Ads

21 November 2022

भारताची राज्यघटना कशी तयार करण्यात आली?

भारताची राज्यघटना कशी तयार करण्यात आली?

प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ दिली, तो 30 जानेवारी 1950चा क्षण.

प्रथम राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी जवाहरलाल नेहरू यांना स्वतंत्र भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ दिली, तो 30 जानेवारी 1950चा क्षण.

भारत 15 ऑगस्ट 1947ला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि 26 जानेवारी 1950 आपली राज्यघटना अंमलात आली. म्हणजेच भारत देश प्रजासत्ताक झाला.

याच राज्यघटनेनुसार आजही आपलं सरकार, आपली राज्यव्यवस्था आणि एकूणच राज्यकारभार चालतो.

मग प्रश्न पडतो की 15 ऑगस्ट 1947 पासून 26 जानेवारी 1950 पर्यंत देश कसा चालत होता? तब्बल दोन वर्षं, 5 महिने आणि 11 दिवस भारताची काय परिस्थिती होती?

आपल्यापैकी बहुतांश लोकांचा तर त्या काळी जन्मही झाला नव्हता. मग चला तर पाहूया की त्या दिवसांमध्ये काय काय घडलं होतं. या अशा घटना होत्या ज्यांचा आजही आपल्या जीवनावर परिणाम होतोय.

स्वातंत्र्य मिळालं, पण?

देश स्वतंत्र झाला असला, तरी देश चालवण्यासाठी घटना अजून तयार नव्हती. 9 डिसेंबर 1946 पासून घटना समितीच्या बैठका सुरू झाल्या होत्या. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947. पण हा काही अंतिम मसुदा नव्हता.

प्रजासत्ताक दिनाचं पहिल्यांदा संचलन कधी झालं होतं? वाचा अशा 13 प्रश्नांची उत्तरं
भारताचा राष्ट्रध्वज कसा जन्माला आला?

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली पुढच्या अडीच वर्षांत घटना समितीची एकूण 12 सत्रं पार पडली. घटनेतील प्रत्येक शब्द तोलून-मापून आणि सर्व विचाराअंती लिहिण्यात आला.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली, म्हणून तो दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

आणि 26 जानेवारी 1950ला ती देशात अंमलात आणली गेली, तेव्हापासून आपण आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो.

ज्या देशात घटनात्मक प्रमुखाची नियुक्ती निवडणुकीत होते, तो देश प्रजासत्ताक असतो.

जो देश स्वतःच स्वतःला चालवतो आणि बाहेरच्या शक्तींवर अवलंबून नसतो, त्याला सार्वभौम म्हणतात.

ब्रिटनमध्ये लोकशाही आहे, पण ते प्रजासत्ताक नाही, कारण त्या देशाची घटनात्मक प्रमुख ही राणी आहे.

राष्ट्रपती आणि पंतप्रधान

15 ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री दिलेल्या भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले होते की "नियतीशी आम्ही करार केला होता. त्या करारानुसारच आजची स्वातंत्र्याची पहाट आम्हाला पाहायला मिळाली आहे."

डॉ. राजेंद्र प्रसाद प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करताना

डॉ. राजेंद्र प्रसाद प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करताना

ब्रिटिशांनी जाता-जाता सर्वपक्षीय सरकारकडे सत्ता सुपूर्द केली होती. काँग्रेसचे पंडित नेहरू हे या सरकारचे नेते होते, पण त्यांच्या कॅबिनेटमध्ये वेगवेगळ्या विचारसरणीचे, पक्षांचे आणि सामाजिक पार्श्वभूमीचे नेते होते.

त्यांच्या समन्वयाने देशाचा कारभार पहिले साधारण अडीच वर्ष चालला. नंतर अर्थातच 1951 साली पहिल्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजले आणि विविध पक्षांमधले मतभेद, त्यांच्यातला विरोध स्पष्ट झाला.

इंग्रज गेले तरी भारताचे शेवटचे व्हॉइसरॉय लॉर्ड माउंटबॅटन स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून इथेच थांबले. जवाहरलाल नेहरू पहिले पंतप्रधान बनले.

भारतरत्न : नानाजी देशमुख, प्रणब मुखर्जी, भूपेन हजारिकांना निवडणुकीवर डोळा ठेवून पुरस्कार?
नानाजी देशमुख आता भारतरत्न: चित्रकूट प्रकल्पाचे निर्माते कोण होते?

नंतर 21 जानेवारी 1948 रोजी सी. राजगोपालचारी म्हणजेच राजाजी हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल झाले.

पण 1950मध्ये राज्यघटना तयार झाल्यावर गव्हर्नर जनरल हे पदच रद्द करण्यात आलं आणि त्यानंतर राष्ट्रपती हे देशाचे घटनात्मक प्रमुख असतील, असं जाहीर करण्यात आलं. डॉ. राजेंद्र प्रसाद यांची देशाचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवड करण्यात आली.

संस्थानांचं विलिनीकरण

पण त्याचबरोबर दरम्यान आणखी एक आव्हान होतं. पाकिस्तानमधून येणाऱ्या निर्वासितांचं पुनर्वसन करणं जवळजवळ साडेपाचशे स्वायत्त संस्थानांना भारतात सामील करून घेणं. यापैकी बहुतेक सर्व संस्थानांनी भारतात विलीन होण्याची तयारी दाखवली, पण हैदराबाद, जुनागढ आणि काश्मीरनं नकार दिला.

