ्याचे महाराज प्रतापसिंह यांच्या कार्यकाळातही वेदोक्ताधिकाराचा तंटा निर्माण झाल्यावर त्यांनी पंडितांची एक निर्णयसभा बोलावली आणि त्यामध्ये मराठ्यांचे क्षत्रियत्व सिद्ध होऊन त्यांना वेदोक्ताचा अधिकार मान्य केला गेला.


1896 साली बडोद्यात सयाजीराव गायकवाड यांच्याकडील धार्मिक विधी महाराष्ट्रीय ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार दिल्यावर सयाजीरावांनी राजस्थानी आणि गुजराती ब्राह्मणांकरवी ते करवून घेतले होते.


या वेदोक्त प्रकरणाचे पडसाद कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रात न पडते तरच नवल. यातून एकप्रकारचा संघर्षच निर्माण झाले. महाराष्ट्रातील तत्कालीन वर्तमानपत्रांतून, सभा-भाषणांतून त्याची दोन्ही बाजूंनी चर्चा होऊ लागली.


ऑक्टोबर 1901 मध्ये लोकमान्य टिळकांनी आपल्या केसरीमध्ये वेदोक्ताचे खूळ या नावाचे दोन अग्रलेख लिहिले. त्यातून त्यांनी वेदोक्तातील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ती थोडक्यात अशी होती, “या युगात ब्राह्मण व शूद्र असे दोनच वर्ण राहिले आहेत. शिवाजी महाराजांच्या कार्यावर मोहिती होऊन तत्कालीन कर्त्या पुरुषांनी खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करुन गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला; पण त्यावेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही.”


नवा राजवाडा, कोल्हापूर

छत्रपतींच्या भोसले घराण्याशिवाय इतर घराण्यांना वेदोक्ताचा अधिकार नाकारणं हे शाहू महाराजांना अस्वस्थ करणारं होतं. आधी फक्त आपल्यापुरते राजवाड्यासाठी वेदोक्ताचा आग्रह धरणाऱ्या महाराजांनी समस्त मराठ्यांना हा अधिकार मिळावा असा आग्रह धरला आणि तसेही प्रयत्नही केले.


पुढे जाऊन राजर्षी शाहू महाराजांनी ब्राह्मणेतर जातीतींल मुलांना वेद शिकण्याचा अधिकार मिळावा यासाठी थेट वैदिक स्कूल काढूनच आपल्या कृतीतून उत्तर दिले.


ज्या ब्राह्मणांनी वेदोक्त पद्धतीने विधी करण्यास नकार दिला त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली.


संस्थानचे राजोपाध्यांचे राजसेवेसाठी दिलेले 30 हजारांचे इनाम जप्त करण्यात आले. करवीरच्या शंकराचार्य मठाचे ब्रह्मनाळकर स्वामी यांचे 50 हजार रुपयांचे उत्पन्न सरकारजमा करण्यात आले. इतरही शेकडो ब्राह्मणांची उत्पन्नं आणि इनाम सरकारजमा करण्यात आले.


हे प्रकरण कोलकात्याच्या गव्हर्नर जनरलपर्यंतही गेले. वेदोक्ताचा अधिकार कोणाला द्यायचा यावर चर्चा, टीका घडत राहिली. 1905 साली डिसेंबर महिन्यामध्ये जाहीर सभेतील ठरावात महाराजांचे क्षत्रियत्व आणि त्यांना वेदाधिकार असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर हे प्रकरण निवळले.

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स



1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —— 1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 2)

15) डेक्कन एजुकेशन सोसायटी —- 1884- —--आगरकर,टिळक,चिपळूणकर

16) डेक्कन सभा —— 1893 —— न्या.म.गो.रानडे

17) डेक्कन रयत शिक्षण संस्था —-1916---- शाहू महाराज

18) रयत शिक्षण संस्था —-1919---- कर्मवीर भाऊराव पाटील

19) श्री शिवाजी शिक्षण संस्था —-1932--- पंजाबराव देशमुख

20) मनवधर्म सभा —— 1844----दादोबा पांडुरंग तर्खडकर

21) परमहंस सभा —— 1849---- दादोबा पांडुरंग /ईश्वरचंद्र विद्यासागर

22) ग्यानप्रसारक सभा —— 1848 —- दादोबा पांडुरंग

23) मद्रास महाजन सभा —— 1884 —— पी.आनंद चार्लू / सुब्रमण्यम अय्यर

24) हिंदू महासभा —- 1915 —— मदन मोहन मलविय

25) वृद्धांसाठी संगत सभा —— वि.रा.शिंदे

26) वकतरीत्वा उत्तेजक सभा —--न्या.म.गो.रानडे

27) सार्वजनिक सभा —-1870---- ग.वा.जोशी


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 3)

28) ग्रँट मेडिकल कॉलेज —1838--जगन्नाथ शंकर सेठ

29) ग्रँट मेडिकल सोसायटी —1852--भाऊ दाजी लाड

30) बंगाल असियाटीक सोसायटी--1784 —विलीयम जोन्स 

31) असियाटीक सोसायटी —1789--विलीयम जोन्स

32) बॉम्बे नेटीव स्कूल बुक सोसायटी —1822— जगन्नाथ शंकर सेठ

33) सायन्तिफिक सोसायटी — 1862— सर सय्यद अहमद खान

34) मोहमदम लिटररी सोसायटी —1863— नवाब अब्दुल लतीफ

35) ट्रॅन्स्लेशन सोसायटी — 1864— सर सय्यद अहमद खान

36) लंडन इंडियन सोसायटी — 1865— दादाभाई नवरोजी / उमेशचंद्र बॅनर्जी

37) थेओसोफिकॅल सोसायटी — 1875— मॅडम ब्लावाट्सक्यी / कर्नल अल्कोट

38) मराठा एजुकेशन सोसायटी — 1901— शाहू महाराज

39) इंडियन होमरूल सोसायटी — लंडन —1905 —श्यामजी कृष्ण वर्मा

40) पीपल्स एजुकेशन सोसायटी —1945— बाबासाहेब आंबेडकर

41) किंग एड्वर्ड मोहमद्न एजुकेशन सोसायटी —1906— शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 4)

42) निष्काम कर्ममठ —1910— महर्षी धो.के.कर्वे

43) निष्काम कर्मयोगी — वि.रा.शिंदे

44) हिंदुस्तान चे बुकर टी वॉशिंग्टन —महात्मा फुले

45) महारष्ट्राचे चे बुकर टी वॉशिंग्टन — कर्मवीर भाऊराव पाटील

46) हिंदुस्तान चे मार्टिन लुथर किंग — राजाराम मोहन रॉय 

47) महारष्ट्रा चे मार्टिन लुथर किंग — महात्मा फुले

48) अहिल्याश्रम (स्त्रियांसाठी) — 1923— वि.रा.शिंदे

49) पवनार आश्रम (वर्धा) —1921— विनोबा भावे

50) अनाथ बालिका आश्रम —1899— महर्षि धो.के.कर्वे

51) विक्टोरीया अनाथाश्रम —- महात्मा फुले

52) विक्टोरीया मराठा बोर्डींग —1901— शाहू महाराज 

53) सेवा समिती — 1910— हृदयनाथ कुंझर

54) सेवा सदन — वि.रा.शिंदे

55) पूना सेवा सदन — रमाबाई रानडे

56) शारदा सदन मुंबई —1889 — पंडिता रमाबाई

57) मुक्ती सदन केडगाव —1898— पंडिता रमाबाई 

58) कृपा सदन, प्रीती सदन —- पंडिता रमाबाई


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 5)

59) केसरी — लोकमन्या टिळक

60) महारष्ट्र केसरी —— पंजाबराव देशमुख

61) महारष्ट्र धर्म —- विनोबा भावे

62) अमरावती अंबाबाई मंदिर सत्याग्रह —- पंजाबराव देशमुख

63) पंढरपूर विठ्ठल मंदिर सत्याग्रह — साने गुरुजी

64) नाशिक काळाराम मंदिर सत्याग्रह — बाबासाहेब आंबेडकर

65) पुणे पर्वती मंदिर सत्याग्रह —- एस.एम.जोशी

66) कुसाबाई शी पुनार्वीवाह केला (1874) —- विष्णू शास्त्री पंडित

67) गोदुबाई शी पुनार्वीवाह केला (1893) —- महर्षी धो.के.कर्वे

68) स्वतहाच्या मुलीचा पुनार्वीवाह करवून दिला —— रा.गो.भांडारकर

69) विधवा विवाह उत्तेजक मंडळी —- (1893) ——  महर्षी धो.के.कर्वे

70) पुनार्वीवाह उत्तेजक मंडळी (1865) —- न्या.म.गो.रानडे

71) विधवा विवाह पुस्तक —- विष्णू शास्त्री पंडित

72) विधवा विवाहाचा कायदा व पुनार्वीवाह कायदेशीर मान्यता (1917) — शाहू महाराज

73) आंतर जातीय विवाहास मान्यता कायदा (1918) — शाहू महाराज


समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील काही फॅक्ट्स (भाग 6)

74) मराठी ग्रंथ उत्तेजक मंडळी —--नाशिक —- न्या.म.गो.रानडे

75) देशी व्यापार उत्तेजक मंडळी 

● मराठा राज्य व इंग्रज-मराठा युद्धे

: पार्श्वभूमी
• मराठी स्वराज्याची मुहुर्तमेढ रचून शिवाजी राजे १६७४ मध्ये पहिले छत्रपती बनले. छत्रपती शिवाजी राज्यांच्या मृत्यूनंतर कनिष्ठ पुत्र राजारामांना गादीवर बसविण्याचा कट उधळून देऊन या संभाजी राजे (१६८०-१६८९) मराठी राज्याचे दुसरे छत्रपती
बनले.

• संभाजीराजांच्या मृत्यूनंतर त्यांची विधवा पत्नी येसूबाईंनी विश्वासू सरदारांशी चर्चा करून व मराठे शाहीवरचे संकट बाळाजीने ओळखून राजाराम राज्यांना नजर कैदेतून मुक्त करून त्यांना गादीवर बसविले. ‘राजा सलामत तर राज्य सलामत’ या हेतूने
मराठ्यांनी १६८९ मध्ये सुरक्षेसाठी राजारामांना कर्नाटकातील जिंजीस पोहोचविले. मुघलांनी राणी येसूबाई व बाल शाहू यांना कैद केली. १६९७ मध्ये राजाराम महाराष्ट्रात परतल्यानंतर प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांचा २ मार्च, १७०० रोजी वयाच्या केवळ ३० व्या वर्षी मृत्यू झाला.

• राजारामाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ताराबाईंनी आपला साडेतीन-चार वर्षाचा मुलगा शिवाजी यास गादीवर बसवून स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व आपल्या हाती घेतले.

 छ.शाहू राजे यांची सुटका व राज्यारोहण

• औरंगजेबच्या मृत्यूनंतर बहादूरशाहने शाहू राजांना मुक्त केले. बाजीरावाने ताराबाईंनी शाहूंच्या हाती मराठेशाहीची सत्ता देण्यास नकार दिला. ताराबाईंचा सेनापती धनाजी जाधव यांनी ऐनवेळी शाहूंची बाजू घेतली. या गृहयुद्धातून झालेल्या खेडच्या युद्धात
(१२ ऑक्टोबर, १७०७) ताराबाईंचा पराभव झाला. शाहू राजांनी सातारचा किल्ला सर करून १२ जानेवारी, १७०८ मध्ये राज्याभिषेक करून राज्यारोहण केले. ते मराठ्यांचे चौथे छत्रपती बनले. ताराबाईंनी कोल्हापूरला मराठ्यांची दुसरी गादी
निर्माण केली. या दोघांमधील यादवी १७३१ च्या वारणेच्या तहापर्यंत चालू राहिली.

● पहिले इंग्रज-मराठा युद्ध (१७७५-१७८२)

 कारणे व महत्त्वाच्या घटना

• बॉम्बे सरकारला महाराष्ट्रात क्लाईव्हने बंगालमध्ये स्थापन केलेल्या दुहेरी शासनव्यवस्थेची स्थापन करण्याची इच्छा होती. पेशवेपदासाठीच्या सत्ता संघर्षाने त्यांना संधी प्राप्त झाली.

• माधवरावांच्या मृत्यूनंतरचा सत्ता संघर्ष: पेशवेपदाची इच्छा असलेल्या रघुनाथरावांनी (माधवरावांचा काका) पेशवा नारायणराव (माधवरावांचा भाऊ) याचा खून घडवून आणला व स्वत:स पेशवा घोषित केले. तेव्हा मराठा दरबारातील नाना फडणीस, महादजी शिंदे, सखाराम बापू वगैरे बारा व्यक्तींनी राघोबाच्या विरोधात बारभाईंचे राजकारण केले. त्यांनी राघोबाला पदच्युत केले व नारायणरावांच्या नुकत्याच झालेल्या मुलाला सवाई माधवराव असे नाव देऊन त्याला पेशवा बनविले व त्याच्या वतीने हे बाराजण राज्यकारभार पाहू लागले.

•राघोबाने गेलेले पेशवेपद मिळविण्यासाठी बॉम्बे प्रेसिडन्सीशी ‘सुरतचा तह’ (१६ मार्च, १७७५) रोजी केला. त्यामुळे युद्धास सुरूवात झाली.

• मात्र सुरतचा तह कलकत्त्याच्या गव्हर्नर-जनरलला पसंद पडला नाही. त्याने बॉम्बे सरकारला मराठ्यांची नवीन तह करायला सांगितले. दीर्घ चर्चेनंतर बॉम्बे सरकारने पुणे दरबारातील शासक गटाशी मार्च १७७६ मध्ये ‘पुरंदरचा तह’ केला. या तहामुळे युद्ध तात्पुरते थांबले. या तहाद्वारे राघोबाला मराठ्यांच्या स्वाधीन
करायचे ठरले व त्याने केलेले पूर्वीचे तह रद्द करण्यात आले.

• मात्र हा तह मुंबईच्या इंग्रजांना नुकसानकारक वाटला. तसेच कंपनीच्या संचालकांनाही तो पसंत पडला नाही. अमेरिकन वसाहती गमावल्याने आता इंग्रजांनी पुन्हा राघोबाची बाजू घेऊन मराठ्यांशी युद्ध सुरू केले. पण पुण्याकडे राघोबाला घेऊन येणाऱ्या इंग्रजांचा महादजी शिंदेंनी तळेगाव येथे पराभव
करून त्यांना ‘तळेगावचा तह’ (१७७९) मान्य करावयास लावला.

• हा तह इंग्रजांनी अमान्य केल्यावर त्यांचा निर्णायक पराभव करण्यासाठी नाना फडणीसाने पेशवे, नागपूरकर भोसले, हैदर अली व निझाम यांचा ‘चतुःसंघ’ इंग्रजांविरूद्ध उभा केला. मात्र धुर्त इंग्रजांनी निझाम व भोसल्यांना फितविले. तसेच गोद्दार्ड
याच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याहून मोठे सैन्य मराठ्यांविरूद्ध पाठविले.

