13 June 2024

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫


❇️ सिक्कीम चे नवे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमाग

◾️पक्ष : सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा
◾️शपथ : 10 जून 2024 ला
◾️सलग 2 वेळा ते सिक्कीम चे मुख्यमंत्री बनले
◾️सिक्कीम चे गव्हर्नर : लक्ष्मण प्रसाद आचार्य ◾️यांनी त्यांना शपथ दिली
सिक्कीम विधानसभा जागा : 32
◾️त्यापैकी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा 31 जिंकल्या

❇️ RBI ने पेमेंट फसवणुकीचे धोके कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट्स इंटेलिजन्स प्लॅटफॉर्म स्थापन करण्यासाठी विविध पैलू तपासण्यासाठी समिती स्थापन केली
◾️नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे माजी MD आणि CEO श्री. AP होटा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे.
❇️ SEBI ला द एशियन बँकर तर्फे 'बेस्ट कंडक्ट ऑफ बिझनेस रेग्युलेटर' पुरस्काराने सन्मानित
◾️हाँगकाँग येथे आयोजित समारंभात सेबीचे पूर्णवेळ सदस्य कमलेश चंद्र वार्ष्णेय यांनी हा पुरस्कार स्वीकारला

❇️ संयुक्त राष्ट्र ने इजराईल देशाला काळ्या यादीत ( back list ) केलं आहे
◾️इजराईल आणि गाझा युद्धामुळे खूप लहान मुलांचा मृत्यु झाला आणि मानवाधिकारांचे उल्लंघन झाले
◾️त्यामुळं Black List केलं आहे
◾️Black list असलेले काही देश
⭐️हमास ,ISIS, अल कायदा या संघटना
⭐️इराक , म्यानमार , येमन, सोमालिया ,रशिया हे देश

❇️ पूजा तोमर UFC (Ultimate Fighting Championship) मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय ठरली
◾️तिने महिलांच्या स्ट्रॉवेट विभागात ब्राझीलच्या रायने डॉस सँटोसचा पराभव केला.
◾️ त्या उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरच्या बुढाना गावातील आहेत
◾️त्यांचं टोपण नाव The Cyclone

◾️NITI - National Institution for Transforming India
⭐️1 जानेवारी 2025 ला स्थापना
⭐️नीती आयोग अध्यक्ष : पंतप्रधान
⭐️नीती आयोग उपाध्यक्ष : श्री सुमन बेरी
⭐️नीती आयोग CEO : श्री BVR सुब्रह्मण्यम

❇️ नुकतेच झालेले काही मुख्यमंत्री लक्षात ठेवा
◾️मोहन चरण माझी : ओडीसा मुख्यमंत्री
◾️लालदुहोमा : मिझोराम मुख्यमंत्री
◾️भजनलाल शर्मा : राजयस्थान मुख्यमंत्री
◾️मध्यप्रदेश मुख्यमंत्री : मोहन यादव
◾️तेलंगणा मुख्यमंत्री : रेवंत रेड्डी

❇️ 2025 चा पुरुष ज्युनिअर हॉकी विश्वचषक स्पर्धा भारतात होणार आहे
◾️ आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने तशी घोषणा केली आहे
◾️अध्यक्ष : तैयब इकराम
◾️डिसेंबर 2025 ला स्पर्धा होतील
◾️2013 , 2016 ,2021 ला याचे आयोजन भारतात झाले होते

❇️ संत कवी थिरुमंगाई अलवार यांची  मूर्ती ब्रिटन मधून परत आणली जाणार आहे
◾️प्राचीन धातूची मूर्ती ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अश्मोलियन म्युझियममध्ये आहे
◾️ही 500 वर्षे जुनी मूर्ती आहे
◾️ह्याची उंची 60 cm आहे
◾️1967 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ मध्ये ही ठेवण्यात आली

❇️ ग्लोबल Gender Gap index 2024 मध्ये भारताचा 129 वा क्रमांक आहे
◾️वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ( WEF) ने प्रकाशित केला
◾️146 देशांचा अहवाल प्रसिद्ध
◾️पहिल्या 3 क्रमांकावर
1)आइसलँड
2) फिनलँड
3)नॉर्वे
◾️शेवटचा देश सुदान आहे ( 146 क्रमांक)

❇️ भारताचे नवीन आर्मी प्रमुख म्हणून लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी हे बनले आहे
◾️30 व्या क्रमांकाचे लष्कर प्रमुख असतील
◾️हे सध्या लष्कर उपप्रमुख आहेत
◾️लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी 30 जून ला पदभार स्वीकारतील
◾️15 डिसेंबर 1984 ला भारतीय सेनेमध्ये सामील झाले होते

❇️ भारतीय आर्मी
◾️स्थापना : 26 जानेवारी 1950
◾️मुख्यालय : दिल्ली
◾️सेना दिवस : 15 जानेवारी ला

🔖 याच्या Notes काढून ठेवा : VVIMP
◾️भारतीय सशस्त्र दलांचे कमांडर-इन-चीफ - द्रौपदी मुर्मु
◾️चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ :जनरल अनिल चौहान
◾️लष्कर प्रमुख :जनरल मनोज पांडे ( 30 जुन पर्यंत)
◾️लष्कर उपप्रमुख :उपेंद्र द्विवेदी ( 30 जून पर्यत)
◾️नौदल प्रमुख :दिनेश कुमार त्रिपाठी
◾️नौदल उपप्रमुख : कृष्ण स्वामीनाथन 
◾️हवाईदल प्रमुख: एअर मार्शल विवेक राम चौधरी
◾️वायुदल उपप्रमुख : अमरप्रीत सिंग
◾️भारतीय तटरक्षक दल चे प्रमुख : अशोक पाल
◾️ केंद्रीय दक्षता आयोग प्रमुख : प्रविण कुमार श्रीवास्तव
◾️CBI प्रमुख : प्रवीण सूद
◾️केंद्रीय माहिती आयोग अध्यक्ष :हीरालाल समरिया
◾️IB प्रमुख : तपण कुमार डेका
◾️RAW प्रमुख : रवी सिंह
◾️NIA प्रमुख : सदानंद वसंत दाते
◾️ED चे अध्यक्ष : राहुल नवीन

-------------------------------------------

महत्त्वाच्या आयोगांची माहिती :-

📚 UPSC (केंद्रीय लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- स्थापना: 1926
- संरचना: 1 अध्यक्ष + 10 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,

📚 MPSC (महाराष्ट्र लोकसेवा आयोग)

- कलम: 315
- संरचना: 1 अध्यक्ष + 6 सदस्य
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 62 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: कलम 317,

🗳️ CEC (मुख्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 324
- स्थापना: 26 जानेवारी 1950
- संरचना: 1 मुख्य निवडणूक आयुक्त + 2 निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

🗳️ SEC (राज्य निवडणूक आयुक्त)

- कलम: 243K/ZK
- संरचना: 1 राज्य निवडणूक आयुक्त
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: उच्च न्यायालयाचे न्यायाधीशाच्याप्रमाणे.

💰 CAG (महालेखा परीक्षक)

- कलम: 148
- स्थापना: 1858
- संरचना: 1 महालेखा परीक्षक
- कार्यकाल: 6 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशाप्रमाणे.

⚖️ Lokpal (लोकपाल)

- कायदा: लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम, 2013
- स्थापना: 2019
- संरचना: 1 अध्यक्ष + 8 सदस्य (4 न्यायिक + 4 गैर-न्यायिक)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.

⚖️ Lokayukta (लोकायुक्त)

- कायदा: राज्यस्तरीय कायदे
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1972-1980
- संरचना: 1 अध्यक्ष + 1 सदस्य (राज्यानुसार बदलतो)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यस्तरीय कायद्यानुसार सर्वोच्च न्यायालयाच्या/उच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राज्यापल

👥 NHRC (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: 1993
- संरचना: 1 अध्यक्ष + 12 सदस्य (2 न्यायिक + 3 निलंबित सदस्य + इतर)
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती.

👥 SHRC (राज्य मानवाधिकार आयोग)

- कायदा: मानवाधिकार संरक्षण अधिनियम, 1993
- स्थापना: विविध राज्यांमध्ये साधारणतः 1994-2001
- संरचना: 1 अध्यक्ष + 2 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे किंवा 70 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राज्यपाल
- काढून टाकण्याचा अधिकार: राज्यपाल सर्वोच्च न्यायालयाच्या सल्ल्यानुसार.

🕵️ CVC (केंद्रीय सतर्कता आयोग)

- कायदा: केंद्रीय सतर्कता आयोग अधिनियम, 2003
- स्थापना: 1964
- संरचना: 1 केंद्रीय सतर्कता आयुक्त + 2 सतर्कता आयुक्त
- कार्यकाल: 4 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार: सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीच्या आधारे राष्ट्रपती.

