09 April 2022

पंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती

पंचायतराज समिती विषयी संपूर्ण माहिती

ग्रामप्रशासन

भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक/पितामह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते.
लॉर्ड रिपनने भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा 12 मे 1882 रोजी केला.
स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे पहिले राज्य-राजस्थान स्वीकार –2 ऑक्टोंबर 1959
स्थानिक स्वराज्य संस्था स्विकारणारे दुसरे राज्य – आंध्रप्रदेश स्विकार –1 नोव्हेंबर 1959
पंचायतराज स्विकारणारे नववे राज्य – महाराष्ट्र
स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायतराज हे नाम दिले.
बलवंतराय मेहता समिती

भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप व कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम बलवंतराय मेहता समिती नियुक्त करण्यात आली.
या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने 16 जानेवारी 1957 मध्ये केली. तर समितीने आपला अहवाल शासनास 1958 मध्ये सादर केला.
या समितीमधील इतर सदस्य – ठाकुर फुलसिंग, डी.पी. सिंग, बी.जी. राव.
यासमितीने केलेल्या शिफारशी

लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे.
पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी. म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत, तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी.
ज्या गावाची लोकसंख्या 500 असेल तेथे ग्रामपंचायत स्थापन करण्यात यावी.

ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी.

ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात. तसेच अनुसूचीत जाती-जमतीच्या लोकांना प्रत्येकी एक जागा राखीव असावी.
जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्यत्व असावे.
जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा.
पंचायतराजच्या तिन्ही संस्थामध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावेत (सर्वात जास्त महत्व पंचायत समितीला असावे.)
अशोक महेता समिती नियुक्ती – 1977. शासनास अहवाल सादर – 1978.
महत्वाच्या शिफारशी

पंचायत संस्थांच्या माध्यमातून लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी जनतेच्या सहभागास महत्व दिले गेले पाहिजे.
पंचायत संस्थाच्या निवडणुका वेळेवर घेणे बंधनकारक करावे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षाची निवड प्रत्यक्ष मतदारामधून करण्यात यावी.
पंचायत पद्धती व्दिस्तरीय असावी.
73 वी घटना दुरूस्ती

भारतातील पंचायतराज संस्थांना 73 व्या घटनादुरुस्तीमुळे घटनात्मक दर्जा (संविधानिक दर्जा) प्राप्त झाला.
ही घटनादुरूस्ती 24 एप्रिल 1993 रोजी करण्यात आली.
73 व्या घटनादुरूस्तीनुसार करण्यात आलेल्या महत्वाच्या तरतुदी
प्रत्येक गावामध्ये सर्व प्रौढ स्त्री-पुरुषांचा समावेश असणारी ग्रामसभा व ग्रामपंचायत असणे बंधनकारक करण्यात आले.
भारतातील सर्व राज्यामध्ये त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था स्थापन करण्यात यावी.
पंचायत व्यवस्थेच्या तिन्ही स्तरामध्ये महिलांसाठी 1/3 जागा राखीव ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले.
देशातील प्रत्येक राज्यात पंचायतराज संस्थांचा कार्यकाल 5 वर्ष करण्यात आला.
पंचयातराजच्या तिन्ही स्तरामध्ये महिला आणि अनुसूचीत जाती-जमातीसाठी पदाधिकार्‍यांची पदे राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली.
पंचायतराज संस्थासाठी प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र निवडणूक यंत्रणा स्थापना करण्याचे बंधन घालण्यात आले.
केंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक राज्याने राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे आवश्यक करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने पंचायतराज संस्थांसंबंधी नियुक्त केलेल्या समित्या वसंतराव नाईक समिती

नियुक्ती – 1960
शासनाला अहवाल सादर – 15 मार्च 1961
शासनाने अहवाल स्वीकारला – 1 एप्रिल 1961
शिफारशीची अंमलबजावणी – 1 मे 1962
महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था नाईक समितीच्या शिफारशीवर आधारित आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम – 1961 हा कायदा नाईक समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला.
महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी अशी शिफारस नाईक समितीने केली.
ल.ना. र्बोगिरवार समिती

