23 July 2020

नरसिंघम समिती

🧶 1991 मध्ये नरसिंहम समिती किंवा वित्तीय प्रादेशिक सुधार समितीची स्थापना एम. नरसिम्हाम यांच्या अध्यक्षतेखाली केली गेली , ज्याने डिसेंबर 1991 मध्ये आपल्या शिफारसी सादर केल्या. नरसिंहम समितीची स्थापना 1998 मध्ये दुसर्‍या वर्षी झाली.

🧶नरसिंहम समितीच्या शिफारशींमुळे भारतातील बँकिंग क्षमता वाढविण्यात मदत झाली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी व्यापक स्वायत्ततेचा प्रस्ताव आहे. मोठ्या भारतीय बँकांच्या विलीनीकरणाची समितीने शिफारसही केली होती. त्याच समितीने नवीन खासगी बँका सुरू करण्याचे सुचविले, त्या आधारे सरकारने 1993 मध्ये परवानगी दिली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या देखरेखीखाली बँकेच्या मंडळाला राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त करण्याचा सल्लाही नरसिंह समितीला देण्यात आला होता.

🛑१९९१ च्या नरसिंहम समितीच्या शिफारशी

🧶आर्थिक व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी एम. नरसिंहम यांनी  1991 मध्ये खालील शिफारसी केल्या.

🧶१. या समितीने पुढील पाच वर्षांत कायदेशीर तरलता प्रमाण (एसएलआर) 38. cent टक्क्यांवरून 28 टक्क्यांपर्यंत तरलतेचे प्रमाण कमी करण्याची शिफारस केली.

🧶२.या समितीने निर्देशित कर्ज कार्यक्रम रद्द करण्याची शिफारस केली.

🧶 या समितीच्या मते व्याज दर बाजार दलांनी निश्चित केले पाहिजेत. व्याजदराच्या निर्धारणात रिझर्व्ह बँकेने हस्तक्षेप करू नये.

🧶 या समितीने बँकांची लेखा प्रणाली सुधारण्याबाबतही सांगितले.

🧶 या समितीने बँकांच्या कर्जाची वेळेवर पुनर्प्राप्ती करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापनेवर जोर दिला.

🧶 नरसिंहम समितीने बँकांच्या पुनर्रचनेवरही भर दिला. या समितीनुसार or किंवा banks आंतरराष्ट्रीय बँका, or किंवा १० राष्ट्रीय बँका आणि काही स्थानिक बँका आणि काही ग्रामीण बँका एका देशाच्या आत असाव्यात.

🧶 या समितीने शाखा परवाना रद्द करण्याची शिफारस केली.

🧶नरसिंहम समितीने आपल्या देशात परकीय बँकिंगला प्रोत्साहन देण्याची शिफारस केली.

🧶या समितीने बँकांवरील दुहेरी नियंत्रण रद्द करण्याची शिफारस केली.

🧶यापूर्वी वित्त मंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेचे बँकांकडून नियंत्रण होते. केवळ रिझर्व्ह बँकेच्या नियंत्रणाखालीच बँकांचे नियंत्रण करावे, अशी सूचना नरसिंहम समितीने केली.

इतिहास विषयक महत्वाची प्रश्ने.

1. 1869 साली महात्मा गांधींचा जन्म _____ ह्या ठिकाणी झाला.

A. सुरत
B. बडोदा
C. पोरबंदर 🅾
D. नाताळ (दक्षिण आफ्रिका)

2. गांधीजी कोणत्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत गेले ?

A. 1890
B. 1893 🅾
C. 1896
D. 1899

3. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेत खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ?

A. आफ्रिकन ओपिनियन
B. इंडियन ओपिनियन 🅾
C. नाताळ काँग्रेस
D. ब्लॅक सॅल्युट

4. दक्षिण आफ्रिकेत गांधीजींनी कोणत्या आश्रमाची स्थापना केली होती ?

