06 April 2022

व्यक्ती विशेष : प्रा. अनीसउज्जमान


👉आपल्याकडे ‘पद्म’ पुरस्कारांचे जे महत्त्व, तेच पद्मा नदीपारच्या बांगलादेशात ‘एकुशे पदक’ या पुरस्काराचे. हे दोन्ही पुरस्कार- त्यातही ‘पद्मभूषण’ आणि ‘एकुशे पदक’ मिळवणाऱ्या व्यक्ती फार कमी, त्यांपैकी एक म्हणजे प्राध्यापक अनीसउज्जमान. बंगाली भाषा, साहित्य आणि शिक्षण यांच्या निरंतर सेवेसाठी त्यांना २०१४ मध्ये ‘पद्मभूषण’ने गौरविण्यात आले होते.

👉बांगलादेशनिर्मितीच्या चळवळीत ते सहभागी होतेच. पण त्यापुढेही, बांगलादेश हा अतिरेकी धर्मवाद्यांचा देश ठरू नये, इथे कला-संस्कृती बहरण्यासाठी आवश्यक असलेला मोकळेपणा रुजावा, यासाठी ते आजन्म प्रयत्नरत होते. त्यांचे निधन १४ मे रोजी ढाका येथे झाले.

👉कोलकात्यात १९३७ मध्ये जन्म, १९४७ मध्ये ढाक्याकडे स्थलांतर, तेथेच माध्यमिक व उच्चशिक्षण अशी पार्श्वभूमी असलेल्या अनीसउज्जमान यांचा वयाच्या १४ व्या वर्षांपासून विद्यार्थी चळवळीशी संबंध आला. ‘पाकिस्तानीकरण नको’ हा मुद्दा तत्कालीन विद्यार्थ्यांनाही आपला वाटत होता. बंगालीसाठी १९५२ मध्ये पहिली भाषा-चळवळ झाली, त्यात तरुण अनीसउज्जमान यांचा सहभाग होता. पुढे १९६९च्या चळवळीचे महत्त्वाचे केंद्र ठरलेल्या चित्तगांवमध्ये सहप्राध्यापक असताना त्यांनी नेतृत्वही केले. निर्णायक उठाव १९७१ मध्ये झाला, तोवर नव्या बांगलादेशाची उभारणी करणाऱ्यांत त्यांची गणना होत होती.

👉 मात्र राजकारणात न पडता ते लेखन आणि अध्यापनातच रमले. १४ पुस्तके आणि समीक्षा व समाजचिंतनपर अनेक निबंध त्यांच्या नावावर आहेत. ढाका व चित्तगांव येथे प्राध्यापकी करताना १९७८ ते १९८३ या काळात त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या संशोधन प्रकल्पांसाठी काम केले. हे प्रकल्प भाषा व समाज यांच्या संबंधांविषयी होते. ‘सॉरबाँ’ म्हणून ओळखले जाणारे पॅरिस विद्यापीठ (१९९४) व अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना विद्यापीठ (१९९५) येथे अभ्यागत प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर २०१० मध्ये ते कोलकाता विद्यापीठातही पाहुणे प्राध्यापक होते.

👉 पण त्यांच्या विद्यापीठीय विश्वनागरिकत्वावर कळस चढला तो, २००९ ते २०११ मध्ये शांतिनिकेतनच्या ‘विश्व भारती’ विद्यापीठातील त्यांच्या वावराने! प्राचीन बंगाली गद्यापासून ते स्त्रीचे साहित्य व समाजातील स्थान, सांस्कृतिक वैविध्य व बहुविधता, अशा विषयांवर त्यांनी अभ्यासपूर्ण पुस्तके लिहिली. बांगलादेश आणि जग यांमधला एक सांस्कृतिक पूल त्यांच्या निधनामुळे निखळला आहे.                                

