Ads

31 January 2022

यशाची पहिली पायरी म्हणजे कृती करणे...


👉 मित्रांनो, आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत कि लोक अपयशी का होतात... आणि यशाची पहिली पायरी कोणती आहे... हे सर्व आजच्या लेखामध्ये आपण पाहणार आहोत आणि  शिकणार आहोत... 👍

👉 मित्रांनो, आजच्या धावपळीच्या काळात सर्वांना यशस्वी व्हायचं आहे... प्रत्यक व्यक्तीचे काही न काही स्वप्न असते आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती त्याच्या स्वप्न नुसार मोठ मोठ्या योजना तयार करतो, तरी सुद्धा खुप कमी लोक यशस्वी होतात...

👉 प्रत्येकजण स्वप्न पाहतो,  Goal ठरवतो, Plan तयार करतो तरी सुद्धा 98% लोक अपयशी होतात... आणि फक्त 2% लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करतात आणि यशस्वी होतात... यामागे फक्त आणि फक्त एक कारण आहे ते म्हणजे Action न घेणे...

यशाची सर्वात महत्वाची पहिली पायरी ती म्हणजे Action घेणे...

खुप लोक दिवसभर विचार करतात, दिवसभर योजना तयार करतात परंतु Action करत नाही... त्यामुळे त्यांना अपयश येते...

👉 मित्रांनो, तुम्ही ठरवलेल्या योजना नुसार Action केलीच नाही तर तुम्हाला Result हा हमेशा शून्यच  मिळेल...

आजकल लोक Action का घेत नाही त्यामागे कोणकोणते कारणे आहेत ते पाहुयात...

Action न घेण्याचे कारणे किंवा अपयशी होण्याचे कारणे...

1) आत्मविश्वासाची कमी असणे...
2) कोणतेही काम पूर्ण करण्यासाठी चांगल्या वेळेची वाट पाहणे...
3) आजचे काम उद्यावर ढकलणे
4) आळस

मित्रांनो, जसे कि मी सांगितल तुम्ही जो पर्यंत Action करणार नाही तो पर्यंत तुम्हाला Result मिळणार नाही... त्यामुळे तुम्ही आज पर्यंत फक्त स्वप्न पाहत असाल किंवा फक्त plan करत असाल किंवा चांगल्या वेळेची वाट पाहत असाल तर त्या साऱ्या गोष्टी आजपासून सोडुन द्या... आणि डायरेक्ट Action करा...

उदाहरणं :-  पुस्तक वाचल्याने ज्ञान मिळते... आता ही गोष्ट सर्वांना माहित आहे... परंतु तुम्ही जो पर्यंत पुस्तक वाचणार नाही तो पर्यंत तुमचे ज्ञान वाढणार नाही... 👍

ज्ञान वाढवण्यासाठी तुम्हाला रोज पुस्तके वाचावे लागतील तेंव्हाच तुमचे ज्ञान वाढेल... फक्त विचार करून तुमचे ज्ञान वाढणार नाही हे लक्षात ठेवा...

मित्रांनो, Action घेण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स देत आहे... त्या टिप्स वाचा आणि स्वतःच्या जीवनात लागु करा...

1) सर्वात प्रथम Goal ठरवा...
👉 ( Goal कसे ठरवावे याबद्दल मी अगोदर एक लेख लिहिलेला आहे तो लेख नक्की वाचा...)

तुम्हाला तुमचे जीवन कसे जगायचे याची कल्पना करा...  त्यानंतर तुम्हाला कोणती नोकरी करायची किंवा कोणता बिजनेस करायचा आहे हे ठरवा...

मित्रांनो, आपले Goal आपल्याला माहिती पाहिजे जेंव्हा आपल्याला आपले goal माहिती असते तेंव्हाच आपण पूर्ण स्पीड ने त्या Goal कडे जाऊ शकतो... आणि Goal पूर्ण करू शकतो...

सर्वात प्रथम तुमचे Goal काय आहे हे ठरवा... 👍

2) Micro Plan बनवा...
👉 मित्रांनो, तुम्ही जे कोणते  Goal ठरवले असतील  ते Goal कसे पूर्ण होतील हा प्रश्न स्वतःला विचारा आणि थोडा वेळ विचार करा...

