Ads

11 April 2022

लक्षात ठेवा

💪एकच ध्यास CDPO पास🎯:
🔴◾️राष्ट्राच्या घटनात्मक योजना◾️🔴

भारताच्या घटनेत राज्याच्या निती दाखविणा-या सिद्धांतांत कलम २१ ए, २४ आणि ३९ मध्ये मुलांच्या विकासासाठीची कारणे व त्याबद्दलची कर्तव्ये नमुद केली आहेत.

कलम २१ ए

शिक्षणाचा अधिकार
राज्याच्या कायद्यात ठरविल्या प्रमाणे राज्याने ६ ते १४ वर्ष वयाच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण पुरवावे

कलम २४

मुलांना कारखान्यात वगैरे काम करण्यापासून मज्जाव करणे
कुठल्याही १४ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कारखान्यात,खाणीत वा जेथे त्यांच्या जीवाला धोका आहे अशा ठिकाणी काम करण्यास मज्जाव करणे

कलम ३९

राज्याने, खासकरुन त्यांच्या योजना संरक्षणाकडे वळवाव्या
(इ)कामगारांचे आरोग्य व शक्ति, स्त्री आणि पुरुष, व कोवळ्या वयात मुलांवर दुर्व्यवहार होऊ नयेत आणि त्यांच्यावर अशी कोणतीही दयनीय परिस्थिती येऊ नये जेणेकरुन त्यांना पैशाच्या आवश्यकते साठी आपल्या ताकद व शक्ति पेक्षा जास्त कांमात स्वतःला झोकावे लागेल.

_________________________________________

🔴◾️अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी डॉ. अब्दुल कलाम अमृत योजना◾️🔴

प्रस्तावना

योजनेची वैशिष्ट्ये

योजनेतील घटक

आहाराचे स्वरूप

अंमलबजावणी यंत्रणा

प्रस्तावना

अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे. आदिवासी समाजामध्ये याचे प्रमाण 33.1 टक्के आहे.

स्त्रियांच्या गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्याने याचा परिणाम बाळाच्या वजनावर होतो. शिवाय जन्मानंतर पहिले तीन महिने बालक पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्याने या कालावधीत मातेचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर शासनातर्फे अनुसूचित क्षेत्रांतर्गत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडी क्षेत्रातील सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना आहारातून उष्मांक व प्रथिनांची उपलब्धता होण्यासाठी भारतरत्न डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना आणली आहे. या योजनेअंतर्गत एक वेळ चौरस आहार उपलब्ध करून देण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली आहे.

योजनेची वैशिष्ट्ये

या योजनेअंतर्गत गरोदर स्त्रियांना शेवटच्या तिमाहीत व स्तनदा मातांना बाळंतपणानंतर पहिल्या तिमाहीत याप्रमाणे सहा महिन्याच्या कालावधीत चौरस आहार देण्यात येईल.

अनुसूचित क्षेत्रातील लाभार्थींना 1 डिसेंबरपासून चौरस आहार देण्यात येणार आहे.

राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यात 85 एकात्मिक बाल विकासप्रकल्पांतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे.

एकूण 16 हजार 30 अंगणवाडी आणि 2013 मिनी अंगणवाडी क्षेत्रातील लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळणार आहे.

योजनेतील घटक

अनुसूचित क्षेत्रातील अंगणवाडी कक्षेत येणाऱ्या सर्व गरोदर स्त्रिया आणि स्तनदा मातांना या योजनेनुसार एकूण सहा महिन्याच्या कालावधीसाठी एक वेळचा चौरस आहार मिळणार आहे. उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण या योजनेमुळे कमी होण्यास मदत होणार आहे. अनुसूचित क्षेत्रामधील सुमारे 1 लाख 89 हजार एवढ्या गरोदर स्त्रिया व स्तनदा मातांना या योजनेचा दरवर्षी लाभ मिळणार आहे.  

मुलांमध्ये चेतना निर्माण करण्याच्या डॉ. कलाम यांच्या कार्याचा गौरव करण्याच्या दृष्टिकोनातून या योजनेला भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम अमृत योजना असे नाव देण्यात आले आहे. ही योजना राज्यातील 16 आदिवासी जिल्ह्यांतील 85एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे. योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा, किंमत आणि पोषण मुल्ये ठरविण्यात आली असून चौरस आहाराचा खर्च सरासरी प्रति लाभार्थी 22 रुपये एवढा निश्चित करण्यात आला आहे. या योजनांसाठी केंद्र शासनाच्या टीएचआर योजनेचा निधी (केंद्र व राज्य हिस्सा) वापरण्यात येईल. 