• दोन वर्षे युद्ध असेच चालू राहिले. इंग्रजांनी महादजींकरवी शांततेचा प्रस्ताव मांडला. हैदर न विचारता मराठ्यांनी ‘साल्बाईचा तह’ करून ७-८ वर्षे चाललेले युद्ध संपुष्टात आणले.

● साल्बाईचा तह, १७ मे, १७८२

• साल्बाई या ग्वाल्हेरपासून ३२ किमी अंतरावर असलेल्या ठिकाणी महादजी शिंदे (पेशव्यांच्या वतीने) व इंग्रज यांमध्ये हा तह १७ मे, १७८२ रोजी करण्यात आला व पहिले इंग्रजमराठा युद्ध थांबले. या तहाच्या प्रमुख अटी पुढीलप्रमाणे होत्याः

– १)साष्टी, भडोच, मुंबई इंग्रजांकडेच राहतील, तर पुरंदरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेली ठाणी मराठ्यांना परत केली जातील.
– २)इंग्रजांनी राघोबाची बाजू घेऊ नये.
– ३)इंग्रजांना त्याच्या व्यापारी सवलती पुन्हा प्राप्त होतील.
– ४)दोन्ही पक्षांनी एकमेकांच्या दोस्त राज्यांवर हल्ला करायचा नाही.तसेच पेशव्यांनी इतर युरोपीयन शक्तींना मदत करायची नाही.

● महत्व

• हा तह इंग्रजांसाठी खूप महत्वाचा ठरला. खरे तर, तो इंग्रजांच्या साम्राज्य विस्ताराच्या इतिहासात एक महत्वाचे वळण (turning point) ठरला. या तहामुळे इंग्रजांची मराठ्यांशी २० वर्षे शांतता प्रस्थापित झाल्याने या काळात त्यांनी आपली शक्ती
वाढविली व मराठ्यांव्यतिरिक्त इतर शबूंचा एक-एक करून पराभव केला. नाना फडणीसाला हा तह हैदरच्या मान्यतेशिवाय करायचा नव्हता. त्यामुळे महादजी व नाना यांच्या फूट पडली, तसेच मराठे व हैदर यांचे संबंधही बिघडले.

● दुसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८०३-१८०५)

● कारणे

• १)लॉर्ड वेलस्लीचे मराठ्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचे आक्रमक धोरण. त्याला मराठ्यांवर तैनाती फौजेचा तह लादायचा होता.

• २)सवाई माधवरावांच्या मृत्यूनंतर १७९५ मध्ये राघोबाचा अकार्यक्षम व कर्तव्यशून्य असा मुलगा दुसरा बाजीराव यास पेशवेपद मिळाले. १८०० मध्ये नाना फडणीसाचा मृत्यू झाला व ‘मराठेशाहीतील सारे शहाणपण संपले’. १८ व्या शतकाच्याअखेर पर्यंत अनेक हुशार, मुत्सद्दी व अनुभवी मराठी राजकारण्यांचा मृत्यू झाला होता.

• ३)मराठा सरदारांमधील दुफळी: दौलतराव शिंदे व यशवंतराव होळकर यांच्यातील यादवी. बाजीरावाची होळकरांविरूद्ध शिंद्यांना मदत, यशवंतराव होळकरांनी केलेला पेशवे व शिंदे यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव. या पराभवामुळे बाजीरावाने
संरक्षणासाठी इंग्रजांकडे धाव घेतली व १३ डिसेंबर, १८०२ रोजी ‘वसईचा तह करून इंग्रजांची तैनाती फौज पदरी ठेवण्याचे मान्य करून इंग्रजांचे मांडलिकत्व स्वीकारले.

• ४)वसईच्या तहामुळे इंग्रजांना पेशव्यांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्राप्त झाला. मात्र इतर मराठा सरदारांनी तहास मान्यता देण्यास नकार दर्शविल्याने दुसऱ्या युद्धास तोंड फुटले.

● महत्त्वाच्या घटना

• १८०३ मध्ये ऑर्थर वेलस्लीने शिंदे-भोसले यांच्या एकत्रित सैन्याचा पराभव केला व त्यांच्या तैनाती फौजेचे पुढील तह केले:

१) १७ डिसेंबर, १८०३ रोजी रघुजी भोसले यांच्या बरोबर ‘देवगावचा तह’ केला. माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यास भोसल्यांच्या दरबारात रेसिडेन्ट म्हणून नेमण्यात आले.

२) ३० डिसेंबर, १८०३ रोजी दौलतराव शिंदे यांच्या बरोबर ‘सुर्जी अर्जनगावचा तह’ केला. जॉन माल्कम यास शिंद्यांच्या दरबारात रेसिडन्ट म्हणून नेमण्यात आले.

• होळकरांविरूद्ध मात्र इंग्रजांना यश मिळू शकले नाही. शेवटी २४ डिसेंबर, १८०५ रोजी यशवंतराव होळकरांबरोबर इंग्रजांनी ‘राजपूरघाटचा तह’ हा शांततेचा तह केला.

• अशाप्रकारे दुसऱ्या इंग्रज- -मराठा युद्धात भोसले, शिंदे, होळकर यांच्यासारख्या मातब्बर सरदारांना इंग्रजांनी पराभूत केले. भारतात कंपनीची सत्ता सर्वश्रेष्ठ शक्ती (Paramount Power) बनली.

● तिसरे इंग्रज-मराठा युद्ध (१८१७-१८१८)

• कारणे

• आपण एकटे पडलो आहोत याची जाणीव दुसऱ्या बाजीरावाला झाली. त्याने इंग्रजांच्या जोखडातून सुटण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आपले स्वातंत्र्य नष्ट झाल्याने मराठा सरदारांमध्यही असंतोष होता.

• गायकवाडांच्या गंगाधरशास्त्रींच्या खूनात बाजीरावाचा व त्याचा सल्लागार त्र्यंबकजी डेंगळे यांचा हात असल्याचा आरोप करून इंग्रजांनी बाजीरावावर जून १८१७ मध्ये ‘पुणे तह’ हा एक
कडक तह लादला, जो वसईच्या तहाला पूरक म्हणून
लादण्यात आला. या तहाने बाजीराव निव्वळ एक संस्थानिक बनला.

• लॉर्ड हेस्टिंगने पिंडाऱ्यांचा बंदोबस्त करण्यापूर्वी त्यासाठी शिंद्यांची मदत घेण्यासाठी दौलतराव शिंदेबरोबर नोव्हेंबर, १८१७ मध्ये ‘ग्वाल्हेरचा तह’ केला. तसेच दुसऱ्या मल्हारराव होळकरांबरोबरच जानेवारी, १८१८ मध्ये ‘मंदासोरचा तह’ केला.

• पुणे तहाच्या विरूद्ध बाजीरावाने बापू गोखलेच्या साहाय्याने लढण्याचे ठरविले. ५ नोव्हेंबर, १८१८ रोजी निर्णायक असे तिसरे युद्ध खडकी येथे सुरू झाले. युद्धात पेशव्यांचा पराभव झाला. बाजीरावाने शरणागती पत्करली. त्याच्या बरोबर इतर मराठा सरदार घराणीही इंग्रजांच्या अंकित आले.

• इंग्रजांनी बाजीरावास पेन्शन देऊन त्यास कानपूरजवळ बिठूर येथे रवाना केले. पेशव्यांचा सर्व प्रदेश ताब्यात घेतला.

TCS पॅटर्न अत्यंत महत्वाचे


✨ 'ब्रह्म समाज' ची स्थापना केव्हा झाली - इ.स. 1828.


✨ 'ब्रह्म समाज' ची स्थापना कोणी आणि कुठे केली - कलकत्ता येथे, राजा राममोहन रॉय


✨ आधुनिक भारतातील हिंदू धर्मात सुधारणा करण्याची पहिली चळवळ कोणती होती - ब्राह्मो समाज


✨ सती प्रथेला आणि इतर सुधारणांना विरोध करणारी ब्राह्मसमाजाची विरोधी संघटना कोणती- धर्मसभा


✨ धर्मसभेचे संस्थापक कोण होते - राधाकांता देव


✨ सती प्रथा कधी संपली - इ.स. 1829.


✨ सती प्रथेच्या शेवटी कोणाचा प्रयत्न सर्वात जास्त होता - राजा राममोहन रॉय


✨  'आर्य समाजाची ' स्थापना केव्हा झाली - इ.स. 1875, मुंबई


✨ आर्य समाजाची स्थापना कोणी केली - स्वामी दयानंद सरस्वती


✨ आर्य समाज कशाच्या विरोधात आहे - धार्मिक विधी आणि मूर्तीपूजा


✨ 19 व्या शतकातील भारतीय पुनर्जागरणाचे जनक कोणाला मानले जाते - राजा राममोहन रॉय


✨ राजाराम मोहन रॉय यांचा जन्म कुठे झाला- राधानगर, जिल्हा वर्धमान


✨ स्वामी दयानंद सरस्वती यांचे मूळ नाव काय होते- मूळशंकर


✨ राजा राममोहन रॉय इंग्लंडला गेल्यानंतर ब्राह्मसमाजाची सूत्रे कोणी हाती घेतली - रामचंद विद्वागीश


✨ ज्यांच्या प्रयत्नाने ब्राह्मोसमाजाची मुळे उत्तर प्रदेश, पंजाब आणि मद्रासमध्ये पसरली - केशवचंद्र सेन


✨ 1815 मध्ये कलकत्ता येथे 'आत्मीय सभा'   स्थापन करणारे - राजा राममोहन रॉय


✨ राजा राममोहन रॉय आणि डेव्हिड हेअर हे हकीस संस्थेशी संबंधित होते- हिंदू कॉलेज


✨ थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कोठे झाली - 1875 एडी, न्यूयॉर्कमध्ये


✨ भारतामध्ये थिऑसॉफिकल सोसायटीची स्थापना केव्हा आणि कोठे झाली - 1882, अड्यार, मद्रास येथे


✨ 'सत्यर्थ प्रकाश' कोणी रचला - दयानंद सरस्वती


✨ 'वेद की बहुत' चा नारा कोणी दिला - दयानंद सरस्वती


✨ जेव्हा 'रामकृष्ण मिशन' ची स्थापना झाली - इ.स. 1896-97, बैलूर (कलकत्ता)


✨ 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना कोणी केली - स्वामी विवेकानंद


✨ अलीगड चळवळ कोणी सुरू केली - सर सय्यद अहमद खान


✨ अलीगड मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी कोणी केली- सर सय्यद अहमद खान


✨ 'यंग बंगाल' चळवळीचा नेता कोण होता - हेन्री व्हिव्हियन डेरोजिओ


✨ सत्यशोधक समाजाचे संस्थापक कोण होते - ज्योतिबा फुले


✨ भारताबाहेर कोणत्या धर्मसुधारकाचा मृत्यू झाला - राजा राममोहन रॉय


✨ वहाबी चळवळीचे मुख्य केंद्र कोठे होते- पाटणा


✨ जेव्हा भारतात गुलामगिरी बेकायदेशीर घोषित करण्यात आली - 1843 


✨ भारतातील इंग्रजी शिक्षणाची व्यवस्था कोणाकडून होती - विल्यम बेंटिक यांनी


✨ 'संपूर्ण सत्य वेदांमध्ये सामावलेले आहे' हे विधान कोणाचे - स्वामी दयानंद सरस्वती


✨ 'महाराष्ट्राचा सॉक्रेटिस' कोणाला म्हणतात - महादेव गोविंद रानडे


✨ विश्व धर्म परिषदेत विवेकानंद कुठे प्रसिद्ध झाले - शिकागो


⚫️ 'संवाद कौमुदी'चे संपादक कोण होते - राजा राममोहन रॉय


⚫️ 'तत्व रंजिनी सभा', 'तत्व बोधिनी सभा'   आणि 'तत्वबोधीन पत्रिका' यांचा संबंध - देवेंद्र नाथ टागोर


⚫️ 'प्रार्थना सोसायटी'ची स्थापना कोणाच्या प्रेरणेने झाली - केशवचंद्र सेन


⚫️ महिलांसाठी 'वामा बोधिनी' हे मासिक कोणी काढले - केशवचंद्र सेन


⚫️ शारदामणी कोण होती - रामकृष्ण परमहंस यांची पत्नी


⚫️ 'कुका आंदोलन' कोणी सुरू केले - गुरु राम सिंह


⚫️ 1956 मध्ये कोणता धार्मिक कायदा संमत झाला - धार्मिक अपात्रता कायदा


⚫️ महाराष्ट्रातील कोणत्या सुधारकाला 'लोकहितवादी' म्हणतात - गोपाळ हरी देशमुख


⚫️ ब्राह्मसमाज कोणत्या तत्त्वावर आधारित आहे - एकेश्वरवाद


⚫️ 'देव समाज' कोणी स्थापन केला - शिवनारायण अग्निहोत्री


⚫️ 'राधास्वामी सत्संग' चे संस्थापक कोण आहेत - शिवदयाल साहेब


⚫️ फॅव्हियन चळवळीचे समर्थक कोण होते - अॅनी बेझंट


⚫️ 20 व्या शतकाच्या सुरुवातीच्या दशकात सुरू झालेली चळवळ कोणती होती - अहरार


⚫️ गोपाळ कृष्ण गोखले यांनी 'भारत समाज सेवक' ची स्थापना केव्हा व कोणी केली - इ.स. 1905


⚫️शीख गुरुद्वारा कायदा केव्हा पास झाला - 1925 


⚫️ रामकृष्ण परमहंस यांचे मूळ नाव काय होते - गदाधर चट्टोपाध्याय


⚫️डॉ. अॅनी बेझंट भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षा केव्हा बनल्या - 1917 


⚫️शिकागो जागतिक धर्म परिषदेत स्वामी विवेकानंद कधी सहभागी झाले - 1893 


⚫️ 'प्रिसेप्टस ऑफ जीझस' कोणी रचला - राजा राममोहन रॉय


⚫️राजा राममोहन रॉय यांचे कोणते पर्शियन पुस्तक होते, जे 1809 मध्ये प्रकाशित झाले होते - तुहफतुह-उल-मुवाहिदीन


⚫️वेदांत महाविद्यालयाची स्थापना कोणी केली - राजा राममोहन रॉय


⚫️ राजा राममोहन रॉय यांना 'युग दूत' कोणी म्हटले - सुभाषचंद्र बोस


रक्तपट्टीका



🔻आकार द्विबहिर्वक्र व रंगहीन

🔻सस्तन प्राण्यातच आढळतात

🔻कद्रक नसते व अतिशय लहान

🔻5 ते 10 दिवस जगतात

👉अस्थीमज्जा मध्ये तयार होतात

👉रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात

👁‍🗨यांना Thrombocytes म्हणतात

👁‍🗨डग्यू मलेरिया मध्ये यांचे प्रमाण कमी होते


🔰लाल रक्त पेशी🔰

🔘गोलाकार व द्विअंतरावर्क असतात

🔘कद्रक नाही

🔘आकाराने खूप लहान

🔘हिमोग्लोबीन मुळे लाल रंग

🔘सत्री मध्ये प्रमाण कमी

🔘127 दिवस जगतात

🔘पलिहा मध्ये मरतात

👉गर्भात यकृत मध्ये तयार होतात

👉परौढ माणसात अस्थी मज्जा मध्ये तयार होतात

👉यांना Erythrocytes म्हणतात



🔴पांढऱ्या पेशी🔴

👁‍🗨आकाराने मोठ्या,अमिबासदृश

👁‍🗨कद्रक असते व रंगहीन

👁‍🗨3 ते 4 दिवस जगतात

👁‍🗨अस्थीमज्जा व प्लिहा मध्ये तयार

👁‍🗨5000 ते 11000 प्रति घनमिमी असतात

👉आजारामध्ये यांची संख्या वाढते

👉यांना Leucocytes म्हणतात

भास्करराव विठोजीराव जाधव

◾️भास्करराव विठोजीराव जाधव यांचे घराणे रायगडाच्या परिसरातील बिरवाडीचे

◾️ रा.गो. भांडारकर हे त्यांचे सहाध्यायी होते

◾️मॅट्रिकच्या परीक्षेत ते मुंबई इलाख्यात सर्वप्रथम आले होते

◾️महात्मा फुले, आय्यवारू स्वामी , प्रा. केळूसकर ही त्यांची दैवते बनली . अशाप्रकारे ते सत्यशोधक समाजाचे खंदे पुरस्कर्ते बनले. 

