25 January 2022

बेटी बचाव बेटी पढाओ योजना :



सुरुवात - 22 जानेवारी 2015


दूत - साक्षी मलिक  


बाल लिंगगुणोत्तर सुधारणे आणि शिक्षणाच्या माध्यमातून मुलींच्या सबलीकरणाला प्रोत्साहन देणे हा या योजनेचा उद्देश आहे.

  हरियाणा येथील पानिपत येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.

  'बेटा बेटी एकसमान' हा आपला मंत्र असला पाहिजे असे सांगत लिंग भेदभाव संपुष्टात आणला पाहिजे.

  हरियाणातील बाल लिंगगुणोत्तर परिस्थिती चिंताजनक असल्यामुळे या योजनेच्या उद्घाटनासाठी हरियाणाची निवड करण्यात आली.

  यात 10 वर्षाखालील मुलींचे बँक खाते उघडावे लागते.

  भारतीय टपाल खात्याच्या वतीने तयार करण्यात आलेल्या 'बेटी बचाओ बेटी पढाओ' टपाल तिकिटेही काढण्यात आली.

  सध्या भारतातील 100 जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर लागू. 


महाराष्ट्रातील निवड करण्यात आलेले जिल्हे (लिंगगुणोत्तर दर)


   जिल्हा - 2001 - 2011


1) बीड - 894 - 807 

2) जळगाव - 880 - 842 

3) अहमदनगर - 884 - 452 

4) बुलढाणा - 908 -  855

5) औरंगाबाद - 890 - 858 

6) वाशिम - 918 - 863 

7) कोल्हापूर - 839 - 863 

8) उस्मानाबाद - 894 - 867 

9) सांगली - 867 - 851 

सकन्या समृद्धी योजना



* १ हजार रुपयाच्या किमान रकमेसह सार्वजनिक क्षेत्रातील कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये किंवा पोस्ट ऑफिस मध्ये मुलीच्या नावाने सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडता येते.


* हे खाते मुलीच्या जन्मापासून केवळ १० वर्षापर्यंतच उघडता येते. एका वर्षामध्ये या खात्यात किमान हजार रुपये किंवा अधिकाधिक १.५० लाख जमा करता येतात.


* एक पालक आपल्या केवळ दोन मुलीकरता हे खाते उघडू शकतो, आणि दोघींच्या खात्यात एक वर्षात १.५० लाख यापेक्षा अधिक रक्कम भरता येणार नाही.


* मात्र दुसऱ्यांदा जुळ्या मुली झाल्यास तिसऱ्या मुलीकरता हे खाते उघडले जाऊ शकते. मुलगी २१ वर्षे झाल्यावर हे खाते परिपक्व होते.


* तथापी १८ वर्षानंतर आवशक्यता असल्यास ५०% रक्कम काढता येईल, ही योजना मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि लग्नाचा खर्च घेऊन तयार करण्यात आली.


* या योजनेसाठी मुलीचे खाते काढताना मुलीचा जन्माचा दाखला, ओळखपत्र, निवासी पत्र, इत्यादी कागदपत्रे आवश्यक आहेत.


* खात्याच्या परिपक्वतेनंतर जमा झालेली रक्कम संबंधित मुलीच्या मालकीची होते. भारतात हे खाते कुठेही काढता येते.


* वयाच्या १० वर्षानंतर मुलगी स्वतः आपले खाते हाताळू शकते. किमान एक हजार रुपये दरवर्षी न भरू शकल्यास त्या वर्षासाठी ५० रुपये दंड आकाराला जाईल, मात्र दंडाच्या रकमेसह १४ वर्षापर्यंत कधीही हे खाते पुन्हा सुरु करण्याची तरतूद आहे.

पराथमिक कृषि सहकारी पतसंस्था :



(Primary Agricultural Credit Co-Operatives) 


प्राथमिक कृषि सहकारी पतसंस्था सहकारी त्रि-स्तरीय रचनेच्या सगळ्यात खालच्या स्तरावर ग्रामीण भागात कार्य करतात. 


🎯सथापना -


गावातील 10 किंवा अधिक व्यक्ती एकत्र येऊन या सहकारी पतसंस्थेची स्थापना करू शकतात.

  गरीब शेतकर्‍यांनाही संस्थेला सभासद होता यावे यासाठी सदस्यत्व शुल्क/प्रवेश शुक्ल नाममात्र ठेवले जाते.तसेच या संस्था अमर्यादित जबाबदारीच्या तत्वावर (Unlimited liability) स्थापना केल्या जातात. म्हणजेच, ती संस्था अपयशी ठरल्यास तिची देणी (Liabilities) देण्याची पूर्ण जबाबदारी सदस्यांवर असते. 