👨‍⚖️ CAT (केंद्रीय प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: प्रशासनिक न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1985
- संरचना: 1 अध्यक्ष + 65 सदस्य
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

👨‍⚖️  MAT (राज्य प्रशासनिक न्यायाधिकरण)

- कायदा: राज्य प्रशासकीय न्यायाधिकरण अधिनियम, 1985
- स्थापना: 1991
- संरचना: 1 अध्यक्ष + -- सदस्य (वाढवता येते)
- कार्यकाल: 5 वर्षे किंवा 65 वर्षे वयोमर्यादा
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

📰 PCI (प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया)

- कायदा: प्रेस कौन्सिल अधिनियम, 1978
- स्थापना: 1966
- संरचना: 1 अध्यक्ष + 28 सदस्य
- कार्यकाल: 3 वर्षे
- नियुक्ती अधिकारी: राष्ट्रपती
- काढून टाकण्याचा अधिकार:

11 June 2024

चालू घडामोडी :- 10 JUNE 2024

1) आंतरराष्ट्रिय दृष्टीदान दिवस 10 जून रोजी साजरा करण्यात येतो.

2) भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली.

3) अनुभवी स्पॅनिश खेळाडू 'कोर्लोस अल्काराझ' याने फ्रेंच ओपन 2024 (पुरुष एकेरी) विजेतेपद पटकावले आहे.

4) ICC T-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव केला आहे.

5) भारताचा युवा टेनिसपटू 'सुमित नागल' याने 'हेलब्रोनर नेकरकप स्पर्धा' जिंकली आहे.

6) भारतीय तिरंदाज कुमुद सैनीने तिरंदाजी आशिया कप 2024 स्टेज 3 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

7) 09 जून रोजी जगभरात 'आंतरराष्ट्रीय अभिलेखागार दिन' साजरा करण्यात आला.

8) 'समीर बन्सल' हे PNB MetLife India Insurance चे MD आणि CEO बनले आहेत.

9) ज्येष्ठ टेनिस प्रशिक्षक 'नरसिंग' यांची 'दिलीप बोस जीवनगौरव पुरस्कार'साठी नामांकन करण्यात आले आहे.

10) नरेंद्र मोदी यांनी भारताच्या पंतप्रधान पदी तिसऱ्यांदा शपथ घेतली.

11) राष्ट्रपती द्रोपद्री मुर्मु यांनी 72 मंत्र्यांना शपथ दिली आहे.

12) नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू नंतर भारताच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेणारे दुसरे नेते ठरले आहे.

13) सोफिया फिरडौस या ओडिशा राज्याच्या पहिल्या मुस्लिम खासदार ठरल्या आहेत.

14) युनिसेफ च्या अहवालानुसार जगात अफगाणिस्तान या देशात कुपोषित मुलाचे प्रमाण सर्वाधिक आहे.

15) भारत देशात 40 टक्के कुपोषण आढळून आले आहे.

16) UNICEF संस्थेने चाईल्ड न्यूट्रिशन रिपोर्ट 2024 जारी केला आहे.

17) नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या पंतप्रधान पदाच्या शपथ विधीला सात देशांचे नेते उपस्थित होते.

18) फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा 2024 च्या महिला एकेरीचे विजेतेपद इगा स्वीयातेक हिने पटकावले आहे.

19) पोलंड देशाची टेनिस पटू इगा स्वीयातेक हीने फ्रेंच ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.

20) भारताच्या अंशू मलिक आणि अंतिम पंघाल यांनी बुडापेस्ट आंतरराष्ट्रिय मानांकन कुस्ती स्पर्धेत रौप्य पदक पटकावले आहे.

21) केंद्रीय निवडणुक आयोगाच्या आकडेवारीनुसार 18 व्या लोकसभेत आसाम राज्यात सर्वाधिक मतदान झाले आहे.

22) भारत सरकारच्या नवीन मंत्री मंडळामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांना स्थान मिळाले आहे.

23) पाकिस्तान या देशाची संयुक्त राष्ट्र परिषदेच्या अस्थायी सदस्य म्हणून निवड झाली आहे.

24) ESIC कर्मचारी राज्य विमा मंडळ च्या Additional D irector genral पदी कमल किशोर सोन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

10 June 2024

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्या वेळी घेतली पंतप्रधान पदाची शपथ

▪️ शपथ - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी दिली.
▪️ स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आहेत.

🫂 शपथविधी ला उपस्थित असलेले विदेशी लोक

🇧🇩 बांग्लादेश च्या प्रधानमंत्री - शेख हसीना
🇱🇰 श्रीलंका चे राष्ट्रपति - रानिल विक्रमसिंघे
🇧🇹 भूटान चे प्रधानमंत्री - शेरिंग तोबगे
🇳🇵 नेपाल चे प्रधानमंत्री - पुष्प कमल दहल
🇲🇺 मॉरीशस चे प्रधानमंत्री - प्रविंद जगन्नाथ
🇲🇻 मालदीव चे - राष्ट्रपति मुइज्जू

✒️ पंतप्रधान पद आणि संविधान तरतुदी

▪️ कलम 75 - पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपतींच्या द्वारे केली जाते.
▪️ कलम 74(1) - राष्ट्रपतींना सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असते.
▪️ शपथ कशी असवी हे अनुसूचित 3 मध्ये सांगितले आहे.
▪️ मंत्र्यांची संख्या 15% पेक्षा जास्त असणार नाही - म्हणजे 543 चे 15% = 81 पर्यंत मंत्र्यांची संख्या असते

⏰ पंतप्रधान आणि त्यांची वर्षे

▪️ सर्वात जास्त काळ राहिलेले पंतप्रधान - जवाहरलाल नेहरू (16 वर्षे 286 दिवस )
▪️ पहिले काळजीवाहू पंतप्रधान - गुलझारीलाल नंदा
▪️ पहिल्या महिला पंतप्रधान - इंधिरा गांधी
▪️ सर्वात जास्त वय असलेले पंतप्रधान - मोरारजी देसाई
▪️ राजीनामा देणारे पहिले पंतप्रधान - मोरारजी देसाई
▪️ सर्वात कमी वय असलेले पंतप्रधान - राजीव गांधी
▪️ कधीही संसदेला सामोरे न गेलेले पंतप्रधान - चौधरी चरणसिंग ( पाठिंबा काढला इंदिरा नेहरूंनी )
▪️ सर्वात कमी काळ राहिलेले पंतप्रधान - अटलबिहारी वाजपेयी
▪️ तिसऱ्यांदा शपथ घेणारे गैर काँग्रेसचे नेते - नरेंद्र मोदी

चालू घडामोडी :- 09 JUNE 2024

1) दरवर्षी 09 जून रोजी जगभरात 'जागतिक मान्यता दिन' (हिंदीमध्ये जागतिक मान्यता दिन) साजरा केला जातो.

2) दरवर्षी 09 जून रोजी प्रवाळाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी 'कोरल ट्रॅगल डे' साजरा केला जातो.

3) प्रवाळ त्रिकोण दिन सर्वप्रथम 09 जून 2012 रोजी साजरा करण्यात आला.

4) ईनाडू ग्रुपचे संस्थापक आणि ज्येष्ठ मीडिया व्यक्तिमत्व रामोजी राव यांचे वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले.

5) पेंटब्रश आर्ट कम्युनिटी, भारतीय प्रवासी कलाकारांच्या गटाने संयुक्त अरब अमिराती (UAE) मध्ये 'रेट्रो रिव्हायव्हल' नावाचे प्रदर्शन आयोजित केले आहे.

6) नवीनतम QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रैंकिंग 2025 नुसार, IIT खरगपूर ही देशातील चौथी सर्वोत्तम उच्च शिक्षण संस्था बनली आहे.

7) गॅम्बियन सिव्हिल सर्व्हट्ससाठी चौथा मिड-करिअर प्रशिक्षण कार्यक्रम 'नवी दिल्ली' येथे यशस्वीरित्या संपन्न झाला.

8) युनायटेड नेशन्स (UN) ने सशस्त्र संघर्षांदरम्यान मुलांवर गुन्हे करणाऱ्या देशांच्या 'लाजरी यादी'मध्ये इस्रायल आणि हमासचा समावेश केला आहे.

9) बिस्लेरी लिमोनाटाने बॉलीवूड अभिनेता आदित्य रॉय कपूर यांची पहिला ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे.

10) कॅनडाचे माजी पंतप्रधान विल्यम लिऑन मेकेन्झी किंग हे सर्वाधिक काळ (21 वर्षे, 154 दिवस) सत्तेवर राहणारे जागतिक नेते आहेत.

11) जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) दिलेल्या माहितीनुसार बर्ड फ्लूमुळे जगातील पहिला मानवी बळी (मृत्यू) मेक्सिकोमध्ये झाला आहे.

12) रामोजी राव यांनी 1984 मध्ये चित्रपटांची निर्मिती सुरू केली.

