23 September 2019

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी षष्ठी विभक्तीचे प्रत्यय ओळखा.

   1) स, ला, ना, ते    2) चा, ची, चे, च्या   
   3) त, इ, आ    4) ने, ए, शी, नी

उत्तर :- 2

2) ‘किती उंच पर्वत आहे हा !’ विधानार्थी वाक्य करा.

   1) कोण  म्हणेल हा पर्वत उंच नाही    2) हा पर्वत लहान थोडाच आहे
   3) पर्वत किती उंच आहे ?      4) हा पर्वत खूप उंच आहे

उत्तर :- 4

3) उद्देश्य व विधेय हे ................. चे घटक होत. वरील रिकाम्या जागेत अचूक पर्याय भरा.

   1) वाक्या    2) अर्थप्रकाश   
   3) अर्था    4) वाक्य प्रयोगा

उत्तर :- 1

4) शिपायाकडून चोर पकडला गेला. – या वाक्यातील प्रयोग ओळखा.

   1) कर्तरी    2) सकर्मक कर्तरी   
   3) नवीन कर्मणी    4) भावे

उत्तर :- 3

5) खालील पर्यायी उत्तरांतील योग्य उत्तर कोणते ?

     ‘अव्ययीभाव समासात .............................’

   1) पहिले पद प्रुख    2) दुसरे पद प्रमुख
   3) दोन्ही पदे प्रमुख    4) तिसरे पद प्रमुख

उत्तर :- 1

6) खालील वाक्यात शेवटी विरामचिन्हे द्या. – सुनील शाळेला का जात नाही.
   1) .      2) ?     
   3) !      4) :

उत्तर :- 2

7) ‘कुल’ या शब्दाचे शब्दसाधित रूप कोणते होईल ?
   1) कुळाचार    2) कुळकर्णी   
   3) कुलटा    4) कुलीन

उत्तर :- 4

8) योग, रूढी, योगरूढ हे कोणत्या शब्दशक्तीचे प्रकार आहेत ?
   1) अभिधा    2) लक्षणा   
   3) व्यंजना    4) गौणी

उत्तर :- 1

9) ‘सूर्य’ या अर्थी पुढील शब्द वापरत नाही.
   1) रवि      2) आदित्य   
   3) भानू    4) सुधांशू

उत्तर :- 4

10) विधायक च्या विरुध्द
   1) विनायक    2) विघातक   
   3) वैधानिक    4) संकट

उत्तर :- 2 

९३ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो


🅱उस्मानाबाद येथील नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली.

🅱 निमंत्रक संस्था असल्याने मराठवाडा साहित्य परिषदेने एकाही साहित्यिकाचे नाव सुचवले नाही.

🅱साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत अखिल उस्मानाबाद येथे रविवारी पार पडलेल्या भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

🅱महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

🅱घटक संस्थांनी वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. 

🅱साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा असल्यामुळे ‘मसाप’ने नाव सूचवण्यात आले नाही.

🅱📚दिब्रिटो यांची कारकिर्द 📚🅱

🅱फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

🅱 ‘सुवार्ता’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीपर लेखन केले आहे.

🅱 ‘सुबोध बायबल – नवा करार’ या ग्रंथासाठी दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.

🅱१५ व्या मराठी ख्रिती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

🅱‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’, ‘आनंदाचे अंतरंग’, ‘तेजाची पाऊले’, ‘परिवर्तनासाठी धर्म’, ‘ओअॅसिसच्या शोधात’, ‘सृजनाचा मळा’, ‘नाही मी एकला’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘गोतावळा’ आदी ग्रंथ प्रकाशित आहेत.

🅱वसई येथे वास्तव्य असलेले फादर दिब्रिटो यांनी मराठी साहित्यात धर्म आणि वैचारिक लेखनाद्वारे मौलिक भर घातली आहे. 

जागतिक कुस्ती स्पर्धा: आवारेने कांस्यपदक जिंकले

भारताचा युवा कुस्तीपटू राहुल आवारेने जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं आहे. त्यामुळे भारताच्या खात्यात पाचवं पदक आलं आहे. राहुलने ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे.