नियुक्ती – एप्रिल 1970
शासनाला अहवाल सादर – सप्टेंबर 1971
प्रत्येक वर्षी ग्रामसभेच्या किमान दोन बैठका व्हाव्यात अशी शिफारस या समितीने केली.
बाबूराव काळे समिती

नियुक्ती – ऑक्टो 1980
शासनास अहवाल सादर – 1981
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पदाधिकार्‍यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी शिफारस या समितीने केली.
पी.बी. पाटील समिती

नियुक्ती – जून 1984
शासनास अहवाल सादर – 1986
शियफरशी

ग्रामपंचायतीची लोकसंख्येनुसार पुनर्रचना करण्यात यावी.
जिल्हा परिषदांवर खासदार व आमदार यांना सदस्यत्व असू नये.
आर्थिक विकेंद्रीकरण ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात यावा.
ग्रामपंचायतीच्या वार्षिक अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी.
सदस्यांची निवड प्रत्यक्ष मतदारामधून करण्यात यावी.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक खर्च मर्यादा

स्थानिक स्वराज्य संस्थाचे नाव  –   खर्च रुपये
महानगरपालिका  –  1,00,000 रु.
जिल्हा परिषद    – 60,000 रु.
नगरपरिषद     – 45,000 रु.
पंचयात समिती   – 40,000 रु.
ग्रामपंचायत   -7,500 रु.
ग्रामसभा

ग्रामसभेत संबंधित खेड्यातील सर्व प्रौढ (18 वर्षे वयावरील) स्त्री-पुरुष नागरिकांचा/मतदारांचा समावेश होतो.
ग्रामसभेच्या वर्षातून किमान चार बैठका व्हाव्यात अशी सूचना केंद्रसरकारने अलिकडेच सर्व राज्यांना केली आहे. त्या बैठका पुढील वेळी व्हाव्यात.
–26 जानेवारी (प्रजासत्ताक दिन), 15 ऑगस्ट (स्वातंत्र्यदिन), 1 मे (महाराष्ट्र दिन), 2 ऑक्टोंबर (गांधी जयंती) आणि दोन बैठका स्त्रियांच्या व्हाव्यात.
ग्रामसभा बोलविण्यासाठी 7 दिवस अगोदर नोटिस द्यावी लागते.
ग्रामसभा बोलविण्याचा अधिकार सरपंचला असतो. सरपंच गैरहजर असल्यास उपसरपंच बैठक बोलविलो.
ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषवितो. सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंच अध्यक्षस्थान भूषवितो.
ग्रामसभेच्या बैठका वेळेवर बोलविल्या जातात किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यावर सोपविली आहे.
सरपंच व उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान वरील पंच भूषवितो.
ग्रामसभेची गणसंख्या – एकुण मतदारच्या 15% किंवा 100 यापैकी जी कमी असेल ती संख्या.
ग्रामसभा ग्रामपंचायतीच्या पंचाची निवड करते.
ग्रामपंचायत

भारतीय घटनेच्या कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीची तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात ‘मुंबई ग्रामपंचयात अधिनियम 1958’ उपकलम 5 नुसार ग्रामपंचायतीची निर्मिती झाली आहे.
स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी संबंधीत गावची लोकसंख्या कमीतकमी 600 असली पाहिजे.
जर एखाद्या गावाची लोकसंख्या 600 पेक्षा कमी असेल तर दोन किंवा तीन गावे मिळून गट ग्रामपंचायत स्थापन करण्यात येते.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांना पंच म्हणतात.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते.
महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्यसंख्या 7 ते 17 अशी आहे.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या ठरविण्याचा अधिकार (सदस्यसंख्या निश्चित करण्याचा अधिकार) जिल्हाधिकार्‍यास असतो.
महराष्ट्रातील ग्रामपंचायतीच्या पंचाची संख्या लोकसंख्येवरून ठरविण्यात येते ती खालीलप्रमाणे

लोकसंख्या  –  पंचाची संख्या
600 ते 1500   –  7
1501 ते 3000   – 9
3001 ते 4500  – 11
4501 ते 6000  – 13
6001 ते 7500  – 15
7501 ते पेक्षा जास्त  -17