A. साबरमती आश्रम
B. सेवाग्राम आश्रम
C. फिनिक्स आश्रम 🅾
D. इंडियन आश्रम

5. महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य 🅾

6. कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 🅾
C. सन 1919
D. सन 1920

7. जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन 🅾
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन

8. _ साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 🅾
C. सन 1936
D. सन 1939

9. 'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान 🅾
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना

10. ____ रोजी लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला.

A. 1 ऑगस्ट 1920 🅾
B. 1 ऑगस्ट 1925
C. 1 ऑगस्ट 1929
D. 1 ऑगस्ट 1935

11. भारतीय घटनेत सुरूवातीला किती कलमे होती ?

A. 6
B. 8 🅾
C. 10
D. 12

12. देशात आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमानुसार जारी केली जाते ?

A. कलम 356
B. कलम 360 🅾
C. कलम 365
D. कलम 368

13. भारत सरकारला कायदेविषयक सल्ला कोण देतो ?

A. कायदामंत्री
B. राष्ट्रपती
C. सरन्यायाधीश 🅾
D. लोकसभा सभापती

14. भारतात खरी कार्यकारी सत्ता कोणाकडे असते ?

A. भारतातील सनदी अधिकारी
B. भारताचे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती
C. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ 🅾
D. भारताचे सर्वोच्च न्यायालय

15. राज्यसभा लोकसभेने मंजूर केलेले अर्थविधेयक किती काळापर्यंत रोखून ठेवू शकते ?

A. 14 दिवस 🅾
B. एक महिना
C. चार महिना
D. एक वर्ष

16. विधानसभेत कमाल किती सदस्य असतात ?

A. 250
B. 270
C. 350
D. 500 🅾

17. केंद्र-राज्य विवाद खालीलपैकी कोणत्या संस्थेकडून सोडविले जातात ?

A. उच्च न्यायालय
B. नियोजन मंडळ
C. आंतरराज्यीय परिषद
D. यापैकी कोणी नाही 🅾

18. राज्यपालाचा कार्यकाळ सामान्यतः किती असतो ?

A. कायम
B. 5 वर्षे 🅾
C. 6 वर्षे
D. 10 वर्षे

19. भारताने घटनादुरुस्तीची पध्दत कोणत्या देशाकडून घेतली ?

A. अमेरिका
B. दक्षिण आफ्रिका 🅾
C. कॅनडा
D. आयर्लंड

20. भारतात केंद्रीय वित्त आयोगाची स्थापना दर किती वर्षांनी केली जाते ?

A. 3 वर्षे
B. 4 वर्षे
C. 5 वर्षे 🅾
D. 6 वर्षे

21. रक्तात असणाऱ्या प्रथिनाला काय म्हटले जाते ?

A. मायोसीन
B. फायब्रीनोजन 🅾
C. केसीन
D. व्हिटेलीन

22. एक ग्रॅम प्रथिनांमधून किती उष्मांक मिळतात ?

A. 10
B. 8
C. 6
D. 4 🅾

23. खालीलपैकी कोणते खरे फळ आहे ?

A. सफरचंद
B. काजू
C. अननस
D. नारळ 🅾

24. TRIPS आणि TRIMS ह्या संज्ञा कोणत्या यंत्रणेशी निगडीत आहेत ?

A. WTO 🅾
B. IMF
C. IBRD
D. ADB

25. वातावरणातील कोणता थर हा दाट असून तो एकूण वातावरणाच्या 85% इतका व्यापलेला आहे ?

A. मिसोस्फियर
B. थर्मोस्फियर
C. ट्रोपोस्फियर 🅾
D. स्ट्रॅटोस्फियर

26. एकक क्षेत्र जमिनीवर पीक वाढीच्या कालावधीत पर्णक्षेत्र निर्माण करण्याच्या क्षमतेला काय म्हणतात?

A. पर्णक्षेत्र निर्देशांक
B. पर्णक्षेत्र कालावधी 🅾
C. पीक वाढीचा दर
D. तुलनात्मक पीक वाढीचा दर

27. महाराष्ट्रात मिठाचा सत्याग्रह _____ येथे झाला.

