27 October 2025

अर्थशास्त्र विषयातील आता पर्यंत विचारलेले प्रश्न

1. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेची आहेत?
अ) कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा हेतू असतो.
ब) व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते
क) उद्योग उभारणीसंदर्भात मालक स्वतः निर्णय घेतात
ड) यातील उत्पादनाचे कार्य व विभाजन सरकारमार्फत चालते
1. अ,ब
2. क,ड
3. अ,ब,क,ड
4. अ,ब,क✅

2.  पर्याप्त लोकसंख्येची वौशिष्ट्ये ओळखा?
अ) यामध्ये उपलब्ध साधनसामग्रीचा परिपूर्ण वापर केला जातो
ब) उपलब्ध साधनसामग्री गरजे एवढी निर्माण झालेली असते
क) देशातील लोकसंख्येचे आदर्श आकारमान दर्शवते
1. अ,क बरोबर✅
2. अ,ब,क बरोबर
3. ब,क बरोबर
4. अ,ब बरोबर

3. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा उपयोग होतो?
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) सहकार क्षेत्र
क) समाजवादी क्षेत्र
ड) खाजगी क्षेत्र
1. अ,ड✅
2. ब,क
3. क,ड
4. अ,ब

4. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राची निवड करावी लागते
अ) श्रमप्रधान तंत्र
ब) कृषिप्रधान तंत्र
क) भांडवलप्रधान तंत्र
1. अ,ब,क
2. अ,ब
3. अ,क✅
4.ब,क

5. खालील विधानातून योग्य पर्याय ओळखा
अ) भूमी, श्रम, भांडवल इत्यादी घटकांच्या कमतरतेमुळे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन घटते
ब) औद्योगिक कलहामुळे उत्पादन प्रभावित होते
क) सुखचैनीच्या वस्तू वाढीमुळे बाजार भावात घट होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,क
4.अ,ब,क

6.वस्तू व सेवांच्या तुलनेत पैशाचा पुरवठा अतिरिक्त झाल्यास पुढील कोणत्या मौद्रीक अधिकाराचा वापर करून ते कमी केले जातात
अ) बँक दर वाढवणे
ब) सरकारी कर्जखोऱ्याची खरेदी
क) रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करणे
1. अ
2.ब
3. अ,ब,क
4. अ,क✅

7. राष्ट्रीय उत्पन्नाची योग्य वैशिष्ट्य ओळखा
अ) राष्ट्रीय उत्पन्न ही समग्रलकशी संकल्पना आहे
ब) राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे
क) राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पैशात व्यक्त केलेले मूल्य
ड) राष्ट्रीय उत्पन्नात घसारा मोजला जातो
1. अ,ब,ड
2. अ,क,ड
3. ब,क,ड
4. अ,ब,क✅

8. खालीलपैकी कोणत्या कारणाने वस्तू विनियमात अडचण होती, याबाबत अयोग्य विधाने ओळखा
अ) गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव
ब) मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव
क) वस्तूंचा साठा कऱण्यातील अडचण
ड) विलंबित देणी देण्यातील अडचण
1, अ,ब
2. ब,व क
3. यापैकी नाही✅
4. अ,ब,क,ड

9. खालीलपैकी कोणत्या चलनप्रकारात अतिरिक्त चलननिर्मितीचा धोका संभवतो
अ) प्रातिनिधिक कागदी चलन
ब) परिवर्तनीय कागदी चलन
क) अपरिवर्तनीय कागदी चलन
1. अ,ब
2. अ,क
3. ब,क✅
4. अ,ब,क

10. रेपो दर वाढिचा खालीलपैकी कोणता परिणाम आहे?
अ) चलनपुरवठा कमी होतो
ब) महागाईत वाढ होते
क) व्यक्तींची व्यय शक्ती वाढते
ड) उत्पादनात वाढ होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,ड
4. अ,ब,क


1. सहकार चळवळीशी संबंधीत असलेले फेंडरीक निकोल्सन (1892) यांनी भारतात सहकारी संस्था स्थापनेसाठी खालीलपैकी कोणती शिफारशी केल्या.

अ) ग्रामिण भागात सहकारी संस्था स्थापनेसाठी रायफेजन पध्दतीचा वापर करावा.
ब) शहरी भागात सहकारी संस्था स्थापनेसाठी शुल्झ डेलित्झ पध्दतीचा वापर करावा.
क) निकोल्सन यांनी संस्था स्थापनेची प्रेरणा जर्मनी या देशाकडून घेतली.

१) अ आणि ब योग्य
२) अ आणि क योग्य
3) अ, ब आणि क अयोग्य
४) अ, ब आणि क योग्य✅

2. रुपयाच्या अवमुल्यन केले असता खालीलपैकी कोणते परीणाम घडून येतात.

अ) रुपयाची किंमत कमी होईल व डाँँलरची किंमत वाढेल.
ब) परकीयांना भारतात गुंतवणुक करणे सोपे होईल व रोजगार वाढेल.
क) भारताची आयात वाढेल व निर्यात कमी होईल.
ड) चालु खात्यावरील तुट कमी होईल आणि भांडवली खात्यात वाढ होईल.

१) अ, ब आणि क
२) अ, ब आणि ड✅
३) ब, क आणि ड
४) वरील सर्व

3. घाऊक किंमतीचा निर्देशांक विषयी पुढील विधाने विचारा घ्या.

अ) अभिजित सेन कार्यदलानुसार 2010 पासून 676 वस्तूंच्या घाऊक किंमतीवरुन काढला जातो.
ब) यासाठी आधारभूत वर्ष 2004-05 स्विकारण्यात आले आहे.
क) यामध्ये सर्वाधिक भार प्राथमिक वस्तुंना देण्यात आला आहे.

१) अ आणि ब✅
२) ब आणि क
३) अ आणि क
४) वरील सर्व 

4. राजीव आवास योजनेसंबंधी योग्य विधान ओळखा.

अ) या योजनेची सुरुवात २०११ साली झाली.
ब) या योजनेत ५०% वाटा केंद्राने उचलला आहे.
क) या अंतर्गत ग्रामीण गृहनिर्माणास चालना देण्यात येते.

१) अ आणि ब
२) ब आणि क
३) अ आणि क
४) वरील सर्व  ✅

5. राष्ट्रीय महिला सक्षमीकरण धोरण २००० चा प्रयत्न

१) बालिकांसंबंधी असलेले सर्व भेदभाव व महिलांवर होणारे
सर्व प्रकारचे अत्याचार दूर करणे
२) महिलांना मानवी हक्क आणि सत्तेत समान संधी प्रदान
करणे
३) वरील दोन्ही✅
४) वरीलपैकी कुठलेच नाही

6. अमर्त्य सेन आणि गाऊलेट डी. यांनी वर्णन केलेली विकासाची महत्त्वाची मूल्ये कोणती? खालीलपैकी योग्य
पर्याय निवडा.
१) उपजीविका, स्वतबद्दल आदर, स्वातंत्र्य, क्षमता, अधिकार/हक्क✅

२) आरोग्य, भरणपोषण, शिक्षण, क्षमता, अधिकार/हक्क

३) अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे पाणी, स्वच्छता

४) राष्ट्रीय उत्पन्न वाढ, दरडोई उत्पन्न, मूलभूत गरजा, स्वातंत्र्य, शिक्षण

7. पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे?

अ) वित्त आयोगाची नेमणूक हे राज्यपालांचे कार्यकारी कर्तव्य आहे
ब) नागरी खटल्यांपासून स्वतची प्रतिरक्षा राज्यपालांचा स्वेच्छा अधिकार असतो.
१) केवळ अ
2) केवळ ब
३) दोन्ही
४) एकही नाही✅

8. पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने राष्ट्रीय उत्पन्न समिती ऑगस्ट ४८ मध्ये नेमली.
ब) प्रोफेसर डी. आर. गाडगीळ हे तिचे अध्यक्ष होते.

१) केवळ अ योग्य
२)केवळ ब योग्य
३) अ व ब दोन्ही योग्य
४)अ व ब दोन्ही अयोग्य✅

9. मनरेगा विषयी असत्य विधान ओळखा.
१. ही योजना २ फेब्रुवारी २००६ ला भारत सरकारच्या ग्रामीण मंत्रालया मार्फत सुरू करण्यात आली
२.या योजनेत किमान रोजगार १२७ रु प्रती दिन इतका मिळतो
३. अर्ज केल्यानंतर किमान ३० दिवसाच्या आत काम मिळाले नाही तर बेरोजगारी भत्ता दिला जातो✅
४.ग्रामीण भागातील अकुशल कामगारांना या योजनेचा लाभ घेता येतो

10. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे (IRDP) कोणत्या योजनेत विलीन करण्यात आले?
१.इंदिरा आवास योजना
२.स्वर्ण जयंती स्वयंरोजगार योजना✅
३.स्वर्ण जयंती शहरी रोजगार योजना
४.भारत निर्माण योजना

1. जागतिक बँकेद्वारे जारी करण्यात आलेल्या पहिल्या मानव भांडवल निर्देशांकात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
१.108 वा
२.115 वा✅
३.91 वा
४.131 वा

2. भारतात 1997 सालापासून उद्योगांना 'मिनिरत्न' व 'नवरत्न' दर्जा देण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती?
१.सी. रंगराजन
२.अर्जुनसेन गुप्ता✅
३.अभिजितसेन गुप्ता
४.एम. नरसिंहन

3. भारतात शासकीय मार्गाने संरक्षण क्षेत्रात किती टक्के परकीय थेट गुंतवणूकीस (FDI)परवानगी आहे?
१.51%
२.66%
३.74%
४.100%✅

4. भारतात संरक्षण क्षेत्रात स्वयंचलित मार्गाने किती टक्के FDI ला परवानगी आहे?
१.26%
२.49%✅
३.74%
४.100%(शासकीय मार्गाने 100% FDI परवानगी)

5. 2017-18 आकडेवारीनुसार भारतात राष्ट्रीय महामार्गांची सर्वाधिक लांबी कोणत्या राज्यात आहे?
१.महाराष्ट्र✅(15437 किमी)
२.उत्तरप्रदेश (8711 किमी)
३.राजस्थान(7906किमी)
४.दिल्ली(678किमी)

6. भारतात कृषी हवामान विभाग स्थापन कोणत्या साली करण्यात आली होती?

१.1875( भारतीय हवामान विभाग , पुणे स्थापन)
२.1918
३.1932✅
४.1953

7. भारताचे पहिले त्रैवार्षिक आयात निर्यात धोरण 1985 साली कोणत्या समितीच्या शिफारशीवरून स्वीकार करण्यात आले होते?

१.व्ही.व्ही.रामैय्या समिती
२.अबीद हुसेन समिती
३.मुदलियार समिती✅
४.एल.के.झा. समिती

8. भारताच्या परकीय व्यापार धोरणाची वैशिष्ट्ये खालीलपैकी कोणती आहेत?

अ.आयात पर्यायीकरण
ब. निर्यात प्रोत्साहन
क. परकीय बाजारपेठ काबीज करणे
ड. शेती व्यापारास प्रोत्साहन

पर्याय

१.अ,ब,क,ड
२.अ,ब,क
३.फक्त क
४.अ,ब✅

9. 1971 साली कार्यान्वित करण्यात आलेली भारताची झर्लिना  ही अणुभट्टी कोणत्या देशाच्या मदतीने स्थापन करण्यात आली होती?
१.अमेरिका
२.ब्रिटन
३.फ्रान्स✅
४.स्वदेशी बनावटीची

10. संपूर्ण भारतीय मालकीची पहिली बँक कोणती?
१.बँक ऑफ हिंदुस्थान
२.RBI
३.पंजाब नॅशनल बँक✅
४.बँक ऑफ महाराष्ट्र

1.स्वातंत्र्योत्तर काळात भारतातील दारिद्र्य विषयक अभ्यास करणाऱ्या तज्ञांमद्ये खालीलपैकी कोणाचा समावेश करता येणार नाही?
1.प्रा.वी. म.दांडेकर
2.डॉ. नीलकंठ रथ
3.म.एस. अहलुवालीया
4.जॉन मालथस✅

2.खाजगिकरणाबाबत करण्यात आलेल्या खालील उपाययोजनांपैकी अयोग्य पर्याय ओळखा
1.उद्योगांना नवरत्नाचा दर्जा
2. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती
3.निर्गुंतवणूक धोरण
4. फेरा ऐवजी फेमा धारण करणे✅

3.खालीलपैकी कोणते कार्य रिझर्व्ह बँकेचे म्हणता येणार नाही?
1.बँकांची बँक म्हणून काम पाहणे
2.जागतिक बँकेचे प्रतिनिधित्व करणे✅
3. परकीय चलनाचा साठा सुरक्षित ठेवणे
4.चलन निर्मिती करणे

4. महाराष्ट्राच्या नवीन सुधारित पथकर धोरण (toll policy)  बाबत खालील विधाने विचारात घ्या.
1. अर्थसंकल्पातून पूर्ण करण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या प्रकल्पावर पथकर आकारला जाणार नाही✅
2. 200 कोटी रुपयाखालील  प्रकल्प खाजगीकरणानंतर्गत करण्यात येणार नाही
3. फक्त 200 कोटी रुपयांपुढील खाजगी प्रकल्पांसाठी पथकर आकारला जाईल
4. एकाच रस्त्यावरील दोन पथकर नाक्यांमधील अंतर किमान 20. कि. मी असावे

5.लोकांची योजना चे जनक म्हणून ..... यांचा निर्देश करावा लागेल?
1. श्रीमान नारायण
2.मानवेंद्रनाथ रॉय✅
3. प. जवाहरलाल नेहरु
4. एम. विश्वेश्वरय्या

6.विशेष उचल अधिकार (SDRs) सुविधा कोनामार्फत उपलब्ध करून दिली जाते?
1. जागतिक बँक
2. जागतिक व्यापार संघटना
3. आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ
4. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी✅

7. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादन साधनाचे स्वामित्व, नियंत्रण व्यवस्थापन .....केले आहे.
1. सरकारद्वारे
2. समाजद्वारे
3. खासगी व्यक्तिद्वारे✅
4. सहकाराद्वारे

8.सार्वजनिक वितरण प्रणालीची उद्दिष्ट्ये कोणती आहेत?
अ) उपभोक्त्यांना स्वस्त आणि सवलतीच्या दरात अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे
ब) लोकसंख्येचा किमान पोषणात्मक दर्जा टिकवून ठेवणे
1.अ बरोबर ब चूक
2.अ चूक ब बरोबर
3.दोन्ही बरोबर✅
4.दोन्ही चूक

9.दरडोई उत्पन्न म्हणजे .....
1.देशातील एकूण लोकसंख्या भागीले एकूण राष्ट्रीय उत्पन्न
2. देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागीले देशाचे एकूण उपभोग खर्च
3. देशाचे एकूण राष्ट्रीय उत्पन्न भागीले देशाची एकूण लोकसंख्या✅
4. एकूण उपभोग खर्च भागीले एकूण लोकसंख्या

10. लोकसंख्या स्थित्यंतरातील तिसरी अवस्था असलेला पर्याय सांगा.
1. जास्त जन्मदर व जास्त मृत्युदर
2. जास्त जन्मदर व कमी मृत्युदर
3. कमी जन्मदर व जास्त मृत्युदर
4. कमी जन्मदर व कमी मृत्युदर✅

1. महाराष्ट्रातील भारनियमनाचे  प्रमुख कारण काय आहे?