ग्रामपंचायतीमध्ये महिलासाठी 50% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयासाठी 27% जागा राखीव असतात.
ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचीत जाती व अनुसूचीत जमातीच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍याला असतो.
संबंधीत गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतीचा सहयोगी सभासद असतो.
महाराष्ट्रात 1 जून 1959 पासून ‘मुंबई ग्रामपंचायत अधिनियम’ लागू करण्यात आला.
ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा सरपंच असतो.
सरपंचाची निवड निवडून आलेल्या सदस्यामधून केली जाते तसेच त्यातूनच एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते.
सरपंच व उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवितो व तोच त्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवितो.
ग्रामपंचायतीची निवडणूक लढविण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे पूर्ण झालेले असावे लागते.
ग्रामपंचायतीची निवडणूक दर 5 वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीच्या कालावधी 5 वर्षाचा असतो.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उभे राहण्यास अनामत रक्कम – 500 रु. राखीव जागेसाठी – 100 रु.
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्यशासन ग्रामपंचायतीचा कार्यकाल 6 महीने वाढवू शकते.
ग्रामपंचायतीच्या बैठका महिन्यापासून एक म्हणजेच वर्षातून 12 बोलवाव्या लागतात.
ग्रामपंचायतीच्या पंचास व उपसरपंचास सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो तर सरपंच पंचायत समितीच्या सभापतीकडे राजीनामा देतो.
सरपंचावर अविश्वासाचा ठराव आणण्यासाठी एकूण सदस्याच्या 1/3 सदस्यांनी लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्यांच्या 2/3 सदस्यांनी तो ठराव पास करावा लागतो.
महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी 3/4 बहुमताची आवश्यकता असते.
एकदा अविश्वास ठराव फेटाळला गेल्यास दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी 1 वर्षे आणता येत नाही.
सरपंच किंवा उपसरपंच यांच्या निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास 15 दिवसाच्या आत सदरहू विवाद जिल्हाधिकार्‍याकडे सोपविता येतो. तसेच जिल्हाधिकार्‍याने दिलेल्या निर्णयावर निर्णय दिलेल्या तारखेपासून 15 दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपिल करता येते.
सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वासाच्या ठरावाची बैठक तहसीलदार बोलावितो व तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो.
सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो.
ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनास आहे.
जर एखाद्या ग्रामपंचायतीमधील एकूण सदस्य संख्येच्या निम्म्यापेक्षा अधिक पदे रिक्त असतील तर राज्यशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते.
सरपंच, उपसरपंच व पंचास अकार्यक्षता, गैरवर्तन, कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीस आहे.
नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो.
ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा कमी आहे. अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचे उत्पन्न 25,000 रु. पेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीची हिशोब तपासणी लेखापाल, स्थानिक लोकनिधी मार्फत होते.
ज्या खेड्यातील अनुसूचीत जाती-जमातीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 60% पेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंच हा अनुसूचित जाती जमातीमधील असतो.
ग्रामपंचायतीच्या सरपंचांचा दरमहा मानधन लोकसंख्येनुसार 750, 1125 व 1500 रु. मिळते, या मानधनाच्या 75% रक्कम राज्यशासन देते.
ग्रामपंचायतीच्या सदस्यांना दरमहा 200 रु. बैठक भत्ता मिळतो.
ग्रामपंचयातीमध्ये एकूण 79 विषय आहेत.
सरपंच किंवा उपसरपंचाविरुद्ध अविश्वासाची नोटिस तहसीलदारकडे द्यावी लागते.
जिल्हाधिकार्‍यास ग्रामपंचायतीचा ठराव रोखण्याचा अधिकार असतो.
सरपंच व उपसरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्यास गामसेवक हा हंगामी सरपंच असतो.
ग्रामपंचायतीची रचना व कार्ये 1963 च्या कायद्याने नियंत्रित होतात.
न्यायपंचायतीचा कार्यकाल सर्वसाधारणपणे 3 ते 5 वर्षे एवढा असतो.
सरपंच व उपसरपंच यांना न्यायपंचायतीचे सभासद होता येत नाही.
न्यायपंचायत 100 रु. किंमतीचे दिवाणी दावे चालविते.
महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत – अकलूज
महाराष्ट्रीतील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत – नवघर
महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सातारा
महाराष्ट्रात सर्वात कमी ग्रामपंचायती असणारा जिल्हा – सिंधुदुर्ग
ग्रामपंचायतीचे वॉर्ड निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकार्‍यास असतो.  