A. संगमनेर, रत्नागिरी, मालवण
B. वडाळा, मालवण, शिरोडा 🅾
C. शिरोडा, संगमनेर, ठाणे
D. कल्याण, मालवण, शिरोडा

28. युनेस्कोने पर्यावरण शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने कोणाच्या मदतीने आंतरराष्ट्रीय पर्यावरण शिक्षण कार्यक्रम अंमलात आणला ?

A. WHO
B. WWF
C. IEEP
D. UNEP 🅾

29. खालीलपैकी कोणते शहर कृष्णा-पंचगंगा नद्यांच्या संगमावर आहे ?

A. कराड
B. कोल्हापूर
C. नरसोबाची वाडी 🅾
D. सातारा

30. _______ यांनी स्वामी दयानंद सरस्वतींना 'आर्यसमाज' स्थापनेसाठी मदत केली.

A. स्वामी विवेकानंद
B. आगरकर
C. गोखले
D. लोकहितवादी 🅾

31. कोणत्या साली गोव्यामध्ये पोर्तुगीजांनी आपली सत्ता स्थापन केली ?

A. सन 1500
B. सन 1510 🅾
C. सन 1520
D. सन 1530

32. ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

A. सन 1500
B. सन 1550
C. सन 1600
D. सन 1650

33. प्लासीची लढाई ______ रोजी झाली.

A. 23 जानेवारी 1757
B. 23 जून 1
C. जून 1758
D. 31 मार्च 1751.

34. वसईचा प्रसिध्द तह कोणत्या वर्षी घडून आला ?

A. सन 1801
B. सन 1802 🅾
C. सन 1803
D. सन 1818

35. तैनाती फौज भारतात कोणी सुरू केली ?

A. अकबर
B. औरंगजेब
C. लॉर्ड वेलस्ली 🅾
D. लॉर्ड कॉर्नवालीस

36. सतीबंदीचा कायदा कोणत्या वर्षी पास झाला ?

A. सन 1829 🅾
B. सन 1859
C. सन 1929
D. सन 1959

37. विधवा पुर्नविवाहाचा कायदा कधी पास झाला ?

A. सन 1926
B. सन 1936
C. सन 1946
D. सन 1956 🅾

38. इंग्रजांनी भारतातील पहिली वखार कोठे उभारली ?

A. चंद्रनगर
B. सुरत 🅾
C. कराची
D. मुंबई

39. कोणत्या साली भारतात विद्यापीठ कायदा पास झाला ?

A. सन 1834
B. सन 1864
C. सन 1894
D. सन 1904 🅾

40. भारतात येणारे पहिले युरोपियन कोण ?

A. इंग्रज
B. फ्रेंच
C. डच
D. पोर्तुगीज 🅾

41. नेफा हे ______ चे जुने नाव आहे.

A. मणिपूर
B. मेघालय
C. अरुणाचल प्रदेश 🅾
D. त्रिपुरा

42. खालीलपैकी भाषिक आधारावर निर्मिती झालेले पहिले राज्य कोणते ?

A. महाराष्ट्र
B. आंध्रप्रदेश 🅾
C. गुजरात
D. आसाम

43. IIM मध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणती प्रवेश परीक्षा द्यावी लागते ?

A. NET
B. JEE
C. GATE
D. CAT 🅾

44. भारत सरकार कोणत्या दिवशी 'राष्ट्रीय मतदार दिन' म्हणून साजरा करते ?

A. 12 जानेवारी
B. 15 जानेवारी
C. 25 जानेवारी 🅾
D. 26 जानेवारी

45. स्वतंत्र तेलंगणाची मागणी कशावर आधारलेली होती ?

A. भाषिक महत्त्वाकांक्षा
B. प्रादेशिक असंतुलन 🅾
C. फुटीरतावादी राजकारण
D. राज्याच्या स्वायत्ततेशी

46. मोटार वाहनांमुळे _____________ प्रकारचे प्रदूषण होते .

A. हवेमधील
B. प्राथमिक
C. दुय्यम
D. प्राथमिक व दुय्यम दोन्ही प्रकारचे 🅾

47. ई-मेलचा अर्थ ________________ असा आहे.