1. वाढती मागणी आणि अपुरी निर्मिती✅
2. योग्य व्यवस्थापनाचा अभाव
3. पारेशनातील गळती
4. चुकीचे सरकारी धोरण

2. महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत आर्थिक हिस्सा खालीलपैकी कोणता घटक दर्शवितो?
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) खाजगी क्षेत्रातील मोठे उद्योग
क) धातू वस्तू
ड) लघू उद्योग
योग्य पर्याय निवडा
1. (अ) आणि (ब)
2. (ब) फक्त✅
3. (क) आणि (ड)
4. (ड) फक्त

3. महाराष्ट्र सरकारने २०१३ सालच्या नवीन औद्योगिक धोरणाद्वारे सूक्ष्म ,लघू व मध्यम उपक्रमांबाबतीत पुढीलपैकी कोणत्या दृष्टिकोनाचा अवलंब केला आहे?
1. आशावादी
2. वास्तवादी
3. पवित्रवादी✅
4. अवास्तववादी

4. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत खालील घटकांचा समावेश होतो
अ) आंतरराष्ट्रीयीकरण
ब) खाजगीकरण
क) शिथिलीकरण
ड) विकेंद्रीकरण
1.(अ) आणि(ड)
2. (अ) आणि(क)✅
3. (ब) आणि(क)
4. (क) आणि(ड)

5. १९९१ च्या औद्योगिक धोरणाची कोणती उद्दिष्ट्ये होती?
अ) औद्योगिक परवानाराज संपुष्टात आणणे
ब) खाजगी क्षेत्राचे महत्व कमी करणे
क)सार्वजनिक क्षेत्राचे महत्व कमी करणे
ड)लघुउद्योगाचा विकास
दिलेल्या पर्यायातून अचूक पर्याय निवडा:
1. फक्त(अ)
2. (ब) आणि(ड)
3. (अ) आणि(क)✅
4. वरील सर्व

6. खालीलपैकी कोणती विधाने जागतिकीकरणाचा नकारात्मक परिणाम दर्शवतात
अ) कामगार संघटित क्षेत्रातून असंघटित क्षेत्रात ढकलले गेले
ब) स्पर्धा निर्माण केली
क) कामगार संघटनांची सौदाशक्ती घटली
ड) थेट परकीय गुंतवणूक वाढली
पर्यायी उत्तरे
1(अ) व (क) ✅
2. (अ) व (ड)
3. (ब) व (क)
4. (अ) व (ब)

7.  २०११-१२ मध्ये भारताच्या निर्यातीच्या बाबतीत वरची पाच राज्ये कोणती होती?
1. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक✅
2. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि केरळ
3. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि पंजाब
4. महाराष्ट्र, गुजरात,तामिळनाडू आणि आंध्रप्रदेश

8. भारताच्या विदेशी व्यापाराच्या दिशेच्या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान समर्पक आहे?
1.OECD देशांचे भारतीय निर्यातीमधील महत्व वाढले आहे
2.  भारताचा OPEC प्रदेशाशी व्यापार मोठ्या प्रमाणात सुधारला आहे✅
3. भारताच्या निर्यातीत इंग्लंडचे स्थान प्रथम आहे
4.  सार्क प्रदेशातून आयात मोठ्या प्रमाणात वाढली आहे

9. सॉफ्टवेअर निर्यातीतील हिश्य्यानुसार भारतासाठी सर्वाधिक महत्वाची बाजारपेठ कोणती आहे?
1. अमेरिका✅
2. इंग्लंड
3. चीन
4.  जपान

10.  २०११-१२ मध्ये झालेल्या खाद्यान्नाच्या भाववाढीमध्ये  खालील घटकांचा महत्वचा वाटा होता.
अ) दूध
ब) अंडी, मटण, मासे
क) खाद्यतेल
ड) साखर
योग्य पर्याय निवडा
1. फक्त(अ) आणि (ब) ,(क)✅
2. फक्त(अ) (ब) आणि(ड)
3.फक्त (ब) (क) आणि(ड)
4. फक्त(ब) आणि(ड)


1. खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य भांडवलशाही अर्थव्यवस्थेची आहेत?
अ) कमाल नफा मिळवणे हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा हेतू असतो.
ब) व्यवस्थापन खाजगी व्यक्तीकडे असते
क) उद्योग उभारणीसंदर्भात मालक स्वतः निर्णय घेतात
ड) यातील उत्पादनाचे कार्य व विभाजन सरकारमार्फत चालते
1. अ,ब
2. क,ड
3. अ,ब,क,ड
4. अ,ब,क✅

2.  पर्याप्त लोकसंख्येची वौशिष्ट्ये ओळखा?
अ) यामध्ये उपलब्ध साधनसामग्रीचा परिपूर्ण वापर केला जातो
ब) उपलब्ध साधनसामग्री गरजे एवढी निर्माण झालेली असते
क) देशातील लोकसंख्येचे आदर्श आकारमान दर्शवते
1. अ,क बरोबर✅
2. अ,ब,क बरोबर
3. ब,क बरोबर
4. अ,ब बरोबर

3. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये खालीलपैकी कोणत्या क्षेत्राचा उपयोग होतो?
अ) सार्वजनिक क्षेत्र
ब) सहकार क्षेत्र
क) समाजवादी क्षेत्र
ड) खाजगी क्षेत्र
1. अ,ड✅
2. ब,क
3. क,ड
4. अ,ब

4. वस्तू व सेवांच्या उत्पादनासाठी खालीलपैकी कोणत्या तंत्राची निवड करावी लागते
अ) श्रमप्रधान तंत्र
ब) कृषिप्रधान तंत्र
क) भांडवलप्रधान तंत्र
1. अ,ब,क
2. अ,ब
3. अ,क✅
4.ब,क

5. खालील विधानातून योग्य पर्याय ओळखा
अ) भूमी, श्रम, भांडवल इत्यादी घटकांच्या कमतरतेमुळे उपभोग्य वस्तूंचे उत्पादन घटते
ब) औद्योगिक कलहामुळे उत्पादन प्रभावित होते
क) सुखचैनीच्या वस्तू वाढीमुळे बाजार भावात घट होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,क
4.अ,ब,क

6.वस्तू व सेवांच्या तुलनेत पैशाचा पुरवठा अतिरिक्त झाल्यास पुढील कोणत्या मौद्रीक अधिकाराचा वापर करून ते कमी केले जातात
अ) बँक दर वाढवणे
ब) सरकारी कर्जखोऱ्याची खरेदी
क) रोख राखीव निधीच्या प्रमाणात वाढ करणे
1. अ
2.ब
3. अ,ब,क
4. अ,क✅

7. राष्ट्रीय उत्पन्नाची योग्य वैशिष्ट्य ओळखा
अ) राष्ट्रीय उत्पन्न ही समग्रलकशी संकल्पना आहे
ब) राष्ट्रीय उत्पन्न ही प्रवाही संकल्पना आहे
क) राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे पैशात व्यक्त केलेले मूल्य
ड) राष्ट्रीय उत्पन्नात घसारा मोजला जातो
1. अ,ब,ड
2. अ,क,ड
3. ब,क,ड
4. अ,ब,क✅

8. खालीलपैकी कोणत्या कारणाने वस्तू विनियमात अडचण होती, याबाबत अयोग्य विधाने ओळखा
अ) गरजांच्या दुहेरी संयोगाचा अभाव
ब) मूल्याच्या सामायिक मापदंडाचा अभाव
क) वस्तूंचा साठा कऱण्यातील अडचण
ड) विलंबित देणी देण्यातील अडचण
1, अ,ब
2. ब,व क
3. यापैकी नाही✅
4. अ,ब,क,ड

9. खालीलपैकी कोणत्या चलनप्रकारात अतिरिक्त चलननिर्मितीचा धोका संभवतो
अ) प्रातिनिधिक कागदी चलन
ब) परिवर्तनीय कागदी चलन
क) अपरिवर्तनीय कागदी चलन
1. अ,ब
2. अ,क
3. ब,क✅
4. अ,ब,क

10. रेपो दर वाढिचा खालीलपैकी कोणता परिणाम आहे?
अ) चलनपुरवठा कमी होतो
ब) महागाईत वाढ होते
क) व्यक्तींची व्यय शक्ती वाढते
ड) उत्पादनात वाढ होते
1. अ,ब✅
2. ब,क
3. अ,ड
4. अ,ब,क

1. वस्तू व सेवांच्या उत्पादनात घट होण्याची प्रमुख कारणे कोणती?
अ) उत्पादन घटकांची टंचाई
ब) औद्योगिक कलह
क) नैसर्गिक आपत्ती
ड) कर कपात
1. अ,ब,ड✅
2. ब,क,ड
3. अ,क,ड
4. अ,ब

2. अर्थव्यवस्थेत पुढील कोणत्या घटकांचा विचार केला जातो?
अ)  उत्पादन
ब) उपभोग
क) वितरण
ड) उपलब्ध साधनसामग्रीचे विभाजन
1. अ,ब,क
2. अ,ब
3. अ,क
4. वरील सर्व✅

3. भौतिक जीवनमान निर्देशांकावर काही मर्यादा आहेत. याबाबत अयोग्य विधान ओळखा
अ) बेरोजगारी, गृहनिर्माण, न्याय सुरक्षितता, मानवी हक्क हे घटक दुर्लक्षित झाले आहेत
ब) यात निर्देशकांचे तीन घटक सारखे महत्वाचे असतात
क) या निर्देशांकाद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेतील संरचनात्मक बदलाचे स्पष्टीकरण करता येते.
1. अ,ब
2. ब,क
3. अ,ब,क
4. क✅

4खालीलपैकी कोणते आर्थिक वृद्धीचे निर्देशक मानले जाते?
अ) स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाढ
ब) दरडोई उत्पन्नामध्ये वाढ
क) दरडोई उपभोगात  वाढ
ड) लोकांचा सहभाग
1. अ,ब,क✅
2. ब,क,ड
3. ब,क
4. वरील सर्व

5. टेलिफोन क्षेत्राबाबत अयोग्य पर्याय ओळखा
1. महानगर टेलिफोन निगम. लि
2. भारत संचार निगम लि
3. टेलिकॉम रेग्युलिटी ऑथिरिटी लि✅
4. विदेश संचार निगम लि

6. खालीलपैकी दारिद्र्याचे आर्थिक परिणाम कोणते
अ) उत्पन्नात विषमता
ब) संसाधनांचा अपव्यय
क) मानवी मूल्यांचा ऱ्हास
ड) आर्थिक गुन्हेगारीत वाढ
1. अ,ब
2. ब,क,ड
3. अ,ब,ड✅
4. वरीलपैकी सर्व

7. मंदीच्या काळातील बेकारीला कोणती बेकारी म्हणतात
अ) घर्षणजन्य
ब) चक्रीय
क) ऐच्छिक
ड) संरचनात्मक
1. अ,ब,क
2. ब✅
3. अ,ब
4. वरील सर्व

8. खाजगिकरणाबाबत खालील कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत , याबाबत अयोग्य पर्याय ओळखा
1. उद्योगांना नवरत्नाचा दर्जा
2. राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती
3. निर्गुंतवणूक धोरण
4. फेरा ऐवजी फेमा लागू✅

9. मानवी विकासाच्या प्राथमिक अवस्थेत पैसा म्हणून कशाचा वापर होत?
अ) पिसे , हस्तिदंत
ब) प्राण्यांची कातडी लोकर
क) मीठ, शिंपले
ड) नाणी
1. अ,ब,क✅
2. वरील सर्व
3. अ,ब,ड
4. अ,क,ड

10. खातेदाराने स्वाक्षरी केलेला दस्तऐवज घेवून आल्यास, त्यात नमूद केलेली रक्कम त्यास द्यावी असा आदेश म्हणजे काय?
अ) हुंडी वटवणे
ब) रोख कर्ज
क) अल्प मुदत कर्ज
1. ब,क बरोबर
2. फक्त अ बरोबर✅
3. अ,क
4. फक्त ड

1. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा?
अ) न्यून लोकसंख्या म्हणजे लोकसंख्या खूप जास्त असणे
ब) न्यून लोकसंख्या म्हणजे उपलब्ध साधनसामग्रीचापूर्ण वापर करण्यासाठी लोकसंख्या पुरेशी असणे
क) न्यून लोकसंख्येचे उदाहरण भारत आहे
1. अ,क बरोबर
2. अ,ब,क बरोबर
3. फक्त ब बरोबर
4. वरीलपैकी एकही नाही✅

2. श्रमापेक्षा यंत्रसामुग्रीचा जास्त वापर ...... यंत्रणांमध्ये केला जातो?
1. भांडवलप्रधान ✅
2. श्रमप्रधान
3. पारंपरिक
4. यापैकी नाही

3. केंद्र सरकार खालील गोष्टींसाठी जबाबदार असते?
1. अन्नधान्याची साठवणूक✅
2. शिधापत्रिकांचे वितरण
3. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची माहिती
4. स्वस्त धान्याच्या दुकानांच्या कामाचे पर्यवेक्षण

4. भाववाढीचे नकारात्मक परिणाम सांगा
1. खरेदीक्षमता घटते
2. बचत घटते✅
3. भांडवल उभारणी घटत
4. उत्पन्न वाढते

5.भारताच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनाबाबत योग्य विधाने ओळखा
1. देशाच्या उत्पादनात सध्या प्राथमिक क्षेत्रापेक्षा द्वितीयक क्षेत्राचा वाटा जास्त आहे✅
2. देशाच्या उत्पादनात सध्या द्वितीयक क्षेत्रापेक्षा प्राथमिक क्षेत्राचा वाटा जास्त आहे
3. देशाच्या उत्पादनात सध्या ्तृतीयक क्षेत्रापेक्षा द्वितीयक क्षेत्राचा वाटा जास्त आहे
4. देशाच्या उत्पादनात सध्या तृतीयक क्षेत्रापेक्षा प्राथमिक क्षेत्राचा वाटा जास्त आहे

6. सार्वजनिक उणीवांचा योग्य पर्याय ओळखा.
अ) गरिबांचा मर्यादित फायदा
ब) वितरकांचा फायदा होत नाही
क) शहरी पूर्वग्रह
ड) प्रादेशिक विषमता
1. अ,ब,क
2. ब,क,ड
3. अ,क,ड✅
4. यापैकी नाही

7.भारतात सार्वजनिक वितरण प्रणाली केव्हा अस्तित्वात आली
1. १९७२ च्या दुष्काळानंतर
2. २००० च्या दुष्काळानंतर
3. १९७३ च्या पहिल्या तेल झटक्यानंतर
4. १९४३ च्या बंगाल दुष्काळानंतर✅

8. भारतातील बेकारी नष्ट होण्यासाठी शासनाने खालीलपैकी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत
अ) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम
ब) सीमांत शेतकरी व शेतमजूर कार्यक्रम
क) कृषी सेवाकेंद्र
ड) धडक कार्यक्रम
इ) जवाहर रोजगार योजना
उत्तर :-वरील सर्व✅

9.पुढील कोणते विधान अयोग्य आहे.
अ) दहशतवादामूळे विदेशी व्यापारावर विपरीत परिणाम होतो
ब) भ्रष्ट्राचारामुळे आर्थिक विषमता निर्माण होते
क) साठेबाजीमुळे वस्तूंच्या व सेवांच्या कृत्रिम तुटवडा निर्माण होतो
ड) उत्पादनात वाढ करण्याचा आकृतिबंध नैसर्गिक पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात घातक आहे
1. अ
2.ब
3. क
4. यापैकी नाही✅

10.माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सुरू केलेली जवाहर रोजगार योजना पुढील कोणत्या वर्गासाठी होती
अ) आदिवासी
ब) अनुसूचित जाती
क) वेठबिगार
1. फक्त अ
2. फक्त ब
3. अ ,ब
4. अ,ब,क✅

1. पुढील विधानांवर विचार करा.
अ) जेव्हा देशाची आयात जास्त असते तेव्हा देशाचा व्यापार प्रतिकूल असतो.
ब) जेव्हा देशाची निर्यात जास्त असते तेव्हा देशात भाववाढ होत असते.
1. अ बरोबर ब चूक
2. अ चूक ब बरोबर
3. अ व ब दोन्ही चूक
4. अ व ब दोन्ही बरोबर✅

2.भारतात सार्वजनिक वितरण प्रणाली केव्हा अस्तित्वात आली?
1. 1972 च्या दुष्काळानंतर
2. 2000 च्या दुष्काळानंतर
3. 1973 च्या पहिल्या तेल झटक्यांणातर
4. 1943 च्या बंगाल दुष्काळानंतर✅

3. ग्राहक संरक्षण कायद्याचे मुख्य उद्दिष्ट सांगा?
अ) ग्राहकांना चांगले व परिपूर्ण सरंक्षण देणे
ब) ग्राहकांवरील अन्यायाचे निवारण करण्यासाठी सुलभ व वेगवान यंत्रणेची तरतूद करणे
क) भेसळयुक्त वस्तूची विक्री थांबवणे
ड) साठेबाजी व काळाबाजार करणे
1.अ,ब,ड
2. ब,क,ड
3. अ,ब✅
4. वरील सर्व

4.खालीलपैकी योग्य विधाने ओळखा
अ) आर्थिक वृद्धीच्या संकल्पनेत गरिबी, बेरोजगारी, आर्थिक विषमता इत्यादी समस्या निराकरणाचा प्रयत्न केला जात नाही
ब) आर्थिकवृद्धी ही संख्यात्मक संकल्पना आहे
1. अ बरोबर ब चूक
2. ब बरोबर अ चूक
3. दोन्ही बरोबर✅
4.दोन्ही चूक

5.भौतिक जीवनमान निर्देशकांचे निर्देशक घटक खालील पैकी कोणते?
अ) सरासरी आयुर्मान
ब) माता मृत्युदर
क) साक्षरतादार
ड) बालमृत्यूदर
1. अ,ब,ड
2. ब,क,ड
3. अ,क,ड✅
4. ब फक्त

6.अयोग्य पर्याय ओळखा
अ) आर्थिकवृद्धी होत असताना राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा मोठा असतो
ब) आर्थिक विकास होत असताना राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा वाटा कमी कमी होत जातो तर उद्योग व  सेवाक्षेत्राचा वाटा वाढत जातो
1. अ
2. ब
3. अ व ब
4. यापैकी नाही✅

7.शासनाने गरिबी निर्मूलनासाठी केलेल्या विशेष उपाय योजनांबाबत अयोग्य पर्याय ओळखा.
1. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार कार्यक्रम- कामाच्या बदल्यात धान्य
2. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम- पदवीधरांना स्वयंरोजगारासाठी मदत✅
3 .स्वयंरोजगारासाठी  ग्रामीण युवकांना प्रशिक्षण- स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण
4. जवाहर रोजगार योजना

8.भारतातील लोकसंख्येची वैशिष्ट्ये ओळखा
अ) जन्मदर व मृत्युदर यातील घटता फरक
ब) घटता बालमृत्यूदर
क) लोकसंख्या दशवार्षिक वाढीचा घटता दर
ड) कमी जन्मदर व उच्च मृत्युदर
1. अ,ब
2. अ,ब,क✅
3. वरील सर्व
4. यापैकी नाही

9.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे?
अ) लोकसंख्या स्थित्यंतराचा सिद्धांत जन्मदाराचे व मृत्यूदराचे उच्च वेगकडून कमी वेगाकडे स्थित्यंतर स्पष्ट करते
ब) १९२१ या वर्षाला महाविभाजन वर्षे असे म्हणतात
1. केवळ अ
2. केवळ ब
3. अ आणि ब✅
4. अ व ब दोन्ही नाहीत

10. कुटुंब कल्याण कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला?
1.1950
2. 1956
3. 1952✅
4. 2000