1935 चा कायदा

1935 च्या कायद्याने संघराज्याची निर्मिती केली.
1935 च्या कायद्याने प्रतांत 1919 च्या कायद्याने सुरू केलेली व्दिदल राज्य पद्धती नष्ट केली व प्रांतातील सर्व खाती लोकप्रतिंनिधीच्या हाती सोपवली.
1935 च्या कायद्याने केंद्रात व्दिदल शासन पद्धती सुरू केली.
संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने केली.
या कायद्याने जवळजवळ 14 टक्के लोकांना मताधिकार मिळाला.
1935 च्या कायद्याने केंद्रीय, राज्य व संयुक्त अशा तीन सूच्या निर्माण केल्या.
भारतमंत्र्यांचे ‘इंडिया कौन्सिल’ रद्द करण्यात आले व सल्लागार मंडळाची स्थापना करण्यात आली.
मुस्लिम, शीख, कामगार, ख्रिश्चन या सर्वांना या कायद्याने स्वतंत्र मतदार संघ देण्यात आले.
1935 च्या कायद्याव्दारे ब्रम्हदेश हा भारतापासून वेगळा करण्यात आला.
1935 चा कायदा म्हणजे गुलामगिरीची सनदच होती, ते एक अनेक ब्रेक्स असलेले व इंजिन नसलेले यंत्रच होते- पं.जवाहरलाल नेहरू.
1935 चा कायदा म्हणजे – संपूर्ण सडलेला मूलत: निष्कृष्ट, अनई संपूर्णपणे अस्विकाहार्य बॅ.जिना.

.

दुसर्‍या महायुध्दातील स्वातंत्र्य चळवळ

दुसर्‍या महायुध्दातील स्वातंत्र्य चळवळ

ऑगस्ट घोषणा (1940) :-

दुसर्‍या महायुध्दास भारताचा पाठिंबा व सहकार्यासाठी र्लॉड लिनलिधगो याने 8 ऑगस्ट 1940 रोजी घोषण केली. त्यानुसार
(1) भारताला वसाहतीचे स्वराज्य देणे,

(2) कार्यकारी मंडळात हिंदी सभासदांची वाढ करणे

(3) राज्यघटनेसाठी घटना परिषद स्थापन करणे

(4) अल्पसंख्याकांच्या हिताचे संरक्षण करणे.

वैयक्तिक सत्साग्रह (1940) :-

कॉग्रसने 1940 च्या मुंबई अधिवेशानात ऑगस्ट प्रस्ताव फेटाळला. कारण, त्यामध्ये भेदनीतीचा उपयोग आणि स्वातंत्र्याची मागणी नाकारली होती.
गांधीजींनी ऑक्टो 1940 मध्ये वैयक्तिक सत्याग्रह सुरु करुन युध्दविरोधी प्रचार केला पाहिजे सत्याग्रही म्हणून विनोबा भावे यांची निवड केली.
दुसरे पंडित जवाहरलाल नेहरू यांची निवड केली. डिसेंबर 1941 पर्यत 22 हजार सत्याग्रहींनी कारावास स्वीकारला.
क्रिप्स् योजना (2 मार्च 1942) :-

1939 ला दुसरे महायूध्द सुरु झाले. प्रारंभीच्या काळात जर्मनी जपान सैन्याने विजय प्राप्त केले होते.
चीनचे चॅग काई शेक यांनी भारतीयांना इंग्रज लवकरच स्वातंत्र्य देतील, त्यासाठी आपण प्रयत्न करू असा सल्ला दिला होता.
युध्दात भारताचे सहकार्य मिळविण्यासाठी रुझवेल्टचे प्रयत्न आणि राष्ट्रीय सभेची आक्रमक भूमिका यामुळे भारतीयांशी चर्चा करण्यासाठी चर्चिलने क्रिप्स मिशन पाठविले.
सर स्टॅफर्ड, क्रिप्स र्लॉड ऑफ ब्रिव्हर्व, र्लॉड ऑफ प्रिव्हीपर्स इ. 1942 रोजी भारतात आले. त्यांनी जी योजना तयार केली तिला क्रिप्स योजना म्हणतात.
तरतुदी-
(1) वसाहतीच्या स्वराज्याचा दर्जा असलेले संघराज्य.