◾️पुण्यातील 'डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटी'चे अध्वर्यू अ‍ॅड. गंगाराम भाऊ म्हस्के यांनी त्यांचे नाव शाहू महाराजांना सुचवले. 

◾️दुर्मिळ गुणांमुळे त्यांनी भास्कररावांना आग्रहाने करवीर संस्थानात नेमून घेतले. 

◾️१८९५ ते १९२१ या काळात भास्कररावांनी मुख्य महसूल अधिकारी , जिल्हा व सत्र न्यायाधीश, असिस्टंट प्लेग व फॅमिन कमिशनर, १९०१ च्या शिरोगणतीचे उपाधीक्षक इ. अनेक महत्त्वाची पदे भूषवली

◾️बहुजन समाजाचे शिक्षण, जातीभेद निवारण, अस्पृश्यता निर्मुलन, ब्राह्मणेतरांचे राजकारण या बाबतीत त्यांचे व शाहू महाराजांचे विचार समान होते

◾️शाहू महाराजांचा प्रगाढ विश्वास असल्यामुळे कोल्हापूर नगरपालिकेच्या कारभाराची सर्व सूत्रे तब्बल १४ वर्षे भास्कररावांच्या हाती राहिली

◾️करवीरची जनता त्यांचा 'कोल्हापूरचे दुसरे शिल्पकार' असा त्यांचा अभिमानाने उल्लेख करते.

◾️त्यांना प्रति शाहू महाराज असेही म्हटले जाते


अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com

समाजसुधारक व आधुनिक भारतीय इतिहासातील महत्वाच्या बाबी✍

1) ब्राह्मो समाज —- 1828 —— राजाराम मोहन रॉय

2) आदी ब्राह्मो समाज —— 1865 —--- देवेंद्रनाथ टागोर

3) भारतीय ब्राह्मो समाज —--- 1865 —— केशवचंद्र सेन

4) तरुण ब्राह्मो समाज —1923----वि.रा.शिंदे

5) प्रार्थना समाज —--- 1867 —— आत्माराम पांडुरंग तर्खडकर

6) आर्य समाज —— 1875 —— स्वामी दयानंद सरस्वती

7) आर्य समाज शाखा कोल्हापूर —--1918--- शाहू महाराज

8) आर्य महिला समाज —— 1889 —— पंडिता रमाबाई

9) सत्यशोधक समाज —-1873----महात्मा फुले

10) सत्यशोधक समाज कोल्हापूर —— 1911---- शाहू महाराज

11) सार्वजनिक समाज —— 1872----आनंदमोहन बोस

12) नवविधान समाज —--1880--- केशवचंद्र सेन

13) भारत सेवक समाज---1905---- गोपाळ कृष्ण गोखले

14) भारत कृषक समाज —--1955---- पंजाबराव देशमुख.

❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣❣

Combine STI/PSI/ASO Pre Practice Questions

 प्र1): रियासतकार सरदेसाई यांच्या मते १८५७ चा उठाव  म्हणजे…………….होय.

A) शिपायांची गर्दी 

B) भारतीय जनतेतील असंतोषाचा स्फोट 

C) स्वातंत्र्य युद्ध 

D) गो–यांविरुद्ध काळ्यांनी व्यक्त केलेला असंतोष.


B✅🎁🍨🔥⚔️


 प्र2: नानासाहेब पेशवे यांचा सेनापती …… याने १८५७ च्या उठावात कामगिरी बजावली.

A)  रावसाहेब पटवर्धन

B) बापू गोखले 

C) गंगाधर फडणीस 

D)  तात्या टोपे


D ✅🎁🍨🔥⚔️



 प्र3): इ .स. १८५७ च्या उठावात ज्यांनी क्रांतिकारकांचे नेतृत्व केले होते , अशा नेत्यांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येत नाही.?

A) बहादूरशहा 

B) नानासाहेब 

C) बापू गोखले 

D) कुंवर सिंह


 C ✅🎁🌹🔥⚔️


 प्र4: १८५७ च्या उठावात अनेक संस्थानिक इंग्रजांशी एकनिष्ठ राहिले . अशा संस्थानांमध्ये खालीलपैकी कोणत्या संस्थानाचा समावेश करता येणार नाही ?

A) हैद्राबाद 

B) ग्वाल्ह्रेर 

C) बडोदा 

D) जगदीशपूर


D ✅🎁🌹🔥⚔️


 प्र5):जबलपूर  प्रदेशातील गोंड राजा…………… याने १८५७ च्या उठावात भाग घेउन क्रांतिकारकांना साथ दिली.

A) मान सिंह 

B) विक्रम सिंह 

C) शंकर सिंह 

D) लॉरेन्स


C ✅🎁🔥🌹⚔️


 प्रश्न6): क्रांतिकारकांनी दिल्ली ताब्यात घेतली त्या वेळी दिल्ली चा कमिशनर  कोण होता ?

A) सायमन फ्रेझर 

B) निकोलसन 

C) हडसन 

D) लॉरेन्स


A ✅🎁🌹〽️⚔️


प्र 7) : ३० जू न १८५७ रोजी  क्रांतिकारकारकांनी……………. यांना पेशवा म्हणून घोषित केले.

A)  तिसरा बाजीराव

B) तात्या टोपे 

C) चिमासाहेब 

D)  नानासाहेब


D ✅🎁🌹Ⓜ️⚔️


 प्र8): …………… हे क्रांतिकारकांनी क्रांतीचे प्रतीक उठवले होते.

A) जळता निखारा 

B) बंदूक 

C) लालकमळ 

D) गुलाब


 C ✅🎁🌺🌺Ⓜ️


 प्र 9): १८५७ च्या उठावाची पूर्व नियोजित तारीख कोणती होती ?

A) ११ मे १८५७ 

B) ३० जून १८५७ 

C) २९ मार्च १८५७ 

D) ३१ मे १८५७


D ✅🎁🌺🌹Ⓜ️



प्र 10 ): १८५७ च्या उठावात अभूतपूर्व संग्रामा नंतर इंग्रजांना पुन्हा दिल्ली काबीज करुन देणारा आधिकारी कोण होता ?

A) सर हेन्री बर्नाड 

B) जनरल नील 

C) जनरल स्मिथ 

D) निकोलसन


D ✅🎁〽️Ⓜ️⚔️


 प्र 11): खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

A) बहादूरशहा इंग्रजांशी लढता लढता मरण पावला 

B) इंग्रजांनी बहादूरशहास पकडून क्रुरपणे ठार केले. 

C) बहादूरशहा रंगुन येथे मृत्यु पावला . 

D) बहादूरशहा नेपाळ येथे मृत्यु पावला


 C ✅🎁🔥⚔️Ⓜ️


 प्र 12): १८५७ च्या उठावात सहभागी झाल्याबद्दल इंग्रज सरकारने ……………. याला १८ एप्रिल १८५९ रोजी शिप्री येथे जाहीररित्या फाशी दिली .

A) नानासाहेब 

B) तात्या टोपे 

C) बहादूरशहा 

D) कुवंर सिंह


B ✅🎁🌹🔥〽️


 प्र13): १८५७ चा उठाव हिंदी शिपायांनी केवळ स्वार्थी हेतूने प्रेरीत होऊन केला होता , असे मत व्यक्त करणारा इतिहासकार कोण ?

A) रियासतकार सरदेसाई 

B) अशोक मेहता 

C) सर जॉन सिली 

D) वि. दा . सावरकर


C ✅Ⓜ️🎁🔥⚔️


प्र14: खालीलपैकी कोणते संस्थान लॉर्ड डलहौसी  याने खालसा केलेले नाही.

A) सातारा 

B) नागपूर 

C) ग्वाल्हेर 

D) म्हैसूर


 C ✅🎁🔥🌹Ⓜ️


 प्र 15 ): खालीलपैकी कानपूर येथील हत्याकांडाला जबाबदार असण–या व्यक्ती कोण ?

A) कुँवर सिंह 

B) तात्या टोपे 

C) अझीमउल्ला 

D) नानासाहेबांचे सैन्य


D ✅🎁🌹🔥〽️


 प्र 16): १८५७ च्या उठावाचे राजस्थानमधील मुख्य ठिकाण कोणते  ?

A) कोटा 

B) नसीराबाद 

C) जैसलमेर 

D) अजमेर


A ✅🎁🌹Ⓜ️🔥



 प्र 17): खालीलपैकी कोणत्या वर्गाने क्रांतिकारकांना सहाय्य केले नाही ?

A) संस्थानिक 

B) जमीनदार 

C) शेतकरी व कामगार D) नवमध्यम वर्ग


D ✅🎁🌹Ⓜ️🔥


 प्र 18): ओरिसा ते छोटा नागपूरच्या प्रदेशात १८५७ च्या उठावात कोणी मुख्यत्वे भाग घेतला होता ?

A) आदिवासी जमाती 

B) जमीनदार 

C) जुने संस्थानिक 

D) वरील सर्व


D ✅🎁🔥Ⓜ️〽️


 प्र 19) :१८५७  च्या उठावाचे आसाममध्ये नेतृत्व कोणी केले  होते ?

A) दिवान मणिराम दत्त B) कंदावेश्वर सिंह 

C) पुरंदर सिंह 

D) पिलारि बरुआ


A ✅🎁🔥〽️Ⓜ️


 प्र20) :१८५७ च्या उठावादरम्यान सम्राट बहादूरशहा चा सर्वात विश्वासू सल्लगार  कोण ?

A)अजिमुल्ला खान

B) झवान बख्त 

C) झीनत महल 

D) बख्त खान



[प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर✅

२] २८०-३१५ nm

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर✅

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच ✅

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर✅

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर✅

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स ✅

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ ✅

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे ✅

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

४] मुकुंदराव पाटील


उत्तर

१] म.गो.रानडे ✅

---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

१] फक्त अ✅

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 [प्र.१] सुर्य किरणांद्वारे येणाऱ्या अतिनील किरणांची तरंगलांबी किती असते?

१] १००-२०० nm

२] २८०-३१५ nm

३] ६४०-८२० nm

४] ८५०-९१० nm


उत्तर

२] २८०-३१५ nm 

--------------------------------

[प्र.२] "परीसंस्थांशी संलग्न जनता" असे कोणास संबोधले जाते?

१] पर्यावरणवादी

२] पर्यावरण विशेषज्ञ

३] जंगलात रहाणारे आदिवासी

४] जुन्या पिढीतील शहरी लोक 


उत्तर

३] जंगलात रहाणारे आदिवासी 

--------------------------------

[प्र.३] कोणत्या राष्ट्रीय उद्यानास जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान असे नाव देण्यात आले?

१] पेंच

२] ताडोबा

३] मेळघाट

४] सह्याद्री


उत्तर

१] पेंच 

--------------------------------

[प्र.४] खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये "बिझार्ड" या नैसर्गिक आपत्तीचा समावेश करता येईल?

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती

२] पाण्यातील नैसर्गिक आपत्ती

३] जमिनीवरील नैसर्गिक आपत्ती

४] जैविक नैसर्गिक आपत्ती


उत्तर

१] हवामानातील नैसर्गिक आपत्ती 

--------------------------------

[प्र.५] कोणता नेत्रदोष नेत्रगोल काहीसे लांबट होण्यामुळे उद्भवतो?

१] निकटदृष्टीता

२] दूरदृष्टीता

३] रंगांधळेपणा

४] वृद्धदृष्टीता


उत्तर

१] निकटदृष्टीता 

--------------------------------

[प्र.६] इथेनॉल चे उत्पादन वाढवण्यासाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाबरोबर करार केला?

१] अमेरिका

२] इस्त्राईल

३] पेरू

४] फ़िलिपाइन्स


उत्तर

४] फ़िलिपाइन्स 

--------------------------------

[प्र.७] महाराष्ट्र शासनाने 'ग्राम न्यायालय कायदा २००८' कधी लागू केला?

१] २ ऑक्टोबर २००८

२] १५ ऑगस्ट २००८

३] २ ऑक्टोबर २००९

४] १५ ऑगस्ट २००९


उत्तर

३] २ ऑक्टोबर २००९ 

--------------------------------

[प्र.८] आंध्र लेक कोणत्या जिल्ह्यात आहे?

१] ठाणे

२] बुलढाणा

३] पुणे

४] धुळे


उत्तर

३] पुणे 

--------------------------------

[प्र.९] "Industrial association of western India" ची स्थापना कोणी केली?

१] म.गो.रानडे

२] पंजाबराव देशमुख

३] नारायण लोखंडे

उत्तर

१] म.गो.रानडे 

४] मुकुंदराव पाटील


---------------------------------

[प्र.१०] सेंद्रिय शेतीचे फायदे कोणते?

अ] कमी खर्चाची शेती

ब] कमी वेळ लागतो

क] कमी मजूर लागतात


१] फक्त अ

२] अ आणि ब

३] अ आणि क

४] वरील सर्व


उत्तर

१] फक्त अ

12 August 2025

12 ऑगस्ट 2025.

1.भारतातील पहिला ड्रोन-एआय पॉवर्ड कृत्रिम पावसाचा प्रयोग.

▪️ ठिकाण - जयपूरच्या रामगड येथे.