कझाकिस्तानच्या नूर सुल्तान येथे ब्रॉन्ज मेडल सामन्यात राहुल आवारेने अमेरिकेचा कुस्तीपटू टायलर ली ग्राफ याला पराभूत केलं. दरम्यान, ऑलिम्पिकच्या न येणाऱ्या गटात राहुलनं पदक पटकावलं आहे. त्यामुळे या पदकानंतरही तो टोकियो ऑलिम्पिकमध्ये क्वालिफाय होणार नाही. या आधी दीपक पुनियाने ८६ किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली होती. नूर-सुलतान, कझाकिस्तान येथे सुरू असलेल्या या जागतिक कुस्ती स्पर्धेतून विनेश फोगट, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, रवी दाहिया यांनी २०२०च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला आहे.

ऐतिहासिक: बॉक्सर अमितला जागतिक रौप्य

भारताचा बॉक्सर अमित पंघलची यंदाच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील घोडदौड शनिवारी रौप्यपदकासह संपष्टात आली. ५२ किलो वजनी गटाच्या फायनलमध्ये शनिवारी उझ्बेकिस्तानचा ऑलिम्पिक विजेता बॉक्सर शाखोबिदिन झॉयरोव्हने त्याच्यावर सरशी साधत जगज्जेतेपदाचा मान संपादला. अमितने फायनलमध्ये केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, लढतीतमधील त्याची आक्रमकता पाहून अंतिम फेरीचा ५-० हा स्कोअर फसवा वाटतो. मात्र कुस्ती आणि बॉक्सिंगमधील तांत्रिक गुणांचा थांग खुद्द खेळाडूंनाही लागत नाही.

जागतिक स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारणारा, रौप्यपदकाची कमाई करणारा दुसरा सीडेड अमित पंघल हा भारताचा पहिलाच बॉक्सर ठरला आहे. त्याआधी मनीष कौशिकने ६३ किलो वजनी गटात ब्राँझपदकाची कमाई केली आहे.

अमितची उंची तशी बॉक्सरला साजेशी नाही; पण आपल्या उजव्या हाताच्या ठोश्याने तो उंचपुऱ्या प्रतिस्पर्ध्याच्यादेखील नाकीनऊ आणतो. शनिवारी पार पडलेल्या फायनलमध्येही तसेच चित्र दिसले. त्याचा प्रतिस्पर्धी झॉयरोव्ह उंचपुराच होता. तरीदेखील छोट्याचणीच्या अमितचे ठोशे अचूक लागत होते. त्यात अमितच्या तुलनेत झॉयरोव्हची शरीरयष्टीही पिळदार आहे. मात्र तांत्रिकदृष्ट्या भारताचा एशियाड आणि आशियाई विजेता बॉक्सर अमित कमीच पडला.

मुळचा रोहतकचा असलेल्या अमितने राष्ट्रीय विजेता झाल्यापासून मागे वळून बघितले नाही. २०१७मध्ये त्याने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत ब्राँझची कमाई केली आणि अमितच्या आंतरराष्ट्रीय यशाचा सिलसिला सुरू झाला.

या स्पर्धेच्याआधी भारताला जागतिक स्पर्धेत एकपेक्षा जास्त पदके जिंकणे जमले नव्हते. जे अमित आणि मनीषमुळे शक्य झाले. २००९मध्ये विजेंदर, २०११मध्ये विकास क्रिशन, २०१५मध्ये शिव थापा आणि २०१७मध्ये गौरव बिधुरीने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत ब्राँझपदके पटकावली आहेत.

▪️दष्टिक्षेप

१) जागतिक बॉक्सिंग स्पर्धेतील ५२ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत शनिवारी अमित पंघलला ऑलिम्पिक विजेत्या झोयरोव्हकडून पराभव पत्करावा लागला.

२) जागतिक कुस्ती स्पर्धेत किमान उपविजेता ठरलेला अमित हा पहिला भारतीय बॉक्सर ठरला आहे. या स्पर्धेत प्रथमच भारताला दोन पदके लाभली हे विशेष.

३) मनीष कौशिकने ६३ किलो वजनी गटात यंदा ब्राँझपदकाची कमाई केली आहे.

22 September 2019

चालू घडामोडी वन लाइनर्स, 21 सप्टेंबर 2019.


