Ads

22 August 2019

झांबिया आणि भारत  या देशांच्या दरम्यान सहा  करार झाले


झांबियाचे राष्ट्राध्यक्ष एडगर चागवा लुंगु यांनी 20 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2019 या काळात भारताला भेट दिली. नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर भारत दौऱ्यावर आलेले ते आफ्रिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत.

👉राष्ट्राध्यक्ष लुंगु यांचा हा पहिलाच भारत दौरा होता.

👉भेटीदरम्यान, राष्ट्राध्यक्ष लुंगु आणि त्यांच्या समवेत आलेल्या प्रतिनिधी मंडळासोबत झालेल्या चर्चेमध्ये दोन्ही देशांनी परस्पर हिताच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.

🌹🌳🌴चर्चेमधले ठळक मुद्दे🌴🌹

👉भारताच्या सहकार्यात आरोग्य, ऊर्जा निर्मिती तसेच ल्युसाकामध्ये वाहतूक सुरळीत करण्यासंदर्भातल्या प्रकल्पात उत्तम प्रगती होत आहे.

👉झांबियामध्ये इनक्युबेशन सेंटर स्थापन करण्यासाठी भारत सहकार्य करणार आहे. 

👉याशिवाय कृषी क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी 100 सौर सिंचन पंप भारत उपलब्ध करुन देणार आहे. झांबियाला 1000 टन तांदूळ आणि 100 टन दूध भुकटीही भारत पाठविणार आहे.

🌹🌳🌴झांबिया आणि भारत  यांच्यात झालेले करार 🌴🌳🌹

1.भूगर्भ आणि खनिज संसाधन या क्षेत्रातल्या सहकार्याबाबतचा सामंजस्य करार

2.संरक्षण सहकार्याबाबत सामंजस्य करार

3.कला आणि संस्कृती क्षेत्रात सहकार्याबाबत सामंजस्य करार

4.भारतीय परराष्ट्र व्यवहार सेवा आणि झांबियामधली राजनैतिक आणि आंतरराष्ट्रीय अभ्यास संस्था यामधला सामंजस्य करार  

5.ई-विद्याभारती आणि ई-आरोग्यभारती (e-VBAB) नेटवर्क प्रकल्पाबाबत सामंजस्य करार

6..भारतामधले निवडणूक आयोग आणि झांबियामधले निवडणूक आयोग यांच्यादरम्यानचा सामंजस्य करार

🌹🌳🌴भारत-झांबिया संबंध🌴🌳🌹

👉झांबिया हा आफ्रिका खंडाच्या दक्षिण भागातला एक भूपरिवेष्ठित देश आहे.

👉त्याला काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक, टांझानिया, मलावी, मोझांबिक, झिंबाब्वे, बोत्स्वाना व नामिबिया आणि अँगोला या देशांचा वेढा आहे.

👉लुसाका ही झांबियाची राजधानी असून झांबियाई क्वाचा हे राष्ट्रीय चलन आहे.

👉भारत आणि झांबिया यांच्यात प्राचीन काळापासून संबंध आहेत.

👉झांबिया हा भारताचा महत्वाचा मित्र आणि विश्वासू भागीदार आहे.

👉व्यापार, वाणिज्य, गुंतवणूक आणि पायाभूत संरचनेपासून विकासात्मक सहकार्य, क्षमतावृद्धी तसेच दृढ सांस्कृतिक संबंधांपर्यंत उभय देशातली भागीदारी व्यापक झाली आहे.

👉झांबिया हा खनिजसमृद्ध देश आहे.

👉इतर खनिजांबरोबरच भारत झांबियाकडून मोठ्या प्रमाणात तांबे धातूची आयात करतो.

