28 March 2020

ATM मधून पैसे निघाले नाही तरी लागणार दंड, या बँकेने केला नवा नियम : 

जर तुम्ही ‘एटीमएम’मधून पैसे काढायला गेला व तुमच्या खात्यात पुरेसे पैसे नसतील, तर तुम्हाला २५ रुपये दंड आकारला जाणार आहे. खासगी क्षेत्रातील अ‌ॅक्सिस  बँकेने १ एप्रिल २०२० पासून हा दंड वसूल करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्यावतीने वेबसाइटवर परिपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत पुरेसे पैसे नसल्याने एटीएमधून पैसे काढता न आल्याबाबत कोणताही दंड आकारला जात नव्हता.

याशिवाय अन्य चार प्रकारच्या दंडाची रक्कम बँकेकडून वाढवण्यात आली आहे. आता NACH व्यवहार अयशस्वी झाल्यावर ६५० रुपये दंड आकारला जाणार आहे, जो आतापर्यंत ५०० रुपये होता. याशिवाय अन्य बँकेचा धनादेश न वठल्यास २५० रुपये, ऑटो डेबिट न झाल्यास ३०० रुपये दंड आकारला जाणार आहे. यासाठी आतापर्यंत २५० रुपये आकारले जात होते. एवढेच नाहीतर बँकेने शाखांबरोबरच्या व्यवहारांसंबंधीचे नियम देखील ठरवले आहेत.

अ‌ॅक्सिस  बँकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार शाखेतून १५ ट्रांजेक्शन मोफत होतील व त्यानंतर प्रत्येक ट्रांजेक्शनला ७५ रुपये पडतील. एवढेच नाहीतर चेकबुक घेण्यासाठी आता १०० रुपये द्यावे लागणार आहेत. अगोदर यासाठी ६० रुपये घेतले जात होते.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस

देशातील सर्वाधिक वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस म्हणजेच सीएसटीएमटी स्थानकाने 2019 मध्ये 132 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्तच जाणून घेऊयात लाखोंच्या संख्येने प्रवाशांची वर्दळ असणाऱ्या या स्थानकाबद्दलच्या खास गोष्टी…

- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) हे मुंबई शहरामधील एक ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक आहे.
- सीएसएमटी हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आणि त्यासोबत मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे.

- 1878 मध्ये या स्थानकाच्या बांधकामाची सुरुवात झाली. या स्थानकाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी दहा वर्ष लागले. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. त्या काळात कोणतीही इमारत बांधण्यासाठी लागलेला सर्वाधिक वेळ आहे.
- मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक बोरीबंदर स्थानकाच्या जागेवर इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्याभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले.

- या स्थानकाची रचना फेड्रीक विल्यम स्टीव्हन्स या ब्रिटीश स्थापत्यकाराने केली आहे. या कामासाठी फेड्रीक यांना त्याकाळी १६ लाख १४ हजार रुपयांचे मानधन देण्यात आले होते.
- या स्थानकाची रचना ही लंडनमधील सेंट पॅकार्स रेल्वे स्थानकाशी मिळतीजुळती आहे.

- सीएसटीएमटी स्थानकाची रचना ही व्हिक्टोरियन इटालियन गॉथिक रिव्हायवल प्रकारची आहे.
- स्थानकाच्या मुख्यभागी असलेल्या घड्याळाखाली क्विन एलिझाबेटचा पुतळा होता. मात्र १९५० साली भारत सरकारच्या आदेशानुसार सर्व इमारतींवरील ब्रिटिशांचे पुतळे हटवण्यास सरुवात करण्यात आली. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. त्यामध्येच हा पुतळाही काढून टाकण्यात आला.

- हा पुतळानंतर १९८० पर्यंत राणीच्या बागेत उघड्यावर पडून होता. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. नंतर त्याचे काय झाले यासंदर्भात माहिती अधिकाराअंतर्गत दिलेल्या अर्जात या पुतळ्यासंदर्भात सरकारकडे कोणतीची माहिती नसल्याचे समोर आले.
- हा पुतळा तस्करीच्या माध्यामातून भारताबाहेर नेऊन विकण्यात आला किंवा नष्ट करण्यात आला असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

- मार्च १९९६ पर्यंत या स्थानकाचे नाव व्हिक्टोरिया टर्मिनस (व्हीटी) असे होते. मात्र या स्थानकाचे नामकरण करुन ते छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) असे ठेवण्यात आले.
- मार्च १९९६ ते जून २०१७ दरम्यान हे स्थानक छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी) नावाने ओळखले जायचे.