ENGLISH QUESTION AND ANSWER

                                                                                                                1.He founded a refuge for mountain gorilla
  A) Rubbish
B) Migrant
C) Waste
D) Sanctuary

Correct Answer D
Sanctuary
2. Identify the correct meaning of the underlined words in the contexts.
He skimmed through the newspaper.
  A) Glanced
B) Removed
C) Tossed
D) Moved
Correct Answer A
Glanced

3. What is meaning of the word 'Elegy'.
  A) A handwritten document
B) A song telling a popular story
C) A poem addressed to a person
D) A funeral song
Correct Answer D
A funeral song

4.Today is a special day on the ________.
  A) Calendar
B) Calender
C) Calander
D)Calendor
Correct Answer A
Calendar
 
5.The barber has cut my hair very short.
(Correct progressive future tense form)
  A) The barberis cutting my hair very short.
B) The barber will have cut my hair very short
C) The barber will be cutting my hair very short
D) The barber had cut my hair very short.
Correct Answer C
The barber will be cutting my hair very short

6.Write the correct form of verb in the given sentence:
"Each of these rooms_____good enough for me."
  A) is
B) are
C) have
D) were
Correct Answer A
is

7. ____means strength,energy, power, force and spirit.
  A) Victory
B) Calamity
C) Vigour
D) Apology
Correct Answer C
Vigour

8. A stoic is a person who__________ ?
  A) Silently suffers and endures as without any complaints
B) Buys and sells the stock and share
C) is in a charge of the goods of a private company
D) does not endure anything plainful and sorrow
Correct Answer A
Silently suffers and endures as without any complaints
 
9. Sunita is on cloud nine after winning the final T20 match.
(underline phrase means)
  A) to be very happy
B)to be bery angry
C) to be fond of somebody
D) All of the above
Correct Answer A
to be very happy

10. "To bite the bullet" means
  A) To try very soft
B) To state your opinion
C) To accept something unpleasant without complaining
D) Biting the air
Correct Answer C
To accept something unpleasant without complaining                      

05 April 2022

अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी डॉ. अब्दुल कलाम अमृत योजना

प्रस्तावना

योजनेची वैशिष्ट्ये

योजनेतील घटक

आहाराचे स्वरूप

अंमलबजावणी यंत्रणा

प्रस्तावना

अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के आहे.

स्त्रियांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्याने याचा परिणाम बाळाच्या वजनावर होतो. शिवाय जन्मानंतर पहिले तीन महिने बालक पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्याने या कालावधीत मातेचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर शासनातर्फे अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ चौरस आहार उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल.

अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थींना 1 डिसेंबरपासून चौरस आहार देण्यात येणार आहे.

राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यात 85 एकात्मिक बाल विकासप्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे.

एकूण 16 हजार 30 अंगणवाडी आणि 2013 मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळणार आहे.

योजनेतील घटक

अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेनुसार एकूण सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळचा चौरस आहार मिळणार आहे. उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण या योजनेमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. अनुसूचित क्षेत्रामधील सुमारे 1 लाख 89 हजार एवढ्या गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना या योजनेचा दरवर्षी लाभ मिळणार आहे.  

मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना असे नाव देण्यात आले आहे. ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांतील 85एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, किंमत आणि पोषण मुल्ये ठरविण्यात आली असून चौरस आहाराचा खर्च सरासरी प्रति लाभार्थी 22 रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे. या योजनांसाठी केंद्र शासनाच्या टीएचआर योजनेचा निधी (केंद्र व राज्य हिस्सा) वापरण्यात येईल. 

अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्यक होते. अनुसूचित क्षेत्रामध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण 33.1 टक्के एवढे आहे. आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात. तसेचबालकाच्या जन्मानंतर पहिले तीन महिने मूल पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे.

आहाराचे स्वरूप

या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दुध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील.

अंमलबजावणी यंत्रणा

ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना नियमित मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त या योजनेचा आहार तयार करण्यासाठी प्रतिमाह प्रत्येकी दोनशे पंन्नास रुपये देण्यात येतील.

ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून योजनेंतर्गत कामाचा व फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सनियंत्रण समिती, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येईल.