एक उदाहरणं सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल...

👉 समजा, माझं स्वप्न आहे पोलीस बनायचं...

मी माझे Goal ठरवलं मला पोलीस बनायचं आहे...

नंतर मी स्वतःला एक प्रश्न करेल कि... मला पोलीस बनण्यासाठी काय काय करावे लागेल...?

हा प्रश्न जेंव्हा मी स्वतःला विचारेल तेंव्हा मला खुप उत्तरे मिळतील... जसे कि

रोज सकाळी लवकर उठावे लागेल

रोज सकाळी रनिंग करावी लागेल व्यायाम करावा लागेल...

रोज 4 घंटे अभ्यास करावा लागेल...

हे पहा.. मला पोलीस बनण्यासाठी वरील सर्व गोष्टी कराव्या लागतील तेंव्हाच मी पोलीस होऊ शकतो...

परंतु

👉 मी जर अभ्यास केलाच नाही किंवा सकाळी रनिंगला गेलोच नाही तर काय होईल... याचा परिणाम असा होईल कि मी पोलीस अजिबात होऊ शकणार नाही..

मित्रांनो, तुमचे जे कोणते स्वप्न असतील त्याचा plan नक्की बनवा परंतु Micro Plan वर जास्त फोकस करा

Micro Plan म्हणजे प्रत्येक लहान गोष्टीचा plan बनवणे

समजा तुम्हाला टरबूज खायाचे आहे तर कसे खासाल...

तुमचे उत्तर अगदी बरोबर आहे

आपण त्या टरबूजचे छोटे छोटे भाग करू आणि नंतर एक भाग खाऊ

मित्रांनो यालाच Micro plan म्हणतात... तुमचा जो कोणता Plan आहे त्याला खुप लहान भागामध्ये विभागून घ्या... जेंव्हा तुम्ही Micro Plan बनवता तेंव्हा प्रत्येक दिवसी काय करायचे आहे हे तुम्हाला समजेल आणि त्यानुसार तुम्ही Action घेशाल

समजा

एक पुस्तक एक महिन्यात वाचायचे असेल तर सर्वात प्रथम विचार करा...त्या पुस्तकात ऐकून पेज किती आहेत

समजा त्या पुस्तकात ऐकून पेज 450 आहेत

तेंव्हा त्या पेजला विभागून घ्या 30 दिवसामध्ये..

450 ÷ 30 = 15 पेज

म्हणजे तुम्हाला एक पुस्तक एका महिन्यात संपवायचे असेल तर रोज पेज वाचावे लागतील तेंव्हाच 30 दिवसात एक पुस्तक वाचुन संपवाल
🏃 PRACTICE MAKES MAN PERFECT✒👍🏻

महाराष्ट्र पोलिस भरती प्रश्न सराव


1. देशातील पहिले सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण देणारे राज्य कोणते ?
1. गुजरात 🔸🔸
2. सिक्किम
3. आसाम
4. महाराष्ट्र
👉 भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम असून सेंद्रिय शेती विषयी माहिती देणारे विद्यापीठ गुजरात मध्ये आहे

2. भारतातील पहिले बाल न्यायालय कोठे सुरू करण्यात आले ?
1.दिल्ली 🔸🔸
2. महाराष्ट्र
3. आंध्र प्रदेश
4. चंदिगढ

3............. या भागातील पठार मेवाड पठार व व मारवाड पठार म्हणून ओळखले जाते.
1. मध्य प्रदेश
2. राजस्थान 🔸🔸
3. सिक्किम
4. गुजरात

4. महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो ?
1.02
2.06
3.07
4.05 🔸🔸
👉 कृष्णा , सावित्री, कोयना, वेण्णा ,गायत्री

5. अरवली पर्वत राजस्थानमध्ये असून हा पर्वत अतिप्राचीन म्हणजेच सर्वात जुना पर्वत आहे. या पर्वताच्या पश्चिम भागामध्ये मही व लूनी ह्या दोन नद्या उगम पावतात. लुनी ही नदी पुढे कच्छच्या आखातात गायब होते. अरवली पर्वताच्या ............. भागात बनारसी नदी उगम पावते.
1. उत्तर
2. दक्षिण
3. मध्य
4. पूर्व 🔸🔸