*चालू घडामोडी वन लाइनर्स, 22 ऑगस्ट 2019.*

✳ यूएन च्या विशेष उद्देश ट्रस्ट फंडात भारत $1 दशलक्ष योगदान देतो

✳ अमेरिकेने 125 दशलक्ष डॉलर्स अफगाणिस्तानास मदत केली

✳ अमेरिकेने पाकिस्तानला 440 दशलक्ष डॉलर्सची आर्थिक मदत कपात केली: अहवाल

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदी जी 7 समिट 2019, फ्रान्समध्ये सामील झाले

✳ जी -7 शिखर परिषदेत भारताला भागीदार देश म्हणून आमंत्रित केले गेले आहे

✳ पंतप्रधान मोदी रशियामधील 5 व्या ईस्टर्न इकॉनॉमिक फोरम (ईईएफ) मध्ये उपस्थित होते

✳ उत्तर प्रदेश मंत्रिमंडळ 21 ऑगस्ट रोजी (आज)

✳ झांबियाचे अध्यक्ष एडगर चागवा लुंगू 20 ऑगस्टपासून भारत दौर्‍यावर आहेत

✳ भारतीय महिला संघाने ऑलिम्पिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जपानला 2-1 ने पराभूत केले

✳ मार्क रॉबिन्सन इंग्लंडच्या महिला संघाचा प्रशिक्षक म्हणून पद सोडतील

✳ आंतरराष्ट्रीय ग्रँड मास्टर बुद्धिबळ मुक्त स्पर्धा हैदराबादमध्ये सुरू

✳  माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना भ्रष्टाचार प्रकरणात अटक

✳  प्रणय, प्रणीथ वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपच्या प्री-वुअर्टर्समध्ये दाखल

✳  नेपाळला पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी भारत 233 कोटी रुपयांची आर्थिक मदत देते

✳  "FASTags" डिसेंबर 2019 पासून सर्व वाहनांसाठी अनिवार्य होईल

✳ डक-ही एटीपी मेन-ड्रॉ सामना जिंकण्यासाठी पहिला बधिर खेळाडू ठरला

✳ एस श्रीशांतची स्पॉट फिक्सिंग बंदी ऑगस्ट 2020 मध्ये संपली: बीसीसीआय लोकपाल

✳ शॉटगन विश्वचषक स्पर्धेची सुरुवात फिनलंडच्या लाहिटी येथे होईल

✳ आयआयटी, उत्तर प्रदेशातील आयआयएम अभ्यासक्रमात योगाचा समावेश करतात

✳  ओडिशा सरकार पीडब्ल्यूडींसाठी विशेष सेल सुरू करणार आहे

✳  गोवा लोकसेवा आयोग परीक्षा कोंकणीत घेण्यात येईल

✳  एफसी गोवा फुटबॉल संचालक म्हणून रवी पुस्कुर यांची नियुक्ती करते

✳ डॉ. एस. जयशंकर काठमांडू येथे 2 दिवसाच्या नेपाळ दौर्‍यावर येतील

✳  महाराष्ट्र शासनाने एमएसआरटीसी बसेससाठी लाइव्ह ट्रॅकिंग सिस्टम सुरू केली

✳  लोकसभा सचिवालयानं संसदेमध्ये प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली

✳  ओडिशात 1 सप्टेंबरपासून 'एक राष्ट्र, एक रेशन कार्ड' योजना राबविण्यात येईल

✳  भारतीय पुरूष हॉकी संघाने टोकियोमध्ये ऑलिम्पिक कसोटी स्पर्धे जिंकल्या

✳  जगातील सर्वात कमी भारतीय पॅकेज्ड फूड्स: सर्वेक्षण

✳  2025 पर्यंत भारताचे सॉफ्टवेअर उद्योग $ 80 अब्ज डॉलर्स वर जाईल: सीआयआय

✳  मोफत औषध योजना अंमलबजावणीमध्ये राजस्थानचा पहिला क्रमांक आहे

✳  कर्नाटक भारतातील शीर्ष सौर सौर्य म्हणून उत्कृष्ट राज्य म्हणून उदयास आले

✳  अमेरिकेने आज भारतासमवेत २+२ वार्तालापांची अंतरराष्ट्रीय बैठक आयोजित केली आहे

✳  आज तक 20 दशलक्ष सदस्यांना ओलांडण्यासाठी प्रथम वृत्त चॅनेल बनले

✳ मेझॉनने हैदराबादमधील जगातील सर्वात मोठ्या कॅम्पसचे उद्घाटन केले

✳  राजीव गौबा यांची 30 ऑगस्टपासून कॅबिनेट सचिवपदी नियुक्ती

✳  अजय कुमार यांची नेक्स्ट डिफेन्स सेक्रेटरी म्हणून नेमणूक

✳  काठमांडू येथे भारत नेपाळ संयुक्त कमिशनची पाचवी बैठक

✳  बीएसएनएल आता भारतात सर्वात जलद 3 जी नेटवर्कः ट्राय

✳  JIO जुलैमध्ये सर्वात वेगवान 4G नेटवर्क बनले आहे: ट्राय

✳  एकात्मिक शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम "निष्ठा" सुरू

