१८ एप्रिल २०२२

घटनादुरूस्ती 1 ते 30 पर्यंत

पहिली घटनादुरूस्ती [1951]
राष्ट्रपती : राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
१) सामा., आर्थिक मागास वर्गीयांसाठी विशेष तरतूदींचा अधिकार राज्यांना

२) मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी तरतूदी असणारे कायदे

३) जमीन सुधारणा, इतर कायद्यांचे न्याया. पुर्नविलोकनापासून संरक्षणासाठी ९ वे परिशिष्ट जोडण्यात आले.

४) भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला  निर्बंध घालणाऱ्या तीन आधारांचा

सार्व. सुव्यवस्था
परराष्ट्र मंत्री
गुन्ह्याला उत्तेजन यावरून मर्यादा घालने न्यायप्रविष्ठ राहील.
५) राज्यसंस्थेने कोणताही व्यापार/  उद्योगाचे राष्ट्रीयीकरण केल्याने व्यापार/  उद्योग करण्याचा हक्क भंग होतो या आधारावर कृती अवैध ठरवता येणार नाही.

दुसरी घटनादुरूस्ती [1952]
राष्ट्रपती : राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
लोकसभेच्या एक सदस्य ७.५ लाख  लोकसंख्येचे प्रतिनिधीत्व करेल. या पद्धतीने लोकसभेतील प्रतिनिधीत्वाच्या प्रमाणाची पुर्नरचना केली जाईल.

तिसरी घटनादुरूस्ती [1954]
राष्ट्रपती : राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
सार्वजनिक हितासाठी अन्नधान्य,  जनावरांचा चारा,  कच्चा कापूस, कापूस बियाणे, कच्चा ताग यांचे उत्पादन पुरवठा, वितरण यांवर  नियंत्रण ठेवण्यासाठी संसदेला  अधिकार दिले.

चवथी घटनादुरूस्ती [1955]
राष्ट्रपती : राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
१) खाजगी मालमत्तेचे अनिवार्य पणे प्राप्ती केल्यानंतर देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईचे प्रमाण ठरविणे आणि विषय न्यायीक पुर्नविलोकना बाहेर ठेवणे२) कोणताही व्यापार राष्ट्रीयकृत  करण्यासाठी राज्य संस्थेला सत्ता दिली.३) ९ व्या परिशिष्टामध्ये अजून काही विषय समाविष्ट केले.४) अनुच्छेद ३१ (अ) ची व्याप्ती वाढवण्यात आली.

पाचवी घटनादुरूस्ती [1955]
राष्ट्रपती : राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
राज्यक्षेत्रावर,  सीमारेषेवर,नामांतरावर परिणाम करणाऱ्या  प्रस्तावित केंद्रीय कायद्यावर मत  प्रदर्शन करण्यासाठी  राज्याची कालमर्यादा निश्चित केली जावी  यासाठी राष्ट्रपतींना अधिकार देण्यात आले.

सहावी घटनादुरूस्ती [1955]
राष्ट्रपती : राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
केंद्र सूचीत नवीन विषय समाविष्ट राज्यांतर्गत व्यापार दळणवळण दरम्यान होणाऱ्या वस्तूंच्या खरेदी विक्रीवर कर लावणे या संदर्भात राज्याच्या अधिकारावर निर्बंध घातले.

सातवी घटनादुरूस्ती [1956]
राष्ट्रपती : राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
१) राज्य वर्गीकरण अ.ब.क.ड. संपवून भाग-७ रद्द केला.

२) १४ राज्य, ६ के.प्र. यांना मान्यता मिळाली.

३) के.प्र. पर्यंत HC अधिकारक्षेत्रात वाढ केली.

४) दोन/अधिक राज्यासाठी सामाईक HC स्थापना करणे.

५) दोन/अधिक राज्यासाठी  एकच राज्यपाल.

६) HC मध्ये सहाय्यक, हंगामी न्याया. नियुक्ती बाबत.