🎯कार्ये -


ही संस्था प्रत्यक्ष ग्रामीण जनतेच्या संपर्कात येते. त्यांच्या ठेवी स्वीकारते व त्यांना कर्जे देते. कर्जे मुख्यत: अल्प मुदतीचे व मुख्यत: कृषीसाठी दिले जाते. मात्र सावकाराच्या तावडीत सापडू नये म्हणून खावटी कर्जे सुद्धा दिली जातात.ही संस्था ग्रामीण जनता व दुसर्‍या बाजुला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्यात दुव्याचे काम करते. 


🎯भांडवल उभारणी -


स्व-स्वामित्व निधी - सदस्यत्व फी, भागभांडवल व राखीव निधी.ठेवी - सदस्य तसेच, बिगर सदस्यां कडून मिळविलेल्या.कर्जे - जिल्हा मध्येवर्ती सहकारी बँकेकडून मिळालेली. 


🎯विस्तार -


भारतात मार्च 2010 मध्ये विविध राज्यांमध्ये मिळून सुमारे 95,633 प्राथमिक कृषि सह. संस्था कार्य करीत होत्या. त्यांची एकूण सदस्य संख्या त्यावेळी सुमारे 1.32 कोटीपेक्षा जास्त असून त्यांनी 26,245 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या होत्या. 


🎯महाराष्ट्रातील विस्तार -


31 मार्च 2010 रोजी महाराष्ट्रात 21,392 प्राथमिक कृषि सह.पतसंस्था होत्या आणि त्यांची सभासद संख्या 149 लाख होती. 

राष्ट्रध्वजाच्या अभिवादनार्थ ७३ किलोमीटरची दौड.

🔰देशाचा ७३ व्या प्रजासत्ताक दिन बुधवारी असून उपायुक्त हरि बालाजी यांनी ७३ किलोमीटर अंतर धावून अनोख्या पद्धतीने राष्ट्रध्वजाला अभिवादन केले. गेल्यावर्षी अमरावतीमध्ये  त्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त ७२ किलोमीटर अंतर कापले होते.

🔰वांद्रे कुर्ला संकुलापासून ही मोहीम सुरू झाली. यावेळी परिमंडळ १ चे उपायुक्त बालाजी यांच्यासोबत ९ आणखी धावपटू सहभागी झाले होते. तेथून ते मुलुंडला गेले. तेथून पुन्हा वांद्रे कुर्ला संकुल परिसरात परतले. तेथून नरिमन पॉईंटपर्यत ते व त्यांच्या सोबतचे धावपटू धावले. तेथून ते पुन्हा गेट वे ऑफ इंडियाला आले. त्यातील बालाजी यांच्यासह एकूण तीन धावपटूंनी संपूर्ण ७३ किलोमीटरचे अंतर पार पाडले. उर्वरीत सहा जणांनी ५५ किलोमीटर अंतर कापले. शेवटच्या २१ किलोमीटर अंतरात ७० धावपटू सहभागी झाले होते.

🔰त्यानंतर गेट वे ऑफ इंडिया येथे देशाचा तिरंगा झेडा फडकावून अभिवादन करण्यात आले. बालाजी यांनी मध्यरात्री १२ वाजता धावायला सुरूवात केली होती.ते सकाळी साडे आठच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाला पोहोचले. बालाजी यांनी गेल्यावर्षीही अमरावतीमध्ये कार्यरत असताना ७२ किलोमीटरचे अंतर धावून पार पाडले होते.

राज्यात सोमवारपासून शाळा सुरू होणार; आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, शाळा सुरू करण्याचा निर्णय.

🔰राज्यातील करोनाची तीव्रता नियंत्रणात आल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून बंद असलेली शाळा- महाविद्यालये सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबतच्या प्रस्तावास हिरवा कंदील दाखविला असून स्थानिक परिस्थितीनुसार बालवाडी ते महाविद्यालय असे संपूर्ण शिक्षण सुरू होणार असल्याची माहिती दिली गेली.

🔰राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारपासून शाळांसोबतच महाविद्यालयेही सुरू करण्याची तयारी उच्च व  तंत्रशिक्षण विभागाने सुरू केली आहे. दरम्यान, शाळा सुरू होत असल्यानं विद्यार्थ्यांची काळजी घेण्याचं आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलंय. ते जालन्यात बोलत होते.

🔰“सोमवारपासून राज्यातील अनेक ठिकाणच्या शाळा सुरू होत आहेत. शाळांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियम पाळून विद्यार्थ्यांची काळजी घ्यावी. मुलांमध्ये थोडेही लक्षणं आढळल्यास चाचणी करून घ्यावी आणि एखादा विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आल्यास ज्या वर्गातील विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळून आला तो वर्ग बंद ठेवावा,” अशी सूचना शिक्षण विभागाकडे करण्यात आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

🔰लोकल सर्कल कम्युनिटी प्लँटफॉर्मनं एक सर्वेक्षण केलं असून या सर्वेक्षणात ६२ टक्के पालकांनी मुलांना शाळेत पाठवण्यास नकार दिल्याचं समोर आलंय. यावर बोलताना पालकांनी काळजी करण्याचं कारण नसून जगभरातील शाळांचा अभ्यास करूनच राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, असाही शाळा सुरू करण्याचा हेतू असल्याचं ते म्हणाले. त्यामुळे पालकांनी काळजी न करता नियम पाळावे असं आवाहन देखील टोपे यांनी केलं.