13) रामोजी राव यांना 2000 मध्ये 'नुवी कवळी' चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

14) जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ संकुल म्हणून 'रामोजी फिल्म सिटी'ची 'गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे.

15) उत्तर प्रदेशा ची पूजा तोमर UFC मध्ये बाउट जिंकणारी पहिली भारतीय बनली आहे.

16) पूजाने तोमरने 2012 पासून MMA फायटिंगला सुरुवात केली होती.

17) भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स या पहिल्या क्रू मिशनमध्ये बोईंग स्टारलाइनरमधून अंतराळात उड्डाण करणारी पहिली महिला ठरली आहे.

18) भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नासाच्या स्टारलाइनर मोहिमे अंतर्गत तिसऱ्यांदा अंतराळात पोहचल्या आहेत.

19) सुनीता विल्यम्स यांनी सर्वप्रथम श्री गणेशाची मूर्ती आणि भगवद्गीता अंतराळात नेली आहे.

आयोग व त्यांचे अध्यक्ष:

✅राष्ट्रीय मानवी हक्क आयोग:

स्थापना: 12 oct 1993

1ले अध्यक्ष: न्या. रंगनाथ मिना

सध्याचे अध्यक्ष: अरूण कुमार मिश्रा


✅महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग: 

स्थापना: 6 मार्च 2001

1ले अध्यक्ष: न्या. अरविंद सावंत

सध्याचे अध्यक्ष: कमलकिशोर ताटेड


✅राष्ट्रीय महिला आयोग:

स्थापना: 31 जाने 1992

1ले अध्यक्ष: जयंती पटनायक

सध्याचे अध्यक्ष: रेखा शर्मा


✅महा- राज्य महिला आयोग:

स्थापना: 28 जाने 1993

सध्याचे अध्यक्ष: रुपाली चाकणकर


✅राष्ट्रीय माहिती आयोग:

स्थापना: 12 0ct 2005

1 ले अध्यक्ष: बजाहत हबीबुल्ला

सध्याचे अध्यक्ष: हिराला समरिया


✅महा राज्य माहिती आयोग:

स्थापना: 2 मार्च 2006

सध्याचे अध्यक्ष: सुमित मलिक 


✅ केंद्रीय निवडणुक आयोग:

स्थापना: 25 जाने 1950

सध्याचे अध्यक्ष: राजीव कुमार (25 वे)


✅महा-राज्य निवडणुक आयोग:

स्थापना: 26 एप्रिल 1994

सध्याचे अध्यक्ष: UPS मदान 


✅निती आयोग:

स्थापना: 1 जाने 2015

1ले अध्यक्ष: नरेंद्र मोदी (पंतप्रधान पदसिद्ध अध्यक्ष)


✅राष्ट्रीय बालहक्क आयोग: 

स्थापना: मार्च 5 2007

1ले अध्यक्ष: शांता सिन्हा

सध्याचे अध्यक्ष: प्रियांक कानुनगो

महिलांच्या साठी विविध राज्यात असलेल्या महत्त्वाच्या योजना

 ✅कर्नाटक राज्य :- 

⭐️गृहलक्ष्मी योजना  : कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा 2000 रुपयांची निधी


✅तमिळनाडू राज्य  :-

⭐️कलैग्नार मगलीर उरीमाई थित्तम योजना  : कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा 1000 रुपये


✅आंध्र प्रदेश राज्य :

⭐️अम्मा वोडी योजना : शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी 15000 रुपये , 45 ते 60 वयोगटातील महिलांना दरवर्षी 18500 रुपये


✅उत्तर प्रदेश राज्य :- 

⭐️कन्या सुमंगला योजना : प्रत्येक मुलीला जन्मापासून शिक्षणापर्यंत खर्चासाठी 25000 रुपये


✅मध्य प्रदेश राज्य 

⭐️लाडली बहना योजना  : 1.3 कोटी महिलांना दरमहा प्रत्येकी 1,250 रुपये


✅पश्चिम बंगाल 

⭐️लक्ष्मीर भंडार : अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील रुपये महिलांना दरमहा 1000 रुपये

⭐️कन्याश्री प्रकल्प : 13 ते 18 या वयोगटातील शाळा तसेच कॉलेजात जाणाऱ्या मुलींना दरवर्षी 1000 रुपये

⭐️रूपश्री प्रकल्प: लग्नासाठी मुलीला एकदाच 25000 रुपयांचे अनुदान


📌कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा, दिल्ली या राज्यांनी महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिली जाते.

📌महाराष्ट्रात महिलांना एसटीच्या प्रवासात 50% सवलत दिली जाते


जिल्हाधिकारी

– जिल्हा हा प्राचीन कालखंडापासून महत्वाचा घटक मानला जातो.  जिल्हा पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली जिल्ह्याचा संपूर्ण कारभार चालतो.

– रॅम्से मॅकडोनाल्ड यांच्या मते ” जिल्हाधिकारी असे कासव आहे ज्याच्या पाठीवर भारत सरकाररूपी हत्ती उभा आहे”. जिल्हाधिकारी या पदाचा वेगवेगळ्या कालखंडामध्ये विकास होत गेला आहे.

कालखंड                           जिल्हाधिकाऱ्यांचे नाव

मौर्य कालखंड                      राजुका

गुप्त कालखंड                      वीसयापती

मोगल कालखंड                    अमीर / अमल गुजर

ब्रिटीश कालखंड                   जिल्हाधिकारी


भारतामध्ये जिल्हाधिकारी हे पद १४ मे १७७२ रोजी वॊरन हेस्टींगंज यांनी निर्माण केले. ( महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे )

– १७८७ मध्ये लॉर्ड कॉर्नवालिस यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायदानाची वदंडाधिकाऱ्याची कामे सोपविली.

– सुरवातीला जिल्हा धिकारी होण्यासाठी ( ICS- Indian Civil Services ) परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक होते.

– भारतामध्ये १९४६ ला ICS सेवेचे रूपांतर IAS सेवेमध्ये करण्यात आले.

– सुरेंद्रनाथ बेनर्जी हे भारतातील पहिले ICS  परीक्षा उत्तीर्ण व्यक्ती होय. 

– सत्येंद्रनाथ टागोर हे भारतातील पहिले ICS अधिकारी होय. 

– ICS परीक्षेमध्ये भारतीय लोकांचा सहभाग वदावा यासाठी ‘ली कमिशनच्या‘ शिफारशीच्या आधारावर भारतामध्ये १९२६ ला सांघिक लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली ( UPSC ).

– स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सांघिक लोकसेवा आयोगाचे रूपांतर केंद्रीय लोकसेवा आयोग असे करण्यात आले व भारतीय राज्यघटनेचा कलम ३१५ मध्ये तरतूद करण्यात आली.

– जिल्हाधिकारी हा जिल्हा प्रशासनाचा सर्वोच्च प्रमुख असतो. तसेच भारतीय प्रशासन सेवेतील IAS दर्जाचा वरिष्ठ अधिकारी असतो.

– महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ७ (१) नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हाधिकारी असतो.

पात्रता                    पदवीधर असावा

निवड                     केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे

नेमणूक                   राज्य शासन

दर्जा                       IAS चा

कार्यक्षेत्रे                  जिल्हास्तर

वेतन व भत्ते              राज्य शासन

कार्यकाळ                 ३ वर्ष ( ३ वर्षानंतर बदली )

नियंत्रण                   विभागीय आयुक्त

रजा                       राज्य शासन

राजीनामा                 राज्य शासन

बडतर्फी                  केंद्र शासनाच्यावतीने


महाराष्ट्र पोलिस भरती-प्रश्नमंजुषा

'तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन' हे कोणी म्हंटले ?*

A) सुभाष चंद्र बोस ✅✅
B) नारायण गुरु 
C) सुखदेव 
D) भगत सिंग

♻️♻️ *सत्यशोधक समाजाचे मुखपत्र कोणते होते ?*

A) सुधाकर  
B) केसरी 
C) दीनबंधु ✅✅
D) प्रभाकर

♻️♻️ *महात्मा फुले यांनी कोणते पुस्तक लिहिले नाही ?* 
A) गुलामगिरी 
B) जातीचा उच्छेद ✅✅
C)  शेतक-यांचा आसूड 
D) ब्राह्मणांचे कसब

♻️♻️ *कोणती नदी अरबी समुद्राला मिळते ?*

A) तापी ✅✅
B) कावेरी 
C) महानदी 
D) कृष्णा

*महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो ?*

A) औष्णिक विद्युत ऊर्जा ✅✅
B) आण्विक ऊर्जा  
C) जल विद्युत ऊर्जा 
D) यापैकी नाही

♻️♻️ *पुण्याचे प्लेग कमिश्नर रैंड यांची 1893 मध्ये _________ याने हत्या केली. *

A) दामोदर हरि चाफेकर ✅✅
B) वासुदेव बळवंत फडके 
C) उस्ताद लहुजी मांग 
D) अनंत कान्हेरे 

♻️♻️ *मुस्लिम लीगची स्थापना कोठे झाली ?*

A) ढाका ✅✅
B) कोलकाता 
C) चितगांव 
D) मुर्शिदाबाद

♻️♻️ *बंगालची फाळणी कोणत्या गव्हर्नर जनरलने केली ?*

A) लॉर्ड रिपन 
B) लॉर्ड डफरीन 
C) लॉर्ड डलहौसी 
D) लॉर्ड कर्झन ✅✅

♻️♻️ *बार्डोलीचा सत्याग्रह ___________ यांच्या नेतृत्त्वाखाली झाला. *

A) सरदार पटेल ✅✅
B) म. गांधी  
C) विनोबा भावे 
D) महादेव देसाई

♻️♻️ महाराष्ट्रातील आद्य क्रान्तिकारक कोण होते ?