तसेच अंगणवाडी पातळीवर महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य (अनुसूचित जमाती) यांच्या अध्यक्षतेखाली आहार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या योजनेचे वेळोवळी त्रयस्थ संस्थेमार्फत

भारतीय क्रांतिकारी संघटना

🛡 *व्यायाम मंडळ*🛡
– चाफेकर बंधू  ( १८९६ )

🛡 *अनुशीलन समिती*🛡
– ज्ञानेंद्रनाथ बोस ( १९०१ ) मिदनापुर

🛡 *अभिनव भारत*🛡( पुणे )
– वि .दा .सावरकर  ( १९०२ )

🛡 *इंडिया हाऊस*🛡
– श्यामजी कृष्णा वर्मा ( १९०४ )

🛡 *स्वदेश बांधव समिती*🛡
– अश्विनीकुमार दत्त ( १९०५ )

🛡 *अभिनव भारत*🛡( लंडन)
– वि. दा. सावरकर ( १९०६ )

🛡 *इंडियन इंडिपेंडस लिग*🛡
– तारकानाथ दत्त ,अमेरिका, १९०७

🛡 *अनुशीलन समिती*🛡
– विरेंद्रकुमार घोष - भूपेंद्र दत्त
                  १९०७ ( ढाका )

🛡 *भारत माता सोसायटी*🛡
– अजितसिंह आंबाप्रसाद (१९०७ )

🛡 *गदर पार्टी*🛡
– लाला हरदयाळ ( १९१३ )

🛡 *इंडियन इंडिपेंडस लिग*🛡
– लाला हरदयाळ - विरेंद्र चट्टोपाध्याय ( १९१४ ) ( बर्लिन )

🛡 *इंडियन इंडिपेंडस लिग*🛡
– राज महेंद्र प्रताप ( १९१५ ) काबूल

🛡 *हिन्दुस्थान रिपब्लिकन असोशिएशन*🛡
– सचिंद्रनाथ संन्याल ( १९२४ )

🛡 *नौजवान सभा*🛡
– भगतसिंग ( १९२६ ) (लाहोर)

🛡 *हिन्दुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोशियशन*🛡
– चंद्रशेखर आझाद (१९२८)

🛡 *इंडियन इंडिपेंडन्स लिग*🛡( *टोकियो* )
– रासबिहारी बोस (१९४२)

🛡 *आझाद हिंद सेना*🛡
– रासबिहारी बोस (१९४२) टोकियो

गांधी युगातील महत्वाच्या घटना

♻गांधी युगाचा उदय :

सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला.

आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.

जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.

1. भारतातील चळवळी :
भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.

♻चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -

चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्या गरीब शेतकर्यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.

✍साराबंधी चळवळ (सन 1918) -

1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.

गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.

शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
हा गांधीजीचा दूसरा विजय होता.

✍रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -

भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.

या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.

या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.

13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.

या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.

आझाद हिन्द सेना

विषय -इतिहास
आझाद हिन्द सेना
दै.दिव्यमराठीच्या 'रसिक' पुरवणीतील 'गाळीव इतिहास' या पाक्षीक सदरात प्रकाशित लेख..........

खरीखुरी सेना

ब्रिटिश मलायावर जोरदार हल्ला करून विजय प्राप्त केल्यावर जपानने ब्रिटिश आर्मीच्या सुमारे १ लाख ३० हजार सैनिकांना युद्धकैदी म्हणून पकडले. त्यापैकी ७० हजार युद्धकैदी भारतीय वंशाचे होते. या युद्धकैद्यांना एकत्र करून त्यांची स्वतंत्र सेना कॅप्टन मोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली जपान आर्मीच्या मदतीने एप्रिल १९४२मध्ये स्थापन करण्यात आली. ही स्वतंत्र सेना म्हणजेच आझाद हिंद सेनेची प्राथमिक अवस्था होती. मोहन सिंग यांच्या मतानुसार, जपानचे कमीत कमी नियंत्रण या सेनेवर असावे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जेव्हा आदेश देईल, तेव्हाच भारतावर स्वारी करावी, असे होते. परंतु जपानला हे मान्य नसल्यामुळे त्यांनी मोहन सिंग यांना या सेनेतून हटवून त्यांना जपानी मिलिटरी पोलिसांच्या ताब्यात दिले. यामुळे सेनेची अवस्था अतिशय विस्कळीत झाली. अशा बिकट अवस्थेत या सेनेला सुभाषचंद्र बोस यांचे नेतृत्व मिळाले!