1. बेकारीच्या आर्थिक परिणामविषयी चुकीचे विधान ओळखा?
अ) संसाधनांचा अपव्यय
ब) कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी अवघड
क) दारिद्र्य व उत्पादनातील विषमता
ड) आर्थिक गुन्हेगारीत वाढ
इ) अनुत्पादक लोकसंख्येचा वाढता भर
1. अ,ब
2. क,ड,इ
3. यापैकी नाही✅
4. वरील सर्व

2.1991 साली नवीन आर्थिक धोरणाची आवश्यकता खालील कोणत्या कारणावरून वाटू लागली?
अ) आर्थिक अस्थिरता
ब) प्रतिकूल व्यापरतोल
क) कर्जाचा वाढता भार
ड) भाववाढ
इ) जर्मनीचे विघटन
1. अ,ब,क,ड
2. अ,ब,क✅
3. ब,क,ड,इ
4. वरील सर्व

3.खालीलपैकी आधुनिक काळातील सर्वात महत्वाची समस्या कोणती?
अ) पर्यावरण हानी
ब) बेरोजगारी
क) रोगराई
ड) प्रतिकूल मान्सून
1. अ✅
2. अ,ब,क
3. क,ड
4. वरील सर्व

4.खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे
अ) प्रचलित मजुरी दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असतानाही न मिळणे म्हणजे बेकारी होय
ब) तेजीच्या अवस्थेनंतर येणाऱ्या मंदीच्या अवस्थेत प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या बेकारीला चक्रीय बेकारी असे म्हणतात.
क) जेव्हा अर्थव्यवस्थेत संरचनात्मक व तंत्रज्ञानात्मक बदल होतात त्याला संरचनात्मक बेकारी म्हणतात
1. अ, क
2. ब,क
3. अ,ब
4. वरील सर्व✅

5.भारतातील उच्च जन्मदराच्या कारणांपैकी अयोग्य कारण ओळखा.
अ) सार्वत्रिक विवाह
ब) दारिद्र्य
क) स्त्रियांचा निम्न दर्जा
ड) वाढती साक्षरता
1.अ,ब,क
2. ब,क,ड
3. अ,ब,क,ड
4. ड✅

6.जागतिकीकरणात पुढील कोणत्या गोष्टींचा समावेश होतो
अ) आधुनिक दळणवळण
ब) माहिती तंत्रज्ञान
क) प्रगत वाहतूक
ड) डॉलर ची निर्मिती
1. अ,क
2. अ,ब,ड
3. अ,ब,क✅
4. अ,क,ड

7.भारतातील खनिज तेलाबाबत अयोग्य विधान ओळखा.
अ) भारतात तेल संशोधनासाठी तेल आणि नैसर्गिक वायू मंडळाची स्थापना करण्यात आली
ब) 1959 साली ऑइल इंडिया लिमिटेड ची स्थापना करण्यात आली.
1. अ
2. ब
3. अ व ब
4. यापैकी नाही✅

8.10 व्या पंचवार्षिक योजनेबाबत अयोग्य विधाने ओळखा.
1. स्थूल देशांतर्गत उत्पादनामध्ये वार्षिक सरासरी वृद्धी 7.8% झाली
2. त्यामुळे भारत हा वेगाने विकास करणारा देश ठरला.✅
3. औद्योगिक क्षेत्रातील वृद्धी 8.8% वार्षिक दराने वाढली
4. फेब्रुवारी 2007  मध्ये भारताचा विदेशी चलनाचा साठा 185  बिलिअन डॉलर पर्यंत पोहोचला होता.

9. खालीलपैकी कोणत्या कारणाने कागदी चलनाची निर्मिती झाली
अ) धातू, पैसा वाहून नेण्याच्या अडचणीमुळे 
ब) सोने, चांदीचा पुरवठा कमी असल्यामुळे
क) नाण्यात होणाऱ्या झीजमुळे
1. फक्त अ
2. अ व ब
3. अ व क
4. वरील सर्व✅

10.राष्ट्रीय उत्पन्न हा चक्रीय प्रवाह आहे , कारण......
अ) उत्पन्न हे दरवर्षी मोजले जाते
ब) एका व्यक्तीचे उत्पन्न म्हणजे दुसऱ्या व्यक्तीचा खर्च होय.
1. अ बरोबर
2. ब बरोबर✅
3. दोन्ही बरोबर
4. दोन्ही चूक

1. ई. स. 2018 मध्ये अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक कोणाला मिळाले की ज्यांनी शाश्वत व दीर्घकालीन आर्थिक विकासामध्ये योगदान देणारे लिखाण केले.
1. प्रा सोलो आणि सम्यूल्सन
2. गुंन्नर मीरडाल आणि प्रा राजन
3. प्रा विल्यम नॉरधस आणि प्रा पॉल रोमर ✅
4.अमर्त्य सेन आणि प्रसू

2. लेखक समिती व त्यांच्या दारिद्रयाच्या संकल्पना यांची योग्य जोडी लावा
        अ गट
अ. जागतिक बँक
ब. श्री  गौरव दत्त
क. लकडावाला समिती
ड. डॉ दांडेकर आणि डॉ रथ
         
          ब गट
I. दरडोई दर दिवशी ग्रामीण भागात 2400 उष्मांक आणि शहरी भागात 2100 उष्मांक मिळण्याइतके अन्नधान्य मिळणे आवश्यक.
II. दारिद्र यातील अंतर (दारिद्रय आतील पोकळी)
III. दरडोई दर दिवशी आहारासाठी 2250 उष्मांकापेक्षा कमी अन्न मिळणे
IV. 1973- 74 च्या किमतीनुसार ज्यांना दरडोई महिना ग्रामीण भागात रुपये 49.0 नऊ आणि शहरी भागात रुपये 57 आहारासाठी मिळत नाहीत
✅उत्तर:- अ-IV, ब-III, क- I, ड- II

3. घाऊक किंमत निर्देशांका मध्ये (WPI) पुढीलपैकी कोणत्या वस्तूंच्या किमतींचा विचार केला जातो?
अ. प्राथमिक वस्तू
ब. इंधन
क. उत्पादित वस्तू
1. फक्त अ आणि क
2. फक्त अ आणि ब
3. फक्त ब
4. वरील सर्व✅

4. पी डी ओझा (1960-61) समितीने दारिद्र्यरेषेच्या मापनासाठी पुढीलपैकी कोणता निकष विचारात घेतला होता?
1. प्रति व्यक्ती प्रति महिना मिळणारे उत्पन्न
2. प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्च✅
3. वरील दोन्ही
4. यापैकी नाही

5. सर्वसमावेशक वृद्धि प्रक्रियेमध्ये शासनाच्या योगदानाचे निर्देशक पुढीलपैकी कोणते आहे?
अ. महसूल स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण
ब. सार्वजनिक गुंतवणूक स्थूल देशांतर्गत उत्पादन प्रमाण
क. वरीलपैकी दोन्ही
ड. यापैकी नाही

6. योजना काळातील 1951 ते 2011 या कालखंडाच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.
अ. देशाच्या अन्नधान्य उत्पादनात चार पट वाढ झाली भारतीय उद्योगांचे विविधीकरण झाले
ब. आयातपर्यायी करण निर्यात विविधीकरण आणि विज्ञान तंत्रज्ञान विद्येचा प्रसार झाला
क. दारिद्र्य व बेकारीचे प्रमाण कमी करण्यात यश आले
ड. उत्पन्न व संपत्तीचे विकेंद्रीकरण करणे आणि आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण कमी करण्यात यश आले
1.ब, क, ड
2.ब, क
3.अ, ब✅
4. क, ड

7. खालीलपैकी कोणते सहस्त्रक विकास ध्येय नाही?
1. अति गरिबी आणि भूक यांचे उच्चाटन
2. सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्यता
3. बालमृत्यू दर कमी करणे
4. कृषी शाश्वतता साध्य करणे✅

8. लिंग असमानता निर्देशांकामध्ये(GII) पुढीलपैकी कोणत्या घटकांचा समावेश होतो?
अ. प्रजनन स्वास्थ्य
ब.सबलीकरण
क.श्रम बाजार
1.अ, ब
2.ब, क
3.ब
4.अ, ब, क, ड✅
या प्रश्नामध्ये अ ब आणि क हे तीनच पॉइंट दिले असुन उत्तरामध्ये मात्र अबकड असे चार पर्याय दिल्यामुळे हा प्रश्न चुकीचा असल्याने याचा एक गुण आयोगामार्फत दिला जाऊ शकतो

9. अल्पसंख्यांक समुदायाच्या सामाजिक आर्थिक वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या योजना उपयोगी आहेत?
अ. नई रोशनी
ब. पढो परदेस
क. शिका व कमवा
ड. नई मंजिल
1. अ, ब
2. क, ड
3. वरीलपैकी कोणतेही नाही
4. वरील सर्व

10. जून 2012 मध्ये Rio+20 घोषणापत्र संदर्भात शाश्वत विकास उद्दिष्ट (SDGs) ठरविण्यात आली त्यानुसार पुढील पैकी कोणती वैशिष्ट्ये ठरविण्यात आलेले नव्हते?
अ. गरिबीचे उच्चाटन असमान ती विरुद्ध संघर्ष लिंगभाव समानता
ब. आरोग्य व शिक्षण सुधारणा महासागर व जंगल रक्षण
क. अविरत विकासासाठी जागतिक भागीदारी पाठपुरावा आणि समीक्षा साठी प्रभावी संरचना विकास
ड. अतिरेकी संघटना वर बंदी आणि पर आक्रमण वर बंदी
1.क, ड
2.अ, ब, क
3. ड
4.अ

11. वित्तीय सर्वसमावेशकते आपण चुकीचा प्रश्न साठी प्रधानमंत्री जनधन योजना खालीलपैकी कोणत्या दिवशी सुरू करण्यात आली?
1. 16 मे 2014
2. 15 में 2014
3. 28 ऑगस्ट 2014✅
4. 18 नोवेम्बर 2014

12. सन 1991 मध्ये विकासाचे एल पी जी प्रतिमान.......
या त्या वेळच्या अर्थमंत्र्यांनी अमलात आणले?
1.पी व्ही नरसिंहराव
2. प्रणव मुखर्जी
3. डॉ मनमोहन सिंग ✅
4. पी चिदंबरम

25 October 2025

बेटी बचाओ बेटी पढाओ योजना (BBBP)

१. सुरुवात

➤ २२ जानेवारी २०१५ रोजी पानिपत, हरियाणा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरुवात.


२. लक्ष्यगट

➤ नुकतीच लग्न झालेली व तरुण जोडपी

➤ गर्भवती व स्तनदा माता

➤ आई-वडील


३. उद्दिष्टे

➤ पक्षपाती लिंग निवडीचे उच्चाटन करणे

➤ मुलींचे अस्तित्व व संरक्षण सुनिश्चित करणे

➤ मुलींच्या शिक्षणात आणि सर्व क्षेत्रांत सहभाग सुनिश्चित करणे


४. प्रमुख बाबी

➤ महिला आणि बालविकास मंत्रालय, आरोग्य मंत्रालय व शिक्षण मंत्रालय यांच्या संयुक्त प्रयत्नाने राबवली जाते

➤ जागरूकता मोहीम, मीडिया कॅम्पेन, शालेय व सामाजिक हस्तक्षेप यावर भर



💰 सुकन्या समृद्धी योजना (SSY)


१. सुरुवात

➤ २२ जानेवारी २०१५ रोजी पानिपत, हरियाणा येथूनच सुरू


२. लक्ष्यगट

➤ १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुली


३. उद्दिष्टे

➤ मुलींचा जन्मदर वाढवणे

➤ मुलींच्या जगण्याचे प्रमाण (Survival Rate) सुधारणे

➤ शिक्षणासाठी व भविष्याकरिता बचत करण्याची सवय लावणे


४. महत्वाचे मुद्दे

➤ पोस्ट ऑफिस किंवा मान्यताप्राप्त बँकेत खाते उघडता येते

➤ एका कुटुंबातील दोन मुलींसाठी खाते उघडण्याची मुभा

➤ खाते उघडण्याची वयमर्यादा – मुलगी १० वर्षांपेक्षा कमी वयाची असावी

➤ खाते मॅच्युरिटी – २१ वर्षे किंवा मुलीचे लग्न (किमान १८ व्या वर्षी)

➤ आयकर कलम ८०C अंतर्गत करसवलत


📝 टीप: दोन्ही योजनांचा उद्देश स्त्रीभ्रूणहत्या थांबवून मुलींना शिक्षण, आरोग्य आणि आर्थिक सुरक्षितता देणे आहे.

आर्थिक विकास आणि वृद्धी (व्याख्या)


🔹️ मायर व बाल्डविन - "आर्थिक विकास ही अशी प्रक्रिया आहे, ज्याअंतर्गत देशाच्या वास्तविक दरडोई उत्पन्नात दीर्घकालीन वाढ घडून येते."


🔹️ किंडल बर्जर - "अधिक उत्पादन व ते ज्यामुळे शक्य होते त्या तांत्रिक व संस्थात्मक स्थळातील बदल म्हणजे आर्थिक विकास होय."


🔹️ ए. मॅडिसन - "श्रीमंत राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी, तर गरीब राष्ट्रांच्या उत्पन्न स्तरातील वाढ म्हणजे आर्थिक विकास होय."


🔹️ उर्सुला हिक्स - "विकसित देशांतील आर्थिक प्रगतीस वृद्धी तर अविकसित देशांतील आर्थिक प्रगतीस विकास म्हणता येईल."


🔹️ शुम्पिटर - "आर्थिक विकास हा अर्थव्यवस्थेच्या स्थितीक अवस्थेतील उत्स्फूर्त बदल असून, विकासाची प्रक्रिया खंडित किंवा तुटक असू शकते. या उलट अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळात संथपणे व सातत्याने होत जाणारा बदल म्हणजे वृद्धी होय."


🔹️ जे. के. मेहता - "आर्थिक वृद्धीच्या प्रक्रियेतील बदल संख्यात्मक (Quantitative) तर आर्थिक विकासाच्या प्रक्रियेतील बदल गुणात्मक (Qualitative) स्वरूपाचे असतात."


🔹️ प्रो. बने - "विकसनशील देशात अर्थव्यवस्थेचा विविध घटकात वाढ करून ती टिकविण्यासाठी काही प्रमाणात मार्गदर्शन व नियमांची गरज असते याला आर्थिक विकास म्हणतात, तर विकसित अर्थव्यवस्थेमध्ये विकासाची प्रक्रिया स्वयंसूर्ते नसते त्यामुळे त्या प्रगतीला आर्थिक वृद्धी म्हणता येते."

सायमन कमिशन, नेहरू अहवाल व लाहोर अधिवेशन🔸️ (PYQ POINTS)


🔹 इंग्रजांची भूमिका व नेहरू अहवाल

➤ इंग्रजांनी नेहरू रिपोर्टकडे पूर्णतः दुर्लक्ष केले कारण मुस्लीम लीगने त्याला विरोध केला.

➤ मुस्लीम लीगने नेहरू रिपोर्टपेक्षा जिन्नांच्या चौदा कलमी कार्यक्रमाला प्राधान्य दिले.

➤ काँग्रेसने सरकारला एका वर्षात नेहरू रिपोर्ट स्वीकारण्याची मुदत दिली होती.


🔹 सायमन कमिशनची स्थापना (1927)

➤ माँटेग्यू–चेम्सफोर्ड कायद्याने (1919) केलेल्या सुधारणांचे मूल्यमापन करण्यासाठी कमिशन नेमले गेले.

➤ काँग्रेसला प्रतिनिधित्व न दिल्याने काँग्रेसने कमिशनचा तीव्र निषेध केला.

➤ कमिशनमध्ये एकही भारतीय सदस्य नसल्याने भारतीयांनी त्याचा बहिष्कार केला.

➤ सायमन विरोधी आंदोलन हे युवकांचे पहिले संघटित व क्रांतिकारी आंदोलन ठरले.

➤ जवाहरलाल नेहरू व सुभाषचंद्र बोस यांनी युवकांना संघटित करून नेतृत्वात पुढे झेप घेतली.


🔹 सायमन कमिशन नेमण्याची कारणे (1927)

➤ 1919 चा माँटेग्यू-चेम्सफोर्ड कायदा निकामी ठरला होता.

➤ ब्रिटनमध्ये मजूर पक्ष सत्तेवर आल्यास भारतासाठी अधिक उदार धोरण आखेल, अशी इंग्रजांना भीती होती.

➤ स्वराज्य पक्षाचा वाढता प्रभाव रोखणे इंग्रजांना आवश्यक वाटले.


🔹 सायमन कमिशनच्या शिफारशी

➤ प्रांतिक स्वायत्ततेचा स्वीकार, कायदे मंडळात प्रतिनिधींची व मतदारांची संख्या वाढवावी.

➤ १० ते १६% लोकसंख्येला मताधिकार देण्याची शिफारस.

➤ केंद्रात द्विदश शासन पद्धती लागू करू नये अशी सूचना.

➤ प्रांतातील द्विदश शासन पद्धती रद्द करावी असे सुचविण्यात आले.


🔹 लाहोर अधिवेशन (1929) व पुढील घडामोडी

➤ लाहोर अधिवेशनात काँग्रेसने ‘पूर्ण स्वराज्य’ ही मागणी केली.

➤ या मागणीनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला, ज्याने स्वातंत्र्य आंदोलनाला नवे वळण दिले.

कलम २६२ – आंतरराज्यीय नदी पाणी तंटे निवारण(PYQ POINTS)


🔹️ अनुच्छेद २६२ अन्वये कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवारणाकरिता तरतूद करण्याचा अधिकार संसदेला आहे.


🔹️ भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद २६२ (२) हे संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालय अथवा अन्य न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रांस अटकाव करण्याची तरतूद करण्याचा अधिकार देते.