A. इलेक्ट्रॉनिक मेल 🅾
B. इलेक्ट्रिकल मेल
C. इलेक्ट्रोमॅग्नेटीक मेल
D. इलेक्ट्रोस्टॅटीक मेल

48. खालीलपैकी कोणत्या महामार्गावर 'खंबाटकी घाट' लागतो ?

A. मुंबई-पुणे
B. मुंबई-गोवा
C. मुंबई-आग्रा
D. पुणे-बेंगळूरु 🅾

49. खालीलपैकी कोणता प्रत्यक्ष कर आहे ?

A. व्यवसाय कर 🅾
B. मूल्यवर्धित कर
C. सेवा कर
D. विक्री कर

50. महाराष्ट्रातील आदिवासी विकासाच्या चळवळीशी कोण संबंधित नव्हते ?

अ. सेनापती पांडुरंग बापट ब. अनुताई वाघ क. ताराबाई मोडक ड.केशवराव जेधे

A. ब, ड
B. अ, क
C. अ, ड 🅾
D. ब, क

१) खालील पैकी कोणाचा अखिल भारतीय कांग्रेस पक्षाच्या स्थापनेत सहभाग होता ?
अ) श्री. डब्ल्यू . सी. बॅनर्जी
ब)  श्री. दिनशॉ वाच्छा
क) श्री. विल्यम वेडेरबर्न
ड) वरील सर्व.🅾

२) खालीलपैकी कोणती संघटना कांग्रेस प्रणित नाही?
अ) कांग्रेस सेवा दल
ब)  युक्रांद🅾
क) एन एस यू आय
ड) आय एन टी यू सी

३) कांग्रेस पक्षातील हाय कमांड म्हणजे खालीलपैकी कोण असते?
अ) पक्षाध्यक्ष
ब) पक्ष उपाध्यक्ष
क) कांग्रेस कार्यकारी समिती 🅾
ड) यापैकी नाही

४) खालीलपैकी योग्य विधाने निवडा.
१) राष्ट्रीय कॉंग्रेस ही लोकशाही तत्वावर आधारित असलेली संघटना होती.
२) १८८५ साली राष्ट्रीय कॉंग्रेसची स्थापना झाली.
३) राष्ट्रीय सभेवर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असला तरी दुसऱ्या महायुद्धात भारताने इंग्रजांना मदत करावी या गांधीजींच्या निर्णयाविरुद्ध राष्ट्रीय सभेने ठराव संमत केला होता.

अ) फक्त १ व ३
ब) फक्त १ व २
क) फक्त २ व ३
ड) वरील सर्व 🅾

५) कॉंग्रेसमधील जहाल व मवाळ गटातील प्रमुख पूरक असलेले पर्याय निवडा ? 
१) विचारसरणीत  भिन्नता 
२) आंदोलन मार्गातील भिन्नता 
३) मागण्यात  भिन्नता 
४) स्वराज्य व स्वातंत्र्य मुद्यावर मतभेद 

अ) १, ३ व ४
ब) २, ३ व ४
क) १, २ व ३🅾
ड) १, २ व ४

६)  खालीलपैकी कोणते उद्दिष्ट कॉंग्रेसच्या स्थापनेशी संबंधित नाही ?
   
अ) भारतीय लोकाचा असंतोष कमी करणे.
ब) इंग्रज प्रशासनाच्या चुका दुरुस्त करणे 
क) विविध प्रश्नावर लोकमत तयार करणे 
ड) जहाल व मवाळामध्ये समन्वय प्रस्थापित करणे🅾

७) भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावर राष्ट्रीय सभा बरखास्त करण्यात यावी असे खालीलपैकी कोणाचे मत होते ?