सुभाषबाबूंनी ऑगस्ट १९४२ बर्लिनमध्ये युद्धकैदी म्हणून पकडल्या गेलेल्या तीन हजार सैनिकांची ‘फ्री इंडिया लिजन’ स्थापना केली. त्यानंतर ते जर्मन पाणबुडीच्या साहाय्याने ११ मे १९४३ला टोकियो येथे पोहोचले. जपानी पंतप्रधान टोजो यांना भेटून त्यांनी ४ जुलै १९४३ रोजी सिंगापूरमध्ये, मोहन सिंगच्या आझाद हिंद सेनेतील, त्याचप्रमाणे रासबिहारी बोस यांनी स्थापन केलेल्या ‘इंडियन इंडिपेंडन्स लीग'मधील सैनिकांना एकत्रित करून, ४३ हजार सैनिकांच्या आझाद हिंद सेनेची पुन:स्थापना केली.

आझाद हिंद सैनिकांचा उद्देश भारताला स्वातंत्र्य मिळवून देणे हा असला तरी युद्धात तत्कालीन परिस्थितीनुसार सैन्य हालचाली कराव्या लागतात. या अपरिहार्यतेतून मणिपूर, म्यानमार, इम्फाल, अंदमान भागातील यशस्वी चढाईनंतर आझाद हिंद सेनेतील अनेक सैनिकांची १९४४मध्ये प्रचंड फरफट झाली. १९४५च्या उन्हा‌ळ्याच्या सुरुवातीस शिखर राष्ट्रांच्या शरणागतीची केवळ औपचारिक घोषणा शिल्लक राहिली होती. अपुरी साधने, उपासमार या समस्यांना तोंड देणारे हे सैनिक १९४५च्या मे, जून महिन्यात थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर परिसरात युद्धकैदी म्हणून ब्रिटिशांच्या हाती सापडले. हिरोशिमा-नागासाकी या जपानी शहरांवर अमेरिकेने अणुबॉम्बचा प्रयोग केल्यावर जपानने तत्काळ शरणागती पत्करली. या वेळी फार्मोसाच्या तैपेई बेटावरून लष्करी विमानाने रंगूनला जाण्याच्या तयारीत असताना विमानाचा स्फोट होऊन सुभाषबाबूंचा १८ ऑगस्ट १९४५ रोजी निप्पॉन आर्मी हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, मात्र याची अधिकृत घोषणा अद्याप केली गेली नव्हती.

सुभाषबाबूंच्या अचानक नाहीसे होण्यामुळे आझाद हिंद सैनिक अस्वस्थ झाले. रंगूनमध्ये या सैनिकांनी शरणागती स्वीकारली. सिंगापूर आणि रंगून या केंद्रावरील माहितीनुसार, युद्धादरम्यान १६ हजार ३०० सैनिकांपैकी १२ हजार सैनिक पकडले गेले. ब्रिटिश आर्मी गुप्तहेर यंत्रणांकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. ज्यांची थेट निष्ठा आझाद हिंद सेनेशी होती, असे कैदी ‘ब्लॅक'; ज्यांना परिस्थितीमुळे सेनेसोबत राहावे लागले, असे कैदी ‘ग्रे'; आणि ज्यांना सेनेशी कसलीच आत्मीयता नव्हती, मात्र बळजबरीने त्यांना सेनेत सामील केले गेले ते ‘व्हाईट', अशी वर्गवारी केली गेली. यापैकी ‘व्हाईट' वर्गवारीतील सहा हजार कैद्यांना तत्काळ सोडून दिले गेले. ‘ग्रे' वर्गवारीतील ११ हजार सैनिकांना कॅशरिंग पद्धतीने अपमानित करून पगार, भत्ता न देता बरखास्त करून सोडून दिले. ‘ब्लॅक' वर्गवारीतील सैनिकांचे कोर्ट मार्शल केले जाईल, असे जाहीर झाले. त्यानुसार शहनवाज खान, प्रेम सहगल, गुरुबक्षसिंग धिल्लन, अब्दुल रशीद, संघारा सिंग, फतेह खान, मल्लिक मुनव्वर या प्रमुख सैनिकासह अनेकांवर इंडियन आर्मी अॅक्ट १९११च्या कलम ४१ अंतर्गत राजाविरुद्ध युद्ध पुकारणे, या प्रमुख आरोपांसह जीवहानी, वित्तहानी इत्यादी गुन्ह्यासाठी खटले दाखल केले गेले.