पदे संस्था आणि त्यांचा कार्यकाल

✅ राष्ट्रपती  - 5 वर्ष

✅ उपराष्ट्रपती  -  5 वर्ष

✅ राज्यपाल - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत 

✅ पंतप्रधान - 5 वर्ष 

✅ लोकसभा अध्यक्ष - 5 वर्ष

✅ लोकसभा सदस्य  - 5 वर्ष

✅ राज्यसभा सभापती - 5 वर्ष

✅ राज्यसभा सदस्य - 6 वर्ष 

✅ राज्यसभा - कायमस्वरुपी स्थायी

✅ महालेखापाल - 6 वर्ष  

✅ महान्यायवादी - राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत  

✅ मुख्यमंत्री - 5 वर्ष 

✅ विधानसभा - 5 वर्ष 

✅ विधानसभा सदस्य - 5 वर्ष

✅ विधान परिषद सदस्य - 6 वर्ष  

✅ विधान परिषद - कायमस्वरुपी ( स्थायी )

✅ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 65 वर्ष वयापर्यंत 

✅ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश - 62 वर्ष वयापर्यंत 

✅ कनिष्ठ न्यायालयाचे न्यायाधीश - 60 वर्ष वयापर्यंत 

✅ UPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 65 वर्षे पर्यंत )

✅ MPSC अध्यक्ष व सदस्य - 6 वर्ष  ( जास्तीत जास्त वयाच्या 62 वर्षे पर्यंत )

25 वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2022

• 25 वा राष्ट्रीय युवा महोत्सव 2022 पुद्दुचेरी येथे 12-13 जानेवारी 2022 रोजी आयोजित करण्यात आला होता.
• या उत्सवाची थीम "साक्षर युवा - सशक्त युवा" ही होती
•  युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आणि पुद्दुचेरी सरकार यांनी संयुक्तपणे हा महोत्सव आयोजित केला होता.
• पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या महोत्सवाचे उद्घाटन केले. यादरम्यान राष्ट्रीय युवा परिषदेचेही आयोजन करण्यात आले होते.
• स्वामी विवेकानंद यांच्या १५९ व्या जयंतीनिमित्त या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
• देशातील तरुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे, जेणेकरून त्यांना विविध उपक्रमांतून त्यांची प्रतिभा सादर करण्याची संधी मिळू शकेल. विशेष म्हणजे केंद्र सरकार 1995 पासून या महोत्सवाचे आयोजन करत आहे.
• भोपाळ (M.P.) येथे 1995 मध्ये पहिल्यांदा हा महोत्सव आयोजित करण्यात आला होता.

लोकअंदाज समिती

▪️ स्थापना- 1950 (जॉन मथाईं समितीच्या शिफारशी नुसार)

▪️ सदस्य-30.

▪️ सर्व सदस्य लोकसभेतून.

▪️ लोकसभा अध्यक्ष 30 पैकी एकाची अध्यक्षपदी निवड करतात.

▪️कार्यकाळ 1 वर्ष.

♦️कार्ये:

1)अर्थसंकल्पीय अंदाजाचे वेळोवेळी परीक्षण.

2) काटकसर, कार्यक्षमता, प्रशासकीय व संस्थात्मक सुधारणा या विषयी अहवाल देणे

3)धोरणे व अर्थ संकल्पीय तरतूद यांचे परीक्षण करणे.

🔴 लोकलेखा समिती.

▪️स्थापना-1921

▪️ सदस्य-22-
(राज्यसभा-7,लोकसभा-15).

▪️22 पैकी एकाची अध्यक्षपदी निवड लोकसभा सभापतीद्वारा

▪️ 1966-67 पासून अध्यक्ष विरोधी पक्षाचा.

▪️कार्यकाळ- 1 वर्ष
.

♦️कार्ये:

1)CAG च्या अहवालांची तपासणी करणे.

2महालेखा परिक्षकाला या समितीचे कान वडोळे म्हणतात.

🔵सार्वजनिक उपक्रम समिती.

🔸स्थापना-1964

▪️ कृष्ण मेनन समिती शिफारशीवरून.

▪️सदस्य- 22- (राज्यसभा-7,लोकसभा-15).

♦️कार्ये:

1)सार्वजनिक उपक्रमांचे अहवाल व लेखे तपासणे.

2)सार्वजनिक उपक्र मांवरील महालेखापालाचे अहवाल तपासणे.