अ) सी. राजगोपालाचारी  
ब) आचार्य कृपलानी 
क) महात्मा गांधी 🅾
ड) जयप्रकाश नारायण 

८) खालीलपैकी कोणती योजना कांग्रेस कार्यकाळातील नाही ?
अ) मनरेगा
ब) किसान विकास पत्र
क) सुकन्या समृद्धी🅾
ड) अन्न सुरक्षा

९) २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला पूर्ण भारतात किती जागा मिळाल्या ?
अ) ४४ 🅾
ब) ४८
क) ५२
ड) ६१

१०) खालीलपैकी कोणत्या कॉंग्रेस नेत्याने भारत देशाचे गृहमंत्रीपद भूषवले नाही?
अ) पी. चिदंबरम
ब) पी.व्ही. नरसिंहाराव
क) इंदिरा गांधी
ड) पृथ्वीराज चव्हाण 🅾

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नोबेल पुरस्कार सोहळा रद्द

◾️जगावर ओढावलेल्या कोरोनाच्या दुष्ट संकटामुळे यावर्षी पार पडणारा नोबेल पुरस्कार सोहळाही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

◾️त्याचबरोबर माध्यमांच्या माहितीनुसार ६४ वर्षांच्या काळात पहिल्यांदाच या सोहळ्यात खंड पडल्याचे म्हटले जात आहे.

◾️यासंदर्भातील माहिती नोबेल पुरस्कारांचे आयोजन करणाऱ्या संस्थेने दिली आहे.

◾️तसेच हा पुरस्कार सोहळा वेगळ्या प्रकारे आयोजित करण्यात येणार असून त्याची लवकरच माहिती दिली जाणार असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

◾️नोबेल आठवडा ज्या प्रकारे आयोजित करण्यात येतो तसा यावेळी करण्यात येणार नाही.

◾️कोरोनाच्या महामारीमुळे सध्या यावेळची परिस्थिती वेगळी आहे. हे वर्ष गेल्या वर्षीच्या तुलनेत निराळे आहे.

◾️सध्या सर्वांना नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याची गरज असल्यामुळे यावर्षीचा नोबेल पुरस्कार सोहळा रद्द केला जाणार असून तो नव्या स्वरूपात दिसेल, अशी माहिती नोबेल फाऊंडेशनचे संचालक लार्स हेकेन्स्टीन निवेदनाद्वारे दिली.

◾️दरम्यान, नोबेल पुरस्कारांच्या ६४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच हा सोहळा रद्द करण्यात आल्याचे म्हटले जात आहे.

राष्ट्रीय पक्ष व प्रादेशिक पक्ष

______________________________________
🔰 राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेल्या पुढील निकषांची पूर्तता व्हावी लागते.
______________________________________
📌 (अ) चार किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान ६% वैध मते मिळवणे आवश्यक असते. तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून किमान चार सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत.

किंवा
📌 (ब) एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान २% मतदारसंघांमधून तसेच किमान तीन राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक असते.

🔰 प्रादेशिक किंवा राज्यपातळीवरील पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील निकष स्पष्ट केले आहेत.

📌 अ) लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान ६% मते मिळवणे आणि किमान दोन सदस्य विधानसभेवर निवडून येणे आवश्यक असते.

किंवा
📌 (ब) विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या किमान ३% जागा किंवा किमान ३ जागा प्राप्त करणे आवश्यक आहे.
___________________________________

पेपर खरच होतील का राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षा 2020(सप्टेंबर/ऑक्टोबर) ?

टीप: हे माझे मत आहे आयोगाचे नाही.