▪️भारतात पहिल्यांदाच, ड्रोन आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) वापरून कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी क्लाउड सीडिंग तंत्रज्ञानाचा वापर केला.

▪️ उपक्रम भारत-अमेरिका-आधारित तंत्रज्ञान कंपनी GenX AI आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येत आहे.

▪️ काम कसे करते - लक्ष्यित ढगांमध्ये सोडियम क्लोराईड फवारतील .

▪️ महाराष्टातील प्रयोग - : 1973-1986 : बारामती (महाराष्ट्र) वर ढगांच्या गर्दीमुळे पावसात 24% वाढ झाली.


2.Lock FD Feature

▪️ कुणामार्फत - ॲक्सिस बँक

▪️ उद्देश - ऑनलाइन मुदत ठेवी अकाली बंद होण्यापासून रोखण्यासाठी.

▪️बँकिंग ग्राहकांमध्ये ऑनलाइन फसवणुकीबद्दल चिंता वाढली आहे. फिशिंग , मालवेअर हल्ले होण्यापासून संरक्षण करणे.


3.National Anubhav Awards 2025

▪️ प्रायोजित मंत्रालय - Department of Pension & Pensioners’ Welfare (DoPPW)

▪️ सुरुवात - 2015 मध्ये सुरू

▪️मंत्रालये/विभागांमधील 15 पुरस्कार विजेत्यांचा सत्कार केला जाणार.

▪️पोर्टल कर्मचाऱ्यांकडून निवृत्तीच्या आठ महिने आधी किंवा निवृत्तीनंतर तीन वर्षांच्या आत लेखन मागवते , जे नंतर संबंधित मंत्रालयाद्वारे प्रकाशित केले जातात आणि पुरस्कारांसाठी मूल्यांकन केले जातात. नंतर त्यांची निवड पुरस्कारासाठी केली जाते.


4.आंतरराष्ट्रीय युवा दिन 2025

▪️दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी.

▪️ इतिहास - 1991 ऑस्ट्रियातील व्हिएन्ना येथे झालेल्या संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक युवा मंचाच्या पहिल्या सत्रात आंतरराष्ट्रीय युवा दिनाची कल्पना.

▪️1998 पासून नियमित.

▪️2025 थीम: SDGs आणि त्यापलीकडे स्थानिक युवा कृती


5.पहिले जागतिक एमएस स्वामीनाथन अन्न आणि शांती पुरस्कार.

▪️ विजेते -नायजेरियन शास्त्रज्ञ डॉ. अ‍डेमोला अ‍डेनले 

▪️ओळख - ज्यांना नायजेरियातील भूक कमी करण्याच्या त्यांच्या परिवर्तनकारी कार्याबद्दल सन्मानित करण्यात आले आहे.

▪️पुरस्कार जिंकणारा तो पहिला कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत.

▪️मोदी यांनी 7 ऑगस्ट 2025 रोजी त्यांच्या नावाने एक जागतिक पुरस्कार - अन्न आणि शांतीसाठी एमएस स्वामीनाथन पुरस्कार - सुरू केला.


6.केनिया

▪️जागतिक आरोग्य संघटनेने केनियाला ट्रायपॅनोसोमियासिस / झोपेच्या आजारापासून मुक्त घोषित केले.

▪️हा महत्त्वाचा टप्पा गाठणारा तो 10 वा देश बनला आहे.

▪️2025 मध्ये, जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मलेरियामुक्त प्रमाणित केलेला सुरीनाम हा अमेझॉन प्रदेशातील पहिला देश बनला. याव्यतिरिक्त, 2025 मध्ये जॉर्जियाला दुसरा देश म्हणून मलेरियामुक्त घोषित करण्यात आले.

▪️भारताने 2025 पर्यंत मलेरियाचे रुग्ण शून्यावर आणण्याचे आणि 2030 पर्यंत मलेरियाचे संपूर्ण उच्चाटन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

अलैंगिक प्रजननाचे प्रकार:


🔰१) विखंडन (Fission):

     ज्या पद्धतीमध्ये एक सजीव पेशींचे दोन किंवा अधिक सामान भागात विभाजन होते. त्यास विखंडन असे म्हणतात. दोन सामान भागात विभाजन झाल्यास त्या क्रियेला द्विविखंडन (Binary Fission) आणि अधिक भागात विभाजन झाल्यास त्या बहुविखंडन (Multiple Fission) असे म्हणतात. हि पद्धत एकपेशीय सजीवांमध्ये आढळते.


उदा. द्विविखंडन – जिवाणू, पॅरामेशिअम (आडवे विखंडन), बहुविखंडन –  अमिबा, यूग्लिना (उभे विखंडन). 



🔰२) मुकुलायन (Budding):

    बहुपेशीय सजीवांची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्यांच्या शरीरावर गोलाकार फुगीर रचना तयार होते त्यास मुकुल असे म्हणतात. त्यात वाढ होऊन विकसित सजीव तयार होतो जेव्हा त्या सजीवामध्ये स्वतःचे पोषण करण्याची क्षमता निर्माण होते, तेव्हा तो मूळ सजीवापासून वेगळा होतो यास मुकूलायन असे म्हणतात. उदा. हायड्रा.



🔰३) खंडीभवन (Fragmentation):

    काही बहुपेशीय सजीवांचे अनेक लहान तंतुमय खंडात रूपांतर होते . पाणी व पोषद्रव्ये योग्य प्रमाणात मिळाल्यावर त्यांची वाढ होऊन नवीन सजीव तयार होतात या पद्धतीला खंडीभवन असे म्हणतात. उदा स्पायरोगायरा.



🔰४) पुनरुदभवन / पुनर्जनन (Regeneration):

    काही बहुपेशीय प्राण्यांमध्ये त्यांच्या शरीरापासून वेगळ्या झालेल्या भागापासून ते पूर्ण शरीर तयार करतात यालाच पुनरुदभवन असे म्हणतात.


उदा. प्लेनेरिया, लिव्हरफ्ल्यूक.



🔰५) बीजाणू निर्मिती (Spore Formation):

    काही सजीवांमध्ये लहान पानांवर बीजाणूधानी तयार होते व त्यात असंख्य बीजाणू तयार होतात. बिजानुधानी परिपकव झाल्यानंतर फुटते व त्यातील बीजाणू अनुकूल परिस्थितीत नवीन सजीवांची निर्मिती करतात, यास बीजाणू निर्मिती असे म्हणतात.


उदा. म्युकर, मॉस, रिक्सीया तसेच काही नेचे गटातील वनस्पती.




🔰६) शाकीय प्रजनन (Vegetative Propagation):

    वनस्पतींच्या मूळ, खोड, पाने, मुकुल यांसारख्या शाकीय अवयवांपासून होणाऱ्या प्रजननाला शाकीय प्रजनन असे म्हणतात.


उदा. खोड – बटाटा, बीट, ऊस, अद्रक, गुलाब इ.

मूळ- रताळे, गाजर, मुळा

पाने – ब्रायोफाटा (पानफुटी).

MPSC STUDENT महत्वाचे प्रश्नसंच

1) खालीलपैकी गतीविषयक पहिले समीकरण कोणते ?

1) v² = u² + at         2) v = u + at    

3) v = ut + ½at²      4) v = u + v/t

उत्तर :- 2


2) खालीलपैकी कोणते धातू आहेत ?

   अ) ॲल्युमिनीअम,  सोने      ब) लोखंड, तांबे

   क) चांदी, तांबे        ड) आयोडीन, सिलिकॉन

   1) अ, ब           2) ब, क    

   3) अ, ब, क      4) अ, ब, क, ड

उत्तर :- 3

1) खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील प्रथम राष्ट्रीय डॉल्फीन संशोधन केंद्र उघडण्यात येणार आहे.

   1) मुंबई    2) चेन्नई    

   3) पटना      4) बेंगळूरू

उत्तर :- 3


2) योग्य जोडया निवडा. (राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार)

   अ) 2018    --  विराट कोहली, मीराबाई चानू

   ब) 2017    --  सरदार सिंग, देवेंद्र झांझरिया

   क) 2016    --  पी.व्ही. सिंधु, साक्षी मलिक, दिपा कर्माकर, जितू रॉय

   ड) 2015    --  सानिया मिर्झा

  1) अ, क, ड    2) अ, ब, क, ड  

  3) अ, ब, ड    4) अ, ब, क

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणता दिवस हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो.

   1) 15 सप्टेंबर    2) 15 ऑक्टोबर    3) 14 ऑगस्ट    4) 24 डिसेंबर

उत्तर :- 2


4) तृतीयपंथीय लोकांकरीता मैदानी स्पर्धा आयोजित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.

   अ) तामिळनाडू    ब) केरळ      क) गुजरात    ड) महाराष्ट्र

  1) ड      2) क     

  3) ब      4) अ

उत्तर :- 3


5) थेट जनतेकडून सरपंचाची निवड करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य आहे.

   1) पहिले    2) दुसरे  

   3) तिसरे      4) चौथे

उत्तर :- 3


3) खालील विधानांचा विचार करा.

   अ) पेशीचा आकार मुख्यत्वे तिच्या कार्याशी निगडीत असतो.

   ब) सूक्ष्मजीवांना गिळंकृत करण्यासाठी पांढ-या रक्तपेशी स्वत:चा आकार बदलू शकतात.

   क) एका टोकाकडून दुस-या टोकाकडे आवेगाने वहन करण्यासाठी चेतापेशींची लांबी जास्त असते.

   ड) केशिकांमधून सुलभ वहन होण्यासाठी मानवी लोहीत रक्तपेशींचा आकार व्दिबर्हिर्वक्री गोलाकार असतो.

   1) अ, ब, क    2) अ, क, ड 

   3) अ, ब, ड      4) वरील सर्व बरोबर

उत्तर :- 1


4) v² = u² + 2as हे गतीविषयक कितवे समीकरण आहे ?

   1) चौथे         2) पहिले    

   3) तिसरे        4) दुसरे

उत्तर :- 3


5) खालीलपैकी कोणते मूलद्रव्य धातू तसेच अधातूंचे गुणधर्म दर्शविते.

   1) आर्सेनिक, अँटीमनी 

   2) सेलिनिअम, सिलिकॉन

   3) जर्मेनिअम    

  4) वरील सर्व

उत्तर :- 4



1) कँडेला (Candela) हे खालीलपैकी कशाचे एकक आहे.

   1) ल्युमिनस इंटेनसिटी (Luminous Intensity)

    2) चुंबकीय विकर्षरेषा

   3) चुंबकीय क्षेत्र       

   4) विद्युत प्रभार

उत्तर :- 1


2) ॲल्युमिनीअम, लोखंड, जस्त या धातूंची थंड / उष्ण पाण्याबरोबर अभिक्रिया होत नाही मात्र

   1) वाफेशी अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होते.     

   2) ऑक्सिजन वायू मुक्त होतो.

   3) 2 Al + 3 H2O   Al2O3 + H2 ही अभिक्रिया होणार    

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


3) खालील विधानांचा विचार करा.

   अ) लाल रक्तपेशी या भ्रूणामध्ये यकृतात किंवा प्लिहामध्ये तयार होतात.

   ब) लाल रक्तपेशी प्रौढ माणसांत अस्थिमज्जेत तयार होतात.

   क) पांढ-या पेशी या अस्थिमज्जा तसेच प्लिहामध्ये तयार होतात.

   ड) वरील सर्व विधाने बरोबर आहे.

1) अ, क  2) ड   3) ब, क 4) फक्त अ  

उत्तर :- 2


4) खालीलपैकी कोणते मूलभूत एकक MKS, CGS आणि FPS या तिन्ही पध्दतीत सामाईक आहे.

   1) मीटर  2) सेकंद   3) ग्रॅम  4) फूट

उत्तर :- 2


5) असे कोणते धातू मूलद्रव्ये आहेत ज्यांची पाणी व वाफ सोबत रासायनिक अभिक्रिया होत नाही.

 1) सोने  2) चांदी    

3) तांबे      4) वरील सर्व

उत्तर 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) 2018 चा मिस वर्ल्ड चा किताब कोणी जिंकला.

   1) वेनेसा पोन्स डी लिऑन     

   2) निकालेन पिशाना

   3) मानुषी छिल्लर      

   4) मानसी मल्होत्रा

उत्तर :- 1


2) पूर्णपणे भारतीय बनावटीची इंजिनविरहीत ............. ही देशातील सर्वात वेगाने धावणारी ट्रेन ठरली आहे.

   1) ट्रेन 18    2) ट्रेन 20    

   3) ट्रेन 21    4) ट्रेन 25

उत्तर :- 1


3) खालील माहितीचा विचार करा.

   अ) राजीव महर्षी यांची भारताच्या नियंत्रक व महालेखापालपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

   ब) राजीव महर्षी हे भारताचे 13 वे नियंत्रक व महालेखापाल आहे.

   क) भारताचे पहिले नियंत्रक व महालेखापाल व्ही. नरहरी राव होते.

   ड) भारताचे संविधानाच्या कलम 148 नुसार नियंत्रक व महालेखापालाची रचना करण्यात आलेली आहे.

  1) अ, ब, क बिनचूक      

  2) अ, क, ड बिनचूक

  3) अ, ब, ड बिनचूक      

  4) अ, ब, क, ड बिनचूक

उत्तर :- 4


4) RBI ने जाहीर केलेल्या अहवालानुसार खालीलपैकी कोणत्या देशांकडून भारताला सर्वाधिक (Remittances) प्राप्त होतो.1) UAE       2) USA      

3) कतार      4) कुवेत

उत्तर :- 1


5) खालील माहितीचा विचार करा.

अ) मायकेल ॲन्डाटजे यांना जुलै 2018 मध्ये The English Patient या पुस्तकासाठी गोल्ड मॅन बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

ब) मॅन बुकर पुरस्काराच्या 50 व्या वर्धापनदिनानिमित्त खास गोल्ड मॅन बुकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले होते.

क) मॅन बुकर पुरस्काराची सुरुवात 1969 पासून झाली.

1) अ सत्य         2) अ, ब सत्य    

3) अ, क सत्य    4) अ, ब, क सत्य

उत्तर :- 4




📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या काळात विकास प्रकल्पाची साधनसामुग्री संरक्षण क्षेत्राकडे वळविणे भाग पडले ?

1) पहिली पंचवार्षिक योजना      

2) दुसरी पंचवार्षिक योजना

3) तिसरी पंचवार्षिक योजना      

4) पाचवी पंचवार्षिक योजना

उत्तर :- 3


2) भारतातील प्रत्येक पंचवार्षिक योजनेमध्ये ............... या उद्दिष्टावर भर दिला होता.

1) सहकार व स्वातंत्र्य      

2) विकास व तंत्रज्ञान

3) आत्मनिर्भरता व स्वावलंबन    

4) बेरोजगारी

उत्तर :- 3


3) पायाभूत व जड उद्योगावर भरीव खर्च व सार्वजनिक क्षेत्र वाढीवर जोर कुठपर्यंत चालू होता ?

