01 November 2021

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘विटीदांडू’ हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे?

   1) वैकल्पिक व्दंव्द    2) समाहार व्दंव्द   
   3) अव्ययी भाव      4) बहुव्रीही

उत्तर :- 3

2) उद्गारातील भाव सौम्य असतो म्हणून केवलप्रयोगी अव्ययानंतर खालील कोणते विरामचिन्ह वापरले जाते ?

   1) अर्धविराम    2) स्वल्पविराम    3) पूर्णविराम    4) अपसारणचिन्ह

उत्तर :- 2

3) ‘मेघासम तो श्याम सावळा’ या वाक्यातील अलंकार ओळखा.

   1) रूपक    2) उपमा      3) श्लेष      4) यमक

उत्तर :- 2

4) सिध्द शब्द निवडा.

   1) गुरू      2) गुरूने      3) गुरूला    4) गुरूच्या

उत्तर :- 1

5) ‘पानीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली’ हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ?

   1) अभिधा    2) लक्षणा    3) व्यंजना    4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 2

6) पुढीलपैकी कोणता शब्द ‘फूल’ या अर्थाचा नाही?

   1) कुसुम    2) सुमन      3) पुष्प      4) पाकळी

उत्तर :- 4

7) ‘पुढारी’ या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द कोणता ?

   1) अनुनय    2) अनुयायी    3) अनुभूती    4) अनुचित

उत्तर :- 2

8) स्पष्टीकरणासाठी म्हण देणे. – ‘अत्यंत गरीब स्थिती असणे.’

   1) बुडत्याला काडीचा आधार    2) भुकेला कोंडा निजेला धोंडा
   3) रोज मरे त्याला कोण रडे    4) केळीवर नारळी अन् घर चंद्रमौळी

उत्तर :- 4

9) ‘आवाक्याबाहेरची गोष्ट करू पाहणे’ या अर्थाचा खालीलपैकी वाक्प्रचार कोणता ?

   1) आकाश फाटणे    2) अस्मान ठेंगणे होणे
   3) आभाळ कोसळणे    4) आकाशाला गवसणी घालणे

उत्तर :- 4

10) ‘चुकीच्या बाबींसाठी पराकोटीचा आग्रह धरणारा’ या शब्दसमूहाबद्दल पुढील शब्द वापरतात.

   1) अनाग्राही    2) दुराग्रही    3) पंचशील    4) पंचीकृत

उत्तर :- 2

पोलीस भरती साठी महत्वाचे प्रश्न

1) ‘युरोपियन ओपन 2019’ ही स्पर्धा कुणी जिंकली?
उत्तर : अँडी मरे

2) आंतरराष्ट्रीय सामाजिक सुरक्षा संघटने (ISSA)ची स्थापना कोणत्या साली झाली?
उत्तर : सन 1927

3) भारतीय बँक संघाचे (IBA) अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : रजनीश कुमार

4) ‘एशियन ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद 2019’ या स्पर्धेत कोणत्या भारतीयाने सुवर्णपदक पटकावले?
उत्तर : रोनाल्डो सिंग

5) ‘स्टार्टअप शिखर परिषद’ कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती?
उत्तर : नवी दिल्ली

6) ‘नॉन-अलाइन्ड मूव्हमेंट (NAM) शिखर परिषद 2019’ कुठे भरणार आहे?
उत्तर : बाकू

7) वित्तीय कृती दलाच्या (FATF) ‘ग्रे लिस्ट’ मधून कोणत्या देशाला हटविण्यात आले आहे?
उत्तर : श्रीलंका

8) सुलतान ऑफ जोहोर चषक या पुरुष हॉकी स्पर्धेत कोणत्या संघाने भारताला पराभूत केले?
उत्तर : ग्रेट ब्रिटन

9) फेब्रुवारी 2020 मध्ये ‘डिफेन्स एक्सपो’ कुठे भरवण्यात येणार आहे?
उत्तर : लखनऊ

10) सॅंटियागो शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर : चिली

महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव

1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
1. गुजरात 🔸🔸
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1.दिल्ली 🔸🔸
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान 🔸🔸
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
1.02
2.06
3.07
4.05 🔸🔸
👉 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व 🔸🔸