A) राजाराम मोहन रॉय 
B) दादाभाई नौरोजी 
C) वि. दा. सावरकर 
D) वासुदेव बळवंत फडके ✅✅

१. खालीलपैकी कोणत्या समितीचा कार्यविषयक 'पंचायतराज संस्था' हा होता ?
अ) जी. व्ही. के. राव समिती
ब) लळा सुंदरम समिती
क) अशोक मेहता समिती ✅✅
ड) व्ही.कृष्णमेनंन समिती

२) चंद्र पृथ्वीपासून खूप अंतरावर असतांना सूर्यग्रहण झाले तर अशे ग्रहण ..........असेल?
१) खग्रास
२) खंडग्रास
३) कंकनाकृती ✅✅
४) यापैकी नाही

३) केंद्र शासनाने अतिमागास म्हणून जाहीर केलेली 'माडिया गोंड'ही जगात प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळते ?
१) सिंधुदुर्ग
२) चंद्रपूर ✅✅
३) गोंदिया
४) रायगड

४) खालीलपैकी कोणत्या राष्ट्राचा आपणास मिळणाऱ्या परकीय मदतीत आजही सर्वाधिक हिस्सा आहे ?
१) रशिया
२) जपान
३) ब्रिटन
४)अमेरिका ✅✅

५) 'मुंबई बेट'ही इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स ..........
१) याने पोर्तुगीजांकडू जिंकून घेतले.
२) याने मोघलांकडून जिंकून घेतले.
३) यांच्यामते इंग्लंडहून सुंदर शहर होते
४) याला त्याच्या विवाहप्रसंगी पोर्तुगीजांनी आंदण दिले. ✅✅

६) 'ग्रँड ट्रॅक' हा राष्ट्रीय महामार्ग या दोन शहरांना जोडतो.
१) कोलकत्ता : अमृतसर  ✅✅
२) मुंबई : दिल्ली
३) मुंबई : कोलकत्ता
४) कोलकत्ता : चेन्नई

७) अग्निकंकण उर्फ 'रिंग ऑफ फायर'खालीलपैकी कोणत्या घटकांशी संबंधीत आहे
अ) भूकंपप्रवण क्षेत्र
ब) ज्वालामुखी उद्रेकाचे क्षेत्र
क) प्रशांत महासागराभोवतीचा भाग

१) फक्त अ,ब व क ✅✅
२) फक्त ब व क
३) फक्त ब व अ
४) अ ते क

८) 'रिंट ऑफ व्हेबिअस कॉपर्स' व 'रिंट ऑफ मॅडामस' हे कोणत्या मूलभूत हक्कांशी संबंधीत आहेत
१) संपत्तीचा हक्क
२) धर्मस्वातंत्र्याचा हक्क
३) स्वातंत्र्याचा हक्क
४) घटनात्मक दाद मागण्याचा हक्क ✅✅

९) खालीलपैकी कोणती कलमे राष्ट्रीपतीच्या आणीबाणीच्या अधिकाराशी संबंधीत आहेत?
१) ३५२,३५६,३६० ✅✅
२) १६३,१६४,१६५
३) ३६७,३६८,३६९
४) ३६९,३७०,३७१

10) भारताच्या घटना समितीचे पहिले अधिवेशन ९ डिसेंबर,१९४६ रोजी दिल्ली येथे भरले होते.या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले  होते?                                १) डॉ. राजेंद्रप्रसाद
२) हृदयनाथ कुंझरू
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर
४) डॉ. सच्चिदानंद सिन्हा✅✅

११) विधानपरिषदेच्या एकूण सदस्यांपैकी किती सदस्य शिक्षक मतदारसंघाकडून निवडून दिले जाते?
१) एक-पप्ष्टांश
२) एक-बारांश ✅✅
३) एक-पंचमाश
४) एक-तृतीयांश

१२) दादाभाई नौरोजीनी आपला सुप्रसिद्ध 'वहन सिद्धांत' (Drain Theory) आपल्या ..........ग्रंथात मांडला आहे .
१)पाँव्हार्टी इन इंडिया
२) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल इन इंडिया ✅✅
३) पाँव्हार्टी अँड अन् ब्रिटिश रुल
४) ब्रेन ड्रेन ड्युरिंग ब्रिटिश पिरिअड

१३) गंगा नदी येथे बंगालच्या उपसागरास मिळते तेथे गंगेच्या मुखाशी गाळ साचून ........या नावाने बेट तयार झाले आहे
१) सुंदरबन
२) प्रयाग
3) न्यू-मूर ✅✅
४) कोलकात्ता

१४) संगणकामधील फ्लॉपी डिस्क म्हणजे........होय.
१) माहिती एकत्र करणारी यंत्रणा
२) केंद्रीय मेमरी
३) एक सॉफ्टवेअर
४) माहिती साठवण्याचे एक साधन ✅✅

१५) 'P'हा 'K'चा भाऊ आहे .'S'हा 'P' चा मुलगा आहे .'T'ही 'K'ची मुलगी आहे .'E'आणि 'K'परस्पर बहिणी आहेत; तर 'E'che 'T'शी नाते काय?
१) आत्या
२) मावशी ✅✅
३) मामी
४) बहीण

"Economics of public and private helth care And health insurance in india"  या पुस्तकाचे लेखक कोण आहेत.?

उत्तर: ब्रिजेश पुरोहित

◾️1]शरीरातील एकूण पेशींच्या प्रकाराची संख्या किती?
1) ३६९
2) ५४७
3) ६३९ ✅✅✅
4) ९१२

2] धान्यासाठा टिकविण्यासाठी कोणते औषध वापरतात?

1) सोडियम क्लोरेट ✅✅✅
2) मायका
3) मोरचुद
4) कॉपर टिन

3]  जर एखादी वस्तू एकसमान वेगाने जात असेल, तर

1)  त्या वस्तूची चाल सारखी राहते व दिशा बदलते .
2) त्या वस्तूची चाल व दिशा बदलतात .
3) त्या वस्तूची चाल व दिशा सारखी राहते .
4) त्या वस्तूची चाल बदलते,पण दिशा तीच राहते.✅✅✅

4] रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?

1) तीन  ✅✅✅
2) दोन
3) चार
4) सहा

5] मोडआलेल्या धान्यास आणि आंबविलेल्या अन्नपदार्थात खालीलपैकी कोणते जीवनसत्व विपूल प्रमाणात तयार होते?

1)  अ
2) ब ✅✅✅
3) ड
4) ई

6]  खालीलपैकी कोणते गतीज ऊर्जेचे उदाहरण आहे?

1)  सायकल
2) रेल्वे
3) जहाज
4) वरिल सर्व ✅✅✅

7] २३५२ डेसि मीटर = किती हेक्टोमीटर?

1)  २३.५२

 2) २३५.२

3) २३०.५२

4) २.३५२ ✅✅✅

8]  त्वरण म्हणजे ................... मधील बदलाचा दर होय.

1) वेग ✅✅✅
2) अंतर
3) चाल
4) विस्थापन

9] होकायंत्रात .............. चुंबक वापरतात.

1)  निकेल
2) रबर
3) रबर
4) सूची✅✅✅

10]   हॅड्रोजन आणि ----------HB - या वायूच्या संयोगामुळे पाणी तयार होते?

1)  ऑक्सीजन ✅✅✅
2) नायट्रोजन
3) कार्बनडाय ऑक्साईड
4) हेलियम

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

कोणत्या  गव्हर्नर  जनरलनि  इनाम  कमिशन  1828  ला  नेमले .

A) लॉर्ड  विलियम बेंटिक ✅✅
B) लॉर्ड  हेस्टिंग्स
C) लॉर्ड  वेलस्ली
D) लॉर्ड मेयो
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



बॉम्बे  ठाणे  रेल्वे  कोणत्या  वर्षी  सुरु  झाली.