🔹️ पाणी विवाद अधिनियम, १९५६ अन्वये आंतरराज्यीय नदीच्या पाण्यासंबंधी वादाच्या निवारणाकरिता न्यायाधिकरण (Tribunal) स्थापन करण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे.


🔹️ नदीच्या पाण्याशी निगडित आंतरराज्यीय तंट्याचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा सांविधानिक अधिकार संसदेला आहे.


🔹️ संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा त्यावरील नियंत्रण याबाबतीत कोणत्याही तंट्याच्या निर्णयाकरिता तरतूद करता येईल.


🔹️ अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाला किंवा अन्य कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी तरतूद संसदेला कायद्याद्वारे करता येते.


🔹️ पाणी-तंटा अधिनियमानुसार केंद्र शासनाला अशा कोणत्याही तंट्याच्या निवारणाकरिता लवाद (Tribunal) स्थापण्याचा अधिकार आहे.


🔹️ महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशमधील कृष्णा पाणीवाटप लवाद (Krishna Water Disputes Tribunal) हा राज्यघटनेच्या कलम २६२ च्या तरतुदीनुसार जाहीर करण्यात आला आहे.


🔹️ महादायी जल विवाद न्यायाधिकरण (२०१०) मध्ये खालील राज्यांचा समावेश आहे: गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र.


🔹️ महानदी जल विवाद न्यायालयची स्थापना मार्च २०१८ मध्ये करण्यात आली आहे.


🔹️ १६ फेब्रुवारी २०१८ रोजी कावेरी पाणी तंट्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या अपीलीय अधिकार क्षेत्राला विस्तार झाला आहे. (अनुच्छेद १३६ चे पुनर्रष्टीकरणारे)

राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची साधने


1) स्थूल देशांतर्गत उत्पाद (GDP) :- देशाच्या सीमेअंतर्गत उत्पादित झालेल्या "अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाची बेरीज" म्हणजे GDP होय. 


🛑GDP - अंतर्गत शक्ती दर्शवते.


2)स्थूल राष्ट्रीय उत्पाद(GNP) :- "देशाच्या नागरिकांनी जगात कोठेही राहून उत्पादित केलेल्या अंतिम वस्तू आणि सेवांच्या बाजारभावाची बेरीज" म्हणजे GNP होय. 


उदा :- अजय - अतुल यांनी अफ्रिकेत जाऊन तिथे स्टेज शो केला तर त्यांना तिथे मिळालेले पैसे GNP मध्ये मोजले जातील‌. ते GDP मध्ये मोजले जाणार नाहीत.(हा M(आयात) झाला.)


उदा :- जाॅन सीना त्याच्या देशातून भारतात आला आणि स्टेज शो केला त्याने भारतातात मिळवलेले पैसे जाताना त्याच्या देशात घेऊन गेला तर ते वजा करावे लागतील (हा X (निर्यात)‌झाला)


📍गेलेला पैसा वजा (-)करता आणि आलेला पैसा समाविष्ट (+)करता तेंव्हा आपल्याला GNP मिळतो.


🔰 निर्यात(X) - जास्त असेल तर GNP जास्त असणार आहे.


उदा - GDP 1000 रू + निर्यात 400 + आयात 300 = 1100 GNP

म्हणजेच GDP 1000 रू. तर GNP 1100 रू.


💠आयात(M) - जास्त असेल तर GDP जास्त असणार आहे आणि GNP कमी असणार आहे.

उदा - GDP 1000 रु + निर्यात 400 - आयात 600 = 800 GNP

म्हणजेच GDP 1000 रू. तर GNP 800 रू.


🔶स्थूल राष्ट्रीय उत्पाद (GNP) = GDP + X(निर्यात ) - M(आयात ) पाठच करा (PYQ)


⭕️घसारा (डेप्रिसिएशन) - एखादी भांडवली वस्तू आहे ती जर एका आर्थिक वर्षात घसरत असेल (तिची झीज होत असेल )तर तिची घसरण पैशाच्या स्वरूपात मोजली जाते. त्याला घसारा म्हणतात. 


🔰 निव्वळ देशांतर्गत उत्पाद (NDP):-

घसारा वजा करून जे उत्पन्न मिळते त्याला म्हणतात नेट डोमेस्टिक प्रोडक्ट (NDP)


✅NDP = GDP - घसारा 


⭕️ निव्वळ राष्ट्रीय उत्पाद(NNP):-

घसारा जर GNP मधून वजा केला तर NNP मिळतो.


✅NNP = GNP - घसारा


🟡 राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याचे सर्वात सुयोग्य साधन/मापन NNP हे आहे. 

म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यासाठी भारतात NNP चा वापर केला जातो.


💠 राष्ट्रीय उत्पन्न टाॅपिकवरती वरील महत्त्वाच्या संकल्पनांवरती राज्यसेवा पूर्व तसेच संयुक्त गट ब आणि क पूर्व परीक्षांमध्ये खूप वेळा प्रश्न आलेले आहेत.(PYQ) 

पाठच करा.

मिष्टी योजना (MISTHI Yojana)



1️⃣ सामान्य माहिती

➤ MISTHI = Mangrove Initiative for Shoreline Habitats & Tangible Incomes 

➤ सुरुवात – ५ जून २०२३ (2023-24 अर्थसंकल्पात घोषणा)

➤ योजनेचा कालावधी – 2023 ते 2028

➤ संबंधित मंत्रालय – पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय

➤ सरकारची भूमिका – स्थानिक समुदायांना खारफुटी लागवड उपक्रमांसाठी आर्थिक मदत

➤ दोन वर्षांतील प्रगती – 19,020 हेक्टर क्षेत्र व्यापून गुजरातमध्ये खारफुटी वनीकरणात राष्ट्रीय आघाडी


2️⃣ उद्दिष्टे 🎯

➤ निकृष्ट झालेली खारफुटी परिसंस्था पुनरुज्जीवित करणे

➤ खारफुटीचे आच्छादन वाढवणे

➤ हवामान बदल आणि समुद्री धूप यांच्या विरोधात किनारी लवचिकता (coastal resilience) मजबूत करणे

➤ किनारी समुदायांसाठी

  ✅️ ➤ पर्यावरणीय पर्यटन

  ✅️ ➤ शाश्वत उपजीविकेला प्रोत्साहन

➤ COP27 (इजिप्त, 2022) मध्ये सुरू झालेल्या

  ✅️ ➤ Mangrove Alliance for Climate (MAC) ला पाठिंबा


3️⃣ कार्याची व्याप्ती 📍

➤ 9 किनारी राज्ये आणि 4 केंद्रशासित प्रदेशांतील

  ✅️ ➤ 540 चौरस किमी क्षेत्रफळामध्ये खारफुटी विस्ताराचा समावेश


4️⃣ संबंधित मुद्दे 📊

➤ देशातील एकूण खारफुटीचे आच्छादन – 4,991.68 चौ. किमी

➤ देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राशी प्रमाण – 1.5%

➤ सर्वाधिक खारफुटी वने –

  ✅️ ➤ पश्चिम बंगाल – 2,114 चौ. किमी (42.30%)

➤ महाराष्ट्रातील खारफुटी वने –

  ✅️ ➤ 324 चौ. किमी (6.50%)

काही महत्वाचे ऑपरेशन्स :-



✔️ ऑपरेशन अलर्ट - राजस्थान सीमेवर सीमा सुरक्षा दलाने (BSF) ने सुरू केलेले सुरक्षा अभियान 


✔️ऑपरेशन ब्रह्मा - २०२५ म्यानमार भूकंप दरम्यान म्यानमारला आपत्ती मदत पुरवण्यासाठी 


✔️ऑपरेशन कलानेमी - उत्तराखंड सरकार ने सुरू केलेले, "बनावट बाबा" किंवा बनावट आध्यात्मिक नेत्यांवर कारवाईसाठी 


✔️ऑपरेशन इंद्रावती - हैतीमधून  डोमिनिकन रिपब्लिकला आपल्या नागरिकांना  बाहेर काढण्यासाठी 


✔️ऑपरेशन ऑलिव्हिया - ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाने सुरू केले.


✔️ऑपरेशन स्पायडरवेब - युक्रेनच्या सुरक्षा सेवेने (SBU) रशियन हवाई तळांना लक्ष केलेला ड्रोन हल्ला.


✔️ऑपरेशन रायझिंग लायन - इस्रायलने इराणवर केलेला सर्वात धाडसी हल्ला.


✔️ऑपरेशन 'ट्रू प्रॉमिस ३' - इस्रायलच्या "ऑपरेशन रायझिंग लायन" चा बदला घेण्यासाठी इराणने सुरू केलेले.


✔️ऑपरेशन सिंधू - इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढले 


✔️ऑपरेशन मिडनाईट हॅमर - इराणच्या अणु सुविधांवर अमेरिकेच्या नेतृत्वाखालील लष्करी हल्ला.

विभागीय परिषद (MPSC PYQ POINTS)


▪️विभागीय परिषदा या संविधानात्मक संस्था आहेत.

▪️भारतात एकूण सात विभागीय परिषदा देशातील प्रत्येक विभागासाठी निर्माण करण्यात आल्या आहेत.

▪️प्रत्येक मुख्यमंत्री हा आळीपाळीने विभागीय परिषदेचा उपाध्यक्ष म्हणून कार्य करतो.

▪️दोन किंवा अधिक विभागीय परिषदांच्या संयुक्त बैठकीचे अध्यक्षस्थान केंद्रीय गृहमंत्री भूषवितो.


🔸️ विभागीय परिषदांची उद्दिष्ट्ये / कार्ये

➤ राज्यवाद, प्रादेशिकवाद, भाषावाद आणि संकुचितवादी तीव्र वृत्ती यांना आळा घालणे.

➤ देशात भावनिक ऐक्य साध्य करणे.

➤ केंद्रीय गृहमंत्री विभागीय परिषदेचे अध्यक्ष असतात.


🔸️ उत्तर-पूर्व परिषद

➤ १९७१ मधील भारताच्या उत्तर-पूर्व विभागाच्या पुनर्रचनेच्या अनुषंगाने तिची निर्मिती करण्यात आली.

➤ ८ ऑगस्ट १९७२ रोजी तिची निर्मिती करण्यात आली.

➤ २००२ मध्ये परिषदेत सिक्कीमचा समावेश करण्यात आला.

काही महत्त्वाचे नियम



1.न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम -

एखाद्या वस्तूवर कोणतेही असंतुलित बल क्रिया करीत नसेल तर ती वस्तू अचल अवस्थेत असल्यास अचल अवस्थेतच राहील अथवा सरळ रेषेत एकसमान गतीत असल्यास ती सतत त्या रेषेत एकसमान गतीत राहील.


2.न्यूटनचा गतिविषयक दुसरा नियम -

संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो व संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते.


3.न्यूटनचा गतिविषयक तिसरा नियम -

कोणत्याही एका वस्तूवर बलाची क्रिया होत असताना बल निर्माण करणाऱ्या (दुसऱ्या) वस्तूवर विरुद्ध दिशेने तेवढ्याच परिमाणचे बल प्रतिक्रिया करीत असते.

किंवा

क्रिया बल व प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात; परंतु त्यांच्या दिशा परस्परांविरोधी असतात.


4.ऊर्जा अक्षय्यतेचा नियम -

ऊर्जेची निर्मिती किंवा तिचा नाश होऊ शकत नाही. एका प्रकारच्या ऊर्जेचे दुसऱ्या प्रकारच्या ऊर्जेत रूपांतर करता येते, तथापि विश्वामधील एकूण ऊर्जा सदैव अक्षय्य राहते.


5.तरणणाचा नियम -

तरणणाऱ्या वस्तूचे वजन तिच्या द्रव्यास भागाने विस्थापित केलेल्या द्रव्याच्या वजनाएवढे असते.


6.ओहमचा नियम -

जर वाहकाची भौतिक अवस्था कायम राहात असेल तर वाहकाच्या दोन टोकांमधील विभवांतर (V) व वाहकातून जाणारी विद्युत्धारा (I) यांचे गुणोत्तर स्थिर राहते.

महत्त्वाच्या नवीन नियुक्त्या – २०२५


1️⃣ रोमन कॅथोलिक चर्च (पोप)

 – चाना रॉबर्ट फ्रान्सिस प्रेव्होस्ट (पहिला अमेरिकन) → पोप लिओ XIV म्हणून नियुक्त


2️⃣ लोक लेखा समिती (PAC)

 – अध्यक्ष: के.सी. वेणुगोपाल


3️⃣ UPSC (युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन)

 – अध्यक्ष: डॉ. अजय कुमार


4️⃣ NALSA (राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण)

 – कार्यकारी अध्यक्ष: न्यायमूर्ती सूर्यकांत


5️⃣ BRICS चेंबर ऑफ कॉमर्स & इंडस्ट्री

 – अध्यक्ष: हरवंश चावला


6️⃣ भारताचा सर्वोच्च न्यायालय

 – ५२ वा CJI: न्यायमूर्ती बी.आर. गावई (भूषण रामकृष्ण गावई)


7️⃣ इंटेलिजन्स ब्युरो (IB)

 – संचालक: तपन कुमार डेका (कार्यकाळ १ वर्षाने वाढवला)


8️⃣ इंडियन फर्टिलायझर असोसिएशन (IFA)

 – अध्यक्ष: शैलेश सी. मेहता


9️⃣ पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार मंडळ

 – अध्यक्ष: एस. महेंद्र देव


🔟 आंतरराष्ट्रीय प्रशासकीय विज्ञान संस्था (IIAS)

 – अध्यक्ष: व्ही. श्रीनिवास (२०२५–२८)


1️⃣1️⃣ पंतप्रधानांचे संग्रहालय आणि ग्रंथालय

 – संचालक: अश्विनी लोहनि


1️⃣2️⃣ राष्ट्रपतींचे पहिले महिला ADC

-- यशस्वी सोलंकी


1️⃣3️⃣ वर्ल्ड अँटी-डोपिंग एजन्सी (WADA)

 – अध्यक्ष: विटोल्ड बान्का | मुख्यालय: मॉन्ट्रियल, कॅनडा


1️⃣4️⃣ संयुक्त राष्ट्र महासभा (UNGA)

 – ८० वा सत्र अध्यक्ष: अन्नालेना बॅरबॉक (जर्मनी) → फिलेमोन यांग (कॅमेरून) यांची जागा घेतली


1️⃣5️⃣ वर्ल्ड टुरिझम ऑर्गनायझेशन (UNWTO)

 – पहिली महिला सचिव-जनरल: शेखा नासेर अल नोवाइस (UAE)


1️⃣6️⃣ भारतीय उद्योग परिसंघ (CII)

 – अध्यक्ष: राजीव मेमानी


1️⃣7️⃣ आंतरराष्ट्रीय बिग कॅट अलायन्स (IBCA)

 – अध्यक्ष: भूपेंद्र यादव (पर्यावरण मंत्री) | सचिव-जनरल: एस.पी. यादव

जगातील प्रसिद्ध नद्या



🔹️ जगातील सर्वात लांब नदी कोणती? — नाईल (Nile)


🔹️ प्रवाहाच्या प्रमाणानुसार जगातील सर्वात मोठी नदी कोणती? — अ‍मेझॉन (Amazon)


🔹️ सिंधूनंतर पाकिस्तानातील सर्वात लांब नदी कोणती? — सतलज (Sutlej)


🔹️ युरोपातील सर्वात लांब नदी कोणती? — व्होल्गा (Volga)


🔹️ उत्तर अमेरिकेतील दुसरी सर्वात लांब नदी कोणती? — मिसुरी (Missouri)


🔹️ यलो समुद्र कोणत्या दोन देशांदरम्यान आहे? — चीन आणि कोरिया


🔹️ ब्लू नदी कोणत्या देशात आहे? — अमेरिका (U.S.)