अनुसूचित क्षेत्रातील कुपोषण, बालमृत्यू व कमी वजनाची बालके जन्माला येणे यासारख्या गंभीर समस्यांवर मात करण्यासाठी परिणामकारक उपाययोजना राबविणे आवश्यक होते. अनुसूचित क्षेत्रामध्ये कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण 33.1 टक्के एवढे आहे. आदिवासी स्त्रियांमध्ये गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये वजनवाढीचे प्रमाण कमी असल्यामुळे त्याचा परिणाम बाळाच्या वजनावर होऊन कमी वजनाची बालके जन्माला येतात. तसेचबालकाच्या जन्मानंतर पहिले तीन महिने मूल पूर्णपणे मातेवर अवलंबून असल्यामुळे या कालावधीत मातेचे आरोग्य व पोषण चांगले राहणे आवश्यक आहे.

आहाराचे स्वरूप

या योजनेंतर्गत देण्यात येणाऱ्या एक वेळच्या पूर्ण आहारामध्ये चपाती अथवा भाकरी, भात, कडधान्ये-डाळ, सोया दुध (साखरेसह), शेंगदाणा लाडू (साखरेसह), अंडी अथवा केळी अथवा नाचणी हलवा, फळे, हिरव्या पालेभाज्या, खाद्यतेल, गुळ अथवा साखर, आयोडीनयुक्त मीठ, मसाला इत्यादींचा समावेश असेल. तसेच हा आहार खरेदी करण्यासाठी एका अंगणवाडीसाठी एक अशी चार सदस्यीय आहार समिती नियुक्त करण्यात येईल. या समितीला आहार घटक खरेदी करण्याचे अधिकार राहतील.

अंमलबजावणी यंत्रणा

ही योजना यशस्वीरित्या राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना नियमित मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त या योजनेचा आहार तयार करण्यासाठी प्रतिमाह प्रत्येकी दोनशे पंन्नास रुपये देण्यात येतील.

ही योजना आदिवासी विकास विभागाच्या नियंत्रणाखाली व एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या माध्यमातून राबविण्यात येणार असून योजनेंतर्गत कामाचा व फलनिष्पत्तीचा आढावा घेण्यासाठी राज्यस्तरावर आदिवासी विकास विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय सनियंत्रण समिती, जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा सनियंत्रण व अंमलबजावणी समिती स्थापन करण्यात येईल.

तसेच अंगणवाडी पातळीवर महिला सरपंच किंवा ग्रामपंचायत सदस्य (अनुसूचित जमाती) यांच्या अध्यक्षतेखाली आहार समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. या योजनेचे वेळोवळी त्रयस्थ संस्थेमार्फत

_______________________________________

🔴एकात्मिक बाल विकास सेवा योजना (आय सी डी एस)

🌸आय सी डी एस, हा भारत सरकारने पुढाकार घेऊन सुरु केलेल्या उपक्रमापैकी एक असून राज्यातील महिला व बाल विकास विभागामार्फत कार्यान्वित करण्यात येतो.

🌸आय सी डी एस लहान बालकांना पोषण आहार, आरोग्य निगा आणि शालापूर्व शिक्षण सेवा संकलित स्वरुपात  पुरवू इच्छिते.

🌸लहान बालकांच्या आरोग्य आणि पोषणाच्या समस्या त्याच्या किंवा तिच्या मातेचा विचार न करता सोडविता येणे शक्य नाही आणि म्हणूनच या उपक्रमाची व्याप्ती किशोरावस्थेतील मुली, गर्भवती महिला आणि स्तनदा माता यांच्यापर्यंत विस्तारण्यात आली आहे.

🌸आय सी डी एस उपक्रम मुलांना आणि मातांना त्यांच्या गावात किंवा वार्डात सर्व पायाभूत आवश्यक सेवा एकत्रितपणे पुरवू इच्छिते. ही योजना शहरी झोपडपट्ट्यामधून आणि ग्रामीण तसेच आदिवासी विभागातून टप्याटप्याने विस्तारली आहे.

🌸राज्यात आय सी डी एस उपक्रमाचे एकूण ५५३ प्रकल्प कार्यरत असून ३६४ ग्रामीण, ८५ आदिवासी विभागात आणि १०४ शहरी झोपडपट्ट्यांमध्ये आहेत.