- २०१७ साली जून महिन्यामध्ये स्थानकाच्या नावात महाराज हा शब्द लावण्यात आला आणि तेव्हा पासून हे स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) म्हणून ओळखले जाते.
- सीएसएमटी स्थानकामध्ये १८ फलाट असून फलाट क्र. १ ते ७ हे मुंबई उपनगरी मार्गिकेवरील स्थानकाचे आहेत.

- फलाट क्र. ८ ते १८ हे मुख्य मार्गिकेवरील असून तेथून लांब पल्ल्याच्या पॅसेंजर / जलद गाड्या मार्गस्थ होतात.
- महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यांपैकी छत्रपती शिवाजी टर्मिनस हे एक आश्चर्य ठरले आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. महाराष्ट्रातील अद्भुत आणि देखण्या सात आश्चर्यांची जून २०१३ मध्ये घोषणा करण्यात आली.

- २००८ साली झालेल्या मुंबई हल्ल्यांमध्ये या स्थानकालाही दहशतवाद्यांनी लक्ष्य केले.
- रात्री साडेनऊच्या सुमारास अजमल कसाब आणि त्याचा साथीदार ए के ४७ बंदूका घेऊन अंदाधुंद गोळीबार करत स्थानकामध्ये शिरले. या हल्ल्यात सीएसटी स्थानकावरील ५८ जणांचा मृत्यू झाला तर १०४ जण जखमी झाले.

- स्लमडॉग मिलेनियर या सिनेमातील जय हो हे गाणे या स्थानकात चित्रित करण्यात आले आहे. तसेच २०११ साली आलेल्या रा.वन. सिनेमामध्येही हे स्थानक दाखवण्यात आले आहे.
- मुंबईतील सर्वात गजबजलेले स्थानक असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील प्रवाशांची संख्या घटली आहे.

- मागील  वर्षात म्हणजेच २००७ ते २०१८ दरम्यान सीएसएमटी स्थानकात तब्बल ४७.४ टक्के प्रवाशांची संख्या घटली असल्याचे समोर आले आहे.
- वर्ष २००७-०८ मध्ये प्रवासी संख्या ८.८ कोटी होती. ती, २०१८-१९मध्ये घटून ४.६ कोटी झाली आहे. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी. दक्षिण मुंबईतून अनेक कार्यालयांचे मुंबईतील उत्तर आणि पश्चिम भागात स्थलांतर झाले आहे.

- लांब पल्ल्याच्या गाडीतून आरक्षित आणि अनारक्षित प्रवास करणाऱ्या प्रवासी संख्येत २२ लाखाहून ३ लाख म्हणजे जवळपास ४ टक्के घट झाली आहे.
- या स्थानकामध्येच रेल्वेचे एक संग्रहालय असून त्यामध्ये या स्थानकाचा इतिहास चित्ररुपात मांडण्यात आला आहे.
- या स्थानकामधून दर चार ते पाच मिनिटांनी एक लोकल ट्रेन सुटते.

ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

(Oscar The Academy Award Winners)
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🚦सर्वोत्कृष्ट चित्रपट – पॅरासाईट
🚦सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – बाँग जून हो
     (पॅरासाईट)
🚦सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – रेनी झेल्विगर
     (ज्युडी)

🚥सर्वोत्कृष्ट अभिनेता – हॉकिन
     फीनिक्स (जोकर)
🚥सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – लॉरा
     डर्न (मॅरेज स्टोरी)
🚥सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – ब्रॅड
     पिट (वन्स अपॉन अ टाईम इन
     हॉलिवूड)

🚦सर्वोत्कृष्ट मूळ गीत – आय अॅम गॉना
     लव्ह मी अगेन (रॉकेटमॅन)
🚦सर्वोत्कृष्ट ओरिजनल स्कोअर
     – जोकर
🚦सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट
     – पॅरासाईट

🚥सर्वोत्कृष्ट आधारित पटकथा
    – जोजो रॅबिट
🚥सर्वोत्कृष्ट मूळ पटकथा – पॅरासाईट
🚥सर्वोत्कृष्ट केशभूषा आणि रंगभूषा –
    बॉम्बशेल

🚦सर्वोत्कृष्ट वेशभूषा – लिटील वूमन
🚦सर्वोत्कृष्ट दृश्य परिणाम – 1917
🚦सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – 1917