देशात त्यावेळी 500हून अधिक संस्थांना भारतात सामील करून घेण्याचं काम सरदार पटेलांना केलं.

देशात त्यावेळी 500हून अधिक संस्थांना भारतात सामील करून घेण्याचं काम सरदार पटेलांना केलं.

तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रयत्नांनंतर तिन्ही संस्थानं भारतात विलीन करून घेण्यात आली. हैदराबादच्या स्वातंत्र्यासाठी तर भारताला लष्कर पाठवावं लागलं होतं हा ज्ञात इतिहास आहे.

आर्थिक सुधारणा

तत्कालीन आर्थिक परिस्थिती देखील बिकट होती. इतिहासकार बिपन चंद्रा त्यांच्या 'इंडिया आफ्टर इंडिपेंडन्स'मध्ये सांगतात की इंग्रजांच्या 200 वर्षांच्या कारभारात भारताची अर्थव्यवस्था विदारक झाली होती.

देशांत गरिबी होती, निरक्षरता होती, शेती अत्यंत वाईट परिस्थितीत होती. हे सर्वकाही सुस्थितीत आणण्याचं आव्हान स्वतंत्र भारताच्या शासकांपुढे होतं.

उदाहरणार्थ, 1938-39 साली फक्त 11 टक्के शेतजमिनीवर चांगली बियाणं वापरात होती. स्वातंत्र्याच्या वेळी देशाच्या अर्थव्यवस्थेत एकूण कारखान्यांमधल्या उत्पादनांचं योगदान फक्त 7.5 टक्के होतं. आणि

देशातली जवळजवळ 90% यंत्रं आयात केलेली होती, असं बिपन चंद्र त्यांच्या पुस्तकात नमूद करतात.

1947मध्ये आर्थिक कार्यक्रम समिती स्थापित करण्यात आली होती. पंडित नेहरू त्या समितीचे अध्यक्ष होते.

भारताच्या आर्थिक प्रगतीची दिशा काय असावी, याचं धोरण या समितीनं ठरवलं होतं.

भारतातील उद्योगधंद्यांपैकी 75% उद्योग हे भारतीयांच्या मालकीचे होते.

स्वतंत्र होण्याआधीपासूनच भारतीय उद्योजक युरोपियन व्यापाऱ्यांच्या स्पर्धेत होते. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर बिर्ला, टाटा, सिंघानिया, दालमिया, जैन यांचे उद्योग अधिक बळकट झाले आणि भारताच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा उचलला.

मार्च 1950 मध्ये नियोजन समितीची (Planning Commission) स्थापना झाली.

1951ला पंचवार्षिक योजना सुरू झाली. त्याची पायाभरणी 1947 ते 1950 या काळात झाली असं आपण म्हणू शकतो.

भारतीय संविधानाची निर्मिती
भारतात अनेक जाती आणि धर्माचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वर्गाचे लोक एकत्र राहतात.

भारतीय लोकशाहीमुळेच वेगवेगळ्या गटांना संसदेत प्रतिनिधित्व मिळालं आहे. भारतीय लोकशाही बळकट करण्याचं श्रेय हे भारतीय स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेची निर्मितीच्या प्रक्रियेलाच द्यावं लागेल. भारतीय संविधान हे अनेक लोकांच्या परिश्रमातून, अभ्यासातून, आणि संशोधनातून निर्माण झालं आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ड्राफ्टिंग कमिटीचे म्हणजेच घटनेच्या मसुदा समितीचे प्रमुख होते. भारतीय संविधानाचं स्वरूप कसं असावं, त्याची चौकट त्यांनी आखली, विविध विषयांवरील तज्ज्ञांकडून मिळणारी माहिती, त्यांच्या सूचना ध्यानात घेऊन त्या राज्यघटनेत कशा येतील याचा विचार बाबासाहेबांनी केला. राज्यघटनेच्या निर्मितीत त्यांनी जो मोठा वाटा उचलला आहे त्यामुळे त्यांना राज्यघटनेचा शिल्पकार म्हटलं जातं.

डॉ. आंबेडकर

  9 डिसेंबर 1946 रोजी भारताची घटना समिती पहिल्यांदा एकत्र आली आणि त्यांनी भविष्यातल्या भारताची दिशा ठरवली.

डॉ. आंबेडकरांची घटनेच्या मसुदा समितीवर नियुक्ती 28 ऑगस्ट 1947 रोजी झाली. 141 दिवसांच्या परिश्रमानंतर घटना समितीने पहिला मसुदा तयार केला. तो दिवस होता 3 नोव्हेंबर 1947.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर पुढील अडीच वर्षांत संसदेत घटना समितीची एकूण 12 सत्रं पार पडली. घटनेतील प्रत्येक शब्द तोलून मापून आणि पूर्ण विचारांती लिहिण्यात आला.

9 डिसेंबर 1946 रोजी घटना समितीच्या सदस्यांची पहिली बैठक झाली होती. त्यानंतर 2 वर्षं, 11 महिने आणि 18 दिवसांच्या परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर रोजी राज्य घटनेचा मसुदा तयार झाला.