6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?
1. ग्वाल्हेर 🔸🔸
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे 🔸🔸
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर 🔸🔸
2. 1, 2बरोबर
3. 3, 4बरोबर
4. सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र 🔸🔸
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?
1. नर्मदा व तापी 🔸🔸
2.  तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश 🔸🔸
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम 🔸🔸
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?
1. चेन्नई
2. कोलकत्ता 🔸🔸
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद 🔸🔸
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा 🔸🔸

  🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

30 October 2021

खालाटी आणि वलाटी

◼️ खालाटी  ( पश्चिम कोकण  )◼️

▪️समुद्रकिनाऱ्यास लागून असलेला कमी उंचीचा भाग

▪️येथे गाळाची चिंचोळी मैदाने आढळतात तसेच या भागात नारळीच्या व सुपारीच्या बागा जास्त आहेत

◾️वलाटी ( पूर्व कोकण) ◾️

▪️सह्याद्री पर्वताच्या पश्चिमेकडील भागाचा यात समावेश होतो.

◾️अधिक उंच सखल भाग असल्यामुळे येथे शेतीची अत्यल्प विकास झालेला आहे.

◾️या भागात फलोत्पादन केले  जाते. यामध्ये फणस आणि आंबा ही प्रमुख फालोत्पादन केले जाते. यामध्ये फणस आंबा ही प्रमुख फलोत्पादन पिके आहेत

कोकणची माहिती

🔹कोकणात उतरणाऱ्या घाटांचा क्रम :

[उत्तरेकडुन दक्षिणेकडे ]

1) थळघाट
2) बोरघाट
3)ताम्हीणी
4)वरंधा
5)कुंभार्ली
6) आंबा घाट
7) फोंडा घाट
8)आंबोली घाट

🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे कोकणातील नद्यांचा क्रम

1) सूर्या नदी
2) वैतरणा नदी
३) उल्हास नदी
4) अंबा नदी
5) सावित्री
6) वाशिष्ठी
7) काजळी
8)वाघोठाण
9)कर्ली
10) तेरेखोल

🔹खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे खालीलप्रमाणे

1)डहाणूची खाडी
2) दातिवऱ्याची खाडी
3) वसईची खाडी
4) धरमतरची खाडी
5) रोह्याची खाडी
6) राजपुरीची खाडी
7) बाणकोटची खाडी
8) दाभोळची खाडी
9) जयगडची खाडी
10) विजयदुर्गची खाडी
11) तेरेखोलची खाडी

प्रश्न मंजुषा

चंद्राचा किती टक्के भाग पृथ्वीवरून दिसतो?

1)59%✅
2)48%
3)49%
4)9%

सूर्याची किरणे पृथ्वीवर येण्यास किती वेळ लागतो?

1)9 मिनिट
2)8 मिनीट✅
3) 7 मिनिट
4)5 मिनिट

*मुचकुंदी प्रकल्प कोणत्या दोन राज्यात आहे?*

1)आंध्रप्रदेश ओरिसा ✅
2)महाराष्ट्र मध्य प्रदेश
3)छत्तीसगड मध्यप्रदेश
4)महाराष्ट्र तेलंगणा

उकाई प्रकल्प कोणत्या नदीवर आहे?

1) तापी✅
2) गोदावरी
3) नर्मदा
4) गंगा

कोकणाची सरासरी रुंदी............की. मी आहे.

1)30 ते 50
2)35 ते 55
3)30 ते 60✅
4)15 ते 30

भामरागड टेकड्या खालीलपैकी कोठे स्थित आहेत?

1)चंद्रपूर
2) भंडारा
3) गडचिरोली ✅
4) गोंदिया

बिग- बॅग थेअरी प्रत्यक्षात इतिहास पूर्वकालीन अनुचा सिद्धांत सर्वप्रथम ....... प्रस्तावित केला  होता?

1)अल्बर्ट आईन्स्टाईन
2)जॉर्जस लिमैत्रे✅
3)आयसॅक न्यूटन
4)स्टिफन हॉकिंग

असा कोणता देश आहे ज्यात कोणताही खानिज आढळत नाही?

1) फ्रान्स
2)पेरू
3)स्विझर्लांड ✅
4)स्वीडन

पुलर लेणी कोणत्या जिल्ह्यात आढळते?

1) नागपूर ✅
2) औरंगाबाद
3) बुलढाणा
4) नाशिक

पृथ्वी आणि सूर्य यांच्या मधील सरासरी अंतर किती आहे?

