25 October 2021

महाराष्ट्रातील पंचायत राज

आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

●1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
स्थानिक स्वराज्य संस्था

●2.  राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
2 ऑक्टोबर 1953

●3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
16 जानेवारी 1957

●4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
वसंतराव नाईक समिती

●5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
27 जून 1960

●6.  वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
महसूल मंत्री

●7.  वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
226

●8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
जिल्हा परिषद

●9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

●10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
1  मे 1962

●11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

●12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
7 ते 17

●13.  ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
जिल्हाधिकारी

●14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे  ?
जिल्हाधिकारी

●15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ? 5 वर्षे

●16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ  कधी पासून मोजला जातो ?
पहिल्या सभेपासून

●17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
तहसीलदार

●18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
विभागीय आयुक्त

●19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
सरपंच

●20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

●21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
दोन तृतीयांश (2/3)

●22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
तीन चतुर्थांश (3/4)

●23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती  सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
पंचायत समिती सभापती

●24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

●25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
संबंधित विषय समिती सभापती

●26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

●27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
विभागीय आयुक्त

●28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
ग्रामसेवक

●29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
जिल्हा परिषदेचा

●30.  ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

●31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
ग्रामसेवक

●32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
राज्यशासनाला

●34.  सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
विस्तार अधिकारी

●35.  गटविकास  अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे  ?
ग्रामविकास खाते

●36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
जिल्ह्याचे पालकमंत्री

●37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
जिल्हाधिकारी

●38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
दहा (स्थायी+9 विषय समित्या)

●39. जिल्हा परिषदेच्या  समित्या  कोणत्या आहेत ?
स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

●40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष  कोण असतात ?
जिल्हा परिषद अध्यक्ष

●महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
वसंतराव नाईक

सामान्य विज्ञान (इयत्ता 5 वी).

शरीराच्या आतील भागात असलेल्या इंद्रियांना आंतरिंद्रिये म्हणतात.

 मेंदू, फुफ्फुसे, हृदय, इ. आंतरिंद्रियांची उदाहरणे आहेत.

 अन्नाचे पचन अन्न नलिकेमध्ये होते.

 अन्न पचनास मदत करणार्‍या रसास पाचकरस असे म्हणतात.

 तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी यामध्ये पिष्टमय पदार्थाचे प्रमाण अधिक असते.

 डाळी, मांस, दूध यामध्ये प्रथिने अधिक असतात.

 भुईमुंग, करडई यांसारख्या तेलबियात स्निग्धाचे प्रमाण अधिक असते.

 पालेभाज्यांपासून क्षार व जीवनसत्वे मिळतात.

 मोड येताना धान्यातील जीवनसत्वाचे प्रमाण वाढते.

 आंबवल्यामुळे अन्नपदार्थातील जीवनसत्वात वाढ होऊन पौष्टिकता वाढते.

 ओ.आर.एस म्हणजे ओरल रिहायड्रेशन सोल्यूशन. याचा उपयोग शरीरातील पाणी आणि क्षार यांची कमतरता भरून काढण्यासाठी होतो.

 पोटॅशिअम परमॅगनेटच्या द्रावणाने जखम धुतात आणि त्याचे स्फटिक जखमेवर दाबून बसवतात.

 खडकापासून मातीचा 2.5 सेमी पातळ थर तयार होण्यासाठी सुमारे 800 ते 1000 वर्ष लागतात.

 डोंगर उतारावर घातलेल्या बांध्ंणा ताली किंवा ओटे म्हणतात.

 पदार्थ सूक्ष्म कणांचे बनलेले असतात हे मत कणाद महर्षींनी मांडले.

 कणाद महर्षींचा जन्म इसवी सनापूर्वी 6 व्या शतकात प्रभास क्षेत्र म्हणजेच गुजराथ राज्यातील सोरटी सोमनाथ जवळच्या प्रभासपट्टम येथे झाला.

 पदार्थाच्या सूक्ष्मतिसूक्ष्म कणाला महर्षीनी 'पीलव' म्हटले आहे.

 उष्णता वाहून नेण्याची क्षमता असणार्‍या पदार्थांना उष्णतेचे सुवाहक असे म्हणतात.
 उष्णता वाहून नेण्याची क्षमता नसणार्‍या पदार्थांना उष्णतेचे दुर्वाहक असे म्हणतात.