   1) तिसरी योजना      2) पाचवी योजना

   3) आठवी योजना      4) दहावी योजना

उत्तर :- 3


4) दहाव्या पंचवार्षिक योजनेतील उद्देशिय स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचे उद्दिष्टे  खालीलपैकी कोणते होते ?

   1) 9.00%       2) 8.00%   

   3) 10.00%    4) 07.00%

उत्तर :- 2


5) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कोणते लक्ष्य निश्चित केले नव्हते?

अ) दारिद्रयात घट      

ब) सहकारास प्रोत्साहन

क) वृद्धीदर आणि रोजगारात वाढ    

ड) प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकीकण

   1) अ फक्त          2) ब फक्त   

    3) क आणि ड    4) ड आणि अ

उत्तर :- 2


1) जोडया लावा.

   अ) मूलभूत अधिकार      i) जर्मनीचे वायमर संविधान

   ब) निती निर्देशक तत्वे      ii) कॅनडाचे संविधान

   क) केंद्र सरकारला उर्वरित अधकार    iii) आयरिश संविधान

   ड) आणीबाणी        iv) अमेरिकेचे संविधान

             अ  ब  क  ड

         1)  iv  i  iii  ii

         2)  iv  iii  i  ii

         3)  iv  iii  ii  i

         4)  I  iii  iv  ii

उत्तर :- 3


2) भारतीय संविधानाची वैशिष्टये आणि त्यांच्या स्त्रोतांच्या योग्य जोडया लावा.

   अ) एकेरी नागरिकत्व    i) ब्रिटीश राज्यघटना

   ब) मूलभूत हक्क      ii) फ्रान्स राज्यघटना

   क) स्वातंत्र्य, समता, बंधुता  iii) कॅनेडियन राज्यघटना

   ड) उर्वरित अधिकार    iv) अमेरिकेची राज्यघटना

             अ  ब  क  ड

         1)  iv  iii  i  ii

         2)  i  iv  ii  iii

         3)  iii  i  iv  ii

         4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 2


3) राजकुमारी अमृत कौर ह्या कोणत्या मतदार संघातून संविधान सभेवर निवडून आल्या होत्या ?

   1) बिहार    2) केंद्रीय प्रांत    3) बाँम्बे      4) पंजाब

उत्तर :- 2


4) सर्वोच्च न्यायालयाने काही वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिली आहे. पुढीलपैकी कोणत्या 

     वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा .

   अ) समतेचे तत्व      ब) स्वातंत्र्याचे तत्व    क) संघराज्य    ड) समाजवादी संरचना

   इ) न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार    फ) धर्मनिरपेक्षता

   1) अ, ब, क, ड, इ, फ    2) अ, क, इ, फ      3) अ, ब, क, ड, फ    4) अ, ब, क, इ, फ

उत्तर :- 2


5) खालील विधानांचा विचार करा.

   अ) डॉ. बी.आर. आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते.

   ब) श्री. एच.जे. खांडेकर हे या समितीचे सदस्य होते.

   1) ब बरोबर आहे    2) अ बरोबर आहे      3) दोन्ही बरोबर आहेत  4) दोन्ही चूक आहेत

उत्तर :- 2


1) एखाद्या  नळीचा अंतर्गत व्यास मोजण्यासाठी खालीलपैकी कोणते मापक वापरतात ?

1) मायक्रोमीटर    2) व्हर्निअर कॅलीपर  3) नॅनोमीटर        4) वरीलपैकी नाही

उत्तर :- 2


2) खालीलपैकी कोणत्या धातूची विरल HCl सोबत अभिक्रिया होत नाही.

   1) लोखंड    2) जस्त   

   3) तांबे      4) वरील सर्व

उत्तर :- 3


3) खालीलपैकी कोणता घटक रक्त गोठण्याच्या क्रियेत भाग घेतो.

   अ) कॅल्शिअम    ब) व्हिटॅमीन    क) रक्तपट्टीका     ड) फायब्रीनोजीन    इ) प्रोथ्रॉम्बीन

   1) अ, ड, इ    2) फक्त ड, इ    

   3) क, ड, इ    4) वरील सर्व

उत्तर :- 4


4) खालीलपैकी संपूर्ण अदिश राशींचा समूह कोणता ?

  1) वस्तुमान, घनता, कार्य, उष्णता  

  2) चाल, संवेग, बल, त्वरण

  3) लांबी, वेग, विस्थापन, चाल      

  4) संवेग, तापमान, उष्णता, ऊर्जा

उत्तर :- 1


5) आम्लारीची धातूंवर अभिक्रिया झाली असता कोणता वायू बाहेर पडतो ?

   1) CO2    2) O2      

   3) H2      4) यापैकी नाही

उत्तर :- 3


1) UNHRC चे पूर्ण रूप काय ?

   अ) United Nations Human Right Counsil

   ब) United Nations Higher Refugeas Counsil

   क) United Nations Human Right Commision

   ड) United Nations Human Right Court

  1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 1


2) खालीलपैकी अभिनेत्री लालन सारंग बाबत काय खरे आहे.

   अ) लालन सारंग यांचे 9 नोव्हेंबर 2018 रोजी वयाच्या 69 व्या वर्षी निधन झाले.

   ब) रंगभूमीवरील बंडखोर अभिनेत्री म्हणून त्या ओळखल्या जायच्या.

   क) विजय तेंडूलकर यांच्या सखाराम बाईंडर या नाटकात त्यांनी साकारलेली चंपाची भूमिका वादळी ठरली होती.

   ड) त्यांनी 87 व्या मराठी नाटयसंमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते.

  1) अ, ब, क    2) अ, क, ड   

  3) अ, ब, ड    4) अ, ब, क, ड

उत्तर :- 4


3) खालीलपैकी कोणत्या शहरात देशातील पहिले क्रिप्टोकरन्सी ATM सुरू करण्यात आले आहे.

   1) मुंबई        2) दिल्ली  

   3) बेंगळूरू    4) नागपूर

उत्तर :- 3


4) ‘नालसा’ (NALSA) च्या कार्यकारी अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती करण्यात आली.

1) न्या. मदन लोकूर  2) तुषार मेहता    3) रवी शर्मा             4) यापैकी नाही

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणाची मालदीवच्या अध्यक्षपदी निवड झाली.

   1) इब्राहीम महंमद सोलीह        

   2) अब्दुल्ला यामीन

   3) महंमद नाशीद      

   4) यापैकी नाही

उत्तर :- 1


1) 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये पायाभूत क्षेत्रामधील अंदाजे गुंतवणूक किती आहे ?

   1) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या दुप्पट

   2) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या 120%

   3) 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या 150%

   4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1


2) काही पंचवार्षिक योजनांकरिता विकासाच्या उद्दिष्टांची टक्केवारी व प्रत्यक्षात आत्मसात विकासाची टक्केवारी पुढे दिली आहे. 

    यातील कोणते विधान चुकीचे आहे ?

           उद्दिष्ट    प्रत्यक्षात

1) प्रथम योजना (1951 – 56)  2.1    3.6

2) चौथी योजना (1969 – 74)  5.7    2.05 

3) आठवी योजना (1992 – 97)  5.6    6.68

4) दहावी योजना (2002 – 2007)  8.0    9.7

उत्तर :- 4


3) खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे ?

   1) पहिली पंचवार्षिक योजना = (1951 – 56)

   2) तिसरी पंचवार्षिक योजना = (1966 – 71)

   3) सहावी पंचवार्षिक योजना = (1980 – 85)

   4) दहावी पंचवार्षिक योजना = ( 2002 – 2007)

उत्तर :- 2


4) 12 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये (2012 – 17) , नियोजन आयोगाने पायाभूत विकासासाठी अंदाजे रु. 45 लक्ष कोटींची 

    गुंतवणुकीची तरतूद केली आहे. या गुंतवणुकीपैकी खाजगी गुंतवणुकीची वाटा किती आहे ?

   1) कमीत कमी 50%      2) 60%    

   3) कमीत कमी 45%      4) 75%

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कोणती अकराव्या पंचवार्षिक योजनेची उद्दिष्ट समजता येतील  ?

   अ) संपूर्ण देशाकरिता सकलदेशीय उत्पादन (GDP) 9% पर्यंत नेणे.

   ब) दुर्बल घटकांकरिता अन्न व पौष्टिक आहाराची व्यवस्था करणे.

   क) सकल देशी उत्पादन (GDP) 8% पर्यंत  नेणे.

   ड) दरडोई सकल देशी उत्पादनात (GDP) वार्षिक वृद्धी 7.6% व्हावी.

   1) अ, ब, क      2) अ, ड     

   3) ब, क           4) अ, ब, क, ड

उत्तर :- 2



1) योग्य जोडया लावा.

                     गती      उदाहरण

         1) स्थानांतरणीय    अ) यात्रेतील फिरणारा पाळणा

         2) परिवलन      ब) पृथ्वीवरील दिवस – रात्र

         3) नियतकालिक    क) चालणारी व्यक्ती

         4) यादृच्छिक    ड) उडणारे फुलपाखरू

        इ) सायकलचा ब्रेक

    1) 1-क, 2-अ, 3-ब, 4-ड  

    2) 1-क, 2-ब, 3-अ, 4-ड

    3) 1-अ, 2-ब, 3-क, 4-ड  

    4) 1-क, 2-ब, 3-ड, 4-अ

उत्तर :- 1


2) योग्य पर्याय निवडा.

            धातू/अधातू      उपयोग

           

            1) पारा        अ) लोखंड, कार्बन, निकेल, क्रोमिअम यांचे संमिश्र

           2) ग्रॅफाइट        ब) लोखंड, कार्बन, यांचे संमिश्र

           3) सल्फर        क) पेन्सिलीतील शिसे

           4) पोलाद        ड) औषधे

           5) स्टेनलेस स्टील      इ) तापमापी

   1) 1-इ, 2-क, 3-ड, 4-ब, 5-अ    

   2) 1-इ, 2-क, 3-ड, 4-अ, 5-ब

   3) 1-इ, 2-क, 3-अ, 4-ड, 5-ब     

   4) 1-इ, 2-क, 3-अ, 4-ब, 5-ड

उत्तर :- 1


3) खालील कोणत्या संघात खुली रक्ताभिसरण संस्था आढळते.

   अ) संघ मोलुस्का    ब) संघ आर्थोपोडा    क) दोन्ही बरोबर    ड) दोन्ही चूक

   1) अ        2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 3


4) अ) वेगबदलाच्या दराला त्वरण असे म्हणतात.

    ब) हवेचा कुठलाही विरोध नसताना उंचीवरून खाली सोडलेल्या वस्तूचे त्वरण एकसमान त्वरण असे म्हणतात.

    क) ऋण त्वरणाला ‘मंदन’ असेही म्हणतात.

          वरीलपैकी सत्य विधान/ विधाने कोणती ?

   1) फक्त अ      2) फक्त ब   

   3) फक्त क      4) अ, ब, क

उत्तर :- 4


5) मध्यम अभिक्रियाशील धातूंचे निष्कर्षणबाबत योग्य विधान/विधाने ओळखा.

   अ) लोखंड, जस्त, तांबे हे मध्यम अभिक्रियाशील धातू आहेत.

   ब) हे सल्फाईड किंवा कार्बोनेटच्या रूपात आढळतात.

   क) कार्बोनेट मर्यादित हवेमध्ये तीव्रपणे तापवून त्यांचे ऑक्साईडमध्ये रूपांतर कॅल्सिनेशन पध्दतीव्दारे केले जाते.

   1) अ, ब बरोबर , क चूक   

   2) अ, ब, क बरोबर 

   3) अ, क बरोबर, ब चूक 

   4) सर्व अयोग्य

उत्तर :- 2



1) योग्य जोडया निवडा.

   अ) धवलक्रांतीचे जनक      --  वर्गीस कुरीयन

   ब) जागतिक हरितक्रांतीचे जनक    --  नॉर्मन बोरलाँग

   क) भारतीय हरितक्रांतीचे जनक    --  डॉ. स्वामीनाथन

   ड) महाराष्ट्राच्या हरितक्रांतीचे जनक  --  वसंतराव नाईक

  1) अ, क, ड    2) अ, ब, ड  

  3) अ, ब, क    4) अ, ब, क, ड

उत्तर :- 4


2) ज्यू  समुदायाला धार्मिक अल्पसंख्याक दर्जा देणारे गुजरात हे कितवे राज्य आहे.

   1) पहिले    2) दुसरे    

   3) तिसरे      4) चौथ्ये

उत्तर :- 3


3) सह्योग HOP TAC – 2018 हा भारताचा कोणत्या देशाबरोबरचा संयुक्त युध्दाभ्यास आहे.

   1) व्हिएतनाम    2) ऑस्ट्रेलिया 

   3) अमेरिका       4) यापैकी नाही

उत्तर :- 1


4) खालील माहितीचा विचार करा.

   अ) केनियाची राजधानी नैरोबी येथे पहिल्या शाश्वत निल अर्थव्यवस्था परिषद नोव्हेंबर 2018 मध्ये पार पडली.

   ब) या परिषदेचे यजमान पद केनियाने भूषविले.

   क) या परिषदेची संकल्पना निला अर्थव्यवस्था आणि शाश्वत विकासासाठी 2030 अजेंडा अशी होती.

  1) अ, क योग्य    

  2) अ, ब योग्य  

  3) अ योग्य   

  4) अ, ब, क योग्य

उत्तर :- 4


5) खालीलपैकी बिनचूक जोडया निवडा. ( 90 वे ऑस्कर पुरस्कार)

   अ) सर्वोत्कृष्ट चित्रपट  -  द शेप ऑफ वाटर

   ब) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक  -  त्रिआमो डेलटोरो

   क) सर्वोत्कृष्ट अभिनेत्री  -  फ्रान्सिस मॅकडोरमंड

   ड) सर्वोत्कृष्ट अभिनेता  -  गॅरी ओल्ड मॅन

  1) अ, ब, क    2) अ, ब, क, ड   

  3) अ, ब, ड    4) अ, क, ड

उत्तर :- 2



1) दहाव्या पंचवार्षिक योजनेत कोणते क्षेत्र ‘गाभा क्षेत्र’ मानण्यात आले ?

   अ) औद्योगिक क्षेत्र    

    ब) शिक्षण क्षेत्र

   क) पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा   

   ड) कृषी क्षेत्र

         दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.

   1) अ फक्त    2) अ आणि क 

   3) ब फक्त    4) ड  फक्त

उत्तर :- 4


2) नियोजन आयोगाच्या मतानुसार नवव्या पंचवार्षिक योजनेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका विशिष्ट मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले  

     गेले ?