6. भारतातले पहिले शासकीय दिव्यांगत्व क्रिडा केंद्र कोणत्या शहरात उभारले जाईल ?
1. ग्वाल्हेर 🔸🔸
2. इंदौर
3. दिल्ली
4. यापैकी नाही

7. मुंबई आणि महाराष्ट्र यांच्यातील नाते वर्णन करताना 'जसे गरूदाला पंख आणि वाघाला नखं' असे वर्णन कोणत्या कवीने केले ?
1. अमर शेख
2. अण्णाभाऊ साठे 🔸🔸
3. प्र. के.अत्रे
4. द.ना.गव्हाणकर

8. पुढील डोंगर रांगा पैकी चुकीची कोणती ?
1. धुळे -गाळणा डोंगर
2. नांदेड -मुदखेड डोंगर /निर्मल डोंगर
3. औरंगाबाद -वेरूळ डोंगर
4. हिंगोली -हिंगोली डोंगर

1. सर्वच बरोबर 🔸🔸
2. 1, 2बरोबर
3. 3, 4बरोबर
4. सर्वच चूक

9.  खालील पैकी  कोणते राज्य  भारताच्या  पुर्व किनाऱ्यावर  वसलेले  नाही ?
1. महाराष्ट्र 🔸🔸
2 तामिळनाडु
3. आंध्रप्रदेश
4. पश्चिमप्रदेश

10. सातपुडा डोंगररांगा ह्या कोणत्या नद्यांना विभाजित करतात ?
1. नर्मदा व तापी 🔸🔸
2.  तापी व गोदावरी
3. कृष्णा व गोदावरी
4. कृष्णा व पंचगंगा

11. कोणता त्रिभुजप्रदेश हरित त्रिभुज प्रदेश म्हणून ओळखला जातो ?
1. महानदी त्रिभुज प्रदेश
2. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेश 🔸🔸
3. गोदावरी त्रिभुज प्रदेश
4. कृष्णा त्रिभुज प्रदेश

12. खालीलपैकी कोणता चित्रपट भारतातील पहिला देशी रंगीत चित्रपट होता ?
1. मुगल ए आझम
2. किसान का नाम 🔸🔸
3. आलम आरा
4. राजा हरिश्चंद्र

13. भारतातील पहिले वैद्यकीय महाविद्यालय 1835 ला कोठे स्थापन झाले ?
1. चेन्नई
2. कोलकत्ता 🔸🔸
3. चंदिगड
4. मुंबई

14. मौलाना आझाद संशोधन केंद्र कोणत्या शहरात आहे ?
1. पैठण
2. सोयगाव
3. औरंगाबाद 🔸🔸
4. नांदेड

15. नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या पर्वतावर वसलेले आहे ?
1. सह्याद्री
2. गाविलगड
3. सातमाळा
4. सातपुडा 🔸🔸

  🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶

म्हाडाच्या परीक्षा आता 31 जानेवारीपासून; वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल


🔰 म्हाडाच्या भरती परीक्षेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल करण्यात आला.

🔰 7 फेब्रुवारी पासुन सुरु होणाऱ्या परिक्षा आता 31 जानेवारीपासून ऑनलाईन सुरु होणार आहे.

🔰 31 जानेवारी, 2, 3, 7, 8, 9 फेब्रुवारी या सहा दिवसांत परीक्षा घेण्यात येणार आहे.

🔰 565 पदांसाठी ऑफलाईन होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे.

🔰 दरम्यान, या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

30 January 2022

महात्मा गांधी

- जन्म: 2 ऑक्टोबर 1869, मृत्यू: 30 जानेवारी 1948
- 1893 ते 1915 दक्षिण आफ्रिकेत (21 वर्षे)
- 9 जानेवारी 1915 वयाच्या 45 व्या वर्षी गांधींचे दक्षिण आफ्रिकेतून भारतात (बाॅम्बे) आगमन. याचवर्षी अहमदाबाद येथे सत्याग्रह आश्रमाची स्थापना
- गांधी युग 1917 ते 1947
- 9 जानेवारी: प्रवासी भारतीय दिवस
- 2 ऑक्टोबर: आंतरराष्ट्रीय अंहिसा दिन
--------------------------------------------------
● चंपारण्य सत्याग्रह (बिहार) 1917