 लोखंडाप्रमाणेच कोबाल्ट व निकेल हे धातूही चुंबकाकडे आकर्षिले जातात.

 पुन्हा पुन्हा उलट सुलट क्रमाने होऊ शकणार्‍या बदलांना परिवर्तनीय बदल असे म्हणतात.

 बाष्पीभवन, सांद्रीभवन, विरघळणे, उत्कलन आणि विलयन हे भौतिक बदलाचे प्रकार आहेत.

 लोखंडी पत्रे, नळ इ. वस्तूवर जस्ताचा पातळ लेप लावतात.

 तांब्या-पितळेच्या भांड्यांना काथिलाचा लेप देऊन कल्हई करतात.

मराठी व्याकरण - वर्णविचार

* आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनीना वर्ण असे म्हणतात. उदा क, ख, घ, ग

* मराठी भाषेत एकूण ४८ वर्ण आहेत.

* एकूण स्वर १२ आहेत.

* स्वरादी २ आहेत.

* मराठी भाषेत एकूण व्यंजने ३४ आहेत.

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

स्वर 
* ऱ्हस्व - अ इ उ ॠ ऌ
* दीर्घ - आ ई ऊ
* संयुक्त - ए [अ +ई ] ऐ ओ औ

व्यंजने 
* कठोर - क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ,
* मृदू - ग, घ, ज, झ, ड, ढ, द, ध, ब, भ,
* अनुनासिक - ड़, न, ण, म,
* अर्धस्वर - य, र, ल, व,
*  उष्मा - श, ष, स,
* महाप्राण -  ह,
* स्वतंत्र - ळ,
* क्ष व ज्ञ हि दोन जोडव्यंजने आहे.
* क्ष = क + ष,  ज्ञ = द + न + य
* कंठ्य - क, ख, ग, घ, ड़, ह, - अ, आ.
* तालव्य - च, छ, ज, ज्ञ, य, श, - इ, ई
* मृधन्य - ट, ठ, ड, ढ, ण,
* दंत्य - त, थ, द, ध, न, ल, स, - ऌ
* औष्ठय - प, फ, ब, भ, म, - उ, ऊ,
* कंठ  तालव्य - ए, ऐ
* कंठोष्ट्य - ओ, औ,
* दंतोष्ठ्य - व,
* दंत तालव्य - च, छ, झ,

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संयुक्त स्वर 
ए = अ + इ किंवा औ = आ +उ = उ
* सजातीय स्वर - एकाच उच्चारस्थानापासून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उदा - अ - आ

* विजातीय स्वर - भिन्न उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. उदा - अ - उ

* अनुनासिके - ड़, न, ण, आणि म, या वर्णाचा ऊच्चार हा त्या वर्णाच्या उच्चारस्थानाबरोबर नासिकेतून होतो. म्हणून त्यांना अनुनासिके असे म्हणतात.

🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻🔻

भाषा वाक्यांनी बनते, वाक्ये शब्दांनी बनतात आणि शब्द वर्णांनी बनतात. त्यामुळे व्याकरणाचे वर्णविचार, शब्दविचार आणि वाक्यविचार असे तीन घटक पडतात.

या लेखामध्ये आपण वर्णविचार या घटकातील काही महत्त्वाचे मुद्दे पाहू. मागील लेखात लिहिल्याप्रमाणे व्याकरणाच्या संकल्पना, नियम किंवा व्याख्या व या संदर्भात विधाने यावर गुंतागुंतीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे व्याख्या समजून घेणे व लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

वाक्य, पद, शब्द, मूलध्वनी, वर्ण, अक्षर या संकल्पना समजून घेऊन व्याख्या लक्षात ठेवायला हव्यात.

* शासन निर्णय २००९नुसार वर्णमालेमध्ये ‘अ‍ॅ’ आणि ‘ऑ’ या स्वरांचा समावेश. यामुळे आधुनिक वर्णमालेमध्ये १४ स्वर आणि ५० वर्ण.

* ‘क्ष्’ आणि ‘ज्ञ्’ ही विशेष संयुक्त व्यंजने, तर ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ ही जोडाक्षरे.

🌿संधी - महत्त्वाचे मुद्दे🌿

वर्णविचारातील संधी हा एक महत्त्वाचा घटक आहे.