आठवी घटनादुरूस्ती [1960]
राष्ट्रपती : राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
SC/ST आंग्ल यांच्या  प्रतिनिधीत्वासाठी L.S  आणि विधानसभेत आरक्षीत जागांची मुदत १० वर्षाकरिता वाढविण्यात आली. (१९७० पर्यंत)

नववी घटनादुरूस्ती [1960]
राष्ट्रपती : राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
भारत-पाक यांच्या  करारनाम्यानुसार (१९५८) बेरूबारी  संघाचा (प. बंगाल मधील) भारतीय भूप्रदेश पाकिस्तानला हस्तांतरीत करण्यात आला होता.

दहावी  घटनादुरूस्ती [1961]
राष्ट्रपती : राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
भारतीय  संघराज्यात दादर आणि नगर हवेलीचा  समावेश करण्यात आले आहे.

अकरावी घटनादुरूस्ती [1961]
१) संसदेच्या दोन्ही सभागृहाची  संयुक्त बैठक घेण्याऐवजी स्वतंत्र निर्वाचन मंडळाची तरतूद करून उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूक  क्रियेत बदल करण्यात आला.

२) राष्ट्रपती/उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीला निर्वाचन मंडळामध्ये रिक्त असलेल्या जागेच्या आधारे आव्हान देता येणार नाही.

बारावी  घटनादुरूस्ती [1962]
राष्ट्रपती : राजेंद्र प्रसाद
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
भारतीय संघराज्यात  गोवा, दमण,  या घटनादुरूस्ती द्वारे घटनेत समावेश करण्यात आला आहे.

तेरावी घटनादुरूस्ती [1962]
राष्ट्रपती : डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
नागालॅंडला घटकराज्याचा दर्जा देण्यात आला आणि यासंदर्भात विशेष तरतूदी करण्यात आल्या

चवदावी घटनादुरूस्ती [1962]
राष्ट्रपती : डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
१) भारतीय संघराज्यात  पाँडेचेरीचा समावेश  केला.२) हिमाचल प्रदेश, मणिपूर, त्रिपूरा, गोवा, दमणदीव आणि पाँडेचरी या केंद्रशासित प्रदेशासाठी विधीमंडळ आणि मंत्रीमंडळाच्या निर्मितीची पंधरावी घटनादुरूस्ती [1963]

राष्ट्रपती : डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
एखादा गुन्हा HC च्या परिक्षेत्रात  घडलेल्या असल्यास त्या खटल्या संदर्भात HC त्या परिक्षेत्राबाहेरील कोणत्याही व्यक्तीला/अधिसत्तेला
न्यायालयीन आदेश बजावू शकते2. HC न्यायाधीश निवृत्ती वर ६० वरून ६२ करण्यात आले.3. HC मधील सेवा निवृत्त न्यायाधीशाला त्याच HC मध्ये हंगामी न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्याची तरतूद.4.  HC मधील सेवानिवृत्त न्यायाधीशाला SC चा अस्थायी न्यायाधीश म्हणून कार्य करू शकते.5.HC  SC न्यायालयातील न्यायाधीशांच्या वय निश्चितीची  कार्यपद्धती.

सोळावी घटनादुरूस्ती [1963]
राष्ट्रपती : डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
१) राज्यसंस्थेला भारताचे सार्वभौत्व अखंडता यासाठी भाषण-अभिव्यक्ती शांततापूर्ण एकत्र जमणे, संगठनासंस्था स्थापन करणे या मुलभूत हक्कावर आणखी निर्बंध लादण्याचे अधिकार प्रदान.

२) कायदेंडळासाठी निवडणूक  लढवणारे उमेदवार कायदेंडळाचे  सदस्य, मंत्री, न्यायाधीश आणि भारताचे  महालेखापरिक्षक यांनी करावयाच्या सत्य विधान आणि शपथेच्या प्रारूपामध्ये सार्वभौत्व आणि अखंडता या शब्दाचा समावेश.

सतरावी घटनादुरूस्ती [1964]
राष्ट्रपती : डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण
पंतप्रधान : पंडित जवाहरलाल नेहरू
१) बाजारभावाप्रमाणे  नुकसान भरपाई दिल्याशिवाय व्यक्तीगत  लागवडीखालील असलेली जमीन प्राप्त  करण्यास प्रतिबंध.२) ९ व्या परिशिष्टामध्ये आणखी ४४ कायद्यांचा समावेश केली.