🌸या योजनेतंर्गत लाभार्थींना पुरविण्यात येणाऱ्या काही प्रमुख सेवा:

🎄पुरक पोषण आहार

🎄लसीकरण

🎄आरोग्य तपासणी

🎄संदर्भ आरोग्य सेवा

🎄अनौपचारीक शाला-पूर्व शिक्षण

🎄पोषण आणि आरोग्य शिक्षण

_____________________________________

🌸राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशन
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✍महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे जिथे कुपोषणाशी लढण्याचे कार्य मिशनसारखे राबवण्यात येत आहे आणि याच उद्देशाने राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य आणि पोषण मिशनची स्थापना करण्यात आली आहे. आरोग्य आणि पोषण मिशनचा पहिला टप्पा २००५ मध्ये आणि दुसरा टप्पा नोव्हेंबर २०११ मध्ये आखण्यात आला होता. या मिशनचे मुख्य उद्दिष्ट महाराष्ट्रातील कुपोषण समस्या कमी करणे असून त्यासाठी गर्भधारणेपासून पहिल्या १००० दिवस म्हणजेच वजा ९ ते २४ महिन्यांच्या कालावधीवर लक्ष केंद्रित केले जाते.

✍राजमाता जिजाऊ मिशन  ही एक तांत्रिक आणि सल्लागार स्वायत्त संस्था असून संपूर्णत: युनिसेफच्या अर्थसाहाय्यावर चालते. याचा मुख्य हेतू  महाराष्ट्र शासन, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि आय सी डी एस आयुक्तालय यांच्या मध्ये संवाद आणि सहयोग घडवून आणणे हा आहे.

✍महिला आणि बालक विकास विभाग आणि या मिशनच्या कार्यात कोणताही संभ्रम आणि पुनरावृत्ती होऊ नये याकरिता मिशनची भूमिका स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्याने अगदी विचारपूर्वक निर्णय घेतला की या मिशनला शासकीय अर्थसाहाय्य देण्यात येणार नाही आणि या मिशनतर्फे  कोणत्याही योजनांची थेट अमंलबजावणी करण्यात येणार नाही. यामुळे मिशनला स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे कार्य करणे शक्य होते. या मिशनची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत:

✍पहिले १००० दिवसांचे अनन्य साधारण महत्व पटवून देणे.

✍एक ‘विचार गट’ म्हणून कार्य करणे  आणि शासनाला धोरण निश्चिती करण्याकरिता वास्तविक पुराव्यावर आधारीत सल्ला देणे.

✍कुपोषण कमी करण्याचे सामाइक उद्दिष्ट साध्य करण्याकरिता विविध विभांगात एककेंद्राभिमुखता/एकवाक्यता आणणे.

✍या भूमिकेला अनुसरुन, या मिशनने विविध विभांगासाठी बहु-क्षेत्रीय कृती कार्यक्रम तयार केला आहे, ज्यात कुपोषणाची समस्या दूर करण्यासाठी विविध विभाग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे कसे सहाय्य करू शकतात याचा आराखडा दिलेला आहे.

महत्त्वाची माहिती

💪एकच ध्यास CDPO पास🎯:
🔴‘सौर चरखा अभियान🔴

🌸सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय (MSME) यांच्यातर्फ ‘सौर चरखा अभियान’ राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते 27 जून 2018 रोजी नवी दिल्लीमध्ये सुरू केले जाणार आहे.

🌸या अभियानामध्ये 50 समूह (clusters) समाविष्ट केले जातील आणि प्रत्येक समूह 400 ते 2000 कारागिरांना रोजगार प्रदान करणार. याअंतर्गत कारागिरांना 550 कोटी रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे.

______________________________________

🌸🌸🌸सेवा भोज योजना.🌸🌸🌸

🚦धर्मदाय आस्थापनांना CGST आणि IGST पासून मुक्त करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने ही योजना सुरू केली.

🚦प्राप्तीकर विभागाच्या ‘प्राप्तीकराबाबत माहिती देणाऱ्याला बक्षीस देणारी योजना-2018’ने या सालच्या योजनेला बदलले - सन 2007.

🚦नोंदणीकृत संस्थांना मिळणाऱ्या परदेशी देणगीवर लक्ष ठेवण्यासाठी या मंत्रालयाने/विभागाने ऑनलाईन विश्लेषणात्मक साधन (OAT) सादर केले - केंद्रीय गृहमंत्रालय.

🚦या ठिकाणी ‘सखी सुरक्षा प्रगत DNA न्यायवैद्यक प्रयोगशाळा’ उभारली जात आहे - चंदीगड.