* संधी हा विषय संस्कृत व्याकरणातून मराठीत आल्यामुळे संधी झालेल्या शब्दाचा विग्रह व एकत्र येणारे वर्ण यामधील ऱ्हस्व - दीर्घ बारकाईने लक्षात ठेवावे लागतात.

* स्वरसंधी, व्यंजनसंधी आणि विसर्गसंधी असे संधींचे मुख्य तीन प्रकार, त्यांचे उपप्रकार आणि मराठीचे विशेष संधी यांचा अभ्यास या घटकामध्ये आहे.
* संधींचे नियम लक्षात ठेवून त्यानुसार तयार होणारे शब्द लक्षात ठेवणे आणि उलट पद्धतीने प्रत्येक शब्द विचारात घेऊन तो कोणत्या संधिनियमाने तयार झाला असेल, याचा सराव करणे ही पद्धत जास्त उपयुक्त ठरेल.

* जास्तीत जास्त संधियुक्त शब्दांच्या विग्रहाचा सराव करणे आवश्यक आहे.
* मराठीचे विशेष संधियुक्त शब्द वगळता इतर सर्व संधियुक्त शब्द आणि त्यांच्या विग्रहातील शब्द मूळ संस्कृत असल्याने मराठीत तत्सम शब्द म्हणून गणले जातात हेही लक्षात घ्या.

* संधी घटकाचा अभ्यास उत्तमप्रकारे केला की ‘नियमानुसार शब्दलेखन’ या घटकाचाही बहुतांश अभ्यास होऊन जातो. अशा प्रकारे मुख्यत: वस्तुनिष्ठ माहितीवर आधारित वर्णविचार हा घटक तुम्हाला संपूर्ण गुण मिळवून देऊ शकतो

समानार्थी शब्द:

बदल = फेरफार, कलाटणी 
बर्फ = हिम  
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार 
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका 
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक 
बाप = पिता, वडील, जनक 
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती 
ब्रीद = बाणा   
भरवसा = विश्वास 
भरारी = झेप, उड्डाण 
भव्य = टोलेजंग
भुंगा = भ्रमर, भृंग, मिलिंद, मधुकर
भाट = स्तुतिपाठक 
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा  
भाळ = कपाळ 
भाऊ = बंधू, सहोदर, भ्राता
भेसळ = मिलावट
भेदभाव = फरक
भोजन = जेवण   
भोंग = खोपटे, झोपडी
मदत = साहाय्य 
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य 
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार 
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना 
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा  
मानवता = माणुसकी 
मान = गळा  
माणूस = मानव
मंगल = पवित्र 
मंदिर = देऊळ, देवालय
मंदपणा = मंडपाच्या
मंडपामां = मंडपामध्ये
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता 
मोहाची फुले = मोवा
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मिष्टान्न = गोडधोड
मुलगा = पुत्र, सुत, तनय, नंदन, तनुत 
मुलगी = कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा  
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन 
मुख = तोंड, चेहरा 
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा 
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता 
युक्ती = विचार, शक्कल 
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर 
येतवरी = येईपर्यंत
योद्धा = लढवय्या 
रक्त = रुधिर 
रणांगण = रणभूमी, समरांगण 
र्हास = हानी    
राग = क्रोध, संताप, चीड 
राजा = नरेश, नृप, भूपाल, राणा, राया 
राष्ट्र = देश 
रांग = ओळ 
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा  
रेखीव = सुंदर, सुबक 
लग्न = विवाह, परिणय  
लाट = लहर 
लाज = शरम, 
लोभ = हाव
लोटके = मडके
वरचा = वद्राचा
वडील = पिता
वस्त्र = कपडा 
वद्रा = वर
वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू 
वाट = मार्ग, रस्ता 
वाद्य = वाजप 
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू 
वेश = सोशाख
वेदना = यातना  
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी 
विद्या = ज्ञान 
विनंती = विनवणी 

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) मुसळधार पाऊस पडला – उद्देश्यविस्तार ओळखा.