🚥सर्वोत्कृष्ट संकलन – फोर्ड व्हर्सेस
     फरारी
🚥सर्वोत्कृष्ट ध्वनी मिश्रण – 1917
🚥सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन – फोर्ड
     व्हर्सेस फरारी

🚦सर्वोत्कृष्ट लघु माहितीपट – लर्निंग टू
🚦स्केटबोर्ड इन अ वॉरझोन (इफ यू आर
    अ गर्ल)
🚦सर्वोत्कृष्ट माहितीपट – अमेरिकन
     फॅक्टरी

🚥सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड लघुपट – हेअर
     लव्ह
🚥सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड चित्रपट – टॉय
      स्टोरी 4                               सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन लघुपट – द
     नेबर्स विंडो
-  सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाईन – वन्स
     अपॉन अ टाईम इन हॉलिवूड

'करोना'वर 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' औषध प्रभावी, 'नॅशनल टास्क फोर्स'चा सल्ला


🔷करोना विषाणूमुळे फैलावणाऱ्या 'कोविड १९' या आजाराच्या अतिगंभीर प्रकरणांत उपचारासाठी 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' (Hydroxychloroquine) या औषधाचा वापर केला जाऊ शकतो, असा सल्ला 'इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'द्वारे (ICMR) गठीत करण्यात आलेल्या 'नॅशनल टास्क फोर्स'नं दिलाय.

🔷 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' या औषधाचा वापर सध्या मलेरियाच्या रुग्णांसाठी औषध म्हणून केला जातो.

🔷आता, हेच औषध संशयित किंवा करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य सेवकांना दिलं जाऊ शकतं, असं 'आयसीएमआर'नं म्हटलंय.

🔷याशिवाय करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही हे औषध दिलं जाऊ शकतं, असं सूचित करण्यात आलंय.

🔷अतिशय वेगानं संक्रमित होणाऱ्या 'करोना व्हायरस'चा प्रसार रोखण्यासाठी आत्तापर्यंत लस शोधून काढण्यात यश आलेलं नाही.

🔷याच दरम्यान, 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' (Hydroxychloroquine) हे औषध करोना व्हायरसच्या उपचारांत फायदेशीर ठरू शकतं, असं रिसर्चमधून समोर आलंय. या रिसर्चमध्ये 'क्लोरोक्वीन फॉस्फेट' आणि 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन सल्फेट' करोनाच्या उपचारांत मदत करू शकतं, असं आढळून आलं.

🔷उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील काही दिवसांपूर्वी याच औषधाचं नाव सूचवलं होतं. अमेरिकेतील 'फूड ऍन्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन' (FDA) हे औषध मोठ्या प्रमाणात आयात करत आहेत.

🔷चीनच्या आरोग्य विभागानंही फेब्रुवारी महिन्यात 'क्लोरोक्वीन फॉस्फेट'च्या वापराचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं जाहीर केलं होतं.

पोलीस भरती प्रश्नसंच


♻️♻️दक्षिण मध्य रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?

A) कोलकाता
B) मुंबई
C) सिकंदराबाद ✅
D) नागपूर

♻️♻️देशातील दहशदवादी संघटनांचा तपास करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती?

A) NIA ✅✅
B) NSG
C) ATS
D) CBI

♻️♻️सापाचा खेळ करणारा?

A) दरवेशी
B) गारुडी ✅
C) मदारी
D) डोंबारी

♻️♻️मधुमेह आजार हा कोणत्या द्रवाच्या कमतरतेमुळे होतो?

A) व्हिटॅमिन-अ
B) कॅल्शीयम
C) फाॅस्फरस
D) इन्शुलीन ✅✅

♻️♻️निती आयोगाचे अध्यक्ष कोण?

A) प्रणव मुखर्जी
B) अरविंद पनगरीया
C) राजनाथसिंह
D) नरेंद्र मोदी ✅✅

♻️♻️राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता?

A) नाशिक
B) नागपूर ✅✅
C) पुणे
D) औरंगाबाद

♻️♻️खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा?