A) 1852
B) 1853✅✅
C) 1854
D) 1855
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



इ. स .  1848 ते  1856 या   काळात  अनेक  संस्थाने  कोणी  खालसा  केली.

A) लॉर्ड  रिपन
B) लॉर्ड  विलियम  बेंटिक
C) लॉर्ड कॉर्नवालिस
D) लॉर्ड  डलहौसी ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



इ. स. 1800 मध्ये कोणी  हिंदी  लोकांसाठी  कलकत्ता येथे  फोर्ट  विलियम  महाविद्यालयाची  स्थापना  केली.

A) लॉर्ड  मेकॅले
B) लॉर्ड  बेंटिक
C) लॉर्ड  वेलस्ली ✅✅
D) लॉर्ड  डलहौसी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



शासकीय  कर्मचाऱ्यावर   राष्ट्रीय  काँग्रेसशी  संबंध  ठेवण्यास कोणी  बंदी  घातली.

A) लॉर्ड  कर्झन
B) लॉर्ड  डफरीन ✅✅
C) लॉर्ड रिपन
D) ए.  ओ.  ह्यूम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा करण्यात येतो.?

19 जुलै
29 जुलै ✅✅
30 जून
30 जुलै

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कारगिल विजय दिवस भारतीय भुदलाच्या कोणत्या विजयी मोहीमेच्या स्मृतीत पाळला जातो?

(A) ऑपरेशन कॅक्टस
(B) ऑपरेशन पवन
(C) ऑपरेशन विजय ✅✅
(D) ऑपरेशन ब्लॅक टोरनॅडो

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या संस्थेनी ‘उन्नत भारत अभियान’साठी TRIFED सोबत सामंजस्य करार केला?

(A) भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
(B) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास
(D) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या राज्यात चौथ्या खेलो इंडिया युवा क्रिडा स्पर्धेचे आयोजन केले जाणार?

(A) हरयाणा✅✅
(B) राजस्थान
(C) उत्तरप्रदेश
(D) मध्यप्रदेश

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणाची वेस्टर्न एअर कमांडच्या प्रमुखपदी नेमणूक झाली?

(A) एअर मार्शल विवेक राम चौधरी✅✅
(B) एअर मार्शल व्ही. आर. चौधरी
(C) एअर मार्शल बी. सुरेश
(D) एअर मार्शल आय. पी. विपिन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या सार्वजनिक संस्थेनी स्मार्ट ग्रिड तंत्रज्ञान क्षेत्रात प्रशिक्षण, संशोधन आणि उद्योजकता विकास यासाठी IIT कानपूर या संस्थेसोबत सामंजस्य करार केला?

(A) भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड
(B) नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन
(C) पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन✅✅✅
(D) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या देशाने पारंपरिक औषधी आणि होमिओपथी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्यासाठी भारतासोबत सामंजस्य करार केला?

(A) केनिया
(B) झिम्बाब्वे✅✅
(C) मोझांबिक
(D) मलावी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या देशाने अॅंटीमायक्रोबियल रेझिस्टन्स विषयक संशोधनासाठी भारतासोबत करार केला?

(A) ब्रिटन✅✅✅
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) स्पेन
(D) कॅनडा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणाला भूशास्त्र मंत्रालयाकडून ‘जीवनगौरव उत्कृष्ठता पुरस्कार 2020’ने सन्मानित करण्यात आले आहे?

(A) अशोक साहनी✅✅
(B) डॉ. एस. एस. बाबू
(C) जे. के. भट्टाचार्य
(D) टी. चक्रवर्ती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या राज्यात / केंद्रशासित प्रदेशात पवन हंस या कंपनीने उडान योजनेच्या अंतर्गत प्रथम हेलिकॉप्टर सेवेचा शुभारंभ केला?

(A) हिमाचल प्रदेश
(B) जम्मू व काश्मीर
(C) सिक्किम
(D) उत्तराखंड✅✅


1857 च्या उठावात पहिला हुतात्मा कोण झाला?
तात्या टोपे
मंगल पांडे✅✅✅
नानासाहेब पेशवे
बहादुरशहा जफर


चंपारण्य सत्याग्रह 1917 मध्ये करण्यात आला. चंपारण्य हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तरांखंड
उत्तर प्रदेश
पंजाब
बिहार✅✅✅



जगात सर्वात जास्त बोलणाऱ्या एकूण भाषांपैकी हिंदी भाषेचा कितवा क्रमांक लागतो?
पाचवा
सहावा✅✅✅
सातवा
आठवा



नव्या शैक्षणिक धोरणानुसार 10+2 ऐवजी कोणती पद्धत राबवली जाणार आहे?
5+3+3+4✅✅✅
5+10+12
5+8+4
5+4+3+2



कोणते पोलीस ठाणे देशातील सर्वोत्तत्कृष्ठ ठरले आहे?
नादौन पोलीस ठाणे✅✅✅
नानखारी पोलीस ठाणे
रामपूर पोलीस ठाणे
नेरवा पोलीस ठाणे


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


भारतीय हवाई दलाच्या कोणत्या पथकाला ‘गोल्डन अॅरोज’ म्हणून संबोधले जाते?

(A) स्क्वॉड्रॉन 12
(B) स्क्वॉड्रॉन 102
(C) स्क्वॉड्रॉन 17✅✅
(D) स्क्वॉड्रॉन 8

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


कोणत्या देशासोबत भारतीय रिझर्व्ह बँकेनी 400 दशलक्ष डॉलरच्या चलनाची अदलाबदल करण्यासाठी करार केला?

(A) इथिओपिया
(B) सेनेगल
(C) सेशेल्स
(D) श्रीलंका ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

काश्मीर खोऱ्यातल्या कोणत्या मसाल्याला केंद्र सरकारकडून GI टॅग प्राप्त झाला?

(A) कोशूर माऱ्त्सिवागुन
(B) कोशूर झुर
(C) काश्मीर कहवा
(D) केसर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या मंत्रालयाने भाडेतत्वावर देण्याच्या संदर्भातल्या भारतीय लेखा मानदंडांमध्ये दुरुस्ती केली?

(A) वाणिज्य व उद्योग मंत्रालय
(B) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय ✅✅
(C) कायदा व न्याय मंत्रालय
(D) अर्थमंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


2020 साली जागतिक हेपॅटायटीस दिनाची संकल्पना काय आहे?

(A) इन्व्हेस्ट इन एलिमीनेटिंग हेपॅटायटीस
(B) हेपॅटायटीस फ्री फ्युचर✅✅
(C) फाइंड द मिसिंग मिलियन्स
(D) मेकिंग हेपॅटायटीस एलिमीनेशन ए रीयालिटी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशात भारत निर्यातीला चालना देण्यासाठी कापूस साठविण्यासाठी गोदाम उभारणार आहे?

(A) व्हिएतनाम✅✅
(B) म्यानमार
(C) अफगाणिस्तान
(D) फिलीपिन्स

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या मंत्रालयाने ग्रामीण विकास कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्यासाठी “वित्तीय व्यवस्थापन निर्देशांक” जाहीर केला?

(A) सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
(B) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(C) कामगार व रोजगार मंत्रालय
(D) ग्रामीण विकास मंत्रालय✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



हवामानाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी तयार केलेल्या भारतीय हवामान विभागाच्या (IMD) मोबाइल अॅपचे नाव काय आहे?

(A) ऋतू
(B) जलवायू
(C) मौसम ✅✅
(D) अवधी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या मंत्रालयाने ‘BIS-केअर’ अॅपचे अनावरण केले?

(A) ग्राहक कल्याण, खाद्यान्न व सार्वजनिक वितरण मंत्रालय ✅✅
(B) खाद्यान्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय
(C) कॉर्पोरेट कल्याण मंत्रालय
(D) अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



___ या दिवशी ‘जागतिक युवा कौशल्य दिन’ साजरा केला जातो.

(A) 14 जुलै
(B) 15 जुलै✅✅
(C) 13 जुलै
(D) 12 जुलै

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



जगातला सर्वात उंच रेल्वे पूल कुठे बांधण्यात येत आहे?

(A) उत्तराखंड
(B) जम्मू व काश्मीर✅✅
(C) लडाख
(D) मणीपूर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या संस्थेत “विमेन आंत्रेप्रेनेऊरशिप अँड एंपोवरमेंट (WEE) कोहोर्ट” उपक्रमाचा प्रारंभ केला गेला?

(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली✅✅
(B) भारतीय विज्ञान संस्था, बेंगळुरू
(C) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद
(D) महिला व बाल विकास मंत्रालय

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या बँकेनी ‘कोना कोना उम्मीद’ मोहीमेचा प्रारंभ केला?

(A) फेडरल बँक
(B) HDFC बँक
(C) कोटक महिंद्रा बँक✅✅
(D) ICICI बँक

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



“स्वच्छ भारत रेव्होल्यूशन” या पुस्तकाचे संपादक कोण आहेत?