   1) मुसळधार    2) पाऊस   
   3) पडला    4) पाऊस पडला

उत्तर :- 1

2) खालील वाक्यातील प्रयोग ओळखा.
     ‘सहलीस जाताना कात्रजजवळ उजाडले’

   1) कर्मभाव संकर प्रयोग    2) मिश्र किंवा संकर प्रयोग
   3) भावकर्तरी प्रयोग    4) कर्म – कर्त प्रयोग

उत्तर :- 3

3) पहिले पद संख्यावाचक असून त्यावरून समूहाचा बोध होत असेल तर तो ................... समास होतो.

   1) बहुव्रीही    2) कर्मधारय   
   3) व्दिगू    4) व्दंव्द

उत्तर :- 3

4) कंसातील विरामचिन्हे ओळखा. (;)

   1) अपूर्ण विराम    2) स्वल्प विराम   
   3) अर्धविराम    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

5) पुढीलपैकी कोणता शब्द फार्सीतून मराठीत आला आहे ?

   1) आसू    2) खर्च     
   3) आंबा    4) परशू

उत्तर :- 2

6) ‘व्यंगार्थ’ वाक्य कोणते ते पर्यायी उत्तरातून अचूक शोधा.

   1) आम्ही  फक्त बाजरीच खातो.
   2) देविकाबाई सुनेला म्हणाल्या, ‘सूर्य अस्ताला गेला.’
   3) घराच्या भिंतीवरून सरपटणारा एक प्राणी म्हणजे पाल.
   4) त्याच्या घरावरून गेले, की मंदिर येते.

उत्तर :- 2

7) खालीलपैकी कोणता शब्द ‘किंमत’ या अर्थाचा नाही ?

   1) मूल      2) दर्जा     
   3) भाव    4) दर

उत्तर :- 2

8) दिलेल्या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द निवडा. – कृश

   1) स्थूल    2) नैसर्गिक   
   3) गोरा    4) दोष

उत्तर :- 1

9) ‘हाजीर तो वजीर’ या म्हणीचा अचूक पर्याय पुढीलपैकी कोणता  ?

   1) बुध्दिबळाच्या खेळात ‘वजिराला’ महत्त्व असते    2) जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो
   3) ‘वजीर’ छान चित्रपट असतो        4) हजेरी बुकात नाव नोंदवणे

उत्तर :- 2

10) ‘तोंडात बोट घालणे’ – या वाक्प्रचाराच अर्थ ओळखा.

   1) भूक लागणे      2) शरण येणे   
   3) नवा हरूप येणे    4) आश्चर्यचकीत होणे

उत्तर :- 4

24 October 2021

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच


कोणत्या दिवशी ‘जागतिक रेबीज दिवस’ साजरा करतात?

(A) 29 सप्टेंबर
(B) 28 सप्टेंबर ✅✅
(C) 27 सप्टेंबर
(D) 26 सप्टेंबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या देशाने “ह्वासोंग-8” नामक हायपरसोनिक क्षेपणास्त्र विकसित केले?

(A) जपान
(B) दक्षिण कोरिया
(C) चीन
(D) उत्तर कोरिया ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या राज्यात ‘झोजीला खिंड बोगदा’ बांधण्यात येत आहे?

(A) हिमाचल प्रदेश
(B) उत्तराखंड
(C) लडाख ✅✅
(D) सिक्कीम

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या दिवशी ‘राष्ट्रीय स्वयंसेवी रक्तदान दिवस’ साजरा करतात?

(A) 28 सप्टेंबर
(B) 29 सप्टेंबर
(C) 30 सप्टेंबर
(D) 01 ऑक्टोबर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या दिवशी “जागतिक कृषि पशुधन दिवस’ साजरा करतात?

(A) 29 सप्टेंबर
(B) 30 सप्टेंबर
(C) 01 ऑक्टोबर
(D) 02 ऑक्टोबर ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीने भारत सरकारचे मुख्य जलसर्वेक्षक / हायड्रोग्राफर म्हणून पदभार स्वीकारला?

(A) व्हाइस अॅडमिरल विनय बधवार
(B) व्हाइस अॅडमिरल अधीर अरोरा ✅✅
(C) व्हाइस अॅडमिरल करमबीर सिंग
(D) व्हाइस अॅडमिरल जी. अशोक कुमार

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या दिवशी ‘जागतिक पशु / प्राणी दिवस’ साजरा करतात?