   1) सामाजिक न्याय आणि समतेसह विकास     

   2) सामाजिक न्याय आणि न्यायबुद्धीसह विकास

   3) सामाजिक न्याय आणि रोजगारासहीत विकास  

  4) सामाजिक न्याय आणि आर्थिक समानतेसह विकास

उत्तर :- 2


3) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   अ) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ‘जलद आणि सर्वसमावेशी वृद्धी’ होते.

   ब) अकराव्या पंचवार्षिक योजनेचे उद्दिष्ट ‘अधिक आणि संतुलित वृद्धी’ होते.

   1) फक्त अ बरोबर   

   2) फक्त ब बरोबर  

   3) दोन्ही बरोबर  

   4) दोन्ही चूक

उत्तर  :- 1


4) 12 व्या योजनेच्या संदर्भात पुढील कोणती विधाने बरोबर आहेत ?

   अ) योजनेचा कालावधी : 1 एप्रिल 2012 ते 31 मार्च 2017

   ब) नियोजनाचे दोन मसुदे, 9 टक्के विकास दर आणि 9.5 टक्के विकास दर विचारात घेऊन ठरविले आहेत.

   क) औद्योगिक विकासाचा दर 9.6 टक्के आणि 10.9 टक्के.

   ड) शेती उत्पादन वाढीचा दर 5.0 टक्के आणि 5.5 टक्के.

   1) फक्त अ आणि ब  

   2) फक्त क आणि ड  

   3) वरील सर्व   

   4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 4


5) पुढील विधानांपैकी कोणते अयोग्य आहे ?

     पहिल्या दहा पंचवार्षिक योजना काळात ठरविलेल्या उद्दिष्टांच्या संदर्भात भारताची अर्थव्यवस्थेची स्थूल आंतरदेशीय उत्पादन 

      स्वरूपात विकासाची कामगिरी कशी राहीली ?

   अ) तिस-या पंचवार्षिक योजनेत सगळयात कमी

   ब) दहाव्या पंचवार्षिक योजनेत सगळयात अधिक

   1) केवळ अ अयोग्य     

   2) केवळ ब अयोग्य    

   3) अ व ब दोन्ही अयोग्य नाहीत  

   4) अ व ब दोन्ही अयोग्य आहेत

उत्तर :- 4



1) प्लाझ्मा पदार्थाच्या संशोधनासाठी भारत सरकारने ‘राष्ट्रीय प्लाझ्मा संशोधन केंद्र’ कोठे उभारले आहे ?

   1) चेन्नई      2) अहमदाबाद  

   3) मुंबई      4) बेंगळुरू

उत्तर :- 2



2) अधातूचे भौतिक गुणधर्म विचारात घ्या आणि त्यापैकी कोणता गुणधर्म असा आहे ज्याला हिरा अपवाद आहे.

   अ) चकाकी नसते      ब) विजेचे वहन करत नाहीत

   क) कठीणपणा नसतो      ड) ठिसूळपणा असतो

    1) फक्त क    2) क आणि अ

    3) अ, ब, ड    4) यापैकी नाही

उत्तर :- 3



3) गाईच्या शेणावर उगवलेल्या कवकाला काय म्हणतात ?

   अ) सेक्सिकॉल्स    ब) टेरिकॉल्स    क) कार्टिकॉल्स    ड) क्रोप्रोफिलस

   1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 4



4) विधाने वाचा, योग्य पर्याय निवडा.

   अ) बोस-आईनस्टाईन कंडनसेट ही पदार्थाची पाचवी अवस्था आहे.

   ब) सत्येंद्रनाथ बोस यांच्या स्मरणार्थ ‘बोस’ आणि ‘अल्बर्ट आईनस्टाईन’ यांचे आईनस्टाईन संज्ञा देण्यात आलेल्या आहेत.

   क) या अवस्थेच्या शोधाबाबत एरिक कार्नेल, यु.काटर्ले आणि कार्ल वेमेन या अमेरिकी शास्त्रज्ञांना 2001 चे नोबेल पारितोषिक 

        देण्यात आले.

        वरीलपैकी सत्य नसलेले विधान/विधाने कोणती ?

   1) अ, क    2) ब, क   

   3) फक्त क    4) एकही नाही

उत्तर :- 4


5) धातूंची ऑक्सिजनशी अभिक्रिया होऊन ऑक्साईड तयार होतात. मात्र खालीलपैकी असा कोणता धातू आहे. ज्याची 

     ऑक्सिजनसोबत अभिक्रया होत नाही.

   अ) सोने    ब) सोडिअम    क) सिल्वर    ड) मॅग्नेशिअम

   1) फक्त अ, क    2) फक्त ब  

   3) फक्त क         4) यापैकी नाही

उत्तर :-1

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) मानव विकास निर्देशांक 2018 नुसार प्रथम पाच देशांचा बिनचूक क्रम निवडा.

   अ) नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जर्मनी

   ब) नॉर्वे, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, आयर्लंड

   क) नॉर्वे, स्वित्झर्लंड, आयर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया

   ड) नॉर्वे, स्वित्झर्लंड, जर्मनी, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया

  1) क      2) ब      3) अ      4) ड

उत्तर :- 3


2) खालील माहितीचा विचार करा.

   अ) सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळयाचे (स्टॅच्यु ऑफ युनिटी) 31 ऑक्टोबर 2018 रोजी लोकार्पण करण्यात आले.

   ब) स्टॅच्यु ऑफ युनिटी हा जगातील सर्वात उंच पुतळा आहे.

   क) स्टॅच्यु ऑफ युनिटी या पुतळयाची उंची 182 मीटर आहे.

   ड) सरदार वल्लभभाई पटेल हे भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जाते.

  1) अ, ब, क बिनचूक       

  2) अ, क, ड बिनचूक

  3) अ, ब, क, ड बिनचूक        

  4) अ, ब, ड बिनचूक

उत्तर :- 3


3) खालील माहितीचा विचार करा.

   अ) 18 ऑगस्ट 2018 रोजी पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान म्हणून इम्रान खानने शपथ घेतली.

   ब) इम्रान खान हे पाकिस्तान  तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) या पक्षाचे प्रमुख  आहे.

   क) जुलै 2018 मध्ये पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणूकीत इम्रान खानच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ या पक्षाने 116 जागा 

       जिंकल्या.

   ड) पाकिस्तानच्या संसदेला “मजलिस-ए-शुरा” असे म्हणतात.

  1) अ, ब, क, ड योग्य       

  2) अ, क, ड योग्य

  3) अ, ब,  ड यो ग्य      

  4) अ, ब, क योग्य

उत्तर :- 1


4) खालील माहितीचा विचार करा.

   अ) प्रख्यात शास्त्रज्ञ आणि भारतातील डीएनए तंत्रज्ञानाचे जनक लालजी सिंह यांचे डिसेंबर 2017 मध्ये निधन झाले.

   ब) लालजी सिंह यांनी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून काम पाहिले होते.

   क) भारत सरकारने लालजी सिंह यांना पद्मश्री पुरस्कार देवून त्यांचा गौरव केला होता.

  1) अ सत्य        2) अ, क सत्य   

  3) अ, ब सत्य    4) अ, ब, क सत्य

उत्तर :- 4


5) खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी  2018 नोबेल पुरस्कार दिला गेला नाही.

   अ) भौतिकशास्त्र    ब) शांतता    क) अर्थशास्त्र    ड) साहित्य

  1) अ, ड    2) ड      3) ब      4) क, ड

उत्तर :-2


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) समतोल प्रादेशिक वाढीसाठी, दहाव्या पंचवार्षिक योजनेतील नवीन उपक्रम म्हणजे :

   1) “राष्ट्रीय समान उन्नती योजने” ची स्थापना

   2) स्वर्णजयंती स्वरोजगार योजनेअंतर्गत साधनसामग्रींचे हस्तांतर

   3) गरीब राज्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन

   4) विशेष विभाग उन्नती कार्यक्रम

उत्तर :- 1




2) खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ?

   1) औद्योगिकीकरणामुळे भारतात वृद्धीची क्षमता निर्माण झाली.

   2) भारतात जागतिकीकरणानंतर औद्योगिक उत्पादन वाढले.

   3) दहाव्या पंचवार्षिक योजनाकाळात (2002-2007) औद्योगिक उत्पादनाचा वृद्धीदर जास्त होता.

   4) जागतिकीकरणानंतर भारतीय मोठया उद्योगधंद्यांचा विस्तार झाला.

उत्तर :- 3


3) अ) दहाव्या योजनेदरम्यान सरकारच्या भूमिकेची नव्याने व्याख्या केली गेली.

    ब) परंतु अकराव्या योजनेत समानता आणि सामाजिक न्याय याच्या खात्रीची गरज यावर भर देण्यात आला, दहाव्या योजनेत 

         नाही. 

   1) अ फक्त बरोबर आहे   

   2) ब फक्त बरोबर आहे    

   3)अ आणि ब दोन्ही बरोबर आहे  

  4) अ आणि ब दोन्ही चूक आहेत.

उत्तर :- 1


4) जलद औद्योगिक विकासासाठी आवश्यक औद्योगिकरण साध्य करण्याकरिता अवजड उद्योगांमधील गुंतवणूकीवर भर 

    देण्याविषयीची रणनीती म्हणजे :

   1) गांधी प्रतिमान   

   2) नव – गांधी प्रतिमान

   3) महालनोबिस प्रतिमान    

   4) मार्क्स प्रतिमान

उत्तर :- 3


5) दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत अकराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत कृषि क्षेत्राचा सकल उत्पन्न दर कुठपासून कुठपर्यंत वाढला ? 

अ) 2.0% ते 4.0  %  

ब) 3.7% ते 4.5%    

क) 5.7% ते 8%   

ड) वरीलपैकी कुठलाही नाही  

   1) ‍क      2) ड      3) अ      4) ब

उत्तर :-3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) खालीलपैकी कोणते अभयारण्य गव्याकरता प्रसिद्ध आहे ?

    1) सागेश्वर – सांगली  

    2) मेळघाट – अमरावती    

    3) राधानगरी – कोल्हापूर  

    4) तानसा – ठाणे

उत्तर :- 3


2) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रदेशात मोठय प्रमाणात जंगले व प्राणी आहेत ?  

   1) विदर्भ      2) मराठवाडा 

   3) कोकण    4) वरील सर्व

उत्तर :- 1


3) महाराष्ट्र राज्यात जंगलाखालील क्षेत्राचे प्रमाण ................... आहे.

   1) 21%       2) 25%  

    3) 27%      4) 10%

उत्तर :- 1


4) जोडया लावा.

              वन उत्पादने      विभाग

         अ) तेंदूची पाने      i) चंद्रपूर

         ब) खैर कात        ii) नागपूर, गोंदिया

         क) रोशा गवत      iii) डहाणू

         ड) बांबू गवत       iv) गडचिरोली, अमरावती

                अ  ब  क  ड

           1)  ii  iii  iv  i

           2)  i  ii  iii  iv

           3)  iii  iv  i  ii

           4)  iv  iii  ii  i

उत्तर :- 1


5) कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटयांचा काडया बनविण्यास वापरले जाते ?

   1) सागवान    2) साल  

   3) पॉपलर     4) निलगिरी

उत्तर :- 3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) कोणत्या राजकीय पक्षाचे सभेत केवळ एक उमेदवार निवडून आले होते ?

   अ) कृषक प्रजा पक्ष 

    ब) शेडयूलड् कास्टस् फेडरेशन

   क) कम्युनिस्ट पक्ष    

   ड) अपक्ष

1) फक्त अ, क, ड    2) फक्त ब, क, ड          3) फक्त अ, ब, ड       4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 4

2) खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय संविधान समितीची पहिली बैठक 9 ते 23 डिसेंबर 1946 रोजी नवी दिल्ली येथे पार पडली.

   ब) सरदार हुकूम सिंग, के.टी. शाह, महावीर त्यागी हे भारतीय घटना समितीतील बिगर काँग्रेस पक्षाचे सदस्य होते.

   क) संविधान सभेच्या पहिल्या बैठकीस मुस्लीम लीगचे सर्व सदस्य हजर होते.

         वरीलपैकी कोणते / ती विधान  / ने बरोबर आहे / त ?

   1) अ आणि ब      2) ब आणि क 

   3) अ आणि क     4) अ, ब आणि क

उत्तर :- 1


3) सर्वोच्च न्यायालयाने काही  वैशिष्टयांना संविधानाची पायाभूत वैशिष्टये म्हणून मान्यता दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्या 

    वैशिष्टयांचा त्यात समावेश होतो ते सांगा ?

   अ) समतेचे तत्व      ब) न्यायालयीन पुनर्विलोकन  

   क) संघराज्य      ड) सार्वभौमत्व

   1) अ, ब, क, ड    

   2) ब, क, ड 

   3) अ, ब, क   

   4) अ, ड, क

उत्तर :- 1


4) भारताच्या संघराज्यात्मक पध्दतीबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) राज्यघटनेत ‘संघराज्य’ हा शब्दप्रयोग कोठेही केलेला नाही.

   2) संघराज्यातून फुटून बाहेर पडण्याचा अधिकार राज्यांना नाही.

   3) अखिल भारतीय सेवा संघराज्य तत्वाचा भंग करतात.

   4) राज्यपालाच्या नेमणूकीची पध्दत भारताने अमेरिकन पध्दती प्रमाणे स्वीकारली आहे.

उत्तर :- 4


5) भारतात खालीलपैकी कोणत्या तरतुदी या संघराज्य पध्दतीच्या विरोधी आहेत ?

   अ) राज्ये अविनाशी नाहीत.   

    ब) आणीबाणी तरतूदी

   क) अखिल भारतीय सेवा   

   ड) राज्यघटनेचे सर्वश्रेष्ठत्व    

   इ) राष्ट्रपतीव्दारे राज्यांचा विधेयकावर नकाराधिकार

   1) अ, ब, क, ड    2) ब, क, ड, इ 

   3) अ, ब, क, इ     4) ब, क, इ

उत्तर :- 3



1) लार्ज हायड्रॉन कोलॉइडर (LHC) हा जगदविख्यात प्रयोग खालीलपैकी कोणत्या दोन देशांच्या सीमेवर पार पडला ?

   1) फ्रान्स आणि स्वित्झर्लंड  

   2) रुमानिया आणि तुर्की

   3) स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रीया 

   4) फ्रान्स आणि इटली

उत्तर :- 1


2) खालील काही रासायनिक समीकरण दिले आहेत. त्यापैकी अयोग्य समीकरण ओळखा.

   1) 2 Zn + O2           2 ZnO   

   2) 4 Al + O2         4 AlO3

   3) K2O + H2O                 2 KOH        4) Na2O + H2O                  2 NaoH

उत्तर :- 2


3) योग्य पर्याय निवडा.

   अ) ग्लोब्युलीन    -  शरीरात प्रतिद्रव्ये तयार करतात.

   ब) अलब्युलीन    -  शरीरातील पाण्याचा समतोल राखणे.

   क) प्रोथ्राँबीन    -  रक्त गोठयाच्या प्रक्रियेत मदत करणे.