26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 ला ती अंमलात आणली गेली. तेव्हापासून आजपर्यंत आपण एक प्रजासत्ताक, सार्वभौम राष्ट्र म्हणून ओळखले जातो.

चलेजाव चळवळ १९४२

नुकतेच ७५ वर्ष पुर्ण

(संकल्प से सिध्दी - घोषणा)

२अधिवेशने-
१-वर्धा -प्रस्ताव संमत
२-गवालिया टँक,मुंबई-सुरु

◾️ठराव मंजुर-८ अॉगस्ट १९४२

◾️कारण-
क्रिप्स वाटाघाडी फिस्कटल्या
जपाण आक्रमण
महागाईचा भडका
महायुध्द

◾️घोषणा-
चले जाव (युसुफ मेहेरअली)
करा अथवा मरा(गांधी)

◾️अटक-(अॉपरेशन झिरो अवर)
गांधी-आगाखाण पॕलेस,पुणे
नेहरु-अल्मोडा
जयप्रकाश नारायण-हजारीबाग कारागृह

◾️असहभागी घटक-
मुस्लीम लीग,
हिंदु महासभा
लिबरल पार्टी
भारतीय कम्युनीस्ट पक्ष

◾️पत्रीसरकार-
महाराष्ट्र - सातारा
उत्तर प्रदेश -बलिया (भारतातील पहिले )
बंगाल -मिदनापुर /तामलुक-(गांधी बुढी-मतंगिणी हाजरा)
बिहार -पुर्णिया

◾️गव्हर्नर -लाॕर्ड लिनलिथगो
INC चे अध्यक्ष-मौलाना आझाद

◾️९ अॉगस्टला गवालिया टॕंक वर झेंडा फडकवणारी महिला-अरुणा असफ अली.

राष्ट्रपती संबंधित कलमे

🟡 राष्ट्रपती संबंधित कलमे 🟡

🔶 52:-भारताचा राष्ट्रपती

🔶 53:-संघराज्य चे कार्यकारी अधिकार

🔶 54:-राष्ट्रपती निवडणूक

🔶 55:-निवडणूक पद्धत

🔶 56:-राष्ट्रपती कार्यकाळ

🔶 57:-पुनर्निवडी साठी पात्रता

🔶 58:-राष्ट्रपती बाबत पात्रता

🔶 59:-पदाच्या अटी

🔶 60:-राष्ट्रपती शपथ

🔶 61:-महाभियोग प्रक्रिया

🔶 62:-निवडणूक घेण्याचा कालावधी

🔶 71:-निवडणूक संबंधित बाबी

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

पोलीस भरती - प्रश्नसंच विषय - गणित

१) २७० नंतर पुढील येणाऱ्या १० व्या विषम संख्येचे वर्गमूळ किती ?

अ. १५  

ब. १७

क. १९

ड. २१


२) पुढीलपैकी पूर्ण वर्ग संख्या कोणती ?

अ. ०:२२५  

ब. २२.५

क. ६.२५

ड. ६२.५  


३) १४.३१, १६.४, १३.१३, १२.२४ या संख्येचे मध्यमान किती येईल ?

अ. ४१ वर्ष  

ब. ३३ वर्ष  

क. १२५ वर्ष  

ड. ४५ वर्ष


४) रमेश जवळ ३२ रुपये आहेत. हरिषजवळ रघूच्या चौपट व रमेशपेक्षा ४ रुपये कमी आहेत तर तिघांजवळ मिळून किती रुपये आहेत ?

अ. ६६

ब. ६७

क. ६९

ड. ६८    


५) सहा संख्याची सरासरी ६४.५ आहे. सातवी संख्या ९६ असल्यास सर्व संख्याची सरासरी किती ?

अ. ६६.५

ब. ६८

क. ६८.५

ड. ६९


६) बस भाडे शेकडा २० ने वाढविला. पुन्हा काही महिन्यानंतर शेकडा १० ने वाढविला. तर मुळ भाड्यात शेकडा वाढ किती झाली ?

अ. ३५ टक्के  

ब. ३० टक्के  

क. ३१ टक्के  

ड. ३२ टक्के


७) एका परीक्षेमध्ये ७०० पैकी ४५५ विध्यार्थी नापास झाले. तर किती टक्के विध्यार्थी पास झाले ?

अ. ३५

ब. ४०

क. ६५

ड. ६०


८) संख्येचे १५ टक्के ३० आहे, तर त्या संख्येची तिप्पट किती ?

अ. २००

ब. २५०

क. ४००

ड. ६००


९)  दर ५ वर्षांनी दुप्पट होणाऱ्या योजनेत अ गुंतवणूक करतो जर त्याने सन १९९०, १९९५ व २००० मध्ये रु. ५००० गुंतवणूक केली तर त्याला २००५ साली किती रक्कम मिळेल ?

अ. रु. ४००००  

ब. रु. ६००००

क. रु. ९००००

ड. रु. ७००००


१०) मगनसेठने ३० रु. दराने १८ खेळणी आणली. ती सर्व खेळणी त्यांनी ५६० रुपयांस विकली. तर या व्यवहारात किती नफा झाला ?