🔴मनरेगा योजना🔴

दूष्काळ आणि नापिकीमुळे ग्रामीण भागात उद्‌भवणाऱ्या आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी ग्रामीण जनतेला रोजगार मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेला 2 फेब्रुवारी 2016 रोजी दहा वर्षे पूर्ण झाली. 

प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील अकुशल परंतु काम करू इच्छिणाऱ्या प्रौढ सदस्यांना एका आर्थिक वर्षात किमान शंभर दिवसाच्या मजुरी रोजगाराची हमी देण्याच्या उद्देशाने 2 फेब्रुवारी 2006 रोजी आंध्रप्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील बंदलापल्ली या गावातून या योजनेचा शुभारंभ झाला. 

मनरेगा योजनेची उद्दिष्टे 

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबास मागणीनुसार किमान शंभर दिवस रोजगार पुरवणे. सामाजिक आर्थिक समावेशन निश्‍चित करणेपंचायतराज संस्थांना बळकट करणे. 

___________________________________

मनरेगा योजना 

प्रत्येक ग्रामीण कुटुंबातील अकुशल अंगमेहनतीचे काम करण्यास इच्छुक प्रौढ सदस्य ग्रामपंचायतीमध्ये आपले नाव, वय व पत्त्याची नोंदणी करू शकतो. नोंदणी केल्यापासून 15 दिवसांच्या आत ग्रामपंचायत नोंदणीकृत कुटुंबास जॉबकार्ड जारी करते. अर्जदारास त्याच्या/तिच्या घरापासून 5 किलोमीटर अंतराच्या परिसरात रोजगार पुरवला जातो. 5 किमी अंतरापलिकडील कामासाठी 10% अधिक मजुरी मिळते. मागणी केल्यापासून 15 दिवसांच्या आत काम न मिळाल्यास बेरोजगारी भत्ता दिला जातो. योजनेअंतर्गत कामांमध्ये महिलांसाठी 33% आरक्षणाची तरतूद आहे. या योजनेत पुरुष व स्रियांना सारखीच मजुरी दिली जाते. 

मनरेगा योजनेचे मूल्यांकन 

सध्या मनरेगा योजना ग्रामीण लोकसंख्या असणाऱ्या 660 जिल्ह्यांमध्ये राबवली जाते योजना सुरू झाल्यापासून गेल्या दहा वर्षांत सरकारने योजनेवर जवळपास 3.14 लाख कोटी रुपये खर्च केला आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये मनरेगा योजनेअंतर्गत जवळपास 1980 कोटी मनुष्य दिवसांचा रोजगार निर्माण झाला आहे. सध्या (फेब्रुवारी 2016) मनरेगा योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारकांची संख्या 13.14 कोटी तर एकूण कामगार संख्या 27.6 कोटी आहे. दर तीन ग्रामीण कुटुंबापैकी एका कुटुंबापर्यंत मनरेगा ही योजना पोहोचली आहे या योजनेअंतर्गत एकूण कामगार संख्येपैकी अनुसूचित जाती 19.50 टक्‍के, तर अनुुसूचित जमातींमधील कामगारांचे प्रमाण 15.22 टक्के आहे. मनरेगा योजनेत एकूण कामगारांपैकी 33 टक्‍के स्रिया असाव्या असा नियम आहे परंतु योजनेत महिला सहभागाची 33 टक्‍के आरक्षणाची सीमा ओलांडली गेली आहे. 2014-15 व 2015-16 मध्ये महिला सहभागाचे प्रमाण पुरुषांहून अधिक झाले आहे. 

 मनरेगाचे यश 

मनरेगा योजनेमुळे योजनेच्या लाभार्थ्यांच्या अन्न सुरक्षा, आहार यात सुधारणा झाली आहे. त्यांच्या आहारातील कॅलरी व प्रथिनांचे प्रमाण वाढले आहे. 

मनरेगा अंतर्गत मजुरी कामगारांच्या थेट बॅंक/पोस्ट खात्यावर जमा होत असल्याने डिसेंबर 2015 पर्यंत 11.2 कोटी बॅंक/पोस्ट खाती उघडली गेली आहेत.या योजनेने महिलांना हक्काचा रोजगार मिळवून दिला. यामुळे ग्रामीण महिलांचे सबलीकरण होण्यास मदत झाली आहे. मनरेगा योजनेअंतर्गत रोजगार प्राप्त झाल्याने आपत्कालीन परिस्थितीत रोजगाराच्या शोधार्थ ग्रामीण भागाकडून शहरी भागात होणारे स्थलांतर कमी होण्यास मदत झाली आहे. 