- बिहारमधील निळ उत्पादक शेतकरी वर्गाचे प्रश्न सोडविण्यासाठी
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- पहिला सविनय कायदेभंग
- स्थानिक नेता राजकुमार शुक्ल
--------------------------------------------------
● अहमदाबाद गिरणी कामगारांचा लढा (गुजरात) 1918

- पहिले उपोषण / भूक हरताळ
- कापड गिरणी मालकांविरोधात
--------------------------------------------------
● खेडा सत्याग्रह (गुजरात) 1918

- पहिले असहकार आंदोलन
- सरकारविरोधी
--------------------------------------------------
● रौलट सत्याग्रह 1919

- नागरी स्वातंत्र्यावर गदा आणत असलेल्या रौलट कायद्याविरोधात
- पहिले जन आंदोलन (Mass Strike)
- जालियनवाला बाग हत्याकांडाच्या (13 एप्रिल 1919) निषेध म्हणून गांधींनी कैसर - ए- हिंद ही पदवी परत केली.
- 1919 मध्ये दिल्लीत ऑल इंडिया खिलाफत समितीचे पहिले अध्यक्ष म्हणून गांधीजींची निवड
--------------------------------------------------
● असहकार चळवळ

- जून 1920 अलाहाबादमध्ये खिलाफत समितीत हा ठराव पास झाला
- काँग्रेसचे कोलकत्ता अधिवेशन ( सप्टेंबर 1920) आराखडा मंजूर
- काँग्रेसचे नागपूर अधिवेशन (डिसेंबर 1920) काँग्रेसची मान्यता
- चौरीचौरा घटना (16 एप्रिल 1922) असहकार चळवळ स्थगित
- 1924 बेळगावमध्ये झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद गांधींकडे (पहिले आणि एकमेव) टेलीग्राम व्हीजेएस ईस्टडी.
- 1930 तत्कालीन व्हाईसराॅय लाॅर्ड इर्विनकडे गांधीजींनी 11 मुद्द्यांची मागणी केली.
--------------------------------------------------
● दांडी यात्रा

- मिठाचा कायदा मोडण्यासाठी
- 79 अनुयायांची पहिली तुकडी, 14 महाराष्ट्रायीन नेत्यांचा समावेश
- 12 मार्च ते 5 एप्रिल 1930 दांडीयात्रा, अंतर 240 मैल
- 6 एप्रिल 1930 मिठाचा कायदा मोडला
--------------------------------------------------
● गांधी इर्विन करार 1931

- दुसर्या गोलमेज परिषदेला गांधी उपस्थित राहणार
- संविनय कायदेभंग चळवळ मागे घेतली
- काँग्रेसच्या कराची अधिवेशनात या कराराला समर्थन मिळाले.
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 1931 संविनय कायदेभंग चळवळीचा दुसरा टप्पा सुरू ही चळवळ पुन्हा 1934 मध्ये मागे घेण्यात आली.
--------------------------------------------------
● पुणे करार 1931

- रॅम्से मॅकडाॅनल्डच्या जातीय निवड्याला विरोध म्हणून पुण्याच्या येरवडा कारागृहात गांधींचे आमरण उपोषण
- यावरूनच महात्मा गांधी आणि डाॅ. आंबेडकर यांच्यात 24 सप्टेंबर 1932 ला हा करार झाला
- दलितांची स्वतंत्र मतदार संघाची तरतूद रद्द केली.
--------------------------------------------------
● वैयक्तिक सत्याग्रह

- 1933 मध्ये सुरूवात
- 14 व 16 सप्टेंबर 1940 काँग्रेसच्या मुंबई बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
- टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- 13 ऑक्टोबर 1940 वर्धा येथे विनोबा भावे यांना पहिले वैयक्तिक सत्याग्रही
- पंडित नेहरू दुसरे वैयक्तिक सत्याग्रही
--------------------------------------------------
● चले जाव

- काँग्रेसचे मुंबई अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर
- महत्त्वाच्या नेत्यांना अटक झाल्यामुळे भूमीगत स्वरूप प्राप्त
- सी. राजगोपालचारी सूत्र (CR Formula): गांधी आणि जिनांची मिटिंग

डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची केंद्र सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती.