🔹️ माया नदी कोणत्या देशात आहे? — रशिया


🔹️ कोणती नदी विषुववृत्त दोनदा ओलांडते? — काँगो (Congo)


🔹️ स्कीना नदी कोणत्या खंडातून वाहते? — उत्तर अमेरिका


🔹️ डार्लिंग नदी कोणत्या देशात आहे? — ऑस्ट्रेलिया


🔹️ रेड नदी कोणत्या देशात आहे? — अमेरिका (USA)


🔹️ ऑक्सस नदी कोणत्या दोन देशांदरम्यान वाहते? — अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान


🔹️ यांगत्से कियांग नदी कोणत्या देशात आहे? — चीन


🔹️ आशियातील सर्वात मोठी नदी कोणती? — यांगत्से कियांग (Yangtze Kiang)


🔹️ आफ्रिकेतील सर्वात मोठी नदी कोणती? — नाईल (Nile)


🔹️ थेम्स ही कोणत्या देशातील प्रसिद्ध नदी आहे? — युनायटेड किंगडम (UK)


🔹️ ऑरेंज ही कोणत्या देशातील नदी आहे? — दक्षिण आफ्रिका (South Africa)


🔹️ पाकिस्तानातील सर्वात लांब नदी कोणती? — सिंधू नदी (River Sindh)


🔹️ कोणत्या नदीला “Father of Waters” असे म्हणतात? — सिंधू नदी (Indus)

महत्त्वाचे लष्करी सराव (Military Exercises )



१) द्विपक्षीय लष्करी सराव (Bilateral Exercises)


🔹 Vinbax 2024 – भारत व व्हिएतनाम


🔹 वज्र प्रहार 2024 (Vajra Prahar) – भारत व अमेरिका


🔹 गरुड शक्ती 2024 (Garuda Shakti) – भारत व इंडोनेशिया


🔹 नसीम-अल-बहर (Naseem Al Bahr) – भारत व ओमान


🔹 IN-GN MPX – भारत व जर्मनी


🔹 SIMBEX 2024 – भारत व सिंगापूर


🔹 कॅरियर स्ट्राइक सराव (Carrier Strike) – भारत व इटली


🔹 काझिंद 2024 (Kazind) – भारत व कझाकिस्ता


🔹 अल नजाह-5 (Al Najah) – भारत व ओमान


🔹 ईस्टर्न ब्रिज (Eastern Bridge) – भारत व ओमान


🔹 युद्ध अभ्यास (Yudh Abhyas) – भारत व अमेरिका


🔹 वरूण 2024 (Varuna) – भारत व फ्रान्स


🔹 उदार शक्ती (Udar Shakti) – भारत व मलेशिय


🔹 नोमॅडिक एलिफंट (Nomadic Elephant) – भारत व मंगोलिया


🔹 JIMEX 2024 – भारत व जपान


🔹 मैत्री 2024 (Maitree) – भारत व थायलंड


🔹 MPX – भारत व स्पेन


🔹 होपेक्स सराव (Hopex) – भारत व इजिप्त


🔹 तर्कश (Tarkash) – भारत व अमेरिका


🔹 शक्ती (Shakti) – भारत व फ्रान्स


🔹 दस्तलिक (Dustlik) – भारत व उझबेकिस्तान


🔹 टायगर ट्रायम्फ (Tiger Triumph) – भारत व अमेरिका


🔹 LAMITIYE 2024 – भारत व सेशल्स


🔹 डेजर्ट सायक्लोन 2024 (Desert Cyclone) – भारत व UAE (संयुक्त अरब अमिरात)


🔹 सहयोग-कैझिन (Sahyog-Kaijin) – भारत व जपान


२) बहुपक्षीय लष्करी सराव (Multilateral Exercises)

🔹 IBSAMAR – भारत, ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका

24 October 2025

चालू घडामोडी :- 23 ऑक्टोबर 2025


◆ ऑलम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकवून देणारा भालाफेकपटू नीरज चोप्रा ला भारतीय सैन्याकडून लेफ्टिनेंट कर्नल हे पद देण्यात आले आहे.

◆ भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमात मोलाचे योगदान देणारे वैज्ञानिक डॉ. एकनाथ वसंत चिटणीस यांचे निधन झाले आहे. 

◆ रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन भूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये 1000 धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज बनला आहे.

◆ आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन दरवर्षी 23 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

◆ आंतरराष्ट्रीय हिम बिबट्या दिन 2024 ची थीम "भविष्यातील पिढ्यांसाठी हिम बिबट्याच्या अधिवासांचे रक्षण करणे" ही होती.

◆ सरकारने उच्च उत्पादन देणाऱ्या, लांब-स्टेपल कापसाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी 'कापूस उत्पादकता अभियान' सुरू केले आहे. 

◆ मासाको नोझावा यांना जपानच्या 2025 च्या 'पर्सन ऑफ कल्चरल मेरिट' पुरस्कारासाठी निवडण्यात आले आहे. 

◆ जागतिक वन संसाधन मूल्यांकन (GFRA) 2025 च्या अहवालानुसार, एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत भारताचा क्रमांक जागतिक स्तरावर नववा आहे.

◆ आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) चा 90 वा सदस्य देश म्हणून तुवालू सरकार अधिकृतपणे सामील झाले आहे.

◆ मोरक्कोने अर्जेंटिनाविरुद्ध विजय मिळवून चिली येथे झालेला फिफा अंडर-20 विश्वचषक 2025 जिंकला आहे.

◆ युनायटेड स्टेट्स ग्रँड प्रिक्स 2025 मध्ये मॅक्स व्हर्स्टापेनने लँडो नॉरिस आणि चार्ल्स लेक्लेर्क यांच्यावर विजय मिळवला.

◆ भारत आणि युनायटेड किंग्डमने रामानुजन ज्युनियर रिसर्चर्स प्रोग्राम सुरू केला आहे. 

◆ JAIMEX 2025 हे भारत आणि जपान यांच्यातील एक सागरी सराव आहे, ज्यात भारतीय नौदलाचे युद्धपोत INS सह्याद्री सहभागी झाले आहे.

23 October 2025

चालू घडामोडी :- 21 & 22 ऑक्टोबर 2025


◆ गोवा येथे 31 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर 2025 दरम्यान FIDE Chess World Cup 2025 होणार आहे. 

◆ मलेशियातील सुलतान ऑफ जोहोर कप 2025 मध्ये हॉकीमध्ये भारताने रौप्य पदक जिंकले आहे.

◆ छत्तीसगड राज्य सरकारने काळवीटांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात पुनर्स्थापित करण्यासाठी पाच वर्षांचा (2021-2026) पुनरुत्पादन कार्यक्रम सुरू केला आहे.

◆ भारतामध्ये दरवर्षी 21 ऑक्टोबर हा दिवस पोलिस स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो.

◆ 125 व्या इंडियन फुटबॉल असोसिएशन (IFA) शिल्ड 2025 "मोहन बागान सुपर जायंट" फुटबॉल संघाने जिंकली.

◆ महसूल गुप्तचर संचालनालयाने (DRI) चिनी फटाक्यांची बेकायदेशीर तस्करी रोखण्यासाठी 'ऑपरेशन फायर ट्रेल' राबवले आहे.

◆ Graded Response Action Plan (GRAP) हा दिल्ली-NCR मधील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी तयार केलेला आराखडा आहे.

◆ जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (WOD) दरवर्षी 20 ऑक्टोबर रोजी ऑस्टिओपोरोसिसविषयी जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.

◆ जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (WOD) 2025 ची थीम "हे अस्वीकार्य आहे!" (It's unacceptable!) ही आहे.

◆ जागतिक ऑस्टिओपोरोसिस दिन (WOD) 2024 ची थीम "नाजूक हाडांना नाही म्हणा" (Say No to Fragile Bones) ही होती.

◆ मशीनद्वारे गटार स्वच्छता करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने 'मॅनहोल ते मशीन होल' ही योजना सुरू केली आहे.

◆ Wildlife Institute of India (WII) ने "Status of Elephants in India" हा अहवाल प्रसिद्ध केला.

◆ चौथी दक्षिण आशियाई (SAAF) अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2025, 24 ते 26 ऑक्टोबर दरम्यान झारखंडमधील रांची येथील बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियममध्ये आयोजित केली जाईल.

22 October 2025

राज्य पुनर्रचना संदर्भातील आयोग व समित्या



1️⃣ एस. के. धार आयोग (S.K. Dhar Commission)

🔸️ स्थापना: 1948

🔸️ अहवाल: 1948

🔸️ अध्यक्ष: एस. के. धार

🔸️ स्थापनेचे माध्यम: संविधान सभेचे अध्यक्ष

🔸️ शिफारस:

 ✔️ राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा

 ✔️ भाषा व संस्कृतीवर आधारित पुनर्रचना नाकारली

 ✔️ मात्र आंध्र प्रदेशची निर्मिती भाषिक आधारावर करता येईल असे मत व्यक्त


2️⃣ जे. व्ही. पी. समिती (J.V.P. Committee)

🔸️ स्थापना: 1948

🔸️ अहवाल: 1949

🔸️ सदस्य: जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, पट्टाभी सीतारामय्या

🔸️ स्थापनेचे माध्यम: काँग्रेस पक्ष

🔸️ शिफारस:

 ✔️ भाषिक तत्त्वास विरोध केला

 ✔️ भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीबाबत अनुकूलता दाखवली नाही


3️⃣ राज्य पुनर्रचना आयोग (State Reorganization Commission / Fazal Ali Commission)

🔸️ स्थापना: 1953

🔸️ अहवाल: 1955

🔸️ अध्यक्ष व सदस्य:

 ✔️ फाजल अली (अध्यक्ष)

 ✔️ के. एम. पण्णीकर

 ✔️ हृदयनाथ कुंझरू


🔸️ स्थापनेचे माध्यम: केंद्र सरकार

🔸️ शिफारस:

 ✔️ भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेस समर्थन

 ✔️ ‘एक राज्य - एक भाषा’ या तत्त्वाचा अस्वीकार

 ✔️ राज्य निर्मिती करताना प्रशासकीय कार्यक्षमता व सामाजिक एकोपा यालाही महत्त्व देण्याचे सुचवले

आंतरराज्यीय परिषद (कलम 263) PYQ POINTS



♦️स्थापना व रचना

🔹️ कलम 263 नुसार, राज्यांमध्ये समन्वय साधण्यासाठी राष्ट्रपती आंतरराज्य परिषद नियुक्त करू शकतात.

🔹️ आंतर-राज्य परिषद 28 मे, 1990 रोजी स्थापन झाली.

🔹️ परिषदेची पुनर्रचना 11 नोव्हेंबर, 1999 रोजी करण्यात आली.


♦️अध्यक्ष व सदस्य

🔹️ पंतप्रधान हे आंतर-राज्य परिषदेचे अध्यक्ष असतात.

🔹️ सर्व राज्यांचे मुख्यमंत्री हे परिषदेचे सदस्य असतात.


♦️बैठका व कार्यपद्धती

🔹️ आंतर-राज्य परिषदेच्या बैठका पडद्याआड (गुप्तरित्या) घेतल्या जातात.

🔹️ परिषदेत विचारार्थ येणारे मुद्दे सहमतिने सोडवले जातात.


♦️कार्यक्षेत्र

🔹️ राज्या-राज्यांतील तंटे – उद्भवलेल्या तंट्यांबाबत चौकशी करणे व सल्ला देणे.

🔹️ समाईक हितसंबंधांचे विषय –

    • राज्यांपैकी सर्व, काही किंवा संघराज्य व एक/अधिक राज्ये यांच्या सामाईक हिताशी संबंधित विषयांवर अन्वेषण व चर्चा करणे.

🔹️ धोरण समन्वय व शिफारशी –

    • अशा कोणत्याही विषयावर शिफारशी करणे.

    • विशेषतः धोरणे व कारवाई यांचा अधिक चांगला समन्वय साधण्यासाठी शिफारशी करणे.

नवीन मार्गदर्शक तत्त्वे

 💎 नवीन मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles of State Policy – DPSP) घटनादुरुस्त्यांद्वारे जोडलेली


🔹 1976 – 42 वी घटनादुरुस्ती

1.मुलांच्या निरोगी विकासाच्या संधी सुरक्षित करणे (अनुच्छेद 39)


2.समान न्यायाचा प्रचार करणे व गरिबांना मोफत कायदेशीर मदत देणे (अनुच्छेद 39A)


3.उद्योगांच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग सुरक्षित करणे (अनुच्छेद 43A)


4.पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, तसेच जंगले व वन्यजीवांचे रक्षण करणे (अनुच्छेद 48A)


🔹 1978 – 44 वी घटनादुरुस्ती

➤ राज्याने उत्पन्न, स्थिती, सुविधा व संधी यांतील असमानता कमी करणे आवश्यक (अनुच्छेद 38)


🔹 2002 – 86 वी घटनादुरुस्ती

➤ अनुच्छेद 45 मध्ये बदल: सहा वर्षापर्यंतच्या सर्व मुलांचे संगोपन व शिक्षण राज्याने करणे.

➤ कलम 21A अंतर्गत प्राथमिक शिक्षण हा मूलभूत अधिकार घोषित.


🔹 2011 – 97 वी घटनादुरुस्ती

➤ सहकारी संस्थांशी संबंधित नवीन तत्त्व (अनुच्छेद 43B) —

✅️ ➤ सहकारी संस्थांची निर्मिती प्रोत्साहित करणे

✅️ ➤ त्यांचे स्वायत्त कामकाज व लोकशाही नियंत्रण सुनिश्चित करणे

✅️ ➤ व्यावसायिक व्यवस्थापनाला चालना देणे

अखिल भारतीय किसान सभा



🔹️स्थापना व मुख्य माहिती

➤ स्थापना: 11 एप्रिल 1936

➤ ठिकाण: लखनौ

➤ संस्थापक सचिव: प्रा. एन. जी. रंगा

➤ अध्यक्ष: स्वामी सहजानंद सरस्वती

➤ पहिले अधिवेशन: लखनौ

➤ मुखपत्र: इंदुलाल याज्ञिक यांच्या नेतृत्वाखाली


🔹️सदस्य आणि प्रमुख नेते

➤ सोहनसिंग जोशी

➤ इंदुलाल याज्ञिक

➤ जयप्रकाश नारायण

➤ मोहनलाल गौतम

➤ कमल सरकार

➤ सुनील प्रामाणिक नंबूरीपाद

➤ करीनंद शर्मा

➤ यमुना करजी

➤ यदुदुंन (जादुनंदन) शर्मा

➤ राहुल सांकृत्यायन

➤ पी. सुंदरैय्या

➤ राम मनोहर लोहिया

➤ आचार्य नरेंद्र देव

➤ बंकिम मुखर्जी

➤ मुझफ्फर अहमद

➤ ए. के. गोपालन

➤ बिनय कृष्ण चौधरी

➤ हरिकिशन सिंग सुरजीत

➤ एस. रामचंद्रन पिल्ले

➤ आमरा राम


🔹️महत्त्वाचे कार्य आणि कार्यपद्धती

➤ सभेने शेतकऱ्यांच्या हक्कांचा जाहीरनामा राष्ट्रीय सभेला सादर केला

➤ 11 एप्रिल 1936 रोजी काँग्रेसची पहिली अध्यक्ष म्हणून स्वामी सहजानंद सरस्वती यांची निवड


🔹️पूर्वसंधी आणि प्रदेशीय स्थापना

➤ 1928: 'आंध्र किसान संघ – संस्थापक: एन. जी. रंगा

➤ ओरिसा: 'उत्कल प्रांतीय किसान सभा' – संस्थापक: मालती चौधरी

बारडोली सत्याग्रह (1928-29)



🔹️मूलभूत माहिती

➤ वर्ष: 1928-29

➤ ठिकाण: बारडोली

➤ नेतृत्व: सरदार वल्लभभाई पटेल


🔹️कारणे आणि सुरूवात

➤ 1926 मध्ये स्थानिक सरकारने 30% कर वाढीची घोषणा केली

➤ शेतकऱ्यांनी या वाढीचा विरोध केला

➤ सरकारने बारडोली चौकशी आयोग नेमला, ज्याने कर वाढ चुकीची असल्याचे सांगितले


🔹️पटेलांचे नेतृत्व आणि कार्यपद्धती

➤ पटेलांनी महिलांचा सहभाग वाढवला

➤ महिलांना "सरदार" पदवी दिली

➤ लढा देण्यासाठी 13 छावण्या उभारल्या

➤ आंदोलनात सामाजिक बहिष्काराचा वापर करून विरोधकांवर दबाव टाकला

➤ सत्याग्रह पत्रिका सुरू केली


🔹️समर्थन आणि राष्ट्रीय प्रतिसाद

➤ लालजी नारंजी आणि के एम मुन्शी यांनी समर्थनार्थ विधान परिषदेचा राजीनामा दिला

➤ मुंबई रेल्वेने संप पुकारला

➤ 2 ऑगस्ट 1928: गांधीजी बारडोलीत दाखल, पटेलांना अटक होऊ नये म्हणून


🔹️चौकशी आयोगाचे निर्णय आणि यश

➤ चौकशी आयोग स्थापन: ब्लुमफिल्ड व मक्सवेल

➤ आयोगाने कर वाढ चुकीची असल्याचे सांगितले

➤ कर वाढ 30% ऐवजी 6.3% करण्यात आली

➤ सत्याग्रह यशस्वी ठरला ✅

मुळशी सत्याग्रह



🔹️स्थान व कालावधी

➤ ठिकाण: पुणे जिल्ह्यातील मुळशी परिसर

➤ कालावधी: 1920 – 1921


🔹️नेतृत्व

➤ या सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केले.


🔹️कारण

➤ टाटा वीज कंपनीने वीज निर्मितीसाठी धरण बांधण्याची योजना आखली होती.

➤ या योजनेमुळे सुमारे 54 गावे धरणाखाली जाणार होती.

➤ शेतकऱ्यांची जमीन बुडणार असल्याने त्यांनी विरोध सुरू केला.


🔹️घटना व पार्श्वभूमी

➤ शेतकऱ्यांनी जमिनींच्या अन्यायकारक संपादनाविरोधात आंदोलन केले.

➤ सेनापती बापट यांनी या संघर्षाचे नेतृत्व करत जनजागृती केली.

➤ हे आंदोलन औपनिवेशिक शासन व भांडवलदारांच्या संयोगाविरोधातील ग्रामीण असंतोषाचे प्रतीक ठरले.


🔹️परिणाम व व्यापक प्रभाव

➤ मुळशी सत्याग्रहामुळे जमिनींचे हक्क, विकास प्रकल्पांतील पुनर्वसन, आणि शेतकऱ्यांच्या हितांचे प्रश्न राष्ट्रीय पातळीवर चर्चिले गेले.

➤ पुढील काळात (1926-27) बंगाल, उत्तर प्रदेश, पंजाब व आंध्र प्रदेशात किसान सभा व इतर शेतकरी संघटना स्थापन होण्यास प्रोत्साहन मिळाले.

भारतातील क्रांतिकारी चळवळी: महत्त्वाचे टप्पे (१८७९ – १९१९)



1.🚩 बंगालमधील क्रांतिकारी चळवळ

➤ प्रारंभ (१९०२)

  ➡️ छोट्या क्रांतिकारी गटांची स्थापना — मिदनापूर व कलकत्ता येथील अनुशीलन समिती (प्रमथनाथ मित्र, पुलिन बिहारी दास, बारिंद्रकुमार घोष).

➤ प्रचाराची साधने

  ➡️ १९०६ पासून युगांतर हे क्रांतिकारी साप्ताहिक सुरू झाले.