1)150 दशलक्ष किमी✅
2)150 लक्ष किमी
3)150 प्रकाश वर्ष
4)150 कोटी किमी

महाराष्ट्र राज्याच्या उत्तर सीमेवर कोणते डोंगर स्थित आहे?

सातपुडा....

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

महाराष्ट्रातील महत्त्वाची शहरे

◆पुणे:-राष्ट्रीय हरित न्यायाधीकरणाचे महाराष्ट्रातील पहिले हरित विद्यापीठ

◆सिंधुदुर्ग:- महाराष्ट्रातील पहिला ई-ऑफीस प्रणाली राबविणारा जिल्हा

◆नागपूर:-महाराष्ट्रातील पहिली सीएनजी गॅसवर आधारीत शहर बस सेवा सुरु

◆ठाणे:- महाराष्ट्रातील पहिली व्हिडीओ कॉन्फरन्स् जोडलेली पहिली जिल्हा परिषद

◆सांगली:- महाराष्ट्रातील उसाच्या मळीपासून मद्य निर्मीती करणारा पहिला कारखाना

◆रायगड:-  महाराष्ट्रातील पहिले गिधाड अभयारण्य

◆बोल्डावाडी (हिंगोली):-  महाराष्ट्रातील इको-व्हिलेजचा पहिला प्रयोग

◆अंधेरी:- महाराष्ट्रातील पहिले अधिकृत इलेक्ट्रानिक कचरा गोळा करण्याचे केंद्र

◆ सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिली मासळी वरील रोगनिदानासाठी उभारण्यात आलेली प्रयोगशाळा

◆सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आदिवासी आश्रमशाळेत क्रिडा प्रबोधनी स्थापन केली

◆चंद्रपूर:- महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव उपचार केंद्र

◆चंद्रपूर:- महाराष्ट्रातील पहिले सॅटेलाईट सिकलसेल रिसर्च सेन्टर

◆ गडचिरोली:- महाराष्ट्रातील पहिला ई-विद्या प्रकल्प राबविणारा जिल्हा

◆इस्लामपूर (सांगली) :- महाराष्ट्रातील पहिली मोफत 4 - जी वाय-फाय सुविधा देणारी नगरपालिका

◆पाचगाव (नागपूर) :- महाराष्ट्रातील पहिले मोफत वाय-फाय सुविधा देणारे गाव

◆परसोडी (यवतमाळ):- महाराष्ट्रातील पहिली ग्रामपंचायतीमध्ये ई-बँक सेवा देणारी ग्रामपंचायत

◆लेखामेंडा (गडचिरोली):- महाराष्ट्रातील पहिले बांबु विक्रीचा अधिकार मिळणारे गांव

◆चंद्रपूर एस.टी. आगार:- महाराष्ट्रातील पहिले स्तनपान कक्ष

◆चंद्रपूर जिल्हापरिषद:- महाराष्ट्रातील पहिली ऑनलाईनद्वारे ग्रामसभा उपक्रम राबविणारी पहिली जिल्हा परिषद

◆पुणे:- महाराष्ट्रातील पहिले निर्भया केंद्र

◆सोलापूर :- महाराष्ट्रातील पहिला फॉरेस्ट सायबर सेल

देशातील पहिल्या घटना


देशातील पहिले सोलर सिटी - मलकापूर (सातारा)

देशातील पहिले बाल न्यायालय - दिल्ली

देशातील पहिले महिला न्यायालय - आंधप्रदेश

देशातील पहिले आधार गाव - टेंभली (नंदूरबार)

देशातील पहिले हरीत शहर - आगरतळा (त्रिपुरा) (दूसरे - नागपूर)

देशातील पहिली फूड बँक - दिल्ली

देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य- उत्तराखंड

देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क - भुवनेश्‍वर

देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज - काटेवाडी

देशातील पहिले अपारंपारीक उर्जा धोरण जाहीर करणारे राज्य- महाराष्ट्र

देशातील पहिला निर्मल जिल्हा - कोल्हापूर

देशातील पहिली हॉल्टीकल्चर रेल्वे येथे सुरु झाली - भुसावळ - आजदपूर

देशातील पहिली ऑनलाईन ब्रेक लायब्ररी - मुंबई

देशातील पहिले स्थानिक स्वराज्य संस्थेत मतदान अनिवार्य करणारे राज्य - गुजरात

देशातील पहिली संत्रा वायनरी - सावरगाव (नागपूर)

देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संम्मेलन - पुणे

देशातील पहिली ई-जीपीएफची सुरूवात - अरुणाचल प्रदेश

देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ - नागपूर

देशातील क्रिडा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

देशातील युवा धोरण राबविणारे पहिले राज्य - महाराष्ट्र

देशातील पहिली राष्ट्रीय सागर अकादमी - चैन्नई

देशातील पहिले क्रिकेट संग्रहालय - ब्लेडस् ऑफ ग्लोरी (पुणे)

देशातील पहिले दूरदर्शन केंद्र - दिल्ली

देशातील पहिले हवामान संशोधन केंद्र - पुणे

देशातील पहिले विशेष व्याघ्र संरक्षण दल तैनात करणारे राज्य - कर्नाटक

देशातील पहिला वाघांच्या रेडिओ कॉलरिंगचा प्रयोग करणारा व्याघ्र प्रकल्प - ताडोबा (चंद्रपूर)

देशातील पहिले कार्बनमुक्त राज्य - हिमाचलप्रदेश

देशातील पहिली इलेक्ट्रीक धूर न सोडणारी बस येथे सुरू झाली - बंगलोर

देशातील पहिले नोटा (नकाधिकार) स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूकीत उपलब्ध करून देणारे राज्य - महाराष्ट्र

देशातील पहिला घन कचर्‍यापासून उर्जानिर्मिती करणारा प्रकल्प या महानगर पालिकेने सुरु केला आहे - पुणे

देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे देशातील पहिले राज्य - सिक्किम

देशातील पहिले भुजलासंबंधी कायदे करणारा राज्य - महाराष्ट्र

देशातील पहिली गुप्तवार्ता प्रबोधिनी- पुणे

देशातील पहिले तंबाखूमुक्त गाव - सदरहू (नागालँड)

देशातील पहिले झोपडपट्टीमुक्त शहर - चंदीगड

देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर - झारखंड

देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य - आंध्रप्रदेश

देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अ‍ॅक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ - राज्यस्थान

देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र - हडपसर  (पुणे)

देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य - महाराष्ट्र

•देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)​

प्रदेश संकल्पना

प्रदेश म्हणजे काय? याचे अगदी साधे सरळ उत्तर ‘एखाद्या विस्तीर्ण क्षेत्राचा लहानसा भाग’ असे सहजपणे देता येईल. एखादे क्षेत्र जेव्हा प्रदेश म्हणून विचारात घेतले जाते तेव्हा त्यात पुढील गोष्टी असणे अपेक्षित असतात.

कमीत कमी एका किंवा जास्त गुणधर्माबाबत क्षेत्रात साम्यता/एकरुपता असणे.
क्षेत्रीय संलग्नता.
क्षेत्रास सर्वसामान्य व्यक्तिमत्व असणे
साधर्म्य.
बहुतांश कापूस क्षेत्र मध्यम पर्जन्याच्या प्रदेशात एकवटलेले आहे.

भूमी संसाधने व भूमी उपयोजन

महाराष्ट्राचे क्षेत्रफळ सुमारे 3,07,580 चौ.किमी आहे.
भूमी संसाधनांचा सर्वात जास्त वापर शेतीसाठी केला जातो.
शेतीसाठी भूमीची उपलब्धता उंचसखलपणा आणि उतार यांवर ठरते. तर तिची शेतीसाठीची उपयुक्तता प्रदेशातील पर्जन्यावर व मृदांच्या स्थितीवर ठरते.
कोकण व पश्‍चिम घाट या भागात उंचसखलपणा जास्त आहे. त्यामुळे तेथील भूमीच्या वापरावर मर्यादा पडतात.
राज्यातील पूर्वेकडील प्रेदशात इतर उद्देशांसाठी विशेषत: वनक्षेत्र तसेच खनिज उत्पादनासाठी बरीचशी जमीन वापरली जात असल्याने या भागातही शेतीसाठी जमीन कमी प्रमाणात उपलब्ध होते.
मध्य महाराष्ट्रात पर्जन्य कमी प्रमाणात मिळते. अर्थात यामुळे जमिनीची उपलब्धता कमी होत नाही, मात्र तिची शतीसाठी उपयुक्तता बरीचशी कमी होते.
तापी, गोदावरी, वर्धा-वैनगंगा, भीमा, कृष्णा इत्यादी नद्यांच्या पूर मैदानाच्या भागातील भूमी त्यामानाने शेतीसाठी उपयुक्त आहे.