A) नागपूर -संत्री
B) कोल्हापूर -डाळींब✅✅
C) जळगांव -केळी
D) जळगांव -केळी

27 March 2020

मार्गदर्शक तत्वमधील दुरुस्ती


42 वी घटनादुरुस्ती 1976
- 39F:-बालक व युवकांना विकासाच्या संधी
- 39A:-समान न्याय व कायदेशीर मोफत सल्ला
- 43A:-उद्योग व्यवस्थापन मध्ये कामगार सहभाग
- 48A:-पर्यावरण,वने व वन्यजीव यांचे संरक्षण व संवर्धन

44 वी घटनादुरुस्ती 1978
- 38B:-राज्य उत्पन्न ची विषमता किमान पातळीवर आणण्याचा प्रयत्न करेल

86 वी घटनादुरुस्ती 2002
- 45:-6 वर्षांखालील बालकांचे संगोपन व शिक्षणासाठी तरतुद करणयाची जबाबदारी राज्यावर टाकण्यात आली

97 वी घटनादुरुस्ती
- 43B:-राज्य सहकारी सोसायटीच्या निर्मिती, स्वायत्त कार्यपद्धती यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहील

भारतातील करोनाग्रस्त वाढण्याचा वेग मंदावला.

जगभरामध्ये करोना विषाणूचा संर्सग वाढत असताना देशामध्येही करोनाग्रस्तांची संख्या दिवसोंदिवस वाढतानाचे चित्र दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी संध्याकाळी बुधवारपासून २१ दिवस संपूर्ण देशात लॉकडाउन असेल अशी घोषणा केली. त्यामुळे १४ एप्रिलपर्यंत सर्वांनी घरातच बसावे असं आवाहन मोदींनी केलं आहे.

करोनाची संक्रमण श्रृंखला तोडण्यासाठी हा २१ दिवसांच्य लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येत असल्याचेही मोदींनी स्पष्ट केलं. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने दिलेल्या आकडेवारी लॉकडाउनचा निर्णय घेतल्यानंतर करोनाग्रस्तांची संख्या कमी प्रमाणात वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. बुधवारी दुपारी बारावाजेपर्यंत करोनाग्रस्तांची संख्या मंगळवारच्या तुलनेत ५७ ने वाढला. बुधवारी दुपारी देशामध्ये ५३९ करोनाग्रस्त रुग्ण होते. हीच संख्या मंगळवारी ६७ ने वाढला होता.

सध्या ही बातमी सकारात्मक असली तरी ही प्राथमिक आकडेवारी आहे. अमेरिका आणि भारताची तुलना केली असता अमेरिकेतील रुग्णांची संख्या ही भारतापेक्षा अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. मागील पाच दिवसांमध्ये भारतातील करोनाग्रस्तांची संख्या दुप्पट झाली आहे. याच वेगाने करोनाग्रस्तांची संख्या वाढत राहिल्यास या आठवड्याच्या शेवटपर्यंत भारतातील करोनाग्रस्तांची संख्या एक हजारहून अधिक असेल.

पहिल्या २४ तासांमध्ये करोनाग्रस्तांचा देशातील संख्या वाढण्याची गती मंदावली असली तरी लॉकडाउनच्या पहिल्याच दिवशी अनेक लोकांनी जिवनावश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी बाजारांमध्ये गर्दी केल्याचे चित्र पहायला मिळालं.

त्यामुळे सरकारी प्रयत्नांना जास्तीत जास्त यश यावे म्हणून नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करता करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. अनेक दिग्गज नेते, कलाकार, खेळाडूंनी नागरिकांना २१ दिवस जास्तीत जास्त काळ घऱात थांबू आणि करोनाला हरवू अशापद्धतीचे आवाहन केल्याचे चित्र सोशल नेटवर्किंगवर दिसत आहे.

संविधानातील 12 परिशिष्ट

1. राज्य व केंद्रशासित प्रदेश
2. वेतन, भत्ते व विशेषाधिकार
3. शपथा / प्रतिज्ञांचे नमुने
4. राज्यसभेत राज्यांचे सदस्यत्व
5. अनुसूचित जाती व जमाती बाबत तरतुदी
6. आसाम, मेघालय, त्रिपूरा मिझोराममधील जनजाती
7. सूची: केंद्र, राज्य आणि समवर्ती सूची
8. भाषा
9. विवक्षित अधिनियम व विनियम विधिग्राह्य
10. पक्षांतरासंबंधी अपात्रता
11. पंचायती: अधिकार, कार्ये आणि जबाबदारी
12. नगरपालिका: अधिकार, कार्ये आणि जबाबदारी

'लॉकडाऊन' आणि 'कर्फ्यू'मधला नेमका फरक समजून घ्या...