  ➡️ १९०५–०६ पर्यंत संध्या व युगांतर यांसारख्या वृत्तपत्रांनी क्रांतिकारी दहशतवादाचा पुरस्कार केला.

➤ महत्त्वाच्या घटना

  ➡️ १९०७ — पूर्व बंगालच्या माजी लेफ्टनंट गव्हर्नरवर हल्ल्याचा प्रयत्न.

  ➡️ १९०८ — प्रफुल्ल चाकी व खुदीराम बोस यांनी मुझफ्फरपूरचे मॅजिस्ट्रेट किंग्जफोर्ड यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. खुदीराम बोस यांना फाशी, प्रफुल्ल चाकी यांनी आत्महत्या केली.

  ➡️ १९०८ — अलिपूर बॉम्ब कट प्रकरण : अरविंद घोष, बारिंद्र घोष व इतरांवर खटला.

  ➡️ १९०८ — बऱ्हा डकैती : ढाका अनुशीलनने सरकारी खजिना लुटण्याचा प्रयत्न.

  ➡️ १९१२ — दिल्ली कट : रासबिहारी बोस व सचिन सन्याल यांनी व्हाईसरॉय हार्डिंग यांच्या मिरवणुकीवर बॉम्ब फेकला.

  ➡️ पहिले महायुद्ध (१९१४–१९१८) : जतीन दास व युगांतर गट जर्मन कटात सामील — जर्मनीच्या मदतीने सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न (अयशस्वी).


2.🦁 महाराष्ट्रातील क्रांतिकारी चळवळ

➤ आद्य क्रांतिकारक

  ➡️ १८७९ — वासुदेव बळवंत फडके यांनी रामोशी शेतकरी व गरीब लोकांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र बंड पुकारले. (भारताचा आद्य सशस्त्र क्रांतिकारी उठाव).

➤ जनजागृती

  ➡️ १८९० चे दशक — लोकमान्य टिळक यांनी शिवाजी व गणपती उत्सवांद्वारे तरुणांमध्ये जहाल विचार व देशभक्ती निर्माण केली.

  ➡️ केसरी व मराठा या नियतकालिकांद्वारे ब्रिटिशविरोधी विचारांचा प्रसार.

➤ चाफेकर बंधू

  ➡️ १८९७ — प्लेग कमिशनर रँड व ले. आयर्स्ट यांची पुण्यात चाफेकर बंधूंनी (दामोदर, बाळकृष्ण, वासुदेव) हत्या केली. (भारताच्या राजकीय हत्येचे पहिले मोठे क्रांतिकारी कृत्य).

➤ सावरकर आणि अभिनव भारत

  ➡️ १८९९ — विनायक व गणेश सावरकर यांनी मित्र मेळा या गुप्त संस्थेची स्थापना.

  ➡️ १९०४ — मित्र मेळा → अभिनव भारत संघटनेत रूपांतर.

  ➡️ १९०९ — नाशिक कट खटला : अनंत कान्हेरे यांनी जिल्हाधिकारी जॅक्सन यांची हत्या केली.


3.⚔️ पंजाबमधील क्रांतिकारी चळवळ

➤ नेतृत्व आणि प्रचार

  ➡️ लाला लजपत राय, सरदार अजित सिंग, आगा हैदर सय्यद हैदर रझा, भाई परमानंद, लालाचंद ‘फलक’, सुफी अंबाप्रसाद इ. नेत्यांनी ब्रिटिशांविरुद्ध चळवळ चालवली.

  ➡️ सरदार अजित सिंग यांनी भारत माता सोसायटी ची स्थापना केली.

  ➡️ लाला लजपत राय यांचे पंजाबी व अजित सिंग यांचे भारत माता वृत्तपत्रे क्रांतिकारक विचारांचे प्रसारक.

➤ महत्त्वाची घटना

  ➡️ गदर चळवळ (१९१३) : लाला हरदयाल यांनी अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे स्थापना केली. उद्देश — ब्रिटिश राजवट उलथविण्यासाठी जगभरातील भारतीयांना एकत्र आणणे.

  ➡️ पहिल्या महायुद्धादरम्यान पंजाबातील क्रांतिकारकांचा क्रांतीचा प्रयत्न.

  ➡️ रासबिहारी बोस यांनी उत्तर भारतातील अनेक क्रांतिकारी कारवायांत पडद्यामागून नेतृत्व केले.

नागरी (Urban) क्षेत्र – 2011 जनगणना आधारित माहिती


1️⃣ नागरी क्षेत्राची व्याख्या (Census Definition)

➤ जनगणनेनुसार दोन प्रकारची शहरे नागरी क्षेत्रात समाविष्ट केली जातात:

 अ) वैधानिक शहरे (Statutory Towns)

  ⮞ जिथे महानगरपालिका, नगरपालिका, कटक मंडळे अस्तित्वात आहेत.

  ⮞ किंवा जी शहरे शहर क्षेत्र समितीने सूचीकृत केली आहेत.

 ब) जनगणना शहरे (Census Towns)

  ⮞ लोकसंख्या किमान 5000 असणे आवश्यक.

  ⮞ पुरुषांपैकी किमान 75% कामगार गैरकृषी व्यवसायात असावेत.

  ⮞ लोकसंख्या घनता (density) प्रती चौ.कि.मी. 400 पेक्षा जास्त असावी.


2️⃣ भारताची नागरी लोकसंख्या (2011)

➤ नागरी लोकसंख्या = 37,71,06,125

➤ भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 31.14% ही नागरी आहे.


3️⃣ वर्ग-1 शहरे (Class I Towns)

➤ परिभाषा : ज्या शहरी भागाची लोकसंख्या 1 लाखापेक्षा जास्त आहे.

 ◉ 2001 मध्ये – वर्ग-1 शहरे = 394

 ◉ 2011 मध्ये – वर्ग-1 शहरे = 468


4️⃣ दशलक्षी शहरे (Million Plus Cities)

➤ परिभाषा : लोकसंख्या 10 लाखांपेक्षा जास्त

 ◉ 2001 मध्ये – अशी शहरे = 35

 ◉ 2011 मध्ये – अशी शहरे = 53 (468 वर्ग-1 शहरांपैकी)


📝 टीप: दशलक्षी शहरे म्हणजे मेगा सिटीज नव्हेत. मेगा सिटीज = 1 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या (उदा. मुंबई, दिल्ली, कोलकाता).

स्वातंत्र्य चळवळीचे महत्त्वाचे टप्पे (1929–1932)



🔹 लाहोर काँग्रेस अधिवेशन (डिसेंबर 1929)

  ➤ काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य हे आपले ध्येय म्हणून स्वीकारले.

  ➤ सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

  ➤ 26 जानेवारी 1930 हा दिवस पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय.


🔹 दांडी मार्च (12 मार्च–6 एप्रिल 1930)

  ➤ गांधीजींच्या नेतृत्वाखाली मिठाच्या सत्याग्रहाचा प्रसार तमिळनाडू, मलबार, आंध्र, आसाम, बंगालपर्यंत.


🔹 अतिरिक्त विरोध मार्गांसह चळवळीचा प्रसार

  ➤ वायव्य सरहद्द प्रांतात खुदाई खिदमतगार सक्रिय.

  ➤ शोलापूरमध्ये विणकर कामगार सक्रिय.

  ➤ धारसाना येथे मिठाचा सत्याग्रह.

  ➤ बिहारमध्ये चौकीदारी कर नाही मोहीम.

  ➤ बंगालमध्ये चौकीदारी विरोधी आणि युनियन-बोर्ड विरोधी कर मोहीम.

  ➤ गुजरातमध्ये कर नाही मोहीम.

  ➤ महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रांतात वनांचे कायदेभंग.

  ➤ आसाममध्ये 'कनिंघम परिपत्रका' विरोधात आंदोलन.

  ➤ उत्तर प्रदेशात शेतसारा नाही मोहीम.

  ➤ महिला, विद्यार्थी, मुस्लिम गट, व्यापारी, लहान व्यापारी, आदिवासी, कामगार आणि शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.


🔹 गांधी–आयर्विन करार (मार्च 1931)

  ➤ काँग्रेसने दुसऱ्या गोलमेज परिषदेत उपस्थित राहण्यास आणि सविनय कायदेभंग मागे घेण्यास सहमती दर्शविली.


🔹 कराची काँग्रेस अधिवेशन (मार्च 1931)

  ➤ गांधी–आयर्विन दिल्ली कराराला मान्यता दिली.

  ➤ आर्थिक कार्यक्रम आणि मूलभूत अधिकारांवर ठराव मंजूर.


🔹 गोलमेज परिषद (The Round Table Conference)

  ➤ ब्रिटनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेत अल्पसंख्याकांसाठी सुरक्षिततेसाठी मतभेद झाले.

  ➤ डिसेंबर 1931–एप्रिल 1934: सविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा.


🔹 जातीय निवाडा (Communal Award, 1932) आणि पुणे करार (Poona Pact)

  ➤ दलित वर्गाला स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले.

  ➤ राष्ट्रीय एकात्मतेसाठी धोका असल्याची राष्ट्रवाद्यांची भावना.

  ➤ गांधींनी आमरण उपोषण सुरू केले → पुणे करार.

  ➤ पुणे करारामुळे दलित वर्गासाठी स्वतंत्र मतदारसंघ रद्द; जागा वाढवून आरक्षित ठेवण्यात आल्या.


🔹 पुणे कराराचा दलित वर्गावरील परिणाम

  ➤ संयुक्त मतदारसंघ व दलित वर्गावरील परिणाम.

  ➤ गांधी व आंबेडकर यांच्या विचारांतील फरक व साम्य.

समुद्रतळ प्रसार सिद्धांत (Sea Floor Spreading Theory) : हेरी हेस🔸️



समुद्रतळाच्या अभ्यासातून पुढील काही बाबी उघडकीस आल्या :

🔹 समुद्रतळाच्या मध्यभागी Mid Oceanic Ridge जवळ सतत ज्वालामुखिचा उद्रेक होत असतो. त्यामुळे त्या भागात खूप मोठ्या प्रमाणात लाव्हा बाहेर फेकला जातो.


🔹 या मध्य महासागरी कटकाचे (Mid Oceanic Ridge) च्या दोन्ही बाजूस समान अंतरावर असलेल्या खडकांचे वय, रासायनिक घटक व चुंबकीय गुणधर्म सारखे असते. या भागापासून जसे जसे दूर जावे तसतसे खडकांचे वय वाढत जाते.


🔹 समुद्रतळावरील खडक हे खंडाच्या खडकांपेक्षा खूप कमी वयाचे आहेत.


🔹 समुद्रतळावर जमा झालेल्या गाळाची जाडी फार कमी आहे. शास्त्रज्ञांना असे अपेक्षित होते की जर समुद्र खंडाएवढे वयाचे असतील तर गाळाचे वय सुद्धा सारखेच असावे. परंतु कोणत्याच ठिकाणी समुद्रतळातील गाळाचे वय 200 दशलक्ष वर्षांपेक्षा अधिक नाही.


🔹 खोल गर्ता (Deep Trenches) मध्ये भूकंप नाभी (Earthquake focus) हे खोल असतात. तर मध्यसागरी कटकात (Mid Oceanic Ridge) भूकंपनाभी उथळ (Shallow) आहे.


👉 या पुराव्यांचा अभ्यास करून शास्त्रज्ञ हेरी हेस यांनी 1961 मध्ये समुद्रतळ प्रसार (Sea Floor Spreading) सिद्धांत मांडले. त्यांनी सांगितले की Mid Oceanic Ridge जवळ सातत्याने ज्वालामुखी उद्रेक होऊन नवीन लाव्हारस बाहेर पडतो व समुद्रतळ तुटून एकमेकापासून दूर जाऊ लागतात. त्यामुळे समुद्रतळाचा प्रसार होतो.


परंतु यामुळे एका समुद्राचा आकार वाढून दुसऱ्या समुद्राचा आकार कमी होत नाही, तर जो समुद्रतळ ज्वालामुखिमुळे दूर ढकलला जातो, तो भाग समुद्री गर्ते मध्ये बुडून नाहीसा होतो.

मानवी भूगोलासंबंधी महत्त्वाचे ग्रंथ व लेखक



① बर्नहार्डस वारेनियस (जर्मन)

➤ ग्रंथ: जिओग्राफिया जनरलीस


② चार्ल्स डार्विन (इंग्रजी)

➤ ग्रंथ: ओरिजिन ऑफ स्पेसीस (1859)

➤ सिद्धांत: थिअरी ऑफ इव्होल्यूशन


③ हेन्री थॉमस बकल (इंग्रजी इतिहासकार)

➤ ग्रंथ: हिस्ट्री ऑफ सिव्हिलायझेशन इन इंग्लंड


④ कार्ल रिटर

➤ ग्रंथ: युरोपा (1863)


⑤ 'अर्डकुंड' (Erdkunde)

➤ लेखक: कार्ल रिटर

➤ अर्थ: भूगोल

➤ वैशिष्ट्य: २०,००० पानांचा व १९ खंडांचा ग्रंथ

➤ प्रकाशन: 1817 मध्ये लिहिण्यात आला


⑥ कॉसमॉस (Kosmos)

➤ लेखक: अलेक्झांडर हम्बोल्ट

➤ पद: बर्लिन विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक

➤ वैशिष्ट्य: लेक्चर्सचा संग्रह

➤ मान्यता: 'भूगोलाचा पहिला संदर्भग्रंथ'


⑦ ॲन्थ्रोपोजिओग्राफी (Anthropogeographie)

➤ लेखक: फ्रेडरिक रॅट्झेल

➤ वैशिष्ट्य: मानव भूगोलविषयक मूलभूत ग्रंथ


⑧ जिओग्राफिया ह्युमेना (Géographie Humaine)

➤ लेखक: जीन ब्रुन्स (Jean Brunhes)

➤ वैशिष्ट्य: फ्रेंच भाषेतील मानवी भूगोलावर आधारित प्रसिद्ध ग्रंथ

महत्वाचे कंप (Sound & Vibration – Key Points) 🎵


🔹️ ध्वनीची निर्मिती वस्तूच्या कंपनामुळे होते. प्रत्येक ध्वनीचे मूळ कुठल्या तरी कंप पावणाऱ्या वस्तूमध्ये असते.


🔹️ ध्वनीचे प्रसारण अनुतरंगाच्या रूपात (Longitudinal Waves) होते.


🔹️ ध्वनीच्या प्रसारणासाठी स्थायू, द्रव किंवा वायू माध्यमाची आवश्यकता असते.


🔹️ ध्वनीचा वेग स्थायू माध्यमात द्रव व वायू माध्यमापेक्षा जास्त असतो.


🔹️ जर १/१० सेकंदाच्या आत दोन ध्वनी आपल्या कानावर पडले, तर त्यांचे स्वतंत्र ज्ञान होत नाही.


🔹️ ध्वनीच्या हवेतील वेगावर तापमान, आर्द्रता व वारा परिणाम करतात.


🔹️ हवेचे तापमान १°C ने वाढविल्यास, ध्वनीचा वेग ०.६ m/s ने वाढतो.


🔹️ दमट हवेत ध्वनीचा वेग कोरड्या हवेपेक्षा जास्त असतो.


🔹️ ध्वनीचा परिणामी वेग = ध्वनीचा वेग + वाऱ्याच्या वेगाची सदिश बेरीज.


🔹️ चंद्रावर माध्यम नसल्यामुळे ध्वनी ऐकू येत नाही.


🔹️ ध्वनीचा वेग प्रकाशापेक्षा कमी असल्यामुळे वीज चमकल्यानंतर ढगांचा गडगडाट थोड्या वेळाने ऐकू येतो.


🔹️ प्रत्यक्ष ध्वनी ऐकल्यानंतर १/१० सेकंदाने प्रतिध्वनी आला, तरच तो स्वतंत्रपणे ऐकला जातो.


🔹️ प्रतिध्वनी ऐकू येण्यासाठी परावर्तक पृष्ठभागाचे अंतर ≥ 17 m असले पाहिजे.


🔹️ वटवाघूळ अंधारात उडण्यासाठी प्रतिध्वनी तत्वाचा उपयोग करते.


🔹️ SONAR (Sound Navigation and Ranging) तत्त्वाने पाण्याची खोली मोजता येते.


🔹️ ध्वनीचा द्रव माध्यमातील वेग > वायू माध्यमातील वेग.


🔹️ निर्वातात ध्वनीचे प्रसारण होत नाही.


🔹️ ०°C तापमानास, हवेतील ध्वनीचा वेग ३३२ m/s असतो.


🔹️ ध्वनीचे परावर्तन प्रकाशाप्रमाणे होते, पण त्यासाठी विस्तृत परावर्तक पृष्ठभाग आवश्यक असतो.


🔹️ ध्वनी एखाद्या पृष्ठभागावरून परावर्तित होऊन पुन्हा ऐकू येतो.