वाचा :- प्रमुख व्यक्तींची प्रचलित नावे

*🔸 हिंदू नेपोलियन --  स्वामी विवेकानंद

*🔹 मॅन ऑफ पिस -- लाल बहादूर शास्त्री

*🔸 कैद-ए-आजम -- बॅ. जीना

*🔹 शहीद-ए-आलम --  भगतसिंग

*🔸 लोकनायक -- बापूजी अणे

*🔹 भारत कोकिळा -- सरोजिनी नायडू

*🔸 गान कोकिळा -- लता मंगेशकर

*🔹 आंध्र केसरी -- थंगबालू प्रकाशम्

*🔸 गरिबांचे कैवारी -- के. कामराज

*🔹 प्रियदर्शनी -- इंदिरा गांधी

*🔸 देशरत्न -- डॉ. राजेंद्र प्रसाद

*🔹 भारताचे बिस्मार्क -- सरदार पटेल

*🔸 पंजाबचा सिंह --  राजा रणजितसिंग

*🔹 विदर्भ केसरी -- ब्रिजलाल बियाणी

*🔸 विश्व कवी -- रविंद्रनाथ टागोर

*🔹 समर सौदामिनी -- अरुणा आसफअली

*🔸 भारताचे बुर्क -- सुरेंद्रनाथ बॅनर्जी

*🔹 शांतीदूत -- पंडित नेहरू

राष्ट्रीय संरक्षण निधी


🚶‍♂ उददे्श = राष्ट्र संरक्षणाच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी रोख अथवा अन्य स्वरुपात प्राप्ति झालेल्या स्वेच्छा देणग्यांची जबाबदारी व त्यांचा वापर करण्याबाबत निर्णय घेण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय संरक्षण निधीची स्थापना करण्यात आली.

🚶‍♂निधीचा वापर = सशस्त्र सेनादलातील सैनिक (निमलष्करी दलातील सैन्य अंतर्भूत) व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणाकरिता हा निधी वापरला जातो.

🚶‍♂व्यवस्थापन =  पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील कार्यकारी समितीमार्फत या निधीचे व्यवस्थापन केले जाते. या समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री, संरक्षणमंत्री तसेच वित्तमंत्री आदी सदस्य असतात. वित्तमंत्री या निधीचे खजिनदार असून पंतप्रधान कार्यालयातील संयुक्त सचिव या समितीचे सचिव म्हणून काम बघतात.

🚶‍♂साठा = रिझर्व बँकेतील खात्यात हा निधी जमा करण्यात येतो. हा निधी पूर्णपणे लोकांनी दिलेल्या देणग्यांवर अवलंबून असतो. यासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कोणत्याही स्वरूपाची तरतूद नसते. या निधीसाठी आपले योगदान देण्याकरिता ऑनलाईन पद्धतीने पैसे जमा करता येतात.

जगातील सर्वात मोठा स्कायवॉक होणार अमरावतीत...

जगात स्वीझरलँड आणि चीन या ठिकाणी स्कायवॉक आहे. स्वीझरलँडचा स्काय वॉक ३९७ मीटर, तर चीनचा स्काय वॉक ३६० मीटरचा आहे.
     मात्र, अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथे तयार होणारा प्रस्तावित स्कायवॉक ४०७ मीटरचा म्हणजेच जगातील सर्वात लांब स्कायवॉक असणार आहे.
   
      मात्र, चिखलदरा स्कायवॉकच्या बांधकामात काही अडथळे आले. आता हे अडथळे दूर झाले आहेत. राज्याच्या पाठपुराव्यानंतर केंद्र सरकारने या स्कायवॉकच्या बांधकामाला परवानगी दिलीय.

केंद्राच्या परवानगीमुळे आता चिखलदरा येथील स्काय वॉकचे काम लवकरच पूर्णत्वास जाण्याची चिन्हे आहेत.

जय भीम’ आणि ‘मरक्कर’चा ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत प्रवेश

      टी. जे. ज्ञानवेल दिग्दर्शित ‘जय भीम’ आणि प्रियदर्शन दिग्दर्शित मरक्कर’ या दाक्षिणात्य चित्रपटांचा ९४ व्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत प्रवेश झाला आहे.
     जगभरातील २७६ चित्रपट ‘ऑस्कर’ पुरस्कारांसाठी खुल्या विभागात स्पर्धेत आहेत. या यादीत ‘जय भीम’ आणि ‘मरक्कर’ चित्रपटांचाही समावेश आहे.

    मरक्कर’त २ नोव्हेंबर २०२१ रोजी ओटीटीवर प्रदर्शित झाला असून चित्रपटाचे कथानक ९० च्या दशकातील तमिळनाडूमध्ये घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे.
     दाक्षिणात्य अभिनेता सूर्या यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका आहे. प्रदर्शनानंतर हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. राजकीय वादालाही या चित्रपटाला तोंड द्यावे लागले होते. तमिळनाडूतील आदिवासींना न्याय मिळवून देणाऱ्या वकिलाची ही कथा आहे.  