   ड) फ्राब्रेनोगेन    -  सुज आल्यानंतर तिथे स्त्रवणारे रसायन.

   1) अ, ब, क    2) अ, ब, ड  

   3) ब, क, ड    4) अ, ब

उत्तर :- 1


4) 10¼  Fermi म्हणजेच ......

   1) 1 मीटर               2) 100 मायक्रॉन 

   3) 1 अँगस्ट्रॉम युनिट  4) 1 मि. मी.

उत्तर :- 3


5) ‘उभयधर्मी ऑक्साइड’ म्हणजे –

   1) जे धातू ऑक्साईड आम्ल व आम्लारी दोन्हीसोबत अभिक्रिया करतात.

   2) या अभिक्रियांतून क्षार आणि पाणी तयार होते.

   3) Al2O3 हा धातू ऑक्साईड आम्ल व आम्लारी दोन्हीसोबत अभिक्रिया करू शकतो.

   4) वरील सर्व

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) इस्त्रोचे पहिले ‘अवकाश तंत्रज्ञान उबवण’ केंद्र खालीलपैकी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले.

   1) सिक्कीम    2) त्रिपूरा   

   3) कर्नाटक     4) यापैकी नाही

उत्तर :- 2


2) देशातील हरवलेल्या मुलांना शोधून काढण्यासाठी नुकतेच कोणते ॲप सुरू केले आहे.

   1) निर्यात मित्र    2) रियुनाइट  

   3) प्राप्ती            4) सुखद

उत्तर :- 2


3) रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या वतीने पहिल्या वित्तीय अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली.

   अ) सूधा मूर्ती    ब) सुधा बालकृष्णन  क) सुधा कोहली    ड) सुधा चतुर्वेदी

  1) ब      2) अ      3) ड      4) क

उत्तर :- 1


4) द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार या दोन्ही पुरस्कारांची सुरुवात केव्हा झाली.

   1) 1985, 2002    2) 1988, 2004        3) 1988, 2006    4) 1992, 1961

उत्तर :- 1


5) व्यास सन्मान या पुरस्काराची सुरुवात केव्हा पासून झाली.

   1) 1991    2) 1981 

   3) 1993      4) 1982

उत्तर :- 1


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) पुढील दोन विधानांपैकी कोणते खरे आहे ?

   अ) शेतमालाच्या किंमती प्रथम पंचवार्षिक योजना काळात प्रत्यक्षात उतरल्या.

   ब) तदनंतर शेतमालाच्या किंमती निरंतर वाढतच गेल्या केवळ 1971-72 वर्ष सोडून

   1) केवळ अ           2) केवळ ब 

   3) कोणतेही नाही    4) दोन्हीही

उत्तर :- 1


2) किमान जीवनमान पुरविण्यासाठी भारतीयांचा भौतिक आणि सांस्कृतिक दर्जा सुधारणे हे .......... शी संबंधित आहे.

   1) नेहरू – गांधी प्रतिमान   

   2) नव – गांधी प्रतिमान

   3) नव – गांधी प्रतिमान     

   4) मार्क्स प्रतिमान

उत्तर :- 2


3) बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ‘उपभोग गरीबी’ चे शिरगणती गुणोत्तर किती टक्क्याने कमी करण्याचे उद्दिष्ट आहे  ?

   अ) 8      ब) 10      क) 12      ड) 6

   1) ड      2) अ      3) ब      4) क

उत्तर :- 3


4) भारताच्या पहिल्या दोन पंचवार्षिक योजनांमध्ये वाटपाचा सर्वात जास्त हिस्सा या एका क्षेत्राला मिळाला .

   1) कृषी व संबंधित सहायक क्षेत्र   

   2) वीज

   3) सिंचन        

   4) वाहतूक आणि दळणवळण

उत्तर :- 4


5) सर्व पंचवार्षिक योजनांमध्ये कृषी विकासाच्या व्यूह रचनेत ............... समाविष्ट होते.

   अ) कृषी विस्तार सेवा        ब) अनुकूल व्यापार शर्ती

   क) सिंचन विस्तार        ड) संस्थात्मक कर्ज

   1) अ, क        2) अ, क आणि ड  

   3) अ, ब, ड    4) ब, क, ड

उत्तर :- 2


1) खालीलपैकी कोणते एकक ऊर्जेचे एकक नाही ?

   1) न्यूटन             2) न्यूटन/ सेकंद  

  3) न्यूटन/ मिनट    4) यापैकी  नाही

उत्तर :- 4



2) कॅल्शिअम हा धातू पाण्यावर तरंगतो कारण,

   1) कॅल्शिअमची पाण्याबरोबर अभिक्रिया होत असताना तीव्रता कमी असते.

   2) बाहेर पडलेली उष्णता ही हायड्रोजन वायूला पेट घेण्यास पुरेशी नसते.

   3) हायड्रोजनचे बुडबुडे पृष्ठभागावर तयार झाल्यामुळे

   4) वरील सर्व

उत्तर :- 4




3) योग्य पर्याय निवडा.

   अ) झुरळाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.   

 ब) बेडकाचे हदय हे तीन कप्प्यांचे असते.

   क) मासे यांचे हदय हे दोन कप्प्यांचे असते. 

   ड) सापाचे हदय हे दोन कप्प्यांचे असते.

   1) अ, ब, क, ड    2) ब, क   

   3) ब, क, ड         4) फक्त अ, ब, क

उत्तर :- 2




4) खालीलपैकी संपूर्ण सदिश राशींचा समूह कोणता ?

   1) बल, संवेग, त्वरण, वेग  

    2) चाल, वस्तुमान, लांबी, घनता    

   3) संवेग, तापमान, कार्य, बल  

  4) कार्य, ऊर्जा, उष्णता, विस्थापन

उत्तर :- 1





5) धातूची विरल HCl आम्लासोबत अभिक्रिया झाली तर धातूचे .............. तयार होतात व H2 मुक्त होतो आणि धातूंची सल्फुरिक 

    आम्ल सोबत अभिक्रिया होऊन ............... तयार होतात.

     वरील दोन्ही रिक्त जागा भरा.

   1) क्षार, क्लोराइड्स    2) क्लोराइड्स, क्षार   

 3) क्षार, पाणी    4) क्लोराइड्स, सल्फेट

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) जगातील सर्वांत लांब सागरी पुल कोणत्या देशांत बांधण्यात आला आहे.

   1) जर्मनी    2) जपान  

    3) चीन      4) फ्रान्स

उत्तर :- 3



2) राष्ट्रीय जैवइंधन धोरणाची अंमलबजावणी करणारे देशातील पहिले राज्य कोणते.

   1) गुजरात    2) तामिळनाडू 

   3) महाराष्ट्र    4) राजस्थान

उत्तर :- 4



3) गायीला राष्ट्रमाता घोषीत करणारे भारतातील पहिले राज्य कोणते.

   1) उत्तराखंड    2) उत्तरप्रदेश  

   3) मध्यप्रदेश    4) महाराष्ट्र

उत्तर :- 1




4) जागतिक शांतता निर्देशांक 2018 नुसार प्रथम स्थानी कोणता देश आहे.

   1) आइसलँड    2) न्युझीलँड 

   3) ऑस्ट्रीया      4) डेन्मार्क

उत्तर :- 1




5) 21 वी राष्ट्रकूल स्पर्धा नुकतीच कोठे पार पडली ?

   अ) ऑस्ट्रेलिया    ब) स्वीडन    क) इंग्लंड    ड) स्कॉटलँड 

  1) ब      2) अ      3) क      4) ड

उत्तर :-. 2


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) अकराव्या पंचवार्षिक योजना आराखडयाचे शीर्षक ............... हे होते.

   1) जलद आणि आर्थिक वृद्धीच्या दिशेने        2) जलद आणि अधिक सर्वसमावेशक वृद्धीकडे

   3) जलद, अधिक सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासाकडे   

 4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 2



2) आपल्या पहिल्या तीन पंचवार्षिक योजनांचे सुरुवातीपासूनचे सर्वात महत्त्वाचे आर्थिक उद्दिष्ट म्हणजे

   1) समाजवादी समाज रचना निर्माण करणे  

  2) आर्थिक विषमता कमी करणे

   3) विभागीय समतोल    

    4) औद्योगिकरण

उत्तर :- 1



3) 12 वी पंचवार्षिक योजना तयार करीत असताना हे नियोजन आयोगाचे अध्यक्ष होते.

   1) डॉ.  मोन्टेक सिंग अहलुवालिया      2) डॉ. मनमोहन सिंग

   3) डॉ. अरविंद सुब्रमणियम   

   4) डॉ. रघुराम राजन

उत्तर :- 2


4) ही बाराव्या पंचवार्षिक योजनेंची (2012-2017) मुख्य लक्ष्ये आहेत –

   अ) वास्तव स्थूल देशांतर्गत उत्पादन वृध्दी दर 8 टक्के राखणे.

   ब) अर्भक मृत्युदर 25 प्रति 1000 पर्यंत खाली प्रमाणे.

   क) पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठीची गुंतवणुक स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 9 टक्के पर्यंत वाढविणे.

   1) अ फक्त बरोबर आहे    

   2) ब फक्त बरोबर आहे    

   3) अ व ब फक्त बरोबर आहे     

   4) वरील सर्व बरोबर आहेत

उत्तर :- 4


5) आर्थिक बाबी संदर्भातील कॅबिनेट समितीने ............ काळात कृषी विस्तार आणि  तंत्रज्ञानवर राष्ट्रीय मिशन अंमलबजावणीस 

     मान्यता दिली आहे.

   1) 9 वी पंचवार्षिक योजनेच्या  

   2) 10 वी पंचवार्षिक योजनेच्या

   3) 11 वी पंचवार्षिक योजनेच्या   

   4) 12 वी पंचवार्षिक योजनेच्या

उत्तर :- 4


📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌


1) विषुववृत्तीय सदाहरित जंगलासंबधी खालीलपैकी कोणते वैशिष्टय बरोबर आहे ?

   अ) अत्यंत दाट आहेत.        ब) वार्षिक पानगळ आहे.    

   क) लाकूड टणक आणि टिकाऊ आहे.    ड) एकाच प्रकारच्या वृक्षांची नसतात.

   1) फक्त अ    2) फक्त अ, क आणि ड    3) फक्त क    4) फक्त ब आणि क

उत्तर :- 2


2) पुढील कोणते / ती विधान / ने योग्य आहे / त ?

   अ) मोहगनी उष्ण कटिबंधीय पानझडी जंगलात आढळतात.

   ब) सुंद्री किनारवर्ती जंगलात आढळतात.

   1) केवळ अ योग्य  2) केवळ ब योग्य      3) अ व ब दोन्ही योग्य  4) अ व ब दोन्ही अयोग्य

उत्तर :- 2


3) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?

   अ) महाराष्ट्रात उष्ण कटिबंधीय दमट पानझडी अरण्ये व उष्ण कटिबंधीय काटेरी खुरटी अरण्ये जवळपास सारख्याच क्षेत्रात

        आहेत.

   ब) वरील दोन्ही एकत्रितपणे परंतु उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यांच्या एक तृतीयांशही क्षेत्रात नाहीत.

   1) अ    

   2) ब     

   3) दोन्ही 

   4) एकही नाही

उत्तर :- 1


4) उष्ण कटिबंधीय शुष्क पानझडी अरण्यात खालीलपैकी कोणती झाडे आढळतात ?

   अ) सागवान    ब) सिसम      क) अंजन    ड) तिवर

   इ) हिरडा

   1) अ, क, ड, इ    2) क, ड, इ   

   3) अ, ब, क         4) अ, ब, क, इ

उत्तर :- 3


5) जोडया लावा.

  वन्य प्राणी अभयारण्य      प्रशासकीय विभाग

  अ) फन्साड        i) अमरावती

  ब) नांदूर – मधमेश्वर      ii) कोकण

     क) किनवट        iii) औरंगाबाद

  ड) मेळघाट        iv) नाशिक

         अ  ब  क  ड

    1)  ii  iv  iii  i

    2)  ii  iv  i  iii

    3)  iv  ii  iii  i

    4)  i  iii  iii  iv

उत्तर :- 1


1) कोणत्या समित्यांमध्ये डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी सदस्य म्हणून कार्य केले ?

   अ) मूलभूत अधिकार समिती    ब) अल्पसंख्यांक उपसमिती    

   क) सल्लागार समिती      ड) राज्ये समिती

   1) फक्त अ, ब, क    2) फक्त ब, क, ड    3) फक्त अ, ब, ड    4) फक्त अ, क, ड

उत्तर :- 1


2) भारतीय संघराज्य व्यवस्थेला ‘वाटाघाटीचे संघराज्य’ असे कोणी संबोधले आहे ?

   1) के. सी. व्हिअर  

  2) आयव्हर जेनिंग्ज

  3) ग्रॅनव्हिल ऑस्टिन 

  4) मॉरिस जोन्स

उत्तर :- 4


3) ‘भारत हे संघराज्य आहे’ यास खालीलपैकी कोणते तत्व आधार देत नाही ?

   1) एक राज्यघटना  

    2) व्दिगृही कायदेमंडळ  

   3) राज्यघटनेची सर्वोच्चता  

  4) न्यायालयीन पुनर्विलोकन

उत्तर :- 1


4) भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेत कोणत्या संकल्पनेला अग्रक्रम दिला आहे ?

   1) स्वातंत्र्य      2) समता  

    3) न्याय      4) बंधुभाव

उत्तर :- 3


5) भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रीकेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ आणि ‘समाजवादी’ या शब्दांचा समावेश 1976 च्या ............. 

    घटनादुरुस्तीनुसार करण्यात आला.

   1) 44 वी      2) 41 वी   

   3) 42 वी      4) 46 वी

उत्तर :- 3



1) जेव्हा वस्तूमधील सर्व कणांचे विस्थापन एखाद्या स्थिर बिंदूभोवती अथवा त्या वस्तूच्या अक्षाभोवती वर्तुळाकार कक्षेत होते, 

     तेव्हा त्या गतीला कोणत्या प्रकारात समाविष्ट कराल ?

   1) एकरेषीय गती  2) परिवलन गती

 3) यादृच्छिक गती  4) नियतकालिक गती

उत्तर :- 2


2) ॲल्युमिनिअम निष्कर्षणाबाबत खालीलपैकी अयोग्य पर्याय ओळखा.

1) बॉक्साइटचे ॲल्युमिनीअममध्ये रूपांतर      

2)‍ शुध्द ॲल्युमिनीअमचे विद्युत अपघटनी क्षपण

3) स्टीलच्या टाकीमध्ये विद्युत अपघटन केले जाते    

4) ॲल्युमिनीअम हा ॲनोड वर जमा होतो

उत्तर :- 4


3) खालील रक्तपट्टीका, रक्तबिंबीकाबाबत काय खरे आहेत.

   अ) यांचा आकार व्दबहिर्वक्र असते.        ब) या रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत मदत करतात.