मनरेगाच्या मर्यादा 

योजनेअंतर्गत देण्यात येणारी मजुरी बऱ्याचदा वेळेत न मिळाल्याने कामगारांमध्ये याबाबत नकारात्मक भाव तयार झाला आहे. देशभरात मनरेगाची बनावट जॉब कार्डस, बनावट कामगार यादी तयार झाल्याचे निदर्शनास आले आहे. यातून बऱ्याचदा मध्यस्थ व्यक्तीच पैसे बळकावते असे दिसून आले आहे. मनरेगा अंतर्गत होणारी बांधकामे, रस्ते वा अन्य सुविधा या तकलादू jb व कमी गुणवत्तेच्या आहेत. 

___________________________________

🌸महिला व बालविकास अधिकारी-2018 उपयुक्त..

🌹राष्ट्रीय महिला आयोग  अधिनियम-1990
#CDPO

_________________________________

🔴◾️राष्ट्राच्या घटनात्मक योजना◾️🔴

भारताच्या घटनेत राज्याच्या निती दाखविणा-या सिद्धांतांत कलम २१ ए, २४ आणि ३९ मध्ये मुलांच्या विकासासाठीची कारणे व त्याबद्दलची कर्तव्ये नमुद केली आहेत.

कलम २१ ए

शिक्षणाचा अधिकार
राज्याच्या कायद्यात ठरविल्या प्रमाणे राज्याने ६ ते १४ वर्ष वयाच्या मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण पुरवावे

कलम २४

मुलांना कारखान्यात वगैरे काम करण्यापासून मज्जाव करणे
कुठल्याही १४ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कारखान्यात,खाणीत वा जेथे त्यांच्या जीवाला धोका आहे अशा ठिकाणी काम करण्यास मज्जाव करणे

कलम ३९

राज्याने, खासकरुन त्यांच्या योजना संरक्षणाकडे वळवाव्या
(इ)कामगारांचे आरोग्य व शक्ति, स्त्री आणि पुरुष, व कोवळ्या वयात मुलांवर दुर्व्यवहार होऊ नयेत आणि त्यांच्यावर अशी कोणतीही दयनीय परिस्थिती येऊ नये जेणेकरुन त्यांना पैशाच्या आवश्यकते साठी आपल्या ताकद व शक्ति पेक्षा जास्त कांमात स्वतःला झोकावे लागेल.

______________________________________

🔴◾️राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान◾️🔴 (आर.एम.एस.ए.)

लक्ष्य

लक्ष्य आणि उद्देश्य

मुख्य उद्देश

माध्यमिक स्तरासाठी दृष्टिकोण आणि धोरण

गुणवत्ता

समता

संस्थांतर्गत सुधारणा आणि स्रोत संस्थांचे सुदृढ़ीकरण

सरकार ४ केंद्र प्रायोजित योजना चालवते

केन्द्रीय विद्यालय आणि जवाहर नवोदय विद्यालय

आर्थिक मदतीचा नमुना आणि बँकेत खाते उघडणे

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (आर.एम.एस.ए.)

राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा (आर.एम.एस.ए.) उद्देश आहे माध्यमिक शिक्षणाचा विस्तार आणि त्याच्या मानकांमध्ये इयत्ता ८वी ते १० मध्ये सुधारणा करणे — आर.एम.एस.ए. देशाच्या प्रत्येक कानाकोप-यात प्रत्येकी ५ किमी. अंतरावर इयत्ता १०वी पर्यंतचे माध्यमिक शिक्षण पोहोचवतील. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान (आर.एम.एस.ए.) हा भारत सरकारचा आत्ताच सुरु करण्यात आलेला कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश माध्यमिक शिक्षणाचे सार्वत्रीकरण असा आहे (यू. एस. ई). सरकारतर्फे सुरु करण्यात आलेला देशातील लाखो मुलांना प्रारंभिक शिक्षण देणारा राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालेला आढळतो, आणि म्हणूनच देशात ह्या कार्यक्रमाची माध्यमिक स्थरावर विस्तार करण्याची गरज भासू लागली आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने यात लक्ष घातले आहे आणि ११व्या योजनेत २०,१२० कोटी रुपये खर्च करून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानाचा (आर.एम.एस.ए.) ह्या नावाने माध्यमिक शिक्षण योजनेचा विस्तार करण्याचे ठरवले आहे. “सर्व शिक्षा अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे, मोठ्या प्रमाणावर उच्च प्राथमिक इयत्तांमधून माध्यमिक शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी बाहेर पडत आहेत, ज्यामुळे माध्यमिक शिक्षण सुरु करण्याची गरज निर्माण होत आहे” असे मानव संसाधन विकास मंत्री म्हणाले.