अठरावी घटनादुरूस्ती [1966]
राष्ट्रपती : डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण
पंतप्रधान : लाल बहादुर शास्त्री
एखाद्या घटकराज्यांच्या किंवा  के.प्र. एखादा भाग दुसऱ्याएखाद्या घटकराज्याला  किंवा कें.प्र. जोडून नवीन घटकराज्य किंवा कें.प्र निर्माण करण्याचा संसदेचा हा अधिकार तिच्या ‘नविन  घटकराज्य निर्माण करण्याच्या अधिकारामध्ये अंतर्भूत आहे.’

एकोणीसावी घटनादुरूस्ती [1966]
राष्ट्रपती : डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण
पंतप्रधान : लाल बहादुर शास्त्री
निवडणूक न्यायासनाची व्यवस्था रद्द केली आणि निवडणूक याचिका सूनवाईचा अधिकार उच्च न्यायालयांना दिला.

विसावी घटनादुरूस्ती [1966]
राष्ट्रपती : लाल बहादुर शास्त्री
पंतप्रधान : इंदिरा गांधी
सर्वोच्च  न्यायालयाने अवैध घोषित केलेल्या उत्तर प्रदेशातील जिल्हा न्यायाधीशांच्या विशिष्ट नियुक्त्यांना वैध ठरविले.

एकविसावी घटनादुरूस्ती [1967]
राष्ट्रपती : डॉ झाकीर हुसेन
पंतप्रधान : इंदिरा गांधी
सिंधी भाषेचा  आठव्या परिशिष्टामध्ये १५ वी भाषा  म्हणून नव्याने समावेश केला.

बाविसवी घटनादुरूस्ती [1969]
राष्ट्रपती : डॉ झाकीर हुसेन
पंतप्रधान : इंदिरा गांधी
आसाम राज्यापासून नवीन स्वायत्त राज्य म्हणून मेघालय राज्याची निर्मिती केली.

तेवीसवी घटनादुरूस्ती [1969]
राष्ट्रपती : डॉ झाकीर हुसेन
पंतप्रधान : इंदिरा गांधी
SC/ST आणि  आंग्ल भारतीयांच्या प्रतिनिधीत्वासाठी लोकसभा आणि  विधानसभेत आरक्षित जागांची मुदत १० वर्षासाठी वाढवण्यात आली(१९८० पर्यंत)

चोवीसवी घटनादुरूस्ती [1971]
राष्ट्रपती : डॉ झाकीर हुसेन
पंतप्रधान : इंदिरा गांधी
१) FR सहघटनेतील कोणत्याही भागात घटनादुरूस्तीचा अधिकार संसदेला आहे.२) घटनादुरूस्ती विधेयकाला  संमती देण्याचे राष्ट्रपतींवर बंधन टाकण्यात आले.

पंचविसावी  घटनादुरूस्ती
राष्ट्रपती : डॉ झाकीर हुसेन
पंतप्रधान : इंदिरा गांधी
१) मालममत्ता हक्कासंबंधीतरतूदीमध्ये ’भरपाई’ शब्दाऐव जी ’रक्कम‘ हा शब्द समाविष्ट केला तसेच मालमत्तेचा मुलभूत हक्क संकूचित करण्यात आला.

२) मधील अ-३९ (इ) किंवा ( मधील तरतूदींच्या परिणामकारकतेसाठी करण्यात आलेल्या कोणत्याही कायद्याला अ-१४, १९, ३१ मध्ये दिलेल्या हक्कांचे उल्लंघन झाले या कारणावरून आव्हान देता येणार नाही. त्यासाठी राज्यघटनेत ३१ (उ) हे नवीन अनुच्छेद जोडण्यात आले

26 वी घटनादुरूस्ती [1971]
राष्ट्रपती : व्ही.व्ही गिरी
पंतप्रधान : इंदिरा गांधी
संस्थानिकांचे तनखे आणि विशेषाधिकारी रद्द केले.