✳  अब्दल्ला हॅमडोक यांनी सुदानचे नवीन पंतप्रधान म्हणून कार्यभार स्वीकारला

✳  20 सप्टेंबर रोजी भारत पहिला रफाळे जेट मिळवणार आहे

✳ इंडिया-एस्टोनिया बिझिनेस फोरम आयोजित

मुंबई विद्यापीठाला ‘ग्लोबल एज्युकेशन’ पुरस्कार

👉प्रत्येक सत्रातील ४५०पेक्षा अधिक परीक्षांच्या संपूर्ण मूल्यांकनाची प्रक्रिया ‘ओएसएम’ पद्धतीद्वारे करणारे मुंबई विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ असल्याने ते या पुरस्कारासाठी पात्र ठरले.

👉उच्च शिक्षणात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्याबद्दल मुंबई विद्यापीठाला राष्ट्रीय पातळीवरील ‘ग्लोबल एज्युकेशन पुरस्कार - २०१९’ प्राप्त झाला आहे.

👉राजस्थानातील उदयपूर येथे झालेल्या ग्लोबल एज्युकेटर फेस्टिव्हलमध्ये सोनम वायचुंग व लक्षराजसिंग मेवाड यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

👉मुंबई विद्यापीठाने २०१७ साली उन्हाळी सत्राच्या परीक्षांपासून सर्व परीक्षांसाठी संगणकाधारीत मूल्यांकन पद्धत म्हणजेच (आॅनस्क्रीन मार्किंग) सुरू केली. प्रत्येक परीक्षेला जवळपास १३ ते १६ लाख उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करून, त्याचे शिक्षकांमार्फत आॅनलाइन मूल्यांकन करून घेतले.

👉‘ओएसएम’बरोबरच मुंबई विद्यापीठाकडून सर्व परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ‘डिजिटल पेपर डिलिव्हरी’मार्फत ८१९पेक्षा जास्त महाविद्यालयांना प्रश्नपत्रिका आॅनलाइन पाठविली जाते.

👉प्रश्नपत्रिका छपाईचा, वाहतुकीचा खर्च व वेळ यातून वाचला जातो, तसेच सुरक्षितरीत्या या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वी महाविद्यालयाकडे पोहोचतात.

👉 सुरक्षेचा उपाय म्हणून प्रत्येक प्रश्नपत्रिकेवर त्या-त्या महाविद्यालयाचे नाव छापले जाते, तसेच आॅनलाइन पुनर्मूल्यांकन, आॅनलाइन पीएच.डी प्रवेश परीक्षा, आॅनलाइन परीक्षा अर्ज, आॅनलाइन प्रवेश, आॅनलाइन संलग्नता अशा अनेक तंत्रज्ञानयुक्त सोईसुविधा मुंबई विद्यापीठाने केल्या आहेत व करीत आहे.यामुळेच हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.

महाराष्ट्रकन्या’ मोनिकाने रोवला अटकेपार झेंडा

चीनमध्ये झालेल्या World Police and Fire Games स्पर्धेमध्ये भारतीय पोलीस दलाच्या महिला प्रतिनिधीने भारताची मान उंचावली.

या स्पर्धेत भारताच्या पोलीस दलाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या महिला कॉन्स्टेबल मोनिका जाधव हिने तिरंदाजीमध्ये विक्रमी कामगिरी केली.

तिने World Police and Fire Games स्पर्धेत दोन सुवर्णपदकांसह एकूण तीन पदके पटकावली.

मोनिका बुलडाणा पोलीस दलात कार्यरत असून आंतरराष्ट्रीय खेळाडू आहे. मोनिका जाधवला तिरंदाजी प्रशिक्षक चंद्रकांत इलग,सुरेश शिंदे यांचे मार्गदर्शन, तसेच पोलीस महासंचालक सुबोध जायसवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन आणि प्रोत्साहन दिले.