लक्ष्य

१४-१८ वर्ष वयोगटाच्या सर्व मुलामुलींना चांगल्या प्रतिचे शिक्षण प्राप्त व्हावे, परवडावे आणि मिळावे हे या माध्यमिक शिक्षणाचे लक्ष्य आहे. हे लक्ष्य नजरेसमोर ठेवून खालील काही बाबींची पूर्तता करण्याचा दृष्टिकोण आहे :

कोणत्याही वस्तीच्या उचित अंतरावर एक माध्यमिक विद्यालय वसवणे, हे अंतर उच्च माध्यमिक विद्यालयांसाठी ५ किलोमीटर आणि उच्चतर माध्यमिक विद्यालयांसाठी ७-१० कि.मी. असेल.

२०१७ पर्यंत माध्यमिक शिक्षण हे निश्चितपणे सर्वत्र पोहोचावे (१०० % जी.ई.आर.) आणि २०२० पर्यंत सार्वत्रिकपणे टिकून राहावे

समाजातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गासाठी, शैक्षणिकदृष्या मागासलेले, मुली आणि खेडोपाडी राहणारी अपंग मुले आणि इतर वर्ग उदाहरणार्थ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, अन्य मागासवर्ग आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेले अल्पसंख्यांक (इ.बी.एम.) यांना विशेष संदर्भासहित माध्यमिक शिक्षण प्रदान करणे.

लक्ष्य आणि उद्देश्य

माध्यमिक शिक्षणाच्या जागतिकीकरणाचे (यू.एस.इ.) आव्हान पूर्ण करण्यासाठी, माध्यमिक शिक्षणाच्या संकल्पनात्मक रचनेमध्ये आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे. या संबंधातील मार्गदर्शक सिद्धांत असे आहेत - जागतिक प्रवेशयोग्यता, एकात्मता आणि सार्वजनिक न्याय, प्रासंगिकता आणि विकास आणि अभ्यासक्रमात्मक आणि रचनात्मक तत्वे. माध्यमिक शिक्षणाच्या जागतिकीकरणाने एकात्मतेकडे पाऊले उचलायला मदत होते. ‘सामान्य शाळा’ ह्या उद्देशाला प्रोत्साहन मिळेल. जर संस्थेत अशा प्रकारची पद्धत स्थापन झाली तर, सगळ्या प्रकारच्या शाळा, विनाअनुदानित खाजगी शाळांसहित सर्व शाळा, वंचित आणि खालच्या समाजातील मुलेमुली आणि गरिबीरेषेच्या खालची कुटुंबे (बीपीएल) यात प्रवेश घेऊन, माध्यमिक शिक्षणाच्या जागतिकीकरणात भाग घेतील.

मुख्य उद्देश

सर्व माध्यमिक विद्यालयांमध्ये हे सुनिश्चित करणे की सरकारी शाळांच्या बाबतीत आर्थिक सहाय्य / स्थानिक संस्था आणि सरकारी मदत घेणार्या शाळा आणि इतर नियामक तंत्र शाळांकडे भौतिक सुविधा,कर्मचारी आणि इतर गरजा कमीतकमी निर्धारित मानकांनुसार असायला पाहिजेत.

मानकांच्या आधारे सर्व युवामुलांसाठी माध्यमिक शिक्षणात सुधारणा करण्यासाठी – जवळची जागा (५ कि.मी. अतरावर माध्यमिक शाळा, आणि ७ ते १० कि.मी. अंतरावर उच्च माध्यमिक शाळा) / राहण्याची व्यवस्था आणि व्यवस्थित व सुरक्षित प्रवास, स्थानिक परिस्थितीचा विचार करुन शाळांच्या स्थापनेचा विचार. पण, डोंगराळ व अवघड जागांवर, हे मुद्दे थोडे सैल सोडले जातील. अशा जागांवर मुख्यतः वस्तीशाळांची स्थापना करण्यात येईल.

कोणतेही मूल त्याचे लिंग, सामाजिक,आर्थिक परिस्थिती किंवा विकलांगता आणि इतर मर्यादांमुळे माध्यामिक शिक्षणापासून वंचित राहणार नाही ह्याची खात्री करणे.

माध्यमिक शिक्षणाच्या गुणवत्तेत वृद्धि करणे ज्याने सामाजिक बौद्धिक आणि सांस्कृतिक शिकवणीमुळे गुणवत्तेत सुधारणा होईल.