(2) युध्दसमाप्तींनतर राज्यघटना बनविण्यासाठी घटना समिती स्थापन केली जाईल.

(3) कॉग्रेस, मुस्लीम लीग, हिंदू महासभा या सर्वानी ही योजना फेटाळली, बुडत्या बॅकेवरील पुढच्या तारखेचा धनादेश असे गांधीजींनी वर्णन केले.

1942 ची चळवळ :-

क्रिप्स मिशन परत गेल्यानंतर भारतात इंग्रजांच्या विरोधी नाराजी पसरली. 8 ऑगस्ट 1942 च्या चळवळीला प्रारंभ झाला.
चलेजाव चळवळ कारणे पुढीलप्रमाणे
(1) क्रिप्स योजनेने कोणाचेही समाधान झाले नाही.

(2) भारतीय व मंत्रिमंडळाशी चर्चा न करता भारत युध्दात सहभागी असल्याची घोषणा ग.ज. ने केली.

(3) भारतीय स्वातंत्र्य व राज्यघटना या संदर्भात युध्द समाप्तीनंतर निर्णय घेण्यात येईल.

(4) इंग्रजांविरूध्द सुभाषचंद्र बोस यांनी चळवळ सुरु केली. जपानच्या आक्रमणाची भीती वाटत असल्याने चलेजाव चळवळ सुरु केली.

8 ऑगस्ट 1942 चा ठराव :-

वर्धा येथे कॉग्रेस वर्किगं कमिटिने चलेजाव ठराव 14 जूलै 1942 ला मंजूर केला.
त्याच आधारे मुंबईच्या गवालिया टंक मैदानावर कॉग्रेस अधिवेशनात 8 ऑगस्ट 1942 रोजी ठराव मंजूर केला.
त्यातील तरतुद-
(1) ब्रिटिश राजवट असणे भारताला अपमानास्पद आहे.

(2) भारतीय स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश व संयुक्त राष्ट्राची परिषद होणार आहे.

(3) स्वतंत्र भारत आपली सर्व शक्ती खर्च करुन हुकूमशाहीविरुध्द लढा देईल.

1942 च्या चळवळीचे स्वरूप :-

चळवळीची घोषणा करताच प्रमुख नेत्यांना कैद झाली. त्यामुळे समाजवादी गटांनी भूमिगत राहून आंदोलन सुरु केले.
संप मोर्चे हरताळ, निदर्शन, सरकारी, मालमतेचे नुकसार तसेच प्रतिसरकार स्थापन करणे इ. मार्गाने चळवळ सूरू होती.
अनेक शहरांमधील कामगारांनी कारखाने बंद केले. सरकारने आंदोलकांवर लाठीमार, गोळीबार, केला.
त्यामध्ये नंदुबारचा विद्यार्थी शिरीषकुमार आणि त्याचे चार मित्र ठार झाले.
10 हजारांहून अधिक लोक ठार झाले. जयप्रकाश नारायण, राममनोहर लोहिया, अच्यूत;राव पटवर्धन, अरूणा असफअली इ. नेत्यांनी महत्वाची कामगिरी केली.
सी. आर. फॉम्र्युला (30 जून 1944) :-

हिंदु मुसलमान यांच्यातील मतभेद मिटल्याशिवाय स्वातंत्र्य मिळणार नाही असे व्हॉइसरॉय र्लॉड वेव्हेल यांनी सांगितले, तेव्हा चक्रवर्ती राजगोपालाचारी यांनी गांधीजींच्या संमतीने बॅ. जिनासमोर योजना मांडली.
तिलाच सी. आर. फॉम्र्युला किंवा राजगोपालाचारी योजना म्हणतात. त्यातील तरतुदी-
(1) हिंदुस्थानची घटना निर्माण होईपर्यंत हिंदु मुसलमान यांनी हंगामी सरकार स्थापन करावे.