आयोगाने काही महिन्यांपूर्वी राज्यसेवा आणि संयुक्त परीक्षेचे वेळापत्रक दिले परंतु ते देताना मुख्य परिक्षेबद्दल सांगितले नाही आणि सेंटर बदलुन देण्याबाबत ही काही सांगितले नाही.आयोगाने मुख्य परिक्षेच्या तारखा न देन हे समाजण्यासारखा नाही कारण पूर्व चे वेळापत्रक आयोग देत असेल तर त्यामागे असा विचार असेल की तोपर्यंत करोना थोडा आटोक्यात येईल मग जर सप्टेंबर ऑक्टोम्बर पर्यंत करोना आटोक्यात येणार असेल तर मग पुन्हा वाढण्याचे काही चान्सेस नाहीत मग मुख्य परीक्षेच timetable देण्यात काहीच अडचण नव्हती.म्हणजेच आयोगाच्या मनात ही खात्री दिसत नाहीये की नक्की आपण सप्टेंबर/ऑक्टोबर मध्ये परीक्षा घेऊ की नाही त्यामुळे कदाचित मुख्य परीक्षेच्या तारखा न बाबत आयोगाने विचार केला नसावा.
दुसरी गोस्ट अशी की जर आयोगाला पेपर घ्यायचेच असतील तर आयोगाला परीक्षा केंद्र पुन्हा निवडण्याची संधी मुलांना द्यावीच लागेल.कारण पुण्याचा विचार केला तर पुण्यात परीक्षा केंद टाकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 40,000 असते यातील 5 ते 7 हजार मुले मूळ पुण्यातील पकडली तरी राहणारी जवळपास 33 ते 35 हजार मुले बाहेरील जिल्ह्यातून पुण्यात येणारी असतील आणि सध्याची परिस्थिती पाहता ही रिस्क घेणे आयोगाला आणि शासनाला परवडेल असा वाटत नाही तसेच 4 महिने घराबाहेर न पडुदेणारे आणि कडक lockdown पाळणारे पालक यासाठी मुलांना पुण्या मुंबई ला जाऊ देतील का ? पेपर ची वेळ ही सकाळी 11 ला असल्याने लांबून येणाऱ्या बहुदा सर्वच मुलांना आदल्याच दिवशी पुण्यात यावे लागेल आणि बऱ्यापैकी मुलांनी आधीच रूम सोडून सर्व सामान घरी नेल्याने पेपर च्या आदल्या दिवशी नातेवाईकां कडे राहावे लागेल व जिथे राहतील त्यातील बरेच ठिकाने ही आधीची कंटेन्मेंट झोन होऊन गेली असतील तर तिथे राहण्याची मुले आणि त्यांचे पालक रिस्क घेतील का असे बरेच प्रश्न आहेत ज्यांची उत्तरे नाही अशीच असतील.आशा प्रकारे विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा रोष पत्करून पेपर घेणे आयोगाला परवडेल का ? आणि जर चुकून (असे काही होऊ नये ही देवा कडे प्रार्थना) पेपर झाले आणि 4 लाख मुलांपैकी एकाचे काही बरे वाईट झाले तर आयोग आणि शासन सर्व बाजूनी होणारी टीका सहन करण्यास तयार आहे का ?
दुसरा मुद्दा असा की जर आयोगाने परीक्षा केंद्र बदलण्याची संधी दिली आणि आपल्या आपल्या जिल्हयात पेपर घेतन्याचे ठरविले तर गडचिरोली चंद्रपूर सारख्या भागात नेहमी असणारी दोन हजार विद्यार्थी क्षमता जर 5 हजार किंवा जास्त होणार असेल तर अशा भागत एवढ्या सुविधा आशा काळात कुठून उभ्या करणार,आशा दुर्गम भागात प्रत्येक केंद्रावर cctv असेल अथवा इतर सुविधा कशा उपलब्ध करून देणार....?

मग नक्की पेपर होतील की नाही ?
माझ्या मते जेंव्हा आयोग परीक्षा केंद्र बदलण्याची संधी देणारी सूचना  काढेल तेंव्हा परीक्षा घेण्याच्या दृष्टीने आयोग positive विचार करत आहे असा समजाव...परीक्षा केंद्र आहेतेच ठेऊन परीक्षा होतील असा मलातरी अजिबात वाटत नाही....एव्हड लिहिण्याचा कारण हेच की फोकस हा अभ्यासावर राहुद्यात पेपर याच तारखेला होतील यावर नको...धन्यवाद🙏

महत्त्वाचे प्रश्नसंच

🔰 खालील विधाने विचारात घ्या:

अ) भारतात सर्वात जास्त काल इंग्रजांनी शासन केले.
ब) पोर्तुगीजांनी भारतातून सर्वप्रथम आपली सत्ता मागे घेतली.
क) पोर्तुगीजांनी आपली पहिली वसाहत गोवा इथे स्थापन केली.
ड) ब्रिटीश खलाशी वास्को-द-गामा १४९८ मध्ये भारतात आला.