27 घटनादुरूस्ती [1971]
राष्ट्रपती : व्ही.व्ही गिरी
पंतप्रधान : इंदिरा गांधी
१) विशिष्ट केंद्रशासित प्रदेशांच्या  प्रशासकांना अध्यादेश जारी करण्याचा अधिकार.२) अरूणाचल प्रदेश आणि मिझोराम या नवीन केंद्रशासित प्रदेशांसाठी काही विशेष तरतुदींचा समावेश.३) मणिपूर या नवीन घटक राज्यासाठी विधानसभा आणि मंत्रिमंडळाची निर्मिती करण्याचा  अधिकार संसदेला प्रदान.

28 वी  घटनादुरुस्ती [1972]
राष्ट्रपती : व्ही.व्ही गिरी
पंतप्रधान : इंदिरा गांधी
१) भारतीय सनदी सेवकांचे  (आय.सी.एस) विशेषाधिकार रद्द केले आणि त्यांच्या सेवाशर्ती निश्चित करण्याचा अधिकार संसदेला प्रदान.

29 वी घटनादुरूस्ती [1972]
राष्ट्रपती : व्ही.व्ही गिरी
पंतप्रधान : इंदिरा गांधी
१) केरळ राज्याने जमीन सुधारणेबाबत केलेले दोन कायदे ९ व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट केले.

30 वी घटनादुरूस्ती [1972]
राष्ट्रपती : व्ही.व्ही गिरी
पंतप्रधान : इंदिरा गांधी
१) एखाद्या दिवाणी खटल्यामध्ये  २०,००० किंवा त्यापेक्षा अधिक रकमेचा समावेश असेल तर सर्वोच्च न्यालयालयाकडे अपील करण्याची मान्यता असलेली तरतूद रद्द करण्यात आली. त्याएवेजी एखाद्या खटल्यामध्ये केवळ कायद्याचा महत्वपूर्ण प्रश्न निहीत असेल तरच अशा दिवाणी खटल्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाकडे अपील केलीजाऊ शकते, अशी तरतूद केली

७३ वी घटना दुरुस्ती

७३ वी घटना दुरुस्ती
७३ वी घटना दुरुस्ती
राज्य घटनेत करण्यात आलेला बदल
घटना दुरुस्तीचा मुख्य उद्देश
सर्व सामान्य माणसाला विकास काम व नियोजनात सहभाग देणारा कायदा
७३ वी घटना दुरुस्ती
देशाच्या विकासाच्या दृष्टीने पंचायत राज्याचे महत्त्व ओळखून त्याला आपल्या राजकीय कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान देण्याचा निर्णय भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी घेतला. दारिद्रय रेषेखालील लोकांसाठी केंद्र सरकारच्या योजना राज्य सरकार द्वारे व त्यांच्या सहभागानेच राबविणे शक्य होते. पंचायत राज व्यवस्थेविषयी राज्य सरकारे उदासिन होती. देशातील लोकशाही व्यवस्थेमध्ये “पंचायत राज व्यवस्थेला” स्वायत्त संस्था म्हणून स्थान दयावयाचे असेल तर त्याच्या मुलभूत व्यवस्थेची तरतूद असणारी घटना दुरुस्ती करण्याचे नक्की ठरले. त्यासाठी ६४ वे घटना दुरुस्तीचे विधेयक लोकसभेपुढे मांडण्यात आले. लोकसभेने ते १८८९ च्या ऑगस्टमध्ये मंजूर केले. परंतु कॉंग्रेस या सत्ताधारी पक्षाला राज्य सभेत बहूमत नसल्यामुळे ह्या विधेयकाला राज्य सभेची मंजूरी मिळाली नाही. त्यानंतर त्यांनी ते विधेयक पून्हा दुसऱ्यांदा १९९० च्या सप्टेंबर महिन्यात व्ही.पी.सिंग यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय आघाडी सरकारने लोकसभेत मांडले. परंतु बिलावर चर्चा होण्यापूर्वीच राष्ट्रीय आघाडी सरकार कोसळले व लोकसभा बरखास्त झाली. त्यामुळे हे विधेयक आपोआप बारगळले. त्यानंतर ते विधेयक पी.व्ही.नृसिंहराव सरकारने सप्टेंबर १९९१ मध्ये लोकसभेत तिसऱ्यांदा मांडले. त्याला २२ डिसेंबर १९९२ रोजी मंजूरी दिली. आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे २३ डिसेंबर १९९२ रोजी राज्य सभेने ते मंजूर केले.