      प्रियदर्शन दिग्दर्शित आणि मोहनलाल अभिनित ‘मरक्कर’ या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या चित्रपटाचाही ऑस्कर पुरस्कार स्पर्धेत समावेश झाला आहे.
     
       खुल्या विभागात निवड झालेल्या २७६ चित्रपटांची यादी ऑस्करच्या संकेतस्थळावर गुरुवारी जाहीर करण्यात आली. त्यात या दोन्ही चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.

       यंदाच्या ऑस्कर पुरस्कार स्पर्धेसाठी नामांकन मिळवणाऱ्या चित्रपटांची अंतिम यादी ८ फेब्रुवारीला जाहीर करण्यात येणार आहेत.

पंतप्रधान मोदी जगात भारी… सर्वाधिक Approval Rating सहीत ठरले सर्वात लोकप्रिय नेते.


भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जागतिक स्तरावरील एका सर्वेक्षणामध्ये सर्वाधिक लोकप्रिय म्हणजेच लोकमान्यता असणारे नेते म्हणून पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळालं आहे.

पंतप्रधान मोदींची मान्यता गुणांकन म्हणजेच अ‍ॅप्रूव्हल रेटिंग हे जगातील इतर कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक आहे. ७१ टक्क्यांसाहीत मोदींनी या यादीमध्ये पहिलं स्थान मिळवलंय. अमेरिकतील ग्लोबल लीडर अ‍ॅप्रूव्हल ट्रॅकर मॉर्निंग कन्सल्टने हे सर्वेक्षण केलंय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेते ठरले आहे. त्यांनी जगभरातील १३ नेत्यांना मागे टाकत ही लोकप्रियता मिळवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता अमेरिका, युके, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्राझील, फ्रान्स आणि जर्मनीसह १३ देशांमधील नेत्यांच्या तुलनेत जास्त असल्याचं सर्व्हेक्षणातून समोर आलं आहे.

मेक्सिकोचे अध्यक्ष अँड्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर, इटालियन पंतप्रधान मारियो ड्रॅगी यासारख्या नेत्यांचाही या यादीमध्ये अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी समावेश आहे.

22 January 2022

उद्याच्या परीक्षेत काय काळजी घ्यायला पाहिजे ?


( Just for motivation only )


      उद्या तुमचा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा दिवस , मनावर खूप दडपण असेल , काहींना टेंशन आलं असेल , काहींचा अभ्यास खूप चांगला झाला असेल , अशी प्रत्येकाची आजच्या दिवसात वेगवेगळी मानसिकता असणार आहे ...

         सर्वप्रथम , आज संध्याकाळ 6 पर्यंत जेवढा अभ्यास झाला तेवढा झाला , जास्त अभ्यास करायच्या नादात पडू नका . तुम्हाला सर्वांना एव्हाना कळलंच असेल की कितीही अभ्यास करा तो कमीच पडतो . 

          या पुढे mind stable ठेवा . किती वाचायचं राहिलंय या पेक्षा आपला खूप छान अभ्यास झाला आहे , अशा positive mindset मध्ये रहा . 

         मी नेहमी एक उदाहरण देतो . सुरवातीला 3 ओव्हर मध्ये 3 विकेट्स गेल्यानंतर पण match जिंकता येते आणि पाहिल्या 10 over मध्ये 80 ची opening partnership करून देखील काही वेळी match हरतात .

          ह्या वरून एक निष्कर्ष निघतो की , जो शेवटपर्यंत हार मनात नाही तोच ही स्पर्धा परीक्षा पास होऊ शकतो .

          प्रत्येकाने स्वतःला सांगा की हो , मी पास होऊ शकतो . जर तुम्ही अभ्यास केला असेल , जर तुमची practice चांगली झाली असेल जर तुमचं mind stable असेल तर नक्कीच तूमचा result येऊ शकतो .

          इथून पुढे आपला अभ्यास कसा exam मध्ये उतरवायचा ? paper attempt करायची आपली काय strategy असली पाहिजे ? ह्या गोष्टींवर विचार करा . 

         फक्त खूप अभ्यास केला म्हणून परीक्षा पास करता येत नसते , परीक्षेत जाताना योग्य mindset आणि योग्य strategy असणं खूप महत्त्वाचं असतं .


     तुम्हाला अजून काही सांगायची गरज नाही , सगळ्यांनी आज पर्यंत कसाही अभ्यास केलेला असू द्या , उद्या जाऊन एकदम जोरदार batting करायची आहे , चांगल्या प्रकारे पेपर सोडवा , शांत रहा , घाई करू नका , सुरवातीला काही प्रश्न अडचणीचे आले तर ते नंतर सोडवा , तुमचा सगळ्यांचा उद्याचा दिवस चांगला नक्कीच जाणार .