अ. ३०

ब. ४०

क. २०

ड. ५०


----------------------------------------------------  


उत्तरे : १)  ब  २) क  ३) ब  ४) ब  ५) ड  ६) ड  ७) अ  ८) ड  ९) ड  १०) क


----------------------------------------------------

समाजसुधारक :- स्त्री शिक्षणाच्या जनक सावित्रीबाई फुले

स्रियांच्या पायातील गुलामीच्या बेड्या तोडून स्रियांना चूल आणि मुलाच्या पलीकडचे जीवन दाखवणाऱ्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची आज पुण्यतिथी. म्हणून जाणून घेऊयात त्यांच्या जीवनाचा प्रवास.

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे 3 जानेवारी 1831 साली त्यांचा जन्म झाला. आई सत्यवती तर वडील खंडोजी नेवसे पाटील हे गावचे पाटील होते. सावित्रीबाईंचे लग्नाच्या वेळी अवघे 9 वर्ष वय तर ज्योतिरावांचे वय 13 होते.

ज्योतिराव मूळचे फुरसुंगीचे. परंतु पेशव्यांनी बक्षीस म्हणून त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन दिली. त्यानंतर ज्योतिरावांच्या वडिलांनी बागेतील फुलाचा व्यवसाय करून त्यांना 'फुले' आडनाव मिळाले.

जातिव्यवस्थेच्या विरोधात जाऊन त्यांनी फुले दाम्पत्यांनी 1 जानेवारी 1848 साली पुण्यातील बुधवार पेठेतील भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. सावित्रीबाईंनी विवाहानंतर शिक्षण घेतले आणि आधी शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.

त्यांचे शिक्षण कार्य पाहून 1852 मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. शिक्षण प्रसार सुरु असताना सनातन्यांनी धर्म बुडाला..जग बुडणार... असा कांगावा करत उच्च वर्णीयांनी त्यांना प्रचंड विरोध केला, त्यांच्या अंगावर शेणही फेकण्यात आले परंतु त्या डगमगल्या नाहीत.

1854 साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. ‘काव्यफुले’ हे नाव अतिशय समर्पक आहे. या नावात गुंफलेला ‘फुले’ हा शब्द एकाचवेळी दोन गोष्टी स्पष्ट करतो.

शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार सुरु असताना त्यांनी पाहिले की लहानपणीच लग्न झालेल्या मुलींना पतीच्या निधनानंतर सती जावे लागे. या जुन्या रूढी परंपरा बंद करण्याचा विडा त्यांनी उचलला होता.

त्यांनी केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांना प्रबोधन करून त्यांचा संप घडविला होता. पुनर्विवाह कायदा होण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले. पती महात्मा फुले (1890) यांच्या निधनानंतर त्यांनी सत्यशोधक समाजाची धुरा संभाळली.

1896 च्या दुष्काळात पोटासाठी शरीराची विक्री करणाऱ्या स्रियांची त्यांनी धनदांडग्याच्या तावडीतून सुटका करून सत्यशोधक कुटुंबात आश्रयास पाठवले. अठराव्या शतकात प्लेगच्या साथीने थैमान घातले. पुण्यातील प्लेगबाधितांना इंग्रजांनी एका माळावर दवाखाना सुरु करून उपचार चालू केले.

या दवाखान्यातील प्लेगबाधित रुग्णाची सेवा सावित्रीबाई फुले करू लागल्या, सेवा करत असतानाच त्यांना प्लेगची बाधा झाली आणि अशातच 10 मार्च 1897 साली त्यांचे निधन झाले.

धोंडो केशव कर्वे



जन्म - रत्नागिरी, 18 एप्रिल 1858.

मृत्यू - 9 नोव्हेंबर 1962.

1942 - बनारस विद्यापीठाची डि. लिटू.

1958 - भारतरत्न. जन्मशताब्दी वर्ष.


◽️ कर्वे यांना महर्षि ही पदवी जनतेने दिली.

◾️ सत्री शिक्षण हा यांच्या कार्याचा केंद्रबिंदू.

◽️ विधवविवाहासाठी संपूर्ण महाराष्ट्रात दौरा केला.


संस्थात्मक योगदान :


📌 1893 - विधवा विवाहोत्तेजक मंडळी.

📌 1 जानेवारी 1899 - अनाथ बालिका आश्रम.

📌 1907 - हिंगणे महिला विद्यालय.

📌 1910 - निष्काम कर्मकठ.

📌 1916 - महिला विद्यापीठ, पुणे.

📌 1916 - महाराष्ट्र ग्रामशिक्षण मंडल.

📌 1 जानेवारी 1944 - समता संघ.

📌 1945 - पुणे बलअध्यापक मंदिर, शिशुविहार.

📌 1948 - जातींनीर्मुलन संघ.

📌 1918 - पुणे - कन्याशाळा.

📌 1960 - सातारा - बलमनोहर मंदिर.


वैशिष्टे :


📌 मानवी समता - मासिक.

📌 1893 - विधवेशी पुनर्विवाह.

📌 1894 - पुनर्विवाहितांचा मेळावा.

📌 1915 च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष.

📌 1928 - आत्मवृत्त या नावाचे आत्मचरित्र.

जपानमधील महिला विद्यापीठाची माहिती देणार्‍या पुस्तकावरून पहिले महिला विद्यापीठ स्थापन.


🔳 'अण्णासाहेब कर्वे म्हणजे महाराष्ट्रातील चमत्कार' - आचार्य अत्रे.