(A) जयदीप गोविंद
(B) समीर कुमार
(C) व्ही. राधा
(D) परमेश्वरन अय्यर✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖



कोणत्या संस्थेच्यावतीने “सहकार कूपट्यूब NCDC चॅनेल” कार्यक्रमाचा प्रारंभ केला?

(A) राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र
(B) राष्ट्रीय सहकार विकास महामंडळ✅✅
(C) राष्ट्रीय दुग्ध संस्कृती संग्रह
(D) राष्ट्रीय हवामान माहिती संस्कृती

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

मुस्लिम धर्मातील सामाजिक सुधारणा आंदोलने

1) वहावी आंदोलन
2) अलिगड आंदोलन 
3) अहमदीया आंदोलन
4) देवबंध आंदोलन 

 1) वहाबी आंदोलन  

वहाबी चे प्रवर्तक रायबरेली चे 'सैय्यद अहमद' होते

वहाबी 1828 ई. ते 1888 पर्यंत

आन्दोलनाचे मुख्य केन्द्र पटना शहर होते

पटना चे विलायत अली व इनायत अली या आन्दोलन चे प्रमुख नायक होते

हे आन्दोलन मूलता मुस्लिम सुधारवादी आन्दोलन होते

जे उत्तर पश्चिम, पूर्वी भारत तथा मध्य भारतात होते

 सैय्यद अहमद ची इच्छा 

सैय्यद अहमद इस्लाम धर्मातील परिवर्तने तथा सुधारणांच्या  विरुद्ध होते

त्यांची इच्छा हजरत मोहम्मद  कालीन इस्लाम धर्माला पुन:स्थापित करण्याची होती

सैय्यद अहमद पंजाब चे सिक्ख आणि  बंगाल चे  अंग्रेजांना विरोध केला

अनुयायांना शस्त्र धारण व प्रशिक्षित करुन स्वयं सैनिकी वेशभूषा धारण केली,

त्यांनी पेशावर वर 1830 ई. मध्ये काही काळासाठी अधिकार ठेवला

अापल्या नावाचे सिक्के भी चालवले

  फाँसी ची शिक्षा 

1857 मध्ये आन्दोलनाचे नेतृत्व पीर अली ने केले

कमिश्नर टेलबू ने  एलिफिन्सटन सिनेमा समोर एका झाडाला लटकवून फाँसी दिली

त्यांच्याबरोबर ग़ुलाम अब्बास, जुम्मन, उंधु, हाजीमान, रमजान, पीर बख्श, वहीद अली, ग़ुलाम अली, मुहम्मद अख्तर, असगर अली, नन्दलाल एवं छोटू यादव यांना फाँसी वर दिली



 2) अलिगड मुस्लीम आंदोलन 

अलीगढ़ आन्दोलनाची सुरुवात अलीगढ़ (उत्तर प्रदेश)येथे झाली.

आन्दोलन चे संस्थापक सर सैय्यद अहमद ख़ाँ होते

त्यांनी 'पीरी-मुरीदी प्रथा' एवं 'दास प्रथा' समाप्त करण्याचे प्रयत्न केले

सर सैय्यद अहमद ख़ाँ नी 1875 ई. मध्ये अलीगढ़ मध्ये एक ‘ऐंग्लो मुस्लिम स्कूल’ ज्याला 'ऐंग्लों ओरियन्टल स्कूल' म्हणत

येथे मुस्लिम धर्म, पाश्चात्य विषय तथा विद्वान् जैसी सभी विषयांची शिक्षा दीली जात !

 आन्दोलनाचेे इतर नेते 

दिल्लीत जन्मलेले सैय्यद अहमद ने 1839 ई. मध्ये  ईस्ट इंडिया कम्पनीत नौकरी केली।

कम्पनीच्या न्यायिक सेवेत कार्य करताना  1857 च्या उठावात कम्पनीची साथ दिली

 1870 नंतर प्रकाशित 'डब्ल्यू. हण्टर' चे पुस्तक 'इण्डियन मुसलमान' मध्ये सरकार ला सल्ला दिला कि मुसलमानांबरोबर समझौता करावा

सर सैय्यद अहमद ख़ाँ द्वारा संचालित 'अलीगढ़ आन्दोलन' चे त्यांच्या व्यतिरिक्त आन्दोलन के अन्य प्रमुख नेता

नजीर अहमद चिराग
अली अल्ताफ
हुसैन मौलाना
शिबली नोमानी

अलिगढ चळवळीचे उद्देश कोणते ?

उत्तर

1.मुस्लीम समाजाने आपली राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्राबद्दलची कालबाह्य सनातनी विचारसरणी बदलून पौर्वात्य व पाश्चिमात्य विचारांचा समन्वय साधला पाहिजे. हा अलीगड चळवळीचा उद्देश होता.

2. मुस्लीम समाजाला आधुनिक शिक्षण मिळावे.

3. धार्मिक शिक्षणाबरोबरच पाश्चिमात्य शिक्षणाची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी हा त्यांचा हेतू होता.

4. काळाच्या बदलानुसार धर्माची परिभाषा व अर्थ यांच्यातही बदल झाला पाहिजे. तसे होत नसेल तर धर्माला जडत्व येते असे त्यांनी प्रतिपादन केले.

5. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, सांप्रदायिकता, अवैज्ञानिक चालिरीती याविरुद्ध लढा दिला.

6.मुस्लीम समाजातील पडदा पद्धतीचा  निषेध केला.

7. मुस्लीम स्त्रियांनी शिक्षण घेऊन ज्ञानसंपन्न व्हावे असे त्यांनी मत मांडले.

8. बहुपत्नीत्व पद्धतीस त्यांनी जोरदार विरोध केला.

9. 1875 मध्ये त्यांनी ‘अँग्लो ओरिएन्टल कॉलेज’ची स्थापना अलिगढ येथे केली.

पाश्चिमात्य विज्ञान व संस्कृती याची ओळख होऊन आधुनिक समाजाची निर्मिती व्हावी, यासाठी त्यांनी या कॉलेजचा उपयोग केला.

10. सय्यद अहमदखान यांनी धार्मिक सहिष्णुतेचा उपदेश केला. हिंदू व मुसलमान हे समाज एकत्र यावेत अशी त्यांची इच्छा होती.

Basic Concepts of Economics :

🛑दारिद्र्य 🛑

जीवनाच्या मुलभूत किमान गरजा भागविता येण्याची अक्षमता म्हणजे दारिद्र्य होय.

दारिद्र्य एक सापेक्ष संकल्पना आहे.



🔶कामगार 

उच्च किंवा निम्न अशा कोणत्याही स्तरावरील आर्थिक क्रियांमध्ये गुंतलेल्या व त्याद्वारे राष्ट्रीय उत्पन्नात भर घालणा-या सर्व व्यक्तींना कामगार म्हटले जाते.




🛑बेरोजगारी🛑

 रोजगार नसलेल्या परंतु रोजगार मिळावा अशी इच्छा असलेल्या व्यक्तीला बेरोजगार म्हणता येईल.  रोजगार मिळविण्यासाठी उत्सुक असलेली व्यक्ती त्यासाठी शारिरीक व मानसिकदृष्ट्या समर्थ असावी.



🔶बेरोजगारीचे प्रकार

१) खुली बेरोजगारी :- 

काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही नियमित उत्पन्न देणारा रोजगार प्राप्त होत नसेल तर त्याला खुली बेरोजगारी असे म्हणतात.


२) हंगामी बेरोजगारी :-

शेतीच्या नांगरणीपासून कापणीपर्यंतचा कालावधी सोडून वर्षाच्या इतर काळात भासणारी बेरोजगारी.


३) अदृश्य / प्रच्छन्न बेरोजगारी :-

आपल्या क्षमतेचा पूर्ण वापर करुन एखादे काम जेवढे व्यक्ती करू शकतात त्यापेक्षा जास्त व्यक्ती त्या कामात गुंतलेले असल्यास..


४) कमी प्रतीची बेरोजगारी :-

ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला आपल्या क्षमतेपेक्षा / शिक्षणाच्या दर्जेपेक्षा कमी प्रतीच्या रोजगारावर समाधान मानावे लागते.


५) सुशिक्षीत बेरोजगारी :- 

जेव्हा सुशिक्षीत लोक कमी प्रतीच्या किंवा खुल्या बेरोजगारीला बळी पडतात.


६)चक्रीय बेरोजगारी :-

विकसीत भांडवलशाही देशांमधील व्यापारी चक्राच्या मंदीच्या परिस्थितीत ही बेरोजगारी दिसून येते.


७) घर्षणात्मक बेरोजगारी :-

 विकसीत देशांना जेव्हा नवीन उद्योग जुन्या उद्योगांना आपल्या व्यवसायातून बाहेर पडण्यास भाग पाडतात व कामगार अधिक चांगल्या रोजगाराच्या प्रतिक्षेत असतात तेव्हा ही बेरोजगारी निर्माण होते.