१) फक्त अ,ब, क योग्य
२) फक्त क योग्य  📚✍️
३) सर्व अयोग्य
४) सर्व योग्य

🔰 कोणत्या वर्षी भारत सरकारने जागतीक व्यापार संघनेशी करार केला आहे ? आणि जागतीक व्यापार संघटना (डब्ल्यु. टी. ओ.) कधी अस्तित्वात आली.

A) 1981-1982 
B)  1994-1995  ✅
C) 1996-1997 
D) 1998-1998 

🔰 भारतात नियोजन मंडळाची स्थापना केव्हा झाली ?

M)  मार्च 1950 ✅
P) एप्रिल 1950
K) मार्च 1951
H) मार्च 1949

🔰 _ उत्तर-पूर्व रेल्वे विभागाचे मुख्यालय आहे.

A) भुवनेश्वर
B) हाजीपूर 
C)  गुहाटी
D)  गोरखपुर  ✅

🔰 द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जेथे एकवटलेले आहेत तेथील  परिसरात दाट लोकवस्ती आढळते.

A) लातूर - उस्मानाबाद
B) जलगाव - भुसावल
C) पंढरपूर - सोलापूर
D)  पिंपरी -चिंचवड ✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

'सरहद्द गांधी' या नावाने कोणाला ओळखले जाते ?

A. आगा खान
B. खान अब्दुल गफार खान ✔
C. महात्मा गांधी
D. मोहम्मद अली जीना

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

___साली गांधीजींनी 'हरिजन' हे साप्ताहिक सुरू केले.

A. सन 1930
B. सन 1933 ✔
C. सन 1936
D. सन 1939

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

जालियानवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी कोणते कमिशन नेमले होते ?

A. सायमन कमिशन
B. हंटर कमिशन ✔
C. रिपन कमिशन
D. वूड कमिशन

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कोणत्या वर्षी गांधीजींनी गुजरातमधील खेडा येथे सत्याग्रह केला होता ?

A. सन 1916
B. सन 1918 ✔
C. सन 1919
D. सन 1920

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

महात्मा गांधींनी भारतात सर्वप्रथम सत्याग्रह कोठे केला ?

A. दिल्ली
B. मुंबई
C. अहमदाबाद
D. चंपारण्य ✔

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

कृष्णा नदी


◾️ कृष्णा नदी कृष्णा खोऱ्याचा
📌 संपूर्ण भारतात तिसरा क्रमांक लागतो तर
📌 द्वीपकल्पीय पठारावरती दुसरा क्रमांक लागतो

◾️ कृष्णा नदीचे क्षेत्रफळ हे 2 लाख 58 हजार 948 चौरस किलोमीटर इतके आहे

◾️ प्रवास -
📌 महाराष्ट्र
📌 कर्नाटक
📌 तेलंगणा व
📌 आंध्र प्रदेश या
चार राज्यांच्या मधून वाहते

◾️ आंध्र प्रदेशात बंगालच्या उपसागरास जाऊन मिळते

◾️ तिच्या प्रमुख उपनद्या
🔹 कोयना
🔹 वारणा
🔹वेण्णा
🔹 येगळा
🔹 पंचगंगा
🔹घटप्रभा
🔹 मलप्रभा
🔹भीमा
🔹 तुंगभद्रा
🔹मुशी आणि
🔹 मुनेरू