१. लागवडीखालील क्षेत्र

महाराष्ट्राला लाभलेल्या भूमीपैकी 56.6 टक्के क्षेत्राचा उपयोग पिके घेण्यासाठी केला जातो. यालाच लागवडीखालील क्षेत्र म्हणतात.
प्राकृतिक रचना, हवामान, मृदा, जलसिंचन सुविधा, उताराचे स्वरुप यांचा परिणाम लागवडीखालील क्षेत्रावर होतो.
पश्‍चिम महाराष्ट्र आणि विदर्भ येथील 70 टक्के क्षेत्र लागवडीखाली आहे.
कोकण तसेच पूर्व विदर्भामध्ये जमिनीचे तीव्र उतार व वनांचे आच्छादन यामुळे लागवडीखालील क्षेत्र कमी आहे.
वाढत्या लोकसंख्या आणि नागरीकरण यामुळे शेतजमिनीचा वापर घरांसाठी, वस्त्यांसाठी होत असल्याने शहरी भागाजवळील लागवडीखालील क्षेत्रामध्ये घट होत आहे.

२. वनक्षेत्र

महाराष्ट्रामध्ये पडणारा सरासरी पर्जन्य सुमारे 1000 मिमी आहे. पर्जन्याच्या वितरणावर वनाचे क्षेत्र अवलंबून असते.
सह्याद्रीच्या पूर्व उतारावरील नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या पश्‍चिम भागात वने आढळतात.
मध्ये महाराष्ट्र हे अवर्षणप्रवण क्षेत्र असल्याने वनांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. तेथे सपाट भूमीचा वापर शेतीसाठी केला जातो.
प्रत्येक प्रदेशाचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी एकूण भूमीच्या 33 टक्के क्षेत्र वनांखाली असणे आवश्यक असते. महाराष्ट्रात हे प्रमाण खूप कमी आहे. राज्याच्या 17 टक्के क्षेत्रामध्ये वने आहेत.
वनांचे क्षेत्र वाढवण्यासाठी सामाजिक वनीकरण योजना राबवून वनांखालील क्षेत्र वाढवण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे.

३. पडीक क्षेत्र

ज्या क्षेत्रामध्ये कधीही पीक घेणे शक्य नसते ते कायम पडीक क्षेत्र होय.
मुसळधार पर्जन्यामुळे मृदेचा उत्पादक थर वाहून जातो व जमिनी कायमच्या नापीक होतात. तसेच काही जमिनीवर पाणी साठून तेथे दलदल तयार होते त्यामुळे पीक येऊ शकत नाही. विशेषत: कोकण किनार्‍यावरील खारभूमी प्रदेश कायम पडीक स्वरुपात आहेत.
महाराष्ट्राचे मोठे क्षेत्र पर्जन्याव अवलंबून आहे. एखाद्या वर्षी पेरणीसाठी आवश्यक तेवढा पाऊस झाला नाही तर जमिनी पडीक ठेवाव्या लागतात. अशा जमिनी चालू पडीक क्षेत्र म्हणून ओळखल्या जातात.
जलसिंचन सुविधा पुरवल्यास हे क्षेत्र लागवडीयोग्य बनवता येईल. तसेच त्या जमिनीचा वनशेती किंवा फलोत्पादनासाठी उपयोग करता येईल.
कोणत्याही प्रदेशातील भूमी उपयोजन हे शेती व्यवसायावर नियंत्रण करणारे प्राकृतिक घटक आण आजचा समाज यांच्या परस्परक्रियेतून निर्माण होत असते.


४. बिगर शेती क्षेत्र

ज्या क्षेत्रामध्ये शेती केली जात नाही त्या क्षेत्राला बिगरशेती क्षेत्र असे म्हणतात. वसाहतीसाठी भूमीचा वापर केला जातो.
महाराष्ट्रामध्ये नागरीकरण तसेच औद्योगिकीकरण वेगाने वाढत आहे. अन्य वापरात असलेल्या क्षेत्राचा उपयोग वस्त्यांसाठी किंवा उद्योगधंद्यासाठी केला जात आहे.