८ ते १८ ऑगस्ट या कालावधी दरम्यान चीनमध्ये World Police and Fire Games या स्पर्धा रंगल्या होत्या. यामध्ये मोनिकाने अतिशय चांगली कामगिरी केली.

 ‘टार्गेट आर्चरी’ या प्रकारात मोनिकाने ७२० पैकी ७१६ गुण मिळवित विक्रम नोंदविला. फिर्ल्ड आर्चरीमध्ये तिने सुवर्ण, तर ‘थ्रीडी’ आर्चरी प्रकारात कांस्यपदक मिळविले.

२०१३ मध्ये मोनिका पोलीस दलात भरती झाली होती. त्यानंतर मे महिन्यात शांघाय येथे झालेल्या विश्व स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करताना तिने जागतिक स्तरावर नववे स्थान पटकावले होते.

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर



(१४ एप्रिल १८९१ – ६ डिसेंबर१९५६), बाबासाहेब आंबेडकर नावाने ओळखले जात.

आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या दोन्हीतून अर्थशास्त्रातील डॉक्टरेट पदव्या मिळवल्या.आपल्या सुरुवातीच्या कारकिर्दीत ते अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यांनी नंतरच्या जीवनात राजकीय कार्यांवर लक्ष केंद्रित केले;
ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचार व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित करणे, दलितांसाठी राजकीय हक्क व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला१९५६ मध्ये त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, व लक्षावधी दलितांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.

१९५० च्या दशकात बौद्ध भिक्खुंनी त्यांना बोधिसत्व ही बौद्ध धर्मातील उपाधी प्रदान केली. इ.स. १९९०साली त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला.
आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकप्रिय संस्कृतित उभी राहिली आहेत.

महाराष्ट्रातील समाज सुधारक :- प्रबोधनकार ठाकरे


⬜️ जीवन परिचय ⬜️

◼️ केशव सीताराम ठाकरे हे त्यांचे नाव. जन्म १७ सप्टेंबर १८८५  रायगड जिल्ह्यात पनवेल येथे झाला.

◼️ प्रबोधनकार हे पत्रकारितेत  जेवढे झुंजार तेवढेच त्यांचे वक्तृत्वही झुंझार होते. त्यांनी त्यांच्या पत्रकार सारथी,लोकहितवादी, आणि प्रबोधन केले.

◼️त्यांच्या कुमारिकेचे शाप १९१९, भिक्षुकशहिचे बंड १९२१ यासारख्या पुस्तकातून आणि खरा ब्राम्हण १९३३, विधीविशेष १९३४, यासारख्या नाटकातून समाजसुधारक प्रकटतो.

💠 पुस्तके - चरित्रे 💠

◼️ग्रामण्याचा साद्यंत इतिहास - १९१९ वर्षे

◼️स्वराज्याचा खून - १९२२ वर्षे
 
◼️ प्रतापसिह छत्रपतीरंगो बापुजी - १९४८
 
◼️रायगड - १९५१
 

🔳 चरित्रे 🔳

◼️ संत रामदास - १९१८ 
 
◼️पंडिता रमाबाई - १९५०
 
◼️गाडगे महाराज  - १९५२
 
◼️माझी जीवनगाथा हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे.

२० नोवेंबर १९७३ रोजी त्यांचे निधन झाले.

उस्ताद बिस्मिल्ला खान

- जन्म: 21 मार्च 1916, मृत्यू: 21 ऑगस्ट 2006
- पहिला सर्वात मोठा कार्यक्रम 1937 मध्ये अखिल भारतीय संगीत परीषदेत शहनाई वाजवली.
- भारताच्या पहिल्या स्वातंत्र्यदिनी 1947 मध्ये भारतीयांना मंत्रमुग्ध केले.
------------------------------------------------------
● चित्रपट

- 1959: गुंज ऊठी शहनाई
- 1977: Sanaadi Appanna
- 1989: Sange Meel Se Mulaqat
------------------------------------------------------
● प्राप्त पुरस्कार

- अखिल भारतीय संगीत परीषद 1937 तीन पदके
- संगीत नाटक अकादमी पुरस्कार: 1956
- पद्मश्री: 1961
- पद्म भूषण: 1968
- पद्म विभूषण: 1980
- Talar Mausiquee: 1992
- भारतरत्न: 2001

【】वाक्प्रचारांचा अर्थ व वाक्यात उपयोग【】

1) नाव मिळवणे. 
अर्थ :- कीर्ती मिळविणे. 
वाक्य :- शालान्त परीक्षेत जिल्ह्य़ात प्रथम 
            येऊन सुप्रियाने नाव मिळविले. 