✳ पुरुष वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेची सुरुवात रशियामध्ये

✳ अमित पानघलने वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला

✳ अमित पन्हाळ अंतिम सामन्यात पुरुषांच्या वर्ल्ड बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये प्रवेश मिळवणारे पहिले भारतीय व्हा

✳ मनीष कौशिक कांस्यपदक जागतिक बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये  63 केजी गटात

✳ मनीष कौशिक पुरुषांच्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत पदक जिंकणारा 5 वा भारतीय खेळाडू ठरला

✳ कझाकस्तानमध्ये 16 व्या जागतिक कुस्ती स्पर्धेस प्रारंभ

✳ जागतिक कुस्ती स्पर्धेत 57 केजी गटात रवी कुमारने कांस्यपदक जिंकले

✳ गोव्यात  37 वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेची बैठक

✳ वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये 65 किलोग्राम प्रकारात बजरंग पुनियाने कांस्यपदक जिंकले

✳ 9 वा रग्बी वर्ल्ड कप 2019 ची सुरुवात जपानमध्ये

✳ अमित शहा यांनी आपत्कालीन प्रतिसाद सहाय्य प्रणाली (ईआरएसएस) - '112' हेल्पलाइन सुरू केली

✳ अमित शहाने '' ई-साथी '' मोबाइल .प्लिकेशन सुरू केले

✳ क्रीडा मंत्रालयाने गगन नारंगच्या अकादमीसाठी 5 कोटींची घोषणा केली

✳ फ्रान्सकडून भारताला पहिला राफेल फायटर जेट "आरबी -001" प्राप्त झाला

✳ एशियन टेबल टेनिस स्पर्धा इंडोनेशियामध्ये सुरू होईल

✳ जी सॅथियान पहिला भारतीय खेळाडू एशियाई टेबल टेनिस चँपियनशिपचा उपांत्य-अंतिम सामना करेल

✳ महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकांसाठी आज ईसीआय तारखा जाहीर करणार

✳ राष्ट्रपतींनी मद्रास हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश व्ही.के. ताहिलरामनी यांचा राजीनामा स्वीकारला

✳ मधुकर कामथ ऑडिट ब्युरो ऑफ सर्कुलेशन्सचे अध्यक्ष (एबीसी)

✳ विनीत कोठारी यांची मद्रास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती

✳ अनिल कुमार जैन यांची नवीन कोळसा सचिवपदी नियुक्ती

✳ आरबीएस बँकेने अ‍ॅलिसन रोजला मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे

✳ इंडोनेशियाची संयुक्त राष्ट्रसंघाच्या 74 व्या महासभेच्या उपाध्यक्षपदी निवड झाली

✳ जॉन थॉमस यांनी दक्षिणी रेल्वेचे महाव्यवस्थापक म्हणून पदभार स्वीकारला

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 दिवसांच्या अमेरिकेच्या दौर्‍यावर रवाना

✳ बीबीसीने मुलांसाठी '' डिजिटल वेलबिंग '' अ‍ॅप लाँच केले

✳ मध्य प्रदेश सरकारने गोविंदाला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून नियुक्त केले

✳ आयुष्मान भारत, ओला हेल्थकेअर बेनिफिट्ससाठी विस्तारित सामंजस्य करार

✳ 2020 मध्ये यूएन हवामान बदल समिटचे आयोजन करण्यासाठी ग्लासगो

✳ केनिया नोव्हेंबर 2019 मध्ये जागतिक लोकसंख्या समिटचे आयोजन करणार आहे

✳ ऑक्टोबरमध्ये रशिया-आफ्रिका समिटचे उद्घाटन सोची करणार आहेत

✳ सीएसआर समिट इंडियाचे 6 वे संस्करण नवी दिल्ली येथे होणार आहे

✳ आयआयटी मद्रासने देशाची पहिली अंतराळ टेक संशोधन बैठक आयोजित केली

✳ मायक्रोसॉफ्टने डिजिटल प्लॅटफॉर्म होस्ट करण्यासाठी आता भारताच्या इरोस बरोबर करार केला

✳ फिफा अंडर -17 डब्ल्यूसी सेवा करातून सूट: सरकार

✳ एमएचएने राष्ट्रीय एकात्मतासाठी सरदार पटेल पुरस्कार जाहीर केला

✳ चँपियन्स गोल्फ टूर्नामेंटमध्ये कपिल देवने 60-64 वयोगटातील गट जिंकला

✳ पीयूष गोयल आज युएईच्या दोन दिवसीय दौर्‍यावर येणार आहेत

✳ 1 ला राजस्थान स्टेट फुटबॉल लीग 2019 प्रारंभ झाला

✳ बी साई प्रणीथ आउट आउट चायना ओपन बॅडमिंटन स्पर्धा.

