Ads

30 May 2020

मराठी व्याकरण :- वाचा महत्त्वाच्या म्हणी


1 कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
अर्थ:
लाजलज्जा पार सोडून देणे.

2 कठीण समय येता कोण कामास येतो?
अर्थ:
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही.

3 कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच.
अर्थ:
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही.

4 कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी.
अर्थ:
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते.

5 कर नाही त्याला डर कशाला?
अर्थ:
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.

6 कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
अर्थ:
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही.

7 करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?
अर्थ:
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही

8 करणी कसायची, बोलणी मानभावची.
अर्थ:
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर.

9 करायला गेले गणपती अन् झाला मारुती.
अर्थ:
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे. नाहीतर त्यातून भलतेच घडते.

10 करायला गेलो एक अन् झाले एक.
अर्थ:
करायचे एक आणि झाले भलतेच.

11 करावे तसे भरावे.
अर्थ:
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे.

12 करीन ती पूर्व दिशा.
अर्थ:
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे.

13 कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड.
अर्थ:
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते.

14 कवडी कवडी माया जोडी.
अर्थ:
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते.

15 कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले.
अर्थ:
करणे थोडे पण गवगवाच फार.

16 कसायाला गाय धार्जिणी.
अर्थ:
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात.

17 काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
अर्थ:
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी.

18 काखेत कळसा अन् गावाला वळसा.
अर्थ:
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.

19 काट्याचा नायटा करणे.
अर्थ:
एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे.

20 काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
अर्थ:
खर्‍या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही.

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे सराव


राज्यसेवा तसेच सयूंक्त गट ब आणि गट क साठी उपयुक्त

▪️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘प्रकृती’ नावाने संकेतस्थळ कोणत्या संस्थेने तयार केले?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली

▪️ भारतीय संविधानातल्या कितव्या दुरुस्तीद्वारे पंचायतींना संविधानिक दर्जा दिला गेला?
उत्तर : 73 वी दुरुस्ती

▪️ चीनच्या पहिल्या मंगळ शोध मोहिमेचे नाव काय आहे?
उत्तर : तियानवेन 1

▪️ कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत ई-ग्राम स्वराज्य संकेतस्थळ आणि स्वामीत्व योजना चालवली जात आहे?
उत्तर : पंचायतराज मंत्रालय

▪️ कोणत्या देशाने ‘नूर’ नावाचा लष्करी उपयोगाचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?
उत्तर : इराण

▪️ कोणत्या व्यक्तीने 21 एप्रिल 2020 रोजी झालेल्या जी-20 कृषिमंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व केले?
उत्तर : नरेंद्र सिंग तोमर

▪️ UNESCO संघटनेनी कोणत्या शहराची 2020 या वर्षाची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून निवड केली?
उत्तर : क्वालालंपुर

▪️ कोणता दिवस ‘इंग्रजी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : 23 एप्रिल

▪️ कोणत्या राज्य सरकारने शिक्षण प्रदान करण्यासाठी ‘संपर्क दीदी’ अ‍ॅप तयार केले?
उत्तर : उत्तराखंड

▪️ कोणती भारतीय कंपनी इस्राएल देशाची पहिली संपूर्ण डिजिटल बँक सुरू करण्यात मदत करणार आहे?
उत्तर : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस

१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

घाट (खिंड):

पर्वतरांगेतील दोन्ही प्रदेशात जाण्या – येण्याजोगा किवा दळनवळनाचा ‘डोंगररस्ता’ म्हणजे घाट होय.

🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀🍀
घाट जिल्हा जोडणारी गावे (मार्ग)