जी मुले माध्यमिक शिक्षण घेत आहेत त्यांना चांगल्या प्रतीचे शिक्षण मिळत असल्याची खात्री करणे.

10 April 2022

Must read


📖 स्टेटिक जीके के साथ परीक्षा संबंधित करेंट अफेयर्स:

#Hindi

1) रक्षा मंत्री राजनाथ सिंह ने रक्षा उपकरणों की तीसरी सकारात्मक स्वदेशीकरण सूची जारी की।
➠ 101 वस्तुओं की सूची में प्रमुख उपकरण और हथियार प्लेटफॉर्म शामिल हैं और उन उपकरणों, हथियारों और प्रणालियों पर विशेष जोर दिया गया है जो वर्तमान में विकास के अधीन हैं और अगले पांच वर्षों के दौरान दृढ़ आदेशों में तब्दील होने की संभावना है।

2) केंद्रीय शिक्षा और कौशल विकास मंत्री, श्री धर्मेंद्र प्रधान ने "बिरसा मुंडा-जनजाति नायक" नामक पुस्तक का विमोचन किया।
➠ पुस्तक को प्रो. आलोक चक्रवाल, कुलपति, गुरु घासीदास विश्वविद्यालय, बिलासपुर, छत्तीसगढ़ द्वारा लिखा गया है।

3) आंध्र प्रदेश में प्रशासन के एक नए युग की शुरुआत करते हुए, मुख्यमंत्री वाईएस जगन मोहन रेड्डी ने वस्तुतः 13 नए जिलों का उद्घाटन किया, जिससे राज्य में कुल जिलों की संख्या 26 हो गई।

▪️आंध्र प्रदेश :-
➨CM -  Jaganmohan Reddy
➨Governor - Biswabhusan Harichandan
➨ Venkateswara Temple
➨Sri Bhramramma Mallikarjuna Temple

4) पुलित्जर पुरस्कार से सम्मानित अमेरिकी कवि रिचर्ड हॉवर्ड का 92 वर्ष की आयु में निधन हो गया।
➠ वह एक अमेरिकी कवि, साहित्यिक आलोचक, निबंधकार, शिक्षक और अनुवादक थे।

5) पाठ्येतर गतिविधियों को बढ़ावा देने के लिए, दिल्ली सरकार ने स्कूल के समय के बाद दिल्ली में सरकारी स्कूलों के लिए हॉबी हब की स्थापना की है।

6) कर्नाटक सरकार ने राज्य सरकार के कर्मचारियों के लिए महंगाई भत्ते (डीए) को मूल वेतन के मौजूदा 24.50 प्रतिशत से बढ़ाकर 27.25 प्रतिशत करने का निर्णय लिया है।

▪️कर्नाटक:-
मुख्यमंत्री :- बसवराज बोम्मई
राज्यपाल :- थावरचंद गहलोत
पोर्ट :- न्यू मैंगलोर पोर्ट
अंशी राष्ट्रीय उद्यान
बन्नेरघाटा राष्ट्रीय उद्यान
नागरहोल राष्ट्रीय उद्यान
बांदीपुर राष्ट्रीय उद्यान
कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान
भाषा - कन्नड़
गठन - 1 नवंबर 1956

7) केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव ने बेहतर पर्यावरण के लिए हमारी जीवन शैली में स्थायी रूप से अपनाए जा सकने वाले छोटे बदलावों के बारे में जनता के बीच अधिक जागरूकता फैलाने के लिए एक शुभंकर 'प्रकृति' का शुभारंभ किया।

8) सूचना मंत्रालय ने विभिन्न प्रसारण लाइसेंसों, अनुमतियों और पंजीकरणों के लिए आवेदनों की त्वरित फाइलिंग और प्रसंस्करण सुनिश्चित करने के लिए एक नई प्रसारण सेवा वेबसाइट शुरू की।

9) हिमाचल प्रदेश के शिक्षा मंत्री गोविंद सिंह ठाकुर ने घोषणा की कि आगामी सत्र में कक्षा 9 से 12 तक के सभी छात्रों को 'श्रीमद्भगवद गीता' एक विषय के रूप में पढ़ाया जाएगा।

▪️ हिमाचल प्रदेश :-
मुख्यमंत्री :- जय राम ठाकुर
राज्यपाल :- राजेंद्र विश्वनाथी
➠Kinnaura tribe , Lahaule Tribe, Gaddi Tribe and Gujjar Tribe
➠Sankat Mochan Temple.
➠Tara Devi Temple
➠Great Himalayan National Park
➠Pin Valley National Park
➠Simbalbara National Park
➠Inderkilla National Park