21 September 2019

ISRO ने चंद्राच्या कक्षेत फिरणाऱ्या ऑर्बिटरबद्दल दिली माहिती


चांद्रयान-2 मोहिमेत पाठिशी उभे राहिल्याबद्दल देशवासियांचे आभार मानल्यानंतर इस्रोने आज ऑर्बिटरच्या प्रकृतीची माहिती दिली.

ऑर्बिटरच्या पेलोडवर करण्यात आलेले प्रारंभिक प्रयोग यशस्वी ठरले आहेत. सर्व पेलोडसची कामगिरी समाधानकारक आहे असे इस्रोने म्हटले आहे.

चांद्रयान-2 चा ऑर्बिटर ठरल्याप्रमाणे सर्व वैज्ञानिक चाचण्या करत आहे. ऑर्बिटरमध्ये आठ अत्याधुनिक पेलोड आहेत.

ज्यावरुन चंद्राचा नकाशा तयार करण्यात येईल तसेच चंद्रावर पाणी, बर्फ, खनिजांचा शोध घेतला जाईल. वि
चांद्रयान-2 मोहिमेतील लँडरशी संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या कक्षेत फिरत असलेला ऑर्बिटर निर्णायक ठरेल असा विश्वास काही दिवसांपूर्वी इस्रोचे प्रमुख सिवान यांनी व्यक्त केला होता.

तसेच आधी ऑर्बिटरचे आयुष्य एक वर्ष असणार होते. पण जीएसएलव्ही प्रक्षेपकाने ऑर्बिटरला अचूक कक्षेत प्रस्थापित केले तसेच त्यामध्ये इंधन जास्त असल्यामुळे ऑर्बिटर आणखी सात वर्ष कार्यरत रहाणार आहे.

पाण्यासंदर्भात महत्वपूर्ण शोध ऑर्बिटरच्या माध्यमातून लागू शकतो.

ऑर्बिटरमुळे चंद्रावर बर्फ आणि पाणी शोधून काढण्याची संधी आहे. चंद्राच्या पृष्ठभागाखाली 10 मीटरपर्यंत गोठलेले पाणी पाहण्याची क्षमता आमच्याकडे आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

ग्लोबल वॉर्मिंगचा वेग भविष्यात वाढणार

वातावरणातील कार्बन डायऑक्साइडची पातळी ज्या प्रमाणात वाढत आहे, त्या प्रमाणात जागतिक तापमानातही वाढ होत असल्याचे निरीक्षण एका अभ्यासातून मांडण्यात आले आहे. यासाठी ५० दशलक्ष वर्षांपूर्वीच्या तप्त वातावरणाची तुलना करण्यात आली आहे. काही नाही वाढणार, आजकाल लोकं एवढी झाडे लावतायेत की वातावरण सद्य परिस्थिती पेक्षा शुद्ध होईल.
सुमारे ४८ दशलक्ष ते ५६ दशलक्ष वर्षांपूर्वीच्या काळाला 'अर्ली ओसीन' काळ म्हटले जात असून या कालावधीत जगभरात गेल्या ६६ दशलक्ष वर्षांतील सर्वाधिक तापमान होते, असे मानले जाते. अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठ आणि अॅरिझोना विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या 'अर्ली ओसिन' कालावधीचा अभ्यास करून हे मत मांडले आहे.

वातावरणातील कार्बन डायऑक्साइड ज्या प्रमाणात वाढत आहे, त्याचा परिणाम वातावरणावर होत असल्याबद्दल शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. भविष्यात कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण जसे वाढेल, त्यानुसार तापमानवाढीचा वेगही आतापेक्षा अधिक वाढणार आहे आणि ही नक्कीच आपल्यासाठी चांगली बातमी नाही, अशा शब्दांत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांनी याआधी 'अर्ली ओसीन' या काळातील कार्बन डायऑक्साइडच्या प्रमाणाशी याआधीही तुलना केली होती, मात्र तेव्हा त्यांना अशी चिंताजनक तापमानवाढ आढळली नव्हती. त्यांनी वातावरणअभ्यासाच्या तंत्रामध्ये बदल करून त्यात ढगांचे प्रमाण तपासण्याची पद्धत अवलंबल्यानंतर शास्त्रज्ञांना हा बदल आढळून आला आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीच्या वातावरणातील ढगांचे प्रकार आणि त्यांच्या प्रमाणामध्ये बदल होतात आणि ढगांमुळे वातावरणावर उष्ण आणि शीत परिणाम होतात.