🍁मळशेज घाट ठाणे, पुणेअहमनगर – शहापूर

🍁नाणे घाट ठाणे, पुणेजुन्नर – कल्यान

🍁कुसूर घाट रायगड, पुणेराजगुरूनगर – कर्जत

🍁वरंधा घाट रायगड, पुणेपुणे – महाड

🍁कुरुळ घाट सिंधुदुर्ग, कोल्हापूर कोल्हापूर – वैभववाडी- राजापूर

🍁चंदनापुरी नगर संगमणेर – पुणे

🍁सारसा घाट चंद्रपुर सिरोंचा – चंद्रपुर

🍁बिजासण घाट धुळे धुळे – आग्रा

🍁मांजरसुभा घाट बीड बीड – नगर

🍁अंबेनळी घाट सातारा महाबळेश्वर – कोल्हापूर

🍁ताम्हणी घाट पुणे पुणे – पौदरोड – चिपळूण

🍁धब (कसारा)घाट नाशिक नाशिक – मुंबई

🍁बोर घाट पुणे पुणे – मुंबई

🍁ख्ंबाटकी घाट सातारा पुणे – सातारा

🍁दिवा घाट पुणे पुणे – बारामती

🍁कुंभार्ली घाट सांगली – सातारा कराड – चिपळूण

🍁आंबा घाट कोल्हापूर – रत्नागिरी कोल्हापूर – रत्नागिरी

🍁आंबोली घाट कोल्हापूर कोल्हापूर – सावंतवाडी बेळगाव

🍁फोंडा घाट कोल्हापूर कोल्हापूर – पणजी

🍁पसरणी घाट सातारा वाई – महाबळेश्वर.
___________________________

राज्य आणि मुख्यमंत्री



● *महाराष्ट्र* : उद्धव ठाकरे

● *आंध्रप्रदेश* : जगमोहन रेड्डी 

● *अरुणाचल प्रदेश* : प्रेमा खांडू

● *आसाम* : सर्बानंद सोनवल

● *बिहार* : नितीश कुमार

● *छत्तीसगड* : भूपेश बघेल

● *दिल्ली* : अरविंद केजरीवाल

● *गोवा* : प्रमोद सावंत

● *गुजरात* : विजय रूपानी       

● *हरियाणा* : मनोहरलाल खट्टर

● *हिमाचल प्रदेश* : जयराम ठाकूर

● *झारखंड* : हेमंत सोरेन

● *कर्नाटक* : बी.एस. येडियुरप्पा

● *केरळ* : पिनराई विजयन

● *मध्यप्रदेश* : शिवराज सिंह चौहान

● *पुदुच्चेरी* : व्ही. नारायणस्वामी

● *पंजाब* : अमरिंदर सिंग

● *राजस्थान* : अशोक गेहलोत

● *सिक्कीम* : प्रेम सिंग तमांग

● *तामिळनाडू* : ई. के. पलानीस्वामी     

● *मणिपूर* :  एन. बिरेन सिंग

● *मेघालय* : कॉनराड संगमा

● *मिझोराम* : झोरामथांगा

● *नागालँड* : नेफिऊ रिओ

● *ओडिशा* : नवीन पटनायक                

● *तेलंगणा* : के. चंद्रशेखर राव

● *त्रिपुरा* : बिप्लब कुमार देब

● *पश्चिम बंगाल* :  ममता बनर्जी

29 May 2020

General Knowledge

▪️ कोणती उड्डाणादरम्यान प्रवाश्यांची कोरोना तपासणी करणारी पहिली हवाई सेवा आहे?
उत्तर : एमिरेट्स

▪️ कोणत्या कलाकाराच्या जयंतीनिमित्त ‘जागतिक कला दिन’ साजरा केला जातो?
उत्तर : लिओनार्डो दा विंची

▪️ कोणत्या बँकेनी सामाजिक अंतर पाळण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेफ्टी ग्रिड’ मोहीम चालवली आहे?
उत्तर : HDFC बँक

▪️ आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग फेडरेशन (IWF) चे कार्यवाह अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : उर्सुला पापंड्रिया

▪️ ‘किसान रथ’ अॅपचे कार्य काय आहे?
उत्तर : अन्नधान्यांच्या वाहतूकीवर नियंत्रण ठेवणे

▪️ 2020 साली जागतिक आवाज दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : फोकस ऑन युवर वॉइस

▪️ हांग्जो शहरात आयोजित केल्या जाणाऱ्या ‘2022 एशियन पॅरा गेम्स’या स्पर्धांचे शुभंकर काय आहे?
उत्तर : फीफी

▪️ 2020 साली जागतिक हिमोफिलिया दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : गेट+इनवॉल्व्ड

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘सिघाट’ (Cghaat) संकेतस्थळाचे अनावरण केले?
उत्तर : छत्तीसगड

▪️ कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशाच्या सरकारने ‘अॅसेस करो ना’ मोबाइल अॅप सादर केले?
उत्तर : दिल्ली

देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना.