🔰केंद्र सरकारने शुक्रवारी डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार अर्थात Chief Economic Advisor (CEA) म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात चर्चा सुरू होती.

🔰अनंत नागेश्वरन यांचं नाव देखील चर्चेत होतं. त्यासंदर्भात आज दुपारी केंद्र सरकारने अधिकृत निर्णय जारी केला असून त्यानुसार नागेश्वरन यांच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. २०२२-२३ सालासाठीचा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना केंद्र सरकारने नागेश्वरन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे.

🔰मुख्य आर्थिक सल्लागार नियुक्ती होण्याआधी नागेश्वर हे पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार मंडळाचे अर्धवेळ सदस्य देखील होते. याआधी नागेश्वर यांची एक लेखक, शिक्षक आणि सल्लागार म्हणून ओळख आहे. भारत आणि सिंगापूरमधील अनेक व्यवसायविषयक प्रशिक्षण देणाऱ्या संस्था आणि व्यवस्थापन संस्थांमध्ये त्यांनी अध्यापनाचं काम केलं आहे. तसेच, त्यांचे अनेक शोधनिबंध देखील प्रसिद्ध झालेले आहेत.

ब्राह्मोस निर्यातीसाठी भारत-फिलिपाइन्स करार.


🔰फिलिपाइन्सच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’शी क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ३७४ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या करारावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. भारताला मिळालेला ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्यातीचा हा पहिला देकार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

🔰भारत-रशियन संयुक्त उपक्रमातून ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (बीएपीएल) ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येत आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाजे, विमाने आणि जमिनीवरूनही डागता येते, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. 

🔰लढाऊ जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्यासाठी शुक्रवारी बीएपीएलने फिलिपाइन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी करार केला, असे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे.  बीएपीएल ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ)ची संयुक्त उपक्रम कंपनी आहे. भारत सरकारच्या संरक्षण निर्यातीला चालना देण्याच्या धोरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

राज्यात ७२०० पोलिसांची भरती-गृहमंत्री.

🔰राज्यात पहिल्या टप्प्यात सुरू करण्यात आलेली आलेली ५७०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पूर्ण होत आली आहे. आता दुसऱ्या टप्प्यात ७२०० पोलिसांची भरतीची प्रक्रिया पुढील महिन्यात सुरू केली जाणार आहे. याबरोबरच राज्यातील पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासाठी राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे यांनी दिली.

🔰गृहमंत्री वळसे यांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पोलीस दलाची आढावा बैठक घेतली. तत्पूर्वी यांच्या हस्ते ‘ई-टपाल’ सेवासुविधेचे तसेच स्वागत कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. आमदार संग्राम जगताप, नाशिक विभागाचे पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्यासह पोलीस अधिकारी व पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलाच्या आढावा बैठकीनंतर गृहमंत्री वळसे यांनी पत्रकारांवरील माहिती दिली.

🔰राज्यात मार्चनंतर मोठ्या प्रमाणावर पोलिसांसाठी घरे उभारणीचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. पोलीस ठाण्यांच्या अत्याधुनिकीकरणासंदर्भात आपल्याकडे माहिती संकलित झाली आहे. त्यानुसार राज्य सरकारकडे निधी मागितला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

29 January 2022

खालील प्रश्न सोडवा


🌀रिज़र्व बँक ऑफ़ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली??
A)1955
B)1935🛑🛑🛑
C)1949
D)1969

🌀स्टेट बँक ऑफ़ इंडिया ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली??
A)1965
B)1945
C)1955🛑🛑🛑
D)1935

🌀रिज़र्व बँक ऑफ़ इंडिया चे पहिले भारतीय गवर्नर कोण होते?
A)सी डी देशमुख🛑🛑🛑
B)सर ओसबोर्न स्मिथ
C)सर जेम्स ब्रेड टेलर
D)के जी आंबेगावकर

🌀विदेशात शाखा उघडणारी पहिली भारतीय बँक कोणती आहे??
A)बँक ऑफ़ बड़ोदा
B)बँक ऑफ़ इंडिया🛑🛑लंदन(1946)
C)यूनियन बँक ऑफ़ इंडिया
D)अलाहाबाद बँक