(A) 04 ऑक्टोबर ✅✅
(B) 03 ऑक्टोबर
(C) 02 ऑक्टोबर
(D) 01 ऑक्टोबर

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या कंपनीने मुंबईच्या ‘क्रेडिटमेट’ या नावाच्या डिजिटल ऋण प्रदान करणाऱ्या स्टार्टअप कंपनीचे 100 टक्के भागभांडवल विकत घेतले?

(A) व्हॉट्सअॅप
(B) फोनपे
(C) गुगल पे
(D) पेटीएम ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीला 2021 या वर्षासाठीचा ‘वयोश्रेष्ठ सन्मान’ देण्यात आला?

(A) उर्मिला शर्मा
(B) हरदेव सिंह
(C) व्ही. एस. नटराजन ✅✅
(D) यापैकी नाही

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या व्यक्तीने नागरी उड्डयन मंत्रालयाचे सचिव म्हणून पदभार स्वीकारला?

(A) राजीव बन्सल ✅✅
(B) अजय कुमार
(C) विवेक कुमार देवांगन
(D) मृत्युंजय कुमार नारायण

काहि महत्वाची कलमे(स्पेशल PSI)

काहि महत्वाची कलमे(स्पेशल PSI)
1. राष्ट्रपती - 52
2. उपराष्ट्रपती- 63
3. राज्यपाल -155
4. पंतप्रधान - 74
5. मुख्यमंत्री - 164
6. विधानपरिषद - 169
7. विधानसभा - 170
8. संसद - 79
9. राज्यसभा - 80
10. लोकसभा - 81
11. महालेखापरीक्षक :- 148
12. महाधिवक्ता - 165
13. महान्यायवादी - 75
14. महाभियोग - 61
15. केंद्रीय लोकसेवा आयोग:- 315
16. निवडणुक आयोग - 324
17. सर्वोच्च न्यायालय - 124
18. उच्च न्यायालय- 214
19. जिल्हा न्यायालय- 233
20. राष्ट्रीय आणिबाणी - 352
21.राष्ट्रपती राजवट- 356
22.आर्थिक आणिबाणी-360
23. वित्त आयोग - 280
24. घटना दुरुस्ती - 368
25. ग्रामपंचायत - 40

भारतीय राज्यघटना प्रश्नसंच

१) श्री. एक्स हे अनिवासी भारतीय नागरिक आहेत. त्यांना लोकसभेच्या निवडणुकांमध्ये मतदान करावयाचे आहे. त्यांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाली आहेत. ते कशाप्रकारे मतदान करू शकतील ?

   अ) ते मतदान करु शकरणार नाहीत.

   ब) ते त्यांची मतपत्रिका पोस्टाने पाठवू शकतील.

   क) ते परदेशातील भारतीय दूतवासात जाऊन मतदान करु शकतील.

   ड) भारतीय निवडणुक आयोगाने तयार केलेल्या संकेत स्थळावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   इ) भारतात जिथे त्यांची मतदार म्हणून नोंद झाली आहे. अशा मतदान केंद्रावर जाऊन ते मतदान करु शकतील.

   1) अ हे बरोबर उत्तर आहे  
   2) इ हे बरोबर उत्तर आहे
   3) क हे बरोबर उत्तर आहे    
   4) ब, क आणि ड ही सर्व बरोबर उत्तरे आहे

उत्तर :- 2

२) खालील जोडया जुळवा :

   अ) मुलभूत अधिकार      i) भाग I

   ब) राज्यनितीची मार्गदर्शक तत्वे    ii) भाग II

   क) संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र    iii) भाग III

   ड) नागरिकत्व        iv) भाग IV

  अ  ब  क  ड

         1)  i  ii  iii  iv
         2)  ii  i  iv  iii
         3)  iv  iii  ii  i
         4) iii  iv  i  ii

उत्तर :- 4

३) भारतीय नागरिकत्व हिरावून घेतल्याने नष्ट होते याबाबत खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?

   1) नागरिकाने लबाडीने नागरिकत्व ‍मिळविले असेल.

   2) नागरिकाने भारतीय राज्यघटनेप्रती बेईमानी दाखविली.

   3) नागरिक सामान्यपणे सलग वर्षे भारताबाहेर राहिला.

   ४३४) नागरिकास नोंदणीनंतर पाच वर्षाच्या आत अन्य देशात एक वर्षांचा तुरुंगवास झाला.

उत्तर :- 4

4) ओ.बी.सी. चळवळ .................. प्रभावीत झाली.