🅾देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

🅾देशातील पहिले ग्हर्नर
ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

🅾देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

🅾देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

🅾देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

🅾देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

🅾देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

🅾देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

🅾देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

🅾देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

🅾देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

🅾देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

🅾देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

🅾देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

🅾देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

🅾देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

🅾देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

🅾देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

🅾देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

🅾देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

🅾देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

🅾देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

🅾देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

🅾देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

🅾देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

🅾देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी

🅾देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

🅾देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

•देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

🅾देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

🅾देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संख्येत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

🅾देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

🅾देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन -पुणे

🅾देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात -अरुणाचल प्रदेश

🅾देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

🅾देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

🅾देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य -महाराष्ट्र

🅾देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

🅾देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

🅾देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

🅾देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

🅾देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

🅾देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

🅾देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य -हिमाचलप्रदेश

🅾देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

🅾देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

🅾देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

🅾देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

🅾देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

28 May 2020

ठगांचा बंदोबस्त 1829

गर्व्हनर जनलर ⇨लॉर्ड विल्यम बेंटिंगने १८२९ च्या सुमारास ठगीच्या निर्मूलनाची मोहीम हाती घेतली.

◽️ बंगाल सेनेचा एक अधिकारी कॅप्टन विल्यम श्लीमान याने प्रत्यक्ष कामगिरी बजावली.

◽️ त्याच्या व त्याचा सहकारी विल्यम थॉर्नटन याच्या अहवालानुसार ठगांविषयी पुढीलप्रमाणे माहिती मिळते : मध्य हिंदुस्थान, म्हैसूर व अर्काट या प्रदेशांत ठगीचा सुळसुळाट होता.

◽️ ३०० ठगांची एक टोळी असे परंतु बळी घेण्याच्या कामगिरीसाठी ते छोटे गट करीत व सावज हेरल्यावर ते गट एकत्र येत.

General Knowledge

● ‘वर्ल्ड स्टील रिपोर्ट 2020’ या शीर्षकाचा एक अहवाल कोणत्या संस्थेनी प्रकाशित केला?

*उत्तर* : जागतिक पोलाद संघ

● ‘सोलर पॅराबोलिक ट्रॉफ कलेक्टर’ कोणत्या संस्थेच्या संशोधकांनी विकसित केले?

*उत्तर* : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास

● ‘खुडोल’ उपक्रम कोणत्या राज्यात चालविला जात आहे?

*उत्तर* : मणीपूर

● ‘गव्हर्नमेंट स्टेटस पेपर ऑन डेब्ट’ या शीर्षकाचे दस्तऐवज कोणत्या मंत्रालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आले?

*उत्तर* : अर्थ मंत्रालय

● दरवर्षी जागतिक कासव दिन कधी साजरा केला जातो?

*उत्तर* : 23 मे     

● जागतिक बँकेचे उपाध्यक्ष आणि मुख्य अर्थशास्त्री या पदावर कोणाची नेमणूक झाली?

*उत्तर* : कारमेन रेनहार्ट

● ‘संवाद आणि विकासासाठी सांस्कृतिक विविधता विषयक जागतिक दिन’ कोणत्या दिवशी पाळतात?

*उत्तर* : 21 मे

● कोणत्या राज्याने ग्रामीण महिलांच्या सुरक्षित प्रसूतीसाठी ‘दीदी’ वाहन सेवा सुरू केली?

*उत्तर* : मध्यप्रदेश

27 May 2020

भारतीय रिझर्व बॅंक

◾️

     ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बॅंकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बॅंक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ,यासाठी संसदेत ६ मार्च  १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली  भारतीय रिझर्व बॅंकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे. भारतीय रिझर्व बॅंक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बॅंक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.

◾️प्रमुख उद्देश

भारतीय रिझर्व बॅंकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.

भारताची गंगाजळी राखणे.

भारताची आर्थिक स्थिती राखणे.

भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.


◾️राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक

        नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ( नाबार्ड ) ही भारतातील अपेक्स डेव्हलपमेंट फायनान्शियल संस्था आहे. 
बँकेला " ग्रामीण भागातील कृषी आणि इतर आर्थिक उपक्रमांच्या पतपुरवठा क्षेत्रात धोरण नियोजन आणि कार्यवाही संबंधी बाबी " देण्यात आल्या आहेत. नाबार्ड आर्थिक समावेशन धोरण विकसित करण्यास सक्रिय आहे .

◾️भूमिका :-

    नाबार्ड ही देशातील सर्वात महत्वाची संस्था आहे जी कॉटेज उद्योग, लघु उद्योग आणि ग्रामीण उद्योग आणि इतर ग्रामीण उद्योगांच्या विकासाकडे लक्ष देते.

२.नाबार्ड संबंधित देशांच्या अर्थव्यवस्थांपर्यंत पोहोचतो आणि एकात्मिक विकासास समर्थन व प्रोत्साहन देतो.