   क) या अस्थिमज्जा मध्येच तयार होतात.      ड) या रक्तपेशी सर्व प्राण्यांत आढळतात.

   1) अ, ब, ड    2) अ, ब, क  

   3) ब, क, ड    4) फक्त ब, क

उत्तर :- 2


4) गटात न बसणारा पर्याय निवडा.

   1) लंबकाची गती    

   2) शिवणयंत्राची सुई  

   3) उडणा-या पक्ष्यांचे पंख    

   4) उडते फुलपाखरू

उत्तर :- 4


5) ॲल्युमिनीअम हा मुक्त अवस्थेत आढळत नाही आणि  ॲल्युमिनीअमचा मुख्य धातुके बॉक्साइट आहे, तर बॉक्साइटमध्ये 

     साधारणत: किती टक्के Al2O3 असते.

   1) 20 – 50%    2) 30 – 40%  

   3) 30 – 70%    4) 50 – 70%

उत्तर :- 3



📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌



1) खालील माहितीचा विचार करा.

   अ) 21 वी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा नुकतीच ऑस्ट्रेलिया येथे पार पडली.

   ब) 20 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2014 स्कॉटलँड येथे पार पडल्या होत्या.

   क) 22 व्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये इंग्लंड येथे होणार आहे.

  1) अ, ब सत्य    2) अ, क सत्य  

  3) अ सत्य        4) सर्व सत्य

उत्तर :- 4



2) खालीलपैकी कोणते शहर आपले स्वत:चे ब्रँड आणि बोधचिन्ह असलेले भारतातले पहिले शहर ठरले आहे.

   1) मुंबई      2) जयपूर 

   3) दिल्ली    4) बेंगळूरू

उत्तर :- 4


3) आशियाई क्रीडा स्पर्धा 2018 पदतालिकांनुसार प्रथम पाच देशांचा योग्य क्रम निवडा.

   अ) चीन, जपान, दक्षिण कोरिया, इंडोनेशिया, उझबेकिस्तान

   ब) चीन, जपान, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान, इंडोनेशिया

   क) चीन, जपान, इंडोनेशिया, दक्षिण कोरिया, उझबेकिस्तान

   ड) चीन, जपान, इंडोनेशिया, उझबेकिस्तान, दक्षिण कोरिया

  1) अ      2) ब      3) क      4) ड

उत्तर :- 1


4) 2018 चा राजर्षी छत्रपती शाहू पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आला.

   1) रघुनाथ माशेलकर  2) पुष्पा भावे    3) रणजित देसाई    4) राम लक्ष्मण

उत्तर :- 2


5) महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने कौटुंबिक अत्याचार, कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषण यासारख्या अन्यायाला बळी पडणा-या 

    महिल्यांच्या मदतीकरिता कोणत्या नावाची हेल्पलाईन सुरु केली.

   1) सुहिता         2) वनिता 

   3) हेल्प वुमन    4) यापैकी नाही

उत्तर :- 1


📌📌



1) अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्रामध्ये सरासरी 4 टक्के अभिवृद्धीच्या उद्देशाने “राष्ट्रीय कृषी विकास 

     योजना” 2007-08 वर्षामध्ये सुरू करण्यात आली.

   अ) या योजनेत कोणत्याही विशिष्ट भागाचा विकास अपेक्षित नाही.

   ब) केशरी मोहीम या योजनेत अंतर्भूत नाही.

   1) केवळ अ योग्य    2) केवळ ब योग्य    3) दोन्ही योग्य    4) एकही योग्य नाही

उत्तर :- 4


2) जोडया जुळवा.

  योजना        उद्दिष्टये

         अ) पहिली पंचवार्षिक योजना    i) जलद औद्योगीकरण

         ब) दुसरी पंचवार्षिक योजना    ii) जीवनमानाचा दर्जा उंचावणे

         क) पाचवी पंचवार्षिक योजना    iii) शेतीला प्राधान्य

         ड) दहावी पंचवार्षिक योजना    iv) गरीबी हटाव

               अ  ब  क  ड

           1)  ii  i  iii  iv

           2)  iii  i  iv  ii

           3)  ii  iv  i  iii

           4) iii  iv  i  ii

उत्तर :- 2


3) सामाजिक, आर्थिक व लिंग सबलीकरण ही स्त्रियांच्या सबलीकरणाची त्रिसूत्री योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत 

     स्वीकारण्यात आली ?

   1) आठवी योजना      2) नववी योजना

   3) दहावी योजना       4) अकरावी योजना

उत्तर :- 3


4) महाराष्ट्र राज्याचा दहाव्या पंचवार्षिक योजनेतील स्थूल उत्पादनातील सरासरी चक्रवाढ वृध्दी दर किती होता ?

   1) 8.3 टक्के      2) 8.6 टक्के  

   3) 8.7 टक्के      4) 8.2 टक्के

उत्तर :- 1


5) पंचवार्षिक नियोजनात ग्रामीण विकासावर विशेष भर देण्यात आला. एका पंचवार्षिक योजनेत एकूण गुंतवणूकीपैकी 43 टक्के 

     गुंतवणूक एकात्मिक ग्रामीण विकासाकरिता उपलब्ध करून देण्यात आली. कोणत्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत ग्रामीण 

      विकासावर विशेष भर देण्यात आला ?

   1) दुसरी पंचवार्षिक योजना  

   2) पाचवी पंचवार्षिक योजना

   3) सहावी पंचवार्षिक योजना   

   4) अकरावी पंचवार्षिक योजना

उत्तर :- 3



1) महाराष्ट्रातील मोसमी वनातील वृक्षाची पाने उन्हाळयात गळून पडतात कारण

1) उन्हाळयात पाऊस पडत नाही.      

2) उन्हाळयात तापमान जास्त असते.

3) उन्हाळयात हवामान विषम असते.    4) बाष्पीभवन कमी करण्यास्तव

उत्तर :- 4


2) महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी .........% क्षेत्र राखीव, .........% क्षेत्र संरक्षित व ..........% क्षेत्र अवगीकृत जंगलाखाली 

    आहे.

   1) 5, 11, 84    2) 11, 5, 84  

   3) 84, 11, 5    4) 85, 5, 10

उत्तर :- 3


3) खालील विधाने पहा.

   अ) उष्णकटिबंधीय सदाहरित वने सह्याद्रीच्या पश्चिमेकडील उतारावर आढळतात.

   ब) उष्णकटिबंधीय सदाहरित वनातील वृक्षांची पाने रुंद असतात.

   क) पळस, शिसम, खैर इ. वृक्ष प्रामुख्याने उष्णकटिबंधीय सदाहरित वनात आढळतात.

1) फक्त अ विधान बरोबर आहे.    

2) फक्त ब विधान बरोबर आहे.

3) फक्त क विधान बरोबर नाही.    

4) विधान अ, ब आणि क बरोबर नाहीत.

उत्तर :- 3


4) जोडया जुळवा.

                 अभयारण्य      जिल्हा

         अ) नरनाळा        i) यवतमाळ

         ब) टिपेश्वर        ii) उस्मानाबाद

         क) अनेर        iii) अकोला

         ड) येडशी रामलींग घाट    iv) नंदूरबार

                अ  ब  क  ड

           1)  iii  i  iv  ii

           2)  ii  i  iii  iv

           3)  iv  ii  i  iii

           4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 1


5) खालीलपैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?

   1) लातूर            2) मुंबई उपनगर  

   3) उस्मानाबाद    4) जालना

उत्तर :- 1



1) गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट – 1935 मधील खालील तरतूदी विचारात घ्या :

   अ) या कायद्याने केवळ मुस्लिमांसाठीच नव्हे तर शीख, भारतीय ख्रिश्चन आणि अँग्लो-इंडियन यांच्यासाठीही स्वतंत्र प्रतिनिधित्व

         प्रदान केले.

   ब) शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे सोपविले होते.

   क) या कायद्याने विधिमंडळाला जबाबदार असलेला ना कोणी सल्लागार अथवा ना कोणती मंत्री परिषद नियुक्त केली गेली.

1) विधाने अ, ब बरोबर आहेत      

2) विधाने ब, क बरोबर आहेत

3) विधाने अ, क बरोबर आहेत      

4) विधाने अ, ब, क बरोबर आहेत

उत्तर :- 3


2) 1947 च्या भारतीय स्वातंत्र्य कायद्याने संविधान सभेच्या स्थानामध्ये बदल झाला. या कायद्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणते 

    विधान बरोबर नाही ?

   1) सभा पूर्णत: सार्वभौम संस्था बनली.2) सभा एक विधिमंडळात्मक संस्थाही झाली.

   3) सभेची एकूण संख्या पूर्वीच्या 1946 मधील नियोजित संख्येपेक्षा वाढली.

   4) मुस्लिम लीग सभासदांनी भारतासाठी असलेल्या संविधान सभेतून माघार घेतली.

उत्तर :- 3


3) संविधान सभेतील मूलभूत हक्क आणि अल्पसंख्याक समितीचे अध्यक्ष कोण होते.

   1) डॉ. बी. आर. आंबेडकर 

   2) जे. बी. कृपलानी

   3) सरदार वल्लभभाई पटेल  

   4) जवाहरलाल नेहरू

उत्तर :- 3


4) घटना समितीने भारतीय राज्यघटनेत उद्देशपत्रिका ही कल्पना कोणत्या देशाकडून उचलली.

   1) आयर्लंड       2) यु. के.    

   3) यु. एस्. ए.    4) ऑस्ट्रेलिया

उत्तर :- 3


5) 42 व्या घटनादुरुस्तीनंतर भारताचे केलेले वर्णन असे :

1) सार्वभौम समाजवादी प्रजासत्ताक गणराज्य    

2) सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक गणराज्य

3) सार्वभौम प्रजासत्ताक गणराज्य        4) प्रजासत्ताक गणराज्य

उत्तर :- 2



1) भारतात राष्ट्रीय उत्पन्ना विषयीचे अंदाज ................ कडून सादर केले जातात.
   1) नियोजन मंडळ    2) भारतीय रिझर्व्ह बँक    
   3) वित्त मंत्रालय      4) केंद्रीय सांख्यिकी संघटन 
उत्तर :- 4

2) भारतीय अर्थव्यवस्थेत 2008 – 09 या वर्षात सेवा क्षेत्राचा वृद्धी दर काय होता ?
   1) 8.9%      2) 7.1%   
   3) 7.9%      4) 9.8%
उत्तर :- 4

3) भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे क्षेत्र आहे ?
   1) प्राथमिक    2) व्दितीय  
  3) सेवा           4) बाहय
उत्तर :- 3

4) खालीलपैकी योग्य तो पर्याय निवडून रिक्त जागा भरा.
      राष्ट्रीय उत्पन्न वाढले की करांपासून मिळणारे उत्पन्न आपोआप वाढते, तर त्यास ............. म्हणतात.
   1) अंतर्गत परिवर्तनियता  
    2) अंतर्गत करव्यवस्था
   3) अंतर्गत मूल्यवृध्दि  
    4) अंतर्गत विकास
उत्तर :- 1
5) सर्व शिक्षा अभियान यांच्याकडून राबविले जाते.
   1) केंद्र शासन फक्त      
   2) राज्य शासन फक्त
   3) केंद्र आणि राज्य शासन दोन्हीही        4) वरीलपैकी नाही
उत्तर :-3

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌

1) जोडया जुळवा.
                       अ      ब
         अ) सिंधुदुर्ग             1) पेट्रोलियम/ खनिज तेल
         ब) मुंबई             2) औषधी खनिजयुक्त पाणी
         क) गडचिरोली           3) मँगनीज
         ड) ठाणे             4) चुनखडी
   1) अ-4, ब-2, क-1, ड-3  
    2) अ-3, ब-1, क-4, ड-2
   3) अ-3, ब-2, क-4, ड-1  
    4) अ-2, ब-1, क-3, ड-4
उत्तर :- 2

2) तारापूर अणूविद्युत केंद्र ............. जिल्ह्यात आहे.
   1) रायगड    2) ठाणे    
   3) नाशिक    4) पुणे 
उत्तर :- 2

3) हापूस आंब्याची झाडे ................ जिल्ह्यात आढळतात.
   1) सिंधुदुर्ग    2) रत्नागिरी 
   3) रायगड    4) वरील सर्व जिल्ह्यात
उत्तर :- 4

4) महाराष्ट्रात प्रामुख्याने ...........ऊर्जेचा वापर केला जातो.
   1) औष्णिक    2) अणु   
    3) पवन        4) नैसर्गिक
उत्तर :- 1

5) संकल्पित जैतापूर अणू-ऊर्जा प्रकल्पाचे स्थान .............. या जिल्ह्यात आहे.
   1) रत्नागिरी    2) सिंधुदुर्ग  
   3) कोल्हापूर    4) सोलापूर
उत्तर :- 1

📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌📌

1) भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत शेवटी समाविष्ट केलेले शब्द कोणते ?
   अ) समाजवादी    आ) धर्मनिरपेक्ष    इ) सार्वभौम    ई) लोकशाही    उ) गणराज्य
   ऊ) न्याय    ए) स्वातंत्र्य    ऐ) समानता    ओ) बंधुता    औ) एकात्मता

   1) अ,  ब, औ    2) क, ड, ऊ  
   3) उ, ए, ऐ        4) अ, ड, ओ
उत्तर :- 1

2) भारताच्या राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेवर ............ प्रभाव दिसतो.
   अ) कॅनडाची राज्यघटना   
   ब) जपानची राज्यघटना
   क) इंग्लंडची राज्यघटना  
   ड) अमेरिकेची राज्यघटना
   1) अ व क    2) क व ड  
   3) फक्त ड    4) फक्त ब
उत्तर :- 3

3) भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका प्रथमत: केव्हा दुरुस्त करण्यात आली ?
   1) 1952      2) 1966   
   3) 1976      4) 1986
उत्तर :- 3

4) उद्देशपत्रिकेत बहाल केलेल्या ‘स्वातंत्र्यांचा’ बरोबर क्रम आहे.
   1) अभिव्यक्ती, विचार, श्रध्दा, विश्वास, उपासना
   2) विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा, उपासना
   3) अभिव्यक्ती, विचार, विश्वास, उपासना, श्रध्दा
   4) विचार, अभिव्यक्ती, उपासना, विश्वास, श्रध्दा
उत्तर :- 2

5) 1976 च्या 42 व्या घटना दुरुस्तीने प्रस्ताविकेत कोणत्या नवीन शब्दांचा समावेश केला आहे ?
   अ) सार्वभौम आणि समाजवादी     
    ब) समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष
   क) श्रध्दा, उपासना आणि व्यक्तीची प्रतिष्ठा   
   ड) एकता आणि एकात्मता
        वरीलपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहेत ?
   1) फक्त ब         2) ब आणि क 
   3) क आणि ड    4) ब आणि ड  
उत्तर :- 1