2) रक्ताचे पाणी करणे. 
अर्थ :- खूप कष्ट करणे. 
वाक्य:- शिवाजी महाराजांनी रक्ताचे पाणी 
     केले आणि स्वराज्याची स्थापना केली. 

3) सोंग काढणे. 
अर्थ :- नक्कल करणे. 
वाक्य :-  सुमित सर्व शिक्षकांचे हुबेहूब 
            सोंग काढतो. 

4) रात्रीचा दिवस करणे. 
अर्थ :- खूप कष्ट करणे. 
वाक्य:-रात्रीचा दिवस करून आईवडिलानी सानियाला शिकवले. 

5)भांबावून जाणे. 
अर्थ :- गोंधळून जाणे. 
वाक्य :- गावचा सुनिल पहिल्यांदा शहरात 
           आला, तेव्हा इथली गर्दी पाहून तो  भांबावून गेला.

6)डोक्यावर घेणे. 
अर्थ :- अतिलाड करणे. 
वाक्य :- तुषार पोहण्याच्या स्पर्धेत पहिला 
    आला, तेव्हा बाबांनाी त्याला डोक्यावर 
    घेतले. 

7) आळा घालणे. 
अर्थ :- बंदी आणणे. 
वाक्य :-जंगल तोड करणाऱ्या चोरांना सजा 
देऊन पोलिसांनी गैरकृत्याला आळा घातला. 

8) तीरासारखे धावणे. 
अर्थ:- खूप वेगाने धावणे. 
वाक्य :- कशाचीही पर्वा न करता निलेश 
       स्पर्धेत तीरासारखा धावतो. 

9) मर्जी राखणे. 
अर्थ :- खूश ठेवणे. 
वाक्य:-निवडणूक जवळ आल्यावर नेत्यांनी 
      जनतेची मर्जी राखायला सुरूवात केली. 

10) संगोपन करणे. 
अर्थ :- पालनपोषण करणे. 
वाक्य:-आई वारल्यामुळे शारदाच्या मावशीने 
          तिचे संगोपन केले.

11) अटक करणे :- खूप परिश्रम करून पोलिसांनी अट्टल गुन्हेगाला अटक केली.

12) अपशब्द वापरणे :- चंदूचा अमरला धक्का लागताच, अमरने चंदूविषयी रागाने अपशब्द वापरले.

13)अग्निदिव्य करणे :- वचन पाळण्यासाठी प्रभुरामचंद्रांना चौदा वर्षे वनवास भोगून अग्निदिव्य करावे लागले.

14) अचंबा वाटणे :- भर उन्हात पाऊस पडला, याचा लहानश्या मुलाला अचंबा वाटला.

15) अभिमान वाटणे :- आलोक स्कॉलरशिप परीक्षेत सर्वप्रथम आला, याचा बाबांना अभिमान वाटला.

16) अटकाव करणे :- धरणाच्या ठिकाणी आंदोलन करण्यास सरकारने लोकांना अटकाव केला.

17) अठराविश्व दारिद्र्य : कमवणारे कोणी नसल्यामुळे वावेरकार कुटुंबात अठराविश्व दारिद्र्य होते.

18) अनुकरण करणे :- लहान मुले नेहमी मोठ्या माणसांचे अनुकरण करतात.

19)अभिप्राय देणे :- मी लिहिलेला निबंध चांगला आहे, असा सरांनी अभिप्राय दिला.

20) अभिवादन करणे :- १५ ऑगस्टला आम्ही विद्यार्थ्यांनी तिरंग्याला एकसाथ अभिवादन केले.