N.नबार्ड खालील भूमिका पार पाडून आपले कर्तव्य बजावते:

ग्रामीण भागातील विविध विकासात्मक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी गुंतवणूक आणि उत्पादन पत पुरवठा करणा institutions्या संस्थांसाठी एक उत्कृष्ट वित्तसंस्था म्हणून काम करते.

पतपुरवठा यंत्रणेची शोषक क्षमता सुधारण्यासाठी संस्था इमारतीच्या दिशेने उपाययोजना करणे, देखरेख करणे, पुनर्वसन योजना तयार करणे, पत संस्थांचे पुनर्गठन, कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण इ.

को-ordinates सर्व संस्था ग्रामीण आर्थिक उपक्रम क्षेत्रीय स्तरावर विकास कामात आणि संबंध कायम राखते भारत सरकार , राज्य सरकार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील संस्था धोरण स्पष्ट व स्वच्छ मांडणी संबंधित

सुरु देखरेख आणि मूल्यांकन करून कर्जाची परतफेड प्रकल्प.

ग्रामीण क्षेत्राला वित्तपुरवठा करणार्‍या वित्तीय संस्थांची नाबार्ड पुनर्वित्त करते.

ग्रामीण अर्थव्यवस्थेस मदत करणार्‍या संस्थांच्या विकासात नाबार्डचा सहभाग आहे.

नाबार्ड आपल्या ग्राहक संस्थांची तपासणी देखील करते.

हे ग्रामीण अर्थव्यवस्थेस आर्थिक मदत देणार्‍या संस्थांचे नियमन करते.

हे ग्रामीण उत्थान क्षेत्रात काम करणा the्या संस्थांना प्रशिक्षण सुविधा पुरविते.

हे संपूर्ण भारतभर सहकारी बँका आणि आरआरबीचे नियमन व देखरेख ठेवते.

नाबार्डचे मुख्य कार्यालय मुंबई, भारत येथे आहे.

◾️भूमिका

  नाबार्ड आपल्या 'एसएचजी बँक लिंकेज प्रोग्राम' साठी देखील ओळखला जातो जो भारताच्या बँकांना बचत गटांना (एसएचजी) कर्ज देण्यासाठी प्रोत्साहित करतो . मुख्यत्वे बचत गट ही मुख्यत: गरीब महिलांची रचना असल्यामुळे हे मायक्रोफाइनेन्सच्या महत्त्वपूर्ण साधन म्हणून विकसित झाले आहे . मार्च २०० By पर्यंत, lakh.3 कोटी सभासदांचे प्रतिनिधित्व करणारे २२ लाख बचत गटांना या कार्यक्रमाद्वारे पतपुरवठा करावा लागला. 

नाबार्डकडे पाण्याचे शेड विकास, आदिवासी विकास आणि शेती इनोव्हेशन सारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

◾️नियमन

नाबार्ड राज्य सहकारी बँका (एसटीबी), जिल्हा सहकारी केंद्रीय बँका (डीसीसीबी) आणि प्रादेशिक ग्रामीण बँका (आरआरबी) देखरेखीखाली ठेवतो आणि या बँकांची वैधानिक तपासणी करतो. 

◾️निर्गुंतवणूक

निर्गुंतवणुकीचा अर्थ सरकार, उद्योग किंवा कंपनीवर धोरण बदलण्यासाठी किंवा सरकारांच्या बाबतीत अगदी सत्ता बदलण्याकडे दबाव आणण्यासाठी एकत्रित आर्थिक बहिष्काराचा वापर करणे होय . हा शब्द सर्वप्रथम अमेरिकेत या दशकात वापरला गेला होता, दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदाचे धोरण रद्द करण्यासाठी दबाव आणण्यासाठी एकत्रित आर्थिक बहिष्काराचा वापर करण्यासाठी . मुदत देखील लक्ष्य क्रिया लागू केले गेले आहे इराण , सुदान , उत्तर आयर्लंड , म्यानमार , आणि इस्राएल .

सोळा महाजनपदांची प्राचीन व आधुनिक नावे

१) काशी        - बनारस
२) कोसल      - लखनौ 
३) मल्ल        - गोरखपूर
४) वत्स         - अलाहाबाद
५) चेदि          - कानपूर
६) कुरु          - दिल्ली
७) पांचाल     - रोहिलखंड
८) मत्स्य       - जयपूर
९) शूरसेन      - मथुरा
१०) अश्मक  - औरंगाबाद- महाराष्ट्र
११) अवंती    - उज्जैन
१२) अंग       - चंपा-पूर्व बिहार
१३) मगध     - दक्षिण-बिहार
१४) वृज्जी    - उत्तर बिहार
१५) गांधार    - पेशावर
१६) कंबोज   - गांधारजवळ