(2) युध्द संपल्यानंतर मुस्लीम बहुसंख्य असलेल्या प्रांताच्या सीमा ठरविण्यासाठी कमिशन नेमावे

(3) भारतातून फुटून निघण्याच्या प्रश्नावर सार्वमत घ्यावे.

ही योजना गांधीजींना मान्य होती. परंतु बॅ. जिनांनी नाकारली.

वेव्हेल योजना (9 जून 1945) :-

युरोपमध्ये युध्दाची समाप्ती झाली. तरीपण जपानच्या आक्रमणाची भीती होती.
भारताच्या स्वातंत्र्यसंदर्भात मित्र राष्ट्रांचा चर्चिल यांच्यावर दबाब येत होता.
आगामी निवडणुकीत मजूर पक्ष सत्तेवर आला. तर आपली राजवट बदनाम करतील. यामुळे भारतीयांसाठी योजना जाहिर केली.
त्यातील तरतुद-
(1) हिंदी लोकांनी नवी राज्यघटना करावी.

(2) जपान बरोबरच्या युध्दात भारतीयांनी सहकार्य करावे.

(3) हिंदी गृहलोकांकडे परराष्ट्रीय खाते असेल सिमला संमेलन 25 जून ते 14 जूलै 1945 वेव्हेल योजना व जागा वाटप याची चर्चा करण्यासाठी सिमला येथे संमेलन आयोजित केले.

वेगवेगळया पक्षांचे 22 प्रतिनिधी हजर होते. कार्यकारी मंडळाच्या रचनेबाबत मतभेद झाल्याने संमेलन बरखास्त केले.
वेव्हेलची सप्टेंबर घोषणा इ.स. 1945 :-

इंग्लंडमध्ये जुलै 1945 ला मजूर पक्ष सत्तेवर आला.
पंतप्रधान अ‍ॅटलीने घोषणा केली की, भारताला लवकरच स्वातंत्र्य देण्यात येईल.
त्यानुसार वेव्हेल यांनी घोषणा केली की,
(1) सर्व पक्षांची घटना समिती स्थापन करण्यात येईल.

(2) 1945 च्या हिवाळयात केंदि्रय व प्रांतिय कायदेमंडळाच्या निवडणूका घेण्यात येतील

(3) घटना समितीच्या कामकाजासाठी संस्थानिकांशी चर्चा करण्यात येईल.

सैनिकांचे बंड :-

भारतीय लष्कराच्या तिन्ही दलात इंग्रजांबदल विरोध होता.
जानेवारी 1946 मध्ये कराचीच्या विमानदलाने संप पुकारला त्याचा प्रसार लाहोर, मुंबई, दिल्ली येथे झाला. फेब्रुवारी 1946 मध्ये मुंबईच्या नाविक दलाने उठाव केला.
अंबालाच्या विमानदलाने संप केला जबलपूरच्या लष्करात संप झाला. सर्व लष्करी दलात उठाव झाला.
कॅबिनेट मिशन त्रमंत्री योजना (6 में 1946) :-

पंतप्रधान अ‍ॅटलीने जाहिर केले की, भारताला स्वातंत्र्य दिले जाईल.
यासाठी सर पेथिक लॉरेन्स, सर स्टॅफर्ड क्रिप्स, सर अलेक्झांडर या तीन कॅबिनेट मंत्र्यांचे मिशन नियूक्त केले, ते 20 मार्च 1946 कराची येथे आले.
देशातील 472 नेत्यांशी चर्चा करुन 16 मे 1946 योजना जाहीर केली.
त्यातील तरतुदी-
(अ) भारताला लवकर स्वातंत्र्य दिले जाईल.

(ब) काँग्रेस लीग यांच्यात एकमत होत नाही,

तोपर्यत पुढील योजना सादर करण्यात येत आहे.
(1) ब्रिटिश प्रांत व संस्थाचे यांचे संघराज्य तयार करावे,

(2) लोकायुक्त संसद त्याचा कारभार करेल.