DRDOने मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) भारतीय सैन्याकडे सुपूर्द केला

भारताच्या संरक्षण संशोधन व विकास संस्थेनी (DRDO) विकसित केलेल्या मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) भारतीय सैन्याकडे सुपूर्द केले. 70 मेट्रिक टन (MT) एवढा भार सहन करू शकणार्‍या MMRची रचना व विकास DRDOच्या एका केंद्राने केला.

मोबाइल मेटलिक रॅम्प (MMR) हा पूलाचा एक प्रकार आहे, जो गाडीच्या मदतीने कुठेही सोबत घेवून जाता येतो. या यंत्रणेमुळे सैन्याच्या सशस्त्र वाहनांच्या चळवळीला लागणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे.

✍DRDO विषयी

संरक्षण संशोधन व विकास संस्था (DRDO) ही भारताच्या संरक्षण क्षेत्रात संशोधनासाठी समर्पित असलेली प्रमुख संस्था आहे. त्याची स्थापना 1958 साली करण्यात आली आणि मुख्यालय नवी दिल्लीत आहे. ही संस्था भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कार्यरत आहे.

मंत्रिमंडळाचे 19 महत्त्वाचे निर्णय, खुल्या प्रवर्गातील दुर्बल घटकांचा विकास करणार

✍खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत संस्था स्थापण्यास मान्यता.

✍गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय.

✍मुंबई शहरासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रकल्प राबविण्यासह त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता.

✍मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत हायब्रीड ॲन्युईटी तत्त्वावर बीड जिल्ह्यातील 4800 कोटींच्या कामासाठी निविदा मागविणार.

✍कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल व परिसराच्या विकास आराखड्यास मान्यता.

✍साताऱ्याच्या जिहे कठापूर येथील गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता.

✍राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानांतर्गत उपजीविकेसाठी कौशल्य संपादन व ज्ञान जागरुकता अभियान (संकल्प) प्रकल्प राज्यात राबविण्यास मान्यता.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) खालीलपैकी शुध्द शब्द कोणता ?

   1) निलिमा    2) नीलिमा   
   3) निलीमा    4) नीलीमा

उत्तर :- 2

2) मराठीत एकूण स्वर किती आहेत ?

   1) आठ    2) दहा     
  3) बारा      4) चौदा

उत्तर :- 3

3) ‘वाक्यातील विराम बदलला की वाक्याचा अर्थ बदलतो’ यास काय म्हणतात ?

   1) बलाघात    2) सीमासंधी   
  3) सुरवली    4) व्यंजनव्दित्त

उत्तर :- 2

4) पुढीलपैकी कोणत्या नामांना धर्मीवाचक नामे असे म्हणतात.

   अ) भाववाचक नामे  ब) विशेषनामे   
   क) सामान्यनामे    ड) पदार्थवाचक नामे
   1) फक्त अ    2) फक्त ब व क    3) वरील सर्व    4) फक्त अ व ब

उत्तर :- 2

5) ‘कोण’, ‘काय’ ही सर्वनामे खालील कोणत्या प्रकारात येतात ?

   1) प्रश्नार्थक व अनिश्चित    2) दर्शक व संबंधी
   3) पुरुषवाचक व अनिश्चित  4) दर्शक व प्रश्नार्थक

उत्तर :- 1

6) ‘पंचमुखी हनुमान’ हे कोणते विशेषण आहे ?

   1) अव्ययसाधित विशेषण      2) धातुसाधित विशेषण
   3) समासाधारित विशेषण      4) संबंधी विशेषण

उत्तर :- 3

7) ‘त्या राजाला मुकुट शोभतो’ – या वाक्यातील कर्म ओळखा.

   1) राजाला    2) मुकुट     
   3) शोभतो    4) त्या

उत्तर :- 2

8) ‘नित्य, सदा, सर्वदा, सतत, नेहमी ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ते लिहा.

   1) कालदर्शक      2) सातत्यदर्शक   
   3) आवृत्ती दर्शक    4) स्थल दर्शक

उत्तर :- 2

9) वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता ? – ‘प्रवाशांकरिता मोनोरेल सुरू झाली.’