______________________________________

काहि महत्वाची कलमे

1.  राष्ट्रपती - 52

2.  उपराष्ट्रपती - 63

3.  राज्यपाल -155

4.  पंतप्रधान - 74

5.  मुख्यमंत्री - 164

6.  विधानपरिषद - 169

7.  विधानसभा - 170

8.  संसद - 79

9.  राज्यसभा - 80

10.  लोकसभा - 81

11.  महालेखापरीक्षक :- 148

12.  महाधिवक्ता - 165

13.  महान्यायवादी - 75

14.  महाभियोग - 61

15.  केंद्रीय लोकसेवा आयोग :- 315

16.  निवडणुक आयोग - 324

17.  सर्वोच्च न्यायालय - 124

18.  उच्च न्यायालय - 214

19.  जिल्हा न्यायालय - 233

20.  राष्ट्रीय आणिबाणी - 352

21. राष्ट्रपती राजवट - 356

22. आर्थिक आणिबाणी -360

23.  वित्त आयोग - 280

24.  घटना दुरुस्ती - 368

25.  ग्रामपंचायत - 40

22 July 2020

महाराष्ट्र पोलिस भरती- प्रश्नउत्तरे

● 2020 सालाचे 'ख्रिस्तोफ मेरीयूक्स पारितोषिक' कोणत्या शास्त्रज्ञाला  देण्यात आले?

*उत्तर* : कुरैशा अब्दुल करीम

● ‘स्पंदन मोहीम’ कोणत्या राज्याच्या पोलीसांनी राबविण्यास सुरुवात केली आहे?

*उत्तर* : छत्तीसगड

● ‘नगर वन’ योजनेच्या अंतर्गत किती शहरी वने उभारण्यात येणार आहे?

*उत्तर* : 200

● “निकोप आणि ऊर्जा कार्यक्षम उभारणी” उपक्रम चालविण्यासाठी कोणत्या संस्थेनी EESL सोबत भागीदारी केली आहे?

*उत्तर* : USAID

● कोणत्या संस्थेनी नाविन्यपूर्णतेच्या संवर्धनासाठी अटल नाविन्यता अभियान (AIM) सोबत इच्छापत्रावर स्वाक्षऱ्या केल्या?

*उत्तर* : वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

● पाण्यातून हायड्रोजन निर्माण करण्यासाठी कोणत्या संस्थेनी कमी खर्चीक कॅटालिस्ट विकसित केले?

*उत्तर* :  सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CeNS)

● ‘पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड’ (PIDF) कोणत्या संस्थेनी तयार केला?

*उत्तर* : भारतीय रिझर्व्ह बँक

● ‘#आय कमीट’ मोहिमेचा प्रारंभ कोणत्या मंत्रालयाच्या वतीने करण्यात आला आहे?

*उत्तर* : वीज मंत्रालय

● ‘IoT: ड्राईव्हिंग द पेटंट ग्रोथ स्टोरी इन इंडिया’ ही शीर्षक असलेला अहवाल कोणत्या संस्थेनी प्रकाशित केला?

*उत्तर* :  राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM)

● यंदा (2020) जागतिक खाद्यान्न सुरक्षा दिनाची संकल्पना काय आहे?

*उत्तर* : फूड सेफ्टी, एव्रीवन्स बिझनेस

● ‘EY वर्ल्ड एंत्रेप्रेन्योर ऑफ द इयर 2020’ हा सन्मान कोणाला दिला गेला?

*उत्तर* : किरण मजुमदार शॉ

● मातृत्व वय, मातामृत्यू दर याच्या संबंधित बाबी तपासण्यासाठी नेमलेल्या कृती दलाचे अध्यक्ष कोण आहेत?

*उत्तर* :  जया जेटली

● BAFTA (ब्रिटीश अ‍ॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?

*उत्तर* :  कृष्णेन्दु मजुमदार

● देशात ‘डीप स्पेस ग्राउंड स्टेशन’ उभारण्यासाठी NASA संस्थेसोबत कोणत्या देशाने भागीदारी केली?

*उत्तर* : दक्षिण आफ्रिका

● स्वदेशी “नासॉफरेन्जियल” (NP) स्वॅब कोणत्या संस्थेनी विकसित केले?

*उत्तर* : राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा

● डिसेंबर 2020 या महिन्यात त्याचा ‘K-FON’ नावाचा निशुल्क इंटरनेट प्रकल्प कोणते राज्य कार्यरत करणार आहे?

*उत्तर* : केरळ