🌀विदेशात सर्वाधिक शाखा असणारी भारतीय बँक कोणती आहे??
A)बँक ऑफ़ बड़ोदा🛑🛑🛑
B)बँक ऑफ़ इंडिया
C)यूनियन बँक ऑफ़ इंडिया
D)एक्सिस बँक

🌀.......यांनी मुंबई येथे 11 नोव्हेम्बर 1919 रोजी यूनियन बँक ऑफ़ इंडियाची स्थापना केली??
A)शाहु महाराज
B)महात्मा गांधी🛑🛑🛑
C)डॉ.बाबासाहेब आंबेडकर
D)पंडित नेहरू

🌀पंजाब नॅशनल बँकेची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली??
A)1905
B)1895
C)1995
D)1894🛑🛑🛑

🌀इंटरनेट बँकिंग सेवा पूरवणारी पहिली भारतीय बँक कोणती आहे??
A)Axis bank
B)ICICI bank🛑🛑🛑
C)punjab national bank
D)bank of india

🌀भारतात सर्व प्रथम ATM कार्ड सेवा पुरवणारी पहिली बँक कोणती आहे??
A)HDFC
B)Axis
C)HSBC🛑🛑🛑1987
D)IDBI

🌀क्रेडिट कार्ड सुरु करणारी भारतातील पहिली सार्वजनिक बँक कोणती आहे??
A)यूनियन बँक ऑफ़ इंडिया
B)एक्सिस बँक
C)सेंट्रल बँक ऑफ़ इंडिया🛑🛑🛑
D)देना बँक

(❗️❗️NOTE-ANSWER has been posted in red 🛑 sign❗️❗️)

जनगणना 2021

- सन 2021 मध्ये देशात जनगणना केली जाणार आहे. 2021ची जनगणना ही 16 वी जनगणना असून ती स्वातंत्र्यानंतरची 8 वी जनगणना आहे.

- 160 वर्षानंतर जनगणनेच्या इतिहासात पहिल्यांदाच अॅपमधून नागरिकांची माहिती गोळा केली जाणार आहे. जनगणनेसाठी तयार केल्या जाणाऱ्या अ‍ॅपमुळे राष्ट्रीय जननोंदणी अस्तित्वात येणार. अ‍ॅपमुळे व्यक्तीची माहिती तात्काळ अद्ययावत केली जाऊ शकते.

▪️ठळक वैशिष्ट्ये

- जनगणना 2021 मध्ये प्रथमच माहितीचे संकलन मोबाइल अॅप्लिकेशनद्वारे ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. ही प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पाडली जाणार. प्रथम टप्प्यात घरांची गणना करण्यात येणार आणि दुसऱ्या टप्प्यात देशातल्या रहिवाशांची गणना केली जाणार.

-भारताची जनगणना दोन टप्प्यात करण्यात येणार आहे. घर-यादी आणि घर गणना एप्रिल ते सप्टेंबर 2020 या काळात करण्यात येणार आणि लोकसंख्येची गणना 9 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत होणार आहे.

-16 भाषांमध्ये जनगणनेचे काम केले जाणार आहे. सुमारे 33 लक्ष गणक घराघरांमध्ये जाऊन लोकांची नोंदणी करणार.

- व्यय विषयक वित्त समितीने यासाठी 8754.23 कोटी रुपये खर्चाची शिफारस केली आहे.

- जनगणनेसाठी संदर्भ तारीख 1 मार्च 2021 असणार आहे. परंतू, जम्मू व काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश यासारख्या प्रदेशांसाठी ही 1 ऑक्टोबर 2020 असणार.

▪️जनगणनेविषयी

-पहिली जनगणना 1872 साली लॉर्ड मेयो यांनी केली. सन 1881 पासून नियमितपणे जनगणना केली जात आहे.

- भोर समितीच्या सूचनेनुसार जनगणनेची संपूर्ण जबाबदारी केंद्राने घेतली, त्यासाठी ‘जनगणना कायदा-1948’ तयार करण्यात आला. भारताची जनगणना "जनगणना कायदा-1948" आणि “जनगणना नियम-1990’ (संशोधित कायदा-1993) अंतर्गत नियोजित वेळेत योजनाबद्ध रीतीने पूर्ण केली जाते.