(3) संघराज्याची व गटराज्याची घटना बनवून दर 10 वर्षाने गरजेनुसार बदल करावे

(4) प्रशासनाच्या कामासाठी तीन विभाग

(अ) मद्रास, मुंबई, संयुक्त प्रांत बिहार, मध्ये प्रांत, ओरिसा यांचे एकूण प्रतिनिधी 187

(आ) पंजाब, सरहद्द,प्रांत, सिंधचे प्रतिनिधी 35,

(इ) बंगाल, आसामचे 70 प्रतिनिधी असावेत .

या योजनेत पाकिस्तानचे चित्र दिसत असल्याने लीगने मान्य केली तर कॉंग्रेसने नाकारली.
हंगामी सरकार :-

घटना समितीसाठी निवडणूक घेण्यात आली.
292 पैकी 212 जागा कॉंग्रेसला मिळाल्या घटना समितीचे पहिले अधिवेशन 9 डिसेंबर 1946 रोजी दिल्लीत भरले घटना समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. राजेंद्र प्रसार याची निवड करण्यात आली.
हंगामी सरकारची स्थापना 2 सप्टेंबर 1946 रोजी केली.
तो दिवस लीगने शोकदिन म्हणून पाळला 16 ऑगस्ट 1946 हा दिवस प्रत्यक्ष कृती दिन म्हणून लीेगने पाळला.
र्लॉड माऊंटबॅटन योजना जून 1947 :-

प्रधानमंत्री अ‍ॅटली यांनी 20 फेब्रुवारी 1947 रोजी जाहीर केले की जून 1948 पूर्वी इंग्रज आपली सज्ञ्ल्त्;ाा सोडेल.
र्लॉड माऊंटबॅटन याने काँग्रेस लीगच्या नेत्यांशी चर्चा करून आपली योजना जाहीर केली. ती पुढीलप्रमाणे.
(1) हिंदुस्थानची फाळणी करुन मुसलमानांसाठी स्वतंत्र घटना समिती स्थापन करावी.

(2) बंगाल, आसाम, पंजाबाचे, विभाजन केले.

(3) आसामच्या सिल्हेट जिल्हयात सर्वमत घ्यावे,

(4) इंग्रज सरकार 15 ऑगस्ट 1947 राजी हिंदुस्थान सोडून जातील या योजनेला काँग्रेस व लीगनेही मान्यता दिली.

स्वातंत्र्याचा कायदा आणि हिंदुस्थानची फाळणी :-

र्लॉड बॅटन योजनेच्या आधारे ब्रिटिश पार्लमेंटने 16 जूलैला कायदा मंजूर केली. तो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा होता. त्यातील तरतुदी :
(1) 15 ऑगस्ट 1947 रोजी हिदुस्थानची फाळणी करुन भारत पाकिस्तान दोन देश निर्माण करणे

(2) स्वत:च्या देशाचे कायदे करण्याचा अधिकार त्यांच्या कायदेमंडळाला असेल.

(3) 15 ऑगस्ट 1947 रोजी इंग्रज सरकारचे सर्व अधिकार रद्द होतील.

(4) नवीन राज्यघटना तयार होईपर्यत सध्या असलेली घटना समिती दोन्ही देशांसाठी कायदे करील.

(5) संस्थानांनी कोठे सामील व्हायचे त्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे.

(6) पूर्व बंगाल, पश्चिम बंगाल, संधि, वायव्य, सरहद्द प्रांत, बलुचिस्थान आसामचा सिल्हेट जिल्हा यांचा समावेश पाकिस्तानमध्ये करण्यात येईल. उरलेला प्रदेश भारतात असेल.भारतीय स्वातंत्र्याचा कायद्यानुसार 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान वेगळा झाला. त्याच रात्री 12 वाजता भारतीय पारतंत्र्य नष्ट झाले. 15 ऑगस्ट 1947 ला देश स्वतंत्र झाला. हिंदुस्थानची फाळणी होऊन दोन राष्ट्र निर्माण झाली.