ढगांचा वातावरणातील बदलावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास केला असता, भविष्यात वातावरणातील बदल वाढून तापमानवाढ होणार असल्याचे मत शास्त्रज्ञांनी मांडले. भूगर्भशास्त्रीय पुराव्यानुसार 'अर्ली ओसीन' काळात कार्बन डायऑक्साइडची पातळी प्रती एक दशलक्षमागे एक हजार होती (पीपीएम), ही पातळी सध्याच्या स्थितीत ४१२ आहे. कार्बन उत्सर्जनावर निर्बंध न आणल्यास ही पातळी सन २१०० पर्यंत १०००वर पोहोचेल, अशी भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.

बाबर (सन 1526 ते 1530)

बाबर हा मुघल साम्राज्याचा संस्थापक होय. दिल्लीमध्ये रब्राहीम लोदी सत्तेत असतांना पंजाबच्या प्रांताधिकारी दौलतखान लोदीने बाबरला भारतात आक्रमण करण्यास पाचारण केले.

बाबरने सन 1526 मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईत इब्राहीम लोदीचा पराभव करून मुघल साम्राज्याची स्थापना केली. त्याच्या साम्राज्याला राजपुतान्यातील राजपूतांनी आव्हान दिले.

सन 1527 मध्ये खुनव्याच्या लढाईत बाबरने संघटीत राजपुतांचा पराभव केला आणि आपली दिल्लीची सत्ता मजबूत केली.

2. हुमायूम (सन 1530 ते 1555) :

बाबरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायूम सत्तेत आला.

बिहारमधील अफगाणचा प्रमुख शेरशहा सुरीने चौसाच्या लढाईत हुमायूमचा पराभव केला.

यामुळे हुमायूमला पळून जावे लागले चौसाच्या दुसर्‍या लढाईत (सन 1540) हुमायूचा दुसर्‍यांदा पराभव करून मुघलांची सत्ता संपूष्ठात आणली.

पुढे हुमायूमला सत्तेविना भटकंती करावी लागली.

3. शेरशहा सूरी (सन 1540 ते 1554) :-

सन 1540 मध्ये चौसाच्या लढाईत शेरशहा सुरीने हुमायूमचा करून सूरी वंशाची स्थापना केली. शेरशहाने जनतेच्या हितार्थ अनेक योजना सुरू केल्या.

जमीन महसूल सुधारणा: –

शेतीची प्रत निश्चित करून उत्पादनानुसार शेतसारा निश्चित केला.

रस्ते बांधणी :-

राजधानीला जोडणार्‍या रस्त्याचे बांधकाम हाती घेतले. दिल्ली अमृतसर राजमार्ग त्याच्याच काळात पूर्ण झाला.

चलन व्यवस्था :-

त्याने रुपया हे नाणे सुरू केले.

टपाल व्यवस्था :-

राजधानी मध्ये टपाल व्यवस्था सुरू केली.

4. हुमायूम (सन 1555 ते 1556) :

हुमायूमला शेरशहा सूरी सत्तेत असेपर्यंत काहीही करता आले नाही.

शेरशहा सूरीच्या मृत्यूनंतर मुहम्मद आदिलशहा सत्तेत आला. हा विलासी राजा होता.

सन 1555 मध्ये सिकंदर सूरी चा पराभव करून सूरी वंशाची सत्ता संपुष्टात आणली आणि दिल्लीवर पुन्हा आपला ताबा मिळविला. परंतु, त्यास ही सत्ता फार दिवस उपभोगता आली नाही.

सन 1556 मध्ये जिन्यावरुन घसरून मरण पावला.

5. अकबर (1556 ते 1606) :

सम्राट अकबराने अल्पावधीमध्येच अर्ध्या भारतावर आपली सत्ता स्थापित केली.

राणा प्रतापच्या प्रखर विरोधामुळे मेवाड मात्र त्यास आपल्या साम्राज्यात सामील करता आले नाही.

अकबर हा सहष्णू राजा होता.

सर्व धर्माच्या लोकांना विश्वासात घेवून त्याने आपला साम्राज्य विस्तार केला. यामुळे तो सर्व लोकांमध्ये प्रसिद्धीला आला होता.