16 November 2022

आरोग्य विभाग परीक्षेसाठी महत्वाचे

■ कोणत्या सम्प्रेरकामुळे मुलगा तारुण्यात येतो ?

-टेस्टेस्टेरॉन

■ कोणत्या सम्प्रेरका मुळे मुली तारुण्यात येतात ?

- इस्ट्रोजन्स, प्रोजेस्टेरॉन

■ अन्न मार्गाची लांबी किती फूट असतें ?

- 30 फूट

■ मूत्रपिंडाचे वजन किती असते ?

- 125ग्राम ते 170ग्राम

1)  .... हे वेदनाशामक
हे वेदनाशामक असून ते अफूच्या बोंडांपासून मिळवितात.
विषाणू

● मार्फिन
--------------------------------------------------------
2)  मानवाला
.... या शास्त्रीय नावाने ओळखले जाते.

● होमोसेपियन
--------------------------------------------------------
3) एड्सच्या विषाणूंमुळे रक्तामध्ये असणाऱ्या .... वाढीवर प्रतिकूल परिणाम होतो. 'T' आकाराच्या पेशींच्या
३१४. 'ग्लुकोमिया' हा आजार अथवा रोग मानवी शरीराच्या .... या अवयवाशी संबंधित आहे.

● डोळे
--------------------------------------------------------
4)  'डोळा' या मानवी अवयवाचा फक्त
इतका भाग आपणास बाहेरून दिसतो.

●एक-पंचमांश
--------------------------------------------------------
5)  गरोदर स्त्रियांमध्ये सर्वसाधारणत........ची कमतरता असते.

● कॅल्शिअम व लोह

महत्त्वाची माहिती आणि विज्ञान आणि काही महत्वाचे प्रश्न

1)  जड पाण्याचा रेनुभार किती असतो ?
:- 20

2)  कोणत्या धातूचा उल्लेख
" भविष्य काळाचा धातू " असा केल्या जातो ?
:-  टिटॅनियम

3) मानवाने सर्वप्रथम कोणत्या धातूचा वापर केला ?
:- तांबे

4)   विजेच्या दिव्यात कोणते निष्क्रिय वायू भरलेले असतात ?
:- नायट्रोजन व अरगॉन

5) डोळ्यातील कोणत्या पेशी ह्या प्रकाशाच्या रंगाला प्रतिसाद देतात  ?
:-शंक्वाकार पेशी

6) ज्या पावसाचा पी एच ( सामू ) 5.6 पेक्षा कमी असतो त्या पावसाला ........... पाऊस म्हणतात ?
:- आम्ल युक्त पाऊस ( एसिड रेन )

7) स्वयंपाकाच्या नॉनस्टिक भांड्यांवर कशाचा थर दिलेला असतो  ?
:- टेफ्लॉन

8) झेरॉक्स चा शोध कोणी लावला  ?
:- सी.फ. कार्लसन

9) भिंगांचा शोध कोणी लावला ?
:- रॉजर बेकन

10)  होलोग्राम चा शोध कुणी लवला?
:- डेनिस गॅबर

11)व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

उत्तर : बेरी-बेरी

12) दुधामध्ये कोणत्या व्हिटॅमिनचा समावेश नसतो?

उत्तर : व्हिटॅमिन सी

13)कोणत्या व्हिटॅमिनच्या कमीमुळे रक्तामध्ये गाठी जमा होत नाही?

उत्तर : व्हिटॅमिन के

14) व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

उत्तर : वंध्यत्व

15)व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  :  एस्कॉर्बिक अ‍ॅसिड

16) मिठाचे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  : NaCl

17) हसणार्‍या वायूचे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  :  नायट्रस ऑक्साईड ( एन 2 ओ )

18) ब्रास कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे?

उत्तर  :  तांबे आणि जस्त

सामान्य विज्ञान से संबंधित प्रश्न-उत्तर

1. निम्न में से कौन सा हाइड्रोजन का आइसोटोप है?
A. प्रोटियम
B. ड्यूटेरियम
C. ट्रिटियम
D. ऊपर के सभी

Ans.D

2. फसल संयंत्र का कवक रोग निम्न में से कौन सा है?
A. आलू की पत्तियों का मुड़ना
B. कपास का विल्ट
C. चावल में तुषार
D. आलू में भूरी संडा़ध
Ans.B

3. परमाणु विखंडन प्रतिक्रिया के दौरान उत्पन्न ऊर्जा का प्रयोग किया जाता है?
A. ईंधन बनाने में
B. बिजली बनाने में
C. ताप पैदा करने में
D. इनमें से कोई नहीं

Ans.B

आधुनिक तकनीक पर आधारित सामान्य ज्ञान प्रश्नोतरी

4. इनमें से कौन गैसों के प्रसरण का एक उदाहरण है?
A. खाने की सुगंध
B. अगरबत्ती की खुशबू
C. इत्र की महक
D. उपरोक्त सभी
Ans.D

5. निम्न में से किसमें अधिक ताप है?
A. बर्फ
B. उबलते पानी
C. भाप
D. ऊपर के सभी
Ans.C

6. इनमें से कौन महामारी और स्थानिक (epidemic and endemic) दोनों प्रकार की बीमारी है?
A. टाइफायड
B. हैजा
C. पोलियो
D. खसरा
Ans.B

