Saturday 23 October 2021

वाचा :- महाराष्ट्र इतिहास

● महाराष्ट्रात नेवासे, चांदोली, सोमगाव, टेकवाडे, सावरदे व दायमाबाद आदी ठिकाणी ताम्रपाषाण संस्कृतीचे अवशेष सापडले आहेत.

● महाराष्ट्रात महापाषाण युगाचा काळ इ.स.पूर्व 1000 वर्षापूर्वीचा आहे.

● मौर्य साम्राज्याच्या अस्तानंतर महाराष्ट्रात सातवाहन राजघराण्याचा उदय झाला.

● जागतिक नकाशावर महाराष्ट्रास सर्वप्रथम दर्शवणारे व महत्व प्राप्त करून देणारे ‘सातवाहन’ हेच पहिले महाराष्ट्रातील राजघराणे होय. ‘सिमुक’ राजा या घराण्याचा संस्थापक मानला जातो.

● सातवाहन ‘राजा सातकर्णी’ प्रथम व त्याची राणी ‘नागणिका’ यांची प्रतिमा जुन्नरच्या नाणेघाटात आढळून येते.

● राष्ट्रकूट घराण्यातील ‘कृष्ण प्रथम’ याने जगप्रसिद्ध असलेले ‘वेरूळ येथील कैलास मंदिर’ बांधले.

● शिलाहारांची महाराष्ट्रात दक्षिण कोकण, उत्तर कोकण (ठाणे) आणि कोल्हापूर या तीन ठिकाणी सत्ता केंद्रे होती.

● शिलाहार घराण्याचा संस्थापक म्हणून ‘विद्याधर जीमुतवाहन’ हा आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तगर (तेर) हे त्याचे मूल स्थान होय.

● चंद्रपुर येथे गोंड घराण्याने आपली सत्ता निर्माण केली. तसेच या घराण्याचा संस्थापक ‘कोल भिल’ हा होता.

● यादवांचा प्रधान हेमाद्री याने ‘चातुरवर्ग चिंतामणी’ हा ग्रंथ लिहिला.

● महाराष्ट्रात बहामनी राज्याची स्थापना ‘हसन गंगू बहामणी’ याने केली. तो या राज्याचा संस्थापक मानला जातो.

बहामणी राज्याचे खालील 5 तुकडे झाले.
1. वर्हाडी : इमादशाही
2. अहमदनगर : निजामशाही
3. बिदर : बरीदशाही
4. गोवलकोंडा : कुतुबशाही
5. विजापूर : आदिलशाही

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...