Best Luck ✌️✌️


21 January 2022

पहिल्यांदाच जे परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी

MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या...
👆👆👆👆👆

📚आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..

1. Name of examination
2. Roll number
3. Question booklet number
4. Question booklet series
(A, B, C, D)
5. Subject CODE 👉  GS साठी 035 आणी CSAT साठी 036
(हॉलतिकीट वर उल्लेख असतोच.)
6. तुमची सही..
candidate signature
7. ⚠️ invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.. (पुढे प्रॉब्लेम नको )
8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही..
9. Question किती attempt केले ते लिहणे ही जुनी OMR असल्यामुळे यात उल्लेख नाही.. शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात.. 🙏

⚠️एक वेळ परीक्षेत बैठक क्रमांक टाकताना चुकला तरीही चालेल,शक्यतो चुकणारंच नाही याची काळजी घ्या,पण परीक्षा बैठक नंबर गोल करताना,  A,B,C,D सेट आलेला गोल करताना चुकूनही चुकू देऊ नका.. कारण OMR answer शीट असल्यामुळे मशीन जे आपण गोल केले आहे तेच read करत असते.. त्यामुळे काळजी घ्या..

👉परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id च्या 2 xerox सोबतीला न्या.. सकाळ च्या shift मध्ये 10 ते 12 GS साठी  आणी   3 ते 5 CSAT साठी या वेळेला पेपर असतात.. हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..

⚠️ सर्वात महत्वाचे हॉलटिकिट आणी मास्क, सोबतीला राहूद्या..

परीक्षा साठी शुभेच्छा.. तब्बेतीची काळजी घ्या.. 💐💐

लेफ्टनंट जनरल मनोज पांडे भारताचे नवे उपसेनाप्रमुख; केंद्र सरकारने दिली मान्यता.

🔰भारतीय सुरक्षा दल त्यांच्या नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफच्या नियुक्तीची आतुरतेने वाट पाहत आहेत. जनरल रावत यांच्या निधनाला एक महिना उलटूनही केंद्र सरकार नवीन सीडीएसबाबत निर्णय घेऊ शकलेले नाही.

🔰मात्र, या शोधात सरकारकडून लष्करात नियुक्त्या सुरूच आहेत. केंद्राने पूर्व लष्कराचे कमांडिंग असलेले लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांना देशाचे पुढील उपसेनाप्रमुख बनवण्याचा निर्णय घेतला आहे.

🔰एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दावा केला आहे की, जनरल पांडे यांची या पदावर नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. यासह जनरल पांडे १ फेब्रुवारीपासून लेफ्टनंट जनरल सीपी मोहंती यांच्या जागी उपलष्कर प्रमुख म्हणून नियुक्त होतील. जनरल मोहंती ३१ जानेवारीला निवृत्त होत आहेत.

राज्यसेवा पूर्व साठी चालु घडामोडी चा अभ्यास करताना खालील गोष्टी नक्की ध्यानात असू द्या..

👉 Year book वाचायची सुरुवात डायरेक्ट पुरस्कार पासून करा ( 1 ते 2  मार्क्स कव्हर होतील) ( जास्त फोफट पसारा न वाचता selected पुरस्कार करा ).
मराठी भाषे संदर्भातील पुरस्कार चांगले करा ( Ex. मागच्या वेळेच्या नाळ चित्रपट वरील प्रश्न )

👉 दुसऱ्या नंबर ला तुम्ही पर्यावरणीय घडामोडी (Selected) ठेऊ शकता ( यात प्रत्येक गोष्ट वाचणे expected नाहीये ज्या गोष्टी जास्त चर्चेत होत्या फक्त त्याच करा ex. मागच्या वर्षी अमेझॉन जंगलात लागलेली आग) .

👉 तिसऱ्या क्रमांकावर राजकीय घडामोडी घ्या ( इथे सुद्धा खूप specific वाचा जास्त डीप प्रश्न विचारत नाही महत्त्वाचं तेवढं विचारलं जात ) ( ex. राज्यांच्या निवडणुकांचे रिपोर्ट सहसा paper मध्ये विचारले जात नाही, किंवा काही विधेयके/कायदे विचारले जात नाहीत) यामध्ये जे सर्वाधिक चर्चेत होते तेच वाचा.