१. काळी मृदा

बेसॉल्ट खडकाचा अपक्षय होऊन या मृदेची निर्मिती होते. या मृदेस रेगूर मृदा असेही म्हणतात.
मृदेतील टिटॅनिफेरस मॅग्रेटाईट या घटक द्रव्यामुळे काळा रंग प्राप्त होतो.
या मृदेमध्ये चुनखडी, पोटॅश, लोह, कॅल्शियम, मॅग्रेशियम या घटक द्रव्यांचे प्रमाण असते. तर नायट्रोजन फॉस्फरस आणि सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण कमी असते.
ही अत्यंत सुपीक मृदा आहे.यामध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता जास्त असते.
महाराष्ट्रात ही मृदा प्रामुख्याने अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, अहमदनगर, जळगाव जिल्ह्यांमध्ये आढळते.
महाराष्ट्रात काळ्या मृदांमध्ये कापूस, ऊस, फळे, गहू, ज्वाररी, कडधान्ये ही पिके घेतली जातात.

२. जांभी मृदा

2000 मिमी पेक्षा जास्त पर्जन्य व निश्‍चित कोरडा कालखंड असलेल्या प्रदेशात जांभी मृदा आढळते.
सतत पाणी झिरपण्याने खडकातील क्षार व सिलिकाचे कण वाहून नेले जातात. परिणामत: लोह व अल्युमिनियम मृदातील प्रमाण वाढते.
या मृदेमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, सेंद्रिय पददार्थ या द्रव्यांचे प्रमाण कमी असते. या मृदेची सुपीकता कमी आहे.
महाराष्ट्रात रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सातारा जिल्हयात ही मृदा आढळते.
या मृदेमध्ये तांदूळ हे प्रमुख पिके घेतली जाते. डोंगर उतारावर फलोत्पादन केले जाते.

३. गाळाची मृदा

सततच्या संचयनामुळे नदी खोर्‍यांच्या सखल भागात विशेषत: पूर मैदानात ही मृदा आढळते.
बारीक पोत व पाण्याची सहज उपलब्धता यामुळे सतत नवीन गाळ येत राहण्यामुळे ही मृदा सुपीक बनते.
महाराष्ट्रातील मुख्य नद्यांच्या सखल भागात व पूर मैदानात ही मृदा आढळते.
उत्तर महाराष्ट्रातील तापी-पूर्णा खोर्‍यात खूप खोलवर गाळाचे संचयन झाले आहे. या भागात विस्तीर्ण गाळाच्या मृदांचे क्षेत्र आहे.
गाळाची मृदा सुपीक असल्याने या मृदेत विविध पिकांचे उत्पादन घेतले जाते.

४. तांबडी-पिवळसर मृदा

महाराष्ट्रात अतिप्राचीन काळातील गॅ्रनाईट आणि नीस प्रकारच्या खडकांवर अपक्षय क्रिया होऊन तांबडी मृदा तयार झालेली आहे.
ही चिकणमाती व वाळूमिश्रित मृदा असून, तिच्यात लोहाचे प्रमाण जास्त असल्याने तिला तांबडा रंग प्राप्त होतो.
तिचा रंग पिवळा, तपकिरी किंवा राखाी असू शकतो.
मृदेमध्ये चुनखडी, कार्बोनेट, फॉस्फरिक अ‍ॅसिड, सेंद्रिय द्रव्य व पोटॅशचे प्रमाण अत्यल्प असते.
ही मृदा नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यात आहे.
या मृदेमध्ये बाजरी, भुईमूग, बटाटे आणि भात ही पिके घेता येतात.

मृदेची अवनती

मृदांची सुपीकता कमी होणे, त्यांच्या गुणात्मक पातळीचा र्‍हास होणे या स्थितीला मृदेची अवनती असे म्हणतात.
मृदेचा अतिवाप, अतिजलसिंचन, रासायनिक खतांचा अतिवापर इत्यादीमुळे मृदेची अवनती होते.
चक्रीय पीक पद्धती, जमीन काही काळ पडीक ठेवणे, सेंद्रिय खतांचा वापर इत्यादी उपयांद्वारे मृदेची अवनती कमी करता येते.
महाराष्ट्रात जलसिंचन क्षेत्रात मृदा अवनतीची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. आणि जलसिंचनामुळे मृदेच्या खोल थरातील क्षार मृदेच्या वरच्या थरात जमा होऊन वरचा थर नापीक बनतो. त्यामुळे जलसिंचन प्रदेशातील विस्तारीत क्षेत्र पीक लागवडीसाठी अयोग्य झाले आहे.