   1) मंडळ आयोगामुळे  
  2) महाजन आयोगामुळे
   3) सरकारिया आयोगामुळे  
4) फजल अली आयोगामुळे

उत्तर :- 1

५) भारताच्या राज्यघटनेच्या ............... भागात नागरिकांच्या मूलभूत हक्कांविषयी तरतूदी करण्यात आल्या.

   1) पहिल्या    2) दुस-या   
3) तिस-या    4) चौथ्या

उत्तर  :- 3

६) राज्यांची पुनर्रचना किंवा संघराज्य संबंध याच्याशी संबंधित आयोग व समित्या कोणत्या आहेत ?

   अ) जे.व्हि.पी. समिती  

   ब) सरकारीया आयोग   

   क) इंद्रजित गुप्ता समिती 

   ड) राजमन्नार समिती

   1) फक्त अ, ब, क    2) फक्त अ, ब, ड    3) फक्त अ, क, ड    4) फक्त ब, क, ड

उत्तर :- 2

७) भारतीय संघराज्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या :

   अ) भारतीय राज्यघटनेच्या तिस-या कलमानुसार संसदेला नवीन राज्य निर्माण करण्याचा, त्यांचे क्षेत्र कमी करण्याचा किंवा त्यांचे नाव बदलण्याचा अधिकार आहे.

   ब) राज्यघटना दुरुस्तीच्या प्रक्रियेत राज्ये सहभागी होत नाहीत.

        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?

   1) फक्त अ      2) फक्त ब   
3) अ आणि ब    4) वरीलपैकी एकही नाही

उत्तर :- 1

८) . नागपूर कराराच्या कोणत्या तरतूदी आहेत ?

   अ) विकास व प्रशासनासाठी महाराष्ट्राची तीन विभाग – महाविदर्भ, मराठवाडा, राज्याचा उर्वरित भाग

   ब) मराठवाडयाच्या विकासाकडे विशेष लक्ष

   क) उच्च न्यायालयाचे मुख्यपीठ मुंबई येथे तर दुसरे पीठ नागपूर येथे

   ड) नागपूर येथे विधीमंडळाचे एक अधिवेशन राहील

   1) फक्त अ, ब, क  
2) फक्त अ, क, ड  
3) फक्त क, ड, ब  
4) वरीलपैकी सर्व
उत्तर :- 4

९)  भारतीय ‘नागरिकत्व कायदा’ केव्हा बनविण्यात आला ?

   1) 1956      2) 1955   
  3) 1935      4) 1951

उत्तर :- 2

१०) संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरता कोणती अट आवश्यक नव्हती ?

   1) भारताचा अधिवास आणि
   2) भारतात जन्म किंवा
   3) माता व पितांचा भारतात जन्म किंवा
   4) अशा प्रारंभापूर्वी किमान 5 वर्षे भारतात सामान्यत: निवास

उत्तर :- 3

राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 1

◆ इ.स. 1905 बनारसच्या अधिवेशनात अध्यक्ष नामदार गोखल्यांनी ब्रिटिश सामज्यांतर्गत स्वराज्याचे ध्येय ठरवले.

◆ इ.स. 1906 कोलकत्ता अधिवेशनात अध्यक्ष दादाभाई नौरोजीनी ‘स्वराज्य’ हे अंतिम उद्दिष्ट असल्याचे सांगितले. राष्ट्रीय सभेच्या व्यासपिठावरून ‘स्वराज्य’ या ध्येयाची प्रथमच घोषणा. याच अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव मंजूर करण्यात आला.

◆ 1907 च्या सुरत अधिवेशनात जहाल व मवाळ यांच्यात फूट पडून काँग्रेसचे विभाजन झाले.

◆ व्हाईसरॉय कर्झनच्या राजीनाम्यानंतर लॉर्ड मिंटो व्हाईसरॉय बनला.

◆ भारतातील सर्वात लोकप्रिय व्हाईसरॉय म्हणून रिपनला ओळखतात.

◆ हार्डिंगने ब्रिटिशांची राजधानी कोलकत्याहून दिल्लीला हलवली.

◆ भारतमंत्री मॉन्टेंग्यूच्या रीपोर्टनूसार व्हाईसरॉय चेम्सफोर्डने प्रांतात वैध प्रशासनाचा (व्दिदल शासनपद्धती) प्रारंभ केला.