महत्वाच्या सुधारणा :-

त्याने युद्धकैद्यांना गुलाम बनविण्याची प्रथा बंद केली.

सतीप्रथा बंद करण्याचा प्रयत्न केला.

हिंदूवर लादण्यात आलेला झिझिया कर रद्द केला.

बालहत्या प्रथा बंद केली.

सर्व धर्माची तत्वे एकत्र करून दिन-ए-रलाही धर्माची स्थापना केली.

कला व विद्याप्रेमी :-

अकबराच्या काळात आगर्‍याचा किशाल किल्याचे व फत्तेपूर शिक्रीचा किल्ला बांधला.

अकबराच्या काळातच तानसेन व बैजू बाबरा सारखे गायक प्रसिद्धीला आले.

अकबराच्या काळात अथर्ववेद, पंचतंत्र, रामायण व महाभारताचे फारसी भाषेत रूपांतर करण्यात आले.

तुलसीदासचे रामचरितमानस याच काळात रचले गेले.

अकबराच्या नवरत्न दरबार प्रसिद्ध होता.

6. जहांगीर (1606 ते 1627) :

अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा जहांगीर सत्तेमध्ये आला. त्याने अकबराचे राज्य विस्तारचे धोरणपुढे चालू ठेवले.

त्याने पूर्व बंगाल व पंजाबमधील कांगडा प्रांत राज्यास जोडले. हा राजा कलाप्रेमी होता.

मुघल चित्रकलाशैली याच राज्याच्या काळात प्रसिद्धीला आली.

काश्मिरमधील प्रसिद्ध निशांत बाग व शालिमार बाग जहांगीर राजनेच बांधली.

जाहांगीरच्या कारभारावर नूरजहांचे नियंत्रण होते.

7. शहाजहान (सन 1627 ते 1658) :

जहांगीरच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा शहाजहान गादिवर आला. त्याने दक्षिणकडे आपला राज्यविस्तार केला.

त्याने दक्षिणेतील आदिलशाही आणि कुतूबशाहींना आपले प्रभुत्व मान्य करण्यास भाग पाडले आणि त्याच्या मदतीने निझामशाही संपुष्टात आणली.

अशाप्रकारे दक्षिणेकडे आपली सत्ता प्रस्तापित केली.

शहाजहान हा कलाप्रेमी राजा होता. त्याने आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ ताजमहल नावाची जगप्रसिद्ध वास्तु बांधली. दिल्ली जामा मशीद आली लाल किल्ला हे याच राज्याच्या काळात बांधले गेले.

8. औरंगजेब (सन 1658 ते 1707) :

सन 1657 मध्ये शहाजहान आजारी पडला असता त्याने शहाजहानला नजरकैदेत टाकून स्वत:ला सम्राट घोषित केले.

औरंगजेबाच्या काळापर्यंत मुघल साम्राज्याची सत्ता संपूर्ण भारतभर पसरली होती. औरंगजेब हा सुन्नी विचाराचा असल्यामुळे व संशयी स्वाभावामुळे बरेचशे सरदार व अधिकारी दुखावल्या गेले. याच काळात पंजाब प्रांतात शिखांविरुद्ध संघर्ष सुरू झाला होता आणि महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती.

औरंगजेबास आपली 21 वर्षे मराठ्यांसोबत संघर्ष करण्यात खर्च करावी लागली. परंतु, त्यास यश आले नाही.

शेवटच्या क्षणी सन 1707 मध्ये खुल्ताबाद येथे त्याचे निधन झाले. औरंजेबानंतरचे मुघल सम्राट कमकुवत निघाल्यामुळे प्रांतिक नवाबांनी आपले स्वतंत्र राज्य घोषित केले.

सन 1857 च्या ऊठावात शेवटचा मुघल सम्राट बहादुरशहा जफर-दूसरा यास इंग्रजांनी अटक करून ब्रम्हदेशातील रंगून येथे ठेवले आणि तेथेच त्याचे निधन झाले. अशाप्रकारे मुघल साम्राज्य संपूष्ठात आले.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन

1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी

1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष

1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष

1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष

1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1922 – गया – चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

1929 – लाहो – पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

1940 – मुंबई – मौ. अब्दुल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.

1946 – मिरत – जे. बी. कृपालानी –