10) तमिलनाडु के मुख्यमंत्री एम के स्टालिन ने 60 विशेषताओं वाला 'कावल उथवी' ऐप लॉन्च किया जो किसी भी आपात स्थिति के दौरान पुलिस सहायता लेने में मदद करेगा।

▪️तमिलनाडु :-
➠ Anaimalai Tiger Reserve
➠North Chennai Thermal Power Station
➠ Gulf of Mannar Marine 
National Park
➠ Ennore Thermal Power Station
➠ Mudumalai National Park 
➠ Mukurthi National Park  
➠ Guindy National Park

11) एलोन मस्क, टेस्ला और स्पेसएक्स के संस्थापक फोर्ब्स की सूची में पहली बार 219 बिलियन डॉलर की संपत्ति के साथ शीर्ष पर हैं।
➠ फोर्ब्स की अरबपतियों की सूची में एलोन मस्क 219 बिलियन डॉलर की संपत्ति के साथ सबसे आगे हैं, इसके बाद अमेज़ॅन के प्रमुख जेफ बेजोस 171 बिलियन डॉलर के साथ हैं।
➠मुकेश अंबानी वैश्विक सूची में 10वें स्थान पर हैं, उसके बाद साथी उद्योगपति और अदानी समूह के संस्थापक गौतम का स्थान है।

12) प्रख्यात कवि और साहित्यकार प्रो रामदरश मिश्रा को उनकी कविताओं के संग्रह 'मैं तो यहां हूं' के लिए प्रतिष्ठित सरस्वती सम्मान, 2021 से सम्मानित किया जाएगा।

➠1991 में स्थापित, सरस्वती सम्मान देश के सबसे प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कारों में से एक है।

13) भारत की तीन सांस्कृतिक विरासतों अर्थात् कोंकण क्षेत्र के महाराष्ट्र के जियोग्लिफ्स, मेघालय के जिंगकींग जरी, और आंध्र प्रदेश के श्री वीरभद्र मंदिर और मोनोलिथिक बुल (नंदी) ने यूनेस्को की विश्व धरोहर स्थलों की अस्थायी सूची में जगह बनाई है, जो कुल मिलाकर 49 अस्थायी सूची में है।

➠ एक विश्व धरोहर स्थल संयुक्त राष्ट्र शैक्षिक, वैज्ञानिक और सांस्कृतिक संगठन (यूनेस्को) द्वारा प्रशासित एक अंतरराष्ट्रीय सम्मेलन द्वारा कानूनी संरक्षण के साथ एक मील का पत्थर या क्षेत्र है।

14) टाटा पावर की सौर इकाई टाटा पावर सोलर ने भारत के राजस्थान राज्य के जेटसर में 160 मेगावाट की एसी सौर परियोजना शुरू की है।
▪️ राजस्थान :-
Governor - Kalraj Mishra
➭Amber Palace
➭Hawa Mahal
➭Ranthambore National Park
➭City Palace
➭Keoladeo Ghana National Park
➭Sariska National Park.
➭ Kumbhalgarh Fort

15) उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने श्रावस्ती जिले के जयचंदपुर कटघरा उच्च प्राथमिक विद्यालय से "स्कूल चलो अभियान" का शुभारंभ किया।
➠ श्रावस्ती जिले की साक्षरता दर राज्य में सबसे कम है।

▪️ उत्तर प्रदेश
Governor - Smt. Anandiben Patel
➨Chandraprabha Wildlife Sanctuary
➨Dudhwa National Park
➨National Chambal Sanctuary
➨Govind Vallabh Pant Sagar Lake
➨Kashi Vishwanath Temple

16) ओहियो स्टेट सीनेट ने फिल्म निर्देशक विवेक अग्निहोत्री को उनकी फिल्म 'द कश्मीर फाइल्स' के सम्मान में एक प्रशस्ति पत्र प्रस्तुत किया है।

17) हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) ने अंतरिक्ष में भारत के पहले मानवयुक्त मिशन के लिए भारतीय अंतरिक्ष और अनुसंधान संगठन (इसरो) को गगनयान हार्डवेयर का पहला सेट सौंपा।

▪️हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड :-
➠स्थापित - 1940 (हिंदुस्तान एयरक्राफ्ट के रूप में), 1964 (हिंदुस्तान एयरोनॉटिक्स के रूप में)
➠मुख्यालय - बैंगलोर, कर्नाटक।
➠Industry - Aerospace and Defence
➠Chairman & MD - R Madhavan

≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