• असा तात्पुरता कालावधी जेव्हा कामगार ऐच्छिकरित्या बेरोजगार असतो तेव्हा त्या परिस्थितीला घर्षणात्मक बेरोजगारी असे म्हणतात. (येथे घर्षण जुन्या व नव्या उद्योगामध्ये निर्माण झालेले असतात.)


राणी लक्ष्मीबाई

महाराणी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर

टोपणनाव:मनू

जन्म:नोव्हेंबर १९, इ.स. १८३५

काशी, भारत

मृत्यू:जून १७, इ.स. १८५८

झाशी, मध्य प्रदेश

चळवळ:१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध

प्रमुख स्मारके:ग्वाल्हेर

धर्म:हिंदू

वडील:मोरोपंत तांबे

आई:भागीरथीबाई तांबे 

पती:गंगाधरराव नेवाळकर

अपत्ये:दामोदर (दत्तकपुत्र)


लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर, म्हणजेच झाशीची राणी लक्ष्मीबाई, (नोव्हेंबर १९, इ.स.१८३५ - जून १७, इ.स. १८५८) या एकोणिसाव्या शतकातील झाशी राज्याच्या राणी होत्या. हिंदुस्थानात इ.स. १८५७च्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरूद्ध झालेल्या स्वातंत्र्य उठावातील या एक अग्रणी सेनानी होत्या. यांच्या शौर्याने यांना ‘क्रांतिकारकांची स्फूर्तिदेवता’ म्हणून जनमानसात अढळ स्थान प्राप्त झाले.


बालपण


लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका तांबे होते. यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे सातारा जिल्ह्यातील होते. लक्ष्मीबाईंचा जन्म भागीरथी बाई यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे झाला होता.


व्यक्तिमत्त्व


धोरणी, चतुर, युद्धशास्त्रनिपुण, शूर आणि थोर कर्तृत्व व नेतृत्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाई जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नसल्या तरी राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमधे वावरलेल्या, वाढलेल्या होत्या. अश्वपरीक्षेचे सर्व मापदंड माहीत असणार्‍या लक्ष्मीबाई घोडेस्वारी करण्यातही वाकबगार होत्या. त्या काळी पूर्ण हिंदुस्थानात श्रीमंत नानासाहेब पेशवे, जयाजी शिंदे व लक्ष्मीबाई या तिघांशिवाय कोणीही अचूक अश्वपरीक्षा करणारा नव्हता. अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणार्‍या राणी लक्ष्मीबाईंनी युद्धशास्त्रातील प्रत्येक विद्येत प्रावीण्य मिळविले. बाजीरावांच्या पदरी बाळंभट देवधर नावाचे उत्तम कसरतपटू आणि कुस्तीगीर होते. त्यांनीच मल्लविद्येत पारंगत होण्यासाठी मल्लखांब नावाचा कसरतीचा वेगळा प्रकार शोधून काढला. मनाची एकाग्रता, विलक्षण चपळता, शरीराचा तोल सांभाळण्याचे पूर्ण कौशल्य, काटकपणा आणि चतुरस्र भान वृद्धिंगत करणार्‍या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज झाल्या.


वैवाहिक जीवन


इ.स. १८४२ मध्ये त्यांचा विवाह झाशी संस्थानाचे राजे गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेंव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झाशीच्या प्रजाजनांत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले.


दरबाराचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांस पसंत नसल्याने मिळालेल्या वेळेचा उपयोग लक्ष्मीबाईंनी स्वत्त्व जपण्यासाठी केला. त्यांनी आपला रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी, तलवारबाजी नियमित सुरू ठेवली.


गंगाधरराव नेवाळकर व लक्ष्मीबाई यांना मुलगा झाला परंतु तीन महिन्याचा असताना तो मृत्यू पावला. मुलाच्या रूपाने वारस मिळाल्याच्या आनंदात असणारे गंगाधररावही या गोष्टीने दुःखी झाले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांच्या मुलाला दत्तक घेऊन त्याचे दामोदर असे नाव ठेवले. इ.स. १८५३ मध्ये गंगाधररावांचे निधन झाले.


झाशी संस्थान खालसा


पूर्वीपासून झाशीच्या ब्रिटिशांशी असणार्‍या मैत्रीपूर्ण संबंधांवरून राणी लक्ष्मीबाईंना ईस्ट इंडिया कंपनीद्वारे ब्रिटिश सरकार झाशी संस्थान खालसा करणार नाही असे वाटत होते. त्यासाठी लक्ष्मीबाई स्वतः ईस्ट इंडिया कंपनीशी पत्रव्यवहार करत होत्या. या पत्रव्यवहारातून त्यांनी कंपनी सरकारचा अन्याय, बेकायदेशीरपणा आणि खोडसाळपणा उघड केला. एका पत्रात त्यांनी झाशी संस्थान खालसा केले, तर पूर्ण हिंदुस्थानातील लोकांना हळहळ वाटेल. परिणामी हिंदुस्थानातील लोकांना ब्रिटिशांबद्दल भरवसा, विश्वास वाटेल का?, अशी शंका व्यक्त करून कंपनीला एक प्रकारचे आव्हान दिले. कंपनी सरकारच्या बेजबाबदार अनैतिक कृत्यांनी व कंपनीच्या अधिकाराला आव्हान देणाचे धारिष्ट्य करणाऱ्या राणी लक्ष्मीबाई या देशातील पहिल्या काही व्यक्तींमधील एक होत्या.


परंतु हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतलेलाच असल्याने झाशी संस्थानही खालसा करण्यात आले. १३ मार्च, इ.स. १८५४रोजी झाशीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. त्यानुसार दत्तक विधान नामंजूर करून झांशी संस्थान ब्रिटिश सरकारांत विलीन करण्यात आले. त्या वेळीच स्वाभिमानी राणीने माझी झाशी देणार नाही असे स्फूर्तिदायक उद्गार काढले.


झाशी खालसा झाल्यावर लक्ष्मीबाईंना किल्ला सोडून शहरातील राजवाड्यात राहायला यावे लागले. राणी लक्ष्मीबाईंना पदच्युत झाल्याचा अपमान सहन करीत काही काळ शांत बसावे लागले होते.


इ.स. १८५७चे स्वातंत्र्ययुद्ध


इ.स. १८५७ चा उठाव हा पूर्ण हिंदुस्थानात झाला. त्याप्रमाणे ५ जून, १८५७ ला झाशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ ३५ शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता राणी लक्ष्मीबाई किल्ल्यावर राहण्यास गेल्या. पुढे २२ जुलै, इ.स. १८५७ ला ब्रिटिशांनी राणींना झाशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राज्यकर्त्या झाल्या होत्या, परंतु अतिशय बिकट परिस्थितीत त्यांच्या हाती राज्यकारभार आला होता. मनुष्यबळ नव्हते आणि खजिनाही रिकामाच होता. प्रजेच्या मनात असुरक्षितता, भविष्याबद्दल भीती होती. परंतु तरीही लक्ष्मीबाईंनी खंबीरपणाने परिस्थिती हाताळली. जुन्या विश्र्वासातील लोकांना परत बोलावून त्यांना काही अधिकाराची पदे दिली. दिवाण लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री, तर प्रत्यक्ष वडिलांना - मारोपंत तांब्यांना - खजिनदार केले. लक्ष्मणरावांचा भाऊ, मुलगा तसेच मुन्सफ, भोलानाथ, आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे व शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळविले. राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या २२ तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मितीही सुरू केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणार्‍या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. परकीयांविरुद्ध लढण्याची तयारी करीत असतानाच राणींनी प्रजेचा स्वाभिमान, निष्ठा वाढवण्याचा व आनंद जपण्याचा प्रयत्न केला. दानशूर, श्रद्धाळू व दयाळू लक्ष्मीबाईंनी थंडीत कुडकुडणार्‍या हजार-दीड हजार गरीबांना, साधू-संन्याशांना उबदार कपड्यांचे वाटप केले. स्वतःबरोबर प्रजेच्या श्रद्धा जपणार्‍या राणीने गोवध बंदी सुरू केली. रंगपंचमीसारखा सण साजरा करून स्त्रियांसाठी हळदी-कुंकवासारखे धार्मिक कार्यक्रम त्यांनी किल्ल्यावर केले.