ब्रिटिशांसाठी आझाद हिंद सेनाधिकारी युद्धकैदी असले, तरी भारतीयांसाठी ते स्वातंत्र्ययोद्धे होते. या भूमिकेतून भारतीय जनतेमध्ये सरकार विरोधात प्रचंड क्षोभ निर्माण झाला. अनेक ठिकाणी सभा, निदर्शने, मोर्चे सुरू झाले. विशेष म्हणजे, पहिल्या खटल्यातील तीन आरोपी  प्रेम सहगल, शहनवाज खान गुरुबक्ष सिंग धिल्लन, हे हिंदू-मुस्लिम-शीख असल्यामुळे हिंदू-मुस्लिम-शीख यांची एकत्रित निदर्शने होऊन एक राष्ट्रीय एकतेचे चित्र पाहायला मिळाले. काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी या सैनिकांसाठी बचाव समिती स्थापन केली. काँग्रेसतर्फे भुलाभाई देसाई, तेज बहद्दूर सप्रू, जवाहरलाल नेहरू, के. एन. काटजू, असफ अली यांनी या खटल्यात बचाव पक्षाचे वकील म्हणून कामकाज पहिले. या ट्रायल्स नोव्हेंबर १९४५ ते मे १९४६ दरम्यान दिल्लीच्या लाल किल्ल्यात झाल्या, म्हणून त्या ‘रेड फोर्ट ट्रायल्स’ म्हणून ओळखल्या जातात.

‘र

ेड फोर्ट ट्रायल्स’ चालू असताना देशभर अनेक घडामोडी घडत होत्या. आझाद हिंद सेनेला समर्थन म्हणून १२ नोव्हेंबर १९४५ हा दिवस देशभर आझाद हिंद सेना दिवस म्हणून घोषित करण्यात आला. कलकत्त्यात जवाहरलाल नेहरू, सरत बोस आणि सरदार पटेल यांची मोठी सभा आयोजित केली गेली, ज्यामधून जनतेने उत्स्फूर्तपणे आझाद हिंद सैनिकांच्या बचावासाठी निधी गोळा केला. सुनावणी दरम्यान मुंबईत नौदलात बंड झाले. ब्रिटिश आर्मीमध्ये काही ठिकाणी सैनिकांनी ब्रिटिश अधिकाऱ्यांचे आदेश मानण्यास नकार दिला. स्वातंत्र्य दृष्टिक्षेपात आल्याची जाणीव झाल्यामुळे ब्रिटिश आर्मीतील सैनिकांचा आत्मविश्वास वाढल्याचाही हा परिणाम होता. रेड फोर्ट ट्रायल्समधील सर्वच आरोपींना शिक्षा झाली, मात्र तत्कालीन परिस्थिती पाहून या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. लष्कर प्रमुख क्लाऊड अकिनलेक यांच्या विशेष अधिकारांतर्गत त्यांना सोडून देण्यात आले.