◆ 1919 ला पंजाब प्रांतात व्हाईसरॉय चेम्सफोर्डने रौलेट अॅक्ट लागू केला.

◆ 13 एप्रिल 1919 रोजी जालीयनवाला बाग हत्याकांड घडले.

◆ लखनौ अधिवेशन (1916): या अधिवेशनात काँग्रेस 1907 नंतर सांधली गेली. या अधिवेशनाचे अध्यक्ष बाबू अंबिकाचरण मुजूमदार. या अधिवेशनात 1909 च्या मॉर्ले मिंटो कायद्याव्दारे मुस्लिमांना दिलेल्या स्वतंत्र मतदार संघाची तरतूद काँग्रेसने मान्य केली.

◆ होमरूल चळवळ म्हणजे आपल्या देशाचा कारभार करण्याचा अधिकार आपणास मिळणे होय.

◆ होमरूल चळवळ प्रथम आयर्लंडमध्ये सुरू केली होती.होमरूल चळवळ भारतात सुरू करण्याचे श्रेय आयरिश विदुषी अॅनी बेझेंटकडे जाते.

◆ 1 सप्टेंबर 1916 पासून मद्रास प्रांतात अॅनी बेझंट यांनी होमरूल चळवळ सुरू केली. एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी बेळगाव येथे स्वतंत्रपणे होमरूल चळवळीसाठी संघटना स्थापन केली.

★ राष्ट्रीय सभेची वाटचाल (1905-1920) भाग 2

◆ टिळकांनी स्थापन केलेल्या होमरूल लिगचे अध्यक्ष – बॅरिस्टर बॅप्टीस्टा तर सचिव: न.ची. केळकर

◆ ब्रिटिश साम्राज्यांतर्गत वसाहतीच्या स्वराज्याची निर्मिती हे होमरूल चळवळीचे उद्दिष्ट होते.होमरूल चळवळीमुळेच ब्रिटीश सरकारला ऑगस्ट 1917 मध्ये भारतात टप्या टप्याने वसाहतीचे स्वातंत्र्य देण्याबाबतची घोषणा करावी लागली.

◆ अॅनी बेझंट यांनी ‘कॉमनविल’ हे साप्ताहिक व ‘न्यू इंडिया’ हे दैनिक सुरू केले.

◆ 1917 च्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून अॅनी बेझंट यांची निवड करण्यात आली.

◆ 1916 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मुस्लीम लीगच्या स्वतंत्र मतदार संघास मान्यता दिली.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ रौलेट अॅक्ट – राजद्रोह्यांना आळा घालण्यासाठी विनाचौकशी डांबून ठेवण्याचा अधिकार या कायद्यान्वये सरकारला मिळाला. हा कायदा 18 मार्च 1919 मध्ये पास झाला.

◆ जालीयनवाला बाग हत्यांकांड- 13 एप्रिल 1919, रौलेट कायद्याचा निषेध व डॉ. किचलू आणि डॉ. सत्यपाल यांच्या अटकेचा निषेध करण्यासाठी अमृतसर येथे भरलेल्या सभेवर जनरल डायरने 1600 फैरी झाडल्या.

◆ जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने ऑक्टोबर 1919 मध्ये हंटर कमिशन नेमले.

◆ खिलाफत चळवळ – 1919 (अलीबंधूंनी सुरू केली) 24 नोव्हेंबर 1919 रोजी दिल्ली येथे अखिल भारतीय खिलाफत परिषदेचे आयोजन करण्यात आले.

◆ या परिषेदेचे अध्यक्ष माहात्मा गांधी होते.

◆ तुर्कस्थानाच्या पाशाला पाठींबा दर्शविण्यासाठी ब्रिटिशाविरुद्ध एकत्र येऊन चळवळ करणार्‍या चळवळीस खिलाफत चळवळ म्हटले जाते.

◆ 20 फेब्रुवारी 1920 रोजी नागपूर येथे खिलाफत सभेचे खास अधिवेशन भरले. या अधिवेशनात असहकार चळवळीस पाठींबा दर्शविला.

◆ 1 ऑगस्ट 1920 ला असहकार चळवळ प्रारंभ करण्याची गांधीजींची घोषणा केली.