अशा प्रकारे प्रशासन, सैन्य व कल्याणकारी कामे यांची चोख व्यवस्था लावून स्वराज्य असल्याचा विश्र्वास राणी लक्ष्मीबाईंनी जनतेत निर्माण केला. प्रजेला मुक्त मनाने आपल्या आवडीच्या गोष्टी करण्यासाठी, त्यांच्या कलेची जोपासना करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी झाशीमध्ये मराठी नाटकांचे प्रयोग घडवून आणले. मराठी भाषिकांसाठी रासक्रीडा, चित्रलेखा, बाणासूर इ. नाटके योजली. स्वतःही नाटकांचा आनंद घेतला. एक स्थिर, सुरक्षित, समृद्ध व सुसंस्कृत राज्य घडवण्याचा प्रयत्न राणी लक्ष्मीबाईंनी केला. यामुळे राणी आणि झाशीतील प्रजा यांच्यातील नाते दृढ झाले.


दरम्यान २१ मार्च, इ.स. १८५८ ला सकाळीच सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झाशीजवळ आला. त्याने राणींस नि:शस्त्र भेटीस यावे किंवा युद्धास तयार राहावे असे कळविले. ब्रिटिशांनी केलेल्या विश्र्वासघातामुळे, अन्यायामुळे ‘भारतात विदेशी शासन नकोच’ अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्याचे नाकारले. त्याच वेळी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्यास सुचविले.


उत्तम प्रतीचा सेनानी आणि कर्तबगार राजकारणी असणार्‍या ह्यू रोजने झाशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजुबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळविला. त्या टेकड्यांवर तोफा चढवल्या. २-३ दिवस झाशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज भवानीशंकर, कडक बिजली या तोफा आपल्या नावाप्रमाणे कार्यरत होत्या. घौसखान याने तर तोफेमधून असा मारा केला, की त्यामुळे दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झाशीतील लोक त्याला धन्यवाद देतात. युद्धाच्या ९ व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफ बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारे पाडली. ही खिंडारे बुजवण्यासाठी रातोरात काम केले गेले. त्या वेळी चुना, दगड, विटा यांची ने-आण करण्याचे काम स्त्रियांनी केले होते हे विशेष.


शेवटी ब्रिटिशांना फितुरांनीच साथ दिली. झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहीरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा व्हायचा, ती विहीर आणि जिथे दारुगोळा तयार व्हायचा, तो कारखाना, ही दोन ठिकाणे इंग्रजांनी उद्ध्वस्त केली. अशा स्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणार्‍या मदतीवर होती. त्याप्रमाणे ३१ मार्चला तात्या टोपेंचे सैन्य आले. परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही.


राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावरच लढण्याचे आवाहन केले. एवढेच नाही तर ‘रणांगणात तुम्हाला मृत्यू आला, तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन’ असे आश्र्वासन दिले. राणीचे डावे-उजवे हात असणारे खुदाबक्ष आणि घौसखान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडल्यावर मात्र बिकट परिस्थिती निर्माण झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत, सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याचा निर्णय अंमलात आणला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती, की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य, शौर्य, आवेश पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन लक्ष्मीबाईंना परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकार्‍यांशी लक्ष्मीबाईंनी चर्चा केली आणि निर्णयानुसार रातोरात त्यांनी झाशी सोडले. सतत ११ दिवस राणींनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचा साक्षीदार ह्यूज रोजनेही म्हटले की ‘राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती.’


या पराभवानंतर राणी पेशव्यांबरोबर ग्वाल्हेरला गेली. तेथेही स्वस्थ न बसता लक्ष्मीबाईंनी आपल्या सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैन्यांमध्ये फिरून, सैनिकांची चौकशी करीत, इंग्रजांना रोखण्यासाठी कशा प्रकारे मोर्चे बांधणी करावी याविषयी त्यांनी चर्चा केली. याच वेळी १७ जून इ.स. १८५८ रोजी सकाळीच ब्रिटिश अधिकारी स्मिथ सैन्यासह ग्वाल्हेरच्या अगदी जवळ येऊन पोहोचला. त्याने त्वरित हल्ला चढवला. लक्ष्मीबाईंनी रणांगणात धाव घेतली. लक्ष्मीबाई तलवारीचे सपसप वार करीत समोर येणार्‍या ब्रिटिश सैन्याला कापून काढत होत्या. आवेगाने, विजेसारख्या तळपणार्‍या राणींकडे पाहून त्यांचे सैन्यही त्वेषाने लढले. इंग्रज अधिकारी स्मिथचे सैन्य मागे हटणारच होते, त्याच वेळी नव्या दमाची एक फौज बाजूच्या टेकडीवरून चालून आली. दोन्हीकडून आलेल्या सैन्यासमोर राणींचा निभाव लागला नाही. परिस्थिती ओळखून त्या काही स्वारांनिशी बाहेर पडल्या. थोडे पुढे जाताच एका ओढ्यापाशी त्यांचा घोडा अडला. नेहमीचा घोडा शेवटच्या लढाईत त्यांच्याबरोबर नव्हता. काही केल्या घोडा ओढा ओलांडत नव्हता. तिथे इंग्रजांशी लढत असताना राणी लक्ष्मीबाई रक्‍तबंबाळ होऊन घोड्यावरून खाली कोसळल्या. त्यांचा डाव्या कुशीतही तलवार घुसली, परंतु पुरूषी वेशात असलेल्या राणी लक्ष्मीबाई यांना इंग्रज ओळखू शकले नाही. ते पुढे निघून गेले. घायाळ झालेल्या राणी लक्ष्मीबाई यांना त्यांच्या सेवकाने एका मठात आणले. परंतु त्यांची उपचार करण्याची इच्छा नव्हती. आपला देह क्रूर इंग्रजांच्या हाती लागू नये अशी त्यांची इच्छा होती. म्हणून त्या सेवकाने त्यांना मुखाग्नी दिला. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांनी वयाच्या तिसाव्या वर्षी मरण स्वीकारले आणि अशाप्रकारे एका शूर राणीला रणांगणात वीरमरण आले.

महाराष्ट्राचे विधान मंडळ

👉288 एकूण आमदार विधानसभेचे आहेत.तर 78 सदस्य संख्या विधानपरिषदेची आहे.

👉5/6 विधान परिषद सदस्य

 हे विधानसभा सदस्य, स्थानिक स्वराज्य संस्था, पदवीधर, शिक्षक मतदारसंघातून निवडले जातात.

👉1/6 राज्यपाल विज्ञान, साहित्य, कला,सहकार क्षेत्र व समाजसेवेतील प्रसिद्ध लोकांना विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देतात.


1) सभासदाचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो.

2)दर दोन वर्षांनी एक तृतीयांश सभासद निवृत्त होतात. त्यांच्या जागी नवे सभासद निवडले जातात.

३) एखाद्या घटक राज्यात विधान परिषद संसदेच्या कायद्याने निर्माण करता येते.

४) विधान परिषदेत किमान ४० व जास्तीत जास्त राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या १/३ सदस्य असू शकतात.

५) विधान परिषद हे स्थायी सभागृह आहे.

६) सभापती व उपसभापतीची निवड विधान परिषदेचे सदस्य आपल्या मधूनच करतात.




👉 कशी असते मतदान प्रक्रिया?

 1 विधानसभेप्रमाणे येथे थेट मतदान प्रक्रिया अवलंबली जात नाही.

2) राष्ट्रपती निवडणूक, विद्यापीठ सिनेट यासारख्या निवडणुकींसाठी पसंतीक्रमाची पद्धती वापरली जाते तीच पद्धत या निवडणुकीतही अवलंबली जाते.

3) विधान परिषदेसाठी देखील पसंतीक्रम पद्धतीचाच अवलंब केला जातो.

4) निवडणुकीसाठी जेवढे मतदार उभे असतील तेवढय़ा उमेदवारांना मतदार आपला (आवडीनुसार) पसंतीक्रम देतो.

5) जास्त पसंतीच्या उमेदवाराला पहिला क्रम, त्यानंतर दुसर्‍या आवडीच्या उमेदवाराला दुसरा अशा पद्धतीने एकूण उमेदवारांएवढे मत देता येते.


👉मतमोजणी : संबंधित मतदारसंघाची मतदान संख्या व उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग एक कोटा निश्चित करतात.

👉 निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मते मिळवणारा उमेदवार विजयी होतो. पण पहिल्या पसंतीची मते कोट्याएवढी नसल्यास दुसर्‍या पसंतीची मते जो पूर्ण करेल, तो उमेदवार विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणत्याही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो. यात कोणाचेही मतदान वाया जात नाही.

👉सरळ लढतीचा फायदा : दोन उमेदवारांच्या सरळ लढतीत पहिल्या पसंतीच्या मतात जो पहिल्या क्रमांकावर राहतो त्याचा विजय जवळपास नक्की असतो. मतांचा कोटा पूर्ण न झाल्यास दुसर्‍या क्रमांकावरील उमेदवाराला मिळालेल्या दुसर्‍या पसंतीच्या मतांची मोजणी केली जाते. तरी कोटा पूर्ण न झाल्यास पहिल्या क्रमांकावरील उमेदवाराला विजयी घोषित केले जाते.