भारतीय स्वातंत्र्याचा करार करताना, भारत हे दुसऱ्या महायुद्धातील विजयी राष्ट्र असून सध्याचे भारत सरकार पूर्वीच्या ब्रिटिश सरकारचे वारसदार असल्यामुळे पूर्वीचे तेल-शस्त्रास्त्र पुरवठ्याचे करार, दूतावास, संस्थानावरील नियंत्रण हे विजयी राष्ट्राचे सर्व फायदे भारताला मिळायला हवे, अशी भूमिका भारताने घेतली. या कारणामुळे भारत विजयी राष्ट्र असल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पराभूत असणाऱ्या आझाद हिंद सैनिकांना भारतीय सैन्य दलात पुन:स्थापित (reinstate) केले जाणार नाही, असा करार करावा लागला होता. हा करार आणि आझाद हिंद सैनिकांचे हित यात कायदेशीर अडचणी येऊ नयेत, म्हणून ज्यांना शिक्षा झाली आहे, अशांनी १ मार्च १९४२ या तारखेचा राजीनामा भारतीय सैन्याकडे द्यावा आणि हा राजीनामा सैन्यदल आजच्या तारखेत मंजूर करेल, असे ठरले. याचा परिणाम हे सैनिक  सैन्यातून डिसमीस अथवा ‘कन्व्हिक्ट' न मानले जाता, ते ‘डिस्चार्जड' मानण्यात येतील आणि १९४२ सालापासून त्यांचे आझाद हिंद सेनेतील कार्य सैन्यातील शिस्तीचा भंग करणारे ठरणार नाही, असा मार्ग काढला गेला. संरक्षणमंत्री बलदेव सिंग यांच्याशी चर्चा करून सरदार पटेल यांनी २९ फेब्रुवारी १९४८ रोजी सरकारचे अधिकृत धोरण म्हणून आझाद हिंद सैनिकांना भारतीय सैन्य दलात पुन:स्थापित केले जाणार नाही; मात्र त्यांना पोलिस, गृहरक्षक दल, प्रशिक्षण केंद्रे, सीमावर्ती पोलिस अशा विविध सेवांमध्ये समाविष्ट केले जाईल, हे जाहीर केले. या सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी, जखमी सैनिकांसाठी, भत्ते व पेन्शनसाठी मिळून पुनर्वसनाचा सुमारे ३० लाख एवढा निधी सरकारने उभा केला असल्याची माहिती त्यांनी जाहीर केली.

आझाद हिंद सैनिकांना भारतीय सैन्य दलात पुन:स्थापित केले जाणार नाही, या धोरणावर अनेकांनी कडाडून टीका केली. यास उत्तर देताना २९ मार्च १९४८ रोजी संविधान सभेत नेहरू म्हणाले, सैन्य दलात पुन:स्थापित केले जाणार नाही, याचा अर्थ असा नव्हे की, त्यांना नव्याने सैन्य दलात भरती होता येणार नाही. मात्र ही भरती पूर्णपणे गुणवत्तेवर आधारित असेल. पुन:स्थापनेवर प्रतिबंध असेल, मात्र नव्याने सामील होण्यास (joining afresh) अजिबात बंधन असणार नाही. सरकारने पुनर्वसन कार्यक्रमात अनेक आझाद हिंद सैनिकांची अनेक महत्त्वपूर्ण पदांवर नियुक्तीही केली. अबीद हसन इजिप्तमध्ये, नंबियार यांची जर्मनीत, महेबूब हसन यांची कॅनडात, तर राघवन यांची स्वित्झर्लंडमध्ये राजदूत म्हणून नियुक्ती केली गेली, तर मोहन सिंग यांना काँग्रेसतर्फे राज्यसभेवर खासदार म्हणून घेण्यात आले. शहनवाज खान रेल्वे राज्यमंत्री झाले, लक्ष्मी सहगल यांनी महिला व बाल कल्याण खाते सांभाळले. गुरुबक्षसिंग धिल्लन, प्रेम सहगल यांना पद्मश्री, पद्मविभूषण या नागरी सन्मानाने गौरविण्यात आले. टोकियो केडरमधील आर. एस. बेनेगल हे नव्याने वायुसेनेत दाखल झाले. त्यांनी १९६५ व १९७१च्या युद्धात भाग घेऊन ‘महावीर चक्र'ही प्राप्त केले. म्हणजेच, देश स्वतंत्र झाल्यानंतर सुभाषबाबू आणि त्यांच्या एकनिष्ठ सैनिकांचा त्या वेळच्या नेहरू सरकारने यथोचित मानही राखला आणि मुख्य प्रवाहात मनापासून स्वागतही केले...

‘जयहिंद’चे उद‌्गाते
आझाद हिंद सैनिकांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि स्वातंत्र्यानंतर देशाच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. फाळणी दरम्यान जातीय दंगे थांबविणे किंवा गांधी हत्येनंतर उसळलेला हिंसाचार रोखणे, हैदराबादेत रझाकारांच्या विरोधात आघाडी निर्माण करणे, अशी अनेक कामे आझाद हिंद सैनिकांनी पार पडली आहेत.

आज ‘जय हिंद’ या घोषणेने अभिमानाने ऊर भरून येतो, मात्र या घोषणेचे उद‌्गाते आझाद हिंद सेनेचे सैनिक आहेत!