महत्वाचे समाजसुधारक व राष्ट्रीय चळवळीशी संबंधित प्रश्नोत्तरं

१) आधुनिक भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक — महात्मा ज्योतिराव फुले


२) इ.स. १९०२ मध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये मागासवर्गासाठी ५०% आरक्षणाचा निर्णय घेणारे संस्थानिक — राजर्षी शाहू महाराज (कोल्हापूर)


३) जे. एस. मिल व स्पेन्सर यांच्या विचारांनी प्रभावित समाजसुधारक — गोपाळ गणेश आगरकर


४) पुणे व नगर जिल्ह्यातील इ.स. 1875 मधील ‘दख्खन उठाव’ कोणाच्या विरोधात होता — सावकारांच्या विरोधात


५) असहकार ठराव कोणत्या अधिवेशनात मंजूर झाला — नागपूर अधिवेशन, इ.स. १९२०


६) ‘चले जाव’ ठराव कोणत्या दिवशी पारित झाला — ८ ऑगस्ट १९४२


७) गांधीजींचे आत्मचरित्र ‘माझे सत्याचे प्रयोग’ मूळतः कोणत्या भाषेत लिहिले आहे — गुजराती


८) ‘दीनबंधू’ वृत्तपत्र व बॉम्बे मिल असोसिएशनची स्थापना कोणी केली — नारायण मेघाजी लोखंडे


९) ‘हिंदू लेडी’ या नावाने लेखन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ती — डॉ. रखमाबाई राऊत


१०) सत्यशोधक समाजाची स्थापना — इ.स. १८७३, महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली

बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक (Multidimensional Poverty Index - MPI)

 

विकसन संस्था

➤ MPI हा ऑक्सफर्ड पोवर्टी अँड ह्यूमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (OPHI) या संस्थेने विकसित केला.


प्रकाशन व मोजमाप

➤ 2010 पासून UNDP (United Nations Development Programme) ने OPHI च्या सहकार्याने MPI मोजणे व प्रकाशित करणे सुरू केले.


MPI मोजण्यामागील उद्देश

➤ दारिद्र्य केवळ उत्पन्नावर मोजले जाऊ नये, तर जीवनातील विविध मूलभूत पैलूंचा विचार केला जावा.

➤ शिक्षण, आरोग्य व जीवनमान या तीन प्रमुख परिमाणांवर आधारित मापन.


मुख्य परिमाणे (Dimensions)

✅️ शिक्षण (Education)

➤ कुटुंबातील प्रौढ शिक्षणाचा स्तर

➤ मुलांचे शालेय उपस्थितीचे प्रमाण

✅️ आरोग्य (Health)

➤ बालमृत्यू दर

➤ पोषण स्थिती

✅️ जीवनमान (Living Standards)

➤ स्वच्छ स्वयंपाक इंधनाची उपलब्धता

➤ स्वच्छ पाणी व स्वच्छतागृह

➤ वीजपुरवठा

➤ घरातील रहिवासी स्थिती

➤ मालमत्तेची उपलब्धता


मोजण्याची पद्धत

➤ एखाद्या व्यक्ती/कुटुंबाला बहुआयामी गरीब मानले जाते, जर ते किमान 33% निर्देशकांमध्ये वंचित असतील.

महाधिवक्ता (कलम १६५) 🧑‍⚖️( ALL PYQ POINTS)

🔹️ राज्यपालांनी त्यांना संदर्भात केलेल्या अशा कायदेशीर बाबींवर ते राज्य सरकारला सल्ला देतात.

🔹️ राज्यपालांनी नेमून दिलेली कायदेशीर वैशिष्ट्ये असलेली इतर कर्तव्ये ते पार पाडतात.

🔹️ संविधान किंवा इतर कोणत्याही कायद्याने दिलेले कार्य ते पार पाडतात.

🔹️ राज्य शासनाला कायदेविषयक सल्ला देतात.

🔹️ राज्य विधिमंडळाच्या कामकाजात भाग घेतात.

🔹️ उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश नियुक्तीसाठी आवश्यक ती अर्हता त्यांच्याकडे असते.

🔹️ उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांप्रमाणे त्यांची नियुक्ती केली जाऊ शकते.

🔹️ ते राज्याचे सर्वोच्च कायदा अधिकारी असतात.

🔹️ राज्याच्या महाधिवक्ताची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ ते आपल्या पदाचा राजीनामा संबंधित राज्याच्या राज्यपालांकडे सादर करतात.

🔹️ त्यांना विधिमंडळ सदस्यांप्रमाणे विशेषाधिकार व संरक्षण मिळते.

🔹️ ते राज्य सरकारचे पूर्ण वेळ वकील नसतात.

🔹️ कार्यालयाबाबत राज्यघटनेत कोणतेही स्पष्ट तरतूद नाही.

🔹️ ते राज्याचे प्रथम कायदा अधिकारी (First Law Officer) असतात.

🔹️ ते राज्य शासनाचे सर्वोच्च कायदेविषयक सल्लागार असतात.

🔹️ जर दुसरा पक्ष राज्य नसेल तर त्यांना खाजगी वकिली करण्याचा अधिकार असतो.


🔸️ नियुक्ती व पात्रता 📝

🔹️ नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते.

🔹️ उच्च न्यायालयाचा न्यायाधीश होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती त्यांच्याकडे असणे बंधनकारक आहे.

🔹️ त्यांनी न्यायिक पदावर किमान १० वर्षे काम केलेले असावे.

🔹️ उच्च न्यायालयात किमान १० वर्षे वकिली केलेली असावी.


🔸️ संविधानातील संबंधित अनुच्छेद 📜

🔹️ अनुच्छेद १६५ ➤ राज्याच्या महाधिवक्त्यांचे अधिकार, विशेषाधिकार व कायदेशीर संरक्षण यासंदर्भात आहे.

🔹️ अनुच्छेद १७७ ➤ राज्य विधिमंडळाची सभागृहे व समित्या यामधील महाधिवक्त्यांच्या अधिकारांशी संबंधित आहे.

प्रश्न इतिहास - सिंधू संस्कृती

 १) 1921 साली सिंधू संस्कृतीचे पहिले स्थळ ‘हडप्पा’ कोणी शोधले, ज्यामुळे या संस्कृतीला ‘हडप्पा संस्कृती’ असे नाव दिले गेले?

➡️ दयाराम साहनी


 २) मोहेन्जोदारो हे सिंधू संस्कृतीचे आणखी एक महत्त्वाचे स्थळ आहे. ‘मोहेन्जोदारो’ या शब्दाचा अर्थ काय?

➡️ मृतांचे टेकाड (Mound of the dead)


 ३) मोहेन्जोदारो येथे उत्खननाचे कार्य 1922 साली राखलदास बॅनर्जी यांच्या देखरेखीखाली सुरू झाले. हे ठिकाण सध्या कुठे आहे?

➡️ लरकाना जिल्हा, सिंध प्रांत, पाकिस्तान


 ४) 1924 साली भारतीय पुरातत्त्व विभागाचे महासंचालक यांनी अधिकृतपणे सिंधू संस्कृती (कांस्ययुगीन संस्कृती) शोधल्याची घोषणा केली. त्या वेळी महासंचालक कोण होते?

➡️ सर जॉन मार्शल


 ५) हडप्पा संस्कृतीच्या कोणत्या स्थळी जे. एफ. मॅके यांनी 1927 ते 1931 या काळात आणि जी. ए. एफ. डेल्स यांनी 1963 साली उत्खननाचे कार्य केले?

➡️ मोहेन्जोदारो


 ६) आतापर्यंत सिंधू संस्कृतीची सुमारे 1500 स्थळे सापडली आहेत. यापैकी फक्त सातच स्थळे शहरे मानली गेली आहेत. ती सात शहरे कोणती?

➡️ हडप्पा, मोहेन्जोदारो, चन्हूदरो, लोथल, कालीबंगन, सुत्कागेंडोर आणि सुरकोटडा


 ७) मोहेन्जोदारोला “मृतांचे टेकाड” म्हटले जाते. राजस्थानातील कोणते स्थळाचा अर्थ “काळ्या बांगड्या” असा आहे?

➡️ कालीबंगन


 ८) सिंधू संस्कृतीच्या विस्तारामुळे हडप्पा आणि मोहेन्जोदारोला “विशाल साम्राज्याची जुळे राजधानी” असे कोणी संबोधले आहे?

➡️ स्टुअर्ट पिगॉट


 ९) मोहेन्जोदारोचे लोक कोणत्या वंशाशी संबंधित मानले जातात?

➡️ भूमध्यसागरीय वंश (Mediterranean race)


 १०) पाकिस्तानातील पंजाब प्रांतातील मॉन्टगोमेरी जिल्ह्यातील हडप्पा हे कोणत्या नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे?

➡️ रावी नदी


 ११) 1826 साली चार्ल्स मेसन यांनी हडप्पा टेकडीविषयी प्रथम माहिती दिली. तिच्या पूर्वेकडील टेकडीला “City Mound” म्हणतात. पश्चिमेकडील टेकडीला काय म्हणतात?

➡️ किल्ला टेकाड (Fort Mound)


 १२) हडप्पामध्ये सर्वसाधारण वस्तीच्या दक्षिणेकडे ‘Cemetery R-37’ नावाचा स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीत सापडलेला शवपेटी कोणत्या लाकडाची होती?

➡️ देवदार (Cedar)


 १३) हडप्पामध्ये धान्यागार किल्ल्याबाहेर सापडले आहे, तर मोहेन्जोदारोमध्ये ते किल्ल्याच्या आत आहे. कोणत्या स्थळावर दोन रांगांमध्ये सहा अशा 12 कक्षांचे धान्यागार सापडले?

➡️ हडप्पा


 १४) सिंधू संस्कृतीतील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता होता?

➡️ शेती


 १५) सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या पिकाच्या उत्पादनात निपुण होते?

➡️ कापूस


 १६) सिंधू संस्कृतीतील लोक कोणत्या प्रकारची लिपी वापरत होते?

➡️ चित्रलिपी (Pictograph)


 १७) सिंधू लिपीचे वाचन (deciphering) करण्याचा प्रयत्न कोणी केला?

➡️ डॉ. अस्को पर्पोला, एस. आर. राव, आय. महादेवन इत्यादी


 १८) हडप्पा संस्कृतीत कोणत्या प्रकारचे शासन होते?

➡️ धार्मिक शासन (Theocracy government)


 १९) हडप्पा संस्कृतीतील साधने आणि शस्त्रे मुख्यतः कोणत्या धातूंनी बनवलेली होती?

➡️ तांबे, कथील (टिन) आणि कांस्य (ब्रॉन्झ)

19 October 2025

चालू घडामोडी :- 18 ऑक्टोबर 2025


◆ भारताचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याची सप्टेंबर महिन्यासाठी 'ICC प्लेयर ऑफ द मंथ' म्हणून निवड करण्यात आली आहे.

◆ सप्टेंबर 2025 साठी ICC महिला प्लेअर ऑफ द मंथ हा पुरस्कार स्मृती मानधनाला मिळाला आहे.

◆ भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील 5वा 'समुद्र शक्ती 2025' नौदल सराव 14 ते 17 ऑक्टोबर 2025 या काळात विशाखापट्टणम येथे पार पडला.

◆ ए.आर. रहमान यांनी Google Cloud च्या सहकार्याने "Secret Mountain" - जगातील पहिला AI-आधारित Metahuman band लाँच केला.

◆ कर्नल मायकेल रँड्रियनरिना यांना मादागास्करचे संक्रमणकालीन अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) योजनेनुसार, 'गगनयान'चे पहिले मानवी उड्डाण 2024 मध्ये होणार आहे.

◆ खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्सची पाचवी आवृत्ती राजस्थान राज्यात होणार आहे. 

◆ 30 व्या वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेत मणिपूरने विजेतेपद पटकावले आणि पश्चिम बंगालला अंतिम सामन्यात हरवले. 

◆ कोचीचे पॅरा-ॲथलीट जोबी मॅथ्यू (भारत) यांनी कैरो येथे वर्ल्ड पॅरा पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक जिंकले.

◆ भारतीय वन्यजीव संरक्षण तज्ञ विवेक मेनन यांची आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघ (IUCN) च्या प्रजाती जगण्याच्या आयोगाचे (SSC) अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे.

◆ जसप्रीत बुमराह हा क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (टेस्ट, वनडे आणि टी20) किमान 50 सामने खेळणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज बनला आहे.

◆ जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा दिन (IDICH) दरवर्षी 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

◆ जागतिक अमूर्त सांस्कृतिक वारसा दिन 2025 ची थीम "आपत्ती आणि संघर्षांमुळे धोक्यात असलेला वारसा: तयारी आणि शिक्षण" ही आहे.

18 October 2025

चालू घडामोडी :- 17 ऑक्टोबर 2025



◆ वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) नुसार, भारतीय हवाई दल चीनला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली हवाई दल बनले आहे. 

◆ हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती ऊर्फ हुतोक्सी रिपोर्टर यांचे (वय 87) निधन झाले.

◆ गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) ला 14 ऑक्टोबर 2025 रोजी भारत सरकारने 'मिनी रत्न' दर्जा दिला आहे.

◆ भारताची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर (UNHRC) 2026-2028 या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध निवड झाली आहे.

◆ भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील नौदल द्विपक्षीय सराव (IN-RoKN) ची पहिली आवृत्ती दक्षिण कोरियातील बुसान नौदल तळावर आयोजित करण्यात आली होती.

◆ जागतिक आरोग्य संघटनेची 16वी वार्षिक बैठक - हर्बल मेडिसिनसाठी आंतरराष्ट्रीय नियामक सहकार्य (WHO-IRCH) ही इंडोनेशियातील जकार्ता येथे आयोजित करण्यात आली होती.

◆ पंतप्रधान विकास योजनेंतर्गत (PMJDV), अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने वारसा आणि अभिजात भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध विद्यापीठांमध्ये उत्कृष्टतेची केंद्रे स्थापन केली आहेत.

◆ भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) भूतान, नेपाळ आणि श्रीलंका या देशांमधील व्यक्ती आणि बँकांना भारतीय रुपयांमध्ये कर्ज देण्यास परवानगी दिली आहे.

◆ उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक विभागीय मुख्यालयात दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

◆ मेघालय सरकारने शिलाँगला 'भारताची फुटबॉल राजधानी' म्हणून स्थापित करण्यासाठी नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (NEUFC) या फुटबॉल क्लबसोबत तीन वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.

◆ जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारत 123 देशांपैकी 102 व्या क्रमांकावर आहे.

◆ दरवर्षी आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.

17 October 2025

संयुक्त गट "ब" आणि "क" पूर्व परीक्षा सराव चाचणी क्र.

 क्रिकेट बाँल ही खालीलपैकी कोणत्या फळाची जात आहे. ?

⚪️ दराक्ष 

⚪️ मोसंबी 

⚪️ डाळिंब

⚫️ चिकू ☑️


महाराष्ट्रात सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने .....जिल्ह्यात आढळतात..?

⚪️ सोलापूर 

⚫️ अहमदनगर ☑️

⚪️ जालना 

⚪️ अमरावती 



पर्यावरण व वने मंत्रालय तसेच केंद्रिय प्रदुषण नियंत्रण मंडळ यांच्या 2009 च्या अहवालानुसार महाराष्ट्रातील सर्वात प्रदुषित शहर कोणते. ?

⚪️ मबई 

⚪️ ठाणे

⚫️ चंद्रपूर ☑️

⚪️ नागपूर 



मुंबई बंदरावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी विकसित केलेले बंदर ....हे आहे. ?

⚪️ कांडला

⚪️ मार्मागोवा 

⚪️ हल्दीया 

⚫️ न्हावा-शेवा ☑️



 लोह व अँल्युमिनीयमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये जास्त असते. ?

⚪️ काळी मृदा 

⚪️ गाळाची मृदा 

⚫️ जांभी मृदा ☑️

⚪️ पिवळसर मृदा 



 खालीलपैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही. ?

⚪️ सांगली 

⚪️ सातारा 

⚫️ *रायगड ☑️*

⚪️ रत्नागिरी 



 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते. ?

⚪️ लोणावळा 

⚫️ चिखलदरा ☑️

⚪️ महाबळेश्वर 

⚪️ माथेरान 



पर्जन्यछायेचा प्रदेशामध्ये ...स्थान आहे. ?

⚪️ महाड 

⚫️ वाई ☑️

⚪️ महाबळेश्वर 

⚪️ नाशिक 



महाराष्ट्र राज्याची प्रशासकीय विभागात विभागणी झाली आहे. ?

⚫️ 6 ☑️

⚪️ 4

⚪️ 7

⚪️ 9 



 महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात अजिंठा-वेरुळ लेणी आहेत. ?

⚪️ पणे 

⚪️ अहमदनगर 

⚫️ औरंगाबाद ☑️

⚪️ लातूर


1) योग्य जोड्या जुळवा.


( अ ) आर्य समाज                               ( i ) स्वामी दयानंद सरस्वती 

( ब ) प्रार्थना समाज                             ( ii ) दादोबा पांडुरंग तर्खडकर 

( क ) डिप्रेस्ड क्लासेस मिशन              ( iii ) म. गो. रानडे 

( ड ) सामाजिक परिषद                       ( iv ) महर्षी विठ्ठल रामजी शिंदे 

                                                         \  ( v ) विष्णुशास्त्री पंडित


              अ    ब   क   ड

( 1 )        i     iv   ii    v 

( 2 )        iii   ii     i    iv 

( 3 )         v   ii    iv   iii 

( 4 )        i     ii    iv   iii ✔️


2) खालीलपैकी कोणते विधान बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल योग्य नाही ? 

( 1 ) त्यांचे शिक्षक त्यांना बाल बृहस्पती म्हणत.

( 2 ) ते जावरा संस्थानच्या नबाबाचे इंग्रजी शिक्षक होते.✔️

( 3 ) शुन्यलब्धी हा ग्रंथ त्यांनी लिहिला.

( 4 ) ते कुलाबा वेधशाळेचे संचालक होते.


3) खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने 'विद्यार्थी निधी' सुरू करून त्यात जमा झालेला पैसा डेक्कन एज्युकेशन सोसायटीला दिला ? 

( 1 ) महर्षी धोंडो केशव कर्वे ✔️

( 2 ) कर्मवीर भाऊराव पाटील 

( 3 ) पंजाबराव देशमुख 

( 4 ) गोपाळ गणेश आगरकर 


4) मानवधर्मसभेबाबत खालीलपैकी कोणते विधान खरे नाही ? 