- जनगणना आयुक्त गृहमंत्रालयाच्या अंतर्गत जनगणनेचे कामकाज पार पडले जाते. ‘रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया’ (RGI) कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली जनगणनेचे काम चालते.

- भारताचा भौगोलिक विस्तार जगाच्या भौगोलिक आकाराच्या 2.4 टक्के आहे आणि देशाची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या 17.5 टक्के इतकी आहे.

▪️भारताची जनगणना 2011

-एकूण लोकसंख्या : 121 कोटी.  (51.5% पुरुष, 48.5% स्त्रिया)

- ग्रामीण लोकसंख्या : 68.8%

- शहरी लोकसंख्या : 31.2%

- दशवार्षिक वृद्धीदर : 17.72%

- दशवार्षिक वाढ : 18.22 कोटी

- घनता : 382

- लिंग गुणोत्तर : 943

- लिंग गुणोत्तर (0-6 वर्ष) : 918

- साक्षरता : 72.98%

- घरांची गणना 2011

-/घरांची संख्या : 33.08 कोटी (वापर: 77.1% राहण्यासाठी; उर्वरित घरांचा इतर कामांसाठी)

- 24.67 कोटी कुटुंबे (16.78 कोटी ग्रामीण, 7.88 कोटी शहरी)

ग्रामीण विकासाच्या योजना

१)     समुदाय विकास कार्यक्रम (Community Development Programme) (२ ऑक्टो. १९५२):– ग्रामीण भागाच्या सर्वागीन विकासाठी भारत सरकारणे राष्ट्रीय पातळीवर सुरु केलेली पहिलीच महत्वाची योजना म्हणून समुदाय विकास कार्यक्रम या योजनेचा उल्लेख करता येईल.

उद्दिष्टे :– ग्रामीण भाग नेतृत्वाचा विकास करुन त्याद्वारे ग्रामीण भागाचा विकास घडवून आणणे.

२)    एकात्मिक ग्रामीण विकास योजना (Integrated Rural Development Programme):–

१९७८-७९ पासून ही योजना प्रायोगिक स्वरुपात सुरु करण्यात आली.

२ ऑक्टो. १९८० पासून हा कार्यक्रम व्यापक स्वरुपात सुरु करण्यात आला.

या योजनेच्या खर्चाचे प्रमाण केंद्र व राज्य सरकार – ५०: ५०

उद्दिष्ट:- ग्रामीण भागातील दारिद्र्य दुर करणे.

🅾दारिद्र्य रेषेखालील कुटूंब म्हणजे ज्या कुटूंबाचे वार्षीक उत्पन्न २० हजार रु. पेक्षा कमी आहे.

🅾दारिद्र्य रेषेखालील कुटूंबाला दारिद्र्य रेषेच्यावर आणण्यासाठी या योजने अंतर्गत आर्थिक सहाय्य दिले जाते.

🅾अशा कुटूंबामध्ये अल्प भूधारक, भूमिहीन शेतमजूर, ग्रामीण कारागीर यांचा समावेश करण्यात आला.

१ एप्रिल १९९९ पासून हा कार्यक्रम सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत विलीन करण्यात आला.

३)    ग्रामीण युवा स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना / Training for Rural Youth for Self Employment / TRYSEM – योजनेची सुरुवात झाली – १५ ऑगस्ट १९७९.

🅾उद्दिष्टे :- ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्वयंरोजगारातून रोजागार निर्मितीसाठी

🅾योजनेचे स्वरुप:-

१)    ही योजना १८ ते ३५ वयोगटातील ग्रामीण युवकांसाठी होती.

२)    एक ते सहा महिने या अल्प कालावधी प्रशिक्षण दिले जाई.

३)    बँकेमार्फत १० हजार रुपयांपर्यत कर्ज मिळवून देण्यात येत होते.

४)    प्रशिक्षण कालावधीत लाभार्थींना काही विद्यावेतन देण्यात येई.

१ एप्रिल १९९९ पासून ही योजना सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेत विलीन करण्यात आली.