   1) हेतूवाचक    2) संबंधवाचक   
   3) साहचर्यवाचक    4) करणवाचक

उत्तर :- 1

10) खालीलपैकी कोणत्या वाक्यात न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. पुढीलपैकी बरोबर पर्याय निवडा.

   1) मरावे परी किर्तीरूप उरावे    2) तुला ज्ञान हवे की धन हवे
   3) एक रुपया म्हणजे शंभर रुपये    4) प्रयत्न केला तर फायदाच होईल

उत्तर :- 1

7 सप्टेंबरला 'चांद्रयान'चंद्रावर उतरणार, मोहीम योग्य दिशेने - इस्रो

🔰'चांद्रयान-2' ही चंद्रावर स्वारी करणारी हिंदुस्थानची मोहीम योग्य दिशेने चालली असून ठरल्याप्रमाणे हे यान चंद्राच्या दक्षिणेकडील बाजूला येत्या 7 सप्टेंबरला उतरणार आहे, अशी माहिती हिंदुस्थानी अंतराळ संशोधन केंद्राने (इस्रो) नुकतीच ट्विटरवरील आपल्या अधिकृत हॅण्डलवर दिली.

🔰या मोहिमेत इस्रो चंद्राच्या आतापर्यंत कधीही समोर न आलेल्या बाजूचे संशोधन करणार आहे. चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरणारे हिंदुस्थानचे हे पहिलेच पाऊल असणार आहे. या यानामध्ये ऑर्बिटर, लॅण्डर आणि रोव्हर अशी तीन उपकरणे आहेत. आपल्या बळावर चंद्रावर स्वारी करणारा हिंदुस्थान हा चौथा देश ठरला आहे . यापूर्वी अमेरिका , रशिया आणि चीनने चंद्रावर उतरण्याची कामगिरी केली आहे . बुधवारीच हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार पहाटे तीन ते चार या वेळेत ' ट्रान्स लुनर इन्सर्शन ' ही प्रक्रिया यानाने पार पाडली आहे . त्यानंतर 20 ऑगस्टला ' चांद्रयान -2' हे यान चंद्राच्या कक्षेत पोहोचणार असून त्यानंतर 7 सप्टेंबरला ते चंद्राच्या पृष्ठभूमीवर उतरेल , असेही इस्रोने आपल्या ट्विटमध्ये स्पष्ट केले आहे .

*चालू घडामोडी वन लाइनर्स 21 ऑगस्ट 2019.*


✳ भारतीय पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला

✳ दिल्ली विधानसभा अध्यक्ष आर एन गोयल यांनी आमदार संदीप कुमार यांना अपात्र ठरविले आहे

✳ दिवाकर वासू यांची तामिळनाडू प्रशिक्षक म्हणून नेमणूक

✳ गुजरात सरकार राज्य योग मंडळाची स्थापना करतो

✳ दुती चंद आता पुमचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर

✳ शिशपाल एस राजपूत यांना गुजरात राज्य राज्य मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले

✳ सुधांशु सारंगी यांची भुवनेश्वर पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती

✳ प्रताप ज्योती हंडिक यांनी गौती विद्यापीठाचे नवीन कुलगुरू म्हणून नेमणूक केली

✳ ब्रॅड हॅडिनने सनरायझर्स हैदराबादचा सहाय्यक प्रशिक्षक नियुक्त केला

✳ भूमी पेडणेकर यांनी मनुकासाठी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून स्वाक्षरी केली

✳ शोपीने क्रिस्टियानो रोनाल्डोला सर्वात नवीन ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून घोषित केले

✳ केविन पीटरसन बेटवेचे ग्लोबल क्रिकेट अ‍ॅम्बेसेडर

✅ *YouGov ने ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्ज 2019 जाहीर केले*

✳ गुगल टॉप ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्ज 2019

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्स 2019 मध्ये व्हॉट्सअॅपने दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग 2019 मध्ये यूट्यूबचे तिसरे स्थान आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंगमध्ये सॅमसंगने चौथ्या क्रमांकावर आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्ज 2019 मध्ये फेसबुकने 5 वे स्थान मिळविले

✳ जागतिक वार्षिक ब्रँड आरोग्य क्रमवारीत 2019 मध्ये मेझॉनचा 6 वा क्रमांक आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्ज 2019 मध्ये आयकेईए 7 व्या स्थानावर आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्स 2019 मध्ये नायकेचा 8 वा क्रमांक आहे