( 1 ) मानवधर्मसभेची स्थापना 1844 मध्ये मुंबई येथे झाली. ✔️

( 2 ) मानवधर्मसभेच्या स्थापनेत दादोबा तर्खडकर , दुर्गादास मंछारा 

( 3 ) सभेचा प्रार्थना दिवस रविवार होता.

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर 


5) ------- ही महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी होती.

( 1 ) थ्रोस्टल मिल 

( 2 ) द ओरिएंटल स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी 

( 3 ) बॉम्बे युनायटेड स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी 

( 4 ) बॉम्बे स्पिनिंग अॅण्ड वीव्हिंग कंपनी ✔️


6) राजर्षी शाहू महाराजांनी क्षात्र जगदगुरु मठाधिपती म्हणून कोणाची नेमणूक केली ? 

( 1 ) सदाशिव लक्ष्मण पाटील ✔️

( 2 ) गणेश सुदामा पाटील 

( 3 ) वासुदेव जोशी 

( 4 ) माणिकचंद पाटील 


7) नाना पाटील यांनी कोणती सेना उभारून राष्ट्रीय क्रांतिकारी चळवळीत योगदान दिले ?

( 1 ) तुफानी सेना✔️ 

( 2 ) वानरसेना 

( 3 ) बहुजन सेना 

( 4 ) वरीलपैकी एकही नाही.


8) 'सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ हिंदू लीजन ' ही संस्था कोणी स्थापन केली ? 

( 1 ) सावरकर आणि अनंत कान्होरे

( 2 ) वासुदेव चाफेकर आणि दामोदर चाफेकर 

( 3 ) अनंत कान्हेरे आणि बाळकृष्ण चाफेकर 

( 4 ) दामोदर चाफेकर आणि बाळकृष्ण चाफेकर ✔️


9) योग्य जोड्या लावा.


( अ ) शिवाजी क्लब        i) नाशिक 

( ब ) आर्य बांधव समाज ii) पुणे 

( क ) चाफेकर क्लब      iii) वर्धा, नागपूर 

( ड ) मित्र मेळा             iv) कोल्हापूर 


           अ     ब   क    ड

( 1 )     i      ii    iii    iv

( 2 )     iv    iii   iii     i ✔️

( 3 )     ii     iv   iii     i

( 4 )     iii    iv    ii     i 


10) खालील वर्णन कोणाचे आहे ? 

त्यांनी आर्य महिला समाज, शारदा मुक्ती सदन, कृपा सदन इ . संस्था उभारल्या. त्यांना 'कैसर - ए - हिंद' ही पदवी देऊन गौरवले गेले. त्यांनी वैद्यकीय पुरवण्यासाठी लेडी डफरीन फंड उभारला.

 1 ) तर्खडकर भगिनी 

( 2 ) रमाबाई रानडे 

( 3 ) ताराबाई शिंदे 

( 4 ) पंडिता रमाबाई ✔️



1) हरिश्चंद्र - बालाघाट ' ही डोंगररांग कोणत्या दोन नद्यांची जल विभाजक आहे ?

( 1 ) तापी व नर्मदा 

( 2 ) गोदावरी व भीमा✔️

( 3 ) भीमा व कृष्णा 

( 4 ) तापी व गोदावरी


2) खालील विधाने पाहा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) विदर्भात पूर्वेकडून पश्चिमेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते.

( ब ) उत्तर कोकणात दक्षिण कोकणापेक्षा जास्त पाऊस पडतो.

( क ) गगनबावड्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात जास्त वार्षिक पावसाचे दिवस आहेत.


( 1 ) अ , ब बरोबर 

( 2 ) ब , क बरोबर

( 3 ) अ , क बरोबर ✔️

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर 


 3) जोड्या जुळवा.

      जिल्हा                निर्मिती

( अ ) लातूर       ( i ) 1 जुलै 1998 

( ब ) नंदुरबार    ( ii) 1 मे 1981 

( क ) हिंगोली    ( iii ) 16 ऑगस्ट 1982 

( ड ) सिंधुदुर्ग    ( iv ) 1 मे 1999


            ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )        iii      ii       i      iv

( 2 )        iii       i     iv       ii ✔️

( 3 )        iv       i      ii      iii

( 4 )        iii     iv       i       ii



4) योग्य जोड्या जुळवा.

                धरण                नदी 

( अ ) विल्सन बंधारा      ( i ) गोदावरी 

( ब ) विष्णुपुरी धरण।    ( ii ) येळवंडी 

( क ) भाटघर              ( iii ) मुठा 

( ड ) टेमघर                ( iv ) प्रवरा 


           ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )       ii      iii       i      iv

( 2 )       iv     iii       i      ii

( 3 )       iv      i       ii      iii✔️

( 4 )        i      iv      ii      iii 



5) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) आम्लीय मातीमध्ये कॅल्शियम , मॅग्नेशियमचे प्रमाण कमी व हायड्रोजनचे प्रमाण जास्त असते.

( ब ) आम्लीय मातीमध्ये सुधारणा करण्यासाठी जिप्समचा वापर केला जातो.


( 1 ) फक्त अ बरोबर ✔️

( 2 ) फक्त ब बरोबर 

( 3 ) दोन्ही बरोबर 

( 4 ) दोन्ही चूक 


6) खालील शिखरांचा उंचीनुसार चढ़ता क्रम लावा.

( अ ) त्र्यंबकेश्वर 

( ब ) हरिश्चंद्रगड 

( क ) महाबळेश्वर 

( ड ) सप्तशृंगी 

( इ ) राजगड


( 1 ) अ , इ , ड , ब , क ✔️

( 2 ) इ . अ , ड , क , ब 

( 3 ) अ , ड , इ , ब , क 

( 4 ) ड , अ , इ . ब , क  


7) खालील विधानांचा विचार करा आणि योग्य पर्याय निवडा.

( अ ) लोकसंख्येच्या घनतेबाबत महाराष्ट्र भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे.

( ब ) महाराष्ट्राची लोकसंख्या घनता 365 आहे.


( 1 ) दोन्ही विधाने बरोबर

( 2 ) दोन्ही चूक

( 3 ) फक्त अ बरोबर 

( 4 ) फक्त ब बरोबर ✔️


8) खालील वैशिष्ट्यांवरून वनांचा प्रकार ओळखा.

( अ ) या वनांना 'अल्लापल्ली' असेही म्हणतात.

( ब ) प्रामुख्याने गडचिरोली, चंद्रपूर भागात आढळतात.

( क ) आईन , किंडल , आवळा ही वृक्षे आढळतात.


( 1 ) उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वने ✔️

( 2 ) उष्ण कटिबंधीय निमसदाहरित वने 

( 3 ) उष्ण कटिबंधीय काटेरी वने 

( 4 ) उष्ण कटिबंधीय सदाहरित वने


 9) खालीलपैकी कोणत्या नद्या महाबळेश्वर येथून उगम पावतात ? 

( अ ) कृष्णा 

( ब ) सावित्री 

( क ) वेण्णा 

( ड ) गायत्री 

( इ ) कोयना 


( 1 ) अ , इ 

( 2 ) अ , क , इ

( 3 ) अ , ब , ड , इ 

( 4 ) वरीलपैकी सर्व✔️


10) जोड्या जुळवा.

      अभयारण्ये                   जिल्हा

( अ ) तुंगारेश्वर           ( i ) यवतमाळ 

( ब ) टिपेश्वर             ( ii ) रायगड 

( क ) नरनाळा          ( iii ) पालघर

( ड ) कर्नाळा           ( iv ) अकोला 


             ( अ ) ( ब ) ( क ) ( ड )

( 1 )         i       iii      ii      iv

( 2 )        iii       i       ii      iv

( 3 )        iii       i      iv       ii✔️

( 4 )        iv      iii      i        ii


1) आसियानसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य पर्याय निवडा.

( 1 ) आसियानचे 10 सदस्य देश आहेत .✔️ 

( 2 ) तिचे बोधवाक्य वन व्हिजन वन आयडेंटीटी वन कम्युनिटी ' आहे.

( 3 ) तिची स्थापना 1967 ला बैंकॉक जाहीरनाम्याने झाली,

( 4 ) सर्व विधाने बरोबर 


2) प्रवास आणि पर्यटन निर्देशांक ----- मार्फत जाहीर केला जातो.

( 1 ) डब्ल्यू इ.एफ.✔️

( 2 ) आयएमएफ 

( 3 ) वर्ल्ड बँक 

( 4 ) संयुक्त राष्ट्र 


3) वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलुक ------- प्रसिद्ध करते.

( 1 ) आयएमएफ✔️

( 2 ) यूएन

( 3 ) वर्ल्ड बैंक 

( 4 ) डब्ल्यूईएफ 


4) माराकेश करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.

( अ ) त्याचा संबंध दृष्टीहीन व्यक्तीशी व त्यांच्याशी संबंधित स्वामित्व हक्काच्या गोष्टी जसे की पुस्तक यासारख्या गोष्टींशी संबंधित आहे.

( ब ) भारत हा करार स्वीकारणारा प्रथम देश आहे. योग्य विधान / ने निवडा.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब

( 3 ) अ , ब दोन्ही✔️

( 4 ) यापैकी नाही.


5) गॅट्स् करारासंबंधी खालील विधानांचा विचार करा.

( अ ) क्रॉस - बॉर्डर पुरवठा : एका सदस्यांच्या प्रदेशातून दुसऱ्या सदस्यांच्या प्रांतात असलेला सेवा प्रवाह 

( ब ) परदेशात होणारी सेवा : एखादा ग्राहक सेवा घेण्यासाठी दुसऱ्या सदस्यांच्या प्रदेशात जातो.

( क ) व्यावसायिक उपस्थिती : एखाद्या सदस्याचा सेवा पुरवठादार क्षेत्रीय उपस्थिती स्थापित करतो.

( ड ) नैसर्गिक व्यक्तीची उपस्थिती : सेवेच्या पुरवठ्यासाठी एका सदस्याची व्यक्ती दुसऱ्या सदस्याच्या क्षेत्रात प्रवेश करते. वरीलपैकी योग्य विधाने ओळखा. 


( 1 ) अ , ब 

( 2 ) ब , क 

( 3 ) अ , ब , क 

( 4 ) वरीलपैकी सर्व✔️


6) खालील विधानांचा विचार करा व योग्य विधान / ने निवडा.

( अ ) फेरा कायदा 1973 मध्ये पहिल्यांदा संमत केला.

( ब ) भारत सरकारने फेरा कायदा फेमा कायद्याने बदलला.


( 1 ) फक्त अ

( 2 ) फक्त ब ✔️

( 3 ) अ , ब दोन्ही 

( 4 ) यापैकी नाही.


7) कृषी अनुदानासंबंधी खालील विधानांचा विचार करा व अयोग्य विधान / ने ओळखा.

( अ ) ब्ल्यू बॉक्स : - प्रत्यक्षात व्यापारावर काहीही परिणाम होत नाही,

( ब ) अॅम्बर बॉक्स : - व्यापारावर सर्वात जास्त परिणाम करतात.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब

( 3 ) अ , ब दोन्ही

( 4 ) यापैकी नाही✔️


8) भौगोलिक निर्देशांकासंबंधी खालील विधाने पहा व योग्य विधान / ने निवडा.

( अ ) एखाद्या वस्तूची विशिष्ट ठिकाणामुळे असणारी खासियत भौगोलिक निर्देशांक दर्शवितो.

( ब ) ओदिशाला अलिकडेच रसगुल्ल्यांसाठी भौगोलिक निर्देशांक मिळाला.


( 1 ) फक्त अ 

( 2 ) फक्त ब 

( 3 ) अ , ब दोन्ही ✔️

( 4 ) यापैकी नाही.


9) भारतातील उदारीकरणाच्या परिणामांसंबंधी खालील विधानांचा विचार करा व योग्य विधाने निवडा.

( अ ) कर कमी झाले.

( ब ) बाजार नियंत्रणमुक्त झाला.

( क ) गुंतवणुकदारास राजकीय गोष्टींचा धोका कमी झाला.


( 1 ) अ , ब 

( 2 ) ब , क

( 3 ) अ , क 

( 4 ) अ , ब , क ✔️


10) डंकेल मसुद्यावर भारताने कोणत्या दिवशी स्वाक्षरी केली ?

( 1 ) 15 एप्रिल 1993 

( 2 ) 15 जुलै 1993

( 3 ) 15 एप्रिल 1994✔️

( 4 ) 15 जुलै 1994


🔴 सरकारच्या जमा खर्चाच्या धोरणाला ...असे म्हणतात.


१) मोद्रिक धोरण.

२)राजकोषीय धोरण ✔️✔️

३)द्रव्य निर्मिती 

४) चलनविषयक धोरण

_____________________________


🟠 सटेनलेस स्टील हे कशाचे समिश्र आहे. 

१) लोखंड व कार्बन

२) लोखंड क्रोमियम व निकेल ✔️✔️

३) लोखंड क्रोमियम व कोबाल्ट

४) लोखंड टीन व कार्बन

_____________________________


🟡 गरुशिखर खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेच्या सर्वोच्च शिखर आहे.

 

१)छोटा नागपूर

२)अरवली ✔️✔️

३) मालवा

४) विध्य

_____________________________


🟢  खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी अंडी घालतो.

१) कांगारू 

२) पेग्विन

३) व्हेल

४) प्लॅटिपस ✔️✔️

_____________________________


🔵 पचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र कितवे राज्य आहे 

१)दुसरे

२)पाचवे

३)सातवे

४)नववे ✔️✔️

_____________________________

🟣  रक्तगटाचा शोध कोणी लावला

 

१) लॅडस्टयनर ✔️✔️

२)फुन्क

३)स्टेड

४)विल्यम हार्वे

_____________________________


⚫️........ या पदार्थाची विशिष्ट उष्माधरक्ता सर्वाधिक असते

१)पारा 

२) चांदी

३) पाणी ✔️✔️

४) लोखंड

_____________________________

🟤 भारतीय राष्ट्वादाचे जनक या‌ऺना म्हटले आहे.


१)सुरेंद्रनाथ बॅनर्जी  ✔️✔️

२) लोकमान्य टिळक

३) न्यायमूर्ती रानडे

४)म.गांधी

_____________________________


🔴....... मुळे दुधाचा रंग पांढरा असतो

१)ग्लुकोज

२) लक्टोज

३)रेनिन

४)केसिन ✔️✔️

_____________________________


🟣 वनस्पति किवा प्राणी यांचे आरंभीचे वय शोधण्यासाठी खालीलपैकी कोणता कार्बन आयसोटोप वापरतात.

१)सी -१४  ✔️✔️

२) सी -१३

३) सी -१२

४) यापैकी एकही नाही


 1) खालीलपैकी कोणत्या घटकाकडून प्रथिनांचे अमिनो आम्लात पचन होते ? 

( 1 ) अमायलेज 

( 2 ) ट्रिप्सिन ✔️

( 3 ) लायपेज पेप्सीन 

( 4 ) पेप्सीन


2) पियूषिका ग्रंथीसंदर्भात चुकीचे विधान ओळखा.

( 1 ) पियूषिका ग्रंथी ‘ मास्टर ग्रंथी ' म्हणून ओळखली जाते.

( 2 ) ही सर्वांत लहान अंतःस्रावी ग्रंथी आहे.

( 3 ) ही ग्रंथी मेंदूमध्ये वसलेली असते.

( 4 ) वरीलपैकी सर्व बरोबर ✔️


3) खालीलपैकी कोणत्या जीवनसत्त्वाला वार्धक्यविरोधी जीवनसत्त्व म्हणतात ? 

( 1 ) लॅक्टिक अॅसिड 

( 2 ) अॅस्कॉर्बिक ✔️

( 3 ) फॉर्मिक अॅसिड 

( 4 ) इथेनॉल 


4) खालीलपैकी कोणता पिष्टमय पदार्थ डायसँकेराईड आहे ? 

( 1 ) ग्लुकोज 

( 2 ) फ्रुक्टोज 

( 3 ) सुक्रोज ✔️

( 4 ) सेल्युलोज 


5) मानवी शरीरात जवळजवळ किती की.मी लांबीच्या रक्तवाहिन्या असतात ?

( 1 ) 10000 

( 2 ) 97000✔️

( 3 ) 98500

( 4 ) 98000


6) पेशींमधील ------ पेशीचे ऊर्जाकेंद्र म्हणतात. 

( 1 ) हरितलवक 

( 2 ) तंतूकणिका✔️

( 3 ) रायबोझोम्स  

( 4 ) लयकारिका


7) खालीलपैकी कोणती ग्रंथी सर्वांत मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे ? 

( 1 ) कंठग्रंथी ✔️

( 2 ) पियूषिका ग्रंथी 

( 3 ) लाळग्रंथी  

( 4 ) यकृत 


8) प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतींमधील कोणत्या भागात होते ? 

( 1 ) पाने

( 2 ) हिरवी खोडे 

( 3 ) थोड्या प्रमाणांत फुलांमध्ये 

( 4 ) वरीलपैकी सर्व ✔️


9) भारतीय आहारात व्हिटॅमिन - ए मुख्यत्वे ----- पासून मिळते.

( 1 ) फायटिन 

( 2 ) टँनिन

( 3 ) ऑक्सिटोसिन 

( 4 ) कँरोटीन ✔️


10) उत्क्रांतवादी दृष्टिकोनातून खालीलपैकी कोणता प्राणी माणसाशी साधर्म्य साधतो ? 

( 1 ) डॉल्फीन ✔️

( 2 ) उडणारा मासा 

( 3 ) शार्क 

( 4 ) कासव