7. निम्न में से कौन सा ग्राफेन के बारे में सहीं नहीं है?
A. कार्बन के एल्लोट्रोप
B. 3 डायमेंशनल स्ट्रक्चर
C. परमाणु जाली के रूप में
D. हनी कॉम्ब स्ट्रक्चर
Ans. B

8. रेजिन( Regin) क्या है?
A. एक बहुलक (polymer)
B. वाइरस (virus)
C. मैलवेयर (Malware)
D. सर्च इंजन (Search Engine)
Ans.C

9. ली-फाई के लिए गलत कथन कौन सा है?
A. यह एक प्रकाश आधारित संचार प्रणाली है l
B. यह एक वायर कनेक्शन है l
C. यह बिडेरक्टॉनिकल संचार पर आधारित है l
D. रेडियो आवृत्ति संकेतों का उपयोग l
Ans.B

10. सबसे बड़ा अणु कौन सा है जो मानव तन का एक हिस्सा है ?
A. गुणसूत्र 1 (Chromosome) 1
B. गुणसूत्र 2 ( Chromosome) 2
C. गुणसूत्र 3 (Chromosome) 3
D. गुणसूत्र 4 (Chromosome) 4
Ans.A

11. पहले प्रकाश की गति को किसने मापा था?
A. मार्क आरोसोंन
B. ओ लॉस रोमर 
C. एडविन हबल
D. टाइको ब्राहे
Ans. B


12. गिरगिट रंग क्यों बदलता है?
A. अन्य जानवरों से बचने के लिए रंग बदलते हैं l
B. गर्मी प्रबंधन के लिए रंग बदलते हैं।
C. गिरगिट वातावरण के प्रति संकेत के रूप में रंग बदलते हैं।
D. ऊपर में से कोई भी नहीं
Ans.B

13. K (के) इकाई को निम्नलिखित में से क्या मापने के लिए प्रयोग किया जाता है?
A. इलेक्ट्रिक
B. ध्वनि
C. तापमान
D. ऊपर में से कोई नहीं
Ans.C


14. विटामिन बी-1 की कमी से कौन सी बीमारी होती है?
A. रिकेट्स
B. रतौंधी
C. रक्ताल्पता
D. बेरीबेरी
Ans.D


15. राइनो वायरस … की वजह बनता है:
A. आम जुकाम
B. सिर दर्द
C. कफ
D. घुटनों में दर्द
Ans. A

प्लांट हार्मोन:जीवविज्ञान पर आधारित सामान्य ज्ञान क्विज


16. निम्नलिखित में से किसे 'स्टार क्वीन नेबुला'  के रूप में भी जाना जाता है?
A.मेसियर 16
B.मेसियर 5
C.एनजीसी 3372
D.एनजीसी 3293
Ans. A


17. कितना कुल ऑक्सीजन और रक्त शरीर में मस्तिष्क द्वारा इस्तेमाल किया जाता है?
A.20.00%
B.50.00%
C.75.00%
D.35.00%
Ans. A


18. मानव शरीर में सबसे छोटी हड्डी कौन सी है?
A. पटेला
B. स्टेपीज़
C. टिबिआ
D. ह्यूमरस
Ans. B


19. मात्र दो ऊतक कौन से हैं जो खून से ऑक्सीजन प्राप्त नहीं करते?
A. नाखून और कॉर्निया
B. त्वचा और मस्तिष्क
C. उंगलियां और नाक
D. पैर और भुजा
Ans. A


20. आँख का कौन सा भाग आँख के रंग का निर्धारण करता है?
A. पुतली
B. आइरिस
C. कॉर्निया
D. आई लिड

Ans. B

विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान)


◼️ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
- पांढ-या पेशी

◼️ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
- मुत्रपिंडाचे आजार

◼️ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
- मांडीचे हाड

◼️ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
- कान

◼️ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
- सुर्यप्रकाश

◼️ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
- टंगस्टन

◼️ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
- 8 मिनिटे 20 सेकंद

◼️ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
- न्यूटन

◼️ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
- सूर्य

◼️ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
- नायट्रोजन

रक्त दोन प्रमुख घटकांनी बनलेले असते

1)  रक्तद्रव ( Plasma )
2) रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)

रक्तद्रव (Plasma)

अ.)  रक्तद्रव फिकट पिवळसर रंगाचा, नितळ, काहीसा आम्लारीधर्मी द्रव असतो. यात सुमारे 90 ते 92% पाणी,
6 ते 8% प्रथिने
1 ते 2% असेंद्रिय क्षार
व इतर घटक असतात.

आ.) अल्ब्युमिन - संबंध शरीरभर पाणी विभागण्याचे काम करते.

इ.)  ग्लोब्युलीन्स - संरक्षणाचे काम करतात.

ई) फायब्रिनोजेन व प्रोथ्रोम्बीन रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करतात.

उ)  असेंद्रिय आयने - कॅल्शिअम, सोडिअम, पोटॅशिअम हे चेता आणि स्नायू ठेवतात. कार्याचे नियंत्रण

रक्तकणिका / रक्तपेशी (Blood corpuscles / cells)

1. लोहित रक्तपेशी (RBC)
आकाराने लहान, वर्तुळाकार, केंद्रक नसलेल्या पेशी या पेशीतील हिमोग्लोबीन या घटकामुळे रक्त लाल रंगाचे दिसते. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन रक्तात विरघळतो.

रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 50-60 लक्ष RBC असतात. RBC ची निर्मिती अस्थिमज्जेत होते व त्या सुमारे 100 ते127 दिवस जगतात.

2. श्वेत रक्तकणिका (पांढऱ्या पेशी) (WBC)

आकाराने मोठ्या, केंद्रकयुक्त, रंगहीन पेशी रक्ताच्या प्रत्येक घनमिलीमीटरमध्ये 5000-10,000 पांढऱ्या पेशी असतात

या पेशींचे 5 प्रकार आहेत -
बेसोफील, इओसिनोफिल, न्यूट्रोफील,
मोनोसाईट्स लिम्फोसाईट्स

पांढऱ्या पेशींची निर्मिती अस्थिमज्जेत होते.

कार्य-
पांढऱ्या पेशी, आपल्या शरीरात सैनिकाचे काम करतात. शरीरात कुठेही रोगजंतूचा शिरकाव झाल्यास त्यावर या पेशी हल्ला करतात. सूक्ष्मजीवांमुळे होणाऱ्या रोगांपासून रक्षण करतात.

3. रक्तपट्टीका (Platelets)

या अतिशय लहान आणि तबकडीच्या आकारासारख्या असतात.
रक्ताच्या एका घनमिलीमीटरमध्ये या सुमारे 2.5 लक्ष ते 4 लक्ष असतात.

कार्य - या रक्त गोठवण्याच्या क्रियेमध्ये भाग घेतात.

वैज्ञानिक उपकरणे

वैज्ञानिक उपकरणे व त्यांचे उपयोग
शास्त्रीय नाव,मराठी नाव, उपयोग

शास्त्रीय नाव:-बॅरोमीटर
मराठी नाव:-वायुभारमापन
उपयोग:- वातावरणातील हवेचा दाब मोजणारे यंत्र

शास्त्रीय नाव:-लॅक्टोमीटर
मराठी नाव:- दूधकाटा 
उपयोग:- दुधाची सुद्धता व पाण्याचे प्रमाण मोजू शकणारे उपकरण

शास्त्रीय नाव:-स्फिरोमीटर
मराठी नाव:- गोलाकारमापी
उपयोग:-पृष्ठभागाची वक्रता मोजणारे उपकरण

शास्त्रीय नाव:-क्रोनोमीटर
मराठी नाव:-वेळदर्शक
उपयोग:-आगबोटीवर वापरले जाणारे घड्याळ

शास्त्रीय नाव:-टेलिस्कोप
मराठी नाव:- दूरदर्शक  
उपयोग:-आकाशस्थ ग्रह गोल बघण्याकरिता उपयुक्त

शास्त्रीय नाव:-अल्टिमीटर
मराठी नाव:-विमान उंचीमापक
उपयोग:-विमानात वापरले जाणारे ऊंची मोजण्याचे यंत्र

शास्त्रीय नाव:-सिस्मोग्राफ
मराठी नाव:-भूकंपमापी
उपयोग:- भूकंपाची तीव्रता मोजू शकणारे यंत्र

शास्त्रीय नाव:-थर्मामीटर
मराठी नाव:-तापमापक
उपयोग:- उष्णतेचे प्रमाण मोजणारे उपकरण

शास्त्रीय नाव:-कॅलक्युलेटर
मराठी नाव:-गणकयंत्र
उपयोग:-अगोदर पुरविलेल्या माहितीच्या आधारे अत्यंत गुंतागुंतीची गणितीय प्रश्न क्षणार्धात सोडवणारे यंत्र

काँग्रेसचे अधिवेशन व अध्यक्ष

1885 : मुंबई : व्योमेश्चंद्र बॅनर्जी

1886 : कोलकाता : दादाभाई नौरोजी

1887 : मद्रास : बुद्रुदिन तय्यबजी

1888 : अलाहाबाद : जॉर्ज युल

1889 : मुंबई : सर विल्यम वेडरबर्न

1890 : कोलकाता : फिरोजशहा मेहता

1891 : नागपूर : पी आनंदा चारलू

1892 : अलाहाबाद : व्योमेश्चंद्र बॅनर्जी.

1893 : लाहोर : दादाभाई नौरोजी

1894 : चेन्नई : आल्फ्रेड वेब

1895 : पुणे : सुरेंद्रनाथ बॅनर्जी

1896 : कोलकाता : महंमद सयानी

1897 : अमरावती : सी. शंकरन नायर

1898 : कोलकाता : आनंद मोहन बोस

1899 : लखनौ : रमेशचंद्र दत्त

1900 : लाहोर : सर नारायण गणेश चंदावरकर.

1901 : कोलकाता : दिनशा वाच्छा

1902 : अहमदाबाद : सुरेंद्रनाथ बॅनर्जी

1903 : मद्रास : लालमोहन घोष

1904 : मुंबई : हेन्री कॉटन

1905 : बनारस : गोपाळ कृष्ण गोखले

1906 : कोलकाता : दादाभाई नौरोजी

1907 : सुरत : डॉ रासबिहारी घोष

1908 : मद्रास : डॉ रासबिहारी घोष

1909 : लाहोर : मदनमोहन मालवीय

1910 : अलाहाबाद : सर विल्यम वेडरबर्न

1911 : कोलकाता : पंडित बिशन नारायण धार

1912 : बकींदूर (पाटणा) : रं. ध. मुधोळकर.