👉 चौथ्या क्रमांकावर तुम्ही अंतरराष्ट्रीय घडामोडी ठेवू शकता ( हे वाचताना भारताचा ज्या ज्या ठिकाणी संबंध आहे ते चांगल करा Ex. मागच्या वेळी चाबहर बंदर विचारले)

👉 5 व्य क्रमांकावर आर्थिक घडामोडी ( यात HDI, GHI हे दोनच इंडेक्स महत्त्वाचे आहेत तेवढे जास्त चांगले करा बाकी आवश्यकता नाही )
महत्त्वाच्या परिषदा ( ब्रिक्स/ SCO / UNFCCC )

👉 6 व्या क्रमांकावर काही लेखकांचे पुस्तके / संमेलने यासंदर्भात माहिती घ्या ( मराठी साहित्य संमेलन )

👉 काही महाराष्ट्र संदर्भात असलेल्या घडामोडी चांगल्या करा ( ex. मागच्या वेळी आरे वसाहत विचारले )

या क्रमाने का करायचे..... ?
CURRENT वाचत असताना ते जर पुस्तकाच्या सुरुवातीपासून शेटपर्यंत वाचत जातो म्हटल्यास ते जास्त रटाळवाने वाटते.
आणि यामध्ये ज्या महत्त्वाचा गोष्टी असतात त्या जास्त Highlite होत नाहीत.
म्हणून आधी महत्त्वाचे नंतर बाकीचे...

MPSC राज्यसेवा पुर्व मधील Economy चे प्रश्न Solve करत असताना आपला Approach काय असावा?

राज्यसेवा पुर्व साठी Economy चे साधारणता 15 प्रश्न विचारले जातात. त्यातील 12-13 प्रश्न आपण Read करत असलेल्या regular Sources मधून येत असतात. राहिलेले 2-3 प्रश्न Out of Box च असतात. पण जे Basic Books मधून येतात त्या प्रश्नांना कस Deal करता येईल याविषयी आपण बघूयात.

🔴 Topicwise आपण याविषयी माहिती घेऊ.

❇️ गरिबी व बेरोजगारी -

यामध्ये दारिद्र्य आणि बेरोजगारीचे प्रकार Conceptually माहिती हवेत. त्यानंतर दारिद्र्याच्या समित्याच्या Facts पाठ करून टाका. बेरोजगारी मोजण्याच्या पद्धती चांगल्या करून ठेवा. राज्यसेवेला प्रश्न जास्त deep ला जातं नाही. So या Basic गोष्टीच चांगल्या करा.यापुढे जर प्रश्न आला तर तुम्ही केलेल्या Basic गोष्टींवरती Cover होईल.

❇️ लोकसंख्या-

यामध्ये Pyq हा सर्वात महत्वाचा Factor आहे. तुम्ही Pyq जरी तोंडपाठ केले तरी लोकसंख्येचे तुमचे 60-70% प्रश्न Cover होतात. यामध्ये Factual Angle नेच तयारी करा. उगीचच जास्त Analysis करण्यात काही अर्थ नाही.अलीकडे आयोग लोकसंख्या या घटकावर Deep level ला प्रश्न विचारत आहे. E.g. राज्यसेवा पुर्व 2020 औरंगाबाद घनतेचा प्रश्न.

❇️ 3.शाश्वत विकास -

या घटकावर आयोग Mdg, Sdg,1972 च्या Stockholm परिषदेपासून ते SDG पर्यंत ज्या घडामोडी घडल्या त्यांचा अभ्यास करावा लागेल. या घटकावर आयोगाने 2019 च्या पुर्व ला SDG आणि MDG च्या Main Targets मधील Subtargets वरती प्रश्न विचारले होते. तेवढी depth आपल्याला गाठावी लागेल.8 MDG आणि 17 SDG काही Tricks करून लक्षात ठेवा. सोबतच त्यामधील Subtargets सुद्धा.

❇️ 4 सामाजिक क्षेत्र सुधारणा -

यामध्ये महिला, बालक, वृद्ध, अपंग, सामाजिकदृष्ट्या Weaker Sections वरच्या योजना चांगल्या कराव्या  लागतील.तसेच अन्न, वस्त्र, निवारा, पाणीपुरवठा यासंबधीच्या 2014 च्या पुढील योजनानावर आयोग प्रकर्षाने प्रश्न विचारताना दिसत आहे. देसले सर भाग -2 मधून हा घटक चांगला करून घ्या.योजना अभ्यासताना ती कधी सुरु झाली, तिचे उद्देश काय होते, तिचे लक्ष गट आणि कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येते या गोष्टी करून ठेवा. पुर्व मध्ये 3-4 प्रश्न योजना, धोरणे यावरती विचारले जातात.

❇️ 5. समावेशन -

यामध्ये प्रादेशिक, वित्तीय व वैश्विक समावेशन असे घटक येतात. यामधील आर्थिक समावेशनावरती आयोग दरवर्षी प्रश्न विचारतो आहे. त्यामध्ये जनधन योजना,Pप्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना,प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, अटल पेन्शन योजना  चांगल्या करून ठेवा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे.

❇️ 6. नियोजन व जमीन सुधारणा -

यामध्ये पहिल्या ते बाराव्या पंचवार्षिक योजनांचा एक चांगला Overview आपल्याकडे असावा. त्यासोबत जमीनसुधारणा या घटकाच्या basic Facts बघून घ्या. त्यावरतीच आयोग सारखं प्रश्न विचारतो आहे. त्या राज्यसेवा Mains Hrd च्या कोणत्याही book मध्ये HR या Topic मध्ये तुम्हाला भेटून जातील.