अशा तऱ्हेने केंद्र सरकारने पंचायत राज्य पद्धतीला बळकट करणारी ७३ वी घटना दुरुस्ती केली. राष्ट्रपतींनी त्या दुरुस्तीला २० एप्रिल १९९३ रोजी मान्यता दिली आणि भारतात तिची अंमलबजावणी २४ एप्रिल १९९३ पासून सुरु झाली. केंद्र सरकारने राज्य सरकारांना पंचायती राज्य पद्धती सुरु करण्याकरीता कायदे करण्यास सांगितले. लोकसभेने ७३ वी व ७४ वी घटना दुरुस्ती कायदा केला.

राज्य घटनेत करण्यात आलेला बदल
७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाने “पंचायती” या शिर्षकाखाली “भाग ९-अ” हा नवा भाग राज्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आला आहे. त्यामध्ये कलम २४३ ते कलम २४३-ओ अशी कलमे समाविष्ट केलेली आहेत. याशिवाय या कायदयाने राज्य घटनेला ११ वे परिशिष्ट जोडले असून त्यामध्ये पंचायत राज संस्थाच्या अधिकार कक्षेत येणाऱ्या विषयांची माहिती दिली आहे.

७३ व्या घटना दुरुस्तीने पंचायत राज्यांची स्थापना करण्याचे बंधन प्रत्येक राज्यावर घातले आहे. त्यामुळे पंचायत राज्याची स्थापना ही आता राज्याची “घटनात्मक जबाबदारी” ठरली आहे. राज्य घटनेच्या २४३-बी या कलमान्वये राज्यामध्ये ग्राम, मध्य व जिल्हा स्तरावर पंचायतीची स्थापना करता येईल. मात्र ज्या राज्यांची लोकसंख्या वीस लाखांपेक्षा कमी असेल अशा राज्यात मध्यस्तरावरील पंचायतीची स्थापना केली नाही तरी चालेल, अशी सवलत देण्यात आली आहे.

घटना दुरुस्तीचा मुख्य उद्देश
पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त करून देणे हा ७३ व्या घटना दुरुस्ती कायदयाचा मुख्य उद्देश होता. या घटनादुरुस्तीमुळे पंचायत राज्य संस्थांना घटनात्मक संरक्षण मिळाले आहे. याचाच अर्थ असा की, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याप्रमाणे पंचायत राज्यालाही राज्य घटनेची मान्यता मिळाली आहे. या घटनादुरुस्तीमुळे राज्य सरकारे आता पंचायत राज्य संस्थांच्या बाबतीत पूर्वीप्रमाणे हस्तक्षेप व मनमानी करू शकत नाहीत. पंचायत राज्य संस्थांच्या निवडणूका घेणे किंवा त्यांना अधिकार देणे या गोष्टी आता राज्य सरकारच्या मर्जीवर पूर्वीप्रमाणे अवलंबून राहीलेल्या नाहीत. बऱ्याचशा वेळा राज्यामध्ये शासन करणाऱ्या राजकीय पक्षांना निवडणूक घेण्याकरीता अनुकूल परिस्थिती नसल्यास, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना मुदतवाढ देऊन निवडणुका पुढे ढकलल्या जात असत. महाराष्ट्रात एकेकाळी निवडणुकींना मुदतवाढ देऊन जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीच्या निवडणुका तब्बल १२ वर्षानंतर घेण्यात आल्या होत्या. आता दर पाच वर्षांनी निवडणुका घेण्याचे बंधन घालण्यात आले आहे. घटना दुरुस्तीमुळे राज्य घटनेमध्ये ज्याकाही तरतूदी असतील त्यांचे पालन करणे राज्य सरकारांना बंधनकारक आहे.