४.सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार / SGSY:-

🅾सुवर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना हा एक नवा व्यापक रोजगार कार्यक्रम आहे.

🅾हा कार्यक्रम १ एप्रिल १९९९ ला सुरु झाला.

🅾खर्चाचे प्रमाण – केंद्र आणि राज्य सरकारद्वारे ७५:२५ प्रमाणात केला जातो.

उद्देश:– गावात राहणा-या गरीब व्यक्तीचे उत्पन्न वाढविणे.

🅾नियोजन आयोगाने दारिद्र्य निर्मुलनाच्या व रोजगार निर्मितीच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी नियोजन आयोगाचे एक सदस्य प्रा. हश्मी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. या समितीने दारिद्र्य निर्मुलन व रोजगार निर्मितीच्या योजनांमध्ये एक सुत्रता आणण्यासाठी या सर्व योजना एकाच स्वयंरोजगार योजनेत विलीन करण्याची शिफारस केली. ही शिफारस स्वीकारुन सरकारने १ एप्रिल १९९९ पासून सुवर्ण जयंती ग्राम स्वयं रोजगार योजना सुरु केली. त्यामध्ये पुढील योजना समाविष्ट करण्यात आल्या.

१.     एकात्मिक ग्रामीण विकास योजना (IRDP)

२.     ग्रामीण युवा स्वयंरोजगार प्रशिक्षण योजना (TRYSEM)

३.     ग्रामीण भागातील महिला व मुलांचा विकास (DWCRA)

४.     ग्रामीण कारागीरांना सुधारीत अवजारे पुरविणे (SITRA)

५.     गंगा कल्याण योजना (GKY)

६.     दशलक्ष विहीरी योजना (MWS)

अंमलबजावणी– ही योजना जिल्हा ग्रामीण विकास एजन्सी द्वारे पंचायत समितीच्या माध्यमातून राबविली जाते.

५)    राष्ट्रीय वृध्दकाळ पेन्शन योजना (NOAPC)

🧩उद्देश:– ज्यांना स्वतःचे नियमित उत्पन्न नाही किंवा ज्यांना कुटुंबाच्या सदस्यांकडून किंवा अन्य कोणत्या मार्गाने आर्थिक सहाय्य मिळत नाही व कोणत्याही आस-या शिवाय जीवन जगत आहेत अशा वृध्दांना आर्थिक मदत करणे.

🧩वैशिष्ट्ये:–

१.     अर्जदाराचे वय ६५ वर्षा पेक्षा अधिक असावे.

२.     प्रत्येक महिन्याला लाभार्थीला २०० रु. पेन्शन दिले जाईल. राज्य सरकार आपल्या साधनातून आणखी काही रक्कम टाकून यात भर घालु शकते.

६५ वर्षावरील ४४ लक्ष निराधार व्यक्तींना सामाजिक सुरक्षितता प्रदान करण्यात आली.

६)    राष्ट्रीय परिवार सहाय्य योजना (NFBS):-

कमावणा-या, कर्त्याचा मृत्यू झाल्यास १० हजार रु. सहाय्य करण्यात येईल.

पात्रता- कर्त्याचे वय १८ ते ६५ वर्ष असावे.

७) अन्नपुर्णा योजना:– १ एप्रिल २००० पासून सुरु झाली.

🅾उद्देश – वृध्द लोकांची गरज पुर्ण करण्यासाठी अन्नाची सुरक्षा देणे.

🅾अन्नपुर्णा योजने खालील लाभार्थीला दर महिन्याला १०किलो अन्नधान्य (गहु, तांदूळ) मोफत दिले जाईल.

पात्रता –१) अर्जदाराचे वय ६५ वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक असले पाहिजे.

२)आश्रयहीन, उत्पन्नाचे अजिबात साधन नसणारे.

३)अर्जदार पुर्वीपासून राष्ट्रीय वृध्दकाळ पेन्शन योजना किंवा राज्य पेन्शन योजनेची पेन्शन घेत नसावा.

८) रोजगार हमी योजना:–

🅾महाराष्ट्राची रोजगार हमी योजना – रोजगार हमी योजना वि. स. पागे यांच्या शिफारशीवरुन प्रायोगिक तत्वावर १९६५ ला तासगाव (सांगली) येथे राबविली