🔴'लॉकडाऊन' म्हणजे काय?

1.आपात्कालीन परिस्थितीत सरकारकडून लॉकडाऊन घोषित केला जातो. यामध्ये अत्यावश्यक सेवा बंद केल्या जात नाही. सध्या, बँक, दूध डेअरी, औषध, रेशनिंग, फळ-भाज्या यांसारख्या अत्यावश्यक वस्तूंची दुकानं सुरू असलेली दिसतात.

2.तुम्ही जिथे असाल तिथंच थांबावं हा लॉकडाऊनचा हेतू असतो. यामध्ये नागरिकांना एखाद्या इमारतीत, भागात, राज्य किंवा देशापर्यंत सीमित केलं जातं. बऱ्याचदा नागरिकांना या नियमांत सूटही दिली जाते.

3.लॉकडाऊनमध्ये मुख्यत्वे: नागरिकांना घरातून बाहेर पडण्यासाठी भाग पाडणारी कारणं बंद केली जातील यावर भर दिला जातो. खासगी कंपन्यांना लॉकडाऊन पाळावा लागल्यानं कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' किंवा सुट्टी जाहीर करावी लागली.

4.लॉकडाऊनमध्ये लोकांना घरातच राहण्याची आणि रस्त्यावर न फिरण्याचं आवाहन केलं जातं. केवळ आवश्यक गोष्टींसाठी त्यांनी घराबाहेर पडणं अपेक्षित असतं.

5.लॉकडाऊन दरम्यान कोणत्या प्रकारच्या सेवांना सूट दिली जावी? हे तिथलं स्थानिक प्रशासन ठरवतं

6.सध्या, करोनाचं संक्रमण फैलावू नये यासाठी लोकांनी घरातच ठेवण्यासाठी अनेक राज्यांत लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय.

🔴'कर्फ्यू' म्हणजे काय?

1.अत्यंत गंभीर परिस्थिती 'कर्फ्यू'ची अंमलबजावणी केली जाते. ही स्थिती नागरिकांसाठी थोडी अडचणीची ठरू शकते. कारण नागरिकांना कर्फ्यूच्या नियमांचं पालन करावंच लागतं कारण हा प्रशासनाचा 'आदेश' असतो.

2.या दरम्यान नागरिक आपल्या भागात किंवा रस्त्यांवर गर्दी करून उभे राहू शकतं नाहीत

3.मुख्य म्हणजे, कर्फ्यूच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना पोलीस अटक करू शकतात. तसंच अशा नागरिकांना दंडही भरावा लागू शकतो

4.कर्फ्यू दरम्यान नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडण्याची परवानगी नाही

5.कर्फ्यू दरम्यान शाळा, महाविद्यालय, बाजार बंद ठेवले जातात

6.कर्फ्यूमध्ये अत्यावश्यक सुविधा सुरू राहील, याची काळजी प्रशासन घेतं

7.कर्फ्यू दरम्यान बाजार आणि बँकसारख्या सेवाही बंद केल्या जातात

8.स्थानिक प्रशासनाकडून कर्फ्यू शिथील करण्यात आल्यानंतरच नागरिकांना घरातून बाहेर पडण्याची परवनानगी असते

📌दरम्यान, देशभरात आत्तापर्यंत ५२५ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा आकडा अजूनही वाढण्याची शक्यता आहे. तसंच १० जणांनी करोनामुळे आपला जीव गमावला आहे.

आकाशगंगा

       सूर्य हा एक तारा असून त्या भोवती पृथ्वीसहित 8 ग्रह फिरतात.

        चंद्र हा पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह आहे.

         प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे 50 मिनिटे उशिरा होतो.

       चंद्राला पृथ्वीभोवती एक परिभ्रमण करण्यास 27.3 दिवस लागतात.

         एका अमावस्येपासुन दुसर्यार आमवस्येपर्यंतचा काळ 29.5 दिवसांचा असतो.

        एकूण 88 तारकासमूह मानले जातात. त्यातील 37 तारकासमूह उत्तर खगोलीय तर 51 तारकासमूह दक्षिण खगोलीय आहेत.

  प्राचीन भारतीय खगोल अभ्यासकांनी 27 नक्षत्रांची कल्पना केली आहे.

        प्लूटो आणि त्याच्यासारख्या इतर खगोलीय वस्तूंना आता बटुग्रह म्हणून ओळखतात.