सर्व सामान्य माणसाला विकास काम व नियोजनात सहभाग देणारा कायदा
२४ एप्रिल १९९३ या दिवसापासून ७३ वी घटना दुरुस्ती अंमलात आली. यामुळे भारतातील सर्व राज्यात गावपातळी, जिल्हापातळी आणि या दोन्हीमधील तालुका विकास गट पातळी अशी त्रिस्तरीय पंचायत राज्य पद्धती सुरु झाली. महाराष्ट्रामध्ये १९५८ च्या मुंबई ग्रामपंचायत अधिनियमाने आणि १९६१ च्या महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदयाने ती अगोदरच सुरु झाली होती. ७३ व्या घटना दुरुस्तीने त्यास घटनात्मक दर्जा मिळाला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांना आपल्या क्षेत्रात सामाजिक न्याय आणि आर्थिक विकासाच्या कार्यक्रमात निर्णय घेण्याचे आणि अंमलबजावणी करण्याचे अधिकार या घटना दुरुस्तीने दिले. लोकांना आपल्या प्रतिनिधीक संस्थेच्या माध्यमातून अधिकार दिल्यास ते विकासाच्या म्हणजेच समाज परिवर्तनाच्या कामात सहभागी होतील. त्यांनी स्वतः निर्णय घेतल्यामुळे उत्तर दायित्वाची भावना निर्माण होईल, सामुदायिक कामांना चालना मिळेल आणि ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात स्थानिक नेतृव्याचा उदय होईल असा या घटना दुरुस्तीचा उद्देश आहे. देशाच्या शासन व्यवस्थेमध्ये हा महत्त्वाचा टप्पा असून त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा प्राप्त झाला.

या घटना दुरुस्तीतील कलम २४३ अन्वये गावकारभारात लोकांचा सहभाग वाढावा या हेतूने ग्रामसभेचे आयोजन करणे हे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवक यांच्यावर बंधनकारक केलेले आहे. गावाच्या विकासाची दिशा व विचार केंद्र सरकारातील तसेच राज्य सरकारातील राज्यकर्त्यांपेक्षा गावातील स्थानिक गावकरी, स्त्री, पुरुष अधिक चांगल्या पद्धतीने करू शकतात यावर या कायदयाने शिक्कामोर्तब केले.

42वी घटनादुरुस्ती 1976

42वी घटनादुरुस्ती 1976: या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून ओळखले जाते
1)  प्रस्तावनेमध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष, अखंडता या तीन नवीन शब्दांचा समावेश केला.

2) नागरिकांसाठी मूलभूत कर्तव्ये हा नवीन भाग कलम ५१ (अ) मध्ये समाविष्ट केला.

3) राष्ट्रपतीने मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच कारभार करण्याचे बंधनकारक केले.

4) प्रशासकीय न्यायासन आणि इतर विषयांसाठी न्यायासनाची तरतूद

5) 1971 च्या जनगणनेच्या आधारावर २००१ पर्यंत लोकसभा आणि विधानसभेच्या जागांची निश्चिती

6) घटनादुरुस्त्या ह्या न्यायालयीन पुनर्विलोकनाच्या कक्षेबाहेर ठेवल्या.

7) न्यायालयीन पुनर्विलोकन आणि सर्वोच्च व उच्च न्यायालयाचा आदेश, अधिकार क्षेत्राचा संकोच केला.

8) लोकसभा आणि विधानसभा यांचा कार्यकाळ 5 वरून 6 वर्षे करण्यात आला.

9) मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी करण्यासाठी केलेल्या कायद्यांमुळे काही मूलभूत हक्कांचे उल्लंघन होते. या आधारावर न्यायालये त्यांना अवैध घोषित करू शकत नाही.

10) देश विघातक कारवायांना हाताळण्यासाठी कायदे करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आणि अशा कायद्यांचे मूलभूत हक्कांवर देखील श्रेष्ठत्व असेल.

11) तीन नवीन मार्गदर्शक तत्वांची भर घालण्यात अली. उदा. समान न्याय आणि मोफत कायदेशीर मदत; उद्योगांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग आणि पर्यावरण, जंगले व प्राण्यांचे संरक्षण

12) भारताच्या कोणत्याही भागामध्ये राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा करणे सुकर केले.

13) घटक राज्यातील राष्ट्रपती राजवटीचा एकवेळ (सलग) कालावधी ६ महिन्यांवरून १ वर्ष करण्यात आला.

14) राज्यसूचीतील ५ विषय समवर्तीसूची मध्ये स्थानांतरित केले.
शिक्षण ,जंगले, जंगली प्राणी आणि पक्षांचे संरक्षण , वजन आणि मापे आणि न्यायाचे प्रशासन, सर्वोच्च आणि उच्च न्यायालये वगळता इतर सर्व न्यायालयांची स्थापना आणि संरचना.