✳ ग्लोबल वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्ज 2019 मध्ये पेपल 9 व्या स्थानावर आहे

✳ जागतिक वार्षिक ब्रँड हेल्थ रँकिंग्स 2019 मध्ये नेटफ्लिक्सचा दहावा क्रमांक आहे

✳ आर दिलीप यांनी हुबळी-धारवाड पोलिस आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला

✳ एन के कतील यांची कर्नाटक भाजपा अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे

✳ पुरुषांच्या फ्री स्टाईलमध्ये 2019  वर्ल्ड सी’शिपसाठी सुशील कुमार पात्र 74 कि.ग्रा

✳ बेंगळुरू येथे कर्नाटक राज्य ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धा आयोजित

✳ एसएआय एसटीसी धारवाड जिंकली कर्नाटक राज्य ज्युनियर बास्केटबॉल स्पर्धा

✳ सर्बियात तिसर्‍या ज्युनियर नेशन्स बॉक्सिंग टूर्नामेंट

✳ भारतीय पुरुष संघाने तिसर्‍या ज्युनियर नेशन्स बॉक्सिंग स्पर्धेत 11 पदके जिंकली

✳ राज्य पर्यटन मंत्री परिषद नवी दिल्ली येथे आयोजित

✳ नवी दिल्ली येथे एनसीटीई आयोजित शिक्षक शिक्षणावरील आंतरराष्ट्रीय परिषद

✳ दिव्यांग सतेंद्रसिंग लोहिया अमेरिकेच्या कॅटालिना चॅनेलला पार करणारा पहिला आशियाई जलतरणपटू ठरला

✳ मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते बाबूलाल गौर यांचे निधन

✳ राष्ट्रीय संसाधन कार्यक्षमता धोरण 2019 चा मसुदा प्रसिद्ध झाला

✳ एसएमव्हीडीयूने राष्ट्रीय सौर मोहीम साध्य करण्यासाठी एनआयएसई सह सामंजस्य करार केला

✳ बीजिंगमध्ये भारत आणि चीन यांच्यात संरक्षण चर्चा

✳ भारतीय-अमेरिकन नवनीथ मुरली विजयी 2019 दक्षिण आशियाई स्पेलिंग बी स्पर्धा

✳ केमिकल अभियांत्रिकी व तंत्रज्ञानासाठी देशाची पहिली संस्था मिळविण्यासाठी गुजरात

✳ पेटीएमचे अध्यक्ष म्हणून सीएफओ मधुर देवरा पदोन्नती झाली

✳ कर्नाटक सरकारने निकोटाईनचे "वर्ग एक विष" म्हणून वर्गीकरण केले

✳ आयओसीएल वोन डोलो -650 बंगळुरू चषक अखिल भारतीय हॉकी स्पर्धा 2019

✳ मुख्य वैज्ञानिक के. थंगराज यांनी वर्ष 2019 साठी जेसी बोस फेलोशिप जिंकला.

अभिनेते अशोक सराफ स्वच्छ भारत मिशनचे ब्रँड ॲम्बेसिडर ठरले

◼️स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे. ही स्वच्छता शाश्वत स्वरुपात टिकविण्यासाठी ग्रामीण भागात व्यापक प्रसिद्धीसाठी व ग्रामीण जनतेच्या वर्तन बदलासाठी ज्येष्ठ सिने अभिनेते अशोक सराफ ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून काम करणार आहेत.

◼️2 ऑक्टोबर 2014 रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) या कार्यक्रमाची सुरुवात झाली.

◼️2 ऑक्टोबर 2019 ऐवजी 18 एप्रिल 2018 रोजीच ग्रामीण महाराष्ट्र हागणदारीमुक्त घोषित करण्यात आला.

◼️34 जिल्हे, 351 तालुके व 27 हजार 667 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त घोषित केल्या.

◼️स्वच्छ भारत मिशनअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी यापूर्वी चार हजार रुपये इतके अनुदान देण्यात येत होते. ते आते आता बारा हजार रुपये इतके अनुदान देण्यात येते.