         बुधाचा परिभ्रमणकाळ फक्त 88 दिवस तर नेपच्यूनचा सुमारे 146 वर्षे इतका मोठा असतो.

      बुध हा सूर्याचा सगळ्यात जवळचा आणि सगळ्यात लहान ग्रह आहे. 

         पृथ्वीच्या सर्वात जवळचा ग्रह म्हणजे शुक्र. त्याला 'पहाटतारा' म्हणतात.

       पृथ्वीच्या कक्षेत असलेल्या बुध आणि शुक्र यांना 'अंतर्ग्रह', तर कक्षेबाहेरील ग्रहांना 'बाह्यग्रह' म्हणतात.

       'मंगळ' हा पहिला बाह्यग्रह आहे.

सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह म्हणजे 'गुरु'

       गुरूला एकूण 63 उपग्रह आहेत.

         शनि या ग्रहाची घनता पाण्यापेक्षा कमी आहे.

       शुक्राप्रमाणे युरेनस देखील पूर्वेकडून पश्चिमेकडे स्वत: भोवती परिवलन करतो.

      धूमकेतूचे पुच्छ सूर्याच्या विरुद्ध बाजूने असते.

       हॅले हा धूमकेतू 76 वर्षानी दिसतो. आता 2060 मध्ये दिसेल.

         भारताचा पहिला उपग्रह आर्यभट्ट 19 एप्रिल 1975 रोजी सोडण्यात आला.

       त्यानंतर इन्सॅट, आय.आर.एस., कल्पना - 1, एज्युसॅट, भास्कर, इ. उपग्रह आपण अवकाशात सोडले आहेत.

इस्त्रो’ या संस्थेमार्फत आतापर्यंत 21 उपग्रह सोडण्यात आले. 

        GMRT म्हणजे जयंट मिटेरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप.

       टाटा इन्सिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ती खोडद येथे बसविली.

        आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे धोक्यात आलेल्या वनस्पती व अन्य वन्य प्राणी यांच्या संरक्षणासाठीचा करार 1975 पासून अंमलात आला आहे.

        जैवविविधतेच्या संरक्षणासाठी ब्राझील रिओ-द-जनिरो येथे झालेल्या 1992 च्या वसुंधरा परिषदेत जैववैविध्य करारावर सह्या करण्यात आल्या.

लोकपाल

- पहिले लोकपाल:-पिनाकी चंद्र घोष
- गैर न्यायिक सदस्य:- अर्चना रामसुंदर, दिनेश कुमार जैन, महेंद्रसिंग, इंद्रजित प्रसाद गौतम
- न्यायिक सदस्य:- दिलीप भोसले, प्रदीप कुमार मोहंती, अजयकुमार त्रिपाठी, अभिलाषा कुमारी

- लोकपाल निवड समिती:-
1)पंतप्रधान
2)सरन्यायाधीश
3)लोकसभा सभापती
4)लोकसभा विरोधी पक्षनेते
5)कायदेतज्ज्ञ

- लोकपाल पात्रता
1)सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त मुख्य सरन्यायाधीश किंवा निवृत्त न्यायाधीश
2)भ्रष्टाचार विरोधी धोरण,सार्वजनिक प्रशासन,दक्षता,विमा बँकिंग याबाबत किमान 25 वर्षे अनुभव

- अध्यक्ष अपात्रता
- 45 वर्षांपेक्षा कमी वय असलेली व्यक्ती
- लाभाचे पद धारण करणारी व्यक्ती
- संसद व विधिमंडळ सदस्य
- अपराधी दोषी

- कार्यकाल
5 वर्ष किंवा वयाच्या 70 वर्ष पर्यंत जो अगोदर  संपेल तो
- पगार
अध्यक्षाला सरन्यायाधीश प्रमाणे
सदस्य ला न्यायाधीश प्रमाणे

● लोकपाल कायदा 2013

- राज्यसभा:-17 डिसेंबर 2013
- लोकसभा:-18 डिसेंबर 2013
- राष्ट्रपती:-1 जानेवारी 2014
- अंमल:-16 जानेवारी 2014

- रचना: 1 अध्यक्ष व जास्तीत जास्त 8 सदस्य

घटनेतील मूलभूत कर्तव्य

1.      घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.  

2.      ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने. 

3.      भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे. 

4.      देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 

5.      धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे. 

6.      आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. 

7.      वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे. 

8.      विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे. 

9.      सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 

10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 

11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.