15) संसद आणि राज्य विधिमंडळातील गणपूर्तीची आवश्यकता रद्द केली.

16) अखिल भारतीय न्यायिक सेवेच्या निर्मितीसाठी तरतूद

भारतीय राज्यघटना – Indian Polity

भारतीय राज्यघटना – Indian Polity

भारताची राज्यघटना उद्देशिका (Preamble), मुख्य भाग व १२ पुरवण्या (परिशिष्टे) अशा स्वरूपात विभागली आहे. मुख्य संविधानाचे २५ भाग असून त्यांची अनेक प्रकरणांमध्ये विभागणी केलेली आहे. सुरुवातीच्या ३९५ कलमांपैकीची काही कलमे आता कालबाह्य झाली आहेत. सध्या राज्यघटनेत ४४८ (जानेवारी २०२०) कलमे असून भारतीय संविधान हे विस्ताराने जगातले सर्वांत मोठे संविधान आहे. भारताची राज्यघटना ही अतिशय लवचीक असून तिच्या मदतीने जगातील इत्तर राज्यघटनांपेक्षा जास्त प्रकारचे कायदे करता येतात. आपल्या घटनेने प्रत्येकाला एकच नागरिकत्व दिले आहे व प्रत्येकाला एका मताचा अधिकार दिला आहे. आपली घटना हि जगातील सगळ्यात मोठी घटना आहे.

भारतीय राज्यघटना : घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्त्वाची कलमे/ठळक वैशिष्ट्ये , केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मुलभूत ग्क्क व कर्तव्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे- शिक्षण, युनिफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका.

भारतीय राज्यघटनेत घेतलेल्या गोष्टी

एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे
भाग I कलम १ ते ४ संघ आणि त्याचे राज्यक्षेत्र
भाग II कलम ५ ते ११ नागरिकत्व
भाग III कलम १२ ते ३५ मूलभूत हक्क
भाग IV कलम ३६ ते ५१ राज्याचे मार्गदर्शक तत्वे
भाग IVA कलम ५१ A मूलभूत कर्त्यव्ये
भाग V कलम ५२ ते १५१ केंद्र सरकार (संघराज्य)
भाग VI कलम १५२ ते २३७ राज्य सरकार
भाग VII 7 वी घटनादुरुस्ती रद्द
भाग VIII कलम२३९-२४२ केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
भाग IX कलम २४३-२४३O पंचायतराज
– ग्रामपंचायत , पंचायत समिती , जिल्हा परिषद
– नगर पंचायत
भाग IX A कलम २४३P – २४३ZG नगरपालिका
भाग IX B कलम ZH – कलम ZT सहकारी संस्था
भाग X कलम २४४-२४४A अनुसूचित जाती व जमातीप्रदेश /क्षेत्र, आदिवासी क्षेञ
भाग XI कलम २४५ – २६३ संघ-राज्य संबंध
भाग XII कलम २६४-३००A महसुल – वित्त, मालमत्ता, करार व फिर्याद
भाग XIII कलम ३०१-३०७ व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध
भाग XIV कलम ३०८-३२३ केंद्र आणि राज्यांतर्गत सेवा, प्रशासकीय लोकसेवा आयोग
भाग XIV A कलम ३२३A, ३२३B न्यायाधिकरणे
भाग XV कलम ३२४-३२९A निवडणुका
भाग XVI कलम ३३०-३४२ अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी
भाग XVII कलम ३४३-३५१ कार्यालयीन भाषा
भाग XVIIII कलम ३५२-३६० आणीबाणी विषयक तरतुदी
भाग XIX कलम ३६१-३६७ संकीर्ण
भाग XX कलम ३६८ संविधान दुरुस्ती बाबत (घटनादुरूस्ती तरतुदी)
भाग XXI कलम ३६९-३९२ अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष तरतुदी
भाग XXII कलम ३९३-३९५ संक्षिप्त शीर्षक, प्रारंभाची तारीख, हिंदीमधील अधिपत्र आणि मजकूर.
भारतीय राज्यघटना – एकूण २२ भाग