🛑 आणखी एक आणि तितकाच महत्वाचा मुद्दा म्हणजे Out of Box questions च करायचं काय? तर त्यासाठी मला असं वाटत की काही Logic लागलं तर ठीक नाहीतर आपण असे प्रश्न Skip करू शकतो.

एकंदरीत वरती सांगितल्याप्रमाणे प्रत्येक Topic आणि Subtopic चा प्रश्नांचा Trend लक्षात घेतला तर राज्यसेवा पुर्व मध्ये Economy या विषयात 12-13 प्रश्न आपले बरोबर येऊ शकतात.

परीक्षेसाठी सर्वाना All the Best.💐💐

राज्यसेवा पूर्व CSAT

⭕ कोणते टॉपिक आत्ता शेवटच्या दिवसात REVISION करावेत.
तसेच पहिला पेपर झाल्या नंतर मध्ये जो वेळ भेटेल त्या मध्ये कोणते टॉपिक अवश्य वाचून घ्यावे.

☀️ Reasoning :-
     १. वर्गीकरण/ कोडे
     २. नातेसंबंध
     ३. Syllogism
     ४. खरे - खोटे
     ५. विधान - अनुमान/ निष्कर्ष/गृहितक
     ६. आकृतीमालिका
     ७. बैठक वयवस्था
     ८. दिशाज्ञान

☀️☀️ Math
       १. समीकरणे ( एक/द्वी चल)
       २. काळ, काम, वेग
       ३. भूमिती ( वर्तुळ, चौकोन, आयात)
       ४. वयवारी
       ५. Permutation and combination
       ६. सभाव्यता

इतका Target असू द्या.

23 तारखेच्या राज्यसेवा पुर्व मध्ये Attempt किती असावा🤔?

सध्याचा सर्वात  Hot Topic म्हणजे Attempt किती असावा? यावर माझं वयक्तिक मत मी सांगत आहे. यामध्ये मतमतांतर असू शकतात पण काही बाबी सांगाव्या वाटतात त्या खालीलप्रमाणे :

1. Attempt  हा व्यक्तीपरत्वे वेगळा असू शकतो. शेवटी तुमच्या attempt ची link तुमच्या अभ्यासापर्यंत जाते.
                     
2. एखादा 100 Attempt करून gs ला 120+ marks घेऊ शकतो तर दुसरा 75-80  Attempt करून सुद्धा 120+ Marks घेऊ शकतो. सर्वात महत्वाचा मुद्दा तुमच्या Accuracy चा आहे. ती जर मध्यम स्वरूपाची असेल तर तुम्ही जास्त attempt करायला पाहिजे. Accuracy जर खूपच चांगली असेल तर कमी Attempt मध्ये सुद्धा तुम्ही चांगले Marks मिळवू शकता. आता एवढे Paper Solve केल्यावर तुम्हाला तुमचा अंदाज आलाच असेल. मी पहिल्या Category मध्ये येतो.
  
3. आणखी एक मुद्दा म्हणजे Paper च्या Difficulty Level चा. जर paper जास्त Tough वाटत असेल तर Attempt थोडा कमी झाला तरी चालेल. पण थोडा Easy - Moderate Paper ला मात्र Attempt खूप कमी असून चालणार नाही.Paper Easy का Tough हे प्रश्न समोर आल्यानंतर लगेच लक्षात येऊन जाते. त्यानुसार आपल्याला आपला Attempt  कमी - जास्त हे ठरवता यायला पाहिजे. एक Optimum Risk घेतली तर फायदाच होईल. कारण 50-50 वर आलेले Questions Skip करून / काही Logic लागत असूनही भीतीपोटी प्रश्न सोडून देऊन हाती काही लागत नाही.

4. जे लोक वरती सांगितलेल्या पहिल्या Category मध्ये येतात त्यांनी gs मध्ये Min 85-90 Attempt करायला हवा. आणि CSAT मध्ये 65-70..कारण Accuracy खूपच चांगली नसल्यामुळे Attempt थोडा High ठेवावा लागणार आहे. बाकी आणखी कितीपर्यंत न्यायचा हे तुम्ही वयक्तिक ठरवू शकता. 

5.शेवटी Attempt ही गोष्ट एका Limit नंतर जास्त मॅटर करत नाही. तुमचा अभ्यास, Revision, Exam Hall मधील तुमची Psychology, Temperament etc. या गोष्टीच जास्त परिणाम करतात.

6. So Attempt चा निर्णय तुम्ही वरील Criteria's लावून घेऊ शकता.आणि आपल्यासाठी काय Best आहे हे आपल्यापेक्षा जास्त चांगलं कोणीही ओळखू शकत नाही. So choose Your Best👍👍.

सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