1913 : कराची : नबाब सय्यद महंमद बहादूर

1914 : चेन्नई : भुपेंद्रनाथ बसू

1915 : मुंबई : सतेंद्र प्रस सिंह

1916 : लखनौ : बांबू अंबिकाचरण मुझुमदार

1917 : कोलकाता : एनी बेझेंट

1918 : मुंबई : बॅरिस्टर हसन इमाम

1918 : दिल्ली : पं मदनमोहन मालवीय

1919 : अमृतसर : मोतीलाल नेहरू

1920 : कोलकाता : लाला लजपतराय

1920 : नागपूर : चक्रवर्ती विजय राघवाचार्य

1921 : अहमदाबाद : हकीम अजमल खान

1922 : गया : बॅरिस्टर चित्तरंजन दास.

1923 : दिल्ली : मौलाना अबुल कलाम आझाद

1924 : काकीनाडा : मौलाना मुहम्मद अली

1924 : बेळगाव : महात्मा गांधी

1925 : कानपूर ; सरोजिनी नायडू

1926 : गोहत्ती : श्रीनिवास आयंगर

1927 : चेन्नई : डॉ एम ए अन्सारी

1928 : कोलकाता : मोतीलाल नेहरू

1929 : लाहोर : जवाहरलाल नेहरू

1931 : कराची : वल्लभभाई पटेल

1932 : दिल्ली : आर डी अमृतलाल

1933 : कोलकाता : श्रीमती नलिनी सेनगुप्ता

1934 : मुंबई : राजेंद्रप्रसाद

1936: फैजपूर : जवाहरलाल नेहरू

1938 : हरिपुरा : नेताजी सुभाषचंद्र बोस

1939 : त्रिपुरा : नेताजी सुभाषचंद्र बोस

1940 : रामगड : मौलाना अबुल कलाम आझाद.

1941 ते 1945 : मौलाना अबुल कलाम आझाद

1946 : मेरठ : जे बी कृपलानी

1947 : डॉ राजेंद्रप्रसाद.

प्रार्थना समाजाची स्थापना व तत्त्वज्ञान

दादोबा पांडूरंग व डॉ. आत्माराम पांडूरंग यांच्या पुढाकाराने ३१ मार्च १८६७ मध्ये मुंबई येथे प्रार्थना समाज स्थापन करण्यात आला. प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान पुढीलप्रमाणे होते.

परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो.

सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो.

प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही, मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्त्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

प्रार्थना समाजाचे कार्य

प्रार्थना समाजाने अस्पृश्यता निर्मूलन, स्त्रीशिक्षण, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह इत्यादी क्षेत्रात बहुमोल कामगिरी केली. श्री. आर. जी. भांडारकर व न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे हे प्रार्थना समाजाचे मुख्य आधारस्तंभ होते.

न्या. रानडे यांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना करुन भारतीय जनतेत राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार केला. त्यांनी विधवा विवाह मंडळ स्थापन केले.

ना. म. जोशी यांनी “सोशल सर्व्हिस लीग” स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले.

देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी “सर्व्हंटस ऑफ इंडिया सोसायटी” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निर्मूलनच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन” ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात फार मोलाचे कार्य केले.

प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे “अनाथ बालकाश्रम” काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती.

मुलींच्यासाठी स्वतंत्र शाळा सुरु केल्या. “आर्य महिला समाज” ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था चालू करण्यात आली.

४ मे १८७३ रोजी प्रार्थना समाजाने “सुबोध पत्रिका” हे त्यांचे मुखपत्र सुरु केले होते. या मुखपत्रातून सामाजिक व राजकीय विचार मांडले जात होते.

मजुरांच्यासाठी पहिली रात्रशाळा मुंबईमधील चेऊलवाडी येथे भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांच्या पुढाकाराने इ. स. १८७६ मध्ये काढण्यात आली होती. त्यानंतर मुंबईच्या इतर भागात देखील रात्रशाळा काढण्यात आल्या.

इ. स. १८९० रोजी मुंबईतील मदनपुरा येथे अस्पृश्यांसाठी शाळा काढण्यात आली.

इ. स. १८७६-७७ च्या दुष्काळाच्या वर्षी प्रार्थना समाजाने दुष्काळ पीडितांसाठी महत्त्वपूर्ण कार्य केले होते. अशा रीतीने प्रार्थना समाजाने एक भरीव सामाजिक कार्य केल्याचे आढळते.

प्रार्थना समाजाची तत्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकाचे निरसन करण्यासाठी न्या. रानडे यांनी “एकेश्वरनिष्ठांची कैफियत” हा विचार प्रवर्तक ग्रंथ लिहीला.

प्रार्थना समाजाच्या कार्याचे मूल्यमापन

प्रार्थना समाजाला चांगले नेतृत्व लाभूनही ठराविक शहरापुरतेच त्याचे कार्य पोहचू शकले. त्याचे कारण म्हणजे त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूना त्यांच्या कार्याविषयी कधीच आपुलकी वाटली नाही.